Skip to main content

मध्यमवर्ग, कॉर्पोरेट्स आणि काँन्सन्ट्रेशन कँप : लोकसत्तामधील एक लेख

डाखाउ कॉन्सन्ट्रेशन कँपला दिलेल्या भेटीच्या निमित्ताने हिटलर, राष्ट्रवादाने भारलेली तत्कालीन जर्मन जनता, तत्कालीन 'स्युडोसेक्युलरीस्ट, समतावादी' यांना लावली जाणारी विशेषणे आणि सद्य भारतीय परिस्थिती यांचे ललित अंगाने साधर्म्य दाखवु पाहणारा श्री लोकेश शेवडे यांचा हा कालच्या लोकरंगमधील लेख

मोदींना थेट हिटलर बरोबर तुलना करण्याइतके अजुन काही घडले नसले तरी काही साम्यस्थळे रेड फ्लॅग उंचावायला योग्य वाटतात. तसेही भारतीय काय अभारतीय काय मध्यमवर्गाला एखाद्या हुकुमशहाचे असलेले आकर्षण जगाला नवे नाहीच म्हणा!

व्यवस्थापनः सदर चर्चा लांबल्याने व्यवस्थापनाच्या सोयीसाठी धागा वेगळा करत आहोत

बॅटमॅन Wed, 23/04/2014 - 11:36

In reply to by मेघना भुस्कुटे

अरुणजोशींची जी काही कल्पना असेल ती असो. कैकवेळेस त्यांच्याशी असहमती नोंदवूनही झालेली आहे.

पण मोदीराज्य जर आलेच तर स्त्रियांवर काँग्रेस राज्यात झाला त्यापेक्षा सिग्निफिकंटलि अधिक अन्याय होईल या म्हणण्याला नक्की बेस काय आहे? अल्पसंख्यांकांवर अन्याय होईल या विधानाला गोध्रा दंगलीचा आधार आहे (तोही किती ताणावा ते एक आहेच पण एक तो विदाबिंदू तरी आहेच), आदिवाशांबद्दलही काही जरासा का होईना आधार आहे. स्त्रियांबद्दल असे आरोप करायला नक्की काय जागा आहे? ते पहा आणि मग आरोप करा. तसं काही दिसलं नाही आणि नेहमीची स्टॉक कमेंटरी दिसली म्हणून जे म्हणालो ते म्हणालो. आरोप करताहात तर बर्डन ऑफ प्रूफ कुणावर आहे ते सोयीस्करपणे न पाहता वर चुका दाखवणार्‍यांची जाणीव काढायची हा सरळ रडीचा डाव आहे.

मेघना भुस्कुटे Wed, 23/04/2014 - 11:51

In reply to by बॅटमॅन

१. अदितीच्या प्रतिसादात तिनं जे लिहिलं होतं, ते उपमेदाखल होतं. मोदींच्या राजवटीत स्त्रियांवर अन्याय होईल, असं तिनं म्हटलेलं नाही. ते मी म्हटलं आहे.
२. सर्व प्रकारच्या प्रतिगामी राजवटीत पहिला अन्याय जर कुणावर होत असेल, तर तो स्त्रियांवर होतो. शिवाय तो अन्याय नाहीच, बहुमान आहे अशीही भलावण वर केली जाते, हे वारंवार घडलेलं आहे. भाजप आणि त्यातही मोदी पुरोगामी नाहीत असं माझं मत आहे.
३. मोदीबाबतः मोदीच्या पत्नीबाबत घडलेल्या घटनाक्रमातून अन्याय सिद्ध होत नसेल तांत्रिकदृष्ट्या. पण मनोवृत्ती स्पष्ट होतेच.
४. या बाबतीत काँग्रेस भाजपपेक्षा भली असं माझं मत नाही. पण त्याचा इथे संबंध काय? 'तोही पापी आहे, त्यामुळे माझं पाप नलिफाय होतं' हे तर्कट अजब आहे.

बाकी: रडीचा डावबिव... असो बापडा!

बॅटमॅन Wed, 23/04/2014 - 11:58

In reply to by मेघना भुस्कुटे

भाजप आणि मोदी हे प्रतिगामी आणि हरामखोर आहेत असे समजू. त्यांना मत द्यायची तुमची इच्छा नसेल, पण हे कारण अजब आहे इतकंच सांगतो. पाप नलिफाय होत नैये तर जो पैलू मोदीबद्दल हायलाईट केला जातो तो पैलू काँग्रेसबद्दल केला जात नै हे सांगायचं आहे. तसं तर मग भारत हा स्त्रियांसाठी रौरव नरकच आहे. कुठलीही राजवट आली तरी त्यांवर अन्यायच होतो. त्यांनी खरं तर भारतासारख्या अन्यायी देशात राहताच कामा नये असं वाटण्याइतकी भीषण परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत अन्यायाचा प्राधान्यक्रम ठरवण्याचा हा निकष रोचक वाटला, इतकंच. उपमा जरी असली तरी ती इथे अप्रस्तुत आहे. त्यामुळे बाकीची संभावना झाली, इतकेच.

दरवेळेस लिटरली अर्थ कोण घेतं आणि क्राय फाउल करतं ते पाहिलेलं आहे त्यामुळे नवल वाटलं नाही. असो. एकेश्वरी धर्मांसारखीच ही विचारसरणीही एककल्ली आहे. तस्मात चालूद्या.

मेघना भुस्कुटे Wed, 23/04/2014 - 12:02

In reply to by बॅटमॅन

कुणाला काय रोचक वाटावं, ते मी कसं ठरवणार?! तसंच कुणाला कुठली कारणं महत्त्वाची वाटावीत, हेही! असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 23/04/2014 - 18:33

In reply to by मेघना भुस्कुटे

स्त्रियांवर मुद्दाम म्हणून (गोध्रामध्ये मुस्लिमांवर झाला तसा) काही अन्याय होईल असं (मला वाटत) नाही पण सनातनी विचारसरणी बाळगणारा पक्ष, बायको लपवणारा पंतप्रधान, एका स्त्रीवर सरकारी यंत्रणा वापरून पाळत ठेवणारा मंत्री आणि त्याला पाठीशी घालणारा राज्यातला सर्वोच्च नेता हे प्रकार पाहिल्यामुळे स्त्रियांची परिस्थिती आहे त्यातून अधिक गाळात जाण्याची शक्यता वाटते. सनातनी राजवटीत स्त्रियांवर पहिला अन्याय होतो, याबद्दलही सहमती. "अन्याय नाही बहुमान आहे" याच्याशी खासच सहमत.

उदाहरणार्थ 'निर्भया' प्रकरण झाल्यावरही सरसंघचालकांनी "स्त्रिया देवी आहेत" वगैरे विधानं केली होती. त्यातही स्त्रियांना माणूस म्हणून, पुरुषांइतपतच एक व्यक्ती म्हणून जगू द्या वगैरे म्हणणारे सगळे पुरोगामी (किंवा म्हणा सूडो *.*! आमच्या आणि या बाकीच्या लोकांच्या तीर्थरूपांचे त्यात काही जात नाही) लोकच होते; सनातनी संघ "देवी" म्हणत आणि समिती "स्त्रियांनी कपडे बरे घालावेत" वगैरे म्हणत बसले होते.

१. गब्बर आणि इतर काहींच्या मते मोदी भांडवलशाहीवादी आहेत आणि अशा प्रकारच्या रचनेत स्त्रियांचा फायदा होतो. (हे फारच स्वस्त सरसकटीकरण असल्याची कल्पना आहे.) पण स्त्रियांचा फायदा आपसूक होत नाही, झालाच तरी मर्यादित प्रमाणात होतो. त्यासाठी मुद्दाम धोरणं आखून त्याची अंमलबजावणी करावी लागते.
२. हे सनातन्यांचं एक उदाहरण आहे. भाजप, मोदी आणि संघाचा थेट संबंध लावण्याचा हा प्रयत्न नाही. पण तो तसा थेट संबंध आहे याची मला कल्पना आहे. आणि सोयीसवडीनुसार तो संबंध नाकारला जातो, याचीही!

अतिअवांतर : क्र. २ ची घास तोंडात भरवणारी, फूटनोट लिहावी लागावी हे अपयश कोणाचं?

गब्बर सिंग Fri, 25/04/2014 - 06:45

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गब्बर आणि इतर काहींच्या मते मोदी भांडवलशाहीवादी आहेत आणि अशा प्रकारच्या रचनेत स्त्रियांचा फायदा होतो. (हे फारच स्वस्त सरसकटीकरण असल्याची कल्पना आहे.) पण स्त्रियांचा फायदा आपसूक होत नाही, झालाच तरी मर्यादित प्रमाणात होतो. त्यासाठी मुद्दाम धोरणं आखून त्याची अंमलबजावणी करावी लागते.

माझे जनरल मत हे आहे की ही जी धोरणं आखून अंमलबजावणी करण्याचा जो मुद्दा आहे तो एक तर फक्त चांगल्या हेतूंनी प्रेरित आहे किंवा ज्यांच्या साठी धोरणे आखली जातात त्यांनाच क्षति पोहोचवणारा आहे. आता चांगल्या हेतूंनी प्रेरित असणे हे अनिष्ट आहे असे मी म्हणत नाही. Good intentions does not mean good results - एवढेच मला म्हणायचे आहे. पण हे झाले एक जनरल स्टेटमेंट. पण कोणत्या स्पेसिफिक धोरणांबद्दल तुम्ही बोलत आहात ते समजले तर कदाचित तपशीलवार जवाब देऊ शकतो.

भांडवलशाही मधे स्त्रियांचाच काय सगळ्यांचा फायदा होतो. त्यामुळे तुमचे वाक्य कमी सरसकटीकरण करणारे आहे - असा माझा दावा आहे. कारण सगळ्यांचा फायदा होतो - हे वाक्य जास्त सरसकटीकरण करणारे आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 23/04/2014 - 18:18

In reply to by बॅटमॅन

यावरून फक्त लिहिणारे पुरुषच अभिप्रेत होते असेही विधान करता येते.

अय्या, तुला कळ्ळं नाही का गं ब्याम्या, मी तेच तर लिहलंय वर!!!!!! ;;)

(एखादं उद्गारचिन्हं कमी जास्त असेल तर चालवून घे गं बाई. अगं, अाजकाल किनई ते मोजायचं लक्षातच येत नाही.)

कुंदा गजानन फु… Thu, 24/04/2014 - 02:16

In reply to by बॅटमॅन

>> तुमचीच ब्याट, खेळा दोनवेळा. खूष?
बरें झालेंत बॅटच दिलीत तें! मॅन दिले असते तर त्यांनी त्यांचें काय केलें असतें याची कल्पना करवत नाहीं.

अस्वल Tue, 22/04/2014 - 23:28

मूळ लेखात जाणवलेले मुद्दे बघता (२०१४ भारत Vs १९३५ जर्मनी ) काही गोष्टी खूपच वेगळ्या आहेत .

१. हिट्लरचा ज्यू द्वेष उघड आणि unapologetic होता. त्याचा विस्तारवाददेखील अतिशय स्पष्टपणे मांडलेला होता. त्यामुळे १९३०-१९३९ पर्यंत जे काही आर्थिक, सामाजिक बदल नाझी पक्षातर्फे केले गेले त्याचं मूळ उद्दिष्ट अतिशय स्पष्ट होतं -
racial superiority ( वांशिक श्रेष्ठता )
expansion of German Empire to the east (जर्मन राज्यासाठी पूर्वेकडे विस्तार)

२. मत देणाऱ्यांची सामाजिक विभागणी जर्मनीत केवळ वर्ग ह्या निकषावर आधारित होती पण भारतात ती वर्ग, जात, प्रदेश अशा अनेक रूपांत विभागली आहे. त्यामुळे एकगठ्ठा मतं मिळणे हा प्रकार संभवत नाही.

३. भारतातील सद्य परिस्थितीत भाजपला सत्ता मिळाली तो RSS/VHP अशा कट्टर संघटनांना policy making पासून अधिकाधिक दूरच ठेवील. नाहीतर अप्रत्यक्षपणे भाजपला मुस्लिम मतांपासून कायमची फारकत घ्यावी लागेल, जे त्यांना परवडणारे नाही.

४. कोर्पोरेट विश्वाचा प्रभाव कुठल्याही पक्षावर तेवढाच असतो. फरक इतकाच की हिटलरने त्यांचा उपयोग विवक्षित पद्धतीने करून घेतला. आता त्याच्या उलट परिस्थिती आहे - जेव्हा जागतिकिकरणामुळे उद्योगधंदे सरकारवर अंकुश ठेवून असणारेत.

राहता राहिला मध्यमवर्ग आणि त्याचं हुकुमशाहीबाद्दलचं सुप्त आकर्षण - त्याला grass is always greener on the other side of the fence पेक्षा जास्त मूल्य नाही.

सिद्धार्थ राजहंस Wed, 23/04/2014 - 17:03

मनात विभ्रम असणारी लोकं बहुतेक करून फारच सोपा विचार करतात. बर्‍याच वेळा गोष्टी वाटतात त्यापेक्षा क्लिष्ट असतात.

समजा असे धरु कि मोदी ३००+ ने निवडुन आले तर तुमच्या मते त्यांना दंगली घडवणे सोपे जाईल. पण जे घडु शकते यात अजून क्लिष्ट राजकारण आहे.

मुळात दंगली भाजप घडवणार नाही कारण ते एक कडबोळे आहे. यासाठी एसएस सारखे दुसरे कोणीतरी हवे. तुमच्या स्किम ऑफ थिंग्स मधे बसणारे म्हणजे रास्वसं, विहिंप, बजरंग दल वगैरे धरु. यांचा युएसपी हा आहे कि हे केडर बेस्ड आहेत. या संघटनांमधे लोकांना व्यवस्थित बाळकडु पाजले जाते व सगळी माणसे सारखाच विचार करतील हे पाहिले जाते(नक्षलवाद किंवा जेहाद टाईप्स) यात दुसर्‍या विचारांना थारा नसतो.

पण या संघटनांना ताब्यात ठेवण्याचं काम मोदी पहिल्या दिवसापासुन करतील, खरतर करत आहेत. कारण त्यांना कधीच हे नाही चालणार कि नागपूर मधे बसलेले संघाचे लोक सरकार चालवत आहेत. त्यामुळे मोदींच्या सत्ताकारणात यांना कमी स्थान असेल. जेव्हा यांना खुप मोठे बहुमत मिळेल तेव्हा सरकार पाडण्याच्या कुरबुरी ह्या भाजपा अंतर्गत होतील. जसे पुर्वी कॉग्रेसच्या बाबतीत व्हायचे तसे. म्हणुन तर मोदी विहींप+संघाचे वाकडे आहे.
(अडवाणींचा पण तो जिना कसे भारी मुद्दा हा संघाला अंगावर घेउन त्यांची जागा दाखवण्यासाठीच होता)

गुजरात २००७ ची निवडणुक मोदींनी संघाच्या पाठींब्याच्या शिवाय लढली होती.
एव्हडेच नव्हे तर अशोक सिंघल मोदींना 'गझनी' म्हणाले होते कारण त्यांनी मधे गुजरातेत काही मंदीरे पाडली होती. तोगडिया ही आत्ता जी विधाने करत आहेत ती त्यांना अडचणीत आणण्यासाठीच करत आहे. मोदी आणि तोगडिया यांचे मेजर वाकडे आहे.

परत मेडीयाचा प्रभाव बघता अगदी दंगली करु म्हणलं तरी मोदी करणार नाहीत कारण मोदीच्या करकिर्दीत दंगल झाली तर ती 'स्पेशल' दंगल असेल साधीवाली नसेल. सत्ता वाचवायला तरी ते हे करतीलच.

पुढे जाउन असे म्हणले कि संघाने मोदींना जिंकुन दिले आहे आता त्यांना परतफेड हवी आहे जी मोदी देतील. तर कॉर्पोरेटसनी पण त्यांना जिंकुन दिलय आणि या दोघांना खुश करण एकाच वेळी शक्य नाही. असे अजून खुप सिनारिओ निघतील. त्यामुळे बहुमत मिळाले तर ते दंगली करतील असे होण्याची शक्यता कमी आहे. हे थोडे कांउडर इट्युटीव आहे पण असो.

समजा काठावरचे बहुमत मिळाले तर पहिली दंगल होताच इतर पक्ष पाठींबा काढुन घेतील त्यामुळे हे तर सरळ आहे.

मुळात मोदी हा माणुस सगळ्याच दृष्टीने आउटसायडर आहे. ना तो संघाचा आहे ना भाजपाचा. सध्याची निवडणुक पण मोदीच्या नावाने लढली जात आहे भाजपाच्या नाही. परत संघाला आणि भाजपाला पण मोदींची सध्या गरज आहे. ते सगळेपण अगदी खुश आहेत अशातला भाग नाही. (अडवाणी रुसवे, जसवंतसिंगाना काढुन टाकणे इ.)

कदाचित आता हे संघवाले लोक किडे करून मोदींना काढतील आणि नवा माणुस दंगली करेल हे शक्य आहे. पण मुख्य सत्ताकारण हे मोदी वि. भाजप वि. संघ+इ असेच राहिल.

त्यामुळे अगदी तुमच्या भितीस मान देउन दंगली करायच्या म्हणल्या तरी मोदींना थोडंस अवघडच आहे.

(प्रतिसादान नीट विदा दिला नाही आहे. पण मी लिहिलेली कोणतीही माहित चुकिची असल्यास कृपया दाखवुन द्यावे)

ऋषिकेश Wed, 23/04/2014 - 17:25

In reply to by सिद्धार्थ राजहंस

त्यामुळे अगदी तुमच्या भितीस मान देउन दंगली करायच्या म्हणल्या तरी मोदींना थोडंस अवघडच आहे.

मोदी आले की लगेच दंगली होतील, मुस्लिमांचा संहार होईल किंवा इतरही टोकाची पावले उचललेली दिसतील (ही तुलनेने कालमर्यादा असलेल्या गोष्टींची) भिती मला नाहिये. त्यामुळे त्या भितीस मान देण्याच प्रश्न गैरलागू. भिती कस्ली आहे ते आधीच स्पष्ट केले आहे.

नगरीनिरंजन Wed, 23/04/2014 - 20:03

आज लेख वाचला. कॉर्पोरेट्सचा भाग सोडला तर बाकी पटलं नाही. हिटलरची जेवढी हवा झाली असावी तेवढी काही मोदींची झाली आहे असे वाटत नाही.
आणि सत्ताधार्‍यांच्या मागे कॉर्पोरेट्स असणे हा काही भारतातही नवा प्रकार नाहीय.
आधी टाटा-बिर्ला-बजाज होते आता रिलायन्स आणि मल्टिनॅशनल्स आहेत इतकेच.
मध्यमवर्गालाच काय सगळ्याच लोकांना "विकासपुरुष" हवे असतात. "फ्रीडम फॉर सेल" हे सध्याचे जागतिक वास्तव आहे. धार्मिक-वांशिक भेदभावातून मोदींना लोकांची सहानुभूति आहे असे समजणे भोळसटपणा होईल. लोकांना आर्थिक प्रगती, चांगले गुळगुळीत रस्ते, गाड्या-घरं आणि स्मार्टफोन्स हवे आहेत त्यासाठी शिस्तीच्या नावाखाली स्वातंत्र्याचा संकोच झाला तरी चालतो. पण याचा अर्थ दंगली आणि वंशविच्छेद करण्यात रस असेल असे वाटत नाही.
त्याचवेळी आपला विकास होत असताना त्यासाठी ओरबाडलेल्या साधनसंपत्तीमुळे ज्यांची वंचना होते आणि जे लोक चवताळून आपल्या (गहाण ठेवलेल्या) लोकशाहीवर हल्ला करतात त्यांचा कडक बंदोबस्त करेल असा पोलादी पुरुषही हवा असतो.
मुस्लिमांचा "बंदोबस्त" झाला पाहिजे असं म्हणणार्‍यांपेक्षा नक्षलवाद्यांचा "बंदोबस्त" झाला पाहिजे असं म्हणणारे लोक जास्त असतील (विदा नाही).
जेव्हा इतर काही पर्यायच नव्हता तेव्हा टाटा टी पासून टाटा बसेस पर्यंत लोकांनी चालवून घेतलं आणि वर टाटांचं गुणगानही केलं.
आता जमाना रिलायन्सचा आणि व्होडाफोनचा आहे.

ऋषिकेश Wed, 23/04/2014 - 22:06

In reply to by नगरीनिरंजन

लोकांना आर्थिक प्रगती, चांगले गुळगुळीत रस्ते, गाड्या-घरं आणि स्मार्टफोन्स हवे आहेत त्यासाठी शिस्तीच्या नावाखाली स्वातंत्र्याचा संकोच झाला तरी चालतो. पण याचा अर्थ दंगली आणि वंशविच्छेद करण्यात रस असेल असे वाटत नाही. त्याचवेळी आपला विकास होत असताना त्यासाठी ओरबाडलेल्या साधनसंपत्तीमुळे ज्यांची वंचना होते आणि जे लोक चवताळून आपल्या (गहाण ठेवलेल्या) लोकशाहीवर हल्ला करतात त्यांचा कडक बंदोबस्त करेल असा पोलादी पुरुषही हवा असतो.

असे काही मार्मिक वाचले की माझे आणि ननिंचे काहि इतर मुद्द्यांवर मतभेद आहेत हेच विसरून जायला होते. :)
एकदम चोक्कस!

अनुप ढेरे Wed, 23/04/2014 - 22:18

In reply to by नगरीनिरंजन

यासाठी शिस्तीच्या नावाखाली स्वातंत्र्याचा संकोच झाला तरी चालतो.

अशी उदाहरण बघायला आवडतील की जिथे लोकांनी स्वातंत्र्याचा बळी दिला आहे शिस्ती साठी म्हणून. पुण्यातल्या हेल्मेट सक्ती आणि त्या सक्तीविरोधात झालेलं आंदोलन आठवलं ज्यात उलट दिसलं होतं

नगरीनिरंजन Thu, 24/04/2014 - 05:24

In reply to by अनुप ढेरे

लोक विकासाच्या बदल्यात सक्ती स्विकारतात आणि पुणे हे "विकसित" शहर नाहीय (होय!). उद्या दोन्हीबाजूला चार-चार लेनवाले हायवेज आणि अंतर्गत छोटे पण गुळगुळीत रस्ते झाले आणि शहरातून ताशी ८० किमीच्या वेगाने मोटारसायकली दामटता येऊ लागल्या तर या सक्तीविरुद्ध ब्रही निघणार नाही.

पण भारतात वेगळ्याप्रकारची सक्ती खपवून घेतली जाते. ज्यांचं बरं चाल्लंय ते गल्लीगुंडांनी ताब्यात घेतलेल्या स्थानिक राजकारणात दखल देणार नाहीत आणि त्याबदल्यात त्यांच्या आर्थिक प्रगतीआड ते येणार नाहीत असा अलिखित करार आहे.
काही गडबड न करण्याची, चौकसपणा न दाखवण्याची ही शिस्त फार कसोशीने पाळली जाते. मग मतदान करून आलो की आपलं उत्तरदायित्व संपलं अशी समजूत करून घेता येते; आपण आपल्या एसी बेडरूममध्ये झोपलेलो असताना घराजवळच्या सतत वाढणार्‍या झोपडपट्टीत दारू व पैसे वाटले गेले तरी काळजी करायची गरज वाटत नाही.
आपल्याला "गुड लाईफ"च्या आड येणारं काहीही नको असतं मग ती दंगल असो की लोकशाहीतल्या नागरिकाची कर्तव्ये. अपवाद अर्थातच असतात पण ते फार कमी.

अजो१२३ Wed, 23/04/2014 - 20:41

(गोध्रामध्ये मुस्लिमांवर झाला तसा)

कृपया बातम्या नीट कोट करा. गोध्रात हिंदू वर अन्याय झाला. असो. त्याने फरक पडत नाही.

स्त्रियांवर मुद्दाम म्हणून काही अन्याय होईल असं (मला वाटत) नाही

पण शक्यता आहे असं म्हणायचं आहे का?

पण सनातनी विचारसरणी बाळगणारा पक्ष,

भाजपचा कोणता विचार सनातनी आहे? समलैंगिकता? भारताचे सर्वोच्च न्यायालयही सनातनी? राममंदिर? पुन्हा - न्यायालयही सनातनी?

बायको लपवणारा पंतप्रधान,

इंदिरा गांधींनी पण नवरा सोडला होता. कोण बोलते का त्याबद्दल? न्यायबुद्धी अशावेळी कुठे जाते? आणि माहित आहे का ती किती ऑटोक्रॅटिक होती - उद्या सगळे साडी घालून या म्हटले तर येतील इतका काँग्रेसच्या खासदारांवर तिचा दरारा होता म्हटले जायचे. नेहरूपण देशापासून लपून लफडी करायचे. अटलजी 'लग्न का केले नाही' चे उत्तर 'बाजारात दूध मिळत असताना गाय का घरात ठेवा?' असे दिले.

बायको लपवणारा शब्दाचे अनंत अर्थ होतात. त्याने बायको लपवली नाही. बायको आहे हे लपवले. अर्जात जागा रिकामी ठेवली. भाषणात 'मला कुणी नाही तर मी कोणासाठी भ्रष्टाचार करेन' असे खोटे बोलला. निर्वाचन आयोगाकडे केस आहे. तो अविवाहित आहे म्हणून(?) सहानुभूतीने लोकांनी त्याला मतदान दिले पण उलटे होते असे सिद्ध झाले तर त्याच्यावर व्हायची ती कारवाई होईल.

शिवाय आयोगाने/कोर्टाने सगळे डिटेल्स द्यावी लागतील, नाहीतर निवडणूक रद्द होईल म्हटल्यावर , त्या तारखे पासून, त्याने माहिती दिली. त्याला बायको आहे ही माहिती पब्लिक डोमेन मधे आहे. २००१ मधे मिडियाने तिचे घेतेलेले इंटरव्ह्यू पुन्हा टिव्ही वर येत आहेत.

गुजरात मधे महिलांसाठी योजना कमी असतील, नसतील (माहित नाही), पण महिला विरोधी योजना असल्याचे ऐकवत नाही. पार्टीच्या मेनिफेस्टोत महिला आरक्षण आहे.

बाय द वे, तुमच्याच लॉजिकने जायचे तर, (म्हणजे बायको त्यागली तेव्हा हा माणूस महिला विरोधी कामे करणार या लॉजिकने) त्याने भाऊ, बहिण, आई यांनाही त्यागले आहे. त्याच्या एका भावाला, जो त्याच्याच ऑफिसमधे काम करतो,तो वर्षातून ५ मिनिटे , ते ही घरी, भेटतो. मग आता तो पुरुष विरोधी, भाऊ बहिण विरोधी, वृद्धा विरोधी (बायको ३० वर्षांत भेटला नाही म्हणून) किमान १/३० तीव्रतेची कामे पण करणार असं का? वर्षातून एकदा घरी जाणारा सामान्य नसतोच!

एका स्त्रीवर सरकारी यंत्रणा वापरून पाळत ठेवणारा मंत्री

इथे ही तेच. कोणी स्त्री आहे म्हणून सरकारी यंत्रणा तिच्यावर पाळत ठेउ शकत नाही का? स्त्री देश विघातक असू शकत नाही का? आता यांनी निव्वळ स्वार्थासाठी, राजकारणासाठी, स्त्रीद्वेषासाठी असे केले असले, त्याला काही आधार नसला तर जातील जेल मधे. केस चालूच आहे. "मंत्र्याने स्त्रीवर पाळत ठेवणे" हाच सर्वोच्च गुन्हा आहे का? राजस्थानात गहलोत सरकारच्या काळात काय काय झाले? मंत्र्यानीच बलात्कार केला. असं पूर्वी ऐकलं नव्हतं. एन डी ला डी एन ए करून पूत्र स्व्वीकारावा लागला. ९० व्या वर्षी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, उ प्र चे वारंवार मुख्यमंत्री बाप बनले. हा पक्ष चालतो? गृहमंत्र्यांनी संसदेत बलात्कृतेचं नाव वाचून दाखवलं होतं? या सरकारांचं भय नको? गुजरातमधे तमाम स्त्रीयांवर पाळत ठेवायचा प्रोजेक्ट चालू आहे असे आळवू नका.

आणि त्याला पाठीशी घालणारा राज्यातला सर्वोच्च नेता

किमान या बातम्या कुणी काढल्या ते पहा. कोब्रापोस्ट आणि गुलैल. मला अजूनही हे उमगले नाही कि राज्यातल्या एका रँडम स्त्री मागे anti-terrorist squad लावून, ते ही लपून छपून, मोदीला काय मिळणार आहे? लॉजिक काय? आणि पाठीमागे घातले म्हणजे काय केले? शाह मोदीच्या पाठिमागे लपत नाहीय. मोदी म्हणजे साहेब, त्यांच्या सांगण्यावरून असे केले असा आरोप आहे. लपायचे मोदीला आहे. ही घटना ही बरीच जूनी आहे. सरकार सोडल्यानंतर अचानक निवडणूकीपूर्वी ८-१० वर्षांनी या अधिकार्‍यांना काही साक्षात्कार होतो. मग ते गुलैलला 'साक्षात्कार देतात.' केव्हाचं कमिशन काम करतंय या विषयावर, अजून कोणाला काही पत्ता नाही. आणि गुलैल आणि कोब्रापोस्ट आता कंफ्यूज झालेत - आपण नक्की काय राळ उठवणार होतो? मोदीचे लफडे आहे कि 'गुजरातमधे व्यक्तिस्वातंत्र्य....'?

सनातनी राजवटीत स्त्रियांवर पहिला अन्याय होतो, याबद्दलही सहमती. "अन्याय नाही बहुमान आहे" याच्याशी खासच सहमत.

इतकी स्टडीड स्टेटमेंटस मी करू शकत नाही. पण कोणती राजवट कशी आहे ते चेक तरी करून पहा.

http://www.rediff.com/news/report/lawmakers-369-face-charges-of-rape-cr…

या लिंकमधे कोणत्या पक्षाच्या कोणत्या खासदारांची, आमदारांची, उमेदवारांची स्त्री विरोधी किती खटले आहेत ते दिले आहेत. २०१४ च्या निवडणूकित गुजरातला विशेष टाळनीय म्हणावे असे काहीच नाही.

उदाहरणार्थ२ 'निर्भया' प्रकरण झाल्यावरही सरसंघचालकांनी "स्त्रिया देवी आहेत" वगैरे विधानं केली होती. त्यातही स्त्रियांना माणूस म्हणून, पुरुषांइतपतच एक व्यक्ती म्हणून जगू द्या वगैरे म्हणणारे सगळे पुरोगामी (किंवा म्हणा सूडो *.*! आमच्या आणि या बाकीच्या लोकांच्या तीर्थरूपांचे त्यात काही जात नाही) लोकच होते; सनातनी संघ "देवी" म्हणत आणि समिती "स्त्रियांनी कपडे बरे घालावेत" वगैरे म्हणत बसले होते.

हा मुद्दा मान्य आहे. संघी लोक पुरोगामी लोकांची व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करतात. इथे हे लोक मोदीला भारी ठरू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही.
ज्यांना भारतीय पारंपारिक कपडे, इ चयनाचा निकष वाटतो त्यांनी अवश्य असे सरकार टाळावे, पण इथेही अशी सनातन सक्ती करनारे 'कायदे' येतील असे वाटत असेल तर नवलच आहे. श्रीराम सेनेने पब मधल्या मुलांना कायदा हातात घेऊन मारले नि भाजपची नाचक्की झाली. ते सारे कामापलिकडे झिंगलेले होते, दृग्ज घेत होते, तिथे वेश्यागमन चालायचे म्हणल्याने लोक अजूनच चिडले. सनातनी असण्याचे, सनातनी लोकांची मते मिळवण्याचे भयंकर टेम्प्तेशन होऊनही, आत घेउण, मुतालिकला एका दिवसात बाहेर काढावे लागले. नंतर ५ दिवस मिडियाचा मार खावा लागला. सो बी चिल्ड.

तेव्हा ज्यांना असे वाटते कि भाजप येण्याचे इतर फायदे चिकार आहेत, त्यांनी स्त्रीहक्कांची इ चिंता करू नये. स्त्री वाद एक सामाजिक गतिविधी आहे, तिची विशिष्ट गरज जेव्हा कायद्याशिवाय भागणार नाही असा माहौल बनेल तेव्हा प्रत्येक सरकार तसा कायदा करेल. उगाच आता निवडणूकीला थांबलेल्या पक्षांचे स्त्रीवादी आणि स्त्रीविरोधी असे काहीच्या काही वर्गीकरण करायची गरज नाही.

ऋषिकेश Wed, 23/04/2014 - 21:23

In reply to by अजो१२३

तेव्हा ज्यांना असे वाटते कि भाजप येण्याचे इतर फायदे चिकार आहेत, त्यांनी स्त्रीहक्कांची इ चिंता करू नये.

हा क्रम आमच्या दृष्टीने उलट आहे.
लिंगनिरपेक्षता, व्यक्तीस्वातंत्र्य, ह्युमन डेव्हलपमेंट, अभिव्यक्ती स्वातंत्र्य इ. गोष्टीत फायदे चिकार आहेत असे ज्यांना वाटते, त्यांनी मोदी आल्यानंतर इतर फायद्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करावे असे मी सुचवेन! ते फायदे होणार नाहीत असे नाहीत पण ते या मुल्यांपुढे क्षुद्र आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 23/04/2014 - 21:43

In reply to by अजो१२३

१. इंदिरा गांधींनी नवरा सोडला नव्हता. तो दोघे परस्पर निर्णय घेऊन मोकळे झाले होते. त्या दोघांना त्याबद्दल अडचण नव्हती आणि त्या दोघांनी आपलं लग्न झाल्याचं, नातं तुटल्याचंही लपवलं नव्हतं. त्या काळात इंदिरा, फिरोज यांनी निवडणूकांना उभं राहताना फॉर्म्समध्ये खोटं किंवा अर्धसत्य लिहीलेलं होतं का? नसेल तर, इंदिरा किंवा फिरोज यांच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावण्याचं काहीही कारण नाही. तसंही फिरोज गांधी हा कोणी बालविवाहित, स्वतःचं सामाजिक स्थान, प्रसिद्धी नसणारा जसोदाबेन नव्हे की ज्याला सोडून दिलं आणि त्याची दुर्गती झाली. किंवा बायको पंतप्रधान होण्यामुळे फिरोजचं आयुष्य फारच काही चांगलं झालं अशीही गोष्ट नव्हती.

२. एक पे रहना. एक तर पाळत ठेवली गेलेली स्त्री (/व्यक्ती) ही देशविघातक होती म्हणा आणि मग त्यापुढे anti-terrorist squad ला काय पुरावे सापडले ते लिहा. किंवा निरागस स्त्रीवर उगाच पाळत ठेवली गेली, ते ही सरकारी यंत्रणा वापरून हे मान्य करा. मुळातच त्या स्त्रीने असं काय केलं होतं की तिच्यावर पाळत ठेवावी? (उदा: अमेरिकेने इराकवर हल्ला करताना WMD आहेत असं सांगितलं आणि हल्ला केला. मग ती WMD मिळाली नाहीत तेव्हा नाक कापलं गेलं. इथेही तेच उदाहरण, फक्त या स्त्रीच्या बाबतीत WMD ला समांतर काय होतं ते सांगा.)

