Skip to main content

.

.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

.शुचि. Mon, 24/08/2015 - 22:44

In reply to by अस्वल

कोकिला व्रत रखने वाली स्त्रियों के लिए नियम है कि पहले आठ दिन तक आंवले का लेप लगाकर स्नान करे। इसके बाद आठ दिनों तक दस औषधियों कूट, जटमासी, कच्ची और सूखी हल्दी, मुरा, शिलाजित, चंदन, वच, चम्पक एवं नागरमोथा पानी में मिलाकर स्नान करने का विधान है।

इसके अगले आठ दिनों तक पिसी हुई वच को जल में मिलाकर स्नान करें और अंतिम छह दिनों में तिल, आंवला और सर्वऔषधि से स्नान करना चाहिए। प्रत्येक दिन स्नान के बाद कोयल की पूजा करें और अंतिम दिन कोयल को सजाकर उसकी पूजा करें। पूजा करने के बाद ब्राह्मण अथवा सास-श्वसुर को कोयल दान कर दें।

स्वरा Mon, 24/08/2015 - 23:04

In reply to by .शुचि.

मग यानंतर परत कोकीळा व्रत येईपर्यंत, म्हणजेच पुढची १७ वर्षे ११ महिने स्नान करु नये का? नाही म्हणजे कमावलेलं पुण्य उगाच एका भुक्कड स्नानाने गमावले, असे व्हायला नको....

पिवळा डांबिस Mon, 24/08/2015 - 23:39

In reply to by स्वरा

म्हणजेच पुढची १७ वर्षे ११ महिने स्नान करु नये का?

करेक्ट.
म्हणजे मग त्या काळादरम्यान साठलेल्या अंगमळापासून एक झक्कास गणपतीही बनवता येईल!
मग झाली की फुल्लफ्लेज्ज पार्वती!!!
:)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 24/08/2015 - 23:41

In reply to by पिवळा डांबिस

म्हणजे मग त्या काळादरम्यान साठलेल्या अंगमळापासून एक झक्कास गणपतीही बनवता येईल!

याजागी अंगमळापासून अंमळ गणपती बनवता येईल, हे वाक्य अंमळ जालीय वाटेल.

नितिन थत्ते Tue, 25/08/2015 - 06:50

In reply to by .शुचि.

>>ब्राह्मण अथवा सास-श्वसुर को कोयल दान कर दें।

ब्राह्मणाला सासू-सासर्‍यांच्या इक्विव्हॅलंट मानलंय इथे. म्हणजे ४९८(अ) चा गुन्हेगार. कुणा ब्रिगेडी माणसाने लिहिलेलं दिसतंय.

पिवळा डांबिस Tue, 25/08/2015 - 09:40

In reply to by हेमंत लाटकर

मोनालिसा (खरं नांव लिसा घेरार्डिनी) ही तर फ्लोरेन्समधल्या एका व्यापार्‍याची पत्नी (म्हणजे शेठाणी!!) होती ना?
DSC_0410a

हेमंत लाटकर Wed, 26/08/2015 - 07:56

In reply to by गब्बर सिंग

एकदा गणपती नंतर पार्वती अन नंतर डायरेक्ट मोनालीसा ???
नैष्ठिक निग्रह नैय्ये तुमच्याकडे.???

शुचिताईनी आघोळीचा थाट सांगितला त्याला हे उत्तर, येथे राणी मेानालिसा नाही राणी क्लिआेपात्रा म्हणायचे होते.

पिवळा डांबिस Wed, 26/08/2015 - 12:15

In reply to by हेमंत लाटकर

राणी क्लिओपात्रा म्हणायचं असेल तर आमचं काही म्हणणं नाही.
घाला तिला आंघोळ जशी हवी तशी!
हां, मोनालिसा असती तर वाद होता.....

घनु Tue, 25/08/2015 - 14:20

In reply to by बॅटमॅन

पण ती जेव्हा करत असे तेव्हा ते कसे असायचे स्नान हे हेमंतांना महित असावे, त्याबद्दल त्यांनी सांगावे असं माझं म्हणणं होतं.

हेमंत लाटकर Wed, 26/08/2015 - 08:10

In reply to by घनु

मला राणी क्लिआेपात्रा म्हणायचे होते. राणी क्लिआेपात्रा गाढवीनीचे रोज वाटीभर दुघ घेऊन अंगाला लेप लावून आघोळ करत असेे.

