ठाणे अरबस्तानला जोडण्याचा कुटील डाव ?
स्वदेशी चा नारा देणाऱ्या सरकारकडून मराठमोळ्या ठाण्यातील एक नवं सांस्कृतिक केंद्र विवियाना मॉल हा विदेशी शक्तींना , खास करून अरबांना विकला हे ऐकले आणि मन सुन्न झाले, चित्त विचलित झाले, पायाखालची जमीन सरकली.
आज ठाणे विकले गेले
माझी खात्री आहे आज सर्व विवेकवादी , पुरोगामी ठाणेकर रडत असतील
आज मॉल विकला गेलाय उद्या सरकारी ऑफीसेस विकली जातील, मग महापालिका मग विधानसभा, लोकसभा, सेंट्रल व्हिस्टा आणि राष्ट्रपती भवनही विकले जाईल. काय काय बघायला लागणार आहे मोदींच्या राज्यात काय माहित.
ठाणे आता संपले आहे
ते अरब लोकांना विकले आहे
आता ठाण्यात स्त्रीयांना बुरखा घालून फिरावे लागणार .
जिकडे लक्झरी गाड्या होत्या तिकडे आता उंट फिरणार
लक्षात घ्या नेहरूंच्या काळात एकही मॉल विकला गेला नव्हता ...
कोणत्याही सुजाण, पुरोगामी, लोकशाहीप्रेमी पंतप्रधानाने या परिस्थिती मध्ये राजीनामा दिला असता ,अर्थात मोदींकडून ही अपेक्षा नाहीच !
मी "कदाचित "म्हणालो "असावा" म्हणालो
माझा अंदाज चुकू शकतो. मला वाटतं त्यांना माहित आहे नेहरूंच्या काळात मॉल नव्हते. हे वाक्य उपहासाने लिहिले असावे.
खरं म्हणजे ते नक्की डाव्यांना धुवून राहिले की उजव्यांना धुवून राहिले ?
हे ही माझ्या आकलना पलीकडे आहे.
खरे खोटे प्रेत जाणो आता जाणारा गेला लिहून
म्हणून आपण राहिलेले अंदाज लावतोय दुसर काय?
वर जाऊन verify करण्याची इच्छा नाही.
ताजा तवाना मारवा
अतिशय अवांतर प्रश्न
If you don't mind
ताजे प्रेत हा मोठा युनिक आय डी घेतलाय तुम्ही.
या आय डी मागे काही विशेष प्रेरणा आहे /होती की
गंमत म्हणून घेतला ?
की तुम्ही काही postmortem वगैरे विभागात आहात का ?
म्हणजे एरवी इतरांना जो ताज्या प्रेताचा access नसतो तसा तुम्हाला आहे का ?
कारण प्रेताचा ताजेपणा हा ताज्या फुलांचा ताटवा सहज उपलब्ध असावा आणि त्यामुळे ताज्या शिळ्या फुलांत फरक करता यावा तसा काही प्रेतांचा ताटवा उपलब्ध नसतो.
सहज एक कुतूहल म्हणून विचारतोय
उत्तर नाही दिले तरी चालेल
बाकी अभिनंदन आणि शुभेच्छा !
?
नेहरूंच्या काळात स्वतंत्र भारतात किती मॉल होते?