स्त्री भ्रूण हत्या का होत असाव्यात?
स्त्री भ्रूण हत्या हि भारतातली एक समस्या. जगामध्ये स्त्री भ्रूण हत्या होतात कि नाही ह्याची कल्पना नाही. मात्र भारतात हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळते. अशी काय मानसिकता असेल कि वेडगळ कल्पनेपायी लोक आपल्या पोटच्या गोळ्याला निर्दयपणे खुडून टाकत असावेत.
स्त्री भ्रूण हत्येमागे सामाजिक,आर्थिक,धार्मिक कारणे आहेत जसे काही समाजात हुंडा द्यावा लागतो त्यामुळे मुलीचा जन्म हा तिच्या घरच्यांना आर्थिक दृष्ट्या अडचणीत आणणारा असतो यावर बरेच जन अघोरी उपाय वापरतात तो म्हणजे मुलीला गर्भात असतानाच खुडून टाकायचे अशी मानसिकता का होत असावी? इतर धर्मांमध्ये, देशांमध्ये स्त्री भ्रूण हत्या होतात कि नाही ह्याची कल्पना नाही.
स्त्रियांना भारतीय समाजात नेहमी दुय्यमच वागणूक मिळाली ह्याला इतिहास, पुराणकाळ, आजपर्यंत जितकी युगे झाली ती साक्ष आहेत...आज जरी स्त्रिया सर्व क्षेत्रात यशस्वी होत असल्या तरी पुरुषी मानसिकता बदललेली नाही ह्याचे मूळ कारण आपल्या पुरातन व्यवस्थेतच आहे. इंदिरा गांधी ह्या प्रधानमंत्री ह्या सर्वोच्च पदावर असतानाही त्यांना एका मंदिरात त्या स्त्री असल्याने प्रवेश नाकारला गेला होता असे एकून आहे(चू भू द्यावी घ्यावी. मी असे एकून आहे पण प्रत्यक्ष वाचनात आले नाही. कुणाला माहिती असल्यास द्यावी )मागे माझा एक ओळखीचा गृहस्थ पहिली मुलगी झाली म्हणून तिला पाहायला पहिले ३ महिने गेलाही नव्हता. अशी मानसिकता का होत असावी.
माझ्या मते वरवर जरी सामाजिक, आर्थिक कारणे दिसत असली तरी ह्याचे मूळ हे आपल्या पुरातन विचारधारेत आहे जसे मुलाने अग्नी दिला तर स्वर्गात जाता येते. मुलगा नसेल तर कुलक्षय होतो, मरताना मुलाची मांडी पाहिजे,त्याने अखेरचे पाणी तोंडात घातले पाहिजे.ह्या असल्या खुळ्या कल्पनेपायी नि आपला वंश टिकवा ह्या खुळापायी स्त्री भ्रूण हत्या होत असाव्यात असे मला वाटते.
भारतासारख्या प्राचीन नि सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या देशात स्त्री भ्रूण हत्येसारखे प्रकार व्हावेत हे आपल्याला लांच्छनास्पद आहे ह्यात शंका नाही.
स्त्री भ्रूण हत्येसारखा घृणास्पद प्रकार का होत असावा नि हे असले प्रकार रोखण्यासाठी काय केले पाहिजे ह्याबद्दल प्रतिक्रिया अपेक्षीत आहेत.
'प्रो-चॉइस का प्रो-लाईफ' हा
'प्रो-चॉइस का प्रो-लाईफ' हा प्रश्न स्त्रीभ्रूणहत्येसंदर्भात विचारणं ही दोन प्रश्नांची सरमिसळ आहे.
व्यक्तीला गर्भपाताचा हक्क हवा का नको, या अमेरिकन विवादामागे असणारी धार्मिक धारणा आणि स्त्रीभ्रूणहत्येवर बंदी आणण्यामागे असणारी सामाजिक धारणा यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. माझा धर्म बुडतो, म्हणून तुम्ही तुम्हाला नको असलेलं मूलही वाढवलंच पाहिजेत, किंवा माझा धर्म बुडतो म्हणून तुम्ही तुम्हाला नको असलेल्या कटकटी, शारीरिक कष्ट यांना सामोरं गेलंच पाहिजे हे निराळं. आणि समाजासमोर काही प्रश्न आहेत त्यांचा विचार करता, ठराविक चाचण्यांच्या निकालामुळे गर्भपातासाठी मनाई यांचा एकमेकांशी सुतराम संबंध नाही.
अर्थातच घेता येतो. पण मी 'यात
अर्थातच घेता येतो. पण मी 'यात निरर्थक ते काय' असे विचारले तेव्हा नक्की अर्थ कळला नाही कि अर्थ कळला पण म्हणणे वाह्यात आहे असे म्हणायचे आहे ते सांगावे लागेल.
सध्याला गब्बरचे हे प्रश्न विचारणे गंडलेले आहे असे कोणास का वाटले असा प्रश्न माझ्यापुढे आहे. त्या श्रेणीचे दोन अर्थ काढता येत असताना मी त्यापैकी एकच काढून विचार करावा असा कायदा आहे का?
गब्बरने एक स्टँडालोन प्रश्न विचारला. एक प्रकारचे स्वातंत्र्य योग्य कि अयोग्य? मग काय? या प्रश्नातून/ विधानातून काहीच अर्थ काढता येत नाही? असे नाही. प्रश्नच विचारणे चूकीचे आहे? असेही नाही. मग निररथक म्हणणारा क्षूर्क्ष वाटतो.
गब्बरसिंग तुम्ही वकील आहात का
गब्बरसिंग तुम्ही वकील आहात का ?
गर्भपात कायदेशीर असावा कि नसावा हा धाग्याचा विषय नाही तर स्त्री भ्रूण हत्या ज्या केल्या जात आहेत त्याविषयी आहे.
तुम्हीही एका प्रश्नाचे उत्तर द्या उत्तर थेट पणे द्या - म्हंजे खालीलपैकी १ -
१) स्त्री भ्रूण हत्येचे तुम्ही समर्थक आहात का?
(नैतिकदृष्ट्या) एकतर्फी प्रश्न
गब्बर सिंगांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत.
लेखकाचा "स्त्री भ्रूण हत्या का होत असाव्यात?" हा प्रश्न (नैतिकदृष्ट्या) एकतर्फी वाटतो. भ्रूणहत्या जर वाईट असेल तर कोणत्याही भ्रूणाची हत्या वाईटच, त्यात स्त्री-पुरुष असा भेदभाव नसावा.
आपला जोडीदार, (परवडेल तिथे राहण्याची जागा), नोकरी, मित्र, (कायदेशीर) छंद इ.निवडण्याचे स्वातंत्र्य असताना "मुली जन्माला घालाच" अशी शासनाकडून होणारी जबरदस्ती अयोग्य वाटते. "मला मुलगा हवा कि मुलगी हे ठरवण्याचा हक्क मला असावा, सरकारला नको."
न-अवांतरः भारतात-
- स्त्री-भ्रूणहत्या केल्यास शिक्षा होते का?
- पुरुष-भ्रूणहत्या केल्यास शिक्षा होत नाही का?
"मुली जन्माला घालाच" अशी
"मुली जन्माला घालाच" अशी शासनाकडून होणारी जबरदस्ती अयोग्य वाटते. >>>>>>> मुली जन्माला घाला अशी जबरदस्ती शासन करत नाही. शासन मुलगा होईपर्यंत जी स्त्री भृणांची हत्या केली जाते ती करू नका अशी जबरदस्ती करते
मला मुलगा हवा कि मुलगी हे ठरवण्याचा हक्क मला असावा, सरकारला नको.>>>> तुमच्या अशा वांझोट्या हक्कापायीच स्त्री भ्रूण हत्या होतात. आणि ह्याला कारणीभूत आहे आपली पुरातन विचारधारा जी स्त्री कनिष्ठ नि पुरुष श्रेष्ठ अशी विभागणी करते. पुरुष भ्रूण हत्या होतात ह्या बद्दल काही माहिती नाही तुम्हाला असल्यास द्यावी.
मला मुलगा हवा कि मुलगी हे
मला मुलगा हवा कि मुलगी हे ठरवण्याचा हक्क मला असावा, सरकारला नको
वामनराव, तुमच्याशी मी सहमत आहे. मी फक्त वेगळ्या शब्दात मांडेन - सरकारने तो माझा विकल्प (हक्क नव्हे. विकल्प) जबरदस्तीने रद्द केलेला आहे. व सरकारची ही कृती माझ्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करणारी आहे. रद्द केली पाहिजे.
हस्तिदंती
हस्तिदंती मनोर्यातून
यक्झ्याक्टली हाच शब्दप्रयोग माझ्या मित्राने माझ्या मुद्द्यांचा प्रतिवाद करताना केला होता. खरंतर हा शब्दप्रयोग प्रतिवाद नाहीच आहे. पण आपण तसे म्हणूया. ज्याप्रमाणे भारतीय म्यानेजर्स चा आवडता मुद्दा "थियरी व्हर्सेस प्रॅक्टिकल" आहे त्याप्रमाणे भारतीय्/अमेरिकेतील सुद्धा समाजधुरीणांचा आवडता शब्दप्रयोग "हस्तिदंती मनोर्यातून" हा आहे. प्रतिस्पर्ध्यास खजील करायला मस्त उपयोगी पडतो.
समस्या ही आहे की भ्रूणहत्यांबाबतच्या "प्रश्नावरील" सरकारने काढलेला तोडगा मात्र "हस्तिदंती मनोर्यातून" केलेला आहे असे कोणीही म्हणत नाही. पण तो तसा मात्र अवश्य आहे.
हस्तिदंती मनोर्यातून - या शब्दप्रयोगात - If you had the knowledge then you would not have acted that way. असा मुद्दा अध्याहृत आहे.
--
Plato made the fatal error of equating knowledge with virtue and assuming that if one knows what is right he will do what is right. ____ from page 184 of Thomas Cahill’s 2003 volume Sailing the Wine-Dark Sea: Why the Greeks Matter
गर्भपात कधी केला आहे त्यावर
गर्भपात कधी केला आहे त्यावर मत अवलंबून आहे.
एकदा का बर्यापैकी विकसीत (बहुदा पहिले काहि महिने/आठवडे - नक्की आकडा बघावा लागेल) म्हणजे मज्जारज्जु व इतर काहि अंगे डेव्हलप होऊन त्या "अळीवत्" जीवाचे (फ्युटस) काही "जाणीवा" असलेल्या अर्भकात रुपांतर झाले असेल नी त्यात कोणताही जीवघेणा व/वा त्यास जगणे अतिशय दुष्कर करणारा दोष नसेल तर इतक्या उशीरा केवळ "केवळ मूल नको आहे" या उपरतीने करवलेला गर्भपात मला गैर वाटतो.
मला पहिला प्रश्न विचारावासा
मला पहिला प्रश्न विचारावासा वाटतो तो म्हणजे स्त्री-भ्रूणहत्या होतात का? अर्थातच होतात, पण कितीशा? म्हणजे जन्माच्या वेळी नैसर्गिक रीत्याच मुलं जास्त जन्माला येतात. त्यामुळे ९४० मुली - १००० मुलं हे गुणोत्तर जगभर दिसतंच. यापेक्षा भारतात किती वेगळं चित्र आहे? आणि त्यातला किती फरक नैसर्गिक कारणांमुळे आहे आणि किती भ्रूणहत्यांमुळे आहे हे कसं शोधून काढणार?
मुलं नैसर्गिक रीत्याच जास्त जन्माला येतात.
मुलं नैसर्गिक रीत्याच जास्त जन्माला येतात>> महत्त्वाचे निरीक्षण. पूर्वी सतत युद्धसंन्मुख असल्याने पुरुषांची संख्या स्त्रियांच्या तुलनेत वेगाने घटत असल्याने उत्क्रांतीच्या नियमानुसार असे घडले असावे का हे तपासणे रोचक ठरेल. 'युद्धातील मृत्युंमुळे अनाथ झालेल्या स्त्रियांच्या पालनपोषणाची जबाबदारी उचलणे आणि अधिकाअधिक पुरुषांची उत्पत्ती करून झालेली पुरुषसंख्येची हानी भरून काढण्यासाठी प्रत्येक उपलब्ध 'भूमी' वापरात आणणे अशा दुहेरी हेतूने मध्यपूर्वेतील टोळीवाल्यांमधे पसरलेल्या इस्लाममधे बहुपत्नीकत्व रूढ झाले असावे असा माझा एक तर्क आहे. आजच्या स्थिर आयुष्याच्या काळात आणि स्त्री ही केवळ 'भूमी' नव्हे तर स्वतंत्र व्यक्ती आहे हे मान्य होऊ लागलेल्या काळात ते कालबाह्य व्हायला हवे असे म्हणता येईल.
पूर्वी सतत युद्धसंन्मुख
पूर्वी सतत युद्धसंन्मुख असल्याने पुरुषांची संख्या स्त्रियांच्या तुलनेत वेगाने घटत असल्याने उत्क्रांतीच्या नियमानुसार असे घडले असावे का हे तपासणे रोचक ठरेल.
हसून ठसका लागला. किती तो आपण कसे वैज्ञानिक दृष्टीकोणाचे आहोत हे दाखवायचा अट्टाहास!!!
आजच्या स्थिर आयुष्याच्या काळात आणि स्त्री ही केवळ 'भूमी' नव्हे तर स्वतंत्र व्यक्ती आहे हे मान्य होऊ लागलेल्या काळात ते कालबाह्य व्हायला हवे असे म्हणता येईल.
विषय गहन असल्यामुळे असे म्हणायची सुट आहेच.
असा प्रश्न का विचारावासा
असा प्रश्न का विचारावासा वाटला?
स्त्री गर्भाच्या हत्या होत नसतील असे का वाटले?
मुलगी नकोशी असणे ही पुरेशी एस्टॅब्लिश्ड फॅक्ट आहे असे वाटते. दुसरी/तिसरी मुलगी झाल्यास ती अनाथालयाला सरेंडर करणार्या कित्येक माता/कुटुंबे आहेत.
१.०६ (दर हजारी ९४३)हा सामान्य रेशो धरला तरी भारतात अनेक भागात तो दरहजारी नऊशेच्या खाली गेला असल्याचे आढळले आहे. एकूण भारतातसुद्धा तो ९०८ (१.१) इतका खाली आला आहे. "खाप रूल्ड" हरियाणात ८५७ (१.१६) आणि "प्रगत" महाराष्ट्रातसुद्धा ८९६ (१.११) म्हणजे भारतीय सरासरीच्या खालीच आहे.
मुलगी नकोशी वाटणं आणि मुलगा
मुलगी नकोशी वाटणं आणि मुलगा हवासा वाटणं या धारणेबद्दल शंका नाही. मला विचारायचं असं आहे की अस्तित्वात असलेल्या आकडेवारीवरून आपण 'भारतात दर हजार स्त्रीभ्रूणांपैकी दहांच्या(*) भ्रूणहत्या त्या स्त्रीगर्भ असल्यामुळे होतात' असं विधान करता येईल का? (*) - दहा हा आकडा महत्त्वाचा नाही, आपल्याला तिथे योग्य तो आकडा मिळवता येईल का असा प्रश्न आहे. तो आकडा किती असेल तर प्रश्न गंभीर आहे असं म्हणता येईल?
कारण भारतात ० ते ६ वयातल्या मुलामुलींचं गुणोत्तर १००० ला ९१२ होतं - २०११ च्या सेन्ससनुसार. हे गेल्या काही सेन्ससमध्ये घटलेलं आहे यात वादच नाही. मात्र प्रश्न असा आहे की यातली किती घट भ्रूणहत्यांमुळे झालेली आहे? उदाहरणार्थ, http://en.wikipedia.org/wiki/Human_sex_ratio इथे लिहिलेलं आहे -
In an extensive study, carried out around 2005, of sex ratio at birth in the United States from 1940 over 62 years,[14] statistical evidence suggested the following: For mothers having their first baby, the total sex ratio at birth was 1.06 overall, with some years at 1.07. For mothers having babies after the first, this ratio consistently decreased with each additional baby from 1.06 towards 1.03.
थोडक्यात दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं अपत्य हे मुलगी असण्याची शक्यता जास्त आहे. आता जर तिसरं चौथं पाचवं अपत्य होण्याचं प्रमाण कमी झालेलं असेल तर ० ते ६ वयोगटात मुलींची संख्या कमी झालेली दिसेल. गेल्या तीस ते चाळीस वर्षांत फर्टिलिटी रेट निश्चितच प्रचंड कमी झालेला आहे. अर्थातच हे कारण पुरेसं सेक्सी नाही. :)
किंवा दुसरं कारण पहा
A 2009 research paper published by Branum et al. reports the sex ratio derived from data in United States birth records over a 25 year period (1981–2006).[19] This paper reports that the sex ratio at birth for the white ethnic group in the United States was 1.04 when the gestational age was 33–36 weeks, but 1.15 for gestational ages of less than 28 weeks, 28–32 weeks, and 37 or more weeks.
आता आपण हजारात चाळीस-पन्नासचा विचार करतो आहोत, पण इथे हजारात शंभरचा फरक पडू शकतो. जेस्टेशनल एज काही कारणांमुळे बदललं तर मुलं जास्त पैदा होतील. हे भारतात बदललेलं आहे का?
पुन्हा, प्रश्न नाकारण्याचा प्रयत्न नाही. प्रश्न किती गंभीर आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. दुर्दैवाने मल्टिव्हेरिएट प्रॉब्लेम लोकांना आवडत नाहीत. साधंसोपं, सुटसुटीत, आणि भीतीदायक उत्तरं लोकांना पटकन पटतात. मग ती किती बरोबर आहेत याचा विचार होत नाही.
हे जरा अवांतर
हे जरा अवांतर आहे.
