राहुल गांधींविषयी 'इकॉनॉमिस्ट'
'इकॉनॉमिस्ट' ह्या प्रतिष्ठित नियतकालिकानं राहुल गांधींविषयीच्या एका चरित्राचा आधार घेऊन ह्या युवराजाची राजकीय समज आणि एकूण बुद्धिमत्ता यावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. WHAT is the point of Rahul Gandhi? हे लेखाचं पहिलं वाक्यच अतिशय बोलकं आहे. देशाचं काय करायचं याविषयी राहुलला काही म्हणता येत नाही कारण त्याला देशाच्या वास्तवाची जाण नाही; स्वत:पाशी काही दृष्टी नाही; आलेल्या संधीचा फायदा करून घेण्याचं राजकीय संधिसाधू शहाणपणसुद्धा नाही असे अनेक शेरे हा लेख मारतो. नेहरू घराण्याच्या करिश्म्यावर विसंबून राहण्याचे दिवस आता संपले आहेत हे काँग्रेसनं लवकर लक्षात घेतलं पाहिजे असंही लेखात म्हटलेलं आहे.
चरित्र : डीकोडिंग राहुल गांधी - आरती रामचंद्रन
लेखाचा दुवा - http://www.economist.com/blogs/banyan/2012/09/indias-gandhi-family
प्रतिक्रिया
मूर्ती
ओक्के.
लेख वाचला. राहुल गांधींविषयी जे काही लिहिले आहे (राजकीय जाण नाही. बाकीही काही नाही) ते सत्यच आहे. आता प्रश्न हा आहे की तरीही त्या कुटुंबाची भारतीय राजकारणातली भूमिका कोणती?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्याला इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदावरील नियुक्तीपर्यंत मागे जावे लागेल.
नेहरूंनंतर कोण या प्रश्नाची सोडवणूक नेहरूंनी आपल्या कार्यकाळातच केली होती. कामराज यांनी वृद्धांच्या निवृत्तीची योजना आणून बर्याच वृद्ध नेत्यांना पक्षकार्यात गुंतवले. तरीही नेहरूंनी काँग्रेस पक्षाची खास परवानगी घेऊन शास्त्रींना 'मिनिस्टर विदाउट पोर्टफोलिओ' म्हणून मंत्रीमंडळात घेतले. नेहरूंच्या शेवटच्या काळात (आजारी असताना) शास्त्री डी-फॅक्टो पंतप्रधान होते. (संदर्भ- इंडिया आफ्टर गांधी: रामचंद्र गुहा) त्यामुळे नेहरूंनंतर लगेच नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिला नाही.
शास्त्रींच्या अकाली निधनानंतर तो उभा राहिला. तेव्हा काँग्रेसमध्ये बरेच दिग्गज नेते होते. आणि त्यांच्यात संघर्ष अटळ झाला असता. त्याचवेळी काँग्रेसमधील नेत्यांनी एक अँकरपॉइंट म्हणून इंदिरा गांधींना पंतप्रधान बनवले. त्या विठोबाची स्थापना करून बडवे कारभार करणार अशी ती योजना होती. [इंदिरा गांधींनी विठोबाचा रोल झुगारून दिला ही नंतरची गोष्ट. पण कल्पना विठोबा बनवण्याचीच होती).
पुढे इंदिरा गांधींच्या निधनानंतर परत हा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी प्रणव मुखर्जी आणि इतर मोठे नेते यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता होती. प्रणव मुखर्जींनी दावासुद्धा सांगितला होता असे ऐकले आहे. पुन्हा राजीव गांधी यांना पंतप्रधान करून हा संघर्ष टाळला गेला. राजीव गांधींनी विठोबाची भूमिका बरीचशी निभावली. अर्थात आधुनिकीकरणाचे वारे आणण्याचे काम त्यांनी काही प्रमाणात केले. त्यांच्या (खूपच लवकर झालेल्या) मृत्यूनंतर त्यांची जागा घेण्यासाठी लगेच कोणी विठोबा उपलब्ध नव्हता. राहुल प्रियांका खूप लहान होते. आणि सोनिया गांधी राजकारणात यायला तयार नव्हत्या. त्यावेळी नरसिंहराव पंतप्रधान झाले. त्यांनी पाचवर्षे राज्य केले; मनमोहन सिंग यांच्याकरवी उदारीकरण आणले वगैरे सर्व घडले तरी काँग्रेस पक्षाची पीछेहाट मात्र चालूच राहिली. पक्षातले नेते पक्ष सोडून जाऊ लागले. काहींनी स्वतःचे पक्ष स्थापले, काहींनी तर भाजपमध्येही प्रवेश केला.