ही राणी खुप सुंदर होती तिच्याशी लग्न करण्यासाठी अनेक राजांमध्ये लढाया झाल्या. शेक्सपिअर साहेबांनी राणी क्लिआेपात्रावर नाटक काढले ते अजरामर झाले.

आडकित्ता Wed, 26/08/2015 - 22:53

In reply to by हेमंत लाटकर

शेक्सपिअर साहेबांनी राणी क्लिआेपात्रावर नाटक काढले ते अजरामर झाले.

शेक्सपिअर तुमचे साहेब आहेत होय! त्यांच्याकडे १३व्याचा पगार मागायचा आहे ह्ये ध्यानी असूंद्या.
एक अवांतर शंका : नाटक काढल्याने श्क्सपिअर साहेब अजरामर कसे काय झाले?
नाटक काढणे व ल्हिणे यात काय फरक आहे?

हेमंत लाटकर Thu, 27/08/2015 - 13:18

In reply to by आडकित्ता

शेक्सपिअर तुमचे साहेब आहेत होय! त्यांच्याकडे १३व्याचा पगार मागायचा आहे ह्ये ध्यानी असूंद्या.
एक अवांतर शंका : नाटक काढल्याने श्क्सपिअर साहेब अजरामर कसे काय झाले?
नाटक काढणे व ल्हिणे यात काय फरक आहे?

नाही बाॅ, हे नाटक काढल्याने म्हणजे लिहल्याने शेक्सपिअर अजरामर झाले

हेमंत लाटकर Thu, 27/08/2015 - 13:19

In reply to by आडकित्ता

शेक्सपिअर तुमचे साहेब आहेत होय! त्यांच्याकडे १३व्याचा पगार मागायचा आहे ह्ये ध्यानी असूंद्या.
एक अवांतर शंका : नाटक काढल्याने श्क्सपिअर साहेब अजरामर कसे काय झाले?
नाटक काढणे व ल्हिणे यात काय फरक आहे?

नाही बाॅ, हे नाटक काढल्याने म्हणजे लिहल्याने शेक्सपिअर अजरामर झाले

हेमंत लाटकर Tue, 25/08/2015 - 09:13

In reply to by .शुचि.

हे व्रत ज्यांना महिनाभर करावयाचे आहे त्यांनी पहिले 8 दिवस तीळ व आवळा कल्प, नंतरचे 8 दिवस सर्वैषधी चूर्ण (आयुर्वेदिक दुकानात मिळते), पुढचे 8 दिवस वेखंडाचे चुर्ण व नंतर 6 दिवस सर्वैषधी चूर्ण लावून स्नान करावे. म्हणजे हे व्रत केल्याने पुण्य आणि सौंदर्य दोन्हीचा लाभ होईल. पण हे व्रत ईतके सोपे नाही, महिनाभर केले तर रोज दिवसभर उपास करून संध्याकाळी पुजा करून जेवण, महिनाभर पंलगावर न झोपता चटई टाकन जमिनीवर झोपावे लागते. नवरे मंडळीनां महिनाभर संन्यासी व्हावे लागते.

शहराजाद Tue, 25/08/2015 - 09:42

In reply to by हेमंत लाटकर

नोकरी न करता मरमर घरकाम करणार्या महिलाम्ना एका दिवसात व्रत करण्याची मुभा आहे का? असल्यास किती घरकाम केले की ते 'मरमर'ठरते?
धन्यवाअद

नवरे मंदळींवर लादलेल्य्स्स जबरदस्तीच्या सन्यासाचा णिशेढ

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 24/08/2015 - 23:16

In reply to by अस्वल

पण कोकिळ व्रतात नक्की करायचं काय असतं?

गानकोकिळेचे गाणं 'दीदी तेरा देवर दीवाना, हाये राम कुडियों को डाले दाना' सतत म्हणायचं असतं.

पिवळा डांबिस Mon, 24/08/2015 - 23:41

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आमच्यात 'कुहू कुहू बोले कोयलियां' हे गाणं म्हणतात...
आमचं घराणं अधिक कर्मठ आहे!!!
:)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 24/08/2015 - 23:43

In reply to by पिवळा डांबिस

आमच्याकडे पक्ष्यांना दाणे घालून त्यांची भूक भागवण्याला अधिक प्रोत्साहन देतात. कर्मठपणा नावालाही नाही आमच्याकडे.

गब्बर सिंग Mon, 24/08/2015 - 23:43

In reply to by पिवळा डांबिस

आमचे तुमच्यापेक्षा जास्त कर्मठ आहे. आमच्यात "कोकिळ कुहुकुहु बोले, तू माझा तुझी मी झाले" - हे मराठी गाणं म्हणतात. नैतर राज सायबांचा "राग मारामारी" सुरु होतो.

पिवळा डांबिस Tue, 25/08/2015 - 09:22

In reply to by गब्बर सिंग

मग तुमचं जास्त कर्मठ (आणि कडवट!!)
:)

(बाकी कडवा = कडवट हा शोध ज्या शिवसेनावाल्याने लावला त्याची तारीफ करावी तेव्हढी थोडीच!!)

सिफ़र Tue, 25/08/2015 - 10:32

In reply to by गब्बर सिंग

बागेत कोकिळ कुहुकुहु बोले.... इन्शा अल्ला! माझं मन हफिसातच रंग उधळत नाचायला लागलये...

हेला चला बागामघी रंग खेळू चला...रंग खेळू चला आआआआ!!!.रंग खेळू चला आआआआ!!! ;)

पिवळा डांबिस Thu, 27/08/2015 - 10:20

In reply to by गब्बर सिंग

जिगरमा बडी आग है.

क्या बात है! अर्वाचीन बॉलीबूड गाण्यांमधलं ते आमचं सर्वात आवडतं गाणं आहे!

पुरोगाम्यांनो, उगाच बोंबलू नका, ते गाणं तुमच्या गुलजारने लिहिलेलं आहे!!!!!!

हेमंत लाटकर Tue, 25/08/2015 - 21:14

In reply to by सिफ़र

बागेत कोकिळ कुहुकुहु बोले.... इन्शा अल्ला! सिफरच मन हफिसातच बायको बरोबर रंग उधळत नाचायला लागलये... आआआआ!!!

हेमंत लाटकर Wed, 26/08/2015 - 22:34

In reply to by सिफ़र

बागेत कोकिळ कुहुकुहु बोले.... इन्शा अल्ला! माझं मन हफिसातच रंग उधळत नाचायला लागलये...
हेला चला बागामघी रंग खेळू चला...रंग खेळू चला आआआआ!!!.रंग खेळू चला आआआआ!!!

हे जरा जास्त होतय!

हेमंत लाटकर Wed, 26/08/2015 - 22:35

In reply to by सिफ़र

बागेत कोकिळ कुहुकुहु बोले.... इन्शा अल्ला! माझं मन हफिसातच रंग उधळत नाचायला लागलये...
हेला चला बागामघी रंग खेळू चला...रंग खेळू चला आआआआ!!!.रंग खेळू चला आआआआ!!!

हे जरा जास्त होतय!

.शुचि. Mon, 24/08/2015 - 23:55

In reply to by पिवळा डांबिस

आमच्याकडे हे गाणं गातात-

मूर्तिमंत भगवंत भेटला
दे, कंठ कोकिळे मला
मधुमास जीवनी आज अचानक आला
आम्रतरु मोहरला

http://www.cliparthut.com/clip-arts/264/sweating-smiley-face-264995.gif

शहराजाद Tue, 25/08/2015 - 10:05

In reply to by .शुचि.

नवरा सोफ्यावर आणि बायको चटईवर झोपायच्या व्रतात असली छचोर गाणी? त्यापेक्षा आमच्या स्काउटपथकाचे गाणे म्हणा-
'कोकिळ गाई मंजुळ गान,
सुखी अनन्न्दी राहो त्यान'

पुढच्या दोन ओळी लक्षात नाहीत. त्याऐवजी ह्याच ओळी परत एकदा गायल्या तरी चालतील. शेवटी 'कुहुकुहुकुहुकुहुकुहुकुहुकुहु' असे कूजन करावे आणि त्याच वेळी हाताचे पंजे अंगाच्या दोन्ही बाजूंना फडफडवत धावत आपल्या गटाच्या नियोजित जागी जाऊन उभे रहावे.
इथे नियोजित जागा म्हणजे चटई असल्यामुळे खोटेखोटेच धावावे. चटई फरशीवरून घसरते. नपेक्षा चालतच चटईवर जाऊन तेथे नियोजन करावे.

