भूल-भुलैया

चार वर्षापूर्वीची गोष्ट. शुक्रवारची सुट्टी असल्याने लंचनंतर वामकुक्षी काढून जरा आमच्या कॅम्पबाहेर फेरफटका मारावा म्हणून बाहेर पडलो. इथे दम्ममला संध्याकाळचे चार वाजले तरी अजून उष्मा जाणवत होताच ! सौदीला आल्यापासुन दोन महीने आराम असा नव्हताच ! अगदी वीकली ऑफ सुद्धा कॅन्सल केले होते ,इतक्या दिवसानी सुट्टी मिळाली म्हणून जरा एंजॉय करायचा मूड होता .म्हणून अल-खोबर वरुन विक्रांतला फोन करून बोलावलं होतं . तो गाडी घेवून पाच वाजेपर्यंत पोहोचणार होता. तोपर्यंत पायी फेरफटका मारावा म्हणून निघालो, आणि चालत चालत कॅम्प पासून दीड-दोन किलोमीटर वर आलो.

सगळीकडे रखरखीत निर्मनुष्य वाळवंट पसरला होता. रस्त्यावरच्या वाहनांची वर्दळ सोडली तर इथे 200-300 किलोमीटर प्रवास केला तरी मानवी अस्तित्वाची खूण सापडणे महामुश्किल काम !मधून मधून खुरटलेली हिरवी झुडपे , त्यातच समुद्रकिनारीच्या जमिनीत मात्र दलदलीमुळे थोडीफार दाट मॅनग्रोव्ह ची झुडपे होती. तिथे मात्र थोडी हालचाल होती.

30-40 उंट घेवून एक राखणदार तिथे उभा होता. जवळ जावून पहिले तर चक्क भारतीय निघाला. मी कुतुहुलाने विचारले, क्यो भैय्या ? नाम कया है ? तो उत्तरला, नमस्ते साहिब ,मै दिलीपकुमार विश्वकर्मा . बलिया –युपी से हूं . .........
अरे व्वा ,मी म्हणालो, इधर कैसे ?
तो म्हणाला ,बाबूजी कया बतावू? बडी लंबी कहानी है .
तेवढ्यात विक्रांतचा फोन आला ,तो गाडी घेवून आला होता कॅम्पवर . मग मी त्याला गाडी घेवून इकडेच ये असे सांगून तिथपर्यंतचा रस्ता तोंडी सांगितला . पाच मिनिटात तो गाडी घेवून आलाही! हाय-हॅलो झाल्यावर म्हणाला ,अरे इकडे काय करतोस? चल, आज सुट्टी वाया घालवायचीय का? मस्त long drive करून येवू जेद्दाह ला !
पण मी म्हणालो ,थांब रे जरा. जावू उशिराने . अरे या भैय्याची स्टोरी तर ऐकूया जरा !

मग भैय्या घाबरत घाबरत आपली स्टोरी सांगू लागला । त्याचे डोळे पाणावले होते,चेहरा करुण दिसत होता. बायकामुलांना घरी सोडून बरोबर तीन वर्षापूर्वी बलियाच्या जवळच्या एका गावातून तो मुंबईला पोटा-पाण्यासाठी आला. अंधेरीत एका बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शन सुरू होते,तिथल्या मॅनेजर शी विश्वकर्माच्या मित्राची ओळख होती. मग तिथे बिल्डरकडे लहानसहान कामे करू लागला . मोलमजुरी करता करता तिथे बिल्डिंगचे एलेक्ट्रिकचे काम करणार्याब मंडळींशी त्याची चांगली दोस्ती जमली. त्यांनी त्याला इलेक्ट्रिकल मधले बेसिक काम शिकवले. मूळचा तो सातवी फेल होता,पण तसा चलाख होता. सहा-सात महिन्यात तो चांगला तयार झाला.आणि मग मोलमजुरीचे काम सोडून तो इलेक्ट्रिक वायरिंग चे काम करणार्याा त्या ग्रुप बरोबर काम करू लागला.

