Skip to main content

गिधाडगिरी

डाव्या लोकांबद्दल जर काही सर्वात गोड असेल तर तो आहे त्यांचा समानतेचा आग्रह. म्हणजे सगळं काही सपाटच असावं असं नव्हे. एखादा मनुष्य किती का अक्षम वा गैरजिम्मेदार वा भाग्यहिन असेना, त्याला एक "किमान मानुष्यिक जीवन" मिळावं हा आग्रह गोड आहेच खरा. त्या सीमेपुढे मात्र व्यक्तिगत घटकांचा परिणाम होऊन विषम समाज असलेला चालावे. या विषमतेची कमाल मर्यादा काय असावी, किमान मानुष्यिक आयुष्यात काय काय मोडतं, हा समतोल कोणी राखायचा, सरकारचा यात कुठपर्यंत सहभाग असावा, इ इ अनेक बाबी महत्त्वाच्या आहेत नि डाव्या लोकांचा जास्तीत जास्त काळ कोणत्याही देशात समता आधारित समाजाची चौकट कशी उभी राहिल, ती कशी टिकेल, तिच्याने श्रीमंत नि गरीब या दोन्ही बाजूंचा सामाजिक असंतोष कसा किमान असेल, मनुष्यता या शब्दास कसा महान अर्थ प्राप्त होईल, आणि ही चौकट देशाच्या आयुष्यात येण्यार्‍या अनंत संकटांत स्थिर कशी राहील इत्यादि बाबींच्या संशोधनावर जायला हवा. आपल्या भारताच्या संदर्भात ज्या राजकीय आणि आर्थिक घटनात्मक तरतूदी आहेत, त्यांनुसार समता-आधारित व्यवस्था उभी करण्यास कोणतीही आडकाठी नाही.

इथे माझ्या पहिल्या मुद्द्याची नोंद करा: यात धर्म या शब्दाचा कुठे काय संबंध आला? धर्म कुणी पाळला काय आणि नाही पाळला काय, काय फरक पडतो? धर्म ही मिती अर्थ या मितीपेक्षा पूर्णतः भिन्न आहे. धार्मिक खर्च आणि धार्मिक उत्पन्न यापलिकडे धर्माचा सामाजिक अर्थव्यवस्थेशी संबंध नाही. आणि आईंन्सस्टाईनने ज्या प्रमाणे काळ नि अंतराळ या दोन पूर्णतः भिन्न मितींपासून कालांतराल नावाची एक नविन मिती सांगीतली तसे डावे लोक धर्म आणि अर्थ यांची गल्लत करून धर्माथ ही एक मिती बनवतात. याचं कारण काय? कदाचित मार्क्सने समता आणि धर्म हे विषय एकत्र चर्चिले. कदाचित मार्क्सने धर्म, अर्थ आणि शिंका हे तीन विषय एकत्र चर्चिले असते तर आज धर्म, अर्थ आणि शिंक असे तीन डाव्या चळवळीचे अस्मितेचे मुद्दे झाले असते. अर्थातच सामाजिक व्यवस्थेची प्रेरणाच धर्म असेल, किंवा जीवनकारणाची प्रेरणा धर्म असेल तर धर्माचे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतात, पण तसे परिणाम अन्य कोणत्याही बाबीचे होतात. वर वर्णन केलेली व्यवस्था राबवण्यामधे लोकांचा वा संस्थांचा वा सरकारचा एक धर्म वा अनेक धर्म असू दिले तर समानतेच्या उद्दिष्टामधे का फरक पडेल? उदा. भारत एक इस्लामिक राष्ट्र झाला तर भारतात समानता नसेल हे कशावरून? तर धर्म आणि अर्थ हे एका विशिष्ट काटकोनात असले पाहिजेत हा आग्रह डाव्यांच्या बुद्धीबद्दल बरंच काही सांगून जातो.

आता माझा दुसरा मुद्दा काय आहे ते पहा. आपण जेव्हा भारतीय माध्यमांतील डाव्यांबद्दल आणि पुरोगाम्यांबद्दल बोलतो, तेव्हा त्यांना अक्कल आहेच असे गृहित धरणे आवश्यक आहे काय? म्हणजे हे लोकसत्ता, मटाचे संपादक, हिंदूचे संपादक, राजदीप, बरखा, करण, रविश, सागरिका, राजीव साने, इ इ लोक तुम्हाला बुद्धीवंत का वाटतात? त्यांना आपण बुद्धिवंत नि गिधाडे मानून आपण त्यांच्यावर अन्याय करत आहोत. मला असं वाटत नाही कि यांच्यापैकी कोणीही अप्रामाणिक पत्रकार वा बुद्धीवादी आहेत. ती व्यक्तिगत चरित्राने चांगलीच माणसे असावीत (व्यक्तिशः आहेतच अशी माझी खात्री आहे.). प्रश्न त्यांच्या अकलेच्या आहे. म्हणून, त्यांना गिधाडे म्हणणे अवास्तव आणि चूक आहे. आपलं माध्यम जास्त खपावं, टी आर पी वाढावा, आपल्याला जास्त प्रसिद्धी मिळावी, आपल्याला जास्त पैसे मिळावेत अशी प्रेरणा या लोकांत असली तर सरासरी स्वच्छ माणसाच्या चरित्रापेक्षा या लोकांचं चरित्र १० पट चांगलं असावं.

आपल्या जे मनुष्यजातीच्या कल्याण्यासाठी योग्य, अन्यायाला वाचा फोडणारं असं वाटतं ते आपण समोर आणणार मग यासाठी विरोध सरकार पक्षातील नेत्यांना करायचा असो, विरोधकांना करायचा असो, त्यांना निवडून देणार्‍या लोकांना असो, संस्थांचा असो, संस्कृती नि इतिहासाला नाहीतर प्रत्यक्ष इश्वराला असो, ते करतात. हा डाव्यांच्या न्यायाच्या आग्रहाचा गोडवा आहे. त्यात मला तरी अजिबात गिधाडगिरी दिसत नाही. पण त्यात एक तितकाच गोड मूर्खपणा आहे. डाव्यांना बुद्धीचं वावडं असतं. ते फार कुंपणात विचार करतात. त्यांचे हे विचार त्यांना फार फुशारकीचे वाटतात ह्याचं मुख्य कारण मात्र उजवे लोक त्यांना बुद्धिवंत दुष्ट विरोधक मानतात हे आहे. डावा हा बुद्धिमंत असलाच पाहिजे असा उजव्यांचा प्रचंड मोठा गैरसमज झालेला दिसतो, मग त्यासाठी त्यास दुष्ट का ठरवावयाचे असेना.

