Skip to main content

मनाच्या अंतर मनात.......

2 minutes

आयुष्याचा प्रवास ऐन उमेदी च्या वर्षात आल्यावर बऱ्या पैकी जीवना शी ओळख झालेली असते उमेदि ची म्हणाल तर ज्या वयात काही तरी करून दाखवन्या ची प्रचंड इच्छा शक्ति मनात असते साधारणता 22-28 या वयात,आणि मन ही भविश्या तिल आरा खडे बांधन्यात रम मान होउन जाते, कधी हळूच गेलेल्या 20-25 वर्षा तिल अत् भुत चांगल्या वाइट आठ वणी मध्ये गुंतुन जाते ,ये नाऱ्या भविश्या ला ही चांगल्या वाईट आठ वणी ची किनार च असतेजस जसे मोठे होत जाउ तस अनेक गोष्टी शी सबंध येतो , गोष्ट म्हणं न जरा चुकीच् ठरेल कारन सगळ आयुष्य निघुन जात तरी त्या गोष्टि ना आपण स्पर्श करू शकत नाही पन अचर्या ची बाब म्हणजे आपल आयुष्य अगदी शेवट च्या क्षना पर्यन्त यातच गुंत् लेल असत, ह्या सव्रात पहिली भेट होते ति आशे शी ह्या क्षण भंगुर आयुष्यात मान साला भविष्या कडुन खुप कही अपेक्षा असतात ,जीवंत राह न्या साठी हवेचि गरज असते त् र जगन्या साठी आशेची गरज असते,आशेतुन असले ल्या अपेक्षा पुर्ण झाल्या तर ठीक नाहीतर जाउन भेटतो कधी ही न भेट नाऱ्या व् संपुर्ण आयुष्य भर दोष देणाऱ्या नाशिबाला, विशेष म्हणजे हे सर्व खेळ सुरू असतात कुणाल ही न सापड ले ल्या सूप्त मनात मान अपमान,राग,आनंद हे सर्व इथेच लपले ले असतात फक्त कोण, कुनाशी ,कधी अन कुठे ओळख करून देईल हे फ़क्त वेळच ठरवते ,प्रवासा च्या शेवटा ला गेल्यावर एखादया नीवात् संध्या काळी मागे वळुन पहिल तर बनलेला असतो सुख दुःखा चा चांगल्या वाईट आठ वणी चा, मान -अपमान,आशा निराशा असलेला परंतू अनुभव व् आठवणी समृद्ध झालेला आयुष्या चा कोलाज...........
ह्या सर्र्वात् चालात रहते ते आयुष्य...
आयुष्य चालत राहते ...

लहानपणीच्या रांगण्या कडुन
कर्तृत्वाच्या चाली कडे
उरलेल्या आठवणी कडून
आजच्या वास्तवाकडे
आयुष्य चालत राहते...

तूटलेल्या स्वप्नाकडून
धेय्याच्या नविन क्षितिजाकडे
हरवलेल्या मानसा न कडून
स्वत : च्या ओळखीकड़े
आयुष्य चालत राहते...

सुख - दुःखा च्या वळणावरती
आशेच्य किरणांवरती
स्वप्नाच्या नविन वाटाण वरती
आयुष्य चालत राहते...

मैत्रीतून प्रेमाकडे
तिमिरातून तेजाकड़े
सूर्यास्ताकडून
सूर्योदयाकडे
आयुष्य चालत राहते.....

©निलेश

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

.शुचि. Mon, 01/02/2016 - 22:40

चिंतन आवडले.

हरवलेल्या मानसा न कडून
स्वत : च्या ओळखीकड़े
आयुष्य चालत राहते...

सॉलिड!
___
आज एक माणूस खूप पळत येत होता पण त्याची बस सुटली आणि त्याचा इतका वेळ हलवून बस थांबविण्याचा प्रयत्न करणारा हात, निराशेने खाली पडला, चेहरा एकदम हताश झाला. मला ते एकदम वाईट वाटलं. किंबहुना त्याचा पराभूत क्षण मी आज विसरुच शकत नाहीये.
आणि मग एक कल्पना सुचली-
मुलीचं भविष्य अजुन घडतय = बस अजुन गेलेली नाही. आताच वेळेवर तिला जोपासलं नाही, कठोर शब्दात शिकवलं नाही तर बस निघून जाईल आणि पराभूत वाटेल. हे जाणवुन एकदम पोटात खड्डा पडला, जबाबदारीची तीव्रतेने जाणीव झाली. मला मुलगी हरवुन, स्वतःची "पराभूत आई" अशी ओळख नको आहे.
____
माहीत नाही हे कोणाला, किती सुसंगत वाटेल, पण आजचा दिवस बराच उदास चालला आहे.