अनु राव Wed, 26/08/2015 - 10:42

In reply to by शहराजाद

मग त्याऐवजी बायको नवर्‍याच्या जवळ गेली तर चालते का?

ही शक्यता जरी विचारात आली असती तर असली व्रते निर्माण झाली असती का?

पिवळा डांबिस Thu, 27/08/2015 - 10:30

In reply to by अनु राव

ही शक्यता जरी विचारात आली असती

या व्रतामध्ये बायकोला सतरंजी/चटईवर झोपायला लागण्याची शक्यता विचारात घेतली तर,
बायकू अर्ध्या रातीला हळूच नवर्‍याच्या (आणि तिच्या) पलंगावर घुसून झोपण्याची शक्यता नाकारता येत नाही!!!! :)
"ईश्कोंके लिये ना सही, बिछाने के लिये आय!
रंजिश ही सही...."

पिवळा डांबिस Thu, 27/08/2015 - 11:10

In reply to by अनु राव

थॅन्क्यू!
तात्पर्य काय की बायकोला अशी काहीतरी फालतू व्रतं करायला लावण्यापेक्षा नवरे मंडळींनी एक झकास ऐसपैस किंग साईझ बेड विकत घ्यावा!
मग होऊ देत खर्च!!!!
:)

प्रसन्ना१६११ Tue, 25/08/2015 - 11:24

In reply to by .शुचि.

मूर्तिमंत भगवंत भेटला
दे, कंठ कोकिळे मला

कोकीळेचं महात्म्य सांगणारं आणखी एक गाणं..पण शुचिच्या सात्विक गाण्यावर उतारा.. =))

तिरशिंगराव Fri, 25/09/2015 - 10:22

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गानकोकिळेचे गाणं 'दीदी तेरा देवर दीवाना, हाये राम कुडियों को डाले दाना' सतत म्हणायचं असतं.

या गाण्यापासून ती 'गानकोकिळा' राहिली नाही.

हेमंत लाटकर Tue, 25/08/2015 - 00:27

In reply to by अस्वल

माझ्या बायकोने व आईने आताच शुक्रवार-रविवार या तीन दिवसाचे व्रत केले. पहिल्या दिवशी नदीवर, विहिरीवर, हे शक्य नसल्यास बाथरूम मध्ये पुर्वकडे तोंड करून सुर्याला अर्ध्य देवून आघोळ करायची नेतर चौरंगालर सोन्याची किंवा पितळेची कोकीळा झाडावर बसलेली स्थापित करूत सगळे मांडायचे. दिवसभर उपास करायचा. संध्याकाळी पुजा करन नंतर दुसर्या दिवशी असेच तिसर्या दिवशी उद्यापन करायचे. हे सर्व विधी ब्राम्हनाकडून करून घ्यायचे. सवाष्ण ब्राम्हणाला जेवू घालायचे. या तीन दिवसात पलंगावर न झाेपता चटई टाकून जमिनीवर झोपायचे. (नवरे मंडळीनी बैठिकीत सोफ्यावर पडायचे. ha! ha!) नौकरी करणार्या स्त्रियांनी एका दिवसात केले तरी चालते. . पूजेचे साहित्य पुजाविधी उद्या सांगतो

अस्वल Tue, 25/08/2015 - 01:26

In reply to by हेमंत लाटकर

आमच्याकडे कोकिळा नाही, म्हणून रिमा लागूंचा फोटो ठेवायचा प्लॅन आहे.नुसताच, झाडावर चढलेला वगैरे नाही.
आणि मी हे विधी आमच्या रद्दीवाल्या काकांकडून करवून घेईन म्हणतो. आणि सवाष्ण ब्राम्हणाऐवजी माझ्या चौथीतल्या गणिताच्या शिक्षकांना जेवू घालायचा विचार आहे. असं केलं तर चालेल का?
सावकाश उत्तर द्या.. घाई नाही काही.

हेमंत लाटकर Tue, 25/08/2015 - 21:46

In reply to by .शुचि.

सवाष्ण ब्राह्मण? म्हणजे सवाष्ण पुरुष?

सवाष्ण म्हणजे विवाहित स्त्री व ब्राम्हण म्हणजे मुंज झालेला मुलगा किंवा नवरा

हेमंत लाटकर Tue, 25/08/2015 - 21:49

In reply to by .शुचि.

सवाष्ण ब्राह्मण? म्हणजे सवाष्ण पुरुष?

सवाष्ण म्हणजे विवाहित स्त्री व ब्राम्हण म्हणजे मुंज झालेला मुलगा किंवा नवरा

हेमंत लाटकर Tue, 25/08/2015 - 21:29

In reply to by अस्वल

त्यापेक्षा हे व्रत न करता शहराजवळच्या किंवा गावाजवळच्या नदीवर सहकुंटुंब जायचे आणि सर्वांनी 1 तास सुर्याकडे तोंड करून एका पायावर पाण्यात उभे राहायचे 18 वर्षाचे पुण्य 1 तासात.

हा!हा!ही!ही!हू!हू!

अनु राव Tue, 25/08/2015 - 10:38

In reply to by हेमंत लाटकर

हेमंतरावजी लाटकरसाहेब - हे व्रत करायला लावल्याबद्दल ४९८ अंतर्गत तक्रार करायची सोय आहे का?

हेमंत लाटकर Tue, 25/08/2015 - 21:33

In reply to by अनु राव

हेमंतरावजी लाटकरसाहेब - हे व्रत करायला लावल्याबद्दल

मी फक्त माहिती टाकली. करणे न करणे ज्याचा त्याचा वैयक्तिक पश्न.

XYZ Mon, 24/08/2015 - 23:05

In reply to by .शुचि.

स्वतःच्या धाग्याला स्वतः रेटींग करता येणे - हे पहीलं बंद करा..))))))

आॅ...?
हे कसं करायच..?

अद्याणी ( मोबल्यावर टाईपता इना) जव्हेरगंज.

राजेश घासकडवी Mon, 24/08/2015 - 23:22

हे व्रत 18 वर्षानी एकदा येते. ज्या वर्षी अधिक आषाढ मास असतो तेव्हाच करायचे असल्यामुळे आयुष्यात जास्तीत जास्त 3 वेळा करण्याची सॆधी मिळते.

हे मला नीट कळलं नाही. अधिक मास दर तीन वर्षांनी येतो. तेव्हा आषाढ अधिक मास असल्याची परिस्थिती दर ३६ वर्षांनी यायला हवी. आयुष्यात जास्तीत जास्त तीन वेळा वरूनदेखील १८ वर्षं पुरेशी नसावीत असं दिसतं. तेव्हा नक्की काय हे कोणी सांगेल का?

राजेश घासकडवी Mon, 24/08/2015 - 23:43

In reply to by राजेश घासकडवी

थोडं विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं. खरं तर हे व्रत दर ३६ वर्षांनीच येत असणार, पण दक्षिणा दुप्पट मिळवण्यासाठी भटभिक्षुकांनी त्याची फ्रिक्वेन्सी दुप्पट केली असणार! बारा महिन्यांचे ४८ आठवडे केले तसंच काहीतरी असावं.

हेमंत लाटकर Wed, 26/08/2015 - 12:49

In reply to by राजेश घासकडवी

भटभिक्षुकांच्या बाबतीत इतक्या तुच्छतेने बोलायची गरज नव्हती. (मी भट भिक्षुक नसुनही असे म्हणतोय)

जेव्हा शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्याून सुटून विशाऴगडाकडे निघाले (21 मैलाचे अंतर) तेव्हा घोडखिंड अडवून धरायला बाजीप्रभू देशपांडे (भट) नसले असते तर?

याच भटाच्या (बाळाजी विश्वनाथ) वंशावळीने शिवशाही चाळीस वर्ष पुढे चालवली. माधवराव पेशव्यानंतर प्रराक्रमी पेशवा नव्हता. (राघोबाबादादा होते पण ते पराक्रमी होते पण चंचल होते, त्यामुळे शेवटपर्यंत पेशवे झाले नाहीत.) तरी नाना फडणीसांनी काही काळ शिवशाही चालवली. पण इंग्रज प्रबळ झाल्यानुळे दुसरा बाजीराव पराक्रमी नसल्यामुळे हिंदवी स्वराज्य संपले ब

केतकी आकडे Wed, 26/08/2015 - 21:48

In reply to by हेमंत लाटकर

तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे! कोणताही विषय तुम्ही पेशव्यांवर कसा काय नेऊ शकता बुवा!

हेमंत लाटकर Wed, 26/08/2015 - 22:50

In reply to by केतकी आकडे

भटभिक्षुकांनी त्याची फ्रिक्वेन्सी दुप्पट केली असणार! बारा महिन्यांचे ४८ आठवडे केले तसंच काहीतरी असावं.

याला उत्तर देण्यासाठी पेशव्यावर विषय गेला

राजेश घासकडवी Wed, 26/08/2015 - 23:21

In reply to by हेमंत लाटकर

मर्दुमकी गाजवणारे काही लोक भटांमध्ये होते तसे इंग्रजांमध्ये पण होते. पण म्हणून काही इतर इंग्रजांनी आपल्याला आठ टक्क्यांनी गंडवायचा प्रयत्न केला नाही असं नाही ना... तसंच, पौरोहित्य करणारे लोक 'अमुक व्रत करा, तमुक व्रत करा' असं सांगत असतीलच ना. त्यांना त्यात फायदाच आहे की. प्रत्येक व्रतात ब्राह्मणाला जेवायला घाला असं म्हटलेलंच असतं.

हेमंत लाटकर Thu, 27/08/2015 - 00:15

In reply to by राजेश घासकडवी

पौरोहित्य करणारे लोक 'अमुक व्रत करा, तमुक व्रत करा' असं सांगत असतीलच ना. त्यांना त्यात फायदाच आहे की. प्रत्येक व्रतात ब्राह्मणाला जेवायला घाला असं म्हटलेलंच असतं.

पण त्यांनी सांगितले तरी करणे न करणे आपल्या हातात आहे. येथे बाम्हणाला जेवायला घालणे म्हणजे मुंज झालेला मुंजा चालतो.

हेमंत लाटकर Thu, 27/08/2015 - 00:18

In reply to by राजेश घासकडवी

पौरोहित्य करणारे लोक 'अमुक व्रत करा, तमुक व्रत करा' असं सांगत असतीलच ना. त्यांना त्यात फायदाच आहे की. प्रत्येक व्रतात ब्राह्मणाला जेवायला घाला असं म्हटलेलंच असतं.

पण त्यांनी सांगितले तरी करणे न करणे आपल्या हातात आहे. येथे बाम्हणाला जेवायला घालणे म्हणजे मुंज झालेला मुलगा.

राजेश घासकडवी Thu, 27/08/2015 - 02:32

In reply to by हेमंत लाटकर

जाऊद्यात हो. इथे सीरियस कशाला व्हायचं? पण ब्राह्मणांचा पौरोहित्याचा धंदा हा पूर्णपणे त्यांनी सांगितलेल्या भाकडकथांवर लोक कितपत विश्वास ठेवून ती व्रतं करतात यावर होता. त्या प्रत्येक व्रतात ब्राह्मणाला अमुक भोजन द्या, तमुक दक्षिणा द्या वगैरे सांगून ठेवलेलं होतं. तुम्ही म्हणता तसे खरे तर सगळे लग्नाचे विधी, सत्यनारायण, गणपती-उत्सव वगैरेंमधले धार्मिक विधी काढून टाकले तर फार बरं होईल.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 27/08/2015 - 03:42

In reply to by राजेश घासकडवी

अहो, जाऊद्यात हो. त्यांनी मान्य केलंय ना खालच्या प्रतिसादात लग्नात विधीबिधी काही करू नये, लग्नच करू नये वगैरे लिहिलंय ना. किती त्याच त्याच गोष्टींचा कीस पाडत बसणार.

अनुप ढेरे Tue, 25/08/2015 - 00:16

In reply to by राजेश घासकडवी

प्रत्येक महिना हा अधिक नाही होत. फाल्गुन ते अश्विन हेच अधिक होतात बहुधा. सो दर तीन वर्षांनी येणारे अधिक हे ओळीने येत नाहीत. सो १८ वर्षातून एकदा असू शकेल.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 25/08/2015 - 00:24

In reply to by अनुप ढेरे

फाल्गुन ते अश्विन अधिक होतात तर ९*३ = २७ वर्षांनी एकदा असायला पाहिजे. त्यासाठी अधिक महिने ओळीने यायला पाहिजेत असंही नाही. यादृच्छिक आले तरीही सरासरी २७ वर्षांनंतर तोच महिना पुन्हा अधिक येईल.