याचं उदाहरण म्हणून मी एक घटना देतो. मी राजदीप सरदेसाईची (वा त्याने घेतलेली) एक मुलाखत एका हिंदी चॅनेलवर पाहत होतो. त्यात समोरच्याने राजदीपवर आरोप केले कि तुम्ही नेहमी हिंदू धर्माविरोधी बोलता, तुम्ही भाजपविरोधी आहात, संघविरोधी आहात, बायस्ड आहात. उत्तरादाखल राजदीप म्हणाला कि मी हिंदु धर्माच्या विरोधात नाही. मग समोरचा म्हणाला कि तुम्ही स्वतःला हिंदु मानता का? राजदीप म्हणाला कि मी स्वतःला हिंदु मानतो, मला हिंदु धर्म आवडतो, मी स्वतः हिंदु धर्म एक चांगला हिंदु धर्म मानणारा आहे. मग राजदीपचं बदनशीब कि पुढचा त्याच्यावर विश्वासच ठेवेना. डाव्यांना बुद्धिमान गिधाड ठरवायची घाई नडली. अरे का? तो म्हणतोय तर माना ना! मी असतो तर मी विचारलं असतं - बाबा राजदीप, हिंदु धर्म एक चांगला धर्म आहे तर भारत हिंदु देश असायला काय हरकत आहे? तू काय एकटाच चांगला हिंदू आहेस का? तुला आर एस एस प्रणित हिंदु देश न आवडू दे, परंतु तुला स्वकल्पनेतील हिंदु देश तत्त्वतः आवडायला काय हरकत आहे? तुझी जी काय हिंदु धर्माची गोड गोड कल्पना आहे तसा हिंदु धर्म जर प्रॅक्टीकली भारताचा राजधर्म झाला तर तुला नक्की काय हरकत असेल? तत्त्वतः तुला हरकत नसायला हवी. समजा सरकारला धर्म असला नि तो चांगला धर्म असला तर काय बिघडतं? तुझ्या आणि आर एस एस च्या हिंदु भारतामधे काय काय फरक आहेत? असे प्रश्न त्याला विचारायला हवे होते. हिंदु धर्म हि एक चांगली गोष्ट असेल तर सरकारला चिपकायला नक्की काय आड येतं हे त्याच्याकडून वदवलं गेलं पाहिजे होतं. लक्षात घ्या कि (राजदीपला अभिप्रेत) हिंदु धर्म चांगला असणं आणि तो सरकाला लागू असणं अनिष्ट असणं हे दोन्ही कसं शक्य आहे? ही डाव्यांच्या निर्बुद्धतेची दुसरी साक्ष आहे. अगदी तत्त्वतः देखिल स्वतःस चांगली वाटणारी गोष्ट मान्य करायची नाही. राजदीप हिंदु भारत नको म्हणतो म्हणजे हिंदू धर्म वाइट आहे, त्यात सद्यस्थितीत राजकीय संलग्नता देण्याची क्षमता शून्य आहे, अन्य धर्मांशी असहिष्णूता आहे आणि सद्य धर्मरहित व्यवस्था श्रेष्ठ आहे असे सरळसरळ दिसते. तो मुलाखतीत काही म्हणालेला नाही पण त्यास तत्त्वतः देखिल भारत हिंदू देश असणे मान्य नसेल तर हा राजदीपचा वैचारिक घोळ आहे.
त्यात गिधाडगिरी काही नाही, सुस्पष्ट गधागिरी आहे.

ऋषिकेश Fri, 10/03/2017 - 14:16

तुमची भुमिका बहुतांश सुस्पष्टपणे मांडल्याबद्दल आभार. चार तारे दिले आहेत.

मला मानवेल आवडेल असे जीवन मला काहि सहस्रवर्ष जुनी कोणतीही रचना देऊ शकत नाही.
दुसरे असे माझ्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या व अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या कल्पना नव्या समकालीन रचनेहूनही भिन्न आहेत म्हणून माझ्यापरिने त्याला ढुशा द्यायचे काम मी करतो. मात्र असे ढुशा देणे नव्या रचनेत वैध आहे म्हणून मी ते करू शकतोय हा ऋणनिर्देश करण्यावाचूनही गत्यंतर नाही.

===

मात्र धर्म म्हणजे जीवनपद्धती या अर्थाने माझे अनेक व्यवहार हिंदू धर्मियांप्रमाणे आहेत हे मला मान्य आहेत. इतकेच नाही तर जन्मासोबत चिकटलेल्या या धर्मामुळे या देशात मी आपोआप बहुसंख्य होत असल्याने त्यातून होणारी सोय मला काही वेळा उपयुक्तही ठरते हे ही अमान्य असायचे कारण नाही.

इतरांनी कोणता धर्म बाळगावा, हे राष्ट्र 'हिंदू' व्हावे का वगैरे प्रश्न माझ्यासाठी गैरलागू आहेत कारण मला हिंदू राष्ट्र म्हणजे काय हेच समजलेले नाही. ते समजल्याशिवाय त्याला पाठिंबा/विरोध करणे मला शक्य नाही

अजो१२३ Fri, 10/03/2017 - 14:37

In reply to by ऋषिकेश

आपली भूमिका अत्यंत रास्त आहे. किमान आपली मानसिकता अत्यंत खुली आहे. जुन्या रचनेत आणि नव्या रचनेत काय फरक आहेत हे आपण ऑब्जेक्टिवली पाहू इच्छिता ही आनंदाची गोष्ट आहे.
===================
हे राष्ट्र 'हिंदू' व्हावे का हा प्रश्न माझ्यासाठी गैरलागू आहे असे म्हणता हे देखिल स्वीकार्य आहे.
============
विरोध करावा अशी कोणतीच भूमिका आपण घेत नाही आहात म्हणून काही उरलं असेल तर डिटेल्सची चर्चा किंवा एखाद्या प्रोपोजलची चर्चा.

बॅटमॅन Fri, 10/03/2017 - 12:46

In reply to by अजो१२३

डावे, पुरोगामी असं काही नसतं. ते फक्त मनाचे खेळ आहेत. त्यामुळे यांच्या यात्रेचे प्रयोजन समजले नाही.

अजो१२३ Fri, 10/03/2017 - 13:06

In reply to by बॅटमॅन

धर्म या संकल्पनेची सामाजाच्या जीवनातली व्याप्ती फार मोठी आहे. धर्माची समावेशन शक्ती देखिल खूप आहे. तो केंद्रस्थानातला सूर्य, गोल पृथ्वी, पृथ्वीचं आयुष्य, मानवांचे पूर्वज, विश्वाची उत्पत्ती, इ इ काही बाबी सोडल्या तर समाजाने उत्पन्न केलेली कितीतरी नाविन्ये धर्माने आपली करून घेतली आहेत.
सामाजिक जीवनात केंद्रस्थानी असलेल्या धर्माला निष्कासित करून डाव्या आणि पुरोगामी लोकांनी नविन व्यवस्था आणल्या आहेत. या व्यवस्था परिपूर्ण तर नाहीतच, पण अगदी उद्देशात देखिल या व्यवस्थांना मनुष्याच्या जीवनातील काही बाबींना स्पर्श करावयाचा नाही.
इतकी सगळी रडारड असताना वर सध्याला व्यवस्थांच्या केंद्रस्थानी असलेले लोक मूर्ख असणं परवडणारं नाही. हे व्यवस्थांच्या केंद्रस्थानचे डावे (विचारांच्या केंद्राच्या जस्ट डाव्याबाजूला बसलेले) आणि त्यांची मूर्खता आपल्या समाजाची जी अधोगती करते आहे ती कोण्या मनाचा खेळ नाही. ती ढळढळीत दिसते.

बॅटमॅन Fri, 10/03/2017 - 13:23

In reply to by अजो१२३

धर्म हा फक्त माणसाच्या मनात असतो. निसर्गात असलं काही नसतंय. त्यामुळे धर्मबिर्म झब झूठ है. धर्माच्या नावाखाली जे चाळे चाललेत ते हजारभर वर्षे युरोपात आणि तितकीच वर्षे मध्यपूर्वेत दिसलेलेच आहेत. भारतातही दिसलेले आहेत. त्यामुळे धर्माची व्याप्ती, समावेशन शक्ती वगैरे सब मूर्ख बनवायचा प्रकार आहे.

अजो१२३ Fri, 10/03/2017 - 13:30

In reply to by बॅटमॅन

लोकशाही हा फक्त माणसाच्या मनात असते. निसर्गात असलं काही नसतंय. त्यामुळे लोकशाही बिकशाही झब झूठ है. लोकशाहीच्या नावाखाली जे चाळे चाललेत ते शकडो वर्षे युरोपात आणि तितकीच वर्षे अमेरिकेत दिसलेलेच आहेत. भारतातही दिसलेले आहेत. त्यामुळे लोकशाहीची व्याप्ती, समावेशन शक्ती वगैरे सब मूर्ख बनवायचा प्रकार आहे.

बॅटमॅन Fri, 10/03/2017 - 13:33

In reply to by अजो१२३

जे काही आहे ते सर्वच मनात आहे, सबब दोन्हीही सारखाच मूर्खपणा आहे.

आता येऊद्या "भला तेरा मूर्खपणा मेरे मूर्खपणा से कम मूर्ख कैसे" वालं अर्गुमेंट.

मारवा Fri, 10/03/2017 - 21:06

In reply to by बॅटमॅन

चांगले विचारवंत आहेत , बरेच तटस्थ, परखड , आणी दूर्मिळ अशी वैचारीक स्पष्टता असलेले, समाजाशी संवेदनशीलतेने जोडुन घेणारे क्रीयाशील व्यक्ती आहे. त्यांचे गीतेवरील पुस्तक वाचावे असे नम्रपणे सुचवीतो. त्यांचा ब्लॅाग ही जमल्यास बघावा बाकी तूम्हीही विचारी व्यक्ती आहातच.
असो

अबापट Fri, 10/03/2017 - 14:08

जोशी साहेब , मूळ आर्टिकल आवडले . विशेषतः "आपल्या भारताच्या संदर्भात ज्या राजकीय आणि आर्थिक घटनात्मक तरतूदी आहेत, त्यांनुसार समता-आधारित व्यवस्था उभी करण्यास कोणतीही आडकाठी नाही.", " धर्म कुणी पाळला काय आणि नाही पाळला काय, काय फरक पडतो? "

वैयक्तिक मतभेद इथे कि " हिंदु धर्म एक चांगला धर्म आहे तर भारत हिंदु देश असायला काय हरकत आहे?"
कारण : धर्म हि वेगळी मिती आहे देश या मिती पासून... देशाला धर्म असायलाच पाहिजे का ? ... वगैरे . अर्थात तुम्ही तुमचे मत लिहिलेत त्याचा आदर ... पण आपला एवढा मतभेद नक्की ...

अजो१२३ Fri, 10/03/2017 - 15:30

In reply to by अबापट

बापट सर, एकमेकांच्या मताचा आदर हा चांगल्या चर्चेचा पाया असतो. म्हणून तुम्ही वारंवार "अर्थात तुम्ही तुमचे मत लिहिलेत त्याचा आदर" लिहित जाऊ नका. ते मला माहित आहे. शिवाय माझं तुमच्याबद्दल फार आदरयुक्त मत आहे म्हणून मिलिन्दला* दिला तसा कडक प्रतिसाद तुम्हाला माझ्याकडून कधी मिळणार नाही.
=======================

देशाला धर्म असायलाच पाहिजे का ?

देशाला धर्म का नसायला पाहिजे? इन पर्टिक्यूलर भारत देशाला हिंदू धर्म का नसायला पाहिजे? हिंदू धर्माचं घोडं नक्की कुठे अडतंय? तुम्हाला हिंदु धर्मात असे कोणकोणते दोष दिसतात ज्यामुळे भारताला हिंदू धर्म नसायलाच पाहिजे? पाकिस्तानला इस्लाम धर्म आहे आणि अनेक देशांना धर्म आहे म्हणून त्यांचं असं काय खासं बिघडलंय? https://en.wikipedia.org/wiki/Christian_state डेन्मार्क आणि नॉर्वे सारखे देश ख्रिश्चन म्हणवतात स्वतःला. अगदी त्याच अंगानं भारत हिंदू किंवा मुस्लिम (किंवा तुम्हाला जो आवडेल) तो तत्त्वतः असणं चूक कसं आहे?
=======================================

देशाला धर्म असायलाच पाहिजे का ?

देशाला धर्म अनावश्यक आहे असं मत असणं बरोबर असू शकतं. देशातील लोकांना धर्मांत अनास्था असू शकते. पण अनावश्यक असणं आणि हार्मफूल असणं या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. तुम्हाला आवश्यक वाटत नाही तर जाऊ द्या, पण ते अनिष्ट असं देखील वाटतं का?
धर्म वाइट आहे वा लोकांना धर्मांत आस्था नाही असं काही नसेल मग देशाला धर्म नकोच असं का? किमान बर्‍याच लोकांना देशाला देखिल धर्म हवा असं वाटत असेल तर मग काही लोकांची हार्मलेस गरज पुरोगामी लोकांनी पूर्ण होऊ दिली पाहिजे. तिला आक्रस्ताळा विरोध का?
मूळात हिंदू धर्माला राजधर्म बनण्यामधे नक्की कोणकोणता हार्मफूलपणा आहे? असं काही असेल तर त्याची यादी मिळेल का म्हणजे हिंदुत्ववादी लोक धर्म सुधारायचा प्रयत्न करतील. कि उगाच फार अल्प स्वल्प लोकांना हिंदु धर्मात अनास्था आहे (खरं म्हणजे आकस आहे असं वाटावं असं ते मूर्खपणे वागतात) म्हणून ज्या अनंत लोकांना त्याच्यात आस्था आहे त्यांच्यावर अन्याय कशासाठी?
======================================

देशाला धर्म असायलाच पाहिजे का ?

अवांतर व्यक्तिगत मते: धर्म नसलेले देश दिशाहिन असतात. अमेरिका किती का प्रगत असेना पण वांशिक घेट्टोंचा समूह आहे त्यापलिकडे त्याला अर्थ नाही. एका जमिनीच्या तुकड्यावर जाऊन चार दिवस थांबलं कि अंगात अमेरिकनत्व येतं नि मनुष्य महान मानवी मूल्यांच्या दिशेने वाटचाल करू लागतो असं काही नसतं. अमाप संपत्तीनं एकत्र बांधलेले लोक आहेत ते. ती गेल्यावर चार दिवसात अमेरिकनत्व हा इतिहास बनलेला असेल. https://en.wikipedia.org/wiki/Secession_in_the_United_States चोवीस टक्के अमेरिकन आजच म्हणतात गरज पडली तर वेगळं राहू. अगदी सुखासुखी! अगदी हेच भारतीयत्वाचं देखील आहे. चार राजकीय घडामोडींनी घातलेलं कुंपण फार टिकत नसतं. त्या देशाच्या अस्तित्वाला अर्थ नसतो. त्याच्या अस्मितेला अर्थ नसतो. त्या देशातल्या लोकांच्या मूल्यांना अर्थ नसतो. लक्षात घ्या कि घटना नि कायदे हे फार सिमित मार्गदर्शन करतात कसं जगावं त्याबद्दल. मी तुम्हाला नक्की किती आदर द्यावा याचं कोणतंही मार्गदर्शन कोणत्याही घटनेत वा कायद्यात नाही. धर्माचे मात्र हजार दाखले देता येतील.
तर देशाला धर्म नसला तरी चालेल पण देशात सामायिक श्वाश्वत अस्मिता असेल असं काहीही, काहीतरी असायला हवं. नाहीतर एकिकडे १३ लाख पैकी दुसर्‍या नंबरवर २ लाख मते घेणारा खोटारडा नि दुसरीकडे एक लाख पैकी दुसर्‍यापेक्षा ४० मते जास्त घेणारा खरा असलं लॉजिक फार टिकत नाही.
====================================

देशाला धर्म असायलाच पाहिजे का ?

अवांतर: हिंदु धर्म भारताशी कंपॅटिबल नाही का?
=================
*मिलिन्दराव, मला तुमच्याबद्दलही आदर आहेच, पण माझ्या देशाबद्दल थोडा जास्त आहे.

बॅटमॅन Fri, 10/03/2017 - 15:47

In reply to by अजो१२३

धर्मालाही काही अर्थ नसतो. विषय संपला.

एकिकडे १३ लाख पैकी दुसर्‍या नंबरवर २ लाख मते घेणारा खोटारडा नि दुसरीकडे एक लाख पैकी दुसर्‍यापेक्षा ४० मते जास्त घेणारा खरा असलं लॉजिक फार टिकत नाही.

बळी तो कान पिळी हे लॉजिक कसं काय टिकलं बरं एवढी शेकडो-हजारो वर्षे मग?