त्यातच त्या ग्रुपमधल्या शोभन बॅनर्जी या बंगाली टेक्निशियन ने पासपोर्ट काढलेला होता. त्याने नुकताच एका दुबईमधील कंपनीसाठी इंटरव्ह्यू दिला होता. त्यात सिलेक्ट होवून त्याचा व्हिसा आला आणि शोभन दुबईला जायला निघाला. मग विश्वकर्माच्या मनातही आपण दुबईला जावे असा विचार सुरू झाला . शोभन ने त्याला सगळी मदत केली ,आणि पासपोर्टसाठी अर्ज करून मुंबईतल्या एजंट्स चे पत्तेही दिले. इंटरव्ह्यू कसा द्यायचा याबद्दल मार्गदर्शनही केले. आणि शोभन दुबईला गेला. त्याला सोडायला सगळी मित्रमंडळी विमानतळावर गेली होती,त्यात विश्वकर्माही होताच. विमानतळावरचा झगमगाट बाहेरूनच पाहून त्याचे डोळे दीपले ,आणि एका मोहमयी स्वप्ननगरीत तो हरवून गेला. कसेही करून आपणही परदेशी जायचेच या वेडाने तो पुरता झपाटला गेला.

काही दिवसात पासपोर्ट मिळाला, मग इतर कागदपत्रे जमवून विश्वकर्माने धडाधड इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली. पहिल्या सहासात वेळेला तो फेल झाला,पण तरीही जिद्द न सोडता त्याने इंटरव्ह्यू देणे सुरूच ठेवले ,आताशा त्याला कोणते प्रश्न विचारले जातात ,आणि त्यांना कशी उत्तरे द्यायची ,हे त्याला समजले. शेवटी एका इंटरव्ह्यू मध्ये सौदी अरेबिया मधल्या एका कंपनीसाठी तो सेलेक्ट झाला बुवा.2000 सौदी रियाल पगार । त्यादिवशी त्याला आकाशाला हात टेकल्यासारखे झाले. मग काय ? आयुष्यात पहिल्यांदा त्याने दारू प्यायली. सगळ्या मित्रमंडळींना पार्टी देवून स्वत:ही झिंगला .

मग काही दिवसात त्याचाही व्हिसा आला ,आणि 1 डिसेंबरचे 2007 चे विमानाचे तिकीटही.मात्र त्यासाठी एजंटला फी म्हणून 50,000/- रुपये द्यायचे होते. मग लोन काढून ते पैसे भरले .आता विश्वकर्मा अतिशय आनंदात होता, लगेच तो चार दिवसासाठी घरी युपीला जावून घरच्यांना भेटून आला. आणि ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबरला विमानात बसलाही!

सौदीच्या दम्मम विमानतळावर तो उतरला . आपल्या मोहमयी स्वप्नंनगरीत आपण प्रत्यक्ष पोहोचलो आहोत, हे पाहून त्याला आनंदाने वेड लागायचे बाकी राहिले होते. या गडबडीतच विमानतळावरचे सोपस्कार पार पडले ,आणि बाहेर पडल्यावर एक ड्रायव्हर आलीशान गाडीसह त्याचीच वाट पहाट होता. नशीब तो हिन्दी-उर्दू बोलणारा एक पाकिस्तानी होता. विश्वकर्माने आपले सामान आणि पासपोर्ट त्या ड्रायव्हरकडे दिला आणि आता कंपनीत जावू,म्हणून ते निघाले....

हळूहळू शहर मागे पडू लागले आणि सौदीचा भयाण रखरखीत वाळवंट सुरू झाला. आपण नक्की कुठे जातो आहोत?असे त्याने ड्रायव्हरला विचारलेदेखील. पण थातुरमातुर उत्तरे देवून ड्रायव्हरने त्याला गप्प केले. जवळजवळ सहा तास गाडी पळत होती. रात्री एक वाजता मुंबईहून तो निघाला होता ,आणि एव्हाना दुपारचे दोन वाजले होते. त्यामुळे पोटात भुकेचा आगडोंब पेटला होता. ड्रायव्हरने त्याला प्यायला पाणी दिले आणि जेवण मालकाच्या घरी करू असे संगितले....

