पर्यावरण संवेदनशील इमारती/ शहरे (Environment sensitive buildings/ urban Development): गरज

गेली काही वर्षे आणि विशेषतः गेले काही महिने आपण वातावरण बदलाचे परिणाम अनुभवतोय. दरवर्षी होणारी पाणी कपात, दुष्काळामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, लातूरला पाठवलेली जलदूत रेल्वे ह्या सारख्या बातम्या आपल्याला नित्याच्या झाल्या आहेत. बर्याच वेळेला ह्या विषयांवर अनेक मंचांवर झालेल्या चर्चाही आपण पहिल्या आहेत किंवा केल्याही आहेत. मिपा वरही अनेक धाग्यातून ह्या विषयांवर चर्चा झाल्या आहेत. ह्या विषयावर होणाऱ्या बहुतेक चर्चांमध्ये आपण आता मान्य करतोय कि वातावरण बदल (climate change) होतोय आणि त्याचा मानवी जीवनावर दुष्परिणाम होत आहे. अनेक माध्यमातून होणाऱ्या सततच्या चर्चांमुळे ह्या विषयावर जनजागृतीही मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि हि एक खरच चांगली गोष्ट आहे. परंतु अनेक वेळा ह्या चर्चा मध्ये असा दिसून येत कि एक नकारात्मक किंवा फक्त भावनात्मक दृष्टीने ह्या विषयाकडे बघितला जात आहे. बहुतांश वेळा आपण पाहतो कि नागरिकांमध्ये ह्या विषयावर एकप्रकारचा ignorance असतो किंवा संवेदांशिलतेमुळे आलेला तात्पुरता अपराधगंड (gilt) असतो. पहिली गोष्ट जास्त घातक असली तरी दुसरी गोष्टदेखील फारशी उपयोगी नाहीये कारण तात्पुरत्या आलेल्या अपराधागंडा मुले जे उपाय आपण आचरणात आणतो ते दीर्घकालपर्यंत आचरणात आणू शकत नाही. उदाहरणार्थ आपण उन्हाळ्यात आठवड्यातून एकदाच गाडी धुतो, दोनदाच कपडे धुतो पण जरा पाऊस चालू झाला कि आपण दुष्काळ विसरून त्या गोष्टी रोजच्या रोज पुन्हा करायला लागतो पुढचा उन्हाळा येईपर्यंत. ह्या विषयावर शाश्वत, दीर्घकाळ टिकणाऱ्या उपायांची चर्चा आपण केली पाहिजे.
इथे आपण शाश्वत विकासाची संकल्पना समजावून घेउ. जागतिक स्तरावर शाश्वत विकासाची व्याख्या फार सुंदर पणे केली आहे: “शाश्वत विकास म्हणजे आजच्या गरजा आपण अशाप्रकारे पूर्ण केल्या पाहिजेत कि पुढील पिढ्यांना देखील त्यांच्या गरजा कोणत्याही तडजोडीविना पूर्ण करता आल्या पाहिजेत.” इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे कि आजच्या गरजादेखील पूर्ण होणे अपेक्षित आहे. आजच्या गरजांमध्ये तडजोड करून भविष्याची तरतूद करा असे म्हणणे योग्य होणार नाही. विकासाचे चक्र थांबवणे किंवा उलटे फिरवणे आता शक्य नाही आहे. प्रत्येक व्यक्तीच्या, समाजाच्या, देशाच्या काही आकांक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत आहे. गरजा कमी करा असे सांगणे सोपे असले तरी त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे खरच अवघड आहे. त्यामुळे योग्य त्या गरजा योग्य पद्धतीने, आणि पर्यावरण पूरक विकाल्पानी (alternative) पूर्ण करणे हा सुवर्णमध्य होऊ शकतो.
आपण ज्यावेळी देशाच्या विकासाची चर्चा करतो त्यावेळी वाढणारे शहरीकरण आणि सुधारणारे राहणीमान हे मुद्दे महत्वाचे ठरतात. आणि म्हणूनच दुष्काळ किंवा वातावरण बदलावर विचार करत असताना इमारत निर्माण किंवा शहराचे नियोजन ह्यावर विचार करण्याची गरज निर्माण होते.
पर्यावरण संवेदनशील इमारत आणि शहर नियोजन ह्याची गरज खरच आहे का ? ह्या प्रश्नावर विचार करताना मी जाणीवपूर्वक पर्यावरण पूरक (इकोफ्रेंडली) हा शब्द वापरत नाही आहे, कारण इकोफ्रेंडली असे बांधकाम अथवा विकास असूच शकत नाही. कुठलीही इमारत अथवा शहर ज्यावेळी बनते त्या वेळी तिथल्या पर्यावरणातील अनेक घटकांवर चांगले वाईट परिणाम करूनच बनते. एखाद्या रिकाम्या ओसाड जागेचा जरी विचार केला तरी त्यावर खुरटे गावात वाढत असते, अनेक कीटक, वनस्पती ह्यांचा ती जागा अधिवास असतो, तिथे पावसाचे पाणी जमिनीत मुरत असते, ह्या सर्व गोष्टी आपण इमारत बांधतो त्यावेळी एकतर नष्ट होतात किंवा त्यात बदल होतो. अगदी शेती करणे हा देखील एकप्रकारे स्थानिक ecosystem मध्ये केलेला मानवी अधिक्षेपच आहे. त्यामुळे शहरातील घरे तेव्हडी वाईट आणि खेड्यांमध्ये असलेली किंवा जुन्या पद्धतीने बांधलेली घरे चांगली असे सरसकटीकरण करता येणार नाही. प्रयेक बांधकामाचा पर्यावरणावर परिणाम हा होतच असतो. पण पर्यावरणाविषयी संवेदनशील राहून हा परिणाम किती कमी करता येईल ह्याच्यावर आपण विचार करू शकतो. म्हणूनच पर्यावरणाविषयी संवेदनशील इमारती किंवा विकास असा शब्द वापरणे योग्य होईल.
अनेक वर्षे असा विचार केला जायचा कि वायू व जलप्रदूषण किंवा अनेक समस्या ह्या फक्त विविध मोठ्या उद्योगान्मुळेच (industry) होतात आणि रहवासी अथवा इतर उपयोगी इमारतींचा पर्यावरणावर परिणाम (impact) फारसा नसतो. ह्या विचारामुळेच आपल्याकडे इमारतींसाठी पर्यावरण रक्षणासाठी कुठलेही नियम बनलेच नाहीत किंवा त्यांचा विचारही फारसा झाला नाही. परंतु गेल्या दशकात झालेल्या प्रचंड शहरीकरणामुळे आणि निर्माण झालेल्या बेसुमार इमारतीमुळे होणारे परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसू लागले, विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आणि मग आपण ह्या विषयावर बोलू लागलो. ह्या विषयी काही नियम हि आता बनू लागले आहेत.
वास्तविकपणे कुठलीही इमारत हि मुळातच प्रचंड resource intensive असते. कुठल्याही प्रकारची इमारती बांधण्यासाठी किंवा वापरण्यासाठी अनेक resources ची गरज असते आणि ह्याच इमारती ह्या विविध प्रकारच्या कचरा व सांडपाण्याची निर्मिती केंद्रेही असतात. इमारत बांधण्यासाठी वेगवेगळी बांधकाम साहित्ये (materials) वापरावी लागतात. हि साहित्ये बनवताना विविध प्रकारचे नैसर्गिक स्त्रोत वापरले जातात किंवा प्रदूषित होतात. हे साहित्य प्रत्यक्ष बांधकामाच्या जागेवर आणण्यासाठी वेगवेगळी वाहतूक साधने (mode of transport) वापरावी लागतात त्यामुळे प्रदूषण होते. प्रत्यक्ष बांधकामाच्या जागेवर पाणी वीज इत्यादी अनेक resources वापरले जातात. बांधकामाच्या ह्या प्रक्रियेत वेगवेगळा कचरा, राडारोडा तयार होतो आणि तो कुठेही फेकल्यामुळे जमिनीचे प्रदूषण होते. आता हि बांधून पूर्ण झालेली इमारत वापरात येते पण त्या वापरासाठी पाणी, वीज ह्या सारखे resources वापरले जातात आणि त्याच वेळी ती इमारत वेगवेगळ्या प्रकारचा कचरा आणि सांडपाणी तयार करत असते, प्रदूषण करत असते.
ह्या resource वापराच्या परिणामाचे उदाहरण म्हणून वीज (electricity) ह्या resource बद्दल काही आकडेवारी पाहू.
जागतिक परिमाणानुसार एकूण निर्मित विजेच्या जवळपास ४०% वीज ह्या इमारती वापरतात. ह्यात रहिवासी वापराच्या व इतर वापराच्या इमारतींचा समावेश आहे. भारतात हेच प्रमाण साधारण ३०% इतके आहे. आणि वाढत्या शहरीकरणामुळे आणि इतरही कारणामुळे ह्या वीजवापराचे प्रमाण दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खालील दोन्ही आलेख हि गोष्ट अधोरेखित करत आहेत.
graph1

Graph 2

आता ह्या वीज वापराचा आणि पर्यावरणाचा सरळ संबंध कसा आहे हे आपल्याच घराच्या उदाहरणावरून पाहू. एका २ BHK घरात दरमहिना सरासरी २०० युनिट्स वीज वापरली जाते. (वेगवेगळ्या ऋतूत हा वापर कमीजास्त होईल परंतु सरासरी २०० युनिट्स वापरले जातात). ह्यात मी air conditioners धरले नाहीत. ते धरले तर वापर साधारण २५० ते ३०० units इतका होईल. पण आकडेमोडीच्या सोयीसाठी आपण २०० units पकडू. म्हणजे वर्षाकाठी हे घर २४०० units वीज वापरत आहे. भारतात १ unit वीज ज्यावेळी वापरली जाते त्यावेळी त्या विजेच्या निर्मिती आणि वहनामुळे १ kg कार्बन डायोक्साइड पर्यावरणात फेकला जातो. (ह्याला CO2 emission equivalent म्हणले जाते) म्हणजेच घरातल्या फक्त विज वापरामुळे दरवर्षी २४०० kg कार्बन डायोक्साइड पर्यावरणात फेकला जात आहे. हे फक्त एका resource चे उदाहरण झाले. इमारती असे अनेक resources वापरत आहेत.
त्यामुळे जर आपल्याला शाश्वत विकासाकडे जायचे असेल तर इमारतींना पर्यावरण संवेदनशील बनवावेच लागेल.
क्रमशः
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कालच आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. त्या निमित्तानं लिहिलेला हा लेख. पर्यावरण दिनाच्या निमित्तानी आपण वृक्षारोपणासारखे बरेच कार्यक्रम साजरे करतो, अनेक संकल्प करतो. हे सर्व कार्यक्रम महत्वाचे असले तरी फक्त १ दिवस झाडे लाऊन किंवा पाणी वाचवून ह्या प्रश्नांवर शाश्वत उपाय मिळणार नाही असा मला वाटत. चीरस्थायी उपायासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणे आणि शास्त्रीय पद्धतीनी प्रत्येक गोष्टीवर विचार करणे जास्त महत्वाचे आहे. म्हणूनच बरेच दिवस वाचनमात्र राहिल्यानंतर पर्यावरण संवेदनशील बांधकाम ह्या विषयाशी संबंधित अनुभव, विचार share करावेत म्हणून हि लेखमाला लिहित आहे. वस्तुनिष्ठपणे ह्या विषयावर चर्चा करायचा हा एक प्रयत्न. लेखमालेच्या पुढील भागात इमारती आणि शहरांमुळे पर्यावरणावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाय ह्याबद्दल लिहीन.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख खूपच आवडला. विशेषतः शाश्वत विकास ही संकल्पना/व्याख्या. इमारतीचे उदाहरण पूरक आहे आणि भक्कम(खखोदेजा) विदाच्या आधारावर ऊभे आहे. लेख "कन्व्हिन्सिंग" वाटतो.
___
उपायांत म्हणाल तर बाल्कनीत झाडे लावणे याव्यतिरीक्त मला उपाय सुचत नाही. सुचल्यास लिहीन. हां मोठ्या पातळीवर जर सौर ऊर्जेचा वापर करता आला तर उत्तमच. कोणीतरी (बहुतेक अदिती) मध्यंतरी केरळ चे विमानतळ हे सौर-ऊर्जा कशी वापरते याचे आदर्श उदाहरण "ही बातमी ऐकलीत का?" मध्ये दिले होते. मिळाली की लिंक देते.
अजुन एकत्यंत महागडा व कदाचित क्लिष्ट उपाय हा सचिन तेंडुलकरने त्याच्या घरात केलेला होऊ शकतो (आता हे फेसबुकवर वाचलेले होते. खखोदेजा)तो म्हणजे पावसाचे पाणी गच्चीवरील कृत्रिम टाकीत साठवुन त्याचा उपयोग करणे. पण हे फक्त बंगलेवाल्यांना म्हणजे मूठभर लोकांनाच शक्य असावे.
________
सापडली -
http://www.aisiakshare.com/node/4312#comment-110351
_____

