आपण यांचं मीठ खाल्लंय!
आगरी समाजाचे भारतीय संस्कृतीवर फार मोठे उपकार आहेत. कारण त्यांनी मीठाचा शोध लावला. या समाजाचा इतिहास मीठाइतकाच जुना म्हणजे किमान सात हजार वर्षे एवढा प्राचीन आहे. आपण सर्वांनीच त्यांचं मीठ खाल्लंय. इतिहास हा फक्त राजा-महाराजांचाच नसतो तर ज्यांनी संस्कृती घडवली अशा निर्माणकर्त्यांचाही असतो. म्हणून आपण आगरी समाजाच्या ऋणात राहायला पाहिजे…
मीठ नसतं तर काय झालं असतं, तर जेवणच नाही तर सगळं आयुष्यच अळणी झालं असतं. त्यामुळंच मीठाचा शोध हा मानवी संस्कृतील क्रांतीकारी टप्पा मानला जातो. मनुष्य लाखो वर्षांपूर्वी शिकारी मानव होता. त्या काळात शरीरातल्या मीठाची गरज भागवण्यासाठी तो शिकार केलेल्या प्राण्याचं प्रथम रक्त पित असे किंवा लवणयुक्त माती खात असे. पुढं खनीज मीठ (सैंधव) वापरात आलं. अशा मीठाच्या नैसर्गिक खाणी मुळात कमी असत. त्यामुळं हे मीठ प्रचंड महाग असे. एके काळी या मीठाला सोन्यापेक्षाही अधिक किंमत असे. मीठामुळं जगात अनेक युद्धं झाली. साम्राज्ये उभी राहिली किंवा गडगडली.
आजचा सॅलरी (साल्ट) हा शब्द त्यामुळंच वापरात आला. मीठानं खाद्य संस्कृती तर घडवलीच पण मानवी आरोग्यही सुदृढ करायला मदत झाली. ज्याचं मीठ खाल्लं आहे, त्याच्याशी बेईमानी करणं हा नैतिक गुन्हा मानला जाऊ लागला. धर्मकार्यातही मीठ हा महत्त्वाचा घटक बनला.
मीठानं जागतिक इतिहास व्यापलाय. इंग्रज सरकारला हादरवून सोडणारा भारतातला महात्मा गांधींचा मीठाचा सत्याग्रह कोण विसरेल? मीठ हे मानवी संस्कृतीच्या अत्यंत प्राथमिक काळात कर बसवलेलं एकमेव उत्पादन आहे.
भारतात मीठाचा शोध कोळी समाजानं लावला. सर्वप्रथम हा शोध लागला तो कच्छ प्रांतात. मग हळू हळू जिथं अनुकूल किनारे आणि वातावरण आहे तिथं हा मीठशेतीचा उद्योग विस्तारत गेला. कोळी समाजातली जी कुटुंबं मीठशेतीकडं वळली त्यातूनच आगरी समाजाचा उदय झाला. आगर या प्राकृत शब्दाचा सरळ अर्थ आहे बाग किंवा शेत. नारळी-पोफळींच्या बागांसोबतच जिथं मीठ पिकवलं जातं ती मीठाची बाग किंवा मीठागर. या आगर शब्दातूनच आगरी या शब्दाचा उगम झाला. याचाच दुसरा अर्थ असा की कोळी आणि आगरी हे मूळचे एकच! कोळी आणि आगरींचे मूळचे ऐक्य सांगणारी एक पुराणकथाही येते. अगस्ती मुनीच्या आंगले आणि मांगले या दोन पुत्रांपासून क्रमशः आगरी आणि कोळी समाज निर्माण झाले, असं ही कथा सांगते.
कोळी समाज देशभर आढळतो. या समाजाचे मूळ हे कोलीय या भारतातील अतिप्राचीन अशा मानवगणाकडे जाते. भारतात प्राचीन काळापासून अनेक मानवगण वावरत होते, त्यापैकी हा एक. हा पुरातन मानवी घटक देशभर विखुरलेला होता. भारतात कोलीय (कोलीयक) नावाची अनेक गावं नेपाळ, राजस्थान, झारखंड, ओरीसा ते केरळ-तमिळनाडूपर्यंत आढळतात. कोलीय हे फक्त मासेमार नसून ते वीणकामआणि शेतीही करणारे होते. त्यातले समुद्रकिनारी वसलेल्यांनी पहिल्या नौका बांधल्या आणि मासेमारी सुरु केली. जाळ्यांचा शोध त्यांना उपयुक्त ठरला. कारण ते कुशल वीणकरही होते. हे शोध त्यांच्या अन्नाच्या, भरणपोषणाच्या निकडीमुळंच लागले. पुढे काही शतकांतच त्यांना समुद्राच्या खारट पाण्यापासून मीठाचा शोध लागला. या शोधांतून अन्नोद्योग तर सुरु झालाच, पण त्यांच्याच नौकाशास्त्रातून पुढं विदेश व्यापार सुरु झाला. अर्थात प्रथम निर्यात होणारं उत्पादन होते ते मीठ आणि खारवलेले मासे. पुढं त्यातून बलाढय़ अशी भारतीय आरमारे उभी राहिली. मुळात हा समाज दर्यावर्दी असल्यानं नौकानयनाच्या शोधाचं श्रेयही याच समाजाला द्यावं लागतं.
सह्याद्रीच्या कडय़ांमधून जे घाट निर्माण केले गेले ते पुरातन मीठमार्गच होते. वंजारी समाज या मार्गांनी मुख्यत्वाने मीठच जनावरांवर लादून घाटावर आणत असे. सर्वत्र भटकून मीठ विकत असे.
सिंधू संस्कृतीपासूनच (इसपू 4200) भारताचा जागतिक व्यापार सुरु झाला होता. लोथल या कृत्रिम बंदराची सिंधूकाळातील पुरातन निर्मिती हा कोलीय समाजानं निर्माण केलेला आश्चर्याचा अद्भुत असा नमुना आहे. कोकणातली चेऊलसारखी अनेक प्राचीन बंदरं (इसपू 223) आजही या समाजाच्या सागरव्यापाराची आणि विजिगिषु वृत्तीची साक्ष देतात. इजिप्त, सुमेर, अरबस्तान आणि अन्य युरोपीय देशांशी त्यांचा व्यापार होत होता. मीठ हे अर्थातच महत्त्वाचं उत्पादन होतं. त्याचबरोबर अन्य भारतीय वस्तूही आपसूक निर्यात होऊ शकल्या. यामागं कोळी-आगर्यांची अपार कल्पकता होती. साहस होतं. या अनुषंगानंच भारतातून सोन्याचा धूर निघत होता, असं म्हटलं जातं. ते सत्यही होतं.
