रामनवमी

रामनवमीचा उत्सव आज सर्व देशभर साजरा केला जात आहे. ह्या उत्सवाच्या तिथीची निश्चिति कशी झाली हे जाणण्याची मला उत्सुकता वाटली कारण कोठल्याहि घटनेचा इतका स्वच्छ कालनिर्णय आपल्या जुन्या वाङ्मयामध्ये क्वचितच सापडतो आणि जेथे तो असतो तेथे त्याच्या खरेपणाबाबत अनेक शंका असतात असा आपला अनुभव आहे.  ह्या उत्सुकतेपोटी जालावर उपलब्ध असलेल्या रामायणसंहितांचा मी शोध घेतला.  त्यात मला जे दिसले ते पुढे लिहीत आहे.

ह्या संदर्भात शोधलेल्या संहिता दोन गटात पडतात.  पहिल्या गटाची प्रातिनिधिक संहिता म्हणून शास्त्री श्रीनिवास कट्टी मुधोळकर आणि सत्कारी मुखोपाध्याय संपादित 'Ramayana of Valmiki' ह्या पुस्तकाचा उल्लेख करता येईल.  दिल्लीमध्ये १८८३ मध्ये छापलेले हे पुस्तक येथे उपलब्ध आहे.   ह्या पुस्तकात रामजन्मासंदर्भात खालील श्लोक दिसतात:

ततो यज्ञे समाप्ते तु ऋतूनां षट् समत्ययुः |
ततः च द्वादशे मासे चैत्रे नावमिके तिथौ || १-१८-८
नक्षत्रेऽदितिदैवत्ये स्वोच्चसंस्थेषु पञ्चसु |
ग्रहेषु कर्कटे लग्ने वाक्पताविन्दुना सह || १-१८-९

http://www.valmikiramayan.net येथेहि हेच श्लोक दिसतात, यद्यपि तेथील संस्कृत अशुद्ध आहे

ह्या श्लोकांचे भाषान्तर मन्मथ नाथ दत्तकृत भाषान्तरानुसार
असे आहे:

"And then when the six seasons had rolled away after the completion of the sacrifice, in the twelfth month, on the nineth lunar day, under the Punarvasu asterism, when the Sun, the Moon, Saturn, Jupiter and Venus were at Arius, Capricorn, Libra, Cancer and Pisces, and when Jupiter had arisen with the Moon at Cancer, Kausalya gave birth to the lord of the universe..." (पृ.४९.)

’अध्यात्मरामायण’ नावाचा एक ग्रन्थ, मुनिलाल ह्यांनी भाषान्तरित केलेला, गीता प्रेस, गोरखपूर ह्यांनी छापला आहे.  मूळ रामायणाचा हा संक्षेप दिसतो.  त्यामधील पुढील श्लोक कमी शब्दात तेच तपशील देतो:

मधुमासे सिते पक्षे नवम्यां कर्कटे शुभे।
पुनर्वस्वृक्षसहिते उच्चस्थे ग्रहपञ्चके॥
मेषं पूषणि संप्राप्ते... सर्ग ३, श्लोक १४,१५.

sacred-texts.com ह्या संस्थळामधील राल्फ टी.एच.ग्रिफिथकृत रामायणाचे भाषान्तर येथे आहे.   ह्या भाषान्तरामध्येहि वरील ग्रहस्थितीचे वर्णन दिले आहे.

Wikisource मधून घेतलेले आणि जनमानसावर मोठी पकड असलेले तुलसीदासाचे तुलसीरामायण असे म्हणते:

तबहिं रायँ प्रिय नारि बोलाईं। कौसल्यादि तहाँ चलि आई॥
अर्ध भाग कौसल्याहि दीन्हा। उभय भाग आधे कर कीन्हा॥
कैकेई कहँ नृप सो दयऊ। रह्यो सो उभय भाग पुनि भयऊ॥
कौसल्या कैकेई हाथ धरि। दीन्ह सुमित्रहि मन प्रसन्न करि॥
एहि बिधि गर्भसहित सब नारी। भईं हृदयँ हरषित सुख भारी॥
जा दिन तें हरि गर्भहिं आए। सकल लोक सुख संपति छाए॥
मंदिर महँ सब राजहिं रानी। सोभा सील तेज की खानीं॥
सुख जुत कछुक काल चलि गयऊ। जेहिं प्रभु प्रगट सो अवसर भयऊ॥
नौमी तिथि मधु मास पुनीता। सुकल पच्छ अभिजित हरिप्रीता॥
मध्यदिवस अति सीत न घामा। पावन काल लोक बिश्रामा॥
सीतल मंद सुरभि बह बाऊ। हरषित सुर संतन मन चाऊ॥
बन कुसुमित गिरिगन मनिआरा। स्त्रवहिं सकल सरिताऽमृतधारा॥
सो अवसर बिरंचि जब जाना। चले सकल सुर साजि बिमाना॥
गगन बिमल सकुल सुर जूथा। गावहिं गुन गंधर्ब बरूथा॥
बरषहिं सुमन सुअंजलि साजी। गहगहि गगन दुंदुभी बाजी॥
अस्तुति करहिं नाग मुनि देवा। बहुबिधि लावहिं निज निज सेवा॥

हा सर्व झाला एक गट.

दुसर्‍या गटात पडतात रामायणाच्या अशा आवृत्त्या ज्यांमध्ये रामजन्माच्या निश्चित वेळाविषयी अथवा तिथीविषयी कसलाच उल्लेख नाही.  ह्यामध्ये प्रामुख्याने पडते Baroda Oriental Institute ने निर्माण केलेली रामायणाची critical edition.  येथे उपलब्ध असलेल्या ह्या आवृत्तीमध्ये रामजन्माबाबत इतकेच म्हटले आहे:

कौसल्याजनयद्रामं दिव्यलक्षणसंयुतम्।
विष्णोरर्धं महाभागं पुत्रमिक्ष्वाकुनन्दनम्॥६॥
कौसल्या शुशुभे तेन पुत्रेणामिततेजसा।
यथा वरेण देवानामदितिवज्रपाणिना॥७॥
भरतो नाम कैकेय्यां जज्ञे सत्यपराक्रम:।
साक्षाद्विष्णोश्चतुर्भाग: सर्वै: समुदितो गुणै:॥९॥
अथ लक्ष्मणशत्रुघ्नौ सुमित्राजनयत्सुतौ।
वीरौ सर्वास्त्रकुशलौ विष्णोरर्धसमन्वितौ॥१०॥

अर्थ: इक्ष्वाकुकुलनन्दन, भाग्यशाली, जणू विष्णूचा अर्धा भागच भासणार्‍या आणि दिव्य लक्षणांनी युत अशा पुत्राला कौसल्या जन्म देती झाली.  देवांमध्ये श्रेष्ठ अशा वज्रधारी इन्द्रामुळे जशी अदिती तशी कौसल्या अतितेजस्वी अशा पुत्रामुळे शोभून दिसली.  सर्व गुणांनी युक्त आणि विष्णूचा चतुर्भागच असा सत्यपराक्रम भरत कैकेयीपासून जन्मला.  सर्व अस्त्रांमध्ये कुशल आणि विष्णूच्या अर्ध्या अंशाने समन्वित अशा लक्ष्मण आणि शत्रुघ्न ह्या दोघांना सुमित्रा जन्म देती झाली.

रामायणाची जी संस्कृत संहिता sacred-texts.com मध्ये येथे उपलब्ध आहे ती वर उल्लेखिलेल्या critical edition शी जुळते.

