भांडवलशाही हीच एक मोठी समस्या

01 पृथ्वीच्या अस्तित्वाच्या मुळावरच घाव घालणारी भांडवलशाही – मग ती कार्पोरेट भांडवलशाही असो की ग्राहक (consumer) भांडवलशाही की, क्रोनी कॅपिटॅलिझम, वा social, liberal , market economy इत्यादीपैकी कुठलीही असो,- हीच एक फार मोठी समस्या आहे. भांडवलशाहीला जोडलेल्या या विशेषणांना दोष न देता मूळ नामपदाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे त्यामुळे सयुक्तिक ठरू शकेल. भांडवलशाहीतील पाठभेदांकडे बोट न दाखवता मूळ व्यवस्थाच आपल्या पृथ्वीला गिळंकृत करण्याच्या मार्गावर आहे याबद्दल अजिबात शंका नाही. आपल्याकडे या व्यवस्थेला दुसरा पर्यायच नाही किंवा इतर पर्यायांचा विचारच करायचे नाही असे म्हणत गप्प बसणे हेसुद्धा आत्मवंचनाच ठरू शकेल.

खरे पाहता आता साठ-सत्तरीच्या वयोगटात असलेल्या पिढीने आपल्या तारुण्यात या पृथ्वीला भांडवलशाही व्यवस्थेस जुंपवून फळे चाखल्यामुळे आता या व्यवस्थेला नाव ठेवण्याचा अधिकारही ही पिढी गमावून बसली आहे. कारण ही पिढी भांडवलशाहीवर पोसलेली पिढी होती व त्या पिढीने मागचे पुढचे विचार न करता नैसर्गिक स्रोत उध्वस्त करत, निसर्गाला ओरबडत या पृथ्वीला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवली आहे. आताच्या विनाशाचे मूळ भांडवली व्यवस्थेने जन्माला घातलेल्या चंगळवादातच सापडत असल्यामुळे आताच्या पिढीला पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आणावेसे वाटत असल्यास त्यात काही वावगे नाही. ‘आधुनिक हवामानशास्त्राचे पितामह’ डॉ. जेम्स हॅन्सेन यांची नात सोफी किव्हलीहॅन हिने खेळण्या-बागडण्याच्या वयात कर्ब उत्सर्जन आणि तापमानवाढ यांचा जीवसृष्टीवर होत असलेला परिणाम या आजोबानी सुरु केलेल्या संघर्षात उडी घेतली. तिने आणि केल्सी कॅस्कॅडिया रोज ज्युलियाना या 16 वर्षांच्या मुलीने 8 ते 11 वयोगटातील मित्र-मैत्रिणींना साथीला घेऊन ‘हवामान बदलाच्या’ मुद्द्यावर त्यांच्याच अमेरिकी सरकारला न्यायालयात खेचले! पालकांच्या पिढीला अजिबात सुचली नाही अशी धडाडी बालकांनी दाखवली. TIME साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर झळकलेली, स्वीडनमधील नवव्या इयत्तेतील मुलगी ग्रेटा थनबर्ग ही हवामानबदलाच्या बातम्या ऐकून वयाच्या आठव्या वर्षी तिने तेथील सरकारच्या विरोधात संघर्ष करू लागली. ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत 120 राष्ट्रांतील 15 लाख विद्यार्थ्यांनी ‘हवामानबदल रोखण्यासाठी राजकीय नेत्यांनी कृती करावी’ हे बजावण्यासाठी शाळा बंद पाडल्या. दिल्लीत 700, तर हैदराबादेत 400 मुले ‘श्वास स्वच्छ हवा’ म्हणत होते. मुंबई, भावनगर, उदयपूर येथील मुलेदेखील पर्यावरणरक्षणाच्या मागणीसाठी सरसावली होती. जगभरातील मुले निराशा, संताप व भीती व्यक्त करीत होती. या पहिल्या जागतिक हवामान आंदोलनाने जग हादरून गेले आणि बालकांच्या उत्साहाला उधाण आले. जगातील समस्त प्रसारमाध्यमांनी या पर्यावरण योद्धय़ांचे भरभरून कौतुक केले. ‘द गार्डियन’ने यास ‘ऐतिहासिक सविनय कायदेभंग चळवळ’ संबोधले.