कोकणातल्या आरंभीच्या सत्ता याच समाजाच्या होत्या. कुडा-मांदाड इथल्या लेण्यातील शीलालेखात तत्कालीन स्थानिक सत्ताधार्यांचा उल्लेख येतो. ते आगरी कोळीच आहेत. इसवीसनाच्या सहाव्या शतकात तर आगरी-कोळी आणि महार यांची कोकणावर संयुक्त सत्ता होती. किंबहुना नंतरच्याही सत्ता यांच्या मदतीखेरीज या भूभागावर राज्यच करु शकल्या नाहीत, असंच इतिहास सांगतो.
सातवाहन काळापासून (इसवीसन पूर्व 220) महाराष्ट्राचे लष्करी आरमारही बलाढय़ बनल्याचं दिसतं. यात खरा हातभार कोळी-आगरी लोकांचाच होता. हे आरमार एवढं बलाढय़ होतं की, सातवाहनांनी आगरी-कोळी बांधवांच्या मदतीनं श्रीलंकेचाही पराभव करत तेथवर सत्ता पोहोचवली. एवढंच नव्हे तर सातवाहनकालीन आणि आजच्या मराठीचं मूळ असलेल्या महाराष्ट्री प्राकृताच्या मूळ रुपाला आगरी बांधवांनी आपल्या आगरी भाषेत कटाक्षानं जपलेलं दिसतं.
वैदिकांनी जरी पुढं सिंधुबंदी नामक अत्यंत अनिष्ट प्रकार पुढं आणला, तरी या समाजान नौकानयन सुरुच ठेवलेलं दिसतं. त्याचाच उपयोग सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं आरमार उभारायला झाला. याचा दुसरा अर्थ असा की हा समाज वैदिक संस्कृतीच्या प्रभावात कधीच आला नाही. त्यांनी समुद्रबंदीचा फतवा मान्य केला नाही. पुढं सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या रुपानं इतिहासाला एक महानायक मिळाला. आगरी-कोळी समाजाचं आरमारी युद्धतंत्र त्यांच्या काळात कळसाला पोहोचलं. पुरातन काळापासून समुद्राचीच संगत असल्यानं सागरी किल्ल्यांची संकल्पनाही याच समाजानं खूप आधी विकसीत केली. हे आधीचे सागरी किल्ले बनवले गेले ते सागरी चाच्यांना तोंड देण्यासाठी आणि व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी. त्यांचा उपयोग स्वराज्याला केवढा झाला हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. आजच्या सर्वच सागरी किल्ल्यांच्या निर्मितीचं खरं श्रेय आगरी-कोळी समाजालाच द्यावं लागतं ते यामुळंच. पुढं नानासाहेब पेशव्यानं आंगरे यांचं आरमार बुडवण्याची घोडचूक केली आणि इंग्रज-पोर्तुगीजांना मोकळं रान मिळालं, हा दुर्दैवी इतिहासही इथं विसरता येत नाही.
कोलीय वंश हा मूळचा शैव मातृसत्ताक पद्धती पाळणारा समाज. त्यांची स्वतंत्र गणराज्ये होती. ती त्यांच्या वंशाच्या नावानेच ओळखली जात असत. मूळचे कोलीयच असल्यानं आणि विशिष्ट भागातच एकवटल्यानं पुरातन मातृसत्ताक पद्धतीचे अंश आजही आगरी समाजानं जतन केलेले आहेत. अन्य समाजगटांपेक्षा वैदिक संस्कृतीचा पगडा दूर ठेवण्यात त्यांना यश आलं ते यामुळंच! त्यांच्या देवता प्रामुख्यानं मातृदेवताच आहेत. उदाहणार्थ एकवीरा, मंबाई, गोराई, इत्यादी. त्यांच्यात हुंडा देणं-घेणं पूर्णतः अमान्य आहे. एवढंच नव्हे तर समाजाची पंचायत ही फक्त देवीमंदिरासमोरच भरते. घरातले आर्थिक व्यवहार हे आजही सर्वस्वी स्त्रीयांच्याच हाती असतात. गणसत्ताक पद्धतीचंही त्यांनी अगदी अलीकडच्या काळापर्यंत जपलेलं वैशिष्ट्य असं की, आगरी खेडय़ांत आगरी सोडून अन्य माणूस औषधालाही सापडत नसे. आगरी पंचायतच सामाजिक निर्णय एकत्रीतपणे घेत असे. बाह्य सत्तांना त्यात जवळपास प्रवेशच नव्हता.
कोलीय लोक हे कोल या मानवीवंश गटाचे आहेत , असं मानववंशशास्त्रज्ञांचं मत आहे. हा मानवी गट भारताबाहेरही आढळतो. कोकणात या मानवी गटाचं आगमन इसवीसन पूर्व 7 ते 8 हजार वर्षांपूर्वी झालं असावं असं पुरातत्वीय पुराव्यांवरुन दिसतं. नदी-तळ्यांमधली मासेमारी मानवाला अगदी पाषाणयुगापासून येत होती. पण समुद्रातली मासेमारी अत्यंत धाडसाची होती. ज्या कोलीय गणानं सामुद्रिक मासेमारीचा शोध लावला आणि अन्नाची गरज भागवली तो सागरकिनारीच वास्तव्य करणार हे उघड आहे. मीठाचा शोध लागल्यानंतर जो भाग मीठशेतीस योग्य आहे तिथं त्यांनी वस्ती केली. त्यामुळंच महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये त्यांच्या प्राचीन अस्तित्वाचे पुरावे आढळतात. तिथंच ते आजही एकवटलेले दिसतात. बिंब राजानं कोकणात आक्रमण केलं. सैनिकांची लढाईची गरज संपल्यानंतर त्यांना मीठागरं बनवून दिली. तोच हा आगरी समाज, हे मत मांडलं जातं. पण कोणत्याही पुराव्यांवर टिकत नाही.
महत्वाचं म्हणजे तथागत गौतम बुद्धाची माता महामाया आणि पत्नी यशोधरा हीसुद्धा कोलीय वंशाची होती. कदाचित त्यामुळंच की काय इतिहासात असं दिसतं, की कोकणातल्या कोळी-आगरी लोकांवरही बुद्ध धर्माचा प्रभाव होता. कोकणात बुद्ध धर्माचे अस्तित्व प्रबळ असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. नालासोपारा अथवा कुडे-नांदाडची बौद्ध लेणी ही आगरी समाजाचं प्राबल्य असणार्या भागातच आहेत. देवी एकवीरेचे कालौघात बदलले गेलेलं कार्ला इथलं मंदिर हेही मूळचं महामायेचं असू शकेल, असे पुरावे आता मिळू लागले आहेत. म्हणजेच कोलीय गणाने एके काळी बौद्ध धर्माची पाठराखण मोठय़ा प्रमाणावर केली होती हे सिद्ध होते. कारण त्या महनीय धर्माचा संस्थापक त्यांच्याच गणात जन्माला आलेला होता.