महाभारतातील खगोलविषयक उल्लेख कितपत सत्यस्थितिनिदर्शक मानावे ह्याबाबत शंकर बाळकृष्ण दीक्षितकृत ’भारतीय ज्योतिषशास्त्राचा इतिहास’ ह्या पुस्तकातील काही विधानांचा उपयोग होतो.  उदा. पृ. ११३ वर ते म्हणतात: "मेषादि संज्ञा भारतात कोठे आल्या नाहीत हे मागेच सांगितले आहे.  भारताच्या कोणत्याहि भागाच्या रचनाकाली त्या प्रचलित असत्या तर त्यांचा काही उल्लेख भारतात आल्यावाचून राहिला नसता, अशी सर्व भारत वाचणारांची खात्री झाल्यावाचून रहावयाची नाही.  तेव्हा भारतरचनाकाली मेषादि संज्ञा प्रचारात नव्हत्या.  तसेच क्रान्तिवृत्ताचे १२ विभाग करून ग्रहांची स्थिति सांगण्याची पद्धति भारतात नाही.  ग्रहांची व चन्द्राची स्थिति जेथे सांगितली आहे तेथे ती नक्षत्रांवर सांगितली आहे." रामायणात वर्णिलेला काल हा सर्वसंमतीने महाभारतातील वर्णिलेल्या कालाचा पूर्वीचा मानला जातो.  रामायण त्रेतायुगात घडले आणि भारतीय युद्धाच्या समाप्तीपासून कलियुग सुरू झाले अशी पारंपारिक श्रद्धा असते.  रामावतारहि कृष्णावताराच्या पूर्वीचा मानला जातो.  म्हणजेच महाभारतरचानाकालात जे ज्ञान नव्हते ते रामजन्माच्या वेळी निश्चितच नसणार.  तर मग रामाच्या जन्मासंबंधी ’अमुक ग्रह अमुक राशीत होता’ असले विधान, तसेच हा जन्म चैत्र महिन्यात झाला हे विधान निर्माणच कसे झाले?  रामजन्माच्या वेळी उपस्थित असलेला कोणीही नंतर बर्‍याच कालाअंती निर्माण होऊ घातलेल्या चैत्रादि संज्ञा, तसेच राशींचे उल्लेख कल्पून त्या कोठे नोंदवून ठेवू शकला नसता.  इतक्या प्राचीन काळात भारतीयांपाशी काही अन्य कालगणनेची आणि आकाशनिरीक्षणाची शिस्त होती असे कोठेच दिसलेले नाही

सारांश असा की आजच्या रामजन्माच्या कहाणीमागे सत्य काहीच दिसत नाही.  कानावर पडलेल्या परंपरा आणि तुलसीदासासारख्यांच्या लिखाणावर सश्रद्धांचा असलेला पूर्ण आणि अचिकित्सक विश्वास हेच तिचे आधार आहेत.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (3 votes)

रोचक माहिती. आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सारांश असा की आजच्या रामजन्माच्या कहाणीमागे सत्य काहीच दिसत नाही. कानावर पडलेल्या परंपरा आणि तुलसीदासासारख्यांच्या लिखाणावर सश्रद्धांचा असलेला पूर्ण आणि अचिकित्सक विश्वास हेच तिचे आधार आहेत.
हे विधान खोडसाळ आहे.

अजेंडा ठेउन केलेले लिखाण वाटते आहे...
एकच आधार घेतला आहे तो म्हणजे शं बा दीक्षित.
हे तत्कालिन भारत विरोधक होते असे दिसते.
त्यांचा काय दाखला देता?

अजून काही ग्रंथ आधार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद

एकच आधार घेतला आहे तो म्हणजे शं बा दीक्षित.
हे तत्कालिन भारत विरोधक होते असे दिसते.

शं बा दिक्षित हे मान्यवर विद्वान होते. त्यांचे भारतीय ज्योतिषशास्त्र अथवा भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास हे पुस्तक आज प्रमाण मानावे इतपत विश्वासार्हता त्यात आहे असे अभ्यासक सांगतात. या बाबत मतभिन्नता असू शकते ते भारत विरोधक होते असे वाटत नाही. आपल्याला तसे का वाटते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

माझा अभ्यास फारसा नाही, पण एका चर्चेत खालिल मुद्दा मांडला गेला होता -

'वेदांग ज्योतिषाचा' आणि रामायणाचा(निर्मितीचा) काळ साधारणपणे एकसारखा नाहि काय(७०० BCE च्या आसपास)? तसे असल्यास नक्षत्र, तिथी आणि महिन्यांचा हिशोब रामायण-लेखकाला जमु शकेल असे वाटत नाही का?