लेखमालेच्या पुढील भागात इमारती आणि शहरांमुळे पर्यावरणावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाय ह्याबद्दल लिहीन.

वा! जरुर येऊ द्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पावसाचे पाणी गच्चीवरील कृत्रिम टाकीत साठवुन त्याचा उपयोग करणे. पण हे फक्त बंगलेवाल्यांना म्हणजे मूठभर लोकांनाच शक्य असावे.

आजिबात नाही. अपार्टमेंटवालेही करू शकतात, नव्हे करतात. चेन्नै वगैरे साईडला हे असल्याशिवाय परवानगीच देत नैत नवीन अपारमेण बांधायला असे ऐकून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओह हे माहीत नव्हते. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पावसाचे पाणी कृत्रिम टाकीत साठवणे मुंबईसारख्या ठिकाणी शक्य नाही.

मुंबईत वर्षाला सरासरी ८० इंच पाऊस पडतो. आमच्या बिल्डिंगमध्ये एका मजल्यावर आठ फ्लॅट आहेत. त्याचे सरासरी बिल्ट-अप क्षेत्रफळ ५५० चौ फूटाप्रमाणे ४४०० चौ फूट एकूण क्षेत्रफळ आहे. त्यावर ८० इंच पाऊस म्हणजे सुमारे साडेसहा फूट उंचीएवढे पाणी पावसाळ्यात जमा होईल. या पाण्याचे घनफळ २८६०० घनफूट किंवा ८ लाख लीटर असेल. एवढे पाणी गच्चीत साठवणे शक्य नाही आणि एवढे पाणी साठवण्याएवढी टाकी सोसायटीतील उरलेल्या जागेत मावणार नाही.

त्यामुळे मुंबईत रेनवॉटर हारवेस्टिंग म्हणजे गच्चीतील पाणी आवारात सोक पिट बनवून जमिनीत मुरवणे एवढेच शक्य आहे. यातला तोट्याचा भाग म्हणजे 'मी' खर्च करून जमिनीत मुरवलेल्या पाण्याचा फायदा आसपासच्या सर्व सोसायट्यांना होईल याचे मला दु:ख होत असते. म्हणून मी कायदेशीर जबाबदारी म्हणून जे मिनिमम हवे तितकेच करतो.

दुसरा भाग म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये एका मजल्यावर सरासरी २५ लोक राहतात. १+४ इमारतीत १२५ लोक राहतात. सरासरी दरडोई १०० लीटर या प्रमाणानुसार हे आठ लाख लीटर पाणी ६४ दिवस पुरेल.

त्यामुळे एकूण खर्चाचा आणि साठलेले पाणी किती दिवस पुरणार याचा मेळ नीट बसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गच्चीत नाहीच साठवायचं. एक अंडरग्रौंड टाकी तरी करायची किंवा जमिनीत मुरवायचं तरी. तेवढं मुरवलं तरी बास आहे. म्हणजे परत बोअर मारल्यास टेन्शन इल्ले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रेनवॉटर हारवेस्टिंग

हा शब्द माहीत नव्हता. धन्यवाद इथे उधृत केल्याबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नितीन सर, हा विषय पुढील लेखात विस्तृत पणे मांडणारच आहे परंतु मुम्बईमधेही rain water हार्वेस्टिंग चा एक सोपा उपाय करता येईल. तुमच्या अपार्टमेंट ला under ground पाण्याची टाकी असेलच. generally ति दोन दिवस लागेल इतक्या पाण्याची साठवण क्षमता असणारी असते. तुमच्या अपार्टमेंट मध्ये १२५ लोक राहतात आणि भारतीय मानकांनुसार १३५ लिटर पाणी दर माणशी दर दिवसा लागते. म्हणजे तुमच्या अपार्टमेंट ला दर दिवशी पाणी लागते साधारण १६८७५ लिटर आणि टाकीचा आकार साधारण ३३७५० लिटर (१२५ * १३५ * २ दिवस) असेल.
मुंबई मध्ये २०१४ मध्ये जुलै महिन्यात peak rainfall होता साधारण १२०० mm (रेफरन्स: IMD DATA) आणि पावसाचे दिवस होते साधारण २०. म्हणजे सरासरी दर दिवशी ६० mm. टेरेस च क्षेत्रफळ ४१० चौ मी (४४०० चौ फुट). म्हणजे जुलै महिन्यात पाऊस पडलेल्या दिवशी साधारणपणे (४१० * ०.६०) २४.५ घन मीटर पाणी जमा झाले. म्हणजेच २४५३५ लिटर पाणी जमा झाले. हे पाणी योग्य प्रकारे फिल्टर करून तुम्ही तुमच्या under ground पाण्याची टाकी मध्ये साठवू शकता याची क्षमता ३३७५० लिटर इतकी आहे. हे पाणी रोज वापरले जात असल्यामुळे वर्षभरासाठी एकच मोठी टाकी करायची आवश्यकता नाही. फारतर सुरक्षित विकल्प म्हणून पिण्याच्या पाण्याची टाकी वेगळी करू शकता. ह्याच टाकीचा overflow ground water recharge करणाऱ्या शोष खड्ड्याला जोडता येईल त्यामुळे एखादे दिवशी जास्त पाऊस झाला किंवा कमी वापर झाला तर अतिरिक्त पाणी त्या शोष खड्ड्यामध्ये जाईल.
त्यामुळे पावसाळ्यातील सगळे आणि हिवाळ्यातील काही दिवस तुम्ही हे साठवलेले पाणी वापरू शकता आणि municipal water supply वरील ताण कमी करू शकता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुर्दैवाने अंडरग्राउंड टाकी बोअरिंगच्या पाण्यासाठी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शुची जी, ह्या लेखमाले द्वारे अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून आपण कसे पर्यावरण रक्षण करू शकतो ह्याबद्दल माहिती share करण्याचा प्रयत्न करत आहे. आता वरील घरचेच उदाहरण घेतले तर रोज १ unit वीज जर वाचवली तर वर्षाकाठी आपण ३६५ kg CO2 पर्यावरणात कमी टाकू. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहे त्या घरात, कमी खर्चात पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता दाखवू शकता..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बरने प्रचंड रोचक दुवा दिला होता जो अँटाय रिसायकलींग आहे. मी तो हापिसातही काही पर्यावरण फॅनॅटिक्सना फॉर्वर्ड केलेला, थांबा तुम्हाला शोधून देते. त्याने बरोब्बर २ वेळा तीच लिंक शेअर केलेली आहे पण सोबत काही टेक्स्ट नसल्याने शोधणं अवघड आहे. पण मी देइनच. तो माझा फार आवडता लेख आहे.
(१) http://aisiakshare.com/node/4198#comment-105426 - हा एक पण हा माझा "Apple of Eye"लेख नाही. थांबा शोधते आहे.
(२) हा एक घासकडवींचा मस्त लेख - http://aisiakshare.com/node/1681
(३) http://aisiakshare.com/node/4761#comment-119402 - ही घासकडवी - ननि चर्चा

_______

http://www.aisiakshare.com/node/4411#comment-114133

आणि हा तो माझा लाडका लेख!!! हा अतिशय आवडला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्लुजी - मला कमीत कमी २० शंका आहेत तुमच्या लेखा बद्दल. विचारल्या तर चालतील का? माझ्या शंकांना तुम्ही मुळाशी जाऊन विचार करुन उत्तर द्याल का? तुमची स्वताची मते तपासुन बघायची तयारी आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनु राव जी, कितीही शंका विचारल्यात तरी चालेल. माझ्यापरीने मुळाशी जाऊन विचार करून उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. स्वत:ची मते तपासून बघायला नक्कीच आवडेल आणि काही विचार चुकत असतील तर बदलायची हि तयारी आहे. किमान प्रयत्न तरी करेन. बाकी ह्या विषयावरच्या जुन्या चर्चा वाचायचा प्रयत्न करतोय. links दिल्यात तर मदत होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या विजेच्या निर्मिती आणि वहनामुळे १ kg कार्बन डायोक्साइड पर्यावरणात फेकला जातो.

तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक माणुस दिवसाल १ किलो कार्बन डायोक्साइड बाहेर फेकतो. एका घरात ४ माणसे असतील तर वर्षाला १४६० किलो कार्बन डायोक्साइड ते घर तयार करणार. वर हम्मा, चिऊ, काऊ, माऊ, भुभु, कबु, डुक्कु, बदक, उंट असे करोडो प्राणी कीतीतरी कार्बन डायोक्साइड बाहेर फेकतात आणि पर्यावरणाची पार वाट लाऊन टाकतात.
म्हणुन शाश्वत विकासासाठी गब्बर सिंग साहेबांचा फडतुसांना जाळुन टाकण्याचा उपाय** खरा आहे. एकतर त्यानी कार्बन डायोक्साइड सोडणारी नाके खुप कमी होतील आणि त्यांना जाळुन वीज निर्मीती केल्यामुळे कोळसा पण वाचेल कित्येक महिने.

--------
** : हे गब्बरसिंग साहेब कोण आणि त्यांनी हा उपाय कधी आणि का सुचवला त्यासाठी तुम्हाला ऐसीवर शोध घ्यावा लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्याकडे इमारतींसाठी पर्यावरण रक्षणासाठी कुठलेही नियम बनलेच नाहीत किंवा त्यांचा विचारही फारसा झाला नाही.

