Skip to main content

ही बातमी समजली का? - ८२

Andhra Pradesh offers beggars Rs 5,000 to stay away from river festival

RAJAHMUNDRY: The Andhra Pradesh government has come up with a novel scheme to keep beggars away from the crowded ghats where Godavari Pushkaralu is now being held — they've been told to take home Rs 5,000 as compensation for loss of income and steer clear of the once-in-144-year event.

The administration announced the scheme along with the promise of free food on condition that the beggars keep off the Mahakumbh of the south till July 25. But, a new problem confronts the Godavari Pushkaram Organising Committee (GPOC): hordes of people, and not all of them beggars, are queuing up for reparation.

According to rules of the government initiative, only beggars without ration cards and access to welfare schemes like the NTR Bharosa pension scheme are eligible to the largesse.

पिवळा डांबिस Thu, 23/07/2015 - 10:36

सरसंघचालकही मांसाहार करत होते...
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5607648801701532843&S…ताज्या बातम्या&NewsDate=20150723&Provider=- वृत्तसंस्था&NewsTitle=सरसंघचालकही मांसाहार करत होते - देवधर

आता जे आजवर आंजावर आम्हांला मांसाहार करू नका म्हणुन उपदेश करत होते त्यांचा तर बया बाजारच उठला म्हणा की!!!! :)
"बाहेर पोळी अन् घरात नळी!!!!
गं गं ग, ग ग ग ग, ग!!!"
बरं झालं हे प्रकाशित झालं ते!!!!

गब्बर सिंग Thu, 23/07/2015 - 11:55

radical Islam, David Cameron etc etc

On Monday, Prime Minister David Cameron delivered a remarkable speech in Birmingham outlining a stepped up government campaign against Islamist extremism. India could learn a thing or two from him on how to address a sensitive subject without either flinching from the truth or carelessly tarring an entire community.

To be sure, Britain’s problems with Islamism (the drive to order all aspects of the state and society by sharia law) do not exactly mirror India’s. Nor are the two countries’ experiences with terrorism, Islamism’s most violent and visible manifestation, identical. Nonetheless, in the age of Lashkar-e-Taiba and the Islamic State, all pluralistic democracies face a challenge from an ideology that Cameron characterises as “hostile to basic liberal values such as democracy, freedom and sexual equality”.

ऋषिकेश Thu, 23/07/2015 - 14:44

In reply to by चिंतातुर जंतू

काहिसे ढिसाळ मथळांकन म्हणता यावे. उलट सरकारने काय म्हटलेय ते त्याच बातमीत दिलेयः

न्यायालयाच्या आठ सदस्यीय पूर्णपीठाने दिलेल्या निकालाकडे लक्ष वेधले. वैयक्तिक गोपनीयता हा मूलभूत अधिकार ठरू शकत नाही, असे त्यावेळी न्यायालयाने म्हटले होते. सध्याच्या खंडपीठाने या निर्णयाचाही विचार केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा खटला पाच सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली.

ही भुमिका ठीक वाटते

चिंतातुर जंतू Thu, 23/07/2015 - 15:10

In reply to by ऋषिकेश

मूळ निर्णय १९५४ सालचा होता -

रोहतगी यांनी सरकारची बाजू मांडताना १९५४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आठ सदस्यीय पूर्णपीठाने दिलेल्या निकालाकडे लक्ष वेधले. वैयक्तिक गोपनीयता हा मूलभूत अधिकार ठरू शकत नाही, असे त्यावेळी न्यायालयाने म्हटले होते.

आणीबाणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विविध निर्णयांमध्ये राज्यघटनेतील कलम २१ च्या व्याप्तीचा विचार करताना वैयक्तिक गोपीनीयतेचे समर्थन केले होते.

आणीबाणीनंतर न्यायालयाच्या भूमिकेत बदल झाला आणि तो माझ्या मते काळानुरूप आणि आणीबाणीमुळे लक्षात आलेल्या धोक्यांनुसार योग्य दिशेने होता. त्याउलट १९५४मध्ये काय झालं होतं हे पाहा असं सरकारनं आता (म्हणजे २०१५ साली) म्हणणं म्हणजे काळाच्या रेट्याला आणि मानवाधिकारांच्या संकल्पनेत झालेल्या बदलांना न जुमानणं आहे. त्यामुळे ते योग्य नाही.

या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा खटला पाच सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली.

ही तर कालहरण करण्याची आणि आपल्यावरची जबाबदारी झटकण्याची खेळी वाटते. ३७७वरच्या खटल्यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयानं गोपनीयतेच्या अधिकाराचा उल्लेख केला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं म्हणायचं की संसदेलाच ठरवू द्या. आता इथे सरकारनं म्हणायचं की घटनापीठाला ठरवू द्या. थोडक्यात काय, तर भारतीय नागरिकांच्या गोपनीयतेच्या हक्काला कुणीही वाली नाही. त्यामुळे बातमीचा मथळा योग्यच ठरतो असं वाटलं.

अजो१२३ Sun, 26/07/2015 - 16:22

In reply to by अनुप ढेरे

चिंतातूर जंतूंना धूम ठोकायची असं नाही हो म्हणालो मी. त्यांनी मागे देखिल धूम ठोकलेली आठवत नाही मला.
=======================================================================================
It was a generic statement on jargon cult. एखादी संकल्पनेचे नाव देऊन, व्याख्या देऊन लोक सामान्यांना संभ्रमित करतात. नंतर त्या संकल्पनेच्या उपयोजनाकरिता लागणारी वर्किंग फ्रेमवर्क जेव्हा सामान्यांना लागते तेव्हा जार्गनिस्ट ती देत नाहीत.

चिंतातुर जंतू Thu, 23/07/2015 - 16:01

In reply to by अनुप ढेरे

>> वैयक्तिक गोपनीयता हे नक्की काय आहे? यात काय काय येतं?

प्रायव्हसीबद्दल इथे पाहा. मला 'गोपनीयता' हा शब्द 'सीक्रेसी'ला प्रतिशब्द वाटतो. मी त्याऐवजी 'खाजगीपणा' म्हणेन. आधार कार्डाबाबत बोलायचं झालं तर आजकाल अनेक ठिकाणी आधार कार्डाची कॉपी द्यावी लागते. माझ्यापाशी तुमच्या आधार कार्डाची प्रत असेल, तर मला तुमची जन्मतारीख, पत्ता वगैरे मिळू शकतो. शिवाय, मी आधारच्या वेबसाईटवर जाऊन तुमचा आधार नंबर देऊन आणि माझा इमेल अ‍ॅड्रेस देऊन तुमचं आधार कार्ड पिडीएफ फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करू शकतो. त्याचा पासवर्ड तुमचा पिन कोड असतो. तोसुद्धा मला तुमच्या कार्डाच्या प्रतीवर मिळतो. ह्या सगळ्या सुविधांत 'खाजगीपणा'चा फार विचार झाला आहे असं वाटत नाही. आताआतापर्यंत तर मी तुमच्या कार्डाला माझ्या मोबाईलशीही सहज जोडू शकत होतो. अलीकडेच ते बंद झालं आहे. ह्या सगळ्याचा संबंध अखेर बँक खात्याशी आणि त्यात जमा होणाऱ्या अनुदानाशी वगैरे येतो म्हणून हे धोकादायक वाटतं.

अनुप ढेरे Thu, 23/07/2015 - 16:18

In reply to by चिंतातुर जंतू

वैयक्तिक गोपनीयता म्हणजे सरकारकडे नको ती माहिती किंवा सरकारी पाळत असं वाटलं होतं मला म्हणून विचारलं. पण सरकारकडे असलेली माहिती लीक होणं हे चिंताजनक आहे हे मान्य आहे. उमेरिकेत जसं सो.सि.न गोळा करण्याचा अधिकार काही विशिष्ट संस्थांनाच असतो. (ऐकीव माहिती. चु.भु.दे.घे.) तसं काहितरी केलं पाहिजे.

इथे सुचेता दलाल यांनी हाच मुद्दा मांडला आहे.*





* यु टर्नचा मुद्दा नको चर्चायला!

घाटावरचे भट Fri, 24/07/2015 - 09:25

रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता फार काळ टिकेल असे दिसत नाही.

हा निर्णय जर प्रत्यक्षात आला तर त्याला 'आततायीपणा' एवढेच वर्णन चपखल बसू शकेल.

बॅटमॅन Fri, 24/07/2015 - 10:27

In reply to by घाटावरचे भट

मग राघोबा राजन काय गप्प बसणार काय? तो तशापैकी नव्हे. अगर ऐसाही हुवा तो वो सबको फाटेपे मारके चला जायेगा.

घाटावरचे भट Fri, 24/07/2015 - 11:28

In reply to by बॅटमॅन

तो गेला तर फरक आपल्यालाच पडणारे ना! डेस्परेट होऊन काहीही करायला लागलंय सध्याचं सरकार... असो.

काँग्रेसची स्ट्रॅटेजीही तशीच आहे. येत्या २-३ वर्षांत सगळे रिफॉर्म्स अडवून धरायचे. अगदी शेवटी शेवटी मांडवली करायची. म्हणजे त्या रिफॉर्म्सचा परिणाम पुढच्या निवडणुकीपर्यंत दिसायला नको. मग हे भाजप सरकारने काय केलं म्हणून पब्लिकमध्ये बोंबा ठोकायला मोकळे.

अनु राव Fri, 24/07/2015 - 11:55

In reply to by घाटावरचे भट

हे आता व्यक्तीपूजेच्या मार्गानी चालू आहे. राजन च्या आधीचे दोन्ही गव्हर्नर अतिशय उत्तम काम करत होते. त्यांनी सरकारच्या दबावाला भीक घातली नाही. खरेतर त्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर कुठल्याही सरकारी कमीट्यावगरै वर जागा मिळाली नाही.

त्यामुळे राजन हेच फक्त तारणहार आहेत आणि आधी आणि नंतर कोणीच असणार नाही त्यांच्यासारखा अशी भीती बाळगायचे कारण नाही.

२-३ वर्षांत सगळे रिफॉर्म्स अडवून धरायचे. अगदी शेवटी शेवटी मांडवली करायची

रीफॉर्मस चा आणि आरबीआय चा फार काही संबंध नाही.

माझ्या वैयक्तीक मते ( जे फार कोणाला पटत नाही ) आरबीआय च्या पैसा पुरावठा कमी जास्त करणे आणि रेपो रेट २-३ टक्के इकडे तिकडे करणे ह्यानी विषेश काही जाणवण्यासारखा फरक पडत नाही इकॉनॉमीवर. फरक फक्त सार्वभौम सरकार पॉलिसी आणि स्ट्रॅतेजी बदलुन आणि त्या ही पेक्षा बदल अमलात आणुन ( हे महत्वाचे ) करू शकते.

रिफॉर्म्सचा परिणाम पुढच्या निवडणुकीपर्यंत दिसायला नको.

रीफॉर्म्स मुळे भारतासारख्या देशात निवडणुक हरण्याचीच शक्यता जास्त आहे.

खरे तर सध्या जी चौकट आहे ती काही फार वाईट नाही. आहे ती चौकट वापरुनच चमत्कार करणे शक्य आहे, प्रश्न आहे तो इच्छाशक्तीचा. आणि बदल आर्थिक बाबतीत करण्याच्या पेक्षा सामाजिक, कायदा आणि सुव्य्वस्था, न्यायप्रणाली ( जलद होणे ) , शैक्षणीक क्षेत्रात करण्याची गरज आहे. ज्याचा आरबीआय शी काही संबंध नाही.
जे देश प्रगती करू शकले ते मुक्त अर्थव्यवस्थे मुळे कमी तर ह्या बाकीच्या मुलभूत गोष्टींमुळे.

