मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १००
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---
मुद्दा बरोबरच आहे आचरटबाबा
मुद्दा बरोबरच आहे आचरटबाबा ,पण
१. हा प्रश्न २०१४ ला दोन कोटी रोजगार निर्माण करण्याची घोषणा करणाऱ्यांच्या वेळी आला होता का मनात ?
२. आणि हे आत्ता सांगणारे देऊ शकणार नाहीत म्हणून ज्याने दिल्या नाहीतच त्यांनाच पुन्हा चालू ठेवा हे सांगणे कितपत संयुक्तिक ?
सॅटेलाइट पाडण्याचे नक्की
सॅटेलाइट पाडण्याचे नक्की श्रेय कुणाला यावर वाद चालू झाला. सव्वीसेक चानेल्सवर पंप्र "उपलब्धियां समजावून सांगत होते दुपारी. पृथ्विराज चव्हाण म्हणाले मी सहा वर्षे या कमिटीत होतो. सर्व तंत्रज्ञान त्यावेळी होते पण उपग्रह आता पाडला. मंगळयान,चांद्रयान आम्हीच केले.
त्यांनी नोकऱ्या देण्याचा
त्यांनी नोकऱ्या देण्याचा मेळावा एक दोनदा आयोजित केला होता. आता मराठी तरुणांना नक्की कोणत्या नोकऱ्या हव्यात ते सांगायला नको.
परभणी,औरंगाबादच्या तरुणांनी मुंबई आणि उपनगरांत बांधकाम क्षेत्रांत जम बसवलाय. प्लम्बिंग, टाइलिंग वगैरे. आठशे ते हजार रु रोजाने कामं आहेत. कोणताही कोर्स नाही फक्त कुणाच्या हाताखाली सहा महिने राहून शिकतात. सुतारकामात युपी बिहार पुढे आहे.
पण ८०टक्केंना ओफिस जॅाब हवाय.
सेवक
घरी एक सेवक असतो. सगळी कामे संथगतीने करतो. पण पैसे फार ढापतो. सारखं लक्ष ठेवावं लागतं. दांड्याही भरपूर मारतो. त्याला कंटाळून तुम्ही सेवक बदलता. नवीन सेवक बोलण्यांत चटपटीत, प्रामाणिक वाटतो. कधी दांड्या मारत नाही. नंतर त्याचेही 'गुण' लक्षांत येऊ लागतात. बढाया मारणे, खोटे बोलणे असह्य होऊ लागते. आगाऊपणा रोजच सलायला लागतो. अजून तुमच्या पाकीटाला हात लावलेला नसतो. पण तरीही तुम्ही वैतागून जाता. जुना सेवक परत यायला टपलेलाच असतो. अशा वेळी तुम्ही काय करता ?
उत्तरं वाचायला आवडतील.
आपण जुन्या आणि नव्या
आपण जुन्या आणि नव्या नोकरांपासून मालकाला वाटणारे त्रास अधोरेखित करू. नीट वाचा:
घरी एक सेवक असतो. सगळी कामे संथगतीने करतो. पण पैसे फार ढापतो. सारखं लक्ष ठेवावं लागतं. दांड्याही भरपूर मारतो. त्याला कंटाळून तुम्ही सेवक बदलता. नवीन सेवक बोलण्यांत चटपटीत, प्रामाणिक वाटतो. कधी दांड्या मारत नाही. नंतर त्याचेही 'गुण' लक्षांत येऊ लागतात. बढाया मारणे, खोटे बोलणे असह्य होऊ लागते. आगाऊपणा रोजच सलायला लागतो. अजून तुमच्या पाकीटाला हात लावलेला नसतो. पण तरीही तुम्ही वैतागून जाता. जुना सेवक परत यायला टपलेलाच असतो. अशा वेळी तुम्ही काय करता ?
जुन्या नोकराच्या सवयीला फक्त कंटाळले होते.
