जे एन यू : मेरा प्यार
मी जेएनयूची विद्यार्थिनी होते, त्यामुळे या विद्यापीठाविषयी मला अत्यंत आत्मीयता आहे. खरं तर माझ्या तिथल्या अनुभवांबद्दल लिहावं असं मला बर्याच वेळा वाटतं, पण उगाचच राहून गेलं. एकदा लिहायला लागले, तर कुठे थांबू ते मला समजणार नाही. अनेक पैलूंबाबत लिहण्यासारखं आहे. पण तूर्त, ताज्या घडामोडींशी संबंधित अशा विद्यार्थी संघटनांचं राजकारण या विषयावर वेळ होईल, सुचेल तसं तसं लिहित राहते.
घरच्या बर्याच लोकांच्या काळजीला न जुमानता साधारण दहा वर्षांपूर्वी मी जे एन यू मधे प्रवेश केला, तेव्हा माझ्या क्षेत्रातील भारतातील सर्वोत्कृष्ट संस्था यापलीकडे मला विशेष माहिती नव्हती. आधीपासून ओळखीचं असं कुणीही तिथे नव्हतं. एका 'हितचिंतकां'नी मात्र तिथे 'लाल झेंड्याचं (अनिष्ट) राजकारण' चालतं याविषयीची नाराजी व्यक्त करून 'तू त्यापासून लांबच रहा' असा सल्लाही दिला होता. त्या वेळी मुंबई विद्यापीठातील कॉलेजांत विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका होत नव्हत्या. (शिक्षकच काही हुशार इ. विद्यार्थ्यांची निवड करत आणि ही विद्यार्थी प्रतिनिधी मंडळी 'रोझ डे' किंवा वार्षिक उत्सव आयोजित करणे वगैरे करत.) त्यामुळे विद्यार्थी चळवळी, विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका आणि त्या संदर्भातील राजकारण याविषयी मला काहीही माहिती नव्हती. शैक्षणिक संस्था, विद्यार्थी संघटना यांपासून राजकारण दूर असावं असं मलाही तेव्हा वाटत होतं.
माझ्या या विचाराला सगळ्यात पहिला धक्का लागला, तो अॅडमिशनच्या वेळीच. प्रवेश परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी देशभरातून, लांबून लांबून अॅडमिशन घ्यायला जेव्हा जेएनयूत येतात, तेव्हा बर्याचदा बावचळलेले असतात. त्यांच्याबरोबर आलेले पालक चिंताग्रस्त असतात. लहान गावांतून, लहान शहरांतून, साध्यासुध्या घरांतून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात, मोठ्या विद्यापीठात आल्यावर घाबरल्यासारखे वाटत असते. प्रचंड मोठा कँपस, पंधराएक मोठमोठी 'छात्रालये' आणि हजारो निवासी विद्यार्थी अशा वातावरणात रॅगिंगची भीती वाटते. रॅगिंग तर सोडाच, वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांचे (सिनिअर) विद्यार्थी दिवसेंदिवस सकाळ दुपार 'अॅडमिशन असिस्टंस' साठी तत्पर असलेले बघून मला आश्चर्यच वाटले. जेएनयूत मोठ्या संख्येने बाहेरगावचे विद्यार्थी असल्याने दुर्दैवाने हॉस्टेलांचा कायम तुटवडा भासतो. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना लगेच खोली मिळत नाही. अशा वेळी सुरवातीचे काही दिवस/ आठवडे हॉस्टेल न मिळालेले नवीन विद्यार्थी सिनियर विद्यार्थ्यांच्या खोल्यांत राहतात. एवढ्याशा खोलीत - जिथे दोन जणांनी राहणेही कधी कधी नको वाटते तिथे - आपल्या खोलीत आणखी कोणाला तरी सामावून घेण्यात अग्रणी बहुतांशी राजकीय संघटनांचे नेते-विद्यार्थी असतात. (अर्थात, नवीन येणार्या मुलामुलींशी ओळख होऊन त्यांना पुढे वेळप्रसंगी आपल्या संघटनेचा सदस्य होण्याचा आग्रह करायचा हा उघड हेतू त्यामागे असतो. पण एखादा नवीन विद्यार्थी दुसर्या संघटनेचा सदस्य असला, तरी त्याला आपल्या खोलीत राहू देण्याची, त्याच्याशी चांगली मैत्री करण्याची परंपरा इथे आहे.)
अजून अशा बर्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण त्या नंतर कधीतरी. 'विद्यार्थी राजकारण' हे वाईट नाही असा माझ्या मतांत निर्णायक बदल झाला, त्याला कारणीभूत ठरली ती 'किमान वेतन चळवळ'. आत्ताच्या ताज्या घटनांशी याचा थेट संबंध नसला तरी, जेएनयू तले एकंदर राजकीय वातावरण कसे आहे त्याचा अंदाज यावा म्हणून मला हे सांगावेसे वाटले. ही चळवळ झाली तेव्हा जेएनयूत तेरा हॉस्टेल्स होती. विवाहित विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एका क्वार्टरवजा हॉस्टेलव्यतिरिक्त बाकी सगळ्या वसतिगृहांत कॉमन मेस अर्थात खानावळ असते. त्याचा भाजीपाल्याचा, किराण्याचा महिन्याचा जो खर्च येतो, तो सगळ्या विद्यार्थ्यांना विभागून द्यावा लागतो. बाकी १०-१२ स्वयंपाक्यांचा पगार, गॅस आणि इतर खर्च विद्यापीठाकडून मिळतो. या वेळी कँपसमधे अनेक ठिकाणी नव्या वसतिगृहांचे आणि इतर बर्याच इमारतींचे बांधकाम चालू होते. त्यावर शेकडो मजूर काम करत होते. खानावळीत आणि बांधकामावर काम करणार्या, तसेच वसतिगृहांत सफाईचे काम करणार्या कामकर्यांना मिळणार्या वेतनाचा काही विद्यार्थ्यांनी सर्व्हे केला. त्यात त्यांना लक्षात आलं की किमान वेतन कायद्यानुसार जे वेतन त्यांना मिळायला हवे, तेवढेही त्यांना मिळत नाही. आपण ज्या इमारतीत शिकणार आहोत, ज्या इमारतीत राहणार आहोत, जे अन्न खातो त्यामागे अनेकांचे कष्ट आहेत आणि त्या कष्टांचा पुरेसा मोबदला त्यांना मिळायला हवा असं विद्यार्थ्यांना वाटणं या बाबीचे मला खूप महत्त्व वाटले. हे अचानक घडलं नाही. विद्यापीठातले विद्यार्थी, शिक्षक आणि कामगार यांचे संघटन किती घट्ट आहे, त्याची ती प्रचीती होती. किमान वेतन मिळत नाही हे लक्षात आल्यावर या विद्यार्थ्यांनी बाकी विद्यार्थ्यांना एकत्र करून एक शांततामय चळवळ उभारली आणि प्रशासनाकडे मागणी केली की भारतीय कायद्यानुसार जे किमान वेतन देय आहे, तेवढे तरी या कामगारांना मिळावे. बहुतांश नव्या वसतिगृहांतील कामगार आणि बांधकामावरील मजूर हे कंत्राटी होते. त्यामुळे प्रशासनाने आधी जबाबदारी झटकली. पण विद्यापीठ प्रशासन हा अल्टिमेट एम्प्लॉयर असल्याने 'कायद्यानुसार वेतन मिळते का' हे बघण्याची किमान जबाबदारी त्यांच्यावर आहे, हे विद्यार्थ्यांनी मान्य करायला लावले. ही लढाई सोपी नव्हती. पण चिकाटी आणि शांततेने विद्यार्थ्यांनी ती जिंकली. दर महिन्यात वेतन वाटपाच्या वेळी एक विद्यार्थी प्रतिनिधी निरीक्षक म्हणून हजर राहण्याची परवानगीही त्यांनी मिळवली. या चळवळीत वेगवेगळ्या विचारसरणीच्या संघटनांनी आणि कुठल्याही संघटनेशी संलग्न नसलेल्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. ही चळवळ जवळून पाहिल्यावर विद्यार्थी एकत्र झाले, तर किती विधायक आणि संवेदनशील काम करू शकतात ते माझ्या लक्षात आलं, आणि माझी पूर्वीची मतं पालटली.
- - -
भाग दुसरा
- - -
जेएनयूला नेहमीच डाव्यांचा बालेकिल्ला म्हटलं जातं. पण भारतातल्या डाव्या पक्षांत अगदी सुरुवातीच्या काळापासून वैचारिक मतभेद आणि फुटून निघण्याची परंपरा आहे. त्यामुळे सगळे डावे पक्ष नेहमी हातात हात घालून वावरत नाहीत. जेएनयू मध्येही अनेक डाव्या संघटना सक्रिय असल्या तरी त्यांचं एकमेकींशी फार गूळपीठ नाही. तिथे SFI (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची विद्यार्थी संघटना), AISF (भारतीय कम्युनिस्ट पक्षाची विद्यार्थी संघटना), AISA (लेनिनवादी - यांनाच नक्षलवादीही म्हणतात), DSU (माओवादी) अशा वेगवेगळ्या डाव्या संघटना आहेत. PSU ही नक्की कायवादी डावी संघटना आहे, आणि ती अजून JNUत आहे का, हे मला माहीत नाही. पहिल्या दोन संघटना/पक्ष आपल्याला साधारणत: 'उदारमतवादी डावे' म्हणवतात, तर बाकीच्या कट्टर डाव्या संघटना आहेत. काही वर्षांपूर्वी जेएनयू तल्या SFIच्या नेत्यांनी सिपिएमच्या निर्णयावर उघड टीका केल्याने त्यांची (बाबा) पक्षाने हकालपट्टी केली. तेव्हा या विद्यार्थ्यांनी DSF ही आपली नवीन संघटना उभारली. ABVP ही करत नाही एवढी टीका डाव्या संघटना एकमेकींवर करत असतात. याशिवाय काही दलित संघटनाही आहेत, त्यांचं डाव्यांशी फारसं पटत नाही. अनेक वर्षं SFI आणि AISA या JNUतल्या शक्तिमान संघटना होत्या. पण मधूनमधून ABVP ही बळकट होत असते. काँग्रेसच्या NSUI ला मात्र JNUत मोठ्या प्रमाणावर पाठिंबा कधीच मिळालेला नाही. काही वर्षांपूर्वी यूथ फॉर इक्वालिटी अचानक उदयाला आली होती, पण तिचा अस्त झाला. विविध लाल संघटनांच्या अस्तित्वामुळे केंद्रात सत्ताधारी असलेल्या विविध पक्षांना जेएनयू कायम अडचणीचे वाटत आले आहे. कोंग्रेसचे सरकार त्याला अपवाद नाही. नक्षलवादी, माओवादी ही नावं पेपरांमधून नेहमी हिंसक, अतिरेकी संघटनांची नावं म्हणून आपल्या वाचनात येतात. पण JNUतले हे 'अतिरेकी' स्कॉलरशिप वगैरे आपल्या मागण्यांसाठी उपोषण, सत्याग्रहासारखे गांधीवादी मार्ग वापरताना पाहून मौज वाटते.