३. इतर कोणती राजवट कशी आहे याचा इथे काय संबंध? विषय मोदींचा आहे, त्यासंबंधात विधानं केली आहेत.
३अ. स्वातंत्र्यानंतर स्त्रियांची प्रगती झालेलीच नाही असं काही म्हणायचं आहे का? बलात्कार हाच स्त्रियांवरचा सगळ्यात वाईट अत्याचार असं पुरुषप्रधान विधान तुम्हाला करायचं आहे का? (करायचं असेल तर करा, त्याला "हवा मिळेल" अशी अपेक्षा माझ्याकडून करू नका.) स्त्रियांचं वाढतं शिक्षण, नोकरी, राष्ट्रीय उत्पन्नातला वाढता हिस्सा वगैरे गोष्टी स्त्रियांच्या प्रगतीमधल्या महत्त्वाच्या समजल्या जातात. ते एवढी वर्ष कोणत्या पक्षाच्या सरकारने केलंय?

उगाच आता निवडणूकीला थांबलेल्या पक्षांचे स्त्रीवादी आणि स्त्रीविरोधी असे काहीच्या काही वर्गीकरण करायची गरज नाही.

का नाही? देशातले अर्धे लोक स्त्री नाहीत म्हणून का स्त्रियांवर शतकानुशतकं अन्याय झाला नाही म्हणून?

बॅटमॅन Thu, 24/04/2014 - 01:05

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

का नाही? देशातले अर्धे लोक स्त्री नाहीत म्हणून का स्त्रियांवर शतकानुशतकं अन्याय झाला नाही म्हणून?

शतकानुशतके अन्याय होत असताना हे पक्ष नव्हते म्हणून हे वर्गीकरण चूक आहे. तदुपरि ज्याची त्याची समज वगैरे वगैरे.

अवांतरः स्त्रीवादाचे चवीपुरते लेबल तेवढे लावणार्‍या पण तद्दन एककल्ली व आक्रस्ताळ्या विचारांना लोक फार भाव देत नाहीत हे लोकांची विवेकबुद्धी शाबूत असल्याचे लक्षण मानता यावे.

बाकी चालू द्या.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 24/04/2014 - 01:19

In reply to by बॅटमॅन

तसं नाही गं बॅटमॅन. फक्त स्त्रीवादाबद्दल बोलत नाहीये मी. ऋषिकेशने आधीच "लिंगनिरपेक्षता, व्यक्तीस्वातंत्र्य, ह्युमन डेव्हलपमेंट, अभिव्यक्ती स्वातंत्र्य" अशी यादी दिल्यामुळे मी बै ती पुन्हा लिहीण्याचा त्रास घेतला नाही. तू ते तसंच का वाचत नाहीस गं?

बॅटमॅन Thu, 24/04/2014 - 01:33

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सेकंड सेक्स वाचा, सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. राहुल गांधीच्या यूएसपीसारखा हा यूएसपीही मस्त होईल नै?

अजो१२३ Thu, 24/04/2014 - 15:52

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्या दोघांना त्याबद्दल अडचण नव्हती

जशोदाबेन अडचण आहे म्हणून अजून एक दृष्टांत झाला कि काय? तिने म्हणू द्या ना. तिने स्प्ष्ट म्हटलं आहे कि तो काहीही करो मला काही अडचण नाही. तिची एकच अडचण होती ती म्हणजे त्याने मला आयुष्यात एकदा तरी बायको म्हणावे. आणि ती ही आता मोदी ने सोडवली आहे.

अजो१२३ Thu, 24/04/2014 - 16:21

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

फॉर्म्समध्ये खोटं किंवा अर्धसत्य लिहीलेलं

मोदींनी त्या जागा रिकाम्या सोडल्या. ते असत्य तुमच्या नजरेत. ते अर्धसत्य तुमच्या नजरते.

मनमोहनसिंगानी तर बायको नाही असे लिहिले एलेक्टश्न अ‍ॅफिडेविट मधे . To be precise - "Not Applicable" असे लिहिले होते. नि चक्क तिच्या सोबत जगभर फिरले. भारताची फर्स्ट लेडी म्हणून सांगून!!

बॅटमॅन Thu, 24/04/2014 - 20:06

In reply to by सलील

धन्यवाद. सगळेच ठग आहेत तिथे एकट्या मोदीला झोडण्यात प्वाइंट काय? पण नै, त्याला झोडल्याशिवाय लोकांचे जालीय अस्तित्व सिद्ध होत नै त्याला ते तरी काय करणार म्हणा.

सलील Thu, 24/04/2014 - 20:30

In reply to by बॅटमॅन

प्वाइंटाचा मुद्दा असा आहे की भारतात जनरली हिंदूंना आणि त्यातूनही हिंदू संघटनन्ना झोदापाल्याशिवाय स्वतःचे धर्मानिर्पेक्षिक्त्व सिद्ध करता येत नाही. गेली ६५ वर्षे हेच चालू आहे त्यामुळे वेगळा विचार फारसा इथल्या सेक्युलर लोकांना करता येत नाही. च्यायला सगळ्या यूरोपात आणि अमेरिकेत अलिखित नियम असतो की राज्य हे किरीस्तावांचेच आहे. फक्त ते उगाचच तुमच्या घरात तुम्ही काय करता ह्यावर आक्षेप घेत नाहीत. कायदा म्हणजे कायदा. रात्री ११ नंतर कोणीही आवाज केला आणि कोणी तक्रार केली की पोलीस येणारच आणि तुमची गचांडी पकडणारच. तिथे हां बांगेचा, हां काय काकड आरतीचा, हां काय गरब्याच असला फालतू प्रकार नाही. ते ह्या भारतातल्या अर्धवट सेक्युलर लोकांना कळत नाही. धार्मिक तेढ वाढवण्याचे जितके काम ह्या सेक्युलर लोकांनी भारतात केले आहे तितके काम हिंदू आणि मुसलमान संघटननी केले असेल असे वाटत नाही. आपले एक ते एक दळण गिरवत बसायचे आणि उगाचच फक्त एकाच समुदायाला आपले झोडपायचे. ह्याच मुळे जास्त प्रश्न तयार होतात ह्यावर विश्लेषण नाही. धळधळीत आणि धादांत खोटया बातम्या द्यायच्या. उगाचच शब्दांची तोडमोड करायची आणि वर आव आणायचा की चिकित्सा चालू आहे. एकाही सो कॉल्ड मासिकाने आपण चुकीचे लिहिले आहे आणि आह्मी माफी मागतो असे स्वच्छ शब्द्तात मांडल्याचे दिसले नाही. त्या बरखा बै स्वतः लटकल्या तेंव्हा आपलेच एक फुटकळ पानेल निवडून आपल्यावरचे आरोप खोडून राहिल्या. मात्र मोदी आणि बाकीच्यांनी मात्र स्वतंत्र लोकांकडून आपले आरोप खरे खोटे करून घ्यावेत ही ह्यांची इच्छा. बर ते झाले तरी ह्यांचे समाधान नाही कारण ह्यांच्या म्हणण्यानुसारच निकाल लागला पाहिजेल. हा हेकेखोरपणा मात्र सर्मासावेषक असतो. ते किरीस्ताव येत जाता खोटे बोलून धर्मांतर करतात तो त्यांचा हक्क. पण हिंदूना तो हक्क नाही. कारण हिंदू जातीयवादी. च्यायला गेली ६ वर्षे अस्सल गोऱ्यांच्या बरोबर कळते की हे स्वतःचे एक सोडत नाहीत. ऑफिसमध्ये ख्रिस्ताचा फोटो नसेल पण सगळे स्वताचे ते बरोबर रितीरिवाज पाळणार. मग आपल्याच देशात हिंदूंनी काय घोडे मारले आहे काही कळत नाही. ह्या असल्या दुट्टपी प्रकाराने हे सेक्युलर अर्धवट माहिती घेवून राहतात हे दिसते पण ह्यांना ते मान्य नसते. मोदीच्या बाबत तर गोलपोस्ट सतत बदलत असतो ह्यांचा कारण काहीच करून मोदी चांगला नाहीये हेच सिध्द करायचे आहे. जणूकाही बाकीचे सगळे एकदम स्वच्छ आणि १००% बरोबर असतात.

अतिशहाणा Thu, 24/04/2014 - 20:38

In reply to by सलील

ऑफिसमध्ये ख्रिस्ताचा फोटो नसेल पण सगळे स्वताचे ते बरोबर रितीरिवाज पाळणार. मग आपल्याच देशात हिंदूंनी काय घोडे मारले आहे काही कळत नाही

आपल्या देशात हिंदूंनी रीतीरिवाज पाळण्यास कोणी प्रतिबंध केला आहे?

अजो१२३ Thu, 24/04/2014 - 16:50

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि त्याची दुर्गती झाली.

तुमच्या मते जसोदाबेनची दुर्गती झाली आहे. ती एक शिक्षिका आहे आणि सन्माने जगली आहे. गोगोई म्हणतात कि त्या बाईला भारतरत्न द्या. माझ्या मते ती कूल लाइफ जगतेय. आणि नवर्‍याने तिची इच्छा पूर्ण केल्यापासून अधिकच खूष असायची शक्यता नाकारता येत नाही.

इंदीराजी फिरोज हृदयविकाराचा झटका आला तेव्हा जवळ आल्या. नैतर त्यांची दुर्गती चालूच होती.

अजो१२३ Thu, 24/04/2014 - 17:55

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्या काळात इंदिरा, फिरोज यांनी निवडणूकांना उभं राहताना फॉर्म्समध्ये खोटं किंवा अर्धसत्य लिहीलेलं होतं का?

कदाचित लिहिलेही असते. त्याकाळातले फॉर्म्स तिच्या नशिबाने सोपे होते. शिवाय तिचा नवर्‍यावर राग होता.

माझ्या राष्ट्र कार्यासाठी हिला उगाच त्रास नको अशी मोदीची भावना असावी. म्हणून 'उमेदवारीच कँसल होईल' नि 'पदही जाईल' कळल्यावर त्याने माहिती भरली.

इंदिरा गांधींजा मनीचा भाव शुद्ध नि मोदींचा हरामी असे ठाम पणे म्हणता येत नाही. इतका तर नाहीच नाही त्याचा सरकारच्या नितींवर परिणाम व्हावा.

आणि '१८ वर्षांत लग्न झालेल्या पुरुष लोकांनी घर सोडून आर एस एस जॉईन करावी नि मग कलकत्त्याला विवेकानंदाच्या मठात बसावे, असे करत २०-३० वर्षे काढावीत' असा एक केंद्रीय कायदा बनला जाईल इतका तर नाहीच नाही.

अजो१२३ Fri, 25/04/2014 - 19:05

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

२. एक पे रहना. एक तर पाळत ठेवली गेलेली स्त्री (/व्यक्ती) ही देशविघातक होती म्हणा आणि मग त्यापुढे anti-terrorist squad ला काय पुरावे सापडले ते लिहा. किंवा निरागस स्त्रीवर उगाच पाळत ठेवली गेली, ते ही सरकारी यंत्रणा वापरून हे मान्य करा. मुळातच त्या स्त्रीने असं काय केलं होतं की तिच्यावर पाळत ठेवावी?

१. मोदी लफडेबाज आहेत असं गुलैलला उठवून द्यायचं होतं.

२. अमित शाह म्हणाले -"For now, I can tell this much, that nothing was done which a man in public life should have avoided doing so", said Shah.

३. The Gujarat government has set up a judicial inquiry commission headed by former High Court judge Sugnyaben K. Bhatt to probe into the alleged snooping on a woman by the state police.

४. मोदी विरोधक म्हणतात हे कमिशन बचाओ कमिशन आहे
५. त्याचा अजून निकाल आला नाही.
६. असो मानू कि दुष्ट मोदी तो आपल्याच बाजूने लावून घेईल. हे यासाठी कि कोर्ट, न्यायालये मोदीवर काय निर्णय देतात याला अर्थच नाही. मग उरतो प्रश्न तो आपण काय अर्थ काढू शकतो.

अभी आप एक पे रहना जी...