02भांडवलशाही अपयशी होत आहे असे (पश्चातबुद्धीने) 21व्या शतकात म्हणणे म्हणजे 19व्या शतकातील काही जाणकारांनी परमेश्वराचा मृत्यु झाला आहे असे म्हटल्यासारखे वाटेल. 19व्या शतकात परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी थोडा जरी संशय व्यक्त केला तरी तुम्हाला पाखंडी ठरवून समाजातून हद्दपार केले जात होते. तशीच अवस्था भांडवलशाहीविरुद्ध एक चकार शब्द उच्चारणाऱ्यांची होईल की काय असे वाटत आहे. कारण आज जगभरातील सर्व देश अगदी मुकाट्याने भांडवलशाहीचा – त्यातल्या त्यात मुक्त बाजारपेठ व्यवस्थेचा – स्वीकार केला आहे. चीन, रशिया सारखे एके काळी साम्यवादी असलेले राष्ट्रे आता उघड उघड भांडवलशाहीचा अंगीकार करत आहेत व त्यात त्यांना अजिबात कमीपणा वाटत नाही. त्यामुळे मानवी वंशाच्या अस्तित्वासाठी भांडवली व्यवस्थेला पर्याय नाही असेच वाटत आले आहे. परंतु जगभरातील मूठभर लोकांच्या हट्टापायी बहुतांश लोकांचे आबाळ होत आहे हे स्पष्टपणे दिसत असूनसुद्धा भांडवलशाहीचे गोडवे गायले जात आहेत. परंतु निसर्गाचा ऱ्हास होत आहे, हवामान बदलामुळे निसर्गचक्र बदलत आहे, नैसर्गिक संसाधनं नष्ट होत आहेत, याकडे डोळेझाक करणे शक्य नाही. त्यामुळे पृथ्वीला वेठीस धरण्याला भांडवलशाहीच कारणीभूत होत आहे असे म्हणावे लागत आहे. भांडवलशाही अपयशी होत आहे हेच खरे असेल तर एक नवीन संपूर्णपणे वेगळी असलेल्या व्यवस्थेचा विचार करण्याची आता अत्यंत गरजेचे आहे.

भांडवलशाहीचे यशापयश त्याच्यातील दोन अंगभूत घटकात दडलेले आहे. त्यातील पहिला घटक म्हणजे ते देत असलेले शाश्वत वाढीचे आश्वासन. भांडवल वृद्धीसाठी जास्तीत जास्त नफेखोरी करायचे व त्यातून आर्थिक वाढ करत रहायचे हा भांडवलशाहीचा मूळ पाया आहे. वाढ नसल्यास भांडवलशाही कोसळून पडेल. त्यामुळे या अखंड वाढीची भूक, मर्यादित प्रमाणात नैसर्गिक स्रोत असलेल्या पृथ्वीला (व/वा अवकाशाला) पर्यावरणीय संकटात ढकलून देत आहे. भांडवलशाहीच्या दृष्टीने ही पृथ्वी म्हणजे कच्चा/पक्का व्यापारी माल पुरवणारे जणू एक अक्षयपात्रच आहे. अलीकडील भांडवली व्यवस्थेचे पुरस्कर्ते नैसर्गिक स्रोतांच्या मर्यादा लक्षात घेत जणू या पृथ्वीवर उपकार केल्यासारखे वस्तूंच्याऐवजी सेवाक्षेत्रातून आर्थिक वाढ करण्याची हमी देत आहेत. परंतु विसाव्या शतकात काही प्रमाणात केवळ सेवाक्षेत्रातून आर्थिक वाढ झाली असली तरी एकविसाव्या शतकातील सेवाक्षेत्रही मुबलक प्रमाणात नैसर्गिक स्रोतांची तोडफोड करत वाढीमुळे काही धोका नाही असा आभास निर्माण करत आहे. 20व्या शतकाच्या अखेरच्या काही दशकात आर्थिक वाढीचे प्रमाण व नैसर्गिक संसाधनांच्या वापराचे प्रमाण जवळ जवळ सारखे होते. परंतु 21 व्या शतकात नैसर्गिक स्रोतांचा अती वापर होत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन पूर्णपणे बिघडलेले आहे. नैसर्गिक स्रोतांना हात न लावता त्यांचे संरक्षण व/वा संवर्धन करत आर्थिक वाढ होऊ शकते हे मृगजळच ठरत आहे. भांडवली व्यवस्थेचे स्वप्नसदृश हरित वाढ (Green Growth) हे भ्रमच राहिले आहे.