ऋषिकेश Fri, 10/03/2017 - 15:45

In reply to by अबापट

'देशाला धर्म असणे' म्हणजे काय म्हणायचे आहे? यावर देशाला धर्म असायलाच पाहिजे का नाही किंवा कसे यावर मत देता येईल

अजो१२३ Fri, 10/03/2017 - 16:01

In reply to by ऋषिकेश

https://en.wikipedia.org/wiki/Christianity_in_Norway
http://news.nationalpost.com/holy-post/norway-goes-secular-removes-luth…
या बातमीत

It stressed though that “the Norwegian Church will continue to have a special basis in the constitution and the state will be built upon ‘our Christian and humanistic heritage’.”

अर्थात बातमीचं टायटल खोटं आहे, उत्साही पुरोगामीलिखित आहे.

The current requirement for at least half of all government ministers to be members of the Church will also be scrapped, and even the minister of church affairs will no longer need to belong to the church.

२०१२ पर्यंतचा नॉर्वे नि आजचा भारत यांत किती प्रागतिक फरक आहे? मंजे २०१२ मधला नॉर्वे तर आपण हिंदु धर्मासोबत बनू शकतो. त्यापुढे कदाचित अशा कंडिशन्स काढूनच पुढे प्रगती करता येईल असे मानू.
==========================
तुम्हाला जर कोणता धर्म असेल तर तुम्हाला तो धर्म आहे म्हणजे काय याचे सॅलियंट मुद्दे द्या. म्हणजे तुम्हाला नक्की कोणत्या स्वरुपाची माहिती द्यायची आहे ते कळेल.

ऋषिकेश Fri, 10/03/2017 - 16:09

In reply to by अजो१२३

व्यक्तीस धर्म असणे हे मी समजू शकतो.

माझा प्रश्न आहे देशास धर्म असण्याचा. हा देशाचा धर्म आहे म्हणजे:
अ. देशाचे नियम हे फक्त राज्यकर्त्या धर्माचे (स्थायी) नियम असतील.
अ१. कायद्याचई अंमलबजावणी धार्मिक व्यवस्थेतच होईल. व त्याचा अर्थ लावण्याचे अधिकारही त्या धार्मिक अधिकार्‍यांनाच असतील
ब. त्या देशात फक्त राज्यकर्त्या धर्मियांना प्रथम नागरीकत्त्व असेल व त्या देशात फक्त राज्यकर्त्या धर्मियांना विशेष अधिकार असतील
क. इतर धर्मीयांसाठी कायदे करायचे अधिकार फक्त राज्यकर्त्या धर्मालाच असतील
ड. राज्यकर्त्या धर्मात प्रवेश करणे सोपे असेल मात्र तो धर्म बदलणे अवघड/अशक्य असेल
ई. त्या देशात राज्यकर्त्या धर्माच्याच लोकांना नागरीकत्त्व मिळेल?
फ. त्या देशात राज्यकर्त्या धर्माच्याच लोकांना प्रवेश मिळेल?

यापैकी काय-काय लागु आहे?

अजो१२३ Fri, 10/03/2017 - 17:13

In reply to by ऋषिकेश

आपण भारताचा पाकिस्तान बनलाय अशी कल्पना करून पाहू काय काय होते ते:
नंतर भारतातील हिंदू धर्माधिष्ठित व्यवस्था पाकिस्तानपेक्षा चांगली निघेल असे मानू.

पाकिस्तानात काय होते ते पाहू:
अ. देशाचे नियम हे फक्त राज्यकर्त्या धर्माचे (स्थायी) नियम असतील.
पाकिस्तानची कुराण पेक्षा वेगळी अशी घटना आहे. तिच्याने सरकार चालते. ती पाहिजे तशी बदलते. ते हिंदू मॅरिएज अ‍ॅक्ट पण पास करतात. पण त्यांच्यासारखे बरेच कायदे इकडे नकोत. आपली चव वेगळी.

अ१. कायद्याचई अंमलबजावणी धार्मिक व्यवस्थेतच होईल. व त्याचा अर्थ लावण्याचे अधिकारही त्या धार्मिक अधिकार्‍यांनाच असतील
पाकिस्तानात हे होते. म्हणजे कोणता कायदा इस्लामी नसेल तर तो खारीज होतो. अर्थात अजून त्यांना अधिकृतरित्या तरी फार काही पेचप्रसंग आला नाही. पाकिस्तान हा धर्मशासित देश आहे. देश धर्मशासित असणं वेगळं आणि राजसत्तेला धर्माचं नाव गाव माहित असणं (रिकग्निशन) वेगळं. भारतीय राजसत्तेची जी वेगवेगळी चिन्हं इ इ आहेत तक्षं त्यांचा एक धर्म असेल. पण भारतात कायद्याचं फ्रेमवर्क हे घटनेनेच बनणार.

ब. त्या देशात फक्त राज्यकर्त्या धर्मियांना प्रथम नागरीकत्त्व असेल व त्या देशात फक्त राज्यकर्त्या धर्मियांना विशेष अधिकार असतील.
असं काही पाकिस्तानात नाही. मात्र पाकिस्तानात पंतप्रधान नि राष्ट्रपती ही पदं मुस्लिमांकरता राखीव आहेत ज्याची भारताला गरज नाही.

क. इतर धर्मीयांसाठी कायदे करायचे अधिकार फक्त राज्यकर्त्या धर्मालाच असतील
पाकिस्तानात धार्मिक स्वातंत्र्य आहे, कायद्यानं आहे. कायद्याचे अधिकार संसदेला असतील. झिया-उल-हक फार घाण माजवलेली पण मायनोरिटीचे मतदानाचे हक्क ठेवलेले - स्वतःच्या धर्माच्या उमेदवाराला मत द्यायचे असे का असेना पण ठेवले. तो हुकुमशहा गेला मग ते सगळं ठिक केलं गेलं.

ड. राज्यकर्त्या धर्मात प्रवेश करणे सोपे असेल मात्र तो धर्म बदलणे अवघड/अशक्य असेल
पाकिस्तानात असं नाही. फक्त सरकारी धर्माचा अपमान करायचा नाही. ती देशाची अस्मिता आहे. आपल्याकडे सरकारचा नि देशाचा धर्म हिंदु असेल. ते ही ते मेजॉरिटी नि हार्मलेस आहेत तोवर. लोकांचा धर्म काही का असेना.

ई. त्या देशात राज्यकर्त्या धर्माच्याच लोकांना नागरीकत्त्व मिळेल?
पाकिस्तानचं नागरिकत्वं कोणत्याही धर्माच्या माणसाला मिळतं. मंजे धर्माने काही फरक पडत नाही.

फ. त्या देशात राज्यकर्त्या धर्माच्याच लोकांना प्रवेश मिळेल?
असं देखिल पाकिस्तानात काही नाही.
==========================================
पाकिस्तान हा जगातला सर्वात कट्टर नि क्रूर डोक्यांनी चालवलेला गेलेला सर्वात कट्टर धार्मिक देश आहे. पण त्याच्या संवैधानिक प्रतिष्ठापनेत इस्लामचा रोल जो आहे त्यानं मानवतेचं काही वाटोळं केलेलं नाही. अर्थात अपवाद अनंत आहेत हे मान्य. मग धर्म म्हणताच शिसारी, ओकारी, उलटी, शहारे, अंगलहर, इ इ येणारे लाखो विद्वान ज्या भारतात प्रशासनात नि माध्यमांत अ‍ॅक्टीव आहेत, तिथे नॉर्वे सारखी स्थिती यायला हरकत नाही.

ऋषिकेश Tue, 14/03/2017 - 12:19

In reply to by अजो१२३

तुमच्या डोक्यातील 'देशाला धर्म‌' असणे ही सस‌Mकल्पना अजूनही स्पष्ट‌ नाही.
तुम्ही एकीकडे म्हणता

भारतीय राजसत्तेची जी वेगवेगळी चिन्हं इ इ आहेत तक्षं त्यांचा एक धर्म असेल. पण भारतात कायद्याचं फ्रेमवर्क हे घटनेनेच बनणार.

पाकिस्तानात धार्मिक स्वातंत्र्य आहे, कायद्यानं आहे. कायद्याचे अधिकार संसदेला असतील

मग सध्या काय वेगळ्M आहे?

दुसरीकडे तुम्ही म्हणता

आपल्याकडे सरकारचा नि देशाचा धर्म हिंदु असेल. ते ही ते मेजॉरिटी नि हार्मलेस आहेत तोवर.

पण सरकारछा धर्म हिMदू असणे म्हणजे काय‌? याछे एक उदाहरण देऊ शकाल का?

‍‍‍
अवाMतर:
विकाMतला व सुट्टीवर असताना मराठी जालविश्वापासून बहुताMश काळ दूर असतो. तेव्हा प्रतिसाद न दिल्याने मी पळून गेलो असा समज करून खुश होउ नये :) ;) (ह‌. घ्यालच्)

चिंतातुर जंतू Fri, 10/03/2017 - 16:44

In reply to by अजो१२३

>> इन पर्टिक्यूलर भारत देशाला हिंदू धर्म का नसायला पाहिजे? हिंदू धर्माचं घोडं नक्की कुठे अडतंय?

>> हिंदु धर्म भारताशी कंपॅटिबल नाही का?

>> २०१२ पर्यंतचा नॉर्वे नि आजचा भारत यांत किती प्रागतिक फरक आहे? मंजे २०१२ मधला नॉर्वे तर आपण हिंदु धर्मासोबत बनू शकतो.

इथली आकडेवारी सांगते त्यानुसार नॉर्वेची एकूण लोकसंख्या पन्नास लाख आहे. म्हणजे एखाद्या भारतीय महानगराहून कमी. त्यात ८०% ख्रिस्ती आहेत आणि त्यातही ७३% एकाच पंथाचे (ल्यूथेरन). उरलेल्यातले १५% धर्म न मानणारे आणि ३.५% इतरधर्मीय. ह्याची तुलना आजच्या (सव्वाशे कोटी वगैरे) भारताशी करा आणि मग तुमच्या मते भारताची प्रगती जो हिंदू धर्म स्वीकारून होईल तो नक्की कोणता असावा त्याची व्याख्या सांगा. (जात हा विषय ऑप्शनलाच टाकलेला आहे.)

अजो१२३ Fri, 10/03/2017 - 17:20

In reply to by चिंतातुर जंतू

पहा, ८०:१५:५ हा रेशो भारतात देखिल लागू पडतो. फक्त टोटलचा फरक आहे. आता नॉर्वेची लोकसंख्या किती झाल्यावर त्यांनी ख्रिश्चन राज्य हे वर्णन सोडून सेक्यूलर व्हायला हवं? आपलं मत?
=======================================

जो हिंदू धर्म स्वीकारून होईल तो नक्की कोणता

जरा ऑप्शन्स देता का?

चिंतातुर जंतू Fri, 10/03/2017 - 17:24

In reply to by अजो१२३

>> ८०:१५:५ हा रेशो भारतात देखिल लागू पडतो.

कसा? म्हणजे नक्की कोणते लोक ८०% आणि कोणते १५%? आणि "त्यातही ७३% एकाच पंथाचे (ल्यूथेरन)" तो कोणता पंथ?

अजो१२३ Fri, 10/03/2017 - 17:47

In reply to by चिंतातुर जंतू

भारतातल्या एखाद्या राजकीय पक्षाला अमेरिकेत इक्विव्हॅलेंट नाही दाखवला मंजे अमेरिकेत लोकशाही नाही असं होत नाही.
=================
कसं आहे जंतू, हे पहा - ८०% हिंदू, १५% मुस्लिम, ५% इतर. आता त्यातही ७३% एकाच पंथाचे असले पाहिजेत हे तुमचं गृहितक आहे. http://news.nationalpost.com/holy-post/norway-goes-secular-removes-luth… ही बातमी आपण भिंग व्यवस्थित अंतरावर ठेऊन वाचलीत का? मी वरच दिलीय. त्यांनी लुथेरियन या पोटभेदास तिलांजली दिली आहे आणि तुम्ही म्हणत आहात ती ख्रिश्चन राज्य असण्यास पोटभेद असणे आवश्यक आहे. लॉजिक काय?

It stressed though that “the Norwegian Church will continue to have a special basis in the constitution and the state will be built upon ‘our Christian and humanistic heritage’.”

१. ते सगळे लूथेरीयन होते म्हणून ते ख्रिश्चन सरकार बनले अन्यथा ते सेक्यूलर राहिले असते याचा पुरावा काय?
२. लुथेरियन आणि अन्य ख्रिश्चन यांच्यात असे कोनकोनते फरक असतात ज्यांच्यामुळे सरकार सेक्यूलरच ठेवावे लागते?
३. जिथे जिथे जगात ख्रिश्चन वा इस्लामिक धार्मिक सरकारे आहेत तिथे तिथे सर्वत्र सर्वत ७०% प्लस लोक एकाच धर्माच्या एकाच पंथाचे आहेत याचा पुरावा काय?

चिंतातुर जंतू Sat, 11/03/2017 - 14:01

In reply to by अजो१२३

>>आता त्यातही ७३% एकाच पंथाचे असले पाहिजेत हे तुमचं गृहितक आहे.

नाही. माझा प्रश्न लॉजिस्टिक्सविषयी होता. उदाहरणादाखल - एक पंथ म्हणाला की शुभ कार्याची सुरुवात गणेशवंदनेनं करायची. दुसरा पंथ म्हणाला की शारदास्तवन हवं. तिसरा पंथ म्हणाला की आमच्यात बोकडाचा बळी देतात. आता प्रश्न असा की सरकारी प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या वेळी कोणती पद्धत वापरावी? ७३% एकाच पंथाचे असतील तर किमान बहुसंख्यांना मान्य होईल असा एक पर्याय तरी मिळेल.

अबापट Fri, 10/03/2017 - 16:36

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश / जोशी साहेब
ऋ चा प्रश्न : 'देशाला धर्म असणे' म्हणजे काय म्हणायचे आहे?
वैयक्तिक मते : धर्म हि खाजगी गोष्ट असावी. ज्याला जे भावेल ते( दुसर्यांना त्रास न देता ) त्याने पाळावे . प्रत्येक माणसाला वाटणारा धर्म वेगळा असू शकतो . इतकेच काय , तर प्रत्येक माणसाची धर्माची जाण वय काळ परत्वे बदलत जाऊ शकते ( लांब जाऊ नका , इव्हन सावरकरांची धर्माबाबतीत बदलत गेलेली मते .. तर असो ) स्वामी अवैद्यनाथांना अपेक्षित हिंदू धर्म आणि गाडगे महाराजांचा हिंदू धर्म यातही किती तफावत असू शकते ? . हे फक्त मोकळ्या ढाकळ्या लिबरल हिंदू धर्माविषयी च नाही . पण अगदी कट्टर पोथीनिष्ठ इस्लाम किंवा ख्रिश्चनिटी मध्ये सुद्धा आपापला भावलेला धर्म हा वेगळा असू शकतो , नव्हे आहेच ( विचारा वहाबीना सुफी म्हणजे काय ? )
अशी गोष्ट ज्याची जाण इतकी व्यक्तिसापेक्ष बदलती असू शकते , त्याची सांगड देशाला लावण्याची जरुरी काय ?
म्हणून मला या अर्थाने देशाला धर्म नसावा असे वाटते
( शिवाय सद्यस्थितीतील धर्म लावणाऱ्या देशातील गोंधळ बघता ..... )
जर देशाला धर्म हि गोष्ट ... राष्ट्रीय पक्षी मोर तसा राष्ट्रीय धर्म ... वगैरे इतपत निरुपद्रवी असती तर काही हरकत नाही . पण ती तशी नाही . अस्मिता , अर्थकारण, पॉवर अशा बऱ्याच गोष्टी असतात त्यात , ज्यामुळे बऱ्याच लोकांना ती इतपत निरुपद्रवी ठेवण्यात रस नसतो .