मालकाच्या घरी? पण मला तर कंपनीत कामाला जॉइन करायचे आहे ना? विश्वकर्माच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले. भीती आणि शंका यांनी तो अस्वस्थ झाला. पण तेवढ्यात सौदीच्या वाळवंटात फुललेली हिरवीगार शेती दिसू लागली. संत्री,मोसुंबी,सफरचंदे आणि खजुरच्या बागा. तेवढच जरा हिरवळ बघून मन हलके झाले. काही मिनिटातच मालकाचे घर आले. ते एका श्रीमंत अरबाचे घर होते. भला-थोरला बंगला, 5-6 गाड्या ,नोकर-चाकर.... फार मोठे प्रस्थ होते....

गाडीतून उतरल्यावर त्याला बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या एक झोपडीवजा खोलीत नेले. त्याचे सामान तिकडे ठेवून पासपोर्ट मालकाकडे जमा केला गेला. मेरी कंपनी किधार है? आप मुझको इधर किधर लेके आया? या विश्वकर्माच्या प्रश्नांकडे कोणीही लक्ष दिले नाही . बंगल्यात सर्वत्र 24 तास ए.सी. आणि थंड /गरम पाण्याची सोय असली तरी झोपडीत मात्र एकच पंखा,एक बल्ब आणि एक स्टोव्ह आणि पाण्याचा एक नळ होता. जे जेवण मिळाले ते खावून विश्वकर्मा जो गाढ झोपला ,तो जागा झाला थेट दुसर्याव दिवशी सकाळी . ड्रायव्हर त्याला उठवण्यासाठी हाका मारत होता. ...चलो जलदी करो.... खेतपे जाना है ,काम के लिये .

आपण पुरते फसलो आहोत, याची कल्पना आता विश्वकर्माला आली. त्याची मोहमयी स्वप्नांची नगरी कुठल्याकुठे विरून गेली. त्याने ड्रायव्हरच्या माध्यमातून अरबला काही सांगण्याचा प्रयत्नही केला ,पण उपयोग शून्य! उलट तेरेको इंडिया से लाया वो कया खिलाने-पिलाने? चल साला काम पे नही तो मार पडेगी! अशी धमकीही मिळाली. आता मात्र विश्वकर्मा घाबरला. नाइलाजाने कुदळ –फावडी खांद्यावर मारून शेतात गेला आणि पडेल ते काम करू लागला. दोन-तीन महीने गेले ,पगारचे नाव नाही. अरब फक्त त्याला जेवण बनवण्यासाठी धान्य द्यायचा , आणि झोपडीत असलेल्या तुटपुंज्या सुविधांवर विश्वकर्मा जगत होता.

घरी /मुंबईला फोन /पत्राद्वारे कळवावे तर अरबाचा कडा पहारा. त्याच्या नजरेतून कुठलीही गोष्ट अजिबात सुटत नसे. कधीकधी चाबकाचे फटकेही खावे लागायचे. विश्वकर्माचे हाल कुत्राही खात नव्हता.....
असेच सहासात महीने गेले ,आणि मग शेतीच्या कामांचा सीझन संपल्यावर त्याला उंट चरवायचे काम देण्यात आले. ... आज उंट चरवता-चरवता तो जरा इकडे लांबवर आला ,आणि नेमका आमच्याशी संपर्कात आला . आम्हाला त्याने कळवळून विनंती केली,साब आप किसिको बताना नही,वरना मेरी जान चाली जाएगी .एक बार हायवेसे जानेवाले एक पंजाबी ड्रायव्हर को मेरी कहानी बता रहा था , तो मालिकने देखा और बहूत मारा मुझे साबजी......

