Skip to main content

मनातले छोटे मोठे प्रश्न / विचार - भाग २८

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

आधीचे सर्व धागे इथे वाचता येतील. - मनातले छोटेमोठे प्रश्न/विचार
=======

विशिष्ठ प्रोसिजरकरता पॅप स्मिअर आदि ची अपॉइंटमेन्ट घेताना इथे डॉक्टर स्त्री हवी की पुरुष हा तुमचा प्रेफेरन्स का विचारतात कोणास ठाऊक - उगाचच जेंडर डिस्क्रिमिनेशन नाही तर काय?
त्यामुळे आपोआपच्=उगाचच स्त्री असेल तर चालेल पण नसेल तरी विशेष हरकत नाही असे सांगीतले जाते :(
___
मला खटकतय ते हे की असल्या प्रश्नांमुळे उगीचच स्त्री डॉक्टरांना काकणभर प्राधान्य "नकळत" दिलं जातय. माझ्याकडून तरी दिलं गेलय अन आता ती सवय बनतीये. उदा - आत्ता एका थेरपिस्टची अपॉईंट्मेन्ट घ्यायची होती ती मी स्त्री असावी असे अध्याहृत केले. उगाचच. कारण या डिस्क्रिमिनेशन विरुद्ध कोणी काही वाकडे करु शकणार नाही हा आत्मविश्वास बळावल्याने.
______
खरं तर स्त्री का पुरुष हा येडपट प्रश्न आहे. डॉक्टर इज अ डॉक्टर इज अ डॉक्टर. एका निष्णात, कुशल जिने तिच्या आयुष्याचा बराच काळ मला आत्ता ज्याची गरज आहे त्या कौशल्याच्या ज्ञानार्जनाकरता घालविला आहे, अशा व्यक्तीचा सल्ला किंवा सेवा असे फक्त बघता यायला हवे. असो.

ऋषिकेश Tue, 25/11/2014 - 12:16

खरं तर स्त्री का पुरुष हा येडपट प्रश्न आहे. डॉक्टर इज अ डॉक्टर इज अ डॉक्टर. एका निष्णात, कुशल जिने तिच्या आयुष्याचा बराच काळ मला आत्ता ज्याची गरज आहे त्या कौशल्याच्या ज्ञानार्जनाकरता घालविला आहे, अशा व्यक्तीचा सल्ला किंवा सेवा असे फक्त बघता यायला हवे.

वैयक्तिकरित्या सहमत आहे. मात्र ज्यांना असे बघता येत नाही त्यांच्याकरता केलेली ही "सोय" असावी.

नैतिकतेचे नियम व्यक्ती+प्रांतागणिक बदलतात. जगातील काही प्रांतात स्त्रियांची तपासणी केवळ स्त्रियांनीच करावी असे त्यांच्यावर वर्षानूवर्षे झालेले संस्कार सांगतात. तर काही स्त्रियांना/पुरूषांना आपल्या गुप्तांगांची/कोणत्याही विशिष्ट अंगाची तपासणी स्त्रियांनी/पुरूषांनी करणे लज्जास्पद (व/वा टर्निंग ऑन) वाटते हे कारणही असे पर्याय ठेवण्यास पुरेसे वाटते.

शेवटी वरील सुयोग्य तत्त्वापेक्षा पेशंट कंफर्टेबल असणे अधिक महत्त्वाचे असावे.

वामा१००-वाचनमा… Tue, 25/11/2014 - 19:40

In reply to by ऋषिकेश

शेवटी वरील सुयोग्य तत्त्वापेक्षा पेशंट कंफर्टेबल असणे अधिक महत्त्वाचे असावे.

होय शक्य आहे. थोडसं "never insist on taking the right–of–way" सारखं वाटलं मला. म्हणजे बरोबर काय अन चूक काय या मुद्द्याला मुरड घालून त्या परिस्थितीत काय सुयोग्य वाटतय त्यास महत्व देणे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 25/11/2014 - 20:32

In reply to by वामा१००-वाचनमा…

एका इराणी कुटुंबाशी आमची अलिकडेच ओळख झाली, हे लोक अमेरिकेतही आल्यावर आठवड्यातच. ही मैत्रीण सध्या गर्भार आहे. इरानमध्ये ती स्त्री स्त्रीरोगतज्ञाकडेच जात होती. पण इथे अडचण आली, कारण इंग्लिशची बऱ्यापैकी अडचण. शेवटी तिने इराणी डॉक्टर निवडला, आणि तो पुरुष असलेला चालेल म्हणाली.

स्त्रीरोगतज्ञ वगळता डॉक्टर स्त्री हवी का पुरुष, असं विचारत असतील असं वाटत नाही. (मी जिथे विम्याचे पैसे उडवते त्या संस्थेत, जे डॉक्टर नवीन रुग्ण स्वीकारत आहेत त्यांची नावं दाखवतात. मी अल्फाबेटीकली सुरूवातीला आलेल्या नावांवर क्लिक केलं. स्त्रीरोगतज्ञांच्या यादीत बहुतांशी स्त्रियाच दिसल्या.)

---

'कपलिंग' नावाच्या ब्रिटीश विनोदी मालिकेत, जेन म्हणते, "मला नेहेमीच स्त्रीरोगतज्ञासोबत डेटिंग करायचं होतं. मी स्पेशल आहे, हे त्याच्याकडून ऐकायचं आहे."
कोणता एपिसोड ते आठवत नाही, आख्खी मालिकाच बघून टाका. - कपलिंग

वामा१००-वाचनमा… Tue, 25/11/2014 - 20:06

अजुन एक प्रश्न पडला आहे - आपण मराठी आंतरजालावर, संस्थळांवर का वावरतो? माझ्या पासून सुरुवात करते -
(१) सकस मराठी वाचन व्हावे म्हणून
(२) रिकामा वेळ (हा शब्द लिहीतानाच इतकं गुन्हेगार का वाटाव? :() सदुपयोगी लागावा म्हणून
(३) अगदी पहील्यांदा जॉइन केलेले कारण वाद घालता यावा म्हणून.
(४) मेंदूला सकस खाद्य (काव्य-शास्त्र-विनोद) मिळावे म्हणून

'न'वी बाजू Wed, 26/11/2014 - 07:44

In reply to by वामा१००-वाचनमा…

क्र. ३चा मुद्दा कदाचित गंभीरपणे घेण्याच्या लायकीचा असू शकेलही, परंतु बाकीचे मुद्दे अगदी फार म्हणजे फारच विनोदी आहेत.

अजो१२३ Wed, 26/11/2014 - 11:07

In reply to by 'न'वी बाजू

वास्तवात, ते तीन मुद्दे गंभीर आहेत. वाद घालायला मिळते हा मुद्दा विनोदी आहे कारण तात्विक वाद घालायचा पेंशन्स मराठी स्थळांवर नाही. ३-४ वादग्रस्त प्रतिसाद उपप्रतिसाद झाले कि चर्चा व्यक्तिगत वळण घेऊ लागते किंवा सदस्य तसे जाहीर करून खाली बसू लागतात. ;)

अजो१२३ Wed, 26/11/2014 - 11:01

In reply to by वामा१००-वाचनमा…

"सामान्य जनांकडून केलेले लेखन",म्हणजे स्पेशालिस्टकडून न केलेले लेखन,(मग ते कोणत्याही प्रकारचे असो)मराठी स्थळांवर फार उत्तम दर्जाचे आहे. व्यासांच्या दीप्तीने कौरवपांडवांच्या आज्ज्या जशा होरपळल्या तसा परिणाम इथे सामान्य सदस्यांच्या अस्तित्वावर होत नाही म्हणून मला इथे वावरायला आवडते.

बॅटमॅन Wed, 26/11/2014 - 00:54

बातमीच्या क्र. ४७ च्या धाग्यावरील माझा हा प्रतिसाद पहा.

हा प्रतिसादही आता हलवला गेला आहे. मजाये बॉ संपादकीय अधिकाराची! असो, प्रतिसादच पेष्ट करतो.

ज्याप्रमाणे ब्राह्मणेतर जन्ता आणि संस्कृतबद्दलची नेहमीची सायटेशन्स देऊन काही आकलन वाढत नाही त्याप्रमाणेच आहे ते. अर्थात त्याबद्दल तक्रार नाही कारण त्यामागचा उद्देश आकलन वाढवणे हा नाही हे माहितीच आहे.

हा प्रतिसाद अदिती यांच्या या प्रतिसादाला उत्तर म्हणून होता.

http://www.aisiakshare.com/node/3541#comment-81927

तुम्ही कसे भांडवलदारांचे समर्थक आणि भुक्कड-बस्टर आहात तसेच राहुलजी भांडवलदार-बस्टर आणि भुक्कड-समर्थक असण्याची शक्यता चाचपली आहेत का?
बाकी चालू द्या. फक्त या आरोपारोपीतून काही साध्य होत नाही, काही नवीन समजत नाही, आकलन वाढत नाही आणि मग वाचनाचा उद्देश सफल होत नाही अशी तक्रार आहे.

हा पुढे फेमिनिष्ठ धाग्यावर हलवला गेला.

http://www.aisiakshare.com/node/3215#comment-81934

स्वतःला लिबरल म्हणवून घेणार्‍या या संस्थळावर आमच्या एका दीडदमडीच्या प्रतिसादाने अशी काय संक्रांत आणली ते समजल्यास ऋणी राहू.

आमचा प्रतिसाद भिकारचोट असला तर त्यामुळे बाकी लोकांना त्रास न व्हावा म्हणून श्रेणीदानाचा पर्यायही खुला आहे. असे असताना तडकाफडकी अनरिलेटेड धाग्यावर हलवण्याचे कारण काय?

शिवाय, कारण काहीही असले तरी सदस्याशी चर्चा न करता प्रतिसाद हलवणे हे कुठल्या अधिकारात बसते, आणि तसा अधिकार असल्यास लिबरलपणा किती भावाने गेला
हे समजत नाही.

अर्थात, जशास तसे म्हणून असे केले असेल तर आपला हसून मोकळा होतो. बाकी चालू द्या. तुमचा दुटप्पी लिबरलपणा तुम्हांला लखलाभ असो.

हा धागा म्हणून लिहिला होता. तो उडवला गेला, नंतर परत रिस्टोअर करण्यात आला. मज्जाच आहे एकूण.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 26/11/2014 - 01:00

In reply to by बॅटमॅन

छोटा-मोठा प्रश्न म्हणून धागा इथे हलवला आहे आणि मूळ धागा व्यवस्थित, जिवंत आहे. हा घ्या दुवा.

(जे धागे प्रतिसाद म्हणून अन्य धाग्यांमध्ये हलवले जातात ते सगळे असेच दिसतात. हे दुसरं उदाहरण.)

---

बाकी प्रतिसादाबद्दल -
संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे यातून -
- प्रतिसाद संतुलित असावेत. लेखनाचा सांगोपांग विचार करून वाईटाबरोबर चांगले काय हेही सांगावे. व्यक्तिगत टीकाटीप्पणी टाळावी.

बॅटमॅन Wed, 26/11/2014 - 01:07

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वा वा वा. पण स्वतःला आवडला नाही म्हणून प्रतिसाद हलवणे हे बरोबर असेल तर बोलणेच खुंटले. त्या प्रतिसादातून नवीन चर्चा सुरू व्हायची शक्यताही नव्हती, तस्मात नेहमीच्या श्रेणी पद्धतीनेही त्या प्रतिसादाचा इफेक्ट टाळता आला असता. पण ते सोडून निव्वळ स्वतःला न आवडलेल्या प्रतिसादासाठी असे करणे म्हणजे अंमळ गंमतीशीर आहे.

स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसर्‍याचं बघायचं वाकून.

