ही बातमी समजली का? - ८४
Foxconn plans $5 billion investment over 5 years in Maharashtra facility
Taiwan's Foxconn, the world's largest contract electronics manufacturer and a key supplier to Apple Inc (AAPL.O), on Saturday signed a pact with Maharashtra to invest $5 billion over five years on a new electronics manufacturing facility.
The announcement was made by Foxconn founder Terry Gou and Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis after the signing of an accord in the state capital Mumbai.
The Foxconn announcement will bolster Indian Prime Minister Narendra Modi's "Make in India" campaign, which aims to turn Asia's third-largest economy into a manufacturing powerhouse.
Gou said Foxconn, the trade name for Hon Hai Precision Industry Co Ltd (2317.TW) which also counts Blackberry (BB.TO), Xiaomi and Amazon (AMZN.O) as clients, was looking for local partners for the facility in the western Indian state.
विणकरांना योग्य मोबदला हवा!
विणकरांचे वेतन वाढले पाहिजे
हातमागाच्या कपडय़ांचा वापर वाढत आहे.
कायकाय बोलावं लागतं सत्ता टिकवण्यासाठी.
-----------------
RSS's ulema conference calls for terror-, riot-free India
Maulana Haider alleged that politicians provoked Muslims against RSS and Hindus against minorities.
तुळजाभवानी मंदिराकडून
तुळजाभवानी मंदिराकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सोन्या-चांदीचा आशीर्वाद!
माहितीच्या अधिकारात पुजारी मंडळाचे किशोर गंगणे यांनी ही माहिती मिळविली.
हे वाक्य कळीचे आहे. माहीतीच्या अधिकाराच्या कक्षेत मंदिरे का असावीत ?? म्हंजे ही माहीती प्रायव्हेट का नसावी ?? गंगणे यांची माहीती मिळवण्याची लोकस स्टँडी असेलही पण ती प्रसिद्ध न करण्याची जबाबदारी त्यांच्यावर का घातली जाऊ नये ?
मंदिरात अर्पण केल्या गेलेल्या धनाचे पुढे काय होते याची जाहीर चर्चा व चौकशी का व्हावी ??
का होऊ नये??
मंदिरात अर्पण केल्या गेलेल्या धनाचे पुढे काय होते याची जाहीर चर्चा व चौकशी का व्हावी ??
का होऊ नये??
उच्चपदस्थ अधिकारी आपल्या पत्नीसमवेत दर्शनाला आले असता त्यांना शालू, पैठणी, महागडय़ा साडय़ा, महावस्त्र 'आशीर्वाद' म्हणून दिले गेल्याची नोंद आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ात जिल्हाधिकारी म्हणून काम करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचे सासू-सासरे, पोलीस अधीक्षकांचे मामा-मामी, तहसीलदार साहेबांचे साडू-मेहुणी, आयुक्त साहेबांचा मुलगा, जावई, गाडीचा चालक आणि त्यांचे मित्र यांच्यावर देखील अशा प्रसादाची मुक्त उधळण करण्यात आली आहे
हे सगळे लोकांनी दिलेल्या पैशातूनच ना!
अर्थात या विश्वस्त संस्थेला 'कायदेशीरपणे' एका मर्यादेपर्यंत अशा भेटवस्तूंवर खर्च करता येतोही. (म्हणूनच कदाचीत लेखा परिक्षणात अजून तरी कारभार्यांवर ठपका आलेला दिसत नाही). त्यामुळे हे 'बेकायदेशीर' नसेल, पण 'अनैतिक' नक्कीच वाटते! तुळजापूर मंदीर अजून चांगल्या पद्धतीने मॅनेज करण्यासाठी हा पैसा वापरला असता तर...
तुळजापूर मंदीर अजून चांगल्या
तुळजापूर मंदीर अजून चांगल्या पद्धतीने मॅनेज करण्यासाठी हा पैसा वापरला असता तर...
हे मूठभर लोकांना वाटून उपेग नाही. सोयीसुविधा नै दिल्या तर आम्ही देवदर्शनाला येत नाही वगैरे कोणी म्हणणार नाही, म्हणतही नाही हे विश्वस्तांना चांगलेच ठाऊक आहे त्यामुळे त्यांना गरज वाटत नाही.
मंदिरात अर्पण केल्या गेलेल्या
मंदिरात अर्पण केल्या गेलेल्या धनाचे पुढे काय होते याची जाहीर चर्चा व चौकशी का व्हावी ??
जाहीर चर्चा, चौकशी वगैरेचे मुद्दे मला फारच तांत्रिक वाटतात. मुख्य मुद्दा माझ्या दृष्टीने असा आहे की अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना खूष करण्यासाठी देवस्थानाचा पैसा खर्च व्हावा का?
१. देवाच्या भक्तांनी नवससायास केले, देवाला साकडं घातलं.
२. आमचं भलं केलंस तर आम्ही तुला पैसे देऊ म्हटलं. कोप होऊ देऊ नको, आम्ही तुला पैसे देऊ म्हटलं.
३. त्याप्रमाणे ते पैसे त्यांनी दिले.
४. देवाचे एजंट म्हणून देवस्थानाने ते पैसे आपल्या ताब्यात ठेवले.
५. आता तेच पैसे वापरून ते अधिकारी व्यक्तींना साकडं घालतात.
६. आमचं भलं करा, कायदेशीर बाबतीत झुकतं माप द्या आम्ही तुम्हाला पैसे देऊ. तुम्ही आमच्यावर कोपू नका, उगाच व्यवस्थापनात खुसपटं काढू नका, आम्ही तुम्हाला पैसे देऊ.
७. त्याप्रमाणे ते पैसे त्यांनी खरोखरच दिले.
८. सरकारचे एजंट म्हणून त्या अधिका
ऱ्यांनी पैसे आपल्या ताब्यात ठेवले.
यात जर सामान्य भक्ताने सर्वशक्तिमान देवाला पैसे दिलेले चालतात, तर सामान्य देवस्थान व्यवस्थापनाने तेच पैसे सर्वशक्तिमान सरकारला देण्यात नक्की कोणाची काय हरकत आहे?
सर्व देवांना नमस्कार
>> तुळजाभवानी हे माझे कुलदैवत आहे (म्हणे) पण मला या जागेचा, शहराचा, मंदिराचा आणि देवीचा प्रचंड तिटकारा आहे. या मंदिरात संडास कुठे करावी आणि कुठे करू नये इतका साधा नियम, by scores, पाळला जास्त नाही. प्रचंड अजागळ प्रकार आहे.
ह्यात तुळजाभवानीचं विशेष कर्तृत्व नसावं. पंढरपुरातही परिस्थिती फार वेगळी नसावी.
Sanitary workers dread Pandharpur festival
बाजू न्यायाची आणि मानवतेची
वारकऱ्यांना दिलासा
माझ्यामते
माझ्यामते शिवडीवडाळ्याच्या खाजण जमिनी आणि भांडुप-नाहूर-कांजुरमार्गची मिठागरे आणि खारटाणे याबदल्यात हे औदार्य असावे. अर्थात बातमीत किंवा निवेदनात असा उघड उल्लेख असणे शक्यच नाही, पण बिट्वीन द लाइन्स बरेच काही असावे. पण ठीक आहे. चोराच्या हातची लंगोटी. (चोरीचा माल गेला पण चोराची लंगोटी तरी मिळाली.)
Charting a course for the
Charting a course for the Indian economy
Karthik Muralidharan (Associate Professor of Economics, University of California, San Diego) speaks with Arvind Subramanian (Chief Economic Adviser, Government of India) on a broad set of issues ranging from the uniqueness of the Indian development model, the political economy of reforms, reducing factor misallocation in the economy, enhancing State capacity, financing India's infrastructure needs, to the implications of the Fourteenth Finance Commission, improving the design of social welfare programmes, and climate change.
ज्यांचे डोळे उघडे आहेत
ज्यांचे डोळे उघडे आहेत त्यांना यामुळे भिती वाटणं सहाजिक आहे. त्यातल्यात्यात कोर्टाचे हे विधान आशादायक आहे:
During the hearing, the government argued that Pillai, had she gone to London, would have created a “negative image” of her country, which might have discouraged prospective investments in India. The court dismissed this. Pillai’s right to travel, the judge wrote, “cannot be impeded only because it is not in sync with [the] policy perspective of the executive … Criticism, by an individual, may not be palatable; even so, it cannot be muzzled.”
कोर्टाच्या फक्त सोयीस्कर निर्णयांचा दाखला देणारी बंद डोळ्यांची मांजरे, इथेही डोळेझाक करतील हे उघड आहे.
आजच्या लोकसत्ताचा
आजच्या लोकसत्ताचा अग्रलेखः
http://www.loksatta.com/sampadkiya-news/sundar-pichai-newly-appointed-c…
'सत्य'..'सुंदर'..घराबाहेर!
आपली व्यवस्था ही कमअस्सलांनाच डोक्यावर घेणारी असल्यामुळे अस्सलांना अन्य मार्ग शोधावे लागतात. ते कोणते हे अमेरिका वा अन्य देशांत स्थलांतरित होऊन झळाळती कामगिरी करून दाखवणाऱ्या भारतीय तरुणांनी दाखवून दिले आहे..
बोचरे मुद्दे आहेत.
याचसोबत आणखी एक लेख आहे.
http://www.loksatta.com/vishesh-news/narayana-murthy-expressed-disappoi…
ओरिजिनॅलिटीचा इतका अभाव का?
काहीसा तत्समच. बोचराच. बरेच मुद्दे अमान्य करता येत नाहीत.
दोन्ही लेख मला आवडले. आपण
दोन्ही लेख मला आवडले. आपण बाहेर आहोत म्हणजे अस्सल आहोत असा सोयिस्कर व्यत्यास करुन घेणारेही पुष्कळ निघतील. :-)
बाकी सत्या नाडेला किंवा सुंदर पिचई वगैरेंना अस्सल म्हटले तरीही गूगल किंवा अॅपलसारखी कंपनी मुळातून सुरु करुन (अमेरिकेत का होईना) तेवढी नावारुपाला आणू शकेल असा असली अस्सल बघायला मिळेल का? की तसे पैदाच होत नाहीत भारतात?
