Skip to main content

ही बातमी समजली का? - १२५

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं. अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
____

दिल्ली उच्च न्यायालयाचा, पुस्तकांच्या छायाप्रती काढण्यासंदर्भातला निर्णय.
Publishers lose copyright case against DU’s photocopy shop

अक्षरमित्र Sat, 17/09/2016 - 16:59

कोर्टाने योग्यच निकाल दिला आहे. शिक्षण महत्वाचे , त्यात आर्थिक फायदा विद्यार्थी घेत नसल्याने , शैक्षणिक पुस्तकांच्या छायाप्रती काढल्यास , प्रकाशकांच्या हितसंबंधाला बाधा येत नाही,

चिमणराव Sat, 17/09/2016 - 18:48

वरच्या कॅापीराइट कायद्यात "Under the copyright Act, 1957, there are exemptions on “fair use” of work including educational propose from the purview of infringement, it had said." अशी एक बगल ठेवलेली आहे.त्यावर बोट ठेवून कोर्टाचा निर्णय झालेला दिसतोय.

गब्बर सिंग Sun, 18/09/2016 - 10:20

The second indigenous warship of the Visakhapatnam-class stealth guided-missile destroyers — Mormugao — of the Indian Navy was launched at the Mazagon Dock Ship Builders Limited (MDL) on Saturday.

झक्कास.

----

Pakistan is very scared since Modi's Baloch comments, says Baloch activist - खरं की काय ??

----

100 robots queue for iPhones in New Zealand. - रांगेचा फायदा सर्वांना.

----

Tavleen Singh on hereditary democracy : I have been attacked by a committed band of leftists who point out that ‘these people have to get elected’, so who are you to talk.

उत्तर प्रदेशातील घडामोडींबद्दल.

नितीन थत्तेंच्या मताच्या प्रतीक्षेत.

-----

Israel Suffers Four Attacks in 24 Hours

TEL AVIV—A knife-wielding Palestinian assailant stabbed an Israeli soldier before being shot dead by security forces in the West Bank city of Hebron on Saturday, the military said, the fourth attack against Israelis in less than 24 hours.

The soldier was taken to the hospital.

Two Palestinians and a Jordanian were also killed on Friday by Israeli forces after launching separate knife and car-ramming attacks against Israeli civilians and soldiers, the country’s police and army said.

The bevy of attacks revived a wave of Israeli-Palestinian bloodshed that began last September but had tapered off in recent months as Israel heightened security and Palestinian leaders called for their youth to shun violence.

A Palestinian assailant stabbed an Israeli soldier on Friday afternoon at a checkpoint in the West Bank city of Hebron before being killed, Israel’s military said. The soldier was evacuated to the hospital, it added.

Hours earlier in the nearby Israeli settlement of Kiryat Arba, two Palestinians rammed their car into a bus stop full of Israeli settlers, injuring three people, the army said.

मिलिन्द Mon, 19/09/2016 - 22:36

In reply to by गब्बर सिंग

The second indigenous warship of the Visakhapatnam-class stealth guided-missile destroyers — Mormugao — of the Indian Navy was launched at the Mazagon Dock Ship Builders Limited (MDL) on Saturday.
झक्कास.
लिबरटेरियन प्रवृत्तीचा मनुष्य संरक्षण खर्चाबाबत इतका उत्साही कसा असू शकतो ते समजले नाही .

लिबरटेरियन प्रवृत्तीचा मनुष्य संरक्षण खर्चाबाबत इतका उत्साही कसा असू शकतो ते समजले नाही .

खाली लिबर्टेरियन प्रवृत्तीची तुलना इतर दोन प्रवृत्तीशी कशी केली जाऊ शकते त्याचे ३-अ‍ॅक्सिस मॉडेल देत आहे. ३ अ‍ॅक्सिस पुढीलप्रमाणे - (१) प्रोग्रेस्सिव्ह, (२) सनातनी/कॉन्झर्व्हेटिव्ह, (३) लिबर्टेरियन. हे मॉडेल अरनॉल्ड क्लिंग यांनी बनवलेले आहे. (तपशील इथे)

लिबर्टेरियन प्रवृत्ती ही बलप्रयोगाच्या विरोधी आहे. फिजिकल फोर्स च्या वापराला विरोध करणे हे तिचे मुख्य तत्व आहे. त्यामुळे भारतावर बलप्रयोग करण्याच्या प्रवृत्तीला थोपवण्यासाठी भारताने संरक्षणसिद्धता करणे हे संयुक्तीक वाटते. खासकरून "सेक्युलर दहशतवादाच्या" छायेत वावरताना.

--

1. Progressives, who communicate in terms of the oppressor-oppressed axis, stress entrenched racism.

2. Conservatives, who communicate in terms of the civilization-barbarism axis, stress the importance of maintaining respect for police.

3. Libertarians, who communicate in terms of the freedom-coercion axis, stress that laws from the state ultimately are backed by force, so that if you want less state violence you need fewer laws.

मिलिन्द Tue, 20/09/2016 - 21:54

In reply to by गब्बर सिंग

याच युक्तिवादाने सर्व अणुबॉम्बधारक राष्ट्रांच्या वर्तनाचेही समर्थन करता येते .

याच युक्तिवादाने सर्व अणुबॉम्बधारक राष्ट्रांच्या वर्तनाचेही समर्थन करता येते .

उदा. अमेरिका.

मिलिन्द Tue, 20/09/2016 - 22:22

In reply to by .शुचि

आणि त्यामुळेच संबंध पृथ्वी अनेक वेळा नष्ट करता येईल एव्हढे अणुबॉम्ब आम्ही बनवितो !

गब्बर सिंग Tue, 20/09/2016 - 22:30

In reply to by मिलिन्द

आणि त्यामुळेच संबंध पृथ्वी अनेक वेळा नष्ट करता येईल एव्हढे अणुबॉम्ब आम्ही बनवितो !

अण्वस्त्रस्पर्धेमुळे युद्धांची शक्यता कमी झालेली आहे की नाही ?

भारत-पाकिस्तानचे च उदाहरण घ्या.

मिलिन्द Tue, 20/09/2016 - 23:03

In reply to by गब्बर सिंग

एक दिवसाच्या "संरक्षण " (म्हणजेच "आक्रमण") खर्चात सर्व जगाची एक वर्षाची (अन्नाची) भूक भागू शकेल . अफगाणिस्तानात युद्धात अमेरिका आठवड्याला एक बिलियन डॉलर्स खर्च करत होती .

मिलिन्दजी राघांनी या "जगाची भूक" चा मस्त प्रतिवाद केलेला एकदा. आपण बरेचदा म्हणतो, अरे अन्न काय वाया घालवतोयस तिकडे सोमालियात दुष्काळ आहे. पण इथे अन्नाची नासाडी न करुन त्या दुष्काळावर नक्की कसा प्रभाव पडतो? काही यंत्रणा तरी आहे का उरलेले अन्न तिकडे पाठविण्याची? असल्यास किंवा कोणी करु इच्छिल्यास किती कॉस्ट इफेक्टिव्ह होइल? हे म्हणजे उगाचच वडाची साल पिंपळाला लावल्यासारखे नाही होत का?
.
अमेरीकेने जर एक दिवसाचे संरक्षण कमी खर्चाचे केले तरी कशावरुन जगाला ती खाद्य पुरवु शकेल? किंवा का पुरवावे?
___
सॉरी गविंनी मांडला आहे तो मुद्दा -
http://aisiakshare.com/node/3954#comment-98004

मिलिन्द Wed, 21/09/2016 - 00:53

In reply to by .शुचि

काही यंत्रणा तरी आहे का उरलेले अन्न तिकडे पाठविण्याची?
जगभर मदत (AID) पोचविण्याची व्यवस्था आहे, आणि अमेरिका त्याच्यावरील अनुदान वाढवू शकते.
किंवा जगाला खाद्य का पुरवावे?
जसे भारताने 65 वर्षे आदिवासी-विकासाकडे दुर्लक्ष केले आणि आता नक्षल समस्या सोडवीत बसले आहेत, त्याप्रमाणेच "मुसलमान" जगात विकास घडवून आणल्यास त्यांचा हिंसेवरील भर कमी होईल असे वाटते . (अर्थात त्यासाठी पॅलेस्टाईन आणि काश्मीर हे दोन प्रश्नही सुटणे महत्वाचे आहे ). आयसिसला ज्याप्रमाणे प्रचंड भरती करता आली, तशी समृद्ध मुस्लिम जगातून होण्याची शक्यता कमी वाटते . (आपले अनेक दिव्य मुसलमान बांधव माझे हे म्हणणे खोटे पाडायची सहज शक्यता आहे हे मी मान्य करतो . )

त्याप्रमाणेच "मुसलमान" जगात विकास घडवून आणल्यास त्यांचा हिंसेवरील भर कमी होईल असे वाटते .

खरच तुम्हाला असे वाटते? मला व सिंडीला असे वाटते की त्यांना त्यांच्या नशीबावरती सोडल्याने, किंवा त्यांनी त्रास दिल्यास त्यांना चिरडून टाकण्याने, त्यांचा हिंसेवरील भार कमी होइल. We outdo you in number ;)
.
सिरीअसली का म्हणुन त्यांच्या प्रगतीचे प्रयत्न करायचे आपल्या खर्चाने त्यांची प्रगती करायची? तसेही नंतर त्यांनी डोक्यावर मिरे वाटले तर? आधीच ते डिफेन्सिव्ह असतात. इराणच्या धमक्या मधे मधे ऐकायला येतात. मला यात तथ्य (व्हॅल्यु) वाटत नाही. असो. विदा, ठोस अभ्यास , अतिशय खूप असा रस या विषयात नसल्याने तशी माझ्या विधानांना फारशी किंमत नाहीये पण .... तरी मला व्यावहारीकदृष्ट्या तुमचे म्हणणे पटत नाहीये.
___
आणि तसेही अमेरीकेतील मुसलमानांना (त्रासदायक) अनेक सोईसुविधा मिळूनही त्यांनी कसा दुरुपयोग केलेला आहे हे रोज वाचतोच की आपण. इथल्यांचाच बंदोबस्त सुविधा देऊन्ही होत नाहीय त्यात अजुन कोणाकोणाला चॅरिटीमध्ये मदत करत सुटायचं?
__
कोणीतरी मिलिंद यांच्या विधानातील naivety पटवुन द्या. मला नेहमीप्रमाणे ऑब्जेक्टिवली, मुद्देसूद, सघन आशयपूर्ण मांडाणी जम नैय्ये.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 21/09/2016 - 01:44

In reply to by .शुचि

काही वर्षांपूर्वी पोर्तुगालने, अंमली पदार्थांची नशा करणाऱ्या लोकांना शिक्षा करण्याऐवजी ते पैसे त्यांच्या व्यसनमुक्तीसाठी खर्च करायचं ठरवलं. ह्या धोरणाला लोकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध होता. तरीही हे धोरण पुढे रेटलं गेलं.

अंमली पदार्थांची नशा करायचं व्यसन एकदा लागलं की सहज सुटत नाही; बहुतेकांचं सुटत नाहीच. त्यामुळे हे लोक पुन्हापुन्हा तुरुंगात येतात; त्यांच्यावर सतत खर्च करावा लागतो. त्या जागी ह्या लोकांचं व्यसन सोडवल्यामुळे पुन्हापुन्हा होणारा खर्च टळला, एका व्यसनी माणसाने नव्या माणसाला नादी लावण्याची शक्यता कमी झाली, शिवाय अनुत्पादक व्यसनी माणसं पुन्हा उत्पादक बनली. सगळ्यांचाच फायदा झाला.

---

दहशतवाद्यांच्या भीतीपोटी होणारा खर्च, त्यांनी हल्ले केल्यावर होणारं नुकसान, मानवी जीवन ह्यांची काही किंमत चुकवावी लागतेच. तेच पैसे वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या पद्धतीने खर्च केले तर पुन्हापुन्हा दहशतवादी हल्ले होण्याचे प्रकार कमी होण्याची शक्यता आहे.

सध्या अमेरिकेतून शस्त्रास्त्रं परदेशात जातात; त्या जागी अन्न पाठवायचं. ह्या गोष्टी व्यावहारिक पातळीवर करणं कितपत शक्य आहे ह्याची मला कल्पना नाही. पण सैद्धांतिक पातळीवर, असं करणं हा विचार ग्राह्य आहे हे मला पटतं.

.शुचि Wed, 21/09/2016 - 01:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हां खरच की - https://en.wikipedia.org/wiki/Drug_policy_of_Portugal
ही बघ तू सांगते ती बातमी सापडली. हे असं वाचायला पाहीजे इतरांची नखे बघण्यापेक्षा :(

मिलिन्द Wed, 21/09/2016 - 04:50

In reply to by .शुचि

अमेरिकेत सुमारे 80 लाख मुसलमान आहेत. त्यातील सुमारे आठ लोकांनी अलीकडे दहशतवादी हल्ले केले असे मानू. हे किती टक्के प्रमाण झाले? 0.0001%. (या प्रत्येक हल्ल्यानंतर स्थानिक मुसलमानांनी त्याचा तीव्र निषेध केला आहेच.)

तीव्र निषेध करून परत "फक अमेरिका" अशा घोषणाही दिलेल्याच आहेत, नै का? ये अकेली चीज खरेतर तुमच्यासारख्या अमेरिकानिष्ठांना भडकावयाला पुरेशी आहे.

गब्बर सिंग Tue, 20/09/2016 - 23:13

In reply to by मिलिन्द

एक दिवसाच्या "संरक्षण " (म्हणजेच "आक्रमण") खर्चात सर्व जगाची एक वर्षाची (अन्नाची) भूक भागू शकेल . अफगाणिस्तानात युद्धात अमेरिका आठवड्याला एक बिलियन डॉलर्स खर्च करत होती .

भारतात जेवढ्या म्हणून सरकारी बिल्डिंगा आहेत त्या सगळ्यांचे व्यवस्थित युटिलायझेशन करायचे तर देशातल्या सगळ्या बेघरांना किमान रात्री झोपण्याची व्यवस्था केली जाऊ शकेल एवढी जागा नक्की आहे.

.शुचि Wed, 21/09/2016 - 01:44

In reply to by गब्बर सिंग

हे पटते आहे. कचेर्‍यांचा दिवसा कचेरी व रात्री बेघरांसाठी शयनकक्ष असा वापर होऊ शकतो व त्यामुळे रात्रीबेरात्री घडणारे गुन्हेही थांबायचा कयास आहे. (काही दिव्य बेघर लोक हे विधानही खोटे पाडण्याची शक्यता आहेच.)

याच युक्तिवादाने सर्व अणुबॉम्बधारक राष्ट्रांच्या वर्तनाचेही समर्थन करता येते .

इस्रायलने strategic ambiguity का राखलेली आहे त्याचे सुद्धा.

मिलिन्द Tue, 20/09/2016 - 22:19

In reply to by गब्बर सिंग

कसली "strategic ambiguity" हो! त्यांनी इराणवर दोनशे अणुबॉम्ब रोखल्याची बातमी सर्वत्र आहे !

गब्बर सिंग Tue, 20/09/2016 - 22:29

In reply to by मिलिन्द

त्यांनी इराणवर दोनशे अणुबॉम्ब रोखल्याची बातमी सर्वत्र आहे !

ओके. माझी क्लेरिकल मिष्टेक. पॉवेल सायबांनी ... तिनचार दिवसांपूर्वी...

मिलिन्द Mon, 19/09/2016 - 23:04

In reply to by गब्बर सिंग

Israel Suffers Four Attacks in 24 Hours
स्वतःचे लष्कर-विरहीत राज्य पॅलेस्टिनींना अनेकदा ऑफर केले गेले आहे . ते घेऊन , त्या सुपीक जमिनीत उत्तम गुंतवणूक , उत्पादन करून ते एव्हाना समृद्ध आयुष्य जगू शकले असते . पण आपली पूर्वीची शेती-मालमत्ता जशीच्या तशी परत मिळण्याचा ("Right to return"))आपला मूर्ख आग्रह ते जोपर्यंत सोडत नाहीत तोपर्यंत हे असेच चालू राहणार . आग्रह "मूर्ख" अशासाठी , की हे करणे म्हणजे सध्याच्या इस्राएल या देशाचे विसर्जन करणे आहे, आणि ते कधीही मान्य होणार नाही .

नितिन थत्ते Sun, 18/09/2016 - 14:41

>>Tavleen Singh on hereditary democracy : I have been attacked by a committed band of leftists who point out that ‘these people have to get elected’, so who are you to talk.

उत्तर प्रदेशातील घडामोडींबद्दल.

नितीन थत्तेंच्या मताच्या प्रतीक्षेत.

गब्बर/उदय मोड ऑन > कोणाला निवडावे हा उत्तरप्रदेशातील जनतेचा चॉइस आहे. गब्बर/उदय मोड ऑफ >

अनुप ढेरे Mon, 19/09/2016 - 10:09

http://www.businesstoday.in/magazine/corporate/state-owned-company-has-…

LED वाटप सुरू होऊन दोन वर्ष होत आली. यात LED बल्बची किंम एक त्रितियांश झाली. यामुळे आणि या कंपनीच्या पुढच्या प्लान्समुळे खासगी कंपन्यांच्या पोटात गोळा आला आहे. त्या कंपनीचा कारभार आणि त्याच्या भविष्यातिल प्लान्सचा आढावा घेणारा लेख.
पुढे दोन मुद्दे:.
१. वीज वाचवणार्‍या दिव्यांची गरज होती असं दिसतय. डिमांड असून परवडेल असा सप्लाय का नव्ह्ता?
२. सरकारी कंपनीने जे केलं ते सस्टेनेबल आहे काय? की सुरुवातीला छान चाललं सगळं पण खासगी कंपन्या यातून बाहेर पडून पुन्हा सरकारी मोनोपॉली होईल का?

गब्बर सिंग Tue, 20/09/2016 - 02:29

In reply to by मिलिन्द

हो.

येल्लेन बाईंनी व्याजदर तेवढेच ठेवलेले आहेत जेवढे ग्रीनस्पॅन ने ठेवले होते. पण येल्लेन बाई प्रोग्रेस्सिव्ह असल्यामुळे (व ग्रीनस्पॅन लिबर्टेरियन असल्यामुळे) येल्लेन बाईंवर दोषारोप होत नाहीत.

मिलिन्द Mon, 19/09/2016 - 23:21

दोन दिवसात न्यू जर्सीत दोन ठिकाणी, न्यूयॉर्क व मिनिसोटा मध्ये दहशतवादी हल्ले. सुमारे 32 जखमी. सर्व (२) हल्लेखोर मुस्लिम . न्यूयॉर्क-जर्सीमधला माणूस एकच: अहमद रेहमानी (अफगाण-अमेरिकन, 28)- आज सकाळी त्याला पकडले. मिनिसोटातला माणूस (22-year-old Dahir A. Adan, सोमाली) ठार .
http://www.cnbc.com/2016/09/19/what-we-know-about-suspect-ahmad-khan-ra…
http://www.thegatewaypundit.com/2016/09/st-cloud-isis-stabber-identifie…
ज्या धर्माचा मर्दानगी वगैरे मूल्यांवर इतका भर आहे, तो धर्म एखाद्या पुरुषाला निःशस्त्र स्त्रियांना भोसकायला कसा काय उद्युक्त करू शकतो हे मला तरी मोठे कोडे आहे !

मिनेपोलिस मॉलमध्ये प्रत्येक विझिटमध्ये एक ४० तरी सोमाली दिसतातच. सोमालींचे हब आहे मिनेपोलिस/मिनेसोटा. आणि तसे असण्यास काही आक्षेप नाहीच का घ्यावा कुणी? न्यु जर्सीमध्ये नाही लिट्ल इंडिया? असो. आक्षेप हा आहे की आयसिस या सोमालींना हायर करते आहे. वारंवार अशा प्रकारच्या बातम्या येतात की ४ सोमाली युवक आयसिस मध्ये भरती होण्यास जाणार होते पण सर्वात लहान वयाचा युवक फुटला व पोलिस सर्वांना पकडू शकले वगैरे.
.
सोमाली कम्युनिटी सर्व प्रकारचे सहकार्य पोलिसांना देत आहे वगैरे बातम्या येतातच. तरी हे प्रकार घडतच आहेत.
Leaders of Minnesota's large Somali community have condemned the stabbings, saying the suspect — identified by his father as 22-year-old Dahir A. Adan — does not represent them and expressing fear of backlash.

मिलिन्द Tue, 20/09/2016 - 00:48

In reply to by .शुचि

प्रश्न सोमालींनी इथे येण्याचा नाही, तर आल्यावर इथल्या समाजाशी एकरूप होण्याचा आहे . तिसऱ्या जगातल्या मुस्लिम मनाला अमेरिका ही सैतानी , पापी , वंशवादी सहज वाटू शकते. (And then the answer to the pain of living in a "liberal" i.e. godless society becomes the Quran!))आणि त्यातून आता ट्रम्प-साहेब!

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 21/09/2016 - 20:23

In reply to by मिलिन्द

तिसऱ्या जगातल्या मुस्लिम मनाला अमेरिका ही सैतानी , पापी , वंशवादी सहज वाटू शकते.

सैतानी, पापी म्हणून घेण्यासाठी एवढ्या लांब जाण्याची गरज नाही. मृतांचे विधी सुरू असताना लहान मुलांच्या हातात एलजीबीटी-विरोधी फलक नाचवणारे अमेरिकन ख्रिश्चनही हेच म्हणतात.

वंशवादाची भर मात्र गौरेतर लोकांच्या बाबतीत पडते.

ज्या धर्माचा मर्दानगी वगैरे मूल्यांवर इतका भर आहे, तो धर्म एखाद्या पुरुषाला निःशस्त्र स्त्रियांना भोसकायला कसा काय उद्युक्त करू शकतो हे मला तरी मोठे कोडे आहे !

सगळे धर्म ऑप्रेसिव्ह असतात. फक्त एखाद्या विशिष्ठ धर्मावर ठपका ठेवायचा नाही. जनरलायझेशन केले तरी चालते. पण स्पेसिफिक आरोप करायचा नाही. सेक्युलरिझमची मुख्य शिकवण तीच आहे ओ.

प्रतिभाताई पाटील तर म्हणाल्या होत्या की अध्यात्म हेच दहशतवादावरचे उत्तर आहे

गब्बर सिंग Tue, 20/09/2016 - 10:31

After tough talk, Modi’s moment of reckoning

मोदींचे बाप्टायझेशन झाले. मोदींना आता "सेक्युलर पोलिटिशियन" म्हणायला सुरुवात करूया.

-----

अलिप्त राष्ट्र चळवळीचा दरवेळप्रमाणे हळदीकुंकवाचा कार्यक्रम.

चिमणराव Tue, 20/09/2016 - 09:57

औषध कंपन्यांनी त्यांची औषधे देववण्यासाठी डॅाक्टरांना परदेश प्रवास घडवणे बिझनस खर्च धरता येणार नाही।
I-T trips pharma companies on doctors' junkets - TOI Mobile | The Times of India Mobile Site href:http://m.timesofindia.com/city/mumbai/I-T-trips-pharma-companies-on-doc…

गब्बर सिंग Tue, 20/09/2016 - 21:44

Welcome to the Exponential Age.

In 1998, Kodak had 170,000 employees and sold 85% of all photo paper worldwide. Within just a few years, its business model disappeared and it went bankrupt. What happened to Kodak will happen in a lot of industries in the next 10 years – and most people don’t see it coming. Did you think in 1998 that 3 years later you would never take pictures on paper film again?

Software will disrupt most traditional industries in the next 5-10 years.
Uber is just a software tool, they don't own any cars, and are now the biggest taxi company in the world. Airbnb is now the biggest hotel company in the world, although they don't own any properties.

.शुचि Tue, 20/09/2016 - 23:32

https://www.yahoo.com/news/elizabeth-warren-trump-what-kind-of-human-15…

डोनाल्ड ट्रंप म्हणाला/ले की - त्या न्यु जर्सी च्या बॉम्बरला वैद्यकिय मदत आणि (स्वतःवरची केस चालविण्याकरता)कायद्याची मदत मिळते हे चूकीचे आहे.
त्यावर वॉरेन बाई म्हणाला - ट्रंप माणूस आहे की काय (=हैवान) आहे?

* भाषांतर व काही insinuations माझी आहेत ;)

मिलिन्द Wed, 21/09/2016 - 05:04

In reply to by .शुचि

कोणत्याही , कितीही वाईट गुन्हा केलेल्याला ही सुविधा उपलब्ध असतेच. मा. श्री. ट्रम्प हे प्रबोधन-पूर्व काळात जगतात हे उघड आहे . त्यांना प्रचंड संख्येने मिळणारे पाठीराखे ही खरी शोकाची गोष्ट आहे.

त्यांना प्रचंड संख्येने मिळणारे पाठीराखे ही खरी शोकाची गोष्ट आहे.

डेम्स नी पर्याय सुद्धा सॉलिड दिलेला नाही असं दिसतं.

अ‍ॅनेक्डोटल एव्हिडन्स - मी कामानिमित्त सध्या अशा भागात आहे आहे की जो डेम्स चा बालेकिल्ला नसला तरी बलस्थान मानले जाते. इथे बहुतांश लोक कट्टर डेम्स आहेत. आणि एकाही कार च्या मागे हिलरी-क्लिंटन-केन ची पाटी दिसत नाही. अगदी अपवादाने सुद्धा नाही. २००८, २०१२ मधे तसं नव्हतं. मागच्या महिन्यात तर एका टेम्पो च्या मागे तर - It all depends on how you define a liar - अशी पाटी होती व शेजारी बिल क्लिंटन चे चित्र होते.

मिलिन्द Thu, 22/09/2016 - 00:09

In reply to by गब्बर सिंग

Yep, she is a closet Neocon, for sure. But then you also think of gay marriage , abortion (perhaps the Donald is on board for these two), education, immigration etc etc. You hold your nose and pull the lever for Hillary.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 20/09/2016 - 23:59

बेल्जियममधल्या ब्रूज शहरात नळावरची भांडणं वाढणार, असं ऐसीसदस्य २-माधवबाग ह्यांनी खाजगी निरोपातून कळवलं आहे. कारण इथे वाचा.

गब्बर सिंग Wed, 21/09/2016 - 02:09

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हाय कंबख्त.... हफीज जालंधरींच्या पंक्तींची छुट्टी होणार की काय ?

कहाँ चला है साक़िया, इधर तो लौट ... इधर तो आ
अरे, यह देखता है क्या? उठा सुबू, सुबू उठा
सुबू उठा, पियाला भर, पियाला भर के दे इधर...
चमन के .....

बॅटमॅन Wed, 21/09/2016 - 18:55

In reply to by अतिशहाणा

जर नावात काही नसेल तर नाव बदलले तर इतका त्रास का होतो म्हणे दरवेळेस? नामबदल केल्याने मते मिळतात असा विदा आहे काय?

अतिशहाणा Wed, 21/09/2016 - 19:00

In reply to by बॅटमॅन

ह्या नामबदलामागे काय कारण होते ते कळले नाही. बॉम्बेचे मुंबई किंवा औरंगजेब रोडचे अब्दुल कलाम रोड वगैरे नामकरणामागे स्पष्ट कारणं दिली होती. पंतप्रधानपदासाठी चाललेली घोडेबाजाराची परंपरा लक्षात घेता रेसकोर्स रोड हे नाव चपखल होते. लोककल्याण मार्ग वगैरे काय राव.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 21/09/2016 - 19:37

In reply to by अतिशहाणा

घोडेबाजाराची परंपरा लक्षात घेता रेसकोर्स रोड हे नाव चपखल होते

म्हणूनच बदललं असणार. '... हाती कथलाचा वाळा' ही परंपरा पाळायला नको का!

सुनील Wed, 21/09/2016 - 20:44

In reply to by अतिशहाणा

सध्या दीन दयाळ उपाध्याय यांची जन्मशताब्दी सुरू आहे. त्यानिमित्ताने सदर रस्त्याचे नाव "एकात्म मार्ग" असे बदलण्यात येणार होते, असे वाचले होते. ते सोडून, "लोक कल्याण मार्ग" असे, कुणाचा फारसा विरोध होणार नाही, असे नाव स्वीकारले गेले असावे.

गब्बर सिंग Wed, 21/09/2016 - 20:52

In reply to by सुनील

सध्या दीन दयाळ उपाध्याय यांची जन्मशताब्दी सुरू आहे. त्यानिमित्ताने सदर रस्त्याचे नाव "एकात्म मार्ग" असे बदलण्यात येणार होते, असे वाचले होते. ते सोडून, "लोक कल्याण मार्ग" असे, कुणाचा फारसा विरोध होणार नाही, असे नाव स्वीकारले गेले असावे.

मग तर फारच बरं झालं. सिरियसली.

गब्बर सिंग Wed, 21/09/2016 - 23:20

In reply to by नितिन थत्ते

लोक कल्याण हा शब्द गब्बरला चालतोच कसा म्हणतो मी !!!

खवचट.

दिनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्मिक मानवतावादाचा भंपकपणा सहन करण्यापेक्षा "लोक कल्याण" हा शब्द बरा.

मिहिर Thu, 22/09/2016 - 10:15

In reply to by सुनील

लोक आणि कल्याणमध्ये मोकळी जागा का सोडली आहे? सामासिक शब्द आहे ना हा?

उदय. Wed, 21/09/2016 - 21:16

In reply to by चिमणराव

मुळात प्रत्येक रस्ता/गल्ली/बोळ यांना व्यक्तीचे नाव द्यायचा अट्टाहास का? फार व्यक्तीपूजा होतेय, असं नाही का वाटत? भारतीय पोस्टखातं पण पर्सनॅलिटीवर इssतssके स्टँप्स काढते की आता नकोसे वाटायला लागलेत ते.

गब्बर सिंग Wed, 21/09/2016 - 21:26

In reply to by उदय.

मुळात प्रत्येक रस्ता/गल्ली/बोळ यांना व्यक्तीचे नाव द्यायचा अट्टाहास का? फार व्यक्तीपूजा होतेय, असं नाही का वाटत?

व्यक्तीपूजा ही व्यक्तीला irrelevant करण्यापेक्षा बरी नैका ? Wouldn't it be better to revere specific individuals for what (good) they have done ? Rather than letting them go unrecognized, ignored, un-noticed ?

योगदान रेकग्नाईझ करणे हा एक भाग झाला पण व्यक्तीपूजा हे स्तोम आहे असं का वाटतं ? A nation which does not respect, revere its soldiers does not produce soldiers. Similarly a nation which does not respect, revere its leaders does not produce leaders.

Why not celebrate the individual ?

Why are we so much afraid that if we respect, revere an individual, he will become egoistic, and oppressive ??

मी फार सिम्प्लिस्टिक, नाईव्ह् विचार करतोय का ?

उदय. Wed, 21/09/2016 - 21:56

In reply to by गब्बर सिंग

स्तोम आहे असं वाटतं कारण त्याचं राजकारण झालं आहे म्हणून. केवळ एकच उदाहरण देतो. मुंबई एअरपोर्टला जे.आर.डी. टाटा यांचं नाव देण्याऐवजी दुसरेच नाव देणे.

गब्बर सिंग Thu, 22/09/2016 - 00:26

US : Women earned majority of doctoral degrees in 2015 for 7th straight year and outnumber men in grad school 135 to 100

To conclude, let me pose a few questions, paraphrasing George Mason economist Walter E. Williams: If America’s diversity worshipers see any female under-representation as a problem and possibly even as proof of gender discrimination, what do they propose should be done about female over-representation in higher education at every level and in 7 out of 11 graduate fields? After all, to be logically consistent, aren’t female over-representation and female under-representation simply different sides of gender injustice?

स्त्रीप्रधान संस्कृतीचा विजय असो ?

.शुचि Thu, 22/09/2016 - 00:37

In reply to by गब्बर सिंग

स्त्रियांना काही विशेष सुविधा, कन्सेशन्स दिल्यामुळे ही लक्षणीय वाढ झालेली आहे का? की त्या पुरुषांहून जास्त सिन्सिअर असतात किंवा तत्सम अंगभूत गुणविशेषांमुळे झालेली आहे यावर संशोधन व्हायला हवे. जर हा सन्मान कोणत्याही सुविधा न मिळता स्त्रियांनी स्वकर्तुत्वावरती हासील केला असेल, मिळवला असेल तर Walter E. Williams यांच्या प्रश्नाला काहीही अर्थ नाही. सिंपल आकसातून आलेला किंवा अ‍ॅट बेस्ट अज्ञानातून आलेला प्रश्न म्हणता येइल. अज्ञानातूनच.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 22/09/2016 - 01:31

In reply to by .शुचि

अंदाज - पीएचडी करत असताना अगदी कमी पैसे मिळतात; अगदी कमी म्हणजे साधारण समान बुद्धीमत्ता असणाऱ्या दोघीही बुद्धीला चालना देणारी कामं करत आहेत; पैकी एक पीएचडी करत्ये आणि एक खाजगी उद्योगात नोकरी करत्ये; तर पीएचडी करणारीला कमी पैसे मिळण्याची शक्यता बरीच आहे.

अधिक पगार ह्या कारणामुळे स्त्रियांना पीएचडी करणं परवडत असावं; कारणं निरनिराळी. पुरुषप्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे पुरुषांना अधिक पैसे देणारी कामं करावीशी वाटू शकतील; किंवा नैसर्गिकतःच पुरुषांना अधिक कर्तृत्व गाजवावं (=माचोपणा) असं वाटू शकतं; अधिक पैसे = अधिक कर्तृत्व ह्या समीकरणात पुन्हा संस्कृतीजन्य प्रभाव येतो.

नितिन थत्ते Thu, 22/09/2016 - 07:31

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>पुरुषप्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे पुरुषांना अधिक पैसे देणारी कामं करावीशी वाटू शकतील;

किंवा पुरुषप्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे पुरुषांना अधिक पैसे देणारी कामं करणं भाग पडत असेल.

गब्बर सिंग Thu, 22/09/2016 - 07:56

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अधिक पगार ह्या कारणामुळे स्त्रियांना पीएचडी करणं परवडत असावं; कारणं निरनिराळी. पुरुषप्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे पुरुषांना अधिक पैसे देणारी कामं करावीशी वाटू शकतील; किंवा नैसर्गिकतःच पुरुषांना अधिक कर्तृत्व गाजवावं (=माचोपणा) असं वाटू शकतं; अधिक पैसे = अधिक कर्तृत्व ह्या समीकरणात पुन्हा संस्कृतीजन्य प्रभाव येतो.

म्हंजे नैसर्गिकतःच पुरुषांनास्त्रियांना अधिकसुमार कर्तृत्व गाजवावं (=माचोपणा???) असं वाटू शकतं.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 23/09/2016 - 02:16

In reply to by गब्बर सिंग

मुळातच, मी कोणीतरी तिस्मारखाँ आहे, हे जगाला पटवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणं - येन केन प्रकारेण पुरुषो प्रसिद्धो भवेत्‌ - हा माचोपणा आहे. ह्या माचोपणाचा ज्यांना अभिमान बाळगायचा आहे त्यांनी जरूर बाळगावा. हे न केल्यामुळे मला किंवा बहुतांश स्त्रियांना किंवा सर्व स्त्रियांना कोणी सुमार कर्तृत्वाच्या म्हणत असेल, तर म्हणा बुवा! 'मी कित्ती थोर' हे जगाला काही पटवून द्यावं, असला माचोपणा माझ्याकडे नसल्यामुळे मला कोणी सुमार म्हटल्याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही.

राजेश घासकडवी Thu, 22/09/2016 - 17:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझा अंदाज असा - पीएडीचं वय हे स्त्रियांसाठी लग्न किंवा कायमचं नातं निर्माण करण्याचं असतं, तर पुरुषांसाठी ते नोकरी करून मिळवतं होण्याचं असतं. निदान समाजाची अशी अपेक्षा असते. त्या काळात एखादं जोडपं 'तू पीएचडी कर मी नोकरी करून घरी पैसे आणतो' हे म्हणणं '.....मी नोकरी करून पैसे आणते' हे म्हणण्यापेक्षा अधिक शक्यतेचं असतं. प्रस्थापित लिंगभूमिकांमुळेच कदाचित ही सध्याच्या लिंगवास्तवाला छेद देणारी व्यवस्था निर्माण झाली असावी. याचे परिणाम आत्ता नाही, तर पंचवीस तीस वर्षांनी दिसतील. तांत्रिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अधिक स्त्रिया उच्चपदाला पोचलेल्या दिसतील.

.शुचि Thu, 22/09/2016 - 19:05

In reply to by अंतराआनंद

प्रस्थापित लिंगभूमिकांमुळेच कदाचित ही सध्याच्या लिंगवास्तवाला छेद देणारी व्यवस्था निर्माण झाली असावी. याचे परिणाम आत्ता नाही, तर पंचवीस तीस वर्षांनी दिसतील. तांत्रिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अधिक स्त्रिया उच्चपदाला पोचलेल्या दिसतील.

राघांचा हा सकारात्मक अशावाद अत्यंत आवडतो.

अतिशहाणा Thu, 22/09/2016 - 19:25

In reply to by .शुचि

तांत्रिक आणि शैक्षणिक क्षेत्रात पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त असणे (किंवा स्त्रियांपेक्षा पुरुष जास्त असणे) हे सकारात्मक कसे ब्वॉ?

.शुचि Thu, 22/09/2016 - 19:32

In reply to by अतिशहाणा

अधिक स्त्रिया उच्चपदाला पोचलेल्या दिसतील.

नाही नाही पुरुषांपेक्षा जास्त नाही म्हणायचं मला. मला म्हणायचय आता आहेत त्याहून अधिक आणि विशेषतः भारत आणि अन्य विकसनशील देशात.
बाय द वे भारताला विकसनशील म्हणणां म्हणजे शिवी वाटते आता. :( भारत आता डेव्हलप्ड कंट्री च आहे.

राजेश घासकडवी Fri, 23/09/2016 - 06:27

In reply to by अतिशहाणा

पुरुषांपेक्षा जास्त असं नाही. आज दिसणारं जे चित्र आहे - स्त्रियांपेक्षा सर्वत्रच उच्चपदांवर पुरुष खूपच जास्त प्रमाणावर दिसतात - ते बदलून समानतेच्या जवळ येईल. ही समानता निश्चितच सकारात्मक आहे. लहान मुलींसमोर जे चित्र आज दिसतं त्यानुसार त्यांच्या अपेक्षा ठरतात. पंचवीस वर्षांनी ज्या मुली लहान असतील त्यांच्या अपेक्षा आणि स्वतःला काय करता येऊ शकतं याबद्दलचं चित्र त्याकाळच्या समानतेनुसार ठरलं तर अनेक स्वप्नं मरण्यापासून वाचतील.

.शुचि Fri, 23/09/2016 - 01:44

In reply to by गब्बर सिंग

असे असेल का की भेदभाव बरेचदा "सो कॉलड" कमी प्रतीचा क्राऊड वगळण्याकडे असतो. आणि असा कमी प्रतीचा समजला गेलेला क्राऊड खरच त्याच टॅबूमुळे पैशाचीही कमी अपेक्षा ठेवतो => कमी पैशात काम करणारा वर्गच कमी झाला एकदम कट होऊन गेला मग ऑटोमॅटिकली कंपनी जास्त पैसे देते. व दिवाळखोर बनते.
.
म्हणजे मला असे म्हणायचे आहे की मी(कंपनी) उलट्या रीतीने डिस्क्रिमिनेट केले तर? म्हणजे गोर्‍यांना व पुरुषांना घेतलेच नाही, फक्त ब्राऊन लोक व स्त्रियाच घेतल्या. म्हणजे मी कमी पैसे दिले व अधिक श्रम मिळविले.
तरीही मी (कंपनी) दिवाळखोर होइन का? की उलट माझी भरभराट होइल?
___
वा! अशा वागण्याला Reverse Discrimination असा खास शब्द आहे.

गब्बर सिंग Fri, 23/09/2016 - 10:27

Why are housewives so undervalued (even by other women)?

In recent years there have been many attempts to place a monetary value on the work done at home. It is an impossible task of course – itemising the hundreds of components that go into the functioning of a household itself, constantly adjusting values to take into account growing children, location shifts, the financial status of the family, etc. Even after assigning a low estimate for the market value of basic household chores in a report titled Women’s Economic Contribution through Their Unpaid Household Work: The Case of India, researchers valued their contribution at $612.8 billion or 61% of the Gross Domestic Product. Every time I clean the fridge now I make sure I inform my children about my contribution to the economy.

समस्या आहे. हे योगदान असं आहे की ज्याचे मूल्यमापन (measurement) करायचं नाही, होऊ शकत नाही असा जवळपास अलिखित संकेत आहे. हे योगदान अमूल्य आहे असं मानलं जातं. पण मग ज्याचं मूल्यमापन (measurement) केलं जात नाही त्याची तुलना होऊ शकत नाही आणि म्हणून लोकांना त्याचे मूल्य लक्षात येत नाही. मग ते अंडरव्हॅल्यु झाले असं पण म्हणायचं. हे कसं जमणार ?

नितिन थत्ते Fri, 23/09/2016 - 10:53

In reply to by गब्बर सिंग

घरकामाचा मोबदला या विषयावर इथे एक धागा उत्पल यांनी टाकला होता. त्या सर्व्हेतून काय निष्पन्न झाले ते कळले नाही.

http://www.aisiakshare.com/node/2328

नितिन थत्ते Mon, 26/09/2016 - 09:29

In reply to by गब्बर सिंग

त्यांना असं विचारल्याने काय साध्य* होईल/होण्याची शक्यता आहे? असा प्रश्न आहे.

*"काय शॉल्लेट मारलाय पाकिस्तानला !!!" असं समाधान होण्याच्या पलिकडे......

गब्बर सिंग Mon, 26/09/2016 - 10:49

In reply to by नितिन थत्ते

त्यांना असं विचारल्याने काय साध्य* होईल/होण्याची शक्यता आहे? असा प्रश्न आहे.

जबाबदारीची थेट जाणीव करून देणे. पाकिस्तानातले नागरिक हे प्रिन्सिपल आहेत. सत्ताधीश(**) हे एजंट आहेत. नागरिकांची जबाबदारी आहे की एजंटांना वेसण घालण्याची. नाहीतर (अ‍ॅपल्स टू ऑरेंजेस तुलनाच करायची म्हंटली तर) सिरिया सारखी स्थिती होते. सिरियन रेफ्युजी लोकांची दयनीय स्थिती जगजाहीर आहे. अर्थात सिरिया ही लोकशाही नाही. पाकिस्तान निदान काही प्रमाणावर तरी लोकशाही आहे. एजंट लोक बेलगाम वागले तर त्याची फळे प्रिन्सिपल ला भोगावी लागतात. ह्याची जाणीव पाकी नागरिकांना करून देणे गरजेचे होते. हा इशारा, चेतावनी, धमकी, रिस्क-अ‍ॅसेसमेंट काहीही म्हणा.

भारतीय सैनिकांना पाकी सैनिकांशी कोणतेही व्यक्तीगत शत्रुत्व नाही.

** - सत्ताधीश हा शब्द मी मुद्दाम वापरलेला आहे.

--

*"काय शॉल्लेट मारलाय पाकिस्तानला !!!" असं समाधान होण्याच्या पलिकडे.....

मोदींच्या वक्तव्याकडे असं पाहणे हे मोदीविरोधकांचं कामच आहे. मोदीविरोधक हे मोदींचे काँपिटिटर्स आहेत.

अनु राव Mon, 26/09/2016 - 11:20

In reply to by गब्बर सिंग

सिरियन रेफ्युजी लोकांची दयनीय स्थिती जगजाहीर आहे. अर्थात सिरिया ही लोकशाही नाही.

गब्बु, पाकीस्तान चे सोड, कोणी सिरीयन लोकांना तरी हे ऐकवले आहे का की सध्याची तुमची परीस्थीत्त हि तुमच्या मुळेच झाली आहे. असद राजवट ही फार काही वाईट नव्हती, रादर वाळवंटी स्टँडर्ड प्रमाणे तर असद राजवट ग्रेटच होती. उगाचच असद ला त्रास द्यायला गेले आणि अंगाशी आले.

गब्बर सिंग Mon, 26/09/2016 - 11:25

In reply to by अनु राव

गब्बु, पाकीस्तान चे सोड, कोणी सिरीयन लोकांना तरी हे ऐकवले आहे का की सध्याची तुमची परीस्थीत्त हि तुमच्या मुळेच झाली आहे. असद राजवट ही फार काही वाईट नव्हती, रादर वाळवंटी स्टँडर्ड प्रमाणे तर असद राजवट ग्रेटच होती. उगाचच असद ला त्रास द्यायला गेले आणि अंगाशी आले.

म्हणूनच सिरिया व पाकिस्तान ही अ‍ॅपल्स टू ऑरेंजेस कंपॅरिझन आहे असं म्हंटलं.

दुसरं उदाहरण म्हंजे १९७१ युद्ध. त्यात हजारो बांग्ला निर्वासित भारतात आलेच की. हे जास्त अ‍ॅपल्स टू अ‍ॅपल्स कंपॅरिझन आहे का ? ( का ते सुद्धा ४० वर्षांपूर्वीचे म्हणून फेकून देणार ?? )

अनु राव Mon, 26/09/2016 - 11:29

In reply to by गब्बर सिंग

--------
कमिंग बॅक टु मुळ मुद्दा. थत्ते चाचांचा प्रश्न बरोबर आहे, उगाचच बडबड चालु आहे. खरे तर पाकीस्तानचा कॅन्सर स्टेज ३-४ च्या पलीकडे गेला आहे. जेंव्हा उपचार शक्य होते आणि ते प्रभावी पण झाले असते तेंव्हा केले नाहीत. आता काहीही केले तरी उपयोग नाही. मोठे नुकसान सहन केल्याशिवाय पाकीस्तान चा भस्मासुर थोडा काळ गप्प बसणार नाही.
किंवा त्या भीमाच्या गोष्टीत रोज राक्षसाला एक गाडाभर अन्न आणि एक जनावर द्यावे लागायचे तसे थोडे थोडे देत रहायचे पाकीस्तान ला.

गब्बर सिंग Mon, 26/09/2016 - 11:33

In reply to by अनु राव

कमिंग बॅक टु मुळ मुद्दा. थत्ते चाचांचा प्रश्न बरोबर आहे, उगाचच बडबड चालु आहे. खरे तर पाकीस्तानचा कॅन्सर स्टेज ३-४ च्या पलीकडे गेला आहे. जेंव्हा उपचार शक्य होते आणि ते प्रभावी पण झाले असते तेंव्हा केले नाहीत. आता काहीही केले तरी उपयोग नाही. मोठे नुकसान सहन केल्याशिवाय पाकीस्तान चा भस्मासुर थोडा काळ गप्प बसणार नाही.

मग मोदींचे भाष्य हा मुद्दा कव्हर करत नाही असं म्हणायचंय का ?

मोदींचे ते भाषण - प्रमुख मुद्दे

10. Want to tell people of Pak- your leaders are misleading you by talking about Kashmir. They can’t manage what they have created and they talk about Kashmir

11. India exports software, Pakistan exports terrorism

12. I want to remind the citizens of Pakistan that they were part of our soil before 1947

अनु राव Mon, 26/09/2016 - 11:49

In reply to by गब्बर सिंग

11. India exports software, Pakistan exports terrorism

हा पाकीस्तानी नागरीकांचा जाणते पणी केलेला निर्णय आहे. त्यांना पूर्ण कल्पना आहे ते काय करतायत त्याची आणि त्यांना तेच करायचे आहे.

10. Want to tell people of Pak- your leaders are misleading you by talking about Kashmir. They can’t manage what they have created and they talk about Kashmir

त्यांना चांगले सरकार नकोच आहे. त्यांना चांगली मॅनेजमेंट नकोच आहे. त्यांनी तो चॉइस गेली ६० वर्ष सातत्यानी केलेला आहे. त्यांना तेच पाहिजे आहे आणि त्यांना तेच आवडते.

------------
तेजायला, मोदींचा दाभोलकर झालाय. अ‍ॅनालॉजी, लोकांनी सत्यनारायण घालायचे इत्यादी निर्णय जाणते पणी घेतलेले असतात, त्यांना मूर्ख समजणे आणि सुधारा असे सांगणे चूक असते.

गब्बर सिंग Mon, 26/09/2016 - 20:41

In reply to by अनु राव

तेजायला, मोदींचा दाभोलकर झालाय. अ‍ॅनालॉजी, लोकांनी सत्यनारायण घालायचे इत्यादी निर्णय जाणते पणी घेतलेले असतात, त्यांना मूर्ख समजणे आणि सुधारा असे सांगणे चूक असते.

पटतंय पटतंय.

--

अनु, तुझा प्रतिसाद वाचून, मोदींचा बुश झालाय असं वाटतंय. इराकी लोकांना "डेमॉक्रसी" ची डाबर जनम घुंटी पिलवण्याप्रमाणे ... पाकी लोकांना दारिद्र्यनिर्मूलन ची प्रवचनं देतोय.

अनुप ढेरे Mon, 26/09/2016 - 20:51

In reply to by अनु राव

लोकांनी सत्यनारायण घालायचे इत्यादी निर्णय जाणते पणी घेतलेले असतात, त्यांना मूर्ख समजणे आणि सुधारा असे सांगणे चूक असते.

वाह! क्या बात है!

.शुचि Mon, 26/09/2016 - 23:07

In reply to by अनुप ढेरे

एखाद्या व्यक्तीकडे "सत्यनारायण घालणे" हाच एकमेव ऊपाय शिल्लक असेल (त्याच्या बौद्धिक्/शारीरीक किंवा अन्य कोणत्याही लिमिटेशन्मुळे) तर अनिस तो एकमेव आधार काढून घेतल्यानंतर समुपदेशनाकरता येणारे का? जोवर दुसर्‍या कोणाला त्रास होत नाही तोवर कुणाचं नक्की काय बिघडतं? गणेशोत्सवाविरुद्ध अनिस आवाज उठवते आहे का? - हा प्रश्न कुतूहलापोटी विचारला आहे.
.
जगाला शहणपणा शिकवण्याचा विडा किंवा मक्ता आपण काय तो घेतलाय असे समजणे हीच मोठी अंधश्रद्धा आहे.
.
मला अनिंस विषयी कोणताही आकस नाही. आकस आहे तो अन्य लोकांच्या निरुपद्रवी श्रद्धांना ऊठसूठ लाथा घालणार्‍यांचा.

नितिन थत्ते Wed, 28/09/2016 - 13:24

In reply to by .शुचि

>>गणेशोत्सवाविरुद्ध अनिस आवाज उठवते आहे का? - हा प्रश्न कुतूहलापोटी विचारला आहे.

गणेशोत्सव* ही अंधश्रद्धा आहे का? (त्या उत्सवातला लालबागचा राजा नवसाला पावतो ही अंधश्रद्धा आहे).

*सार्वजनिक गणेशोत्सवाचा गणपतीवरील श्रद्धेशी संबंध नाही आणि कधीही नव्हता. लालबागचा राजा नवसाला पावतो ही श्रद्धा हे "सार्वजनिक गणेशोत्सव" या इव्हेंटमधलं अ‍ॅबरेशन आहे.

गणेशोत्सवाविरोधात अंनिसने काही करू नये. ते त्यांच्या स्कोपच्या बाहेर आहे.

अनु राव Wed, 28/09/2016 - 13:31

In reply to by नितिन थत्ते

अनिस नी एकुणातच काही करु नये आणि सर्वच त्यांच्या स्कोपच्या बाहेर आहे. अनिस नी लोकांना आनंदानी जगु द्यावे, उगाच अक्कल शिकवायला जाऊ नये. जास्तीची अक्कल झाली असेल त्यांच्याकडे तर ती स्वतासाठी वापरावी.

मिलिन्द Mon, 26/09/2016 - 23:23

In reply to by अनु राव

सिरिया: संख्येने केवळ अकरा टक्के असलेल्या "आलावी " जमातीचे बऱ्यापैकी दमनकारी/माफिया राज्य उरलेल्यांवर आहे .सुन्नी सत्तर टक्के, अर्थव्यवस्था ठप्प झालेली , आणि हेरखाते ("मुखाबरात") यांचे भयानक अत्याचार . ते सुन्नींना मानवणे शक्य नव्हते . चाळीस वर्षांनी त्यांनी उठाव केला आहे . पण असाद हरला तर अलावीची सरसकट कत्तल होईल अशा भीतीमुळे तो राज्यही सोडणार नाही असे दिसते . सर्व मोहरे आता पुतीनच्या हातात आहेत .

अनु राव Tue, 27/09/2016 - 09:07

In reply to by मिलिन्द

अ‍ॅज युजुअल, तुमची माहीती धाधांत खोटी आहे. सीरीयातली असाद राजवट ही वाळवंटी स्टँडर्ड च्या दृष्टीने "ग्रेट" म्हणावी इतकी चांगली होती. तिथल्या लोकांना शांतता वगैरे प्रकार मुळातच मान्य नसल्यामुळे काहीतरी कारण काढले, त्याचे परीणाम भोगतायत. वर त्याचे निमीत्त करुन युरोप काबीज करतायत ते वेगळेच.

-----
अधोरेखीत शब्द महत्वाचा आहे.

मिलिन्द Tue, 27/09/2016 - 22:51

In reply to by अनु राव

नेहमीप्रमाणेच तुमचा रिस्पॉन्स पूर्वग्रहदूषित आणि वंशद्वेष्टा आहे . वाळवंटातील स्टँडर्ड्स वेगळी असायचे कारण नाही . . योग्य ते योग्य , अयोग्य ते अयोग्य . टॉर्चरमध्ये मृत्यू होणे हे मी तरी अयोग्य मानतो. .

नेहमीप्रमाणेच तुमचा रिस्पॉन्स पूर्वग्रहदूषित आणि वंशद्वेष्टा आहे . वाळवंटातील स्टँडर्ड्स वेगळी असायचे कारण नाही .

वाळवंटातली स्टँडर्ड्स वेगळी नाहीत ? समान आहेत ? कोणाशी तुलना केली तर समान आहेत ?

वाळवंटातली स्टँडर्ड्स उच्च आहेत तर मग सिरियातले शरणार्थी/निर्वासित वाळवंटातल्या इतर देशांमधे (तुर्की, जॉर्डन, लेबॅनॉन) का जात नाहीत ? वेस्ट (उदा. युरोप) मधे का येतात ?

तुर्की, जॉर्डन, लेबॅनॉन मधे जात असतीलही पण वेस्ट मधे यायला अधिक उत्सुक असतात का ?

समस्या सांगतो - वाळवंटातली स्टँडर्ड्स फालतू/फडतूसच आहेत. फक्त तुम्हाला ते तसे मान्य करायचे नसावे. व वाळवंटातली स्टँडर्ड्स निकृष्ट्/फडतूस्/फालतू आहेत असं अनु ने म्हंटलं की लगेच तुमचे आवडते ब्रह्मास्त्र (वंशद्वेष, भेदभाव, पूर्वग्रहदूषित वगैरे शब्द) तुम्ही वापरता. याला वेगळ्या शब्दात पीसी असं म्हणतात.

माझ्या भाषेत सांगायचं तर फडतूस व उच्च यात भाव करायला शिकल्यास सत्यमेवजयते च्या ब्रीदवाक्याच्या जवळपास जाणे लवकर शक्य होईल.

मिलिन्द Wed, 28/09/2016 - 02:18

In reply to by गब्बर सिंग

आपला स्टॅण्डर्ड या शब्दाबद्दल घोळ होतो आहे . वस्तुस्थिती आणि स्टॅंडर्ड या वेगळ्या संकल्पना आहेत. या देशांची वस्तुस्थिती भिकार आहे याबद्दल दुमत नाही. पण त्यांनी "कसे वागले पाहिजे" याबद्दल बाह्य जगाची मते असू शकतात. आणि कोणताही देश त्या पातळीला कधीच येऊ शकणार नाही असे म्हणणे वंशद्वेषी ठरते- (उदा. जॉर्डन अनेक प्रकारे ठीक वागतो आहे). "हे असेच राहणार " असे म्हणणे म्हणजे त्या देशांवरील सुधारणांचे प्रेशर कमी करणे आहे.

गब्बर सिंग Wed, 28/09/2016 - 03:09

In reply to by मिलिन्द

आपला स्टॅण्डर्ड या शब्दाबद्दल घोळ होतो आहे . वस्तुस्थिती आणि स्टॅंडर्ड या वेगळ्या संकल्पना आहेत. या देशांची वस्तुस्थिती भिकार आहे याबद्दल दुमत नाही. पण त्यांनी "कसे वागले पाहिजे" याबद्दल बाह्य जगाची मते असू शकतात.

म्हणूनच - वाळवंटातली स्टँडर्ड्स वेगळी नाहीत ? समान आहेत ? कोणाशी तुलना केली तर समान आहेत ? - हा प्रश्न विचारला होता.

--

आणि कोणताही देश त्या पातळीला कधीच येऊ शकणार नाही असे म्हणणे वंशद्वेषी ठरते

नाही.

ती लांब-उडी ठरेल फारतर. जसं इराक मधे लोकशाही आणूया - असं बुश म्हणाला. ती लांब उडी होती.

कोणताही देश विशिष्ठ पातळीवर जाऊ शकणे व/वा न शकणे हे मुख्यत्वे वंशावर अवलंबून असते असं मानलं तर आणि तरच. इतर फॅक्टर्स (उदा. भौगोलिक कारणे) महत्वाचे नसतात असं मानलं तर आणि तरच.

(आणि तसं काही अनु म्हणालेलीच नैय्ये. खरंतर तिच्या त्या परिच्छेदात भूतकाल व वर्तमानकालाबद्दलचीच वाक्ये होती. "आणि कोणताही देश त्या पातळीला कधीच येऊ शकणार नाही " - हा भविष्यकाल तुम्ही गृहित धरलेला आहे. ).

समस्या ही आहे की वंश हा तुमच्या जरा जास्तच अजेंड्यावर आहे. समोरचा जे म्हणतोय ते समजलं नाही की ते वंशभेदी आहे असं म्हणून रिकामे.

मिलिन्द Wed, 28/09/2016 - 06:37

In reply to by गब्बर सिंग

ठीक आहे, वरची "वाळवंटातली स्टँडर्ड्स" ही कॉमेंट आपण राजस्थानी हिंदूंसाठी होती असे मानू आणि सोडून देऊ!

बॅटमॅन Wed, 28/09/2016 - 12:35

In reply to by मिलिन्द

"हे असेच राहणार " असे म्हणणे म्हणजे त्या देशांवरील सुधारणांचे प्रेशर कमी करणे आहे.

उर्वरित जग म्यारेथॉन दौडत असताना वाळवंटी बाब्या एक पाऊल चालला की विश्वपरिक्रमा केल्याच्या थाटात स्तुती केल्याने सुधारणा होत असतीलच, नै?

अनु राव Wed, 28/09/2016 - 12:54

In reply to by मिलिन्द

अशीच परीस्थिती इराक मधे पण होती की. मेजॉरीटी शियांवर मायनॉरीटी सुन्नी राज्य करत होते. इतकेच नाही तर दुसर्‍या शिया देशाला ( इराण ) ला त्रास देत होते. पण कोणी काही उठाव केला नाही सद्दाम विरुद्ध.

म्हणजे काय, जिथे उस गोड लागला ( पक्षी असाद ) की हे लोक मुळापासुन खाणार, पण सद्दाम ला मात्र घाबरुन रहाणार. तात्पर्य काय ह्यांना सद्दामच पाहिजे कंट्रोल मधे ठेवायला. कोणी चांगला, गरीब, सज्जन दिसला की हे त्याला मारणार.

नितिन थत्ते Mon, 26/09/2016 - 12:21

In reply to by गब्बर सिंग

जनरली बाहेरचा माणूस (उदाहरणार्थ इंग्लंड किंवा फ्रान्सच्या अध्यक्ष) भारतीयांना तुम्ही प्राथमिक शिक्षणावर उच्च शिक्षणापेक्षा अधिक लक्ष द्यावे असे सांगतो तेव्हा भारताचे नागरिक डिफेन्सिव्ह होऊन "तू तुझं बघ ना भौ; आम्हाला शिकवू नको" असा विचार करतो. त्यात स्वतःच्या देशाशी तुलना करून सांगितले तर आणखीच. त्यामुळे मोदींनी पाकिस्तान्यांना शहाणपण शिकवले तर ते आपल्या एजंटांना आवरतील अशी शक्यता नाहीच.

अनु राव Mon, 26/09/2016 - 12:37

In reply to by नितिन थत्ते

गब्बु - पाकीस्तान चा हॅपीनेस इंडेक्स वर नंबर भारताच्या वर आहे हे तुला माहीती आहे का? म्हणजे खरे तर शरीफ ( एक पंतप्रधान आणि दुसरे आर्मी चिफ ) यांनी भारतीयांनाच त्यांच्या एजंटस ना आवरायचा सल्ला दिला पाहिजे.

------
हॅपीनेस इंडेक्स वर शंका घेण्याआधी हे बघ. हॅपीनेस इंडेक्स हा इकॉनॉमिक इंडेक्सस सारखा असतो. त्याला जमीनीवर फार काही अर्थ असायलालच पाहिजे असे नाही.
त्यामुळे तुला जीडीपी ग्रोथ वगैरे पॅरॅमिटर पटत असतील तर हॅपीनेस इंडेक्स पण पटवुन घ्यावाच लागेल. :-)

गब्बर सिंग Mon, 26/09/2016 - 21:00

In reply to by नितिन थत्ते

जनरली बाहेरचा माणूस (उदाहरणार्थ इंग्लंड किंवा फ्रान्सच्या अध्यक्ष) भारतीयांना तुम्ही प्राथमिक शिक्षणावर उच्च शिक्षणापेक्षा अधिक लक्ष द्यावे असे सांगतो तेव्हा भारताचे नागरिक डिफेन्सिव्ह होऊन "तू तुझं बघ ना भौ; आम्हाला शिकवू नको" असा विचार करतो. त्यात स्वतःच्या देशाशी तुलना करून सांगितले तर आणखीच. त्यामुळे मोदींनी पाकिस्तान्यांना शहाणपण शिकवले तर ते आपल्या एजंटांना आवरतील अशी शक्यता नाहीच.

कृष्णाने फक्त पाच गावं मागितली होती. अविस्थल, वरकास्थल, मकांबी, वारणावत, आणि एक कुठलेसे गाव. त्यावेळी दुर्योधनाने सुद्धा आम्हाला शहाणपणा शिकवू नकोस असेच सुनावले होते... कृष्णास. व नंतर शांति चे सारे मार्ग बंद केल्याचा आरोप दुर्योधन्/धृतराष्ट्र या दोघांवरच केला गेला होता. (पांडव जिंकलेले असल्यामुळे इतिहासकारांकडून तसे लिहून घेण्यात आले होते असंही म्हंटलं जाऊ शकतं.).

धृतराष्ट्र हा दुर्योधनावर वेसण घालण्याची कोणतीही शक्यता नव्हतीच.

अनु राव Tue, 27/09/2016 - 09:12

In reply to by गब्बर सिंग

बरोबर आहे, दुर्योधन मूर्ख नव्हता. आधी ५ गावे मागायची, २ महीन्यांनी अजुन ५ मागायची, मग पुन्हा मागायची. हे असेच कृष्ण करत रहाणार हे त्याला पक्के माहीती होते. वर त्या ५-१० गावातुन अतिरेकी पाठवुन दुर्योधनाची गावे जाळण्याचा प्लॅन असणारच. वर बायकांना नादी लावाण्याच्या पॉवर ची दुष्कीर्ती पसरली असणारच सगळीकडे. असा शेजारी कोणाला चालेल?

धृतराष्ट्र हा दुर्योधनावर वेसण घालण्याची कोणतीही शक्यता नव्हतीच.

एक व्हॅलिड कारण सांग धृतराष्ट्रनी दुर्योधनावर वेसण घालायचे.

गब्बर सिंग Tue, 27/09/2016 - 09:27

In reply to by अनु राव

वर बायकांना नादी लावाण्याच्या पॉवर ची दुष्कीर्ती पसरली असणारच सगळीकडे. असा शेजारी कोणाला चालेल?

ब्लासफेमी.

कृष्णाने ती गावं पांडवांसाठी मागितली होती. स्वतः साठी नाही. तो स्वतः तिथे जाऊन राहणार नव्हता ... स्त्रियांना नादी लावायला. आमच्या श्रद्धास्थानावर असा असत्याधारित हल्ला करणार्‍या अनु राव यांचे खाते सत्वर निस्सारित का काय ते करण्यात यावे अशी व्यवस्थापनास विनंती.

संकटात सापडलेल्या स्त्रीस मदत करणे - त्याचे काय ?

--

एक व्हॅलिड कारण सांग धृतराष्ट्रनी दुर्योधनावर वेसण घालायचे.

स्वतःच्या राज्यसभेत एका स्त्रीच्या वस्त्रहरणाचा आदेश देण्याइतकी व ते घडवून आणण्याइतकी प्राज्ञा असलेला दुर्योधन त्याला वेसण नको ? ... व त्यामुळे हस्तिनापुरची बदनामी झाली ते वेगळेच. ती धृतराष्ट्राच्या राज्यसभेत झाली होती पण दुर्योधन युवराज होता.

आता हे मान्य नसेल तर दुसरे कारण देऊ शकतो. दुसरे कारण म्हंजे - पाच गावे द्यायची व त्याच्याबदल्यात १००-वर्षांसाठीची-नो-अ‍ॅग्रेशन ट्रीटी वर सही करून मागायची (युधिष्ठिराकडून आणि कृष्णाकडून). व ते घडवून आणण्यासाठी दुर्योधनास (त्याच्या युद्धोत्सुकतेस) वेसण घालणे आवश्यक होते. व हा असा ट्रीटी घडवून आणला असता तर पाच गावांच्या मोबदल्यात इंद्रप्रस्थ जवळ ठेवता आले असते आणि हस्तिनापुर ची सुरक्षा सुद्धा राखता आली असती. नैका.

अनु राव Tue, 27/09/2016 - 09:45

In reply to by गब्बर सिंग

गब्बु पार्षल, गब्बु पार्षल. स्त्री ने काहीही मत मांडले की विरोधच करायचा इतकेच तुम्हा एमएसपींना माहीती.

माझ्या ओरीजिनल आयडीनी मी रामावर लेख लिहीला तेंव्हा तुला ब्लास्फेमी वाटली नाही. आता लगेच पुळका आला ते श्रद्धास्थानांचा.

गब्बर सिंग Tue, 27/09/2016 - 09:55

In reply to by अनु राव

स्त्री ने काहीही मत मांडले की विरोधच करायचा इतकेच तुम्हा एमएसपींना माहीती.

एखादी स्त्री असं म्हणाली की - गब्बर हा खलपुरुष नाही - तर मी त्यास विरोध का करेन ?

--

माझ्या ओरीजिनल आयडीनी मी रामावर लेख लिहीला तेंव्हा तुला ब्लास्फेमी वाटली नाही. आता लगेच पुळका आला ते श्रद्धास्थानांचा.

Unwarranted Assumption.

राम हे आमचे श्रद्धास्थान आहे हे मागेच मी सांगितलेले आहे तुला.

व त्यावेळी उलट आम्ही स्त्रियांचे आर्ग्युमेंट ष्ट्राँग आहे (सीतेच्या बाजूचे फेमिनिष्ट आर्ग्युमेंट) असं म्हणून तुमचे आर्ग्युमेंट मान्य केले होते.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 25/09/2016 - 01:31

सूचना - कमकुवत हृदय बाळगणाऱ्या अर्थशास्त्राच्या झापडबंद भक्तांनी कृपया हा व्हिडीओ बघू नये.

तोक्यो ऑलिंपिकची पदकं वापरलेल्या स्मार्टफोनमधून बनवणार आहेत.
https://www.facebook.com/scroll.in/videos/1143120439104168/