ही बातमी समजली का? - ९१
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
-------------------------------------------------------------------------------------------
पुण्यानी इथेही नंबर पटकवला आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/6-of-top-10-world-cities-…
हे खरे असेल तर काळजी करण्यासारखे आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/11-nuclear-scientists-die…
Poor net connection?सारखं
Poor net connection?
सारखं खूपदा सर्च करावं लागतं कारण कनेक्शन सारखं मरगळतं. :)
____
Indian cities leading in porn searches could be a tad misleading with many countries missing from the data. Cryptography expert Ajit Hatti, also a security researcher and co-founder of Null, India's largest open security community, said while the data is correct, it is not complete. "There are countries like China, Russia and North Korea that do not use Google or have extremely limited usage. Then in countries like United States and United Kingdom, many use different search engines," he said.
दादरी घटनेबद्दल चा आणखी एक अविचारी लेख.
The Norwegian prime minister did not simply leave it to citizens to choose the kind of society they wished to live in. He led by example and rallied the country behind him. Other cities followed the example set by Oslo.
----------------
घ्या. अकलेचे खंदक : भारतीयांनो तुम्ही आमच्यासारखे बनू नका. _____ पाकिस्तानी कवयित्री फहमिदा रियाज
यात अकलेचे खंदक म्हणण्यासारखं
यात अकलेचे खंदक म्हणण्यासारखं नक्की काय आहे गब्बर? आपल्याला एखाद्या विचारसरणीबद्दल प्रेम वाटतं, म्हणजे त्याविरोधातल्या गोष्टींना सरसकटपणे टाकून बोलण्यानं आपला मुद्दा सिद्ध होतो का? एका कागदोपत्री धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देशात एका माणसाला त्याच्या स्वैपाकघरात शिजलेल्या अन्नाबद्दल घेतलेल्या संशयाच्या नावाखाली दगडांनी ठेचून मारलं जातं, त्याबद्दल बातम्या देतानाही 'ते गोमांस होतं की नव्हतं' या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणारा सूर वापरला जातो, त्याबद्दल काही बोलायला शासन कमालीचा वेळ लावतं - हे आशादायी आहे का? हे नक्की कोणत्या विचारसरणीमधे क्षम्य, स्वागतार्ह, योग्य, दिलासादायक असू शकतं? आणि तसं एखाद्या/दीला न वाटल्यास, त्याबद्दलचं वैषम्य व्यक्त केल्यास, तसं करताना आपल्या स्वतःच्या अपयशाची कबुली दिल्यास (इथे या लेखात / कवितेत रियाजबाई पाकिस्तानचं समाज म्हणून अपयश नोंदताहेत असं माझं मत झालं, ते चुकीचं आहे का?) ते अकलेचा खंदक? तुमचं नक्की तर्कशास्त्र तरी काय आहे?
या घटना जितक्या त्रासदायक-भीतिदायक आहेत, त्याहून जास्त तुमच्यासारख्या सुबुद्ध-सभ्य-रसिक-दिलदार माणसानं त्यांचं एका विशिष्ट प्रकारे समर्थन करणं भीतिदायक आहे.
इथे या लेखात / कवितेत
इथे या लेखात / कवितेत रियाजबाई पाकिस्तानचं समाज म्हणून अपयश नोंदताहेत असं माझं मत झालं, ते चुकीचं आहे का?
ते चुकीचं नाही.
पाकिस्तान एक समाज म्हणूनच, एक देश म्हणून अपयशी आहे. पाकिस्तानचं अपयश हे अनेकांनी, अनेकविध पातळ्यांवर गेली अनेक वर्षे वृत्तांकित केलेलं आहे. मेरी अॅन विव्हर, ओवेन जोन्स, अहमद रशीद, स्टिफन कोहेन, रॉबर्ट कॅप्लन यासारख्या लोकांनी तसेच रोदाद खान यांच्यासारख्या नोकरशहांनी याबद्दल लिहिलेले आहे. मुख्य प्रश्न भारताचा पाकिस्तान होत आहे किंवा होईल हा नाहीच्चे. तो तसा कधीच नव्हता. या कवयित्रीला एक बातमी सापडली आणि तिने तिचा बतंगड बनवायला सुरुवात केली. तिच्यासाठी खरा प्रश्न पाकिस्तानचे अफगाणिस्तानायझेशन किंवा पॅलेस्टिनायझेशन रोखणे हा असायला हवा. व त्याकडे बाईंनी दुर्लक्ष केलेय.
जे झालंय ते हेट क्राईम आहेच. पण त्यात फक्त एक व्यक्ती मृत झाली. भारतात आजवर अनेक दहशतवादी हल्ले झाले व त्यातल्या बहुतांश हल्ल्यांत अनेक लोक मृत व जखमी/कायमचे विकलांग झाले. जवळपास प्रत्येक दहशतवादी हल्ला हा सुद्धा हेट क्राईमच असतो. भारतात झालेल्या बहुतांश दहशतवादी हल्ल्यांमागे धर्म हे महत्वाचे मोटिव्ह होते. त्यामुळे ही घटना काही फार भिन्न आहे असेही नाही.
------
त्याबद्दल काही बोलायला शासन कमालीचा वेळ लावतं
असत्य.
अखिलेश यादव यांनी ताबडतोब विचार-उच्चार-आचार यांची शृंखला सुरु केली. व हे इष्टच आहे.
केवळ मोदींनी भाष्य केलेले नाही म्हणून लोकांना हे असले कवित्व सुचत आहे. (शेवटी काल मोदींनी भाष्य केले ह्यावर सुद्धा बोलता येईल.). प्रणब मुखर्जींनी सुद्धा आपल्या सिव्हिलायझेशनल व्हॅल्युज खतरेमे आहेत अशी चक्क थाप मारली. भारतात २०+ भाषा, ५०+ डायलेक्ट्स, १०+ क्युसिन्स, ४+ धर्म, ४ नृत्याची स्कूल्स, किमान २ संगीताची स्कूल्स, ५०+ जाती, एक करोड पेक्षा जास्त देवीदेवता, किमान चार पाच प्रकारचे पेहेराव आहेत. ह्या सगळ्या गोष्टींमधे (सॉलिड भिन्नता असूनही) कसलीही मारामारी, युद्धं, दंगली होत नाहीत. रोज नाही, आठवड्यातून एकदा नाही, महिन्यातून एकदा नाही, वर्षातून एकदा नाही, दशकातून एकदा - हो. त्यामुळं प्लुरॅलिझम ला खतरा, सहिष्णुतेस धोका वगैरे सगळा बकवास आहे. शुद्ध थापा आहेत.
------
आता मी त्यांना अकलेचे खंदक का म्हणालो ते सांगतो - उत्तर अतिसोपे आहे - ही एक वन ऑफ घटना होती व यापेक्षा जास्त चिंता व्यक्त करण्यासारख्या घटना त्या होत्या की ज्यांमधे भारतीय नागरिक असलेल्या इस्लामिक दहशतवाद्यांनी घाऊक प्रमाणावर बाँबहल्ले केले व अनेक माणसं मारली. अनेक माणसे मारली जाणे हे जास्त सिरियस की एक माणूस मारला जाणे हे जास्त सिरियस ?? ( पुनश्च दहशतवादी हल्ले व दादरीतील हा हल्ला दोघेही हेट क्राईम आहेत, दोघांच्याही मागे धर्म हे मोटिव्ह आहे. ).
तुम्ही या मागचे तर्कशास्त्र विचारलेत पण प्रश्न विचारताना प्रश्नाचे अतिसोपे उत्तर तुमच्यासमोर नव्हते का ?? की केवळ तुम्हाला त्या कवयित्रीचे म्हणणे छानछान वाटले म्हणून तुम्ही प्रश्नाचा रोख बदललात ??
-------
आता तुम्ही असे म्हणाल की - ही घटना वन ऑफ असली तरी ती एका भावी गंभीर व व्यापक ट्रेंड ची सुरुवात असू शकते.
सगळ्याच घटनांचं गांभीर्य
सगळ्याच घटनांचं गांभीर्य आकड्यांत मोजता येत नाही. बरेचदा अशा प्रकारच्या घटनांमधून समाजमनाचा कल दिसत असतो / दिसायला सुरुवात होत असते / त्याच्या झुकण्यावर काहीएक परिणाम होत असतो. अशा घटनांपैकी ती एक घटना आहे असं मला वाटतं.