सलील Thu, 27/11/2014 - 00:21

In reply to by बॅटमॅन

गंमतीशीर कसले हो. सगळ्यांचे पाय मातीचे असतात ह्याचा फक्त पुन:प्रत्यय आहे. सगळेजण आपल्या सोयीच्याच गोष्टी दाखवतात. लिखाण हि तशी लिबरल लोकांची मक्तेदारी आहे. बाकीच्यांवर सहज जजमेंट आणि आपल्याला त्रासदायक गोष्टी तश्याच ठेवणे तसे कठीणच असते. त्यामुळे चालायचेच थोड्केमे लिबरल फार काही वेगळे नसतात.

स्वतःला लिबरल म्हणवून घेणार्‍या या संस्थळावर आमच्या एका दीडदमडीच्या प्रतिसादाने अशी काय संक्रांत आणली ते समजल्यास ऋणी राहू.

आमचा प्रतिसाद भिकारचोट असला तर त्यामुळे बाकी लोकांना त्रास न व्हावा म्हणून श्रेणीदानाचा पर्यायही खुला आहे. असे असताना तडकाफडकी अनरिलेटेड धाग्यावर हलवण्याचे कारण काय?

शिवाय, कारण काहीही असले तरी सदस्याशी चर्चा न करता प्रतिसाद हलवणे हे कुठल्या अधिकारात बसते, आणि तसा अधिकार असल्यास लिबरलपणा किती भावाने गेला
हे समजत नाही.

अर्थात, जशास तसे म्हणून असे केले असेल तर आपला हसून मोकळा होतो. बाकी चालू द्या. तुमचा दुटप्पी लिबरलपणा तुम्हांला लखलाभ असो.

हा धागा म्हणून लिहिला होता. तो उडवला गेला, नंतर परत रिस्टोअर करण्यात आला. मज्जाच आहे एकूण.

बॅटमॅन, असे आरोप करण्यापूर्वी चर्चा करण्याची जबाबदारी सदस्याची पण असेल ना? सदस्य कसे वागतात, लिहितात याबद्दल मी ही कधी कधी खट्टू होतो, पण संस्थळ आणि संपादक यांची आजवरची अधिकृत भूमिका पाहता सबब टिका अस्थानी वाटते.

अजो१२३ Wed, 26/11/2014 - 23:58

हॉटेलात आपण बिल देतो तेव्हा क्रेडीट कार्डच्या स्लीपवर रक्कम लिहून येते. नंतर टिप हाताने लिहायची असते. हे कसे?
आणि समजा कोणी नंतर शून्ये लावून इ भलतीच गडबड केली तर?
हे सगळे ठिक चालते असे मानू. भारतात क्रेडिट कार्डने वेटर टिप का स्वीकारत नाहीत?

'न'वी बाजू Tue, 20/01/2015 - 19:17

In reply to by अजो१२३

हॉटेलात आपण बिल देतो तेव्हा क्रेडीट कार्डच्या स्लीपवर रक्कम लिहून येते. नंतर टिप हाताने लिहायची असते. हे कसे?
आणि समजा कोणी नंतर शून्ये लावून इ भलतीच गडबड केली तर?

केवळ टिप नाही, तर टिप आणि टोटल दोन्ही लिहायचे असते.

नंतर टिपवर शून्ये लावल्यास (किंवा टिप आणि टोटल दोन्हींवर शून्ये लावल्यास) टोटल टॅली होणे कठीण आहे.

दुसरे म्हणजे, करन्सी फिगर्समध्ये डेसिमल पॉइंटनंतर दोनच जागा येतात.

भारतात क्रेडिट कार्डने वेटर टिप का स्वीकारत नाहीत?

???

मी कित्येकदा दिलेली आहे.

अजो१२३ Wed, 26/11/2014 - 23:59

१. सोन्यावर व्हॅट आहे का? महाराष्ट्रात तो किती % आहे? प्रतिष्ठित रजिस्टर्ड व्यापारी आणि काळा व्यवहार करणारे काही किरकोळ व्यापारी यांच्या दरांत कराइतका फरक असतो का?
२. सध्याला सोन्यावर कस्तम ड्यूटी आहे का? किती? कोणकोणत्या परदेशांतून सोने आणले तर ही ड्यूटी द्यावी लागणार नाही? साधारणपणे कायदेशीरपणे परदेशी भेट देणारा माणूस असे किती सोने विना-ड्यूटी आणू शकतो?
३. महाराष्ट्रात दागीन्यांचे सोने किती कॅरेटचे असते? हा कॅरेट प्रेफरन्स प्रत्येक राज्यात वेगवेगळा असतो असे आहे का? पूर्वोत्तर भारतात जवळजवळ २४ कॅरेटचे दागीने बनतात म्हणे. किती किती कॅरेटचे सोने ग्राहकांत कॉमन आहे?
४. गुंतवणूकीचे सोने (घरी ठेवायला घेतात ते बिस्किट) २४ कॅरेटचेच असते का? त्यावर शून्य मेकिंग चार्ज असतो का?
५. स्फटिक चिटकावलेले असताना त्यात सोने किती आहे हे कसे वजन करतात?
६. दागीने बनवण्यासाठी किती शुद्धतेच्या अधिकची शुद्धता चालत नाही.
७. मेकिंग चार्जेस किती % असतात. दागीना बनवणे किती अवघड आहे (डिजाईन किती कठीण आहे) यावर ते अवलंबून असते काय?
८. दुकानात मेकींग चार्ज घेतात. मित्रांकडून घेताना (ती डिजाईन मोडून दुसरी बनवायची असेल तर, इ) घेतात का?
९. तोळ्यात किती ग्राम असतात हे देखिल राज्यागणिक बदलते का? कुठे कुठे ११.क्ष ग्रामचा तोळा असतो म्हणे.
१०. गुंतवणूक करायची असल्यास बिस्किटे घेऊन बँकेत व्याजी "डिपॉझिट" म्हणून ठेवता येतात काय?
११. सोने किती कॅरेटचे आहे हे ओळखायची शास्त्रीय पद्धत काय? कारण ते दुकानदाराला लगेच करावे लागते कोणी सोने विकण्यासाठी आणल्यास.
१२. मेकिंग चार्जेस वजा जाता सोने खरेदी आणि विक्रीचा दर यांत फरक असतो काय?
१३. हॉलमार्क, इ जिथे आहे तो भाग खराब करून सोन्याची विश्वासार्हता घालवता येते का?
१४. सोने शुद्ध (म्हणजे सांगीतलेल्या कॅरेटचेच) आहे हे कळायचा ग्राहकासाठी मार्ग काय?
१५. सोन्याच्या कॅरेटप्रमाणे त्याच्या कांतीत फरक पडतो काय? तो दिसू, भासू शकतो इतपत असतो का?
१६. सोन्याचे भाव कडकायचा विशिष्ट महिना भारतात आहे काय?
१७. कोणकोणते इतर बाजार त्यांच्या इंट्रिंसिक कारणांमुळे पडले तर सोन्याचा भाव वाढतो?
१८. भारतात सध्याला सोन्याची एकही चालू खाण नाही काय?
१९. सोन्याचे आयसोटोप्स असतात का?
२० @ स्त्रीया - सोने न आवडणार्‍या स्त्रीया नगण्य मानता येतील काय?
२१ @ ज्यांना सोने आवडते त्या स्त्रीया - तुम्हाला काय आवडते - सोन्याचे मूल्य कि रूप?

नितिन थत्ते Thu, 27/11/2014 - 07:31

In reply to by अजो१२३

१. सोन्यावर व्हॅट आहे का? महाराष्ट्रात तो किती % आहे? प्रतिष्ठित रजिस्टर्ड व्यापारी आणि काळा व्यवहार करणारे काही किरकोळ व्यापारी यांच्या दरांत कराइतका फरक असतो का?

महाराष्ट्रात १ टक्का व्हॅट आहे. फरक केवळ कराइतका नसतो. सोन्यातसुद्धा फरक असतो. सहसा सोनाराकडे ९९.५ शुद्धतेचे सोने (कॉइन) मिळते. उलट बँकांकडे ९९.९ शुद्धतेचे सोने मिळते. त्यांचा दर बराच जास्त असतो.

२. सध्याला सोन्यावर कस्तम ड्यूटी आहे का? किती? कोणकोणत्या परदेशांतून सोने आणले तर ही ड्यूटी द्यावी लागणार नाही? साधारणपणे कायदेशीरपणे परदेशी भेट देणारा माणूस असे किती सोने विना-ड्यूटी आणू शकतो?

कल्पना नाही. ममोसिंग प्रथम अर्थमंत्री झाले तेव्हा त्यांनी विशिष्ट ग्रॅम सोने आणले तरी चालेल अशी सूट चालू केली होती.

३. महाराष्ट्रात दागीन्यांचे सोने किती कॅरेटचे असते? हा कॅरेट प्रेफरन्स प्रत्येक राज्यात वेगवेगळा असतो असे आहे का? पूर्वोत्तर भारतात जवळजवळ २४ कॅरेटचे दागीने बनतात म्हणे. किती किती कॅरेटचे सोने ग्राहकांत कॉमन आहे?

२२ कॅरटचे असते बहुधा (९१.६). २४ कॅरटचे दागिने वापरणे कठीण असावे.

४. गुंतवणूकीचे सोने (घरी ठेवायला घेतात ते बिस्किट) २४ कॅरेटचेच असते का? त्यावर शून्य मेकिंग चार्ज असतो का?

वर लिहिल्याप्रमाणे वेगवेगळ्या शुद्धतेचे सोने मिळते. ९९.५ आणि ९९.९ दोन्हीला २४ कॅरटच म्हटले जाते.

५. स्फटिक चिटकावलेले असताना त्यात सोने किती आहे हे कसे वजन करतात?

पास
६. दागीने बनवण्यासाठी किती शुद्धतेच्या अधिकची शुद्धता चालत नाही.

असे काही नसावे. २४ कॅरटचे सोने लुळे असते.

७. मेकिंग चार्जेस किती % असतात. दागीना बनवणे किती अवघड आहे (डिजाईन किती कठीण आहे) यावर ते अवलंबून असते काय?

फिक्स्ड टक्के नसतात.

८. दुकानात मेकींग चार्ज घेतात. मित्रांकडून घेताना (ती डिजाईन मोडून दुसरी बनवायची असेल तर, इ) घेतात का?

मेकिंग चार्जेस घेतातच. (मित्रांकडून- प्रश्न कळला नाही)

९. तोळ्यात किती ग्राम असतात हे देखिल राज्यागणिक बदलते का? कुठे कुठे ११.क्ष ग्रामचा तोळा असतो म्हणे.

तोळा हा ११.क्ष ग्रॅमचाच असतो. पण आता १० ग्रॅमला तोळा म्हणतात.

१०. गुंतवणूक करायची असल्यास बिस्किटे घेऊन बँकेत व्याजी "डिपॉझिट" म्हणून ठेवता येतात काय?

बहुधा हो.

११. सोने किती कॅरेटचे आहे हे ओळखायची शास्त्रीय पद्धत काय? कारण ते दुकानदाराला लगेच करावे लागते कोणी सोने विकण्यासाठी आणल्यास.

सोनार कसाच्या दगडाला घासून पाहतात. (पण त्यात गोल्ड प्लेटेड दागिना २४ कॅरटचा दिसेल). दागिन्याचा जडपणा (डेन्सिटी) पहात असावेत.
१२. मेकिंग चार्जेस वजा जाता सोने खरेदी आणि विक्रीचा दर यांत फरक असतो काय?

हो. जसा शेअर विकत घेताना आणि विकताना असतो तसा. पण दागिना देऊन दुसरा केला तर घट वजा करून उरलेले सोने घेतात. त्यात डिफरन्स चार्ज करत नाहीत.

१३. हॉलमार्क, इ जिथे आहे तो भाग खराब करून सोन्याची विश्वासार्हता घालवता येते का?

असा मूर्खपणा कोणी करेल का?

१४. सोने शुद्ध (म्हणजे सांगीतलेल्या कॅरेटचेच) आहे हे कळायचा ग्राहकासाठी मार्ग काय?

काही नाही. हॉलमार्क वगैरेच फक्त.

१५. सोन्याच्या कॅरेटप्रमाणे त्याच्या कांतीत फरक पडतो काय? तो दिसू, भासू शकतो इतपत असतो का?