१. मोदी लफडेबाज आहेत. जिच्याशी लफडे आहे, तिचे अजून एक लफडे तर नाही ना म्हणून पाळत ठेवत आहेत. मोदीचे लफडे असल्याने, ते गुप्त असल्याने, किंवा तिचे अजून एक लफडे असल्याने, आणि तिच्या पाळतीवर सरकारी खर्च झाल्याने - असा पंतप्रधान देशाला (अक्षरक्षः) महाग पडेल.
२. ती पोरगी अतिरेकी आहे. पण पोरगी आहे म्हणून तिच्यावर पाळत ठेऊ नये. अतिरेकी स्त्री मूळे देशात लोक मेले तर फरक पडत नाही.
३. एका मुलीवर अतिरेकी वा बेभ्रोश्याची प्रेयसी म्हणून पाळत ठेवली गेली कि देशातल्या अखिल महिलांचे व्यक्तिस्वातंत्र्य बाधित होते. म्हणून मोदी महाग पडतो.

तुम्ही मलाच जर विचारले तर मी म्हणेन ती मुलगी देश विघातक होती वा असे वाटले आहे इतके म्हणेन. कारण कोणी शहाणा अँटी टेररीस्ट स्क्वॉड वापरणार नाही.

अस्वल Wed, 23/04/2014 - 21:55

In reply to by अजो१२३

राजस्थानात गहलोत सरकारच्या काळात काय काय झाले? मंत्र्यानीच बलात्कार केला. असं पूर्वी ऐकलं नव्हतं. एन डी ला डी एन ए करून पूत्र स्व्वीकारावा लागला. ९० व्या वर्षी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, उ प्र चे वारंवार मुख्यमंत्री बाप बनले. हा पक्ष चालतो?

असं कुठे कोणी म्हटलंय?
मोदी विरोधक /मोदी skeptics म्हणजे काँग्रेस समर्थक नव्हेत. "मोदींना विरोध" म्हणजे मग "बाकी कुठल्याही पार्टीला अनुमोदन" असा निष्कर्ष अजिबात काढता येत नाही.

अजो१२३ Thu, 24/04/2014 - 15:48

In reply to by अस्वल

"मोदींना विरोध" म्हणजे मग "बाकी कुठल्याही पार्टीला अनुमोदन" असा निष्कर्ष अजिबात काढता येत नाही.

मग काय अर्थ काढता येतो? तोंडाची वाफ करणे आवडते असा? तुम्हाला बलात्कारी दिसतच नाहीत, डोळा मारनारे दिसतात, नि तुम्ही फ्क्त त्यांनाच झापता. म्हणजे अनुमोदन होत नाही का? सगळी माहिती घेऊन सगळ्यांवर संतुलित टिका करा, गुण गा, ओके.

अस्वल, मोदींचा लर्जर दॅन बाऊ केला गेला आहे. इथे त्यांच्या विरोधात मुद्दे मांडणारांचे हृदस्थ विषय घ्या - १. अल्पसंख्यकांवरील अन्याय, २. (सम) वा कसा लैगिंक अन्याय, ३. घटनादत्त स्वातंत्र्यांची गळचेपी, ४. स्त्रीयांवरील (संभाव्य) अन्याय. ४. धार्मिक अन्याय. ५. विकास नसणे

-टिका फक्त नि फक्त मोदीवर. शंका फक्त मोदीची. आता काँग्रेसचे कारनामे पहा.

१. अल्पसंख्य -
१९७५ च्या आणिबाणीत संजयगांधींनी वय, लिंग न पाहात, दिल्लितल्या नि इतर मोठया शहरातल्या मुसलमानांच्या गल्ल्यांत घुसुन स्त्री पुरुषांची ओपरेशन्स केली. कोणता कायदा नसत्तान. विनोद मेहतांचे संजयवरचे पुस्तक वाचा, हादरून जाल. आजही दरिया गंज बाजारात अनौरस मुसलमान बरेच बसलेले असतात. थोडी चर्चा झाली तर म्हणतात - 'संजयजीकी देन हैं जी.'
विकि-
India's state of emergency between 1975 and 1977 included a family planning initiative that began in April 1976 through which the government hoped to lower India's ever increasing population. This program used propaganda and monetary incentives to convince citizens to get sterilized. People who agreed to get sterilized would receive land, housing, and money or loans.[20] Because of this program, thousands of men received vasectomies and even more women received tubal ligations. However, the program focused more on sterilizing women than men. An article in The New York Times titled “For Sterilization, Target Is Women” states, “There were 114,426 vasectomies in India in 2002-03, and 4.6 million tubal ligations, the analogous operation on women, though ligation is a more complicated operation.” [21] Despite the fact that sterilizing men is a more simple procedure, the government still chose to focus on sterilizing women instead.[20][21] Son of the Prime Minister at the time Indira Gandhi, Sanjay Gandhi was largely blamed for what turned out to be a failed program.[22] A strong backlash against any initiative associated with family planning followed the highly controversial program, which continues into the 21st century.[23]

उद्या राहूल हे करणार नाही कशावरून? तो त्याचा चक्क सख्खा पुतण्या आहे. पण असे म्हणताना, come on, be reasonable.

२. समलैंगिकता - भाजपची भूमिका सर्वाच्च न्यायालयाचीच भूमिका आहे. भाजपची भूमिका समलैंगिकांना अन्यायाची वाटते आहे. असे कशावरून म्हणता समलैंगिकांवर अन्याय करणे हिच भाजपची मूळ भूमिका आहे? या विषयावर तज्ञांत चर्चा होऊन जो निष्कर्ष निघेल तो पक्षास मान्य असेल असे लिहिले आहे. इथे का कांगावा करायचा? मग आआपच्या शांततेवरही करावा. भारतातले जेनेटिक्स इंजिनिअर, डॉक्टर्स, मानसष्स्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, या विषयावरच्या आंतरराराष्ट्रीय संघटना, कोठे कोठे रिकग्निशन आहे, कोठे कोठे विवाहास मान्यता आहे, इ इ पाहिजे पाअहिजे. ङायग्नोसिस अ‍ॅज डिसिज, दिसॉर्डर, क्यूरेबल , नॉन क्यूरेब्ल हे ही चेक केले पाहिजे. या लोकांचे प्रकार, उपप्रकार आणि प्रत्येक प्रकारची लोकसंख्या किती आहे हे ते पाहिले पाहिजे. Acknoledgement of a new gender, new sexual relation, new marriage contracts has vast implicatons to the society. लोकांची घरात स्वीकर्यता, समाजाचे प्रबोधन, सर्वांना मेनस्ट्रीम मधे घेणे, त्याची टाईमफ्रेम, त्याची व्यवहार्यता, हे सगळे चर्चिले पाहिजे.
LGBTTTAAIQQ ला मान्यता देणे नि त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणे हा जोक नाही. घाईघाईने ढसाळ निर्णय घेलते गेले तर पुढे कितीतरी काळ देशाच्या मागे वेगलीच लचांडे लागून बसतील.

याच मुद्द्याला पर्मोच्च बिंदू बनवणारांसही कूपाबाहेरे यायला हवे - ३७७ खाली गेल्या २० वर्षात एकही गुन्हेगारास सजा झाली नाही. आता ही पुढे अशक्य आहे. त्या करिता इतर सारी प्राधान्ये बाजूला सारायची? का पराचा कावळा करायचा? थोडी व्यवहार्यता ही हवी ना?

३. घटनादत्त स्वातंत्र्यांची गळचेपी, - देशात एकदा आणिबाणी आली होती. तेही राजकीय अस्थिर परिस्थितीने. लोकांचे सारे मूलभूत अधिकार २ वर्षे नव्हते. पण गाडी पुन्हा रुळावर आली. चयित सरकारने अशी कोणतीही पायमल्ली केली तर तिला उलथावून टाकण्यास कोणत्याही क्षणी जनता क्षम आहे. कडबोड्या सरकारांमधे हे अजून अशक्य आहे. आज जनजागृती खूप आहे. हिंदू ग्रोथ रेट ३-४% असायचा. लोक वेल्ले असायचे. आता जीडीपी खूप फास्त वाढतोय. लोकांना वेळच नाही. व्यवस्थित अर्थव्यवस्थेसाठी व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केलेली चालत नाही. आज मिडिया खूप जागृत आहे. लष्कर जागृत आहे. न्यायालये जागृत आहेत. स्वात्रंत्र्य हे प्रगतीचं फ्यूअल आहे. शिवाय सर्वच मोठ्या नेत्यांनी सर्वांना सोबत घेऊन चालू असे म्हटले आहे. भारतातले पक्ष, त्यांचे जाले, कार्यकर्ते, उमेदवार, मंत्री, मिळून लाखो लोक असणार. त्यातले काही फुटकळ तोंडाचे असतात. कंटाळून ते शेवटी फुटकत तोंड पार्टी काढतील इतके २०१४ मधे एफ आय आर, खटले, अरेस्ट्स झाल्या आहेत. अगदी स्वतःच्या घरात रात्री १२ वाजता आपल्या लोकांत केलेल्या विधांना देखिल बेल मिळणे अवघड होत आहे.

बरे शंकाना इतिहास काय आहे? स्नूपगेटच्या केस मधे पण गुलैल संभ्रमित झाला आहे - "मोदीचे कोणासोबत लफडे आहे" म्हणून राळ उठवायची कि "गुजरातेत स्त्रीया सुरक्षित नाहीत" म्हणून? काल प्रियंका गांधी ही तशीच संभ्रमित झाली होती. मला तरी गुजरातच्या सगळ्या बायकांची प्रायवसी मंडित करायची असा कोणता प्रोजेक्ट दिसत नाही. २००४ मधे राहुल म्हणाला कि मला वेरोनिक नावाची स्पॅनिस गर्लफ्रेम्ड आहे. त्याने ती टाकली म्हणू का? नंतर तिचे नावच नाही. वाइटच अर्थ घेतले तर - १. मोदी पीपींग टॉम आहे २. लफडेबाज आहेत चांगला घेतला तर - १. बापाच्या सांगण्यावरून मुलीच काळजी घेण्याचे सरकारी यंत्रणेला दिलेले इन्स्ट्र्क्शन भलत्याच प्रकारे घेतले गेले , २. Intelligence work

४. स्त्रीयांवरील (संभाव्य) अन्याय. अबु आझमी, लालू, मुलायम यांच्या पाठिंब्याने सरकार आले तर स्त्रीच्या बाजोचे कायदे आम्ही पातळ करू/काढू असे या लोकांनी थेट सांगीतलं आहे. २०१४ हे सरकारत असल्यामुळे असे कायदे झाले नसावेत. स्त्री आरक्षणाला यांचा विरोध आहे. भाजपच्या जाहिरनाम्यात स्त्री आरक्षणाला पाठिंबा आहे. त्यांचे सनकी सनातनी स्नेही शिवसेना यांचाही आहे.
स्त्रीयांवरील अन्याय म्हणताना - त्यांची भ्रूण हत्या न होणं, हुंडा पद्धत जाणं, शिक्षण मिळणं, नोकर्‍या/पैसा मिळणं, संपत्तीवर टायटल मिळणं, वाईट पतीला सहज डच्चू देता येण, त्याची नुकसानभरपाई मिळणं, गुन्हायांपासून सुरक्षितता मिळणं, कुटुंबात/ शेतात/ कारखान्यात/ कार्यालयात वातावारण जाचाचे नसणे, हा पहिली प्राधान्ये असावीत.
पबला जावे, कपडे घालणे, कोणते मत मांडावे, कोणीती गाणी गावी, देवाच्या पाया पडावे कि नाही ही दुसरी. अशी स्वातंत्र्ये एकदा दिली कि लोकांनी सांभाळायची असते, पुढे न्यायची असतात. सरकार पाहिजे तिथे मदत करते. इथेही काही सनकि भाजप्यांना यातल्या दुसर्‍या बाबीचा राग असला तरी ते पहिल्या बाबतीत चांगले डेलिव्हर करू शकतात.
आपला कळवळा खर्‍या पिडितांना असतो. अगदी तालिबानांच्या बेल्टमधे बसून विणी मलिक काहीही करते तेव्हा, भाजप सरकारकडून 'रिजनेबल' पुरोगामी लोकांना धोका नसावा.