फाशी निषेध प्रकरण
मृत्युदंड किंवा फाशीची शिक्षा या संकल्पनेला JNUतल्या काही विद्यार्थ्यांचा फार वर्षांपासून विरोध आहे. याआधीही वेळोवेळी तो व्यक्त झालेला आहे. हा विरोध 'अमुक’ व्यक्तीला फाशी झाली, म्हणून केला नसून मृत्युदंड हा एक प्रकारचा खूनच आहे असं त्यांचं मत आहे. हे मत जगभरातल्या वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांनी व्यक्त केलेले आहे. याचा संबंध फक्त डाव्यांशी नाही. माओवादी संघटना, ज्या एरवी हिंसेचं समर्थन करणार्या मानल्या जातात, त्यांनी मृत्यदंडाविरोधी बोलावं हे मात्र आश्चर्याचं वाटतं. मला वाटतं, त्यांनी नेहमीच राज्यसंस्था-प्रणित हिंसेचा विरोध केला आहे. मृत्युदंडाची शिक्षा असावी का, किंवा काही अपवादात्मक परिस्थितीत असावी का याबाबत मतांतरे असणारच. JNUतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मृत्युदंड नसावा, असं अजिबात वाटत नाही, अशी माझी समजूत आहे. पण ज्यांचं मत मृत्युदंडविरोधी आहे, त्यांना ते मांडू देण्याचे स्वातंत्र्य JNUत नेहमीच होतं. त्यावर जहाल शब्दांत (शाब्दिक) टीका करण्याची परंपराही JNUत आहे/होती. आता हजारो विद्यार्थी आणि प्राध्यापक उभे आहेत, ते या विद्यापीठातल्या निर्भयपणे चर्चा-टीका करण्याच्या स्वातंत्र्याच्या पाठीशी.
म्हणूत थोडं JNUच्या 'चर्चा-टीका-वादविवादा'च्या संस्कृतीबद्दल सांगते.
पत्रकयुद्ध
अ४ कागदांवर छापलेली (फोटोकॉपी केलेली) पत्रकं हा JNUच्या राजकीय संस्कृतीतला अत्यंत रोचक भाग आहे. बहुतेक विद्यार्थी हे हॉस्टेलनिवासी असल्याने हजारो विद्यार्थी दुपारचं आणि रात्रीचं जेवायला मेसमधे जातात. प्रत्येक हॉस्टेलची स्वतंत्र मेस असते. मेसच्या ओट्यावरून प्रत्येकाला ताट घ्यावे लागते, तिथे विविध संघटनांच्या पत्रकांचे गठ्ठे ठेवलेले असतात. जेवायला येणारे बरेच विद्यार्थी उदरभरणासाठी अन्न वाढून घेतात, त्यापेक्षा जास्त चवीने पत्रकं हस्तगत करूनच जेवायला टेबलावर जातात. जेवताना पत्रकं वाचून चर्चा केल्याशिवाय अनेकांना जेवण जात नाही. ही पत्रकं बहुधा शब्दबंबाळ असतात, वैचारिक असतात. नवीन विद्यार्थ्यांना लवकर हॉस्टेल मिळावे, JNUच्या प्रवेश परीक्षेची फी कमी करावी असल्या मागण्यांपासून शेजारच्या हॉस्टेलमधे वार्षिक उत्सवाच्या वेळी ठेवलेला कार्यक्रम पोलिटिकली इनकरेक्ट होता, किंवा भारत सरकारने आपले परराष्ट्र धोरण काय ठेवावे याबाबतचे गंभीर सल्ले यापैकी कुठल्याही विषयावर ही पत्रकं असू शकतात. या पत्रकांद्वारे विद्यार्थी फार सिरिअसली वाग्युद्धे खेळत असतात. ही पत्रकं कँपसमधे जितक्या म्हणून भिंती दिसतील त्यांना आतून-बाहेरून लावलेली असतात. लोक हॉस्टेलबाहेर चहा पीत वगैरे उभे असतानाही ती वाचत असतात. भिंतींवर ही पत्रकं लावण्याचे अलिखित नियम आहेत, जसे नवीन सत्र सुरू होऊन निवडणुका होण्याच्या काळात भिंतींवरच्या जागा बुक करून ठेवल्या जातात. दुसर्या पार्टीने बुक केलेल्या जागेवर सहसा कोणी आपलं पत्रक चिकटवत नाही. एखादा कार्यक्रम असेल, तर तो होऊन जाईपर्यंत त्या पत्रकावर दुसरं पत्रक चिकटवायचं नाही. बर्याच पत्रकांच्या खाली हस्ताक्षरात अमुक तारखेपर्यंत हे पत्रक राहू द्यावे अशी सूचना लिहिलेली असते. सहसा दुसर्याच्या स्पेसचं पालन केलं जातं. पण कधी कधी त्यावरून भांडणंही होतात. होळीच्या दिवसात निघणारी पत्रकं हीच काय ती हलकीफुलकी, विनोदी बघायला मिळतात.
रात्रीची भाषणे
JNUच्या राजकीय संस्कृतीचा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे डिनरोत्तर भाषणे. रात्रीचं जेवण झाल्यावर JNU च्या विद्यार्थ्यांना खरं उजाडतं. बर्याच राजकीय संघटना आणि राजकीय/ इतर अभ्यासगट जेवणं झाल्यावर मेसमधे भाषणं ठेवतात. राजकीय नेते, शिक्षक, प्रोफेसर्स, अभ्यासक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते अशा बाहेरून बोलावलेल्या किंवा घरच्या कोणाचं तरी अनौपचारिक भाषण आणि नंतर प्रश्नोत्तरांच्या, चर्चेच्या फैरी असं यांचं स्वरूप असतं. बहुतेक कार्यक्रमांचे विषय राजकीय-सामाजिक असतात किंवा शैक्षणिक विषय असले तरी त्यात बहुधा समाजशास्त्राशी, चालू राजकीय घडामोडींशीसंबंधित विषयच अधिक.
बर्याच हॉस्टेलांसमोर ढाबे आहेत. ते संध्याकाळी सुरू होऊन रात्री उशीरा बंद होतात. या ढाब्यांसमोरच्या दगडांवर बसून तासन्तास केलेल्या चर्चा या इथल्या मंडळींच्या अभिमानाचा विषय आहे. पूर्वी क्रांतिकारी गाणी गात रात्रभर लोक ढाब्यावर बसत असत असं मी ऐकलं होतं.
निर्भयावरचा बलात्कार ज्या ठिकाणी घडला, ते ठिकाण JNUपासून जवळ आहे. त्यामुळे या घटनेचं गांभीर्य JNUच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तर अधिकच होतं. या घटनेच्या विरोधात पहिला मोर्चा काढला, तो JNUच्या विद्यार्थ्यांनीच. निषेध मोर्चे हे JNUच्या विद्यार्थ्यांचं अत्यंत आवडतं साधन आहे.
अध्यक्षीय वादविवाद
कन्हैयासंबंधी सध्या ज्या बातम्या येत आहेत, त्यात काही ठिकाणी त्याच्या वक्तृत्वाचा उल्लेख केलेला आहे. त्याची संघटना सध्या JNUत खूप बळकट नसूनही तो विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत विजयी झाली, कारण अध्यक्षीय उमेदावारांच्या वादविवादात त्याने केलेले उत्तम भाषण, असं मी एका बातमीत वाचलं. अध्यक्षीय उमेदावारांच्या वादविवादाचा कार्यक्रम हा JNUच्या निवडणुकांतला अतिशय आकर्षक भाग मानला जातो. अनेक विद्यापीठांत पैसा, गुंडगिरी, बाहुबळ, आणि शारीरिक सौंदर्य यांच्या आधारे निवडणुका लढवल्या जात असताना वैचारिक वक्तृत्वाला JNUच्या निवडणुकात किती महत्त्व आहे, त्याचं हे उदाहरण आहे. JNUच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुका घेतल्या जातात, त्या विद्यार्थ्यांनीच नेमलेल्या निवडणूक आयोगातर्फे. या आयोगातील कुठलाही विद्यार्थी कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसतो. या अयोगातर्फे JNUच्या विद्यार्थी संघांच्या अध्यक्ष स्थानासाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांच्या वादविवादाचा कार्यक्रम ठेवतात. कार्यक्रमातील जोरदार भाषणे ऐकायला बरेच जण लोटतात. अनेक जण जिंकायची शक्यता नसूनही या कार्यक्रमात भाषण ठोकून आपलं मत सगळ्यांसमोर मांडता यावं या उद्देशाने अध्यक्षीय पदासाठी निवडणूक लढवतात. या भाषणांनंतर उमेदवार एकमेकांना प्रश्न विचारू शकतात. तसंच विद्यार्थीही प्रश्न विचारू शकतात. (हे मला नक्की आठवत नाहीये). या वेळी घोषणाबाजीला ऊत आलेला असतो. हा दिवस एखाद्या सणासारखा असतो. पूर्वी तर म्हणे लठ्ठ लठ्ठ बुकं हाती घेऊनच उमेदवार व्यासपीठावर बसत, आणि वदाविवाद करताना त्यातली अवतरणं एकमेकांवर फेकत. (पोथिनिष्ठ मार्क्सवादी हा वाक्प्रचार तुम्ही ऐकला असेलच.)