हो. पण त्यातील मिसळ कशाची आहे त्यावर ठरेल. पूर्वी ६० च्या दशकात (कंपल्सरी) १८ कॅरटचे दागिने बनवत आणि तांब्याची मिसळ असे. ते दागिने लालसर दिसत.

१६. सोन्याचे भाव कडकायचा विशिष्ट महिना भारतात आहे काय?

लग्नसराईचा एप्रिल मे महिना आणि दिवाळी हा काळ सोन्याचे भाव काहीसे वाढण्याचा आहे.

१७. कोणकोणते इतर बाजार त्यांच्या इंट्रिंसिक कारणांमुळे पडले तर सोन्याचा भाव वाढतो?

शेअर बाजार कोसळला तर सोन्याचे भाव वाढतात. इतर गुंतवणुकी जितक्या रिस्की होतात तितका सोन्याचा भाव वाढतो.

१८. भारतात सध्याला सोन्याची एकही चालू खाण नाही काय?

बहुधा नाही.

१९. सोन्याचे आयसोटोप्स असतात का?

ठाऊक नाही.

२० @ स्त्रीया - सोने न आवडणार्‍या स्त्रीया नगण्य मानता येतील काय?

पास
२१ @ ज्यांना सोने आवडते त्या स्त्रीया - तुम्हाला काय आवडते - सोन्याचे मूल्य कि रूप?

पास.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 27/11/2014 - 08:38

In reply to by अजो१२३

१९. सोन्याच्या समस्थानिकांबद्दल इंग्लिश विकीपान आहे. (फोनमधून दुवा चिकटवता येत नाही.)

२०. गोर्‍या लोकांना सोनं फार आवडत नाही. त्यांच्यापेक्षा आपल्या, भारतीय वर्णावर सोनं चांगलं दिसतं. आणि आपल्यासाठी ते सवयीचंही असतं.

स्त्रियांना नगण्य मानण्याचा सोन्याशी काहीही संबंध नाही. ती परंपरा आहे. (साॅरी, राहवलं नाही.)

नितिन थत्ते Thu, 27/11/2014 - 08:50

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

क्र. २० च्या उत्तरासाठी भडकाऊ अशी श्रेणी दिली आहे.

हद कर दी आप ने.

उथळ फेमिनिस्टांचा खळखळाट फार.

(सखोल फेमिनिस्ट) नितिन थत्ते

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 28/11/2014 - 20:55

In reply to by नितिन थत्ते

ते 'भाषिक दौर्बल्य'* आहे हे समजूनही खवचटपणा केला होता म्हणून आधीच माफीसुद्धा मागितली होती.

*इथेही अवतरणं मुद्दाम वापरली आहेत.

अजो१२३ Fri, 28/11/2014 - 18:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अधिकॄत खवचट मोड पुढे चालू-
गोर्‍या लोकांना सोनं आवडत नाही? गोल्ड, गोल्डन, गिल्डेड, जीसेक, इ इ शब्द, फ्रेजेस, म्हणी, इ इ नी त्यांच्या सुवर्णप्रेमाची कल्पना येते. आणि टिपीकल येनारायी सिनिकलपणाने (हा माझा सिनिकलपणा म्हणा) तुम्ही एतद्देशीयांना, ती सवय म्हणजे तुम्हाला जे काही सुचवायचं असेल ते, हिणवत असाल (आहातच असं मी म्हणत नैयय, नैतर श्रेणीवर्षाव व्हायचा) तर सोन्याच्या जागी हिरे घातले तिकडचं जग इकडच्यासारखं दिसू लागतं. कि अश्शीच हिरे आणि सोने यांच्या ग्राहकांची तुलना सूचवायची होती?

बाय द वे, हा भारतीय वर्ण कोणता? कारण अटलांटिक पलिकडून एकच मिश्ररंग दिसतो. इथून आम्हाला हजारो रंग इर्दगीर्द दिसतात.

स्त्रियांना नगण्य मानण्याचा सोन्याशी काहीही संबंध नाही. ती परंपरा आहे. (साॅरी, राहवलं नाही.)

म्हणूनच का परंपरेत पाटिलीणीच्या मेखलेत वाड्याच्या अख्ख्या चाव्या असत नि पुरुषांचे दागीने नावाचा प्रकार नगण्य आहे?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 28/11/2014 - 21:00

In reply to by अजो१२३

पाश्चात्यांना सोनं अंगावर घालायला आवडत नाही. ही आवड/नावड अलिकडच्या काळातलीच का कसं ते मला माहित नाही.

भारतीय वर्णांवर असं म्हणता येईल.

अजो१२३ Fri, 28/11/2014 - 18:56

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सोन्याच्या समस्थानिकांबद्दल इंग्लिश विकीपान आहे.

सोन्याला आयसोटोप्स, आयसोमर्स, इ इ असल्याने आणि विकत घ्यायच्या सोन्यात त्याची मात्रा एकाकडे कमी आणि दुसर्‍याकडे अधिक असल्यास ग्राहकाला फरक पडतो का असा तो प्रश्न होता. खूप चूक पद्धतीने लिहिला होता. क्षमस्व.
-----
बहुतेक कोणताही फरक पडत नसावा. अगदी अत्यल्प प्रमाणात धातुचे गुणधर्म आणि संमिश्रे बनवण्याची क्षमता यांवर परिणाम होत असावा.

अजो१२३ Fri, 28/11/2014 - 23:58

In reply to by 'न'वी बाजू

निसर्गात मिळणारे सगळेच सोने शुद्ध धातूरुपात नसते, काही अत्यल्प मात्रा कोण्या कारणाने रिअ‍ॅक्टीव असते, इ इ कुठे वाचलेले.

गवि Sat, 29/11/2014 - 00:32

In reply to by 'न'वी बाजू

अहो नबा.. मंगळसूत्राच्या वाट्या उलट्या करुन घातल्या की झाला आयसोमर.. हाकानाका..

वामा१००-वाचनमा… Fri, 28/11/2014 - 20:37

पण हिंदू तर गाईला पवित्र मानतात ना मग नेपाळमध्ये एका हिंदू सणामध्ये म्हशी व बकर्‍यांची घाऊक कत्तल कशी काय करणार आहेत?
_____
चरबीयुक्त्/मेदयुक्त आहारामुळे स्मृतीनाश संभवतो बाप रे!!! तळलेल्या फ्राइज (बटाट्याचे काप), मफिन, केक आदि टाळलेले उत्तम नव्हे टाळलेच पाहीजे. अशा बातम्या सतत वाचून खरं तर स्वतःचं ब्रेन वॉशिंग केलं पाहीजे.

अजो१२३ Fri, 28/11/2014 - 23:04

In reply to by वामा१००-वाचनमा…

कृपया सार्‍या या नववैज्ञानिक शोधांकडे दुर्लक्ष करा. करायचे नसेल तर आता तुम्ही मनुष्यच नाहीत (म्हणजे होमो सेपियन्स नाहीत ;) ) या संभाव्य वैज्ञानिक आगामी बातमीसाठी* तयार राहा.

'न'वी बाजू Fri, 28/11/2014 - 23:49

In reply to by वामा१००-वाचनमा…

पण हिंदू तर गाईला पवित्र मानतात ना मग नेपाळमध्ये एका हिंदू सणामध्ये म्हशी व बकर्‍यांची घाऊक कत्तल कशी काय करणार आहेत?

हिंदूंना (अ‍ॅज़ अ जनरल रूल, धार्मिक कारणांसाठी) गोमांसाबद्दल जे वावडे असते, त्याप्रमाणे म्हशीच्या मांसाबद्दल नसते. विशेषतः नेपाळात. तिथे म्हशीचे मांस हिंदूंमध्ये बर्‍यापैकी पॉप्युलर आहे.

किंबहुना, नेपाळातील बर्गरचेन्समध्ये सामान्यतः (गोमांसाला पर्याय म्हणून) म्हशीच्या मांसाचे बर्गर विकतात.

(बादवे, नेपाळात जाणूनबुजून तर सोडाच, पण चुकून अपघातानेसुद्धा गायीची हत्या हा गुन्हा आहे, असे ऐकून आहे. बोले तो, रस्त्यातून गाडी चालविताना एक वेळ माणसाला उडविला, तर कायद्याच्या जितक्या कचाट्यात सापडणार नाहीत, तितक्या रस्त्यात आड आलेल्या गायीला चुकून गाडीचा धक्का लागला, तर सापडाल म्हणे. अर्थात, नेपाळातील राजेशाही गेल्यानंतर यात काही फरक पडला असल्यास कल्पना नाही, परंतु त्याबद्दल साशंक आहे.)

अजो१२३ Sat, 29/11/2014 - 00:01

In reply to by 'न'वी बाजू

अस्साच नियम सूचिपर्णी वृक्षांबाबत हिमाचलात आहे असे एक स्थानिक म्हणत होता. खरे खोटे देव जाणो, मी लॉग फेक्टरी नाही पाहिली तिकडे.

अजो१२३ Tue, 02/12/2014 - 13:44

One takes two types of photoes on the mobile - landscape and portrait. (For each one type of them, the device can be held in hand in two positions each. But everybody avoids that.)

When these picture files are transferred to the PC, unlike smartphone, PC does not recognize the orientation of the image. One has manually rotate the picture to see it with right orientation. (In mobile, no manual rotation is required. The image is automatically shown with right orientation.)

Quastion 1: It is possible (say with a SW or a setting) to do away with the requirement of manual rotation of each of the images?
Qustion 2: In mobile, though the orientation is right, one has to always tilt the phone while swiching between landscape and portatrait images. How can this be avoided?
Question 3: कोणत्या आवश्यकतेनुसार फोटोंची लांबी रुंदी कशी कशी बदलली पाहिजे.

yugantar Fri, 05/12/2014 - 07:29

>>त्याने मनाविरुद्ध सम्भोगाचे नीच (नीचचका? फार्फारतर वाईट ,निन्दनीय) क्रुत्य केले म्हणून का?
नसेल तर इतर गुन्ह्यात आनि याच्यात फरक काय?
आनि असेल तर तुम्हीच सम्भोगाला हाईप करुन ठेवले असणार. म्हणजे स्त्रीत्वाच लेण, काचेच भान्ड वगैरे.
एकदा मनाविरुद्ध झाल म्हणून काय बिघडल?
>>ह्यात पण उच्च जात वर्ग हितसम्बन्ध आहेतच. म्हणजे निर्भया दिल्लीजवळ घडले की त्याला जास्त महत्व(उच्च जात वर्गीयान्चा candle march वगैरे) गल्लीत बलात्कार म्हणजे थोडी कमी publicity. ह्याच्याहून कमी महत्व दलित हत्या, दलित रेपला(फक्त दलित सन्घटनान्चा निषेधमोर्चा)
>> feminist सुद्धा पुरुषाच्या female courtecy चा तसेच त्याच्या मनातल्या possesive feeling चा वापर करुन घेतात ना? जर त्याची बायको त्याच्या हक्काची wife/वस्तु नसुन एक independant/life partner असेल तर तिच्यावर रेप झाल्यावर तो तेवढाच चवताळेल जेव्हा ती त्याची 'वस्तु' होती? जर तो आणि ती खरीच liberal असेल तर रेप करणार्यावर ती जरुरीपेक्षा(म्हणजे physical मारहाण झाल्यावर आपण जेवढे रागावतो तेवढे) जास्त का रागवेल?

yugantar Fri, 05/12/2014 - 09:36

In reply to by नितिन थत्ते

civilisation म्हणजे काय?धर्म(crusades),चालीरीती(बुरखा,पदर,कर्मकान्ड?) परम्परा (स्त्री,दलित,आदिवासी,अलीकडे lgbt,यान्चा द्वेष करण्याची?). थोडक्यात तुमच civilisation म्हणजे तुम्ही तुमच्यासारखे समान हितसम्बन्ध असलेल्यानी तुमच्या स्वार्थासाठी बनवलेले नियम जे तुम्ही तुमच्या एकट्याच्या किवा अधिक जणाच्या सोईसाठी बदलणार.
तुम्ही वाटाघाटीत (बौद्धिक वा आर्थिक) क्षेत्रात वरचढ ठरलात की ते कुल आणी बलात्कारी शारीरिक झटापटीत वरचढ ठरला म्हणून तो वासनान्ध. तुम्ही वस्तु एखाद्याच्या गळ्यात मारली की तो 'बकरा'. तर बळजबरीने physical relationhip केली म्हणून बलात्कारीत 'अबला'? अहो का म्हणून? त्याने दुसर्यावर आक्रमण केल्याची शिक्षा आपण त्याला या 'civilisation' च्या नियमाप्रमाणेच देणार आहोत मग additional राग कशासाठी? उद्या माझ्या आई-बहीण-बायको ह्या वस्तुवर अशी पाळी येऊ शकते या भीतीने? बर अशी पाळी आलीच तर दु:ख जास्त कशाचे? तिच्यावरच्या अत्याचाराचे की तिच्या बदनामीचे की तुम्ही तिचे रक्षण करण्यास असमर्थ असे 'नामर्द' ठरलात याचे?
झाले गेले विसरुन जायचे सोडून समाजाचा पान्चट विचार करायचा. हा विचारही फक्त sex related बाबतीत का करतात त्यान्चे तेच जाणोत.
ह्यान्चा liberal पणासुद्धा फक्त आपल्यावर पाळी आली की सुरु होतो.
(हा प्रतिसाद general आहे थत्तेजी.'पौरुषी'/'मर्द' विचारधारा असलेल्या पुरुष व स्त्रिया यान्च्या मेन्दुला पचायला जडबीड असे खाद्य म्हणून. खूलासा केलेल बर.)