घाटावरचे भट Fri, 24/07/2015 - 13:24

In reply to by अनु राव

२-३ वर्षांत सगळे रिफॉर्म्स अडवून धरायचे. अगदी शेवटी शेवटी मांडवली करायची
रीफॉर्मस चा आणि आरबीआय चा फार काही संबंध नाही.

माझ्या वैयक्तीक मते ( जे फार कोणाला पटत नाही ) आरबीआय च्या पैसा पुरावठा कमी जास्त करणे आणि रेपो रेट २-३ टक्के इकडे तिकडे करणे ह्यानी विषेश काही जाणवण्यासारखा फरक पडत नाही इकॉनॉमीवर. फरक फक्त सार्वभौम सरकार पॉलिसी आणि स्ट्रॅतेजी बदलुन आणि त्या ही पेक्षा बदल अमलात आणुन ( हे महत्वाचे ) करू शकते.

रिफॉर्म्सचा परिणाम पुढच्या निवडणुकीपर्यंत दिसायला नको.
रीफॉर्म्स मुळे भारतासारख्या देशात निवडणुक हरण्याचीच शक्यता जास्त आहे.

माझे वरचे मत हे राजन यांना किंवा रिझर्व्ह बँकेला उद्देशून नव्हते. ती एक समांतर आणि प्रासंगिक टिप्पणी होती.

अजो१२३ Sun, 26/07/2015 - 16:27

In reply to by अनु राव

रीफॉर्मस चा आणि आरबीआय चा फार काही संबंध नाही.

पण अनुतै, फार कमी लोकांचे कंसेप्त क्लिअर असतात.

नितिन थत्ते Sat, 25/07/2015 - 08:27

In reply to by घाटावरचे भट

१. इंदिरा गांधी ज्याला कमिटेड ब्यूरोक्रसी म्हणत असत त्याचेच हे रूप आहे का? सरकारच्या धोरणांना अनुकूल कृती नोकरशाही करणार नसेल तर सरकारची धोरणे अंमलात कशी येणार?
----------------------------------
२. व्याजदर कपात हे ग्रोथचे महत्त्वाचे हत्यार असते. मागील एनडीएच्या शेवटच्या काळात जी ग्रोथ दिसू लागली होती ती व्याजाचे दर ७ टक्क्यापर्यंत कमी केल्यामुळेच होती आणि त्याचप्रमाणे २००८ च्या मंदीतून भारत बचावला याचेही कारण त्यावेळी भसाभस कमी केलेले व्याजदर हे होते. परंतु अतिरेकी व्याज दरकपात ही महागाईला निमंत्रण देतेच.
----------------------------------
रिझर्व बँक आणि सरकार हे स्वतंत्र असूच कसे शकतात हे मला पडलेले कोडे आहे.

घाटावरचे भट Sat, 25/07/2015 - 09:28

In reply to by नितिन थत्ते

रिझर्व्ह बँकेचे आणि गव्हर्नरचे अधिकार कमी होतील ही भीती नाहीये. भीती ही आहे की पतधोरण वेळोवेळी अस्तित्वात असलेल्या सरकारांच्या राजकीय तत्वप्रणालीच्या दावणीला बांधलं जाईल; ज्याचे दूरगामी परिणाम फार चांगले नाहीयेत. कारण मुळात पॉलिटिकल अजेंडा आला की कॉमन सेन्स बाजूला राहातो हे या आधीही सिद्ध झाले आहे. मग एक तर ग्रोथ नाहीतर सामाजिक विकास यांच्या नावाखाली पतधोरणाची वाट लागेल आणि ते इनकन्सिस्टंट होईल. रंगराजन साहेबही विरोधातच मत मांडत आहेत.

गब्बर सिंग Mon, 27/07/2015 - 09:29

In reply to by घाटावरचे भट

रंगराजन यांचे मत विचारात घेण्यास माझा विरोध आहे. मी (छोटा मूह बडी बात करून) त्यांच्या क्रेडिबिलिटीवर प्रश्नचिन्ह लावत आहे. ते जेव्हा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते तेव्हा रिझर्व्ह बँक स्वायत्त्तच होती व आजही आहे. पण त्यांच्या कारकीर्दीतले महागाईचे आकडे विचारात घेणे गरजेचे आहे. ते युपेन्न मधून पीएचडी आहेत ही खूप जमेची बाजू आहेच. पण - If results are any indicator of capability and if capability stems partly out of depth of understanding then - त्यांच्या क्रेडिबिलिटीवर प्रश्नचिन्ह लावावे लागेल.

1993 - 6.362038664
1994 - 10.21150033
1995 - 10.22488756
1996 - 8.977149075
1997 - 7.16425362

ते नोव्हे. १९९७ मधे त्या पदावरून आंध्रप्रदेश चे राज्यपाल झाले तेव्हा १९९८ मधे महागाईचा दर १३ टक्के वर जाऊन पोहोचला. जलान यांनी तो नंतर एका वर्षात ४ - ५ टक्क्यावर आणला. व आज या विषयावर जलान यांचे मात्र मौन आहे. आणि रंगराजन मात्र आपली जबाबदारी विसरून ....

स्वायत्तता असताना काय दिवे लावले ??????

**** स्वायत्तता नसावी असे मी म्हणत नैय्ये. ती असावीच. पण रिझल्ट्स कडे लक्ष दिले जावे. - रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर चा नकाराधिकार ही अथॉरीटी आहे. स्वायत्तता आहे. पण शून्य अकाऊंटॅबिलिटी ??????

(स्त्रोत - http://data.worldbank.org/indicator/FP.CPI.TOTL.ZG/countries/IN?display… )

गब्बर सिंग Mon, 27/07/2015 - 11:32

In reply to by नितिन थत्ते

रिझर्व बँक आणि सरकार हे स्वतंत्र असूच कसे शकतात हे मला पडलेले कोडे आहे.

रिझर्व बँक आणि सरकार हे एकत्र असणे हे हितसंघर्षात्मक आहे. म्हणून ते स्वतंत्र असावेत.

अनु राव Mon, 27/07/2015 - 12:06

In reply to by गब्बर सिंग

रिझर्व बँक आणि सरकार हे एकत्र असणे हे हितसंघर्षात्मक आहे.

ह्या लॉजिक ला फार काही अर्थ नाही गब्बर. सरकार लोकांनी निवडुन दिलेले आहे आणि सरकारनी जनतेच्या हिताचे काम करणे अपेक्षीत आहे. निवडुन दिलेल्या सरकारला जर त्याला ह्वी तशी धोरणे राबवता येत नसतील तर काय उपयोग?

न्यायालये सुद्धा सरकारनी संमत केलेले कायदे फक्त अंमलात आणतात, स्वता कायदे तयार करत नाहीत.

गब्बर सिंग Mon, 27/07/2015 - 13:17

In reply to by अनु राव

ह्यात हितसंघर्षाचे तपशील आहेत. हे जर व्हेग वाटले तर दुसरे देतो..

भारत सरकार हे मूर्तिमंत हितसंघर्ष आहे. विशेषतः पैसा या विषयात. सरकार पैश्याचा सप्लायर, व्हॅल्युअर, लेंडर, बॉरोअर, ऑडिटर, टॅक्सिंग अथॉरीटी, इन्व्हेस्टर, इन्व्हेस्टी, रेग्युलेटर, ग्यारंटर, इन्शुअरर, सेव्हर, ट्रेडर असे सगळेच रोल करत असते. पण त्यातून केवढा प्रचंड हितसंघर्ष निर्माण होतो त्याची कल्पनाच केलेली बरी.

नितिन थत्ते Mon, 27/07/2015 - 13:43

In reply to by गब्बर सिंग

भारतात तरी (आणि इतरत्रदेखील) सरकारने संपूर्ण देशातल्या संपूर्ण जनतेचे ओव्हरऑल हित साधणे अपेक्षित असते. ओव्हरऑल हितामध्ये मुख्य उद्दिष्ट मिनिमल सर्व्हायव्हल ऑफ ऑल हे असते. देशातल्या जनतेपैकी कोणीही देशातल्या व्यवस्थेमुळे मार्जिनलाइज होऊ नयेत आणि त्यांना जगणे अशक्य होऊ नये हे पाहणे सरकारचे काम मानले जाते. त्यामुळे सर्वंकष हितसंबंध स्वीकारार्ह मानले जातात.

गब्बर-विचारसरणीच्या लोकांच्या दुर्दैवाने मार्जिनलाइज होणे हा त्या लोकांचाच दोष आहे म्हणून त्यांना मरू द्यावे असे कडवे भांडवलदारसुद्धा म्हणत नाहीत.

अनु राव Mon, 27/07/2015 - 13:48

In reply to by गब्बर सिंग

गब्बर, भारत सरकार म्हणुन जे काही आहे ते काही पाकीस्तान नी नेमलेले सरकार नाहीये. भारतातल्या लोकांनीच निवडुन दिलेले आहे. ह्याचा अर्थ लोकांना हेच पाहिजे आहे. आणि समजा नाही पटले तर ५ वर्षानी दुसरे सरकार आणायची मुभा आहेच लोकांना.

चिंतातुर जंतू Sat, 25/07/2015 - 14:52

रिझर्व्ह बॅ़केची स्वायत्तता धोक्यात, फिल्म इन्स्टिट्यूटची स्वायत्तता धोक्यात, एनजीओंना सरकारविरोधात टीका केली तर त्रास दिला जाणं अशा अनेक सुट्या घटनांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करणारा, भारतीय लोकशाहीतल्या उदारमतवादी अंतर्प्रवाहाला सगळीकडून हळूहळू खिळखिळं केलं जातं आहे आणि लोकांची ह्याबाबत तक्रार नाही ह्याचं एक भयावह चित्र उभं करणारा मिहिर शर्मा ह्यांचा एक लेख -
Mihir S Sharma: The people are silent

अनुप ढेरे Sat, 25/07/2015 - 20:04

In reply to by चिंतातुर जंतू

Consider, for example, the incredible silence – the complicity, in fact – of almost the entire political, intellectual and journalistic class in what is so obvious a vendetta it looks like it’s being directed by Francis Ford Coppola: the witch-hunt against Teesta Setalvad.

ऑं?? सायलेंस. सगळीकडे दिसतायत की चर्चा सेटलवाडांबद्दल चर्चा. काय आरोप आहेत, न्यायालय काय म्हणतय, हे चूक कस आहे वगैरे. कुठल्या सायलेंसबद्दल बोलतायत हे?

The government’s intrusive changes to the regime governing foreign contributions to, and the licencing of, non-governmental organisations is a larger symptom of the same disease.

एन्जीओबद्द्लची भीती या सरकारने जन्म दिलेली नाही. यांचा वापर मनी लॉडरिंग, टेरर फायनान्सिंगसाठी होतो ही भीती काँग्रेस्च्या मंत्र्यांनी देखील बोलून दाखवलेली होती. हे लेखकही नंतर मान्य करतो.

At best, it picked people from a broad right-of-centre to left spectrum who were reasonably good at their job and reliably “secular”; at worst, they picked people who paid obeisance to power

यात नवं काही नाही. आत्ताही हेच चालू आहे. पनगारिया, सुब्रमण्यम, डोवल हे पाहिल्या क्याटेगरीत येतात. reasonably good at their job या. (बहुधा!) चौहान, इराणी दुसर्‍या. नंतरच्या सरकरांमध्येही हेच चालू राहणार आहे. सरकारी पैशाने चालणार्‍या संस्थांवर सरकारचच नियंत्रण राहणार आहे.

Thus there is no reason to suppose that, if they are offered a bargain similar to the one the Russian and Chinese leaders offered their people, a majority of Indians will not accept.

फिअर मॉगरिंगचं उदाहरण. केवळ मोदी निवडून आले म्हणून लगेच लोक हुकुमशाहीच्या प्रेमात पडले?

एका वर्षापूर्वी सगळं आलबेल होतं आणि आता जगबुडी आली असा काहीसा टोन आहे लेखाचा. आनंद आहे.

चिंतातुर जंतू Sun, 26/07/2015 - 15:27

In reply to by अनुप ढेरे

>> ऑं?? सायलेंस. सगळीकडे दिसतायत की चर्चा सेटलवाडांबद्दल चर्चा. काय आरोप आहेत, न्यायालय काय म्हणतय, हे चूक कस आहे वगैरे. कुठल्या सायलेंसबद्दल बोलतायत हे?

>> एन्जीओबद्द्लची भीती या सरकारने जन्म दिलेली नाही. यांचा वापर मनी लॉडरिंग, टेरर फायनान्सिंगसाठी होतो ही भीती काँग्रेस्च्या मंत्र्यांनी देखील बोलून दाखवलेली होती. हे लेखकही नंतर मान्य करतो.

>> पनगारिया, सुब्रमण्यम, डोवल हे पाहिल्या क्याटेगरीत येतात. reasonably good at their job या. (बहुधा!) चौहान, इराणी दुसर्‍या. नंतरच्या सरकरांमध्येही हेच चालू राहणार आहे. सरकारी पैशाने चालणार्‍या संस्थांवर सरकारचच नियंत्रण राहणार आहे.

मला वाटतं लेखकाचा मूळ मुद्दा काहीसा असा आहे, की लेखात उल्लेख केलेल्या गोष्टींबद्दल बहुसंख्य लोकांना काही वाटेनासंच झालं आहे. ह्या परिस्थितीत भारतीय लोकशाहीतला उदारमतवादी प्रवाह बहुसंख्यवादाखाली गडप होणार आहे. ideological independence नाहीसा होणं आणि त्याला लोकशाही प्रक्रियांद्वारे किंवा जनमताच्या रेट्याद्वारे democratic sanction मिळणं ह्याविषयीचा धोका तो मांडतो आहे. 'Too many people think that elections are all that matter, and dissent has nothing to do with democracy.' तुमच्या आक्षेपांत ह्या आणि अश्या मुख्य विधानांचा प्रतिवाद कुठे दिसत नाही.

>> एका वर्षापूर्वी सगळं आलबेल होतं आणि आता जगबुडी आली असा काहीसा टोन आहे लेखाचा.

उलट, हळूहळू गरम होत असलेल्या पाण्याचं आणि अखेर उकळी येण्याचं रूपक वापरलं आहे.

अनुप ढेरे Sun, 26/07/2015 - 19:25

In reply to by चिंतातुर जंतू

लेखाचं शीर्षक आणि कंटेंटचा मोठा भाग यात फरक आहे अस वाटतं. कारण त्या वाक्याची उदाहरणं म्हणून जी दिलेली आहेत त्यात तरी नवं अस काहीच नाही. आत्ताच सरकार आणि जुनं सरकार याच ट्रिविअल तुलनेत लेखाचा बराच भाग गेलेला आहे.

लेखकाला हा बदल ग्रॅजुअल आहे आणि त्यामुळे तो लोकांना जाणवत नाहिये अस म्हणायचय तर मला तस वाटत नाही. जर ३-४ वर्ष हा कालावधी कमी असेल तर २० वर्षापूर्वी काय होतं आणि त्याच्या तुलनेत आत्ता आपण लिबरल आहोत का आता हा प्रश्न विचारता येइल.

उदा: माझ्या लहानपणी बाबरी मशीद हवीच असं खूप लोकांना वाटायच. आता कोणाला याचं फार कौतिक राहिलेलं नाही. निवडणूकीमधून हा मुद्दा हद्दपार झाला आहे हे उदारमतवादाचं द्योतक आहे.
समलैंगिकता याविषयी देखील २० वर्षापूर्वी जितक्या टक्के लोकांच उदारमतवादी मत होतं त्यापेक्षा जास्तं टक्के लोकांचा उदारमतवादी मत असेल असा माझा कयास आहे. (जो ऑफ्कोर्स माझ्या सर्कलमधल्या लोकांवरून केलेला आहे. )

हवामानबदल आणि त्याला कारणीभूत प्रकल्प याबाबत लोकांना कौतुक नसणं म्हणजे इल्लिबरल असही मला वाटत नाही. प्रत्येकजण स्वतःच्या फायद्याचं बघत असतो. लोकांनी स्वतःचा फायदा सोडून यांना विरोध करण म्हणजे लिबरलपणा आहे अस काही आहे का?

ideological independence नाहीसा होणं

सरकारी संस्था आयडिऑलोजिकली स्वतंत्र असण हे शक्य आहे असं वाटत नाही. असरकारी संस्थांमध्ये हे स्वातंत्र्य नसण्याच कारण दिसत नाही.

आत्ता कोणत्या गोष्टी लिबरल म्हणून गणल्या जातील पण ज्या जनमतरेट्याच दबल्या जातायत तर मला दोन उदाहरणं दिसतायत. (फक्त हेच दोन मुद्दे आहेत असं नाही.) अतिरेक्यांना फाशीची शिक्षा, काश्मिरात सार्वमत घेणं याबाबत विरोधी मत्=देशद्रोही हे मला दिसलेलं आहे. पण आपण याबाबत रिग्रेस झालेलो आहोत का? हे जाणून घेणं रोचक ठरेल. कारण १५-२० वर्षांपूर्वी काय मत पॉप्युलर होतं हे मला माहिती नाही.

गेल्या एका वर्षात बदललेली एक गोष्ट मला म्हणजे विरोधी मत्=देशद्रोही हे म्हणणार्‍यांना जास्तं फुटेज मिळायला लागलेलं आहे. हे साक्षीमहाराज वगैरे एक्स्ट्रीम मत फक्त गेल्या वर्षी शिकलेले नाहीत. ती मतं जुनीच होती. फक्त मेनस्ट्रीम मिडियामध्ये त्यांना मिळणारं फुटेज वाढलेलं आहे. त्यातूनच ट्विटरवर कुठल्यातरी नटीला श्या पडल्यावर कुठे चाललाय समाज असे प्रश्न लोक विचारतात.

Mr Modi is, in fact, settling in for the long haul. He is solidly and intelligently putting into place the structures that will change the nature of India’s liberal democracy forever,

मोदी इज ओव्हररेटेड अस म्हणीन कधी वाटलं नव्हतं. पण या वाक्यापुरतं म्हणावस वाटतय.

चिंतातुर जंतू Mon, 27/07/2015 - 11:56

In reply to by अनुप ढेरे

>> समलैंगिकता याविषयी देखील २० वर्षापूर्वी जितक्या टक्के लोकांच उदारमतवादी मत होतं त्यापेक्षा जास्तं टक्के लोकांचा उदारमतवादी मत असेल असा माझा कयास आहे.

>> प्रत्येकजण स्वतःच्या फायद्याचं बघत असतो. लोकांनी स्वतःचा फायदा सोडून यांना विरोध करण म्हणजे लिबरलपणा आहे अस काही आहे का?

>> सरकारी संस्था आयडिऑलोजिकली स्वतंत्र असण हे शक्य आहे असं वाटत नाही.

>> मोदी इज ओव्हररेटेड अस म्हणीन कधी वाटलं नव्हतं. पण या वाक्यापुरतं म्हणावस वाटतय.

लोक स्वतःच्या आयुष्यापुरते उदारमतवादी असणं आणि लिबरल डेमॉक्रसी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही त्यांची गल्लत करता आहात असं सुचवू इच्छितो. लोकशाहीत वेगवेगळे दृष्टिकोन असणार आणि ते असणं लोकशाहीच्या हिताचं असतं ह्या मुद्द्यामागे आज पुरेसं जनमत नाही. व्यक्तिगत आयुष्यातला उदारमतवाद तिथे उपयोगाचा ठरत नाही. मोदी ओव्हररेटेड असतीलही, पण न्यायसंस्था, रिझर्व्ह बॅंक इत्यादि ठिकाणची स्वायत्तता धोक्यात येईल अशी धोरणं ते अंमलात आणताहेत हे लेखकाचं म्हणणं खरंच आहे. (स्वायत्तता हवी की नको हा वेगळा मुद्दा आहे.)

ऋषिकेश Tue, 28/07/2015 - 18:26

In reply to by चिंतातुर जंतू

लोकशाहीत वेगवेगळे दृष्टिकोन असणार आणि ते असणं लोकशाहीच्या हिताचं असतं ह्या मुद्द्यामागे आज पुरेसं जनमत नाही.

लेख वाचलेला नाही. मात्र हे विधान लेख न वाचताही पूर्णतः पटावं असंच चित्र मला माझ्या अवतीभवती दिसतंय :(

मेघना भुस्कुटे Mon, 27/07/2015 - 11:58

In reply to by अनुप ढेरे

लेखातल्या विधानाची सत्यता ढेरेपंतांच्या प्रतिसादातून प्रत्ययाला येते आहे. :(

अतिशहाणा Mon, 27/07/2015 - 03:34

याकुब मेमनला भारतात आणण्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या बी रमण यांचा लेख रोचक वाटला.
भारताने पाकिस्तानविरोधातील पुराव्यांच्या बदल्यात याकुबला मृत्युदंड देणार नाही असे आश्वासन दिले होते म्हणे. स्वप्नातही दिलेले आश्वासन पाळणाऱ्या हरिश्चंद्राचा भारत कुठे नेऊन ठेवलाय!

http://www.rediff.com/news/column/exclusive-b-ramans-unpublished-2007-a…

न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला असेल तर शिक्षा अवश्य आणि ताबडतोब द्यावी. मात्र फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा करत असलेले बिअांत सिंग यांचे मारेकरी आणि राजीव गांधींचे मारेकरी यांना पंजाब व तामिळनाडू विधानसभांनी जोरदार दिलेला पाठिंबा चालतो. मात्र याकुबला पाठिंबा दिल्यास निधर्मांध म्हटले जाते हे रोचक आहे.

अनु राव Mon, 27/07/2015 - 12:11

In reply to by अतिशहाणा

बिअांत सिंग यांचे मारेकरी आणि राजीव गांधींचे मारेकरी यांना पंजाब व तामिळनाडू विधानसभांनी जोरदार दिलेला पाठिंबा चालतो.

त्यात फरक आहे. हे दोघे जे मेले त्यांनी काही निर्णय घेतले होते ( चुक का बरोबर ती गोष्ट वेगळी ), त्यांना सरकारी खर्चाने संरक्षण ही पुरवले होते. त्यांना मारणे हे युद्धात शत्रुच्या सैनिकाला मारण्यासारखे होते. पण
मुंबईत जे मेले त्यांनी काही निर्णय घेतले नव्हते, ते सर्व सामान्य होते. म्हणुन मुंबईत मारणार्‍या लोकांना वेगळा न्याय असू शकतो.

अतिशहाणा Mon, 27/07/2015 - 18:34

In reply to by अनु राव

'अमर जवान' ज्योती सारख्या प्रतीकाला तथाकथित लाथ मारणारे देशद्रोही असल्याचा दावा करणाऱ्यांकडून, साक्षात देशाच्या प्रमुखाची हत्या करणाऱ्यांबद्दल अधिक आंतरजालीय आक्रोश अपेक्षित होता. तोच प्रकार राज्याच्या प्रमुखाच्या हत्येबाबत. मात्र गुन्हा काय आहे याचबरोबर तो कुणी केलाय यावरही देशभक्तांची प्रतिक्रिया अपेक्षित असते हे वारंवार दिसून येते. त्यामुळेच ओवेसीसारखे लोक खरेच बोलतात की काय अशी शंका येते.

ते सगळं सोडा. भारताने खरंच आश्वासन दिले असेल तर लाँग टर्ममध्ये अशा रिट्रॅक्टिंगचा नक्कीच तोटा होईल.

चिंतातुर जंतू Mon, 27/07/2015 - 12:55

Leftists refuse to believe Ram was born in Ayodhya: ICHR chief

ICHR प्रमुखपदी असलेल्या माणसाचं हे वक्तव्य दुर्दैवी म्हणावं की चिंताजनक की विनोदी?

“I went to Ayodhya. Just walk through the streets — you will get a feeling of living in Ramayana times… I had this feeling. You can’t call it a myth, that’s my experience, [...] What more proof do you want if you are convinced in your heart, your mind?"

अनु राव Mon, 27/07/2015 - 13:44

In reply to by चिंतातुर जंतू

विनोदी आणि दुर्दैवी नक्कीच आहे. चिंताजनक वाटत नाही. पण भारतातल्या शिक्षणपद्धती बद्दल भाष्य मात्र आपोआप होते. इतका डीग्र्या मिळवलेला माणुस जर असा विचार करत असेल तर खरे खुरे शिक्षण झालेच नाही असे म्हणायला पाहिजे.

चिंतातुर जंतू Mon, 27/07/2015 - 14:06

In reply to by अनु राव

>> इतका डीग्र्या मिळवलेला माणुस जर असा विचार करत असेल तर खरे खुरे शिक्षण झालेच नाही असे म्हणायला पाहिजे.

तुमची काही तरी गफलत होते आहे. डिग्र्या काय, आजकाल कुणालाही मिळतात; विचार महत्त्वाचा. तो असा विचार करतो म्हणूनच त्याला ICHRचं प्रमुखपद मिळालेलं आहे.

अजो१२३ Tue, 28/07/2015 - 14:19

In reply to by चिंतातुर जंतू

तुमची काही तरी गफलत होते आहे.

चर्चा करताना 'अंमळ गफलत होते आहे का' अशी सुरुवात करत आपले बरेच प्रतिसाद असतात. बरीचशी गफलत तुमचीही झालेली असू शकते.
१. मागे एकदा ऐसीवर कोणी म्हटले होते कि युरोपातले कोणतेतरी साहित्य मायथॉलॉजी मानले जायचे. नंतर त्याचा पुरावा मिळाला नि ते अंशतः का होईना इतिहास मानले जाऊ लागले. मी गाळलेली विशेषनामे जाऊ द्या, पण भारतात असे होऊ शकत नाही का? असे होऊ शकते असा विचार करायलाच बॅन असावा का? ते चक्क विनोदी इ इ मानले जावे का? हा न्यूनगंड नाही का? लक्षात घ्या तुम्हाला स्वतःला सगळी मायथॉलॉजी हिंदू आहे म्हणून कोणता उज्वल इतिहास प्रस्थापितच होऊ द्यायचा नाही इ इ मला म्हणायचं नाही. पण आजपर्यंतच्या कॉमीजनी हे हेतूतः केले नसेल कशावरून?
२. राम होता, अयोध्येचा राजा होता, देव नव्हता पण भला होता असा इतिहास (आय मीन असा इतिहास असल्यास) कोणी कॉमी ICHR चा हेड असेल तर कधी वर येईल का? असा विचार विनोद, दुर्दैव, इ इ आहे हेच सालं दुर्दैव नाही का?

तो असा विचार करतो म्हणून त्याला प्रमुख केला आहे नि ते योग्य आहे.

कधी केरळमधल्या, इ (तुमच्या नसलेल्या राज्याच्या) इंग्रजी माध्यमाच्या, काँवेन्टमधे शिकलेल्या, रोमिला थापरचा भारताचा इतिहास वाचलेल्या सामान्य माणसासोबत संवाद केला आहे का? एकदा करून बघा. भारतीय इतिहासात थोर मानली जाणारी व्यक्तित्वं हे लोक अशी belittle, disparage करतात कि विचारता सोय नाही. जावा सुमात्रावर भारताचं राज्य असेल तर त्याला वाणिज्यिक संबंध होते म्हणतात. शिवाजीला गुंडा, लुटेरा, दूरदृष्टीहिन, इ इ म्हणतात. शिवाजीला कोणतंही चांगलं विशेषण लावायला गेलं कि ते अमान्य करतात. ज्ञानेश्वर, तुकाराम इ इ च्या समाजकार्याचा (किमान समाजकार्याचा) पण रोल नाकारतात. तेच काहीही आंग्लाळलेलं दिसलं कि स्तुति करत सुटतात. भारताचा आर्थिक इतिहास (त्यावेळेसच्या इतर देशांशी तुलना याबाबतीत) त्यांना आजच्या सारखाच वाटतो. उदा. महाभारत कालात (किंवा ते लिहायच्या काळात) काय काय कपडे होते यावर फार कमी भर असतो, पण सुई नव्हती यावर प्रचंड भर असतो. वाचकाला शेवटी तेच लक्षात राहतं.

मूळात कॉमी इतिहासकारांचा लेखनाचा टोन असा असतो कि भारताच्या इतिहासात प्रेरणादायी असं काहीच नाही. असं करताना ते इतिहास ते 'आम्ही इतिहास तटस्थपणे सांगतोय' इ सबब ते देतात. पण हा त्यांचा तटस्थपणा पाश्चात्यांचे गुणगाण करताना कुठे जातो?

इतिहासातून प्रेरणाच घ्यायची नाही तर इतिहास अभ्यासायचा कशाला? आर्थिक, सामरिक, कूट, इ इ नितींचा डाटाबेस म्हणून? ते पर्पज सेकंडरी आहे. कॉमी इतिहासकारांनी न्यूनगंडी देशवासीयांची फौज पैदा करून ठेवली आहे.

इस्रोच्या अध्यक्षाने बालाजीचे आशिर्वाद घ्यायचे नाहीत, ICHR च्या अध्यक्षाने रामाचा भक्त असायचे नाही हे विचार इडियॉटिक आहेत. इतिहास कसा उकरून काढायचा, पुरावे कसे गोळा करायचे, कशाचा काय अर्थ काढायचा, तो अर्थ नक्की कसा डॉक्यूमेंट करायचा याची एक मेथडॉलॉजी आहे. (तिच्यात कोणी घपला केला तर अवश्य शिव्या द्या.) पण हे सगळं करण्यामागची भावनिक प्रेरणा काय असावी ते सांगणारे तुम्ही कोण झंड?

बॅटमॅन Tue, 28/07/2015 - 14:24

In reply to by अजो१२३

पण हे सगळं करण्यामागची भावनिक प्रेरणा काय असावी ते सांगणारे तुम्ही कोण झंड?

हे तेच ते झंड
ज्यांना आहे नस्ती घमंड

मेघना भुस्कुटे Tue, 28/07/2015 - 14:36

In reply to by अजो१२३

इशारा: हा प्रतिसाद लिहिला म्हणून वाद शेवटापर्यंत नेण्यासाठी झगडीनच असं नाही. मधेच कंटाळा येण्याची शक्यता दाट आहे.

तटस्थ दृष्टिकोनाच्या अभावाबद्दल तुमचं म्हणणं रास्त आहे. अजिबात असा न्यूनगंड बाळगायची गरज नाही. पण एकदा कुणाहीबद्दल भक्ती वाटली की तटस्थपणाचं भान राखलं पाहिजे हे भानही संपतं. संपूर्ण तटस्थता अशक्य आहे असं आपण घटकाभर मानलं, तरीही ती आदर्श स्थिती आहे याचं भान बाळगणं ही कोणत्याही अभ्यासकाला अत्यावश्यक अशी गोष्ट आहे. ही गोष्ट आणि भक्ती यांत मुळातच एक विरोधाभास आहे. म्हणून असल्या नेमणुकांमुळे चिंता वाटते. मग त्या भगव्या असोत, निळ्या असोत, हिरव्या असोत किंवा राखाडी.

अजो१२३ Tue, 28/07/2015 - 15:17

In reply to by मेघना भुस्कुटे

परिस्थिती कशी असावी याबद्दलच्या तुमच्या मतात असहमत व्हावं असं काहीच नाही.
========================================================================================
इतिहासकाराने तटस्थ असावं. पोलिटिकली करेक्ट नाही. इतिहास हा सैन्य, राजे, युद्धे, क्षेत्रफल, इ इ चा डाटाबेस इतकंच असावं का? नाही. ज्या ऐतिहासिक अस्मिता होत्या (आज असतील वा नसतील) त्यांचं वर्णन देखिल आवश्यक आहे.
=========================================================================================
कॉमी इतिहासकारांनी सगळ्या भारतीय महान ऐतिहासिक पात्रांना टोन डाउन केले आहे. तोच प्रमाण इतिहास मानला जातो. तो इंबॅलॅन्स कसा हटवावा?
=========================================================================================

ही गोष्ट आणि भक्ती यांत मुळातच एक विरोधाभास आहे.

इतक्या एका विधानाबद्दल माझं गुणात्मक मतांतर आहे. देव मानणारे लोक नास्तिक लोक देव देव मानत असे मानतात पण नास्तिक लोक, से गंगा नदी अस्तित्वात आहे असे, मानत नाहीत असे मानत नाहीत. आय मीन, ते नास्तिकांना रॅशनल मानतात.
नास्तिक जे लोक अस्तिक आहेत त्यांना भलतेच इरॅशनल मानतात. अस्तिक देव मानतात म्हणजे ते काहीही मानतात असे होत नाही. एक विशिष्ट मौलिक विचारधारा आणि वर्तनधारा मानण्याची देव ही प्रिटेक्स्ट असते.
तुमचे मत खरे असेल तर सगळ्या अस्तिकांना सगळ्या कामांपासून हटवावे काय? कारण ते अशा विरोधाभासामुळे ते काम नीट करत नसणार. उदा. रामाचे राज्य गांधीजींना हवे होते. त्यांना असे म्हटल्यामुळे राजकारणातून हटवावे का? रामराज्य मानल्याचा कोणता ॠण परिणाम गांधीजींच्या राजकारणी क्षमतेवर झाला? मग या बाबाने काय घोडं मारलं आहे?

बॅटमॅन Tue, 28/07/2015 - 15:32

In reply to by अजो१२३

तुमचे मत खरे असेल तर सगळ्या अस्तिकांना सगळ्या कामांपासून हटवावे काय? कारण ते अशा विरोधाभासामुळे ते काम नीट करत नसणार. उदा. रामाचे राज्य गांधीजींना हवे होते. त्यांना असे म्हटल्यामुळे राजकारणातून हटवावे का? रामराज्य मानल्याचा कोणता ॠण परिणाम गांधीजींच्या राजकारणी क्षमतेवर झाला? मग या बाबाने काय घोडं मारलं आहे?

आयसीएचार ही शासकीय संस्था आहे आणि अशा संस्थेच्या अध्यक्षाने अशी विधाने अध्यक्षीय कपॅसिटीत करणे हे त्या संस्थेला आजिबात शोभून दिसणारे नाही. लोकात बेइज्जती तर होतेच- नॉट दॅट एनीवन केअर्स. अदरवाईज त्या संस्थेने काय दिवे लावलेत हा प्रश्न अलाहिदा, पण म्हणून या अध्यक्षाचं विधान बरोबर होत नाही. कॉमी इतिहासकारांनी हरामीपणा केला म्हणून याच्या वेडगळ विधानांना थारा द्यावा अशी स्ट्रॅटेजी असेल तर तिला काही अर्थ नाही. कॉमी लोकांच्या बायसला अ‍ॅकॅडमिक शिस्तीनेच खोडून काढले पाहिजे. अशी बेफाट विधाने करण्याने मूळ उद्देश तर आजिबात साध्य होत नाही. हां आता भाजपा कॅन डू नो राँग असं असेल तर असूदे. पर्सनली डावे आणि सिकुलर यांची अ‍ॅलर्जी मला जितकी आहे तितकी खूपच कमी लोकांना असेल, पण म्हणून यांची प्रत्येक कृती योग्य ठरते असे माझे आजिबात मत नाही. शिवाय अस्मितांचे वर्णन करणे वेगळे आणि अस्मितांना उघडपणे गोंजारणे हे वेगळे. पण हे लक्षात कोण घेतो?

अर्थात घटनेने मुभा दिलीय म्हणून येनकेन वायझेडप्रकारेण प्रसिद्धी मिळवणे हे चूक कसे इतकाच प्रश्न असेल तर मात्र माझा तुम्हांला फुल सपोर्ट आहे.

अस्वस्थामा Tue, 28/07/2015 - 19:24

In reply to by बॅटमॅन

कॉमी इतिहासकारांनी हरामीपणा केला म्हणून याच्या वेडगळ विधानांना थारा द्यावा अशी स्ट्रॅटेजी असेल तर तिला काही अर्थ नाही. कॉमी लोकांच्या बायसला अ‍ॅकॅडमिक शिस्तीनेच खोडून काढले पाहिजे.

आणि

शिवाय अस्मितांचे वर्णन करणे वेगळे आणि अस्मितांना उघडपणे गोंजारणे हे वेगळे. पण हे लक्षात कोण घेतो?

अगदी सहमत..

अजो१२३ Tue, 28/07/2015 - 19:53

In reply to by बॅटमॅन

"अशी विधाने" म्हणजे काय? कोणत्या विधानात काय चूक आहे?
===============================================
आय मीन

"What Dr Martin Luther King Jr said then remains true today. 'The spirit of Gandhi is very much alive in India today. And it remains a great gift to the world. May we always live in the spirit of love and peace- among all people and nations."

This is what Obama wrote at Rajghat.
ड्राइंग अ पॅरलल, देशाचा अध्यक्ष असताना "गांधीजीचा आत्मा* आज भारतात जिवंत आहे" असं म्हणणं इडिऑटिक नाही का?

ओबामा गांधीजींचे मोठे प्रशंसक आहेत.

Well known for his appreciation of Gandhi, Obama had also taken Bapu's name while receiving Nobel Peace Prize, when asked who would be his most favourite person, dead or alive, to have dinner with.

वेल, पॉइंट इज दॅट, ICHR च्या अध्यक्षांत जो 'नेमका' इडियटपणा आहे तोच मी ओबामांत दाखवून देऊ शकतो.
=============================================================================================
स्पिरिट शब्दाचा अर्थ दुसरा आहे म्हणाल तर दुसरे उदाहरण देईन.

राजेश घासकडवी Wed, 29/07/2015 - 00:56

In reply to by अजो१२३

गांधीजी प्रत्यक्ष होऊन गेले, त्यांनी अमुक अमुक विचार मांडले हे सिद्ध करण्याची गरज पडू नये इतके पुरावे आहेत. राम खरंच होऊन गेला आणि तो अयोध्येतच जन्मला याला नक्की पुरावा काय?

आक्षेप श्रद्धा बाळगण्याला नाही. श्रद्धा आहे म्हणूनच एखादी गोष्ट सत्य ठरते असं मानण्याला आहे.

अजो१२३ Wed, 29/07/2015 - 14:54

In reply to by राजेश घासकडवी

विषय गांधीजींचा नाही. त्यांच्या आत्म्याचा आहे. नि त्याचा कोणता पुरावा नाही. तरीही ओबामा बरळले. नि त्या "भारावलेल्या" वातावरणात त्यांच्या या कमेंटची प्रचंड स्तुतिदेखिल झाली. गांधीजींचा आत्मा आज भारतात आहे याला नक्की पुरावा काय? तर रावांना एक आणि ओबामाला दुसरा न्याय का?
I hope this time you won't twist the meaning of what I am saying.
----------------------------------------------------------------------------

आक्षेप श्रद्धा बाळगण्याला नाही. श्रद्धा आहे म्हणूनच एखादी गोष्ट सत्य ठरते असं मानण्याला आहे.

कृपया राव नक्की काय म्हणाले ते शांतपणे वाचा. "सामान्य माणसाला" श्रद्धेपुढे पुरावा लागत नाही असे त्यांना सुचवायचे होते.

हे त्यांनी त्यांची रामावर श्रद्धा आहे या सत्यासोबत नोंदवले आहे.
---------------------------------------------------------------------------
समोरच्याला बुद्धिश्रष्ट समजून, बेअक्कल समजून त्याच्या विधानाचा विपर्यास्त अर्थ काढून, त्याला मूर्ख लेखणे हे देखिल मूर्खपणाचे लक्षण आहे. जनरली समोरच्या माणसाला किमान बेसिक अक्कल आहे इतके गृहित धरले तर ते चांगले असते.
---------------------------------------------------------------
बाय द वे, माझ्या खालच्या कलामांवरच्या प्रतिसादावर सगळे लोक शांत का आहेत?

बॅटमॅन Wed, 29/07/2015 - 12:21

In reply to by अजो१२३

देशाचा अध्यक्ष म्हणून एखाद्या १०० वर्षांपेक्षा कमी काळापूर्वी मेलेल्या नेत्याचे चार शब्द उद्धृत करणे आणि एखाद्या संशोधन संस्थेचा अध्यक्ष म्हणून उद्गार काढणे यांत फरक आहे हे समजत नसेल तर चालूद्यात तुमचे निरर्थक आत्मरंजन.

अजो१२३ Wed, 29/07/2015 - 17:30

In reply to by बॅटमॅन

साहेब, ओबामांचा कमेंट नीट वाचण्याची विनंती.
तिथे टुडे शब्द दोनदा आहे, जस्ट इन केस यू मिस्ड इट.

चिंतातुर जंतू Tue, 28/07/2015 - 14:42

In reply to by अजो१२३

>> इतिहासातून प्रेरणाच घ्यायची नाही तर इतिहास अभ्यासायचा कशाला?

मोठा गहन विचार आहे. नमन.

अजो१२३ Tue, 28/07/2015 - 15:29

In reply to by चिंतातुर जंतू

खवचट? न्यूनगंडी भारतैतिहासवाचकाची प्रतिक्रिया दुसरी काय असणार?

बॅटमॅन Tue, 28/07/2015 - 15:34

In reply to by अजो१२३

प्रेरणा घेणे एवढेच इतिहासाचे उद्दिष्ट वगैरे विचारसरणी लैच शाळकरी, ओव्हरसिम्प्लिफाईड आहे. तिचा निषेध करणे आणि न्यूनगंड असणे यांचा अर्थाअर्थी संबंध नाही.

अजो१२३ Tue, 28/07/2015 - 19:28

In reply to by बॅटमॅन

इतिहासाच्या अभ्यासाची एकूण काय उद्दिष्टे असतात? प्रेरणा, अस्मिता इ इ अँगल सोडले तर उर्वरित सर्व अँगल त्या त्या विषयात शिकवतातच/मांडतातच. सरळ भौतिकशास्त्रच शिकायचे ना, भौतिकशास्त्राचा इतिहास कशाला शिकायचा प्रेरणा नको असेल तर?
----------------------------------------

बॅटमॅन Wed, 29/07/2015 - 12:29

In reply to by अजो१२३

अनेक उद्दिष्टे असतात.

सरळ भौतिकशास्त्रच शिकायचे ना, भौतिकशास्त्राचा इतिहास कशाला शिकायचा प्रेरणा नको असेल तर?

हे सांगणारे तुम्ही कोण? प्रेरणा नको असे म्हटलेले नाही, फक्त प्रेरणा इतकाच उद्देश नसतो असे म्हटलेले आहे. पण सटल्टी एक तर समजत नसावी किंवा समजूनही भाषिक दौर्बल्याच्या नावाखाली पेडगावची ट्रिप करायची हौसच दांडगी असावी.

अजो१२३ Tue, 28/07/2015 - 19:32

In reply to by बॅटमॅन

परवा अमित शहाच्या इतिहासाबाबतच्या वक्तव्यावर ऋषिकेशची "चिंता" व्यक्त करणारी कमेंट पाहिली ना? (युरोपचा नि भारताचा जागतिक जीडीपीतला वाटा, इ इ )? प्रेरणा नसलेले लोक स्वतःच्या देशाबद्दलच्या कोणत्याही विधानाकडे किती निगेटीवली पाहतात ते त्यातून कळून यावे.

मूळात अशी चिंता का व्यक्त झाली? कारण कॉमी इतिहास.

राजेश घासकडवी Mon, 27/07/2015 - 14:21

In reply to by चिंतातुर जंतू

मी इथे पृथ्वीवर फिरतो, आणि मला सपाट जमिनीवर चालल्याचं जाणवतं. तेव्हा पृथ्वी सपाट आहे यावर माझा विश्वास आहे. मनात गाढ विश्वास असला तर अजून काय पुरावा पाहिजे त्यासाठी? खरंतर सपाट रस्ते बांधणाऱ्या माणसालाच भारतीय विज्ञान संस्थांचं प्रमुख करायला हवं.

अजो१२३ Tue, 28/07/2015 - 13:30

In reply to by राजेश घासकडवी

मी रस्त्यावर फिरतो आणि मला सपाट रस्त्यावर चालल्याचं जाणवतं. तेव्हा रस्ता सपाट आहे यावर माझा विश्वास आहे. आपल्यालाच सगळं कळतं असा मनात गाढ विश्वास असला तर अजून काय पुरावा पाहिजे कशासाठी? खरंतर सपाट पृष्ठभागावरील रस्ते सपाट असतात असे मानणारासच भारतीय विज्ञान संस्थांचं प्रमुख करायला हवं.
- रस्ता सर्वज्ञ अरुण.
=============================================
बाय द वे, अगदी सपाट पृष्ठभावरील सरळ रस्ते सपाट नसतात. Even after ignoring the default curvature of the earth, flat, straight road on flat land still has an intentional curvature.

अजो१२३ Tue, 28/07/2015 - 12:06

In reply to by चिंतातुर जंतू

कोणतं वक्तव्य? वरचं कि खालचं?
-------------------------------------
बाकी मूळातच तुमची प्रकृती चिंता करणारी असल्याने चिंताजनक शब्दाबद्दल बोलणार नाही, पण दुर्दैवी आणि विनोदी का बरं? देव नाही, राम नव्हता, राम देव नव्हता, राम पैदा झाला नव्हता, राम अयोध्येत पैदा झाला नव्हता, इ इ सेटला का म्हणे विनोदी आणि दुर्दैवी मानू नये?
-----------------------------------
आजकाल कोणत्या पदावर कोण आहे याबद्दल फार संवेदनशीलता वाढलेली दिसते. जरा कोरिलेशन काय ते कळेल का?
मंजे नुरुल हसन, रोमिला थापर, इ इ मार्क्सवादी इतिहासकारांनी गेली ७० वर्षे जेव्हा भारताचा इतिहास त्यांच्या कलाने लिहिला आणि स्थानिक अस्मिता सगळ्या शिक्षितांत मातीत मिळवल्या(त्यातले तुम्ही एक) तेव्हा का बरे विनोदी आणि दुर्दैवी वाटले नाही? आज का एवढा इतिहासाच्या भविष्याचा पुळका आला आहे?

अनु राव Tue, 28/07/2015 - 12:26

In reply to by अजो१२३

अजो - पुर्वीच्या सरकारनी पोसलेले लोक तर भाट आणि लाचार च होते आणि फक्त भाट नाही तर चालू आणि हीन प्रवृत्तीचे होते.
पण ते तसे होते म्हणुन हे नविन लोक जे तारे तोडतायत ते जस्टीफाय होत नाही.

अजो१२३ Tue, 28/07/2015 - 14:39

In reply to by अनु राव

यात तारा पार्ट काय आहे ते कळेल का?
===================================================
ओबामा गांधींजींच्या समाधीवर गेला. तिथे त्याला खूप प्रेरणादायी वाटले. जणू काही तिथे गांधीजी आहेतच. त्याला "त्या स्थळी" विशेष भाव जाणवले. इ इ इ इ इ ...
तुमचा प्रॉब्लेम काय?
त्यात विनोदी, दुर्दैवी, चिंताजनक काय?

अजो१२३ Tue, 28/07/2015 - 13:15

In reply to by चिंतातुर जंतू

कोणी काय म्हटलं आहे त्याला कॉमीज कसे कोट करतात याचे उदाहरण चिंजंचा हा कोट मानावा काय?

“I went to Ayodhya. Just walk through the streets — you will get a feeling of living in Ramayana times… I had this feeling. You can’t call it a myth, that’s my experience,” Rao said.

“What more proof do you want if you are convinced in your heart, your mind? So, that place is Ayodhya for those who believe in Ram and those who believe Ram lived there and was born there. This could be a common man’s approach,” he added.

पण हे चिंजंनी लिहिलं आहे तसं लिहिलं कि विनोदी वाटतं.

चिंतातुर जंतू Tue, 28/07/2015 - 14:17

In reply to by अजो१२३

>> पण हे चिंजंनी लिहिलं आहे तसं लिहिलं कि विनोदी वाटतं.

अगदी अगदी. आणि Indian Council of Historical Research ह्या भारदस्त नावाच्या राष्ट्रीय स्तरावरच्या संस्थेच्या उद्दिष्टांमधून तुमच्या माहितीसाठी -

to give a national direction to an objective and scientific writing of history and to have rational presentation and interpretation of history;

ते आणि अध्यक्षांनी जे म्हटलंय ते वरचं उद्धृत एकत्र पाहता मला ते विनोदी वाटतं. मोठी गंमतच आहे नाही सगळी?

अजो१२३ Tue, 28/07/2015 - 14:34

In reply to by चिंतातुर जंतू

तुम्ही कशाकशाला सिग्नेटरी आहात त्याची मला कल्पना नाही. पण घटनेची 'वी द पिपल' ने चालू होणारी प्रिअँबलला तुम्ही सिग्नेटरी आहात (वरचेच लॉजिक लावून) मानता येईल.

WE, THE PEOPLE OF INDIA, having solemnly resolved to constitute India into a SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC and to secure to all its citizens:

JUSTICE, social, economic and political;

LIBERTY of thought, expression, belief, faith and worship;

EQUALITY of status and of opportunity;

and to promote among them all

FRATERNITY assuring the dignity of the individual and the unity and integrity of the Nation;
======================
I know that the discussion is not about you per say. पण कृपया विचार, श्रद्धा, धर्म, विश्वास यांना घटनात्मक अधिष्ठान आहे ते काही मूर्खांनी दिलेलं नाही हे लक्षात घ्या. या मर्यादांतच अध्यक्षांनी आपले विचार मांडले आहेत. तुम्हाला राम नावाचा राजा अयोध्येत नसण्याची जितकी पक्की खात्री आहे तितकी प्रत्येकाला असणं आवश्यक नाही. तेव्हा कृपया कोणाच्या डीग्निटीला हात घालत विनोदी इ शब्द वापरू नकात. ते चीप वाटतं.

चिंतातुर जंतू Tue, 28/07/2015 - 14:48

In reply to by अजो१२३

>> विचार, श्रद्धा, धर्म, विश्वास यांना घटनात्मक अधिष्ठान आहे

>> या मर्यादांतच अध्यक्षांनी आपले विचार मांडले आहेत.

राष्ट्रीय पातळीवरच्या संशोधन संस्थेत belief, faith आणि worship ह्यांचे स्थानमाहात्म्य लक्षात आणून देणारे अध्यक्ष आणि ते म्या पामराच्या लक्षात आणून देणारे तुम्ही दोघेही आजपासून मला प्रातःवंदनीय आणि श्रद्धास्थानी आहात.

अजो१२३ Tue, 28/07/2015 - 15:25

In reply to by चिंतातुर जंतू

राष्ट्रीय पातळीवरच्या संशोधन संस्थेत belief, faith आणि worship ह्यांचे स्थानमाहात्म्य लक्षात आणून देणारे अध्यक्ष आणि ते म्या पामराच्या लक्षात आणून देणारे तुम्ही दोघेही आजपासून मला प्रातःवंदनीय आणि श्रद्धास्थानी आहात.

हे वाक्य कितीतरी प्रकारे चूक आहे.
कोणत्याही संस्थेतील कोणत्याही व्यक्तिस काहीही बिलिफ, फेथ आणि वर्शिप असू शकतात.
एखाद्या व्यक्तिच्या श्रद्धा एक विशिष्ट प्रकारे आहेत हे विनोदी आहे असे मानणे विनोदी आहे.

चिंतातुर जंतू Tue, 28/07/2015 - 15:41

In reply to by अजो१२३

अजो, आता माझ्यासाठी तुम्ही श्रद्धास्थानी आहात म्हटलंय ना? त्यामुळे मी तुमच्या विचारांचा प्रतिवाद करणार नाही. नमन. नमन. नमन.

अजो१२३ Wed, 05/08/2015 - 19:04

In reply to by चिंतातुर जंतू

रामजन्मभूमीचा खटला चाललेला तेव्हा रवि शंकर प्रसाद हे म्हणे थेट "राम लल्लाचे" वकिल होते. हा राम लल्ला कोण? यस, राम लल्ला म्हणजे भगवान राम. त्याचे हे वकिल.

मला हा प्रश्न नेहमी पडतो कि रवि शंकर प्रसाद जेव्हा न्यायालयात रामलल्लाचे वकील म्हणून प्रविष्ट झाले, तेव्हा "भारताच्या घटनात्मक पदावर असलेल्या" न्यायाधीशाने त्यांना (येडझव्यात काढून) का बरे हाकलून दिले नसावे? न्यायालयाने राम या ईश्वराचा वकिल मान्य करणं हे राम नावाचा ईश्वर, किंवा किमान तशी संकल्पना मान्य केल्यासारखं नाही का?

कोर्टानं असं काहीही मान्य करून घ्यावं का? हा विनोद नाही का? त्यावेळी सिक्यूलर लोक झोपले होते का? कि त्यांच्या विनोदग्रहणबुद्धीला ग्रहण लागले होते?
सुदर्शन रावांनी रामाचे नाव काढले कि च सिक्यूलरांना विनोदाचा चेव का उठतो?

आदूबाळ Wed, 05/08/2015 - 20:50

In reply to by अजो१२३

रामजन्मभूमीचा खटला चाललेला तेव्हा रवि शंकर प्रसाद हे म्हणे थेट "राम लल्लाचे" वकिल होते. हा राम लल्ला कोण? यस, राम लल्ला म्हणजे भगवान राम. त्याचे हे वकिल.

औट ऑफ क्युरिऑसिटी: रामभाऊंनी वकालतनामा कसा काय साईन केला असेल?

नितिन थत्ते Wed, 05/08/2015 - 20:58

In reply to by आदूबाळ

ते रामलल्लाचे वकील नव्हते बहुधा....
"रामलल्ला विराजमान" हा खटल्यातील पक्षकार असला तरी कायद्यानुसार कोणताही देव हा मायनर समजला जातो आणि त्याच्या तर्फे कोणीतरी दुसरा खटला चालवतो. त्या गार्डियनचे वकील रव्शंकर प्रसाद होते.
------------------------------
खटल्याच्या निकालाचे लॉजिक शॉल्लेट विनोदी होते.

तीन दावेदार होते. तिघांनाही आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ पुरावे सादर करता आले नाहीत. सबब (बळजोरीने कब्जा केला असला तरी) सध्या तिथे कब्जेदार असलेला रामलल्ला विराजमान हा त्या विशिष्ट जागेचा ताबा स्वतःकडेच ठेवू शकतो.

गब्बर सिंग Tue, 28/07/2015 - 04:58

रॉबर्ट वाड्रांना नोटीस - घ्या. आता टीका पण करायची नाही ????

"A show-cause notice was served on Robert Vadra on July 25 for his Facebook comments. He has been asked to reply within seven days. After getting a response from Vadra, the Speaker's office will decide whether the matter should be referred to the privileges committee," an official said.

वाड्रा त्या ट्वीट मधे असं काय आक्षेपार्ह बोलले होते ??

आणि त्यांच्याविरुद्ध चौकशी चालू असली म्हणून काय झालं ?? त्यांनी सरकारवर, संसद सदस्यांवर टीका पण कराय्ची नाही ????? त्याला पण का.दा.नो. ????

अतिशहाणा Tue, 28/07/2015 - 20:18

In reply to by अनुप ढेरे

सहमत. मध्यंतरी एका उर्मट आमदाराने रहदारीचा नियम चुकवल्याबद्दल जाब विचारणाऱ्या पोलीसावरही हक्कभंगाचा आरोप केला होता ना.

अजो१२३ Tue, 28/07/2015 - 23:36

In reply to by अनुप ढेरे

काही गोष्टी सुनिश्चितपणे नागरिकांच्या अधिकारांत मोडतात. काही नाही. काहींबाबत सांगता येत नाही.
उदा. "जन गन मन" हे गाणे तद्दन भिकारडे आहे असे तुम्हाला वाटले तर कदाचित तुम्ही राष्ट्रगीताचा अवमान करत आहात असा अर्थ काढला जाऊ शकतो. पण म्हणून काय हे गाणे आउट ऑफ डेट, भिकारडे असण्याची शक्यता शून्य आहे का? तर अशा नको नको त्या गोष्टींवर नको नको ते भाष्य करायचा अधिकार सगळ्यांना दिला तर गोंधळ माजेल म्हणून तो केवळ सांसदांना (आणि सदनातच) दिला आहे. सदनातील त्यांच्या वक्तव्याच्या हक्काबद्दलच (वक्तव्याबद्दल नव्हे) कोणी नागरीकाने त्यांना दुषणे दिली तर हक्कभंग वैगेरे प्रकार करू शकतात.

अर्थात यात बर्‍याच लूपहोल्स आहेत.

अजो१२३ Tue, 28/07/2015 - 23:24

पण एकदा कुणाहीबद्दल भक्ती वाटली की तटस्थपणाचं भान राखलं पाहिजे हे भानही संपतं. संपूर्ण तटस्थता अशक्य आहे असं आपण घटकाभर मानलं, तरीही ती आदर्श स्थिती आहे याचं भान बाळगणं ही कोणत्याही अभ्यासकाला अत्यावश्यक अशी गोष्ट आहे. ही गोष्ट आणि भक्ती यांत मुळातच एक विरोधाभास आहे.

आणि

आयसीएचार ही शासकीय संस्था आहे आणि अशा संस्थेच्या अध्यक्षाने अशी विधाने अध्यक्षीय कपॅसिटीत करणे हे त्या संस्थेला आजिबात शोभून दिसणारे नाही.

आणि

पण ते तसे होते म्हणुन हे नविन लोक जे तारे तोडतायत ते जस्टीफाय होत नाही.

आणि

खरंतर सपाट रस्ते बांधणाऱ्या माणसालाच भारतीय विज्ञान संस्थांचं प्रमुख करायला हवं.

आणि

शिवाय अस्मितांचे वर्णन करणे वेगळे आणि अस्मितांना उघडपणे गोंजारणे हे वेगळे. पण हे लक्षात कोण घेतो?
अर्थात घटनेने मुभा दिलीय म्हणून येनकेन वायझेडप्रकारेण प्रसिद्धी मिळवणे हे चूक कसे इतकाच प्रश्न असेल तर मात्र माझा तुम्हांला फुल सपोर्ट आहे.

----->
http://www.oneindia.com/2006/11/22/president-quotes-from-gita-116421506…
२००६ ची बातमी आहे. अब्दुल कलाम अगदी इस्रोच्या काळापासून गीतेतील उदाहरणे देण्यासाठी सु/कु (जे काय ते) प्रसिद्ध आहेत. मग ही चिंता, वायझेडपणा , भक्ती, इ इ शब्द तेव्हा का स्फुरले नसावेत?

Addressing students of the deemed university at the convocation here, Dr Kalam, while advising them to develop values along with learning, stated the purpose of human life was beautifully described in 'Bhagavat Gita.

शिवाय त्यांचा हा प्रसिद्ध कोट -
“We are all born with a divine fire in us. Our efforts should be to give wings to this fire and fill the world with the glow of its goodness.”
डिव्हाइन? व्हाट द फक? तुम्ही तर वैज्ञानिक वैगेरे नं? इतिहास वैगेरे मधे एखादे वेळेस चालेल...पण विज्ञानाच्या क्षेत्रात काम करताना जिथे तिथे गीता, वेद, कुराण...
कलाम हे इस्रोसारख्या शासकीय संस्थेचे प्रमुख आहेत याचे लांछन का बरे वाटले नसावे?
=====================================================
ज्यानं आपलं ऑफिशियल स्टॅट्स सेक्यूलर जाहीर केलं आहे त्यानं काहीही बोलावं, काहीही करावं, कोणतंही पद सांभाळां, मात्र ज्यांचा पक्षच उजवा आहे त्यांनी मात्र सांभाळून नि नास्तीकी बोलावं? कम्मॉन, बी स्पोर्ट.

बॅटमॅन Wed, 29/07/2015 - 12:27

In reply to by अजो१२३

गीतेत मानवी जीवनाचे पर्पज काय आहे ते सांगितले आहेच की. ते चूकबरोबर कसेही असले तरी "गीतेत असे असे सांगितले आहे" हे विधान त्यामुळे चूक ठरत नाही. कलाम यांनी "गीतेतल्या टेक्नॉलॉजीने मिसाईल बनवूया" छाप विधाने केली असती तर सिच्वेशन कंपॅरेबल असती. सुदर्शन रावांची अनेक विचारमौक्तिके त्या लेव्हलची आहेत.

I went to Ayodhya. Just walk through the streets — you will get a feeling of living in Ramayana times… I had this feeling. You can’t call it a myth, that’s my experience, [...] What more proof do you want if you are convinced in your heart, your mind?"

सुदर्शन रावांना अगदी श्रीरामदर्शनही झाले असेल असे मानून चालू, मात्र निव्वळ श्रद्धा असेल तर पुरावा कशाला पाहिजे अशा लेव्हलचे वायझेड विधान कलामांनी कुठे केल्यास दाखवून द्या. तोपर्यंत या तुलनेचा अट्टाहास निव्वळ करायचा म्हणून करणार असाल तर चालूद्यात. जमेल का?

अजो१२३ Wed, 29/07/2015 - 14:36

In reply to by बॅटमॅन

श्रद्धा असेल तर पुरावा कशाला पाहिजे

याला सादरीकरण म्हणतात. रावांनी काय म्हटलं त्याचं चिंजंचं हे सादरीकरण आहे.

I went to Ayodhya. Just walk through the streets — you will get a feeling of living in Ramayana times… I had this feeling. You can’t call it a myth, that’s my experience,” Rao said.

“What more proof do you want if you are convinced in your heart, your mind? So, that place is Ayodhya for those who believe in Ram and those who believe Ram lived there and was born there. This could be a common man’s approach,” he added.
रावांना पुरावा कशाला हे स्वतःला म्हणायचं आहे असं म्हणशील तर त्यांच्या बोलण्यात "सामान्य माणसाचा अप्रोच" कशाला म्हटले आहे हे कळेल काय?

आणि सामान्य माणसाला रामाबद्दल नि अयोध्येबद्दल काय वाटते, कसे वाटते हे रावांनी सांगण्यास बंदी आहे का?

बॅटमॅन Wed, 29/07/2015 - 14:39

In reply to by अजो१२३

I went to Ayodhya. Just walk through the streets — you will get a feeling of living in Ramayana times… I had this feeling. You can’t call it a myth, that’s my experience,” Rao said.

आयसीएचारच्या अध्यक्षाकडून यापेक्षा अधिक अपेक्षा आहेत. मुख्य काम सोडून अशा विधानांचे हापटबार सोडण्याला कै अर्थ नाही. बाकीची स्टेटमेंटेही बघावीत.

गब्बर सिंग Wed, 29/07/2015 - 02:38

A Plea Regarding “Liberal”

लिबरल म्हंजे नेमका कोण ?? कोण लिबरल नाही ?? लेफ्टिस्ट्स हे लिबरल का व कसे नाहीत त्याबद्दल.

Here I make a plea, addressed to conservatives and libertarians, regarding the word liberal: please do not describe leftists, progressives, social democrats, or Democrats as “liberal.” I do not ask that you describe yourself as “liberal.” Continue to call yourself “conservative” or “libertarian.” I propose only a single step: don’t call leftists “liberal.” By this single step, we can make great strides.

अजो१२३ Wed, 29/07/2015 - 16:32

If the commies prevail, they will write (history) that Kalam, a second-rate scientist, and as such not even nuclear scientist, was elevated to highest level by the BJP so that Indian nuclear bomb is not called Hindu bomb. How Kalam helped avert Hindu Bomb tag? हा इतिहास आत्ताच लिहिला गेलाय.

मग उरतो इतिहासाचा दुसरा भाग - अब्दुल कलामांमधे विशेष काही नव्हतं हे सिद्ध करणे. ते अस्सेच कोणीतरी होते म्हणणारे चिक्कार आहेत. जे इस्रो फॉलो करतात किंवा ज्यांनी कलाम राष्ट्राध्यक्ष झाल्यावर किंवा १९९८ च्या चाचणीनंतर कलामांवरचे "डिटेल" लेख वाचले आहेत त्यांना कलामांना तांत्रिक ज्ञानच नव्हते म्हणणारे लोक बरेच गवसतील.

And when Kalam became the President, Princeton scholar M V Ramana attributed it to Kalam's ability to "dress up even mediocre work with the tricolour to pass them off as great achievements."

इतिहास कसा लिहितात त्याचे उदाहरण.
---------------------------------
आता या पार्श्वभूमीवर, कलामांचा ७०-८० वर्षांनी इतिहास काय असेल? Again, if the commies prevail, the so called educated, elite class of those times would believe that Kalam was an worthless chap deliberately elevated to avoid Hindu Bomb tag by the RSS men. असं होण्याला इतिहासात चरित्र्याचा निचरा होणे म्हणू.

आपल्यासमोर पेश झालेली बहुतेक भारतीय ऐतिहासिक पात्रे अशीच निचरा करून पेश केलेली आहे. And so one doesn't feel like loving and liking them. Forget inspiring, they don't draw even basic respect from higher echelons of the society. सन्मान असूच द्या - 'देशभक्त असण्याचे लक्षण कोलू चालवणे नव्हे'- इ इ टाईपच्या रिडिक्यूलला बळी पडतात.

अंतराआनंद Thu, 30/07/2015 - 14:29

In reply to by अजो१२३

थोडक्यात इतिहास हा खरा आपल्यापुढे कधी येत नाही. असे असेल तर त्या इतिहासात घुसून उट्ट काढण्याचा एवढा सोस का? मग ती मशिद होती का मंदीर या वादाचा आणि ती पाडण्याचा फाय॑दा काय झाला? त्यापेक्षा वर्तमान सुधारण्याकडे लक्ष का देउ नये ?

राष्ट्र, राष्ट्रप्रेम, राष्ट्रासाठी त्याग, शहिद होणे इ इ संकल्पनांत ज्यांना आस्था नाही...

आपल्या संकल्पनांच्या व्याख्या वेग-वेगळ्या आहेत.

बॅटमॅन Thu, 30/07/2015 - 14:39

In reply to by अंतराआनंद

थोडक्यात इतिहास हा खरा आपल्यापुढे कधी येत नाही. असे असेल तर त्या इतिहासात घुसून उट्ट काढण्याचा एवढा सोस का? मग ती मशिद होती का मंदीर या वादाचा आणि ती पाडण्याचा फाय॑दा काय झाला? त्यापेक्षा वर्तमान सुधारण्याकडे लक्ष का देउ नये ?

अगदी बरोबर आहे. ब्रिटिशांमुळेच भारत तयार झाला, ते नसते तर आफ्रिकन सबसहारन आदिवासी आणि भारतीय यांच्यात काही फरकच राहिला नसता. हा इतिहास जपत वर्तमान सुधारू या. काळे साहेब बनणे जोमाने चालू ठेवूया.

अरेरेरे, खरं सत्य सांगितलं तरी आवडत नाही लोकांना. ब्रिटिश किती छान होते आणि भारतीय (खरेतर ही संज्ञाही चूकच, ब्रिटिशांअगोदर इथे फक्त आदिवासी होते) कसे मूर्ख अज्ञानी होते आणि त्यामुळे आपल्या अभ्युदयाचा खरा मार्ग काय आहे हे सांगितलं तर असा राग का यावा? शांत व्हा, ब्रिटिश बना.

अजो१२३ Wed, 05/08/2015 - 19:10

In reply to by अंतराआनंद

त्यापेक्षा वर्तमान सुधारण्याकडे लक्ष का देउ नये ?

खरा इतिहास खोदून काढणे नि वर्तमान सुधारणे यांत वर्तमान सुधारण्यास नक्कीच पहिली प्रायॉरिटी आहे. पण चर्चेच्या विषयाची सीमा "खरा इतिहास" असेल तर वर्तमान सुधारणे हा पर्याय म्हणून देता येत नाही.

अजो१२३ Wed, 29/07/2015 - 22:34

तटस्थ (रीड कॉमी) इतिहासलेखन पद्धतीमुळं भारतात किती मोठमोठाले विनोद झाले याची गणती नाही. अगदी महत्वाच्या प्रसंगी!!! त्यावेळी सिडो-सिक्यूकर वाकळ पांघरून झोपलेले.

अलाहाबाद कोर्टाचा जेव्हा रामजन्मभूमीवर (मोर फॅशनेबली विवादित ढांच्यावर) निकाल आला तेव्हा
१. हिंदू ब्राह्मण न्यायाधीश श्री शर्मा म्हणाले - हे नि:संशय रामाचे मंदिर होते.
२. हिंदू बनिया न्यायाधीश श्री अगरवाल म्हणाले - हे काहीतरी हिंदू स्थळ आहे.
३. मुस्लिम न्यायाधीश श्री खान म्हणाले - एकेकाळी ही एक गैरइस्लामी इमारत होती.

अबे काय जोक करता का? भारतीय इतिहास संशोधन मंडळाने वा पुरातत्त्व खात्याने तुम्हाला किती रिपोर्ट दिले होते तिथे काय आहे हे सांगणारे?

या निकालाच्या वेळेस या मंडळांच्या अध्यक्षपदी असणारी मंडळी रियल जोकर्स होती. तटस्थपणा आणि वास्तव यांची चाड तर जाऊच द्या, यांना किमान लॉजिकल कंसिस्टंसीचे देखिल भान नव्हते.

तीन मुस्लिम जज वा तीन हिंदू जज वा तीन अन्य क्कोणी जज यांनी मंदीर होते वा मंदिर नव्हते यापैकी काहीही निकाल दिला असता तर तो देशाला मान्य व्हायला हवा होता. इतकं यांचं रेप्यूटेशन असायला पाहिजे होतं. देशाला मान्य होण्याचं असोच, किमान (वास्तव काय आहे याबाबत, वाटप कसे व्हावे याबाबत असो)जजांत एकमत व्हावं इतकीही यांच्या कामाची प्रतिष्ठा नव्हती.
=================================================================================================
रावांसारख्या देशाच्या एका उच्चपदस्थ नागरीकाला देखिल आपली ईश्वरभक्ती प्रकट करण्यासाठी किंवा देशाच्या जनतेच्या अयोध्येबद्दलच्या भावना कशावर आधारित आहेत हे सांगण्यासाठी मूर्खत्त्वाचे ताशेरे ओढवून घ्यावे लागणे कोणत्याही उच्च मूल्यांचा ढोल बडवणार्‍या लोकशाहीला लाजवणारे आहे.

गब्बर सिंग Sun, 02/08/2015 - 05:54

Peter Brook to return to the Mahabharata for new play, Battlefield

Director who adapted Sanskrit epic into famed nine-hour production in 1980s will draw on section about family torn apart by war for Young Vic show

Peter Brook is to return to one of his most celebrated productions with a new play drawing on a section of the ancient Sanskrit epic the Mahabharata.

The director’s nine-hour production of the Mahabharata 30 years ago has gone down in theatre history as one of the greatest and, if you were there, memorable productions of all time.

Marie-Hélène Estienne, a long-time collaborator who worked as Brook’s assistant on the Mahabharata in the 1980s, said it would be impossible to stage in its entirety again.

Archive theatre review: Krishna comes to the city of the popes
Michael Billington reports from a quarry near Avignon on Peter Brook's dawn-to-dusk staging of the great Sanskrit epic, the Mahabharata

Read more
But she, Brook and writer Jean-Claude Carrière have returned to the 3,000-year-old text for a new play called Battlefield which draws on one section in which the Bharata family is torn apart by war and trying to make sense of the horrors they have experienced – and perpetrated.

“It has come back again I think because of the situation of the world,” said Estienne. “The Mahabharata is not moralistic, it is fact. The moral, the good or bad, is not really there, it is another matter – a matter of what you have to do.”

The play is co-produced by the Young Vic in London where it will be staged next year from 3-27 February.

----------------------------------------------------------

UberPOP halts service in France after clampdown, protests

बातमी १ महिना जुनी आहे. कदाचित मी आधी पोस्ट केलेली असेलही.

फ्रान्स हा ग्रीस च्या दिशेने जात आहे असे दिसते. फ्रान्स सरकारचा बेमुर्वतखोरपणा वाढतच चाललेला आहे.

नितिन थत्ते Sun, 02/08/2015 - 20:07

In reply to by गब्बर सिंग

The opposition of taxi drivers is for operating public taxis without licence fees. and French govt is right in taking licenced taxi drivers' side.

Although Uber is showing it off as destabilizing effects of technology, it is about operating taxis (doing business) without proper licence (which Uber does not seem to deny).

उबेर असे दर्शवू पहात आहे की नव्या जमान्यातल्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊ न शकणार्‍या "गावंढळ" टॅक्सी ड्रायव्हरांचे हे आंदोलन आहे. परंतु खरे तर हे आंदोलन योग्य लायसन्सशिवाय टॅक्सी सेवा पुरवणार्‍यांच्या विरोधात आहे (उबेरच्या स्टेटमेंटवरून लायसन्सशिवाय टॅक्सी चालवण्याची बाब उबेरने नाकारलेली नाही). खरे तर फ्रेंच सरकारने हे आधीच करायला हवे होते.

पक्के बिल हवे असेल तर १३ टक्के टॅक्स लागेल म्हणून कच्चे बिल देऊन स्वस्तात माल देण्या/घेण्यासारखा प्रकार आहे. आणि अशा व्यापार्‍यांनी मोबाईल अ‍ॅप सुरू करून लोकांना ही टॅक्स चुकवेगिरीची सेवा दिली तर चालेल का? (तुम्ही बहुधा चालेल म्हणाल कारण ग्राहकाला स्वस्तात माल मिळणार आहे आणि कुठल्याही प्रकारच्या कराला तुमचा विरोधच असणार).

गब्बर सिंग Mon, 03/08/2015 - 00:25

In reply to by नितिन थत्ते

तुमचा मुद्दा यथार्थ आहे.

उबर व ल्यिफ्ट चे समर्थन एवढ्यासाठी की - १) सामान्य माणसाला त्याच्या कन्झम्शन अ‍ॅसेट चे रुपांतर कॅपिटल अ‍ॅसेट मधे करता यावे व ते सुद्धा पार्ट-टाईम (व त्यासाठी अ‍ॅसेट चा रंग बदलायला लागू नये. तो काळा-पिवळा करायला लागू नये.). थॉमस पिकेट्टी यांच्या पुस्तकात मांडलेला थिसिस हा आहे की कॅपिटल अ‍ॅसेट्स चे मालक हे जास्त रिटर्न्स कमावतात लेबर पेक्षा. रिटर्न ऑन कॅपिटल हा रिटर्न ऑन लेबर पेक्षा खूप जास्त आहे. व ह्यामुळे असमानता निर्माण होते. मग ज्यांना त्यांचे कन्झम्प्शन अ‍ॅसेट्स कॅपिटल अ‍ॅसेट्स मधे रुपांतरित करायचे आहेत त्यांना सरकारी आडकाठी का असावी ??? , २) जगात जिकडे तिकडे टॅक्सी सेवा आहेत व त्या स्थानिक युटिलिटी कमिशन्स नी ( किंवा तत्सम डिपार्टमेंट्स नी) रेग्युलेट केलेल्या आहेत. व या गेली अनेक दशके चालू आहेत. अनेक ठिकाणी टॅक्सी च्या कंपन्या सुद्धा आहेत. परंतु तरीही टॅक्सीज ह्या अस्वच्छ, सोयींचा अभाव असलेल्या अशा का राहिल्यात त्याचा विचार झालेला नैय्ये. बहुतेक वेळी टॅक्सीज या जुनाट, अस्वच्छ, कामचलाऊ असतात. एखादा पॅसेंजर जर १ तास टॅक्सीत बसणार असेल तर त्यास पिण्याचे पाणी मिळत नाही. (माझ्या माहीतीनुसार या सगळ्या समस्यांचे एक कारण म्हंजे लायसेन्सिंग चे असलेले क्वोटाज.) याचा अर्थ रेग्युलेटर ने पाण्याच्या बाटल्या ठेवणे मँडेट करावे असे मला म्हणायचे नाही. पण उबर मुळे ते शक्य होऊ शकते. (शक्य होऊ शकते म्हंजे अनिवार्य नव्हे.) कारण टॅक्सीचालकाला व पॅसेंजर ला दोघांनाही एकमेकांबद्दल फीडबॅक देण्याची सोय उबर च्या अ‍ॅप्प मधेच असणे हे यास चालना देऊ शकेल. ( असा फीडबॅक देण्याची सोय ही काही टॅक्सी युनियन्स नी ठेवलेली आहे हे उल्लेखनीय आहेच.)

मुख्य मुद्दे हे विश्वास निर्माण करणे, गुन्हेगारीची शक्यता, टॅक्सी ड्रायव्हर ने पॅसेंजर वर केलेल्या हल्ल्यांची पार्श्वभूमि, टॅक्सी ड्रायव्हर ने बेपर्वाईने/दारू पिऊन टॅक्सी चालवण्याच्या घटना हे आहेतच. इतर व याहीपेक्षा गंभीर घटना आहेतच. पण पॅसेंजरने सुद्धा ड्रायव्हर वर हल्ला केल्याचा घटना असू शकतात. व लायसेन्सिंग करून सरकार (युटिलिटी कमीशन्स) ह्याच मुद्द्यांची पूर्तता करू इच्छिते. पण Uber, Lyft have every incentive to do exactly that. Uber's very survival depends on both drivers and potential passengers trusting, downloading, and using its app. उबर च्या लायसेन्सिंग रिक्वायरमेंट्स सरकारप्रमाणेच आहेत. पण त्यापलिकडे उबर जी काही व्हॅल्यु अ‍ॅड करते तिच्या शक्यतेस मारून टाकणारी फ्रेंच सरकारची, पिट्सबर्ग शहरव्यवस्थापनाची, साऊथ कॅरोलिना सरकारची कृति आहे. (This value is added by enabling all parties to put competitive pressure on each other. व हे प्रेशर हे सरकारपुरस्कृत मँडेट प्रमाणे नसते.)

एखाद्या व्यक्तीस पूर्णवे़ळ टॅक्सी चालवायची नसेल व फक्त आठवड्यातून दोन वेळाच चालवायची असेल तर - त्यासाठी तिला तिच्या कार चा रंग का बदलायला लावावा ? अ‍ॅप्प वर बंदी घालणे हे या व अशा व्यक्तींच्या संधीस मारक नाही का ??

उदय. Wed, 05/08/2015 - 19:46

In reply to by नितिन थत्ते

योग्य लायसन्सशिवाय टॅक्सी सेवा पुरवणार्‍यांच्या विरोधात आहे

मुळात टॅक्सी सेवा पुरवण्यासाठी लायसन्स देण्याची गरजच काय? सरकारने का ठरवावे कुणाला लायसन्स द्यावे, किती लायसन्स द्यावे? लायसन्सचा केवळ १ उद्देश मला दिसतो, तो म्हणजे सरकार सांगणार की तुम्ही धंद्याला उतरलात तर मनमानी करून भाडे नाकारू शकत नाही. पण मला माझी खाजगी गाडी आठवड्यात ३ दिवस पिझा डिलिव्हरीच्या दुकानासाठी आणि पैसे घेऊन सिनियर सिटीझन्सना फिरवून आणण्यासाठी वापरायची असेल, तर करता येणार नाही का?

नितिन थत्ते Wed, 05/08/2015 - 20:41

In reply to by उदय.

>>पण मला माझी खाजगी गाडी आठवड्यात ३ दिवस पिझा डिलिव्हरीच्या दुकानासाठी आणि पैसे घेऊन सिनियर सिटीझन्सना फिरवून आणण्यासाठी वापरायची असेल, तर करता येणार नाही का?

नाही येणार आणि येऊ नये. (अर्थात भारतात अशा प्रकारे व्यवसाय केला जातो हे ठाऊक आहे).

>>सरकारने का ठरवावे कुणाला लायसन्स द्यावे, किती लायसन्स द्यावे? लायसन्सचा केवळ १ उद्देश मला दिसतो, तो म्हणजे सरकार सांगणार की तुम्ही धंद्याला उतरलात तर मनमानी करून भाडे नाकारू शकत नाही.

भाडे नाकारू शकत नाही तसेच मनमानी भाडे आकारू शकत नाही. त्यासाठी त्या टॅक्सीला मीटर लावलेला असतो आणि तो सरकारी यंत्रणेतून सर्टिफाय केलेला असतो. (परत हे इतक्या काटेकोरपणे होत नाही हे मान्य आहे. पण उद्देश तरी असा असतो).

----------------------------
एकूणच सगळ्या रेग्युलेटर्सची गरजच काय आहे?

गब्बर सिंग Wed, 05/08/2015 - 21:47

In reply to by नितिन थत्ते

एकूणच सगळ्या रेग्युलेटर्सची गरजच काय आहे?

मार्केट फेल्युअर हे सत्य आहे व म्हणून मार्केट करेक्शन करण्यासाठी गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड रेग्युलेटर असायला हवा असा स्टेटिस्ट लोकांचा दावा असतो. पण मार्केट फेल्युअर प्रमाणेच गव्हर्नमेंट फेल्युअर पण असते. व ते खूप समस्याजनक असते. पण नाही....

the recommendation of government intervention does not follow from the demonstration that government intervention could improve matters. Demonstrating that a set of government decisions would improve matters is not the same as demonstrating that actual government decisions would do so. ____ गॅरी बेकर.