आगरी समाजाचे मानवी संस्कृतीवर फार मोठे उपकार आहेत. हा खरा संशोधक आणि निर्माणकर्ता समाज होय! मीठाचा इतिहास म्हणजे आगरी समाजाचा इतिहास होय. या समाजाचा इतिहास वैदिक संस्कृतीपेक्षाही पुरातन म्हणजे किमान सात हजार वर्षे एवढा प्राचीन आहे. आपण सर्वांनीच त्यांचं मीठ खाल्लंय. इतिहास हा फक्त राजा-महाराजांचाच नसतो तर ज्यांनी संस्कृती घडवली अशा निर्माणकर्त्यांचाही असतो, हे या निमित्तानं लक्षात यावं!
- 22663 reads
प्रतिक्रिया
स्वीपिंग स्टेटमेंट्स
एखाद्या समाजाचा इतिहास लिहिताना त्यातील गौरवस्थाने अधोरेखीत करणे इथपर्यंत ठीक आहे. पण म्हणून एवढी स्वीपिंग स्टेट्मेंट्स करणे योग्य नाही. ज्या पद्धतीने हा लेख लिहिला आहे, त्याच पद्धतीने अजून एक (अशीच सांगोवांगीची) भर घालतो - सध्याच्या ओरीसामध्ये पूर्वीची काही राज्ये येत - ओड्र, कोशल, उत्कळ, कलिंग ही महत्त्वाची. त्यातील उत्कळ आणि कलिंग ही नावे "कोल" या सध्या अस्तित्वात असलेल्या आदिवासींवरुन पडलेली आहेत.
तर असे आहे, की जिथे जिथे कोल, कोलीय सापडते तिथे तिथे आपण कोळी आगरी मंडळींना जोडू शकतो. मला वाटते कोळशाचा शोधही कोलीय मानववंशानेच लावला असावा.
कोला, कोलोन!
कोलाचा शोधही को ळ्यानीच लावला. पराशर ऋषींना भरपावसात होडीतून नेताना मत्स्यग्म्धेला सगळे ' येडी कोळीण' म्हणाल्व
. पराशराना माशांचा वास आवडला नाही म्हणून तिने जे सुगंधि द्रव्य तयार केले त्यास येडी कोळीण अत्तर म्हणायचे. पुढे फ्रेंचानि त्याचा अपहार आणि अपभ्रंश करून ' यु डी कोलोन' म्हणून विकायला सुरवात केली.
ऑन सिरीयस नोट लेखकात मला बहुजनाम्चे पु ना ओक होण्याचे पोटेंशियल दिसत आहे.
हे आपले दुर्दैव
अचुक! एका वाक्यात सगळं काही सांगुन गेलात. मला पुनांनी मळलेल्या अनवट संशोधनवाटेविषयी मला नितान्त आदर आहे. पुनांच्या संशोधनाचे खरे मुल्य आणि माहात्म्य अद्यापही लोकांना कळलेले नाही, हे आपले दुर्दैव.
मला उधळायला फार फार आवडतं
हा हा हा हा
हा हा हा हा
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
हा हा
फार मनोरंजक लेख. 'राघूनानांची कन्येस पत्रे' आठवली
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
:)
मनोरंजक लेख आहे खरा पण 'राघूनानांची कन्येस पत्रे' पेक्षा जुन्या आगगाड्यांमध्ये लिहिलेले 'चहाचे फायदे' आठवले. जगातले सर्व शोध आगरी-कोळी समाजानेच लावले आहेत असा काहीसा सूर दिसला. ऋणात रहायला हवे म्हणजे नक्की काय करावं अशी अपेक्षा आहे याचाही उलगडा झाला नाही.
"मीठामुळं जगात अनेक युद्धं झाली. साम्राज्ये उभी राहिली किंवा गडगडली"
ही अगदी नवीन माहीती आहे. नक्की कुठली युद्धे झाली, कुठली साम्राज्ये उभी राहिली आणि कुठली गडगडली याची माहीती कुठे मिळेल? "विकिपिडीया"वर मिळेल काय?
बैठक
हा लेख वाचला. या लेखमालिकेतील इतर लेख वाचण्याचा प्रयत्न केला.
लेखनामागचा हेतू जरी प्रशंसनीय असला तरी लिखाणामधे एकंदर शिस्तीचा अभाव जाणवला. अनेक विधाने अशी एकामागोमाग एक येत जातात ज्यांची संगती लावणे अशक्य बनते. एका विशिष्ट समाजाचे एका विशिष्ट संस्कृतीमधे काय आणि कसे योगदान होते हे समजून घेण्याकरता आणि समजावून सांगण्याकरता लिखाणाची बैठक, विषयाची शिस्तशीर मांडणी , संदर्भांची यादी आणि मुख्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या त्या संदर्भांची योजना हे मूलभूत नियम पाळले गेले असं दिसलं नाही.
कदाचित लिखाणामागची भूमिका आणि त्याचं स्वरूप हे एखादा ससंदर्भ निबंध लिहिणे असे नसून, विषयाची रंजक तोंडओळख करून देणे असा असू शकतो. हे करतानाही विषयाची रंजक मांडणी , शैलीबद्धता हे गुण अभावानेच जाणवले. मुख्य म्हणजे रंजन करणे याचा अर्थ तर्कागत संगतीला रामराम ठोकणे नव्हेच.
असो. लेखकाने या आधीच्या लिखाणात आपल्या वाचनाची चुणूक दाखवलेली आहे. या सखोल वाचनाचं, संदर्भ शोधण्याचं रूपांतर यथायोग्य रीतीने गुणी लिखाणात व्हावे या सदिच्छेपोटी प्रस्तुत अभिप्राय दिला आहे. कलोअहेवि,
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
मीठाच्या व्यापारासंदर्भात
मीठाच्या व्यापारासंदर्भात 'बखर अंत़काळाची' (का 'अंताजीची बखर') मधे रोचक माहिती आहे. तपशील फारसा आठवत नाही, पण कादंबरीतल्या मुख्य पात्राचे वडील कोकणातून मीठ विकत घेऊन त्यात माती मिसळून मीठ बरंच महाग विकत असत. त्या काळात मातकट, काळपट मीठ फार महाग असे.