नव्या नोकरामुळे मात्र असह्य होणे, रोज सलणे आणि वैतागून जाणे असे तीन प्रकार अल्पकाळात होऊ लागले आहेत.
जुना संथ का होईना पण काम करत असे.
नव्या नोकराच्या काम करण्याचा तुलनेपुरताही उल्लेखही नसल्याने तो शून्य काम करतोय हे मालकाला खात्रीने पटलेलं दिसतं, प्लस असह्य, सल, वैताग
जुना विन्स हियर.. ;-)
२०१४- विकास
२०१४- विकास
२०१९ - सुरक्षा
२०२४ - हिंदूत्व आणि संस्कृती?
हळू हळू संघाची मूळ उद्दिष्टं ह्या अजेंड्यातून दिसायला लागतील.
असो. लोकं मला फिअर माँगरिंग वगैरे म्हणतील.
पण भाजपा हा मुखवटा आहे आणि संघ हा चेहेरा आहे ह्यात काय नवीन? किती दिवस मुखवटा लावून जगणार?
अर्थात हे सगळं सत्ता राहिली तरच.
हम्म्म्म्म्...
मुद्दा रोचक आहे खरा.
जाताना आणि पुन्हा (युरोपची) फाळणी नाही करून ठेवलीनीत, म्हणजे मिळवली.
यावरून आणखी एक शंका: इंग्रजांनी मुळात हिंदुस्थान जे सोडले, ते पुष्कळ सारे हिंदुस्थानी तेव्हा ब्रिटनमध्ये स्थलांतरित होऊ लागले होते, म्हणून की काय? (आमची मूळची थियरी होती, की इंग्रजांनी हिंदुस्थान सोडले, ते इंग्रजांस त्यांच्या भाषेवरील अत्याचार सहन होईनात, म्हणून; परंतु या पर्यायी शक्यतेचा आता अधिक तपास केला पाहिजे.)
काय कसं काय इ.
उच्च शिक्षितांमधे शिष्टाचाराचा भाग म्हणून “गुड मॉर्निंग”, “गुड इव्हनिंग”, अनौपचारिक “हाय”, प्रसंगानुसार “एक्स्यूज”, “एक्स्क्यूज मी” वगैरे संभाषण सुरु करणारे शब्द वापरणं अंगवळणी पडून गेलेलं आहे. मराठीत बोलताना “सुप्रभात” या आकाशवाणी छाप उद्गाराचा वापर फक्त काही नातेवाईक व मित्रमंडळी यांच्या बरोबर बोलताना, विशेषतः व्हाट्सॅपवर होतो. “हौ आर यू” साठी सरळ “कसा / कशी आहेस” ; / “कसे आहात” हेच ऐकू येतं. “काय कसं काय” आता इतिहासजमाच झालं की काय असं वाटतं. “धन्यवाद” बोलताना फारच औपचारिक वाटतं, तेच लिहायला काही वाटत नाही.
शैक्षणिक संस्थांतील कारकून, शिपाई यांच्या बोलण्यातले संभाषण संकेत वेगळे आहेत. फर्ग्युसनमधले शिपाई एकमेकांसमोर आले तर नुसतं “चला” असं म्हणून पुढे होत. मराठी अभ्यास परिषदेच्या २००९ सालच्या वार्षिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शाम मनोहर यांनी एस्. पी. कॉलेजमधील शिपाई कसे कृतज्ञता वा आभार व्यक्त करताना देहबोली वापरतात, शब्द नाही याचा उल्लेख केल्याचे आठवते. आता “थँक यू” सगळेच आणि कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीची दखल घेताना म्हणताना आढळतात. कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या तोंडी विषयप्रवेशासाठी “ऐका ना” असं म्हणण्याची पद्धत आहे. मी ते पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला मी समोरच्याचं ऐकून घेत नाही की काय असं वाटून सटपटले होते.