नितिन थत्ते Fri, 05/12/2014 - 09:45

In reply to by yugantar

चिल् माडी.

सिव्हिलायझेशन* असेल तर कोणी कोणाशी संबंध ठेवायचा याचे संकेत तयार होतात. ते न्याय्य किंवा अन्याय्य असू शकतात. त्यात पझेशनची आणि नियंत्रणाची भावना असते.

ते संकेत मान्य असतात म्हणून "या अमुक-अमुकशी मी रत व्हायचे नाहीये" अशी मानसिकता स्त्रीमध्येसुद्धा निर्माण झालेली असते. सिव्हिलायझेशन नसते तिथे मादी सुदृढ अशा कोणत्याही नराशी रत होते.

*प्राण्यांच्या कळपातली अल्फा नर, इतर नर आणि माद्या ही व्यवस्थासुद्धा सिव्हिलायझेशनच.

yugantar Fri, 05/12/2014 - 10:27

In reply to by नितिन थत्ते

सिव्हिलायझेशन असेल तर कोणी कोणाशी संबंध ठेवायचा याचे संकेत तयार होतात. पण ते कालानुरुप किवा गरजेनुसार बदलावे गेले आणी जावेत. उदा.परदेशगमनबन्दी,सतीबन्दी,इ. ते अधिकाधिक गुन्तागुन्तीच्या मागण्याना सामावुन घेणारे बनवले जावेत. बलात्कार्याच जाउ दिल तरी बलात्कारितेच्या पुनर्वसनासाठीसुद्धा बलत्काराला हाईप न करणेच सोयीस्कर आहे.
फक्त रेप या घटनेने (aftermath वगळता) अन्याय्य झाला असे वाटत असेल तर ती आपली कमजोरी मानलीच पाहिजे.
पत्झेशनची आणि नियंत्रणाची भावना असुद्यात हो पण ह्याच civilization नुसार possesed व्यक्तीला directly or indirectly मारक ठरु नये.
--

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/12/2014 - 10:57

In reply to by नितिन थत्ते

आपल्या जोडीदारावर (मर्यादित प्रमाणात) नियंत्रणाची गरज, त्यातून निर्माण होणारी मत्सराची भावना स्त्री-पुरुष दोघांमध्येही असते. त्याचा नागरीकरणाशी संबंध नाही, उत्क्रांतीशी आहे.

---

युगांतर यांच्याा प्रश्नांकडे कोणत्याही गांभीर्याने बघावं असं वाटत नाही. "एकदा मनाविरुद्ध झाल म्हणून काय बिघडल?" असल्या असंवेदनशीलतेकडे दुर्लक्ष केलेलंच बरं.

yugantar Fri, 05/12/2014 - 20:21

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आपल्यात शारीरिक बदल होतात उत्क्रान्तीत मानसिक नाही.
उदा.माझी community अथवा group मिलुन हे ठरवू शकतो आपण अमुक कालाकरता किवा मरेपर्यत विवाहच करायचा नाही.मग आपल्या जोडीदारावर (मर्यादित प्रमाणात) नियंत्रणाची गरज, त्यातून निर्माण होणारी मत्सराची भावनापण निर्माणच होणार नाही. पण असे ठरवु शकत नाही आपण स्व:ताला पन्ख निर्माण करु.(विमानाने उडू कदाचित.)
आपण सर्व मिलून ठरवू शकतो की आपण आपल्या जोडीदारावरच्या physical condition पेक्षा mental तसेच अगदी spiritual condition ला महत्व देउ.
हा civilization चाच प्रश्न आहे. lgbt,दलित,स्त्री इ.उपेक्षिताकडून चलवल करणर्यानो हे स्त्रीत्वाच्या काचेच भान्ड खुपच किमती व ठिसूल केलय व तुम्ही. ते जराजरातरी बदला. एखादेवेली 'दूसर्याकडून' पडले तरी ते 'कायमचे' 'फुटले' असे व्हायला नको.

"एकदा मनाविरुद्ध झाल म्हणून काय बिघडल?" असल्या असंवेदनशीलतेकडे दुर्लक्ष केलेलंच बरं.
>> अहो मी म्हणत नाहीये 'ती'ला काहीही सहन करावे लागले नाही किवा तिने ते निमूटपणे सहन करावे. पण त्या 'नराधमाला' शिक्षा मिलालीच आहे तर नन्तर "एकदा मनाविरुद्ध झाल म्हणून काय बिघडल" हा attitude समाजाने अथवा तिने स्वत: पालायला काय हरकत आहे.
तसेच मी insensetive towards her physical pain नाहीये whatever shouldn't have happened has already happened. So dont overdo it for te sake of victims mental stability.
I also think that this overhyping of 'intercourse with your partner' is one of the reasons why rapists tend to 'invade someone's 'territory''.
-----
उपेक्षित श्रेणीचा अर्थ काय? मी स्वत: उपेक्षित आहे की कमेनन्टची उपेक्षा करावी?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/12/2014 - 21:01

In reply to by yugantar

आपल्यात शारीरिक बदल होतात उत्क्रान्तीत मानसिक नाही.
उदा.माझी community अथवा group मिलुन हे ठरवू शकतो आपण अमुक कालाकरता किवा मरेपर्यत विवाहच करायचा नाही.मग आपल्या जोडीदारावर (मर्यादित प्रमाणात) नियंत्रणाची गरज, त्यातून निर्माण होणारी मत्सराची भावनापण निर्माणच होणार नाही. पण असे ठरवु शकत नाही आपण स्व:ताला पन्ख निर्माण करु.(विमानाने उडू कदाचित.)

---

प्रतिसादातल्या mysogyny - स्त्रीद्वेष्टेपणाचा प्रतिवाद झाला पाहिजे. पण सध्या कंटाळा आलाय. पुन्हा कधीतरी.

नगरीनिरंजन Sun, 04/01/2015 - 19:59

In reply to by yugantar

अहो असं काय करता युगांतरभौ? मुळात माणसाचा मेंदू उत्क्रांतीमुळेच मोठा झाला की नाही?
जसं हरणाच्या मादीला वाटतं की आपलं व संततीचं पोषण करेल असा तगडा नर मिळावा तसंच माणसाच्या मादीलापण वाटतं की पैसेवाला नवरा मिळावा.
आणि जसं किंग कोब्रा नराला मादीच्या पोटात दुसर्‍या नराचं बीज असलेलं खपत नाही तसं माणसातल्या नराला तडा गेलेलं काचेचं भांडं चालत नाही. (ज्यांना चालतं ते उत्क्रांतच झालेले नाहीत. सिंपल.)
त्यामुळे काचेच्या भांड्याला उत्क्रांतीतून आलेली लई किंमत आहे आणि ती किंमत टिकून राहणेच सगळ्यांच्याच हिताचे आहे.
असो. तुम्ही पुरुष आहात ना? मग फक्त अन्याय व अत्याचार पूर्णपणे थांबले पाहिजेत एव्हढंच म्हणत राहा. स्त्रियांनी किंवा त्यांच्या कैवार्‍यांनी काय करायचं ते तुम्ही सांगायचं काम नाय इथं.

नगरीनिरंजन Sun, 04/01/2015 - 19:36

In reply to by नितिन थत्ते

प्राण्यांच्या कळपातली अल्फा नर, इतर नर आणि माद्या ही व्यवस्थासुद्धा सिव्हिलायझेशनच.

निव्वळ जनुकीय प्रेरणांनी न वागणारा तो सिव्हिलाईज्ड आणि प्राणी केवळ जनुकीय प्रेरणांनी वागतात असे नाही का?

(सिव्हिलायझेशनचा शब्दशः अर्थ थोडावेळ बाजूला ठेवू).

गवि Fri, 05/12/2014 - 13:46

गण गण गणात बोते, किंवा गणी गण गणात बोते (पैकी जे बरोबर असेल ते) याला अर्थ आहे काय ? असल्यास काय आहे ?

आणखी एक सरळ उत्तर नसलेला किंवा मूर्खही वाटणारा प्रश्नः

एखाद्या व्यक्तीची मृत्यूपूर्वीची राहिलेली इच्छा किंवा जन्मभर व्यक्त केलेली आणि राहून गेलेली इच्छा मागे राहिलेल्यांनी पूर्ण करणे या संकल्पनेला काही मानसिक अर्थ आहे का? उदा. आगोदर नवस बोलल्यामुळे अन तो पूर्ण झाल्यामुळे अमुक देवीच्या किंवा महाराजांच्या दर्शनाला आपल्या मुलाने / नातवाने / पतीने / पत्नीने जावे. किंवा गोरक्षण संस्थेला / जातीय मंडळाच्या निधीला देणगी द्यावी इ इ.

गेलेल्या व्यक्तीची इच्छा मनापासून अस्सल असेल आणि :

अ. जिवंत राहिलेल्यांपैकी कोणाचीच काडीचीही श्रद्धा त्या देवी / महाराज किंवा जातीव्यवस्थेवर किंवा तत्सम कशावर नसेल तर ती सोडून देणेच योग्य ठरावे का?

ब. हीच इच्छा जर जिवंत उरलेल्या व्यक्तींना पटणारी, श्रद्धेत बसणारी आणि सहज शक्य, कधीकधी आनंददायकही असेल, तर त्याने फरक पडावा का? उदा. आपल्या मृत्यूनंतर आपल्या वारसांनी अनाथ मुलांना शिक्षणासाठी मदत करावी, किंवा काश्मीरची ट्रिप करावी किंवा मोठे घर घ्यावे..

टु ब्रिंग अ लिटिल शार्पनेस :

मुळात मेलेल्या व्यक्तीची इच्छा वगैरे सर्व तिच्यासोबतच संपले असे धरुन काहीही अ‍ॅडिशनल करुच नये?

जर त्या इच्छेला महत्व देऊन मृत्यूनंतरही पूर्तता करायची, तर मूळ इच्छाकर्त्या व्यक्तीच्या इच्छे आणि धारणांनुसार "नो क्वेश्चन्स आस्क्ड-शक्यच नसल्याने.." या पद्धतीने अंमलबजावणी व्हावी की उर्वरित लोकांच्या इच्छा आणि धारणांत बसत असेल तरच व्हावी?

गवि Fri, 05/12/2014 - 13:58

In reply to by अनुप ढेरे

उत्तम प्रश्न विचारलात.