नेमके ह्याच विषयावर मी अभ्यास करत असताना आपला लेख आला. फार चांगल्या विषयाला हात घातलाय. नगर विकास आराखडे हे बर्‍याचदा apparent easements Act धाब्यावर बसवून केलेले असतात, त्यामुळे पूर येऊन जमिनीची धूप होते.बांधकाम क्षेत्राचा विकास करताना अनेक खर्चिक परंतू खात्रीचे उपाय आहेत ते जर अमलात आणले तर पर्यावरणात होणारे बदल ५०- ९०% हमखास कमी होऊ शकतील.
पुढील भाग लवकर टाका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.. बांधकाम क्षेत्राचा विकास करताना अनेक खर्चिक आणि कमी खर्चाचे आणि बिन खर्चाचे उपाय देखील आहेत ज्यायोगे पर्यावरणावरील impact कमी करता येईल. पुढील भागात त्यावर नक्की चर्चा करू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळातले प्रश्न असेच गम्मत म्हणुन
--------

शाश्वत विकास म्हणजे आजच्या गरजा आपण अशाप्रकारे पूर्ण केल्या पाहिजेत कि पुढील पिढ्यांना देखील त्यांच्या गरजा कोणत्याही तडजोडीविना पूर्ण करता आल्या पाहिजेत.”

क्यु भाई क्यु? अजुन १०० वर्षानी किंवा मी मेल्यावर काय होतय ह्याची मी का काळजी करावी? अशी काळजी करण्याची सक्ती का?

-----------

त्यामुळे योग्य त्या गरजा योग्य पद्धतीने

"योग्य" म्हणजे काय? कीती? हे ठरवणार कोण?
------------

प्रयेक बांधकामाचा पर्यावरणावर परिणाम हा होतच असतो.

होऊ दे की मग, आणि तो परीणाम वाईट असतो असे कोणी सांगीतले?

-----------

एखाद्या रिकाम्या ओसाड जागेचा जरी विचार केला तरी त्यावर खुरटे गावात वाढत असते, अनेक कीटक, वनस्पती ह्यांचा ती जागा अधिवास असतो

असल्या ओसाड जागा नष्टच केल्या पाहिजेत त्यातल्या किड्यांसकट. कमीत कमी माझ्या घराजवळ तरी अश्या जागा नकोत.

--------

परंतु गेल्या दशकात झालेल्या प्रचंड शहरीकरणामुळे आणि निर्माण झालेल्या बेसुमार इमारतीमुळे होणारे परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसू लागले, विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आणि मग आपण ह्या विषयावर बोलू लागलो.

मग काय करायचे? लोकांनी झाडावर रहायचे का? दुसरे ऑप्शन काय? निर्माण होणार्‍या इमारती बेसुमार ( म्हणजे तुम्हाला खुप जास्त असे म्हणायचे असले तर) कुठेत, उलट मेजॉरीटी लोकांना रहायला जागा नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळातले प्रश्न असेच गम्मत म्हणुन

मी गंभीर पणे विचार केल्यावर सुचलेली उत्तरे:
--------

शाश्वत विकास म्हणजे आजच्या गरजा आपण अशाप्रकारे पूर्ण केल्या पाहिजेत कि पुढील पिढ्यांना देखील त्यांच्या गरजा कोणत्याही तडजोडीविना पूर्ण करता आल्या पाहिजेत.”
क्यु भाई क्यु? अजुन १०० वर्षानी किंवा मी मेल्यावर काय होतय ह्याची मी का काळजी करावी? अशी काळजी करण्याची सक्ती का?

इथे कुणा एकावर अशी काळजी करायची सक्ती नाहीय तर सर्व मानवजातिचे भविष्य ( our commomn future) ह्या दृष्टीने असा विचार करण्याची अपेक्षा आहे. आपण ह्या सगळ्या पसाऱ्यात इतके क्षुद्र आहोत कि १०० वर्षांनी किंवा मी मेल्यावर काय होतंय ह्याची काळजी फक्त मी घेऊन फारसा उपयोग होणार नाहीये पण आपण सर्वानीच हि काळजी घेतली तर नक्कीच फरक पडेल. आणि हाच aatitude मागील पिढ्यांनी दाखवला असता तर आज ज्या समस्या वातावरण बदलामुळे आपल्याला जाणवत आहेत त्या जाणवल्या नसत्या किंवा कमी जाणवल्या असत्या.
-----------

"योग्य" म्हणजे काय? कीती? हे ठरवणार कोण?

"योग्य" हि खूप सापेक्ष संकल्पना आहे परंतु एक समाज म्हणून परिस्थिती सापेक्ष निर्णय घेणे आवश्यक आहे किंवा घेतला पाहिजे. उदाहरण घ्यायचे झाले तर मराठवाड्यातील दारू कंपन्यांना होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे घेऊ शकतो. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असताना दारू निर्मितीसाठी ते पाणी वापरणे अयोग्य असेल. आणि हा निर्णय पूर्ण समाजानी घेणे अपेक्षित आहे. ह्याला एक उत्तर असे असु शकते कि दारूसाठी लागणाऱ्या प्रोसेस साठी कुठला alternate असू शकेल का हे तपासून पाहणे.

------------

होऊ दे की मग, आणि तो परीणाम वाईट असतो असे कोणी सांगीतले?

परिणाम वाईटच असतो असा माझ विधानच नाही आहे. पण परिणाम नसतोच असा देखील म्हणता येणार नाही. आणि जे वाईट परिणाम आहेत ते कमी कसे करता येतील ह्याची चर्चा ह्या लेखमालेत करायचा प्रयत्न आपण करू.
-----------

एखाद्या रिकाम्या ओसाड जागेचा जरी विचार केला तरी त्यावर खुरटे गावात वाढत असते, अनेक कीटक, वनस्पती ह्यांचा ती जागा अधिवास असतो
असल्या ओसाड जागा नष्टच केल्या पाहिजेत त्यातल्या किड्यांसकट. कमीत कमी माझ्या घराजवळ तरी अश्या जागा नकोत.

ह्या विधानावर मी आता काहीच बोलू शकत नाही. पुढील लेखात काही गोष्टी मांडायचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुमचे विचार बदलतात क हे पाहायला आवडेल.
--------

मग काय करायचे? लोकांनी झाडावर रहायचे का? दुसरे ऑप्शन काय? निर्माण होणार्या् इमारती बेसुमार ( म्हणजे तुम्हाला खुप जास्त असे म्हणायचे असले तर) कुठेत, उलट मेजॉरीटी लोकांना रहायला जागा नाहीये.

Mejority लोकांना राहायला जागा नाहीत हि आपल्या चूक/बरोबर विकास धोरणांच्या मुळे आणि त्याच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे निर्माण झालेली समस्या आहे. पण रहिवासी इमारतींची गरज आहे हे मी नाकारत नाहीच आहे. आणि शाश्वत विकासाच्या संकल्पाने प्रमाणे हि आजची गरज पूर्ण केलीच पाहिजे आणि त्या साठीच इमारती/ शहरांचा विकास हा पर्यावरण विषयी संवेदनशील राहून कसा करता येईल ह्या बद्दल पुढील लेखात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
--------
तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे समाधान कारक आहेत अशी अपेक्षा करतो, समाधान कारक नसतील तर पुन्हा ह्या विषयावर चर्चा करूयात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी मेल्यावर काय होतंय ह्याची काळजी फक्त मी घेऊन फारसा उपयोग होणार नाहीये पण आपण सर्वानीच हि काळजी घेतली तर नक्कीच फरक पडेल

कोणाला फरक पडेल?

मानवजातिचे भविष्य ( our commomn future) ह्या दृष्टीने असा विचार करण्याची अपेक्षा आहे.

मानवजातीची काळजी आपण का करावी? आपण आपली काळजी करावी. १०० वर्षानंतर मानव जात असेल किंवा नसेल, व्हाय शुड इट मॅटर टु मी?

मराठवाड्यातील दारू कंपन्यांना होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे घेऊ शकतो. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असताना दारू निर्मितीसाठी ते पाणी वापरणे अयोग्य असेल

मुळात वर्षभर शेतकर्‍यांना जवळजवळ फुकट पाणी पुरवठा करणे चुक आहे. जर पाण्याचे योग्य ते पैसे मोजायला लागले तर दुष्काळाची वेळ येणार नाही. हे शेतकर्‍यांसाठी नाही सर्वांसाठीच लागु आहे.

Mejority लोकांना राहायला जागा नाहीत हि आपल्या चूक/बरोबर विकास धोरणांच्या मुळे आणि त्याच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे निर्माण झालेली समस्या आहे.

ह्यात धोरणांचा काय संबंध आहे? लोकांकडे उत्पन्नाचे साधन नाही, म्हणुन पैसे नाहीत, म्हणुन ते रहायला जागा घेऊ शकत नाहीत. ह्यात धोरणांचा काय संबंध?
असे म्हणता येइल की पैसे नसताना पैदास करुन देण्याचे धोरण चुकले आहे.

शाश्वत विकासाच्या संकल्पाने प्रमाणे हि आजची गरज पूर्ण केलीच पाहिजे

त्याला लागणार्‍या पैश्याचे काय ओ.

---

तसेच तुम्ही १९४७ पासुन वीजवापराचा ग्राफ दिला आहे त्याचे कारण कळले नाही.

------------------------
उल्लु शेठ - उत्तर देइन असे म्हणाला होतात पण देतच नाही तुम्ही. मग मी पुढच्या शंका कश्या विचारणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>पैसे नसताना पैदास करुन देण्याचे धोरण चुकले आहे.

पैदास करणे हे पैसा नामक संकल्पना निर्माण होण्याआधीपासून आहे. पैसा ही संकल्पना पैदास या गिव्हन स्थितीच्या कडेकडेनेच इम्प्लिमेंट केली पाहिजे. त्या संकल्पनेने पैदास या संकल्पनेवर हावी होऊ नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पैदास करणे हे पैसा नामक संकल्पना निर्माण होण्याआधीपासून आहे.

थत्ते चाचा, असु दे की. पण आता रीसोर्स विकत घेणे परवडत नसेल तर पैदास जबरदस्तीने थांबवली पाहिजे. मी हे शाश्वत विकास आणि पर्यावरणासाठी च म्हणते आहे ( माझ्या उजव्या विचारामुळे नाही ). म्हणजे पुढची लाख वर्ष मानवजात मजेत राहु शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<गब्बर मोड ऑन> मानव जात लाख वर्ष का मजेत राहिली पाहिजे? <गब्बर मोड ऑफ>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्ते चाचा, मी तर सुरुवातीलाच म्हणले आहे. मी मेल्यावर मानवजात् रहाते की नाही हा माझ्यासाठी प्रश्नच नाहीये. पण उल्लुशेठ ना काळजी लागुन राहीलीय ना.
त्यांना काळजी लागुन राहीली आहे म्हणुन मला त्यांची काळजी वाटतीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणाला फरक पडेल?

एकूण प्रदुषणात होणारी वाढ, पर्यावरणावर होणारे वाईट परिणाम ह्यात फरक पडेल. किमान ते काही प्रमाणात कमी होतील.