९९ मध्ये सोनिया गांधींनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतरच्या निवडणूकीत काँग्रेसला यश मिळाले नाही. पण पुढे एक घडले की काँग्रेस पक्षाची फाटाफूट थांबली. आणि २००४ च्या निवडणुकांपर्यंत काँग्रेस सोडून गेलेले बरेचसे नेते परत आले. २००४ मध्ये सोनिया गांधींमुळे काँग्रेसला विजय मिळाला याचा अर्थ मते मिळवणारे नेते काँग्रेसमध्ये परतले असा आहे (सोनिया गांधींनी काँग्रेसला मते मिळवून दिली असा अर्थ नाही).
२००४ निवडणुकांनंतर सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या नाहीत याचे कारण आपली पक्षातली भूमिका विठोबाची आहे हे त्यांना समजले होते. आणि ते राहुललाही बहुधा ठाऊक आहे. पंतप्रधान होऊन देश चालवण्याची ताकद नाही हेही सोनिया गांधींना बहुधा कळत असावे.
आता एवढे सगळे लिहिल्यावर कोणाच्या मनात विचार येईल की असल्या विठोबाची गरज काय? त्याचे उत्तर "बडव्यांची भांडणे टाळण्यासाठी". विठोबा ठेवण्यात राजकीय शहाणपण आहे. (जे आज भाजपमध्ये नाही आणि पूर्वी समाजवादी नावाने असलेल्या वेगवेगळ्या विरोधी पक्षांत कधीच नव्हते).
नेहरू कुटुंबातल्या व्यक्तींनी देश खरोखर चालवावा अशी काँग्रेसमधल्या नेत्यांची कधीही (अगदी इंदिरा गांधींकडूनही) अपेक्षा नव्हती.
देशात दोन (ठळक) राजकीय स्पेसेस आहेत. एक पुराणमतवादी स्पेस भाजपने व्यापलेली आहे. दुसरी लिबरल स्पेस सध्या बरीचशी काँग्रेसने व्यापली आहे. ती स्पेस टिकून रहायला हवी आणि ती व्यापायला दुसरा योग्य पक्ष दृष्टीपथावर नाही म्हणून ती स्पेस काँग्रेसने व्यापायला हवी. त्यासाठी काँग्रेस टिकायला हवी. आणि त्यासाठी विठोबा हवा.
इकॉनॉमिस्ट मधील लेख लिहिणार्यांनी हा विचार केला आहे का हे ठाऊक नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
वाटत नाही
वाटत नाही. ते लेखन एकूण मला फेसबुकी लेखन वाटतं.
बहुदा पंचाईत अशी आहे की, गांधींकडून या अशा लेखकांनी काही ठोकताळे म्हणावेत अशा अपेक्षा ठेवलेल्या असतात आणि त्या पूर्ण होत नाहीत असं दिसलं की टीका सुरू होते.
मानले बुआ !!!!!!!क्या बात कही है !!!
ती व्यापायला दुसरा योग्य पक्ष दृष्टीपथावर नाही म्हणून ती स्पेस काँग्रेसने व्यापायला हवी. त्यासाठी काँग्रेस टिकायला हवी.+१११
स्पष्ट
थत्ते यांनी काँग्रेसबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट मांडली, ते फार चांगले केले. इतके मुद्देसुद व विस्तृत विवेचन वाचल्यावर, त्यांचा काँग्रेसबद्दल एक ठराविक स्टँड का असतो, ते समजले. भाजपने गेल्या काही वर्षांत अत्यंत बेजबाबदारपणे वागून आपली प्रतिमा धुळीला मिळवली आहेच. त्या पार्श्वभूमीवर थत्ते यांचे म्हणणे पटू लागले आहे. आता ही दिव्य दृष्टी प्राप्त झाल्याने आम्हाला इतर पक्षातलेही सर्व विठोबा स्पष्ट दिसू लागले आहेत. हिरव्यागार रानांची अपेक्षा सोडून आता 'वाळवंटातील डावाचीच' आम्हाला संवय करुन घेतली पाहिजे. (निदान दुसरा योग्य पक्ष क्षितिजावर दिसेपर्यंत)
रोचक निरूपण
विठ्ठल निरुपण रोचक आहे. काँग्रेस सोडून दुसरा कुठलाच पर्याय लिबरल लोकांपाशी नाही या मताशी सहमतच आहे. बडवे, विठोबा वगैरे गोष्टी भारतीय लोकशाहीला आवश्यक आहेत हे समजा खरे आहे असे मानले तरी एखादा गांधीच विठोबा व्हायला हवा या अपरिहार्यतेबद्दल फारसे मार्गदर्शन प्रतिसादात आढळले नाही.