स्त्रीभ्रूणहत्या होणं हे स्त्रीपुरुषापत्यांमधला रेशो बिघडण्याचं एकमात्र आणि/किंवा महत्त्वाचं कारण नसण्याच्या शक्यतेची शक्यता आहे. पण गुर्जी, (तुमचे वेगवेगळ्या विषयांमधले दावे वाचताना मला कायम पडणारा हा प्रश्न) कधी कधी सत्याच्या शक्य तितक्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना निरागसपणे केलेली विधानं सामाजिक वास्तवाच्या परीघात मात्र शस्त्र म्हणून अंदाधुंद/विशिष्ट दिशेनं वापरली जाण्याचा संभव असतो - विधानकर्त्याचा उद्देश तसा नसला तरीही. (इथे तुमचं विधान सत्य का असत्य हे पडताळून पाहण्यासाठी लागणारा विदा मजजवळ नाही. मी विदा शोधायला जाणारही नाही, ते माझं क्षेत्र नाही. त्यामुळे विधान सत्य का असत्य याबद्दल मी काहीच म्हणत नाहीय, ध्यानात घ्या.) अशा वेळी आपल्या विधानाचं संभाव्य शस्त्रपण जाणून आपण विधान करताना पुरेसा विचार केला आहे की नाही, याबद्दल तुम्ही कधी काही विचार करता का? असा विचार करायला हवा (मग भलेही विचारान्ती तुम्ही तुम्हांला दिसलेलं सत्य मांडण्याबद्दल कुठल्याही दिशेनं निर्णय घ्याल, पण मुळात असा विचार करायला हवा) असं तुम्हांला वाटतं का? की असा विचार करणं हे अभ्यासकाचं कामच नाही, असं तुम्ही मानता?
कधी कधी सत्याच्या शक्य
कधी कधी सत्याच्या शक्य तितक्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना निरागसपणे केलेली विधानं सामाजिक वास्तवाच्या परीघात मात्र शस्त्र म्हणून अंदाधुंद/विशिष्ट दिशेनं वापरली जाण्याचा संभव असतो - विधानकर्त्याचा उद्देश तसा नसला तरीही.
हा युक्तिवाद भयंकर धोकादायक आहे याची कल्पना आहे का? 'तुम्ही म्हणता ते सत्य असलं तरी समाजहिताचं नाही' हा युक्तिवाद करणं योग्य नाही. समजा जर असं सिद्ध झालं की केवळ हजार स्त्रीगर्भापैकी एकाच गर्भाबाबत स्त्रीभ्रूणहत्या होते. तर 'जितका बागुलबुवा केला जातो तितका हा महत्त्वाचा किंवा गंभीर प्रश्न नाही' असं सिद्ध होणंच चुकीचं असं कसं म्हणता येईल? म्हणजे थोडक्यात 'बागुलबुवा आहे तेच बरं आहे' हा अंधश्रद्धात्मक विचार प्रश्न विचारण्यालाही अडथळा आणतो ही परिस्थिती निश्चितच वाईट वाटत नाही का?
की असा विचार करणं हे अभ्यासकाचं कामच नाही, असं तुम्ही मानता?
बव्हंशी हो. कारण मग हाच विचार सभ्यपणे मांडून जेम्स लेनला विधानं करण्यापासूनच थांबवता येतं.
मला मुळात प्रश्नच नीट कळलेला
मला मुळात प्रश्नच नीट कळलेला नाही. संशोधकाचं काम हे संशोधन करणं आहे. त्या संशोधनाचा अर्थ समाजासाठी योग्य पद्धतीने लावून चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने वापर करणं हे समाजाचं काम आहे. 'समाज चुका करेल म्हणून मी संशोधनच करू नये' किंवा 'या संशोधनातून समजा अमुक अमुक निष्पन्न झालं तर लोकांना काय वाटेल?' असे विचार करावेत असं तुमचं म्हणणं आहे का?
तुम्ही एखादं उदाहरण का देत नाही, जिथे संशोधकाने अविचार करून संशोधन केलं आणि सत्य मांडलं ज्याचे परिणाम वाईट झाले...
मी अजूनही काहीच म्हटलेलं
मी अजूनही काहीच म्हटलेलं नाही. सत्य काय आहे, हे शोधून काढा असंच म्हणतो आहे.
स्त्रीभ्रूणहत्या होण्यामुळे समाजाचं अहित होतं हेही सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ नाही. माझ्या मते समाजाचं जे अहित फार पूर्वी झालेलं आहे, त्याचा स्त्रीभ्रूणहत्या हा परिणाम आहे. स्त्रीभ्रूणहत्या थांबवायच्या असतील तर रोगाची लक्षणं थांबवण्याऐवजी रोगावर इलाज करणं जास्त महत्त्वाचं. त्यासाठी स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर शिक्षण, नोकऱ्या, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची शक्ती या गोष्टी मिळायला हव्यात. वीस वर्षांनी लग्नाच्या बाजारात स्त्रियांची संख्या कमी झाली, स्त्रियांची किंमत वाढली, विभक्त कुटुंबपद्धती जोपासली गेली की हुंडापद्धती आपोआप मरून जाईल, आणि त्याचबरोबर स्त्रीभ्रूणहत्याही थांबतील. आत्ता भ्रूणहत्यांविरोधी कायदे केल्याने नक्की काय साधलं जाईल माहित नाही.
हा आततायी युक्तिवाद वाटतो.
हा आततायी युक्तिवाद वाटतो. माझं म्हणणं असं आहे की स्त्रीभ्रूणहत्येवर बंदी घालून काही विशेष साधलं जात नाही. म्हणजे हा उपाय परिणामकारक नाही. शिक्षण देणं हा परिणामकारक उपाय आहे, तेव्हा तो करावा असं माझं मत आहे.
पण अजूनही गब्बरच्या प्रश्नाला नीट सरळसोपं उत्तर कोणी दिलेलं दिसत नाही. तेव्हा मीच त्याचा प्रश्न अधिक स्पष्ट करून विचारतो.
स्त्रीभ्रूणहत्या वाईट का? त्याचे दुष्परिणाम नक्की काय?
याचं उत्तर कोणीतरी असं देईल की 'सर्वच स्त्रिया संपल्या तर मानवजातच नष्ट होईल' वगैरे वगैरे. ते अर्थातच भोंगळ उत्तर आहे. कारण शंभरातल्या ऐशी स्त्रिया मारल्या तर उरलेल्या वीस स्त्रियांना इतका प्रचंड भाव येईल की सर्वांनाच मुली हव्याशा होतील. पण तरीही गैरसमज होऊ नये म्हणून प्रश्न थोडा सुसह्य करून विचारतो.
ज्या समाजात दोन टक्के स्त्रीगर्भ भ्रूणहत्या करून मारले जातात त्या समाजावर असे काय वाईट परिणाम होतील ज्यासाठी ते गर्भपात थांबवण्याची गरज पडावी?
एकांगी युक्तिवाद
स्त्रीभ्रूणहत्या वाईट का? त्याचे दुष्परिणाम नक्की काय?
याचं उत्तर कोणीतरी असं देईल की 'सर्वच स्त्रिया संपल्या तर मानवजातच नष्ट होईल' वगैरे वगैरे. ते अर्थातच भोंगळ उत्तर आहे. कारण शंभरातल्या ऐशी स्त्रिया मारल्या तर उरलेल्या वीस स्त्रियांना इतका प्रचंड भाव येईल की सर्वांनाच मुली हव्याशा होतील. पण तरीही गैरसमज होऊ नये म्हणून प्रश्न थोडा सुसह्य करून विचारतो.
ज्या समाजात दोन टक्के स्त्रीगर्भ भ्रूणहत्या करून मारले जातात त्या समाजावर असे काय वाईट परिणाम होतील ज्यासाठी ते गर्भपात थांबवण्याची गरज पडावी?
हा युक्तिवाद एकांगी वाटतो. स्त्री भ्रूणहत्या हे समाजातील असमानतेचे द्योतक आहे. अशा असमानतला विरोध करण्याची आवश्यकता नाही कारण त्याने समाजाचे फारसे नुकसान होत नाही असे म्हणणे हास्यास्पद वाटते. समांतर उदाहरण घ्यायचे तर 'स्लेव्हरीचे' घेता येईल. अमेरीकेतील सिव्हिल युद्धाच्या अगोदरचा विचार केल्यास, त्या समाजाचे स्लेव्हरीमुळे असे काय वाईट परिणाम होत होते जेणेकरून त्यांनी स्लेव्हरी थांबवावी. किंवा याच लॉजिकने, उद्या (ठराविक क्षमतेचा र्हास झालेल्या) विकलांग लोकांना मारून टाकल्याने समाजाचे असे काय नुकसान होईल? असे म्हणून अशा हत्या करणे योग्य होईल का? स्त्री भ्रूण हत्येनंतरही पुरूष भ्रूण जन्माला घालू न शकणार्या बायकांना टाकणे/ जीवे मारणे, (या वास्तवात घडणार्या घटना आहेत, अतिशयोक्ती नाही) याच न्यायाने, चालवून घ्यावे का? पुरूष भ्रूण जन्माला न घालू शकणारी असे कारण घटस्फोटाकरता चालवून घ्यावे का? वगैरे.
स्त्री भ्रूणहत्या हे समाजातील
स्त्री भ्रूणहत्या हे समाजातील असमानतेचे द्योतक आहे.
याबद्दल वाद नाहीच. असमानतेला विरोध आहेच, पण म्हणून त्यावर भलतेसलते उपाय करू नये इतकंच. त्यासाठी गुलामगिरीचं उदाहरण चुकीचं वाटतं. 'गुलाम बाळगण्याची प्रथा' ही सरळसरळ गुलामगिरीला पोषक होती. त्यामुळे तिच्यावर बंदी घालणं हे रोगावर इलाज करणं होतं. बाकीची उदाहरणं आततायी युक्तिवादाची आहेत. गर्भाशयातून बाहेर आलेल्यांना सर्वच समाज व्यक्ती मानतात आणि त्यांना मारून टाकण्याचे तोटे उघड आहेत, म्हणून बंदी घालतात.
माझा मूळ प्रश्न असा होता की स्त्रीभ्रूणहत्येमुळे समाजात स्त्री असमानता वाढीला लागते याबाबत काही विदा आहे का? विदा नसला तरी काही प्राथमिक युक्तिवाद तरी आहे का? कारण जे युक्तिवाद दिसतात ते भावनिक दिसतात. मग गब्बरने विचारलेला 'गर्भपात चालतो तर स्त्रीगर्भपात का नाही चालत?' हा प्रश्न शिल्लकच राहतो.
काहीतरी जेन्युइन युक्तिवाद येऊ द्यात की. काहीतरी मूलभूत मांडणी असूदेत. नाहीतर
- किती स्त्रीभ्रूणहत्या होते? माहीत नाही.
- अंदाज बांधण्याचा प्रयत्न करणार का? नाही.
- सेक्स रेशो बदलल्याची जी आकडेवारी दिसते त्याची स्त्रीभ्रूणहत्येपलिकडे इतर कारणं असू शकतील का? विचार करणार नाही.
- स्त्रीभ्रूणहत्या टाळल्याने स्त्रियांची परिस्थिती सुधारेल का? माहीत नाही.
- पण इतकं असलं तरी स्त्रीभ्रूणहत्या वैट्ट वैट्ट वैट्ट कारण असमानतेचं द्योतक, म्हणून त्याला विरोध केला पाहिजे, म्हणून विरोध.
इतकंच शिल्लक राहतं.
बेकायदेशीर गोष्टींचा कायदेशीर विदा कोठून आणायचा
किती स्त्रीभ्रूणहत्या होते? माहीत नाही.
या हत्यांची कोणतीही नोंदणी होत नसल्याने 'खात्रीशीर' विदा मिळणे नेक्स्ट टू इंपॉसीबल आहे हे सर्वजण जाणतातच.
- अंदाज बांधण्याचा प्रयत्न करणार का? नाही.
- सेक्स रेशो बदलल्याची जी आकडेवारी दिसते त्याची स्त्रीभ्रूणहत्येपलिकडे इतर कारणं असू शकतील का? विचार करणार नाही.
सेक्स रेशोकडे पाहिल्यास भारताचा (१.१२) नंबर पाचवा आहे (वर्स्ट रेशो पहिल्या नंबरावर). जगातील सर्व प्रगत देशांचा सेक्स रेशो १ च्या जवळ आहे. युनिसेफनुसार १९४१ साली भारताचा सेक्स रेशो आजच्या प्रगत देशांचा रेशोसारखा होता. तुम्ही वरती प्रतिसादात दिलेली जेनेटीक वगैरे कारण सर्वच देशांना अप्लाय व्हावीत, असे असता भारताचाच सेक्स रेशो इतका का बदलावा?
"One school of scholars suggest that any birth sex ratio of boys to girls that is outside of the normal 105-107 range, necessarily implies sex-selective abortion In the absence of manipulation, the sex ratio at birth is remarkably consistent across human populations, with 105–107 male births for every 100 female births."
भ्रूण हत्येपलिकडे कोणती कारणं असतील? याबद्दल कोणी काही लिहलेले नाही. त्यामुळे आम्ही विचार करायला तयार नाही हे खरे नाही. त्याउलट स्री भ्रूणहत्याच हेच 'महत्त्वाचे' कारण आहे असे युनिसेफ वगैरे अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्था म्हणत आहेत. तेव्हा असा दावा करणारे आम्हीच कोणत्या गैरसमजात आहोत असे का वाटावे?
आम्हाला माहित असलेल्या माहितीप्रमाणे, शिवाय यासंबंधी काम करणार्या संस्थांच्या म्हणण्याप्रमाणे भ्रूणहत्या हे कारण आहे हे (फार वेळ, श्रम इ. न करता) मानायला आम्हाला जड जात नाहीए. तुम्हाला इतर कारणं माहित असतील तर ती विद्यासह जरूर मांडांवी, ती आम्हाला पटली तर आम्हीही मान्य करू.
स्त्रीभ्रूणहत्या टाळल्याने स्त्रियांची परिस्थिती सुधारेल का? माहीत नाही.
फक्त याने स्त्रियांची परिस्थिती सुधारेल असे कोणी म्हणत असेल तर ते चूक आहे.
इररेस्पेक्टीव्हली, आकडेवारी काहीही असो, फक्त स्त्री असल्याने भ्रूणाची हत्या करणे हे चूक आहे आणि म्हणून ते बेकायदेशीर असावे असे माझे मत आहे. काही स्त्रीभ्रूणांची हत्या झाल्याने समाजाचे असे काय मोठे नुकसान होत आहे? तस्मात स्त्रीभ्रूणहत्या बेकायदेशीर असण्याचे कारण नाही तुमचा युक्तिवाद आहे.
'गर्भपात चालतो तर स्त्रीगर्भपात का नाही चालत?'
हा प्रश्न वरवर संयुक्तिक वाटला तरी फसवा आहे. गर्भपात चालतो यात स्त्रीगर्भपातही आला, फक्त स्त्री गर्भपाताला विरोध आहे असे नाही. असामनतेमुळे केल्या गेलेल्या फक्त स्त्रीभ्रूणगर्भपाताला विरोध आहे. विकसीत देशात, जिथे स्त्रि-पुरूष समानता आहे तिथे गर्भ धारण करावा का नाही, मूल जन्माला घालावे का नाही इत्यादी निर्णय घेण्याचा निर्णय स्त्रीला असावा. याविरूद्ध, जिथे स्त्री-पुरूष असमानता ढळढळीत आहे, अशा ठिकाणी स्त्री भ्रूणाच्या हत्येला अटकाव घातला जावा. यात परस्पर विरोध आहे असे मला वाटत नाही. गर्भाच्या लिंगाचे निदान होऊन गर्भपात करणे (२०-२५ आठवडे) आणि गर्भधारणेच्या काही आठवड्यातच गर्भपात करणे हे एकाच पारड्यात मोजणे विनोदी आहे. (नॉट टू मेन्शन, रेप, इन्सेस्ट इत्यादींमुळे राहिलेला गर्भ.)
सर्वात प्रथम माझ्या प्रश्नाला
सर्वात प्रथम माझ्या प्रश्नाला योग्य प्रकारचं उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. विशेषतः दिलेल्या दुव्यातला पेपर वाचनीय आणि मननीय आहे.
स्त्रीभ्रूणहत्येपलिकडचं महत्त्वाचं कारण कोणीच नोंदलेलं नाही याचं आश्चर्य वाटलं. ० ते ६ मध्ये मुलं मोठ्या प्रमाणावर आजारी पडतात. त्यात मुलांना अधिक औषधोपचार, व मुलींना कमी हेही कारण असू शकतं. फर्टिलिटी रेटमधल्या बदलाचं कारण मी आधी नोंदलेलं आहेच. या कारणाचा अर्थातच लेखकाने विचार केलेला नाही. ग्लोबल वॉर्मिंगचाही केलेला नाही, पण तरीही काही प्रमाणात सेक्स सिलेक्टिव्ह अबॉर्शन्स होतात हे सिद्ध करण्यात लेखक यशस्वी झालेला आहे. अंदाजच बांधायचा झाला तर भारतात हे प्रमाण हजार स्त्रीगर्भांपैकी सुमारे पंधरा इतकं असावं असा अंदाज बांधता येतो.
काही स्त्रीभ्रूणांची हत्या झाल्याने समाजाचे असे काय मोठे नुकसान होत आहे?
या प्रश्नात जो तुच्छतादर्शक भाव आहे तसा भाव माझा निश्चितच नव्हता. स्त्रीभ्रूणहत्येला विरोध केल्याने काय फायदा होणार आहे असा प्रश्न होता. त्याचं उत्तर अजून नीटसं मिळालेलं नाही, पण वरच्याच पेपरमध्ये जी भाकितं केलेली आहेत ती अतिरेकी वाटतात. (अर्थात हे गट फीलिंग आर्ग्युमेंट आहे.) वीस वर्षांनी भारतात बलात्कारांचं प्रमाण घटताना दिसेल यावर मी पैज लावायला तयार आहे. वीस वर्षांनी भारतातलं गुन्ह्यांचं प्रमाणही घटताना दिसेल याबाबतही...
डीव्हीएशन
फर्टिलिटी रेटमधल्या बदलाचं कारण मी आधी नोंदलेलं आहेच. या कारणाचा अर्थातच लेखकाने विचार केलेला नाही.
लेखातूनः "This slight excess of male births was first documented in 1710 by John Graunt and colleagues for the population of London (4), and many studies of human populations have confirmed their finding. A key study of births for the period 1962 to 1980 in 24 countries in Europe showed a sex ratio of 105–107, with a median of 105.9 (5). The latter figure is widely used as the baseline for calculating deviations in the sex ratio. "
यामध्ये, ग्लोबल इफेक्ट असणार्या जेनेटीक वगैरे घटकांचा सामावेश व्हावा. (भारत, चायना इ. बद्दल काही विशेष एक्सेप्शन असल्यास कोणते याबाबत कोठे काही म्हणलेले दिसत नाही.)
स्त्रीभ्रूणहत्येला विरोध केल्याने काय फायदा होणार आहे असा प्रश्न होता.
समाजातील काही घटक कायद्याच्या भीतीने का होईना पण भ्रूणलिंगचिकित्सा, स्त्री भ्रूण हत्येपासून लांब राहतील. काही कायद्यांमुळे समाजाला सुधार आणण्यात मदत होते अशा प्रकारचा हा कायदा आहे असे समजायला हरकत नाही. (समांतर उदाहरण रेशीयल प्रोफायलींगचे घेता येईल.)
वीस वर्षांनी भारतात बलात्कारांचं प्रमाण घटताना दिसेल यावर मी पैज लावायला तयार आहे. वीस वर्षांनी भारतातलं गुन्ह्यांचं प्रमाणही घटताना दिसेल याबाबतही..
माझ्या गट फिलींगनुसारः भारतातील शहरांचे आकडे काढले तर गेल्या दशकांत स्त्री भ्रूण हत्येत घट झालेली असेल असे वाटते. त्याच धर्तीवर पुढील वीसवर्षात भारतातील चित्र सुधारेल असं मला वाटतं. पण जर स्त्रिभ्रूणहत्या बेकायदेशीर नसेल तर चित्र सुधारायला जास्त वेळ लागेल.
एकतर स्त्रिया कितीही कमी
एकतर स्त्रिया कितीही कमी झाल्या, तरी त्यांना भाव येत नाही. म्हणजे किंमत (प्राइस) येते, पण किंमत (व्हॅल्यू) उरत नाही. बहुधा त्यांची कमतरता असताना माणूस म्हणून त्यांना आत्मसन्मान, निर्णयस्वातंत्र्य, निवडीला वाव देण्यापेक्षाही त्यांना वस्तू म्हणून ’जपणं, विकणं, विकत घेणं, राखणं, मिरवणं, चोरणं’ सोपं जातं असावं. (इथे तुलना अस्थानी वाटेल कदाचित - किंवा नाहीही - पण कुठल्याशा विशिष्ट जातीतल्या माकडांच्या माद्या आठवल्या. माद्यांची संख्या रोडावलेली आहे आणि प्रचंड आक्रमक-सेक्शुअल उपासमार झालेले नर त्यांच्यावर बलात्कार करतात तो सहन करून जगणं त्यांना भाग आहे. (आता हे कोरिलेशन की कॉजेशन ते तुम्ही ठरवा. ;-)))
दुसरा आक्षेप वर नायल्यानं मांडला आहे. असमानता हा मुद्दा जर मुद्दाच मानायचा नसेल, तर मात्र वादात तसा काही अर्थ उरत नाही.
स्त्रियांची संख्या कमी
स्त्रियांची संख्या कमी झाल्याने त्यांची व्हॅल्यू वाढेल की नाही हे क्षणभर बाजूला ठेवू. मुद्दा असा आहे की स्त्रीगर्भपात वाढल्याने तोटा होईल हे सिद्ध करण्याची स्त्रीगर्भपाताला विरोध करणारांची जबाबदारी आहे.
असमानतेला विरोध आहेच. पण स्त्रीगर्भपाताला विरोध केल्याने असमानता कमी कशी होईल हे सांगा की.
नगण्य वैज्ञानिक मुद्दे
For mothers having their first baby, the total sex ratio at birth was 1.06 overall, with some years at 1.07. For mothers having babies after the first, this ratio consistently decreased with each additional baby from 1.06 towards 1.03.
या विदेनुसार महाराष्ट्रात १००० मुलग्यांमागे ९३५ मुली पाहिजेत. त्यातही १.०७ असं गुणोत्तर घेऊन. भारताचा जननदर २.७ च्या आसपास आहे, (एकापेक्षा बराच जास्त) म्हणजे खरंतर १००० मुलग्यांमागे ९३५पेक्षा जास्तच मुली पाहिजेत. पण नाहीत.
(प्रश्न - जननदरामध्ये गर्भपात मोजत नाहीत. म्हणजे मुळातच काही कारणाने (मूल नकोय, सध्या मूल नकोय, हे मूल नकोय, ही मुलगी आहे ती नकोय इ. शिवाय दुधात बुडवून वगैरे मुली मारतात ते निराळंच; ते सांख्यिकीमध्ये येतच नाही.) गर्भपात केलेला असेल तर ते मोजणार नाहीत. त्यामुळे जननदर कमी झालेला आहे हे म्हणताना आधी गर्भपात किती स्त्रिया करून घेतात याचा विचार करावा लागेल काय? ते ही मोजायचं असेल तर परिस्थिती आणखी गंभीर बनते. अर्थात या प्रकारे लिंगगुणोत्तर का बदलतं - वैज्ञानिक कारणं, हे जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत गर्भपाताचा मुद्दा कितपत महत्त्वाचा हे सांगता येत नाही.)
A 2009 research paper published by Branum et al. reports the sex ratio derived from data in United States birth records over a 25 year period (1981–2006).[19] This paper reports that the sex ratio at birth for the white ethnic group in the United States was 1.04 when the gestational age was 33–36 weeks, but 1.15 for gestational ages of less than 28 weeks, 28–32 weeks, and 37 or more weeks.
हे वाक्य वरवर दिसायला सेक्सीच दिसतं. पण -
१. २८ आठवडे आणि २८-३२ आठवडे असे दोन गट निरनिराळे करण्याचं कारण समजलं नाही.
२. ठराविक वर्षात किती मुलं (मुलगे+मुली) ३३-३६ आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर जन्माला आली आणि २८ आठवडे, २८-३२ आठवडे आणि ३७ आठवड्यांपेक्षा जास्त इतक्या गर्भधारणाकालानंतर जन्माला आली याचा काही अंदाज असल्याशिवाय या वाक्याला सदर चर्चेत फारसा अर्थ नाही.
२अ.यासाठी टोकाचं उदाहरण द्यायचं तर समजा ३३-३६ आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर ९५% मुलं (मुलगे+मुली) जन्माला आली आणि ५% या तीन गर्भधारणाकालांमध्ये, तर त्यातून लिंगगुणोत्तर १.०५ मिळतं. (हजार मुलग्यांमागे ९५२ मुली.) महाराष्ट्र, हरियाणाचं लिंगगुणोत्तर १.१२ आणि त्यापेक्षा वाईट का याचं पुरतं स्पष्टीकरण मिळत नाही.
२ब. समजा ५०% मुलं (मुलगे+मुली) ३३-३६ आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर जन्माला आली आणि ५०% इतर तीन गर्भधारणाकालांमध्ये तर त्यातून लिंगगुणोत्तर १.१४ मिळतं. (१००० मुलग्यांमागे ८७७ मुली.) हरियाणाचं लिंगगुणोत्तर त्यापेक्षाही जास्त, १.१६ आहे.
३. या वाक्याच्या पुढचंच वाक्य आहे "This study also found that the sex ratios at birth in the United States, between 1981–2006, were lower in both black and Hispanic ethnic groups when compared with white ethnic group." भारतीय 'वंशा'च्या लोकांचा अशा प्रकारचा विदा उपलब्ध नसावा. पण सदर विधानामध्ये टोकाची विदाच सादर केलेली आहे असं दिसतं. (हे लिंगगुणोत्तर असं दिसण्यामागे हिस्पॅनिक आणि कृष्णवर्णीय जनता अधिक धार्मिक आहे, गर्भपाताला पाप मानते असेही काही प्रकार असतील काय?)
४. ज्या अमेरिकेतली विदा गोळा करून ही निरीक्षणं मांडलेली आहेत, तिथे जन्माच्यावेळी लिंगगुणोत्तर १.०५ आहे. (विकी दुवा) थोडक्यात वरच्या २अ मुद्द्यामध्ये जे गणित किंवा गृहितक मांडलेलं आहे त्याच्या जवळपास. त्यामुळे भारतासाठी जन्मतेवेळी असणारं लिंगगुणोत्तर १.०६ मानणं विज्ञान, सांख्यिकीपलिकडचं वाटत नाही.
या प्रश्नाला 'मल्टिव्हेरिएट प्रॉब्लेम' बनवण्यात अडचण काहीच नाही, पण त्या बाकीच्या घटकांचा इथे असणारा संबंध नगण्य दिसतो आहे.
या विदेनुसार महाराष्ट्रात
या विदेनुसार महाराष्ट्रात १००० मुलग्यांमागे ९३५ मुली पाहिजेत. त्यातही १.०७ असं गुणोत्तर घेऊन.
नाही. तो विदा मुलामुलींचं गुणोत्तर किती आहे हे सांगण्यापेक्षा बदल का झाला असावा हे सांगण्याचं एक कारण होतं. आणि हा घटक नगण्य निश्चित नाही. समजा आपण एक साधं मॉडेल घेऊ.
गृहितक १ - कितवं मूल आहे यानुसार सेक्स रेशो खालीलप्रमाणे बदलतो.
पहिलं मूल - रेशो १.०६
दुसरं मूल - रेशो १.०५
तिसरं मूल - रेशो १.०४
चौथं मूल - रेशो १.०३
गृहितक २ - १९८० साली फर्टिलिटी रेट ४ होता, २०१० साली फर्टिलिटी रेट २ आहे. गणिताच्या सोयीसाठी प्रत्येक स्त्रीला तितकीच मुलं होतात हे गृहित धरू. (या गृहितकामुळे गणितात फरक पडत नाही हेही जरूर पडल्यास दाखवता येईल)
आता बाकी सर्व स्थिर असेल तर केवळ याच घटकामुळे सेक्स रेशो कसा बदलेल?
१९८० साली सेक्स रेशो १.०४५ - हजारात ९५७ मुली
२०१० साली सेक्स रेशो १.०५५ - हजारात ९४८ मुली
फक्त आकडेवारी तपासली तर 'पहा पहा, स्त्रीभ्रूणहत्या होत आहेत' असं सहज म्हणता येईल.
माझा मुद्दा असा आहे की इतर कुठची कुठची कारणं यामागे आहेत याचाही अभ्यास व्हावा. उदाहरणार्थ, ग्लोबल वॉर्मिंगमुळे पुरुष मुलं जन्माला येण्यात वाढ झालेली आहे का?
Helle et al. have studied 138 years worth of human birth sex ratio data, from 1865 to 2003. They find an increased excess of male births during periods of the exogenous stress (World War II) and during warm years. In the warmest period over the 138 years, the birth sex ratio peaked at about 1.08 in northern Europe.[21]
या स्वरूपाचं तापमानावर आधारित लिंगनिर्देशन इतर प्राण्यांत आढळून आलेलं आहे. आता उत्तर युरोपात जेव्हा हे झालं तेव्हा भ्रूणहत्या होत होत्या का?
पुन्हा एकदा सांगतो, की प्रश्न नाकारण्याचा प्रयत्न नाही तर प्रश्नाची व्याप्ती किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे.
खोलीतला हत्ती!
बदल का झाला असावा हे सांगण्याचं एक कारण होतं.
मुळातच ते अपुरं कारण आहे. १.०७ हा सगळ्यात जास्त skewed, नैसर्गिक आकडा घेतला तरीही सध्याचे भारतातले आकडे विपरीत स्थिती दाखवतात. अशा वेळेस पुढची कारणं, विदा वापरून काय नवीन माहिती मिळणार आहे? पुढच्या या वाक्याबद्दलही हेच म्हणता येईल - the birth sex ratio peaked at about 1.08 in northern Europe. या प्रकारचा विदा जमवण्यासाठी लागणारा unbiased विदा तरी भारतातून सध्या जमवणं शक्य आहे का?
टोकाची परिस्थिती घेऊनही जेव्हा भारतातले आकडे विदारक परिस्थिती दाखवतात तेव्हा मुख्य प्रश्न सामाजिक परिस्थितीचा असतो आणि त्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं. बाकी आकड्यांशी खेळायला, इतर व्हेरीएबल्सचा विचार करायला ना नाही, (ते दोन्ही मलाही आवडतंच), पण जिथे त्याचं महत्त्व नाही ते लिहून काय समजणार? (याउलट, भारतातली स्त्रीभ्रूणहत्या असा विषय बाजूल ठेवून, 'अर्भकांमधलं लिंगगुणोत्तर' असा विषय घेऊन कोणी, काही माहितीपूर्ण लिहीलं तर ते मी अगदी आनंदाने वाचेन. अशा परिस्थितीत लेखनामागचा उद्देश माणसाच्या शरीराबद्दल, कदाचित उत्क्रांतीबद्दल, जीवशास्त्राबद्दल असेल हे सरळ स्पष्ट समजतं.)
याला समांतर, भौतिकशास्त्रीय (ज्यात मूल्यांचा प्रश्नच येत नाही) उदाहरण द्यायचं तर एखाद्या धातूच्या पट्टीची लांबी मोजायची असेल तेव्हा चार वेगवेगळी व्हर्नियर कॅलिपर्स वापरली आणि लांबी मोजली. पण मुळात तापमान बदलतं असेल आणि त्यातूनच पट्टी, उपकरणांच्या मितींमध्ये बदल होत असेल तर चार वेगवेगळ्या व्हर्नियर कॅलिपर्सचा काय उपयोग होणार आहे?
स्त्रीभ्रूणहत्या हा विषय सुरू केलेला असताना, खोलीतल्या या हत्तीकडे दुर्लक्ष करून इतर छोटेमोठे जीवजंतू दाखवून, भारतासारख्या स्त्रीद्वेष्ट्या समाजाबद्दल काय नवीन समजतं?
---
अवांतर - मेघनाची तक्रार सार्थ ठरवणाऱ्या श्रेणी विद्रट प्रतिसादाखालच्या बहुसंख्य प्रतिसादांना मिळालेल्या आहेत काय?
या दुव्यावरची फिगर ५ पहा. यात
या दुव्यावरची फिगर ५ पहा. यात वेगवेगळ्या वंशांमध्ये किती वैविध्य आहे ते दिसून येईल. त्यामुळे अमेरिकेची सरासरी भारताला जशीच्या तशी लागू होईल ही मागणी रास्त वाटत नाही.
त्याच दुव्यावरची फिगर ७ पहा. त्यात गोऱ्या स्त्रियांसाठी जन्माला आलेल्या मुलांचा सेक्स रेशो गेल्या तीस वर्षांत १०५८ वरून १०४८ वर आलेला दिसतो. याचा अर्थ तिथे मेल इनफंटीसाइड होतो असं म्हणता येईल का? हा बदल जर काही इतर कारणांमुळे होत असेल तर तशीच इतर कारणं भारतात का लागू होत नसावी?
त्याच दुव्यावरची फिगर ३ पहा. त्यात मुलांच्या बर्थ ऑर्डरप्रमाणे सेक्स रेशो दिलेला आहे. पाचवं, सहावं, सातवं, आठवं, नववं वगैरे मूल स्त्रीलिंगी असण्याची शक्यता प्रचंड जास्त आहे. सुमारे ३ टक्के. हजारात तीस! तेव्हा फर्टिलिटी रेट कमी होण्याचा परिणाम निश्चितच मुली कमी होण्यात होतो. त्यामुळे चारवरून अडीचवर बर्थरेट आला की सेक्स रेशो हजारात दहाने वाढणार (मुलांची संख्या वाढणार) हे उघड आहे. आपण गेल्या वीस वर्षांत हजारात तीसच्या फरकाबद्दल बोलत आहोत. तेव्हा त्यातल्या दहाचं कारण सापडणं म्हणजे एक तृतियांशाचं कारण सापडणं आहे.
असो. पुन्हा माझा प्रश्न नाकारण्याचा प्रयत्न नाही. नक्की किती मॅग्निट्यूडचा आहे याचा शोध आहे. दुर्दैवाने ज्या विषयाबद्दल लोकांना आस्था आहे अशा विषयाबद्दल असा प्रयत्न केला की भावनिक प्रतिसाद येतात. ते टाळून आकड्यांवर लक्ष केंद्रित करणं इष्ट.
>>दुर्दैवाने मल्टिव्हेरिएट
>>दुर्दैवाने मल्टिव्हेरिएट प्रॉब्लेम लोकांना आवडत नाहीत.
प्रॉब्लेम छोट्या तुकड्यात विभागणं हे विज्ञानाचे मोठे हत्यार आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो असं म्हटल्याने अनेक गोष्टींचं स्पष्टीकरण सुकर होतं. प्रत्यक्षात चंद्र पृथ्वीभोवती तश्श्या प्रकारे फिरत नाही.
समस्येची गंभीरता
समजा १% (हजारात १०) भ्रूणहत्या होत असतील तरी साधारण लाखाच्या वर भ्रूणहत्या भारतात दरवर्षी होत आहेत. म्हणजे भारताच्या इन्फंट मोर्ट्यालिटीच्या ~२५%. त्यामुळे १% जरी मानलं तरी समस्या मोठी आहे.