असेच
आपण बाहेर आहोत म्हणजे अस्सल आहोत असा सोयिस्कर व्यत्यास करुन घेणारेही पुष्कळ निघतील. (स्माईल)
हे बाकी पटले :) शिवाय भारतातले आहोत म्हणून प्रमोशन मिळत नाहीत. गोऱ्या लोकांचा वर्णभेद, ओल्ड बॉईज क्लब वगैरेमुळे कसा अन्याय होतो याच्याही गोष्टी सांगणारे भारतीयच आहेत. ;)
पण भारताची संस्कृती कमअस्सल लोकांना वर आणणारी आहे हे टीपिकल कुबेर स्टाईल सामान्यीकरण आहे. निव्वळ आयटीचं उदाहरण घ्यायचं तर अमेरिका वगळता सगळ्यांचीच संस्कृती कमअस्सल लोकांना वर आणणारी आहे असं म्हणावं लागेल. चीन वगळला तर इतरत्र बहुसंख्य अमेरिकन कंपन्यांचेच प्रॉडक्ट्स वापरले जातात. गूगलसारख्या कंपन्या बॅन केल्या नसत्या तर चीनमध्येही बायडू, टेनसेट वगैरे कंपन्या उदयाला आल्या नसत्या. शिवाय गूगलसाठी भारत हे आता मोठं मार्केट आहे. गेल्या काही वर्षातला गूगलचा (अँड्रॉईड वन वगैरे) प्रवास पाहता भारतीय व्यक्तीला महत्त्वाचे पद मिळणार असा अंदाज होताच.
भारतात आता निदान आयटीमध्ये स्टार्टप कल्चर बरंच रुजायला लागलं आहे. फ्लिपकार्ट, स्नॅपडील, ओला वगैरे सेवा खूपच मोठ्या झाल्या पण एसएमई सेगमेंटमध्ये छोट्याछोट्या स्पेसेफिक सेवा देणाऱ्या अनेक भारतीय कंपन्या उत्तम काम करत आहेत.
छोट्या-छोट्या कंपन्या उत्तम
छोट्या-छोट्या कंपन्या उत्तम काम करत आहेत यात शंका नाही पण डिसरप्टीव्ह म्हणावे असे इनोव्हेशन (उदा. अलिबाबा) कोणी केलेले कधी बघायला मिळेल का असा प्रश्न होता. छोट्याच काय पण मोठ्या कंपन्यांतल्या किती कल्पना ओरिजिनल आहेत आणि किती फक्त डेव्हलप्ड मार्केटमधल्या प्रूव्हन कन्सेप्ट केवळ मार्केट मोठं होतंय म्हणून आता वापरायला काढल्या आहेत?
या स्टार्टपपैकी एखादी खरोखर गूगल-अॅपल-अलिबाबाच्या तोडीची होईल या निव्वळ आशावादा व्यतिरिक्त यामागे सध्यातरी दुसरा आधार नाही. :-)
गूगल किंवा अॅपलही
तुमचा मुद्दा मान्य आहे. पायाभूत अशा संशोधनात भारत मागेच आहे. पण मुळात गूगल किंवा अॅपल या कल्पनाही ओरिजिनल नाहीत. फ्लिपकार्ट/स्नॅपडीलने भारताच्या रिटेल शॉपिंगमध्ये डिसरप्शन केलेच आहे. भारतातील मध्यमवर्गाचा विस्तार वाढत जाईल तशी या कंपन्यांची फूटप्रिंटही वाढत जाईल. अलिबाबा/बायडू/टेनसेट वगैरे चीनी कंपन्यांचा आकार इतका वाढण्याचं कारण म्हणजे सरकारी हस्तक्षेपामुळं त्यांना इतर मोठ्या कंपन्यांची काहीही स्पर्धा नाही.
उदा. काही वर्षापूर्वी धिंगाणा या कंपनीने मोफत मराठी/हिंदी गाणी ऐकण्याची सुविधा सुरु केली होती. त्यांना बरंच फंडिंग वगैरेही मिळालं होतं. सुरुवातीची दोनतीन वर्षं या फंडिंगवर चालून गेली. अॅक्च्युअल कमाई करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी पैसे देऊन काही अधिक सुविधा देऊ केल्या (फ्रीमियम मॉडेल), मात्र या पेड सर्विसला अत्यंत निराशाजनक प्रतिसाद मिळाल्याने त्यांना गाशा गुंडाळावा लागला. साधारण अशीच सुविधा देणाऱ्या शॅझम, स्पॉटिफाय किंवा पॅंडोरा सारख्या सेवा परदेशात चांगल्या सुरु आहेत. या अशा प्रकारामागचं कारण डिस्पोजेबल इन्कमचा अभाव किंवा पैसे खर्च न करण्याची ग्राहकांची मानसिकता. जसजशी ग्राहकांची मानसिकता बदलेल तसं हे चित्रही बदलेल असं वाटतंय.
इंग्लिश स्पीकिंग देश हा या
इंग्लिश स्पीकिंग देश हा या बाबतीत तोटा आहे भारताचा. बायडू वगैरे सारखं लोकल सर्च इंजिन तयार होतच नाही तर प्रोटेक्शन देणार कोणाला? किमान जपान्यांसारखं दुसर्यांचे टीव्ही उघडून बघून त्यापेक्षा किंचित बरे टीव्ही बनवण्याची वृत्ती असती तरी काहीतरी झालं असतं.
१९८४ साली राजीव गांधी यांचा
१९८४ साली राजीव गांधी यांचा राजकीय क्षितिजावर उदय होईपर्यंत संगणक हे काय आहे हे भारतीय समाजमनास तितकेसे समजलेले नव्हते. त्याआधी संगणक आयात करू पाहणाऱ्या टाटा समूहास त्याची परवानगीदेखील सरकारने नाकारली होती. का? तर संगणकास यंत्र मानण्यास आपले सरकार तयार नव्हते. संगणकाच्या आत काही सामग्री नसते आणि त्यातून बाहेरही काही पडत नाही, तेव्हा त्यास यंत्र कसे म्हणणार, असा सरकारचा प्रश्न होता. तरीही जे संगणक आयात करू इच्छित होते त्यांच्यावर मूळ किमतीच्या ३०० टक्के इतका प्रचंड कर आकारला जात असे. हा असला सरकारचा भिकार दृष्टिकोन आणि गुणवत्तेस रोखणारी तितकीच भिकार सामाजिक, राजकीय कारणे यांमुळे भारतीय तरुणांनी अमेरिकेचा रस्ता धरला.
हा संपादक जोकर वैगेरे आहे का?
सरकारच्या काय इंपोर्ट करतात, नाहीत इ इ च्या वेगवेगळ्या लिस्ट असतात. त्यात संगणकाचं नाव भारत सरकारनं अंमली पदार्थ म्हणून घातलं होतं का? कि एक सजीव म्हणून घातलेलं? एखाद्या नव्या गोष्टीचं एच एस (Harmonized System) क्लासिफिकेशन होत नाही तोवर सरकार, कस्ट्म्स आणि व्यापारी यांच्यात त्यावर किती ड्यूटी असावी याचे वाद होतात. कस्टम्सला संगणक हे श्रीमंत लोकांच्या करमणूकीचे साधन वाटले तर ते ३००% ड्यूटी लावेल, इंडस्ट्री याला काही अर्थ नाही म्हणेल. हा इश्श्यू सेटल व्हायला वेळ लागतो. त्याचं असं मूर्खासारखं वर्णन करू नये.
==============================================================
तंत्रज्ञानाचा रेटा प्रचंड असतो. त्यातून आर्थिक लाभ पाहणारे त्याला तडीस नेतात. पण आरंभीच्या काळी कोणत्याही तंत्रज्ञानास विरोध होणे साहजिक आणि आवश्यक आहे.
आज एखाद्या तंत्रज्ञानाचे फायदे तोटे रिट्रोस्पेक्टीवली आरामात सांगता येतात. पण तशी कल्पना मागे नसते.
गर्भजल/लिंगनिदान परिक्षा हे तंत्रज्ञान आहे. बिनविरोध स्वीकारले गेले. ते जेव्हा भारतात प्रचलित होते तेव्हाच्या जनरेशन्सची डेमोग्राफी पाहिली तर सेक्स रेशोचा या तंत्रज्ञानाच्या काळात बँड वाजला. शेवटी सरळ बॅन घातला गेला.
========================================
तंत्रज्ञानाला विरोध करण्यात काही चूक नाही, तो विरोध मेरिट बेसड असावा. संगणक आज नसते तर काय असतं याचं सिम्यूलेशन आहे का? हाऊ डू द सिन्स कंपेअर?
शब्द छटा
‘ओरिजिनॅलिटी’साठी अस्सलता हा शब्द दोन्ही लेखांत वापरला आहे. तो ‘ऑथेन्टिसिटी’साठी योग्य आहे. मी ‘ओरिजिनॅलिटी’साठी ‘आदिजनकत्व’ हा शब्द जास्त योग्य आहे असा एकदा तरी उल्लेख करून नंतर ‘ओरिजिनॅलिटी’च ठेवला असता. - राजीव साने
http://m.loksatta.com/sampadkiya-news/letter-to-editor-1131816/
दोन्ही लेख आणि प्रतिसाद आवडले.
वरील दोन्ही लेखांवर
वरील दोन्ही लेखांवर प्रतिक्रिया म्हणून एक पत्र आज लोकसत्तामधे आलंय.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/letter-to-editor-1131816/
बहुधा परदेशातून पूर्वीच परत येऊन भारतात करियर करणार्यांपैकी एका व्यक्तीने लिहिलेलं असावं असं मजकुरातल्या उल्लेखावरुन वाटतंय.
आपले ते आंबेच!
'सत्य.. सुंदर.. घराबाहेर!' हा अग्रलेख (१२ ऑगस्ट) वाचला आणि वृत्तपत्रांनी दुसरीकडे बोट दाखवताना चार बोटे आपल्याकडेच.. ध्यानात घेतले नाही याची प्रचीती आली.
अमेरिका आणि भारत या मुळात वेगवेगळ्या जीवन पद्धती आहेत. त्यांची तुलना करणे हेच मुळी चुकीचे (जी चूक मी १० वर्षांपूर्वी आल्या आल्या करत होतो.). भारतातले हिरो वेगळे; तिकडचे वेगळे. मीडिया फक्त मोठे पसे दिसले की लक्ष देते. 'एन्रॉन'चा पर्दाफाश करणारा दिवंगत गिरीश संत, मोठी नोकरी सोडून त्याची स्वयंसेवी संस्था पुढे चालवणारा श्रीनिवास, सौर ऊर्जेवर काम करणारा 'आयआयटी'मधला प्राध्यापक शिरीष ब. केदारे हे प्रसारमाध्यमांना आधी सापडत नाहीत हे आमचे दुर्दैव. प्रसारमाध्यमांचे डोळे अमेरिकेत काय होतेय इकडेच असतात! आपले आंबे तिकडे जातात पण आपल्याकडेही असतात. फक्त तिकडच्या आंब्यांचे कौतुक जास्त आणि किंमतही! तिकडची सफरचंदे आपण महाग असून घेतोच.
ज्या देशात एक कंपनी सुरू करायला सतराशेसाठ गोष्टी करायला लागतात, परत प्रत्येक पायरी ही उपयुक्ततेपेक्षा पसे खाण्यासाठीच केली आहे (प्रत्यक्ष अनुभव) अशी सत्य परिस्थिती आहे तिथे 'स्टार्टअप कल्चर'शी तुलना करणे हास्यास्पद आहे. परंतु हे सांभाळूनसुद्धा आपल्याकडे अनेक तरुण भरारी घेत आहेत, तिकडे प्रसारमाध्यमांचे किती लक्ष आहे हा संशोधनाचा विषय आहे!
पुण्यातीलच उदाहरण घ्यायचे तर एक साधा जायचा-यायचा सुखद अनुभव देणारा रस्ता १० वर्षांत होत नाही याला कारण राजकारण्यांचे तिथल्या जमिनींचे भाव वगळता बाकी कशात रस नाही.
या पाश्र्वभूमीवर इतक्याच वेळात एक जण इथून तिथे जातो काय आणि एका साम्राज्याच्या मुख्य पदी पोहोचतो काय, याचे आपल्या परिस्थितीशी मोजमाप करणे ही मुळातच 'अॅपल टू अॅपल' तुलना नाही असे वाटते. आपण आपले आंबे आहेत तिकडे अधिक लक्ष देऊ- पसा हा आधारभूत न धरता!
अतुल कुमठेकर, पुणे
याच लेखांवर राजीव साने यांचंही एक पत्र आहे. हे "युगांतर", "मर्मजिज्ञासा", "गल्लत, गफलत, गहजब"वाले राजीव सानेच असावेत.:
'वेगळे काय करता आले असते?'
बुधवार (१२ ऑगस्ट) च्या अंकातील शशिकांत सावंत यांचा 'ओरिजिनॅलिटी'वरचा लेख आणि 'सत्य सुंदर घराबाहेर' हा अग्रलेख हे दोन्ही उत्कृष्ट आहेत. प्रश्न नेमका मांडला गेला आहे. उपाय बरेच आहेत, त्यापकी एक सुचवीत आहे. पायथागोरसचा सिद्धान्त प्रमेय म्हणून सोडवला जातो. या सिद्धतेची एकच एक रीत (समांतरभुज चौकोनांचे समान क्षेत्रफळ) शिकवली जाते. पण असेही एक पुस्तक आहे की, ज्यात या प्रमेयाच्या ३६५ सिद्धता दिल्या आहेत म्हणजे वर्षभर रोज नव्या तऱ्हेने करून बघता येईल. म्हटले तर हा अपव्यय वाटू शकतो. पण 'वेगळं काय करता आलं असतं?' या प्रश्नाचा रियाझ म्हणून अशा गोष्टी उपयुक्त असतात. तेवढेच आकारमान कमीत कमी पृष्ठफळात मावणारा आकार गोलक (स्फिअर) हा आहे हेही सिद्ध करता येतेच. अशा वेळी साबणाचे फुगे गोलकाकार का बनतात, हाही प्रश्न विचारला गेला पाहिजे. ताणामुळे साबण-पाण्याचे कवच कमीत कमी जागा व्यापू पाहते. पण आतली हवा दाबली गेल्याने ती कवचाला आक्रसण्यास विरोध करते हे द्वंद्व गोलकाकारातच 'सर्वाधिक सुस्थिर' राहते. ही सिद्धता भूमितीय नाही पण वेगळी दृष्टी देणारी आहे. गणितातच नव्हे तर कोणत्याही बाबतीत 'मी असतो तर वेगळे काय केले असते?' असे स्वप्नरंजन (कारण तसे करणे आपल्याला जमले असते असे नाही) करण्याची सवय लावून घेतली पाहिजे.
उदाहरणार्थ 'ओरिजिनॅलिटी'साठी अस्सलता हा शब्द दोन्ही लेखांत वापरला आहे. तो 'ऑथेन्टिसिटी'साठी योग्य आहे. मी 'ओरिजिनॅलिटी'साठी 'आदिजनकत्व' हा शब्द जास्त योग्य आहे असा एकदा तरी उल्लेख करून नंतर 'ओरिजिनॅलिटी'च ठेवला असता. 'पिंजरा' या सिनेमाचा शेवट मी बदलला असता. 'दुश्मन'मधील राजेश खन्नासारखी 'मास्तर'लाही त्याच गावाची सेवा करण्याची शिक्षा होते. ती सहन करत असताना त्याच्या लक्षात येते की 'गुरुजीं'च्या नावाखाली गावात भ्रष्टाचारच चालू आहे. एक सोवळा गुरुजी येईल आणि गाव सुधारेल ही कल्पनाच चुकीची आहे. मीच गुरुजी आहे असे जाहीर करून मास्तर मूर्तिभंजन करतो- 'प्रेमात पडून तमाशात जाण्याचे स्वातंत्र्य मला होतेच, मीच वेडय़ासारखे 'गुरुजी' या प्रतिमेचे रक्षण करत बसलो.' माझा िपजरा जोरात आपटला असता. पण मुद्दा तो नाही. 'वेगळे काय करता आले असते' हा रियाझ चालू राहिला पाहिजे.
राजीव साने, पुणे
ज्या देशात एक कंपनी सुरू
ज्या देशात एक कंपनी सुरू करायला सतराशेसाठ गोष्टी करायला लागतात, परत प्रत्येक पायरी ही उपयुक्ततेपेक्षा पसे खाण्यासाठीच केली आहे (प्रत्यक्ष अनुभव) अशी सत्य परिस्थिती आहे
यालाच तर कमअस्सलांना डोक्यावर बसवणारी व्यवस्था म्हणतात ना? आणि ती काय प्रसारमाध्यमांनी तयार केलीय? पुण्यातल्या चांगल्या-चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसनध्ये तिसर्या वर्षीच जीआरई वगैरे करुन परदेशात जायची तयारी होते ते काय प्रसिद्धीमाध्यमांनी सांगितले म्हणून? मुळात प्रसिद्धीमाध्यमे समाजाचाच भाग किंवा आरसा नाहीत का? मुळात खोसला, नाडेला, पिचई हे महान आहेत की नाहीत हा प्रश्न नाही (इथे गब्बरसाहेब बळंच तो मुद्दा असल्याचे सिद्ध करायचा प्रयत्न करत आहेत); आपल्याकडे व्यवस्था किडलेली आहे हेच सत्य अग्रलेखात सांगितले आहे ते मान्य करण्यात प्रॉब्लेम काय आहे? व्यवस्था किडलेली आहे म्हटले तर ती तशी असण्याची जबाबदारी आपल्यावर येते आणि त्याचीच भीती वाटत असावी बहुतेक. आणि शहरी भारतीयांची जीवनपद्धती आता अमेरिकनांपेक्षा वेगळी आहे हे म्हणायला स्पेशल धैर्य लागेल मला तरी.
बळंच आपल्याकडे हिरो वेगळे असतात म्हणायचं आणि बहुतेकांनी मोठ्या परदेशी नोकरीच्या अभिलाषेने जीआरई, जीमॅट, आयआयटी व आयआयएमच्या परिक्षांना गर्दी करायची हा दुटप्पीपणा आहे. समाजात तर अमेरिकेत वा इंग्लंडात असलेले भारी आणि भारत किंवा इतर आशियाई देशात काम करणारे टुकार अशाही सरसकट धारणा आहेत आणि त्यावरुन लोक स्वतःला श्रेष्ठ समजतात. नुसत्या जातीवरुन स्वत:ला बुद्धिमत्तेचा ठेका मिळाला आहे असे समजणारे अनेक लोक या देशात अजूनही आहेत त्यामुळे कुमठेकरांचा प्रतिवाद पारच भरकटलेला वाटतो. काही तरुण भरारी घेत आहेत यावर समाधान मानायचे की व्यवस्था खराब आहे आणि ती बदलली पाहिजे हे मान्य करायचे यातला सोपा मार्ग त्यांनी निवडलेला दिसतोय. हरकत नाही. बहुसंख्य लोक तेच करत आले आहेत.
अगदी पटतय. त्यातून अशी भरारी
अगदी पटतय. त्यातून अशी भरारी घेणारी दोनचार नावं घेतली की झालं. ही नावं फक्त नियम सिद्ध करणार्^या अपवादाचीच असतात. पण व्यवस्था भेदण्याची शक्ती नसलेली अशी कित्येक नावं आपले पंख गमावून बसतात . त्याहून वाईट म्हणजे असं काही टॅलेंट आपल्याकडे आहे ह्याचा पत्ताही कित्येकांना लागत नाही. आणि लागलाच तर ते बोथट करणारी चोख शिक्षण आणि समाज व्यवस्था आपल्याकडे आहे.
सानेंची प्रतिक्रिया पटणारी पण प्रत्यक्षात तसं काही करायला उत्तेजन देणं तर सोडाच ते बरोबर आहे असं ही कोणी मानत नाही. अगदी चौकटीबाहेरच्या गोष्टींसाठीही चौकटी बनवून त्यात त्यांना कोंबून त्यातला जिवंतपणाच घालवणं हे काम आपल्याला फार चांगलं जमतं.
शहरी भारतीय अमेरिकनांपेक्षा अमेरिकन आहेत.
आणखी एक ग्रेट्ट माणूस आहे की
आणखी एक ग्रेट्ट माणूस आहे की ज्याचा उल्लेख फार कमी होतो पण महाप्रचंड यशस्वी आहे व ज्याने स्वतःची व्हेंचर कॅपिटल कंपनी स्थापन केलेली आहे व प्रचंड नावारूपाला आणलेली आहे. विनोद खोसला. ज्यांना entrepreneurship बद्दल फारसे काही कुतुहल, प्रेम, आदर वाटत नाही त्यांना एकतर खोसलांचे यश माहीती नसेल किंवा माहीती असलेच तर त्यांच्या यशाची एहमियत समजणार नाही. हा माणूस सत्या नाडेला किंवा सुंदर पिचाई यांच्या कितीतरी अगोदर अतिमहाप्रचंड यशस्वी झालेला आहे. सन मायक्रोसिस्टिम्स चा संस्थापक, व केपीसीबी चा पार्टनर होता. आता त्याची स्वतःची खोसला व्हेंचर्स ही कंपनी आहे की अनेक छोट्या स्टार्टप्स ना फंडींग करते. आणखी एक नमूद करण्यासारखी बाब म्हंजे खोसला हे सिरियल entrepreneur आहेत. एकापाठोपाठ एक कंपन्या स्थापन करून नावारूपास आणणारे. डेझि सिस्टीम्स, सन वगैरे. मुख्य बँकर टर्न्ड व्हेंचर कॅपिटलिस्ट नाहीत.
सिलिकॉन व्हॅलीत १९९० नंतर भारतीयांना ओळख निर्माण व्हायला सुरुवात झाली. खोसला हे १९८५ मधेच बिग शॉट बनले होते.
गब्बर - तू प्रॉब्लेम
गब्बर - तू प्रॉब्लेम स्टेटमेंटच मांडता आहात. खोसला फक्त पैसे पुरवणारे होते, हे ठीकच आहे. अपेक्षा अशी व्यक्त केली होती की काहीतरी मोठा बदल घडवुन आणणार्या कल्पना किंवा संशोधन करणार्यात भारतीय व्हावेत.