अर्थात JNUमधले सगळे विद्यार्थी ही गुणी बाळं आहेत, आणि ती फक्त शाब्दिक लढायाच लढतात, असं म्हणणंही खोटेपणाचं होईल. काही वेळेला विद्यार्थ्यांच्या गटात मारहाण झाल्याचे प्रसंगही घडले आहेत. अध्यक्षीय वादविवादाच्या वेळी मारामारी झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. एकतर्फी प्रेमातून भर वर्गात मुलीवर हिंसक हल्ला आणि आत्महत्या हा प्रसंग JNUत घडू शकेल, यावर JNUच्या विद्यार्थ्यांचा कधीच विश्वास बसला नसता, पण अशी एक घटनाही काही वर्षांपूर्वी घडली होती.
अभिव्यक्तिस्वातंत्र्य या मुद्द्यावर JNUत रवंथ होत असणार हे वेगळं सांगायला नकोच. पण एका गमतीदार विवादाची आठवण सांगते. एकदा एका मुलग्यांच्या होस्टेलमधे वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी बाहेरून एक नर्तिका बोलवण्यात आली होती. तिचा नृत्याचा कार्यक्रम चालू असताना रंगात येऊन काही मुले शर्ट काढून स्टेजवर चढू लागली, तेव्हा शेजारच्या होस्टेलमधल्या मुलींनी तो कार्यक्रम बंद पाडला. या प्रसंगावरून बरेच दिवस पत्रकयुद्ध चाललं होतं. जर उजव्या विचारसरणीच्या, संस्कृतिरक्षक म्हणवणार्या लोकांनी एखादा कार्यक्रम त्यांना अनिष्ट वाटतो म्हणून बंद पाडला असता, तर या मुलींना ते चाललं असतं का असा प्रश्न काही मुलांनी विचारला होता.
डाव्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बाहेरून आलेल्या लोकांनी डाव्यांनाच अडचणीचे ठरतील असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केल्याने, आयोजकांनीच कार्यक्रम बंद करून टाकल्याचे विचित्र प्रसंगही इथे घडलेले आहेत.
तर, सांगायचा मुद्दा असा की, असंगत, गुंतागुंतीच्या घटनाही घडलेल्या असल्या, तरी विरुद्ध मत व्यक्त होण्यासाठी, त्याचा वैचारिक प्रतिवाद करण्यासाठी जे अवकाश लागतं, ते विरोधकांनाही देण्याची एकंदर JNU संस्कृती होती, आहे.
- - -
भाग तिसरा
- - -
JNUमधले विद्यार्थी अभ्यास बिभ्यास सोडून (करदात्यांच्या पैशांवर मजा मारत) नसते धंदे करत बसतात, अशी वक्तव्यं गेले काही दिवस ऐकू येत आहेत. रोहित वेमुला प्रकरणाविषयी लिहितानाही मी म्हटलं होतं, की कुठल्याच विद्यार्थी चळवळीत किंवा संघटनेत अभ्यास सोडून राजकारण करणं कधीच अपेक्षित नसतं. JNUतल्या राजकारणातही 'लडाई पढाई साथ साथ' हे ब्रीदवाक्य अनेक ठिकाणी ऐकू येतं. JNUतल्या महत्त्वाच्या विद्याथी नेत्यांची शैक्षणिक, संशोधन क्षेत्रातली कामगिरी नेहमी उत्तम असते. त्यामुळे हे विद्यार्थी आपापला अभ्यास, संशोधन सांभाळूनच बाकीचे 'धंदे' करत असतात, हे एक. दुसरं म्हणजे, जो विद्यार्थी (करदात्याच्या पैशांनी) उच्च शिक्षण घेतो, त्याचं समाजाप्रति ऋण असतं असं मान्य केलं तर JNUचे विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे या ऋणाची परतफेड करतात, असं म्हणता येईल. कारण उच्च शिक्षण म्हणजे केवळ आपल्या क्षेत्रातलं तांत्रिक ज्ञान झापडं लावून गिळणं नाही. आपल्या राजकारणाद्वारे अधिक चांगला समाज निर्माण करण्याचे प्रयत्न हे विद्यार्थी करत असतात. JNUतल्या राजकीयदृष्ट्या सजग वातावरणामुळे तिथला एकंदर समाज/ समुदाय (JNUतल्या राजकारणाशी, विद्यार्थी संघटनांशी काहीच घेणंदेणं नसलेले विद्यार्थीही यात आले) अनेक बाबतीत अनेक अंशांनी सजग, संवेदनशील, विचारी, सुसंस्कृत होतो असं मी ठामपणे सांगू शकते. त्याची काही उदाहरणं देते.
JNUत शिकायला मोठ्या प्रमाणावर परदेशी विद्यार्थी येतात. फॉरेन स्टुडंट्स असोसिएशनच्या पुढाकाराने JNUत कँपसमधल्या (बांधकामांवर काम करणार्या वगैरे) मजुरांच्या मुलांसाठी बालवाड्या-सदृश वर्ग चालवले जातात. JNUतले देशी/परदेशी विद्यार्थी तिथे (अर्थातच विनामोबदला) शिकवायला जातात. (निदान मी तिथे असताना तरी हे वर्ग शनिवार-रविवार नियमित चालत.)
देशाच्या मागास भागांतल्या, बर्या शाळांत शिक्षण न मिळालेल्या, इंग्रजीला घाबरणार्या अनेक विद्यार्थ्यांना JNUत प्रवेश मिळवण्याची इच्छा असते. त्यांना प्रवेश परीक्षेविषयीचं मार्गदर्शन करणारे वर्ग गेली अनेक वर्षं उन्हाळी सुट्टीत JNUच्या विद्यार्थी संघातर्फे भरवले जातात. यात JNUतलेच सिनिअर विद्यार्थी (अर्थातच विनामोबदला) शिकवतात.
JNU ही भारतातली एक उत्कृष्ट शैक्षणिक संस्था आहे. तिथल्या शैक्षणिक वातावरणाची झलक म्हणून तिथली लायब्ररी पहावी!
JNUचं पुस्तकालय नऊ मजली आहे. तिथे भरपूर वाचन कक्ष आहेत. तरीही, सकाळी ते उघडायच्या वेळी घाईघाईने जाऊन जागा पकडली नाही, तर नंतर चांगली जागा मिळवण्याची पंचाईत होते. परीक्षा जवळ आल्या की पुस्तकालय रात्री बारा बाजेपर्यंत उघडं असतं, आणि रात्री बेल वाजवू वाजवू लोकांना बाहेर काढावं लागतं. (लायब्ररी विद्यार्थ्यांची इतकी आवडती असण्याच्या कारणांत 'एसी' आणि 'वायफाय' ही कारणंही आहेत अर्थात.)
भारतीय सनदी सेवांची परीक्षा देणार्या उमेदवारांचं दिल्ली हे आवडतं ठिकाण आहे. JNU ही या उमेदवारांचं लाडकं आहे. इतकं, की JNUच्या वाचनालयातल्या एका हॉलचं नावच गमतीन धोलपूर हाऊस असं पडलं आहे. (कारण युपिएससीचं दिल्लीतलं कार्यालय धोलपूर हाऊस या इमारतीत आहे.) JNUमध्ये काही या परीक्षेसाठीचं विशेष प्रशिक्षण मिळत नाही. पण एकंदरीत शिक्षणाचा उच्च दर्जा, परीक्षेसाठी तयारी करणारे इतर अनेक विद्यार्थी अवतीभवती असल्याने एकमेकांना मदत, मार्गदर्शन, चर्चा, आणि तासंतास/ रात्रंदिवस अभ्यास करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा JNUत मिळतात. JNUतलं हे 'धोलपूर हाऊस' अगदी कायम, २४ तास उघडं असतं. बाहेर कायम गार्ड असल्याने सुरक्षित. टेबले, खुर्च्या, दिवे, पंखे, बाथरुम अशा बेसिक सोयींनी युक्त असलेल्या या हॉलमध्ये (विशेषतः सनदी सेवा परीक्षा देणारे) विद्यार्थी कायम अभ्यासासाठी ठाण मांडून असतात. रात्री उशिरापर्यंत तिथे अभ्यास करून, थोडी तिथेच डुलकी काढून, तिथेच दात घासून तिथूनच सकाळच्या लेक्चरला जाणारे विद्यार्थी तिथे भरपूर दिसतात. तिथे बसायला जागा मिळवण्यासाठी संगीत खुर्ची खेळावी लागते. युपिएससीचा निकाल हा जेएनयूत विशेष आनंदाचा दिवस असतो. कुठल्या होस्टेलमधून यावर्षी सगळ्यात जास्त जण पास झाले अशी स्पर्धा असते. सनदी अधिकारी हे फक्त उदाहरण. बाकी अनेक क्षेत्रांत JNUचे विद्यार्थी कशी चांगली कामगिरी करत आहेत वगैरे सांगत बसत नाही.
आपल्या कराच्या पैशांचं वाट्टोळं JNUचे विद्यार्थी करतात, असं वाटणारे नागरिक हे वाचून किंचित तरी आश्वस्त होतील अशी केवळ आशाच करू शकते. कारण झोपेचं सोंग घेतलेल्याला कसं जागं करणार?
(पुढचा भाग : जे.एन.यू मेरा प्यार: आमच्या परीक्षा)
वॉव! असं फर्स्ट हँड रिपोर्ताज
वॉव! असं फर्स्ट हँड रिपोर्ताज वाचायला नेहमीचा आवडतं.
येऊ दे अजून.,. याची लेखमालाही आवडेल वाचायला (सध्याचे राजकारण दुय्यम आहे, त्यानिमित्ताने तुम्ही यावर असंच कसदार लिहिणार असाल तर त्या राजकारणाच्या मंथ्नाच्या निमित्ताने हे अमृत निघाले म्हणावे लागेल ;) )
विद्यार्थी
मागच्याच आठवड्यात, हे प्रकरण होण्यापुर्वी, माझ्या एका मावस बहिणीशी फोनवर बोलणं झालं. ती सद्ध्या जेएनयुत शिकते. सोशल सायन्सेस. बेघर लोकांच्यावर असलेल्या अन्यायकारक नियमांवरती सद्ध्या थिसीस लिहते आहे. अनाथ मुलांच्या शिकवण्या घेणार्या एका संस्थेची संस्थापक, ही संस्था तीने आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी नववी-दहावीत असताना सुरू केली. (थोडक्यात, राईट-विंग नाही.)