पण ही तुलना बरोबर नाही. तुलना
पण ही तुलना बरोबर नाही. तुलना भारतात दरवर्षी एकंदरीत गर्भपात किती होतात याच्याशी करायला हवी.
A Lancet paper in 2007 said there were 6.4 million abortions, of which 3.6 million or 56 per cent were unsafe. Ipas has calculated this based on the latest population and crude birth rates (CBR) which peg the number of induced abortion at 5,007,932[6] According to Census 2011, abortion taking place in institution varies from 32.0% in Chhattisgarh to 73.9% in Assam. http://en.wikipedia.org/wiki/Abortion_in_India
कदाचित स्त्रीभ्रूणहत्येवर बंदी घातल्यामुळे अनेक धोकादायक गर्भपात बेकायदेशीरपणे होत असतील. त्यामुळे मरणाऱ्या स्त्रियांची संख्या किती असेल?
असहमत.
कदाचित स्त्रीभ्रूणहत्येवर बंदी घातल्यामुळे अनेक धोकादायक गर्भपात बेकायदेशीरपणे होत असतील. त्यामुळे मरणाऱ्या स्त्रियांची संख्या किती असेल?
वरील ३६ लाखातील किती डिलीव्हरीज या 'अनसेफ' होत्या (ज्यात, पुरेश्या पैशांअभावी, इन्फ्रास्ट्रक्चर अभावी इ., म्हणून घरीच, 'सुईणीकडे' केलेल्या?)? किती डिलीव्हरीज 'अन-इंटेडेंड' (आणि म्हणून अनसेफ) प्रेग्नंसीज होत्या? या पेपरनुसारः "But the studies in India show that majority of the births particularly in the rural areas are still delivered at home"
उलट उदाहरण बांग्लादेशचे, जिथे २००१ ते २०१० या कालावधीत हॉस्पीटलमध्ये डिलीव्हर होणार्या स्त्रीयांची संख्या ९% वरून २३% वर गेली आहे, (आणि बहुतेक म्हणूनच) स्त्रीयांच्या मृत्यूत घट झाली आहे.
शिवाय, भ्रूण लिंगचिकित्सा बेकायदेशीर आहे. त्यामुळे, यातील किती गर्भपात हे 'सेफ' असतील हा एक महत्त्वाचा मुद्दा.
थोडक्यात, मृत्युचे प्रमाण आणि याचा थेट संबंध नक्की किती आहे, हे स्पष्ट नाही.
ही तुलनासुद्धा योग्य नाही.
ही तुलनासुद्धा योग्य नाही.
गर्भाचं लिंगनिदान करण्यासाठी निदान १८ आठवडे गर्भधारणाकाल असावा लागतो. या काळानंतर किती नैसर्गिक, अनैसर्गिक पण गर्भाचं लिंगनिदान न करता गर्भपात होतात आणि किती गर्भपात लिंगाधारित असतात अशी तुलना केली तर अधिक योग्य असेल. गर्भधारणेपासून पहिल्या दोन-चार आठवड्यांमध्ये केलेले गर्भपात 'मूल नकोय' किंवा 'आत्ता मूल नकोय' अशा प्रकारचे असतील तर त्यांचा इथे अर्थाअर्थी काहीच संबंध नाही.
या असुरक्षित गर्भपातांमध्येही किती गर्भपात पुरेशी वैद्यकीय व्यवस्था असणाऱ्या ठिकाणी होतात, असुरक्षिततेमागे आर्थिक, जातीय कारणं आहेत का वगैरे प्रश्नही येतात. जातीय कारणांचा उल्लेख कदाचित केलाही नसता, पण जुलै महिन्याच्या 'मिळून साऱ्याजणी'मध्ये पुणे-खर्डा लॉंग मार्चबद्दल लेख* आहे. त्या लेखातून दलित (= सवर्ण नसलेले आणि सवर्णांकडून नाडले जाणारे) लोकांवर सवर्ण व्यवस्थेकडून काय प्रकारे अन्याय होऊ शकतो याची कल्पना येईल. जिथे दलित लोकांना रेशन कार्ड मिळण्यासाठी नाडतात तिथे गर्भपातासाठी छळत नसतील आणि म्हणून दलित किंवा आर्थिकदृष्ट्या दलित स्त्रिया असुरक्षित मार्ग अवलंबत नसतील याची काय खात्री?
मुद्दा एवढाच, की गर्भपात धोकादायक ठरण्यामागची कारणं असंख्य असू शकतात. त्यांचा अभ्यास न करता फक्त स्त्रीभ्रूणहत्येवर बंदी घालण्यावर बोट ठेवणं निरर्थक वाटतं. There are too many variables with far less equations.
*ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हा लेख त्यांच्या संस्थळावरही येईल.
मी विचारलेल्या सरळसोट
मी विचारलेल्या सरळसोट प्रश्नाला सगळेच का बगल देत आहेत? पुन्हा एकदा विचारतो.
समाजातल्या शंभर स्त्रीगर्भांपैकी दोन गर्भ जर ते स्त्रीलिंगी आहेत म्हणून त्यांचा गर्भपात केला जात असेल तर त्यातून समाजाचं नक्की वाईट काय होतं? हे असमानतेचं द्योतक आहे, असमानता वाईट हे मान्य आहे. पण स्त्रीगर्भपाताला विरोध करून नक्की फायदा काय होतो?
या प्रश्नाला जर सोपं उत्तर देता येत नसेल तर विरोध करणारांनी आपल्या भूमिका तपासून पहाव्यात. चांगलं उत्तर मिळालं तर मान्य करायला मी तयार आहे.
ग्रे!
या प्रश्नाला जर सोपं उत्तर देता येत नसेल तर विरोध करणारांनी आपल्या भूमिका तपासून पहाव्यात. चांगलं उत्तर मिळालं तर मान्य करायला मी तयार आहे.
असं सगळं ब्लॅक अँड व्हाईट थोडीच असतं. वास्तवात गोष्टी ग्रे असतात! (हे वाक्य घासू गूर्जींना सांगायला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं, चला, एक सर्कल पूर्ण झालं!) ;-) (ह.घे.)
या हत्या कायदेशीर केल्यास ही समस्या वाढणार नाही याची काय खात्री आहे?
१० कोटी
अमर्त्य सेन यांचा या संदर्भातील लेख -
http://www.nybooks.com/articles/archives/1990/dec/20/more-than-100-mill…
To get an idea of the numbers of people involved in the different ratios of women to men, we can estimate the number of “missing women” in a country, say, China or India, by calculating the number of extra women who would have been in China or India if these countries had the same ratio of women to men as obtain in areas of the world in which they receive similar care. If we could expect equal populations of the two sexes, the low ratio of 0.94 women to men in South Asia, West Asia, and China would indicate a 6 percent deficit of women; but since, in countries where men and women receive similar care, the ratio is about 1.05, the real shortfall is about 11 percent. In China alone this amounts to 50 million “missing women,” taking 1.05 as the benchmark ratio. When that number is added to those in South Asia, West Asia, and North Africa, a great many more than 100 million women are “missing.” These numbers tell us, quietly, a terrible story of inequality and neglect leading to the excess mortality of women.
११% डेफीसिट?
वर वाचल्याप्र्माणे, मुलांची संख्या जास्त असते म्हणून रेशो १.०५ ते १.०७ असतो. मग सेन यांनी ९४% स्त्रिया असताना त्या ६ डेफिसिटमधे वरचे ५ (रेशो १.०५ असल्याने) का मिळवले ते समजले नाही. म्हणून एकूण डेफिसिट ११% आला. या आकडेमोडीत काही चुकत तर नाही ना?
- स्वधर्म
आयला, हा आणि एक वेगळाच अँगल.
आयला, हा आणि एक वेगळाच अँगल. हिकडनं कधी विचार नव्हता केला. नवा अँगल दाखवल्याबद्दल धन्यवाद. रोचक प्रकार आहे एकूण!
एक शंका: अमेरिकेसाठी हा विदा दिसतो आहे, युरोपासाठीही असाच निष्कर्ष काढता येईल असाच विदा आहे का? तसं असेल तर मग तुमचा मुद्दा अजूनच बळकट होईल.
माझे ४ आणे
खूपच प्रतिसाद आहेत, आणि डिटेलवारी वाचण्याचे श्रम अत्ता नकोयेत
तस्मात मूळ प्रश्नाला उत्तर म्हणून अशी विचारसाखळी डोक्यात आली -
स्त्री भृणहत्या-> कारण लोकांना मुली नको आहेत -> लोकांना मुली का नको आहेत? -> बहुधा लोकांना मुलगी ही विविध स्तरांवर एक liability वाटते आहे.
मुली liability का वाटत असाव्यात ? निव्वळ जमा खर्च टाईप विचार केला तर -
आर्थिक भार - (शि़क्षण खर्च आणि पुन्हा लग्नखर्च)
भविष्य सुरक्षिततेचा अभाव - मुलगी "पोसल्याने" पुढची सुरक्षितता काहीच नाही. ती परगृही गेली की मग आई-बापाशी संबंध खुंटला
समाजाचा शॉट - मुलगी म्हणजे लोक हजार गोष्टी बोलणार, तिला अशा वाईट घटकांपासून सांभाळावं लागणार. "अकेली लडकी खुली तिजोरी" इ.इ.
पालक लग्नामधे आणि लग्नानंतरही आयुष्यभर पडेल बाजूचे हकदार.
इथल्या विद्रटपणामुळे केलेलं
इथल्या विद्रटपणामुळे केलेलं काही आंतरजाल संशोधन -
गेल्या वर्षीचा हा लेख - भारतात किमान अडीच लाख स्त्रीभ्रूणहत्या होतात.
विविध स्रोतांमधून गोळा केलेला हा काही विदा
| जनगणनेचं वर्ष | भारतात जननदर१ | दर हजारी मुलग्यांमागे मुलींची संख्या - भारत | महाराष्ट्र (कंसात लिंगगुणोत्तर) |
| १९६१ | ५.८६ | ९७६ (१.०३) | |
| १९७१ | ५.४१ | ||
| १९८१ | ४.६ | ९६१ (१.०४) | |
| १९९१ | ३.८४ | ९४५ (१.०६) | |
| २००१ | ३.०५ | ९२७ (१.०८) | ९१३ (१.०९) |
| २०११ | २.५९ | ९१४ (१.०९) | ८८३ (१.१३) |
१. हा विदा गूगल करून जे टेबल येतं, तो वर्ल्ड बँकेचा विदा वापरून घेतला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात जननदर किंचित कमी, २.४४ आहे.
याशिवाय बीबीसीच्या संस्थळावर हे इन्फोग्राफिस सापडलं, यातले पिवळे स्तंभ ०-६ वयाच्या मुलांचं लिंगगुणोत्तर आहे.

१९५८ साली अल्ट्रासाऊंड तंत्र वापरून लिंगनिदान करता येईल, अशा अर्थाचं संशोधन लँन्सेटमध्ये प्रसिद्ध झालं. १९६२ साली हे यंत्र प्रथम बनवलं. १९८० च्या सुमारास हे यंत्र भारतात आलं. १९९४ मध्ये स्त्रीभ्रूणहत्येविरोधात कायदा, the Preconception and Pre-Natal Diagnostic Techniques (Prohibition of Sex Selection) Act, पारीत झाला. २००४ साली या कायद्यात भर घालून गुन्हेगारांना शिक्षा, तुरुंगवास अशी भर घातली गेली. 'हम दो हमारे दो' याची सरकारी अंमलबजावणी आणीबाणीच्या काळात सुरू झाली असं आठवतं; म्हणजे १९८० च्या आधी. दोनच मुलं आणि मुलगा असण्याचा सांस्कृतिक आणि/किंवा धार्मिक हव्यास यातून स्त्रीभ्रूणहत्या वाढीला लागल्याचं चीन आणि भारतामध्ये दिसतं. १९६१ ते १९८१ या काळात बालकांमधलं लिंगगुणोत्तर १.०३ वरून १.०४ पर्यंत वाढलं, १ टक्क्याने. पुढच्या वीस वर्षांत हे गुणोत्तर ०.०४ ने वाढलं, ४% फरक. जननदराच्या फरकातून ४% बदल स्पष्ट करता येत नाही.
वरच्या विदेचं आणखी एक इन्फोग्राफिक इथे पहा.
(अर्थात हा विदा ०-६ वर्ष या वयाच्या बालकांचा आहे. यात गर्भपात/भ्रूणहत्येसोबत बालमृत्युसुद्धा दिसतात. पण ६-१५ वयाच्या बालकांचं लिंगगुणोत्तर ०-६ पेक्षाही वाईट (१.१२) दिसतं. म्हणजे ज्या मुली भ्रूणहत्येमधून वाचतात त्या पुढे मुलग्यांपेक्षा जास्त दराने आजारांमध्ये मरतात. मानवांमध्ये स्त्रिया अधिक तगून राहणाऱ्या असतात असं समजलं जात असताना याचा अर्थ मुलींचा मुलग्यांपेक्षा अधिक प्रमाणात अनैसर्गिक मृत्यु होतो, असा आहे.)
बहुतेक पश्चिम युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा अशा प्रगत देशात जन्मतेवेळी लिंग गुणोत्तर १.०३-१.०५ अशा प्रकारचं आहे. ज्या देशांमधला जननदर एकाच्या आसपास स्थिरावलेला आहे, मुलगाच हवा असा अट्टाहास नाही तिथलं लिंगगुणोत्तर भारताच्या सध्याच्या आकड्यांपेक्षा बरंच जास्त समानता दर्शवणारं आहे. त्यामुळे वरच्या टेबलातल्या दुसऱ्या कॉलमकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल.
मस्त विदा. हा वापरून मी हा
मस्त विदा. हा वापरून मी हा ग्राफ तयार केला. त्यात क्ष अक्षावर फर्टिलिटी रेट आहे, आणि य अक्षावर लिंगगुणोत्तर (हजार मुलांमागे मुलींची संख्या). हा समजून घ्यायला थोडा कठीण आहे, कारण प्रत्येक बिंदू हा विशिष्ट काळाचा आहे, आणि काळाचा प्रवास उलटा, म्हणजे उजवीकडून डावीकडे होताना दिसतो. ते समजण्यासाठी प्रत्येक बिंदूला त्या त्या वर्षाचं लेबल दिलेलं आहे. यावरून असं दिसून येतं की ६० पासून ते ८० पर्यंत लिंगगुणोत्तरात घट होत होती. ती फर्टिलिटी रेटला समानुपाती होती. ही रेषा निळी आहे. ८० नंतर कधीतरी ही घट होण्याचा दर वाढला. हा प्रवास लाल रेषेने दर्शवलेला आहे. म्हणजे थोडक्यात आधी ज्या काही कारणांमुळे घट होत होती त्यापेक्षा नवीन कारण ८० नंतर निर्माण झालं. या नवीन कारणामुळे झालेला बदल म्हणजे निळी रेषा व लाल रेषा यातलं अंतर. हे सर्व लिंगाधिष्ठित गर्भपातामुळे होतं असं गृहित धरलं तर हजार गर्भांपैकी सध्या सुमारे वीस-पंचवीस स्त्रीगर्भपात होतात असं म्हणता यावं.
+०.५
हे सर्व लिंगाधिष्ठित गर्भपातामुळे होतं असं गृहित धरलं तर हजार गर्भांपैकी सध्या सुमारे वीस-पंचवीस स्त्रीगर्भपात होतात असं म्हणता यावं.
हे गर्भपात लिंगाधिष्ठित असतात आणि त्यापुढे ६ वर्षांपर्यंत मुली मरण्याचा दर जास्त नाही, असं म्हणण्यास जागा आहे, कारण १९७८ च्या सुमारास अल्ट्रासाऊंड मशीन भारतात आलं. पण त्याआधीच्या काळात मुलगी जन्माला आली म्हणून मारली गेली असं होत असेल, तर ते स्पष्ट दिसणार नाही. (आठवा, य-अक्षावर ०-६ वयातल्या मुलींची दर हजारी संख्या आहे, जन्माच्या वेळची नाही.) पण त्या बाबतीत सामाजिक परिस्थिती माहित असणाऱ्यांच्या अंदाजावर विसंबून रहावं लागेल.
त्याखेरीज, फक्त जननदरात घट झाल्यामुळेच मुलींचं प्रमाण कमी झालं हे सिद्ध करण्यासाठी अन्य एखाद्या देशात, जिथे मुलग्याबद्दल सांस्कृतिक/धार्मिक हव्यास नाही, अशा प्रकारचा ट्रेंड दिसतो का हे बघावं लागेल. प्रगत, पाश्चात्य देशांमधला जननदर भारतापेक्षा बराच कमी असूनही मुलींचं प्रमाण भारताच्या १९७१ च्या प्रमाणाशी मिळतंजुळतं आहे.
---
धागा स्त्रीभ्रूणहत्येसंदर्भात असला तरीही मुलगी जन्माला आल्यावर मारणं आणि गर्भ मुलीचा आहे हे समजल्यामुळे तो पाडणं यामागची कारणं निराळी नसल्यामुळे ही समस्या एकत्र पाहता येईल.
इतर देशांमध्येही हे ट्रेंड
इतर देशांमध्येही हे ट्रेंड दिसलेले आहेत. शोध घेताना एक अतिशय सुंदर पेपर सापडला. यात आठ देशांमधल्या खात्रीलायक विद्याचा अभ्यास केलेला आहे. तो संपूर्ण वाचायचा नसेल तर त्याचा भाग तीन (तीन ते चार पानं) जरूर वाचा. त्यात त्यांनी वाढत्या दराची कारणमीमांसा दिलेली आहे. काही निष्कर्ष खालीलप्रमाणे.
- रॅंडम मेजरमेंट एरर - १ मिलियन जन्म होतात तेव्हा ९५% कॉन्फिडन्स लिमिटमध्ये १०५.५ ते १०६.५ यामध्ये कुठचंही उत्तर येऊ शकतं. भारतातल्या राज्याराज्यांमध्ये फरक का दिसतो याचं एक कारण. (केवळ हेच कारण आहे असं नाही)
- निओनेटल डेथ रेट मुलांसाठी अधिक असतो. जेव्हा वैद्यकीय सुविधा नव्हत्या तेव्हा जन्मलेली मुलं अधिक मरत आणि मुली कमी मरत. त्यामुळे मुलींची संख्या जास्त दिसते. १९६० सालापासून भारतात निओनेटल डेथ रेट झपाट्याने कमी झालेला आहे. त्यामुळे मुलांची संख्या जास्त होत असावी असं मानायला जागा आहे.
- महायुद्धकाळात युद्धग्रस्त देशांत मोठ्या प्रमाणावर मुलांची पैदास झालेली दिसून येते. याचा संबंध संभोगाच्या दराशी लावलेला आहे. मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जितक्या लवकर गर्भधारणा होईल तितकी मुलगा होण्याची शक्यता वाढते. हे प्रमाण भारतात वाढलेलं असू शकतं.
- कमी मुलं असली तर पुरुष मुलांचं प्रमाण वाढतं. काही देशांसाठी त्यांनी त्या वर्षीचं लिंगगुणोत्तर (मुलगे/मुली) आणि त्यावर्षी पहिली मुलं जन्माला येण्याचं प्रमाण यांचा संबंध दाखवलेला आहे.
थोडक्यात, वरच्या ग्राफमध्ये दाखवलेला ८० पर्यंतचा ट्रेंड भारतातच नव्हे तर इतर देशांतही दिसून आलेला आहे.
विदा दिला, मग?
स्त्रीभ्रूणहत्या, लिंगनिवड करून भ्रूणहत्या करणं ही एक स्वतंत्र गोष्ट म्हणून पाहिली जाऊ नये. स्त्रियांच्या दमनाचा हजारो वर्षांचा इतिहास, सद्यस्थितीत स्त्रियांना पदोपदी सहन करावा लागणारा लिंगाधारित अन्याय - यात जन्माला आल्यानंतर दुधात बुडवून मारणं, भावांना मिळतात त्यापेक्षा कमी प्रेम, आर्थिक मदत, शिक्षण, अधिक बंधनं अशा प्रकारचे घरात होणारे अन्याय, शाळा-कॉलेज-नोकरीच्या ठिकाणी होणारा दुजाभाव या सगळ्यांचा समावेश आहे. स्त्रियांना शिक्षणातही आरक्षण अाहे, दहावी-बारावीत अधिक मुली, मुलग्यांपेक्षा अधिक गुण मिळवून पास होतात तरीही कोणत्याही क्षेत्रात फारच कमी प्रमाणात स्त्रिया अधिकारपदावर दिसतात. या सगळ्यामागे लिंगाधारित अन्याय आहे. मुलगी, स्त्री ही दुय्यम प्रकारची नागरिक, व्यक्ती आहे, स्त्री हे 'सेकंड सेक्स' आहे अशा प्रकारचं सामाजिक वर्तन, अगदी स्त्रियांचंही, असतं.
ही विषमता आपल्या, मनुष्याच्या प्रगतीसाठी हानिकारक आहे; फक्त पुरुषप्रधान जगात (टिच्चून) टिकलेल्या स्त्रियांसाठीच नाही. ही विषमता दूर करण्यासाठी काही अक्सीर इलाज अजूनपर्यंत सापडलेला नाही. स्त्रीभ्रूणहत्याबंदी हा एक बॉटम अप उपाय आहे. (आता बॉटम अप विचारसरणी अमान्य करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण मग तो तुमचा शब्द विरुद्ध माझा शब्द इतपत वाद राहतो. आणि त्याला फारसा अर्थ नाही.) मुलगा-मुलगी समानता, फक्त दाखवण्याचीही नाही, करण्याचीही गोष्ट आहे हे या स्त्रीभ्रूणहत्याबंदीमधून ठसवता येतं.
समोर एखादी व्यक्ती नसताना तिच्याबद्दल वाईटसाईट बोलणं शक्य असतं, पण व्यक्ती समोर असताना ते जमत नाही. व्यक्तीविरोधात विघातक कृती करण्याचं प्रमाण आणखी कमी होतं. (या वर्तनासाठी संशोधन संदर्भ शोधलेला नाही. गूगल करून सहज मिळेल.) अशा प्रकारचे फोटोग्राफी प्रकल्प काही LGBT कार्यकर्त्यांनी चालवल्याचं आठवतं. तर अशा प्रकारचे सकारात्मक बदल समोर मुलगी/स्त्री असताना घडू शकतात. (बलात्काराच्या बातम्या बनतात, पण असे सकारात्मक बदल कमी प्रमाणात आणि सनसनीखेज नसल्यामुळे बातम्या येत नाहीत.)
असमानता व समानता चा मुद्दा -
असमानता व समानता चा मुद्दा - Most discussed and least understood सदरात मोडतो.
पण तरीही - माझा मुद्दा स्पष्ट पणे मांडतो - सरकारने क्ष व्यक्तीवर क्ष च्या खाजगी आयुष्यात क्ष ने इतरांना समानतेने वागवावे किंवा असमानतेने वागवावे - ही जबरदस्ती करण्याचा काहीही अधिकार नाही. व नसायला हवा.
बरोबर आहे तुमचं.
बरोबर आहे तुमचं.
कितीतरी मेरी क्यूरी पिचब्लेंडच्या ऐवजी फक्त आमटी ढवळत बसल्या आणि सायना नेहवाल हातात रॅकेटच्या जागी धोपाटणं घेऊन बसल्या तरी चालेल. पण हे २० व्या शतकातलं तंत्रज्ञान आम्हां १५ व्या शतकातल्या विचारसरणीच्या लोकांना वापरता आलंच पाहिजे. व्यक्तींना, पालकांना, समाजाला वाटत असेल आपल्या मुलींची बुद्धीमत्ता, कर्तृत्व सडावं तर ते सडवण्याचा अधिकार या सगळ्यांना मिळालाच पाहिजे. मुली, स्त्रिया या तशाही दुय्यम नागरिकच असतात ना. त्यांना न मिळणाऱ्या समान वागणूकीची फिकीर कशाला कोणी करायची; आम्हाला तर तो समानता-असमानता हा मुद्दा समजतच नाही.
ती लोकसंख्या कमी करताना झाला थोडा कोलॅटरल डॅमेज तर कशाला एवढा विचार करायला पाहिजे? कमी मुलं होणं तसंही स्त्रियांच्या फायद्याचंच ना!
अरेच्चा, गब्बर 'हम दो, हमारे दो'च्या विरोधात कधी का बरं बोलत नाही?
अरेच्चा, गब्बर 'हम दो, हमारे
अरेच्चा, गब्बर 'हम दो, हमारे दो'च्या विरोधात कधी का बरं बोलत नाही?
अवश्य.
माझा "हम दो हमारे दो" ला विरोध असेल पण फक्त जर सरकारने दांपत्यांवर "हमारे दो" ची जबरदस्ती केली तरच. इन दॅट केस - I will be tooth and nail opposed to it. रही बात "हम दो" की - मी पॉलिजिनि व पॉलीअँड्री चा समर्थक आहेच.
किती व कोणत्या अपत्यांना जन्म द्यायचा हा मुख्यत्वे दांपत्यांच्या अखत्यारीतील मुद्दा आहे. सरकारने त्यात ढवळाढवळ करायची नाही.
?
कितीतरी मेरी क्यूरी पिचब्लेंडच्या ऐवजी फक्त आमटी ढवळत बसल्या आणि सायना नेहवाल हातात रॅकेटच्या जागी धोपाटणं घेऊन बसल्या तरी चालेल.
मेरी क्यूरी आणि सायना नेहवाल यांनी हाताने अनुक्रमे आमटी ढवळणे आणि धोपाटणे बडवणे याऐवजी अनुक्रमे पिचब्लेंड आणि रॅकेटशी खेळण्यामागील रहस्य अनुक्रमे पोलंड+फ्रान्स आणि हरयाणा+आंध्रप्रदेश/तेलंगण येथील स्त्रीभ्रूणहत्याविरोधी/स्त्री-पुरुष असमानताविरोधी कडक कायदे आहेत, याची कल्पना नव्हती.
ऐकावे ते नवलच!/आयुष्यात रोज कायकाय नवीन गोष्टी शिकतो माणूस!
राजेश, माझा प्रश्न त्याहून एक
राजेश, माझा प्रश्न त्याहून एक पायरी मागे आहे
(कोणत्याही लिंगाची) भृणहत्या* व्हावी असे तुम्हाला वाटते का? त्या अर्भकाला जाणीवा आल्यानंतरही त्याचा जीव घेण्याचा निर्णय पालकांनी घेणे हे गैर नाहिये का?
'हत्या'ची माझी व्याख्या मी वर पुरेशी स्पष्ट केली आहे
यानंतर लिंगनिदान आवश्यक आहे का वगैरे प्रश्नांकडे वळु. तुर्तात हे आधी
मी भ्रूणहत्या ऐवजी गर्भपात हा
मी भ्रूणहत्या ऐवजी गर्भपात हा शब्द वापरेन. नक्की किती आठवड्यांपर्यंत गर्भ पाडून टाकणं सुरक्षित आहे, आणि योग्य आहे हे ठरवण्याचा निर्णय मी तज्ञांवर सोपवतो. पण अशी काही मर्यादारेषा आखली तर त्याआधी गर्भपात करता यावा असं माझं मत आहे. अशी मर्यादारेषा काहीशी आर्बिट्ररी असू शकेल, पण जिथे जिथे गर्भपात कायेदशीर आहे तिथे काही ना काही विचार करून अशी रेषा आखली गेलेली आहे.
जाणीव हा विषय मला थोडा निसरडा
जाणीव हा विषय मला थोडा निसरडा उतार वाटतो. उदाहरणार्थ मुलांना 'अहं'ची जाणीव साधारण एक वर्ष वय असताना होते. आपला जीव सांभाळण्यासाठी भीती आवश्यक आहे याची जाणीव आणखी थोडी नंतर. या विषयावर संशोधन करणाऱ्या काही संशोधकांचं म्हणणं आहे की चार वर्षांपर्यंत मुलांना पूर्ण जाणीव नसते; तोपर्यंत मुलांना संपूर्ण सजीव समजू नये.
मला व्यावहारिक प्रश्न आहे तो म्हणजे पालकांची मूल सांभाळायची आर्थिक पत नसेल, त्यातून ते मूल नकोसं असेल तर त्या मुलाचं पुढे काय होणार? आपल्याकडे इच्छा कितीही असली तरीही अनाथालयांची पुरेशी सोय नाही. कायदेशीर सक्ती करून हे जीव जगतील, पण पुढे काय?
जालावर शोधले असता जीवन\लाईफ
जालावर शोधले असता जीवन\लाईफ कधी सुरु होते याचं ठोस असं काहीच उत्तर नाही मिळालं. त्यामुळे गर्भपात हा मडर आहे का नाही याचं उत्तर हाती लागत नाही.
मला व्यावहारिक प्रश्न आहे तो म्हणजे पालकांची मूल सांभाळायची आर्थिक पत नसेल, त्यातून ते मूल नकोसं असेल तर त्या मुलाचं पुढे काय होणार? आपल्याकडे इच्छा कितीही असली तरीही अनाथालयांची पुरेशी सोय नाही. कायदेशीर सक्ती करून हे जीव जगतील, पण पुढे काय?
स्त्रीभृणहत्येमागे हाच व्यावहारिक प्रश्न असतो बहुदा. हुंडा, मुलीची सुरक्षा वगैरे..
अरण्यरुदन
गुर्जींच्या हेतूबद्दल शंका नाही, पण हे बरंचसं जंगल विसरून झाडं मोजत बसण्यासारखं होत चाललं आहे.
समांतर उदाहरण द्यायचं झालं तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे जाणवणारे परिणाम दीडशे वर्षांनंतर आटोक्याबाहेर जातील की एकशे त्रेचाळीस वर्षे, चार महिने आणि बारा दिवसांनी या चर्चेला तसा काही अर्थ नाही. ती करू नये असं नव्हे, पण अशा चर्चांचा 'ट्रोजन हॉर्स'सारखा उपयोग करून ग्लोबल वॉर्मिंग हेच मुळात थोतांड आहे असा बुद्धिभेद करण्यासाठी होऊ शकतो. अर्थात इथे तसा उद्देश नाही, त्यामुळे एक बौद्धिक कसरत म्हणून या चर्चेकडे पहायला हरकत नसावी. ('भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्याची कसोटी' हीदेखील शेवटी एक भावनाच हो श्याम, असं ग्योडेलियन आर्ग्युमेंट इथे करता येईल काय? ;))
ती करू नये असं नव्हे, पण अशा
ती करू नये असं नव्हे, पण अशा चर्चांचा 'ट्रोजन हॉर्स'सारखा उपयोग करून ग्लोबल वॉर्मिंग हेच मुळात थोतांड आहे असा बुद्धिभेद करण्यासाठी होऊ शकतो.
शहाण्यासुरत्या, अतिरेकी विचार न करणारांकडूनही ही भावना वेळोवेळी व्यक्त केली जाते. 'नाही, म्हणजे तुमचं बरोबर आहे हे आम्हाला समजतं, पण अशी चर्चा कोणा अतिरेक्याच्या हातात पडली तर त्याचे परिणाम वाईट होतील असं वाटत नाही का?' याच लेखावर दोन सुजाण व्यक्तींकडून हा विचार आलेला आहे. हे इतर वेळीही होताना मला दिसलेलं आहे. 'उगाच कीस का काढायचा?' 'बाल की खाल' 'विद्रटपणा' हेही आक्षेप येतात. त्याचबरोबर 'अशा गोष्टींचा खरोखर सांख्यिकीने अभ्यास करता येईल असं वाटतं का?' वेगवेगळ्या प्रकारचे हे आक्षेप, पण मला वाटतं त्यांच्यामध्ये, ते व्यक्त करताना असणाऱ्या दृष्टिकोनामध्ये काही साम्यं दिसतात.
पहिल्याप्रथम, हे आक्षेप अत्यंत नाजूक आणि जिव्हाळ्याच्या विषयाबाबत येतात. स्त्रीभ्रूणहत्या म्हणा, दलितांवरचे अत्याचार म्हणा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणा... यामागे सत्य किती, तथ्य किती हे विचारलं की तशा विचारण्याला नाजूकपणे विरोध होतो. नाजूकपणे अशासाठी, की सत्याची चाड महत्त्वाची हे मान्यच असतं. पण कुठेतरी 'अशी विचारणा करणं काही फार बरोबर वाटत नाही' अशीही भावना असते. याचं कारण म्हणजे स्त्रियांवरच्या, दलितांवरच्या, शेतकऱ्यांवरच्या अन्यायाची चाड ही त्या सत्याच्या चाडीपेक्षा प्रबळ असते. समाजात अन्याय तर आहेच. वाईट गोष्टी आहेत. पण तो मोजायचा प्रयत्न करणं हेच मुळी त्या अन्यायग्रस्तांच्या भावनांचा अपमान करण्याप्रमाणे वाटतं. हे का होतं?
मला असं वाटतं की तुम्ही-आम्ही उच्चशिक्षित, उच्चवर्णीय, श्रीमंत लोक प्रयत्नपूर्वक या अन्यायांपासून दूर राहतो. स्वतःचं सुरक्षित घरकुल बनवतो. भिंती बांधतो. आणि टीव्हीच्या खिडकीतून या सगळ्याकडे बघतो. आपण या व्यवस्थेच्या उतरंडीच्या वरच्या भागात असल्यामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य असतं. तळागाळातल्यांना ते नसतं. त्या दुःखांंच्या भयाण जंतूंपासून सुरक्षित निर्जंतुक वातावरणात आपण असतो. त्याचबरोबर दलदलीत पडलेले लोक आहेत याचं आपल्याला दुःख असतं. कळवळा असतो. आणि हा कळवळा योग्य प्रमाणात ठेवण्याची आपण काळजी घेतो. ही कणव खोटी नसते. पण एक प्रकारे उच्चवर्गीय समाजाने स्वतःवर लादून घेतलेली असते. याला इंग्रजीत व्हाइट मॅन्स बर्डन नावाचा शब्दप्रयोग आहे. तसा चपखल शब्दप्रयोग मराठीत माहीत नाही. या ओझ्यापायीच आपण 'समाजात अन्याय आहेत' अशा प्रकारच्या बातम्यांवर जास्त सहज विश्वास ठेवतो. आणि जग भल्याकडे चाललं आहे असं कोणी म्हटलं की अविश्वासाची प्रतिक्रिया देतो.
त्यामुळे जेव्हा आपल्यातलाच एक म्हणतो की 'हे खरोखरच एवढं मोठं दुःख आहे का?' तेव्हा ती आपल्या भावनेशी, कणवेशी प्रतारणा वाटते. जिथे माणूस म्हणून सहानुभूती द्यायची गरज असते तिथे प्रत्यक्ष तपासून बघण्याचा प्रयत्न पाषाणहृदयी वाटतो. जिथे टीव्हीवरच्या खिडक्यांतून दिसणारी चित्र पाहूनच हेलावून जाणं अपेक्षित असतं तिथे प्रत्यक्ष जमिनीवर उतरून निरीक्षण करणं, किंवा इतरांनी केलेल्या निरीक्षणांचा अर्थ लावणं हे कोरडेपणाचं वाटतं. आणि गंमत अशी आहे, की या बातम्यांत भावनिकरीत्या गुंतून न जाता तटस्थ पण उघड्या डोळ्यांनी बघण्याचा प्रयत्न करणं, याला 'हस्तिदंती मनोऱ्यात राहणं' म्हटलं जातं.