विक्रांत म्हणाला,घाबरू नकोस, तुला परत भारतात जायचे आहे का? मी व्यवस्था करतो. कसाबसा तो तयार झाला.आणि उंट घेवून परत गेला .आम्ही मग जेद्दाहचा long drive च प्लॅन कॅन्सल करून रात्रीपर्यंत विश्वकर्माच्या प्रॉब्लेम वर विचार केला. दुसर्यान दिवशी मग विक्रांतने Indian Embassy मधल्या सूरज मेनन या त्याच्या मित्राला फोन करून सगळी हकिगत कळवली. अरबाचा पत्ता आणि विश्वकर्माचा ठावठिकाणा कळवला . चार-पाच दिवसातच वेगाने घडामोडी होवून विश्वकर्माचा पासपोर्ट आणि कागदपत्रे अरबकडून परत मिळवण्यात आली.

आम्ही दोघांनी थोडे पैसे त्याला दिले, त्या पंजाबी ड्रायव्हर लोकांनीही माणुसकी म्हणून पैसे जमवून दिले. सगळे मिळून 50,000/- भारतीय रुपये त्याला दिले, आणि तुझे कर्ज पहिले फेड बाबा , आणि पुन्हा नीट चौकशी केल्याशिवाय कुठल्यातरी एजंटच्या नादी लागून इकडे येण्याची स्वप्ने बघू नकोस, असा सल्ला त्याला दिला. तिकटाची व्यवस्था Indian Embassyने केली होती. जवळजवळ एका वर्षाचा वनवास भोगून ,सगळ्या स्वप्नांचा चुराडा झालेला विश्वकर्मा विश्वकर्मा भारतात परत गेला..... पण त्याची सुटका केल्याचे अनामिक समाधान मात्र आम्हाला झाले. न जाणो, त्यादिवशी मी फेरफटका मारायला कॅम्पबाहेर न येता तसाच विक्रांतबरोबर long driveला गेलो असतो तर? ...... तर विश्वकर्मा आणखी किती वर्षे तसाच अडकून पडला असता काय माहीत ???

...........................................................असे अनेक विश्वकर्मा परदेशीच्या मोहमयी स्वप्नांच्या भूलभुलैयात फसून कुठेकुठे अडकून पडलेले असतील ... ईश्वर त्यांना परत त्यांच्या मुला-माणसात परत आणो ही प्रार्थना .....!!!

(सत्यकथे वर आधारित. नावे बदलली आहेत )
मंदार कात्रे

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

ह्म्म्म.. कथा चांगली फुलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हम्म. नशीब चांगलं होतं त्याचं म्हणुन मदत करु शकणारे आणि करणारे भेटले.
छान लिहीलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परदेशाबद्दल असे किस्से ऐकले आहेत.
अरब जगताबद्दल जरा जास्तच ऐकले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

धाग्यातील भय्याची कहाणी वाचून त्याच्याबद्दल दया वाटते. तो तर बोलूनचालून अशिक्षित आणि म्हणून सहज फसला.

पण तेथे कामाला गेलेल्या सुशिक्षितांची कहाणी तरी फार निराळी आहे का? लहानमोठे अपमान आणि अन्याय ह्यांच्याकडे दुर्लक्ष करून तेहि तिथल्या नोकर्‍या करतातच की.

डॉ.दळवी ह्यांचे 'सोन्याच्या धुराचा ठसका' हे पुस्तक मी वाचले. त्यात स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या ह्या बाईंचे स्वतःचे असे बरेच अनुभव नोंदवलेले आहेत. त्यापैकी एक असा: तेथील बर्‍याच मराठी लोकांनी कोजागिरी साजरी करण्याचे ठरविले आणि गावापासून दूर, बंदिस्त अशी एक जागाहि त्यासाठी मिळविली. त्या ठिकाणी सर्व दारे बंद करून आत कोजागिरीचा काही करमणुकीचा कार्यक्रम चालू होता. कार्यक्रम ऐन भरात असतांना सौदी पोलिस आत घुसले आणि सर्व लोकांना छडया मारून त्यांनी तेथून हाकलले. कारण काय - तर स्त्रिया आणि परके पुरुष एका ठिकाणी गटाने बसू शकत नाहीत. सारांश, छडया खाऊनहि सर्वजण तेथेच राहिले.

अर्थस्य पुरुषो दासः...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0