कौतुक कशासाठी?
कवी हा बाष्कळयाचा धोका पत्करूनच
लिहायला उतरतो, एखादा ड्रायव्हर , डॉक्टर
स्वैपाकी, लाकूडतोड्या जसे समाजाचे
उपयुक्त काम करतो तसे प्रशस्तिपत्रक मिळायला
आयुष्य जाते, बहुतेक कवी नापास होतात, जो गाजतो
तोही शेवटी वैषम्याने विचारतोच की मी लिहिल्याने
काय फरक पडला? तर ऐका : तुम्ही कविता
न लिहिता (आणि मुख्य म्हणजे न वाचता)
जगू शकणार आहात का?
तसे असेल तर अभिनंदन ! सुखी व्हा!
पण ज्यांना ती एक जीवनावश्यक गोष्ट वाटते ,
त्यांना प्रश्न असा की, तहान लागल्यावर तुम्ही जर
पाणी प्यायलात , तर त्याचे
कौतुक कशासाठी?
xxx
प्रतिक्रिया
और इक चीज़ मिलेगी, टूटा खाली
और इक चीज़ मिलेगी, टूटा खाली जाम....
मस्त!
मस्त!