अगदी आर्थिक बाबतीत सुद्धा भारतीयांनी काही क्रांतीकारक Financial Product ची कल्पना मांडली आहे असे दिसत नाही.
खोसलांचे महत्व आहेच पण ते त्यांच्या पैश्याइतकेच.
तुला कालच खव लिहिले त्याप्रमाणे गुगल ला जास्तीतजास्त उत्तम मॅनेजर मिळाला असेल पण फक्त "मॅनेजरच". भारतीयांनी पैसे मिळवणे आणि "मॅनेज" करणे ( सर्वच गोष्टी ) ह्यातुन बाहेर येउन काही कर्तृत्व दाखवले तर बरे वाटेल.
अपेक्षा अशी व्यक्त केली होती
अपेक्षा अशी व्यक्त केली होती की काहीतरी मोठा बदल घडवुन आणणार्या कल्पना किंवा संशोधन करणार्यात भारतीय व्हावेत.
खोसला इथे सुद्धा चमकलेले आहेत. सन मायक्रोसिस्टिम्स ही वर्कस्टेशन बनवणारी पहिली यशस्वी कंपनी, एम्बीए करत असतानाच सुरु केली त्यांनी व इतर दोघांनी. ते सुद्धा १९८२ मधे. त्याकालात ती संकल्पना क्रांतिकारी होती.
-
खोसलांचे महत्व आहेच पण ते त्यांच्या पैश्याइतकेच.
इथेच अंदाज चुकला तुमचा. खोसलांचे महत्व त्यांच्या कंपनी बिल्डिंग च्या स्किल चे. आज डझनावारी नव-उद्योजक त्यांच्याकडे मुख्यत्वे help, guidance, hand-holding, advice, connections यासाठी जातात. फायनान्सिंग साठी व्हेंचर डेट, ग्रोथ इक्विटी हे सगळे मार्ग खुले आहेत. पण खोसला हे ट्रॅडीशनल फायनान्सर नसण्यावर भर देतात. Khosla Ventures has funded dozens of companies. But more importantly entrepreneurs find his company building experience most useful.
ही "मॅनेजमेंट" झाली नावेगळा
ही "मॅनेजमेंट" झाली ना
वेगळा प्रश्न विचारतो. बघ तुला वेगळा पैलू दिसतोय का ते.
When an entrepreneur is setting up and growing his company he can hire a number of seasoned and experienced executives to help him execute the ideas well. Why would he go to a venture capitalist for advice ??
Answer - A strong VC has experience as a seasoned executive as well as having founded one or more companies. Especially the ones which have had huge successes.
Update - A strong VC has experience as a seasoned executive as well as having founded one or more companies as well as having provided advice to other entrepreneurs and seen the impact of that advice. Especially the companies which have had huge successes AND FAILURES.
अशीही एक श्रद्धांजली
भालचंद्र पेंढारकरांच्या निधनानिमित्ताने भाजप, महाराष्ट्र ह्यांच्यातर्फे वाहण्यात आलेली श्रद्धांजली -
भालचंद्र पेंढारकर " चित्रतपस्वी " ? 󾌯 .किती हे अगाध ज्ञान 󾌹😈
Posted by Sanjay Pethe on Tuesday, August 11, 2015
बोर्ड झळकला की बास.
बोर्ड झळकला की बास. बाकी मजकूर कोण वाचतंय?
एकदा मुं.मनपा.च्या विलेक्षणात भाजप शिवसेनेच्या कम्बाइन्ड प्रचारसभेत असेच विलक्षण प्रलाप ऐकायला मिळाले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करताना एक वक्ता लडखडत्या आवाजात बाबा आमटे म्हणाला होता आणि श्रोत्यांनीही ते निमूटपणे ऐकून घेतले होते कारण त्या वक्त्याचे कुठलेच शब्द कळू शकत नव्हते. प्रत्येकाने आपापल्या विचारसरणीनुसार अर्थ लावून घेण्याची मुभा होती. आमट्यांचे नाव येण्याचे कारण त्या एकदोन दिवसात त्यांच्याविषयी काही ठळक बातमी पेप्रात आली होती.
राहुल गांधींच्या भाषणाची
राहुल गांधींच्या भाषणाची इंग्रजी चिठ्ठी व्हायरल
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Rahul-Gandhis-cheat-sheet…
बा द वे....चिठ्ठी वाचणे आणि
बा द वे....चिठ्ठी वाचणे आणि पाठ केलेले (रिहर्स केलेले) भाषण उत्स्फूर्त असल्यासारखे करणे यात गुणात्मक फरक काय आहे? अपार्ट फ्रॉम इम्प्रेशन?
आणि सो कॉल्ड उत्स्फूर्त भाषण करणारे लोक आधी मुद्दे न घेता भाषण करतात का? [उदा. आज दसर्याच्या भाषणात काय ज्योक मारायचे, कोणते शब्द वापरायचे हे बाळासाहेब आधी ठरवत नसतील?]
+१
सहमत. खरंतर यात गंमत काय आहे तीच कळली नाही. राहूल गांधींनी केलंय म्हणून गंमत म्हणायचं असेल तर ठीक आहे. पण पाठ केलेले भाषण करताना भगतसिंगला अंदमानमध्ये पाठवणे किंवा चंद्रगुप्ताला गुप्त घराण्यात टाकणे किंवा गांधीबाबांना मोहनलाल म्हणणे अशा चुका करण्यापेक्षा सरळ चिठ्ठीमध्ये नोट्स ठेवलेल्या काय वाईट?
थत्तेकाका - ती चिठ्ठी तुम्ही
थत्तेकाका - ती चिठ्ठी तुम्ही बघितली का, त्या चिट्ठीत भाषण वगैरे नाहीये. लोकसभेत काय ओरडायचे त्याची एक-एक वाक्य मोठ्या फाँट मधे रोमन लिपीतल्या हिंदीत आहेत. त्यात सुद्धा वाचताना घोटाळा होउ नये म्हणुन सर्व अपर केस मधे लिहीले आहे.
त्यामुळे त्या चिठ्ठीची तुलना तुम्ही रिहर्स केलेल्या भाषणाशी किंवा भाषणातले ज्योक ठरवण्याशी करु नका.
मोजुन ८-१० छोटी वाक्य सुद्धा पाठ करुन संसदेत येता येत नाही?
एक निरिक्षण असय की भाजपाने
एक निरिक्षण असय की भाजपाने असलेच दंगे केले होते हे फार पब्लिकला माहिती नाहिये (तेव्हा राजकाराण फॉलो नव्ह्ते करत आता करतायत असही असू शकतं) किंवा विसरले गेले आहेत.
अधिवेशन उधळणं हे वाइटच पण ज्या मुद्द्यावर उधळल ते आश्चर्यकारक आहे. ललित मोदी हा मुद्दा अगदीच चिरकुट आहे. त्याऐवजी 'व्यापम'वर दंगा घातला असता तर पटू शकलं असतं. मेबी तो मुद्दा दिग्गींवरदेखील शेकू शकेल अस वाटलं असावं.
व्यापम घोटाळा एकापेक्षा अधिक
व्यापम घोटाळा एकापेक्षा अधिक राज्यांत पसरला आहे हे जोवर पुढे येत नाही तोवर संसदेत तो विषय टिकू शकणार नाही - तोवर तो स्टेट सबजेक्ट ठरतो.
त्यामुळे व्यापम कितीही पटीने भयंकर असला तरी संसदेत त्यावर फार संगा करता आला नसता.
---
बाकी एक अधिवेशन उधळून काँग्रेस व भाजपाने फार काही छान केले नसले तरी त्याने जगबुडी आल्यासारखी टिका चाललीये त्यातही फार काही दम नाही.
---
जीएसटी विधेयकाचा मी एक सामान्य माणून म्हणून नक्की फायदा काय? किती? तो फायदा कोणाला आहे?
जीएसटी विधेयकाचा मी एक
जीएसटी विधेयकाचा मी एक सामान्य माणून म्हणून नक्की फायदा काय? किती? तो फायदा कोणाला आहे?
+१११
ह्याचे उत्तर कोणी देत नाही. त्याच बरोबर जीएस्टी म्हणजे सब मर्ज की एक दवा अश्या पद्धतीने जे दाखवले जात आहे तो तर निव्वळ मुर्खपणाच आहे.
खरे तर सध्याच्या कुठल्याच कायद्यांमुळे अर्थव्यवस्था कुंठीत झाली नाहीये. ज्या कारणांमुळे ( जसे भ्रष्टाचार, न्याययंत्रणेतला विलंब, कायदा आणि सुव्यवस्था जवळजवळ असुन नसल्या सारखीच, शिक्षणाचा दर्जा ) अर्थव्यवस्था अडुन राहिली आहे त्याबद्दल थोडे जरी काही केले तर मोठा फरक दिसेल.
खरं का?
खरे तर सध्याच्या कुठल्याच कायद्यांमुळे अर्थव्यवस्था कुंठीत झाली नाहीये. ज्या कारणांमुळे ( जसे भ्रष्टाचार, न्याययंत्रणेतला विलंब, कायदा आणि सुव्यवस्था जवळजवळ असुन नसल्या सारखीच, शिक्षणाचा दर्जा ) अर्थव्यवस्था अडुन राहिली आहे त्याबद्दल थोडे जरी काही केले तर मोठा फरक दिसेल.
खरं का? आता इथंच वर भारतात सतराशे साठ लायसन लागत असल्यामुळं नवे उद्योग उभारणं कसं अवघड आहे याची चर्चा झाली होती. एक उदाहरण देतो. माझ्या नात्यात एक छोटंसं दुकान चालवलं जातं. त्या दुकानासाठी त्यांना १२ लायसन काढावे लागले. उदा. अंडी विकण्यासाठी वेगळं लायसन लागतं. हा कायदा आहे. आता बाकीच्या वस्तू विकण्यासाठी वेगळं लायसन आणि अंडी विकण्यासाठी एक स्पेशल लायसन कशाला? हे असे विचित्र कायदे हे भ्रष्टाचार, विलंब यामागचं एक मोठं कारण आहे. अंड्याचं लायसन घेण्यासाठी दहावेळा मनपामध्ये खेटे घालण्यापेक्षा थोडे पैसे देऊन एकाच फेरीत ते काम करुन घ्यायचं की असे कायदे बदलायचे? माझ्या एका मित्राने सॉफ्टवेअर कंपनी सुरु केली (नॉन-सेझ). दोन एम्प्लॉईजपुरत्या कंपनीसाठी त्याला किमान ९ लायसन काढावे लागले. ह्या सगळ्या डोकेफोडीमुळे अर्थव्यवस्था कुंठित होत नाही असा तुमचा समज असेल तर असो. पण खरी परिस्थिती वेगळी आहे.