कोल्हटकर किंवा इतर जाणकारांनी समजुन घेण्यास मदत करावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात एका सुरस महाकाव्यातील प्रमुख पात्राचा जन्म त्या दिवशी झाला काय किंवा नाही काय!

एकदा रामाचे अस्तित्त्वच मान्य केल्यावर किंवा राम हेच मुळात काही मानवी गुणांचे प्रतिक म्हणून पुजिले जात असताना त्याचा प्रतिकात्मक जन्मदिवस पाळण्यात फारसे गैर नसावे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@प्रकाश घाटपांडे: 'उपक्रम'मधील दीक्षितांच्य पुस्तकाचा तुम्ही लिहिलेला परिचय पूर्णतः समर्पक आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी मी हे पुस्तक भाव्यांच्या सेनापति बापट मार्गावरील कार्यालयात जाऊन विकत घेतले. पुस्तकाची किंमत इतकी का असा प्रश्न विचारता त्यांनी दिलेले उत्तर असे होते. 'अशी बरीच दर्जेदार जुनी पुस्तके बहुशः पुनः छापली जात नाहीत कारण त्यांचा वाचकवर्ग अतिशय मर्यादित असतो. ही पुस्तके प्रताधिकाराच्या बाहेर गेलेली असतात. मी त्याची एक प्रत मिळवून ती facsimile पद्धतीने पुनर्मुद्रित करतो आणि त्याच्या ५००-१००० पर्यंतच प्रती काढतो. प्रत्येक प्रतीची किंमत अशी ठेवतो की २००-३०० प्रती विकल्या गेल्या तरी माझे भांडवल परत येते. ज्यांना अशा एखाद्या पुस्तकाचे महत्त्व वाटते ते वाचक आनंदाने माझी किंमत देऊन पुस्तक विकत घेतात. अशा मार्गाने माझा थोडा व्यवसायहि होतो आणि पुस्तकाचे out of print होणे मी काही वर्षे पुढे ढकलले ह्याचा आनंद मला मिळतो.' मला हे उत्तर पूर्ण पटले हे सांगायला नको.

अर्थात त्या काळात गूगल,archive.org,DLI अशा गोष्टी कोणाच्या स्वप्नातहि नव्हत्या. (अवान्तर - DLI ह्या भारतीय संस्थळाच्या निर्नायकी आणि बेशिस्त कारभाराबाबतचे माझे मत अजिबात बदललेले नाही. ह्याबाबतचा माझा 'उपक्रम'मधील सुमारे अडीच वर्षांपूर्वीचा धागा http://mr.upakram.org/node/3450 येथे आहे.)

शं.बा.दीक्षितांवरचा 'उपक्रम'मधील अजून एक लेख येथे आहे. http://mr.upakram.org/node/2205

@निनाद - तुम्हाला माझ्या लेखात खोडसाळ काय दिसले कळत नाही. माझा प्रश्न सरळसोपा आहे. रामजन्माच्या वेळची स्थिति ज्याने नोंदविली आहे त्याला ती कशी कळली? ह्याचे काही विचारणीय उत्तर तुम्हास ठाऊक असले तर द्या नाहीतर तूष्णीं भव!

@मी - माझा प्रश्न रामायणलेखनकाली भारतीयांचे ज्योतिषज्ञान कसे आणि कितपत होते हा नाहीच. ते भले राशि, वार इत्यादींपर्यंत पोहोचले असेल वा नसेल. रामजन्म, जो कृष्ण, भारतीय युद्ध ह्या घटनांंहूनहि प्राचीन मानला जातो त्या वेळचे ज्योतिषज्ञान काय होते असा हा प्रश्न आहे. आणि ते जर तुटपुंजे असले तर रामजन्माच्या वेळची ग्रहस्थिति, तिथि इत्यादि उल्लेख कोणा उत्तरकालीनाच्या कल्पनाविलासातून रामजन्मानंतर काही दशके वा हजार वर्षे लोटल्यानंतर निर्माण झाले असे मानण्यास प्रत्यवाय नाही.