फुटकळ, पण क्षुल्लक नसलेल्या या संभाषण-वंगणांबाबत इतरांची काय मतं / निरीक्षणं आहेत ?
चिं.वि. जोशी (अवांतर)
काय मी आदूबाळ यांच्याशी बोलत आहे?
चिं.वि. जोशी हे अनेकदा आपल्या कथांतून, एखादे संभाषण इंग्रजीतून चाललेले आहे, हे सूचित करण्यासाठी, इंग्रजी वाक्याचे शब्दशः मराठी भाषांतर त्याच्या इंग्रजी व्याकरणानुरूप शब्दक्रमासहित लिहीत असत, ते आठवले. वाचायला फार चमत्कारिक वाटत असे ते! (अर्थात, ही चमत्कृती विनोदनिर्मितीकरिता तथा जाणूनबुजून असल्याकारणाने ते ठीकच म्हणा.)
मराठीची धाटणी सोडून
मराठीची धाटणी सोडून इंग्रजीच्या वळणाने होणारी वाक्यरचना बोकाळली आहेच. अनेकदा त्यावर हिंदीचीही छाप दिसते. असल्या अधेड भाषेत आलेले मजकूर संदेश म्हणून बरे असतील तर मी सरळ त्याचं शुद्धलेखन, वाक्यरचना सुधारून त्याच गटाला परत पाठवते आणि सांगते फॉरवर्ड करणार असाल तर ती सुधारित आवृत्ती वापरा.
दहा पंधरा वर्षांपूर्वी मी आणखी एक उद्योग करायचे. कॉल सेंटरला फोन केला की आवर्जून मराठी हा पर्याय निवडायचा. फोनचं किंवा क्रेडिट कार्डाचं बिल (उदा. सात – शंभर – पंचवीस) असं ऐकलं की “ग्राहक सेवा कर्मचाऱ्याशी वार्तालाप करण्याचा” पर्याय निवडायचा. मग मराठी भाषक कोणी उपलब्ध होईपर्यंत म्हणजे सहजच दहा पंधरा मिनिटं प्रतीक्षा करायची, त्यांना शंभराच्या पटीतल्या संख्येसाठी भंभर नव्हे, शे म्हणतात, ती दुरुस्ती करा म्हणून सांगायचं, त्यावर प्रतिक्रिया म्हणून अधेड मराठी ऐकायचं. मूळ इंग्रजी, हिंदी वाक्यांचा वास यायचाच. त्यात so that साठी मात्र हटकून “जेणेकरून” वापरलेलं असायचं. मी मग त्या व्यक्तीलाच तुम्ही स्वतः मराठी भाषक असूनही असं कसं कृत्रिम बोलता हो, रेकॉर्ड होतंय ना हे संभाषण ऐकवा जरा वरिष्ठांना वगैरे खूप त्रागा करायचे. पुढे sms / email ने बिलं मिळायला लागली आणि ती चिडचिड व्हायची थांबली.
रोचक निरीक्षण
'द स्टोरी ऑफ फ्रेंच' हे पुस्तक उज्ज्वला, तुला फार आवडलं नसल्याचं तू मागे कुठे तरी लिहिलं होतंस. त्याच पुस्तकात गंमत वाचली होती.
'बोनजूर' हा शब्द फ्रेंचमध्ये 'गुड मॉर्निंग'चं भाषांतर म्हणून तयार झालेला नाही. तो फ्रेंच संस्कृतीसह विकसित झाला. मराठीतली वाक्यं आता सरळसरळ भाषांतरं म्हणून तयार होत आहेत. एरवी रोज भेटल्यावर चुकार हाय-हॅलो-गुडमॉर्निंग करण्यात वेळ न घालवणारे लोक हल्ली व्हॉट्सॅपवरून न चुकता गुड मॉर्निंग करतात. 'कसं चाललंय' यावर 'बरं आहे की' असं उत्तर पूर्वी अस्थानी ठरत नसे. हल्ली 'कशी आहेस' याला 'बरी आहे' असं उत्तर दिलं की कोणी तरी धोक्याची घंटा सुरू करतात. 'बरी आहेस म्हणजे आनंदात नाहीयेस का' वगैरे.
(सवांतर)
मराठीत बोलताना “सुप्रभात” या आकाशवाणी छाप उद्गाराचा वापर फक्त काही नातेवाईक व मित्रमंडळी यांच्या बरोबर बोलताना, विशेषतः व्हाट्सॅपवर होतो.
मुळात, दोन मराठी माणसे भेटल्यावर त्यांनी एकमेकांना (एकमेकांशी मराठीतून बोलताना) 'तुझी सकाळ/दुपार/संध्याकाळ चांगली जावो', असे म्हणण्याची गरज काय आहे? (कावळ्याच्या आशीर्वादाने...)
१. केवळ इंग्रजीभाषक तसे म्हणतात, म्हणून? (नाही म्हणजे, त्यांच्या भाषेत ते ठीकच आहे, नि इंग्रजीतून बोलताना दोन मराठीभाषकांनीसुद्धा तसे म्हणण्याबद्दल काहीच आक्षेप नाही. पण मराठीतसुद्धा ते कशासाठी ओढून आणायचे?) हे म्हणजे, महात्मा गांधी जेव्हा हेल्थफ्रीकमोडमध्ये असत - आणि त्यांची आरोग्यविषयक मते अचाट होती, हे जगजाहीर आहे - तेव्हा ते येणाऱ्याजाणाऱ्यास पहिला प्रश्न "How were your bowel movements this morning?" असा करत, असे वाचलेले आहे. त्यावरून प्रेरणा घेऊन आम्ही जर सर्वांना "काय मग? आज सकाळी शी कशी झाली?" असे वंदन करू लागलो, तर येथे ते किती जणांना रुचेल? (गांधीजींच्या हेतूच्या शुद्धतेबद्दल आम्हांस यत्किंचितही शंका नाही, हे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते. परंतु तरीही.)
२. बरे, मराठीत बोलतानासुद्धा तेच वंदन (इंग्रजांच्या चांगल्या वाटलेल्या प्रथेचे अनुकरण म्हणून) करायचेच आहे, तर मग मुळाबरहुकूम इंग्रजीतूनच का करू नये? (आणि मग उर्वरित संभाषण खुशाल मराठीतून चालू ठेवावे!) त्याचे ओढूनताणून मराठीकरण (किंवा, खरे तर, मराठीकरणाच्या नावाखाली संस्कृतीकरण) का करावे? (दोन मराठीभाषक मुसलमानांनी एकमेकांना भेटल्यावर 'अस्सलाम-आलैकुम्'-'व-आलैकुम्-अस्सलाम'ऐवज 'तुझ्या घरात शांती नांदो'-'आणि शांती नांदो तुझ्याही घरात' असे अभिवादन-प्रत्यभिवादन करावे काय? काय म्हणून? सकाळीसकाळी सावरकर चावले काय त्यांना?)
३. तसेही, 'नमस्कार', 'रामराम' आदि मराठी अभिवादने मरण पावली काय? की (मराठीतून) असले हे खुळचट 'सुप्रभात' म्हणावे लागावे?
टोटली
मी लहानपणी जेथे राहात होतो तेथे "चला" आणि "जेवण झालं का" हे खूप ऐकले आहे. बाकी बहुतांश लोक नुसते भुवया वर खाली करून सलामी देत. फार फार तर "काय म्हणता" वगैरे विचारत.
पण एकूणच आपल्याकडे आभार हे देहबोलीतून दाखवायची पद्धत असावी. लोक सहसा चेहऱ्यावर आभार दाखवतात किंवा हात वगैरे दाखवून. मलाही धन्यवाद, कृपा करून वगैरे खूप कृत्रिम वाटते.
तसेच अमेरिकन किंवा एकूणच परदेशी लोक आपण तुमची भाषा बोलायचा प्रयत्न करत आहोत हे दाखवायला "नमस्ते" (ना-मस-ते वगैरे) म्हणतात ते ही. शाळेत शिक्शकांना एकसाथ नमस्ते केल्यानंतर पुढे कोणीही कोणालाही नमस्ते करताना पाहिले नाही.
नवरोम्यांटिक मराठी कथांमधे "तो माझी किती काळजी घेतो/करतो" हे एक बॉयलरप्लेट वाक्य टाकलेले असते. ते ही बहुधा he cares for her वरून तसेच घेतले असावे. नाहीतर इतक्या तरूण लोकांना सतत कोणीतरी काळज्या करायची काय गरज असते माहीत नाही.
न बा, पोटतिडिकेने आलेली
न बा, पोटतिडिकेने आलेली प्रतिक्रिया मनापासून आवडली. नमस्कार, रामराम हे आहेतच, पण होतं असं की व्हाटसॅप ग्रुपवर (तिथेही मी पुष्कळ उशीराच प्रवेशले) पायंडा पडून गेलेला होता. विशेषतः देशोदेशी विखुरलेल्या मित्रमंडळींच्या वास्तवाची दखल म्हणून सकाळ, संध्याकाळचा उल्लेख (मग दुबईकराचा सिंगापूरकरासाठी गुड डे). सगळे सर्वदा सगळ्यांना अभिष्टचिंतन करत बसत नाहीत, पण नेहमीचे यशस्वी व्यग्र असलेले दिसले की दुसरं कोणीतरी पुढे होतं. शाम मनोहरांनी भाषा कोणते समाजगट कशी वापरतात याचीच निरीक्षणं नोंदवली होती. त्या अनुषंगानेच मी लिहिलं होतं.
“जेवण झालं का” हे विचारणं हाही संभाषण सुरु करण्याचा भाग असतो हे मला माझ्या माजी सासरी समजलं होतं.
मी सध्या जिथे राहते तो रस्ता अजून तरी वाहता नाही (अजून काही वर्षांनी तो दोन पुलांना जुळणार आहे) त्यामुळे रस्त्यावर दुभाजकापलीकडे क्रिकेट चालतं आणि ती खेळणारी मुलं जेव्हा आमच्या सोसायटीत चेंडू येतो तेव्हा “बॉल बॉल बॉल” एवढंच म्हणून चेंडू हक्काने मागून घेतात. अशा वेळी हेही एक वास्तव याची जाणीव होते.
रिक्षावाला बघतोय
काल रिक्षानं जात असता सहप्रवाशांशी जोरजोरात मोदींविषयी चर्चा चालू होती (किंबहुना सामूहिक गालीप्रदानच). मध्येच रिक्षावाल्यानं रिक्षा बाजूला घेतली. बाहेर जाऊन काही तरी खुटखुट केली आणि मग म्हणाला, 'दुसरी रिक्षा पकडा.' मी म्हटलं, मोदींवर टीका केली म्हणून आम्हाला बाहेर काढतोयस की काय! तर म्हणाला, त्या *** माणसामुळेच ही वेळ आली आहे : मला रिक्षा चालवायची आहे, भाडंही भेटलेलं आहे, पण पेट्रोलच संपलंय रिक्षातलं. :-)
खेकड्यांची संघवृत्ती
घुबडांची संसद, मोरांचा दिखावा आणि खेकड्यांची(!) संघटना अन्य:
https://www.mnn.com/earth-matters/animals/blogs/99-strange-collective-a…
WOW विमान कंपनी
WOW नावाची अतोनात स्वस्त विमान कंपनी बंद पडली. म्हणजे अशी बंद पडली की काही दिवसांपूर्वी त्यांनी अचानक जाहीर केले की आम्ही आउट ऑफ बिझनेस जात आहोत. सगळी विमाने रद्द केली. लोकांचे पैसे बुडले, लोक इकडे तिकडे गेलेले, त्यांना अन्य कोणत्या तरी विमानकंपनीची विमाने बुक करावी लागली.
परवा एअरपोर्टवरुन जाताना मी पाहीले Wow कंपनीचे विमान सर्व विमानांहून दूर कुठेतरी उभे करुन ठेवले होते.
यूएस स्टॉक मार्केट
तुम्हाला इमर्जिंग मार्केट इक्विटी एक्स्पोजर बर्यापैकी सॉफिस्टीकेटेड पद्धतीने घेता येईल. मी युएस मार्केट ट्रॅक करत नाही पण बर्याच म्युच्युअल फंडांचे इमर्जिंग मार्केटचे इटीएफ आणि फंड असतीलच. तुम्ही चौकशी करा/शोधा. तो बेस्ट अप्रोच राहील. त्यामुळे तुम्हाला करंसी रिस्क हेज करायचं टेन्शन नाही राहणार. ती सगळी जबाबदारी फंड मॅनेजरची....
पण बायदवे, तुमची युएस इकॉनॉमी चांगली चालली आहे की. बर्याच तज्ञांना युएस जीडीपी आकड्यांनी तोंडघशी पाडलं. अटकळ अशी होती की इतकी वर्ष रेकॉर्ड ब्रेक घोडदौडीला आता खीळ बसेल आणि इकॉनॉमि रिसेशन मध्ये जाईल. पण टॅक्स बेनेफीटचा काही अंशी फायदा झालेला दिसतोय. फेड रेट पण आता स्टेबल आहेत. आता अटकळ अशी आहे की अजून काही तिमाही वा एखाद-दोन वर्ष घोडदौड कायम राहील. प्रो. अस्वथ दामोदरांनी वर्षाच्या सुरुवातीला (http://pages.stern.nyu.edu/~adamodar/) इक्विटी रिस्क प्रिमियमयम वरून अशी अटकळ केली होती की यूएस स्टॉक मार्केट अजूनही बुल मार्केटला सपोर्ट करत आहे. नंबर्स तसं सजेस्ट करत असूनही मला वाटलं, प्रो. या वेळी चुकले असतील, कारण ते मत इतर तज्ञांशी मिळतं जुळतं नव्हतं. शिवाय डिसेंबर मध्ये यूएस मार्केट मध्ये जी घसरण झाली त्यावरून वाटलं की बुलरनच्या घोडदौडीची वाफ संपली. पण जानेवारी पासून बैल सुसाट पळाला आहे. ४ महिन्यांनी प्रोफेसरांची अटकळ बरोबर होती असे म्हणावे लागत आहे.
"ऑन माय ओन" साठी ऑल दी बेस्ट आणि शुभेच्छा!
वा! माहीतीपूर्ण प्रतिसाद आहे
वा! माहीतीपूर्ण प्रतिसाद आहे हा. फंड मॅनेजर (कंपनी) थ्रुच काही स्टॉक्स घेतले व लगेच घाबरुन विकले. पण फार एक्सायटिंग वाटले.
इमर्जिंग कंपनींचे इटीएफ व म्युच्युअल फंड असतील हे माहीत नव्हते तसेच या सर्वांची जवबाबदारी फंड मॅनेजरची असते हे माहीत नव्हते.
खरं तर काहीच माहीती नाहीये. पण हे फिल्ड ग्लॅमरस वाटते व त्याकडे ओढा आहे. माहीतीबद्दल खूपच आभार.
_________________
त्या कंपनीचे १० स्टॉक्स काहीतरी ५०.११ ला घेतलेले होते ज्याची किंमत आत्ता ५२.८३ झालेली आहे. लहान स्टेप्स ने सुरुवात करेन. कॉन्फिडन्स येउ देत.

काय मंग, काय ठरलं? गायकवाड की
काय मंग, काय ठरलं? गायकवाड की काकडे? शिरोळे की बापट? हांय?