अजून एक घटक म्हणजे निसर्गाला गृहित धरण्याची भांडवलशाहीची वृत्ती. शाश्वत वाढीला आसुसलेली भांडवली व्यवस्था प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे निसर्गाला नेहमीच कस्पटासमान मानत आले आहे. निसर्गाला ही व्यवस्था दोन झोनमध्ये विभागून टाकली आहे. वाटेल तसे व/वा वाटेल तितके कच्चा/पक्का माल ओरबडण्यासाठी एक झोन आणि व्यापारी वस्तुनिर्मितीतून साठलेल्या/बाहेर पडलेल्या कचऱ्याची विल्हेवाट करत राहण्यासाठी दुसरा झोन. आणि हे दोन्ही झोन एकमेकात केव्हा सरमिसळ होतात याची कल्पनासुद्धा सामान्यांना येत नाही. ही भांडवली व्यवस्था अशा प्रकारच्या बाह्य परिघाशिवाय तग धरू शकत नाही. यासाठी कुठलीही किंमत स्वतःहून देण्याची तयारी या व्यवस्थेत नसते.

भांडवलशाही व्यवस्थेस अपेक्षित असलेली आर्थिक सूज आख्या पृथ्वीचा बळी घेत आहे. पृथ्वीच्या खोल पोटात शिरून त्याचा विध्वंस करत आहे. पृष्ठभागावरील अरण्य, पशू-पक्षी, पाण्याचे स्रोत, नद्या-नाले, समुद्र व समुद्राच्या तळापर्यंत असलेले जीव व वनस्पतींचा नाश करत आहे. ही भांडवलशाही पुनर्भरणाचा अजिबात विचार न करता व्यवस्था राबवत आहे. फारच आरडा-ओरडा केल्यास काही तरी जुजबी उपाय करून ओरडणाऱ्यांचे तोंड बंद करत आहे.
आपल्यातील बहुसंख्यांना ही प्रळयसदृश स्थितीचा अंदाजच आला नाही. कुठल्याही युद्ध, आर्थिक मंदी, दुष्काळ, वा घातक साथीचे रोग यांच्यापेक्षाही आताची स्थिती फारच वाईट आहे. या पूर्वीचे अनेक समाज अशा चारी प्रकारच्या संकटातून कसेबसे बाहेर पडून पुन्हा एकदा समाजाची उभारणी करत आले आहेत. परंतु आता आपल्या पायाखालील माती, विपुल प्रमाणात असलेले जीवावरण, रहिवासयोग्य हवामान यांनाच व्यवस्था गिळंकृत करू पाहत आहे. आपल्या जीवनाधारांनाच ही व्यवस्था नष्ट करू पाहत आहे.

पैशाने नैसर्गिक संसाधनासकट सर्व काही विकत घेता येते व तसे करणे हा माणसाचा मूळ हक्क आहे ही समज दृढ करण्यात भांडवलशाही यशस्वी झाली आहे. या समजुतीमुळे पुनरुत्पादन करता येणे अशक्य अशा नैसर्गिक संपत्तीच्या मालकी हक्कासाठी चढाओढ व त्यातून इतरांचे हक्क संकुचित करण्यासाठी प्रचंड प्रमाणात दबाव आणला जात आहे. व प्रसंगी यासाठी हिंसेचाही अवलंबन केला जात आहे. या (गैर) समजुतीमुळे आर्थिक वाढीसाठी उघडपणे अवकाश व काळ यांची लूटमार करत इतरांच्या जिवंत राहण्याच्या हक्कावरच गदा आणला जात आहे. कदाचित यामुळेच आर्थिक सत्तेचे राजकीय सत्तेत रूपांतरित होत असून मानवी जीवनास अत्यावश्यक असणाऱ्या संसाधनावर या सत्ता नियंत्रण ठेवत असून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या, मानवी जीवन व्यवहारात व सामाजिक सलोख्यात ढवळाढवळ करत आहेत. भांडवलशाहीला सहानुभूती दर्शविणारे नेहमीच संपत्ती निर्माण करणे ही चांगली भांडवलशाही आणि संपत्ती हिसकावणे (ओरबडणे) ही वाईट भांडवलशाही असे भांडवलशाहीचे भलावण करत असतात. परंतु पर्यावरणीय दृष्टिकोनातून बघितल्यास संपत्तीची निर्मिती ही नेहमीच संपत्तीच्या ओरबडण्यातूनच होत असते. आणि ही आर्थिक वाढ आताच्या सजीवसृष्टीच्या व यानंतरच्या पिढ्यांच्या नैसर्गिक संसाधनांचा बेसुमार वापरातून होत असते, हे सोईस्करपणे विसरले जात असते.