मी एक धर्मनिरपेक्षता मानणारी आणि सध्याच्या फ्याशनप्रमाणे मुस्लिमप्रेमी-स्युडोसेक्युलर व्यक्ती आहे म्हणून मला ती घटना इतकी महत्त्वाची आहे असं कुणी म्हणेल. पण तसं नाहीय. मी स्वतःला स्वतंत्र व्यक्ती मानते. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय करावं, काय खावं-प्यावं-ल्यावं, कुणासोबत झोपावं वा न झोपावं याबद्दलचे निर्णय माझ्यावर मी सोडून इतर कुणीही लादणं मला भयानक गुदमरवणारं वाटतं. साधी टिकली लावणं वा न लावणं आणि त्याबद्दलची कुटुंबातल्या काही व्यक्तींची नाराजी या विषयावरून मी प्रचंड मोठे वाद घातले आहेत आणि मनःस्वास्थ्याची किंमत मोजून माझं स्वातंत्र्य टिकवण्याचा कळतेपणापासून प्रयत्न केला आहे. अशा मला - घरात बीफ शिजवल्याबद्दल - उद्या कुणी येऊन मारझोड केली तर, अशी भयचकित करणारी शंका येते. कायदे मोडू नयेत हे सत्यच. पण अशा प्रकारचा व्यक्तिगत आयुष्यावर बंधनं आणणारा कायदा मुळात या देशात यावाच का? त्याचा कुणी कोणत्या धर्मावरचा राग काढण्यासाठी, आपलं संख्याबळ दाखवण्यासाठी, राजकीय फायद्यांसाठी, कोणत्या थराला जाऊन, लोकभावनेचा फायदा घेऊन वापर करावा - हे तर पुढचं झालं. पण ते सगळं आत्ता बाजूला ठेवलं, तरी अशा प्रकारचं काहीतरी या देशात घडतं ही माझ्यासाठी कमालीची हादरवणारी गोष्ट आहे. त्याबद्दल आपसांत बोलताना परधर्मीय व्यक्तीशी लग्न केलेले आणि परदेशात स्थायिक असलेले, काहीही खाणारे पिणारे माझे जवळचे मित्र हादरून गेलेले दिसतात. या देशात परत येण्याबद्दल त्यांना शंका येते, निराधार वाटतं. आणि तरीही - या गोष्टीबद्दल माझ्या आजूबाजूच्या सर्वसामान्य वाटणार्या कित्येकांना फारसं काहीच वाटत नाही - यानं मला एकटं, व्याकुळ, निराधार वाटतं.
ही अशी एकच घटना नाही. मांस विकण्यावर बंदी घालणं आहे. पॉर्न पाहण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न आहे. काही संस्था संपवण्याचा प्रयत्न करणं आहे.... अशा घटनांची माळच्या माळ आहे. तिच्यातून काही कल स्पष्ट होत जाताहेत. आणि धर्म गेला खड्ड्यात, पण व्यक्ती म्हणून माझं जगणं, गुदमरत चाललं आहे. या भावनेशी सहानुभूत होणारी भावना मला त्या कवितेत दिसते. एकमेकांच्या वैविध्यासकट एकमेकांना जगू देणारे प्रदेश कमी होत चालले आहेत, जगाच्या पाठीवरूनच अस्तंगत होत चालले आहेत, त्यांच्या निव्वळ 'असण्या'तून मिळणारा आधार आता संपत चालला आहे, म्हणून कवी जमातीला येणारी व्याकुळता मला त्यात दिसते, एक प्रकारचं द्रष्टेपण-इशारा दिसतो.
तुम्ही बॉम्बस्फोटांबद्दल बोलताहात. पण ते हल्ले निदान बाहेरच्या कुणीतरी केलेले होते. काही परकीय शक्तींचा हात त्यामागे होता. इथे या घटनेत माझे शेजारीच माझ्या जिवावर उठण्याची शक्यता घेऊन बसलेले मला दिसतात. हे 'बातमी का बतंगड' अशा नावाखाली कसं काय ढकलणार? हे माझ्यासाठी अधिक गंभीर, निराशाजनक आणि भीतिदायक, उंबर्याशी येऊन ठेपलेलं आहे.
सॉरी गब्बर, तुम्ही कितीही आकडेवारी फेकलीत, तरी मला दिसणारे हे बदलते कल - ट्रेण्ड्स मला दिसत राहतातच आणि त्यावर मी तर्कानं मात नाही करू शकत. एकच व्यक्ती (हा!) मारली गेलेली असली, तरी ही उद्याच्या भीतिभारित दिवसांची नांदी आहे - मी आजवर गृहीत धरलेलं आजूबाजूचं सहिष्णू वास्तव बदलल्याची संपल्याची खूण तिच्यात आहे आणि त्यामुळे ती घटना एखाद्या जगड्व्याळ बॉम्बस्फोटाइतकीच महत्त्वाची आहे असं मला वाटतं.
सॉरी गब्बर, तुम्ही कितीही
सॉरी गब्बर, तुम्ही कितीही आकडेवारी फेकलीत, तरी मला दिसणारे हे बदलते कल - ट्रेण्ड्स मला दिसत राहतातच आणि त्यावर मी तर्कानं मात नाही करू शकत. एकच व्यक्ती (हा!) मारली गेलेली असली, तरी ही उद्याच्या भीतिभारित दिवसांची नांदी आहे - मी आजवर गृहीत धरलेलं आजूबाजूचं सहिष्णू वास्तव बदलल्याची संपल्याची खूण तिच्यात आहे आणि त्यामुळे ती घटना एखाद्या जगड्व्याळ बॉम्बस्फोटाइतकीच महत्त्वाची आहे असं मला वाटतं.
तुम्ही कितीही मोठे संवेदनप्रचूर प्यारे लिहिलेत तरीही या अशा घटना - तुम्ही म्हंटल्याप्रमाणे - उद्याच्या भीतिभारित दिवसांची नांदी आहे - असे मला अजिबात वाटत नाही. (याचे कारण मी आधीच दिलेले आहे.)
व तर्काने मात करू शकत नाही हे तर तुमचे नुसते नावापुरते फेकलेले वाक्य आहे. या वाक्याच्या आधीची व नंतरची तुमची सर्व वाक्ये ही तर्क या संकल्पनेची थेट अॅप्लिकेशन्स आहेत. तुम्हाला फक्त तुमच्या प्रतिवाद्याने दिलेला तर्क फिजूल वाटत असावा. ट्रेंड चे च म्हणाल तर ट्रेंड हे (१००% नसले तरी) बहुतांश प्रमाणावर तर्काधिष्ठितच असतात.
माझी संवेदना एक जाऊ द्या
माझी संवेदना एक जाऊ द्या उडत!
मला एक सांगा, एरवी व्यक्तीच्या आयुष्यात सरकारने दखलअंदाजी करू नये म्हणून आकाशपाताळ एक करणारे तुम्ही. तुम्हांला समाजाने एका व्यक्तीला आपल्या काही समजुतींच्या आधारे, एका कृतीच्या संशयाबद्दल, थेट जिवे मारावं - हे आक्षेपार्ह वाटत नाही? की हे तुमच्या सोईच्या धर्मविषयक गणितांना साजेसं आहे म्हणून?
माझ्या डोक्याला
माझ्या डोक्याला गब्बरतर्कानुसार दिसलेली कारणपरंपरा:
दादरीच्या घटनेवरून वातावरण बदललं हे सिद्ध होत नाही / ते बदललंय, पण बाईंनी त्यात नाक खुपसू नये, त्यांनी पाकिस्तानातले हिंदू जपावेत / ते बदलंलय, पण लाडावलेल्या लोकांना बरी दहशत बसलीय..
->
भारतातलं वातावरण बदललेलंच नाही / ते बदललं तरी बाईंचा काय संबंध / ते असं बदलतंय ते बरंच आहे, व्यथेचं कारण नाही. ->
->
तरी बाई भारतातल्या बदललेल्या वातावरणाबद्दल आणि पाकिस्तानातल्या समाजाच्या अपयशाबद्दल व्यथित आहेत. परिणामी -
->
बाई अकलेचा खंदक आहेत.
एक तर मला वाटतं गब्बर ही
एक तर मला वाटतं गब्बर ही कविता आता/सध्या लिहीली आहे असे मानून चालले असावेत असे मला वाटते. मूळ मुद्दा हाच आहे की ती कविता १९९६ ची आहे, फ्युचरीस्टिक आहे तेव्हा त्या बाई आता दादरीमुळे नाक खुपसताहेत असे वाटून घेण्याची (गब्बर) यांना आवश्यकता नाही. आणि याच मुद्द्यामुळे मग तेव्हा का नाही बोलल्या जेव्हा बॉम्ब पडले वगैरे अर्ग्युमेन्ट्स फोल आहेत.
मला एक सांगा, एरवी
मला एक सांगा, एरवी व्यक्तीच्या आयुष्यात सरकारने दखलअंदाजी करू नये म्हणून आकाशपाताळ एक करणारे तुम्ही.
एरवी व्यक्तीच्या आयुष्यात सरकारने दखलअंदाजी करू नये म्हणून आकाशपाताळ एक करणारा मी - एकदम मान्य.
तुम्हांला समाजाने एका व्यक्तीला आपल्या काही समजुतींच्या आधारे, एका कृतीच्या संशयाबद्दल, थेट जिवे मारावं - हे आक्षेपार्ह वाटत नाही?
ते आक्षेपार्ह आहेच व राज्यसरकारने त्यावर विचार-उक्ती-व-आचार हे तिनही केलेले आहे. व ते इष्टच आहे असे मी म्हणालो.
----
की हे तुमच्या सोईच्या धर्मविषयक गणितांना साजेसं आहे म्हणून?
हां आता तुम्ही नेमक्या विषयास हात घातलात. पण मी हे आधीच मान्य केलेले आहे की ह्या हल्ल्यात धर्म हा मुख्य मोटिव्ह होता.
प्रथम हे सांगा की अखिलेश यादव सरकारने केलेली कारवाई आवश्यक होती आणि पुरेशी होती हे तुम्हाला मान्य आहे ? मोदींनी यावर भाष्य करायलाच हवे होते असं तुम्हाला म्हणायचं आहे ? व तसे असल्यास कोणत्या आधारावर ??
माझं म्हणणं पुन्हा एकदा मांडतो - दादरीत घडलेली घटना हा हेट क्राईम आहे. आक्षेपार्ह आहे. पण राष्ट्रपति म्हणतात त्याप्रमाणे हा भारताच्या सिव्हिलायझेशनल व्हॅल्युज ना खतरा वगैरे बिल्कुल नाही. केवळ मोदींनी यावर भाष्य करायला हवे या अपेक्षेपायी मुखर्जी व तुम्ही राई चा पहाड करीत आहात (उदा. तुमचे हे वाक्य - उद्याच्या भीतिभारित दिवसांची नांदी आहे). हा हल्ला राज्यसरकारच्या अखत्यारीत येतो. व यावर राज्यसरकारने ताबडतोब पावले उचललेली आहेत. व ते इष्टच आहे. पण ह्या हल्ल्यात फक्त एक जण मृत झालेला असल्यामुळे व हल्ल्यानंतर राज्यसरकारने तातडीने पावले उचललेली असल्यामुळे - पंतप्रधानांनी भाष्य करावे इतकी महत्वाची घटना नाही. धर्माधारित हेट क्राईम च्या ह्यापेक्षाही प्रचंड मोठ्या घटना घडेल्या असूनही त्यांमुळे आपले सिव्हिलायझेशन खतरेमे आलेले नाही व नव्हते.
व तुमच्या प्रमुख प्रश्नाचे उत्तर मी आधीच दिलेले आहे.
बाँबहल्ले करणे हेट क्राईम
बाँबहल्ले करणे हेट क्राईम असला तरी त्यामागे एक पद्धतशीर यंत्रणा असते आणि कोणाच्यातरी फायद्यासाठी विचारपूर्वक योजना आखून, लष्करी पद्धतीने हल्ला केला जातो आणि प्रत्यक्ष हल्ला करणार्याचेही ब्रेनवॉशिंग करायला विशेष आणि जवळ-जवळ सायंटिफिक प्रयत्न केले जातात. असे बाँबहल्ले आधुनिक युद्धनीतीचा भाग आहेत. शिवाय बाँबहल्ले करणारे अंगावर बाँब लावून आपल्याच गावात, आपल्याच शेजार्याच्या घरात जात नाहीत.
याउलट स्वतःच्याच गावातल्या लोकांनी दगड-विटांनी ठेचणे हा इतकी पूर्वतयारी केलेला हेट-क्राईम नाहीय. किंबहुना इतकी पूर्वतयारी न करावे लागणारे हेट-क्राईम व्हायला लागणे हे कोणीतरी बाहेरून लष्करी पद्धतीने हल्ला करण्यापेक्षा जास्त गंभीर आहे; कारण अशा सामान्य माणसांच्या हेट-क्राईममध्ये सिव्हिल-वॉरची बीजे असतात. जेव्हा नैसर्गिक संकट येते तेव्हा मग सीरियासारखी स्थिती होते. मिल्टन फ्रीडमनचे सुप्रसिद्ध वाक्य आहेच की जे विचार तुम्ही संपन्नतेच्या/शांततेच्या काळात पेराल ते संकटाच्या काळात फोफावून येतात आणि तेच होणार आहे.
हे आणि 'ते'
रियाजबाई 'ह्या'च मुद्द्यावर का बोलल्या. 'त्या' सर्व मुद्द्यांवर का नाही? 'तिथे' त्यांची वाचा बसते का?
अरे हे तर आपलं आवडतं आर्ग्युमेंट.
बोलल्याही असतील की. आपल्यासंबंधी बातमी होती म्हणून इथे पोचली.
आणि भारतासारख्या देशात असं घडलंय हे महत्त्वाचंच वाटलं असणार त्यांना. अख्ख्या तिसर्या जगातले लिबरल फ्रिंज ग्रूप्स आदर्शासाठी भारताकडे डोळे लावून असतात. तिथे पहा सगळे कसे गुण्यागोविंदाने राहातात, द्वेष नाही, त्वेष नाही, ठेचणे-मारणे-जाळणे नाही, अश्या समजात असतात बिच्चारे!
रियाजबाई 'ह्या'च मुद्द्यावर
रियाजबाई 'ह्या'च मुद्द्यावर का बोलल्या. 'त्या' सर्व मुद्द्यांवर का नाही? 'तिथे' त्यांची वाचा बसते का?
अरे हे तर आपलं आवडतं आर्ग्युमेंट.
बोलल्याही असतील की. आपल्यासंबंधी बातमी होती म्हणून इथे पोचली.
२००९ च्या हल्ल्याबाबत बोलल्या ?? तो हल्ला आपल्या संबंधितच होता की.
तेव्हा वि. आता या तुम्ही
तेव्हा वि. आता या तुम्ही मांडलेल्या द्वंद्वाच्या छायेत अतिगंभीर वि. अतिकमी-गंभीर हे सरळ निर्णयन झाकोळून जात आहे. त्याकडे तुमचे लक्ष वेधू इच्छितो.
यदि दुर्योधन सभ्यताके सारे नियमोंका उल्लंघन करे तो वो ठीक. परंतु यदि भीम किसी नियम का उल्लंघन करे तो उसको मृत्युदंड ? क्या मर्यादाए भी पक्षपात करती है ? ( तुम्ही योगेश्वराचे नाव घेतलेत तेव्हा त्यांनी हलधर बलरामास विचारलेला प्रश्न तुमच्या समोर मांडत आहे. प्रसंग - दुर्योधन व भीम यांचे अंतिम युद्ध झाले त्याच्या अंतिम क्षणास बलराम संतापलेला असतो ते या साठी की भीमाने दुर्योधनास गदेने कमरे खाली वार केला व ते गदायुद्धाच्या नियमाविरुद्ध आहे.)
डोळे उघडा
या कवयित्रीला एक बातमी सापडली आणि तिने तिचा बतंगड बनवायला सुरुवात केली. तिच्यासाठी खरा प्रश्न पाकिस्तानचे अफगाणिस्तानायझेशन किंवा पॅलेस्टिनायझेशन रोखणे हा असायला हवा. व त्याकडे बाईंनी दुर्लक्ष केलेय.
उगाच रडारड. किमान विकीपिडीया तरी पाहत चला.
तुम बिलकूल हम जैसे निकले मध्ये पाकिस्तानातील दुर्दशेकडेही निर्देश आहे. पण तो तुमच्यासाठी फारच 'सटल' ठरलेला दिसतो. असो.
च्यायला, उद्या कोणी अमेरिकन आम्हाला म्हणायचा; तुमच्या देशात लोकांना ठेचून मारले जाते, तिकडे पहा. आमच्या देशातील 'गन व्हायलंसच्या' बातम्यांचा बतंगड बनवू नका म्हणून!
ती कविता
तुम बिलकुल हम जैसे निकले अब तक कहाँ छुपे थे भाई
वो मूर्खता वो घामड़पन जिसमे हमने सदी गंवाई
आखिर पहुंची द्धार तुम्हारे अरे बधाई बहुत बधाई
प्रेत धरम का नाच रहा है कायम हिन्दू राज करोगे?
सारे उलटे काज करोगे अपना चमन दराज़ करोगे
तुम भी बैठे करोगे सोंचा पूरी है वैसी तैयारी
कौन है हिन्दू कौन नहीं है तुम भी करोगे फतवे जारी
होगा कठिन यहाँ भी जीना रातों आ जायेगा पसीना
जैसी तैसी कटा करेगी यहां भी सबकी साँस घुटेगी
कल दुःख से सोंचा करती थी सोंच के बहुत हँसी आज आई
तुम बिलकुल हम जैसे निकले हम दो क़ौम नहीं थे भाई !
भाड़ में जाए शिक्षा-विक्षा अब जाहिलपन के गुण गाना
आगे गड्ढा है ये मत देखो वापस लाओ गया ज़माना
बश्ट (practice) करो तुम आ जायेगा उलटे पाँव चलते जाना
ध्यान न मन में दूजा आये बस पीछे ही नज़र जमाना
एक जाप सा करते जाओ बारम-बार यही दोहराओ
कितना वीर महान था भारत कैसा आलिशान था भारत
फिर तुमलोग पहुँच जाओगे बस परलोक पहुँच जाओगे
हम तो हैं पहले से वहाँ पर तुम भी समयनिकालते रहना
अब जिस नरक में जाओ वहाँ से चिट्ठी-विट्ठी डालते रहना
बाकी काही म्हणा गब्बर शेठ,
बाकी काही म्हणा गब्बर शेठ, पॉलिटिक्स इज गेम ऑफ पर्सेप्शन्स
आणि मोदी अश्या प्रकरणावर मुग गिळून गप्प बसतात हे पर्सेप्शन आहे, आणि ते त्यांच्या अॅक्शनने दृढही होते आहे. (व ते पर्सेप्शन त्यांना त्यांच्या मतदारांपैकी गब्बरसारखा एक सायझेबल भाग सांभाळायला आवश्यकही आहे).
तुम्ही व तुमच्यासारख्यांनी कितीही किल्ला लढवलात तरी अश्या पाथिराख्यांचे बळ कमी पडलेच आणि ते बळ पुरेसेही नाह- तसेच विरोधकांनी योग्य त्या प्रमाणात रान माजवून त्यांच्याकडून (फारसे थेट नसले तरी) घटनेविरोधात चार शब्द बोलून; खरंतर वदवून घेतलेच, ही विरोधकांनी चहूबाजुंनी उठवलेल्या आवाजाने मोदींना व त्याहीपेक्षा अधिक तुमच्यासार्ख्या भक्तांना धोबीपछाड दिल्याची खूण आहे! बिच्चारे मोदीसमर्थक त्यांच्या शेवटी जुलमाच्या का होईला दिलेल्या वक्तव्याने तोंडावर आपटले! त्याहून गंमत आपला नेता कोणासमोर -विशेषतं असल्या सिक्युलरांसमोर - अजिब्बात झुकत नाही अश्या भक्तांच्या समजाच्याही चिंधड्या उडाल्या!!
जेव्हा इतक्या महत्त्वाच्या घटनांवर जेव्हा जेव्हा मोदी मौनात जातील (नी भारतातील बदललेले वातावरण बघता अशा घटन होणे फार दुर्मिळ वाटत नाही) तेव्हा तेव्हा विरोधकांनी असा आवाज केला व मोदींना दरवेळी नरमाईची भुमिका घेण्यास भाग पाडले तर लवकरच तो सायझेबल भागही गळून पडेल व त्यांची अवस्था "ना घर का ना घाटका" होईल-- याचे मोदींचे सद्य हे वक्तव्य पहिले चिन्ह मानावे का? का जमिन अधिग्रहणाच्या पराभवाने मोदींच्या पिछेहाटिची नांदी सुरू झाली? का ओबामांना बराक बराक करूनही त्यांनी यांना मि. प्राईममिनिस्टर संबोधले तेव्हाच? ;)
तुम्ही व तुमच्यासारख्यांनी
तुम्ही व तुमच्यासारख्यांनी कितीही किल्ला लढवलात तरी अश्या पाथिराख्यांचे बळ कमी पडलेच आणि ते बळ पुरेसेही नाह- तसेच विरोधकांनी योग्य त्या प्रमाणात रान माजवून त्यांच्याकडून (फारसे थेट नसले तरी) घटनेविरोधात चार शब्द बोलून; खरंतर वदवून घेतलेच, ही विरोधकांनी चहूबाजुंनी उठवलेल्या आवाजाने मोदींना व त्याहीपेक्षा अधिक तुमच्यासार्ख्या भक्तांना धोबीपछाड दिल्याची खूण आहे! बिच्चारे मोदीसमर्थक त्यांच्या शेवटी जुलमाच्या का होईला दिलेल्या वक्तव्याने तोंडावर आपटले! त्याहून गंमत आपला नेता कोणासमोर -विशेषतं असल्या सिक्युलरांसमोर - अजिब्बात झुकत नाही अश्या भक्तांच्या समजाच्याही चिंधड्या उडाल्या!!
हे पटले. एकदम पटले.
माझी अशी अपेक्षा होती की मोदी या सगळ्यांची नाकं जमीनीवर रगडतील. सेक्युलरिझम हा राजकीय अर्हतेचा सर्वात महत्वाचा क्रायटेरिया जो बनून राहिला आहे - तो बकवास बंद करतील. पण मोदींनी निराशा केली.
ते झुकले आहेत असे मला वाटत
ते झुकले आहेत असे मला वाटत नाही. त्यांचे वक्तव्य पुरेसे संदिग्ध आहे.
त्यांनी दादरी घटनेवर थेट भाष्य न करता "हिंदूंनो तुम्ही ठरवा की तुम्हाला मुसलमानांशी लढायचं आहे की गरीबीशी....". वरवर पाहता हे विकासोत्सुकांना आवडेल असे विधान आहे. पण त्याचा दुसरा अर्थ असा आहे की "मी यात लक्ष घालणार नाहीये. जर असल्या घटना घडत राहिल्या तर तो त्या लोकांचा प्रश्न आहे". हा अर्थ दंगेखोरांना हुरूप आणणारा आहे. [दंगेखोर मुसलमानांना ठोकतील आणि मोदी तिकडे काणाडोळा करतील या अपेक्षेने मते दिलेल्यांना (पण वरवर विकासाचे नाव घेणार्यांना) आनंदित करणारे विधान आहे].
थत्तेचाचांशी बराचसा सहमत.
थत्तेचाचांशी बराचसा सहमत.
मला हे आवडले असते जर मोदींनी दादरी च्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा स्वच्छ भारत, एफ्डीआय वगैरे विषयावर भाष्य केले असते तर. मोदींनी या विषयावर मुद्दाम काणाडोळा करायला हवा होता. मोदींनी यावर भाष्य करण्यामुळे असा पायंडा पडतो की राज्यसरकारला कर्तव्य असले व अधिकार असले तरी व केंद्रसरकारची जबाबदारी अतिमर्यादित किंवा नाममात्र असली तरी पंतप्रधानांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे. असा पायंडा चूक आहे.
ह्यात फक्त एक माणूस मेला. यात इतका गहजब करण्यासारखे काय होते ?? बकवास नुसता.
सेक्युलर गँग ची सगळ्यात मोठी समस्या हीच आहे की यात एक मुसलमान मेला. बस्स. बाकी काही नाही. यात एक हिंदू मेला असता तरी सेक्युलर गँग इतकी आग-बबूला झाली नसती.
( किमान आता तरी माझ्यावर आरोप करा. प्लीज. )
ज्या नात्याने २जी मध्ये
ज्या नात्याने २जी मध्ये मनमोहनसिंगाची जबाबदारी असते त्या नात्याने.
------------------
ऑन अ सिरिअस नोट. सध्याचे केंंद्रसरकार अॅलेजेडली मोदी या व्यक्तीला केंद्रस्थानी धरून बनवले गेले आहे असे म्हणतात. मोदी या व्यक्तीवर विश्वास ठेवून जनतेने मते दिली वगैरे.
नेमकं
"वरवर पाहता हे विकासोत्सुकांना आवडेल असे विधान आहे. पण त्याचा दुसरा अर्थ ...दंगेखोरांना हुरूप आणणारा आहे."
नेमकं विश्लेषण. विकासासाठी पाठीमागे असलेला वर्ग आणि पारंपारीक वर्ग अशा दोन्ही वर्गाला एकाच वेळी सांभाळून घेणारं वक्तव्य आहे आणि एका मुरब्बी राजकारण्याला साजेसेच आहे. असेच काहीसे मिहीर शर्माचेही मत आहे.
Mihir S Sharma: The consistent prime minister
If Modi was really willing to act on inter-faith harmony, he would have fired Mahesh Sharma, his culture minister, who said the lynching was an “accident”, a “reaction”, and praised the mob for not raping Mohammed Akhlaq’s 17-year-old daughter. If Modi actually meant to act to reduce communal tension in order to fight poverty, he would have named and disciplined his legislator Sangeet Som
let us never accuse Modi of a lack of consistency: the Modi of 2015 is not very different from the Modi of 2002.
रियाझ या स्वतः कवयित्री आहेत,
रियाझ या स्वतः कवयित्री आहेत, त्यांच्या भावना इन्टेन्स असू शकतात व त्या मांडण्याची कलाही त्यांना साध्य आहे हे दिसतेच आहे. पोएम-हंटरवरच्या त्यांच्या कविता फेमिनिझम वरच्या वाटल्या. ओळख दिली आहे त्यात तरी त्या फेमिनिस्ट कवियत्री आहेत असे लिहीले आहे.
.
ही कविता, १९९६ मध्ये लिहीलेली दिसते. त्यामुळे, फ्युचरिस्टिक वाटली मला.
.
आवडली. पण एक पिस ऑफ आर्ट यापलिकडे (मन रिझवणारी गोष्ट) ही कविता काही साध्य करेलसं वाटत नाही. याचं कारण एवढच की या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना भावनेचा टोकदारपणा कळत नाही. लातोंके भूत ...टाइप. आपण मारे कविता वाचून व्यथित होऊ पण आपल्या व्यथित होण्याने काय फरक पडतो? आपण तर ऑलरेडी , रेषेच्या अलिकडे आहोत.
जशा? हे प्युअर अॅकॅडेमिक
जशा? हे प्युअर अॅकॅडेमिक इन्टरेस्टपायी विचारते आहे. तर तू म्हणशील पोवाडे. पण पोवाडे हे जुन्या काळचे झाले जेव्हा फक्त गिनेचुने कविता/पोवाडे/संगीत लोकांच्या कानावर आदळे आणि त्यामुळेच त्याचा प्रभाव जाणवे. जेव्हा लोकांचा एकमेकांशी संपर्क फार कमी होता. आता मास कम्युनिकेशनच्या साधनांनी जग इतकं घट्ट एकत्र विणलं गेलय की कविता/पोवाडे यांद्वारा क्रांती होणं दुरापास्तच वाटतय.
.
कविता फार टोकदार आहे पण अन्य कवितांच्या गर्दीत ती हरवणार आहे.
माझ्याकरता हे फार रोचक दुवे
माझ्याकरता हे फार रोचक दुवे आहेत. मात्र १ आणि ४ हा पॉइन्ट सिद्ध करत नसावेत असे मला नजरेखालून घातल्यावर वाटले. सर्वच दुवे, नीट वाचेन.
मला दुवे आवडतात. आपल्या तोडक्यामोडक्या भाषेत, बरेच मुद्दे गाळत सांगण्याचे परत वेळखाऊ काम करण्यापेक्षा दुवे द्यावेत. ज्याला रस आहे तो किती का मोठे वा क्लिष्ट दुवे असेनात ओढला जातो.
____
पहील्या दुव्यातील Sarita Callender- She is a survivor of international human trafficking, यांची कविता विषण्ण करते. त्यांची कहाणी भयंकरच आहे.
____
दुवा - ३ -
People who talk about poetry's social utility often concentrate on content. They think, perhaps, that poetry Tells the Truth, or Provides Solace. These notions make me queasy, and are treason to poetry. If you're crawling to poems on your hands and knees, as I once heard a famous poet remark—in my view, you're not crawling to poetry. Prozac would probably work better.
.
Poetry's social function comes not from what it means but from what it is. Its utility is to shake us out of our standard American buy-stuff-and-watch-TV half life. A poem's content matters very little to that utility.