आजपासून मला तुमचा भक्त म्हणून
आजपासून मला तुमचा भक्त म्हणून स्वीकारा. प्लीज. तुस्सी ग्रेट्ट हो.
(Occupational) Licensing is a key source of corruption. मनोबा म्हणतो तसे - साहेब होते म्हणून काम झाले - ही वृत्ती वाढते. लायसेन्सिंग ची यासाठी गरज आहे अन त्यासाठी आवश्यकता आहे वगैरे समर्थनं इतकी झालेली आहेत की ....,,,
विचित्र कायदे हे भ्रष्टाचार,
विचित्र कायदे हे भ्रष्टाचार, विलंब यामागचं एक मोठं कारण आहे
विचीत्र ( ?) कायदे हे भ्रष्टाचारामागचे कारण होऊ शकत नाही. भ्रष्टाचार करणे ही मनोवृत्ती आहे. ती मनोवृत्ती जर बदलणार नसेल तर कीतीही कायदे सोप्पे केले तरी भ्रष्टाचार कमी होणार नाही. त्याच बरोबर भ्रष्टाचार करुन सुद्धा आपल्या केसालाही धक्का लागणार नाही ही खात्री भारतातली न्यायव्यवस्था देत असल्यामुळे भ्रष्टाचाराला खतपाणीच मिळते.
९ लायसन काढायला लागणे हे भ्रष्टाचारामागचे कारण नाहीये कारण जर भ्रष्टाचार नसता तर हीच लायसन २ दिवसात पण मिळू शकतात.
त्याच बरोबर, हे असे कायदे करण्याची वेळ का आली आहे हे ही शोधा. भारतीयांची वृत्तीच दांभिक आणि फसवणारी असल्यामुळे असले चेक्स असणे गरजेचे झाले आहे. पश्चिम युरोप आणि अमेरिकेत सामान्य माणसे छोट्या फायद्या साठी खोटे बोलत नसल्यामुळे कुठलेही कागदोपत्री पुरावे न देता फक्त माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवुन ( सेल्फ अफिडेव्हिट देउन )कामे केली जातात. भारतात असे केले तर काय होईल ह्याचा तुम्हीच विचार करा.
लोल
विचीत्र ( ?) कायदे हे भ्रष्टाचारामागचे कारण होऊ शकत नाही. भ्रष्टाचार करणे ही मनोवृत्ती आहे. ती मनोवृत्ती जर बदलणार नसेल तर कीतीही कायदे सोप्पे केले तरी भ्रष्टाचार कमी होणार नाही. त्याच बरोबर भ्रष्टाचार करुन सुद्धा आपल्या केसालाही धक्का लागणार नाही ही खात्री भारतातली न्यायव्यवस्था देत असल्यामुळे भ्रष्टाचाराला खतपाणीच मिळते.
९ लायसन काढायला लागणे हे भ्रष्टाचारामागचे कारण नाहीये कारण जर भ्रष्टाचार नसता तर हीच लायसन २ दिवसात पण मिळू शकतात.
त्याच बरोबर, हे असे कायदे करण्याची वेळ का आली आहे हे ही शोधा. भारतीयांची वृत्तीच दांभिक आणि फसवणारी असल्यामुळे असले चेक्स असणे गरजेचे झाले आहे. पश्चिम युरोप आणि अमेरिकेत सामान्य माणसे छोट्या फायद्या साठी खोटे बोलत नसल्यामुळे कुठलेही कागदोपत्री पुरावे न देता फक्त माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवुन ( सेल्फ अफिडेव्हिट देउन )कामे केली जातात. भारतात असे केले तर काय होईल ह्याचा तुम्हीच विचार करा.
प्रतिसाद अत्यंत हास्यास्पद आहे. भारतीयांची मनोवृत्ती भ्रष्टाचार करणे ही आहे, भारतीय दांभिक आहेत, अमेरिकेत सामान्य लोक छोट्या फायद्यासाठी खोटे बोलत नाहीत. (मग मोठ्या फायद्यासाठी खोटे बोलतात का?) हा गिरीश कुबेर स्टाईल प्रतिसाद वाटला. एक वैयक्तिक प्रश्न विचारतो. तुम्ही भारतीय आहात का? तुम्ही दांभिक आणि फसवणारी वृत्ती वापरुन किती जणांना गंडवलंय?
विचीत्र ( ?) कायदे हे
विचीत्र ( ?) कायदे हे भ्रष्टाचारामागचे कारण होऊ शकत नाही. भ्रष्टाचार करणे ही मनोवृत्ती आहे. ती मनोवृत्ती जर बदलणार नसेल तर कीतीही कायदे सोप्पे केले तरी भ्रष्टाचार कमी होणार नाही. त्याच बरोबर भ्रष्टाचार करुन सुद्धा आपल्या केसालाही धक्का लागणार नाही ही खात्री भारतातली न्यायव्यवस्था देत असल्यामुळे भ्रष्टाचाराला खतपाणीच मिळते. ९ लायसन काढायला लागणे हे भ्रष्टाचारामागचे कारण नाहीये कारण जर भ्रष्टाचार नसता तर हीच लायसन २ दिवसात पण मिळू शकतात.
@अनु, कॉमन लॉ व लेजिस्लेटिव्ह लॉ मधे भाव केलास तर विचित्र (?) कायदे हे भ्रष्टाचारामागचे कारण कसे होते ते लक्षात येईल असा मुद्दा मांडतो. हा मुद्दा बघ तुला पटतोय का. हा व्हिडिओ पहा. २५:०० ते ३२:०० हा भाग. विशेषतः २९:०० ते ३१:०० यात तो जे मोरल कंपक्शन वि. प्रुडेन्शियल ऑब्जेक्शन बद्दल जे बोलतोय ते उत्तर आहे का तुझ्या प्रश्नाचे ?
कदाचित तू म्हणशील की गब्बर is only restating the problem or गब्बर is indulging in appeal to authority type argument.
माझा मुद्दा हा आहे की - भारतीयांची वृत्तीच दांभिक आणि फसवणारी असणे व छोट्या फायद्या साठी खोटे बोलण्याची असणे - ही प्रवृत्ती ही ह्या चेक्स व सफोकेटिंग कायद्यांचा परिणाम म्हणून झालेली असेल - ह्याची शक्यता पडता़ळून पाहणे गरजेचे आहे.
>>ही प्रवृत्ती ही ह्या चेक्स
>>ही प्रवृत्ती ही ह्या चेक्स व सफोकेटिंग कायद्यांचा परिणाम म्हणून झालेली असेल - ह्याची शक्यता पडता़ळून पाहणे गरजेचे आहे.
असे वाटत नाही. १२० फुटी वाहता हायवे पादचारी पुलावरून न ओलांडता रस्त्यावरून ओलांडणे ही कृती सफोकेटिंग कायद्याचा परिणाम म्हणून आलेली नसून (सामान्य नियम न पाळता) शॉर्टकट घेण्याच्या प्रवृत्तीतून आलेली आहे.
विचित्र (?) कायदे हे
विचित्र (?) कायदे हे भ्रष्टाचारामागचे कारण कसे होते ते लक्षात येईल असा मुद्दा मांडतो. हा मुद्दा बघ तुला पटतोय का
दोन उदाहरणे देते. युरोप, अमेरिकेत कुठेही गर्भलिंग निदानाच्या विरुद्ध कायदा करावा लागला नाही, पण भारतात करावा लागतो आणि तो अंमलात आणताना भ्रष्टाचार पण होतो. ह्यात त्या कायद्याचा दोष आहे का भारतीयांचा.
दुसरे उदाहरण - सतीच्या कायद्याचे. अजुनही बर्याच भारतीयांना हा कायदा मान्य आहे असे वाटत नाही, आणी जगात असा कायदा करायची गरज पण पडली नाही, पण भारतात पडली.
सांगायचे हे की, कायदे परिस्थिती बघुन करावे लागतात. कायदा केला म्हणुन भ्रष्टाचार वाढत नाही.
माझ्या अनुभवाप्रमाणे, इंग्लंड मधे गॅस, वीज मिटर रीडींग मधे तुम्हाला शंका असतील आणि तुम्ही फोन केलात तर तुम्ही सांगितलेले रीडींग पण ही लोक घेतात.
फार पूर्वी, मी इथे WP वर असताना, मला जवळजवळ वर्षानी कळले होते की WP वर रहाणार्या लोकांना Council Tax मधे बर्यापैकी सूट मिळते. मी पुर्णे तयारीनिशी, WP घेउन वगैरे काउंसिल ऑफिस मधे गेले, तिथल्या माणसाला सांगितले की ही सूट मला पण पाहीजे कारण मी WP वर इथे आहे. त्यानी लगेच एका चिठोर्यावर लिहुन घेतले आणि म्हणाला की काम झाले. मीच त्याला विचारले की अर्ज आणि WP ची कॉपी वगैरे पाहीजे का? तो म्हणाला काही गरज नाही. वर मी पुर्वी ज्या घरात रहात होते त्याचा पण पत्ता विचारुन घेतला आणि नंतर मला त्या वर्षापूर्वी भरलेल्या टॅक्स वर पण सुट मिळाली.
असा विश्वास जर महानगरपालिका भारतात दाखवायला लागली तर १०% टॅक्स तरी जमा होईल का?
@अनु, कॉमन लॉ व लेजिस्लेटिव्ह
@अनु, कॉमन लॉ व लेजिस्लेटिव्ह लॉ मधे भाव केलास तर विचित्र (?) कायदे हे भ्रष्टाचारामागचे कारण कसे होते ते लक्षात येईल असा मुद्दा मांडतो. हा मुद्दा बघ तुला पटतोय का. हा व्हिडिओ पहा. २५:०० ते ३२:०० हा भाग. विशेषतः २९:०० ते ३१:०० यात तो जे मोरल कंपक्शन वि. प्रुडेन्शियल ऑब्जेक्शन बद्दल जे बोलतोय ते उत्तर आहे का तुझ्या प्रश्नाचे ?
गब्बर - तुझा पूळ प्रॉब्लेम हा आहे की तू य्रुरोप अमेरिकेत केलेले अभ्यास, सर्वे, संशोधन तसेच्या तसे भारताला लावायला जातोस. तू जे लिहीले आहेस ते कदाचित अमेरिकेत खरे असेल, पण भारतात कदाचित पूर्ण उलटे असेल.
भारतीयांसाठी युरोप मधे तयार झालेली सायकॉलोजी चे शास्त्र आणि तिथे रेकमेंड होणार्या थेरपी अजिबात उपयोगी नाहीत. कदाचित त्याच्या पूर्ण उलटी थियरी भारतियांसाठी तयार केली पाहीजे.
व्यवसाय करण्यासाठी सोयीस्कर
जीएसटी विधेयकाचा मी एक सामान्य माणून म्हणून नक्की फायदा काय? किती? तो फायदा कोणाला आहे?