@ऋषिकेश - तुम्हाला वाटतो तितका हा केवळ एक उत्सव साजरा करण्याचा प्रश्न नाही. रामजन्म, रामजन्मभूमि असे विषय किती स्फोटक करण्यात आले आहेत हे आपण जाणतोच. ह्या स्फोटक रसायनामागे सत्य किती आणि cant किती हे जाणून घ्यायला नको काय? रामाच्या नावाने समुद्रात टाकलेले दगड तरंगले आणि म्हणून त्या सेतूला हात लावायचा नाही अशी भूमिका 'संतमहंत' घेत असतात आणि त्या भूमिकेवर संपूर्ण श्रद्धा असलेले लोक प्रचंड संख्येने देशात आहेत. ह्याची परीक्षा का करू नये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@मी - माझा प्रश्न रामायणलेखनकाली भारतीयांचे ज्योतिषज्ञान कसे आणि कितपत होते हा नाहीच. ते भले राशि, वार इत्यादींपर्यंत पोहोचले असेल वा नसेल. रामजन्म, जो कृष्ण, भारतीय युद्ध ह्या घटनांंहूनहि प्राचीन मानला जातो त्या वेळचे ज्योतिषज्ञान काय होते असा हा प्रश्न आहे. आणि ते जर तुटपुंजे असले तर रामजन्माच्या वेळची ग्रहस्थिति, तिथि इत्यादि उल्लेख कोणा उत्तरकालीनाच्या कल्पनाविलासातून रामजन्मानंतर काही दशके वा हजार वर्षे लोटल्यानंतर निर्माण झाले असे मानण्यास प्रत्यवाय नाही.

बरोबर आहे, चैत्र महिन्यातली नवमीच लेखकाने का ग्राहय धरली असावी ह्या प्रश्नावर संशोधन करणे योग्य वाटते, पण ज्या गोष्टीची सत्यतापडताळणी 'शक्यच' नाही त्याच्या तांत्रिकतेबद्दलच्या प्रश्नाचे प्रयोजन समजत नाही, ह्या प्रश्नाच्या माध्यमातून 'राम'च खुद्द कल्पनेचे अपत्य आहे त्यामुळे त्यासंदर्भातल्या अस्मिता ह्या चुकिच्या ठरतात असे सुचवायचे असल्यास तो मुद्दा प्रस्तुत लेखात आल्याचे जाणवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ऋषिकेश - तुम्हाला वाटतो तितका हा केवळ एक उत्सव साजरा करण्याचा प्रश्न नाही. रामजन्म, रामजन्मभूमि असे विषय किती स्फोटक करण्यात आले आहेत हे आपण जाणतोच. ह्या स्फोटक रसायनामागे सत्य किती आणि cant किती हे जाणून घ्यायला नको काय? रामाच्या नावाने समुद्रात टाकलेले दगड तरंगले आणि म्हणून त्या सेतूला हात लावायचा नाही अशी भूमिका 'संतमहंत' घेत असतात आणि त्या भूमिकेवर संपूर्ण श्रद्धा असलेले लोक प्रचंड संख्येने देशात आहेत. ह्याची परीक्षा का करू नये?

आक्षेप परिक्षा करण्यावर नाहिच.
मुद्दा आहे मुळात राम हाच मुळात प्रतिकात्मक आहे असे मानले (रामच कशाला फॉर दॅट मॅटर गणेश, हनुमान आदी मंडळी सुद्धा)- ते प्रत्याक्षात होते की नाही याचीही खात्री नसताना- त्यांचा तथाकथित खरा जन्मदिवस शोधण्यात काय हशील?