फोनवरील चर्चेचा मुख्य विषय उच्चशिक्षण हा होता, पण त्या अनुशंगाने इतर गोष्टींवर चर्चा झाली. जेएनयुतील अनेक विद्यार्थी 'नक्षलवादी' संघटनेत जातात या दाव्यात कितपत तथ्य आहे या माझ्या प्रश्नाला मिळालेलं उत्तर निराशाजनक होतं. (तथ्य आहे.) इथल्या 'अती-डाव्या' विचारसरणीमुळे इथले विद्यार्थीही 'अती-डावेच' होत असतील का हा तिचा प्रश्न मला विचार करण्यासारखा वाटला. (वैचारिक भुमिका आहे का नाही, वगैरे.)
ही समस्या जेएनयु पुरतीच नाही. अनेक विद्यापीठ्यांत वैचारीक चळवळी जोमाने चालतात. पण अनेकदा डाव्या-किंवा उजव्या विचारसरणीच्या विद्यापिठातून एकाच साच्याचे विद्यार्थी बाहेर पडत आहेत की काय अशी शंका यावी अशा घटना घडत असतात*. हे दुर्दैवी आहे. वैचारीक भुमिका निर्माण होण्यासाठी विद्यापिठांपेक्षा चांगली जागा कोणती असेल? पण तिथेच जर अशा परंपरा निर्माण होत असतील तर दुर्दैवी आहे. जास्तच अपेक्षा असण्याचा दोष माझा असू शकेल.
* अमेरिका आणि कॅनडातील अनेक विद्यापिठांत अशा घटना घडलेल्या आहेत. बिल माहर, डॉकिन्स वगैरे वक्त्यांना निमंत्रण देण्यास विरोध वगैरे पासून ते फेसबुक ग्रुप अश्लिल विनोद केले म्हणून डेंटल प्रोग्रॅममधील सर्व मुलांना (पुरूष) विद्यापिठातून बडतर्फ करणे पर्यंत.
फेसबुक ग्रुप अश्लिल विनोद
फेसबुक ग्रुप अश्लिल विनोद केले म्हणून डेंटल प्रोग्रॅममधील सर्व मुलांना (पुरूष) विद्यापिठातून बडतर्फ करणे पर्यंत.
ही घटना कॅनडामधील डलहौजी विद्यापीठाच्या दंतवैद्यक विभागात घडली पण तिला कसलाहि डावा-उजवा वास नव्हता. काही विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातील मुलींबद्दलच फेसबुकावर अश्लील आणि बलात्कारसूचक मजकूर लिहिला. त्याची सर्व गटांकडून छीथू झाली.
समुपदेशनात भाग घेण्याचे त्या सर्व विद्यार्थ्यांनी मान्य केल्यामुळे त्यांचा पुढे व्यवसाय करण्यावरील रोख उठविण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा करणार्यांकडून ही गर्हणीय वर्तणूक त्यांच्या भावी रुग्णांसाठी भयकारक आहे म्हणून ही - सर्वानुमते अतिशय योग्य - कारवाई केली गेली.
ह्या बद्दलच्या अनेक बातम्यांपैकी सहज हाताशी आलेली ही बातमी पहा.
अवांतर
काही विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातील मुलींबद्दलच फेसबुकावर अश्लील आणि बलात्कारसूचक मजकूर लिहिला. त्याची सर्व गटांकडून छीथू झाली.
१. सदर मजकूर एका क्लोज्ड फेसबुक ग्रुपवर होता. स्वतःच्या घरात कोण काय बोलू शकतो किंवा नाही यावर कायदेशीर बंधने कॅनडात नाहीत असे मला वाटते.
२. मुद्दा डावा-उजवा नसून विचारसरणीचा आहे. विद्यार्थीनींनी आंदोलन करून या विद्यार्थ्यांना बडतर्फ करायला लावले होते. छी-थू करणे वेगळे आणि हे वेगळे.
३. माझ्या माहितीप्रमाणे बलात्कारसूचक मजकूर नव्हता. कोणाबरोबर लग्न करायला आवडेल, कोणाबरोबर सेक्स करायला आवडेल वगैरे गोष्टी होत्या. असो वा नसो, that is irrelevant in my opinion.
असो. हे या धाग्यावर अवांतर आहे.
नवीन मुलांना सिनियर्सकडून
नवीन मुलांना सिनियर्सकडून रॅगिंग नव्हे तर मदत होण्याचा तुम्ही केलेला उल्लेख अतिशय महत्त्वाचा आहे.
निषेध मोर्चे हे त्यांचे आवडते साधन आहे असे तुम्ही म्हटले आहे, त्यासंदर्भात आठवले. मोबाईलचा जमाना येण्याच्या आधीही या मुलांचे अगदी कमी अवधीत मोर्चाचे आयोजन करण्याचे कौशल्य वाखाणण्यासारखे होते असे माझ्या तिथल्या एका मित्राने साांगितले होते.
बरं केलंस.
खूप बरं केलंस लिहिलंस ते. मी ७७ सालानंतरच्या विद्यार्थी चळवळी मुंबई विद्यापीठात जवळून पाहिल्या. या चळवळीतून राजकीय प्रणालींविषयीची उत्सुकता जागी होते, अभ्यास वाढायला मदत होते. शब्दांना रूप येते. शिकायला जातात की फुकटचे धंदे करायला ही मठ्ठ कमेंट आत्ता अनेकदा वाचायला मिळते आहे. शिवाय तेथील शिक्षण स्वस्त आहे म्हणून अनेकांच्या पोटात लईच दुखत असतं. करदात्यांचा पैसा वापरून हे लोक शिकायच्या ऐवजी हे धंदे करतात असा शहाजोग प्रश्न फक्त डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनाच विचारला जातो. संस्कारी अभाविपच्या विद्यार्थ्यांना नाही. त्या म्हणजे तुपातल्या वाती.
आभार हे लिहिल्याबद्दल, चार्वी.
विद्यार्थी अभ्यास बिभ्यास
विद्यार्थी अभ्यास बिभ्यास सोडून (करदात्यांच्या पैशांवर मजा मारत) नसते धंदे करत बसतात, अशी वक्तव्यं गेले काही दिवस ऐकू येत आहेत. रोहित वेमुला प्रकरणाविषयी लिहितानाही मी म्हटलं होतं, की कुठल्याच विद्यार्थी चळवळीत किंवा संघटनेत अभ्यास सोडून राजकारण करणं कधीच अपेक्षित नसतं. JNUतल्या राजकारणातही 'लडाई पढाई साथ साथ' हे ब्रीदवाक्य अनेक ठिकाणी ऐकू येतं. JNUतल्या महत्त्वाच्या विद्याथी नेत्यांची शैक्षणिक, संशोधन क्षेत्रातली कामगिरी नेहमी उत्तम असते. त्यामुळे हे विद्यार्थी आपापला अभ्यास, संशोधन सांभाळूनच बाकीचे 'धंदे' करत असतात, हे एक. दुसरं म्हणजे, जो विद्यार्थी (करदात्याच्या पैशांनी) उच्च शिक्षण घेतो, त्याचं समाजाप्रति ऋण असतं असं मान्य केलं तर JNUचे विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे या ऋणाची परतफेड करतात, असं म्हणता येईल. कारण उच्च शिक्षण म्हणजे केवळ आपल्या क्षेत्रातलं तांत्रिक ज्ञान झापडं लावून गिळणं नाही. आपल्या राजकारणाद्वारे अधिक चांगला समाज निर्माण करण्याचे प्रयत्न हे विद्यार्थी करत असतात.
दणदणीत!
आपल्या कराच्या पैशांचं वाट्टोळं JNUचे विद्यार्थी करतात, असं वाटणारे नागरिक हे वाचून किंचित तरी आश्वस्त होतील अशी केवळ आशाच करू शकते. कारण झोपेचं सोंग घेतलेल्याला कसं जागं करणार?
खरंय :(
बाकी, असाच लेख एफ टि आय आय च्या एखाद्या विद्यार्थ्यानेही लिहावा असे वाटते. या अशा संस्थाच कोणताही देश उभारणीची महत्त्वाची साधने असतात. त्यावर अतिशय कोता दृष्टीकोन ठेऊन जर सरकार आपला अंकूश लाऊ पहात असेल तर भविष्य कठीण आहे! :(
Unlimited liberty inconsistent with democracy.
Nice account. No one should blame the entire JNU for whatever happened. However, we should not allow culprits to hide behind University's prestige to commit crimes.
As Rousseau has said, 'FREEDOM IS OBEDIENCE TO A LAW WHICH WE PRESCRIBE TO OURSELVES. ' These students have precisely violated this norm since the law we as a nation have prescribed to ourselves cannot be allowed to be violated as it entails danger for this nation.
Leszec Kolakowaski ( in preface to 'Main currents of Marxism ') has said: Theoretical dogmatic Marxism drags on it's poor existence in the corridors of some academic institutions : while it's carrying capacity is very poor, it is not unimaginable that it will gain in strength, supported by certain intellectually miserable but loud movements.........'
What we are observing is just a demonstration of this prophecy.
त्या साठी आधीच्या ओळीचा
त्या साठी आधीच्या ओळीचा संदर्भ पण घ्या. प्रतिसादकाची मातृभाषा इंग्रजी असु शकते असे लिहीले होते, म्हणजे त्यांची आई इंग्लिश असु शकते ना.
आता बाजीराव.
बाजीरावानी जसे परदेशी वंशाच्या बाई शी लग्न केले. तसे करणारा बाजीराव काही शेवटचाच मराठी पुरुष नसावा. असे म्ह्णायचे होते.
तुम्ही रुसोचं अवतरण दिलंत तर
तुम्ही रुसोचं अवतरण दिलंत तर आम्ही थोरोचं अवतरण देऊ. घ्या:
I think that we should be men first, and subjects afterward. It is not desirable to cultivate a respect for the law, so much as for the right. The only obligation which I have a right to assume is to do at any time what I think right.
पण वेगळ्या संदर्भातली अवतरणं इथे फेकून कुठलाच मुद्दा सिद्ध होणार नाही.
विद्यापीठाच्या नावाने गुन्हा झाकण्याचा प्रयत्न कोणीही करत नाहीये. ज्या घोषणा घटनेचा अवमान करणार्या होत्या, त्यांचा स्पष्ट निषेध बहुतेकांनी केला आहे. मुद्दा आहे तो विरुद्ध मत मांडू देण्याच्या स्वातंत्र्याचा.
