दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२८ मार्च
जन्मदिवस : पहिलं चित्रात्मक पाठ्यपुस्तक बनवणारा शिक्षणतज्ज्ञ योहान कोमोनियस (१५९२), साहित्यिक मॅक्सिम गॉर्की (१८६८), भारतात स्त्रीवादी अभ्यासाची सुरूवात करणाऱ्या वीणा मजुमदार (१९२७), प्रोटॉनची अंतर्रचना शोधणारा नोबेलविजेता जेरोम फ्रीडमन (१९३०), अभिनेता अक्षय खन्ना (१९७५), अभिनेत्री चित्रांगदा सिंग (१९७६)
मृत्युदिवस : लेखिका, समीक्षक व्हर्जिनिया वूल्फ (१९४१), स्वातंत्र्य चळवळीतील पुढारी भाऊसाहेब रानडे (१९८४), चित्रकार मार्क शगाल (१९८५), 'प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूप'चे एक प्रणेते, चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा (२००२)
---
राष्ट्रीय नौका दिन.
१७३७ : बाजीराव पेशवे यांनी मोगलांचा पराभव केला
१९१० : हेन्री फाबरने प्रथमच समुद्रावरून विमान उडवलं.
१९३० : काँस्टँटिनोपल आणि अंगोरा या तुर्की शहरांची नावं इस्तांबूल आणि अंकारा अशी बदलण्यात आली.
१९३३ : घातपातामुळे विमान पडण्याची पहिली दुर्घटना, प्रवाशाने विमानात आग पेटवल्यामुळे इंपिरियल एयरवेजचं विमान पडलं.
१९४२ : भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जपानमध्ये 'इंडियन इंडिपेडन्स लीग'ची स्थापना; त्यात 'आझाद हिंद सेने'ची मुळं होती.
१९५९ : चीनने तिबेटी सरकार बरखास्त करून तिबेट बळकावलं.
१९७९ : अमेरिकेत 'थ्री-माईल आयलंड' अणूदुर्घटनेत अणूइंधन अंशतः वितळलं, किरणोत्सारी रेडॉन वायू पसरला, जीवितहानी नाही.
१९९८ : सी-डॅकने पूर्ण भारतीय बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
मस्त अनुभवकथन.. आवडलं.
मस्त अनुभवकथन.. आवडलं.
:)
धाडस केलंत ते बरं केलंत नाहितर माझ्यासारखी त्यांना जवळून बघताही न आल्याची रुखरुख आयुष्यभर लागून राहिली असती
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सुदैवाने
सुदैवाने त्यांना प्रत्यक्ष आणि जवळून पाहिलं आहे. ९० -९१ साली रत्नागिरीत साहित्य संमेलन झालं होतं तेव्हा ते तिथे हजर होते.
आम्ही शा़ळकरी पोरं एका ठिकाणी बसलो होतो. (परिसंवाद म्हणायचं) स्टेजला जवळजवळ चिकटूनच बसलो होतो. स्टेजही घरगुती म्हणावं इतकं छोटं. टेबल प्लॅटफॉर्म. आणि समोरच दोनतीन इतर साहित्यिकांसोबत पुलं. इतर साहित्यिकही तसे मोठे होते पण पुलं त्यांच्यात असल्याने ते "इतर" तिघे कोण हे आता आठवतही नाहीये.
त्यावेळी पुलंशी संवाद (व्यक्तिगत नव्हे, पब्लिकलीच) साधता आला. मुख्य म्हणजे डोळे भरुन पाहता आलं.
सर्व चर्चासत्रांमधे त्यांचा मुक्त संचार होता आणि खेळकरपणे अगदी अनौपचारिक वागत होते. सहज स्टेजवरुन उतरुन कुठेतरी जाऊन यायचे. मधेच एखादी फेरी अन्य कोणत्यातरी मंडपात. मधेच कोणाशी गुफ्तगू वगैरे.
आमच्यातल्या एका आगाऊ प्रश्नकर्त्या मुलाला त्यांनी "हा मुलगा पुढे प्रसिद्ध लेखक होणार याची मी खात्री देतो." असं ते म्हणाले. तो मुलगा आणि शिक्षकगण कृतकृत्य झाला होता.
तो मी नव्हतो हे आधीच नमूद करतो.
हे सर्व १९९०-९१ सालचं त्या वेळी ते एकदम जॉली आणि गुटगुटीत मस्त तब्ब्येतीत दिसत होते. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे असं दिसतंय की त्यानंतरच्या चारपाच वर्षांत एकदमच तब्येत झपाट्याने खालावत गेली असावी. काळ फार वेगवान असतो.
आवडले
खूप छान अनुभव कथन.
भेट झाली
भेट झाली चांगले जहाले. माझेही पुणयस क्वचित जाणे होइ. पण त्यावेळेस त्यांना भेटणार्यांच्या प्रचंड संख्येने बर्याच अडचणी येतात असे ऐकणयत आलेले.
त्यामुळे त्यांना मुद्दाम जाउन त्रास देववला नाही. इच्छा होतीच जायची.
थेट भेट, स्वाक्षरी मिळणे हे उत्तम. शिवाय फोतोसाठी फारसा आग्रह धरुन बसला नाहित, हे अधिक भावले.(सौम्य व्यक्तीच्या सौजन्याचा आदर ठेवलात, हे आवडले.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
थेट भेट, स्वाक्षरी मिळणे हे
असंच म्हणतो. छान अनुभवकथन. तुमचं पुलंवरचं मनापासूनचं प्रेम दिसून आलं. तुमच्यावर पुलंचा नक्की कुठच्याकुठच्या बाबतीत प्रभाव पडला याविषयीही तुमच्या शब्दांत वाचायला आवडेल.
पुलंना भेटलात, काय पाहिजे
पुलंना भेटलात, काय पाहिजे अजून. सुनीताबाईंच्या शेवटच्या आजारात त्यांना भेटायला गेलो होतो, अवस्था बघवली नाही, तसेच परत आलो
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं