Skip to main content

पुन्हा विचार करतांना

लेणी खोदणार्‍या
लोकांना सोडून काहीच
मानवी भौतिक वास्तव नसतांना
गाळलेली जागा
म्हणजे संवादाचा एक प्रकार

अस्वल Sun, 01/03/2015 - 04:28

तोतया कविता लिही
वाचका कविता वाच
वाच का कवि तावाच
वाचकाक विता वाच
वाच काकवी तावाच
वा चकाक वितावाच

पृथ्वी अजून ४-५ अब्ज वर्षांनी नसेल.
सूर्यही मग रेड जायंट बनल्यावर
शेवटी एक बटुकनाथ तारा बनून विझून जाईल.
मग एके दिवशी कोणीच नसेल-लिहायला किंवा वाचायला.
त्यापेक्षा हे बरं.

बॅटमॅन Mon, 02/03/2015 - 16:52

In reply to by अस्वल

वाचका कविता वाच
वाच का कवि तावाच
वाचकाक विता वाच
वाच काकवी तावाच
वा चकाक वितावाच

भयंकर आवडल्या गेलेला आहे हा प्रकार. याला चरणयमक असे म्हणतात. पंडित काव्यांत याची उदाहरणे आहेत, उदा.

पायां न मी देइन वंश सारा, पायां नमी दे इनवंश सारा |

अजून उदाहरणे नक्की आहेत, पण आठवत नाहीत. पाहून सांगतो.

याचीच नक्कल पुलंच्या गाळीव इतिहासात एक अप्रकाशित आर्या या नावाने आहे.

"कखगघङटठडणम वर्णमाला | कखगघ ङटठडणम वर्णमाला |
कख गघङट ठडणम वर्णमाला | कख गघङटठडणम वर्णमाला |" इ.इ.

याचाही बाप म्हणजे प्रतिलोम यमक. श्लोकाच्या चार ओळींपैकी पहिली ओळ उलटी केल्यास तिसरी ओळ अन दुसरी ओळ उलटी केल्यास चवथी ओळ, उदा.

वीराजते मत्त उदार पाहे
वीरा धरी शक्ति शराव साहे
हे पारदा उत्तम तेज रावी
हे सावरा शक्ति शरी धरावी || इ. अर्थ विचारू नका. मला माहिती नाही आणि सारस्वतकारांनीही त्या नागेश की विठ्ठल नामक कवीला या काडेकरूपणाबद्दल झाडला आहे.

हा असला प्रकार संस्कृतातहि आहे. विलोमकाव्य या नावाने. एक ओळ नेहमीसारखी वाचली तर रामाचे अन उलटीकडून वाचली तर कृष्णाचे वर्णन. रामकृष्णविलोमकाव्यम् या नावाने ते स्तोत्र फेमस आहे. ढवळे प्रकाशनाने प्रकाशित केलेले.