विठोबा आणि लोकशाही
>>बडवे, विठोबा वगैरे गोष्टी भारतीय लोकशाहीला आवश्यक आहेत हे समजा खरे आहे असे मानले
विठोबा असणे लोकशाहीसाठी आवश्यक आहे असे नाही. लिबरल पर्याय हवा. विठोबाशिवाय तो मिळाला तर लोकशाहीसाठी चांगलेच आहे. आम्हाला आवडेल.
>>खादा गांधीच विठोबा व्हायला हवा या अपरिहार्यतेबद्दल
अशी अपरिहार्यता नसणार. सध्या ममोसिंग नावाचा एक अॅडिशनल विठोबा आहे असे वाटते. पण गांधी नावाचा विठोबा (विठोबा म्हणून) अधिक यशस्वी होतो असे दिसते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सद्य परिस्थितील मासिकांचे
सद्य परिस्थितील मासिकांचे राजकीय विश्लेषण वाचता (उदा. मनमोहन सिंग- अंडरअचिव्हर, ट्रॅजिक फिगर, ओबामा - अंडर अचिव्हर) त्यांच्या खरेपणाबद्दल शंका घेण्यास बराच वाव दिसतो, अर्थात राहूल गांधींबद्दलचे मत योग्य किंवा अयोग्य असेलही पण त्यामागचा उद्देश राजकीयच असण्याची शक्यता अधिक, लेखात व्यक्त केलेल्या अनेक बाबी राहूल गांधींच्या सामाजिक प्रतिमेशी मिळते-जुळत्याच आहेत असे दिसते.
राहुल गांधी
आमच्यासारख्या जनसामान्य भारतीयांसाठी राहुल गांधी दखलपात्र आहेत /आहे का?
राहुल गांधी असतील्/असला तरी आउअटलुक दखलपात्र आहे का?
भाजप ही दुसरी कॉग्रेस वाटत नाही का?(म्हंजे की काँग्रेस जाउन भाजपवाले आले तर भारताचे लागलिच सुवर्णयुग वगैरे अवतरणार असल्या दिव्य फेसबुकी संदेशांवर पब्लिकचा भरवसा आहे का.)
.
तरीही खालच्या प्रतिसादातील . २००४ मध्ये सोनिया गांधींमुळे काँग्रेसला विजय मिळाला याचा अर्थ मते मिळवणारे नेते काँग्रेसमध्ये परतले असा आहे (सोनिया गांधींनी काँग्रेसला मते मिळवून दिली असा अर्थ नाही). खूपच हायक्ल्लास वाटलं. अगदि गांधी भक्तांसाठी आणि विरोधकांसाठीही. सूपर्ब.
.
प्रत्येक बातमीबद्दल आणि प्रत्येकानी प्रत्येकावर मारलेल्या शेर्याबद्दल धागा काढावा का?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
स्पष्टीकरण
नितिनचा प्रतिसाद चांगला आहे. माझ्यामते जनसंघवाल्यांना वाजपेयींना मुखवटा घालून विठोबा बनवायचा होता.तसे अडवाणी,जोशीह्यांनी बडव्यांची भूमिका पार पाडली १९९८- ते २००४ काळात म्हणा.
मला हा राहूल गांधी राम तेरी गंगा मैलीमधल्या राज कपूरच्या मुलासारखा दिसतो हुबेहुब.
राजीव कपूर पेक्षा चांगला
बाकी मत मिळवणारे लोकं परत काँग्रेस मधे आणणं पण एका दृष्टीने करिष्माच की...
+
वाजपेयी मुखवटा आहेत (पक्षी- विठोबा आहेत) हे तर गोविंदाचार्यांनीच सांगितले होते की....
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
एक विनंती : थत्ते यान्चा प्रतिसाद उडवुन टाकावा
आपल्याच दैवतांचा आपण कसा अपमान करतो हे अनिल थत्ते यांनी विठोबा या शब्दाला विकृत करून दाखवून दिले आहे. हे वाईट आहे. अशा सवंग गोष्टींपासून आपण दूर राहायला हवे, असे मला वाटते. माझी अॅडमीनला विनंती आहे की, त्यांनी थत्ते यांचा प्रतिसाद उडवुन टाकावा. हा प्रतिसाद ‘बॅड टेस्ट'च्या कक्षेत मोडतो.
ते काय लिहित आहेत,
कोणती प्रतिके वापरून काय सांगण्याचा प्रयत्न होतो आहे हे आपणास आकळले नाही असे वाटते.
तेजा महोदय, चष्मा बदलून पुनः एकदा वाचून पहा, ही विनंती.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-