राजकारण

समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने - १ : प्रस्तावना आणि भूमिका

(सदर लेखाची प्रेरणा ज्या व्याख्यानामुळे मिळाली ते व्याख्यान 'श्रावण मोडक' यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आले होते. श्रावण ऐसीअक्षरेचा सदस्य होता नि इथल्या अनेकांचा मित्रही. समाजवादी विचारांची प्राथमिक ओळख त्याच्यामुळेच झाली. तेव्हा ही लेखमालिका त्याच्यासाठी.)

भूमिका:

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

अमोघ वक्तृत्वशैलीचा बहर

पंचावन्न किंवा साठ वर्षांपूर्वीची एक स्पष्ट आठवण मला अजूनही आहे. मी त्या वेळेस एक शाळकरी मुलगा होतो. एका रविवारच्या दुपारी माझे एक मामा टापटिपीचे कपडे करून कोठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीत मला दिसले होते. हे माझे मामा चाकरमानी असल्याने रविवार म्हणजे आपला हक्काचा सुट्टीचा दिवस असे बहुसंख्य चाकरमान्यांप्रमाणे मानत आणि रविवारची दुपार सर्वसाधारणपणे लोळण्यात आणि वृत्तपत्र वाचनात घालवत असत. साहजिकच मला आश्चर्य वाटले व मी मामाकडे तो आज रविवार दुपारचा कसा काय आणि बाहेर कोठे चालला आहे? अशी पृच्छा केली. त्याने मला आपण एका मीटिंगला चाललो आहोत एवढेच सांगितले. मला फारसे काही कळले नाही व मी गप्प राहिलो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

फलज्योतिषावर आधारलेल्या राजकीय भाकितांचे भवितव्य !

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष आणि ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी ४ एप्रिल २०१४ रोजी एक पत्रकार परिषद बोलवून देशातील 'मतसंग्रामा'ची बित्तंबातमीचे भाकीत वर्तविले होते. मंडळाच्या कार्याध्यक्ष मालती शर्मा, आनंदकुमार कुलकर्णी, प्रवीणचंद्र मुळे, मेघश्याम पाठक, अरुंधती पोतदार, शांता केकरे, वर्षा नागनाथ आदी या वेळी उपस्थित होते.

नंदकिशोर जकातदार यांनी देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणार्‍या भारतातील सुमारे चार हजार पत्रिकांचा अभ्यास करून वर्तविलेले भाकित व प्रत्यक्षनिवडणुकीचे निकाल व त्यावरून काढलेले निष्कर्ष खाली दिलेले आहेत.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

तेलंगण

तेलंगणचा प्रश्नाने सध्याच्या सरकारसाठी एका चिघळलेल्या गळूचं स्वरूप धारण केलं आहे. मुळात भारतीय संघराज्य संरचनेत, स्वतंत्र राज्यांसाठी इतका टोकाचा संघर्ष करण्याची गरज पडू नये अशी लवचीकता आहे. पण तरीही हा प्रश्न चिघळतच गेला आहे. याला काँग्रेसचे सद्य सरकारच जबाबदार आहे हा निष्कर्ष आततायी ठरावा. मुळात हा प्रश्न नवा नाही किंवा "तेलंगण हे स्वतंत्र राज्य असावे का?" यावरील उहापोहही स्वतंत्र भारताला नवीन नाही. हैदराबाद संस्थान भारतात समाविष्ट केल्यापासून हा प्रश्न अस्तित्वात आहे. अर्थातच, हैदराबादच्या विलिनीकरणाच्याही आधी किंबहुना भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळापासून या प्रांताचा इतिहास आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

जपानी नेत्रपल्लवी

गेले काही महिने/वर्ष भारत आणि जपानमध्ये कमालीची जवळीक आलेली 'दिसते' आहे. श्री सिंग यांची जपान यात्रा झाल्यानंतर गेल्याच महिन्यात जपानच्या महाराजा व राणीने केलेली भारतवारी अनेकांच्या भुवया उंचावून गेली. एकूणच जपानी वर्तुळांत त्यांच्या राजाची भेट ही केवळ मित्र राष्ट्रांना - ती ही अतिशय क्वचित- ऑफर केली जाते. त्या लगोलग २६ जानेवारीच्या सोहळ्यात जपानी पंतप्रधानांना मिळालेले आमंत्रण भारताकडून उचललेले 'परतफेडीचे' पाऊल आहे असे वाटत असतानाच ही बातमी येऊन थडकली.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

संसद: हिवाळी अधिवेशन २०१३

याआधी:
२०१२: मान्सून सत्र | हिवाळी अधिवेशन
२०१३: बजेट सत्रः पूर्वार्ध | बजेट सत्रः उत्तरार्ध | मान्सून सत्र

२०१३ चे हिवाळी अधिवेशन येत्या गुरूवारी ५ डिसेंबर रोजी सुरू होत आहे व ते २० डिसेंबर रोजी संपणे प्रस्तावित अहे. या सत्रात मांडली जाण्याची शक्यता असलेली काही महत्त्वपूर्ण विधेयके अशी आहेतः
-- तेलंगाणा निर्मिती विधेयक.

भारत-पाक १९६५ युद्ध....त्रोटक आणि विस्कळित माहिती

१९६५ चे भारत पाक युद्ध सुरु कसे झाले?

पार्श्वभूमी:-
१९६०चे दशक एक वेगळेच समीकरण जागतिक राजकिय पटलावर मांडत होते. शीतयुद्धाला रंग चढत होता. NATO च्या छत्राखाली अमेरीकन समर्थक देश व कम्युनिस्टांच्या लेबलखाली तत्कालीन USSR म्हणजे रशियाचे समर्थक अशी कधी छुपी तर कधी उघड स्पर्धा सुरु होती. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळताच अमेरिकेने स्वतः मैत्रीचा हात पुढे करत भारतात अमेरिकन तळ मागावायचा प्रयत्न केला. भारताने तो फेटाळुन लावल्यावर राजकिय दृष्टीने अमेरिकेच्या मनात भारताविषयी अढी निर्माण झाली ती पुढे कित्येक दशके वाढतच गेली. इतरही कारणे त्यास होतीच.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

संसद: मान्सून सत्र २०१३

ऐसीअक्षरे वर आपण २०१२च्या मान्सून सत्रापासून सुरवात करत २०१२ चे हिवाळी अधिवेशन२०१३ च्या बजेट अधिवेशनाशी संबंधित दैनैदिन कामकाज - काय प्रस्तावित होते, प्रत्यक्षात काय झाले - याचे वार्तांकन इथे वाचले व त्यावर चर्चाही केली. या उपक्रमाला येत्या मान्सून सत्राच्या निमित्ताने एक वर्ष पूर्ण होत आहे याचा आनंद आहे.

पाने

Subscribe to RSS - राजकारण