मानवजातीची काळजी आपण का करावी? आपण आपली काळजी करावी. १०० वर्षानंतर मानव जात असेल किंवा नसेल, व्हाय शुड इट मॅटर टु मी?

मी माणूस आहे म्हणून मी मानव जातीची काळजी करतो. सगळ्यांनीच ती करावी अशी अपेक्षा नाहीये किंवा सक्ती तर मुळीच नाही आहे. ज्यांना वाटत त्यांनी तो करावा. माझ आजच वय ३० आहे आणि मी आजून ५० -६० वर्ष तरी जगेन अशी आशा आहे. आजची नैसर्गिक resorces ची अवस्था बघितली तर oil reserves अजून साधारण ५० -५५ वर्ष, gas reserves अजून ६० -६५ वर्ष पुरू शकतील असा estimate आहे. पाण्याची समस्या आम्हाला दर उन्हाळ्यातच जाणवती आहे. भारता मध्ये अनेक शहरातील हवेची गुणवत्ता बरीच खालावली आहे काही ठिकाणी ती धोकादायक पातळीवर गेली आहे. पर्यावरणाबद्दल काळजी करण्या साठी इतकी कारणे माझ्यासाठी पुरेशी आहेत. हि काळजी मी माझ्या साठीच करतो आहे.

मुळात वर्षभर शेतकर्यांकना जवळजवळ फुकट पाणी पुरवठा करणे चुक आहे. जर पाण्याचे योग्य ते पैसे मोजायला लागले तर दुष्काळाची वेळ येणार नाही. हे शेतकर्यां साठी नाही सर्वांसाठीच लागु आहे.

ह्या बद्दल मी अगदीच सहमत आहे. पण हीच पाणी वाटपाच्या धोरणातील चूक आहे आणि ती सुधारायला हवी. पण म्हणून इमारती बांधताना होणारे परिणाम कमी करू नयेत असा थोडीच आहे? पुढील लेखात पाण्या चा वापर त्याचे monitoring ह्या बद्दल लिहिणार आहे त्या वेळी चर्चा करूच.

ह्यात धोरणांचा काय संबंध आहे? लोकांकडे उत्पन्नाचे साधन नाही, म्हणुन पैसे नाहीत, म्हणुन ते रहायला जागा घेऊ शकत नाहीत. ह्यात धोरणांचा काय संबंध?
असे म्हणता येइल की पैसे नसताना पैदास करुन देण्याचे धोरण चुकले आहे.

उत्पन्नाच्या साधनाचे विकेंद्रीकरण आपल्याला करता आले नाही हि धोरणातील चूक आहे ना?? जर चांगल्या उत्पन्नाचे साधन गावात उपलब्ध झाले तर लोक शहरांकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होणार नाहीत. ह्यातून राहायच्या जागांची समस्या कमी होऊ शकते.

त्याला लागणार्याा पैश्याचे काय ओ.

हि लेखमाला पर्यावरण संवेदनशील इमारती ह्या विषयावर आहे. सगळ्यांना घरे द्यायला पैसे नाहीत म्हणून जि घरे बांधणार आहोत ती देखील पर्यावरण संवेदनशील असू नयेत असा अर्थ होत नाही. जि घरे आता बांधली जात आहेत ती कशी सुधारता येतील ह्याचा प्रयत्न करूच शकतो.

---

तसेच तुम्ही १९४७ पासुन वीजवापराचा ग्राफ दिला आहे त्याचे कारण कळले नाही.

तो वीज वापराचा ग्राफ ministry of power ह्यांच्या पंच वार्षिक योजनेच्या रेपोर्ट मधील आहे आणि त्या ग्राफ मधून domestic वीज वापर कशा प्रकारे वाढला हे मला दाखवायचे होते. ग्राफ झूम करून पाहिलात तर शेवटचे पाच स्तंभ २००७ ते २०११ असे आहेत कारण तो त्या पंच वार्षिक योजनेसाठी चा ग्राफ आहे. सरकारी ग्राफ असल्या मुले तो १९४७ पासूनचा आहे. पण तो तसा असल्यामुळे नक्की काय प्रोब्लेम आहे हे सांगितलात तर तो बदलता येईल.

------------------------

उल्लु शेठ - उत्तर देइन असे म्हणाला होतात पण देतच नाही तुम्ही. मग मी पुढच्या शंका कश्या विचारणार?

मी ऐसी अक्षरे वर पूर्णवेळ कार्यरत नाही आहे त्यामुळे तुम्हाला वाट बघायचा जो त्रास झाला त्याबद्दल क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात वर्षभर शेतकर्‍यांना जवळजवळ फुकट पाणी पुरवठा करणे चुक आहे. जर पाण्याचे योग्य ते पैसे मोजायला लागले तर दुष्काळाची वेळ येणार नाही. हे शेतकर्‍यांसाठी नाही सर्वांसाठीच लागु आहे.

वर्षभर? शेतकर्‍यांना कोण पुरवतं फुकट पाणी? उलट पैसे मोजल्याने जास्त माज येतो. आंघोळीला शॉवर किंवा टब वापरणे, संडासात सारखे फ्लश वापरणे, लाद्या, खिडक्यांच्या ग्रिल, कार पाण्याणे धुणे, घरात स्विमिंग पुल बांधणे हे सगळे पैसे मोजुनही केले जातेच की?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या बद्दल मी अगदीच सहमत आहे. पण हीच पाणी वाटपाच्या धोरणातील चूक आहे आणि ती सुधारायला हवी. पण म्हणून इमारती बांधताना होणारे परिणाम कमी करू नयेत असा थोडीच आहे? पुढील लेखात पाण्या चा वापर त्याचे monitoring ह्या बद्दल लिहिणार आहे त्या वेळी चर्चा करूच.

कोणाच्या धोरणातल्या चुका सुधारायच्या सोडुन मी स्वता खिषातुन पैसे खर्च का करु? माझ्या खर्च केलेल्या पैश्याचा खरा फायदा कोणाला होणार तर जे लोक चुकीच्या धोरणामुळे मजा करत आहेत त्यांना.

सगळ्यांना घरे द्यायला पैसे नाहीत म्हणून जि घरे बांधणार आहोत ती देखील पर्यावरण संवेदनशील असू नयेत असा अर्थ होत नाही. जि घरे आता बांधली जात आहेत ती कशी सुधारता येतील ह्याचा प्रयत्न करूच शकतो.

हे सर्व करण्याचा कुठल्याही प्रकारचा अतिरीक्त भार माझ्या वर पडत नसेल तर ठीक आहे. पण तुम्ही जबरदस्तीने आम्हाला रेन वॉटर हार्वेस्टींग करायला लावणार, आमचे पैसे खर्च करुन. पण माझ्या बाजुला लोक कॉर्पोरेशन चे स्वच्छ पाणी फुकट वापरत असणार. हे मान्य नाही.

तसेच तुम्ही १९४७ पासुन वीजवापराचा ग्राफ दिला आहे त्याचे कारण कळले नाही.

हा ग्राफ देऊन तुम्हाला काय सांगायचे आहे. वीज वापर वाढतच असणार ना. जीडीपी वाढायला पाहिजे तर वीजवापर वाढणारच. तुम्ह्याला त्या पेक्षा वेगळे काय सांगायचे आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणाच्या धोरणातल्या चुका सुधारायच्या सोडुन मी स्वता खिषातुन पैसे खर्च का करु? माझ्या खर्च केलेल्या पैश्याचा खरा फायदा कोणाला होणार तर जे लोक चुकीच्या धोरणामुळे मजा करत आहेत त्यांना.
हे सर्व करण्याचा कुठल्याही प्रकारचा अतिरीक्त भार माझ्या वर पडत नसेल तर ठीक आहे. पण तुम्ही जबरदस्तीने आम्हाला रेन वॉटर हार्वेस्टींग करायला लावणार, आमचे पैसे खर्च करुन. पण माझ्या बाजुला लोक कॉर्पोरेशन चे स्वच्छ पाणी फुकट वापरत असणार. हे मान्य नाही.

माझ्यकडे free rider syndrome ला काहीच उत्तर नाही आहे. मला एखाद्या विषयाबद्दल काळजी वाटते म्हणून मी त्या विषयाबद्दल माझा वेळ, पैसा खर्च करतो. पण ह्याची जबरदस्ती कुणावरच नाही आहे ( किमान भारतात तरी पर्यावरण संवेदनशील इमारती हा mandatory विषय नाही). परंतु ज्या गोष्टींचा कुठलाही आर्थिक भार पडणार नसेल अशा गोष्टी तरी तुम्ही करू शकाल? म्हणजे जर ओला कचरा आणि सुका कचरा तुमच्या घरातच वेगळा साठवायला तुम्हाला काहीच खर्च येणार नाही, अशा गोष्टी तुम्ही करूच शकता.

हा ग्राफ देऊन तुम्हाला काय सांगायचे आहे. वीज वापर वाढतच असणार ना. जीडीपी वाढायला पाहिजे तर वीजवापर वाढणारच. तुम्ह्याला त्या पेक्षा वेगळे काय सांगायचे आहे?

GDP वाढतोय त्याप्रमाणे वीज वापर वाढणारच आणि त्यामुळे पर्यावरण वर होणारा परिणाम पण वाढणारच. म्हणूनच वीज Efficiently आणि विचारपूर्वक वापरणे गरजेचे आहे. त्या ग्राफ मध्ये सरळपणे दिसते आहे कि डोमेस्टिक वीज वापराची वाढ गेल्या दशकात मोठ्या प्रमाणात होत आहे, आणि आपल्या त्यामुळेच इमारती Energy efficient होणे गरजेचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ह्याची जबरदस्ती कुणावरच नाही आहे (

मालक - जबरदस्ती आहे म्हणुनच मी तुम्हाला उत्तरे लिहीते आहे. जबरदस्ती नसती तर मला काय करायचे होते.

आता महानगर पालिका रेन वॉटर हार्वेस्टींग मँडेटरी करते आहे नविन बांधकामांना. ही जबरदस्ती नाही का? मी जर नविन फ्लॅट घेतला तर मला जास्तीचे पैसे खर्च करायला लागणार नाहीत का?
पुढे मागे पर्यावरण पुरक अ, ब, क अश्या अनेक गोष्टी करायलाच पाहिजेत असे नियम येणारच आहेत.
बर हे सर्व नागरीकांसाठी असते तर चालुन ही गेले असते. मध्यमवर्गीय सॉफ्ट टारगेट शोधायचे आणि त्यांना दाबायचे.

