Submitted by प्रभुदेसाई on शनिवार, 23/01/2021 - 11:51
पहाटे म्हणा किंवा सकाळी म्हणा सहा वाजले की तात्याचा मोबाइल तात्याला विसाव्या शतकातील गोड गोड गाणी ऐकवून जागा करतो. तुम्ही काहीही म्हणा पण तात्याला स्वतःला विसाव्या शतकातील गाणी फार आवडतात. त्या वेळी कोणी लता मंगेशकर नावाच्या एक गायिका होत्या त्यांचा गळा गोड होता. त्यांनी गायिलेल्या बऱ्याच गाण्यांचा संग्रह तात्याकडे आहे. हा गाण्यांचा संग्रह तात्याला कसा मिळाला? सगळं सांगत बसलो तर वेळ लागेल. पुन्हा केव्हातरी.
Submitted by Milind Rane on गुरुवार, 31/12/2020 - 22:50
माझ्या डेस्क वरचा फोन वाजला . मी फोन उचलला . " विकास मेरे केबिन मे आओ ". आमच्या एच आर मॅनेजर फरीदाने मला बोलावलं . मी तिच्या केबिन मध्ये गेलो . तिने मला विचारलं स्टोर मॅनेजर दिलीप कैसे है ? तुम्हे कुछ पता है उनके बारे मे . मी एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या समोरच्या खुर्चीवर बसलो . "हां " आय सी यू में है ". " तब्बेत खालावलीय आहे थोडी ". त्यांच्या डिपार्टमेंटची मुलं जाऊन आली त्या दिवशी . "बेशुदी मध्ये ओरडत आणि बडबडत असतात मोठ्याने ." " त्रास होतोय त्यांना खूप ".
"अल्लाह त्यांच्या तब्बेतीला आराम पडू देत ". ती म्हणाली .
Submitted by प्रभुदेसाई on शनिवार, 19/12/2020 - 10:09
I dream therefore I am.
The dreams can be as real as you want them to be.
Submitted by धनंजय on बुधवार, 09/12/2020 - 08:17
----------------------------------------------------------------
मेहरबानी कसली, हे तर दरवानाचे कामच आहे
----------------------------------------------------------------
"काय झालं, मेहता मॅडम? काही मदत करू का मी?" बिल्डिंगचा दरवान आपली जागा सोडून धावत आला आणि नुकत्याच बाहेर पडलेल्या पोक्त बाईला म्हणाला.
Submitted by देवदत्त on शनिवार, 28/11/2020 - 16:47
(पूर्वप्रकाशन: "माहेर" दिवाळी अंक २०१९)
औरंगाबाद शहरालगतच्या म्हैसमाळ पठारावर तुम्ही सहलीला गेलात, तर मजेमजेनं उड्या मारताना तुम्हाला कांगारूंचे कळप दिसतील. या अजब चमत्काराला कारणीभूत आहेत सिंधुआज्जी.
आता सिंधुआज्जींची ओळख करून देणं क्रमप्राप्त आहे.
Submitted by प्रभुदेसाई on शुक्रवार, 09/10/2020 - 15:55
Submitted by मनीषा on रविवार, 27/09/2020 - 09:55
मराठी भाषेचे शब्दवैभव, मराठी भाषिकांना आणि मराठीच्या जाणकारांना चिरपरिचित आहे. विविध प्रकारच्या म्हणी, वाक्प्रचार आणि सुविचारांच्या अलंकारांची लेणी मराठी भाषेला लाभलेली आहेत. काही म्हणी रोजच्या संवादात अगदी सहजपणे वापरल्या जातात. त्या म्हणी कशा प्रचलित झाल्या असाव्यात, त्या मागे काय कथा असतील?
तर काही म्हणींच्या या कथा...
"ह्यात नाही राम - त्यात नाही राम"
Submitted by प्रभुदेसाई on मंगळवार, 22/09/2020 - 09:00
अरुण रेडिओ वरची क्रिकेटची कॉमेंटरी ऐकण्यात अगदी रंगून गेला होता. खाली सोसायटी कंपाउंड मध्ये त्याचे मित्र गल्ली क्रिकेट खेळण्यात दंग होते. ते त्याला खेळण्यासाठी सारखे बोलावत होते. पण तो गेला नव्हता. त्याला भारत पाकिस्तान गेम मध्ये जास्त रस होता. शेवटची ओवर चालू होती. पाकिस्तान जिंकणे आता शक्यच नव्हते. हा गेम संपला की तो मित्रांच्या बरोबर खेळायला जाणार होता. इतक्यात आतून बाबा आले. आज बाबा ऑफिसला गेले नव्हते. त्यांना जबरदस्त सर्दी झाली होती. थोड अंग गरम झाल्यासारखे वाटत होते.
“ झाली की नाही तुझी मॅच?” बाबांनी थोड्या चढ्या आवाजांत विचारले.
Submitted by प्रभुदेसाई on मंगळवार, 08/09/2020 - 21:04
उत्परिवर्तनशील करोना व्हायरसचा हल्ला नुकताच परतवण्यात आला होता आणि त्यांना त्यांच्या निवासस्थानी सी / १-१९९६बी २ धुमकेतू ह्युकुटेकडे जाण्यास भाग पाडले गेले होते. खंडणीची त्यांची मागणी नाकारली गेली. सैतानाने त्यांना पृथ्वीवर हल्ला करण्यासाठी उचकवले होते. माणसे हा नेत्रदीपक पराक्रम अर्थातच क्लिंगनच्या सक्रिय मदतीने साध्य करू शकले. नाहीतर मागच्या वेळी म्हणजे २०२० साली लाखो लोकांचा बळी देऊन आणि १० टन सोन्याची खंडणी घेऊन त्यांची बोळवण करावी लागली होती. निदान ह्यावेळी आम्ही सैतानावर मात करण्यात यशस्वी झालो होतो.
Submitted by प्रभुदेसाई on बुधवार, 02/09/2020 - 17:31
ऐका देवा महाराजा कार्नेगीजी देवा तुमची कहाणी. एक आटपाट मेट्रो महानगर होते. तेथे एक राजा राज्य करत नव्हता. त्याला दोन राण्या नव्हत्या. एक आवडती नव्हती आणि एक नावडती नव्हती. कारण तेथे लोकशाही नांदत होती. त्या लोकशाहीची व्याख्या अशी होती Democracy is a government off the people, buy the people and f*** the people.
पाने