उथळ उथळ
पुल देशपांडे उर्फ भाई यांस,
उथळ उथळ उथळ किती
नवसमाज भाई
सूज्ञांची परिवशता
अंत कळत नाही.
उथळ .......
रंगवूनी स्त्रीपात्र हिडीस
पुरुष लचकती
नाटक वा सिरियल हो
तेच सूत्र भाई
उथळ ........
अकलेला साजिशी
गोष्ट निर्मिती
लांबण किती चालावी
हेच कळत नाही
उथळ .......
नवल मनीं हे वाटे
'गुरु' जनांचे
'पीजे' ला ' सिद्धु' हास्य
खंत उरी राही
उथळ उथळ उथळ किती
नवसमाज भाई !
प्रतिक्रिया
सिद्धु हास्य सिद्ध हस्त
सिद्ध हस्त ऐकले होते पण हे सिद्ध-हास्य
पुलं?
पुलंना उद्देशून का लिहिलंय हे कळलं नाही.
भाई या शब्दामुळे.
भाई या शब्दामुळे. हे अर्थातच फार वरवरचं आणि संदिग्ध उत्तर. खरे कारण असेलच काहीतरी.
पुल
पुलंना उद्देशून लिहिलंय कारण आता ज्या लेव्हलचे विनोद सगळीकडे ऐकायला मिळतात त्यापेक्षा खूपच दर्जेदार विनोद त्यांच्या लेखनात व कथाकथनात असायचे.
बाकी , मूळ गाण्यातले 'बाई' च्या ऐवजी 'भाई' लिहिले गेले आणि त्यातूनच पुलंना उद्देशून लिहिण्याची कल्पना सुचली.
नवज्योत सिद्धु जसा फालतू विनोदाला सातमजली हंसतो, तसेच हे परीक्षक हंसतात, म्हणून सिद्धुहास्य हा शब्द वापरला.
मस्तच!
मजा आली!
कवितेच्या आशयाशी सहमत .
कवितेच्या आशयाशी सहमत .
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||