सध्याची करव्यवस्था किचकट आहे. एक्साईज ड्युटी, सेल्स टॅक्स, व्हॅट, लोकल बॉडी टॅक्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या करांची हाताळणी करणे व्यावसायिकांसाठी जिकीरीचे आहे. वेगवेगळ्या राज्यांचे करआकारणीचे दर आणि करव्यवस्थेतील फरकांमुळे आंतरराज्यीय व्यवहारांमध्ये करांची हाताळणी करणे अधिकच अवघड होते. जीएसटीमुळे करआकारणी सुलभ होईल, करचुकवेगिरीला आळा बसेल, करआकारणीत आधीच भरलेल्या कराचा (गुड्स) उपयोग नंतर करसवलतीसाठी (सर्विसेस) घेता येईल. आता सामान्य माणूस म्हणजे फक्त ग्राहक अशी व्याख्या असेल तर एकंदर कर किंचित कमी होण्याच्या शक्यतेनुसार वस्तू थोडीफार स्वस्त होऊ शकते.
एक्साईज ड्युटी, सेल्स टॅक्स,
एक्साईज ड्युटी, सेल्स टॅक्स, व्हॅट, लोकल बॉडी टॅक्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या करांची हाताळणी करणे
काय सांगता, इतके सगळे जाऊन फक्त जीएसटी येणार?
करचुकवेगिरीला आळा बसेल
हे आत्ता का होऊ शकत नाही? आणि आत्ता होऊ शकत नसेल तर जीएसटी आल्यावर का व्हावे?
आता सामान्य माणूस म्हणजे फक्त ग्राहक अशी व्याख्या असेल तर एकंदर कर किंचित कमी होण्याच्या शक्यतेनुसार वस्तू थोडीफार स्वस्त होऊ शकते.
पुण्यात रहाणार्या व्यक्तीच्या वापरातील कुठ्ल्या वस्तु स्वस्त होतील आणी कुठल्या महाग?
वस्तू स्वस्त होणार असतील तर त्याचे एकच कारण असु शकते, टॅक्स कमी होणार. म्हणजे सरकारचे टॅक्स उत्पन्न कमी होणार का? मग डेफिसीट वाढुन महागाई अजुन वाढणार का?
>>वस्तू स्वस्त होणार असतील तर
>>वस्तू स्वस्त होणार असतील तर त्याचे एकच कारण असु शकते, टॅक्स कमी होणार. म्हणजे सरकारचे टॅक्स उत्पन्न कमी होणार का? मग डेफिसीट वाढुन महागाई अजुन वाढणार का?
कर कमी होणार आहे असे वाटत नाही. नुकतेच जीएसटी न आल्याने राज्याचे २२००० कोटी नुकसान झाले असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्या अर्थी एकुणात २२००० कोटीने टॅक्स वाढणार आहे (दरडोई २००० रुपये). जर टॅक्स वाढणार नसेल आणि तरी राज्याला २२००० कोटी रुपये जास्त मिळणार असतील तर त्याचा अर्थ एकूण करातला राज्याचा वाटा वाढणार आहे. तो वाढण्यासाठी जीएसटी असण्याची काही गरज नाही. त्या अर्थी जीएसटी आल्यावर कर वाढणार असावा.
नाही कळले
म्हणजे जर मी व्यावसायिक नसेन तर "कदाचित" मला स्वस्त वस्तु मिळणे हा एकमेव फायदा आहे. तो ही कदाचित. सुरवातीला हा २७% कर असु शकतो (जेटली दावा करताहेत की तो १८% पर्यंत खाली येऊ शकेल पण सध्या २७% अंदाजच लागू आहे) त्यामुळे उलट अनेक सर्विसेस महाग होतील असेही वाटते. म्हणजे तोही फायदा नाही.
हा टॅक्स केंद्र सरकारकडे जाणार मग ते राज्य सरकारांना देणार. म्हणजे राज्यसरकारे केंद्रावर अधिकच डिपेण्डन्ट झाली. (जसे वॅटमुळे स्था स्व संस्था राज्यसरकारवर अधिक डिपेण्डन्ट झाल्या).या मुळेच विधेयकावर गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आक्षेप होता ना? सत्तेचे व आर्थिक बाबींचे विकेंद्रीकरण अधिक फायद्याचे असते असे जगभर दिसते. मग ही उलट गंगा फायद्याची कशी?
मग या विधेयक मंजूर न झाल्याने जगबुडी आल्याचा आव का आणला जात आहे?
राहुल गांधी हा मोअर ऑर लेस
राहुल गांधी हा मोअर ऑर लेस "फूल" म्हणून जनतेने सर्टिफाय केलेला दिसतो. त्यामुळे एक प्रश्न.....
काँग्रेस पक्षात जे दुसर्या फळीतील जनाधार असलेले -ज्योतिरादित्य शिंदे किंवा सचिन पायलट किंवा आणखी कोणी - नेते आहेत त्यांना सोनिया किंवा राहुल यांना काँग्रेसचे नेते म्हणून राहू देण्यात स्वतःच्या करिअरला धोका वाटत नाही का? हे (सोगा-रागा) राहिले तर काँग्रेस पक्ष पुन्हा उभा राहू शकणार नाही- (भक्तांच्या मते ४४ वरून शून्यावर येईल)कदाचित १० जागांपर्यंत खाली येईल. अशा काँग्रेसमध्ये दुय्यम नेते म्हणूण राहण्यात काय फायदा असे यांना वाटत नाही का?
सोगा रागा यांना डम्प करण्याची इतकी चांगली संधी पुन्हा येईलच असे नाही.
या नेत्यांचे रीडिंग/गणित काय असेल?
या नेत्यांचे रीडिंग/गणित काय
या नेत्यांचे रीडिंग/गणित काय असेल?
मला वाटते जनाधार असलेले म्हणून ज्यांची नावे येतात त्यांचा जनाधार अजून राष्ट्रीय स्तरावर रागां सोगां यांना रिप्लेस करू शकतील येव्हढा जास्त नाहीये. त्यामुळे ते शांत असावेत. त्यापायी नंतर पडत्या काळात देखील साथ निभावणारे एकनिष्ठ असे वलय मिळेल. जातीय गणिते पुन्हा जमविणे, भाजपा सरकारच्या चुकांना एक्स्प्लॉईट करणे; सपा, नितिश लालू ,पवार आणि बसपा यांचा प्रत्यक्षपणे व डावे, ममता यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा अशी मोट बांधण्याचे जरा लांबचे प्लॅनिंग एव्हढाच पर्याय या कर्तृत्ववान नेत्यांपुढे आहे. कारण पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचे कांही अधिकार रागां सोगांनी या नेत्यांकडे दिलेले नाहीत. रागा अधिकृतपणे पक्षाचे सर्वेसर्वा झाले आणि भाजपा च्या मंत्र्यांनी बडबड न करता झपाट्याने कामे केली तर यांतील कांहींचे बंड निश्चित!
रागा
रागा प्रोजेक्ट केला जातो तितका मूर्ख नसावा.(प्रत्येक कृती क्यामेर्याखाली इतकी जबरदस्त ट्रॅक केली गेली; त्यातही मूळ उद्देशच टवाळीचा असला तर कुणालाही येडपट ठरवणे फार अवघड नसावे.)
म्हणजे, तो लै हुशार आहे वगैरे म्हण्णे नाही. पण त्याला टार्गेट केलं जातय हे सरळ आहे.
१९९१ला राजकारणाबाहेर गेलेल्या सोनिया १९९८पासून अधिकाधिक सक्रिय होउ लागल्या.(आधीही असतील, पण तितक्याशा नाही.)
वाजपेयी किती थोर्,समजूतदार अनुभवी वगैरे आणि ही गोरी बया, ही कशी माठ वगैरे तेव्हाही बोललं जात होतं.
२००४च्या निवडणुकीच्या वेळीही(फील गुद फ्याक्टरचा बोलबोला असताना) तेच. "तुमच्यापैकी कोण वाजपेयी-आडवाणींना च्यालेंज करनार हो" म्हणत काँगींची खिल्ली उडवली जात होती.
नेमका कॉम्ग्रेसनं काय गेम केला माहित नाही. की पब्लिक नाराज होती माहित नाही.
भाजप आपटली. काँग्रेस आघाडी बरीच पुढे आली.
कम्युनिस्टांनी थेट पाठिंबा जाहिर केल्यावर तर चित्र स्पष्ट होतेच.(शिवाय नेमके त्याच वेळी भाजपला सोडून कॉम्ग्रेसकडे करुणानिधी-डीएमके आलेले.
त्यांनी तामिळनाडूत ४० पैकी ४० जागा जिंकून मोठाच स्विंग फ्याक्टर आणला. )
.
.
थोडक्यात :- "खणखणीत नेतृत्व" असं सोनिया गांधींचं मानलं जात नव्हतं २००४ वगैरेला. तिलाही ही तिची विरोधक मंडळी "यडछाप" समजत होती.
पण बाई सत्तेत आल्या.तसेच २०१९ वा त्यापुढे कधीतरी राहुलही येउ शकतो. त्यासाठी "राहुलच वाचवू शकतो. तो तारणहार आहे." असं पब्लिकला वाटलं नाही तरी चालेल.
फक्त "भाजप सरकार आपले वाटोळे करीत आहे (किमान कोणत्या तरी एका निकषावर(दंगल, सामाजिक सुरक्षा, भ्रष्टाचार, निकम्मे असणे वगैरे अशा)) " असे पब्लिकला वाटले तरी पुरे.
.
.
हे होणे अशक्य आहे असेही नाही. अवघड मात्र वाटते आहे. कॅग, हितसंबंध दुखावलेले घटक, काही स्टिंग ऑपरेशनवाले , अण्णा हजारेस्टाइल कार्यकर्ते...
ह्यातील कुणीही भाजपला खाली खेचू शकते. पण ह्यातील कोणीच स्वतः त्या सिंहासनावर बसत नाही.
मग पोकळी असली, की बसणार कोण ? तर पुन्हा काँगी!
(त्यातही स्वत: रागा पीएम होणार नाही. तो कॉम्ग्रेस अध्यक्ष राहिल; व पर्यायाने भ्रष्टाचार व इतर सगळी बालंटे प्रत्यक्ष खुर्चीवर असणार्याच्या माथी जातील.
चुकून काही चांगले झालेच, तर त्याचे श्रेय मात्र रागा घेतील. )
.
.
राजकीय-सामाजिक त्याच त्या विषयांवर बोलू नये अस्वे टह्रवत असतो; पण कधी कधी राहवत नाही आनी मग टंकत बसतो मी.
The man who helped kill the
The man who helped kill the Soviet Union with information
मूळचे ब्रिटिश असलेले व अमेरिकेत लेखक म्हणून ख्यात असलेले रॉबर्ट कॉन्क्वेस्ट यांचे नुकतेच निधन झाले. सोव्हियन युनियन मधे जे काही राडे व अत्याचार झाले त्याचे शब्दांकन करणारे लेखक. डाव्यांनी त्यांच्यावर अत्याचारांचे आकडे फुगवून सांगण्याचे आरोप केलेले होते. खरंखोटं देव जाणे. जॉर्ज विल यांनी वाहिलेली आदरांजली.
In 1986, Conquest published “The Harvest of Sorrow: Soviet Collectivization and the Terror-Famine,” his unsparing account of the deliberate starvation of Ukraine in 1932 and 1933, which killed, at a minimum, 7 million people, more than half of them children. At one point, more Ukrainians were dying each day than Jews were to be murdered at Auschwitz at the peak of extermination in the spring of 1944.
सावरकरांच्या हिंदुत्ववादाचा
सावरकरांच्या हिंदुत्ववादाचा विपर्यास
घ्या. ह्याचा विपर्यास झाला त्याचा कालानुरुप अर्थ ध्यानात घ्यायला पायजे अमक्याचं मिस-इंटरप्रिटेशन झालं ढमक्याचा अर्थ आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट घेतला गेला हीच ओरड - बस्स करा यार. तुम्हाला काय एकदाची आदर्श हिंदुत्ववादाची काय ती एक व्याख्या करून दाखवा आणि मग सर्वसंगपरित्याग करून हिमालयात जा बघू. डोक्याला शॉट नुस्ता.
विवेकानंद सुद्धा पेलणारे
विवेकानंद सुद्धा पेलणारे नव्हते.
विवेकानंदांचे एक वाक्य असे दाखवा की जे आजच्या जगात आचरणात आणण्याजोगे आहे. सामान्य माणसाला.
तुम्ही असे म्हणू शकता की गब्बर ला विवेकानंद समजलेच नाहीत व / वा त्याने समजून घेतलेच नाहीत. (गब्बर ची कपॅसीटीच नैय्ये.) पण मला एकही त्यांचे म्हणणे असे सापडले नाही की जे आज शांतपणे आचरणात आणता येईल.
ही कांही उद्धरणे पहा बरं..
विवेकानंदांचे एक वाक्य असे दाखवा की जे आजच्या जगात आचरणात आणण्याजोगे आहे. सामान्य माणसाला.
ही कांही उद्धरणे पहा बरं..आणि ही फक्त सामाजिक विषयांसंदर्भातीलच आहेत..(अन्य विषयांतील पण आहेत..पुन्हा कधी तरी)
"धर्माच्या म्हणजे माणसातील चांगुलपणाच्या आधाराशिवाय या देशातील सभ्यता टिकणार नाही.."
"पुरोहितगिरी हे भारताच्या अधःपतनाचे कारण आहे. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनी केलेल्या जुलुमांचे ओझे चक्रवाढ व्याजाने वाढून त्यांच्याच डोक्यावर बसले आहे."
"..अभेदावर, विभिन्न वस्तुंच्या मुळाशी एकत्व विद्यमान आहे या सत्यावर श्रद्धा ठेवल्याने सर्वप्रकारे कल्याण होते, हाच वेदांताचा सर्वोच्च आदर्श आहे."
"जातीभेद ही दृढमूल झालेली सामाजिक संस्थाच होय. तिचे कार्य आता संपले आहे व ती भारताचे वातावरण जणू दुर्गंधीने भरून टाकत आहे. लोकांची नष्ट झालेली सामजिक स्वत्वबुद्धी पुनः जागृत करुनच हा जातीभेद दूर करता येईल"
"जातीभेद हा वेदांतधर्माच्या विरुद्ध आहे. जातीभेद ही केवळ व्यवस्था आहे. तिला खर्या धर्मात स्थान नाही. कोणीही मनुष्य, मग तो शूद्र असो की चांडाळ असो, अगदी ब्राह्मणाला देखील तत्वज्ञान समजाऊन सांगू शकतो. सत्याचे ज्ञान अती नीच व्यकतीकडूनही प्राप्त करता येते; मग ती कोणत्याही जातीची वा पंथाची असो"
"एक माणूस जन्मतःच दुसर्यापेक्षा श्रेष्ठ असतो ही कल्पनाच वेदांताच्या दृष्टीने निरर्थक आहे. वेदांताने विशेषाधिकाराची कल्पनाच टाकून द्यायला सांगितले आहे. त्यानंतरच धर्माचा आरंभ होईल. त्यापूर्वी धर्म अस्तित्वात असू शकत नाही. विशेष अधिकार विसर्जीत करण्याचे काम भारतातील ब्राह्मणांपासून सुरु करावे, व हे करण्यास मुळीच वेळ गमवू नये. जातीवर आधारीत विशिष्ट हकाचे दिवस आता संपलेत"
"पाणी उजव्या हाताने प्यावे की डाव्या असल्या क्षुल्लक समस्या घेऊन ज्या समाजाने शेकडो वर्षे वादविवादात घालविली त्या समाजाकडून तुम्ही कसली अपेक्षा करणार? देशातील अत्यंत विचारशील व्यक्ती शेकडो वर्षे स्वयंपाकघरातील समस्यांवर, सोवळे- ओवळे, शिवाशिवीचे प्रायश्चीत इत्यादी गोष्टींवर वाद घालीत बसाव्यात यापेक्षा अधिक पतन कोणते असू शकेल?"
"..आज आपल्यापैकी बहुतेक जण वेदांतवादी नाहीत आणि पुराणवादीही नाहीत अथवा तंत्रवादीही नाहीत. आम्ही फक्त 'शिवू-नका वादी' आहोत. आपला धर्म स्वयंपाकघरात जाऊन बसला आहे..भाताचे भांडे झाले आहे आपला देव; आणि मला शिवू नका-मी पवित्र आहे हा झाला आहे आपला धर्म..आणखी शंभर वर्षे हे असेच चालले तर आपल्यापैकी प्रत्येकाला वेड्याच्या ईस्पितळात जावे लागेल"
"इतकी तपश्चर्या करून मला हेच सत्य कळले आहे की, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी भगवंताचा वास आहे. ईश्वरबिश्वर आणखी कांही नाही. जीवांची सेवा हीच इश्वराची सेवा होय"
"..अहो भारातातील उच्चवर्णियांनो...मारे तुम्ही आपली वंशावळ आर्यांपर्यंत नेऊन भिडवलीत, प्राचीन भारताच्या वैभवाचे पोवाडे रात्रंदिवस गाईलेत, आम्ही अमुक कुळांत जन्मलो, अशी ऐट मिरवलीत..तेव्हढ्याने तुमचा जिवंतपणा सिद्ध होत नाही.(तुम्ही) चालती बोलती प्रेते आहात! तुमच्या चालीरीती, रुढी इतक्या निर्जीव व जुनाट आहेत की जणू पुराणवस्तुसंग्रहालयातील नमुनेच! तुम्ही भूतकाळाचे प्रतिनिधी आहात..भविष्यकाळी तुम्हाला अस्तित्वच नाही. स्वप्नलोकांतील रहिवाश्यांनो, कशाला तुम्ही आता इथे रेंगाळत आहात? प्राचीन भारताच्या मृतशरीराच्या रक्तमांसहीन अस्थीपंजरांनो, तुम्ही आता तबडतोब धुळीला मिळून हवेत विलीन का होत नाही? मात्र तुमच्या जवळचा (ज्ञानाचा) अमुल्य खजीना जाण्यापूर्वी तुमच्या वारसदारांना देऊन टाका बघू..! तुम्ही आता शून्यात विलीन होऊन जा आणि तुमच्या जागी नवभारताचा उदय होऊ द्या. नांगर धरणार्या शेतकर्याच्या झोपडीतून, कोळ्यांच्या, चांभारांच्या, भंग्यांच्या झोपड्यातून नवा भारतवर्ष उभा राहू द्या! किराणामालाच्या दुकानातून आणि भडभुंज्याच्या भट्टीजवळून तो वर येऊ द्या! कारखान्यांतून, दुकानामधून आणि बाजारातून तो वर येऊ द्या! झाडाझुडुपांतून, रानावनातून, दर्याखोर्यांतून, पहाडपर्वतांतून तो प्रगट होऊ द्या. या सामान्य लोकांनी हजारो वर्षे दडपशाही सहन केली आहे, अगदी तोंडातून ब्र ही न उच्चारता सहन केली आहे...मूठभर सत्तू खाऊन ते जगाला हलवू शकतात..भाकरीचा चतकोर तुकडा मिळाला तरीही ते त्रिभुवनात मावणार नाही एव्हढी कार्यशक्ती प्रगट करतील. काढा तुमची ती मणीभांडारे..जितक्या त्वरीत तुम्ही हे त्यांना देऊ शकाल, तितक्या त्वरीत ते द्या..आणि या जगातून नाहीसे व्हा. तुम्ही अदृश्य होता न होता तोच नवभारताच्या जागृतीची पहिली ललकारी ऐकू येईल..सगळ्या जगाला दणाणून सोडीत लक्ष लक्ष कंठांतून ललकारी उठेल..'वाह गुरु की फतेह..!"
संभाव्य आक्षेपः 'पण हे आजच्या काळात आचरणात आणता येईल अशी वाक्ये आहेत?" संभाव्य आक्षेपाला उत्तर- 'हो'.
शंका
विवेकानंद ह्या विषयाबद्दल काही शंका आहेत.
परस्परविरोधी माहिती आल्यावर त्याच्याशी नेमकं डील कसं करायचं?
स्वामी विवेकानंद ह्यांनी "पवहारी बाबा" म्हणजे "पवन/हवा खाउन जिवंत राहणारा माणूस/बाबा" , हठयोगाच्या मदतीनं चमत्कार वाटावेत असे प्रकार करणारी माणसे , विविध सिद्धी वगैरेंचा अनुभव घेतल्याचा उल्लेख केलाय. विवेकानंदांची पुस्तकं/भाषणं वगैरे वाचल्यावर जे जाणवतं ते म्हणजे अल्याडच्या पुस्तकात विवेकानंदांनी "छी थू त्या जातिसंस्थेच्या." , "जय हो समानता की." , " भौतिक स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेले आधुनिक विज्ञानवादीच शिवाशिव पाळणार्यांपेक्षा वेदांताच्या जवळ आहेत." असा उपदेश केलेला असतो;
पण....
पण ह्या अल्याडच्या पुस्तकांशिवाय पल्याडच्या पुस्तकात विवेकानंदांनीच सिद्धी, चमत्कार, त्याबद्दलचे अनुभव, पवहारी बाबा वगैरेबद्दल बोललेलं असतं ! विवेकानंदांनी "जातीवाद वाईट आहे. प्रगतीची कास धरा.कषट करा. सचोटिनं वागा" वगैरे सांगितलं हे सत्यच आहे.
पण त्याच्याच सोबत अशा चमत्कारांचा, सिद्धींना आपण साक्ष असल्याचेही बोललं आहे.
त्याचं काय करायचं ?
शिवाय त्यांना रामकृश्णांबद्दल अपार आदर वगिअरे होता.
तर हे रामकृष्ण परमहंस म्हणजे कोण. तर हे अधूनमधून गडाबडा लोळत. त्रास होतो वगैरे म्हणत. हे अध्यात्माचे इफेक्ट आहेत म्हणत.
विवेकानंद आणि अजून एक कोणता तरी शिष्य म्हणजे फार फार प्राचीन अशा ऋषींचे अवतार आहेत म्हणत. नर-नारायण ह्या नावाचे कुनी दोन ऋषी होते; त्यातला एक म्हणजे साक्षात विवेकानंद. ह्याशिवाय रामकृष्ण इतरही काही करत.(तपशील आता रामकृष्ण मिशनच्या लायब्रर्यांत जाउन शोधायला लागतील. चटकन आठवणाता म्हणजे रेफरन्स "परिव्राजक" हे पुस्तक.ती विवेकानंदांची समुद्रप्रवासातली डायरीच होय.)
ह्या सर्व प्रकारांबद्दल आपलं मत जाणून घ्यायला आवडेल. विशेषतः अलौकिक पारलौकिक शक्ती, चमत्कार वगैरे.
फक्त विवेकानंदच नव्हे मागील दीड दोन शतकात होउन गेलेल्या कैक संतांचे चमत्कार फेमस आहेत.
खरं तर त्यांनी चमत्कार केला आहे म्हणूनच ते थोर आहेत असं त्यांच्या मागे जाणारा मोठ्ठा समाज मानतो.
गाडगेबाबा, तुकडोजी हे सामाजिक कार्यासाठी थोर मानले जातात; मान्य.
पण महाराष्ट्रिय मध्यमवर्गात स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज हे व असे कैक लोक अतिप्रिय आहेत.
ह्यांची तत्वज्ञाने कमी किंवा नगण्य प्रमाणात म्हणता यावीत इतकी चर्चेत असतात, पण विषय निघाला की पोथी व त्यातले चमत्कार हे येतातच. ह्यांच्याबद्दल वस्तुनिष्ठ ष्ट्यांड घ्यायचा म्हटला तर काय म्हणता यावे नेमके ?
खुद्द विवेकान्म्दांचे गुरु रामकृष्ण परमहंस ह्यांच्याबद्दल काय म्हणता यावं?
केशवचंद्र सेन वगैरे तत्कालीन अग्रणी बुद्धीवाद्यांनाही रामकृष्ण परमहंस ह्यांची भुरळ पडली होती.
रामकृष्ण परमहंस स्वतः कॅन्सरनं गेले असले तरी त्यांच्याही चमत्कांरांच्या नोंदींची वानवा नाहिच.
ह्या सगळ्याकडे नेमकं कसं पहायचं?
१. चमत्कार सोडून द्यायचे. एका
१. चमत्कार सोडून द्यायचे. एका विशिष्ट काळात, एका विशिष्ट घटकाला कदाचीत ते प्रेरणादायी/ कांही शिकविणारं वाटत असेल. मला विवेकानंद भावतात ते 'माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका' आणि त्यानंतरच्या टाळ्या यापेक्षा त्यांनी फुले-शाहू- आंबेडकरांएव्हढ्याच तिव्रतेने (कधी कधी त्यांचेपेक्षा कठोर शब्द वापरून) अस्पृश्यता आणि उच्चनीचतेच्या भेदभावांचा धिक्कार केला आहे, यामुळे. वेदांताच्या जगन्मान्य भाष्यकाराने असल्या गोष्टी म्हणजे धर्म नव्हे, हे त्या काळात ठणकावून सांगितले म्हणून. त्यांनी कांही चमत्कार केले की नाही याला शून्य महत्व.
२. अप्रतिम संघटन, प्रॅक्टीकल धर्म (धर्म= स्वतः आणि इतरांना शांतता/ ऐहिक व अध्यात्मिक प्रगतीच्या समान संधी मिळतील यासाठी कसे राहिले पाहिजे याची सूत्रे- उपासना पद्धती या अर्थाने नव्हे) शिकवणे, नाही-रे साठी पुढे दीर्घ काळ चालत राहीलेली विविध प्रकल्पांची मोठी साखळी उभारणे यातील त्यांचे कर्तृत्व अफाट आहे. म्हणून ते भावतात.
३. विविध साधना/ सिद्धी या विषयावर बोलण्याएव्हढा माझा त्यातील अभ्यास नाही. पण म्हणून त्यातील सगळंच थोतांड होतं असं मला वाटत नाही. असलं तरीही वरच्या गोष्टी त्याहून कितीतरी महत्वाच्या आहेत.
४.
स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज हे व असे कैक लोक अतिप्रिय आहेत.
खरय. मी आस्तिक आहे पण देवळं, मठ आणि आश्रम मध्ये रमत नाही. स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज यांच्यापेक्षा गाडगेबाबा फार जवळचे वाटतात. स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज यांच्या चमत्काराच्या कथा रमवीत नाहीत. तरी पण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन कांही चांगलं काम (दवाखाने/ शाळा/ जल संवर्धन) करणारी मंडळी आहेत, त्यांना मानतो व यांनी लोकांना अशी प्रेरणा दिलेली म्हणून केवळ या सत्पुरुषांबद्दल आदर वाटतो.
गांधीजी कधीकाळी रेसिस्ट आणि
गांधीजी कधीकाळी रेसिस्ट आणि पुढे एकदम हरिजनप्रेमी वगैरेही झाले. याची संगती कशी लावणार?
शिवाजीमहाराज त्यांच्या एका सुभेदाराला पत्रात सुनावतात, "ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो". तेच दुसर्या ठिकाणी एका सरदाराबद्दल म्हणतात, "मराठा असून ब्राह्मणावर तरवार उगारली त्याचा नतीजा तो पावला". याची संगती कशी लावणार?
औरंगजेबाने देवळे फोडली, त्यासोबत त्याने एकदा यज्ञबिज्ञ केल्याची ष्टुरी तर तुम्हीच सांगता ना? याची संगती कशी लावणार?
वरील उदाहरणांवर विचार केलात तर याची संगती लागू शकेलसे वाटते.
संगती
>> गांधीजी कधीकाळी रेसिस्ट आणि पुढे एकदम हरिजनप्रेमी वगैरेही झाले. याची संगती कशी लावणार?
तज्ज्ञ अधिक तपशीलात सांगतील, पण मला वाटतं ह्याची संगती लावण्याचे प्रयत्न गांधीजींनीच केले होते. हळूहळू आपल्या विचारांत कसा बदल झाला हे गांधीजींनी आत्मचरित्रात आणि इतरत्रही वेळोवेळी म्हणून ठेवलेलं आहे. नाही का?
@प्रसन्ना१६११, तुमचे म्हणणे
@प्रसन्ना१६११, तुमचे म्हणणे मी सहर्ष मान्य करतो.
तत्व हे कोणी सांगितले आहे हे न पाहता ते तत्व सुयोग्य आहे की नाही ते तपासून पाहून ते आचरणात आणले पाहिजे - हा विचार स्पृहणीयच आहे.
आता माझा पुढचा प्रश्न - हा - नेमका या स्पृहणीय विचाराच्या विपरीत आहे.
तुम्ही जे विवेकानंदांचे विचार वर उधृत केलेत ते सगळे मागे संतांनी सुद्धा सांगितलेले आहेत. तुकाराम, ज्ञानेश्वर, कबीर, तुलसीदास, चोखामेळा, नामदेव, एकनाथ या व इतर विवेकानंदांच्या पूर्वी जन्मास आलेल्या संतांनी मांडलेलेच आहेत. विवेकानंदांनी असा नेमका कोणता विचार मांडला की जो इतरांनी पूर्वी मांडलेला नाही. असा विचार की सामान्य माणसास आचरणात सुद्धा आणता येईल.
पुनश्च - तुमचा मुद्दा मान्य आहेच @प्रसन्ना१६११. आता फक्त माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या.
विवेकानंदांचे एक वाक्य असे
विवेकानंदांचे एक वाक्य असे दाखवा की जे आजच्या जगात आचरणात आणण्याजोगे आहे. सामान्य माणसाला.
हा तुमचा मूळ मुद्दा.. माझा पहीला प्रतिसाद यावर होता.
विवेकानंदांनी असा नेमका कोणता विचार मांडला की जो इतरांनी पूर्वी मांडलेला नाही.
हा तुम्ही नवीन प्रश्न मांडला.
१. आधीच अनेकांनी केलेली शिकवण त्यांनी पुन्हा सांगितली असे जरी गृहीत धरले तरी त्याच्यानी काही फरक पडत नसावा. आजुबाजुला काय परिस्थिती असताना व किती चिवटपणे, जोरकसपणे सांगितले आहे. इट मॅटर्स...निरर्थक/ भेदभाव कारक/ विकृत गोष्टी सोडुन द्या, त्या म्हणजे खरा धर्म नव्हेत हे सगळ्याच संतांनी सांगितलेच आहे. विवेकानंद त्याकाळात लोकप्रिय असलेल्या भक्तीच्या निष्क्रीय गोष्टींपेक्षा धर्म म्हणजे सुधारणा हे लोकांच्या गळी उतरवण्यात यशस्वी ठरले, ते महत्वाचे.
२. तसं पाहीलं तर प्रयेकानेच कांही समान तत्वाचा वेगवेगळ्या शब्दांत पुरस्कार केलेला आहे. यात काय ओरिजिनल असं म्हणता येतंच की. कांही समान तत्वे म्हणजे- एकत्व, ईशभक्ती, शांततामय सहअस्तित्व, सर्वानी आपापल्या आयुष्यात गुण्यागोविंदाने रहावे यासाठी सांगितलेल्या पारलौकिक कल्पना इ. त्यामुळे विवेकानंदांचे वा अन्य कोणाही महापुरुषाचे/ महान स्त्रियांचे महत्व कमी होत नाही.
३. महान लोक, लोकोत्तर सुधारक आणि संत यांनी सार्वकालिक लागू होऊ शकतील अशा गोष्टी आणि त्या त्या कालखंडाला लागू होतील अशा गोष्टी अशा दोन प्रकारे उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या (अथवा त्यांचा पुनरुच्चार केला). अनेक गोष्टींचे संदर्भ बदलल्यामुळे सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आजच्या काळात आचरणयोग्य किंवा लागू पडतील अशा नसतात. म्हणून पहिल्या प्रकारातील त्यांचे काय सांगणे आहे, ते शोधून त्यावर विचार करावा असे वाटते.
(अवांतरः ते ‘संभाव्य आक्षेप’..‘बाजार’ वगैरे कृहघे. एकावर खवचट शिक्काही...)
India could help Foxconn
सगळं होऊ शकतं पण ...