03अशा प्रकारे भांडवलशाहीचे दोष दाखविल्यास भांडवलशाहीमुळेच लाखो-करोडो लोकांची गरीबी नष्ट झाली व तुम्ही आता पुन्हा एकदा जगाला दारिद्र्याच्या खाईत लोटत आहात हे पालुपद आळविले जाते. भांडवली व्यवस्थेतील आर्थिक वाढ काही लोकांच्या आयुष्यातील दारिद्र्य दूर करण्यात यशस्वी झाली हे खरे असले तरी त्याच वेळी अनेकांची संपत्ती ओरबडून घेत, त्यांची जमीन, श्रम व संसाधन हिसकावून घेत इतरांचे भले करण्यात आले हेही विसरता येत नाही. श्रीमंत देशातील संपत्ती सक्तीच्या गुलामगिरीच्या जोरातून व वसाहती देशातील संपत्तीची लुटालूट करून आली आहे, हेही तितकेच खरे. कोळसा खाणी व तेल या जीवाश्म इंधनाप्रमाणे भांडवलशाहीमुळे फायदा झाला हे नाकारता येत नाही. ज्या प्रमाणे या प्रदूषणात भर टाकणाऱ्या ऊर्जा श्रोतांना पर्याय शोधण्याचा प्रयत्न चालू आहे तसेच भांडवलशाहीपेक्षा वेगळी व मानववंशाला तगून ठेऊ शकणारी व त्याचे कमीत कमी नुकसान करणारी पर्यायी व्यवस्थेची आता अत्यंत गरज आहे.

आता आपल्याला मागे फिरता येणार नाही. भांडवलशाहीला पर्याय म्हणून सरंजामशाही (राजेशाही) वा ऱशियाने राबवलेल्या साम्यवादाची चेष्टा करणारी एकाधिकारशाही (state dictatorship) यांचा विचार करता येणार नाही. रशियाचा साम्यवाद एका अर्थी भांडवलशाहीचे अदृश्य स्वरूपच होते. या दोन्ही पर्यायांचासुद्धा फक्त आर्थिक वाढीवरच भर होता. या वाढीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कुठल्याही प्रकारची टोकाची भूमिका घेण्यास त्या सदैव तयार होते. उद्दिष्टपूर्तीसाठी कुठल्याही थराला जाण्याची त्यांची तयारी होती. त्यासाठी सामान्य जनतेला वेठीस धरून अमानुष वागणूक देण्यातही त्यांना काही गैर वाटत नव्हते. त्यांना स्वतःच्या कर्तृमकतृत्वावर भलताच आत्मविश्वास होता. व त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची त्यांची तयारी होती.

भांडवलशाही व्यवस्थेला पर्याय शोधताना केवळ आर्थिक वृद्धीतूनच माणूस सुखी होईल या फाजिल आत्मविश्वासाच्या अवस्थेतून बाहेर पडायला हवे. अनेक विचारवंतानी भविष्यातील धोका ओळखून काही पर्याय सुचविलेले आहेत. मानवाच्या शाश्वत विकासासाठी आर्थिक वाढीचे निकष गैरलागू आहे, असे बहुतेक तज्ञांचे मत आहे. प्रत्येक पिढीला नैसर्गिक संपत्तीचा उपभोग घेण्याचे समान हक्क आहेत याची जाणीव ठेवूनच ध्येय-धोरणं ठरवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मानवी समाजाचा पाया पर्यावरण संतुलनावर रचल्यास आपले बहुतेक प्रश्न सुटू शकतील असे अनेक विचारवंतांना वाटत आहे. आपल्याला आता या विचारवंतांच्या सूचनांच्या आधारे एक सर्वसमावेशक पर्याय शोधायचे आहे. आपल्याला यानंतर फक्त आर्थिक वाढीचाच विचार करून चालणार नाही. आर्थिक, पर्यावरणीय, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, व व्यावहारिक अशा विविध क्षेत्रातील विचारवंताना एकत्र आणून एका नवीन व्यवस्थेत समाज निर्मिती करायचे आहे. व ही व्यवस्था निसर्गाला धक्का न पोचवता आपल्या सर्व गरजा भागवू शकेल.यावर भर देणे गरजेचे ठरणार आहे.