ऑह माय गॉड!!! सुंदर... अप्रतिम विचार.
___
सर्वच दुवे आवडले. दुवा ३ तर इतका संपृक्त आहे. नंतर वाचते.
I think poetry ought to be taught not as an engine of meaning but as an opportunity to learn to live in doubt and uncertainty, as a means of claiming indeterminancy. Our species is deeply defined by its great surges of reason, but I think it high time we return to elemental awe and wonder. Such a position is necessary to our communal health.
आहाहा! क्या बात है!
सरोजिनी के कपडे...
>> आता मास कम्युनिकेशनच्या साधनांनी जग इतकं घट्ट एकत्र विणलं गेलय की कविता/पोवाडे यांद्वारा क्रांती होणं दुरापास्तच वाटतय.
.
कविता फार टोकदार आहे पण अन्य कवितांच्या गर्दीत ती हरवणार आहे.
ह्या टोकदार कवितेमुळे एकविसाव्या शतकात भारतात क्रांती झालीए - त्या क्रांतीचं नाव... आलिया भट्ट!
एन्जॉय सॅटर्डे...
हिंदी बी बी सी आहे हे माहीतच
हिंदी बी बी सी आहे हे माहीतच नव्हतं - http://www.bbc.com/hindi
Soviet players didn’t want to
Soviet players didn’t want to cheat, they were ordered to: Viswanathan Anand
--------------------------
Dare you to eat pork in Saudi Arabia: VHP
याला म्हणतात world-class nonsense.
LUCKNOW: Throwing a challenge to writers who are returning their awards, VHP national spokesman Surendra Jain on Sunday asked if they would go to Saudi Arabia and ask for pork there. "If they do so and return alive, I myself would welcome them, else they should stop being hypocrites," said Jain, who is in the city for a two-day meet of Vishwa Hindu Parishad.
Are you nuts ?
का करतात लोक असे.. वर पाहता
का करतात लोक असे.. वर पाहता काही problem दिसत नाही. Both software engineer.
http://m.timesofindia.com/city/pune/Pune-techie-suicide-Husbands-cries-…
सुधींद्र कुलकर्णींवर शाई फेकली
सुधींद्र कुलकर्णींवर शाई फेकली
पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केल्याच्या निषेधार्थ ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचे माजी राजकीय सल्लागार आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे प्रमुख सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकण्यात आली. कुलकर्णींच्या घराजवळच ही घटना घडली. शिवसैनिकांनीच ही शाईफेक केली, असा आरोप सुधींद्र कुलकर्णी यांनी केला.
गब्बर - २०२० साली जर मोदीच
गब्बर - २०२० साली जर मोदीच पंप्र असतील तर मेंढ्याचे कातडे पांघरलेले लाखो कोल्हे दिसतील. त्यात सध्याचे सेक्युलर समाजवादी अग्रणी असतील.
सुधेंद्रु चे एक मानायला पाहिजे की त्याला बदलता काळ लवकर कळला. मोस्टली समाजवाद्यांना माओ अजुन जीवंत आहे अशी खात्री असते.
आपले अपशब्द
>> नाही हो थत्ते काका. मी "समाजवादी" शब्दाचा उपयोग जे जे काही हीन आहे, नीच आहे त्याचे वर्णन करायला वापरते. हीन आणि नीच च पण लपुन छपुन, तात्विक, सभ्य/सज्जनतेचा बुरखा पांघरुन असलेले.
शिवीच म्हणाना एक प्रकारची.
तुमचा (अप)शब्दकोश एकदा प्रकाशित कराच. म्हणजे तुमच्या (अप)लिखाणाचे अन्वयार्थ ज्यांना लावायचे असतील त्यांना जरा सोपं जाईल.
मोस्टली समाजवाद्यांना माओ
मोस्टली समाजवाद्यांना माओ अजुन जीवंत आहे अशी खात्री असते.
अगदी प्रतिकात्मक दृष्टीने पाहिले तरी हे वाक्य मस्त आहे. समाजवाद्यांचा सेंट्रल प्लॅनिंग कमीशन वर खूप भरोसा असतो. एकंदरित आपल्या समाजाची (मुख्यत्वे त्यातल्या फडतूसांची) "आम्हाला मसींहा हवा" ही मानसिकता माओवादात चपखल बसते. म्हंजे आमच्या समस्या कुठल्यातरी (अज्ञात) शक्तीने स्वतः जाणून घ्याव्यात व निराकरण करावे. We would love to transfer our costs and risks on to this central planning commission. माओ जिंवंत नसला म्हणून काय झाले ... आमची सोनिया व आमचा राहूल आहे ना - तो देईल आम्हाला. व त्यांनी नाही केले तर स्वयंसेवी संस्था आहेतच आमच्या सेवेशी.
मोठा गाजावाजा करून प्लॅनिंग
मोठा गाजावाजा करून प्लॅनिंग कमिशन बंद केले पण एक नीती आयोग नावाचे काहीतरी सुरू केले. दोन्हीत फरक काय आहे हे अजून गुलदस्त्यात आहे.
हे योग्यच आहे.
पाच वर्षं प्लॅनिंग कमिशन अस्तित्वात होतं की नव्हतं याचा विचार (२०१९ मधे) केला आणि त्याचं मँडेट संदिग्ध होतं व त्यांनी फारसं काही काम केलं नाही - हे समजले की प्लॅनिंग कमिशन असले काय अन नसले काय - फरक फारसा पडत नाही - हे लक्षात येईल व समाजवादी टिवटिव बंद होईल.
http://www.niticentral.com/20
http://www.niticentral.com/2015/01/03/niti-aayog-different-planning-com…
इथे आहे की फरक सविस्तर लिहीलेला.
.
मुख्य मुद्दा हाच दिसतो की facilitater instead of provider.
States witll have more say
According to the official
According to the official press release, “The centre-to-state one-way flow of policy, that was the hallmark of the Planning Commission era, is now sought to be replaced by a genuine and continuing partnership of states.”
“The institution will serve as a ‘think tank’ of the government – a directional and policy dynamo. NITI Aayog will provide governments at the Central and State levels with relevant strategic and technical advice across the spectrum of key elements of policy,” the release further said.
हे दोन पॅरा पाठोपाठ लिहिले आहेत.
पहिल्या वाक्यातले वन वे फ्लो ऑफ पॉलिसी हे तितकंसं खरं नाही.
दुसर्या पॅरामधले provide governments at the Central and State levels with relevant strategic and technical advice across the spectrum of key elements of policy हे वाक्य युनिडायरेक्शनलच फ्लो दाखवते आहे.
गंमत अशी की एकीकडे एका
गंमत अशी की एकीकडे एका व्यक्तीच्या झालेल्या खुनाबद्दल मुग गिळणारे (प्रसंगी त्या खुनाला भारतीय सहिष्णुतेवर हल्ला असे कोणी म्हटले तर सिक्युलर बडबड समजणारे) आता एका माणसावर निव्वळ शाई उडवल्यावरून मात्र शिवसैनिकांवर टिका करण्यासाठी सोशल मिडीयावर हिरीरीने उतरलेले दिसतात!
आपल्याच बोलण्यातली विसंगती त्यांना जाणवते की नाही कोण जाणे.
गंमत अशी की एकीकडे एका
गंमत अशी की एकीकडे एका व्यक्तीच्या झालेल्या खुनाबद्दल मुग गिळणारे (प्रसंगी त्या खुनाला भारतीय सहिष्णुतेवर हल्ला असे कोणी म्हटले तर सिक्युलर बडबड समजणारे) आता एका माणसावर निव्वळ शाई उडवल्यावरून मात्र शिवसैनिकांवर टिका करण्यासाठी सोशल मिडीयावर हिरीरीने उतरलेले दिसतात!
मला विचारा ना. एका माणसाचा खून झाला त्यावर मुग गिळून बसलो नव्हतो. त्यावर राज्यसरकारने केलेली कारवाई आवश्यक व पुरेशी आहे असे मी म्हणालो होतो. फक्त त्या घटनेतून भारतीय सहिष्णुता खतरेमे वगैरे काही प्रतीत होत नाहिये असे म्हणालो. व तसेच मोदींनी त्यावर काही भाष्य करू नये असं म्हणालो.
त्या खुनाला भारतीय सहिष्णुतेवर हल्ला असे कोणी म्हटले तर सिक्युलर बडबड समजणारे - हो. प्रणब मुखर्जींनी केलेली केवळ सिक्युलर बडबड नव्हती. थापेबाजी होती. तिथे एक हिंदू मेला असता तर ही मंडळी इतक्या आवेशाने मैदानात उतरली नसती. अगदी चारपाच हिंदू मेले असते तरीही नाही. म्हणे सिव्हिलायझेशनल व्हॅल्युज खतरेमें. हाशिमपुर्यात नाही वाटतं झाल्या ? भागलपुरमधे ? २००८ मधे नाही वाटतं व्हॅल्युज खतरेमे आल्या ? त्या मुंबई हल्ल्यानंतर ममोसिं नी किती व काय भाष्य केले होते ते आठवून पहाच. आता लगेच - गब्बर, जुन्या घटना का उकरून काढत आहे ? असा प्रश्न विचारालच तुम्ही. पण २७ जुलै २०१५ ला दिनानगर, गुरुदासपुर मधे हल्ला झाला तेव्हा नाही वाटतं सहिष्णुता खतरे मे आली ?? तसेच वीस मार्च २०१५ च्या हल्ल्यानंतर नव्हती वाटतं आली सहिष्णुता खतरे में ? अं ??