४. धार्मिक अन्याय.
आज तरी धर्माच्या नावाने भारतात सरकार कोणावर अन्याय करत नाही. तरीही खालील काही प्रकारच्या धार्मिक भावना पहायला मिळतात
१. आम्ही इथे ७०० वर्षे राज्य केले. आम्ही ज्येते , हिंदू गुलाम. ब्रिटिशांनंतर आमचेच राज्य यायला हवे. Got it? Akhand Bharat with green glasses?
२. आजही भारत अखंड सेक्यूलर व्हायला हवा .
३. आजही अखंड भारत हिंदुराष्ट्र असायला हवे होते.
४. देशाचे तीन-चार भाग व्हायला पाहिजे होते - हिंदू, मुस्लिम, अन्य, मिक्स

मुस्लिमांना त्यांना देश दिला. आता हा इतरांचा, बव्हंशी हिंदूचा. काही मुस्लिम लोक पाकिस्तानात गेले, सेक्यूलर इथे राहिले.

५. आताचा भारत हिंदू देश व्हावा.
७. आताचा भारत खर्‍या अर्थाने सेक्यूलर राहणे गरजचे.
६. आता आपण जसले कसले सेक्यूलर आहोत, नि आहोत तसेच राहणे शहाणपणाचे आहे.

या झाल्या चढत्या क्रमाच्या 'लोकधारणा.'

पक्षांच्या धारणा काय आहेत?
भाजप म्हणते
१. - सध्याला तरी आता आपण जसले कसले सेक्यूलर आहोत, नि आहोत तसेच राहणे शहाणपणाचे आहे. पहिल्यांदा सत्ता हाती घ्या.
२. पुढची पायरी? खर्‍या अर्थाने सेक्यूलर राहणे. हिंदु धर्म खर्‍या अर्थाने सेक्यूलरच आहे म्हणतात ते. पण वास्तवातले सेक्यूलर सरकार मात्र खर्‍या अर्थाने सेक्यूलर नाही. म्हणजे काय? समान नागरी कायदा! ३७० कलम!
३. मी लिहितोय तितकं मोठं व्हिजन दोक्यूमेंट भाजपने लिहिलं नसेल, पण त्या कलम ७ च्या दोन स्टेजेस आहेत. पहिली सांगीतली. दुसरी आहे ती भारताची जी स्वाभिमानस्थळं ठेचली गेली आहेत, त्यांना त्यांचा ऐतिहासिक गौरव पुनः प्राप्त करून देणे. म्हणजे हिंदू अस्मितांच्या स्थळांना वादविवादांच्या बाहेर काढून आणून देणे. त्याचा एक घाइची लागलेला प्रकार त्यांनी करून पाहिला. काम अर्धवट झालं. अब्रू पूरी गेली. फायदा देखिल बराच झाला. पण शस्त्रही निकामी झालं. जनतेची प्राधान्ये बदलली.
४. मग हे चाळे सुचायला काय हवं? भरलेलं पोट! म्हणून विकासाचा , मॉडेलचा नारा आहे, पण मंदिर मागे कुठे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून जाहिरनाम्यात आहेच. देशाची आर्थिक प्रगती झाल्याशिवाय सांस्कृतिक सम्मान जागवता येत नाही. आणि देवळांचा अजेडा ज्याचा आहे त्यानेच प्रगती केली असलेली बरी.
५. इथे दोन गोष्टी येतात. सरकारमधे राहणे सर्वात महत्त्वाचे. म्हणून माहौल शांतीपूर्ण असणे गरजेचे. आर्थिक समस्या नको. विवादित स्थलांबद्दल न्यायिक वा लौकिक सहमती बनवणे. लोकांना रस नाही दिसले कि पुन्हा सगळे सोडून देणे नि रोजची कामे करणे.
६. शिक्षणाचा दर १००% करणे, विवादित मुद्द्यांबद्दल पूर्ण तांत्रिक छानबिन करणे, ती सगळ्यांसमोर आणणे, तथहिन मुद्दे सोडून देणे, देशात लांबकाळ शांतता राखणे, २-३ मुस्लिमांना पंतप्रधान बनवणे, ताजमहल फेम पूनाओक टायपांची सरकारी टिका करणे, सामाजिक दुही (न होण्या) साठी कायदा करणे इ इ.
७. नेते, शिक्षण, बुद्धीवान सांगू लागले तर देशात 'संवेदशनशील' असे मुद्दे उरणार नाहीत. सामान्य लोक त्यांची श्रद्धा आहे अशा लोकांचे ऐकतात. त्यांच्यावर विश्वास ठेवतात.
८. कुछ तेरी कुछ मेरी करून वादग्रस्त मंदीरे, नक्षलवार, काश्मिर, ईशान्य भारत, दंगली, जातीयवाद, असे प्रश्न सोडवता येतील.
९. एव्हढं सगळं झालं तरी आर एस एस भाजपला झोपू देनार नाही. त्यानंतर प्रश्न येतो हिंदुत्ववादाचा. भारत हिंदू देश म्हणजे काय? फक्त घटनेच्या प्रिएंबलमधे घुसडायचा एक शब्द? कि नागरिकत्त्वाचेच नाव? कि प्रत्येक नागरीकाच्या धर्माचे नाव? कि काही सरकारी विधी हिंदू? का प्रत्येकासाठी काही खाजगी विधी हिंदू? म्हणजे सौदीसारखे. सध्याचे तरी उत्तर असे आहे - आमचा हिंदुत्ववाद म्हणजे प्रत्येक भारतीय हिंदू आहे. या वाक्यात हजार प्रकारचे जोक आहेत. जसे आमचे राष्ट्रीयत्व हिंदू सांगीतले तर भारतीय शब्द कोशातून बाद. चला काही का होईना. नामधारी तर नामधारी, भारत हिंदू देश बनवणे हे भाजपचे स्वप्न आहेच खरे.
१०. आता जगात हिंसाचार थांबला असेल. एक संकल्पनाच म्हणून आंतरराष्ट्रीय सीमांच्या इन्फ्लेक्झिबिलिटीची (नि कदाचित अस्तित्वाची) टिका होऊ लागलेली असेल. आर्थिक विकास, सुरक्षा, मानवविकास यांनी इतिहासाला ओव्हपॉवर केले असेल नि अखंड भारत पुन्हा बाळसे धरू लागला असेल. मोदीला मसनात जाउन १०० वर्षे झालेली असतील.

तर या कुटील स्किम मधे, १० पैकी भाजप पहिल्याच पायरीवर आजही गटांगळ्या खात आहे.

काँग्रेस काय म्हणते ?

त्यांचा इतिहास काय आहे. कोर्ट, कचेरी न पाहता त्यांनी सोमनाथ मंदिराच्या जागची औरंगजेब मशिद हलवली. तिथे बर्‍याच मशिदी नि मंदिरे असायचीए. हा आला, त्याने पाडली, त्यानी बांधली इ इ करून. शेवटी अहिल्याबाईंनी बांधलेले शेवतचे देऊळ असताना देखिल पटेलांनी मूळ जागची मशिद शिफ्ट केली. सरकारी म्हणण्याप्रमाणे सुरक्षित, इजा न होऊ देता. फोटो पाहिला तर त्याची कल्पना येते. हे झाले सरकारी खर्चाने. सेक्यूलर नेहरूला देशाबाहेर पाठवून. प्रसाद नि पटेल मग चक्क मंदिराचा खर्च सरकारने का करू नये अशी निलर्ज्ज चर्चा करू लागले. शेवटी जनमंदिर आहे, म्हणून भारतातल्या लोकांचा पैसा वापरावा हे ठरले. हा काळ कोणता होता? भारताचे राष्ट्रगीत संस्कृत. पक्षी मयूर, फूल कमळ. ब्रीदवाक्ये संस्कृत. या मायनोरिटीची जबदरस्त गळचेपी झाली. भाषा संस्कृतप्रचुर हिंदी. कोणाला कळेना. सर्वात मोठा नेता म्हणतो - मी कट्टर हिंदू आहे, मला रामराज्य हवे. काँग्रेसने मुंबईसारख्या जागी आंबेडकरांना हरवले होते - दलितांना हरिजन म्हणायचे नाही इतकाच इश्श्यू होता. हिच का काँग्रेसची धर्मनिरपेक्षता?

आता काढा काँग्रेच्या काळात किती दंगली झाल्या. कोण मेले? पक्षपुर्स्कृतच मानली तरी दिल्लीची दंगल अहमदाबादपेक्षा प्रचंड तीव्र होती. तरीही राजीव गांधीला, ० अनुभव असताना देशाने ४१५ जागा दिल्या.

काँग्रेसचं व्हिजन काय आहे-
१. आजची देशाची स्थिती बेस्ट आहे. हे भाजप नसते तर अजून जास्त बेटर राहिली असती.
२. तशी पुढे स्थिती चांगली राहिल. पण हे आले तर सत्यानाश होईल. खात्री आहे. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत हे नकोत.
३. आम्ही गरींबाकरता काम करतो. हे लोक श्रीमंतांकरता करतात.
४. गांधी घराण्याला चिपकून राहू (एकाधिकारशाही शब्द त्यांना नाही वापरायचा)
५. देशातले दारिद्र्य आम्ही येत्या १० वर्षांत नष्ट करू.
६. देशाच्या अस्मितांना इ कोणता धोका नाही.
७. भाजपचा कोणीही त्यांच्या व्हिजनच्या क्र २ ते क्र १० चा मुद्दा जरी बोलला तरी त्याला देशद्रोह ठरवायचे. अगदी १ साठी सुद्धा तेच.
८. म्हणजे मत आम्हालाच द्या.

स्त्रीयांविरुद्ध अन्याय, दलितांविरुद्ध अन्याय, उदारीकरणाविरुध्ह अन्याय, देशाची फाळणी, दंगे, कत्तली, आंतर्गत अस्थैय, हा सगळा आमचा वास्तविक इतिहास आहे. त्यांचा तितका नाही. तरीही चोराच्या उलट्या बोंबा.

५. विकास नसणे
विकास दोन-चार प्रकारे पाहता येतो - १. संपत्ती जनन २. सामाजिक स्थिती ३. सुरक्षा, इ
संपत्ती जनन हे सरकारचे कम नसते. ते लोकांचे असते. सरकार केवळ त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करून देते. वेगवेगळ्या सरकारांचे प्रगतीचे आकडे आपण मोजतो तेव्हा तेव्हाची लेगसी, कॅपिटल मार्केट्सची स्थिती, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमाण नि कंपोझिशन, तंत्रज्ञानांचा परिणाम, राजकीय घडामोडी, नैसर्गिक घडामोडी (पाउस, भूकंप), आंतरराष्ट्रीय घडामोडी (रेसेशन्स, ट्विन टॉवर),सामाजिक बदल (लोन्स घेणे, न घेणे, बचत करणे, न करणे, परदेशवार्‍या करणे), संक कॉस्ट्स, मिनिमम ओब्लिगेटरी एक्सपेंडीचर, हे घटक कितीतरी प्रमाणात सरकारच्या कंट्रोल मधेच नसतात. शिवाय अगोदरच्या अर्थिक सायकलचा एक मोमेंटम असतो.