मस्त. जेएनयुची ओळख आवडली.
मस्त. जेएनयुची ओळख आवडली. पहिल्या भागाएवढेच पुढले भाग विस्तृत असते तर अजून छान झाले असते. देशद्रोह हा शब्द फार स्वस्त झालाय. बाकी खड्डेदार रस्ते करणारे,मोठमोठी कर्ज घेऊन बुडवणारे आणि स्वतःचा दिमाख अबाधित ठेवणारे व्यावसायिक ,कायदा हातात घेऊन धुडगूस घालणारे आणि अश्यांना सोईनुसार पाठीशी घालणारे वा लुटुपुटूचा विरोध करणारे सर्व राजकीय पक्ष ह्यांना देशप्रेमींच्या कोणत्या श्रेणीत घालावे बरे?
सेपरेट्स्ट घोषणा देणारे थेट
सेपरेट्स्ट घोषणा देणारे थेट देशद्रोही, देशात असहिष्णुता वाढलीय हे म्हणणारे थेट देशद्रोही म्हणजे उठल्या सुटल्या भारतमातेला वंदन करणारे देशप्रेमी हे आपोआप सिद्ध नाही होत का? प्रत्येकजण त्याच थाटात तर बोलतोय . देशातील जनता म्हणजेच भारतमाता ना? की ती कुठल्या देवळात बसलीय आणि तिची षोडोपचारे पूजा केली की झाला का देशभक्त? या अश्या घटनांना अवाजवी महत्व देणे म्हणजे प्रत्यक्षापेक्षा प्रतिमेचं महत्व वाढवणे. प्रत्यक्षाच्या छातीवर नाचलात तरी चालेल पण प्रतिमेचे पावित्र्य राखा.
सेपरेटिस्ट घोषणा चुकीच्या आहेत आणि त्या देणार्^यांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे हे खरं पण देशाच्या गृहमंत्र्यांपासून सर्वांनी मिडीयासमोर तोंडं उघडावीत एवढी मोठी आहे का ही घटना? देश एवढा कमकुवत आहे? सेपरेटिस्ट घोषणा देणं देशद्रोह असेल तर जम्मू कश्मीर मध्ये भाजपाला ज्याची सोबत हवीय तो पीडीपी किती सोवळा आहे?
अनुप, शब्दांचे खेळ राहू देत. पण जरा विरोधी आवाज उठला की रान उठवायचं , हाकारे घालायचे ही प्रवृती वाढत चाललीय हे बरोबर वाटतं का? गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाराची उतरंड असते. त्या त्या ठिकाणच्या व्यक्तींना आपलं काम करु देण्याऐवजी उच्च अधिकारावरील व्यक्तीने वक्तव्यात का होईना थेट आक्रमक होण्यातूनच खालच्या व्यक्तींना संदेश जातो. त्यातूनच वकिलांनी न्यायालयात हैदोस घालेपर्यंत गोष्टी घडतात. त्याने सरळसाधं जगू पहाणार्^या सामान्याना धास्ती बसते. कारण कोणत्या गोष्टीला कुठलं लेबल लावलं जाईल याची भिती वाटते. बरं, या गोष्टींमुळे सामान्यांना त्रास देणारे मूळ मुद्दे विसरले जातात. मिडिया हवा देते, हे बरोबर असलं तरी मुळात आग विझवणार्^या बंबावर भरोसा टाकण्याऐवजी त्या आगीचे निखारे करुन मिडीयाला पुरवण्याचे काम 'देशप्रेमी' का करतात?
काही 'देशप्रेमी' तर परस्पर
काही 'देशप्रेमी' तर परस्पर जेएनयूच्या विद्यार्थ्यांना धडा शिकवायला सरसावत आहेत. जेएनयूत जायला (ऑटो)रिक्षा केली, तर "जेएनयूत कशाला? पाकिस्तानातच सोडून येतो तुला" वगैरे चालू झालंय. जेएनयूच्या विद्यार्थ्यांसारख्या 'दिसणार्या' (कुर्ता/झब्बा घालणार्या, झोळीवाल्या वगैरे) इतरांना पण हे अनुभवाला येत आहे.
आणि कहर म्हणजे आपण ज्यांना
आणि कहर म्हणजे आपण ज्यांना मित्र म्हणतो अशा आप्तांपैकी अनेकांनी हे असले आततायी उद्गार काढले आहेत. एकाएकी इतका तीव्र विखार, उन्माद, द्वेष साचून येण्याइतकं काय घडलं आहे? आपल्यापैकी ज्यांच्या उद्गारांमुळे दचकायला होत आहे, ते सगळे जण सुस्थित (घर, नोकरी, गाडी बाळगून) आहेत. मग हा राग तरी कसला म्हणावा? भीती वाटते, हे तर आहेच. पण त्याहून जास्त हे कोडं समजून घेता येत नाही, त्यानं जास्त हतबल वाटतं.
नाही, निषेधात असहिष्णुता
नाही, निषेधात असहिष्णुता नाही.
फटकावून काढण्याची, पाकिस्तानात पाठवण्याची, गोळ्या घालण्याची, गलिच्छ शिव्यांची - भाषा वापरण्यात असहिंष्णुता आहे. एखाद्या व्यक्तीच्या भाषणस्वातंत्र्याची गळचेपी झाली तरी चालेल, पण देशप्रेमाची व्याख्या आम्ही म्हणू तीच आणि तीच असेल, ती मान्य नसल्यास तुम्हाला धडा शिकवला जाईल, असं निलाजरेपणे म्हणण्यात आणि सरकारने त्याला मूक मान्यता देण्यात आहे.
तरीही - तरीही - भाषिक पातळीवरची हिंसा मान्य आहे. पण वकिलांनी कायदा हातात घेण्यातली असहिष्णुता आणि कोणताही आरोप सिद्ध झालेला नसताना एखाद्या व्यक्तीला जामीन न मिळण्यातली व्यवस्थेची असहिष्णुता मान्य नाही. त्याला ठाम विरोध आहे. राहील.
देशप्रेमाची व्याख्या आम्ही
देशप्रेमाची व्याख्या आम्ही म्हणू तीच हे दुसर्या बाजूने देखील येतं. अफझल गुरू हा अतिरेकी होता. आम्ही अजून अफझल गुरू तयार करू, तुमचे तुकडे करू या घोषणांना अनेक लोक देशद्रोही म्हणतात. माझ्या ओळखीतले अगदी कट्टर मोदी विरोधक देखील हे मत मांडतायत. ही बाजू देखील असू शकते, या भावना जेन्युइन असतात हे कधी विचारवंत समजून घेतात असं वाटत नाही. भाजपाने बवनवलेल्या 'पाकिस्तान' शब्दाच्या बागुलबुवाला लोकं काय किंमत देतात हे बिहार निवडणुकांत दिसलं की. इथे ते तसं नाही. पण बर्याचदा कुठलीही घटना मोदी सरकारशी जोडण भले ती कर्नाटक, उ.प्र. कुठेही घडली असो हे मात्र दिसून येतं.
इथे कोणीही वकिलांनी जे केलं त्याला समर्थन देत नाहिये. त्याचा आणि पोलिसांचा धिक्कार केला पाहिजेच.
जामिन आणि आरोप सिद्ध होणं याचा सबंध नाही. याचा आणि असहिष्णुतेचा संबंध नाही.
उठल्या सुटल्या भारतमातेला
उठल्या सुटल्या भारतमातेला वंदन करणारे देशप्रेमी हे आपोआप सिद्ध नाही होत का?
अजिबात नाही. असं कोणी म्हटलय?
पण जरा विरोधी आवाज उठला की रान उठवायचं , हाकारे घालायचे ही प्रवृती वाढत चाललीय हे बरोबर वाटतं का?
प्रवृती वाढलिये म्हणण्यापेक्षा सो.मी.मुळे प्रवृत्ती विझिबल झाली आहे. पूर्वी याच गोष्टी प्रायवेटमध्ये बोलल्या जातही असतील.
केरलभी मांगे आझादी, हर घरसे अफझल निकलेगा या घोषणा केवळ सेपरेटिस्ट नाहीत तर दहशतवादाला उद्युक्त करणार्या आहेत. ( या घोषणा कोणी दिल्या, कन्हैया की उमर खालिद हे बाजूला ठेवा.) दहशतवादाला उद्युक्त करणं हे FOE खाली मी इग्नोर नाही करू शकत. राजधानीत असं होणं ही गंभीर घटना आहे. देशपातळीवर दखल घेण्यासारखी. काश्मिरमध्ये हे अनेक वर्ष होत आहेच. त्यात नवीन नाहीच्चे. पण हे लोण दिल्ली, बंगाल इथेही पसरणं नक्कीच गंभीर आहे.
आजच JNU मोर्चेकर्यांचे शर्टचे फोटो बघितले की ज्यावर 'कन्हैय्य करेगा कंस का वध' असं लिहून खाली भाजपाचं कमळ. ही उघड धमकी आहे.
माझ्यामते या सगळ्या घटनेतली सर्वात जास्तं वाइट गोष्ट वकील लोकांची झुंडशाही होती. हाणामारी कायमच निषेधार्ह.
अवांतरः मीडीया ही एक एंटीटी अजिबात पकडू नका. या घटनेवरून च्यानेल्समध्येही दोन उघड गट पडले आहेत. टाइम्स नाऊ, झी विरुद्ध इंडिया टूडे, NDTV वगैरे.
गेली ६० वर्ष ह्या डाव्या
गेली ६० वर्ष ह्या डाव्या गुंडांनी अनेक विध रुप घेउन ( कधी बुद्धीवादी, कामगार , कधी लेखक वगैरे ) सर्व भारतीयांना दाबुन ठेवले होते. आता त्यांचे दुकान बंद होण्याची वेळ आल्यावर कुठे कुठे आग लाऊ असे झालय त्यांना.
ढेरे शास्त्री - इग्नोर करा ह्या सर्व बातम्यांना. मी पूर्वी पण अनेक वेळा लिहीले आहे, त्यांचे पैश्याचे स्त्रोत बंद पडले आहेत.
अस्तीत्वाची शेवटची लढाई चालु आहे. पण स्वार्थ तर इतका आहे की सर्व समाज मेला तरी ह्यांना काही फरक पडत नाही. त्यांच्या कडे दुर्लक्ष केले की आवाज बंद होतील त्यांचे. २०१९ नंतर मोदी पुन्हा आले तर ह्यातले अर्धे लोक मोदींना सलाम ठोकत असतील. कदाचित तो किशनकन्हया अभाविप चा अध्यक्ष वगैरे पण होइल.
ह्या डाव्या/ समाजवादी गुंडांनी १९७० ते ७५ पण असाच देशभर दंगा घातला होता. त्यानी देशाचे आधीच अपरीमीत नुकसान झाले आहे. त्या गुंडगीरीतुनच लालू, मुलायम असली लोक निर्माण झाली.
सर्व सामान्य लोकांनी ह्यांच्या खोट्या नाटकांना न भुलता दुर्लक्ष केले पाहीजे..
नाहीतर काही खरे नाही आपल्या सारख्या सज्जन लोकांचे.
ह्या डाव्या/ समाजवादी
ह्या डाव्या/ समाजवादी गुंडांनी १९७० ते ७५ पण असाच देशभर दंगा घातला होता. त्यानी देशाचे आधीच अपरीमीत नुकसान झाले आहे. त्या गुंडगीरीतुनच लालू, मुलायम असली लोक निर्माण झाली. >>>>
म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे कि इंदिरा गांधींची आणीबाणी बरोबर होती ? मुलायम , लालु, नितीश हे जयप्रकाश यांच्या ७७ च्या आणीबाणीच्या आंदोलनातुन आलेले आहेत. असो इतिहास माहित नसेल तर काहि बिघडत नाहि, आजकाल इतिहास माहित नसले तरी प्रधानसेवक होउ शकतो, शिक्षण नसेल तरी शिक्षणमंत्री होउ शकतो. त्यामुळे जाउ द्यात.
२००२ च्या गुंडगीरीतुनहि देखील असे अनेक लोक निर्माण झाले आहेत
इंडियन एक्सप्रेसमधील सुरजित
इंडियन एक्सप्रेसमधील सुरजित भल्ला यांच्या लेखातून .....
it is very curious that Delhi Police (or the home ministry) has till date not determined the identity of the individuals who made the objectionable statement(s). Nor have the violent lawyers been charged with a crime, let alone arrested. Identity known, motive known, crime known — and yet no action taken for the blatant violation of law, legal practice, and common humanity.
Note the contrast in how the government is handling the two “crimes”. One capital crime is a student leader, making a common pedestrian student speech, who is being charged with sedition; the other non-criminals are violent lawyers, who have broken the law, who have beaten up journalists and fellow lawyers, and who are being lauded by the cops and, so far, been allowed to go free by the Modi administration.
मस्त
अतिशय आवडले हे लेखन!!!!
विद्यार्थी चळवळी आणि वेगवेगळ्या विरोधी विचारांना स्विकारणार्या आणि त्यातील संवादांना, वाद-विवादांना प्रोत्साहन देणारी ही संस्था भारतात आहे हे किती आश्वस्त करणारे आहे! इतरत्र वाचलेले हे अवतरण इथे देण्याचा मोह आवरत नाही -
Students (and faculty) on the JNU campus across party-lines contribute to change by asking critical questions that are important for nation-building. The university is literally the universe for raising these very questions and expressing these dissenting ideas and opinions, regardless of how different and difficult they are. It was no surprise that when the Akhil Bharitya Vidyarthi Parishad and others took out processions and distributed celebratory pamphlets on the hanging of Afzal Guru in 2013, the left organisations did not try and shut them down. Instead, they retaliated with their own pamphlets and counter protests. Freedom of expression, if not practiced and propagated by the young adult, has no meaning for the society at large. (स्त्रोतः http://scroll.in/article/803517/the-problem-with-jnu-too-left-for-liber…)
JNUमधले विद्यार्थी अभ्यास बिभ्यास सोडून (करदात्यांच्या पैशांवर मजा मारत) नसते धंदे करत बसतात, अशी वक्तव्यं गेले काही दिवस ऐकू येत आहेत. रोहित वेमुला प्रकरणाविषयी लिहितानाही मी म्हटलं होतं, की कुठल्याच विद्यार्थी चळवळीत किंवा संघटनेत अभ्यास सोडून राजकारण करणं कधीच अपेक्षित नसतं. JNUतल्या राजकारणातही 'लडाई पढाई साथ साथ' हे ब्रीदवाक्य अनेक ठिकाणी ऐकू येतं. JNUतल्या महत्त्वाच्या विद्याथी नेत्यांची शैक्षणिक, संशोधन क्षेत्रातली कामगिरी नेहमी उत्तम असते. त्यामुळे हे विद्यार्थी आपापला अभ्यास, संशोधन सांभाळूनच बाकीचे 'धंदे' करत असतात, हे एक. दुसरं म्हणजे, जो विद्यार्थी (करदात्याच्या पैशांनी) उच्च शिक्षण घेतो, त्याचं समाजाप्रति ऋण असतं असं मान्य केलं तर JNUचे विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे या ऋणाची परतफेड करतात, असं म्हणता येईल. कारण उच्च शिक्षण म्हणजे केवळ आपल्या क्षेत्रातलं तांत्रिक ज्ञान झापडं लावून गिळणं नाही. आपल्या राजकारणाद्वारे अधिक चांगला समाज निर्माण करण्याचे प्रयत्न हे विद्यार्थी करत असतात. JNUतल्या राजकीयदृष्ट्या सजग वातावरणामुळे तिथला एकंदर समाज/ समुदाय (JNUतल्या राजकारणाशी, विद्यार्थी संघटनांशी काहीच घेणंदेणं नसलेले विद्यार्थीही यात आले) अनेक बाबतीत अनेक अंशांनी सजग, संवेदनशील, विचारी, सुसंस्कृत होतो असं मी ठामपणे सांगू शकते. त्याची काही उदाहरणं देते.
ह्या परिच्छेदासाठी तर एक जहांगीर इमान द्यावी!!! :)
धन्यवाद लेखाबद्दल. ज्यानी
धन्यवाद लेखाबद्दल.
ज्यानी आतापर्यत फक्त झेंडे हातात घेउन शहरी भागात घोषणा देण्याचे काम केले आहे, ज्यांना शेतकी आत्महत्या, बेरोजगारी, कुपोषण ,कोट्यावधीची उद्योग्पतीची बुडलेली कर्जे, याबद्दल घेणे देणे नाहि त्या 'देशभक्तांपासून' ह्या देशाची लवकरात लवकर सुटका व्हावी अशी इच्छा.
कैप्टन पवन कुमार जो आज
कैप्टन पवन कुमार जो आज काश्मीर मधल्या अतिरेकी हल्ल्यात शहिद झाला तो जाट होता आणी जेएनयु डेग्री होल्डर होता. एका शहिद कैप्टनची जात आणी शैक्षणिक संस्था लिहायची आज वेळ आली. हे सरकार अजुन किती तुकडे करणार आहे ?
http://www.thehindu.com/news/national/capt-pawan-kumar-a-jat-jnu-degree…
आई शपथ!
एनडीए, आर्मी कॅडेट कॉलेज, सीएमई वगैरेचे अॅलम्नाय, खास करून त्यातून आर्मीत भरती झालेले जवान, अधिकारी हे सर्व घाऊक भावात (en masse) देशद्रोही आहेत, याची कल्पना नव्हती.
पाकिस्तानातच पाठवले पाहिजे साल्यांना! (बोले तो, युद्धात ड्यूटीवर नव्हे. मायग्रंट्स, पर्मनंट रेसिडेंट्स म्हणून.)
दिल्लीतल्या पाकिस्तानी वकिलातीतील संबंधित अधिकारी याकडे लक्ष देतील काय?
(अवांतर)
(बाकी, आपले ज्यांच्याशी पटत नाही, अशांना धाडून देण्याकरिता (आणखी१) एक हक्काचे स्थान निर्माण करून देण्याबद्दल आपण सर्वांनीच श्रीश्री कायदेआझम मोहम्मद अली जीना यांचे उतराई व्हावयास हवे, नाही?)
--------------------------------------------------------------------------
तळटीप:
१ पूर्वी, बोले तो १९४७अगोदर, केवळ गर्दभश्रोणीवर निभावावे लागे. आता विकल्प निर्माण झाला.
खूप दिवसांनंतर ऐसीवर आले, आणि
खूप दिवसांनंतर ऐसीवर आले, आणि माझ्या प्रिय विद्यापीठाबद्दल हा लेख वाचून आनंद झाला. सध्या खूप लिहायला वेळ नाही, पण जणू माझेच अनुभव सांगणारा वाटला. आपली सगळी विद्यापीठं अशीच असायला हवीत. JNU तल्या चर्चेच्या मोकळ्या वातावरणाची, सर्वांगीण राजकीय शिक्षणाची कल्पना देणं तेवढं सोपं नाही.
अभिव्यक्तिस्वातंत्र्य या मुद्द्यावर JNUत रवंथ होत असणार हे वेगळं सांगायला नकोच. पण एका गमतीदार विवादाची आठवण सांगते. एकदा एका मुलग्यांच्या होस्टेलमधे वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी बाहेरून एक नर्तिका बोलवण्यात आली होती. तिचा नृत्याचा कार्यक्रम चालू असताना रंगात येऊन काही मुले शर्ट काढून स्टेजवर चढू लागली, तेव्हा शेजारच्या होस्टेलमधल्या मुलींनी तो कार्यक्रम बंद पाडला. या प्रसंगावरून बरेच दिवस पत्रकयुद्ध चाललं होतं. जर उजव्या विचारसरणीच्या, संस्कृतिरक्षक म्हणवणार्या लोकांनी एखादा कार्यक्रम त्यांना अनिष्ट वाटतो म्हणून बंद पाडला असता, तर या मुलींना ते चाललं असतं का असा प्रश्न काही मुलांनी विचारला होता.
डाव्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बाहेरून आलेल्या लोकांनी डाव्यांनाच अडचणीचे ठरतील असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केल्याने, आयोजकांनीच कार्यक्रम बंद करून टाकल्याचे विचित्र प्रसंगही इथे घडलेले आहेत.
तर, सांगायचा मुद्दा असा की, असंगत, गुंतागुंतीच्या घटनाही घडलेल्या असल्या, तरी विरुद्ध मत व्यक्त होण्यासाठी, त्याचा वैचारिक प्रतिवाद करण्यासाठी जे अवकाश लागतं, ते विरोधकांनाही देण्याची एकंदर JNU संस्कृती होती, आ
हे.