महिना कोणता हे कसा ठरवतात - ज्या नक्षत्रात चंद्र पौर्णिमेला असतो त्या नक्षत्रावरून महिना कोणता हे ठरवतात. चित्रा नक्षत्र - चैत्र महिना, विशाखा - वैशाख, ज्येष्ठा - ज्येष्ठ... अधिक महिन्याचं नक्की काय गणित ते माहीत नाही, पण ज्या दोन नक्षत्रांच्या मध्ये चंद्र असेल त्यावरून ठरवत असतील, असा अंदाज. त्यात कार्तिक, मार्गशीर्ष, माघ हे महिने का गाळले जातात याचं खगोलीय कारण चटकन समजत नाहीये. धार्मिक, रूढींचं कारण आहे का?

अवांतराबद्दल क्षमस्व.

अनुप ढेरे Tue, 25/08/2015 - 00:45

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

घ्या, हे तुम्हाला माहिती नाही? वॉट यु?

http://www.aisiakshare.com/node/1136#comment-15128

माझीही ऐकीव माहिती होती. गुगल करता वरचा दुवा मिळाला.

अजून एका ठिकाणी

सरासरी ३२ महीने १६ दिवसांनी हा अधिक मास येतो. चैत्र ते अश्विन हे ७ महीने अधिक वेळा, तर फाल्गुन कधीतरी अधिक येऊ शकतो. पण पौष, माघ हे महीने कधीच अधिक येत नाहीत. ४ जानेवारीला सूर्य-पृथ्वी किमान अंतर असते. त्यामुळे या काळात सौरमास लहान असतो. त्यामुळे एका सौरमासात चांद्रमास पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या काळात येणारे पौष, माघ हे चांद्रमास अधिक येत नाहीत. ४ जुलै रोजी सूर्य-पृथ्वी अंतर कमाल असते. या काळात सौरमास मोठा असतो. त्यामुळे या काळात येणारे ज्येष्ठ, आषाढ़, श्रावण, भाद्रपद हे जास्त वेळा अधिक येतात.

प्रत्येकाची अधिक माहिन्याची टर्न झाली की मगच पुन्हा तो महिना अधिक असही नसावं.

अनुप ढेरे Tue, 25/08/2015 - 00:48

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अजून थोडं अवांतरः ८१ पूर्ण झाल्यावर सहस्रचंद्रदर्शन करतात. त्याचा हिशेब करताना देखील अधिक पकडतात आणि मग तो हिशेब बरोबर येतो हे नव्याने कळाले. ८१ वर्षात (८१*१२) + २७ अधिक इतके महिने = ९९९ चंद्र. मग फुडल्या पौर्णिमेला १०००वा चंद्र.

अपरिमेय Tue, 25/08/2015 - 00:59

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जर चांद्रमहिन्यात एकही संक्रांत नसेल तर तो महिना अधिक महिना म्हणून धरतात. जर दोन संक्रांती असतील तर त्या महिन्याचा लोप होतो (हे खूपच क्वचित होते). चांद्रमहिन्यात एकही संक्रांत नाही हे पॄथ्वी aphelion च्या जवळपास असतानाच होऊ शकते, (orbital angulr velocity कमी असल्याने), कार्तिक ते माघ पॄथ्वी perihelion च्या जवळपास असल्यामुळे त्या चांद्रमहिन्यात एकतरी संक्रांत होतेच.

अरविंद कोल्हटकर Tue, 25/08/2015 - 03:27

In reply to by अपरिमेय

सुमारे ३ वर्षांपूर्वी आनंद घारे ह्यांनी लिहिलेल्या 'अधिक मास' ह्या धाग्यावर अधिक मास ह्यावर बरीच चर्चा खगोलगणितीय अंगाने झाली होती.तेथे माझाहि प्रतिसाद होता. त्यामध्ये अधिकमासाचे गणित कसे असते आणि ते मास पावसाळ्यातच का येतात हे मला जमले तसे उलगडून दाखविले होते. तोच प्रतिसाद येथे पुनः चिकटवत आहे.


मन ह्यांच्या वरील प्रतिसादात लोकप्रभेच्या एका लेखाचा उल्लेख आहे. त्या लेखात पुढील वाक्य दिसले: "मार्गशीर्ष, पौष आणि माघ हे महिने कायम ३० दिवस अगर काही तास जास्त कालावधीचे असतात म्हणून ते कधीच अधिक मास नसतात."

ह्याचा अर्थ मला समजला नाही. पूर्वी मी कोठेतरी वाचल्याप्रमाणे हिवाळ्याचे महिने अधिक न होण्याचे कारण केपलरचा दुसरा नियम, Equal areas are swept in equal time, हे आहे.

विकिपीडियामधून घेतलेल्या वरील आकृतीप्रमाणे जानेवारी ३ ला पृथ्वी आपल्या लंबवर्तुळाकृति कक्षेमध्ये सूर्यापासून सर्वात कमी अंतरावर असते आणि जुलै ३ ला सर्वात अधिक. केपलरच्या दुसर्‍या नियमानुसार जानेवारी ३ च्या पुढेमागे पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गति सर्वात अधिक म्हणजे ३०.२९ किमी/से (१०९०४४ किमी/ता) असते कारण केपलरच्या नियमानुसार सारख्या वेळात सारखे क्षेत्रफळ राखण्यासाठी पृथ्वीला कक्षेचा अधिक लांबीचा चाप चालून जायचे असते. पृथ्वीची तीच गति त्याच कारणासाठी जुलै ३ च्या पुढेमागे २९.२९ किमी/से (१०५४४४ किमी/ता) इतकी असते. (पहा http://nssdc.gsfc.nasa.gov/planetary/factsheet/earthfact.html)

ह्याचा अर्थ असा की जानेवारी ३ च्या पुढेमागे पृथ्वीवरून सूर्याकडे पाहिले तर सूर्य अधिक वेगाने आणि कमी वेळात तारकामंडलाच्या पार्श्वभूमीवर हलतांना दिसेल आणि सरासरीपेक्षा कमी वेळात एक राशि पार करेल.

चन्द्राच्या पृथ्वीभोवतीच्या भ्रमणावर ह्याचा परिणाम न झाल्यामुळे सूर्याच्या राशीत चन्द्राने प्रवेश केला आणि तदनंतर अमावास्या होऊन पुढचा चान्द्रमास प्रारंभ झाला तर त्याच सूर्यराशीत तो चान्द्रमास संपण्याची शक्यता कमी होईल किंवा संपूर्ण नष्ट होईल. ह्याचाच अर्थ अधिक मास सुरू होणार नाही.

ह्यामुळे असे म्हणता येते की ३ जानेवारीच्या पुढचेमागचे चान्द्रमास - हिवाळ्याचे चान्द्रमास - अधिक मास होऊ शकत नाहीत किंवा तशी शक्यता कमी असते आणि जसजशी पृथ्वी जुलै ३ कडे सरकू लागते तसतशी अधिक मासांची शक्यता वाढते.
>>

नगरीनिरंजन Fri, 25/09/2015 - 08:06

In reply to by अरविंद कोल्हटकर

माझा थोडा गोंधळ झालाय.
वक्रीय गती समान असल्यास रेषीय गती त्रिज्येच्या प्रमाणात वाढते (v=wr). त्यामुळे ३ जुलैच्या आसपास पृथ्वीची रेषीय गती सर्वाधिक असायला हवी. काय चुकतंय माझं?
सूर्यसापेक्ष गती ३ जानेवारीच्या आसपास जास्त असणार हे मात्र बरोबर वाटतेय.

नितिन थत्ते Fri, 25/09/2015 - 09:09

In reply to by नगरीनिरंजन

मला वाटते रेषीय गती स्थिर असावी.

Earth sweeps equal area in equal time. त्यामुळे रेषीय आणि कोनीय गती दोन्ही बदलत असाव्यात.

अंतराआनंद Mon, 24/08/2015 - 23:23

पण गोड आवाजाचा आणि काळ्या रंगाचा असतो तो नर कोकिळ असतो. म्हणजे दाक्षायणिला लिंगबदलाचा (शाप का वर काय ते) सुद्धा दिला का शंकराने?