मग काय पाहावे?
१. सरकार कसे, कोणते कर लावते, बदलते? फायनान्सिंग कसे करते? फिस्कल पॉलिसी कशी आहे?
२. कोणते कायदे करते, असे करून कोणत्या क्षेत्रात सुलभता आणते, कुठे काम अवघड करते. कोणते रेग्यूलेटरी कायदे करते, कोणते सबसिडी देनारे करते, कोणते (लोकांचे) उत्पन्न वाढवणारे कायदे करते?
४. हे कायदे नीटपणे अंमलात आणले जातात का? कि निर्भया फंड, डोनर फंड रचत जायचे?
५. देशाच्या स्टॅतेजिक गरजा, सामाजिक गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी प्रकल्प हातात घेते का? त्याची फायनान्सींग करून, योग्य ते क्लिअरारान्सेस घेऊन पूर्णत्वास नेते का? ती कॅपॅसिटी इ नीट प्लॅन केलेली निघते का?
६. कालामानानुसार नागरिकांच्या गरेच्या वस्तूत, प्रमाणात बदल होतो. एक मोठ्या स्केल वर गेल्यावर असे हिंदोळको त्या क्षेत्रास मारक असतात. सरकार पडू शकते. रोष होऊ शकतो
७. सगळ्याच किमती एकच पटीने वाढल्या तर तांत्रिकदृष्ट्या ते इंफ्लेशनच नव्हे. सरकार इकॉनोमी बूस्ट करते तेव्हा नवा पैसा एका कंडूइट मधून येतो. तिथल्या जवळच्यांचे फावते. ही रक्कम चांगली बजेटच्या ५% असते. मग पैसा कोठे ओतायचा आहे, कोणाला वर आणायचे, किती हे सरकारला किती चांगले कळते?
९. Interest rate, inflation rate, exchange rate संतुलित असतात का? मॉनेटरी पॉलिसी कशी असते? केंद्रिय बेंकेने प्रधान चालला तरी मार्केट प्यादे पण हलवत नाही असं तर नसतं ना?
१०. राज्यातल्या/देशातल्या सर्वात कमी पगारीवर असणार्‍या खाजगी कर्मचार्‍यांना पुरेसे वेतन मिळते का?
११. सरकारने मुद्दाम प्रगतीत कोणते अडथळे आणले?
१२. न्यायव्यवस्थेशी नाते कसे होते? कितीदा झाड पडली?
१३. कोणते मोठे प्रकल्प हातात घेतले? पूर्ण केले?
१४. आताच्या समस्यांची लिस्ट नेत्यांकडे आहे का?

२. सामाजिक स्थिती
इथे काय पाहावे
१. दंगली झाल्या का, होतील का?
२. सैन्यबले ठिक आहेत का?
३. आपदांग्रस्तांचे पुनर्वस्न्न झाले का?
४. सामाजिक सौहाद आहे का? भाषणे भडक आहेत का?
५. बालमृत्यू दर, जन्माच्या वेळी मातेच्या मृत्यूचा दर
६. चवदार, पुरेसा पोषण
७. शुद्ध नियमित पाणी

3. सुरक्षा
१.गुन्हे, कमी असणे
२. conviction rate जास्त असणे
३. सैन्य सबल असणे

२०१४ चा चुनाव बराच सौभाग्यपूर्ण आहे. अभूतपूर्व प्रमाणात मतदान झाले. कितीतरी एफ आय आर झाले. अटकी झाल्या. अजून केसेस पुढे येतील. काहींना आत घेत्लं जाईल. काहींची खासदारी आहे.

१. ज्यांना कम्यूनिलॅझम नको+ लोककल्याण हवे वाटते त्यांचा काँग्रेसचा आधार आहे.
२. ज्यांना विकास हवा, दृढ शासन हवे त्यांना भाजपचा आधार आहे.
३. ज्यांना दोहोंची किळस आली आहे त्यांना नवा, ताजा, तरुण, तरुणांचा, स्वच्छ, सांप्रतादायिकताविरोधी, आय आय टी यन वाला, निडर, बेधडक आआप आहे

सलील Thu, 24/04/2014 - 16:10

In reply to by अजो१२३

जोशीबुवा तुम्ही खरच महान आहात बुवा. इतक्या तपशिलाने आणि मुद्दे घेवून लिहिता आहात. कौतुक आहे. आपला तेवढा पेशन्स वा इंटरेस्ट नाही. कारण एकदा कळले की मोदी विरोध करणारच आहेत तर जास्त डोके फोडून फायदा नाही. ह्यांच्या लेखी मोदी सर्वगुणसंपन्न आणि ह्यांनी त्यांच्या सोयीनुसार ठरवलेल्या कसोट्यांवर पास झाला तर थोडे बरे. १० पैकी त्याने ६ गोष्टी केल्या तर सगळे लक्ष उरलेल्या ४ गोष्टींवर असणार आहे. बाकी कोंग्रेस आणि गांधी परिवार १० पैकी .५ गोष्टी केल्या तर .५ चे ५००% होणार असाच सगळा मामला आहे. ह्याच पद्धतीने आतल्या आवाजाची चिरफाड आजपर्यंत बघितली नाहीये. म्हणजे टी. बाळू पासून आरएसएस हे रिमोट कंट्रोलवाले आणि आतला आवाज फक्त निर्गुण निराकारी असा सगळा मामला आहे. असो.

चिंतातुर जंतू Thu, 24/04/2014 - 16:51

In reply to by अजो१२३

>> २. समलैंगिकता - भाजपची भूमिका सर्वाच्च न्यायालयाचीच भूमिका आहे. भाजपची भूमिका समलैंगिकांना अन्यायाची वाटते आहे. असे कशावरून म्हणता समलैंगिकांवर अन्याय करणे हिच भाजपची मूळ भूमिका आहे? या विषयावर तज्ञांत चर्चा होऊन जो निष्कर्ष निघेल तो पक्षास मान्य असेल असे लिहिले आहे. इथे का कांगावा करायचा? मग आआपच्या शांततेवरही करावा. भारतातले जेनेटिक्स इंजिनिअर, डॉक्टर्स, मानसष्स्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, या विषयावरच्या आंतरराराष्ट्रीय संघटना, कोठे कोठे रिकग्निशन आहे, कोठे कोठे विवाहास मान्यता आहे, इ इ पाहिजे पाअहिजे. ङायग्नोसिस अ‍ॅज डिसिज, दिसॉर्डर, क्यूरेबल , नॉन क्यूरेब्ल हे ही चेक केले पाहिजे. या लोकांचे प्रकार, उपप्रकार आणि प्रत्येक प्रकारची लोकसंख्या किती आहे हे ते पाहिले पाहिजे. Acknoledgement of a new gender, new sexual relation, new marriage contracts has vast implicatons to the society. लोकांची घरात स्वीकर्यता, समाजाचे प्रबोधन, सर्वांना मेनस्ट्रीम मधे घेणे, त्याची टाईमफ्रेम, त्याची व्यवहार्यता, हे सगळे चर्चिले पाहिजे.
LGBTTTAAIQQ ला मान्यता देणे नि त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणे हा जोक नाही. घाईघाईने ढसाळ निर्णय घेलते गेले तर पुढे कितीतरी काळ देशाच्या मागे वेगलीच लचांडे लागून बसतील.

विशेष उद्बोधक प्रतिसाद. एकेक मुद्दा घेऊ -

अरुणजोशी -

>> असे कशावरून म्हणता समलैंगिकांवर अन्याय करणे हिच भाजपची मूळ भूमिका आहे?

भाजप -

Rajnath came out strongly in support of the apex court and of Section 377. He told a newspaper, "We will state that we support Section 377 because we believe that homosexuality is an unnatural act and cannot be supported."

Backing party President Rajanth Singh's views on Section 377, BJP spokesperson Mukhtar Abbas Naqvi said, "What Rajnath Singh has said on section 377 is correct. We can't bring western culture into our society and culture."

स्रोत

अरुणजोशी -

>> मग आआपच्या शांततेवरही करावा.

आप -

The Aam Aadmi party is disappointed with the judgment of the Supreme Court upholding the Section 377 of the IPC and reversing the landmark judgment of the Delhi High Court on the subject. The Supreme Court judgment thus criminalizes the personal behavior of consenting adults. All those who are born with or choose a different sexual orientation would thus be placed at the mercy of the police. This not only violates the human rights of such individuals, but goes against the liberal values of our Constitution, and the spirit of our times.

स्रोत (पक्षाच्या संकेतस्थळावरून).

अरुणजोशी -

>> या विषयावरच्या आंतरराराष्ट्रीय संघटना, कोठे कोठे रिकग्निशन आहे, कोठे कोठे विवाहास मान्यता आहे, इ इ पाहिजे पाअहिजे. ङायग्नोसिस अ‍ॅज डिसिज, दिसॉर्डर, क्यूरेबल , नॉन क्यूरेब्ल हे ही चेक केले पाहिजे.

विवाहाची मान्यता आणि ३७७ कलमाने ठरवलेला गुन्हा ह्यांत फरक आहे. तुमच्या मते तो नाही का?

ङायग्नोसिस अ‍ॅज डिसिज, डिसॉर्डर :

In 1973, the American Psychiatric Association declassified homosexuality as a mental disorder. The American Psychological Association Council of Representatives followed in 1975.[3] Thereafter other major mental health organizations followed and it was finally declassified by the World Health Organization in 1990.

स्रोत - विकीपीडिआ

थकलो.

अनुप ढेरे Thu, 24/04/2014 - 22:23

In reply to by चिंतातुर जंतू

आम आदमी पार्टीनी हे ३७७ बद्दल स्वतःच्या जाहीरनाम्यात काहीही घेतलेलं नाही. हा बोटचेपेपणा कशासाठी मग?

चिंतातुर जंतू Fri, 25/04/2014 - 14:29

In reply to by अनुप ढेरे

>> आम आदमी पार्टीनी हे ३७७ बद्दल स्वतःच्या जाहीरनाम्यात काहीही घेतलेलं नाही. हा बोटचेपेपणा कशासाठी मग?

बोटचेपेपणासारख्या आरोपांचं खंडन करण्यात मला रस नाही. एक रोचक गोष्ट अशा प्रतिसादांत दिसते ती फक्त दाखवून देतो :

विदाबिंदू भाजप आप काँग्रेस CPM
समलैंगिकतेविषयी जाहीर भूमिका आहे का? होय होय होय होय
प्रौढांनी संमतीनं केलेली समलैंगिक कृत्यं कायदेशीर असावीत का? नाही होय होय होय
हा मुद्दा निवडणूक जाहीरनाम्यात आहे का? नाही नाही होय होय

ह्या माहितीवरून भाजपला प्रतिगामी म्हटलं गेलं, तर त्या विरोधात अनेक प्रतिसाद येतात. ह्या धाग्यावरही ते दिसतील. आपच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा नाही ह्याचा अर्थ काय, ह्यावर वाद घालायचा झाला तर तो घालता येईलही, पण त्यातून भाजप पुरोगामी ठरत नाहीच.
समलैंगिकता हा निवडणुकीसाठी किती महत्त्वाचा मुद्दा आहे ह्यावरदेखील वाद घालायचा झाला, तर तो घालता येईल, पण त्यातून तरी भाजप पुरोगामी ठरेल का?
मग असे मुद्दे उपस्थित करून नक्की काय होतं? तर माझ्या मते, पुरोगामित्वाचा मुद्दा बाजूला राहून भलत्या गोष्टींकडे लक्ष विचलित करता येतं आणि त्यातून 'ब्राऊनी पॉईंट्स' मिळवता येतात.
माहितीतून पुढे येणारं वास्तव काय आहे ह्यापेक्षा 'परसेप्शन' काय आहे ह्याचं महत्त्व ह्या निवडणुकीत कशा प्रकारे दिसतंय ह्याचा हा एक नमुना मानता येईल.
त्यात पुढे गंमत ह्याची वाटते की मध्यमवर्गीय, सुशिक्षित, आधुनिक नागरी राहणीच्या वगैरे लोकांकडून असं सातत्यानं होताना दिसतं. मला हा प्रकार खूप रोचक वाटतो. त्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठीच हा प्रतिसाद.

अजो१२३ Fri, 25/04/2014 - 18:07

In reply to by चिंतातुर जंतू

लोक लिंका दिल्या तर वाचत नाहीत असे असावे. या विषयावर आआप नि भाजप मधे फरक आहे, पण १९-२०.

BJP on Friday suggested that its stand on the Supreme Court judgement on Section 377 of IPC which upheld criminality of homosexual relations is still open, saying the debate over the issue is not yet over.

“If you look at the issue, I don’t think the debate is still over.... The court has upheld the validity of the Section. What is covered under the Section and what is not, there is ambiguity. So let the government go and exhaust that,” Leader of the Opposition in Rajya Sabha Arun Jaitley said at a FICCI Ladies Organisation event.

His comments came hours before the government moved the apex court seeking a review of its order.

Mr. Jaitley was replying to a question over his party’s stand against homosexuality and in support of the apex court order despite opposition to it from a large section, including Congress president Sonia Gandhi and party vice-president Rahul Gandhi.

BJP chief Rajnath Singh and several other party leaders had welcomed the Supreme Court order saying the party will not support anything “unnatural“.

Mr. Jaitley said Ms. Sushma Swaraj, Leader of the Opposition in Lok Sabha, had made it clear that the party would take a stand after government comes out with a decision first.

Centre on Friday filed a review petition in the Supreme Court on its order reinstating law criminalising homosexuality with Law Minister Kapil Sibal hoping that “right of personal choices” is preserved.

अस्वल Thu, 24/04/2014 - 21:51

In reply to by अजो१२३

तुमच्या प्रतिसादातील तपशीलांना सल्यूट!
मोदींवर गरजेपेक्षा जास्त टीका केली जात आहे हे मान्य, पण त्यांचे समर्थन देखील तितक्याच larger than life प्रमाणात होत आहे की नाही ?
तेव्हा पेटलेले मोदी समर्थक आणि विरोधक बाजूला क्षणभर बाजूला ठेवू.
मला म्हणायचं होतं ते असं - choosing a lesser evil ह्या पातळीवर मतदान करावं लागणार आहे. तेव्हा जर मोदिंविशयी साशंकता दाखवली तर त्याचा विपर्यास केला जातोय.
शेवट्च्या ३ मुद्द्यांत तुम्ही महत्वाच्या ३ पक्षांचे USP साधारणपणे अचूक मांडले आहेत, त्यात कुणाला काय महत्त्वाचं वाटतं त्यानुसार त्यांनी मत द्यावं.

अजो१२३ Fri, 25/04/2014 - 19:13

In reply to by अजो१२३

या प्रतिसादाला एकूण सात श्रेणीदाने झाली. पहिले झाले तेव्हा ३ गुण होते. शेवटचे झाले तेव्हा पुन्हा ३ आहे. मग मधली कशी झाली असतील?
३-४-५-६-५-४-३. म्हणजे ४ प्लस नि ३ मायनस.

मेघना भुस्कुटे Thu, 24/04/2014 - 17:19

बाकीचे लोक निदान इतकं तरी म्हणतात, "हां, असंही असू शकेल बॉ. बरोबर आहे हां, आम्हांला वाटत होतं तितकं धोकादायक नसेलही. तरी वाटते बॉ आम्हांला भीती. काय करणार... अनुभव तसे भीषण आहेत..." इत्यादी.

जोशींचं मात्र बरंय! त्यांना आलबेल वाटलं की सगळ्यांना सगळं आलबेल वाटलंच पाहिजे. कितीही विदा द्या, कितीही तर्कशुद्ध बचाव करा. मानवी भीती, मानवी स्वभाव, सामाजिक न्याय कशाचीही उदाहरणं द्या. ते गोलगोल फिरून आपले "पण मी म्हणतो तेच्च्च्च्च तर्कशुद्ध आहे. बाकी सगळं चूक असलंच्च्च्च पाहिजे!"वर ठाम असतात.

धागा आपला काढतोय सेंच्युर्‍या!

चालू द्या! मधल्यामधे मला मात्र भरपूर विदा मिळाला. थोडे गैरसमज बोथट झाले. थोडे समज बळावले. मस्त!

बॅटमॅन Thu, 24/04/2014 - 17:24

In reply to by मेघना भुस्कुटे

जोशींचं मात्र बरंय! त्यांना आलबेल वाटलं की सगळ्यांना सगळं आलबेल वाटलंच पाहिजे. कितीही विदा द्या, कितीही तर्कशुद्ध बचाव करा. मानवी भीती, मानवी स्वभाव, सामाजिक न्याय कशाचीही उदाहरणं द्या. ते गोलगोल फिरून आपले "पण मी म्हणतो तेच्च्च्च्च तर्कशुद्ध आहे. बाकी सगळं चूक असलंच्च्च्च पाहिजे!"वर ठाम असतात.

जोशी आडनावाचा गुण म्हणावा काय????

(हघ्याहेवेसांनल)

अजो१२३ Thu, 24/04/2014 - 17:43

In reply to by बॅटमॅन

विदा, तर्क, माहिती, दाखले, उदाहरने मी देतोय. शिवाय मला एकांगी भूमिका मांडायची नाही. मी हे सगळे करत असताना काही न कळून घेऊन हे लोक तिथेच गोल गोल्ल फिरत असतात नि थांबल्यावर विचारतात - अरे जोशी, तू तिथेच?

मेघना भुस्कुटे Thu, 24/04/2014 - 17:53

In reply to by अजो१२३

ते बरीक आहे. तुम्हांला एकांगी भूमिका मांडायची नसते, तुम्ही तर्क, विदा, माहिती, दाखले देत असता... हे इतक्यांदा पाहिलं आहे; तर्री आम्ही (पक्षी: स्त्रिया, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, पुरोगामी इत्यादी.) दर वेळी तुम्ही पुढे येण्याची अपेक्षा करतो हा एक आमचा मूर्खपणा आहे खराच. असो. तुमचं चालू द्या. हलक्यानं घ्या वगैरे आहेच शिवाय. :ड

अजो१२३ Thu, 24/04/2014 - 18:00

In reply to by मेघना भुस्कुटे

टी वी चॅनलवर प्रतिगामी, परंपरावादी, आर आर एसी, भाजपी, इ मंडळींला पण लोक किती झोडून पाठवतात. तुम्हा लोकांना मी इतका भारी का ठरतो?

अजो१२३ Thu, 24/04/2014 - 17:36

In reply to by मेघना भुस्कुटे

जोशींचं मात्र बरंय! त्यांना आलबेल वाटलं की सगळ्यांना सगळं आलबेल वाटलंच पाहिजे. कितीही विदा द्या, कितीही तर्कशुद्ध बचाव करा. मानवी भीती, मानवी स्वभाव, सामाजिक न्याय कशाचीही उदाहरणं द्या. ते गोलगोल फिरून आपले "पण मी म्हणतो तेच्च्च्च्च तर्कशुद्ध आहे. बाकी सगळं चूक असलंच्च्च्च पाहिजे!"वर ठाम असतात.

धाग्यात बरीच चर्चा पर्सनल अ‍ॅटकवर चालली आहे. पण राजनेत्यांच्या. कृपया तो माहौल संस्थळावर आणू नका.

अजो१२३ Thu, 24/04/2014 - 17:40

In reply to by मेघना भुस्कुटे

बाकीचे लोक निदान इतकं तरी म्हणतात, "हां, असंही असू शकेल बॉ. बरोबर आहे हां, आम्हांला वाटत होतं तितकं धोकादायक नसेलही. तरी वाटते बॉ आम्हांला भीती. काय करणार... अनुभव तसे भीषण आहेत..." इत्यादी.

तुम्हीच हिटलरी महौल बनवला आहे असं दिसतं तुमच्या वर्तुळात!!! (हलक्याने घ्या)

राजेश घासकडवी Thu, 24/04/2014 - 18:38

धाग्यात बरीच चर्चा पर्सनल अ‍ॅटकवर चालली आहे. पण राजनेत्यांच्या. कृपया तो माहौल संस्थळावर आणू नका.

असंच सर्वांना म्हणतो. या धाग्यावर वातावरण जरा जास्तच तापलेलं दिसलं. खडाजंगी चर्चा व्हायला काहीच हरकत नाही. पण काही वेळा मुद्द्यांपलिकडे व्यक्तींशी वाद सुरू होतो. आपण ज्या भूमिकांचा विरोध करतो त्या भूमिकांच्या जागी एखाद्या सदस्याला बसवतो आणि मग त्याला हाणायला सुरूवात करतो. त्यापायी प्रतिसाद-प्रत्युत्तरं ही तलवारींच्या घावांप्रमाणे एकमेकांना जखमी करण्यासाठी होतात. त्यांना अडवण्यासाठी बचावाच्या ढाली येतात. गंमत म्हणून कधीतरी हेही करायला हरकत नाही. पण सतत हेच करण्याचा तोटा असा की समोरच्याच्या युक्तिवादात जे काही घेण्यासारखं आहे त्याकडे दुर्लक्ष होतं. आणि आपलाच तोटा होतो.

हे एका विशिष्ट विचारसरणीला किंवा विशिष्ट आयडीला लागू नाही, तर जवळपास सगळ्यांसाठीच आहे.

अजो१२३ Fri, 25/04/2014 - 18:10

समलैंगिकता हा आजच्या भारताच्या समोरचा सर्वात मोठा, महत्त्वाचा नि कठीण प्रश्न आहे नि त्याधारितच मतदान व्हायला हवे असे वाटणारे कोण कोण आहेत?

अजो१२३ Sat, 01/09/2018 - 17:18

In reply to by अजो१२३

वास्तव असं होतं कि यांच्या निराधार भित्यांव्यतिरिक्त यांना भाजपला मत न द्यायला असं फारसं काही कारण नव्हतं. मग बाबा यांची भूमिका लेचीपेची आहे? एक मुद्दा मिळाला - समलैंगिकता. मग आता हाच माझा मुख्य मुद्दा. मूळात हे बॅक कॅल्क्यूलेट करत होते...!
================
साला एवढ्या विकसित नि अतिविकसित देशांत कधी समलैंगिकता निवडणूकीचा मुद्दा झाला नाही, भारतासारख्या इतर हजारो मोटःयाला समस्या असणाऱ्या देशात असणार?

अजो१२३ Sat, 01/09/2018 - 17:09

या धाग्यावर इथल्या सगळ्या प्राचीन,अर्वाचीन आणि आधुनिक पुरोगाम्यांची अक्कल मे २०१४ पूर्वीच किती आहे हे मी सप्रमाण सिद्ध केलं. हे सगळे बोंबलभाडे फुकटची कावकाव करत होते. इतका गंभीर संवाद करावा याची यांच्यापैकी एकाचीही लायकी नव्हती.
===================
काहीही डोकं न लावता काहीही भित्या व्यक्त करत फिरणे हा यांची कोणतीही अक्कल न लागणारा धंदा असतो. २०१४ मधे जे मोदीभक्त ह्यांना भीक न घालता शिव्या घालून पुढे निघत होते तेच खूप शहाणे होते असं मला २०१८ मधे वाटतं. कारण यांची एकही भिती खरी ठरलेली नाही, आणि यांचा बहुमत न येण्याचा अंदाज १००% चूक निघाला तरी आज हे बोंबलभाडे आजही सर्कारबद्दल नीट मत व्यक्त करत नाहीत. याचं कारण देशहिताची चाड इ नसून व्यक्तिगत अकलेचा माज हे आहे. आपली संपूर्ण बुद्धी वापरून तयार केलेलं सर्व तत्त्वद्न्यान मूर्ख निघालं म्हणून हे अजूनच चेकाळलेत. तो राहुल मंदबुद्धी आहे, केजरीवाल पिसाट आहे, आणि युती सरकार टाळावं, कोणतातरी एक पक्श देशपातळीवर सक्षम पक्श म्हणून उभा राहत नाही तोवर मोदी पीएम असल्यास काही हरकत नाही म्हणायचा प्रामाणिकपणा आजही या बोच्यांत दिसत नाही.
==================
झक मारली नि यांना इतके तार्किक प्रतिसाद दिले.

खुशालचेंडु Sun, 02/09/2018 - 14:53

In reply to by अजो१२३

तुम्हाला इतकं आयुष्य जाऊनही डावे कळायला वेळ लागला म्हणावयाचे. आम्हाला वयाच्या विसाव्या वर्षीच कळले.