ठाणे शहराच्या आसपास रहाणार्या आगरी लोकांची भाषा ऐकत रहावी अशी गोड वाटते, अगदी शिव्यापण. या बायका प्रेमाने बोलताना, कौतुक करतानाही अस्सल शिव्या देतात त्याचे संस्कार अगदी लहान वयापासून झाल्यामुळेही असेल.
(लेखाबद्दल अधिक लिहीत नाही. आ.रा आणि मुक्तसुनीत यांच्या प्रतिक्रियेत अधिक भर घालण्याएवढं काही सुचलं नाही.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सर्वांचे आभार. मी ही
सर्वांचे आभार. मी ही लेखमाकिका विद्वानांसाठी लिहित नाहीहे. अस्मितेच्या शोधात असलेल्या जनसामान्यांसाठी लिहित आहे. मानवी इतिहासात व संस्कृती घडवण्यात प्रत्येक समाजघटकाचे राजा-महाराजांपेक्षाही मोठे योगदान आहे. ते त्यांना समजावून सांगणे मला महत्वाचे वाटते. ही लेखमालिका गेल्या चार आठवड्यांपासुन दै. नवशक्तीच्या "ऐसी अक्षरे" या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.वर्षभर ही मालिका सुरु राहील. जेंव्हा या मालिकेचे पुस्तक रुपांतर केले जाईल तेंव्हा सुचवल्याप्रमाणे संदर्भ्...तळटीपा वगैरे दिल्या जातील. सध्या व्रुत्तपत्रीय जागेच्या आणि सामान्य वाचकांच्या आकलन मर्यादा लक्षात घेवून हे लेखन केलेले आहे. या संस्थळावर काही सामान्य येतच असतील्...त्यांच्यासाठी हे लेखन आहे. विद्वानांनी ते वाचले नाही तरी चालु शकेल.
मी ही लेखमाकिका विद्वानांसाठी
असं असेल तर मग, मला वाटतं की स्वीपिंग स्टेटमेंट्स अथवा गुणी लेखनाबद्दल वर जे काही म्हणले गेले आहे ते अधिकच महत्वाचे ठरते.
काय म्हणता?
बिपिन कार्यकर्ते
कार्यकर्ते...गुणी लेखनाचा
कार्यकर्ते...गुणी लेखनाचा क्लास काढा कि राव...पहिला विद्यार्थी मी होतो. पक्कं.
जनसामान्य
कुणासाठीही लिहा. विद्वानांसाठी लिहा, जनसामान्यांसाठी लिहा. पण अवास्तव विधानांच्या आधारे कुणाला अस्मिता मिळवून देऊ असे तुम्हाला वाटत असेल तर तो भ्रम आहे.
इतिहास व संस्कृती घडवण्यात जनसामान्यांचे योगदान राजेमहाराजांपेक्षा खूप अधिक आहे हे दाखवण्यासाठी असत्याचा आधार घेण्याची काहीच गरज नाही. उपलब्ध आणि अधिकृत इतिहासात याचे बरेच दाखले मिळतात. शिवाजीचं आख्खं चरित्र जनसामान्यांची ताकत अधोरेखीत करणारं आहे. भारताचा स्वातंत्र्यलढा तशीच कहाणी सांगतो. मध्ययुगातील भक्ती-सूफी परंपरा या जनसामान्यांच्या महान सांस्कृतिक योगदानाचा भला मोठा पुरावा आहे. प्राचीन भारताच्या इतिहासावर दामोदर कोसंबींनी आणि त्यांच्या समविचारी इतिहासकारांनी जो प्रकाश टाकला आहे त्यातून जनसामान्यांचे इतिहासातील स्थान आणि महत्व याचे लख्ख दर्शन घडते.
हे जे लिहिलेले आहे, ते साधारण सामान्य ज्ञान असलेला कोणीही "सामान्य माणूस" (माझ्यासारखा. मी विद्वान नाही. इतिहासकारही नाही. आणि सांगायला हरकत नाही, "ब्राह्मण" ही नाही.) मान्य करणार नाही. जनसामान्य जनसामान्य करत सत्याशी तडजोड ठीक नव्हे. जनसामान्यांचा अपमान करु नका.
या लेखात आक्षेपार्ह वाटते ते हे, की कोळी-आगरी समाजाच्या सध्याच्या व्यवसायासंदर्भात जे जे काही इतिहासात घडले आहे, त्याचे त्याचे सर्व श्रेय एक्स्लिझिव्हली याच समाजाला दिलेले आहे. जसे काही मानवी संस्कृतीच्या आरंभापासून कोळी-आगरी आणि इतर अशी विभागणी होती, आणि नॉन कोळी-नॉन आगरी मंडळींचा मीठ, नौकानयन, व्यापार, विणकाम याच्याशी संबंधच नव्हता. इतिहास सर्वांचाच आहे. हे असे अस्मिता जागे करण्याच्या नादात आपण जातींचे ध्रुवीकरण करीत आहात हे ध्यानात घ्यावे.
कोणतीही मते खोडुन काढतांना
कोणतीही मते खोडुन काढतांना अरविंद कोल्हटकर देतात तसे पुरावे द्यावे लागतात. याच लेखमालिकेतील बाकीचे लेखही वाचले असते तर काही व्यवसाय हे एक्सक्ल्युजिव आहेत तर काही नाहीत हे लक्षात आले असते. पण सरधोपट विधाने करणा-यांना हे कोण शिकवणार?
दुसरे, तुम्ही ब्राह्मण आहात कि ढोर समाजाचे, मला काही फरक पडत नाही कारण मी सर्व जातींचा सन्मान करतो. शेवटी जाती कशाही निर्माण झालेल्या असोत...त्या होत्या आणि आहेत आणि राहणार आहेत. जातींचे ध्रुवीकरण नव्हे तर प्रत्येक जातीसमुहाचे संस्कृती घडवण्यातील योगदान मला अभिप्रेत आहे कि ज्यामुळे जाती एकमेकांकडे अधिक सन्मानाने पाहतील.
राहिले मी जनसामान्यांचा अवमान करतोय कि नाही...त्याचे उत्तर जनसामान्यांवरच सोडलेले बरे. त्याचे उत्तर मी तुमच्यासारख्या असामान्यांकडुन मागितलेले नाही. किंवा जनसामान्यही तुमच्याकडे तक्रार घेवुन आलेले नाहीत. मुळात टोपननावे घेत बेहोश-बेधुंद उधळना-यांना मी किंमत देत नाही. वाकड्यात घुसण्यातच ज्यांना विकृत मौज वाटते त्यांच्यासाठी माझ्याकडे काही मनोरुग्णालयांची/मानसोपचार तज्ञांची यादी आहे..गरज भासलयास ती मी पुरवू शकेल.