अर्थात मृत्युपत्राला एक "कायदेशीर" अँगल असतो आणि त्यामुळे त्यातल्या इच्छा आणि आज्ञा या साधारणपणे कायदेशीर वाटप आणि आर्थिक बाबींशी संबंधित असाव्यात अशी माझी समजूत आहे. त्यामधे हा प्रश्न सोपा बनतो, कारण व्यावहारिक आणि कायदेशीर म्हटल्यावर त्या बाबी पार पाडण्याला एक कारण मिळतं.

मृत्युपत्रात निव्वळ इच्छा व्यक्त करता येतात का? म्हणजे इस्टेटीची वाटणी या गोष्टीशी अजिबात संबंध न ठेवता, उदा. माझ्या मुलीने अविवाहित रहावं, किंवा माझ्या मुलाने सिगरेट ओढू नये, किंवा दरवर्षी घरी कुटुंबाने अमुक माताजींचा प्रकटदिन साजरा करावा इत्यादि..?!!

अश्या इच्छा कायद्याने कंपल्सरी करता येत नसाव्यात असं तर्कदृष्ट्या वाटतं. फार तर विवाह केल्यास माझा फ्लॅट माझ्या मुलीला देऊ नये, किंवा माताजींच्या प्रकटदिनासाठी मी रक्कम वेगळी काढून ट्रस्टींकडे ठेवू इच्छितो अश्या प्रकारची इच्छा-रचना करता येत असावी.

नक्की ठाऊक नाही.

पण समहाउ हा मूलभूत मुद्दा कुठेतरी मृत्यूपत्रालाही लागू आहेच.

प्रथमेश नामजोशी Fri, 05/12/2014 - 14:22

In reply to by गवि

ज्यांच्याकडून इच्छा पूर्ण करून घेणं गृहित धरलं आहे, त्यांची मेलेल्या व्यक्तीशी किती भावनिक जवळीक होती, त्यावर अवलंबून.

अजो१२३ Fri, 05/12/2014 - 15:59

प्रश्न १ : विज्ञानाचे वावडे का असते? आमचा ड्रुष्टीकोन शास्त्रीय आहे असे सांगणारे लोक विषया, संदर्भाची, शास्त्रीय चिकित्सा का करत नाही? की लोकांना विज्ञानातलं झाट कळत नाही आणि लोकांना आपण वैज्ञानिक दृष्टीकोनाचे आहोत हे दाखवण्यासाठी ज्या कोणत्या कारणासाठी जे जे काही वैज्ञानिक मानले जात नाही त्याचा केवळ विरोध करून आपली वैज्ञानिकता सिद्ध करतात?

प्रश्न २: मराठी आंतरजालावर जिथे तर्क आणि खरा शास्त्रीय दृष्टीकोन असणारे बरेच सदस्य असतात तिथे खोडसाळ लोकांना कसे टाळावे.

प्रश्न ३: प्रत्येक सदस्याला कोणतीही श्रेणी देण्याचा अधिकार आहे. तिचे स्पष्टीकरण मागण्याचा लेखकाला अधिकार आहे. तिचे स्पष्टीकरण देण्याचे बंधन श्रेणीदात्यावर नाही. अशा श्रेणीवर अभिप्राय देण्याचा अधिकार लेखकाला आहे. त्यावर शांत राहण्याचा अधिकार श्रेणीदात्यांस आहे. मग श्रेणी खोडसाळपणे दिलेली आहे, श्रेणी सात्विकपणे दिलेली आहे (आणि लेखकास त्याची कल्पना येत नाहीय.) वा लेखनाशी असंबंधित बाबींमुळे श्रेणी देण्यात येत आहे याचे उत्तर कसे शोधावे? मग तसे पुन्हा होऊ नये यासाठी काय करता येईल? लेखकाजवळ चार लोक एकत्र येतात तेव्हा जो अल्प स्वल्प खोडसाळपणा मानवी स्वभाव म्हणून असतोच असतो तो सहन करण्याची कला नसेल तर त्याने तो फोरम सोडावा का?

गवि Fri, 05/12/2014 - 16:10

In reply to by अजो१२३

अहो अजो.. काय झालं तात्कालिक कारण ?

एक सिनारेस्ट किंवा त्रिभुवनकीर्ती घ्या, भरपूर वाफ घ्या, गरम पाण्याने अथवा बीटाडाईन सोल्युशनाने गुळण्या करा आणि झोपताना "ग्लायकोडिन" किंवा अडुळसा घ्या. यापैकी कशानेतरी नक्की कमी होईल त्रास अन बरं वाटेल.

अजो१२३ Fri, 05/12/2014 - 16:50

In reply to by गवि

गंभीरपणे सांगायचं तर माझे सगळे असल जगातले फोरम्स मस्त आहेत. पण त्यात कोणालाही ऐसीवरच्या सारख्या गहन गप्पा करायला वेळ वा रस वा गती नाही. मला इथल्या विषयांत रस तर आहेच शिवाय फोरम मराठीत असल्याने आय एक्स्प्रेस मायसेल्फ बेस्ट हेअर. पण मला निगेटीवीटीची अ‍ॅलर्जी आहे. माझ्या "भूमिकेमुळे" कोणाला माझ्याबद्दल निगेटीवीटी असेल तर मी तिथे नसणे पसंद करतो. त्यात दोहोंना सुख आहे.

अजो१२३ Fri, 05/12/2014 - 17:23

In reply to by गवि

काय झालं तात्कालिक कारण ?

तात्कालिक कारण माझ्या प्रत्येक प्रतिसादाला अनावश्यकपणे निरर्थक, खोडसाळ आणि विशेषतः विनोदी श्रेणी मिळणे हे आहे. विनोदी शब्दाच्या दोन छटा आहेत (भाषेचे दौबल्य) - १. उचित आशय अतिशय विनोदी पद्धतीने मांडला आहे. २. मूर्खासारखे काहीही लिहिले आहे. या दुसर्‍या विनोदी शब्दासाठी माझी एक टॉलरन्स लेवल आहे. उदा. मागे भाषेचे दौबल्य या धाग्यात मी भाषेतील विभक्तींची दौबल्ये सांगताना षष्ठी विभक्तीबद्दल एक विधान केले होते. त्याचा आशय असा होता कि षष्ठी विभक्ती स्वामित्व दर्शविण्यासाठी आणि संबंध दर्शविण्यासाठी वापरली जाते. क्षचा शत्रू म्हणताना षष्ठी विभक्ती वापरली जाते पण क्षचे शत्रूवर किंचितही स्वामित्व नसते. एका विभक्तीत इतके संबंध गुंडाळू नयेत आणि तिचे सबक्लासिफिकेशन व्हावे. (पुढे खूप लिहिता येईल, पण असो.). त्याला प्रतिसाद म्हणून अदितीने कोण्या एका व्याकरणाबद्दल आकलन गंडलेले असलेल्या एका व्यक्तिचे एका व्याकरण तज्ञाला लिहिलेले एक लेटर पोस्ट केले व त्याची आठवण आली असे लिहिले. अर्थातच आशय पोचवण्यात माझी चूक झाली असावी वा अशा दौर्बल्याचे विशेष महत्त्व नाही असे अदितीला म्हणायचे असावे. हे अधूनमधून चालून जाते. पण हे नेहमीच वा न चुकता होऊ लागले तर? विशेषतः मला जो आशय गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे मांडायचा आहे त्याबद्दल? जालीय खोडसाळपणाच्या खेळात आपली उर्जा वाया घालवायची माझी इच्छा नाही.
-------------------
मी तसा स्वतःला कूल मानत असलो तरी या खोडसाळपणाचा परिणाम माझ्या प्रतिसादांच्या भाषेवर होतो.* झाला आहे. जिथे मला खूप पॉझिटिव वातावरणात राहता येते आणि माझ्या रुचिचे विषय जास्त चर्चिले जातात असे अनेक जालीय , अजालीय फोरम उपलब्ध आहेत. पण तरीही ऐसीचा एक वेगळा फ्लेवर आहे म्हणून इथे लिहिणे, असणे मला जास्त आवडते. मी दिवसाला एकच वा दोनच धागे वाचतो नि तिथे अ‍ॅक्टीव असतो. मी "वाचक" प्रकारचा माणूस नसल्याने मी माझी इथली पार्टीसिपेशन स्टाईलही (एक विषय आणि हाय डेप्थ) बदलू शकत नाही.
-----------------------
* खोडसाळपणा आहे असा माझा गैरसमज होतोय असे नाही. आयॅम नॉट रेडी टू लिव विथ द निगेटिव साईड ऑफ वेब मिडिया. हे विचार आरंभीच्या काळात मनात येत असतानाच इथे मांडून टाकले.

स्पा Fri, 05/12/2014 - 16:08

जरा चरचरीत प्रश्न (वेगळ्या धाग्याचे पोतेन्शिअल असलेला )

हल्लीच्या मुलींच्या मुलांकडून (लग्नासाठीच्या ) नक्की अपेक्षा काय ?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 02/01/2015 - 06:55

In reply to by स्पा

पण एकच एक असं उत्तर देणं कठीण आहे. पण काही मुलींच्या अपेक्षा इथे सापडतील -

'Sahi Rishta' Matrimonial Videos

वामा१००-वाचनमा… Fri, 05/12/2014 - 19:51

विनोदी व्हिडिओ क्लिप्स चे एखादे संकलन असावे असे वाटते.
उदा -
https://www.youtube.com/watch?v=0pYtKCQIM4I

खूप ओव्हरॅक्टिंग आहे - https://www.youtube.com/watch?v=kRFbtcXBd0A
पण मजेशिर आहे =))

https://www.youtube.com/watch?v=7o4uDXft_pU

https://www.youtube.com/watch?v=amShk1X3IHE&list=PLE654E63058AF9CBF

https://www.youtube.com/watch?v=zoVMV2uv4-4

https://www.youtube.com/watch?v=i1M67S6cp98

https://www.youtube.com/watch?v=uH4YiyOKzkc

चिमणराव Sat, 06/12/2014 - 03:16

कापडाची किंमत ताग्याच्या आतल्या पुठ्ठ्यावर लिहितात, लोक आपल्या मागे "कंटाळवाणा बोलतो", पणवती, सर्किट, चमचा ,उचापती, अचरट, इत्यादी लेबलं लावतात. संस्थळावर हेच सर्वाँना दिसेल असे गळ्यात(श्रेणी) अडकवतात त्यामुळे उजळ माथ्याने वावरता येते.

वामा१००-वाचनमा… Thu, 11/12/2014 - 10:01

धागा काढत नाही कारण बहुसंख्य लोकांना या विषयात ना गम्य ना गती असेल. पण कोणा अनुभवी ज्योतिषाने उत्तर दिल्यास आवडेल की कोणत्याही ग्रहाचे अन विशेषतः शुक्राचे वक्री भ्रमण कसे परीणाम करते? -

काही महीन्यांपूर्वी शुक्राचे वक्री भ्रमण चालले होते. मी वाचत असलेले (फॉलो करत असलेले) बहुसंख्य भविष्यवेत्ते कळकळीने सांगत होते की या काळात नवीन मैत्री-प्रेम-ओळख आदि च्या फंदातही पडू नका. कारण हमखास अयशस्वी होतील. तसेच जुनी (unresolved) प्रकरणं, आकर्षणं अचानक उपटतील, किंवा तुम्हाला परत मागे वळायचा मोह होईल अन तो अनाठाई असेल, तो यशस्वी ठरणार नाही. फक्त निराशा वाट्याला येईल.
या काळात मला तरी असाच अनुभव आला अगदी ज्योतिष्यांच्या वॉर्निंगकडे डोळेझाक केल्यावरही आला. अगदी उघड करुन सांगायचे तर, पूर्वी आवडणारी कोणी व्यक्ती फेसबुकवर भेटली, व परत शब्दाने शब्द अथवा एकाचा शब्द अन दुसर्‍याच्या मौनाची खाई वाढत जाऊन परिणीती भांडणात झाली. अन असा अनुभव पूर्वी कधीच आला नव्हता. (अर्थातच पूर्वीही शुक्र वक्री झालेला असणारच आहे पण मला तरी असा प्रसंग आठवत नाही. काहीच्या काही एकमेव अनुभव होता. आता इतर वेळी शुक्र वक्री असल्यावर असा अनुभव का आला नाही या सुयोग्य प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. तर ते एक असोच.)
शिवाय अन्य काही लोकही त्या काळात एकाच नावेत असल्याचे समजत होते. उदा.- एक मित्राने मला सांगीतल्याचे आठवते की "मी सैरभैर झालो आहे , फेसबुकवरती इतक्या old flames भेटताहेत. अन त्रास होतोय. I am barely hanging on there with help of a thin thread " ...... अशीच काही तरी भाषा अन मतितार्थ हाच की मानसिक त्रास होतोय.

नंतर आत्ता आत्ता माझ्या वाचनात पुढील लेख आला - -

http://www.theastrologyplace.uk/2010/08/venus-retrograde.html

जो की तेव्हाच्या परिस्थितीचे जाम चपखल वर्णन करतो असे माझ्या लक्षात आले. म्हणजे तेव्हा तर मला इतक्या गंभीरतेचे ध्यानही नव्हते की त्या ज्ञानाचा प्लासेबो इफेक्ट व्हावा.

The retrograde movement of Venus suggests past relationships re-visited due to unresolved issues. A re-evaluation of values and re-assessment of love appears to be a significant theme in this situation. A resolve of feelings is something that may be on the cards and as Venus rules love, relationships, harmony, desires and also rules over all forms of beauty these are reassessed and the process is turned on an inward level a reverse of action by retreating within. The relationship under review, may help the individual move forward.

या सर्व घटनाक्रमांमुळे, वक्री भ्रमण या विषयावर ज्योतिषविषयक माहीती मिळाली तर आवडेल.

ॲमी Thu, 11/12/2014 - 10:25

In reply to by वामा१००-वाचनमा…

अपुली गपुलीच्या वरील प्रतिसादातले ज्योतिष, शुक्र वगैरे काढून टाकल्यास येणारा प्रश्न जास्त रोचक होइल असे वाटते.

भूतकाळातील नाती किंवा फ्लेम (मंजे क्रश/इन्फेचुएशन ना?) परतून आल्यास माणूस खरंच सैरभैर होतो का? खासकरून मिलाक्रामधे असे होण्याची शक्यता जास्त असणार.
तसे झाले तर हाऊ टू डील विथ इट.

वामा१००-वाचनमा… Thu, 11/12/2014 - 17:07

In reply to by ॲमी

टिंकूचा प्रश्न मला पडलेला नाही. "हाऊ टू डील विथ इट" प्रत्येकावर अवलंबून आहे.
माझा प्रश्न ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांसाठी आहे - की शुक्राच्या वक्री भ्रमणकाळातील फलादेश काय ते सविस्तर कळवावे.

कान्होजी पार्थसारथी Fri, 12/12/2014 - 00:44

अजोंचा एक युक्तीवादी (?) प्रतिसाद वाचून मला एक प्रश्न पडला.
समजा जर समस्त दक्षिण कोरिअन लोकांनी असं ठरविलं की
१) फक्त नुडल्सच खायचे. तेही घासांनी नाही, नुडल्सची एकच लांबलचक तार तोंडाचा चंबू करून आत ओढायची.
२) एकमेकांशी अजिबात बोलायचं नाही. तोंडातून कसलाच आवाज करायचा नाही. जो सुर्र्र् आवाज होईल तेवढाच. फारफार तर शीळ घालण्यापुरता.
३) कसलेही चुंबन घ्यायचे नाही.(अगदी शेवटच्या क्षणी देखील(!)) अथवा इतर मौखिक आवडी निवडी जपायच्या नाहीत.(निखळ आनंदासाठी सुद्धा)
तर एक साताठ हजार वर्षांनी त्यांचे दातओठ नाहीसे होतील आणि त्याठिकाणी नुडल्स जाण्याइतपत लहान बुळुक राहील का? मग त्यांना होमो नुडलस की असलेच नाव देता यील का?

अजो१२३ Fri, 12/12/2014 - 00:48

In reply to by कान्होजी पार्थसारथी

शरीराबाहेर काय होते आहे हे पेशीतल्या जीन्सना माहित नसते. कृपया आपले उत्क्रांती कशाने होते नि कशाने नाही याचे ज्ञान अपडेटवा.
------
अन्य अज्ञानमूलक शब्द - १. साताठ हजारवर्षे २. समस्त
------------
बाकी चालू द्या. जितके अज्ञान जास्त तितका पुरोगामीत्वाचा जोर जास्त असे निरीक्षण राहिले आहे.

अस्वल Fri, 12/12/2014 - 01:13

In reply to by अजो१२३

अवांतर -(म्हणजे पुढचं नाही वाचलंत तरी चालेल, पण एवढं वाचलंच आहे तर पुढेही वाचा.)
अजो, पुरोगामी ह्या शब्दाबद्दल तुम्हाला एवढा विरोध का आहे?
सहसा तुमच्या मतांना विरोध करणार्यांना तुम्ही सरसकट पुरोगामी म्हणता, असे निरिक्षण राहिले आहे

----------
स्वाक्षरी आवडली नाही! :)

कान्होजी पार्थसारथी Fri, 12/12/2014 - 01:25

In reply to by कान्होजी पार्थसारथी

त्यात कृपया ही एक कंडीशन घालावी:

४) समुद्रामार्गे, खुष्कीच्या मार्गे अशा कोणत्याही मार्गांनी आलेल्या इतर माणसांपासून कोरिअन लोकांनी दक्षिण कोरियाच्या भूभागावर हायब्रीड संतती पैदा करायची नाही.

फारतर काळ वाढवावा, किंवा त्या भूभागावर एकुणच नुडल्सची उपलब्धता अत्यंत मर्यादित ठेवावी.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 12/12/2014 - 02:21

In reply to by कान्होजी पार्थसारथी

नुडल्सची उपलब्धता अत्यंत मर्यादित असेल तर ते दुसरं अन्न शोधणार. त्यापेक्षा नूडल्स अशा अवतारातच सगळ्या प्रकारचं, परिपूर्ण पोषण मिळेल आणि इतर अन्नपदार्थांमधून काहीतरी (लोह, जीवनसत्त्वं, इ) कमी मिळेल अशी अट ठेवता येईल.

आबा Tue, 16/12/2014 - 06:09

In reply to by कान्होजी पार्थसारथी

दात-ओठ असणार्या लोकांना नूडल्स खाताना अशी कोणती समस्या निर्माण होईल, की ज्यामुळे ते "रिप्रोङक्टीव्ह एज" अाधीच मरतील?!

yugantar Tue, 16/12/2014 - 01:35

--LGBT चे लैंगिक हक्क मान्य होतायेत, यथावकाश सगळीकडे (सध्या फक्त उच्चभ्रू वर्गात) लग्नाला संमती मिळेल. दुसरीकडे live in मुळे व फटाफट घटस्फोट ची निर्माण झालेली fashion(हो हे कितीही नाकारले तरी होत आहे/होणारच आहे.हे जेथून उगवले त्या US मध्ये हे मोठ्या प्रमाणात घडते आहे.) यामूळे लग्नसंस्था मोडकळीस येईल किंवा polygamy(संपूर्ण जीवनात उदा.2/3 दा) बोकाळेल. तेव्हा मुलांची होणारी फरफट याचा विचार स्वैर लैंगिक व्यभिचार करणारे(lgbt असो वा नसो लग्नानंतर वा लग्नाआधी) करत असावेत का की केवळ कल की सोचेंगे कल को. -- उदारमतवाद्यांच्या मते जर लैंगिक इच्छा दाबुन ठेवणे हा गुन्हा आहे तर आई-वडील, काही प्रमाणात आज्जी-आजोबांना या उतारवयात देखील असणारच. हे बरोबर की चूक हे तेच सान्गतील पण चटकन् बदल स्वीकारू शकणाऱ्या या तरुण वयात शक्य तितका उदारमतवादी दृष्टिकोन असताना मला हे जड जात आहे तर त्याना स्वतःला काय वाटेल?
-- एकदा सर्व गोष्टीत लैंगिक भावनाना महत्त्व द्यायचे ठरल्यावर दीर,सासरे इ.कडे स्वच्छ नजरेने नेहमीच पाहता येईल? एकदा पण check out नाही करणार? Incest का नको? पोरान्चा जनुकीय बिघाड झाला तर झाला काय फरक पडतो? कोणाला वंश वाढवायचाय यामूळे येथे?
-- रानटीपणा हा unlimited and untimely sex (albeit on basis of 'fittest candidate based on physical strength) असेल आणि सुसंस्कृतपणा same unlimited and untimely sex but fittest candidate will be judged by his sex appeal+ money(you can't deny this)+ etc. असेल तर शब्दच्छल तरी का करावा?
-- पु.लंनी कुठंतरी म्हटलय हाताची पाची बोटं सारखी नसतात.मग कोणीतरी वरचढ असणारच. मग काय फरक पडतो कोण आहे ते? का पितृसत्ताक काढुन मातृसत्ताक झाल्यावर, opposite sex marriage 'ऐवजी' same sex Marriage जास्त व्हावी अशी इच्छा आहे? नसली तरी कितीही शुद्ध हेतू असला तरी दुसर्याचे अधिकार वाढणै हा पहिल्यावर आघात करतोच.
--बहूतेक उच्चभ्रू वर्गात सम्भोग (पोरं जाणती झाल्यावरही) मान्यता आहे असे कळते. कनिष्ठ वर्गात तरी 'मन मारल्यामुळे' वा एकांतच नसल्याने असे होत असावे का? --मी sexist होत असेन पण पुरूषांच्या मधली (बरं बाबा/आई स्त्रियांच्या मधलीसुद्धा) स्पर्धा आकर्षक/मनाजोगता विरुद्धलिंगी जोडीदार मिळावा म्हणूनच असते (मग पुढचे घोडा/गाडी इ. भौतिकवाद नंतर.)

yugantar Tue, 16/12/2014 - 10:29

In reply to by नंदन

बहूतेक कोकणच्या एका व्यक्तिच्या वर्णनात जो गांधीला नाव वगैरे ठेवतो. ईंग्रज चांगले होते ते सांगतो. नाव आठवत नाही. पु.लं. ची रेघ न रेघ पाठ असणार्यांच्या जगात हे पाप असेल तर होय मी पापी आहे. ;).

सुनील Tue, 16/12/2014 - 11:25

माझे स्वतःचे PUC आजतागायत कधीही फेल गेलेले नाही. तसेच कुणा ओळखीच्या व्यक्तीचेही गेल्याचे ऐकले नाही. इतर ऐसीकरांचा काय अनुभव आहे?

जर सगळ्यांचेच PUC पास होत असेल तर, मुदलात हा PUC चा फार्स होतोच कशासाठी?

