The Sheet Anchor of Indian Chronology

अलेक्झँडर, चन्द्रगुप्त मौर्य, चाणक्य, अंभी, पौरस इत्यादि नावे जी आपणास आज ठाऊक आहेत ती सर्व पश्चिमेकडील ग्रीक लोकांच्या लेखनातून उपलब्ध झाली आहेत. भारतीय प्राचीन साहित्यात एकतर अलेक्झँडर, अंभी, पौरस कोठेच भेटत नाहीत आणि 'त्या' प्रसिद्ध लढाईविषयीहि एकहि उल्लेख नाही. अर्थात लढाई झाली हे सत्य आहे कारण अनेक ग्रीक लेखनांमधून तिचा उल्लेख मिळतो पण त्या ग्रीक सैन्यामध्ये कोणी एक चन्द्रगुप्त होता ज्याने चाणक्य ह्या राजनीतिपटु ब्राह्मणाच्या सहकार्याने नंदकुलाचा नाश केला ह्यामागे काही पुरावा नाही. अर्थात चन्द्रगुप्त, चाणक्य, नंदकुलाचा नाश ह्या घटनाहि होऊन गेल्या होऊन गेले कारण मुद्राराक्षस, देवीचन्द्रगुप्तम्, कौमुदीमहोत्सव अशा ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील नाटकांमध्ये, तसेच कथासरित्सागरामध्ये त्या भेटतात.

ही सगळी गोची चन्द्रगुप्त नक्की कोण आणि केव्हा होऊन गेला हे पाश्चात्य अभ्यासकांनी कसे ठरविले ह्यातून झाली आहे. पाश्चात्य अभ्यासकांचा ठराव आणि त्यातील गोची हा फार विस्तृत विषय आहे, येथे त्याचा आराखडाच थोडक्यात द्यायचा प्रयत्न करता येईल.

चन्द्रगुप्ताचा काळ ही एकच घटना भारताच्या प्राचीन इतिहासाला अन्य जगाच्या इतिहासाशी जोडते आणि त्यामुळे त्या घटनेला Sheet Anchor of Indian Chronology असे मॅक्समुल्लरने संबोधले. विन्सेण्ट स्मिथसारख्या अन्य जाणकारांनी त्याला दुजोरा दिला. ही गोष्ट एकदा पक्की मानली की चन्द्रगुप्ताच्या पुढच्या आणि मागच्या सर्व व्यक्ति आणि घटना केव्हा होऊन गेल्या हे अधिक-उणे करून ठरवता येते. पण ही मूळची गोष्टच कितपत पक्की आहे ह्याबाबत अन्य अनेक अभ्यासकांना पहिल्यापासून शंका आहे. तथापि मॅक्समुल्लर आणि विन्सेण्ट स्मिथसारख्या विद्वानांच्या मतापुढे अशा संशयी अभ्यासकांच्या शंकांना कधीच वजन मिळाले नाही. हळूहळू मॅक्समुल्लर आणि विन्सेण्ट स्मिथ ह्यांचे हे मत एका dogma मध्ये परिवर्तित झाले. १०० हून अधिक वर्षे आपल्या स्थानावर अढळ असलेल्या ह्या dogma ला विरोध म्हणजे एक वैचारिक बंडखोरीच. अशी बंडखोरी करणार्‍याला सर्व विद्यापीठे, प्राध्यापकाच्या जागा, academic conferences ह्यांचे दरवाजे बंद होऊ लागले.

चन्द्रगुप्ताचा काळ कसा ठरला? Indology ह्या शास्त्राचा जनक विल्सन जोन्स ह्याने स्थापन केलेल्या Asiatic Society of Bengal च्या १०व्या वर्षदिनाच्या निमित्ताने सोसायटीपुढे २८ फेब्रुअरी १७९८ ह्या दिवशी एक भाषण केले. त्याला अलेक्झँडरच्या मोहिमेबाबत ग्रीक लेखकांनी केलेल्या लेखनामधून Sandracottus (ह्याची अनेक स्पेलिंग्ज आहेत) हे नाव माहीत होते आणि तत्कालीन उपलब्ध संस्कृत लेखनामधून त्याला चन्द्रगुप्त हे नावहि माहीत होते. त्यातील एक दुसऱ्याशी जोडून अलेक्झँडरच्या संबंधात आलेला आणि नंतर सेल्यूकस निकेटरशी तह करणारा Sandracottus हाच त्याला माहीत असलेला चन्द्रगुप्त असा तर्क त्याने बांधला. ह्या तर्काला दुजोरा मिळाल्यासारखे दिसले तेव्हा, जेव्हा जेम्स प्रिन्सेपला फ़ेब्रुअरी १८३८ मध्ये अशोकाच्या ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेल्या गिरनार लेखाचे (अशोकाचे १३ वे शिलाशासन) वाचन करता आले. त्या लेखामध्ये त्याला अशोकाचे समकालीम म्हणता येतील अशी भारताबाहेरच्या तीन राजांची नावे आढळली. ह्या राजांचा काळ माहीत असल्यामुळे त्यांचा काळ हा अशोकाचा काळ ठरला, त्यामुळे त्याच्या दोन पिढ्यामागच्या चन्द्रगुप्त हा अलेक्झँडरचा समकालीन आणि चन्द्रगुप्त मौर्याचा काळ म्हणजे इ.स.पूर्व ३१५ ह्या तर्काला बळ मिळाले. बौद्धांच्या समजुतीनुसार बुद्धाचे परिनिर्वाण चन्द्रगुप्तापूर्वी १६२ वर्षे झाले. त्यावरून गौतम बुद्धाच्या परिनिर्वाणाचा काळ इ.स.पूर्व ४७७ असा ठरला. ह्याच रीतीने क्रमाक्रमाने सगळाच प्राचीन भारतीय इतिहास आज आपण मानतो तसा बसला आणि आता तो वज्रलेप झाल्यासारखे वाटते.

येथे हे दुर्लक्षिले गेले प्राचीन इतिहासाची भारतीय परंपराहि अस्तित्वात आहे आणि ती अनेक पुराणांमधून आणि राजतरंगिणीसारख्या ग्रन्थांमधून मांडण्यात आली आहे. तिच्यामध्ये कलियुगप्रारम्भापासून तीन हजार वर्षे कोणते राजवंश होऊन गेले अशी जन्त्री आहे. त्यानुसार असे विधान करणे शक्य आहे की जोन्स इत्यादींना दिसलेला चन्द्रगुप्त हा मौर्य चन्द्रगुप्त नसून गुप्त वंशाचा संस्थापक गुप्त चन्द्रगुप्त आहे आणि मौर्य चन्द्रगुप्त हा त्याच्या अनेक शतके आधी होऊन गेला. अशोकाचे समकालीन मानले गेलेले तीन राजेहि कोणी दुसरेच आहेत असे मानण्यास जागा आहे. चन्द्रगुप्त-नंदवंश ह्यांच्या बाबतच्या प्रचलित कथा गुप्त चन्द्रगुप्तालाहि विरोधात नाहीत. अशा रीतीने Sheet Anchor of Indian Chronology जर रद्द करता आला तर भारतीय प्राचीन इतिहास आज वाटतो त्यापेक्षा खूपच जुना असावा असे म्हणता येईल.

पण ह्या ना त्या कारणाने पाश्चात्यांनी ही सर्व पुराणे आणि राजतरंगिणीसारखे ग्रन्थ शुद्ध इतिहास म्हणून अविश्वासार्ह ठरवले. त्यातील वंशावळी काही प्रमाणात मान्य केल्या पण त्यांचे काळ पुराणे दाखवितात त्यापेक्षा बरेच कमी करून घेतले आणि अशी बरीच कसरत करून चन्द्रगुप्त मौर्य इ.स.पू. ३१५ (अधिक-उणे काही वर्षे) हे जुळवून घेतले. त्यामुळे भारताचा प्राचीन इतिहास इ.स.पू. १५०० च्या अधिक मागे जात नाही हा सिद्धान्त जन्मला.

हे सर्व करण्यामागे भारत ह्या जित राष्ट्राचा इतिहास हा ग्रीक इतिहासापेक्षा अधिक प्राचीन असूच शकत नाही हा पाश्चात्यांचा साम्राज्यवादी पूर्वग्रह मुख्यत्वे कारणीभूत आहे अशी शंका पाश्चात्यांचे विरोधक घेतात.

हे सर्व विचार येथे पूर्ण विस्तारात मांडणे शक्य नाही कारण त्यांचा आवाका खूप मोठा आहे. असा काही प्रश्न अस्तित्वात आहे आणि भारतीय इतिहासाच्या कालगणनेबद्दलचा शेवटचा शब्द उच्चारला गेलेला नाही हे अधोरेखित करणे इतपतच ह्या धाग्याची व्याप्ति पोहोचते. ज्यांना अधिक जिज्ञासा असेल अशांनी The Sheet Anchor of Indian Chronology हे श्ब्द गूगलच्या शोधपेटीमध्ये घालून काय बाहेर पडते ते वाचावे. ’History of Classical Sanskrit Literature (लेखक M. Krishnamachariar)’ असे पुस्तक archive.org ह्या संस्थळावर उपलब्ध आहे. त्याच्या विस्तृत प्रस्तावनेची xxxvii ते cx इतकी पाने ह्या प्रश्नाच्या विवेचनासाठी खर्च केली आहेत.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे जे ग्रंथ -**मुद्राराक्षस, देवीचन्द्रगुप्तम्, कौमुदीमहोत्सव अशा ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील नाटकांमध्ये, तसेच कथासरित्सागरामध्ये त्या भेटतात.**आहेत ते सध्या कुठे आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्यंत रोचक लेख!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा लेख वाचनात आला.

http://indiafacts.org/flawed-sheet-anchors-of-indian-history/

कितपत विश्वासार्ह आहे महिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

खरे बुद्धिप्रामाण्यवादी इतिहासकार/अभ्यासक पुरावा लेख , पत्रे न मिळाल्यास तर्काचे इमले न बांधता गप्पच राहतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> अर्थात चन्द्रगुप्त, चाणक्य, नंदकुलाचा नाश ह्या घटनाहि होऊन गेल्या होऊन गेले कारण मुद्राराक्षस, देवीचन्द्रगुप्तम्, कौमुदीमहोत्सव अशा ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील नाटकांमध्ये, तसेच कथासरित्सागरामध्ये त्या भेटतात.

या वा इतर साहित्यामध्ये अशोकाचा उल्लेख सापडतो का?

अशोकाचा शोध, तुम्ही वर म्हणल्याप्रमाणे, बराच उशीरा लागला हे ऐकून वाचून माहित होते. चाणक्य आणि चंद्रगुप्त यांवर बरंच जुनं लेखन आहे, तर मग अशोकाचाही उल्लेख कुठेतरी यावा.

जर नसेल, तर दोन वेगळे चंद्रगुप्त असण्याची शक्यता बळावते. अशोक आणि त्याच्या आजोबा चंद्रगुप्त हे दोन्ही विस्मृतीत गेले वगैरे. पण तरीही, जर अशोकाचे राज्य -शिलालेखानुसार- इतके पसरलेले असेल, तर त्याचा उल्लेख कुठेतरी यायला हवा होता असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अशोक त्यांच्या १) अगोदरचा असेल परंतू दुर्लक्ष करत असतील २) आणि इतरांच्या कृतींचा विध्वंस करणे अमान्य असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशोकाचे आणि त्याच्या वंशजांचे अनेक उल्लेख बौद्ध साहित्यातून दिसतात. अशोकावदान( दिव्यावदानचा अंश) तर आहेच. शिवाय अशोकाच्या खापरपणतवाचा मुलगा बृहद्रथ याचाही उल्लेख आणि कालनिश्चिती आहे. कारण त्याची हत्या करून पुष्यमित्र शुंग मगधाच्या गादीवर आला आणि या पुष्यमित्राविषयी ( तो बौद्धद्वेष्टा म्हणून) अनेक उल्लेख आहेत. सारिपुत्तपरिप्रिच्छा , मेरुतुंगाचे विचारस्रेणि अशी साधने आहेत. चिनी भाषांतरे आहेत. मौर्य वंशाची झालेली कालनिश्चिती बऱ्यापैकी भरवसा ठेवण्याजोगी आहे. अर्थात मतभेद आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>शिवाय अशोकाच्या खापरपणतवाचा मुलगा बृहद्रथ याचाही उल्लेख आणि कालनिश्चिती आहे.

शिलालेख आणि वरील साहित्य वगैरे ताडून कालनिश्चिती केली गेली असेल असे गृहीत धरतो. तसे जर असेल, तर कोल्हटकरांनी व्यक्त केलेल्या साशंकतेला वाव उरत नाही असे दिसते. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ब्राह्मी व इतर प्राचीन लिप्यांचे उद्गठन (उलगडन?)अगदी अलीकडचे आहे. तत्पूर्वी भारतीय द्वीपकल्पाचा इतिहास बहुतांशी संस्कृत साहित्य, पुराणे पोथ्या वगैरेवर अवलंबून होता. इतर भाषांतली (चिनी, तिबेटी, सिंहली, तमिळ, कन्नड, पाली, जैन प्राकृत वगैरे) समांतर साधने फारशी तपासली गेली नव्हती. शिलालेख वाचले गेले नव्हते.आता परिस्थिती बरीच सुधारलीय. कालनिर्णयासाठी कार्बन डेटिंग आणि आघातबदलमोजणी सारखी प्रगत तंत्रे उपलब्ध आहेत. सध्याच्या भारतीय भूभागापलीकडेही उत्खनन, सर्वेक्षण, शोधमोहिमा घेतल्या जाऊन बरीच माहिती उपलब्ध झाली आहे. लिपीशास्त्राचे ज्नान वाढले आहे. भाषेच्या आणि अक्षराच्या वळणावरून अंदाजे कालनिर्णय (गुप्त कालीन, अशोकोत्तर वगैरे) करता येतो.
अर्थात अधिकाधिक अचूकतेसाठी सदैव प्रयत्न करीत राहाणे हे योग्यच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रस्थापित इतिहास पुन: चाळवायचा जो कोणी प्रयत्न करेल त्याला लगेचच Revisionist, विहिंप/संघाचा चेला असे शिव्याशाप मिळू लागतात. केवळ academic interest आणि सत्यशोधनासाठी मी हे करीत आहे असा कितीहि दावा त्याने केला तरी प्रस्थापित विद्वान त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. वर माझ्या लेखातच मी ओझरते उल्लेखिल्याप्रमाणे विद्यापीठातील जागा, शिष्यवृत्त्या, परिषदांची निमंत्रणे सगळे त्याला बंद होते.

सध्या Indology चे केन्द्र अमेरिकेकडे सरकले आहे. तेथील प्रस्थापित प्राध्यापकांना Revisionist वाटतील अशा विचारांचा वासहि सहन होत नाही आणि विद्यापीठातील जागा, शिष्यवृत्त्या, परिषदांची निमंत्रणे हे सगळे त्यांच्याच हातात असते.

ह्याचे सध्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कैखुश्रु दादाभाई सेठना (१९०४-२०११) ह्यांचे ’Ancient India in a New Light' हे पुस्तक होय. प्रस्थापित विचारांना आह्वान देणारे हे विद्वत्तापूर्ण पुस्तक अनुल्लेखाने मारले जात आहे.

University of British Columbia मधील Emeritus Professor (आणि माझे कॉलेजपासूनचे मित्र) डॉ.अशोक अकलूजकर ह्यांचे पॉंडिचेरीमधील हे व्याख्यान हाच मुद्दा मांडते.

सेठना ह्यांचे पुस्तक Ancient India In a New Light प्रस्थापित कालगणनेकडे आणि अशोक, त्याचे समकालीन तीन राजे, गुप्त वंशाचा काल ह्या सर्व प्रश्नांकडे नव्याने पाहते आणि नवी उत्तरे सुचविते. ६०० पानांचे हे पुस्तक मिळाल्यस अवश्य वाचा. ते न मिळाल्यास पुढचा सारांश पुस्तकाच्या अंतरंगाची कल्पना देतो.

Sethna ventures into what can only be described as high adventure in his radical reconstruction of ancient Indian chronology in Ancient India in a New Light? To summaries his findings in brief, Sethna marshals evidence from the Puranas and archaeology to argue that the Sandrocottus of Megasthenes could not have been the Mauryan king, but was the founder of the Gupta Dynasty. I had pointed out to him after he had completed the first part of the work that unless the Asokan epigraphs could be tackled convincingly, his new chronology would break down. Sethna proceeded to do this also over 300 pages of a closely argued thesis pushing Asoka back to 950 B.C. and allocating to the Gupta Empire the period 315 B.C. - A.D. 320.

Sethna's 606 page tome, with a 15 page bibliography and a 23 page index, is an outstanding instance of ratiocination proceeding inexorably from a chronological absurdity fastened upon unerringly by the clear ray of his perception. Pulakesin IPs Aihole inscription of 634 A.D. shows Indian chronology in vogue fixing 3102 B.C. as the date of the start of the Kaliyuga, while also referring to the Saka Era of 78 A.D. According to modern historians, this is the time of the Gupta Empire, when this system of chronology was made up by the Puranic writers. Now, according to the Puranas the Guptas come around the last quarter of the 4th century B.C. If the modern dating of the Guptas is accepted, it means that the Puranics, face to face with the Gupta kings, placed them in antiquity six hundred years in the past! It is peculiar that so obvious an absurdity should have escaped our own historians. Can we help concluding that we are still unable to rid our minds of the overpowering influence of the dismissal by western scholars of our own ancient records: The Puranas? They believe in the historicity of Homer and excavate Troy, but will not allow that same probability to the Puranas simply because they speak of a civilized antiquity in a colonized country when the western man was living in caves, and that is unacceptable from a subject race. On the grounds of the reductio ad absurdum of the Puranics placing their contemporary monarchs six centuries in the past, Sethna proposes that the Guptas referred to in the Puranas are the descendants of that Chandragupta whom Megastlienes refers to as Sandrocottus, contemporaneous with Alexander. Consequently, the Mauryan Chandragupta and his grandson Asoka needs must recede considerably farther into die past.

The rest of the book is a thrilling venture as Sethna daringly steers his slender craft through uncharted seas crossing one insuperable barrier-reef after another to reach a destination in whose existence he firmly believes. The most important of these is the supposed linking of the Greeks with Asoka. Sethna's penetrating insight reveals that the Asokan "yona raja" Amtiyoka of Rock Edict XIII cannot refer to a Greek king and that the dating of this edict proposed by Bhandarkar is quite mistaken even on the basis of the current chronology. Next the Asokan inscription in Greek and Aramaic at Kandahar is analyzed and the conclusion arrived at that the two inscriptions are not contemporaneous; that the Greek comes much after the Aramaic and, indeed, explicates it: That the "Yavanani" script referred to by Panini is this Aramaic script going back to the pre-9th century B.C. period. The Kandahar II and Laghlman Aramaic inscriptions are then taken up and proven to be much before the 3rd century B.C. as theorized at present. Finally, examining the evidence for the reigns of the Sungas, Kanvas and Satvahanas, Sethna arrives at 950 B.C. as the date of Asoka's accession.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आणि प्रतिसाद आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कैखुश्रो सेठना यांच्या मतांना फारशी (खरे म्हणजे अजिबात) स्वीकृती तज्ज्ञ वर्तुळांत मिळालेली नाही. डॉ. अकलूजकर यांच्या व्याख्यानात त्यांनी शिला आज्ञान्चे प्रयोजनच नव्हते असा मुद्दा मांडला आहे. ज्या काळात ही प्रस्तरलेखने झाली त्या काळात टिकाऊ कागद अस्तित्वात नव्हता. भूर्जपत्रादि माध्यमे होती आणि कदाचित त्यावर अशोकाच्या राजाज्ञा लिहिल्या होत्या असतीलही आणि त्यांचा शोध लागेल किंवा नच लागेल. पण हे प्रस्तरादेश मात्र आजही लोकांसमोर आहेत. प्रमुख मंडळींनी ते वाचून अनुसरावे आणि मग महाजनो येन गतो स पंथा: या न्यायाने बाकी जन अनुसरतील अशी अपेक्षा होती. व्यापाऱ्यांचे, भिक्षुसंघांचे तांडे येताजाता ते वाचतील आणि तद्वत आचरतील ही कल्पना होती. ब्राह्मी लिपीविषयक आणि शिलालेखस्थानविषयक त्यांची विधाने अतिशय प्राथमिक आहेत. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0