नॉर्वे , स्वीडन हे छोटे , धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या बऱ्यापैकी एकसंध , कमी लोकसंख्येचे देश आहेत . भारत देश हा धर्म , पंथ , विचारधारा , लोकसंख्या , संस्कृती या सगळ्या बाबतीत खूप विविधता असलेला देश आहे त्यामुळे नॉर्वे स्वीडन चे उदाहरण आपल्याला लागू पडत नाही असे वाटते .
अवान्तर् : USA हा अधिकृत ख्रिश्चन देश आहे का हो ?
फार लिहिले .

अजो१२३ Fri, 10/03/2017 - 17:26

In reply to by अबापट

नॉर्वे , स्वीडन हे छोटे , धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या बऱ्यापैकी एकसंध , कमी लोकसंख्येचे देश आहेत .

ठिकै. ईशान्येतली राज्ये त्यांच्यापेक्षा छोटी नि एकसंघ आहेत. त्यांना राज्यधर्म असू द्यावा का?

चिंतातुर जंतू Fri, 10/03/2017 - 17:30

In reply to by अजो१२३

>> ईशान्येतली राज्ये त्यांच्यापेक्षा छोटी नि एकसंघ आहेत. त्यांना राज्यधर्म असू द्यावा का?

खरंच? मग एक काम कराच. इशान्येकडच्या प्रत्येक राज्याचं नाव लिहा आणि सांगा त्यातल्या प्रत्येक एकसंध राज्याचा राज्यधर्म नक्की कोणता असायला हवा तुमच्या मते?

चिंतातुर जंतू Sat, 11/03/2017 - 14:11

In reply to by अजो१२३

>> भारतीय लोक उदार स्कँडेनेवियन लोकांपेक्षा जास्त एकसंघ आणि कट्टर असावेत.

इकडे दिलंय त्यानुसार ४१% मैतेई हिंदू ४१% ख्रिस्ती आणि मग बाकीचे सुमारे २०% इतर आदिवासी वगैरे आहेत. त्यात पुन्हा खोर्‍यात राहणारे वेगळे आणि डोंगरांत राहणारे वेगळे वगैरे. त्यांच्यात्यांच्यात पुन्हा पाठभेद आहेत :

Kukis and Nagas are the major tribe conglomerates. The Nagas are further sub-divided into sub-tribes: Tangkhul, Maram, Poumai Naga, Sumi, Angami, Ao, Chakhesang, Chang, Khiamniungan, Konyak, Liangmai, Lotha, Pochury, Rongmei, Zeme, and Mao

आता प्रश्न असाच उपस्थित होतो की राज्याचा एकच कोणता तरी धर्म झाला की त्या सगळ्यांना सार्वजनिक आयुष्यात आणि सरकारी अधिकृत कार्यक्रमांत वगैरे नक्की काय करावं लागेल?

अजो१२३ Fri, 10/03/2017 - 18:10

In reply to by अबापट

धर्म हि खाजगी गोष्ट असावी.

धर्मात व्यक्तिगत नि सामाजिक गोष्टींचे संकेत असतात.
राजकारणात देखिल व्यक्तिगत नि सामाजिक गोष्टींचे संकेत / नियम असतात.
मग धर्मच का खासगी गोष्ट असावी. सगळ्या राजकीय गोष्टी पण खासगी गोष्टी असाव्यात. उदा. मी स्वतःला भारताचा नागरीक मानावे कि पाकिस्तानचा, मी अमृतसरवरून लाहोरला जाताना कोणा मूर्खांनी अडवले तर त्यांना बदडावे का नाही, मला गाडी चालवता येत असेल तर मी कोणा माणसाला त्याची सिद्धता म्हणून कोणती चिटोर का दाखवावी (जा ना घरी, तुझ्या अंगावर घातली का गाडी असे का म्हणू नये), कोण्या बंगाल्याने कोण्या अगम्य भाषेत लिहिलेल्या संदर्भहिन गाण्याच्या वेळी माझे प्रिय पॉपकॉर्न सोडून उभं का राहावं, माझी ओळख देताना कोण्या एका मूर्खाने माझ्याशी अर्थाअर्थी काही संबंध नसलेल्या भल्या मोठ्या जमिनीच्या तुकड्याचे नाव घेत "तिथलीय" म्हणून का सांगावे, मी काही बरंवाइट केलं तर मी केलं ते चूक का बरोबर का क्षम्य का जेल्य ते पुन्हा जाडजूड पुस्तके घेऊन बसलेल्या असंबंधित निरर्थक लोकांना का ठरवू द्यावे. ही सगळी मंडळी माझ्या जीवनात कुठून कशी आली , कोणी आणली आणि मी का गिनावं त्यांना. हे सगळं खासगीच नाही का? माझं व्यक्तिगत नाही का? धर्म ही खासगी व्यवस्था असावी असा आग्रह असेल तर झाडून सगळ्या सामाजिक व्यवस्था फक्त आणि फक्त खासगी (लातूरला खाजगी) असाव्यात.
==================
तुम्ही मेरिट बेसिस वर बोला ना काय असावं , काय नसावं, काय खाजगी असावं , काय पब्लिक असावं.

बॅटमॅन Fri, 10/03/2017 - 18:16

In reply to by अजो१२३

धर्म निरर्थक आहे. त्याने लोकांचे वाटोळे केले. धर्म खाजगीच पाहिजे.

लोकशाहीचे, राष्ट्रवादाचे सर्व फायदे उपटून वर त्याला कृतघ्नपणे शिव्या घालणार्‍यांचे नियमन करायला धर्म अक्षम आहे.

अजो१२३ Fri, 10/03/2017 - 18:17

In reply to by अबापट

ज्याला जे भावेल ते( दुसर्यांना त्रास न देता ) त्याने पाळावे . प्रत्येक माणसाला वाटणारा धर्म वेगळा असू शकतो .

दोन लोकशाह्यांचा पण एकमेकांना जबरदस्त त्रास होतो. दोन धर्मांना एकमेकांचा होतो त्यापेक्षा जास्त. म्हणून काय लोकशाही वैयक्तिक ठेवायची. कायपन राबवायचं म्हणलं तर थोडंफार घासणारच, पण सगळ्यात बेक काय ते पाहायला लागेल.

बॅटमॅन Fri, 10/03/2017 - 18:19

In reply to by अजो१२३

अजोच्या असंबद्ध प्रतिक्रियांचा त्रास होत असेल तर काय करायला पाहिजे याचे उत्तर आहे का हो तुमच्या दीन-ए-उदगिरी मध्ये?

अजो१२३ Fri, 10/03/2017 - 18:24

In reply to by अबापट

इतकेच काय , तर प्रत्येक माणसाची धर्माची जाण वय काळ परत्वे बदलत जाऊ शकते

हे प्रत्येकच संकल्पनेबाबत होतं. हे कसं कारण असेल राजकारण आणि धर्म जोडणं टाळण्याचं.

हे फक्त मोकळ्या ढाकळ्या लिबरल हिंदू धर्माविषयी च नाही . पण अगदी कट्टर पोथीनिष्ठ इस्लाम किंवा ख्रिश्चनिटी मध्ये सुद्धा आपापला भावलेला धर्म हा वेगळा असू शकतो , नव्हे आहेच ( विचारा वहाबीना सुफी म्हणजे काय ? )

लोकशाहीचा तुम्ही काढलेला अर्थ (तो खाली तुम्हाला आवडणारा रम्य गोंधळ इ) आणि मी असाच मूडमधे आल्यावर कधीतरी काढलेला अर्थ (माझ्याकडनं माझ्यासंमतीनं माझं शोषण करून घ्यायचं) हे वेगळे असणार. पण सर, धर्मात असा काय प्रॉब्लेम आहे कि लोकांना एवढं जबर्‍या वावडं आहे.

बॅटमॅन Fri, 10/03/2017 - 18:27

In reply to by अजो१२३

नॉनखाजगी धर्म म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे ते डिफाईन करा क्लिअरली, तोवर या चर्चेला अर्थ नाही.

अजो१२३ Fri, 10/03/2017 - 17:23

( शिवाय सद्यस्थितीतील धर्म लावणाऱ्या देशातील गोंधळ बघता ..... )

मी केवळ तात्त्विक भूमिका विचारतोय. देशातला गोंधळ बघून मी लोकशाही पण बरखास्त करायची शिफारस करेन.
क्रमशः

अबापट Fri, 10/03/2017 - 17:42

In reply to by अजो१२३

>>>मी केवळ तात्त्विक भूमिका विचारतोय. देशातला गोंधळ बघून मी लोकशाही पण बरखास्त करायची शिफारस करेन.

आणि आपल्या किंवा कुठल्या लोकशाही असणाऱ्या देशातील( म्हणजे आपल्या देशातील लोकशाही प्रमाणे सक्षम लोकशाही असणाऱ्या ) गोंधळ आणि सौदी अरेबिया सारख्या धर्माधिष्ठित देशात चालणाऱ्या गोष्टी यांची एकमेकांशी तुलना होऊ शकते का ?
मला 'चालणाऱ्या 'लोकशाहीतील गोंधळ हा धर्माधिष्ठित सत्ता असणाऱ्या देशामधील दंडेलशाही पेक्षा पसंत आहे .

आपल्या देशाबद्दल बोलताय ? कुठला गोंधळ ?
आपल्या देशातील गोंधळासकट मला आपल्या देशातील लोकशाही हि आवडते . ती सक्षम आहे असे मत.

तिरशिंगराव Fri, 10/03/2017 - 20:41

आपल्या देशाने जी निधर्मी वाट धरली आहे, तीच योग्य आहे, असे मला वाटते. फक्त ही राज्यव्यवस्था, खर्‍या अर्थाने निधर्मी म्हणून राबवली तरच ती आदर्श म्हणता येईल. उदाहरणार्थ,
१. कुठल्याही प्रकल्पाची सुरवात, कुठल्याही धर्माच्या पद्धतीने पूजा करुन असता कामा नये.
२. कुठल्याच धर्माच्या लोकांना सवलती नकोत.
३. कुठल्याही सणाला, पंतप्रधान, राष्ट्रपती इत्यादिंनी शुभेच्छा देणे बंद करावे.
४. सर्व धार्मिक सणांच्या सुट्ट्या रद्द कराव्यात.
५. सरकारी पदावरच्या कुठल्याही स्तरावरच्या व्यक्तिने, कामावर असताना धार्मिक पूजा करु नये. यांत सपत्निक पंढरपूरच्या विठोबाची पूजा, हे एक ठळक उदाहरण आहे.
६. सरकारी कार्यालयात कुठल्याच धर्माच्या देवाचे वा त्यांच्या पवित्र वस्तुचे फोटो लावता कामा नयेत.
७. रस्त्यावर, वा सार्वजनिक जागेत, कुठल्याही धार्मिक मिरवणुकीला, महाआरतीला वा सामुदायिक नमाजाला बंदी असली पाहिजे.

अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. फक्त ती काटेकोरपणे पाळली पाहिजेत.
धर्म हा फक्त घराच्या वा देवळाच्या/इतर प्रार्थनास्थळांच्या चार भिंतीच्या आंत, ध्वनिवर्धकाशिवायच असला पाहिजे.

गब्बर सिंग Fri, 10/03/2017 - 23:58

डाव्या लोकांबद्दल जर काही सर्वात गोड असेल तर तो आहे त्यांचा समानतेचा आग्रह. म्हणजे सगळं काही सपाटच असावं असं नव्हे. एखादा मनुष्य किती का अक्षम वा गैरजिम्मेदार वा भाग्यहिन असेना, त्याला एक "किमान मानुष्यिक जीवन" मिळावं हा आग्रह गोड आहेच खरा. त्या सीमेपुढे मात्र व्यक्तिगत घटकांचा परिणाम होऊन विषम समाज असलेला चालावे. या विषमतेची कमाल मर्यादा काय असावी, किमान मानुष्यिक आयुष्यात काय काय मोडतं, हा समतोल कोणी राखायचा, सरकारचा यात कुठपर्यंत सहभाग असावा, इ इ अनेक बाबी महत्त्वाच्या आहेत नि डाव्या लोकांचा जास्तीत जास्त काळ कोणत्याही देशात समता आधारित समाजाची चौकट कशी उभी राहिल, ती कशी टिकेल, तिच्याने श्रीमंत नि गरीब या दोन्ही बाजूंचा सामाजिक असंतोष कसा किमान असेल, मनुष्यता या शब्दास कसा महान अर्थ प्राप्त होईल, आणि ही चौकट देशाच्या आयुष्यात येण्यार्‍या अनंत संकटांत स्थिर कशी राहील इत्यादि बाबींच्या संशोधनावर जायला हवा. आपल्या भारताच्या संदर्भात ज्या राजकीय आणि आर्थिक घटनात्मक तरतूदी आहेत, त्यांनुसार समता-आधारित व्यवस्था उभी करण्यास कोणतीही आडकाठी नाही.

(१) अजोंनी समानता या शब्दावरून समता या शब्दावर उडी मारलेली आहे.

(२) गब्बर हा विषमतेचा थेट समर्थक आहे. समानता एन्फोर्स करण्यास माझा प्रखर विरोध आहे. Liberty also means liberty to be unequal. व मी जर इतरांपेक्षा प्रचंड श्रेष्ठ असेन तर तुम्ही त्याप्रति सहिष्णु असलंच पाहिजे. जसं लता मंगेशकर ह्या पार्श्वगायनात बहुतेकांपेक्षा श्रेष्ठ आहेत, अमिताभ बच्चन, बलराज साहनी, दिलीप कुमार हे अभिनयात बहुतेकांपेक्षा श्रेष्ठ आहेत हे मान्य करताना लोकांना समस्या येत नाही तसं मुकेश अंबानी हे इतरांपेक्षा पैश्याच्या बाबतीत श्रेष्ठ आहेत हे मान्य करूनही त्यांच्याकडचे पैसे बळजबरीने घेऊन इतर फडतूसांना दिले जातात यावर माझा आक्षेप आहे. पार्श्वगायनातील विषमता दूर करण्यासाठी लताबाईंना फोर्स केला जात नाही की तुम्ही इतरांना पार्शगायन शिकवायलाच हवं असा. अभिनयातील विषमता दूर करण्यासाठी अमिताभ ला बळजबरी केली जात नाही की त्याने इतरांना अभिनय शिकवायलाच हवा याची. मग मुकेश अंबानीकडचा पैसा बळजबरीने ओढून इतरांना का दिला जावा ? Why are we so hostile intolerant to wealth earners ?

(३) माझ्या दृष्टीने आदर्श व्यवस्था ही आहे की ज्यात प्रचंड विषमता असावी आणि लोकांना त्यात काहीही अयोग्य वाटू नये.

पिवळा डांबिस Sat, 11/03/2017 - 01:15

मतं पटणं/ न पटणं हा भाग वेगळा पण लेख आणि अजोंचे प्रतिसाद मस्त आले आलेत.
विशेषतः ते एका बंगाल्याने लिहिलेलं असंबद्ध गाणं वाजतांना पॉपकॉर्न.....
ते तर कहर आहे. खदखदून हसलो!