मी जे काही रीसोर्सेस वापरते आहे त्याची किंमत द्यायला तयार आहे. फक्त सर्वांना ती किंमत लागु असावी इतकीच माफक इच्छा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतकंच नाही नव्या इमारतींना म्हणे कचरा व्यवस्थापनसुद्धा स्वतःच करायला सांगितले जात आहे. (आणि त्या बेसिसवर आम्हा जुन्या इमारतींकडूनही कचरा उचलणे बंद करणार अशा नोटीसा येत आहेत).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नवीन येणाऱ्या धोरणांनुसार कचरा व्यवस्थापनाच नाही तर सांडपाण्याचे व्यवस्थापन देखील नव्या इमारतींना स्वत:च करावे लागणार आहे परंतु ह्या साठी महापालिका / शासन वेगवेगळ्या सवलती ( incentives) अशा इमारतीच्या रहिवाशांना देत आहे.
उदा. पुणे महानगरपालिका rainwater हार्वेस्टिंग किंवा ओला कचरा स्वत: जीरावणाऱ्या इमारतीमधील रहिवाशांना घरपट्टी मध्ये १०% सवलत दर वर्षी देते. किंवा नवीन धोरण नुसार हरित मानांकित इमारतीच्या विकास शुल्कात बरीच सवलत PMC / PCMC देते. हरित मानांकित इमारतींना अधिक FSI देण्याचे धोरण अनेक राज्यात आहे आणि ते महाराष्ट्रात देखील काही दिवसातच येत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो आधी घरपट्टी सर्वांकडुन समान नियमांनी घेतली जाते का ते बघा, मग सुट मिळते का नाही ते चर्चेला घेऊ.

हरित मानांकित इमारतींना अधिक FSI देण्याचे धोरण अनेक राज्यात आहे

हे तर पर्यावरण पुरक नाहीये ना Sad जास्त FSI म्हणजे जास्त माणसे रहाणार शहरात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जास्त माणसे शहरात येत आहेत म्हणून रहिवासाच्या इमारतींचा तुटवडा आहे. त्याची मागणी जास्त आहे असा तुम्हीच म्हणाल्या होता. त्यामुळे पर्यावरणाला घातक असली तरी घरबांधणी तर होणारच आहे. ह्याला एक मध्यममार्ग म्हणून ज्या इमारती पर्यावरण पूरक आहेत त्यांना अधिक FSI देऊन, पर्यावरण पूरक इमारती बांधायला प्रोत्साहन दिले जात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

rain water हार्वेस्टिंग/ पर्यावरण पूरक अ ब क नियम, सर्व नवीन बांधकामांना mandatory असणार आहे फक्त सेलेक्टीव मध्यमवर्गीय लोक राहतात त्या बांधकामांना नसणार आहेत. तसे बरेच बाकी नियमही सर्व इमारतींना mandatory आहेत (अग्नीशमन वगेरे) नियमांच्या इम्प्लीमेंतेशन मध्ये येणाऱ्या प्रोब्लेम वर नक्कीच उत्तरे हुडकता येतील म्हणून असे नियम बनवणे चुकीचे नाही.

एक उदाहरण देतो, जेंव्हा आपण एक अधिकृत इमारत बांधतो त्यावेळी इमारतीच्या चारही बाजूला काही मोकळी जागा सोडावी लागते असा नियम आहे. जर तुम्हाला अधिकृत इमारत बांधायची असेल तर टी सोडावीच लागेल शेजारच्या झोपडपट्टीमध्ये कुणी अशी जागा सोडली नाही म्हणून मीपण तशी सोडणार नाही असा करता येणार नाही (किमान तुम्हाला अधिकृत इमारतीत राहायचे असेल तर). किंवा बरीच जनता घरपट्टी भारत नाही म्हणून मीदेखील भरणार नाही हे म्हणणे शहाणपणाचे नाही. बाकी लोकांनी टी भरवित म्हणून नियमांची अंमलबजावणी नीट व्हावी हि अपेक्षा आपण करूच शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर तुम्हाला अधिकृत इमारत बांधायची असेल तर टी सोडावीच लागेल शेजारच्या झोपडपट्टीमध्ये कुणी अशी जागा सोडली नाही म्हणून मीपण तशी सोडणार नाही असा करता येणार नाही (किमान तुम्हाला अधिकृत इमारतीत राहायचे असेल तर).

हे अन्यायकारक च आहे. ह्या अन्यायाविरुद्ध खरे तर तुम्ही आवाज उठवला पाहिजे. माझ्याच कष्टाच्या पैश्यानी विकत घेतलेल्या अधिकृत इमारतीत रहायचे मला काय फायदे मिळतात? एक तरी सांगु शकाल का?

बरीच जनता घरपट्टी भारत नाही म्हणून मीदेखील भरणार नाही हे म्हणणे शहाणपणाचे नाही. बाकी लोकांनी टी भरवित म्हणून नियमांची अंमलबजावणी नीट व्हावी हि अपेक्षा आपण करूच शकतो.

का शहाणपणाचे नाही? इथे मात्र नियमांची अंमलबजावणी व्हावी ही फक्त अपेक्षा पण रेन वॉटर हारवेस्टींग मात्र मँडेटरी? अजबच न्याय आहे हा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर्याच गोष्टी mandatory आहेत पण लोक नाही करत, हा अमलबजावणी मधील problem आहे. तुम्ही नका करू रेन water हार्वेस्टिंग आता, ज्यावेळी नियमाची अंमलबजावणी सगळ्यांसाठी योग्य प्रकारे होईल त्यावेळी करा (किंवा त्यावेळी करावच लागेल).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>माझ्याच कष्टाच्या पैश्यानी विकत घेतलेल्या अधिकृत इमारतीत रहायचे मला काय फायदे मिळतात? एक तरी सांगु शकाल का?

गब्बर तुमच्यावर रडगाडे घालून तुम्हाला चिरडून टाकायला पाहिजे असं म्हणत नाही हा फायदा मिळतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आपण जे resources वापरत आहोत किंवा जो कचरा तयार करत आहोत त्याबद्दल योग्य मोबदला आपल्याला द्यावा लागेल हे आपल्याला मान्य करावाच लागेल. टो सगळ्यांकडून समान प्रमाणात घ्यावा अशी अपेक्षा असणे अगदीच मान्य आहे. आणि त्या साठी आपल्याला महा पालिकेवर किंवा तसे नियम बनवणार्या अन्य कोणत्याही शासन संस्थेवर दबाव आणावाच लागेल. पण म्हणून हि समानता येईपर्यंत नियमाच बनवू नयेत अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या साठी आपल्याला महा पालिकेवर किंवा तसे नियम बनवणार्या अन्य कोणत्याही शासन संस्थेवर दबाव आणावाच लागेल. पण म्हणून हि समानता येईपर्यंत नियमाच बनवू नयेत अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.

उलट आहे समानता येणार नसली तर नियम बनवण्याचा कुठलाही नैतिक अधिकार सरकार ला रहात नाही.
तुम्ही खुन केला तर फाशी आणि मी केला तर पद्मश्री - असा नियम चालेल का तुम्हाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नैतिक अधिकाराबद्दल मला माहित नाही पण ह्या logic प्रमाणे कुठलाही नियम किंवा कायदा समाजात आणता येणार नाही आणि समाज अराजक किंवा रानटी अवस्थे मध्ये पोहचेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला, कमीतकमी तुमचा प्रवास जबरदस्ती नाहीये पासुन जबरदस्ती आहे आणि ती सुद्धा अगदी ५-७% लोकांवर आहे हे मान्य करण्यापर्यंत झालाय.

आता ही जबरदस्ती करायला सरकारच्या मागे कोण लागतय, तर तुमच्या सारखे पर्यावरणवादी (?) लोक. तुम्ही नसता तर महानगरपालिकेने असले नियम केलेच नसते ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे नियम नसल्यामुळे येणारी परिस्थिती अनुभवती आहे म्हणून महापालिका असे नियम बनवती आहे. कचरा व्यवस्थापनाची (कचरा कुठे आणि कसा जिरवायचा) हि समस्या बहुतेक सगळ्या महापालीकांपुढे मोठी समस्या आहे म्हणून त्याबद्दल नियम बनवायची वेळ आली आहे. दर उन्हाळ्यात ३-४ महिने पाणी कपात करावी लागे आणि आपल्या सारखे नागरिक आरडा ओरडा करतात म्हणून rain water हार्वेस्टिंग चा नियम करायची वेळ आली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दर उन्हाळ्यात ३-४ महिने पाणी कपात करावी लागे आणि आपल्या सारखे नागरिक आरडा ओरडा करतात म्हणून rain water हार्वेस्टिंग चा नियम करायची वेळ आली आहे.

त्याची कारणे वेगळी आहेत. ती अ‍ॅड्रेस करायची सोडुन तुम्ही "चोर सोडुन सन्याश्याला फाशी" ही म्हण सिद्ध करताय.

मी स्वता खर्च करुन पावसाचे अशुद्ध पाणी आपरायचे माझ्या आजुबाजुला लोकांनी महानगरपालीकेचे शुद्ध केलेले पाणी फुकट वापरायचे. ये कहांकी समझदारी है?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याची जि बरीच कारणे आहेत त्यात नागरिकांकडून होणार पाण्याचा अपव्यय, पाण्याचा पुनर्वापर ना करणे इत्यादी करणे देखील आहेत. सांगायचाच झाल तर भारतीय मानकानुसार दर दिवशी दर माणशी १३५ लिटर पाणी शहरी भागात लागत. ह्यात अगदी गाडी धुण्यासाठीच पाणी देखील धरले आहे. परंतु पुण्याचीच गोष्ट सांगायची झाली तर दर दिवशी दर माणशी २०० लिटर पेक्षा जास्त पाणी नागरिकांकडून वापरला जात. त्यामुळे नागरिक म्हणजे सगळे साधू संन्यासीच आहेत आणि त्यांच्यावर फार अन्याय होतोय हे काही खरे नाहीये. ह्या समस्येवर जे अनेक उपाय आहेत ( ज्याची चर्चा पुढील लेखात मी करणारच आहे) त्यातील रेन water हार्वेस्टिंग हा एक उपाय आहे पण एकमेव उपाय नाहि .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुणे महापालिकेच्या विदा नुसार gross per capita पाणी ३२१ लिटर पुरवले जाते, data प्रमाणे प्रत्यक्ष पाणी प्रतिदिन प्रती माणशी २२८ लिटर्स पुरवले जाते (म्हणजे पाणी पुरवठा करताना होणारी गळती आणि चोरी मोठ्या प्रमाणावर आहेच. ती कमी करायचे उपाय महापालिकेने करणे गरजेचेच आहेत)..प्रत्यक्ष पाणी पुरवठ्याच्या (२२८ लिटर्स) ३०% पाणी कपात जरी केली तरी दर दिवशी दर माणशी १६० लिटर पाणी पुरवठा होता जो राष्ट्रीय मानाकापेक्षा जवळपास २०% जास्त आहे. आणि तरी नागरिक पाणी कापती बद्दल आरडा ओरडा करतात. ह्या आकड्यांवरून मला हेच दाखवायच आहे कि नागरिकांकडून देखील पाण्याचा अपव्यय होत आहे जो थांबवणे तितकेच गरजेचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्ही पुणेकरांनी पाणी वापरले तर. आम्ही पाणी वापरतो म्हणुन डाउनस्ट्रीम धरणांना पाणी जाते. नाहीतर टेमघर, वरसगाव भरुन राहीली असती.

प्रश्न समानतेचा आहे. पाणी , वीज वापराला योग्य ती किंम्मत लावा आणि सर्वांना लावा. मग तुम्हाला हे रेन वॉटर हार्वेर्स्टींग, पर्यावरण पुरक इमारती वगैरे प्रचार करायची गरजच पडणार नाही.