अनुप ढेरे Tue, 16/12/2014 - 11:31

In reply to by सुनील

हाच प्रश्न पडला होता. एकदा फक्त एकाला त्या पीयुसीवाल्यानी गाडी गॅरेजमध्ये दाखवा जरा असा सल्ला दिलेला पाहिला आहे.

yugantar Tue, 16/12/2014 - 12:17

बळीराजाची बोगस बोंब http://m.loksatta.com/aghralekh-news/state-government-under-debt-should… कोण कुठले बागायतदार? पँकेज मराठवाड्या-विदर्भ वाल्यांसाठी जाहीर झालय. असे किती सधन शेतकरी राहिलेत. २.५ एकराच्या खाली ८०% शेतकरी आहेत. कायपण पान्चट बौद्धिक पाजता का? हे २.५ एकरसुद्धा पुढच्या पिढीत वाटले जाणार. पोराना शेतकरी सान्गतोय मर पण शिक. इथ काशी करु नको. तर त्याच्यात शुद्ध मराठी , इंग्रजी, जन्मापासून सेलेबल बनण्याची शिकवण यातून असले ग्रामीण भागातले किती एक टिकणार. ह्यांच बरय जन्मजात english शिकायला भेटतयं. White collar नौकरी (तुमच्याच भाषेत संपादनसुद्धा लेखनविक्री होईल ना.) बौद्धिक श्रम(?) करायचे. वट्ट पैसा छापून नाटकी उपदेश द्यायचा. आर् उसाला पाणी जातंय आम्हालाबी माहितयं. पण नगदी पीक घेणं भागच आहे. दोन एकरात काय पेरणार? काम करून बी पीक नाय आलं/पैका नाय मिळाला तर कसं वाटतं? सोप्पय. तुम्हाला सकाळची कॉफी टेबलावर नाही मिळाली तर जस वाटेल ना अगदी तसंच. मग म्हणा भीक नाय घेत कुणाची आठ तास काम करतो.अन् पैसे घेतो एक तारखेला. आमची/आमच्या मुलांची समाजातली किंमत बघा. मग बोला. द्या दीपिकाच्या cleavage ला प्राथमिकता. द्या कोहली-अनूष्काला पाठिम्बा. आम्हाला कुत्रं विचारत नाही. उग फाटे नको म्हणून जात/हुंडा/लैंगिकता/अंधश्रद्धा यात घुसत नाही. एक विदर्भ/मराठवाड्यातल्या शेतकर्याचा जिवंत(?) देह.
-------------
जमलयं का रडणं साहित्य,कला,संगीत इ.इ. पुच्छविहीन पशुंच.

चिंतातुर जंतू Tue, 16/12/2014 - 18:02

युनिकोडमध्ये टाइप केलेला मजकूर श्रीलिपीत आणायचा असेल, तर काय वापरता येईल? मी गूगलवर शोधलं असता काही दुवे सापडले, पण कुणाला ह्या बाबतीत प्रत्यक्ष अनुभव असला तर ते हवं आहे.

चिंतातुर जंतू Tue, 16/12/2014 - 20:04

In reply to by मेघना भुस्कुटे

कुणी ह्या क्षेत्रातले माहितगार असले, तर विचारून सांगा. 'परिवर्तन' म्हणून सॉफ्टवेअर वापरा अशीही सूचना आली आहे. त्याबद्दल कुणाकडे माहिती असेल तर कृपया सांगा.

मणिकर्णिका Tue, 16/12/2014 - 22:56

In reply to by चिंतातुर जंतू

युनिकोड श्री लिपीमध्ये बदलण्याकरता श्री सॉफ़्टवेअरचं इन्स्टॉलेशन करतानाच ’एक्स्चेंज युटिलिटी’ नावाची सुविधा मिळते. त्यामध्ये काही सेकंदांमध्ये मजकूर श्री लिपीमध्ये कन्व्हर्ट होतो.

श्री सॉफ़्टवेअर नसेल तर युनिकोड श्रीमध्ये बदलणे अवघड आहे. माझ्याकडे श्री सॉफ़्टवेअर नसताना मी श्रीच्या .ttf फ़ाईल्स डाऊनलोड करून घेऊन त्या वर्डमध्ये थेट कन्व्हर्ट होतात का (युनिकोड मंगलमध्ये होतो तसा) हे पाहिलं होतं. ते अर्थातच झालं नाही. मी स्वत: आकृतीमध्ये काम करते. आकृतीच्या कव्हर्टरमधून युनिकोड ते श्री कन्व्हर्जन करून पाहण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. या कव्हर्टरमध्ये म्हणाल ते कन्व्हर्जन होतं; पण, हे झालं नाही. म्हणजे, कन्व्हर्जन होतं खरं पण ते बरचंसं डिस्टॉर्टेड असतं. त्याचा काहीही उपयोग नाही. काना-मात्रा-वेलांट्या सर्व ओव्हरलॅप होतात. लायसन्स्ड फाँट असल्याने असं होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे, त्यामुळे तुमच्याकडे श्री सॉफ़्टवेअर असणं क्रमप्राप्त आहे.

श्री सॉफ़्टवेअरची कॉंप्रिहेन्सिव पॅकेजेस खूपच महाग आहेत. त्याचं बेसिक व्हर्जन मात्र परवडण्याजोगं आहे. माझ्याकडे अंकुर २.० आहे. श्री लिपीमधलं सगळं काम आरामात होतं.

अस्वल Fri, 19/12/2014 - 22:25

सध्या बराच in vogue आहे असं एकंदरीत कवरेजवरून वाटलं. त्यामुळे मनात आलेले प्रश्न-
मोठा: मार्गशीर्ष व्रत्/उपवास: हा प्रकार नक्की काय आहे?
छोटा: हे सगळं आधीपासून चालू आहे की नवीनच चालू झालंय?

ॲमी Sun, 21/12/2014 - 02:58

In reply to by अस्वल

मार्गशिर्ष महिन्यात गुरूवारी करतात ते लक्ष्मीचे व्रत का? मलापण गेल्यावर्षीच कळालं :-D. बहुतेक आहे पुर्वीपासूनच, फोफावलय आत्ताआत्ता.

अस्वल Sun, 21/12/2014 - 03:27

In reply to by ॲमी

हो ना, अलिकडेच चालू झालंय. आमच्या एका मत्स्यप्रिय दोस्ताचा ह्यामुळे भयानक अपेक्षाभंग झाला. बिचारा कुणीतरी जेवायला बोलावलं म्हणून खूष होता- पण मार्गशीर्ष गुरूवार निघाला.

ऋषिकेश Mon, 29/12/2014 - 08:45

In reply to by अस्वल

माझ्या घरी हा प्रकार किमान माझ्या आजीचे लग्न झाले म्हणजे किमान ८० एक वर्षांपासून तरी संपन्न होतोय असे खात्रीलायकरित्या कळते. त्याहून आधीपासून असल्यास कल्पना नाही.

मी लहानपणापासून याला "फोफावलेल्या" स्वरूपातच बघतोय.
वैभवलक्ष्मीच्या पोथ्या मात्र गेल्या २०-३० वर्षात आल्या/फोफावल्या असाव्यात अशी माझ्या आईची आठवण सांगते. तिच्या माहेरी या पुस्तिका नक्की वापरत नसत अशी तिची पक्की स्मृती आहे.

मस्त कलंदर Sat, 03/01/2015 - 11:18

In reply to by ऋषिकेश

मीही लहानपणापासून फोफावलेल्या स्वरूपातच पाहात आले आहे मार्गशीर्षातले व्रत. माझ्यामते मार्गशीर्षातले महालक्ष्मी व्रत आणि वैभवलक्ष्मी व्रत ही दोन्ही वेगवेगळी आहेत. कथादेखील वेगवेगळ्या आहेत. महालक्ष्मी व्रताची कथा ही सौराष्ट्रातला भद्रश्रवा राजा, राणी सुरतचंद्रिका आणि राजकन्या शामबाला यांची आहे. वैभवलक्ष्मीच्या कथांची बरीच व्हर्जन्स आहेत. कोणते नक्की बरोबर आहे हे ती वैभवलक्ष्मीच जाणे. कथेचं एक व्हर्जन- एक कोणी दरिद्री स्त्री घरच्यांना न सांगता (बहुतेक) निर्जळी उपवास करते. प्रत्येक शुक्रवारी देवीची पूजा केल्यानंतर जेवायला बसते आणि प्रत्येक वेळी पहिल्या घासानंतर कुणीतरी(नवरा बहुधा) येतं. ती ताट पलंगाखाली सरकवून उठते. असे सात्/सोळा/'य' शुक्रवार झाल्यानंतर पाहाते ते पलंगाखाली सारलेली ताटं हिरे-माणिक-मोत्यांनी भरलेली असतात. (किचन आणि बेडरूम दोन्ही एकत्र असं एकाच खोलीचं घर असेल तर इतकी ताटं पलंगाखाली ठेवता यावी इतकी ताटं+पलंगाखालचं क्षेत्रफळ+इतके दिवस पलंगाखाली डोकावून तिथला केर न काढण्याइतका आळशीपणा+इतक्या आठवड्यात कुजलेल्या अन्नाचा वास न येण्याइतके किंवा सहन करणारे लोक अशी शिकवण या व्रतातून मिळते) दुसर्‍या एका कथेत राणी लक्ष्मीचा अपमान करते म्हणून राजा तिला हाकलून देतो. ती ज्या गल्लीत जाईल तिथल्या लोकांची कामे बिघडतात. जसे साळ्याची साडी, कुंभाराची मडकी इत्यादी. मग देवी तिला उ:शाप देते आणि व्रत सांगते.

महालक्ष्मीचं व्रत फक्त मार्गशीर्षात करतात तर वैभवलक्ष्मीचं कधीही करता येतं. ते मग १६ किंवा २१ आठवड्यांचं असतं आणि अगदीत निर्जळी नाहीतर किमान निरंकार (द्रव्पदार्थ सेवन) केला जातो. माझ्या आत्याच्या मुलीला शाळेत गम्य नव्हतं आणि ही व्रतवैकल्यं स्त्रिया किंवा भावी स्त्रियांसाठी असतात. त्यामुळे मला मार्गशीर्षात आमच्या घरी आणि आत्यांच्या घरी दोन्ही ठिकाणी कथा वाचावी लागे. गेल्या १४ वर्षांत ही कथा वाचण्याचा प्रसंग माझ्यावर गुदरला नसला तरी आजही मी ती कथा तोंडपाठ सांगू शकेन असा विश्वास आहे. :-)

साधारण शाळेत असेपर्यंत सर्व पुस्तकांत कथा शब्दशः तीच होती. पुढे वाक्यरचना बदलून अधिक समकालीन झाली. नंतर वैभवलक्ष्मीची कथा आणि महालक्ष्मीची कथा या दोन्ही एकाच पुस्तकात, मतितार्थ तोच पण पूर्ण नवनीत गाईड छापाची झाली. त्यानंतरचं काही माहित नाही. सर्वच कथांमध्ये 'ही कथा ऐकल्याशिवाय वा वाचल्याशिवाय या व्रताचे फळ आपल्यास मिळणार नाही' असे लिहिलेले असते आणि व्रताचे उद्यापन करणे तितकेच महत्वाचे असते(क्लोजर या संकल्पनेचं मूळ प्राचीन भारतात आहे हो) त्यामुळे पुस्तके भेट देण्याची प्रथा पडली असावी हे माझे वैयक्तिक मत.

ॲमी Sun, 04/01/2015 - 06:48

In reply to by मस्त कलंदर

=)) व्रतातून मिळणारी शिकवण भारीय!
वैभवलक्ष्मी व्रत दहाएक वर्षांपुर्वी ऐकलं होतं. ते बहुतेक कोणत्याही वारी केलं तर चालतं ना मंजे १६/२१ सोमवार/मंगळवार/... लग्न व्हावे म्हणून करतात ते हेच का?

'न'वी बाजू Sun, 04/01/2015 - 07:02

In reply to by ॲमी

१६/२१ सोमवार/मंगळवार/... लग्न व्हावे म्हणून करतात ते हेच का?

१६ सोमवार पोरे व्हावीत म्हणून करत नाहीत काय? (चूभूद्याघ्या.)

ॲमी Sun, 04/01/2015 - 07:10

In reply to by 'न'वी बाजू

काय्की :-|
आमच्या दोन मैत्रिणींनी १६ बुधवार/शुक्रवार केलेले लग्न व्हावे म्हणून. आत्ता परवाच १६ सोमवार ऐकले. कशासाठी केलेले माहीत नाही. पण करणारीला मुलगी आहे. त्यामुळे पोरं व्हावीसाठी नसेल... पोरगा व्हावासाठी असू शकेल.