तुम्ही म्हनता तुम्ही "सामान्य" आहात. नव्हे तुमच्याएवढ्या सामान्य प्रतीचा माणुस मी क्वचितच पाहिला असेल. त्यामुळेच तर तुम्ही "असामान्य" ठरता.
माझी या संस्थळाच्या मालकांना विनंती आहे कि माझी येथे गरज नसल्याने माझे सदस्यत्व रद्द करण्यात यावे.
धन्यवाद.
खिक्...
खिक्... गरज? खुल्या संकेतस्थळांवर ती कधीच नसते. तसे तुम्हाला कोणी भासवून दिले असेल तर तो त्याचा मूर्खपणा आहे इतकेच.
संजय सोनवणी, श्री आळशांचा
संजय सोनवणी,
श्री आळशांचा राजा हे बहुतेक सर्वच संकेतस्थळांवर संयत व सामंजस्याची भूमिका मांडताना दिसतात, त्यांच्या वरील प्रतिसादातही मला काहिच आक्षेपार्ह आढळले नाही. आपला आक्रस्ताळेपणाचा प्रतिसाद व असभ्य भाषा यांचे या सदस्यांच्याबाबत या प्रतिसादात तरी वापरण्याचे काहीच प्रयोजन नव्हते.
संस्थळावर लेखन करायचे असेल तर त्यावर जे काही प्रतिसाद येणार ते वाचण्याची, समजुन घेण्याची, व त्याचा सभ्यपणाने प्रतिवाद करण्याची तयारी असणे हे आवश्यक ठरतेच.
तुमच्या लेखनाचा उदोउदो करणार्या लोकांसाठीच तुमचे लेखन असेल तर तसा फोरम निवडायला हवा.
केवळ कोणी विरोधी मत मांडले म्हणून असा आकांडतांडव कराल, तर काही दिवसांनी केवळ एकांगी विचार करणार्यांची फौज भोवताली जमा होउन, आपली मते तपासून बघण्याची क्षमताच नव्हे शक्यताही नाहीशी होईल.
असो...
श्री आळश्यांचा राजा यांच्या संदर्भात वापरलेल्या अनुचित आणि असभ्य भाषेचा तीव्र निषेध.
विक्रमजी, आगरी/कोळी आज
विक्रमजी, आगरी/कोळी आज प्रबोधनाच्या वाटेवर आहेत. गेल्या चार महिन्यात या समाजाने १८ सामाजिक चचासत्रे घेतली. एका सत्राला मीही उपस्थित होतो. ब्राह्मणांना दोष देनारे एकही भाषण कोणी केले नाही. शिवाय तुम्ही त्या समाजाला सरसकट निम्नस्तरीय म्हनता हे तुम्हाला जरा अतीच वाटत नाही काय? प्रबोधनाच्या वाटेवर जे निघाले आहेत त्यांना अडवू पाहणारे तुमचे विधान नाही काय? मागासांना विकसीत होण्यासाठी शुभेच्छा देण्याऐवजी तुम्ही त्यांना सरळ अतिमागासांत ढकलत आहात हे योग्य आहे काय?
ऐसी अक्षरे या संकेतस्थळाची
ऐसी अक्षरे या संकेतस्थळाची अधिकृत भूमिका सर्व पानांच्या तळाशी ऐसीअक्षरेची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे दिसते. त्यातल्या मार्गदर्श तत्त्वांत उल्लेखल्याप्रमाणे "जोवर शिष्टपणाची मर्यादा पाळली जाते, आणि कोणाविषयी बदनामीकारक, कायदेबाह्य, अगर संस्थळाला हानिकारक ठरू शकेल असे लिखाण होत नाही तोपर्यंत लेखकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न केला जाईल." सर्व विचारसरणींच्या, सर्व प्रकारच्या सदस्यांचे ऐसी अक्षरेवर स्वागतच आहे.
सदस्यांनी लेखन करताना व्यक्तिगत आरोप आणि अशिष्ट भाषा टाळावी ही विनंती.
मिठाचा 'शोध' कोणी लावला?
ह्या लेखातील अतिव्याप्त विधानांबद्दल फार काही लिहीत नाही. बहुजनसमाजाला योग्य ते श्रेय दिले जात नाही अशा रुखरुखीतून हे लेखन निर्माण होत आहे. वाचणारे वाचतात आणि टाळ्या वाजवतात. बहुप्रसव लेखकाच्या नावावर आणखी एक 'वैचारिक' पुस्तक जमा होते. 'Preaching to the converted' अशा प्रकारचे हे लिखाण वाटते.
'आगरी समाजाचे भारतीय संस्कृतीवर फार मोठे उपकार आहेत. कारण त्यांनी मीठाचा शोध लावला' ह्या एका विधानावर थोडे सविस्तर लिहितो. मीठ कोणी 'शोधले', चाक कोणी 'शोधले', विस्तव कोणी 'शोधला', आडोसा निर्माण केला किंवा प्राण्यांची कातडी पांघरली तर ऊन्ह-वारा-पाऊस-थंडीपासून बचाव होतो हे कोणी 'शोधले' अशा प्रश्नांना उत्तरे असतात असे मला वाटत नाही. 'शोधले' कोणीच काहीच नाही, जे निसर्गाने उपलब्ध होते ते 'ओळखले' इतकेच म्हणता येईल. तेहि अमुक एका काळी किंवा अमुक एका जागीच घडले असेहि म्हणता येत नाही. हे होतेच आणि अनेक जागी आणि अनेक वेळा हे स्वतन्तपणे लक्षात आले इतकेच म्हणता येईल. हे हजारो वर्षांपूर्वीच घडले असावे, त्याचा इतिहास फक्त सात हजार वर्षांचाच आहे असे मानायचीहि गरज नाही. हिंदुस्तानाच्या पश्चिम किनार्यावर घडले असेल तसेच बंगालच्या पूर्व किनार्यावरहि स्वतन्त्रपणे सापडले असेल, मध्यपूर्वेतील उष्ण समुद्रकिनार्यांवरहि सापडले असेल. सोनवणींच्या स्कीममध्ये आगरी - का कोळी? - जमातीला ह्याचा copyright द्यायचा असला तर ते त्यांचे स्वातन्त्र्य आहे पण सर्वांनी ती स्तुतिस्तवने गाण्यात मागे सूर लावावा इतके काही आगरी - का कोळी - समाजाचे विशेष योगदान मीठक्षेत्रात मला दिसत नाही.