आता एका माणसावर शाई उडवल्यावरून पण टीका करतोयच. पण शिवसैनिकांबरोबर "त्या" माणसावरही टीका करतोय.
विसंगति नेमकी कुठे आहे ते सांगा. व्हिक्टिम वर टीका करणे ही विसंगती आहे ?
बाय द वे - Shouldn't secular gang be happy that असहिष्णु Shivsainiks are under attack from all sides ?
--
संभाव्य प्रतिवाद - ठरलेला -
१) मी साधे एक स्टेटमेंट केले होते. गब्बर ने ते स्वतःवर ओढून का घेतले ते समजत नाही.
२) २० मार्च २०१५ व २७ जुलै २०१५ ला तुमचे मोदीच सत्तेवर होते ना ? मग त्यांनी रोखला का नाही हल्ला.
त्या खुनाला भारतीय
त्या खुनाला भारतीय सहिष्णुतेवर हल्ला असे कोणी म्हटले तर सिक्युलर बडबड समजणारे - हो. प्रणब मुखर्जींनी केलेली केवळ सिक्युलर बडबड नव्हती. थापेबाजी होती. तिथे एक हिंदू मेला असता तर ही मंडळी इतक्या आवेशाने मैदानात उतरली नसती. अगदी चारपाच हिंदू मेले असते तरीही नाही. म्हणे सिव्हिलायझेशनल व्हॅल्युज खतरेमें. हाशिमपुर्यात नाही वाटतं झाल्या ? भागलपुरमधे ? २००८ मधे नाही वाटतं व्हॅल्युज खतरेमे आल्या ? त्या मुंबई हल्ल्यानंतर ममोसिं नी किती व काय भाष्य केले होते ते आठवून पहाच. आता लगेच - गब्बर, जुन्या घटना का उकरून काढत आहे ? असा प्रश्न विचारालच तुम्ही. पण २७ जुलै २०१५ ला दिनानगर, गुरुदासपुर मधे हल्ला झाला तेव्हा नाही वाटतं सहिष्णुता खतरे मे आली ?? तसेच वीस मार्च २०१५ च्या हल्ल्यानंतर नव्हती वाटतं आली सहिष्णुता खतरे में ? अं ??
हा पूर्ण पॅराच माझ्याकरता माहीतेपूर्ण आहे. खूप दंगली खरच झालेल्या आहेत ज्यात मुस्लीम लोक (हाशीमपुरा+भागलपुर), हिंदू (मुंबई) जीवे मेले आहेत. तेव्हा पंप्र वरती इतका दबाव आणला नव्हता जितका आत्ता मोदींवर आणला आहे. पण असा दबाव सर्व बाजूंनी मोदींवरच आणला जाण्याची कारणे काय असावीत? की इनी-मिनी-माइनी-मो करुन मोदींवर दबाव आणलय मुद्दाम? काहीतरी कारण असेल ना त्यांना टार्गेट करण्याचं. भूतकाळातील एखादी घ.....
.
मोदी पंप्र झाले म्हणजे त्यांनी कोर्या पाटीने सुरुवात करावी असा थोडीच अर्थ होतो? भूतकाळ पुसून टाकता येत नाही. आता हा गमावलेला विश्वास जनतेत निर्माण करण्याची गरज आणि जबाबदारी कोणाची? (र्हेटॉरिकल प्रश्न आहे)
____
मला माहीत आहे हा राज्याच्या अखत्यारीतील प्रश्न होता व केंद्र विशेषतः पंप्रं नी बोलायचे कारण नव्हते. माझा एवढाच प्रश्न आहे इतक्या चोहोबाजूंनी दबाव का आणला गेला - तुमच्या मते.
____
तेच तेच उगाळलं जातय असे वाटत असेल तर प्रश्न डॉज केला/उत्तर दिले नाही तरी चालेल.
पण असा दबाव सर्व बाजूंनी
पण असा दबाव सर्व बाजूंनी मोदींवरच आणला जाण्याची कारणे काय असावीत? की इनी-मिनी-माइनी-मो करुन मोदींवर दबाव आणलय मुद्दाम? काहीतरी कारण असेल ना त्यांना टार्गेट करण्याचं. भूतकाळातील एखादी घ.....
कारणे आहेत.
स्वत:ला सेक्युलर म्हणवणार्या मंडळींना सेक्युलर हा शब्द ट्रॉफी असल्यासारखी वाटत असावी. सेक्युलर व्हर्सेस कम्युनल हे द्वंद्व. पण दोन्ही बाजूंनी गेली ३ दशकं त्या द्वंद्वावर आधारित राजनीती केली. समस्या ही आहे की - एरवी सेंट्रल प्लॅनिंग वर भर देणार्या या सेक्युलर-समाजवादी मंडळींनी सेक्युलरिझम प्रिझर्व्ह करण्यासाठी विशिष्ठ अशी संस्था उभी केली नाही. Institution building हे महत्वाचे आहे की नाही ? डग्लस नॉर्थ यांच्या - "institutions reduce uncertainty by providing structure to everyday life". (Page 3, Institutions, Institutional Change and Economic Performance ) वाक्यातून मार्गदर्शन मिळवणे कठिण आहे. कारण जर त्यांचे हे वाक्य खरं असते तर if we go on creating a lot of institutions then will it completely eliminate uncertainty ???? ( implicit answer = not quite.).
आपल्या देशात निर्वाचन आयोग आहे की जो देशात निष्पक्ष निवडणूका घेण्यास बांधील असतो. त्यांचे नियम, उपनियम, कायदे असतात. ती एक मोनोपोली आहे हे बाजूला ठेवा. पण निर्वाचन आयोग ही एक Institution म्हणून सुरेख काम करते. इतके की अनेक् देशातले पॉलीसीमेकर्स अभ्यास करण्यासाठी भारतीय निर्वाचन आयोगाकडे येतात. तशी एक (भारतातील) सेक्युलरिझम ला प्रिझर्व्ह करणारी Institution का बनवली नाही ? गेल्या ३० वर्षांत ? जर सेक्युलरिझम इतका महत्वाचा होता तर ? Institution सोडा. सेक्युलर या शब्दाची व्याख्या सुद्धा सुस्पष्ट नाही आपल्या देशात. (इथे माझा अभ्यास कमी पडत असेलही व अशी व्याख्या अस्तित्वात असेलही.). पण यू गेट द प्वाईंट.
मला वैताग आलाय तो या गोष्टीचा की सेक्युलर असणे/नसणे ही राजकीय जीवनाची सर्वोच्च अर्हता बनून राहिलेली आहे या देशात. One of the most frequent activity any person indulges in is trade. व यामधे जनता बहुतांश प्रमाणावर देवाणघेवाण ही सेक्युलर पद्धतीने करते. बहुतांश म्हंजे सदासर्वदा नव्हे. पण जनता सेक्युलर आहेच कारण जनता बहुतांश वेळा सेक्युलर पद्धतीने ट्रेड (देवाणघेवाण) करते. जर असे असेल तर सेक्युलरिझम बद्दल इतका मोठा गहजब का ?
मोदींनी हा गैरप्रकार ओळखला आणि सेक्युलरिझम वरचा भर कमी केला आणि गव्हर्नन्स ला ऐरणीवर आणले. Suddenly the secular gang found their key asset (skill) less relevant than it used to be. So pressurize Modi.
संभाव्य आक्षेप -
१) मग मोदींनी तरी अशी कोणती Institution निर्माण केली ?
२) मोदी असा काय ग्रेट गव्हर्नन्स देतात ?
हे म्हणजे कसे आहे ना
हे म्हणजे कसे आहे ना , वर्गात एखादा आडदांड,गुडघी पण डोक्याने जरा कमी असा एखादा पोरगा असतो असतो,
त्याच वर्गात अंगाने किरकोळ पण अंगी नाना कळा असणारा दुसरा पोरगा असतो.
या किरकोळ पोराला त्या आडदांड पोराची खोड काढण्याची भारी हौस असते. त्याला असे केल्याने बुद्धीला आव्हान मिळाल्या सारखं वाटत .
मग बघा हा आडदांड पोरगा कसा आमच्या सारख्या
बुद्धीने हुशार पण तब्बेतीने किरकोळ असणाऱ्या सरळ,विवेकी पोराला कसा सारखा त्रास देत असतो हे दाखवण्याची संधी हा किरकोळ पोरगा कधीच सोडत नाही.
काल अशीच किरकोळ पोराने आडदांड पोराची काळ काढली,मग हा आडदांड पोरगा नेहमीप्रमाणे किरकोळ पोराला बदडायला आणि मास्तर वर्गात यायला एकच गाठ पडली.
मास्तरांनी पण मग नेहमीच्या सवयीने त्या आडदांड पोराला धुतला. कळीचा नारद असणारा किरकोळ पोरगा नेहमीप्रमाणे साळसूद,केविलवाणा चेहरा करून बसला होता. खरा न्याय तेव्हाच होईल जेव्हा मास्तर त्या किरकोळ पोरालाही तेवढीच शिक्षा करतील
आता यातला आडदांड पोरगा कोण आणि किरकोळ पोरगा कोण हे तुम्हीच ओळखायचं
मास्तर म्हणजे सगळी प्रसारमाध्यमे आणि त्यांच्या अनुषंगाने मत बनवणारे आपण सगळेच
काटजूंची लेटेस्ट पोस्ट. मस्त
काटजूंची लेटेस्ट पोस्ट. मस्त आहे, वाचनिय.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/katju-targets…
गब्बरसाठी प्रश्न - मोदींनी
गब्बरसाठी प्रश्न - मोदींनी भाष्य केलं की नाही यावर बोलताना तुम्ही एके ठिकाणी सिग्नल थियरीचा उल्लेख केलेला होता. मला जे काही अल्प स्वल्प कळतं त्यानुसार सिग्नल थियरी अशा प्रकारे काम करते.
- वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रमाणात शिक्षण घेऊन एम्प्लॉयर्सना सिग्नल देतात.
- कोणी कुठच्या प्रकारचा सिग्नल दिला आहे त्याप्रमाणे एम्प्लॉयर्स त्यांना जोखून त्यांना वेगवेगळ्या नोकऱ्या देतात.
- म्हणजे मास्टर्स केलेल्याला पाच लाखाची नोकरी, तर बॅचलर्स केलेल्याला तीन लाखाची नोकरी.
- याचाच अर्थ ज्याने बॅचलर्स केलेलं आहे, त्याने 'मी फक्त बॅचलर्स केलेलं आहे, याचा अर्थ मी मास्टर्स केलेलं नाही' असा सिग्नल देतो. त्यानुसार त्याला दोन लाख कमी मिळतात.
- म्हणजे एखादी गोष्ट न करणं हा एक प्रकारचा सिग्नल आहे. आणि जे लोक ते सिग्नल वाचून नोकरी द्यायची की नाही हे ठरवतात त्यांच्या हातात त्या सिग्नलचा अर्थ लावण्याचं काम असतं, आणि हक्क असतो.
- पंतप्रधान हे पद मोदींना एका अर्थाने भारताच्या जनतेने बहाल केलेलं आहे.
- त्यांनी ते पद सांभाळण्यासाठी ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करणारे सिग्नल मोदींनी दिले पाहिजेत.
- ते सिग्नल आले नाहीत तर कंपन्या ज्याप्रमाणे बॅचलर्स आणि मास्टर्समध्ये जसा फरक करतात, त्याप्रमाणेच लोक त्यांच्या बाबतीत चांगला पंतप्रधान की वाईट पंतप्रधान हे जज करतील.
- इथे उत्तर प्रदेश सरकारने योग्य सिग्नल पाठवले की नाही हा मुद्दा पूर्णपणे वेगळा आहे. लोकांची जर अपेक्षा असेल तर ती पंतप्रधानांनी पाळण्याची जबाबदारी येते.
इतर देशांत असे सिग्नल्स पाठवले जातात का? तर उत्तर आहे हो. अमेरिकेत सिव्हिल राइट्सचा कायदा झाला तेव्हा दक्षिणेतल्या गोऱ्यांनी दंगली केल्या. त्यात एका काळ्या माणसाची हत्या केली. ही अर्थातच तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या राज्याच्या अखत्यारीतली गोष्ट होती. मात्र तत्कालीन राष्ट्राध्यक्षाला, असे प्रकार चालवून घेतले जाणार नाहीत असा संदेश (सिग्नल) द्यायचा होता. त्यामुळे तो खून हा 'त्या व्यक्तीच्या जगण्याच्या व्यक्तिगत अधिकारावर घाला आला' म्हणून ही घटना फेडरल केस बनवली. मुद्दा असा आहे की असे सिग्नल देण्यातून राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान सिग्नल पाठवू शकतात. ते सिग्नल पाठवायचे की नाही हा एक निर्णय असतो. बॅचलर्स करून थांबायचं की मास्टर्स करायचं यासारखाच. आणि कुठच्या सिग्नल्सवरून पात्रता ठरवायची हे कर्मचाऱ्याच्या हातात नसतं. मग तो प्रधान कर्मचारी असला तरीही. सिग्नल थिअरी लागू पडतेच.
आता यावर गब्बर 'पण हा सिग्नल महत्त्वाचा नाही' वगैरे युक्तिवाद करेल, तो वाचायला आवडेल.
लोकांची जर अपेक्षा असेल तर ती
लोकांची जर अपेक्षा असेल तर ती पंतप्रधानांनी पाळण्याची जबाबदारी येते. त्यांनी ते पद सांभाळण्यासाठी ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करणारे सिग्नल मोदींनी दिले पाहिजेत.
गब्बर म्हणणार आहे मग हीच अपेक्षा ममोंच्या बाबतीत कुठे गेली होती ;)
फक्त मोदींकडून या अवास्तव अपेक्षा का? :D
____
मग मी म्हणणार आहे - अपेक्षा या "बस्स असतात" जशी कविता "बस्स असते" - कार्यकारणभाव्/तर्क विहीन :D
___
मला हेही माहीत आहे की माझ्या इतक्या सुंदर या प्रतिसादाला ना कोणी रोचक श्रेणी देणारे ना मार्मीक :( ...... आमी नै ज्जा!! =))
___
एकंदर ऐसीकरांनीच एकट्याला घेराव/दबाव घालून गब्बरचा "मोदी" केलाय =))
त्यांनी ते पद सांभाळण्यासाठी
त्यांनी ते पद सांभाळण्यासाठी ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करणारे सिग्नल मोदींनी दिले पाहिजेत.
ते सिग्नल आले नाहीत तर कंपन्या ज्याप्रमाणे बॅचलर्स आणि मास्टर्समध्ये जसा फरक करतात, त्याप्रमाणेच लोक त्यांच्या बाबतीत चांगला पंतप्रधान की वाईट पंतप्रधान हे जज करतील.
१) मोदींनी या घटनेवर भाष्य करणे आवश्यक आहे अशी जनतेची अपेक्षा आहे हे कशावरून ? अपेक्षा असल्यास त्यावर भाष्य करणे अनिवार्य आहे कशावरून ? वैकल्पिक असेल तर ?
२) जर मोदींनी यावर भाष्य करणे ही जनतेची अपेक्षा असेल व ही अपेक्षा पूर्ण करणे हे अनिवार्य नसेल व वैकल्पिक असेल तर - आणि मोदींनी ही बाब वैकल्पिक आहे म्हणून भाष्य करण्याचे टाळले तर जनता त्यांना त्यानुसार जज करेलच. मग सेक्युलर मंडळींनी गहजब का करावा ??
३) जो विषय मुख्यत्वे राज्यसरकारच्या अखत्यारीत येतो त्यावर भाष्य करून राज्यसरकारवर एक प्रकारे दबाव आणण्याचा यत्न केला असा आरोप होऊ शकतो. मोदींवर एकाधिकारशाही चे आरोप झालेले आहेत. मग इथे मुख्यत्वे राज्याच्या अखत्यारीतला प्रश्न घेऊन त्यावर प्राधान्यतेने भाष्य करणे ह्यातून "मोदी हडेलहप्पी आहेत" असा सिग्नल कशावरून जाणार नाही ?
४) पंतप्रधानांच्या भूमिकेची उक्ती ही बाय डेफिनिशन स्कार्स गुड असते व आहे. या घटनेत केवळ एक माणूस मृत झाला. एका छोट्या घटनेवर ती वाया घालवणे हे तिचे अवमूल्यन नाही का ? प्राधान्यतेने भाष्य करणे ह्यातून तसा सिग्नल का जाणार नाही ?
५) आणखी कठोर प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण इथे थांबतो.
इथे काय करतोयस गब्बर. अरे
इथे काय करतोयस गब्बर. अरे अप्लाय कर मोदींच्या प्रधान-सल्लागार पदासाठी. का तू ऑलरेडी ओबामाचा प्र.-स. आहेस? :)
सॉरी मी नकळत पाचर मारलीये तुझ्या प्रतिसाद ऑफ द इयर ला :( सॉरी.
___
इथे ममोंकडून कुठे केल्या अपेक्षा वगैरे मी वर्तवले होते - तसा तू डिफेन्सिव्ह झालेला नाहीस. बौद्धिक-आक्रमक उत्तर दिलयस. :)
_________
बाय द वे, आता खाल्लेल्या प्रोटीन बारमध्ये खूप कॅफिन आहे - लक्षात आलं माझ्या.
वादापुरते सेक्युलर विरोधक
वादापुरते सेक्युलर विरोधक विनाकारण गहजब करताहेत हे अध्याहृत धरून पुढिल प्रतिसाद देतोय. (मुळात काँग्रेससारखे विरोधक सेक्युलर आहेत यावर माझा अजिबात विश्वास नाही. ते ही कम्युनलच आहेत. पण ते असो, सध्या वादापुरते धरून चालू)
१) मोदींनी या घटनेवर भाष्य करणे आवश्यक आहे अशी जनतेची अपेक्षा आहे हे कशावरून ? अपेक्षा असल्यास त्यावर भाष्य करणे अनिवार्य आहे कशावरून ? वैकल्पिक असेल तर ?
तशी अपेक्षा आहे की नाही हे दुय्यम आहे. तशी अपेक्षा आहे असा आभास घडवण्यात विरोधक यशस्वी आहेत!
२) जर मोदींनी यावर भाष्य करणे ही जनतेची अपेक्षा असेल व ही अपेक्षा पूर्ण करणे हे अनिवार्य नसेल व वैकल्पिक असेल तर - आणि मोदींनी ही बाब वैकल्पिक आहे म्हणून भाष्य करण्याचे टाळले तर जनता त्यांना त्यानुसार जज करेलच. मग सेक्युलर मंडळींनी गहजब का करावा ??