पैकी ज्यांनी राम होता हे मानयचे ठरवले आहे त्यांना रामाच्या जन्मदिवसाच्या "खर्‍या" (?) तारखेशी घेणेदेणे नसावे. ज्यांना रामाचे अस्तित्त्व मान्य नाही त्यांच्यासाठी ती तारीख गैरलागु आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ह्याबाबतीत गोष्टी इतक्या काळ्या- पांढर्‍या वाटत नाहित.
परंपरेने चालत आलेल्या मायथॉलॉजी, दंतकथेमध्ये तथ्यांश असण्याची शक्यता बरीच असते.
मौखिक परंपरेने प्रक्षिप्त भागच मूळ मजकूराच्या कैकपट झाला तरी मूळ काहीतरी खरे असण्याची शक्यता फार फार असते.
ट्रॉयला देखील सुरुवातीस निव्वळ काव्य मानले गेले.
सध्या इंग्लंडमध्ये किंग आर्थर व जपानमध्ये ३७ पिढ्यांपूर्वीचे पूर्वज असेच इतिहास - दंतकथा ह्या सीमेवर आहेत.
आता अशा गोष्टींचं विश्लेषण करुन तत्काळ काही फायदे असतीलच असं नाही.
पण तत्काळ फायदे असणार्‍याच गोष्टी कराव्यात असे नाही.
तुम्ही मानणारे- न मानणारे असे जे थेट दोन गट केलेत त्याशिवायही काही सीमेवरची म्डळी असणं शक्य आहे.
किंवा अजून एक प्रकार म्हणजे चिकित्सक्/अभ्यासक.
त्यांना ह्यात रस असणं शक्य आहे.
(मला स्वतःला फार रस आहे, अशातला भाग नाही; पण दुर्गा भागवतांपासून ते इरावती कर्व्यांपर्यंत मंडळी ह्यात गुंतलेली दिसली की रस असणारी काही अभ्यासक मंडळी असणं शक्य आहे ; हे पटतं. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मान्य. अशांनी अभ्यास करावा हे खरेच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

राम नावाची कोणी व्यक्ति कधी नव्हतीच, ती केवळ श्रद्धाळूंची मनाची समजूत आहे असे मला तरी वाटत नाही. मला असे वाटते की राम नावाचा कोणी वीर पुरुष केव्हातरी होऊन गेला आणि रामायणकथेसारखी कथा त्याच्या आयुष्यात खरोखरीच घडली. ती बहुतांशी स्थानिक पातळीवर आणि खूपच छोटया स्केलवर घडली. त्या लहान कथेवर कल्पनेची सजावट चढविली गेल्यामुळे आजचा लंकेपर्यंत गेलेला आणि वानरसेना उभारणारा राम कविवर्गाने तयार केला. दक्षिणेत आपली संस्कृति पसरवण्याच्या उत्तरेकडील आर्यांच्या इतिहासाचे रूपक म्हणजे रामायणकथा असे मला वाटते.

प्रत्येक समजुतीमागील सत्य काय हे जाणून घ्यायच्या कुतूहलातून आणि ते शोधतांना मला काय सापडले हे सांगण्यासाठी मी हा धागा सुरू केला आहे असे वर म्हटलेलेच आहे. निनाद ह्यांना आलेल्या शंकेतील political motivation येथे अजिबात नाही. रामनवमी आणि रामचरित्र ज्यांना साजरीच करायची असतील त्यांनी ती अवश्य करावी पण राम अमुकच ठिकाणी अमुकच वेळेला जन्मला असले आग्रह मनात न ठेवता असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राम हा प्रतिमात्मक आहे असे किती लोक मानतात? भारताच्या सुप्रीम कोर्टात रामलल्ला हा एक फिर्यादी होता असे आठवते. (चू.भू.द्या.घ्या.)

रामाच्या जन्मदिवसाची चर्चा होण्याने हा भावनिक मुद्दा किती निरर्थक आहे हे हळूहळू लक्षात येण्यास मदत होईल असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समुद्रात टाकलेले दगड तरंगले

प्यूमाइस नावाचे दगड पाण्यावर तरंगतात. ३० किमी लांबीचे? २० वर्षे?
http://en.wikipedia.org/wiki/Pumice

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दक्षिण भारतात कुठल्याशा मंदिरातही ते दगड आहेत .
त्यांचे दिस्कवरी का कुठल्याशा च्यानेलवरील माहितीपटात चित्रणही पाहिले होते.
हातात धरता येतील इतके लहान पांढरे दगड होते. पाण्यात टाकल्यावर तरंगत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars