Skip to main content

मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १११

Questions issues queries problems

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

Rajesh188 Fri, 07/10/2022 - 14:41

जगभरात असे अनेक प्रसंग आता घडायला लागले आहेत आणि ते जगातील शहरात.
शाळेत जिथे लहान मूल असतात,किंवा बाकी अशा ठिकाणावर जिथे लोक एकत्र येतात.
तिथे गोळीबार होत आहे.
अशा लोकांना ,लहान मुलांना ठार मारले जात आहे त्या लोकांची काही दुष्मनी किंवा संबंध गोळीबार करणाऱ्या व्यक्ती शी नाही.
मीडिया आणि जगातील अधिकारात असलेल्या संस्था.
फक्त एक शब्द वापरून त्या प्रसंगाचे गंभीर पना कमी करत आहेत
माथेफिरू व्यक्ती नी केलेला गोळीबार.

पण एका वाक्यात त्याचे वर्णन करून दिशाभूल केली जात आहे.
प्रचंड शहरीकरण,संपत्ती ची फक्त भ्रम निर्माण करणारी व्याख्या,
चलनी नोटा म्हणजे कागद किंवा धातू म्हणजे सोने ह्यांना संपत्ती समजणे.
आणि त्या मागे धावणे
शहरीकरण ,भकास ग्रामीण भाग.
नोकरीची खात्री नाही.
लोकात संवाद नाही.
फक्त गर्दी आहे पण त्या गर्दीत एक जिनसी पना नाही.
त्या मुळे शहरात राहणाऱ्या लोकात एकाकी पणाची भावना आहे आणि माणसं,गर्दी हेच दुश्मन आहेत.
अशी वाढत जाणारी लोकं मध्ये वृत्ती.ही वाढत आहे
लहान मुलांना काही कारण नसताना ठार marle जात आहे.
खूप गंभीर प्रश्न आहे.
चर्चा होवून त्या वर उपाय करायला सत्ता धारी ,समजतील उच्च स्तरावर असणारे,जगाचे प्लॅन करणारे का भित आहेत चर्चेला.

चंद्रावर जा आणि तिथेच रहा .
अंबानी पेक्षा जास्त पैसे तुमच्या account मध्ये टाकू .
कोण तयार होईल चंद्रावर atm नाही.
बाकी काहीच नाही.
ती येणारी संपत्ती (नोटा आणि सोने कुत्र खात नाही)काही कामाची नाही.
पाहिले तर संपत्ती म्हणजे काय?
ह्याची खरी व्याख्या कोणी तरी ठरवावी.
एकाकी पना गर्दीत येणे ही खूप गंभीर समस्या आहे हा प्रश्न मला पडतो जगाला का पडत नाही.
आज पूर्ण जग निरोगी,पूर्ण जगात राहणाऱ्या लोकांना अन्न,निवारा,उपचार मिळणे हेच गरजेचे आहे तीच संपत्ती आहे.
Abjjo रुपयाचे कागद म्हणजे संपत्ती नक्कीच नाही.

Rajesh188 Fri, 07/10/2022 - 15:21

इंडोेशियातील फूट बॉल मॅच मध्ये हिंसाचार होवून शेकडो लोक मेली.

मॅच देशांतर्गत च होती एकच देशातील दोन टीम होत्या.
इतका कसला द्वेष.
पण जगा नी ह्या पण गंभीर घटनेची दखल घेतली नाही.
असे का घडले,देश बांधव मध्येच इतका द्वेष का निर्माण झाला.
भारतात तरी ह्या वर सखोल चर्चा मीडिया मध्ये झाली नाही.
आणि जगात पण झाली नसणार.
अशा विषयावर चर्चा करण्यास जगाला का भीती वाटत आहे.
वर्चस्व गमावले जाईल ही भीती काही लोकांना आहे का?

Rajesh188 Mon, 17/10/2022 - 23:46

पेटंट कायदे लोकांनी उठव करून च उघडुन लावले पाहिजेत
आधुनिक शोषण गोड बोलून चालू आहे.
पारंपरिक आहार सोडून बाकी काहीच आहारात घेवू
नका.
पेटंट कायदा म्हणजे लूट करण्याची कायदेशीर परवानगी.
नफा किती कामवावा त्याला काही मर्यादा हव्यात

विजुभाऊ Thu, 20/10/2022 - 11:09

In reply to by Rajesh188

कोणतेही संशोधन करण्यासाठी बुद्धी ,लागणारा वेळ कष्ट साधने यां वर कोण्याही सोम्यागोम्याने डल्ला मारून नये.. व योग्य लोकांना संस्थेला मोबदला मिळावा म्हणून , त्यातून पुढील संशोधनासाठी निधी उपलब्ध होतो यासाठी पेटंट असते.
मायक्रोसोफ्ट ला त्यांच्या बुद्धीचे पैसे त्यांचे सॉफ्टवेअर ( सॉफ्टवेअर ची नवी प्रत तयार करण्यासाठी नवे काहीच करावे लागत नाही तरीही) लोकानी विकत घेतल्यावर मिळतात.
उद्या तुम्ही म्हणाल की मायक्रोसॉफ्ट ने ते फुकट द्यावे.

Rajesh188 Thu, 20/10/2022 - 13:04

In reply to by विजुभाऊ

फक्त जीवन आवश्यक वस्तू ना पेटंट कायद्यात सुट असावी नाही तर किंमती सरकार नी नियंत्रित कराव्यात.

औषध,मेडिकल उपकरण, बीज, इत्यादी.
अणू बोंब बनवण्याचे एकच तंत्र आहे .
त्याच पेटंट मिळण्याची कोणी वाट बघीतली नाही.
ज्याला शक्य आहे त्या देशाने अण्वस्त्र बनवली पण आणि तंत्र विकले पण.
देश हीत साठी जागतिक कायदे कधी नाकारावे लागतात.
तेवढी हिम्मत ठेवावी च लागते.

Rajesh188 Wed, 19/10/2022 - 14:23

सुपर कॉम्प्युटर, प्रगत कृत्रिम बुध्दी मत्ता.
विविध सुविधा.
असून पण आपण रोग मुक्त मानव जात निर्माण करू शकलो नाही.
काय कारणे असावी .
मार्ग चुकीचा आपण निवडला आहे का?
असे प्रश्न मनात येत.
काल की परवाच एक बातमी वाचली.
बोस्टन मध्ये संशोधक लोकांनी हायब्रीड covid व्हायरस लॅब मध्ये तयार केला.
त्या व्हायरस मुळे १०० पैकी ८० संसर्ग ग्रस्त च मृत्यू होवू शकतो.
आजार हा उद्योग झाला आहे अशी शंका होतीच.
त्या मुळे आजार निर्माण करणे आणि त्या नंतर औषध ,लस निर्माण करून पैसा कमावणे .
हा उद्देश तर नाही ना?
असा प्रश्न पडतो.
वुहान व्हायरस नक्की नैसर्गिक आहे का?
हे अजून पण स्पष्ट नाही.
चीन इतका panic का होतो covid बाबतीत ह्या मध्येच त्याचे उत्तर आहे.

पुंबा Thu, 20/10/2022 - 03:09

डॉ महालनोबिस ज्यांनी ओआरटी या सोप्या उपचारप्रणालीचा प्रचार आणि संशोधन वापरुन लाखो बालकांचे कॉलरा/डायरिया सारख्या रोगांपासुन संरक्षण केले त्यांच्यावरील हा उत्तम लेख.

https://indianexpress.com/article/opinion/columns/dilip-mahalanabis-ors…

Rajesh188 Thu, 10/11/2022 - 13:26

पृथ्वी चा surface area ५१. कोटी something' वर्ग किलोमीटर आहे ...
जगाची लोकसंख्या ८०० कोटी जवळ पास आहे.
१ वर्ग किलो मीटर म्हणजे २४७ aicre.

खूप जमीन आहे राखीव जंगल ठेवून ,वाळवंट सोडून पण पाच एकर प्रतेक व्यक्ती ल जमीन उपलब्ध आहे
पण मानवी लोकसंख्या जागतिक २०० कोटी च्या वर नसावी....
फेस बुक चे जागतिक कर्मचारी ८० हजार आहेत ..आणि उलाढाल किती तरी मोठी.
८० हजार लोक तर भारतात डिस्ट्रिक्ट असणाऱ्या शहरात फूट पथ वर व्यवसाय करून पोट भरतात.

मोठी उलाढाल आणि रोजगार कमी अशा कंपन्या सक्ती नी बंद करणे गरजेचे आहे.
शोषण करण्यासाठी कोणालाच परवानगी नको..
मानवाने सरळ आता u टर्न घेणे गरजेचे आहे...
नाही तर विनाश अटळ आहे

Rajesh188 Thu, 10/11/2022 - 13:32

रोजगार निर्मिती हा एकमेव अट ठेवून कंपन्या ना सुविधा द्याव्यात ....

रोजगार शून्य व्यवसाय सक्ती नी बंद करावेत.
.आधुनिकतेच्या नावाखाली जगाला गुलाम गिरी मध्ये ढकल जात आहे
हीच वेळ सावरायची आहे

Rajesh188 Thu, 10/11/2022 - 13:36

ह्यांनी एका क्षणात हजारो लोकांचे रोजगार हिरावून घेतले आहेत.
.ह्यांना व्यवसाय करण्यास पूर्ण प्रतिबंध करून नवीन व्यावसायिक लोकांना संधी द्यावी.

पुंबा Sat, 12/11/2022 - 11:51

लालूंच्या दोन्ही किडण्या बाद झाल्याने त्यांच्या कन्येने त्यांना किडणी देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतः लालू ह्याला आजिबात तयार नव्हते मात्र रोहिणी ह्या त्यांच्या कन्येने आजिबात न ऐकता हा कठीण निर्णय घेतला.
लालू आदर्श राजकारणी नक्कीच नाहीत पण दोन गोष्टींमुळे त्यांचे वेगळेपण उठून दिसते.
१. तेजस्वीने नववी झाल्यानंतर शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. शाळेत डोके चालत नव्हते हेच मुख्य कारण. बिहारच्या शाळांत चालणारे कॉपी वगैरे प्रकार आपल्याला माहितच आहेत. प्रत्यक्षात वाट्टेल ते करून त्याचे शिक्षण कसेबसे पूर्ण करवणे त्यांना अशक्य नव्हते. अंतुले वगैरे प्रकरणे आपल्याला माहित आहेतच. मात्र तसे काही न करता मुलाच्या इच्छेचा मान राखून त्यांनी तेजस्वीला मनासारखे वागू दिले.
२. लालूसारख्या माणसाला किडणीदाता मिळवणे(अधिकृत किंवा अनधिकृत मार्गाने) अशक्य नव्हते. श्रीमंत मंडळी किडण्या, लिव्हरं वगैरे कशी मिळवतात हे मोठ्या भारतीय आरोग्यव्यवस्थेतलं मोठं ओपन सिक्रेट आहे. तसे न करता स्वतःच्या कन्येची किडणी घ्यायचा निर्णय त्यांनी तिच्या प्रेमापोटी घेतला.

'न'वी बाजू Sat, 12/11/2022 - 16:42

In reply to by पुंबा

तसे न करता स्वतःच्या कन्येची किडणी घ्यायचा निर्णय त्यांनी तिच्या प्रेमापोटी घेतला.

स्वतःच्या (जैविक) परिवारातील दाता(/दात्री) असल्यास शरीर आरोपित अवयव त्यागण्याची शक्यता (तुलनेने) कमी, असा काही (साधासोपा) हिशेब यामागे असू शकेल काय? (नाही, तसा तो असल्यास त्यात काही गैर आहे, असा दावा नाही. फक्त, ‘कन्येच्या प्रेमापोटी’ वगैरे उदात्तीकरण कशापोटी, एवढाच सवाल आहे. कन्येच्या कृत्याचा नि भावनांचा अर्थात आदर आहेच.)

Rajesh188 Tue, 15/11/2022 - 14:15

सर्व सामान्य ,कायद्यांनी सामान्य जीवन जगणारे, निरपराध,कमजोर, विविध वर्गासाठी त्यांचे रक्षण
होण्यासाठी जे कायदे बनवले आहेत.
त्याचा उपयोग ( खरे तर दुरुपयोग) .
त्या त्या घटकातील luchhe,लपंगे,गुन्हेगारी वृत्तीची लोक च स्वतःच्या स्वार्थ साठी करत आहेत.
खरे गरजू सामान्य लोकांना ह्या कायद्याने काहीच संरक्षण मिळत नाही.

दुरुपयोग थांबवणे ह्या साठी विशेष तरतुदी प्रतेक कायद्यात असणे खूप गरजेचे आहे.
पण विचारपूर्वक हा निर्णय घेणे खुप गरजेचे.

पुंबा Sat, 19/11/2022 - 10:27

Monitoring Network (GCRMN) covering 40 years of data and over 12,000 sites, 14 percent of the world's coral died off between 2009 and 2018.
When you take the whole data range into consideration, some regions are hardly affected, others are hit even harder as our chart shows.

हे वाक्य व्याकरणदृष्ट्या योग्य आहे का?

'न'वी बाजू Sat, 19/11/2022 - 18:35

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

…संदर्भ काहीसे संदिग्ध आहेत.

(व्याकरण चूक असल्याबद्दलचा संदेह पुंबा यांना का आला असावा, याची कल्पना येऊ शकते.)

पुंबा Sun, 20/11/2022 - 01:43

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Peter runs fast, Paul runs even faster.
येथे तरतमभाव योग्य प्रकारे व्यक्त होतो कारण दोन्ही वाक्यांच्या जोडणीमध्ये whereas/ but हे उभयान्वयी अव्यय अध्याहृत आहे. त्यामुळे fast ह्या एकाच क्रियाविशेषणाला तरतमभाव लागू पडतो आणि अर्थनिष्पत्ती होते. वरील वाक्यात मात्र पहिल्या वाक्यात व दुसऱ्या वाक्यात विरोधी अर्थाचे क्रियाविशेषण वापरून विरोध साधायचा प्रयत्न केला आहे जे चुकीचे वाटते.
India Batted poorly, Englands batting was even smarter.
चुकीचे वाटते ना?

'न'वी बाजू Sat, 19/11/2022 - 18:49

In reply to by पुंबा

व्याकरणदृष्ट्या वाक्य चुकीचे नसावे, परंतु वाक्यरचना clumsy आहे, एवढे निश्चित!

‘others are hit even harder’ हे ‘some regions are hardly affected’च्या संदर्भात घेतले, तर वाक्य व्याकरणदृष्ट्या निखालस चुकीचे वाटू शकते. मात्र, तसे ते न घेता, अगोदरच्या वाक्याच्या संदर्भात (‘According to a report by the Global Coral Reef
Monitoring Network (GCRMN) covering 40 years of data and over 12,000 sites, 14 percent of the world's coral died off between 2009 and 2018.’) घेतले असता योग्य ती अर्थनिष्पत्ती होते, तथा वाक्य व्याकरणदृष्ट्या चुकीचे नाही, हेही लक्षात येते.

पुंबा Sun, 20/11/2022 - 01:31

In reply to by 'न'वी बाजू

होय. पार्सिंगचाच इश्यु वाटतोय.
दुसरे वाक्य जे , ने जोडले आहे त्यातील even harder मुळे गोंधळ होतोय. hardly चा रूढ अर्थ rarely जर अपेक्षीत असेल तर even harder ला काही अर्थ राहत नाही. कारण पहिल्या वाक्यात some regions are hardly affected म्हटले आहे.

Rajesh188 Mon, 28/11/2022 - 22:35

जगातील सर्वात महाग औषधाला परवानगी मिळाली आहे .
एका डोस ची किंमत 35 करोड आहे..
ह्यांचे रक्त गोठत नाही त्या साठी हे औषध आहे.
आणि दुसरी बातमी लोक आपल्या प्रिय जणांची मृत शरीर चे जतन करत आहेत पुढे मेलेला माणूस जिवंत करण्याचा शोध लागला तर त्यांना जिवंत करता येईल .
त्याची किंमत पण करोडो रुपये आहे.
आपले खरे आणि साधे संशोधक आईन्स्टाईन, किंवा विजेचा शोध लावणारे,इंजिन चा शोध लावणारे ,etc ह्यांनी सर्व सामान्य लोकांना विज्ञाना चा फायदा करून दिला पण येथून पुढे तंत्र ज्ञान, रोगावरचे उपचार ,बाकी फायदे फक्त श्रीमंत लोकासाठीच असतील काय.?

Rajesh188 Tue, 29/11/2022 - 13:24

महामहीम राष्ट्रपती महोदया.

ह्यांनी खरी स्थिती मांडली आहे.
गरीब ,असहाय, ज्यांना कोणताच आधार नाही अशी लोक तुरुंगात खितपत पडतात.
कारण वकील देण्यासाठी त्यांच्या कडे पैसा नसतो.
जामीन देण्यासाठी त्यांचा कोणी नसतो.
दोन महिने पण शिक्षा होणार नाही अशा कलम खाली आरोप असणारे पण दहा वीस वर्ष तुरुंगात असतात.
आणि न्याय व्यवस्था आंधळी होवून त्याच्या कडे दुर्लक्ष करते.
गुन्हेगार,लबाड,खुनी, भ्रष्ट लोक मात्र लगेच जामीन वर बाहेर येतात.
कारण लाखो रुपये फीस घेवून खऱ्या चे खोटे करणारे वकील.
लाखो रुपये लाच घेवून गुन्हेगार ची साथ देणारे प्रशासन .
पण न्यायालय चे काम आहे विवेक बुध्दी चा वापर करणे .
कायद्यानेच न्याय दिला पाहिजे असे बंधन नायायालय वर नाही त्यांना सद्सद्ववेक बुध्दी वापरण्याचे पूर्ण स्वतंत्र आहे

वाचाळ्वीर Mon, 02/01/2023 - 17:28

In reply to by Rajesh188

गेल्या काही दिवसांत अनेक WhatsApp पोस्ट आल्या आहेत. त्यातली नोंद घेण्य़ाजेगी म्हणजे करोडो केसेस अडकल्या आहेत तरी न्यायालये भरपूर सुट्या घेतात. हे थांबवले पाहिजे.

या केसेस मधे काहीतरी वर्गीकरण केले पाहिजे. माझ्या मते ५०% केसेस तरी एकतर कालबाह्य झाल्या असाव्यात किंवा कालबाह्य कायद्याच्या अंतर्गत दाखल झाल्या असाव्या.
काही केसेस तर केवळ " अमक्याला धडा शिकवणे" या उद्देशाने दाखल झाल्या असतात.

अश्या केसेस तात्काळ निकाली काढता येतील.

पाश्चात्य देशांत जर अपील करायचे असेल तर अपीलात केस चालवण्य़ाचा खर्च द्यावा लागतो. आपल्याकडेही असे काही चालु करता येईल.
पुढची तारीख घेण्य़ासाठी मोठी फ़ी घेण्यात यावी जेणेकरुन प्रमाण कमी होइल.

अस्वल Thu, 01/12/2022 - 01:29

मराठीत घोस्टरायटिंग होतच असणार -
प्रश्न असा आहे की कुणाला घोस्टरायटिंग (भूतलिखित??) पुस्तकांची नावं माहिती आहेत का?
मुळात एखाद्या माणसाने असं पुस्तक प्रसिद्ध केलं तर त्यात त्या घोस्टरायटरचं नाव असेल का? (नैतिकता वगैरे सोडून द्या.)
मला कुतूहल अशासाठी आहे की -
समजा उद्या कोणी नव्या माणसाने एक पुस्तक लिहिलं आणि मला ते चिकार आवडलं
तर ते घोस्टरायटिंग करून लिहिलेलं नाही हे कशावरून ?

'न'वी बाजू Wed, 07/12/2022 - 03:50

In reply to by अस्वल

मराठीत घोस्टरायटिंग होतच असणार -

मला तर अशी जबरदस्त शंका आहे, की येथे 'राजेश१८८' म्हणून ज्या आयडीचे (मराठीसदृश भाषेतले) प्रतिसाद असतात, तो घोस्टरायटिंगचा प्रकार असावा. हे काम एका आयडीचे खरे, परंतु एका मनुष्याचे (if you can categorize that entity as human, that is) नसून एखाद्या सिंडिकेटचे असावे, असा संशय येऊ लागला आहे.

(कदाचित, 'ऐसी'च्या संपादनमंडळाचा 'राजेश१८८' हा समाईक डुप्लिकेट आयडी असून ते आळीपाळीने/आलटूनपालटून त्या आयडीने लेखन (केवळ गंमत म्हणून) करीत असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.)

समजा उद्या कोणी नव्या माणसाने एक पुस्तक लिहिलं आणि मला ते चिकार आवडलं
तर ते घोस्टरायटिंग करून लिहिलेलं नाही हे कशावरून ?

तुम्हाला राजेश१८८ या आयडीचे लेखन चिकार आवडले की काय?
(आवडण्यासारखेच असते म्हणा, त्यांचे लेखन...)

Rajesh188 Sat, 03/12/2022 - 19:50

मानवाची दुनिया.

1,) पैसा संपत्ती
३) चव आणि त्या नुसार पदार्थ खाण्याचे सुख
३) मानवावर वर च हुकूमत गाजवण्याची इच्छा
४)सेक्स आणि त्या मधून मिळणारा आनंद.
५)सुख सोयी.

अपत्य प्रेम, जात प्रेम ,धर्म प्रेम .
सोयी सुविधा ची आस .
हेच मानवी जग आहे.
आणि पूर्ण जगाचे मार्केट ह्याच भोवती फिरत असते.
अती अती आधुनिक रोबोट पण पैसे ,संपत्ती कमविण्यासाठी च उत्पादित केले जातात.
ह्या व्यतिरिक्त काहीच हेतू नसतो.
हा मानवी स्वभाव दुर्लक्षित करून आधुनिकता चे oasis माणसं ची दुनिया अस्त व्यस्त तर करणार नाही ना.
पृथ्वी राज्य करणे अशक्य आहे तर ब्रह्मांड चे स्वामी होण्याची स्वप्न माणूस का बघतो.
Corona नी लायकी दाखवली असताना पण

अस्वल Tue, 06/12/2022 - 00:58

In reply to by Rajesh188

मामा,
काही शंका (आता मनातले छोटेमोठे विचार व प्रश्न ह्या धाग्यावरच्या प्रश्नावरच शंका येतात. काय दिवस आले. इ. इ.)
१. - वरती १,) आहे त्याचा अर्थ काय?
१ नंतर एकदम ३ आहे - मग मानवाच्या दुनियेत २. का नाही?
३- ह्यामधे "पिणे" हे तुम्ही का वगळलेत? अख्ख्या मानवी दुनियेत कुणीच "पीत" नाही?
४ - काय बोलणार? इथे जिंकलत तुम्ही.
५ - पुन्हा, काय बोलणार? पर्फेक्ट.
६ ते १३४ - हे का वगळले आहेत?

उरलेल भाग मला नीट समजली नाही, पण आशय वैश्विक आहे. आणि शेवट म्हणजे लिहितालिहिता शाईपेनचं नीब अचानक सटकन तुटल्याचा फील येतो.

Rajesh188 Tue, 06/12/2022 - 13:11

प्रश्न वर च प्रश्न विचारायची वेळ येत आहे .
हे अस्वल ह्यांची कॉमेंट .
.त्या साठी लिहीत आहे.
1) इथे असणाऱ्या प्रतेक सजीव वाचे वर्तन एका बिजा मध्ये सामावले आहे.
२) प्रतेक वनस्पती चे वर्तन पण एका अगदी सूक्ष्म बिजात सामावले आहे.
३) निर्जीव आपण ज्यांना समजतो ते ग्रह तारे, दगड माती .
ह्यांचे वर्तन पण एका बिजा मध्ये च आहे फक्त आपल्याला अजून माहीत नाही.
Quantum physics जेव्हा आपल्याला पूर्ण समजेल तेव्हा च त्याचे उत्तर मिळेल.
ही झाली प्रस्तावना.
पैसे ,संपत्ती,शक्ती .
आणि ही साधन वापरून बाकी लोकांपेक्षा आपण वेगळे आहोत हे दाखवणे,.
आणि माणसावर च राज्य करणे .
मानवी स्वभाव आहे.
ते नैसर्गिक आहे त्याच्या बिजा मध्येच आहे
आज जे काही साधन दिसत आहेत,यंत्र दिसत आहेत, अगदी यंत्र मानव दिसत आहे (इथे उतार आहे)
ह्याचा एकमेव हेतू मी वेगळा आहे आणि बाकी सर्व माणसं माझी गुलाम आहे .
ही भावना त्या मागे आहे..

सत्ता गाजवण्याची खाज भागवायला माणसं जिवंत असायला हवी.
ही मूळ गरज आहे.
पण आता उतार चालू झाला आहे नशेत माणूस नष्ट होईल.
यंत्र मानव माणसाला च replace करतील.
कारण माणसाच्या गरजा सोडून त्या पेक्षा अधिक ते त्याच्या काही उपयोग चे नाही ते पण मिळवण्याचा प्रयत्न होत आहे
निसर्ग हाच सर्व श्रेष्ठ आहे उद्या चंद्र पृथ्वी वर आदळू शकतो.
कसा ?ह्या प्रश्न ल काही अर्थ नाही.
ते निसर्ग ठरवेल कसा आदळलेल ते
एका वाक्यात.
निसर्गाने दिलेल्या. बुध्दी चा वापर करून माणसाने आपल्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत.
गैर फायदा घेतला आहे.
निसर्गाने च मेंदू दिला पण माणूस ते स्वतःचे कर्तृत्व
समजत आहे.
त्याची फळं आता मिळण्याचा काळ सुरू होईल .
Y गुणसूत्र हळू हळू नष्ट होत आहे अशी बातमी आज च वाचली.
जे y गुणसूत्र पुरुष लिंग ठरवते आणि पुरुषत्व ठरवते ते नष्ट झाले तर पर्यायी व्यवस्था .
म्हणून एकच देहात reproduction करण्याची क्षमता विकसित होईल.
म्हणजे सेक्स.
आणि त्या सुखाला माणूस सर्वोच्च समजतो तेच नष्ट होणार आहे

अस्वल Tue, 06/12/2022 - 13:44

In reply to by Rajesh188

एखाद्या खजिन्याच्या पेटीची चावी मिळाल्यावर घाईघाईने ती उघडावी तर आत अजून सात पेट्या असतात. तसंच आहे.

आज जे काही साधन दिसत आहेत,यंत्र दिसत आहेत, अगदी यंत्र मानव दिसत आहे (इथे उतार आहे)

उतार म्हणजे काय?कसला उतार? कुणाला दिसत आहे?

निसर्ग हाच सर्व श्रेष्ठ आहे उद्या चंद्र पृथ्वी वर आदळू शकतो.
कसा ?ह्या प्रश्न ल काही अर्थ नाही.
ते निसर्ग ठरवेल कसा आदळलेल ते
एका वाक्यात.

असं कसं म्हणता मामा? अर्थ असलाच पाहिजे. उद्या निसर्गाने ठरवलं आणि सगळ्या पुरुषांच्या मिशीचे डावीकडचे केस गुलाबी झाले तर?

बाकी प्रतिसाद वाचतो आहे, पूर्ण झाला की आणखी प्रश्न विचारीन

Rajesh188 Tue, 06/12/2022 - 14:32

धाग्याच्या मुळ हेतू ल बाधा येईल म्हणून शेवटचा प्रतिसाद इथे
अजून सोप करून सांगतो
१)))(). सेक्स ही नैसर्गिक भावना आहे त्या मध्ये माणसाचे कर्तृत्व काही नाही.
ती नष्ट झाली तर.
कपडे,सौंदर्य प्रसाधने,पुब,बार,विविध वेब साईट, लग्न, टीव्ही कार्यक्रम,सिनेमे, .
हे जे काही उद्योग सेक्स ह्या मानवाच्या नैसर्गिक भावनेवर आधारित आहेत ते सर्व बंद होतील

२), चव.
विविध प्रकारच्या चवी माणसाला निसर्ग दत्त देणगी नी ओळखता येतात आणि त्याची आवड ही पण निसर्गाचीच देणगी आहे
ती नष्ट झाली तर
विविध मसाले,तेल,तूप, विविध हॉटेल, आणि असे अगणित उद्योग बंद होतील.
माणूस दिसेल ते खात जाईल.
३)ऐकणे.
विविध आवाज माणूस ऐकतो त्याचे विश्लेषण करतो.
त्या मध्ये काहीच आवाज त्याला आवडातात.
ही शक्ती नष्ट झाली तर

संगीत हा प्रकारचं जगातून नष्ट होईल.
ज्ञान इंद्रिय पाच च आहेत आणि मानवी विश्व त्या भोवती च आहे इथे फक्त तीन च उदाहरणे दिली आहेत.
थोडक्यात मानवी विश्व हे निसर्गाने जी शक्ती माणसाला दिली आहे तितकेच मर्यादित आहे
त्या पलीकडे मानवी विश्व नाही.

अस्वल Wed, 07/12/2022 - 01:27

In reply to by Rajesh188

जी.ए. कुलकर्ण्यांनी अशा अर्थाचं काही उधृत केलं आहे - "any fool can demand variety. I have been writing the same story over and over again".

Shallow people demand variety – but I have been writing the same story throughout my life, every time trying to cut nearer the aching nerve

तुमच्या प्रतिसादांत एक संकल्पना आहे- जी पकडायचा तुम्ही बरेचदा प्रयत्न करता - पण शेवटी कुठेतरी काहीतरी निसटून जातंच- आणि मग तुम्हाला पुन्हा प्रयत्न करावा लागतो - त्या संपूर्ण संकल्पनेला आवाक्यात आणण्याचा.
बरं, संकल्पनेचा पसाराच एवढा आहे की निळ्या देवमाशाने हात पसरले तरीही त्याला थिटेपणाची खंत वाटावी.
पण तरीही सिसिफसप्रमाणेच तुमची ही तपश्चर्या अव्याहत चालू आहे हे मी स्वत: अनुभवलं आहे.

'न'वी बाजू Wed, 07/12/2022 - 02:19

In reply to by अस्वल

पण तरीही सिसिफसप्रमाणेच तुमची ही तपश्चर्या अव्याहत चालू आहे हे मी स्वत: अनुभवलं आहे.

मला Itsy Bitsy Spiderची प्रकर्षाने आठवण झाली. काय जिद्द! काय चिकाटी!! वा!!!

बरं, संकल्पनेचा पसाराच एवढा आहे की निळ्या देवमाशाने हात पसरले तरीही त्याला थिटेपणाची खंत वाटावी.

काय रूपक (रूपकच ना?) आहे! वाहवा!!! वामहस्तप्रशंसेचा उत्कृष्ट नमुना!

(असो. दोघांचेही चालू द्या.)

megaman Wed, 07/12/2022 - 00:10

एखाद्या आयडी ने लिहिलेले काहीही वाचायला लागू नये अशी काही सोय आहे का ?
( ऐसी वर येणे कायमचे बन्द करणे सोडून )

अस्वल Wed, 07/12/2022 - 06:59

In reply to by megaman

मी admin नाही, त्यामुळे अंदाज-

ऐसी drupal वर चालतं असं वाटतं.
त्यामुळे द्रुपलात एकाने दुसऱ्याला ब्लॉक करायची सोय दिसली नाही.
Admin ब्लॉक करू शकतात, पण तो ऐसीचा स्वभाव नाही.

अबापट Wed, 07/12/2022 - 12:55

@अस्वल आणि @ न बा शेठ
बिचारे आमचे राजेशभाऊ तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात तर तुम्ही त्यांना असं काही बाही लिहीता.

हिम्मत असेल तर @विवेक पटाईत काका यांचे अधिकांश अर्थगर्भ लिखाण वाचून त्यातील माहिती/तर्क/शास्त्रीय पुरावे समजावून घेण्याचा प्रयत्न करण्याचे धैर्य दाखवा !!
समजले तर आम्हालाही समजावा.
चहा पाजीन एकेक.

'न'वी बाजू Wed, 07/12/2022 - 13:04

In reply to by अबापट

@विवेक पटाईत काका यांचे अधिकांश अर्थगर्भ लिखाण वाचून त्यातील माहिती/तर्क/शास्त्रीय पुरावे समजावून घेण्याचा प्रयत्न...

मला सकाळीसकाळी पिसाळलेला कुत्रा चावला, अशी तुमची समजूत होण्यामागचे कारण समजू शकले नाही.

(अस्वलशेठच्या वतीने अर्थातच बोलू इच्छीत नाही.)

असो चालायचेच.

विवेक पटाईत Mon, 12/12/2022 - 11:14

In reply to by 'न'वी बाजू

करोंना नंतर लेखन जवळपास बंद पडले होते. नवीन वर्षसपासून पुन्हा जोमाने लेखन करण्याचा विचार मनात येतो आहे. जे लेखन समजत नाही बहुधा ते सर्वश्रेष्ठ असते. (जवळपास कुत्रा आहे की नाही खात्री करून घ्या).

अस्वल Wed, 07/12/2022 - 15:05

In reply to by अबापट

चहाची आफर टेम्पटिंग आहे.
पटाईत काकांचे ललित धागेच मला आवडतात. पण सध्या त्यांचं रामदेव बाबांवर दिल आलंय.

Rajesh188 Wed, 07/12/2022 - 13:27

मनातील छोटे मोठे प्रश्न.
ते कोणाच्या ही मनात काही ही येवू शकतात.
कोणाला काय प्रश्न पडतील हे सांगता येत नाही.
आणि फक्त स्वतःला पटत नाही म्हणून नावडते प्रश्न विचारणारा .
बहिष्कृत करावा ही भावना येणे च .
चुकीची आहे.
ह्या धाग्यावर वाद विवाद ,प्रतिवाद करायचे च नाहीत.
ह्याचे भान ठेवणे गरजेचे आहे

Rajesh188 Wed, 07/12/2022 - 13:27

मनातील छोटे मोठे प्रश्न.
ते कोणाच्या ही मनात काही ही येवू शकतात.
कोणाला काय प्रश्न पडतील हे सांगता येत नाही.
आणि फक्त स्वतःला पटत नाही म्हणून नावडते प्रश्न विचारणारा .
बहिष्कृत करावा ही भावना येणे च .
चुकीची आहे.
ह्या धाग्यावर वाद विवाद ,प्रतिवाद करायचे च नाहीत.
ह्याचे भान ठेवणे गरजेचे आहे

Rajesh188 Wed, 07/12/2022 - 13:37

ह्या धाग्यावर कोणतेही मनात येणारे प्रश्न लिहू शकतो की नाही?

प्रश्नांवर प्रश्न विचारणे किंवा प्रश्न विचारणाऱ्या आयडी लाच टार्गेट करून त्याचे मानसिक खच्चीकरण करणे.
असे प्रकार का घडतं आहेत.

अस्वल Wed, 07/12/2022 - 15:02

In reply to by Rajesh188

1. हो
2. मला तरी तुमचे प्रश्नच कळत नाहीत म्हणून मी उपप्रश्न विचारले.
प्रश्नांना उपप्रश्न विचारू नयेत असं लिहिलं आहे का?
3. तुम्ही प्रतिक्रियेला उपप्रतिक्रिया का देत नाही? (हा उपप्रश्न आहे)

वनराज Wed, 07/12/2022 - 23:44

पुण्यात (शक्यतो बालेवाडी/बाणेर च्या जवळ) दिवाळीच्या किल्यांवर ठेवण्यासाठीचे मावळे आणि शिवाजी महाराज कुठे मिळतील? दिवाळी होऊन महिना उलटून गेला आहे तरी थोडा स्टॉक शिल्लक असेल अशी आशा आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जाऊन घ्यायचा विचार आहे. नेमका पत्ता किंवा नाव फोन नंबर वगैरे मिळाले तर उत्तम होईल. थोडं लांब असेल तरी चालेल.

Rajesh188 Sat, 10/12/2022 - 23:26

माणसाची प्राणी म्हणून काही वेगळी बाकी प्राण्यांपेक्षा उत्क्रांती झाली आहे का?
मला तरी बिलकुल झाली नाही असे वाटते.
बाकी प्राणी आणि मनुष्य ह्यांच्या मानसिकता मध्ये काही फरक नाही .
एकच निसर्गाचा नियम सर्व प्राण्यांना लागू आहे .
हे युनिव्हर्सल सत्य आहे.

'न'वी बाजू Sat, 10/12/2022 - 23:51

In reply to by Rajesh188

माणसाची प्राणी म्हणून काही वेगळी बाकी प्राण्यांपेक्षा उत्क्रांती झाली आहे का?

१. तुम्हाला अजून शेपूट आहे का? (असावी, अशी दाट शंका येते. अन्यथा, असा प्रश्न तुम्ही विचारला नसतात.)
२. बाकी, उत्क्रांतीचे म्हणाल, तर ती अशी एकदोन पिढ्यांत चटकन जाणवण्याइतकी बहुधा होत नसावी. (माझ्या आजोबांनादेखील (दुर्दैवाने) शेपूट नव्हते. पणजोबांबद्दल कल्पना नाही.)

बाकी प्राणी आणि मनुष्य ह्यांच्या मानसिकता मध्ये काही फरक नाही .

नाही हो! (मनुष्येतर) प्राणी इतकेही वाईट असतील, असे वाटत नाही. (चूभूद्याघ्या.)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 12/12/2022 - 01:17

In reply to by Rajesh188

पण अशी अपेक्षा का धरता तुम्ही? प्राणी आणि मनुष्य यांच्या मानसिकतेमध्ये फरक का असायला हवा? फरक असेल तर नक्की काय दिसेल?

Rajesh188 Mon, 12/12/2022 - 19:35

मी इथे अगोदर पण एका धाग्यावर मत व्यक्त केले होते .
मानवी विश्व हे खूप लहान आहे.
काहीच मोजक्याच घटका भोवती ते गुंभले गेलेले आहे.
चप्पल विकणारा असू किंवा आज च्या काळातील अतूच्य तंत्र .
दोघांचं हेतू एकच असतो पैसे मिळवणे .
इतके लहान मानवी विश्व आहे.

मानवी गरजा पण खूप कमी आहेत.
अन्न,पाणी,निवारा आणि आरोग्य.
.आज पर्यंत जे बदल झाले त्या मध्ये माणसाला च पर्याय निर्माण करण्याचा हेतू नव्हता.
किंवा
आरोग्य,आधुनिक तंत्र निर्माण करणे ह्याचा हेतू संपत्ती निर्माण करणे इतकाच मर्यादित नव्हतं.
म्हणून मानव सुख कारक आयुष्य जगू लागला..
दुष्परिणाम पण झालेच पण त्याचे परिणाम हवे तितके तीव्र नसल्या मुळे जाणवत नाहीत..कारण ते परिणाम मानवी विश्वातील नाहीत निसर्गाशी संबंधित आहेत..
पण येथून पुढे मानवाला च replace करण्या च्य हेतू मुळे.
जे परिणाम होतील ते लगेच दिसतील..
कारण ते मानवी विश्वातील असतील.
खूप मोठी मानवी संख्या जागतिक
अर्थ व्यवस्था मधून जशी बाहेर फेकली जाईल .
तसे उच्च तंत्र विकत घेणारे कमी होत जातील.
पूर्ण डोलारा च ज्या खांबावर उभा आहे तोच कमजोर होईल.
लोक तेव्हा घरात नाही बसणार रस्त्यावर असतील.
चीन मध्ये आता काय घडले लोकांनी बघितले आहे.
क्रूर सरकार असून पण लोक रस्त्यावर आली होती

'न'वी बाजू Tue, 13/12/2022 - 18:22

In reply to by anant_yaatree

तुम्ही luchhe, लपंगे आहात! (संदर्भ)

बाकी, अणू बोंब बनविण्याच्या एकमेव तंत्राचे आजवर कोणीच कसे पेटंट घेतले नाही (संदर्भ), हा मात्र खरोखरच विचार करण्यालायक मुद्दा आहे.

Rajesh188 Tue, 13/12/2022 - 12:53

काहीच वर्षात तंत्र ज्ञान खूप बदलेले .मानवी बुध्दी पेक्षा पण जास्त बुध्दीमान असलेली यंत्र तयार होतील.
हे खरेच आहे.
हा वेग खरेच खूप प्रचंड आहे.
पण त्या वेगाशी जुळवून घेणारी क्षमता पुढील पिढीत यावी म्हणून आपण तयारी केली आहे का?
हा प्रश्न आहेच .
अभ्यासक्रम मध्ये त्या दर्जाचे स्किल शिकवण्याची क्षमता आपल्या शिक्षण व्यवस्थेत आहे का?
तंत्र ज्ञान खूप प्रचंड वेगाने पुढे जाईल आणि खूप मोठी मानवी लोकसंख्या खूप मागे राहील.
ही शक्यता नाकारता येत नाही

'न'वी बाजू Tue, 13/12/2022 - 18:41

In reply to by Rajesh188

समजले नाही..

(तसेही, कधी समजते, म्हणा!)

Rajesh188 Wed, 14/12/2022 - 20:53

In reply to by 'न'वी बाजू

आपला अभ्यासक्रम क्रम आज च्या काळाशी सुसंगत नाही तो बदलला पाहिजे.
२) ज्यांना ह्या आधुनिक तंत्ज्ञानामुळे मुळे फटका बसेल .
उदर निर्वाह करण्याचा कोणताच मार्ग शिल्लक राहणार नाही
त्यांच्या साठी तरतूद करावी लागेल.
३) ड्रायव्हर लेस कार नी अपघात केला तर गुन्हा कोणावर दाखल करायचा आणि शिक्षा कोणाला द्यायची .
हा जसा प्रश्न आहे .
तसेच.

ऑनलाईन शॉपिंग कंपन्या,विविध बँका, आर्थिक संस्था,आणि service सेक्टर मधील,
ग्राहक तक्रार निवारण विभागातील Ai नी चुकीची माहिती दिली,तक्रार योग्य प्रकारे हाताळली नाही आणि त्या मुळे ग्राहकाचे नुकसान झाले ती केस कोणावर करायची .आणि शिक्षा कोणाला द्यायची.
कोणत्याही व्यक्ती विषयी,देशाविषयी,सरकार विषयी,धर्मा विषयी, etc .
चुकीची नाहीत chatgpt नी दिली तर अब्रू नुकसानीचा दावा कोणावर करायचा आणि नुकसान भरपाई कोणाकडून वसूल करायची.
अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत आणि पुढे जास्त होतील.
कोणत्याच देशाने माझ्या माहिती प्रमाणे योग्य तो बदल त्यांच्या कायद्यात अजून तरी केला नाही.

Rajesh188 Fri, 16/12/2022 - 13:48

मेडिकल आणि medicine क्षेत्रात नवीन शोध लागले आहेत.
विविध उपकरण रोग निदान करण्यासाठी उपलब्ध आहेत
विविध औषध कंपन्या दिवसरात्र मेहनत करून औषध निर्मित करत आहेत.
ह्या इतक्या सर्व positive गोष्टी आहेत
समाज मधील ८० टक्के तरी लोक सशक्त,निरोगी, असायला हवी होती
पण खरी स्थिती काय आहे तारुण्य च रोगांनी घेरले जात आहे
रोग ग्रस्त जनताच जास्त आहे.

हवामान अंदाज,विविध धरणे,विविध माहिती, पर्यावरण,हवामान,पृथ्वीचे हवामान ,सर्व सर्व काही आधुनिक यंत्र नी माहीत पडते .
पण स्थिती एकदम उलट आहे.
प्रचंड प्रदूषण,मानवास प्रतिकूल हवामान, पृथ्वीच्या पर्यावरण ची वाट लागत आहे.
आधुनिकतेची झलक कुठे दिसत आहे.

Etc
Etc
Etc.
खरेच आपण प्रगती च्या रस्त्यावर आहोत का?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 02/01/2023 - 23:25

In reply to by पुंबा

गॅसलायटिंग हा शब्द हल्लीच कानावर आला; अमेरिकी मालिका बघून शब्दाचा अर्थही बऱ्यापैकी समजला. मात्र शब्दाचा उगम माहीत नव्हता.

हे मीम आठवलं.
गॅसलायटिंग

Rajesh188 Sun, 01/01/2023 - 02:08

जुने वर्ष समाप्त आणि नवीन वर्ष चालू
त्याचे स्वागत कसे?
तर दारू पिवून.

३१ ल सर्रास सर्व आता भारतात दारू पित असतात.

हा कोणता प्रकार आहे स्वागत करण्याचा

वनराज Tue, 03/01/2023 - 04:41

इथे दिवाळीतल्या किल्ल्यासाठी शिवाजी आणि मावळे मिळण्याबाबत विचारले होते त्याचा स्वानुभव:
डिसेंबर मध्याला बाणेर मधल्या नर्सरीत विचारले तर ते ठेवत नाहीत म्हणून सांगितले. त्यांनी कुंभारवाड्यात विचारायला सांगितले. कुंभारवाड्यात (इंटरनेट वरून शोधून शनिवारवाड्याजवळच्या कुंभारवाड्यात सोमनाथ मटका भांडार ९८२२४१९७३१ येथे विचारले तर "आत्ता नाहीत. संपले." म्हणून उत्तर मिळाले. कुंभारवाड्यातल्या इतर एका दुकानाकडून सुद्धा असेच उत्तर मिळाले. शेवटी तुळशीबाग राम मंदिरातल्या कुंभमेळा (९८३४८४५०२१/८७८८५४१२१९) येथे मातीचा नाही पण सिरॅमिक सारख्या मटेरिअलचा (glossy ) रंगीत शिवाजी मिळाला. लहानच मिळाला (३" x ३" x ४" असेल ). सिंहासनावर बसलेला नसून, लोडाला टेकलेला (बहुधा त्याला वीरासन म्हणतात) आहे. पण छान आहे. तसेच काळेआणि चॉकलेटी एकाच रंगाचे सुद्धा होते. मावळे मात्र तेथे छान मिळाले. हे मावळे टेरा कोटा मातीचे असून त्यांना व्यवस्थित कापडाचे कपडे घातलेले आहेत. ८-९ इंचाचेअसतील. भालेवाले, नगारा वाजवणारे, तुतारी वाजवणारे, रामोशी, दुधाची कळशी घेतलेली बाई (हिरकणी?) इत्यादी मिळाले. हे मातीच्या रंगवलेल्या मावळ्यांपेक्षा बऱ्याच चांगल्या दर्जाचे दिसतात (४०० रुपये प्रत्येकी). हे कलकत्त्यावरून बनवून आणले जातात असे दुकानदार बाईंनी सांगितले.

पुंबा Wed, 04/01/2023 - 00:53

राजीव सान्यांचे भाजप व संघाच्या पूर्णतः कच्छपी जाण्यावरून मनात आलेले विचार:
१. साने पुर्वी जे लिहित, बोलत तो त्यांचा मुखवटा असावा का? म्हणजे विरोधक सत्तेवर असताना सौम्य उदारमतवादी भुमिका घेत रिलेव्हंट रहायचे. सत्तेत आले की कॉन्फिडंटली अजेंडे रेटायचे अशी मोडस ऑपरांडी?
२. अशी एका विचारसरणीला पुरती वाहून घेतलेली माणसे कॉग्निटिव्ह डिझोनन्स पासून कशी वाचत असतील?
३. भाऊ तोर्सेकर, रासा शिवाय नेहमीचे यशस्वी राकु, श्रीगुरूजी यांच्यासारख्यांच्या मेंदूचा अभ्यास केला तर हाना आरंटच्या on the origin of totalitarianism चा पुढचा भाग लिहिता येईल

बिटकॉइनजी बाळा Wed, 04/01/2023 - 16:36

In reply to by पुंबा

केवळ राजीव सानेच नव्हेत तर आधी उदारमतवादी असलेले अनेक 'विचारवंत' आणि 'कलावंत' आता थेट आणि उघड स्पष्ट उजवी भूमिका घेतात.

उदाहरणार्थ, काही वर्षांपूर्वी साक्षात चिंजं देखील ज्या समकालीन कवीच्या कवितांचे अर्थनिर्णयन करून पामरांना समजावून द्यायचे त्या ओंकार कुळकर्णी ला घ्या.
तो इतका जहाल उजवा निपजेल/ असेल असे मला तरी वाटले नव्हते.

परंतु माझ्या मते खरी गोम ही मूल्यनिष्ठेची नाहीच आहे. हे लोक अतिहुशार आहेत. माझ्यामते, या भूमिका त्यांनी मनापासून नव्हे बुद्धीने पटवून घेतल्या आहेत.

हानाशी समांतर विचार मला वेगळ्या कोनातून असा सुचतो -

शिवरायांचा बैठा पुतळा गाडीच्या डेकवर बसवणऱ्या एखाद्या सामान्य कष्टकऱ्याचा मुस्लीमद्वेष हादेखील सामान्यप्रतीचा असतो. तो अज्ञानातून, प्रभावातून आलेला भावनिक स्वरूपाचा असतो. मला हा द्वेष असा 'बनाल' वाटतो. परंतु साने, कुळकर्णी यांचे उजवे झुकलेपण हे कॅल्क्युलेटेड वाटते. प्रसंगी मूळच्या भावनेला बुद्ध्या दाबून घेतलेला स्टँड वाटतो. या उलट काही हुशार लोकांचे कधी कधी मुळातले भावनिक उजवे-झुकलेपण पुढे पुढे कॅल्क्युलेटेड होऊन अधिक व्यापकही होते. याचे उदा. म्हणजे शेफूताई. शेफुताई, रंगराजन आणि तत्सम मंडळींनी उजव्या स्पेसमध्ये प्रथम आणि दुय्यम पातळीवरचे बुद्धीजीवी वैचारिक नेतृत्त्व करणाऱ्यांत जी प्रचंड स्पेस मोकळी होती त्याचा पुरेपूर फायदा उठवलेला आहे. म्हणजे कित्येक वर्षे रामचंद्र गुहा वर्सेस फार कुणी नाही> असंच चाललेलं.

उदा. तोरसेकर-शेफुताई-रंगराजन हे एका पातळीवरचे. त्यांच्याहून अधिक खोल, जटील डेन्स वैचरिक नेतृत्व करणारे/ किंवा तशी क्षमता असणारे साने हे जरा त्याहून वरच्या पातळीवरचे.

असे का याचे उत्तर अर्थातच लाँग टर्म हितसंबंधांत गुंतलेले असते. हे केवळ वैचारिक परीघातच नव्हे तर मेडिया/मनोरंजन क्षेत्रातही ही पोकळी खूप मोठी होती.

उदा. मराठी/हिंदी चित्रपटसृष्टीत ठळक हिंदू लॉबी उभी करणे. यामागे तर स्पष्ट अर्थशास्त्रीय गणितेही आहेत. ओंकार कुळकर्णी सारखी चाणाक्ष लोकं ही स्पेस का म्हणून भरून काढणार नाहीत? शिवाय आता पुढची वर्षे/दशके ही उजव्या राजकारणाची आहेत हे तर स्पष्ट होत आहे तेव्हा पुढे मागे या स्पेसमध्ये जे आता आहेत त्यांना आज उद्या खूप सवलती वगैरे मिळणार आहेतच. शेकडो सरकारी संस्था, कमिट्या, मानद पदे, महामंडळे इत्यादी इत्यादी. शेफुताईसारख्या अनेक लोकांना काही दिवसांनी पद्म पुरस्कार, अध्यक्षपदे, राज्यपालपदे इत्यांदी, उजव्या बाजूला तुटवडा असलेल्या अनेक जागा खुणावत असतात, दिसत असतातच.

अस्वल Thu, 05/01/2023 - 00:46

In reply to by बिटकॉइनजी बाळा

डावे विचारवंत खूप आहेत आणि त्यांच्या अभ्यासू जागेत अनेक वर्षं प्रस्थापित आहेत.
त्याउलट "उजवे विचारवंत" ही जागा भरून निघाली तर उत्तमच आहे.
इथे एक गृहितक आहे की उजव्या बाजूची काही एक समंजस वैचारिक मांडणी असू शकते.

निव्वळ हे बहिष्कृत करा आणि त्याला मारा/झोडा/जाळा ही काही वैचारिक मांडणी नव्हे. ते तर अतिजहाल डावे करतातच. त्याचे परिणाम आपल्याला ठाऊक आहेत.
कुठल्याही बाजूचे ए१ दर्जाचे विचारवंत तयार होण्याची प्रक्रिया काय असेल?
आधी पायदळ (सामान्य लोक) मग घोडदळ (शेफु, तोरसेकर आणि मंडळी) मग सेनापती (लोल, साने?) किंवा ज्याला आपण लीडरशीप म्हणतो ते लोक - अशी उलट वैचारिक मांडणी तर होणार नाही.
हे वरून खाली झिरपत जाणार आहे- जर वरच्या थरातील लोकांची जागा आक्रस्ताळ्या, थयथयाटी लोकांकडे गेली तर तेच खाली झिरपत जाईल आणि पायदळातले सैनिक त्याची अंमलबजावणी करतील.

उजवी बाजूही "खरी" आहे, हे जर प्रस्थापित झालं तर उजव्या बाजूचे लोक फार आक्रमक होणार नाहीत -(आक्रमकता हा एक बचावात्मक पावित्रा असतो,की माझं तुम्ही ऐकत नाही काय? मग घ्या हे दणके).
मग उजव्या बाजूला जागा मिळाली तर् कदाचित त्या बाजूच्या समंजस लोकांकडे नेतृत्त्व जाऊ शकतं.
लंबक उजवीकडे झुकण्याची ही सुरुवात आहे आणि काही काळ अशा आक्रमक लोकांकडे नेतृत्त्व राहील, आणि मग हळू हळू उजवा विचार भारतीय राजकारणात रूजला की तो सौम्य होत जाईल.

शेफुतोरसेकरैत्त्यादी लोकांकडून अधिक कुवतीच्या लोकांकडे जाण्याचा रस्ता सान्यांवाटे जातो - जो आणखी वरच्या पातळीच्या विचारवंतांना वाट मोकळी करून देईल अशी आशा आहे.

अबापट Thu, 05/01/2023 - 06:10

In reply to by अस्वल

साने ना कधी उदारमतवादी होते ना कधी इतर कुणी.
ते फक्त स्ववादी होते, आहेत एवढेच, हे नक्की सांगतो.
अध्यात्माच्या लायनीत त्यांनी प्रसिद्धी आणि पैसा खोऱ्याने ओढला असता वगैरे.(या इसमाबद्दल माझी मते इथे लिहीत नाही, तीव्र आहेत)

अस्वलराव तुम्हाला हा इसम आदरणीय भाऊ व आदरणीय शेफालिजी यांच्याहून वरच्या फळीचा का वाटतो आहे ?

अस्वल Thu, 05/01/2023 - 06:36

In reply to by अबापट

चुकून :)
मी सान्यांचा ब्लॉग मागे वाचलेला आणि मला ते निहायती "भाषाचतुर" वाटले - त्यात काही संकल्पना त्यांनी खुबीने पेरल्या होत्या वगैरे.
(बहुधा त्यांचाच कुठलासा एक लेखंड (खंडप्राय लेख) ऐसीवर मागे वाचून मी डोळे मिटले होते.)

साने शेफुतोरसेकरीत्यादींपेक्षा एक स्टेप वर आहेत कारण त्यांचे विचार ते अधिक चांगले प्याकेज करू शकतात.

shantadurga Fri, 06/01/2023 - 16:56

In reply to by अबापट

दोनेक वर्षांपूर्वी उत्तरप्रदेश मध्ये घडलेल्या एका गुन्ह्या संदर्भात लिहिताना ह्या माणसाने बलात्कार वगैरे सारख्या घटना कमी होत चालल्या आहेत अशी अत्यंत असंवेदनशील आणि भकेल पोस्ट टाकली होती. तेव्हाच ह्या बाबाची पातळी समजली. योगी आणि मोदीशाचं समर्थन करण्यासाठी कोणत्याही थराला जातो हा माणूस.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 05/01/2023 - 06:32

In reply to by अस्वल

विचारवंत ह्या शब्दाचा अर्थ इथे शब्दशः लावू नये. जे कुणी काही मांडणी करतात त्यांना विचारवंत म्हणून टाकू.

उपरोल्लेखित विचारवंतांमध्ये बहुतेकदा एक समान धागा दिसतो. आपल्याला समजलेलं तेच काय ते सत्य आहे, इतर काही, पर्यायी मांडणी असू शकते आणि तीही तितकीच वैध असू शकते, याची फार जाणीव नसते. जोवर अशी मंडळी सत्ताधारी नसतात तोवर काय फरक पडतो! आता तसं नाहीये. टिकली लावलीच पाहिजे; आणि तोकडे कपडे घालून मुंबईत फिरता येणार नाही अशा धमक्या देणं इथपासून गोमांस असण्याच्या संशयामुळे खून करणं आणि बलात्काऱ्यांचा जाहीर सत्कार करणं इथपर्यंत हे प्रकार चालतात. सदर विचारवंत यांतल्या कुठल्याही प्रकारांचा निषेधही करताना दिसत नाही. एरवी मात्र दिवसाला निदान पाच-पन्नास फेसबुक पोस्टी, टि्वटं लिहिल्याशिवाय ह्या लोकांची संध्याकाळ होत नाही.

पोकळी भरून काढायची तर ह्या बहुप्रसवा, लोकप्रिय लोकांना किमान भीषण हिंसेविरोधात ब्र काढावा लागेल.

अस्वल Fri, 06/01/2023 - 09:08

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नक्कीच. सदर लोक माझ्यामते विचारवंत वगैरे अजिबातच नाहीत - अर्थात शब्दस्वस्ताईत सगळेच खपून जातात.
सोयिस्कर भूमिका घेतलेले जाहिरातींचे बिलबोर्ड असल्याने अर्थात ते चकार शब्द काढणार नाहीत.

सो.मिचा अख्खा गेमच जास्तीत जास्त लोकांना खेचण्यासाठी बनवलेला असल्याने अशा प्लॅट्फॉर्मचा वापर करून टोकाची भडक मतंच जास्त पसरत
जाणार तेव्हा सो,मिवर असलेल्या हया वाचारवंतांना सोडून देऊ.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/01/2023 - 02:52

In reply to by अस्वल

नका हो, असं म्हणू नका.

काही महिन्यांपूर्वी एका जुन्या (इंटरनेटपूर्व) मित्रानं विकले न गेलेले विचारवंत म्हणून भाऊ तोरसेकरांचा ब्लॉग मला पाठवला होता. सुदैवानं हे संभाषण फेसबुकवरच झालं; मी ह्यँ ह्यँ ह्यँ करून हसले होते हे त्याला समजलं नव्हतं (नसावं).

सोमिबाहेर काय चालतं कोण जाणे! उदाहरणार्थ, विद्यापीठांमध्ये सुमार उजव्यांच्या नेमणुका वगैरे; आणि हे लोक कसे वागतात हे मला अमेरिकी ऐटीत काम करून समजणार नाही.

सोमिवर काय दिसतं ते अमेरिकी उजव्यांपेक्षा निराळं नाही. सत्ता असली तरी व्हिक्टिम काँप्लेक्स जात नाही. उदाहरणार्थ, अमेरिकेत गर्भपाताच्या हक्कावर वरवंटा फिरवून झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाचे सॅम अलिटो आणि क्लॅरेन्स थॉमस जी काही रडारड करतात तीच भारतीय उजव्यांमध्ये दिसते. आपण काय वाट्टेल ते केलं तरी संपूर्ण समाज आपल्या बाजूनं उभा राहणार नाही; याची जाणीवच या लोकांना नाही. संपूर्ण समाज एखाद्या व्यक्तीच्या मागे उभा राहायचा तर कुणी शिवाजीच जन्माला यावा लागतो आणि लोकांना एकत्र आणण्याची जबाबदारी पार पाडावी लागते, याची जाणीव ह्या लोकांना नाही. त्यामुळे भारतात 'मोदीजींना कसे हे कर्मदळिद्री डावे* नावं ठेवतात' म्हणून रडारड चालते; अमेरिकेत 'अमेरिकी / कौटुंबिक मूल्यांचा ऱ्हास' म्हणून रडारड चालते.

*वास्तविक मी काय प्रकारची नोकरी करते, कुठे करते, वगैरे बघितलं तर डावे लोक मला त्यांच्या वाऱ्यालाही उभे करणार नाहीत! अमेरिकी डावेसुद्धा नाहीत.

सुनील Thu, 05/01/2023 - 09:05

In reply to by पुंबा

आज जगभरातील तज्ञांमध्ये आर्यन मायग्रेशन थियरी (AMT) अधिक मान्यता मिळवून आहे. याच्या उलट मांडणी करणारी ऑऊट ऑफ इंडिया थियरी (OIT) मात्र भारतातीलच एका विशिष्ट वर्गापुरतीच मान्य दिसते.

याचे प्रमुख कारण म्हणजे, OIT चे तज्ञ आपले म्हणणे आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यापेक्षा सोशल मिडियावर लाईक्स आणि फॉलोअर मिळवण्यामागे लागले आहेत. आंतरराष्टीय स्तरावर न जाण्यामागे त्या थियरीतच काही कच्चे दुवे आहेत की त्याची नीटशी मांडणी करण्यात हे तज्ञ कमी पडतात, याची कल्पना नाही.

Rajesh188 Thu, 05/01/2023 - 14:22

मला जास्त काही कळत नाही .
पण लिखाण करणे,भूमिका मांडणे हा एक व्यवसाय आहे .
खूप लोक व्यवसाय म्हणूनच करतात.
उजव्या कडून जास्त व्यवसाय मिळाला की त्यांची बाजू मांडताना, डाव्या कडून जास्त व्यवसाय मिळाला की त्यांची बाजू मांडताना.
भविष्याचा पण विचार करतात.
हे विचारवंत हे जात करून निवृत्त कर्मचारी च असतात.
पेन्शन वैगेरे घेत असतात.
सर्व फायदे घेत असतात
आणि जोड धंदा म्हणून हा पण व्यवसाय करतात.

ह्याला अपवाद आहेत .जे तत्व पाळून असतात.

Rajesh188 Thu, 05/01/2023 - 14:22

मला जास्त काही कळत नाही .
पण लिखाण करणे,भूमिका मांडणे हा एक व्यवसाय आहे .
खूप लोक व्यवसाय म्हणूनच करतात.
उजव्या कडून जास्त व्यवसाय मिळाला की त्यांची बाजू मांडतात डाव्या कडून जास्त व्यवसाय मिळाला की त्यांची बाजू मांडतात
भविष्याचा पण विचार करतात.
हे विचारवंत हे जास्त करून निवृत्त कर्मचारी च असतात.
पेन्शन वैगेरे घेत असतात.
सर्व फायदे घेत असतात
आणि जोड धंदा म्हणून हा पण व्यवसाय करतात.

ह्याला अपवाद आहेत .जे तत्व पाळून असतात.
खूप कमी अशी लोक असतात.
अगदीच मोजकी.

लोक मान्य का करत नाहीत तेच कळत नाही.

संशोधन पासून सर्व असे एक पण क्षेत्र नाही तिथे प्रायोजक केलेली लोक नाहीत.
हीच लोक जास्त आहेत.
तत्व, प्रामाणिक पना असणारी लोक खूप दुर्मिळ आहेत

स्त्री मुक्ती वर भाषण देवून समाज सुधारण्यास वसा घेतलेल्या स्त्रिया स्वतःच्या घरात तशा राहत नाहीत.
व्यवसाय वेगळा आणि पर्सनल लाईफ वेगळे.
इतकी समज प्रतेकात असते

मनीषा Sat, 07/01/2023 - 14:28

विचारवंत म्हणजे साक्षेपी, तटस्थ वृत्तीने आणि मूलागामी विचार करणारा असे समजले जाते.

डावे किंवा उजवे विचारवंत कुठल्यातरी एका बाजूने विचार करतात किंवा त्यांच्या सोयीच्याच विचारांचे समर्थन करतात. म्हणजे ते पक्षपाती असतात असे समजावे काय?

वर उल्लेख झालेल्या विचारवंताचे विचार मी कधी वाचलेले अथवा ऐकलेले नाहीत.

पण हे मात्र खरे आहे की सध्या (सर्वच बाजूने) मी सांगेन तेच ऐका, मी सांगेन तेच करा --- अशी जबरदस्ती करण्याची वृत्ती फारच बोकाळली आहे.

'न'वी बाजू Sat, 07/01/2023 - 18:27

In reply to by मनीषा

विचारवंत म्हणजे साक्षेपी

चुकून ‘विचारवंत म्हणजे सीकेपी’ असे वाचले. निषेध करण्यास (सवयीने!) बोटे शिवशिवली, परंतु तेवढ्यात पुन्हा एकदा (या खेपेस नीट!) वाचल्याने भ्रमनिरास झाला.

असो चालायचेच.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/01/2023 - 02:53

In reply to by 'न'वी बाजू

इथेच तुम्ही राजेश१८८ यांची नक्कल करण्याची चांगली संधी दवडलीत!

Rajesh188 Sun, 08/01/2023 - 21:43

मी नदी, कॅनाल मध्ये पण प्रवाह विरुद्ध च पोहायचो.
20 फिट अंतर कापणे खूप मुश्किल.
तेच प्रवाह च्या दिशेने पोहलो असतो तर कित्येक किलोमीटर अंतर पार केले असतें.
आणि रेकॉर्ड,वाह ,वा हे वेगळे

Rajesh188 Sun, 08/01/2023 - 21:43

मी नदी, कॅनाल मध्ये पण प्रवाह विरुद्ध च पोहायचो.
20 फिट अंतर कापणे खूप मुश्किल.
तेच प्रवाह च्या दिशेने पोहलो असतो तर कित्येक किलोमीटर अंतर पार केले असतें.
आणि रेकॉर्ड,वाह ,वा हे वेगळे

Rajesh188 Tue, 17/01/2023 - 14:24

मानवी अस्तित्व फक्त एकच गोष्टी वर अवलंबून आहे.

.मृत्यू ची जाणिव आणि मृत्यू चे भय
हिंदू धर्मात .
पुनर्जन्म ,देवाचे अस्तित्व, आणि बाकी.
तत्व ज्ञ ््
ज्ञान हे सांगितले आहे l

त्या मृत्यू चे भय निर्माण करून माणसाची पिळवणूक कमी व्हावी.

प्राचीन काळातील हा विचार आज लागू पडतो.
भांडवल शही आणि माणसाचे शोषण .
होण्यास हा विचार अडसर आहे.
नास्तिक,पुरोगामी ह्यांनी सुपारी घेवून .
हा विचार नष्ट करण्याचं विडा उचलला आहे
आज च्य आधुनिक काळात.
मृत्यूची जाणिव आणि मृत्यू ची भीती .
ह्याला जबाबदार जीन नष्ट केला तर .
माणसाला मृत्यू हा समजणार नाही .
आणि.
सर्व आरोग्य व्यवस्था,सर्व सरकार,सर्व कायदे, पोलिस यंत्रणा, न्याय व्यवस्था सर्व अस्त्र, मृत्यू चे भय जेव्हा संपेल तेव्हा एका क्षणात है सर्वांचे महत्व नष्ट होईल.
मृत्यू तर येणार च .पण त्या भीती मुळे च .
आज ची शोषण करणारी व्यवस्था उभी आहे

Rajesh188 Tue, 17/01/2023 - 14:24

मानवी अस्तित्व फक्त एकच गोष्टी वर अवलंबून आहे.

.मृत्यू ची जाणिव आणि मृत्यू चे भय
हिंदू धर्मात .
पुनर्जन्म ,देवाचे अस्तित्व, आणि बाकी.
तत्व ज्ञ ्् ह्या साठी सांगितले आहे की मृत्यू चे भय कमी होईल..
आणि मृत्यू चे भय दाखवून शोषण होणार नाही
आणि हाच हेतू होता

त्या मृत्यू चे भय निर्माण करून माणसाची पिळवणूक कमी व्हावी.

प्राचीन काळातील हा विचार आज लागू पडतो.
भांडवल शही आणि माणसाचे शोषण .
होण्यास हा विचार अडसर आहे.
नास्तिक,पुरोगामी ह्यांनी सुपारी घेवून .
हा विचार नष्ट करण्याचं विडा उचलला आहे
आज च्य आधुनिक काळात.
मृत्यूची जाणिव आणि मृत्यू ची भीती .
ह्याला जबाबदार जीन नष्ट केला तर .
माणसाला मृत्यू हा समजणार नाही .
आणि.
सर्व आरोग्य व्यवस्था,सर्व सरकार,सर्व कायदे, पोलिस यंत्रणा, न्याय व्यवस्था सर्व अस्त्र, मृत्यू चे भय जेव्हा संपेल तेव्हा एका क्षणात है सर्वांचे महत्व नष्ट होईल.
मृत्यू तर येणार च .पण त्या भीती मुळे च .
आज ची शोषण करणारी व्यवस्था उभी आहे
ती नष्ट करण्या साठी मृत्यू चे भय आणि जाणिव नष्ट होणे गरजेचे आहे

दिगोचि Wed, 18/01/2023 - 08:01

माझ्यामते याची जगाने दाखल न घेण्याची अनेक कारणे असू शकतात. एक म्हणजे हे एका मुस्लिमबहुल देशात घडले आहे. दुसरे म्हणजे आमच्या देशात असे होणार नाही कारण आमचे पोलीस हे होण्यापूर्वीच थांबवतील हा विश्वास.

Rajesh188 Thu, 19/01/2023 - 17:06

देशातील महिला कुस्ती pattu नी कुस्ती मंडळाचे अध्यक्ष ब्रीज भूषण ह्या वर यौन शोषणाचे आरोप केले आहेत.
त्या साठी ते दिल्लीत विरोध प्रदर्शन करत आहेत.
पण .
पंतप्रधान गप्प.
गृह मंत्री गप्प
भारतीय मीडिया हवी तितकी आक्रमक नाही.
महिला संघटना ह्या वर प्रतिक्रिया पण देत नाहीत.

महिला आयोग गप्प.
महिलांवर अत्याचार हा विषय परिस्थिती नुसार आहे का.
इथे कोणी गरीब पुरुष असता , आणि तो निर्दोष जरी असता तरी .
त्याला फाशी देण्यासाठी hangama केला गेला असता.
कोणी मुस्लिम असता तर आता पर्यंत भारतीय मीडिया नी त्याला अपराधी म्हणून जाहीर पण केले असते.
महिला आयोग सक्रिय झाला असता.
भारतात न्याय व्यक्ती ची आर्थिक, ताकत ,धर्म ,जात बघून किंवा उपद्रव मूल्य बघून होतो का?

हारुन शेख Thu, 19/01/2023 - 17:45

In reply to by Rajesh188

तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. पूर्णपणे पक्षपात सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी तेजस्वी सूर्या या भाजपच्या नेत्याने केवळ चूष म्हणून विमानाचं आपत्कालीन दार उघडलं. अतिशय गंभीर प्रकार आहे हा. पण त्याला तोंडी माफीवर सोडून देण्यात आलंय. कल्पना करा या सूर्याच्या जागी एखादा मुसलमान नेता असता तर त्याच्यावर तात्काळ आतंकवादी असा शिक्का मारून त्याला कायमचे बरबाद करून टाकले असते.

अर्थात जिथे बिल्किस बानोचे बलात्कारी सहजी सुटतात, सुटल्यानंतर त्यांचा हार-तुऱ्यांनी सन्मान होतो. तिथे वेगळी अपेक्षा काय केली जाऊ शकते.

'न'वी बाजू Thu, 19/01/2023 - 18:37

In reply to by हारुन शेख

१. आपण, बायेनीचान्स, ‘वामन देशमुख’ या डुआयडीने येथे हिंदुत्ववादी प्रतिसादसुद्धा टाकीत असता काय? (नाही म्हणजे, कांगावखोर बेअरिंग उत्तम जमलेय.)

२. मुसलमान नेता (किंवा फॉर्दॅट्मॅटर कोणीही) कशाला मरायला विमानाचे आपत्कालीन दार उघडायला जाईल? त्याला कॉमनसेन्स नाही काय? काहीतरीच बोलता राव! (भाजपवाल्यांचे अर्थातच सांगता येत नाही. ‘चुकून’ पाकिस्तानच्या हद्दीत क्षेपणास्त्रे धाडणाऱ्यांकडून आणखी काय अपेक्षा करणार?)

बाकी, तुमच्या प्रतिसादातील ‘फॅक्ट्स’ चोक्कस आहेत, impeccable आहेत. (वामनरावांच्याही असतात अनेकदा.)

असो चालायचेच.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 21/01/2023 - 07:33

In reply to by 'न'वी बाजू

'न'बा, रियली! तुमच्यात समाजमाध्यमांवर काय गोंधळ सुरू असतो हे बघण्याची पद्धत नाही ते माहित्ये पण तुमच्यात बातम्या वगैरे वाचत नाहीत का?

वामन देशमुख Thu, 19/01/2023 - 19:12

In reply to by हारुन शेख

काही दिवसांपूर्वी तेजस्वी सूर्या या भाजपच्या नेत्याने केवळ चूष म्हणून विमानाचं आपत्कालीन दार उघडलं.

Tejasvi Surya didn’t open emergency door, didn’t apologise, says Tamil Nadu BJP chief Annamalai

https://www.indiatoday.in/india/story/tejasvi-surya-didnt-open-emergenc…

Rajesh188 Thu, 19/01/2023 - 21:05

प्रभावित होवून किंवा त्या विचाराच्या आहारी जावून गुन्हेगार व्यक्ती चे समर्थन करणे किंवा कोणाला आरोपी ठरवणे ही

वाळवी च देशाला गुन्हेगारी चे स्वर्ग बनवेल.

ही वृत्ती वाईटच

'न'वी बाजू Fri, 20/01/2023 - 20:17

In reply to by एक मराठी असामी

एक से एक महाभिकार आहेत हो! आवरा आता.

Rajesh188 Sun, 22/01/2023 - 00:34

हा प्रश्न मला पडतो.
कारण माझे विचार जगा पेक्षा वेगळे असतात.
एक उदाहरण.
भारता पुरतेच .
भारतातील
१%, लोक भारतातील 40% संपत्ती चे मालक आहेत.
जगात पण वेगळी स्थिती नाही.
शहरीकरण कसे चांगले हे जगतील एकुना एक सरकार आणि हुशार लोक सांगतात.
कमिशन घेवून च असले फालतू विचार ते व्यक्त करत असतील .
जगातील अनेक देश बघा .
काहीच शहरात संपत्ती एकवटली आहे.
संपत्ती म्हणजे काय .
हा अवघड प्रश्न आहे.
त्याचाच परिणाम म्हणून काहीच टक्के लोकांकडे खूप मोठी संपत्ती आहे.
कशाला हवीत शहर .?
पूर्ण देश ,राज्य ,गाव .
हा सर्व प्रदेश प्रगत का नसावा?
पण असले प्रश्न माझ्या शिवाय कोणाला पडत नाहीत.

त्या मुळे मी जगातील सर्वात मूर्ख व्यक्ती असावा असे मला वाटते
गावात असताना कॅनाल मध्ये पोहताना ना पण मी प्रवाह विरुद्ध पोहायाचो.
६० मीटर पण अंतर कापणे अवघड होते .
ते पण जमायचे नाही.
पण प्रवाह च्या दिशेने पोहणारे .
अगदी २०० ते ४०० मीटर पण पोहायचे .

तुम्ही किती अंतर पोहू शकता .
ह्या प्रश्नांवर .
मी नापास