मारवा Sun, 28/12/2014 - 16:22

राजेशाही जेव्हा अस्तित्वात होती व काहि ठिकाणी सध्या देखील आहे.
जेव्हा पारंपारीक राजेशाही अस्तित्वात होती भारतात वा कुठेही तेव्हा
राजा व त्याच कुटुंब यांना कस जगवल जात असे म्हणजे आर्थिकद्रुष्ट्या
तो फंड कसे गोळा करत असे वा त्याच्या गरजा कशा भागवल्या जात
म्हणजे कर वसुल करायचा कि सर्व नागरीक फुकटात सर्व्हिसेस द्यायचे काय नेमकी पद्दद्त अस्तित्वात होती.
त्याच्या दैंनंदिन गरजा दुध किराणा भाजीपाला ते लक्झरीज पर्यंत भागवण्याच्या बदल्यात त्याला
काय द्याव लागत असे. वा अपेक्षीत असे. तो नेमक काम काय करत असे.
त्याच्या बरोबरीने त्याच एलाइट सर्कल अष्टप्रधान वगैरे पण राजाच्याच बरोबरीने हे हक्क उपभोगत असत का ?

नितिन थत्ते Sun, 28/12/2014 - 17:19

In reply to by मारवा

वेगवेगळ्या टप्प्यात आणि वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे प्रकार असावेत.

पण नागरिक + व्यापारी यांच्याकडून घेतलेले कर हाच मुख्य स्रोत. शिवाय लढायांत मिळालेली लूट असेच.

सुनील Mon, 29/12/2014 - 08:36

In reply to by मारवा

औरंगजेब हा वैयक्तिक खर्च भगविण्यासाठी टोप्या शिवत असे, असे वाचले आहे (खखोऔजा).

'चाणक्य' मालिकेत, राजघराण्यातील सर्वांना एक ठराविक रक्कम दर महा दिली जाई, असे दाखवले होते. हे जास्त सय्युक्तिक वाटते. जमा झालेल्या करांतून काही रक्कम राजघराणे स्वतःच्या उपभोगासाठी वेगळे काढत असणार.

बाकी, शहाजहानने ताजमहालावर खर्च केलेली अवाढव्य रक्कम ही वैयक्तिक होती ही सार्वजनिक?

नितिन थत्ते Mon, 29/12/2014 - 11:26

In reply to by सुनील

>>शहाजहानने ताजमहालावर खर्च केलेली अवाढव्य रक्कम ही वैयक्तिक होती ही सार्वजनिक?

आँ....

तुम्हाला तेजोमहालयावर कुराणातल्या कलमा कोरून घ्यायचा खर्च म्हणायचे असावे. ;)

सुनील Mon, 12/01/2015 - 09:27

In reply to by मारवा

नाना फडणविस हे काही थेट राज्यकर्ते नव्हते.

तरीही नाना अक्षरशः कोट्याधिश होते (२५० वर्षांपूर्वी जवळपास सहा कोटींची मालमत्ता!) असे आता उपलब्ध पुराव्यावरून म्हणता येते!

त्यांच्या उत्पनाचा स्त्रोत काय असावा बरे?

बॅटमॅन Mon, 12/01/2015 - 14:22

In reply to by सुनील

उत्पन्नाचा स्रोत- कैक गावे त्यांच्या नावावर होती त्याचे उत्पन्न, शिवाय पेशवे सरकारच्या चाकरीतल्या टॉप हुद्यावर होते तिथला पगार. काय कमी ओ मग?

सुनील Mon, 12/01/2015 - 14:38

In reply to by बॅटमॅन

कैक गावे म्हणजे किती गावे? आणि त्यांचा महसूल (म्हणजे बव्हंशी शेतसारा) तो कितीसा? खेरीज, टॉप हुद्दा असला तरी ती चाकरीच. त्या काळातील सहा कोटींशी त्यांचा ताळमेळ लागेल? मग उरलेल्या तीन शहाण्यांकडे कशी नव्ह्ती एवढी माया?

अवांतर - जयललितांना डिस्प्रपोर्शनेट अ‍ॅसेट्स बद्दल शिक्षा झाली तेव्हा त्यांच्या सध्याच्या डिस्प्रपोर्शनेट परंतु एकेकाळच्या प्रपोर्शनेट अ‍ॅसेट्स ह्याविषयी आलेला विनोद आठवून गेला!

बॅटमॅन Mon, 12/01/2015 - 14:43

In reply to by सुनील

सहा कोटी लैच आहेत हे मान्य. जरा नीट पाहिले पाहिजे. कारण पानपतपूर्वकाळात, जेव्हा अटकेपार इ. गेल्यामुळे पेशवाई एकदम जोरात होती तेव्हाही अख्ख्या राज्याचा वार्षिक वसूल १०-१२ कोटी इतकाच होता असे वाचल्याचे स्मरते.

शिवाय, नाना वय वर्षे १८-२० पासून अ‍ॅक्टिव्ह होते आणि वारले बहुधा वयाच्या ५६ व्या वर्षी. तेव्हा ४० वर्षे जी मिळाली, त्यात माया जमवायचे किती सोर्स होते हेही पाहिले पाहिजे. पण स्वहस्ताक्षरातला कागद म्हटल्यावर मेणवली दफ्तरातले उल्लेख पाहिले पाहिजेत. अर्थात मिरजेच्या पटवर्धनांच्या हिशेबांतही १०० किलो सोने इ. उल्लेख सापडतात तिथे नानांकडे संपत्ती असल्याचे कळाल्यावर आश्चर्य वाटत नाही म्हणा, पण पाहिले पाहिजे.

'न'वी बाजू Tue, 30/12/2014 - 09:24

तुमचा पगार 'कमी' आहे का? असेल तर तुम्ही तुमचं काम कितीही मन लाऊन तरी तुम्ही निकम्मे आहात. तुम्ही आदरपात्र नाही. तुम्ही भुईला भार आहात.

विशेषणांच्या मांदियाळीत 'फडतूस' राहून गेले वाटते.

उठा !!! जागे व्हा! जोपर्यंत तुम्ही पायलट/डेंटिस्ट बनत नाही तोपर्यंत स्वस्थ बसू नका.

आयुष्याच्या या पायरीवर आता डेंटिस्ट आणि/किंवा पायलट कसे बनायचे (आणि, मुख्य म्हणजे, काय म्हणून) याबद्दल काही टिप्पणी मिळू शकेल काय?

डेंटिस्ट आणि/किंवा पायलट कसे बनायचे

विच्छा तेथे मार्ग. (गविंना विचारा ते पायलट आहेत बहुदा.)

काय म्हणून

तुमच्या बेसिकमध्येच झोल आहे. तुम्हाला निकम्मंच रहायचय का आयुष्यात? प्रगतीची आस नाही का तुम्हाला? प्रगत म्हणवून घ्यायचं असेल तर हीच प्रोफेशन्स आहेत!

आयुष्याच्या या पायरीवर आता डेंटिस्ट आणि/किंवा पायलट कसे बनायचे

वेळोवेळी अंतर्मुख व्हावं की सतत हवेत भरार्‍या माराव्यात, हा मिडलाईफ क्रायसिस आहे खराच!

मन Mon, 12/01/2015 - 14:45

समजा एक कागदाचा वर्तुळाकृती कपट्यावर/तुकड्यावर एका बाजूने फुंकर मारली (काइंड ऑफ हवेने ढकलले.) तर येणारा इफेक्ट हा विरुद्ध बाजूने ते ओढण्यासारखा असेल का ?
म्हणजे कागदाच्या तशाच कपट्याच्या/तुकड्याच्या दुसर्‍या बाजूने आपण तोंडाने हवा ओढून घेतली ;(स्ट्रॉने द्रव पदार्थ पिताना द्रव ओढून घेतो तद्वत.)
तर त्या आधीच्या बाजूने फुंकर मारणे हे नंतरच्या बाजूने शोषण्यासारखे/हवा ओढून घेण्यासारखे आहे का ?
व्हेक्टर्सचा विचार करता ते तसेच आहे असे अंदाजपंचे वाटते.
तुमचे मत काय ?
किंवा ...
.
.
.
छताला पंखा लटकवतो ना, समजा तस्श्शीच एक कागदाचे चकती अडकवली आहे.
तुम्ही पुरेसे उंच आहात (किंवा चकती खालपर्यंत, तुमच्या तोंडासमोरपर्यंत लटकते आहे.)
तुम्ही तिला जोरात फुंकर मारता. ती दुसर्‍या बाजूला जाते.
ती स्थिर झाल्यावर तुम्ही विरुद्ध दिशेला जाता आणि जोरात हवा आत ओढता तोंडाने.(व्हॅक्युम क्लीनर आत ओढतो तसे.)
दोन्ही केसमध्ये कागदाच्या चकतीवर नेट-इफेक्ट सारखाच असेल का ?

शास्त्रिय दृष्ट्या सांगता येणार नाही पण हवा ओढुन येणारा इफेक्ट कमी असेल.
माझ्या मते कारण असे असेल की, जेंव्हा तुम्ही फुंकर मारता आहात तेंव्हा फोकस्ड एरीया मधे तो फोर्स काम करणार आहे.
पण जेंव्हा तुम्हा हवा आत ओढुन घेणार आहात तेंव्हा ती आजुबाजुची सर्व हवा आत ओढुन घेणार आहे.

तथापि
तुमच्या छताच्या फॅन च्या प्रयोगात जर तुम्ही तो फॅन एका नळकांड्यात ( टनेल ) मधे बसवलात तर इफेक्ट बरासचा सारखा असेल.

वामा१००-वाचनमा… Tue, 13/01/2015 - 10:39

"सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्।।"
च्या धर्तीवरचे एक मेडिटेशन टेक्निक सापडले. म्हणजे कुठे वाचनात आले नाही तर उद्विग्न मनस्थितीत, comfort (सावली, विसावा) ची अत्यंत गरज असताना मलाच सापडले असे वाटते.
एक एक आयुष्यात भेटलेली व्यक्ती आठवायची अन मनात "God bless" असे म्हणून त्या व्यक्तीकरता प्रार्थना करायची.
असे लक्षात आले की प्रथम प्रथम शत्रूच आठवतात अन प्रार्थना अत्यंत अवघड जाते. किंबहुना अतिशयच तिरस्कार वाटतो, वाईट वाटतं. कारण त्या व्यक्तीच्या आपल्याशी असलेल्या essence मध्ये मन बुडून जाते अन क्लेश होतात.
नंतर नंतर randomely मित्र-मैत्रिणी-प्रियजन अन अगदी बसचे ड्रायव्हर, सहकारी, जुने शाळू सोबती सगळेजण येऊ लागतात. प्रत्येक व्यक्ती मनात वेगळ्या भावना उद्दीपित करते. त्या भावनांचे फक्त नीरीक्षण करायचे.
जसे काही झरझर ढग जात क्षणोक्षणी आकाश बदलते - तसे वाटते.
यातून मला जाणवलेले फायदे -
(१) ज्या व्यक्तीस/पक्षी-प्राणी-जीव कोणासही आपण दुखावले आहे त्या आत्म्याशी कनेक्ट होऊन positive vibes त्याच्याकडे पाठविल्याचे समाधान मिळते.
(२) शांत मनःस्थितीत व्यक्ती आठवल्याने, त्या नात्याचा essence लक्षात येतो
(३) मला एकदम surprising वाटले ते हे की, क्वचित चटकन आपल्या एखाद्या जुन्या तत्वाशी/मूल्याशी परत connect अवचित गवसते कारण ती व्यक्ती ते मूल्य प्रक्षेपित करत असते. (व्यक्तीगत असल्याने हा मुद्दा उदाहरणासहीत स्पष्ट करता येत नाहीये.)

अजो१२३ Tue, 13/01/2015 - 15:02

In reply to by वामा१००-वाचनमा…

प्रथम प्रथम शत्रूच आठवतात

शत्रू? एखाद्याला शत्रू म्हणायला बरंच काही असावं लागतं. तुमचं वाक्य ऐकून मी केव्हाचा विचार करतोय कि माझे शत्रू कोण कोण आहेत आणि कोणी सापडत नैयय. मीच लोकांना त्रास देत असतो आणि बिचारे मला क्षमा करत असतात.