भांडवलशाहीवर विसंबून आपले जीवन मृत्युच्या खाईत लोटायचे की माणसासकट निसर्ग जिवंत राहण्यासाठी भांडवलशाहीला पूर्ण विराम द्यायचे यापैकी एकाची निवड करणे हे आपल्यासमोरील ज्वलंत प्रश्न आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सर्व दोष भांडवलशाहीला का देतात?

>> चीन, रशिया सारखे एके काळी साम्यवादी असलेले राष्ट्रे आता उघड उघड भांडवलशाहीचा अंगीकार करत आहेत व त्यात त्यांना अजिबात कमीपणा वाटत नाही. त्यामुळे मानवी वंशाच्या अस्तित्वासाठी भांडवली व्यवस्थेला पर्याय नाही असेच वाटत आले आहे. परंतु जगभरातील मूठभर लोकांच्या हट्टापायी बहुतांश लोकांचे आबाळ होत आहे हे स्पष्टपणे दिसत असूनसुद्धा भांडवलशाहीचे गोडवे गायले जात आहेत. परंतु निसर्गाचा ऱ्हास होत आहे, हवामान बदलामुळे निसर्गचक्र बदलत आहे, नैसर्गिक संसाधनं नष्ट होत आहेत, याकडे डोळेझाक करणे शक्य नाही. त्यामुळे पृथ्वीला वेठीस धरण्याला भांडवलशाहीच कारणीभूत होत आहे असे म्हणावे लागत आहे. भांडवलशाही अपयशी होत आहे हेच खरे असेल तर एक नवीन संपूर्णपणे वेगळी असलेल्या व्यवस्थेचा विचार करण्याची आता अत्यंत गरजेचे आहे. >>

यास केवळ हीच कारण आहे हे काही पटत नाही. लोकांच्या आवडी बदलल्या, हाव वाढली. जिथे मी जन्मलो तिथेच मिळेल ते चार घास खाऊन जगेन असं कुणी म्हणतो का?
कित्येक लोक पूर्वी 'स्टेपल फुड एके स्टेपल फुड' महिनोंमहिने खाऊन राहायचे. तसे कुणी राहात नाही.
काही पटलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांडवलशाहीतून पुढे आलेला चंगळवाद आणि सतत वाढ होण्यासाठी लढवल्या जाणाऱ्या मार्केटिंग स्कीम्स ह्या सगळ्यांबद्दल माझं मत अजिबात बरं नाही.

मात्र भांडवलशाही नसती तर मूठभर उच्चवर्णीय, पुरुषांच्या हातातच सत्ता राहिली असती. नफ्यासाठी का होईना, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सधन ग्राहकवर्गाची गरज आहे; ती भागवण्यासाठी म्हणून बायकांचं - अर्ध्या लोकसंख्येचं - आयुष्य सुखाचं झालं आहे. खालच्या जातीतल्या लोकांना मानानं जगण्याच्या संधी नफ्याच्या गाजराशिवाय मिळणं अशक्य होतं. नफा आणि आपली सार्वजनिक प्रतिमा जपण्यासाठी भांडवलदार सामाजिक सलोखा, विविधतेत एकता वगैरे गोष्टी करतात; सरंजामशाहीत ह्या गोष्टी घडणं साफ अशक्य होतं. अनेक चळवळी, लोकांमधला असंतोष ह्यांकडे गरजेनुसार दुर्लक्ष आणि वेळेला असंतुष्टांना चुचकारण्याचं धोरणही भांडवलशाहीत अवलंबावं लागतं. कारण युद्धामुळे शस्त्रास्त्रं सोडून बाकीचे सगळे व्यापार मंदावतात.