पाडगावकरांची एक प्रसिद्ध कविता आहे. 'या चंद्राशी त्या चंद्राचे कसले नाते...' त्यात ते म्हणतात की 'त्या चंद्रावर विज्ञानाची शिडी लावूनि जाता येते' मला आता कविता पूर्ण आठवत नाही, पण हा चंद्र मात्र मनाच्या तरल अवस्थेत, भावनिक, कविमनाच्या, प्रेमात पडलेल्यांनाच क्षणभर स्पर्शता येतो. थोडक्यात विज्ञानाची शिडी क्षुद्र, आणि आंतरिक भावनिक वगैरे गोष्टी लयभारी. ठीक आहे. पण ही शिडी तयार करताना किती सुंदर सत्यांची मौक्तिकं, रत्नं तिला जडवली आहेत याकडे का दुर्लक्ष करावं?
वर अभ्यासक आणि माणूस या भूमिकांचा उल्लेख आलेला आहेच. अभ्यासकाने माणूस असण्याचा, 'समाज नावाच्या गुंतागुंतीचं' (श्रावण मोडकांचा जालप्रसिद्ध वाक्प्रचार) भान ठेवण्याचा आग्रह होताना दिसतो. मी उलटा प्रश्न विचारतो. की माणसं फार आणि अभ्यासक कमी अशी परिस्थिती असताना माणसांंनीच थोडं अभ्यासक असण्याचा प्रयत्न का करू नये? भावनांची चाड आणि सत्याची चाड यांत भावनांना नेहमीच झुकतं माप का मिळावं?
सर्वांनीच सत्याला पुरेसं महत्त्व द्यायचं ठरवलं तर ट्रोजन हॉर्स, चर्चांचा गैरफायदा वगैरे प्रकारच होणार नाहीत. सत्य समजावून न घेता, सर्व कंगोरे जाणून न घेता 'सत्य समाजसापेक्ष असावं' असं म्हटलं तर सगळाच समाज अशी सत्यं स्वीकारायला असमर्थ राहतो. लहान मूल धडपडेल म्हणून त्याला चालायला शिकवायचंच नाही का? कदाचित आत्ताचा अज्ञ समाज काही चर्चांचे चुकीचे अर्थ काढेल म्हणून अशा चर्चाच टाळल्या तर 'प्रश्न मल्टिव्हेरिएट असतात' हे लोकांना कसं शिकता येईल? झाडं मोजताना जंगलाचं भान विसरायला होतं हे म्हणणं ठीक आहे. पण 'मी झाडं मोजून सांगतो, की हे जंगल वाटतं तितकं मोठं नाही. आत्तापर्यंत समजत होतो त्याच्या एक तृतियांशच आहे' असं म्हणणं म्हणजे जंगलाला विसरणं होत नाही. अशा मोजमापांतून फायदे होतात, आणि त्यासाठी मोजण्याचे प्रयत्न उघड्या डोळ्यांनी चालू ठेवले पाहिजेत.
मला वाटतं समाजासाठी सत्याला अंग मुडपून घेण्याऐवजी समाजानेच थोडं हलावं, म्हणजे सत्याला व्यवस्थित हात पाय पसरता येतील.
परिमाण आणि परिणाम
म्हणजे तुमचं बरोबर आहे हे आम्हाला समजतं, पण अशी चर्चा कोणा अतिरेक्याच्या हातात पडली तर त्याचे परिणाम वाईट होतील असं वाटत नाही का?'
ही भीती साधार आहे. उत्क्रांती किंवा ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भात असं झाल्याची उदाहरणं जाहीर आणि वैयक्तिक परिचयात आहेत. शिवाय 'कन्फर्मेशन बायस' सारख्या विदाबाह्य गोष्टी आहेत, हा भाग अलाहिदा.
पण मूळ प्रतिसादात म्हटलं तसं अशा चर्चा होऊच नयेत किंवा अशा चर्चा करणारे पाषाणहृदयी आहेत, असं म्हणण्याचा अजिबात हेतू नाही.
पण 'मी झाडं मोजून सांगतो, की हे जंगल वाटतं तितकं मोठं नाही. आत्तापर्यंत समजत होतो त्याच्या एक तृतियांशच आहे' असं म्हणणं म्हणजे जंगलाला विसरणं होत नाही. अशा मोजमापांतून फायदे होतात, आणि त्यासाठी मोजण्याचे प्रयत्न उघड्या डोळ्यांनी चालू ठेवले पाहिजेत.
ज्या समाजात लोकांचा प्रतिसाद हा झाडांच्या संख्येच्या समप्रमाणात असतो, त्या आदर्श समाजासाठी हे ठीक आहे. प्रत्यक्षात आवश्यक उपाययोजनेची व्याप्ती 'क्ष' असेल, तर केवळ ०.१*क्ष किंवा त्याहूनही कमी उपाय होताना दिसतात. जोवर हे चित्र बदलत नाही तोवर अशा काटेकोर मोजमापांतून फायदे होण्यापेक्षा तोटेच होण्याची शक्यता अधिक.
पुन्हा एकदा - याचा अर्थ अशा चर्चा किंवा अशी मोजमापं होऊच नयेत, असं नव्हे. परिमाण हे महत्त्वाचे खरेच. पण परिमाणातल्या त्रुटीतून जर अधिक चांगला परिणाम साधला जात असेल, तर ते अधिक श्रेयस्कर. मायक्रो-पातळीवर काटेकोर मोजणीला महत्त्व हवंच, पण सामाजिक संवादाच्या मॅक्रो पातळीवर ज्या गोष्टींनी अधिक अपेक्षित परिणाम साधला जाईल - त्या अधिक श्रेयस्कर.
मला वाटतं समाजासाठी सत्याला अंग मुडपून घेण्याऐवजी समाजानेच थोडं हलावं, म्हणजे सत्याला व्यवस्थित हात पाय पसरता येतील.
दोन मुलांपैकी एक रडत असेल, तर आई त्यालाच उचलते. सत्यानेही थोडे अधिक डेसिबल आपल्या रडण्यात वाढवले, तरच समाज हलण्याची काही शक्यता आहे. एरवी 'उर्ध्वबाहुर्विरौम्येष, न च कश्चित शृणोति मे'चे पुरातन रडगाणे आहेच.
हा हा, 'या असल्या चर्चा
हा हा, 'या असल्या चर्चा थोड्या हळू आवाजात कराव्या' असं म्हणणारांनाच कन्फर्मेशन बायस आहे का हे तपासून पहावं लागेल, थर्ड रेलला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणारांना नाही.
प्रत्यक्षात आवश्यक उपाययोजनेची व्याप्ती 'क्ष' असेल, तर केवळ ०.१*क्ष किंवा त्याहूनही कमी उपाय होताना दिसतात. जोवर हे चित्र बदलत नाही तोवर अशा काटेकोर मोजमापांतून फायदे होण्यापेक्षा तोटेच होण्याची शक्यता अधिक.
याचं कारण सगळेच जण आपले आकडे फुगवून सांगतात. मोदी १५००० गुजरात्यांना वाचवतात, ठाकऱ्यांच्या अंत्ययात्रेला शिवाजीपार्कात २० लाख लोक जमतात, स्विस बॅंकेमध्ये ३ ट्रिलियन डॉलर इतका भारतीयांचा पैसा असतो... आणि कोणीच कुठच्याच बाबतीत 'हे नक्की खरं आहे का?' हे तपासून बघत नाही. अचूकतेबद्दल इतकी अनास्था? सगळीच पोरं आईकडे कलकल करत 'मला २० पोळ्या हव्या' म्हणायला लागतात. मग त्यातल्या एकाला म्हटलं 'खरंच?' तर तो म्हणतो, '२० मागितल्या की आई २ देते. तेव्हा खरंच काय हे विचारू नकोस'. या कॅच २०-२ चं काय करायचं?
परिमाणातल्या त्रुटीतून जर अधिक चांगला परिणाम साधला जात असेल, तर ते अधिक श्रेयस्कर.
सत्यानेही थोडे अधिक डेसिबल आपल्या रडण्यात वाढवले, तरच समाज हलण्याची काही शक्यता आहे.
तुम्हाला 'श्रेयसाने सत्य डावलून रडण्याचे डेसिबल वाढवले' असं म्हणायचं आहे. हा फार धोकादायक युक्तिवाद आहे. श्रेयसाची व्याख्या खाप पंचायती आणि ब्रिगेडा ठरवतात तेव्हा फारच. त्यापेक्षा प्रत्येकाने सत्य, अचूकता आणि काटेकोरपणा अंगी बाणवणं योग्य.
आणि अजूनही कोणी 'कायदा करून स्त्रीगर्भपात थांबवणं योग्य, फायद्याचं, श्रेयस' याची पुरेशी कारणं दिलेली नाहीत. पण श्रेयस काय हे स्वयंस्पष्ट असल्यामुळे कदाचित ते महत्त्वाचं नसावं.
असो
हा हा, 'या असल्या चर्चा थोड्या हळू आवाजात कराव्या' असं म्हणणारांनाच कन्फर्मेशन बायस आहे का हे तपासून पहावं लागेल, थर्ड रेलला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणारांना नाही.
'कन्फर्मेशन बायस' म्हणण्यामागे माझा रोख अशा किंवा इतर चर्चांतून सोयीस्कर, टोकाचे निष्कर्ष काढणार्या (उदा. उत्क्रांती हे थोतांड आहे वगैरे) गटाकडे होता; तुमच्याकडे नाही.
बाकी तुमचे म्हणणे समजले. माझी मुख्य असहमती या धोरणाच्या अंमलबजावणीतील फरकावर आहे (आदर्श/युटोपियन समाज वि. आजचा समाज). त्याबद्दल मुद्दे वाढवण्याचा आळस/कंटाळा आल्याने माझ्या बाजूने चर्चा थांबवतो.
हा मुद्दा सिरियस, सेन्सिटिव्ह
हा मुद्दा सिरियस, सेन्सिटिव्ह आहे. व मला व्यवस्थित विचार करून लिहायला काल वेळ मिळाला नव्हता.
---
१) प्रथम "आयव्होरी टॉवर" च्या युक्तीवादाचा प्रतिवाद. प्रत्येक दांपत्याची स्पेसिफिक सिच्युएशन भिन्न असते हे तरी मान्य कराल ? या सर्व स्पेसिफिक सिच्युएशन्स साठी सरकारने मुंबई मधे बसून एकच एक कायदा करणे (विधीमंडलात बसून) हे "आयव्होरी टॉवर" टाईप वर्तन (वस्तुस्थितीशी फटकून राहून) नाहिये का?
_____ १-अ) एखाद्या दांपत्यास एक मुलगा आहेत. त्यांना दुसरी मुलगी च हवी आहे. त्यांनी काय करायचे ?
_____ १-ब) एखाद्या दांपत्यास चार मुलगे आहेत. त्यांना पाचवी मुलगी च हवी आहे. त्यांनी काय करायचं?
_____ १-क) एखाद्या दांपत्यास एक मुलगी आहे. व दुसरा मुलगा हवा आहे. त्यांनी काय करायचं ?
_____ १-ड) एखाद्या दांपत्यास दोन मुली आहेत. त्यांना तिसरा मुलगा हवा आहे. त्यांनी काय करायचं?
ही स्पेसिफिक सिच्युएशन्स ची उदाहरणे आहेत. या सगळ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आलीच ना? बरं ते सुद्धा तंत्रज्ञान उपलब्ध असताना. आपल्या अपत्यांत वैविध्य असावे अशी जर दांपत्यांची इच्छा असेल तर त्यात चूक काय आहे ? (आता तुम्ही तृतीयपंथीय चा मुद्दा उपस्थित करणार आहात हे माहीती आहे.)
-----
२) सामाजिक प्रश्न हे या स्त्रीभ्रूण हत्येच्या विषयाच्या मुळाशी आहेत ही कारणमीमांसा मान्य आहेच. पण ही सामाजिक समस्या रूढी/रीतीरिवाज यातून निर्माण झालेली आहे व ह्या रूढीची शक्ती आपण जाणतोच. मग समाजधुरीणांना एखादी काऊंटर-रूढी (counter-tradition ) बनवण्यापासून कोणी रोखले आहे ? रूढी व कायदा यांत मुख्य फरक हा आहे की - रूढी एन्फोर्स करण्याची "फॉर्मल यंत्रणा" नसते. कायदा एन्फोर्स करण्याची फॉर्मल यंत्रणा असते. व रूढी न पाळण्याचे स्वातंत्र्य असते व "फॉर्मल यंत्रणा" यासाठी राबवली जाऊ शकतेच. आता तुम्ही म्हणाल की "फॉर्मल यंत्रणा" नसूनही ही रूढी बळकट आहे - त्याचे काय ? व माझा तोच मुद्दा आहे.
-----
३) त्यातूनही ज्यांना हे तंत्रज्ञान वापरायचे आहे व क्षमता आहे ते सिंगापूर ला (किंवा इतरत्र, wherever) जाऊन ते काम करून येऊ शकतात. बाकीच्यांचे काय ? त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आली की नाही ?
-----
४) मग कमी होत जाणारी स्त्री-लोकसंख्या, त्यामुळे वाढणारं लैंगिक अत्याचारांचं प्रमाण, इतर सामाजिक दुष्परिणाम (स्त्रियांच्या सार्वजनिक वावरावर येणारे निर्बंध, स्त्रियांचं होणारं वस्तूकरण) - यांचं काय (आणि कधी) करायचं?
हा मेघना यांचा प्रश्न.
Let me get this straight - Mr. A might assult/abuse B, C and D and therefore Govt should force E and F to have an unwanted child ??? Really ?
आता तुम्ही लगेच - त्या दांपत्यास ते "unwanted child" वाटते हीच समस्या आहे व ती तशी का आहे याचा विचार करा, गब्बर - असे म्हणणार. (उत्तर खाली ५ व ६ मधे)
सरकारची जबाबदारी ही आहे - Prevent existing individuals from assulting/abusing other existing individuals.
------
५) unwanted child - (हा unintended consequences of a policy action या अखत्यारीत येतो.) जे अपत्य नकोसे आहे व ज्यास जन्म देण्याची सक्ती झालेली आहे त्याची परवरीश कशी होईल ? व्यवस्थित होईल का ? are we not exacerbating the problem ? (गविंनी हा मुद्दा वेगळ्या शब्दात मीमराठी वर मांडला होता.)
------
६) दांपत्यास ते "unwanted child" वाटते हीच समस्या आहे - हे मान्य करतो. पण दांपत्याने - समाजास मुली पुरवणे ही आमची जबाबदारी नाही - असे म्हंटले तर त्यांच्यावर ते अपत्य जन्मास घालण्याची जबरदस्ती का व्हावी ? आमची मुलगी मोठी झाल्यावर तिचे लैंगिक शोषण होऊ शकते - म्हणून आम्ही मुदलात मुलीस जन्मच देणार नाही - असे म्हंटले तर त्यांच्यावर जबरदस्ती का व्हावी ???
-----
७) Whose right is the govt trying to protect/safeguard ? दांपत्याने मतदान केलेले आहे व टॅक्स दिलेला आहे (गृहितके). त्यामुळे दांपत्याच्या अधिकारांचे व विकल्पांचे रक्षण करणे हे ही सरकारची प्रथम जबाबदारी आहे. भ्रूण हा दांपत्यांपैकी एकाच्या पोटात मूळ धरून वाढीस लागणार आहे. त्या भ्रूणावर स्त्री चा (मातेचा) अधिकार पुरुषापेक्षा (पित्यापेक्षा) जास्त आहे असा माझा दावा आहे. पण जर स्त्री ला (माते ला) तो नको असेल तर सरकारला जबरदस्ती करण्याचा काय अधिकार आहे ?
_____ ७-अ) स्त्री वर गर्भपाताची जबरदस्ती होऊ शकते हा प्रतिवाद सुयोग्य आहेच.
_____ ७-ब) दांपत्याने मतदान केलेले आहे व टॅक्स दिलेला आहे - याचा अर्थ नवजात अर्भकांच्या जिवीताचे (किंवा जे मत्/टॅक्स देत नाहीत त्यांचे) रक्षण सरकारने करू नये - असे म्हणायचे आहे का, तुम्हास गब्बरसिंग?? - हा प्रतिप्रश्न सुयोग्य आहेच. उत्तर - अर्थातच ... मला तसे म्हणायचे नाही. तपशीलात उत्तर देईनच.... जर प्रश्न विचारलात तर.
------
८) स्त्रीभ्रूणहत्येचे समर्थन गब्बर करीत आहे का ? माझे उत्तर - नाही. (आता लगेच - १ - ७ मुद्दे मांडून झाल्यावर सुद्धा गब्बर असे म्हणत असेल तर ते विनोदी आहे/हास्यास्पद आहे - असा सिनिकल प्रश्न तुम्ही करू शकता. व त्यास माझे उत्तर हे आहे की - व्यक्तीच्या विकल्पांचे उल्लंघन सरकारकडून होऊ नये असा माझा आग्रह आहे. Female foeticide may be a mistake but that is the fault of the couple. And since it is not directly negatively affecting anyone - Govt. does not have the right to use force.)
------
९) अदितीचा मुद्दा - 'प्रो-चॉइस का प्रो-लाईफ' हा प्रश्न स्त्रीभ्रूणहत्येसंदर्भात विचारणं ही दोन प्रश्नांची सरमिसळ आहे. - माझा तो हेतू नव्हताच. मला फक्त - गर्भपात बेकायदेशीर असावा का - हा प्रश्न विचारायचा होता व होता. व माझा हा प्रश्न पुरेसा सूचक आहे. व या प्रश्नाबाबत - additional clarity will do disservice to the cause - असे वाटते (hunch). 'प्रो-चॉइस का प्रो-लाईफ' चा मुद्दा यात आणण्यामागे - Providing the context to the sub-point (of trimester) that I was going to make. ट्रायमेस्टर चा मुद्दा मी अँटिसिपेट केलेला होता त्याप्रमाणे .....
------
दोस्तानु, पुनश्च, हा प्रश्न सिरियस, सेन्सिटिव्ह, Deeply personal आहे. तेव्हा माझ्या मुद्यांचा प्रतिवाद अवश्य करा.