तुम्ही ह्या नुस्त्या भानगडी करुन, बिचार्‍या मध्यमवर्गांचे फ्लॅट मात्र १ लाखानी महाग करताय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुणेकरांनी पाणी वापरण्याबद्दल मला काहीच प्रोब्लेम नाही आहे. पाणी अयोग्य पणे वापरून त्याची नासाडी करण्याबद्दल आहे. आणि पुणेकर पाणी गरज म्हणून वापरत आहेत, डाउनस्ट्रीम धरणांना पाणी जावे म्हणून उपकार करत नाहीत. बाकी मी काय प्रचार करावा आणि नाही तो माझा प्रश्न आहे. आणि ह्या सगळ्या भानगडी मध्यमवर्गाचे flat महाग न करता देखील कशा करता येतील ह्यावर देखील आम्ही प्रयत्न करत आहोत.
विरोधासाठी विरोध करायचा असेल तर मग मग चर्चा करण्यात अर्थच नाही. धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्यापिटलिस्ट लोकांनी समानतेचा हट्ट केलेला बघून अं ह झालो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

क्यापिटलिस्ट लोकांनी समानतेचा हट्ट केलेला बघून अं ह झालो!

नेहमी उजवे लोकच स्वातंत्र्य आणि समानतेचा हट्ट करतात. समानता संधीची, न्यायाची वगैरे वगैरे....

समाजवादी लोकच नेहमी असमानता पुरस्कृत करत असतात. कष्ट करुन जगणार्‍याला टॅक्स, फुकट्यांना सबसीडी.
मध्यमवर्गीयांना रेन वॉटर हार्वेस्टींग चा खर्च, सरकारी जमीनी वर घरे बांधुन रहाणार्‍यांना फुकट पाणी. असे अनेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
पेटन्ट आणि आयपीचे विषय आहे की कुठे जातो क्यापिटलिस्टांच्या समानतेचा धर्म! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>सरकारी जमीनी वर घरे बांधुन रहाणार्‍यांना फुकट पाणी.

हे कुठे मिळते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अनेक झोपडपट्यांमधे ( म्हणजे त्यात चांगल्या २ मजली झोपड्या पण असतात ). पुण्याच्या आजुबाजुच्या सर्व टेकड्यांवर लोक घर बांधुन रहातात आणि महानगरपालिका त्यांना पाणी पुरवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हॅ काहीही हं अनु
ते पाणी मिळवतात. पालिका देत नाही.

ज्याच्याकडे ताकद असते त्याने मिळावलं तर गैर नाही ना तुमच्या (क्यापिटलिस्टांच्या) मते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ज्याच्याकडे ताकद असते त्याने मिळावलं तर गैर नाही ना तुमच्या (क्यापिटलिस्टांच्या) मते?

अजिबात नाही. तुझे उजव्या विचारसरणी बद्दल गैरसमज आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुंबई महापालिका त्यांना पैसे घेऊन पाणी पुरवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

http://indianexpress.com/article/cities/mumbai/bmc-proposal-to-hike-wate...

सध्या ३ रु २४ पैसे दर हजार लीटरला आकारले जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अब रुलाओगे क्या थत्तेचाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टिपिकल मध्यमवर्गीय गैरसमजांना धक्का लागला की रडू येणारच!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Several times, BMC does not receive payments from everyone in these large groups.

ह्या वाक्यामुळे रडु आले हो थत्तेचाचा. हे वाक्य सुद्धा कीती ऑप्टीमिस्टीक माइंडसेट मधुन आलेले आहे हे मी समजु शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेडर रोडवर मोठे थकबाकीदार आहेत असे मागे वाचले होते. बरोबर आहे त्यांना कनेक्शन तुटायची भिती नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पेडररोड वर महाराष्ट्राची अस्मिता कुहु कुहु करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रश्न समानतेचा आहे. पाणी , वीज वापराला योग्य ती किंम्मत लावा आणि सर्वांना लावा. मग तुम्हाला हे रेन वॉटर हार्वेर्स्टींग, पर्यावरण पुरक इमारती वगैरे प्रचार करायची गरजच पडणार नाही.

तांबड्या भागाबद्दल - अनु राव फॅन क्लब मधून मला काढून टाकले जावे अशी मागणी करतो.

गुलाबी भागाबद्दल - "योग्य ती किंमत लावा आणि सर्वांना लावा" - हे विधान अनु राव यांनी टंकनश्रम वाचवण्यासाठी केले किंवा कसे हे जाणून घ्यावे लागेल. योग्य म्हंजे काय व कुणासाठी ?

हे विधान अर्धेअधिक ठीकठाक आहे.

----

खरंतर ... पाण्याच्या प्रायव्हेटायझेशन मुळे गरिबांना फायदाच होईल व खरंतर तडफडून मरावे लागणार नाही -- हे आर्ग्युमेंट जरासुद्धा सेन्स असलेल्या व्यक्तीस तुरंत ध्यानात येईल.

पण ज्यांच्या लक्षात येत नाही किंवा ज्यांना लक्षात घ्यायचे नाही ... त्यांच्यासाठी....

पाणी उपसणे, शुद्धीकरण, वितरण, व या सगळ्याचे व्यवस्थापन याला पैसे पडतात. तेव्हा पाणी ही पब्लिक प्रॉपर्टी आहे व सगळ्यांना ती नि:शुल्क मिळाली पाहीजे - हा आग्रह धरणे अतर्क्य आहे.

ढोबळ मानाने दोन गट आहेत.
(१) ज्यांना पाणी विकत घेणे परवडते व
(२) ज्यांना पाणी विकत घेणे परवडत नाही

सिरियसली बोलायचे तर पाण्याचे प्रायव्हेटायझेशन मान्य नसेल तर गट क्र. (२) मधल्या लोकांना पाण्यावाचून तडफडून मरण्याचा पर्याय उपलब्ध असावा. डाव्यांनी उगीचच -- गरिबांना पाण्यासाठी पैसे मोजायला लावणे हे मोरली रिपग्नंट आहे -- असला कैच्याकै युक्तीवाद करणे थांबवावे.. तसेच पाणी हा फंडामेंटल राईट (मूलभूत अधिकार आहे) हा युक्तीवाद सुद्धा फोल आहे. अगदी पी. साईनाथ यांच्यासारख्या दणकट पत्रकाराने केलेला असला तरीही फोल आहे. पुरावा इथे

ज्यांना परवडते त्यांनी पैसे मोजावेत व ज्यांना पाणी परवडत नाही त्यांनी शांतपणे किंवा तडफडून मरावे. नैतर आत्महत्या करावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीवरच्या माझ्या जवळच्या मित्राला बिल्डर ने रेन वॉटर हार्वेस्टींग च्या नावा खाली १ लाख रुपयाला लुटले. त्याशिवाय महानगर पालिका कंप्लिशन सर्टीफीकेट पण देत नाही हल्ली.
एक लाख म्हणजे मुद्दल तर गेलीच, वर वर्षाचे ८००० व्याज पण गेले.

तो तसा समाज , चळवळ वगैरे चा विचार करणारा आहे म्हणुन काही ह्या धाग्यावर बोलत नाहीये. पण त्याला खुपते आहेच १ लाख गेल्याचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महानगर पालिका कंप्लिशन सर्टीफीकेट देत नाही हे खरे आहे पण बिल्डरने तुमच्या मित्राला उल्लू बनवले आहे. जसे पार्किंग विकणे बेकायदेशीर आहे तसेच रेन water हार्वेस्टिंग च्या नावाखाली अतिरिक्त पैसे घेणे देखील बेकायदेशीर आहे. त्याच न्यायाने त्याला पार्किंगसाठी गेलेल्या पैशाचे देखील वाईट वाटले पाहिजे.
rainwater हार्वेस्टिंग त्या बिल्डर नि पूर्ण केला आहे कि नाही आणि ते काम करत आहे कि नाही हे तपासून बघायला सांगा त्याला नाहीतर तेल हि गेले आणि तूपही गेले असे व्हायला नको..:)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेन water हार्वेस्टिंग च्या नावाखाली अतिरिक्त पैसे घेणे देखील बेकायदेशीर आहे.

बेकायदेशीर कसे आहे? बिल्डरनी खरंच मोठा खड्डा खणुन त्याच्या भिंती सिमेट नी लिंपुन जमिनीखाली टाकी बनवली आहे. त्याला पंप वगैरे पण लावला आहे. त्याला बराच खर्च आलेला असणार. तो खर्च बिल्डर विकत घेणार्‍यांकडुनच वसुल करणार ना. अ‍ॅग्रीमेंट मधे लिहीत नाहीत की रेन वॉटर हार्वेस्टींग साठी १ लाख असे.

तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टींग ची टाकी आणि महानगर पालिकेची टाकी कॉमन करायचा सल्ला देऊ नका. कारण कोणालाही स्वच्छ पाण्यात गच्ची वरचे पाणी मिक्स करायचे नसते.

त्याच न्यायाने त्याला पार्किंगसाठी गेलेल्या पैशाचे देखील वाईट वाटले पाहिजे.

१. पार्कींग घ्यायचे की नाही हे ऑप्शनल आहे. रेन वॉटर हार्वेस्टींग चा भुर्दंड कंपलसरी आहे.
२. पार्कींग मुळे मला माझी गाडी लावायला हक्काची जागा मिळते. रेन वॉटर हार्वेस्टींग मुळे जर चुकुन होत असलाच तर फायदा तिसर्‍याचाच होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पार्कींग घ्यायचे की नाही हे ऑप्शनल आहे.

निदान पुण्यात तरी कंपल्सरी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही जो प्रत्येकी १ लाख रुपये खर्च सांगत आहात तो अजिबात खरा नाही. माझ्या स्वत:च्या अनुभवानुसार ५००० sft टेरेस एरिया असेल तर त्या इमारतीला फारफारतर ५०००० ते ७०००० खर्च येतो आणि त्या इमारतीत जर २० कुटुंबे ( ४ युनिट्स * ५ मजले) धरले तर प्रत्येकी फार फारतर ३५०० हजार खर्च येईल त्यामुळे उगीच चुकीची ऐकीव माहिती सांगू नका. दुसरा भाग असा कि तुम्ही सरळ सरळ असे म्हणाला होतात कि फक्त रेन water हार्वेस्टिंग चे बिल्डर नि १ लाख रुपये जास्त घेतले. तर हे बेकायदेशीरच आहे कारण रेन water हार्वेस्टिंग हि अतिरिक्त amenity नाही आणि त्यामुळे ती विकता येत नाही ( उद्या तुम्ही बिल्डर नि जायच्या यायच्या रस्त्याचे separate ५ लाख घेतले म्हणाल Smile ) आणि प्रत्येक flat ला किमान पार्किंग देणे / घेणे हे कायद्याने कंपलसरीच आहे (पण असे मिनिमम पार्किंग विकणे बेकायदेशीर). अतिरिक्त पार्किंग तुम्ही विकत घेऊ शकता किंवा बिल्डर ते विकू शकतो ते तुमच्या आणि बिल्डर च्या मर्जी वर आहे.

