महाराष्ट्राच्या ९ आणि १० इयत्तांच्या इतिहासाच्या पुस्तकांचे नवीकरण झाले आणि नव्या इतिहासातून मुघल साम्राज्य, तत्पूर्वीचे रझिया सुलताना, तुघलक, इत्यादि सुलतान, 'रुपये आणे' सुरू करणारा शेरशहा सूर, तसेच राजपूत इतिहास इत्यादि वगळण्यात आले आणि सर्व भर केवळ मराठी राज्यावर देण्यात आला आहे अशा बातम्या आल्याला आता जवळजवळ महिना झाला. (मुस्लिमपूर्व इतिहासाचे काय झाले आहे हे कळले नाही.)
असे असूनहि पुरोगामी विचाराच्या 'ऐसी अक्षरे' नावाच्या बालेकिल्ल्यात त्याच्याविषयी एक शब्दहि उमटलेला नसावा असे वाटते. हे आश्चर्य व्यक्त करावे असे वाटले म्हणून हा धागा उघडला आहे.