अजो१२३ Sat, 11/03/2017 - 12:14

दुर्दैव असं आहे कि माझ्याशी लॉजिक लावताना पुरोगाम्यांची दमछाक होते. मग ते मला ट्रोल मानू लागतात. थकतात. भाषादोष, शैलीदोष काढतात (हे आहेत हे मला देखील मान्य आहे, पण ते महत्त्वाचं आहे का?). अशा सर्व चर्चा निरर्थक असतात असे म्हणतात. मी जे म्हणत नाहीये ते मी म्हणतोय असे म्हणतात. अचानक गायब होतात. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत.
=====================
अर्थात मी स्वतः देखील असाच बरेच जागी करत असावा (एक्सेप्ट फॉर कॉलिंग अदर्स ट्रोल) नि माझ्याबद्दलही लोकांचं असंच मत असावं.

अबापट Sat, 11/03/2017 - 12:33

In reply to by अजो१२३

अजो ,
>>>दुर्दैव असं आहे कि माझ्याशी लॉजिक लावताना पुरोगाम्यांची दमछाक होते.

यात मी पण आलो असे गृहीत धरून लिहितोय . ( तसे खरे हाडाचे पुरोगामी तुम्हीच , पण तरीही !!!)
असं बघा , दमछाक लॉजिक लावताना होत नाहीये , लिहिताना होतीय . म्हणूनच मी वेगळा प्रस्ताव ठेवला होता. तुमचं उत्तर फार उशिरा आलं , नाहीतर काल रात्रीच चर्चा संपवली असती !!!! ;)

>>>अर्थात मी स्वतः देखील असाच बरेच जागी करत असावा (एक्सेप्ट फॉर कॉलिंग अदर्स ट्रोल) नि माझ्याबद्दलही लोकांचं असंच मत असावं.

झालं ना आता मग . अहो तुमचा मित्र बॅटमॅन नि तुम्हाला एवढे काही म्हणाला , पण तुम्ही शस्त्र खाली ठेवलं नाहीत . आणि या एका शब्दाने घायाळ झालात ?
(आठवा तो अर्जुन वगैरे !!!) किंवा अनुताईंचा क्लास लावा .( आणि चर्चा चालू ठेवा !!!! )
( मा. श्री . बॅटमॅन , तुम्ही हळू घ्यावे , तुमच्या तोफेचे तोंड अजो आणि मनोबा कडे असते , ते माझ्याकडे वळवू नये . मी त्यांच्या एवढा दमाचा गडी नाही. )

अजो१२३ Sat, 11/03/2017 - 13:54

In reply to by अबापट

तुमच्या तोफेचे तोंड अजो आणि मनोबा कडे असते , ते माझ्याकडे वळवू नये . मी त्यांच्या एवढा दमाचा गडी नाही.

मेलो हसून. बॅट्या बदनाम हो गया.

अबापट Sat, 11/03/2017 - 15:56

In reply to by नंदन

जळले इलाही नंदन शेठ ... जहाँ पन !!! आपण थोर आहेत . आपल्या भरघोस पाठिंब्यावर कट्ट्याचा एखादा कमालीचा भयानक अंक काढायला हरकत नाही .

अजो१२३ Sat, 11/03/2017 - 13:57

In reply to by अबापट

तुमचं उत्तर फार उशिरा आलं , नाहीतर काल रात्रीच चर्चा संपवली असती !!!!

अजूकबी कदीबी. (कल कू श्याम कू छोडके.)

मूर्तिभंजक Tue, 14/03/2017 - 17:50

फ्रेंचांनी समता आणि बंधुता यांच्या बरोबर एकाच पिशवीत कोंबले असले तरी स्वातंत्र्य हे इतर सर्व मुल्यांचा स्रोत आहे आणि त्याला छेद देणाऱ्या सर्व व्युहांचा विरोध करायला हवा असे मी मानतो. हे सांगण्याचा हेतू असा कि मी डावा नाही हे आधीच स्पष्ट व्हावे.
सर्व धर्म कमी अधिक प्रमाणात स्वातंत्र्याला मुरड घालण्यासाठी बेतलेले आहेत. शिंकेचे तसे नाही. “धर्म – शिंक”, किंवा “बरखा – राजीव साने” आणि नंतर “धर्म- लोकशाही” यांची एकत्र मोट बांधणे हि निव्वळ टवाळ खोरी वाटते आणि मूळ लेखाची प्रत त्यामुळे खालावली असे ही जाणवते. पुरोगामी आणि डावे हे समानार्थी शब्द नव्हेत.
धर्माधीष्टीत राष्ट्राची वकिली ज्यांना करायची असते त्यांना त्यांच्या धार्मिक कल्पनांची सक्ती करायची आहे हे नाकारणे भाबडे पणाचे आहे. नकाशावर “हिंदू राष्ट्र” अशी फक्त पाटी लाऊन संघाचे समाधान होत नाही. तर मी काय जेवावे हे ठरवण्यापासून माझ्यावर त्यांना सत्ता गाजवायची असते. इस्लामला तर, जेंव्हा जागतिक मताची पर्वा नसते, तेंव्हा नास्तिकाचे अस्तित्वच मिटवायचे असते. लोकशाही व्यवस्था ही स्वातंत्र्याच्या दिशेची धडपड तरी आहे.
साम्यवादी आणि धर्मवादी यांच्यामध्ये कमालीचे साधर्म्य आहे. मतभेद न सहन झाल्याने लगेच “अक्कल” “बुद्धी” काढण्याच्या वृत्ती कडे एकवेळ दुर्लक्ष करता येईल पण व्यक्तीस्वातंत्र्याबद्दल त्यांची तुच्छता फार गंभीर आहे.
ऐसी वरील एकाहून एक राजहंसांच्या चालण्याने थक्क होत्साता साधारणपणे “वाचू आनंदे” भूमिकेतून बाहेर पडायचा धीर होत नाही. पण “राजदीप ला व्यक्तिगत जीवनात एक धर्म आवडतो तेंव्हा सार्वजनिक पणे तो धर्म इतरांवर लादायला सुद्धा आवडलेच पाहिजे” हा तर्क वाचून नाईलाज झाला .

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 14/03/2017 - 20:17

In reply to by अजो१२३

... पण संस्थळ सुरू आहे. काही कामं बाकी आहेत; ती एकेक करून मार्गी लावत आहे. पण सर्वसाधारण, मूलभूत गोष्टी सुरू आहेत.

बॅटमॅन Tue, 14/03/2017 - 20:20

In reply to by अजो१२३

नास्तिकांनी अस्तिकांची अक्कल काढावी नि अस्तिकांनी सवय असल्याप्रमाणं निमूट पाहावं याचा इन्वर्स सिनॅरिओ काय?

याचा इन्वर्स सिनारिओ म्हणजे सौदी अरेबिया.

ऐसी Thu, 16/03/2017 - 11:07

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला पुण्यातला केवळ हिन्दू आहे म्हणून जिवंत जाळला गेलेला सावन राठोड आठवला.

अवांतरः कुणाला कशावरून काय आठवतं हे त्या व्यक्तीच्या विचारसरणीचं निदर्शक मानावं का?

बॅटमॅन Thu, 16/03/2017 - 12:06

In reply to by ऐसी

कुणाला कशावरून काय आठवतं हे त्या व्यक्तीच्या विचारसरणीचं निदर्शक मानावं का?

किंवा विकृतीचं. विषय काय अन बोलतोय काय याचा कै संबंध नसताना हिंदूब्याशिंग करणे ही ती विचारजंतांत सुप्रतिष्ठित झालेली विचारपद्धती.

गब्बर सिंग Tue, 14/03/2017 - 21:39

In reply to by मूर्तिभंजक

फ्रेंचांनी समता आणि बंधुता यांच्या बरोबर एकाच पिशवीत कोंबले असले तरी स्वातंत्र्य हे इतर सर्व मुल्यांचा स्रोत आहे आणि त्याला छेद देणाऱ्या सर्व व्युहांचा विरोध करायला हवा असे मी मानतो.

एकदम सहमत्.

हाच माझा मुख्य मुद्दा आहे.