मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ११२

प्रश्न

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

field_vote: 
0
No votes yet

जीभ आपल्या शरीराचा महत्वपूर्ण अवयव आहे. जीभ नसेल तर जेवणाचा स्वाद घेता येणार नाही. जीभ नसेल तर आपण बोलू ही शकत नाही. पण काय बोलावे आणि कसे बोलावे हेच जर आपल्याला कळत नसेल तर मौन राहणे उत्तम. कधी-कधी जीभेतून सुटलेले कटुवचन सर्वनाशाला ही कारणीभूत ठरतात. श्री सार्थ दासबोधात समर्थ अश्याच लोकांसाठी म्हणतात:

जनासीं मीत्री करीना।
कठिण शब्द बोले नाना।
मूर्खपणें आवरेना।
कोणीयेकासी॥
1९/३/१३॥

याचेच एक उदाहरण: महाभारतात राजसूय यज्ञाचा एक प्रसंग आहे. महाराज युधिष्ठिराने राजसूय यज्ञात येण्यासाठी कौरवांना ही निमंत्रण दिले होते. या आयोजनाचा एक उद्देश्य कौरवांशी मैत्री संबंध्द दृढ करणे ही होता. पण झाले काय मय दानवाने बांधलेल्या मायावी महालात दुर्योधन सहित सर्व कौरव पाण्यात पडतात. त्यांना असे पाण्यात पडताना पाहत द्रोपदी त्यांचा उपहास करत आपल्या सखींना म्हणाली पहा " आंधळ्याचे पुत्र आंधळे" कसे सर्व पाण्यात पडले हा! हा! हा! ". जिभेचा हा वार दुर्योधनाला जिव्हारी लागला. त्याच क्षणी त्याने पांडवांचा सर्वनाश करण्याचा प्रण केला. पांडवांच्या सर्वनाशासाठी त्याने नाना षड्यंत्र केले. परिणाम, महाभारताच्या युद्धात संपूर्ण कुरुवंशाचा संहार झाला. जर द्रोपदीने मूर्खतापूर्ण कटू वचन बोलले नसते तर पांडव इंद्रप्रस्थात आणि कौरव हस्तिनापुरात सुखाने नांदले असते. या प्रसंगावरून एकच धडा मिळतो कुणालाही तो कितीही दीनहीन किंवा मूर्ख का असेना, जिभेने कधीच चुकूनही कटू वचन बोलले नाही पाहिजे.

जर द्रोपदीने मूर्खतापूर्ण कटू वचन बोलले नसते तर पांडव इंद्रप्रस्थात आणि कौरव हस्तिनापुरात सुखाने नांदले असते.
खरंच???

वारणावता मधे पांडवांना जाळून मारण्याचे कारस्थान रचले गेले होते.. त्या वेळेला द्रौपदी स्वयंवर सुद्धा झालेले नव्हते.

*********

उतनाही उपकार समझ कोई जितना साथ निभाए |
जनम मरन का मेल है सपना, ये सपना बिसरा दे |
कोई ना संग मरे ...

गुड क्याच.

प्रवाह विरुद्ध मत व्यक्त करणे किंवा तसे वर्तन करणे,तसा विचार करणे .
हे मूर्खपणाचे आहे का?
असे माझ्या वरील पोस्ट मध्ये आहे.
जगातील अनेक प्रवाह विरुद्ध आंदोलन झाली .
आणि त्या मुळेच खूप चांगले बदल समाजात झाले.
तेव्हा प्रवाह विरुद्ध जाणाऱ्या लोकांस मूर्ख च समजले जात होते.
पण तेच नवीन युगाचे रचनाकार आहेत.

"वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसेच इतिहास घडवतात.."
असे श्री बाबासाहेब पुरंदरे यांनी "शिवकल्याण राजा" च्या एका भागात म्हणले आहे.

*********

उतनाही उपकार समझ कोई जितना साथ निभाए |
जनम मरन का मेल है सपना, ये सपना बिसरा दे |
कोई ना संग मरे ...

तीन चार दिवस दूरदर्शन (सह्याद्रीच्या) ९: ३०च्या बातम्या पाहतोय.
अर्धा वेळ एक्साम वॉरियर्स ह्या मोदींच्या पुस्तकाबद्दल बोलण्यात घालवला - सलग चारही दिवस. लहान पोरांना पाठ करून घेऊन कॅमेऱ्यासमोर बोलायला सांगितलेले. परीक्षेचा अत्यंत ताण असतो आणि मोदींच्या पुस्तकामुळे तो कमी झाला असे मध्यमवर्गीय पोरं सांगत होती. Bullshit.

इतरही दिवस असेच काहीतरी असते. मोदी कुठेतरी कार्यक्रमात गेले तिथे काय बोलले ह्याचे कव्हरेज डिटेल मध्ये असते. अनुराग ठाकूर (माहिती आणि प्रसार मंत्री) न चुकता दररोज बातम्यांमध्ये काही ना काही कारणाने असतोच असतो. कुठे आय सांस्कृतिक कार्यक्रम झाले त्याचे फुटेज. आज तर साली हद्दच झाली.

बातम्यांचा क्रम
१. परीक्षा पे चर्चा -एक्झाम वॉरियर्स - मोदींचे थोडे भाषण आणि मुलांचे अनुभव -१० मिनिट
२. शांघाय सिनेमा फेस्टीव्हल (अनुराग ठाकुर भाषण)
३. कुठेतरी काहीतरी कार्यक्रम होता तिथे कुठला नाच सादर केला गेला. (Not kidding!)
४. नितीन गडकरी रस्त्याचे लोकार्पण
५. ऑस्ट्रेलियन ओपन
६. सानिया मिर्झा रिटायर.
७. भुयारी रस्त्याचे एकनाथ शिंदेंकडून लोकार्पण
८. भारत जोडो यात्रा चर्चेत रहावी म्हणून काँग्रेस आणि राहुल गांधी बेछूट वक्तव्य करत आहेत - भाजपा नेत्याचा आरोप
thats it !!!!
आज दखल घेण्यासारखे अजून काही झाले का ? ह्ममममममम....
सेन्सेक्स ८०० पॉइंट नी कोसळला. आज साधा उल्लेख सुध्दा नाही. हिंडनबर्ग रिपोर्ट बद्दल काल जेमतेम दोन मिनिट सुध्दा बातमी दिली नव्हती.

प्रश्न हा, की दूरदर्शन नेहमीच असे होते का, म्हणजे इतके भंपक होते का ? का कधी काही बघण्यालायका खरोखरचा बातम्या सुध्दा असायच्या ?

आक्षेप जर दूरदर्शनसारख्या सरकारी माध्यमावरील बातम्यांचा उपयोग मोदींची टिमकी वाजविण्याकरिता(/पुरताच) केला जात आहे, असा जर असेल, तर कदाचित रास्त मानता येईलही. (ऑल्दो, इतर राजवटींत हे कधी झाले नाही, असेही नाही; तरीसुद्धा, आक्षेपात (मोदीनिरपेक्ष) काही दम आहे.)

मात्र, lack of newsworthiness/भंपकपणा हाच जर का आरोप असेल, तर आजमितीस भारतातील बहुतांश खाजगी चॅनेलांवरील बातम्यांच्या कार्यक्रमांमध्ये तरी कोणती फारशी बरी परिस्थिती आहे?

इतकी वाईट परिस्थिती होती का दूरदर्शन बातम्यांची ? मी लहान असताना दूरदर्शनच्या बातम्या पाहिलेल्या त्या इतक्या वाईट असल्याचे आठवत नाही. पण लहानपणी धूम माझा सगळ्यात आवडता सिनेमा सुध्दा होता, म्हणून विचातोय.

दूरदर्शन इतके वाईट कधीच नव्हते. लोकसभा, राज्यसभा टिव्ही यातर अतिशय सुंदर वाहिन्या होत्या २०१४ पुर्वी, तिथले कार्यक्रम इतके उत्तम माहितीप्रचूर होते की युपीएससी वाले सुद्धा नेमाने बघत. सगळीकडे सुमार लोक भरून आपली आरती ओवाळून घेणे यात प्रचंड इंटरेस्ट असणारी जोडगोळी आहे सत्तेत त्यामुळे ही अधोगति.

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

आणि दूरदर्शन कडून विद्यमान केंद्र सरकारचा उदो होईल इतके तर अपेक्षित आहेच हो. पण किमान बेसिक बातम्या निदान प्रो सरकार स्पिन देऊन का होईना, ऐकायला तरी मिळाव्यात की नाही !? तेव्हढे सुध्दा नाही हे मला धक्कादायक वाटले.

एखादी अत्यावश्यक किंवा उत्सुकतेची बातमी ही त्यांची वेळ टळून गेल्यावर दाखवत.

News चॅनेल हा एक व्यवसाय आहे .समाज सेवा नाही . ( जसे सर्रास समजले जाते मीडिया ही समाज सेवा आहे चोथा स्तंभ आहे लोकशाही चा,साफ चूक आहे)

सरकारी news चॅनेल चे मायबाप हे सरकार असते
आणि खासगी चॅनेल चे मालक हे स्वतःचा फायदा जास्तीजास्त व्हावा म्हणून न्यूज चॅनल च वापर करतात
जाहिराती मधून होणाऱ्या फायद्या पेक्षा जास्त फायदा सरकारी आशीर्वाद नी बाकी मार्गाने होतो.
पार्ट टाइम चॅनेल व्यवसाय आणि मुख्य व्यवसाय वेगळा .
अशी स्थिती असते

निःपक्ष पत्रकारिता हा प्रकार आता राहिला नाही.

काल च एक आर्टिकल वाचले आणि ते पटले पण.

जगातील सर्व देश पुढे येणाऱ्या प्राकृतिक किंवा साथीचे रोग अशा संकटाना समोर जाण्यास सक्षम आहे त का?

Covid मध्ये खूप मोठी मनुष्य हानी झाली.
ती पण अशा वेळी की आधुनिक यंत्रणा माणसाकडे उपलब्ध आहे.
भूकंप,किंवा दुष्काळ ह्या मध्ये जितकी लोक मेली नाहीत त्या पेक्षा जास्त लोक covid मध्ये मेली.
जग भीतीच्या छायखाली असहाय झाले होते.
पुढे कोणती हवामान बदला मुळे प्राकृतिक संकट आले तर?
जगातील एक तरी देश त्याचा मुकाबला करू शकेल का?
एक साधा विचार करा .
दोन वर्ष आपल्या देशात पावूस पडलाच नाही(जग राहू ध्या)
काय अवस्था होईल
अशी वेळ जेव्हा येईल तेव्हा भारत सरकार ची काय तयारी असेल.
काहीच नाही.

अन्न अन्न आणि पाणी पाणी करून लोक जीव सोडतील.
पैसे हे आभासी चलन आहे त्याचा उपयोग अशा वेळी बिलकुल होत नाही.
संसाधने ही खरी संपत्ती आहे.
Gdp वर श्रीमंत की गरीब ठरवणे च अयोग्य आहे.
ज्या देशाकडे नैसर्गिक संसाधने जास्त ते च खरे श्रीमंत.
नैसर्गिक संकटात हेच gdp कमी पण नैसर्गिक संपत्ती जास्त तेच देश वाचतील.
बाकी सर्व नष्ट होतील.
Dienosore नष्ट झाले पण उंदीर वाचले तसे आहे है
चलनी नोटा आणि सोने ,हिरे ही खरी संपत्ती नाही

जगात एकदी गोष्ट उपलब्ध च नसेल तर ?
अब्जो डॉलर असून पण ती तुम्हाला मिळणार नाही.
मुंबई मध्ये जेव्हा पुर आला.
लाखो रुपये गाडीत पडले आहेत अन एक दहा रुपया
चा वडापाव खरेदी करू शकत नाही अशी अवस्था होती.
संसाधने निर्माण करणे म्हणजे संपत्ती निर्माण कारणे

चलनी नोटांची किंमत
कचऱ्या पेक्षा पण जास्त नाही.
पाण्याचा साठा दोन वर्ष पुरेल अशी व्यवस्था जगात एका पण देशात नाही.
खरेच तशी वेळ आली तर?
नवीन प्रकारचा व्हायरस जगात पसरला तर?
ह्या वर काही संशोधन जगात पूर्ण क्षमतेने होत नाही.
Covid येवू शकतो ह्याची जाणीव माणसाला २०२६ लाच झाली पाहिजे होती.
पण जेव्हा प्रत्यक्ष व्हायरस नी पाय पसरायला सुरुवात केली तरी जगाला हा व्हायरस ओळखता आला नाही.
ओळख पटविण्यासाठी दोन वर्ष गेली.
तो पर्यंत भयंकर नुकसान झाले होते

१. Dienosore हे स्पेलिंग प्रचंड आवडले.

२. नका इतका विचार करत जाऊ.

Covid येवू शकतो ह्याची जाणीव माणसाला २०२६ लाच झाली पाहिजे होती.

कोव्हिड येऊ शकतो, याची जाणीव माणसाला (सर्वप्रथम) जर २०२६मध्ये झाली असती, तर तोवर किंचित उशीर झाला नसता काय?

(इ.स. १९६९) म्हणायचे असेल असा गंभीर विचार मनात आला

स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरात काही चुंबक (मॅग्नेट) नसतो. पण तरीही ते एकमेकांकडे कसे आकर्षित होतात?
स्त्री आणि पुरुष यांच्यातील याच निसर्गनिर्मित अनंत आकर्षणाची आणि मानवनिर्मित अथांग राजकारणाची गोष्ट विनोदी पद्धतीने सांगणारी ‘स्त्री & पुरुष’ ही अवघ्या दहा मिनिटांची शॉर्ट फिल्म खालील लिंकवर विनामूल्य पहा.
https://www.mxplayer.in/movie/watch-stree-and-purush-short-film-movie-on...
आणि शॉर्ट फिल्म तुम्हाला आवडली तर शॉर्ट फिल्मची ही लिंक तुमच्या काँटॅक्टमधील इतरांना, ग्रुप्सना शेअर आणि फॉरवर्ड करा.
धन्यवाद!

Vijay Pashte

हिंडनबर्ग रिपोर्ट बद्दल काल जेमतेम दोन मिनिट सुध्दा बातमी दिली नव्हती.
ही कंपनी मूडी, मॉर्गन स्टेनले, एस&पी सारखी व्यवसायिक डाटा क्षेत्रात कार्य करत नाही. 10 कर्मचारी ही या कंपनीत नसेल. ही अशीच रिपोर्ट आहे जसी भारताचा हंगर इंडेक्स . याशिवाय पाहिल्याच पानावर ही आमची निजी राय आहे. हे disclaimar देऊन टाकते. कुणाच्या तरी सांगण्यावर बिना अध्ययन करता बनवलेली रिपोर्ट. दूरदर्शन या रिपोर्टला महत्व का म्हणून देणार.
बाकी 2014 पूर्वी पेक्षा दूरदर्शन वर जास्त उत्तम कार्यक्रम येतात, हे निश्चित.

जखम अंमळ खोलवरची दिसते आहे. काळजी घ्या पटाईत काका.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भक्त मंडळींनी फेबुवर हिंडेनबर्गला हिडिंबा सुद्धा म्हटलं आहे.

त्यांची लेव्हल तितपतच.

चालायचेच.

रिपोर्ट प्रसारित झाला की आरोप करणाऱ्या कंपनीला चा टारगेट करणे.
त्यांच्या कुवती वर प्रश्न चिन्ह उभे करणे.

वैयक्तिक व्यवहार ना देशांशी जोडणे.
हे सर्व रिपोर्ट खरे आहेत ह्याचा पुरावा आहे.
त्या पेक्षा चोकशी करून सत्य काय ते जनते समोर ठेवले जाईल . इतकी एका वाक्यात केंद्र सरकार नी हमी दिली असती तर .
लोकांना चा विश्वास वाढला असता.
इतके साधं आहे हे

आज काल बातम्या देत असते .अगदी head लाईन्स.
Meta नी इतके कर्मचारी काढून टाकले.
गुगल नी इतके कर्मचारी काढून टाकले.
बाकी अनेक अंतर राष्ट्रीय कंपन्या.

ह्यांचं हेतू ह्या बातम्या देण्यात नक्कीच शुद्ध नाही.
त्यांचा आधार घेवून येथील कर्मचारी वर्गावर अन्याय करण्याचा तो माणसं आहे.
एक फ्रेश सामान्य इंजिनिअर .
गुगल मध्ये नोकरी पा ल लागला तर त्या नक्कीच लाखात पगार असणार.
त्याच दर्जा चा इंजिनियर भारतात कामाला लागला तर त्याचा पगार दहा ते पंधरा हजार फक्त असतो.
खूप फरक आहे.
अग्निविर ल २६ हजार पगार आहे.

खूप खूप मोठा फरक आहे.
पण कामावरून काढून टाकले चार वर्षात ही बातमी पसरून दिली जाते पण स्थिती दोघांची काय आहे हे नाही संगत.
फक्त लबाडी

आज काल बातम्या देत असते .अगदी head लाईन्स.
Meta नी इतके कर्मचारी काढून टाकले.
गुगल नी इतके कर्मचारी काढून टाकले.
बाकी अनेक अंतर राष्ट्रीय कंपन्या.

ह्यांचं हेतू ह्या बातम्या देण्यात नक्कीच शुद्ध नाही.
त्यांचा आधार घेवून येथील कर्मचारी वर्गावर अन्याय करण्याचा तो माणसं आहे.
एक फ्रेश सामान्य इंजिनिअर .
गुगल मध्ये नोकरी पा ल लागला तर त्या नक्कीच लाखात पगार असणार.
त्याच दर्जा चा इंजिनियर भारतात कामाला लागला तर त्याचा पगार दहा ते पंधरा हजार फक्त असतो.
खूप फरक आहे.
अग्निविर ल २६ हजार पगार आहे.

खूप खूप मोठा फरक आहे.
पण कामावरून काढून टाकले चार वर्षात ही बातमी पसरून दिली जाते पण स्थिती दोघांची काय आहे हे नाही संगत.
फक्त लबाडी

काही दिवसांपूर्वी युट्यूब शाॅर्टस वर recommendation मध्ये आलेला loudermilk चा काॅफीशाॅपचा व्हिडिओ पाहिला ज्यात व्होकल फ्रायचा कचरा केलेला दाखवला. नंतर यावरचे इतर व्हिडिओ पाहिले. व्होकल फ्राय म्हणजे मला समजलं ते एवढंच की मुळ आवाजामध्ये विशिष्ट प्रकारचा फाटकेपणा आणायचा जेणेकरून तो आकर्षक (मादक?) वाटला पाहिजे. काही गायकांची गाणी निव्वळ ह्या प्रकारच्या आवाजामुळे प्रसिद्ध झाल्याचे समजले. एका दुव्यावर माहिती मिळाली की अनेक मोठमोठे नट्या, नट, गायकं, रेडिओ निवेदक सर्रास व्होकल फ्रायचा वापर करतात. (Sorry to bother you चित्रपटात white voice वापरून नायक प्रगती करताना दिसलाच की) जोपर्यंत हे माहीत नव्हते तोपर्यंत थोडेफार हा प्रकार श्रवणीय वाटायचे पण आता उगीचच irritating वाटताहेत. ओरजीनॅलीटीचा जमानाच नाही राहिला. छ्या.

भांबड आलं

याला भारतीय सेमीक्लासिकल संगीतात देखील सौंदर्याचे स्थान आहे. बेगम अक्ख्तरची पत्ती लागणे हे तर वाहवाचा कळस समजले जाते.

एक प्रश्न पडला, ॲडेल जर लोकल फ्रायचा वापर करत नसेल तर ती ॲडेल राहील काय?

म्हणजे तिच्यासाठी मस्ट आहे, तिच्या गाण्यांचा उपयोग पाहता.

अजून एक लोकल प्रायचा आवडता उपयोग म्हणजे ब्रुकलिन नाईन नाईन मधली जिना लिनेटी.

"झाडावरती एक गिधाड"

Zhadawarti ek gidhad

"क्लोज़अप"