धागालेखकाच्या हास्यास्पद
धागालेखकाच्या हास्यास्पद प्रतिसादांना काहीही उत्तर देणे नाही!
लेख....
लेख कसा वाटला ह्याबद्दल अधिक सांगू इच्छित नाही.वरती चर्चा, आक्षेप चाललेलेच आहेत.
विक्रम देशपांडे ह्यांचे प्रतिसाद हिडिस,गलिच्छ वाटले. विशेषतः पुढील वाक्ये:-
शेवटी - सोनवणी, तुम्ही प्रथम मान्य करा की - ब्राह्मणांचे योगदान सर्वोच्च आहे. मग बाकीच्यांच्या क्षुल्लक योगदानाबद्दल वाटाघाटी करू.
वाटाघाटी करणारे हे कोण आहेत, आणि कशाच्या वाटाघाटी करणार आहेत हे कळले तर बरे. असे प्रतिसाद इथे(ही)राहतात हे पाहून आश्चर्य वाटले.कदाचित अशाप्रकारे मुद्दाम सुपारी देउन ब्राह्मणांचे जिनोसाइड(वांशिक हत्याकांड) करवण्यासाठी, त्यास समर्थन मिळवण्यासाठी काही व्यक्तींना ब्राह्मण दाखवून त्यांच्याकडून दर्पोक्ती करुन घ्यायची व त्याद्वारे इतरांना त्यांचा निर्वंश करण्यासाठी उचक्वायचे अशा मोठ्या गेम प्लॅनचा हा भाग असू शकतो. असे आयडी त्या नृशंस संघटनांची हस्तक वाटतात.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सहमत/असहमत
>>>>>>>>>>>>>>>
लेख कसा वाटला ह्याबद्दल अधिक सांगू इच्छित नाही.वरती चर्चा, आक्षेप चाललेलेच आहेत.
विक्रम देशपांडे ह्यांचे प्रतिसाद हिडिस,गलिच्छ वाटले. विशेषतः पुढील वाक्ये:-
शेवटी - सोनवणी, तुम्ही प्रथम मान्य करा की - ब्राह्मणांचे योगदान सर्वोच्च आहे. मग बाकीच्यांच्या क्षुल्लक योगदानाबद्दल वाटाघाटी करू.
वाटाघाटी करणारे हे कोण आहेत, आणि कशाच्या वाटाघाटी करणार आहेत हे कळले तर बरे.
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
प्रचंड सहमत.
>>>>>>>>>>>>>>>>>
असे प्रतिसाद इथे(ही)राहतात हे पाहून आश्चर्य वाटले.कदाचित अशाप्रकारे मुद्दाम सुपारी देउन ब्राह्मणांचे जिनोसाइड(वांशिक हत्याकांड) करवण्यासाठी, त्यास समर्थन मिळवण्यासाठी काही व्यक्तींना ब्राह्मण दाखवून त्यांच्याकडून दर्पोक्ती करुन घ्यायची व त्याद्वारे इतरांना त्यांचा निर्वंश करण्यासाठी उचक्वायचे अशा मोठ्या गेम प्लॅनचा हा भाग असू शकतो. असे आयडी त्या नृशंस संघटनांची हस्तक वाटतात.
<<<<<<<<<<<<<<<<<<
१. ऐसी अक्षरेच्या धोरणांनुसार कुणालाही आपली राजकीय/सामाजिक संदर्भाततली मते मांडण्याचा अधिकार आहे. त्याच्याशी सहमत/असहमत होणे, त्याला विरोध करणे , कडकडीत निषेध नोंदवणे याचीही मोकळीक आहे.
२. "ब्राह्मणांच्या हत्याकांडा"ची कॉन्स्पिरसी थिअरी विनोदी वाटली. त्याच्याशी असहमती नोंदवतो.
देशपांडे यांना सुचवतो की त्यांचं लिखाण हे जातिवाचक लिखाणाचा एक अत्यंत वाईट नमुना आहे. आपल्या मतांचा त्यांनी पुनर्विचार करावा. जन्माधिष्ठित वर्चस्व, विशिष्ट जातींचं de facto वरचढ असणं वगैरे वगैरे मतं ही असमर्थनीय आणि बुरसटलेली आहेत. "ब्राह्मणांवर अन्याय होतो, त्यांना अकारण झोडपले जाते" या अर्थाचे प्रतिपादन हमो मराठे आणि इतरांनी केलेलं आहे त्या अंगाने त्यांना मांडायचे तर मांडावे. अन्यथा त्यांच्या मतांचा तीव्र निषेध मी नोंदवतो.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
देशपांडेंची विधाने
देशपांडेंची विधाने ब्रिगेडींना आयते कोलीत देण्यासारखी आहेत हे खरे आहे. पण आपण म्हणता तसा गेम प्लान असु शकत नाही असला तरी कालत्रयी यशस्वी होवू शकत नाही. आपल्या माहितीसाठी सांगतो कि मी, हरी नरके, भुपाल पटवर्धन, मधुकर रामटेके आणि शाम सातपुते यांनी मीळुन पुरुषोत्तम खेडेकरांवर त्यांच्या "शिवरायांच्या बदनामीची केंद्रे" या पुस्तकातेल ब्राह्मनांची कत्तल व ब्राह्मण स्त्रीयांबाबत वापरलेल्या अश्लील अशा विधानांबाब्त फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे. हा गुन्हा लवकरच सुनावणीस येईल. तसेच विधानसभेत त्यांच्याविरुद्ध हक्कभंगही दाखल झाला असुन त्यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे...मुख्य म्हणजे खेडेकरांनी हक्कभंग समितीसमोर माफी मागितल्याची माहिती मला मिळाली आहे.
दुसरे असे कि अतुल पेठेंनी गोपु लिखित सत्यशोधक या नाटकाचे दिग्दर्शन केले. याबाबत विजय कुंजीर या मनुष्याने अत्यंत जातीयवादी व घृणास्पद लेखन "अन्विक्षन व "परिवर्तनाचा वाटसरु" या नियतकालिकांत केले आहे (जुन १२) त्यांचा जाहीर निषेध आम्ही केला आहे व त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहोत. खालील लिंकवर याबाबतचा माझा प्रतिसाद उपलब्ध आहे.
http://sanjaysonawani.blogspot.in/2012/07/blog-post_16.html
राहिले देशपांडे यांचे. त्यांच्यासारखे जातीयवादी लोक कोणत्याही समाजाचे असोत, कलंकच असतात. त्यांच्यावर कसा गुन्हा दाखल करता येईल हे मी वकीलांशी बोलुन ठरवेल. धन्यवाद.