आणि गच्ची मधून साठवलेले पाणी जसेच्या तसे वापरले जात नाही ते फिल्टर करून वापरले जाते. त्याचे detail मी पुढील भागात देणारच आहे त्यावेळी त्यावर चर्चा करू. एकदा फक्त सकारात्मक दृष्टीने विचार करून पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मला नासाडीच करायची आहे कारण माझ्याकडे पैसा आहे', असा विचार करणारे लोक मोजके असतात. माझ्यासारखे कुंपणाच्या अल्याड-पल्याड असणारे बरेच लोक असतात. आमच्यासाठी जरूर लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती तै - प्रश्न पाणी वाया घालवायचा किंवा वाचवायचा नाहीये. प्रश्न जबरदस्तीचा आहे आणि ते सूद्धा नेहमीच्या सॉफ्ट टारगेट ना. थिस इस वर्स दॅन बीफबॅन आणि पहलाज निहलानी सेंसॉर बोर्ड. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही मासोकीस्ट व्यक्तीला वेदनेतून दुःखच निपजतं असं सांगताय.

माझ्या घरी रेनवाॅटर हार्वेस्टिंगसाठी एक पिंप आहे, हळूहळू ती चार पिंप करायची आहेत. मनपाकडून सबसिडी मिळते, ती आणखी मिळाली पाहिजे असं मला वाटतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऊल्लू शेठ आणि अदिती तै - तुम्ही दोघांनी माझ्यावर अजुन तुटुन पडायच्या आधी जरी मला हे सांगायचे नव्हते तरी सांगायला लागतय की माझ्या बिल्डींग ला रेन वॉटर हार्वेस्टींग आहे, ते बिल्डरनी नाही तर नंतर आम्ही सोसायटीच्या लोकांनी करुन घेतले आहे. प्रश्न तो नाहीये.

मनपा सबसीडी देणार असेल मला तर मी चार पिंप काय चार फ्लॅट घेइन. इथे काही सबसीडी वगैरे मिळत नाही अदिती तै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनपा सबसिडी देते तेव्हा करदात्यांनी भरलेला पैसा माझ्याकडे वळता होतो. जे लोक घरात रेनबॅरल लावत नाहीत त्यांच्याकडून पैसा वसूल होतो, पण तो त्यांना वापरता येत नाही.

गब्बरच्या भाषेत सांगायचं तर मध्यमवर्गीय, सॉफ्ट टार्गेट हे फडतूस लोक आहेत. त्यांच्याकडून पैसे उकळलेच पाहिजेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उल्लू शेठ - तुमची गणिते एकदा तपासुन घ्या. जमिनीखालची २०००० लिटरची टाकी ( पक्की ) जर तुम्हाला कोणी पंपासकट ७०००० कोणी करुन देत असेल तर लगेच माझ्याकडुन ऑर्डर घ्या. पाहिजे तर १ लाख घ्या

फक्त रेन water हार्वेस्टिंग चे बिल्डर नि १ लाख रुपये जास्त घेतले. तर हे बेकायदेशीरच आहे कारण रेन water हार्वेस्टिंग हि अतिरिक्त amenity नाही आणि त्यामुळे ती विकता येत नाही

सॉरी टु से, पण तुमची समज बरीच कमी आहे. बिल्डरला जास्तीचा खर्च आला, तो त्याने दामदुपटीने ग्राहकाकडुन वसुल केला. इतके साधे गणित आहे. अतिरिक्त अ‍ॅमिनिटी आहे की नाही हा मुद्दाच होऊ शकत नाही.
पार्कींग्शी तुलना तर एकदम चुकीची आहे पण तुम्हाला समजणे शक्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉरी टु से, पण तुमची समज बरीच कमी आहे.

अनु राव मादाम, माझी गणिते पूर्ण पणे तपासून बरोबरच आहेत. इतर विषयात माझी समज बरीच कमी असू शकेल पण सॉरी टु से ह्या विषयात बरीच जास्त आहे. (माझी समज किती आहे ह्या वर विषय आला म्हणून सांगतो कि मी एक आर्किटेक्ट असून पर्यावरण पूरक बांधकाम ह्या विषयात माझे स्पेशलाइसेशन आहे. गेली ७ वर्षे मी पर्यावरण पूरक बांधकाम ह्या क्षेत्रात भारतभर वेगवेगळ्या शहरात भरपूर कामे केली आहेत. आणि आमचा परंपरागत व्यवसाय बिल्डर developer चा आहे त्यामुळे त्यातली गणितेही व्यवस्थित कळतात)

आता तुमचे आक्षेपाचे मुद्दे. महापालीकेनी रेन water हार्वेस्टिंग कंपल्सरी केला आहे. टाकी बांधून पाणी साठवणे नाही. रेन water हार्वेस्टिंग चे दोन प्रकार आहे ज्यात पहिल्या प्रकारात पाणी एकत्र करून फिल्टर करून जमिनीत शोष खड्डया द्वारे मुरवले जाते ह्याला जलपुनर्भरण म्हणतात. मी सांगितलेला खर्च ह्या प्रकारे रेन water हार्वेस्टिंग करण्यासाठी आहे. दुसरा प्रकार टाकी बांधून पाणी साठवणे आणि त्याचा पुनर्वापर करणे हा थोडा खर्चिक प्रकार असून त्यातही बर्याच चांगल्या विकल्पानी खर्च कमी करता येतो. ह्या दोन्ही पैकी कुठलाही प्रकार केला तरी महापालिका कम्प्लिशन सर्तीफिकेत देते. ह्या दोन्ही बद्दल दुसरा लेख मी लवकरच लिहित आहे त्यावेळी सगळी गणिते तुम्हाला व्यवस्थित सोडवून दाखवेन. रेन water हार्वेस्टिंग केला तर पुणे महापालिका property tax वर सवलत हि देते त्याची माहिती देखील पुढील भागात..

पार्कींग्शी तुलना तर एकदम चुकीची आहे पण तुम्हाला समजणे शक्य नाही.

आर्किटेक्ट आणि बिल्डर ह्या दोन्ही क्षेत्रातली माहिती आहे म्हणून सांगतो हि अतिरिक्त अमेनिती नाही आणि त्याबद्दल अतिरिक्त पैसे घेणे बेकायदेशीर आहे. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेऊ. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कसे पकडले ऊल्लु शेठ तुम्हाला.

पर्यावरण पूरक बांधकाम ह्या विषयात माझे स्पेशलाइसेशन आहे. गेली ७ वर्षे मी पर्यावरण पूरक बांधकाम ह्या क्षेत्रात भारतभर वेगवेगळ्या शहरात भरपूर कामे केली आहेत.

मला माहीती होते की तुमचे ह्या वाचनमाले मधे व्हेस्टेद इंटरेस्ट आहेत. म्हणुनच मी विषय लाऊन धरत होते.
तुम्ही तुमचे हे उपजीविकेचे साधन आहे असे डीक्लेरेशन लेखाच्या सुरुवातीलाच द्यायला हवे होते एक प्रोफेशनल म्हणुन म्हणजे वाचणार्‍याला त्यातले फायदे डीस्काऊंट करायला पाहिजेत हे कळले असते.

रेन वॉटर हार्वेस्टींग आणि तत्सम गोष्टी मॅण्डेटरी करण्यामागे, तुमच्या सारख्या हितसंबध गुंतलेल्यांची लॉबीच काम करत असते. त्याला कधी नॉन प्रोफीट ऑर्ग चे नाव द्यायचे, किंवा कधी एनजीओ च्या नावाखाली प्रपोगंडा करायचा. मी माझ्या सुरुवातीच्या प्रतिसादापासुन म्हणते आहे की र्व मँडेटरी नको. बाकी माझी काहीच तक्रार नाहीये.

अश्या पद्धतीने लॉबी करुन बिचार्‍या ग्राहकाला भुर्दंड बसेल असे करणे चुक आह. जहिरातबाजी ला हरकत नाही पण ती उघड उघड असावी. इतकेच बोलुन मी खाली बसते.

ह्या विषयावर तुमच्याशी चर्चा होऊ शकत नाही कारण तुमचे आणि माझे हितसंबंध विरुद्ध आहेत. पुन्हा एकदा माझे आवडते कोट

It is difficult to get a man to understand something, when his salary depends on his not understanding it

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनु राव यांना एक कडकडीत सॅल्युट मारण्यात येत आहे. याबद्दल की एक अत्यंत दणकट व बहुतेकांना सहजासहजी न लक्षात येणारा पैलू त्यांनी समोर आणलेला आहे.

उल्लु , तुमचा या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव व त्याच्या जोरावर तुम्ही केलेले या योजनांचे समर्थन हे क्रोनि-कॅपिटलिझम ची जवळपास कबूली आहे.

हे नेमकं कसं होतं :

(१) लॉबी बनवायची
(२) सरकारकडे जायचे (इथे महापालिका)
(३) एखादी विशिष्ठ संकल्पना ही जनसामान्यांच्या हिताची आहे अशा स्वरूपात ती पेश करण्यास सरकारला मदत करायची. तिची योजना बनवायची.
(४) (लॉबीने) सरकारमधील लोकप्रतिनिधींच्या इलेक्शन फंडास पैसे द्यायचे
(५) बदल्यात सरकारने ही योजना जनहितार्थ आहे म्हणून व सामाजिक जबाबदारी घेतलीच पायजे म्हणून ती योजना सक्तीची करायची
(६) योजना राबवणारे तुमच्यासारखेच सिव्हिल्/कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स असतात ज्यांना काँट्रॅक्ट्स मिळतात
(७) योजना खरोखर कॉस्ट इफेक्टिव्ह आहे की नाही त्याबद्दल चर्चा कोण करतं ? कारण प्रत्येक अपार्टमेंट काँप्लेक्स साठी तो अ‍ॅनॅलिसिस स्वतंत्र करावा लागतो.

हे सगळं तुम्ही केलंय असं कोणीच म्हणणार नाही. पण ... तुम्ही या योजनेचे समर्थन/जाहिरात करणे हे ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे ह्या वाचनमाले मधे व्हेस्टेद इंटरेस्ट आहेत.

सॉलीड पकडलय. आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या जवळच्या मित्राला

तो जो कोण आहे मला अज्जिबात घेणं देणं नाही .... पण एक लघुशंका - तुम्ही त्याला मित्र मानता. तो तुम्हाला मानतो का? Wink
जस्ट किडींग.
___
मनोबा बिन्धास्त नवा आय डी घेऊन या धाग्यावर विरोधी मतं मांड. Wink परत जस्ट किडींग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही त्याला मित्र मानता. तो तुम्हाला मानतो का?