जर जनता जज करेल यावर विश्वास असेल तर विरोधकांनी गहजब केला तर त्याला बळी का पडावे? ज्या अर्थी बळी पडलेत त्या अर्थी विरोधकांची स्ट्रॅटेजी काम करतेय.. मोदी मिलीमिटरभर का होईना घाबरून मागे हटताहेत. त्यांच्या इगोला किंचित का होईना मुरड घातली जातेय. हा त्या गहजब करण्याचाच परिणाम आहे! असा गहजब केला नाही तर या भक्तांना अधिकच चेव नै का चढणार?
३) जो विषय मुख्यत्वे राज्यसरकारच्या अखत्यारीत येतो त्यावर भाष्य करून राज्यसरकारवर एक प्रकारे दबाव आणण्याचा यत्न केला असा आरोप होऊ शकतो. मोदींवर एकाधिकारशाही चे आरोप झालेले आहेत. मग इथे मुख्यत्वे राज्याच्या अखत्यारीतला प्रश्न घेऊन त्यावर प्राधान्यतेने भाष्य करणे ह्यातून "मोदी हडेलहप्पी आहेत" असा सिग्नल कशावरून जाणार नाही ?
कायदा सुव्यवस्था ही राज्य व केंद्राची संयुक्त जबाबदारी आहे. जर एखाद्या घटनेचा देशपातळीवर परिणाम होत असेल तर केंद्राला गप्प बसता येत नाही.
आणि मोदी हडेलहप्पी आहेत, एककेंद्रानुवर्त आहेत हे आता सिद्ध करत बसायची गरज नाही. जवळजवळ प्रत्येकाने ते स्वीकारलेले आहे (रादर त्याच कारणाला भुलून काही मतदारांनी त्यांना मत दिले होते)
४) पंतप्रधानांच्या भूमिकेची उक्ती ही बाय डेफिनिशन स्कार्स गुड असते व आहे. या घटनेत केवळ एक माणूस मृत झाला. एका छोट्या घटनेवर ती वाया घालवणे हे तिचे अवमूल्यन नाही का ? प्राधान्यतेने भाष्य करणे ह्यातून तसा सिग्नल का जाणार नाही ?
जर हे अवमुल्यन वाटत असेल तर त्यातून पंप्रची वृत्ती अधिकच स्पष्ट झाली असती. पण तुम्हाला तसली तरी मोदींना आपली वृत्ती इतकी उघड करायची नसावी म्हणून त्यांनी प्रतिक्रीया दिली
५) आणखी कठोर प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण इथे थांबतो.
प्रश्न संपले की हे कॅव्हिएट बरंय ;)
सौ पते की एक बात, सेक्युलरांच्या गहजबाला मोदी बधले, घाबरले व किंचित मागे हटले! :प
समर्थकांच्या संख्याबळाचे गणित
मोदींनी या घटनेवर भाष्य करणे आवश्यक आहे/नाही, वैकल्पिक आहे/नाही. या पेक्षा त्यांच्या पाठी उभा असलेला कुठल्या वर्गाची काय अपेक्षा आहे हे जास्त महत्वाचे आहे. मोदी स्वतः मनाने सेक्युलर असले पण त्यांच्या पाठी उभा 'बहुसंख्य' वर्ग हा तसा नसेल तर मोदी एक अवाक्षरही या घटने बद्धल काढायचे नाहीत. (आणि कुणीही राजकारणी तेच करेल म्हणा.) मोदींचे मोघम भाष्य हे 'मनाने सेक्युलर असलेला पण विकासासाठी मोदींपाठी उभा असलेला वर्ग' थोडीफारच दखल घेण्याजोगा आहे येवढेच सूचित करतो. ह्या वर्गाची संख्या जास्त असती तर काहीतरी ठोस कार्यवाही स्वपक्षातल्या मंत्र्यांविरुद्ध दिसली असती. पण गेल्या वर्षात 'लव्ह जिहाद', 'घर वापसी', 'गोहत्या प्रतिबंध' असे काढलेले/वाढलेले कार्यक्रम पाहता, कुठल्या वर्गाचे संख्याबळ जास्त आहे ते कळते.
मनाने कम्यूनल असलेलाच वर्ग
मनाने कम्यूनल असलेलाच वर्ग विकासाचा मुखवटा लावून मोदींमागे उभा आहे हे आम्ही खूप काळापासून सांगत आहोत. आणि तेच खरे आहे हे दिसून येत आहे.
अधोरेखित भागाशी असहमत.
मनाने कम्युनल असतीलही पण विकासाचा मुखवटा लावून हे काही पटत नाही.
Voters at large cannot be required to be secular or communal (as long as they are non-violent).
समर्थकांच्या संख्याबळाचे गणित
>> मोदींनी या घटनेवर भाष्य करणे आवश्यक आहे/नाही, वैकल्पिक आहे/नाही. या पेक्षा त्यांच्या पाठी उभा असलेला कुठल्या वर्गाची काय अपेक्षा आहे हे जास्त महत्वाचे आहे. मोदी स्वतः मनाने सेक्युलर असले पण त्यांच्या पाठी उभा 'बहुसंख्य' वर्ग हा तसा नसेल तर मोदी एक अवाक्षरही या घटने बद्धल काढायचे नाहीत. (आणि कुणीही राजकारणी तेच करेल म्हणा.) मोदींचे मोघम भाष्य हे 'मनाने सेक्युलर असलेला पण विकासासाठी मोदींपाठी उभा असलेला वर्ग' थोडीफारच दखल घेण्याजोगा आहे येवढेच सूचित करतो. ह्या वर्गाची संख्या जास्त असती तर काहीतरी ठोस कार्यवाही स्वपक्षातल्या मंत्र्यांविरुद्ध दिसली असती. पण गेल्या वर्षात 'लव्ह जिहाद', 'घर वापसी', 'गोहत्या प्रतिबंध' असे काढलेले/वाढलेले कार्यक्रम पाहता, कुठल्या वर्गाचे संख्याबळ जास्त आहे ते कळते.
मला वाटतं इथे पुष्कळ लोकांचा असा समज होतो आहे की जो वर्ग सोशल मीडियावर बोंबलत सुटतो तो संख्येनंसुद्धा जास्त आहे. प्रत्यक्षात, कुणाला आवडो न आवडो, मोदींना गरीब आणि निम्न आर्थिक स्तरातल्या लोकांचा पाठिंबा आहे (किमान निवडणुकींच्या वेळी तरी होता) आणि हा वर्ग भारतासारख्या देशात संख्येनं मोठा आहे. आता, हा वर्ग कदाचित इथल्या लोकांच्या 'सेक्युलर'च्या व्याख्येमध्ये मोडणारा नसेलही; मात्र, त्यांना 'लव्ह जिहाद', 'घर वापसी' किंवा 'गोहत्याबंदी'सारख्या गोष्टींमध्ये फार रस आहे असंही म्हणता येणार नाही. 'बिजली, पानी, सडक' (आणि आता कदाचित स्वस्त मोबाईल आणि इंटरनेटही) ह्या त्यांच्या गरजा आहेत. त्यांना नोकऱ्या हव्या आहेत. त्यांना रोजच्या वापरातल्या वस्तूंची महागाई कमी व्हायला हवी आहे. त्यांना ५ रुपयांचे शँपूचे आणि 'फेअर अॅन्ड लव्हली'चे आणि 'हेअर डाय'चे सॅशे हवे आहेत. त्यांना विडी-तंबाखू-दारूवरचा कर कमी व्हायला हवा आहे, वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टींना 'लव्ह जिहाद', 'घर वापसी' किंवा 'गोहत्याबंदी'सारख्या गोष्टींपेक्षा अधिक महत्त्व देणारा वर्ग 'सेक्युलर' आहे की नाही, ह्यापेक्षा मोदी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताहेत की नाही, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटतो.
>>जो वर्ग सोशल मीडियावर
>>जो वर्ग सोशल मीडियावर बोंबलत सुटतो तो संख्येनंसुद्धा जास्त आहे.
१. सोशल मीडियावरून "ओपिनिअन मेकिंगला" हातभार लागतो.
२. माझ्या जवळच्या ओळखीत आणि नात्यात दहा पंधरा तरी लोक असे आहेत जे फेसबुकवर "देखो कैसे मुसलमान लोग गायोंको काट रहे हैं" टाइप पोस्ट टाकत नाहीत. पण खाजगीत ठेचण्याची, धडा शिकवण्याची भाषा बोलतात.
पण खाजगीत ठेचण्याची, धडा
पण खाजगीत ठेचण्याची, धडा शिकवण्याची भाषा बोलतात.
मी पाकिस्तान, पॅलेस्टाईन बद्दल क्रूर मतं व्यक्त केलेली आहेत. ही दोन्ही राष्ट्रं मुस्लिम बहुल आहेत. व भारतातल्या मुस्लिमांबद्दल काही फारसं छान बोललेलो नैय्ये आजतागायत. मग माझं नाव (२) मधे टाकताय ? टाकून द्या. हाकानाका.
----------------
मनाने कम्यूनल असलेलाच वर्ग विकासाचा मुखवटा लावून मोदींमागे उभा आहे हे आम्ही खूप काळापासून सांगत आहोत. आणि तेच खरे आहे हे दिसून येत आहे.
तुम्ही असे म्हणता .... तशाचप्रमाणे ....
आजतागायत किमान चारपाच वेळा मी सांगितलेले आहे की मी छुपा हिंदुत्ववादी आहे. पण माझ्यावर तसे आरोप झालेले नाहीत ही माझी कैफियत आहे.
हमारी मांगे पूरी करो.

पुण्यानी इथेही नंबर पटकवला आहे.
लोकहो, तुमच्या मते ह्यामागचं कारण काय आहे?