उत्तम लेख. खूप आवडला. अशा
उत्तम लेख. खूप आवडला. अशा ले़खान्ची सदैव प्रतीक्षा राहील.
The Article was too good!
Dear Mr. Sanjay Sonawani,
The Article written by you was too good as well as very much informative.
I hereby congratulate you for your said research on Aagri & Koli Community.
You are suggested not to bother about the comments appossing your thoughts, you keep writing, the whole Aagri & koli Community is with you!
And its for others that as a President of Aagri Koli Education Forum, Navi Mumbai, I hereby submit that I am glad to understand more about our History. Our thought was niether to detoriate other communities nor to dominate them but knowing more or exploring more about our community was never wrong and if some body uses wrong word against us that never being tolerated.
Finally thanks to aisiakshare for removing the opinion of Mr. Deshpande.
And least but not last that my self is Chartered Accounatant from Aagri Community and there are thousands of professionals available itself in Navi Mumbai like me ...........hence we are no more backward.....and we are trying to bring our community in more forward manner.
Thank you& Regards
Ca Nilesh D. Patil
Preseident : Aagri Koli Education Forum, Navi Mumbai.
काही शंका
माझे इंग्रजी अंमळ कच्चेच असल्यामुळे काही मुद्दे समजले नाहीत, म्हणून जिज्ञासेपोटी अत्यंत नम्रपणे काही शंका विचारत आहे.
apposs म्हणजे काय? मेरियम-वेब्स्टरच्या शब्दकोशात हा शब्द सापडला नाही.
its म्हणजे नेमके कशाचे?
detoriate म्हणजे काय? detoriate other communities हे नेमके कशा अर्थाने वापरले आहे?
niether या शब्दाचा अर्थ कळला नाही; तसेच, तो शब्दकोशातही सापडला नाही.
व्याकरण थोडे नावीन्यपूर्ण वाटले. अर्थात, माझे इंग्रजी अंमळ कच्चेच असल्यामुळे असू शकेल. हा प्रयोग नेमका काय आहे, हे शिकायला आवडेल. क्लासेसची चौकशी केली पाहिजे.
अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. least but not last बोले तो, "ही बाब महत्त्वाची नाही, परंतु हे सांगण्याची ही शेवटचीही वेळ असणार नाही (पक्षी: पुन्हापुन्हा सांगत राहणार आहे)", असे काही म्हटलेले आहे काय? "Last, but not the least" असा दुसरा एक शब्दप्रयोग ऐकला होता, त्यात आणि या शब्दप्रयोगात कमालीचे साधर्म्य वाटले.
Accounatant हाही शब्द शब्दकोशात सापडला नाही, त्यामुळे अर्थ समजण्यास थोडा कठीण जात आहे.
शक्य झाल्यास कृपया शंकानिरसन करावे. आगाऊ आभारी आहे. माझ्या इंग्रजीच्या अज्ञानाबद्दल क्षमस्व.
या प्रतिसादावर तीव्र आक्षेप आहे
'न'वी बाजू महोदय,
तुमचा सर्व प्रतिसाद आक्षेपार्ह आहेच. पण थोडक्यात उदाहरणादाखल पुढील ओळी अधोरेखीत करतो आहे
Accounatant हाही शब्द शब्दकोशात सापडला नाही,
मुद्दाम खाजवून काढलेले खरुज आहे हे. प्रतिसाद देणार्या प्रतिसादकर्त्याची भावना लक्षात न घेता तुम्ही हा अव्यापारेषु व्यापार करता आहात हे तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. प्रतिसाद देणार्याने पहिल्यांदाच येथे येऊन प्रतिसाद दिला आहे. व तो देखील त्यांना मराठी टंकन करता येत नसल्यामुळे इंग्रजीत दिला आहे.
मोठमोठ्या कंपन्यांच्या उच्चशिक्षित डायरेक्टरांच्या ईमेल मधे देखील अशा इंग्रजी टायपिंगच्या चुका मी पाहिलेल्या आहेत. तेव्हा आपण इंग्रजी अज्ञानाचा नावाखाली हा असला हिडीसपणा करता आहात त्यावर माझा तीव्र आक्षेप आहे.
मतांच्या अनुषंगाने चर्चा करायची असेल तर नक्की करा. पण असला उद्योग येथे करु नका. Accounatant हा शब्द अकाऊंटंट आहे हे शेंबडा पोरगा सुद्धा सांगू शकेल. कोणाच्या भावनेशी असा घाणेरडा खेळ करु नका एवढेच सांगतो.
बाकी ऐसी अक्षरेच्या संचालकांनी बघून घ्यावे की 'न'वी बाजू महोदयांचा हा प्रतिसाद धोरणात बसतो की नाही ते.
धन्यवाद!
॑धन्यवाद! सागर,
तु़झ्या म्याच्युअर्ड प्रतिक्रीएबद्द्ल!
Dear whoever u r, Thanks for
Dear whoever u r,
Thanks for correction in my english, I thought you understand the theme and message behind the same very well, thats why so desparate to correct it.
Another request to Aisiakshare that keep spellcheck option ON on your site that is advisable in todays competitive trend.
Furher whoever u r, if you understand the message and able to correct my grammer then please retype the same in your proper gramatical manner and publish it I will be highly pleased.
Thanks and regards
Ca Nilesh D. Patil
ऐसी अक्षरे हे संस्थळ
ऐसी अक्षरे हे संस्थळ प्रामुख्याने मराठी भाषेतून विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आहे. तेव्हा इथल्या संवादांसाठी शक्यतोवर (देवनागरी लिपीतून) मराठी भाषेचा वापर करावा ही विनंती.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तुमचे इंग्रजी अंमळ कच्चेच आहे
माझे इंग्रजी अंमळ कच्चेच असल्यामुळे काही मुद्दे समजले नाहीत, म्हणून जिज्ञासेपोटी अत्यंत नम्रपणे काही शंका विचारत आहे.
You are suggested not to bother about the comments appossing your thoughts...
apposs म्हणजे काय? मेरियम-वेब्स्टरच्या शब्दकोशात हा शब्द सापडला नाही.
- जर तुम्ही oppose किंवा oppossing ए॓वजी apposs शोधत बसाल तर तुमची 'न'वी ची बाजु बाजुलाच राहील आणि कधीच सापडणार नाही. समजुन घेण्यासारखी बाब होती. असु द्या ह्ळु हळु सुधरेल तुमचे इंग्रजी.
And its for others that as a President of...
its म्हणजे नेमके कशाचे?