सर्वांचे विकल्प/ समजाला मुली
सर्वांचे विकल्प/ समजाला मुली न पुरविण्याचा हक्क हे आदि मान्य आहे. तू खंडन फार फार एक्सलंट केलयस.
पण .....
एखादा हक्क अॅब्युझ/मिसयुझ व्हायला लागला की सरकारने मध्ये पडलं पाहीजे रे. अन मग ओल्याबरोबर सुकंही जळतं न्यायाने काही लोकांना सहन कराव लागेल. इलाज नाही.
________
भ्रूणहत्येच्या, हक्काचा सुयोग्य वापर करण्याइतका, आपला समाज परिपूर्ण (परफेक्ट) आहे का? नाही.
संपूर्ण इंटेलेक्च्युअल स्टँड नाही घेता येत. गुन्हेगारांचं फावतय.
गुन्हेगार
गुन्हेगारांचं फावतय.
निव्वळ गर्भपात करणाऱअयांना गुन्हेगार कसे काय ठरवायचे बॉ? उद्या त्या 'नकोशा' मुलीला जन्म दिला तरी तिच्याकडे लक्ष न दिल्यावरही ते गुन्हेगारच ठरतील.
मुलींचा जन्म होण्यात पालकांना काहीही धोका नाही अशी सामाजिक परिस्थिती निर्माण करणे हे सरकारचे काम आहे. आर्थिक इन्सेंटिव देणे, मुलींना मोफत शिक्षण अशी योग्य पावले सरकारने उचललीच आहेत. हुंडाबंदी, बलात्कारविरोधी कायदे यांची अंमलबजावणी चांगली व्हायला हवी.
अगदीच हाताबाहेर परिस्थिती गेली तरीही वैयक्तिक निवडीवर बंधने आणण्यापेक्षा सेक्स रेशो बिघडतो आहे या कारणास्तव सरकारने सरोगेट प्रेग्नंसी सेंटर चालू करुन मुलींना जन्म देणारे कारखाने सुरु करणे जास्त योग्य ठरेल.
निव्वळ गर्भपात करणाऱअयांना
निव्वळ गर्भपात करणाऱअयांना गुन्हेगार कसे काय ठरवायचे बॉ? उद्या त्या 'नकोशा' मुलीला जन्म दिला तरी तिच्याकडे लक्ष न दिल्यावरही ते गुन्हेगारच ठरतील.
होय ज्यांना गुन्हा करायचा आहे, मुलगी नको आहे, ते असे ना तसे मुलीला छळणारच. म्हणूनच कायदा आहे ना.
नंतर "चाईल्ड-निग्लेक्ट" कायद्यान्वये (आहे की नाही माहीत नाही) या नालायक लोकांकडून मुलीची कस्टडी काढून घ्या.
पण नंतर लक्ष देणार नाहीत म्हणून एका मुलीचा जीव खुडायचा परवाना का द्यावा? काढून घ्या तो हक्क.
सरोगेट प्रेग्नंसी सेंटर चालू
सरोगेट प्रेग्नंसी सेंटर चालू करुन मुलींना जन्म देणारे कारखाने सुरु करणे जास्त योग्य ठरेल.
आपण कदाचित भावनेच्या भरात लिहीले असावेत.
पण विचार करा असे "मानवी कारखाने" कितपत योग्य आहेत???????
बाकी पुढील पर्याय चांगले आहेत -
मुलींचा जन्म होण्यात पालकांना काहीही धोका नाही अशी सामाजिक परिस्थिती निर्माण करणे हे सरकारचे काम आहे. हुंडाबंदी, बलात्कारविरोधी कायदे यांची अंमलबजावणी चांगली व्हायला हवी.
सध्या परिस्थिती वेगळी नाही.
पण विचार करा असे "मानवी कारखाने" कितपत योग्य आहेत???????
एखाद्या दांपत्याला नको असतानाही मुलीला जन्म द्यायला लावणे व पालनपोषण करायला लावणे हा कुटिरोद्योग सरकारने जनतेकडे औटसोर्स केलाच आहे. तेच पब्लिक एंटरप्राईज करुन मोठ्या स्केलवर सरकारला करता येईल. (गब्बर यांना पब्लिक एंटरप्राईज कदाचित आवडणार नाही.)
तेच पब्लिक एंटरप्राईज करुन
तेच पब्लिक एंटरप्राईज करुन मोठ्या स्केलवर सरकारला करता येईल.
तुम्ही म्हणता ते योग्य आहे. मानव (स्त्री व पुरुष व तृतीयपंथीय) बनवण्याचे कारखाने अयोग्य नाहीत.
---------
गब्बर यांना पब्लिक एंटरप्राईज कदाचित आवडणार नाही
अहो असमानता (सांपत्तिक, प्राप्तीतील) दूर करण्यासाठी सरकारने संपत्ती निर्मीतीचे (wealth production चे) कारखाने सुरु करावेत असे सुद्धा आमचे मत आहे. बघुया श्रीमंतांकडून त्यांची संपत्ती बळजबरीने घेऊन worthless गरिबांना देण्यास (wealth-Distribution) उत्सुक असणारे "सर्वशक्तिमान" सरकार हे करू शकते का ?
फरक काय?
१-अ) एखाद्या दांपत्यास एक मुलगा आहेत. त्यांना दुसरी मुलगी च हवी आहे. त्यांनी काय करायचे ?
_____ १-ब) एखाद्या दांपत्यास चार मुलगे आहेत. त्यांना पाचवी मुलगी च हवी आहे. त्यांनी काय करायचं?
_____ १-क) एखाद्या दांपत्यास एक मुलगी आहे. व दुसरा मुलगा हवा आहे. त्यांनी काय करायचं ?
_____ १-ड) एखाद्या दांपत्यास दोन मुली आहेत. त्यांना तिसरा मुलगा हवा आहे. त्यांनी काय करायचं?हे.)-----
हे प्रश्नच मुळात खोलवर रुतून बसलेल्या असमानतेतून आलेले आहेत. मुलगा आणि मुलगी यात फरक काय?
वरील प्रश्न आणि, मला कोकणस्थच बायको हवी/नवरा हवा, किंवा मला गोरीच (व्हाईट) बायको हवी वगैरे विचारसरणी एकाच जातकुळीतली.
आवड असू शकते
जर एखाद्या दांपत्याला एक मुलगा असेल तर दुसरी मुलगी असावी अशी (किंवा उलटसुलट) निवड करण्याचा पर्याय असावा. निव्वळ त्या दांपत्याला पाहिजे या कारणासाठी हा पर्याय उपलब्ध असावा. अगदीच थातुरमातुर कारण द्यायचे तर मुलगा आणि मुलगीमध्ये फरक असतोच. मुलगा हा मुलगीचा भाऊ असतो तर मुलगी ही मुलग्याची बहीण असते. रक्षाबंधन-भाऊबीज असे सण एखाद्या कुटुंबाला घरच्याघरी साजरे करावे वाटू शकतात. वगैरे...
असमानता
हे प्रश्नच मुळात खोलवर रुतून बसलेल्या असमानतेतून आलेले आहेत.
हे मान्य आहे. असमानता आहेच. मर्यादित स्रोत असणारे दांपत्याला या असमानतेशी एकट्याने लढा देणे शक्य नसते. त्यामुळे मुलीला जन्म न देण्याचा सोपा पर्याय ते निवडतात. मला स्वतःला यात काही वावगे वाटत नाही.
ही असमानता दूर करण्यासाठी सरकारने इन्सेंटिव दिले पाहिजेत. मुलींना ४० टक्क्यांपर्यंत शिक्षणात आरक्षण, मोठ्या पदांवर बढतीसाठी आरक्षण, मुली होणाऱ्या दांपत्यांना टॅक्स बेनेफिट्स असे अनेक मार्ग आहेत. मुलगी असणे हे मुलगा असण्यापेक्षा जास्त सोयीचे आहे हे पालकांना पटले पाहिजे.
मात्र त्याऐवजी सेक्स रेशो बिघडतो म्हणून अमुकतमुक दांपत्याने मुलगी नको असतानाही तिला जन्म दिलाच पाहिजे हा आग्रह अनाठायी वाटतो.
मुलींना ४० टक्क्यांपर्यंत
मुलींना ४० टक्क्यांपर्यंत शिक्षणात आरक्षण, मोठ्या पदांवर बढतीसाठी आरक्षण, मुली होणाऱ्या दांपत्यांना टॅक्स बेनेफिट्स असे अनेक मार्ग आहेत.
असे आरक्षण देणे हे असमानतेला पोषकच नाही का? कोणत्या बेसिसवर आरक्षण देणार? "मुलगी" हा वीकर सेक्स आहे या बेसिसवर की मुली कमी होताहेत या बेसिसवर? तुम्ही जर स्त्रीभ्रूणहत्याविरोधी कायदा नाही केलात तर ही आरक्षणं देतच रहावं लागणार तर?
दोन्ही
असे आरक्षण देणे हे असमानतेला पोषकच नाही का? कोणत्या बेसिसवर आरक्षण देणार? "मुलगी" हा वीकर सेक्स आहे या बेसिसवर की मुली कमी होताहेत या बेसिसवर
आरक्षण असमानतेला पोषक नाही. असमानता असल्यामुळे केलेली उपाययोजना आहे. दोन्ही बेसीसवर आरक्षण देता येईल. ३३ टक्के आरक्षण तसेही आहे. त्याचे प्रमाण वाढवता येईल. (तसेही ५० टक्के लोकसंख्येला ३३ टक्के आरक्षण कमीच आहे)
दोन्हीची गरज आहे.
ही असमानता दूर करण्यासाठी सरकारने इन्सेंटिव दिले पाहिजेत. मुलींना ४० टक्क्यांपर्यंत शिक्षणात आरक्षण, मोठ्या पदांवर बढतीसाठी आरक्षण, मुली होणाऱ्या दांपत्यांना टॅक्स बेनेफिट्स असे अनेक मार्ग आहेत. मुलगी असणे हे मुलगा असण्यापेक्षा जास्त सोयीचे आहे हे पालकांना पटले पाहिजे.
भारतात इन्सेंटीव्ह नाहीत असा दावा आहे का? मी शाळेत असताना मुलींना मुलांपेक्षा जास्त फी सवलत होती. त्याच वेळी १०वी आणि १२वी पास होणार्या मुलींकरता उत्तरप्रदेश सरकारने कॅश (१० हजार रुपये) बक्षीस त्यावेळी दिल्याचे आठवते असे अनेक इन्सेंटीव्ह भारतात अस्तित्वात आहेत. अर्थात, अजुनही देता येतील, पण फक्त इन्सेंटीव्हने असमानता दूर होते असा तुमचा दावा आहे का?
दबाव सस्टेनेबल नाही
सरकारचा दबाव सस्टेनेबल नाही इतकेच म्हणायचे आहे. दबाव वाढवण्याऐवजी इन्सेन्टिव वाढवावे. मुलीला जन्म दिल्याने लाँग टर्म फायदा होतो आहे असे लक्षात येऊनही ज्यांना मुलगाच पाहिजे ते त्याची फळे भोगतीलच. पण नको असलेल्या मुलीला जन्म देण्याची सक्ती केल्याने त्या मुलीचे व दांपत्याचे असे दोघांचेही जीवन बऱ्यापैकी उध्वस्त असते असे जवळून पाहिले आहे.
माझ्या प्रतिसादाला पुरवणी
सेक्स सिलेक्टीव्ह अबॉर्शन विरूद्ध कायदा करणारा भारत एकटा देश नाही. अमेरीकास्थित एशियन लोकांमध्ये सेक्स सिलेक्टीव्ह अबॉर्शन होत असल्याने आल्याने 'प्रेंडा' नामक बील हॉऊस मध्ये २०१२ मध्ये दाखल केले होते.
Countries with laws or policies on sex selection
??
भारतात मात्र फक्त स्त्रीगर्भपाताला मनाई आहे.
भारतात लिंगचिकित्सा बेकायदेशीर आहे. माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही गर्भपाताला २० आठवड्यांपर्यंत मनाई नाही. तुमचा काहीतरी गोंधळ होत असावा.
कॅनडा:
" for the purpose of creating a human being, perform any procedure or provide, prescribe or administer any thing that would ensure or increase the probability that an embryo will be of a particular sex, or thatwould identify the sex of an in vitro embryo, except to prevent, diagnose or treat a sex-linked disorder or disease "
हे प्रश्नच मुळात खोलवर रुतून
हे प्रश्नच मुळात खोलवर रुतून बसलेल्या असमानतेतून आलेले आहेत. मुलगा आणि मुलगी यात फरक काय?
मुळात आपण ' असमानता' ही नेहमी 'नेगेटीव्हलीच' का घेतो? हो मी मुलगा आणि मुलगी मधे फरक करतो आणि मला मुलगी असावी असं मनापासून वाटतं कारण मला काही किरण बेदी किंवा झाशी ची राणी घडवायची आहे म्हणून नाही तर अगदी अगदी साधी कारणं आहेत :
१. मी मॉल मधे गेलो की ते छान छान फ्रॉ़क घ्यावे वाटतात
३. ते मेक-अप चं सामान घरी आणावं वाटतं
४. ते गोड गोड आणि छोटे दागिने मुलीसाठी आणावे वाटतात
५. त्या सुंदर सोनरी केसाच्या बाहूल्या मला विकत घ्याव्या वाटतात आणि माझ्या मुलीने त्या झोपताना कुशीत घ्यावा असं वाटतं
६. तिने तिच्या आईच्या हर-एक कामाची, हालचालीची नक्कल करावी असं वाटतं.
मग मला मुलगा असेल तर मी वरच्या इच्छा/हौस कश्या पुर्ण करणार (अर्थात मुलगी असली तरी मी त्या तिच्यावर लादणार नक्कीच नाही) ? मी असमानता विसरून माझ्या मुलाला मुलगी समजून वरच्या गोष्टी केल्या तर तो फेमिनाईन नाही का होणार? फेमीनाईन होण्याबद्दल मला काही विरोध वा वाईट वाटत नाही पण पुढे जाऊन शाळेत/कॉलेज्/कामाच्या ठिकाणी त्याला प्रत्येकाच्या चेष्टेला सामोरं जावं लागेल त्यातून तो मानसिक रुग्णही होऊ शकतो (होतात, स्वतः अशी अनेक उदाहरण पाहिली आहेत), आणि त्याच्या ह्या अवस्थेला मीच जबाबदार असेल ना? मग अश्या परिस्थितीत मी म्हणालो मला मुलगीच हवी आहे ( केवळ एक इच्छा) तर त्यात गैर काय आहे? ह्यात कसली आलीय असमानता?
मुर्खासारखे प्रतिसाद येताहेत!
काय मुर्खासारखं लॉजिक आहे लोकांचं!
मुळात आपण ' असमानता' ही नेहमी 'नेगेटीव्हलीच' का घेतो?
कारण या असमानतेमुळे लाखाभर मुलं मारली जाताहेत दरवर्षी. इतकं अवघड आहे का हे समजणं?
मग मला मुलगा असेल तर मी वरच्या इच्छा/हौस कश्या पुर्ण करणार (अर्थात मुलगी असली तरी मी त्या तिच्यावर लादणार नक्कीच नाही) ?
नक्की काय करणार आहात? हौस पुरी करायची असेल तर लादायची तयारी ठेवा. मुलगी टॉमबॉय निघाली तर काय करणार आहात?
मी असमानता विसरून माझ्या मुलाला मुलगी समजून वरच्या गोष्टी केल्या तर तो फेमिनाईन नाही का होणार?
कोण येडझवा म्हणाला हे?
फेमीनाईन होण्याबद्दल मला काही विरोध वा वाईट वाटत नाही पण पुढे जाऊन शाळेत/कॉलेज्/कामाच्या ठिकाणी त्याला प्रत्येकाच्या चेष्टेला सामोरं जावं लागेल त्यातून तो मानसिक रुग्णही होऊ शकतो (होतात, स्वतः अशी अनेक उदाहरण पाहिली आहेत), आणि त्याच्या ह्या अवस्थेला मीच जबाबदार असेल ना? मग अश्या परिस्थितीत मी म्हणालो मला मुलगीच हवी आहे ( केवळ एक इच्छा) तर त्यात गैर काय आहे? ह्यात कसली आलीय असमानता?
मुलं जन्माला घालायच्या आधी जरा नीट विचार करा. यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही.
नीट वाचलं तर लक्षात येईल की
नीट वाचलं तर लक्षात येईल की मी "नेहमी 'नेगेटीव्हलीच' का घेतो" असं म्हणालो आहे.
कारण या असमानतेमुळे लाखाभर मुलं मारली जाताहेत दरवर्षी. इतकं अवघड आहे का हे समजणं?
असमानता असलीच पाहीजे असं माझं म्हणणं अजिबात नाही. मुलगी असावी ही माझी इच्छा आहे असं मी म्हंटलय आणि मुलगा असेल तर मी त्याची भ्रुणहत्या करेन किंवा करावी असं म्हंटलेलं नाहीये, ना मी स्त्रीभ्रूण हत्येला समर्थन करतोय.
नक्की काय करणार आहात? हौस पुरी करायची असेल तर लादायची तयारी ठेवा. मुलगी टॉमबॉय निघाली तर काय करणार आहात?
काहीच करू शकत नाही, ती केवळ इच्छा आहे, सगळ्याच इच्छा पुर्ण होउ शकत नाहीत, आय हॅव अॅक्सेप्टेड द फॅ़क्ट.
कोण येडझवा म्हणाला हे?
आजूबाजूला प्रत्यक्ष उदाहरणं पाहिली आहेत. एका एन.जी.ओ. मधे काम करत असताना 'सुनिता वाही' नावाच्या सायकॉलॉजीस्ट ने ही एक प्रमुख कारण सांगितलं आहे फेमीनाईन होण्यामागचं. आणि पुन्हा क्लीयर करतो... "होणार नाहीत का?" अशी शंका व्यक्त केली आहे.
मुलं जन्माला घालायच्या आधी जरा नीट विचार करा. यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही.
धन्यवाद!
उगीच 'मुर्खासारखे' ' येडझवे' असे शब्द वापरुन भडकायचं काहीच कारण नाहीये पण तुम्हाला माझा मुळ मुद्दा झेपत नसेल तर राहू द्या. (तुमच्या विधानाला प्रतिवाद केला तर एवढा राग? - चालायचंच :))
Don't tell me how to dress, tell him not to rape.
आमची मुलगी मोठी झाल्यावर तिचे लैंगिक शोषण होऊ शकते - म्हणून आम्ही मुदलात मुलीस जन्मच देणार नाही
यात पुन्हा तीच ती मानसिकता दिसते. मुलींवर लैंगिक अत्याचार होऊ शकतो, मुली सातच्या आत घरात का येत नाहीत? मोठ्या प्रमाणावर असं मत दिसत नाही, मुलगा बलात्कारी, दरोडेखोर, खंडणीखोर, दाऊद इब्राहिम, शायन मुन्शी बनू शकतो, आम्हाला मुलगा नको. पीडीतांनाच गुन्हेगार समजून (किंवा न समजता) शिक्षा देऊ पाहण्याचा निषेध.
गर्भपात बेकायदेशीर असावा का -
सरसकट गर्भपाताला कोणीही विरोध केलेला नाही. ठरवून, discriminatory गर्भपाताला विरोध आहे आणि त्याची कारणं सामाजिक आहेत. ती व्यक्तिगत पातळीवर दिसत नाहीतच. त्यामुळे वरच्या प्रतिसादातले व्यक्तिगत स्वातंत्र्याबद्दल उदाहरण देणारे मुद्दे इथे निरुपयोगी आहेत.
रक्षाबंधन वगैरे मुळातच पुरुषप्रधान व्यवस्थेची प्रतीकं आहेत. ते घरीच साजरं करण्यासाठी, बहिणीला भाऊ हवाच हवा ही डब्बल पुरुषप्रधान मानसिकता झाली.
अगदीच हस्तिदंती मनोऱ्यातून बोलायचं असेल तर - मुलगा-मुलगी समान असतात असं तुम्ही (स्वतःला तर सोडाच) तुमच्या समाजाला नाही ना पटवून देऊ शकत! मग भोगा आपल्या कर्माची फळं.
त्यातल्या त्यात स्त्रीभ्रूणहत्याबंदी कायद्याविरोधात सांख्यिकी कारणच द्यायचं असेल तर बंदीमुळे किती स्त्रिया धोकादायक गर्भपात करवून घेतात, किती स्त्रियांचा त्यात मृत्यु होतो, ही बंदी उठवली तर चित्र कितपत, कसं बदलेल याची प्रेडीक्शन्स कोणी काढली असतील ते, वगैरे विदेसकट कारणं दिली तर ते विचारार्ह वाटेल.
हो पण
जोपर्यंत एखादे दांपत्य कोणताही कायदा मोडत नाही तोपर्यंत घरात कोणते सण साजरे करावे याची निवड करण्याचे स्वातंत्र्य हवे. जर गर्भपाताला परवानगी असेल तर ती सरसकट असावी. केवळ स्त्री-गर्भपाताला मनाई व मुलांचे गर्भ पाडून टाकले तर चालेल असे नको.
आमची मुलगी मोठी झाल्यावर तिचे लैंगिक शोषण होऊ शकते
ही असुरक्षितता जर एखाद्या दांपत्याला वाटत असेल तर आश्वासक वातावरण निर्माण करण्यासाठी मुलीला जन्म देणे हे उत्तर निश्चितच नाही.
पुन्हा एकदा, १. सांख्यिकीमधून
पुन्हा एकदा, १. सांख्यिकीमधून दिसणारे प्रश्न व्यक्तिगत पातळीवर नेऊन सोडवता येत नाहीत. २. लोकांना सतीदेवीचा सोहोळासुद्धा घरातच साजरा करावासा वाटू शकतो, पण त्यावर कायद्याने बंदी आहे. एखादं मूल दत्तक घेऊन, मुलगाच असणाऱ्या शेजाऱ्यापाजाऱ्यांशी कौटुंबिक संबंध निर्माण करून वगैरे रक्षाबंधनासारखे पुरुषप्रधान संस्कृतीची प्रतीकं असणारे सोहोळे करायला किंवा दोन बहिणींमध्ये, दोन भावांमध्येही रक्षाबंधन वगैरे साजरं करायला कायद्याने काहीही आडकाठी केलेली नाही.
असुरक्षिततेबद्दल - मुलगी जन्माला न घालणाऱ्याच नव्हे, मुलींना वाढवण्याऱ्या सगळ्याच दांपत्यांना तिची काळजी वाटत राहते. तसंही जन्माला न आलेल्या मुलीपेक्षा वयात येणाऱ्या मुलींबद्दल आई-वडलांना बरंच जास्त प्रेम असतं. ठराविक वयात आईकडून मिळणारे सल्ले ऐकून आपल्याशी खरोखरच काही दुर्व्यवहार झालाच आहे असं वाटेल इतपत सल्ले, कानपिचक्या, आणि काय काय मुलींना मिळत राहतं. थँक यू भारतीय समाज!
भारतातल्या कायद्यानुसार ठराविक गर्भपातालाच बंदी आहे असं नाही तर गर्भलिंगजलपरीक्षेलाच मनाई आहे. गर्भपात करायचा असेल तर करा, पण गर्भाचं लिंग समजणार नाही अशा अर्थाचा कायदा आहे. त्यात आपसूकच मुलग्यांचे (आहेत म्हणून) गर्भ पाडण्यावर बंदी येते. पण विचाराच्या पातळीवरही "अरेरे मुलगा झाला! आता तो बलात्कारी निपजू नये म्हणून काळजी घ्यावी लागणार," असं काही कानावर येत नाही.
प्रॅक्टिकल
१. सांख्यिकीमधून दिसणारे प्रश्न व्यक्तिगत पातळीवर नेऊन सोडवता येत नाहीत
सरकारच्या धोरणातून हेच होतंय. आणि प्रत्यक्ष काय घडतं? साधारण मध्यमवर्गीय व सुशिक्षित घरांमध्ये मुलगाच पाहिजे असा आग्रह आजकाल 'फारसा' धरला जात नाही. काही प्रमाण नक्कीच असेल पण सेक्स रेशो बिघडण्याइतके नक्कीच नाही. घासकडवींकडे आकडेवारी असेलच. ;)
कनिष्ठवर्गातील आणि कमी शिकलेल्या घरांमध्ये मुलगाच पाहिजे असा हव्यास जास्त असतो. तिथे मुलगा पाहिजे म्हणून सात-आठ मुलींना जन्म देऊन दोन-दोन बायका करुन एखाद्या दिवटा शेवटी जन्माला येतो. त्याचे सगळे लाडकोड पुरवले जातात. त्याच्या शिक्षणाकडे लक्ष दिले जाते. त्याच्या बहिणी घरातली धुणी-भांडी वगैरे कामं करतात. एकमेकांच्या वेण्या घालत बसतात. उवा काढत बसतात.
बँकेत शिपाई, शाळेतील प्यून अशा नोकरीतील एका माणसाच्या पगारावर १ रुमच्या घरात राहणारी अशी ५-६ उदाहरणे मी पाहिली आहेत. मुलगा होणे हे एकमेव ध्येय ठेवून जगावर सटासट पोरी सोडण्याचा ध्यास घेतलेल्या या समाजधुरिणांनी सेक्स रेशो स्क्यू होण्यापासून नक्कीच वाचवला असेल पण त्या संपूर्ण निर्दोष मुलींची जन्माची आबाळ झाली आहे.
माझ्या नात्यात सरकारी
माझ्या नात्यात सरकारी अधिकारी, शाळेतले मुख्याध्यापक असे लोक आहेत ज्यांनी जगावर सटासट ३-४ पोरी सोडून शेवटी लाडल्या पोराला जन्म दिलेला आहे. (या मुलींच्या लग्नांसाठी आईवडील कसे चिंतीत असत, वगैरे गप्पाही ऐकलेल्या आहेत.) २०११ च्या जनगणनेनंतर जेव्हा महाराष्ट्रातलं लिंगगुणोत्तर फार खाली आल्याचं दिसलं त्याच काळात मराठी वृत्तपत्रांमध्ये स्त्रीभ्रूणहत्या, मुलगा हवा असले विचार उच्चशिक्षित लोकांनीही व्यक्त केल्याचं, अल्ट्रासाऊंड क्लिनिक्सचा वापर केल्याच्या बातम्या होत्या. हे असे विचार फक्त कनिष्ठ वर्गात, कमी शिकलेले लोक करतात ही एक आणखी अंधश्रद्धा असल्याचे उल्लेख या बातम्यांमध्ये सहजच दिसत होते.
झालं ... माझा शब्द विरुद्ध तुमचा शब्द.
पुन्हा एकदा
जर गर्भपाताला परवानगी असेल तर ती सरसकट असावी. केवळ स्त्री-गर्भपाताला मनाई व मुलांचे गर्भ पाडून टाकले तर चालेल असे नको.
वरती दिलेला प्रतिसाद पुन्हा, थोड्या वेगळ्या भाषेत देतो आहे. फक्त स्त्री-गर्भपाताला मनाई असे खरेच आहे का?
विकी वरून.
"Pre-natal diagnostic techniques like Medical Ultrasonography are capable of determining the sex of the foetus. In many parts of India, daughters are not preferred and hence sex-selective abortion is commonly practiced, a form of Gendercide, resulting in an unnatural male to female population sex ratio due to millions of developing girls being terminated before birth. According to The Pre-Natal Diagnostic Techniques(Regulation and Prevention of Misuse) Amendment Act, 2002 the following are cognizable, non-bailable and non-compoundable offences
Conducting or associating or helping to conduct Pre-Natal Diagnostic tests.
Sex selection on a woman or a man or both on any tissue, embryo, conceptus fluid or gametes derived from either or both of them
Advertisement or communication in any form in print, by electronic media or internet by units, medical professionals or companies on the availability of sex determination and sex selection in the form of services, medicines, or any kind of techniques.
Three years imprisonment and fine of Rs. 10,000 and five years imprisonment and fine of Rs. 50,000 for subsequent offence for service providers is stipulated by the law ; those who seek aid shall be punishable with a term that may extend to three years and a fine that may extend to Rs 50,000 for the first offence and for any subsequent offence with imprisonment which may extend to five years and with fine which may increase to Rs. 100,000."
१. पण दांपत्याने - समाजास
१. पण दांपत्याने - समाजास मुली पुरवणे ही आमची जबाबदारी नाही - असे म्हंटले तर त्यांच्यावर ते अपत्य जन्मास घालण्याची जबरदस्ती का व्हावी ? आमची मुलगी मोठी झाल्यावर तिचे लैंगिक शोषण होऊ शकते - म्हणून आम्ही मुदलात मुलीस जन्मच देणार नाही - असे म्हंटले तर त्यांच्यावर जबरदस्ती का व्हावी ???
२. जर एखाद्या दांपत्याला एक मुलगा असेल तर दुसरी मुलगी असावी अशी (किंवा उलटसुलट) निवड करण्याचा पर्याय असावा. निव्वळ त्या दांपत्याला पाहिजे या कारणासाठी हा पर्याय उपलब्ध असावा.
३. मर्यादित स्रोत असणारे दांपत्याला या असमानतेशी एकट्याने लढा देणे शक्य नसते. त्यामुळे मुलीला जन्म न देण्याचा सोपा पर्याय ते निवडतात. मला स्वतःला यात काही वावगे वाटत नाही.
शतशः सहमत. सामाजिक परिस्थिती बदलणे हे एकेकट्या पालकांच्या आवाक्यातली बाब नाही, म्हणून "ओझे होऊ शकणारी मुलगी" नकोच हे जास्त व्यावहारिक आहे.
चोरी-वाटमारी या संबंधित कडक शिक्षा करणारे कायदे असतानादेखील लोक घराला कुलुपे घालतातच ना, आणि घराबाहेर (विशेषतः प्रवासात, लग्नसमारंभात नव्हे!) पडल्यावर (महागडे दागिने घालणाऱ्या) बायका (ते) दागिने शक्यतो उघडे दिसणार नाही असे बघतातच ना!
(इथे मुलींची तुलना वस्तूंशी केलेली नाही, मुलगी "जोखीम" असलेल्या समाजात ती कशी "हाताळली" जाते हे दाखवले आहे.)
४. मुलगा आणि मुलगी यात फरक काय?
क्या भाईसाहब/ बहनजी, मजाक कर रहे हो क्या? :)
५. ही असमानता दूर करण्यासाठी सरकारने इन्सेंटिव दिले पाहिजेत.
अंशतः असहमत, त्याऐवजी,
६. मुलींचा जन्म होण्यात पालकांना काहीही धोका नाही अशी सामाजिक परिस्थिती निर्माण करणे हे सरकारचे काम आहे.
ते सरकारने पार पाडावे.
मी इतरत्र यापूर्वी दिलेला प्रतिसाद उद्धृत करतो:
ज्या समाजात स्त्रियांविरुद्धचे गुन्हे सर्वाधिक वेगाने वाढत आहेत, त्या समाजाला माद्या पुरविण्याची जबरदस्ती मुलींचे-बहिणींचे रक्षण करण्यास अक्षम असलेल्या पांढरपेश्या बाप-भावावर कशासाठी?
श्रेणी देऊन समाधान झालं नाही म्हणून प्रतिसाद
चोरी-वाटमारी या संबंधित कडक शिक्षा करणारे कायदे असतानादेखील लोक घराला कुलुपे घालतातच ना, आणि घराबाहेर (विशेषतः प्रवासात, लग्नसमारंभात नव्हे!) पडल्यावर (महागडे दागिने घालणाऱ्या) बायका (ते) दागिने शक्यतो उघडे दिसणार नाही असे बघतातच ना!
(इथे मुलींची तुलना वस्तूंशी केलेली नाही, मुलगी "जोखीम" असलेल्या समाजात ती कशी "हाताळली" जाते हे दाखवले आहे.)
मी काय कुणाला शिव्या देते का भेंच्योत!
मत
या रिसर्चमधले मला पटलेले मत इथे देत आहे - गब्बरच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर बहुदा ह्यात सापडावे.
१) प्रथम "आयव्होरी टॉवर" च्या युक्तीवादाचा प्रतिवाद. प्रत्येक दांपत्याची स्पेसिफिक सिच्युएशन भिन्न असते हे तरी मान्य कराल ? या सर्व स्पेसिफिक सिच्युएशन्स साठी सरकारने मुंबई मधे बसून एकच एक कायदा करणे (विधीमंडलात बसून) हे "आयव्होरी टॉवर" टाईप वर्तन (वस्तुस्थितीशी फटकून राहून) नाहिये का?
As such, we can consider a balanced sex ratio as a public good, available to everyone, like clean air or world peace. The behaviour of households who want to avoid female births can typically an opportunistic strategy, the benefits of which seem clear: boys are not only more prized than girls, but are also the only ones expected to take care of their parents. By tampering with biological laws, parents do not contribute their due share of girls to the common demographic pool – a contribution necessary to the stability of the entire marriage
and family system. Given such a situation, environmental economists will recognise a tragedy of the commons: the archetypical social trap, in which free access to a public resource by individual interests leads rapidly to the complete depletion of the shared resource
तसेच
Skewed sex ratio is therefore a typical “externality” – i.e., the unintended and negative consequence of private decisions that ends up affecting everyone.
पण
While it may be safe to predict a likely end to the sex-ratio transition, there are two main options confronting affected societies and governments in the future. One is to let social change and its many ramifications play its natural role in bringing about the end of the masculinisation cycle. The second consists of adopting a more proactive role, in attempting to accelerate change in order to shorten the transitional period.
पब्लिक गुड व्ह. प्रायव्हेट
पब्लिक गुड व्ह. प्रायव्हेट गुड चा मुद्दा मस्त आहे हो. (तुम्ही तुमचा आयडी बदला राव. गब्बर चे गबरू, गब्बू, गबर्या केले जाऊ शकते. तसे मी चे काय करायचे ? म्या ?????)
http://en.wikipedia.org/wiki/Public_good
यात थोडे स्क्रोल करून तो types of goods चा मेट्रिक पहा. आता ह्या अॅनॅलिसिसचा परिपाक म्हणून क्लब गुड केला तर ? जातीयतेस खतपाणी घालण्याचा इल्झाम मेरे सर पे आ जायेगा.
Decency of debate
How the fuck are these two not related?
What has fuck got to do with it?
And how does fuck enhance the point, however valid or invalid it may be, that you are trying to make?
(All it proves is the intensity of your feeling towards your point. Does not lend validity to it in any way.)
सचिनराव, प्रथम एका प्रश्नाचे
सचिनराव, प्रथम एका प्रश्नाचे उत्तर द्या - तुम्ही प्रो-चॉइस आहात की प्रो-लाईफ. म्हंजे दांपत्यास गर्भपात करण्याचा विकल्प असावा की नसावा ? विशेषतः स्त्री ला गर्भपात करण्याचा विकल्प असावा की नसावा ? की गर्भपात हा विकल्प बेकायदेशीर ठरवला जावा ? (यात Roe v. Wade सारखे ट्रायमेस्टर उप-आर्ग्युमेंट आहे तसेच स्त्री वर दबाव टाकला जातो वगैरे आहेत. पण त्याबद्दल नंतर बोलू. आधी सैद्धांतिक पातळीवर गर्भपात बेकायदेशीर असावा की नको ते सांगा.)
उत्तर थेट पणे द्या - म्हंजे खालीलपैकी १ -
१) गर्भपात बेकायदेशीर असावा
२) गर्भपात बेकायदेशीर नसावा