ह्याच भांडवलशाहीत सौरऊर्जा, पवनचक्क्या वगैरे तयार होतात; आंतरजाल तयार होतं. तुमचा राग भांडवलशाहीवर आहे, का चंगळवाद आणि दूरगामी परिणामांचा सारासार विचार न करता घेतलेल्या निर्णयांवर आहे?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख वाचताना अगदी असेच विचार आले होते डोक्यात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

माझ्या मते असे काही केल्यास आपल्याला सुवर्णमध्य साधता येईलः
मानवी समाजाचा पाया पर्यावरण संतुलनावर रचल्यास आपले बहुतेक प्रश्न सुटू शकतील असे अनेक विचारवंतांना वाटत आहे. आपल्याला आता या विचारवंतांच्या सूचनांच्या आधारे एक सर्वसमावेशक पर्याय शोधायचे आहे. आपल्याला यानंतर फक्त आर्थिक वाढीचाच विचार करून चालणार नाही. आर्थिक, पर्यावरणीय, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, व व्यावहारिक अशा विविध क्षेत्रातील विचारवंताना एकत्र आणून एका नवीन व्यवस्थेत समाज निर्मिती करायचे आहे. व ही व्यवस्था निसर्गाला धक्का न पोचवता आपल्या सर्व गरजा भागवू शकेल.यावर भर देणे गरजेचे ठरणार आहे<<

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विचारवंतांनी विचार करून काही रचना तयार करणं, ही लोकशाही ठरत नाही ना...

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जर विचारवंत व त्या त्या क्षेत्रातील तज्ञ आपल्या समोरील पर्यावरणविषयक समस्यावर काही ठोस उपाय सुचवत असतील व लोकानी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना ते पटत असल्यास त्याची अंमलबजावणी करण्यात अडचण नसावी व कदाचित ते लोकशाहीला अनुसरून असेल, असे मला वाटते. (गेल्या 70 वर्षात आपण असेच प्रयोग करत आलेलो आहोत. नियंत्रित भांडवलशाही ते खाजाउ असाच आपला राजकीय प्रवास होता. लोक प्रतिनिधींना वाटले म्हणून ही धोरणं राबवली गेली.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या विचारवंतांविरोधात किती असंतोष आहे, हे समाजमाध्यमांवर दिसत नाही का? लोक किती हौशीनं अंधश्रद्धा आणि बनावट बातम्या पुढे ढकलतात! हे लोक शिकलेले लोक म्हणतात म्हणून त्यांचं ऐकतील, असं समजण्याचे दिवस संपले, असं वाटत नाही का? तुम्ही किती शिकला आहात, ह्यापेक्षा तुमचं फॅनफॉलोइंग, लोकप्रियता किती हे महत्त्वाचं. ते जर शिकलेल्या लोकांना समजलं नाही, तर त्यांना मुळात सध्या लोकशाही कशी चालत्ये हे समजलेलं नाही, असं म्हणावं लागेल.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद!
100 % बरोबर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खाजगी विरुद्ध सार्वजनिक मालकी हा विचार एका वेगळ्या कारणासाठी येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणूस हीच एक मोठी समस्या आहे हो... भांडवलशाही वगैरे सगळं खूप नंतर येतं.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी भांडवलशाहीचा समर्थक आहे. चांगल्या पॉलिसि निर्माण करून त्या तितक्याच कुशलपणे राबवल्यातर माणसाच्या हावरटपणाला कुठेतरी कुंपण घालता येईल असे मला वाटते.

माणूस हीच एक मोठी समस्या आहे हो

हरारींचे सॅपिअन वाचायला घेतलय. पाच भागांपैकी २ भाग वाचून झालेत. माझ्या काही समजूतींना हे पुस्तक छेद देत आहे. जसे कृषीक्रांतीमुळे खूप चांगलेच झाले असावे अशी माझी समज होती आणि अजूनही आहे. पण हे पुस्तक माझी समज चुकीची आहे असे सांगते आहे. मी अजूनही डिनायल मोड मध्ये आहे. या पुस्तकामुळे "माणूस हीच एक मोठी समस्या आहे" (इतर सजीवांसाठी तर ती नक्कीच आहे) याची खात्री पटत चालली आहे. बघू पूर्ण वाचून झाल्यावर काय मत बनते ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हावरे आणि स्वार्थी दोन पायांचे नालायक हलकट प्राणीच. कधीकधी पुळका येऊन आमच्याकडे चार दाणे, हाडकं, फेकतात आणि पावपाव असेही ओरडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0