- its म्ह्णजे it is. जशी याची इथे गरज नव्हती तशीच तुमच्या Doubt ची सुद्धा गरज नव्हती. समजुन घेण्यासारखी बाब होती. असु द्या ह्ळु हळु सुधरेल तुमचे इंग्रजी.
Our thought was niether to detoriate other communities...
detoriate म्हणजे काय? detoriate other communities हे नेमके कशा अर्थाने वापरले आहे?
niether या शब्दाचा अर्थ कळला नाही; तसेच, तो शब्दकोशातही सापडला नाही.
- [de·te·ri·o·rate] अथवा [dih-teer-ee-uh-reyt] = deteriorate म्ह्णजेच To disintegrate. कळाले का ? deteriorate other communities हे नेमके ह्या अर्थाने वापरले आहे कि कुणाचीही जातीला कमी लेखायचे नाही आहे. समजुन घेण्यासारखी बाब होती. असु द्या ह्ळु हळु सुधरेल तुमचे इंग्रजी.
...but knowing more or exploring more about our community was never wrong and if some body uses wrong word against us that never being tolerated.
व्याकरण थोडे नावीन्यपूर्ण वाटले. अर्थात, माझे इंग्रजी अंमळ कच्चेच असल्यामुळे असू शकेल. हा प्रयोग नेमका काय आहे, हे शिकायला आवडेल. क्लासेसची चौकशी केली पाहिजे.
- वाटले ना तुम्हाला नावीन्यपूर्ण पण खेद याचाच कि थोडेच वाटले. स्वाभिविक आहे तुमचे इंग्रजी अंमळ कच्चेच असल्यामुळे असू शकेल. शिकायचा प्रयत्न करुही नका, नाही जमणार तुम्हास आणि क्लासेसची चौकशीही पण नका करु, तुम्हास फीस परवडणार नाही. समजुन घेण्यासारखी बाब होती. तुम्हाला समजले नाही. असु द्या ह्ळु हळु सुधरेल तुमचे इंग्रजी.
And least but not last that my self is Chartered Accounatant...
अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. least but not last बोले तो, "ही बाब महत्त्वाची नाही, परंतु हे सांगण्याची ही शेवटचीही वेळ असणार नाही (पक्षी: पुन्हापुन्हा सांगत राहणार आहे)", असे काही म्हटलेले आहे काय? "Last, but not the least" असा दुसरा एक शब्दप्रयोग ऐकला होता, त्यात आणि या शब्दप्रयोगात कमालीचे साधर्म्य वाटले.
- नशिब माझे तुम्ही दुसरा शब्दप्रयोग तरी ऐकला आहे, not bad. एवढे ही इंग्रजी तुमचे कच्चे नाही असे मला वाटते. ह्ळु हळु सुधरेल तुमचे इंग्रजी. प्रयत्न करत राहा म्हणजे झाले.
Accounatant हाही शब्द शब्दकोशात सापडला नाही, त्यामुळे अर्थ समजण्यास थोडा कठीण जात आहे.
- थोडासा मेंदुवर जोर दिला असता तर सापडला असता. http://en.wikipedia.org/wiki/Accountant ह्या website वर शोधा म्ह्णजे सापडेल. जर तुम्हाला फक्त मेरियम-वेब्स्टरचीच शब्दकोश माहीत असेल http://www.merriam-webster.com/dictionary/accountant तर त्यावर ही सापडेल. काय राव ? समजुन घेण्यासारखी बाब होती. तुम्हाला समजले नाही. असु द्या ह्ळु हळु सुधरेल तुमचे इंग्रजी.
शक्य झाल्यास कृपया शंकानिरसन करावे. आगाऊ आभारी आहे. माझ्या इंग्रजीच्या अज्ञानाबद्दल क्षमस्व.
- वाईट वाटुन घेवु नका. तुम्हीच म्ह्णालात शक्य झाल्यास कृपया शंकानिरसन करावे. मी ते केले. आभाराची अशी काही गरज नाही. प्रयत्न करत राहा म्हणजे झाले. आणि हो अजुन एक गोष्ट विषयाला सोडुन बोलायचे शक्यतो टाळा म्ह्णजेच दुसर्याच्या कामात टांग आडवी आणु नका. समजुन घेण्यासारखी बाब होती परंतु तुम्हाला समजले नाही. असु द्या ह्ळु हळु सुधरेल तुमचे इंग्रजी. असे बोलुन मी इथे थांबतो. धन्यवाद.
कोळी
कोली समजाविषयी अधिक माहिती http://www.lokprabha.com/lokprabha/20120803/sanwar.htm इथे दिसली.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अप्रतिम लेख...
अप्रतिम लेख !
[आगरी समाजाचे भारतीय संस्कृतीवर फार मोठे उपकार आहेत.] मला असे वाटते कि आक्षेप फक्त उपकार या शब्दावर असावा, समाजावर नसावा. आगरी-कोळी समाजाने नेहमीच सगळ्याच समाजाची नेहमीच मदत केली आहे. परंतु इतर [So called] उच्चभ्रु समाजाने याची कधी दखल नाही घेतली आणि कोणी याची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केल्यावर किती हे आक्षेप. इतिहासाबद्द्द्ल कोणी अधिक माहिती पुरवणार असेल त्याने इथे पुरवावी अन्यथा यावर विश्वास ठेवावा नाहीतर लेख वाचुन चुपचाप बसावे. कोणी आगरी-का-कोळी समाजाचे विशेष योगदान मीठक्षेत्रात मला दिसत नाही असे म्हणत असेल तर त्याने तसे सांगावे कि त्याना कोणाचे योगदान मीठक्षेत्रात दिसते. उगाचच विरोध करण्यात या लोकांना काय मज्जा येते, हे प्रतिसादामधुन दिसतच आहे. मला इथे विशेषकरुन नमुद करावेसे वाटते कि नव्या मुबंईतील शेतक-याने आपल्या जमिनी सरकारला कवडी-मोलाने दिल्या कारण त्यांच्या मध्ये त्यागाची भावना होती, उपकाराची नव्हे. शेतक-यांमध्ये शिक्षणाचा अभाव होता परंतु देशाबद्द्द्ल अथक प्रेम होते. मागितले नाही तर काही मिळत नाही हा अनुभव आहे म्ह्णुन हा हक्क सांगणे गरजेजे आहे. विश्वास ठेवा नाहीतर नका परंतु तुम्हासारखे असेल ही, कदाचीत, असे काही बोलणार नाही. पुर्ण खात्रीनिशीच बोलेन कि "मीठाचा शोध" हा आगरी समाजानेच लावला आहे आणि जर तुम्ही त्यांचे मीठ खाल्ले आहे तर त्याला जागा.