हाऊ डज इट मॅटर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनु सॉरी. हा प्रश्न मला एका व्यक्तीने पूर्वी विचारलेला होता आणि मला त्याचे उत्तर अजिबात देता न आल्याने भयंकर (आतापर्यंत - २० वर्षे झाली) चरफड झाली होती/होते. पण उगाचच तुला विचारला असे आता वाटते आहे. असो.
आपण ज्या व्यक्तीला मित्र मानतो तिने आपल्याला न मानणे, किंवा भावना संदिग्ध ठेवणे हे दु:खदायक असते. मला तरी तसे वाटते. - हे वाक्य माझे स्वगत आहे. तुला उद्देशुन नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा कोणत्याही इतर गोष्टींचे परिणामकारक रिसायकलिंग होणार नाही. ही चर्चा त्याचाच नमुना म्हणून दाखवता येईल. स्वतःला तोशीस पडेल असे दुसर्‍यासाठी (त्यात स्वतःचे वंशजही आले) करण्याचा माणसाचा स्वभाव नसतो.
एके दिवशी असाच रिसायकलिंगचा विचार करत होतो तेव्हा लक्षात आलं की घरात किती मोटर्स आहेत. प्रत्येक फॅनमध्ये एक, मिक्सरमध्ये एक, वॉशिंग मशिनमध्ये एक, मायक्रोवेव्हमध्ये एक,कॉम्प्युयुटरमध्ये एक वगैरे. समजा इतक्या मोटर्स वापरण्याऐवजी एक किंवा दोन मोटर्स वेगवेगळ्या अ‍ॅटॅचमेंटने व रेग्युलेटरने वेगवेगळ्या ठिकाणी वापरा असे लोकांना सांगितले तर किती लोक ते करायला तयार होतील? खूपच कमी.
रिसायकलिंगचा प्रचार करणार्‍यांच्या बोलण्यातून एक असा छुपा संदेश जातो की रिसायकलिंग करुन परपेच्युअली आपला इंडस्ट्रियल समाज सुखात राहू शकेल. पण हे थर्मोडायनॅमिक्सच्या नियमांच्या विरुद्ध आहे. रिसायकलिंगने फक्त नाशाचा वेग कमी करु शकतो. हे सगळ्यांना कळत असूनही आत्ताची सुखसाधने सोडायला कोणीही तयार होणार नाही; उलट इतके दिवस झालं तसाच काहीतरी उपाय काढून माणसं अधिकाधिक सुखात राहतील ह्या सोयीस्कर भाकितावर प्रचंड श्रद्धा ठेवली जाते. किंवा तेव्हाचं तेव्हा बघतील लोक असं म्हटलं जातं. (स्वतःला काही होणार नाही ह्याची जवळजवळ प्रत्येकाला खात्री असते). आपण एका मंकीट्रॅपमध्ये असून काहीही झालं तरी ऑबव्हियस उपाय मागासलेपणा म्हणून कोणीही करणार नाही जोपर्यंत परिस्थिती तो करायला भाग पाडत नाही तोपर्यंत.
ह्याला इंग्रजीत ह्युब्रिस असा शब्द आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या मताशी अगदीच सहमत आहे नगरीनिरंजन.. शाश्वत विकासासाठी recycle हा शेवटचा उपाय असला पाहिजे.(माझ्या ह्या लेखात मी कुठेच फक्त recycle किंवा रेन water हार्वेस्टिंग हाच उपाय आहे असा मांडलं नाही आहे पण असा संदेश जात असेल तर मला परत एकदा तपासून पाहावा लागेल)

खरा क्रम १. reduce २. Reuse आणि मग ३. recycle असा असला पाहिजे. आपल्या अति गरजा, आपले अति हव्यास आपण कमी केले तर नक्कीच खूप परिणाम होईल. पुढील भागात ह्या विषयावर चर्चा करूच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एके दिवशी असाच रिसायकलिंगचा विचार करत होतो तेव्हा लक्षात आलं की घरात किती मोटर्स आहेत. प्रत्येक फॅनमध्ये एक, मिक्सरमध्ये एक, वॉशिंग मशिनमध्ये एक, मायक्रोवेव्हमध्ये एक,कॉम्प्युयुटरमध्ये एक वगैरे. समजा इतक्या मोटर्स वापरण्याऐवजी एक किंवा दोन मोटर्स वेगवेगळ्या अ‍ॅटॅचमेंटने व रेग्युलेटरने वेगवेगळ्या ठिकाणी वापरा असे लोकांना सांगितले तर किती लोक ते करायला तयार होतील? खूपच कमी.

यानं काय होईल?
मटेरीअल (आणि पर्यायाने कॅपिटल कॉस्ट्स) चा विचार केला तर असं करून तोटाच होईल. फॅनमधली मोटर अन रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसर मधली मोटर यात बराच फरक आहे. वॉशिंगमशीन, कंप्युटर्स वगैरे वगैरे वेगवेगळ्या मोटर्स एकत्र करायच्या म्हणजे इंजिनीअरींगच्या दृष्टिने हास्यास्पद होईल. त्याशिवाय, ह्या एक-दोन मोटर्सकरून इतकी वेगवेगळी अ‍ॅप्लिकेशन्स करून घेणं म्हणजे त्यांच्या इफिशीयंसीची वाट लागेल. थोडक्यात, कॅपिटल कॉस्ट आणि वापर दोन्ही दृष्टीने हे अपायकारकच होईल.

रिसायकलिंगचा प्रचार करणार्‍यांच्या बोलण्यातून एक असा छुपा संदेश जातो की रिसायकलिंग करुन परपेच्युअली आपला इंडस्ट्रियल समाज सुखात राहू शकेल. पण हे थर्मोडायनॅमिक्सच्या नियमांच्या विरुद्ध आहे. रिसायकलिंगने फक्त नाशाचा वेग कमी करु शकतो.

यात वाईट काय आहे? नाशाचा वेग कमी कमी करत जाणं हे फायद्याचंच आहे. रिसायक्लिंग इफिशीयंट केलं तर तो ही एकूण इफिशीयंसी वाढवण्याचा प्रकार आहे.

बादवे, इंडंस्ट्रीमध्ये रिसायकलिंग सर्रास केलं जातं. कारण कॅपिटकल कॉस्ट, रिसायलिंग कॉस्ट वगैरेचा अभ्यास करून जिथे प्रचंड पैसे वाचवता येतात तिथे रिसायकलिंग न करणं म्हणजे पैसे वाया घालवणं आहे हे गणित स्पष्ट असतं. असो.

एक सोपं उदाहरण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

रिसायकलिंगचा प्रचार करणार्‍यांच्या बोलण्यातून एक असा छुपा संदेश जातो की रिसायकलिंग करुन परपेच्युअली आपला इंडस्ट्रियल समाज सुखात राहू शकेल. पण हे थर्मोडायनॅमिक्सच्या नियमांच्या विरुद्ध आहे. रिसायकलिंगने फक्त नाशाचा वेग कमी करु शकतो.

खरं तर जीवन हेच थर्मोडायनॅमिक्सच्या नियमांच्या विरुद्ध आहे. आपलं शरीर जगवण्यासाठी आपण आपल्या शरीरातली एंट्रॉपी कमी ठेवतो, आणि त्यासाठी बाहेरची एंट्रॉपी वाढवतो. माणसाने जगणंच सोडलं तर एंट्रॉपी कितीतरी कमी होईल. मी तर म्हणेन की आहेत नाहीत ते सर्व अणुबॉंब द्या पेटवून, आणि पृथ्वीवरचं सर्वच जीवन नष्ट करा. म्हणजे बघा एंट्रॉपीची वाढ कशी आटोक्यात येते ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इनफॅक्ट चेंगीझखान व अन्य मंगोलांनी इतकी माणसे मारली की त्या माणसांमुळे होणारी पोटेन्शिअल कार्बन फूटप्रिंट ही कमी झाली आणि त्यामुळे पॄथ्वीवरती ग्रीन कव्हर वाढले असा एक पेपर मध्ये वाचनात आला होता. त्याच न्यायाने हिटलर, स्टॅलिन, पोल पॉट, आयसिस, इ. लोकांचे आभारच मानले पाहिजेत इतक्या लोकांचे हत्याकांड केल्याबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्याच न्यायाने हिटलर, स्टॅलिन, पोल पॉट, आयसिस, इ. लोकांचे आभारच मानले पाहिजेत इतक्या लोकांचे हत्याकांड केल्याबद्दल.

इतकी माणसे मारल्याने जे इतर मोठे आर्थिक फायदे झाले त्याची तर गणतीच नाही. इतकी लक्षावधी लोक अजुन शेकडो वर्षे जगली असती. (एकेकाची ६०-६५ वर्षे धरुन) इथली अगोदरच मर्यादीत संसाधने वेस्ट करत बसली असती. यांना खायला हवे प्यायला हवे ते सर्वच वाचल. उरलेल्या उत्तमांना कमी स्पर्धा कमी मनस्ताप राहीला. संसाधने वापरायला मिळाली. सर्वात जास्त महत्वाच प्रत्येक मारलेल्या माणसामागे कारणमीमांसाही दिली हिटलर स्टॅलीन ने म्हणजे मर्डर वुइथ रेडीमेड कनव्हीन्सींग ब्युटीफुल अ-विसंगत स्पष्टीकरण देऊन
हे सर्वात महत्वाच आहे. ज्यु इ. ची नालायकी जगण्यातली सिद्ध झाल्याने उरलेल्यांना जी निश्चींत झोप मिळाली ती महत्वाची.
छानच झाल खर. हिटलर स्टॅलीन चे उपकार मानवजात विसरली हा कृतघ्नपणाचा कळसच.
नाही चिरा नाही पणती असा प्रकार झाला यांच्याबाबतीत.
मानवतेचे मुक शिलेदार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी. सवालच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उल्लु तुम्ही विषय छान निवडला
अत्यंत माहीतीपुर्ण आहेत तुमचा धागा व तुमचे प्रतिसाद
नवनविन बाबी कळत आहेत.
तुम्हाला योग्य प्रमाणात आव्हान दिल्यानेही अधिकाधिक माहीती बाहेर येत आहे.
बाकी तुम्हाला पकडल पकडल असा गदारोळ झाला म्हणुन बघायला आलो होतो.
कोण सीरीयल किलर वगैरे नाही म्हणुन जीव भांड्यात पडला.
लेख व प्रतिसादासाठी धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> बाकी तुम्हाला पकडल पकडल असा गदारोळ झाला म्हणुन बघायला आलो होतो.
कोण सीरीयल किलर वगैरे नाही म्हणुन जीव भांड्यात पडला. <<

छे हो,पकडतायत कसले. एखाद्या विषयातल्या तज्ज्ञ माणसापेक्षाही आम्हालाच कसं सगळ्यातलं सगळं जास्त कळतं असा दावा करून स्वतःची जाहीर फजिती करून घेणारे काही लोक इथे (आणि एकंदरीत मराठी संस्थळांवर) वावरतात एवढंच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

"खरं तर जीवन हेच थर्मोडायनॅमिक्सच्या नियमांच्या विरुद्ध आहे."
हे कुठून आणले? थर्मोडायनॅमिक्सच्या नियमांच्या विरुद्ध काहीच नसते. "entropy कमी करायची स्वप्ने कदाचित थर्मोडायनॅमिक्सच्या नियमांच्या विरुद्ध असतील.
काही गणितीय मांडणी परिपूर्ण करतना एक संकल्पना म्हणून entropy च गरज भासते. त्या पलीकडे entropy ला महत्व देण्याची गरज नाहीच. माणूस किंबहुना कुठलेही जीवन नसताना सुद्धा entropy वाढत होती आणि असणार. तिचा प्रलय जवळ येण्याशी काही संबंध नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने