दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२४ एप्रिल
जन्मदिवस : यंत्रमागाचा शोध लावणारा एडमंड कार्टराईट (१७४३), लेखक अँथनी ट्रॉलॉप (१८१५), सिनेदिग्दर्शक रॉबर्ट वीनं (१८७३), चित्रकार विलेम द कूनिंग (१९०४), सिनेअभिनेता, लेखक, निर्माता व दिग्दर्शक राजा परांजपे (१९१०), द. भारतीय अभिनेता राजकुमार (१९२९), अभिनेत्री शर्ली मॅक्लेन (१९३४), गायिका व अभिनेत्री बार्बारा स्ट्राइसंड (१९४२), डीएनएमधली माहिती आरएनएमध्ये प्रसारित होते हे शोधणारा नोबेलविजेता रॉजर क्रॉनबर्ग (१९४७), फॅशन डिझायनर जाँ-पोल गोल्तिए (१९५२), लोककलावंत तीजन बाई (१९५६), क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (१९७३)
मृत्युदिवस : लेखक डॅनिएल डीफो (१७३१), गायक दीनानाथ मंगेशकर (१९४२), चित्रकार जामिनी रॉय (१९७२), उद्योगमहर्षी शंतनूराव किर्लोस्कर (१९९४), अभिनेत्री, नाट्यदिग्दर्शिका व निर्माती पर्ल पदमसी (२०००)
--
जागतिक प्रयोगशाळा-प्राणी दिन
भारतीय जलसंपत्ती दिन.
प्रजासत्ताक दिन : गाम्बिया (१९७०)
वंशविच्छेद स्मृती दिन : आर्मेनिया
लोकशाही दिन : नेपाळ
१८०० : 'अमेरिकन लायब्ररी ऑफ कॉंग्रेस'ची स्थापना
१८९१ : ऑस्कर वाइल्डलिखित पुस्तक 'द पिक्चर ऑफ डोरिअन ग्रे' प्रकाशित.
१९१४ : पुंज सिद्धांतामधला महत्त्वाचा फ्रँक हर्ट्झ प्रयोग जर्मन भौतिक संघटनेसमोर दाखवला गेला.
१९१५ : आर्मेनियन वंशविच्छेद - इस्तंबूलमध्ये आर्मेनियन वंशाच्या २५० बुद्धिवादी आणि नेत्यांना अटक; पुढे ऑट्टोमन साम्राज्यभर झालेल्या आर्मेनियन वंशविच्छेदाची ही सुरुवात होती. सुमारे ८ ते १५ लाख मृत. आजही तुर्कस्तानात ह्या हत्याकांडाच्या उल्लेखाला तुर्कस्तानचा अवमान केल्याच्या आरोपाखाली शिक्षा होऊ शकते.
१९२२ : ब्रिटिश साम्राज्य बिनतारी (रेडिओ) टेलिग्राफने जोडण्याची योजना कार्यान्वित; इंग्लंडमधून कैरोशी संदेशवहन सुरू.
१९२३ : सिगमंड फ्रॉईडने त्याचा मानसशास्त्रीय सिद्धांत Das Ich und das Es (The Ego and the Id) या शीर्षकाखाली प्रसिद्ध केला. त्यात मांडलेल्या इगो, इड आणि सुपर-इगोच्या संकल्पनांनी आधुनिक मानसशास्त्राचा पाया घातला.
१९६७ : रश्याचे अंतराळयान सोयुझ-१ कोसळून अंतराळवीर व्लादिमिर कोमारोव्ह मृत्युमुखी
१९७० : चीनचा पहिला उपग्रह 'डॉँग फँग हॉँग-१'चे प्रक्षेपण
१९८१ : आय.बी.एम.ने पहिला वैयक्तिक संगणक प्रदर्शित केला.
१९९० : खगोलातल्या अनेक महत्त्वाच्या घटनांचे प्रथम निरीक्षण करणाऱ्या हबल अवकाशदुर्बिणीचे प्रक्षेपण
२००५ : जगातला पहिला क्लोन केलेला कुत्रा जन्माला आला.
२००६ : नेपाळचा राजा ग्यानेंद्रने ४ वर्षांपूर्वी बरखास्त केलेल्या संसदेला पुन्हा मान्यता दिली.
२०१३ : बांगलादेशातील सर्वात भीषण औद्योगिक अपघात - औद्योगिक इमारत कोसळून ११२९ कामगार ठार; २५०० जखमी.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- अबापट
प्रतिक्रिया
अपेक्षित
खरोखर दाद द्यावी अशी बातमी. हेच धोरण उन्हाळ्यापर्यंत राबवले की 'शिवनेरी' अधिक तोट्यात जायला हरकत नाही. सरकारी निर्बुद्ध बाबुगिरीचे एक खास उदाहरण.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
आधीच
आधीच स्वारगेट-बोरिवली बसला प्रायव्हेटचे भाडे ३५०/- असताना शिवनेरीचे ४३५ ठेवून पायावर धोंडा पाडून घेतलाच आहे. आता चटके देऊन गिर्हाईके पळवून लावा.
संपूर्ण भारताचेच एक 'मेंटल हॉस्पिटल' झाले आहे असे वाटते.
हा हा
पडदे काढून टाकले की प्रवासी कमी होतील. आणि मग एखादीच तरुणी आणि साताठ पोरांचं टोळकं एवढेच लोक प्रवास करत असण्याची शक्यता वाढेल.
मूळ प्रश्नावर तोडगा न काढता
मूळ प्रश्नावर तोडगा न काढता केवळ 'पॅचवर्क' करणे हे तर सरकारी कामांचे वैशिष्ट्य आहे.
जोवर अपराध करणार्यांच्या मनात आपण पकडले जाऊ शकतो ही आणि त्यानंतर होणार्या शिक्षेबद्दल भीती निर्माण होत नाही तोवर ते अपराध करतच राहणार. ह्याबाबत अमेरिकेतील वाहतूक व्यवस्थेचे उदाहरण अतिशय चांगले आहे. मुळात वाहतुकीचे नियम तोडल्यावर होणारी शिक्षा जबर आहे. त्यामुळे इथे कोणी सहसा वाहतुकीचे नियम तोडताना आढळत नाही. मी सध्या ज्या शहरात राहतो तिथे 'Yield to pedestrians' हा नियम सगळे वाहनचालक काटेकोरपणे पाळतात असा माझा अनुभव आहे. चालणार्या माणसाने पदपथावरून रस्त्यावर पाऊल टाकल्यावर वाहने त्याच्यापासून जवळपास चार फूट अंतरावर थांबतात. जर आईवडील हा नियम काटेकोरपणे पाळत असतील तर मुलांवर आपोआपच वाहतुकीचे नियम पाळण्याचे संस्कार होतात. सुरुवातीच्या पिढीला कदाचित जाचक वाटतील असे हे नियम पुढच्या पिढ्यांसाठी स्वाभाविक होऊन जातात. इथे येणारे भारतीय लोक भारतात कदाचित कधीही नियम पाळणार नाहीत पण इथे झक्कत पाळतात, त्याचे कारण नियम न पाळल्यास दणकून होणारा दंड. अशी न्यायव्यवस्था/दंडव्यवस्था भारतात अस्तित्वात येणे गरजेचे आहे. जेणेकरून माणसाने अपराध करण्याआधी दहादा विचार करावा.
सामर्थ्य आहे घोरण्याचे
'जोजो' करील तयाचे
अवांतरः जबर शिक्षेपेक्षा
अवांतरः जबर शिक्षेपेक्षा 'नक्की' आणि 'लगेच' होणारी शिक्षा अधिक दहशत बसवते असे वाटते. बाकी सहमत
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शिक्षेचे मुख्य उद्दिष्ट हे
शिक्षेचे मुख्य उद्दिष्ट हे बाकीच्यांना दहशत बसवणे हेच आहे असे वाटते. ज्ञानेश्वरांच्या शब्दांत सांगायचे झाले तर 'जे खळांची व्यंकटी सांडो'.
त्यामुळे नक्की आणि लगेच होणारी शिक्षा गरजेची आहेच, परंतु कुठेतरी असे देखील वाटते की जबरी शिक्षा असेल तर दहशत अधिक बसेल. कारण शिक्षा 'नाममात्र' देखील असू शकते आणि तिने काही विशेष फरक पडेल असे वाटत नाही.
सामर्थ्य आहे घोरण्याचे
'जोजो' करील तयाचे
सर्कार्चा इजय सो!!!!
सर्कार्चा इजय सो!!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सो व्हॉट ?
काय फरक पडतो ?
एखाद्या स्लिपर कोच मधून जाताना आपण १०००/- रुपड्याचे तिकिट काढलेले असून देखील पांघरुण घरुनच घेऊन जातो की. तसेच हवा असेल तर पडदा देखील घरुनच घेऊन जायचा. हाय काय आन नाय काय !
बाकी बाहेरच्यांना दिसू नये असे पडदा लावून लोकांना शिवनेरीत करायचे तरी काय असते?
सरकारने तत्परतेने काही का होईना पण अॅक्शन घ्यायला सुरुवात केली ह्यासाठी आपण सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव इथे आणायला हवा.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
१००० रुपये वाले स्लिपर कोच
१००० रुपये वाले स्लिपर कोच वाले माजोरडे दिसतात. ७००-८०० वाले पांघरुण पण देतात.
असो
बातमी वाचुन मजा वाटली. एकुणच नको ते निर्णय घेण्यात सरकार पुढे असते
अंमळ गल्लत होते आहे का ?
मी ते पांघरुण देत नाहीत असे कधी म्हणालो ? मी फक्त आपण घरुनच घेऊन जातो असे म्हणतो आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
पुर्ववत
काही काळानंतर हे सर्व पुर्ववत होईल.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
फालतुगिरीला मर्यादा नाही
सरकार काय करेल ह्यचा काय नेम नाही. सकाळी सकाळी उठ्ल्यावर "आज कुछ तुफानी करते है" असे वाटत असावे.