असेच एकच उदाहरण देते.
९० च्या दशकात मुलींच्या हॉस्टेलात मुलांना कितपत प्रवेश दिला जावा (म्हणजे फक्त मेस मधे नव्हे तर खोल्यांच्या विंगमधे देखील) यावर वाद झाला. काही मुलींचे तसेच मुलांचे म्हणणे होते की मुला-मुलींच्या हॉस्टेलांसाठी समान धोरण पाहिजे, मुली मुलांच्या हॉस्टेलात जाऊ शकतात तसेच त्यांना मुलांनाही प्रवेश देता आला पाहिजे. पण काही मुलींनीच यावर आक्षेप घेऊन मुलींना सेफ स्पेस पाहिजे म्हणून आग्रह धरला. स्पृहा म्हणून स्त्री-प्रश्नांवर केंद्रित संस्था याच चर्चांतून तयार झाली - आणि ही चर्चा बहुतेक डाव्या संघटनांमधल्या मुलामुलीं मधलीच होती; उजव्या-डाव्या अशा सरधोपट विरोधांवर आधारित नव्हती. व्यक्तिस्वातंत्र्य, लिंगभेद, समानता, स्त्रीसुरक्षा, अशा अनेक विषयांवर माझे डोळे खाडकन उघडल्यासारखे झाले. म्हणजे फाइनल उत्तर मिळाले नाही, तर आधी कधीच न सुचलेले प्रश्न आणि पदर उलगडले, प्रत्येक संज्ञेवर खूप विचार करायला लागला. तो जो किडा डोक्यात वळवळायला लागला तो अजूनही कायम आहे. हीच JNUची मला आणि माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना अमोल देणगी आहे. आपली सगळी विद्यापीठं अशीच असायला हवीत. हेच वातावरण आपण जपले पाहिजे.
या आधी आम्ही फर्गसन मधे वैशाली समोर मोटारसायकलींवर बसून मुलं हॉस्टेलच्या मुलींवर अश्लील कमेंट करतात म्हणून पोलिसांना तक्रार केली होती. तो फुटपाथ नो पार्किंग झाला, पण आम्हीच नऊ पर्यंत बाहेर असतो म्हणून आमच्यावर असे प्रसंग येतात असे पोलीस, पालक आणि मुलं अशा सर्वांनी ठासवलं. जणू पाउणेनऊ च्या आधी मुलं काही बोलतच नसत, पण पुढे कर्फ्यूची वेळ ८ केली गेली. आमच्याच आवारात तिच्या आईबरोबर राहत असलेल्या, आणि पूर्वी परिस्थितीमुळे काही काळ वेश्याचं काम केलेल्या बाईला, तेथून काढून टाकण्यात आलं. जणू तिच्या जाण्यानं, आणि आठच्या आत कुलुपामागे जाऊन आम्ही सगळ्याच पुन्हा पवित्र झालो. तेव्हा देखील याच विषयांवर विचार व्यक्त करायचा आम्ही अंधुक प्रयत्न केला, विरोधही केला, पण कॉलेजातच त्या साठी असे अनुकूल वातावरण नव्हते, आणि त्याला राजकीय (व्यापक अर्थाने) किंवा तात्त्विक धार नव्हतीच. तो फरक JNUत खूप प्रखरपणे जाणवला.
असो. अजून खूप खूप लिहीण्यासारखं आहे.
जेएनयूची आणखी एक िवद्यार्थिनी
जेएनयूची आणखी एक विद्यार्थिनी लिहिते -
Why I have no political future ...
(शीर्षक इंग्लिश असलं तरीही पोस्ट आधुनिक मराठीत आहे.)
वा आपल्या सगळ्यांचेच
वा आपल्या सगळ्यांचेच अभिनंदन!
ऐसी केवळ निमित्तमात्र असले तरी हरेक प्रकारची मते इथे हक्काने व मोकळेपणाने मांडली जातात याचा एक ऐसीकर म्हणून अभिमान वाटतो.
यानिमित्ताने बरेच दिवस साचलेले लिहीतो:
इथे असे दोन्हीबाजूंकडून मोकळेपणाने लेखन/प्रतिसाद येण्यामागे इथे बॅन होणे जाउच द्या, प्रतिसाद अल्पसा संपादितही होण्याचे भय नसते हे एक सहज लक्षात येणारे कारण असले - तरी याचबरोबर कितीही विरोध असला तरी एक ठराविक पातळी सोडून प्रतिसाद न देण्याची सदस्यांनी पाळलेली स्वयंशिस्तही तितकीच (किंबहुना अधिकच) कारणीभूत आहे. चांगले लेखन करण्यासाठी पोषक वातावरण ठेवण्यास सदस्यांचा मोठाच हातभार आहे. त्यांचेही आभार व अभिनंदन!
मागे प्राची दुबळे यांनीही ऐसीच्या दिवाळी अंकात आलेल्या लेखाच्या संदर्भाने काही व्यक्ती त्यांचे काम जाणून घेण्यास उद्द्युक्त झाल्याचे (व त्यांना सीव्ही रमण पुरस्कर दिल्याचे) लिहिले होते. आता हा एवढ्यातच आलेला दुसरा अनुभव. वेगवेगळी मासिके, साप्ताहिके, वृत्तपत्रे यांचे प्रतिनिधी, कलाकार, काही प्रतिथयश लेखक इथे लिहित नसले तरी आवर्जून ऐसीवरील लेखन वाचत असतात या कल्पनेने खूपच आनंद वाटतो!
इंटरेस्टिंग
वाह ! इंटरेस्टिंग आहे ! जेएनयू ही जुनी संस्था आहे. तिथल्या विविध काळात शिकलेल्या विविध विभागाच्या विद्यार्थ्यांच्या काही नोंदी एकत्र केल्या (त्यांच्या डायऱ्या /इतर काही लिखाण वगैरे असेल तर )तर त्यातून बदलत्या सामाजिकराजकीय आणि शैक्षणिक माहौलावर चांगला प्रकाश पडू शकेल.
आणखी एक ...
आजच्या 'लोकमत'मध्ये जनेयूचा विद्यार्थी आणि ऐसीसदस्य राहुल सरवटेचा लेख -
जेएनयू- इथेच एवढा ‘राग’ का?
जवाहरलाल विद्या पिठाचा खर्च कोणाच्या घामाचा आहे
जवाहर लाल नेहरू विद्या पिठाचा खर्च कोणाच्या घामाचा आहे.
१०० वर्षा पूर्वी हल झाले म्हणून काही लोकांना फुकट पोसायचे काही गरज नाही.
टॅक्स चा पैसा जात ,धर्म,प्रदेश ह्या नुसार विभागून तसाच खर्च करा .
आयात खावू लोकांवर लोकांचा कष्टाचा पैसा खर्च करायची गरज नाही.
सामाजिक न्यायाच्या नावा वर
?
आयात खावू लोकांवर लोकांचा कष्टाचा पैसा खर्च करायची गरज नाही.
इंपोर्टेड अन्न खाणारे ते अन्न लोकांच्या (कष्टाच्या वा हरामाच्या) पैशाने खातात, म्हणून कोणी सांगितले? त्यांना स्वत:ला ते परवडत असेल की. (कष्टम ड्यूटीसकट.)
की तुम्हाला कष्टमचा (= कष्टम ड्यूटीचा) पैसा खर्च करण्याची गरज नाही, असे म्हणायचे आहे? (स्मगलिंगला प्रोत्साहन?)
शिवाय, इंपोर्टेड अन्नाचा किंवा कष्टम ड्यूटीचा जेएनयूशी नक्की संबंध काय?
ह्याबद्दल काय मत आहे?
https://www.facebook.com/OmkarDabhadkar.page/videos/597183717736678/
"जेएनयूची सर्व्हर्स बंद केली गेली का?" हा प्रश्न जेएनयूतल्या सभ्य सोज्वळ मवाळ बिचाऱ्या विद्यार्थ्यांना विचारल्यावर काय होतं - त्याचं हे प्रात्यक्षिक. आणि हे खास आदर्शवादी विचारांकडे आकर्षित होणाऱ्या महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी.
तुम्हाला जेएनयूतल्या मानवतावादी, संविधानवादी तरुणांबद्दल कणव वाटत असेल तर ही चर्चा ऐका.
प्रश्न: जेएनयूतली सर्व्हर्स बंद केली गेली का?
उत्तर: कुणीतरी केलं असेलप्रश्न: केलं तर तसं करणं गुन्हा आहे का?
उत्तर: तिकडे काश्मीर मध्ये इंटरनेट बंद आहे आणि तुम्हाला जेएनयूतल्या सर्व्हरची पडलीये!प्रश्न: अरे सारखं सारखं काश्मीरवर का जाता? आधी जेएनयू मुद्दा तर सोडवा! सांगा, सर्व्हर्स बंद केली गेली का?
उत्तर: म्हणून मग ebvp च्या गुंडांनी आम्हाला मरावं का?प्रश्न: आपण एक एक करून पुढे जाऊया, आधी पहिला मुद्दा हा की - सर्व्हर्स बंद केली गेली का?
उत्तर: काही विद्यार्थ्यांनी केलं असेल, एका राज्याचं इंटरनेट बंद आहे त्यावर काही नाही बोलत, कॉलेजचं केलं तर ओरडतात, हिपोक्रसी आहे ही...---
ही आहे एक झलक. आणि हो - abvp बद्दल मी काहीही बोलत नाही. त्याबद्दल तुमचं मत काय असेल तर असू द्या. मुद्दा फक्त - जे लोक तुम्हाला गरीब, बिचारे, "व्यवस्थे विरुद्ध आवाज उठवणारे" वाटतात - ते नेमके काय आहेत - इतकाच आहे.
याच मंडळींनी २ दिवसांपूर्वी विद्यापीठात आयोजित केलेल्या CAA वरील भाषणाला बंद पाडण्यासाठी सर्वांना खोलीत कोंडून टाकलं होतं. या बालकांनी कितीदा तरी प्रोफेसर्सना त्यांच्या ऑफिसमध्ये जाण्यापासून थांबवलं होतं.
आणि वर्षानुवर्षे त्याच आवारात राहून "मेहनत" घेणाऱ्या दीन-दुबळ्या-वंचित असणाऱ्या याच मंडळींनी - नव्या अॅडमिशन्स होऊ नयेत यासाठी गोंधळ घालत कॉलेज वेठीस धरलं होतं. सध्याचा वाद तिथूनच जन्मला आहे.
अर्थात, हे "असे" आहेत म्हणून "त्यांनी" यांची डोकी फोडावीत काय? Absolutely not. ते चूक आहेच, त्यांना शिक्षा ही व्हावीच. मुद्दा इतकाच की तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींशी - एका कोणत्याही बाजूसाठी जिवाच्या आकांताने भांडत असाल - तर किमान पूर्ण चित्र माहीत असू द्या.
"विद्यार्थी" हे सर्वच राजकीय विचारसरणींसाठी मोफत / स्वस्त फूटसोल्जर्स मिळवण्याचं साधन असतात. त्यात सर्वच बाजूचे तरुण सापडतात, अडकतात, भरडले जातात. या माणाऱ्यांमध्ये बहुतेकवेळा आयडियोलॉजी फक्त सुरुवातीला असते. नंतर नंतर फक्त सळसळतं रक्त आणि शत्रू पक्ष - इतकंच उरतं.
दिल्लीतल्या जामिया-जेएनयूसाठी मुंबई-पुणे-औरंगाबाद-अमरावती-कोल्हापूरात वाद घालताना (कोणत्याही बाजूने) हे इतकं समजून घ्या, बस्स.
बाकी तुम्ही हुशार आहातच...!
ओंकार दाभाडकरांच्या वॉलवरुन साभार.
चातुर्य म्हणजे आकलन नव्हे.
दाभाडकर चतुर आहेत. आकलन नाही हे बरेचदा लपवता येतं. बाण मारून, त्याभोवती वर्तुळ काढून त्याचा फोटो तेवढा फेसबुकवरही डकवता येतो. त्यावर खुश होणारी जनताही आहेच!
चार्वीच्या व्यक्तिगत अनुभव आणि भावनांशी त्या चतुराईचा काय संबंध, दाभाडकर जनेयूत शिकले का, दाभाडकर 'समजून घ्या' म्हणत आहेत मात्र ह्या विषयाबद्दल बोलण्यासाठी त्यांना नक्की किती समजतं, असले प्रश्न तेवढे बाजूला ठेवा.
संबंध
त्या चतुराईचा काय संबंध
तोच, जो मंडळाला हा धागा ह्यावेळी वर आणावासा वाटला.
ह्या विषयाबद्दल बोलण्यासाठी त्यांना नक्की किती समजतं
तसं आपल्या कोणालाही किती आणि काय समजतं म्हणा?
मी उजवीकडे झुकलेलो असलो तरी ते मला 'फेन्ससिटर' म्हणतात आणि डावे 'भक्त' हे लेबल लावून हायष्ट्यांडर्ड घेतात. करायचं काय माणसाने?
+१
तोडफोड, मारहाण करणारी आणि चित्रांवरून ओळखली गेलेल्या कोमल शर्मावर काही फिर्याद दाखल झाल्याच्या बातम्या माझ्यापर्यंत आलेल्या नाहीत. जिच्या डोक्यावर सळयांनी मारहाण झाली, हॉस्पिटलात जावं लागलं, जिचं रक्त काढलं तिच्यावर एफायार दाखल झाल्याच्या बातम्या आहेत.
तरीही हे लोक शेपट्या वर करून कसे चालतात, ह्याचं माझ्याकडे जे उत्तर आहे ते मला मान्य करायचं नाहीये. ते उत्तर असं आहे की ज्यांना मारहाण झाली, ज्यांचं रक्त काढलं, ते लोक आमच्या विचारसरणीचे नसल्यामुळे त्यांनाच आम्ही प्रश्न विचारणार. त्यांना कुठलीही सहानुभूती दाखवणार नाही. ज्यांनी मारहाण केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे असं न म्हणता, वरवर, अमूर्त पातळीवर हिंसेचा निषेध वगैरे करणार. गिरीश शहाण्यांचा लेख - आम्हाला सार्वजनिक मालमत्ता प्यारी आहे, आमच्या देशातली माणसं नाहीत - कारण ती दुसऱ्या विचारसरणीची किंवा धर्माची आहेत. (दुवा)
सगळ्यात पहिलं म्हणजे "अख्ख्या
सगळ्यात पहिलं म्हणजे "अख्ख्या जे.एन.यू"ला शिव्या घालणं बंद करायला पाहिजे.
जी काही मारामारी चालली आहे त्यात काय सगळे विद्यार्थी सामील आहेत का?
मग उल्लेख करताना "जे.एन.यू."ची पोरं म्हणणं सपशेल चूक आहे.
बाकी सगळं ठीक.
डावे/उजवे हाणामाऱ्या काही नव्या नाहीत.
चार्वी ह्यांचा अनुभव कथन
अनुभव कथन च्या नावाखाली jnu
ची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न अतुलनीय आहे.
त्यांची मत किंवा त्यांचे अनुभव हे त्यांच्या विशिष्ट विचार श्रेणी शी सुसंगत असतील म्हणून तेच सत्य आहे jnu
चे अशी जबरदस्ती करायची गरज नाही.
भारताची कणखर पंतप्रधान असलेल्या इंदिरा जी नी सुधा ४८ दिवस हे विद्यापीठ बंद केले होते आणि कडक पोलिस कारवाई केली होती.
Jnu मध्ये होत असलेली गुंडागर्दी हेच कारण असावा तेव्हाच इंदिराजी एवढ्या कठोर झाल्या.
पहिली लोक पेपर मध्ये आलेलं,नेत्यांनी सांगितलेले ,स्वयं घोषित विचार वांतानी सांगितलेलं खर मानायचे .
पण आता समाजातील खूप मोठा भाग स्वतःच्या बुध्दी चा वापर करून चीकिस्ता करून खर खोटं ठरवतो.
Jnu मधून कोणते समाज सेवक बाहेर पडले आहेत .
जे नावाजलेले आहेत ते वाम पंथीय विचाराने आंधळे झालेलं आहेत.
बाकी समाजात जावून समाजच भला करणारा एक पण व्यक्ती jnu मध्ये तयार झालेला नाही.
हा प्रश्न अपेक्षितच होता
दोन वर्ष संरक्षण आणि सात महिने अर्थ अशी दोन मंत्री पद निर्मला सीतारामन ह्यांची कारकीर्द आहे.
सरक्षण मंत्री म्हणून देशाचे
संरक्षण धोरण योग्य राबवलं आहे.
अर्थ मंत्री म्हणून ७,, च महिने झाले आहेत पण त्या देशाच्या आर्थिक स्थिती सुधारण्ासाठी योग्य निर्णय घेत नाहीत हे सत्य आहे .
आता जे बजेट मांडले जाईल त्या नंतर त्यांच्या सक्षम पना विषयी मत व्यक्त करता येईल.
जागतापहारा
इतकं निरर्थक विश्लेषण फार दिवसांपासून वाचलं नव्हतं. वाजपेयींच्या सरकारचा ते केवळ विशिष्ठ पक्षाचे आहेत म्हणून दुःस्वास कोणीही केला नाही. आताचा नेता वाजपेयींच्या वैचारिक उंचीच्या जवळपासही जाणारा नाही, हे सरळ मान्य का करत नाही? विद्यार्थ्यांची कर्तव्य काय हे सांगताना एकदा पंप्र ची कर्तव्य काय हेही सांगून टाका. बॉलिवूड लग्नांना जाणे/ जाहीर शुभेच्छा देणे आणि विद्यापीठांविषयी मौन बाळगणे हे त्यात बसतं का?
विनोदी लेख ... असावा.
इथवर वाचलं -
हे तिथले उनाड तरूण वा तरुणी जे काही करतात, त्याला विद्यार्थी दशेतील वर्तन नक्कीच म्हणता येणार नाही.
मग "माफ करा त्यांना, कां की ते काय बोलतात ते त्यांना समजत नाही; आणि समजत नाही हे ही समजत नाही" अशी आपसूक प्रतिक्रिया झाली.
हे, असलेच लोक क्लबात मुलींवर अत्याचार झाले की लगेच 'तिथे जायची गरज काय' म्हणून नैतिकतेचा झेंडा नाचवत असतात. स्वतः कणाहीन आणि रटाळ असतात; आणि तसं नसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नावं ठेवण्यासाठी उतावीळ झालेले असतात.
संवेदनशील विद्यार्थी
संवेदनशील विद्यार्थी म्हणून ख्याती असलेल्या ह्या विद्यार्थ्यांनी देशातील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा निषेध रस्त्यावर येवून केल्याची उदाहरणे आहेत का?
भारतीय सैन्यावर पाकिस्तान कडून जे हल्ले होतात आणि सैनिकांना जीव गमवावा लागतो त्या हल्यांचा निषेध किंवा पाकिस्तानचा निषेध कधी रस्त्यावर येवून केला आहे का?
आपल्याच सरकारच्या पाकिस्तान विषयी धोरणांचा मात्र निषेध जरूर केला आहे.
मी काय म्हणते ...
... मला काय, इथल्या फार कोणालाच ह्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही.
तुम्हाला तिथल्या विद्यार्थ्यांनी कसला निषेध केला, कशाबद्दल आरत्या ओवाळल्या ह्या विषयात रस आहे. मग तिथली विद्यार्थी प्रकाशनं कोणती; त्यांत कोणी काय म्हणलं; किती वेळा कसले निषेध झाले; कोणाच्या आरत्या ओवाळल्या आणि कशाबद्दल काहीच म्हणलं नाही; ह्याचा एक तौलनिक अभ्यास करून आम्हांलाच माहिती का पुरवत नाही?
संबंधित विषयाचा आपण कुठे, कधी, किती, कसा अभ्यास केला ह्याबद्दल तपशील दिले की कोणी 'तुही यत्ता कंची' असे प्रश्नही विचारू शकत नाहीत!
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=B9P7n99eUmI&feature=share
भाऊ पेटले आहेत. आणखी एक व्हिडीओ
हे काय, एवढंच? असं लेख वाचून
हे काय, एवढंच? असं लेख वाचून वाटलं. सुरूवात छान झालेली आहे. पुढचे भाग शक्य होतील त्यापेक्षा लवकर येऊद्यात.