Skip to main content

मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ११३

प्रश्न

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

Rajesh188 Tue, 09/01/2024 - 22:28

कण म्हणजे काय हेच बेसिक माहीत नसेल तर वरील लेख वाचून समजेल ही अपेक्षा ठेवणे गैर आहे.

ज्यांनी हा लेख लिहला आहे त्यांना तरी समजला असला तरी खूप झाले

विवेक पटाईत Sun, 14/01/2024 - 11:16

शेकडों वर्षांचा वनवास भोगून येत्या २२ जानेवारीला भगवंत पुन्हा अयोध्यात मानाने प्रतिष्ठित होत आहे. या पावन क्षणांची सम्पूर्ण जग आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. यावर ऐसीकरांचे विचार...

'न'वी बाजू Sun, 14/01/2024 - 18:02

In reply to by विवेक पटाईत

मला जे काही रामायण थोडेबहुत (अंधुकसे) आठवते, त्यानुसार, वनवासाहून अयोध्येस परत आल्यानंतर श्रीरामाने:

- कोठल्यातरी रँडम धोब्याच्या कानफुंकणीला ऐकून आपल्या गरोदर बायकोस जंगलात हाकलून दिलीनीत्.

- तो अश्वमेध की कायसासा करून स्वतःच्याच पोरांकडून हाग्यामार खाल्लानीत्.

- जलसमाधी घेतलीनीत्.

थोडक्यात, वनवासाहून परत येऊन अयोध्येत प्रस्थापित झाल्यानंतरचे श्रीरामाचे करियर फारसे ग्लोरियस नाही; फारसे दीर्घसुद्धा नाही. (काय त्या ‘रामराज्या’चे पार महात्मा गांधीजींपासून ते मोदीजींपर्यंत ज्यालात्याला आकर्षण असते, हे तो एक प्रभू श्रीरामच जाणे!)

आणि भाजप? त्या राममंदिराच्या ‘इश्यू’चा अजागलस्तन वर्षानुवर्षे पिळूनपिळून एकदाचे ते राममंदिर बांधून काय ती तिथे श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा एकदाची करून झाल्यानंतर, भाजपची अवस्था मग (आमच्या अमेरिकन भाषेत बोलायचे, तर) मोटारीमागे लागलेल्या कुत्र्याला ती मोटार एकदाची जर गावली, तर त्या कुत्र्याची जशी होते, तशी होणार नाही काय? राममंदिर तर बांधलेत, तिथे श्रीरामाची प्राणप्रतिष्ठासुद्धा केलीत; आता पुढल्या निवडणुका नक्की कशाच्या आधारावर जिंकणार आहात, म्हणे? (तो गोमांसाचा नि एनआरसीचा ‘इश्यू’ असा कितीसे दिवस पुरवूनपुरवून खाल?)

असो चालायचेच.

——————————

या दोन्ही विभूती गुजराती आहेत, याव्यतिरिक्त दोघांमध्ये हा आणखी एक साम्यबिंदू. (तसे पाहायला गेले, तर मुहम्मद अली जीनासुद्धा गुजरातीच होते, परंतु, का कोण जाणे, त्यांना ‘रामराज्या’चे अजिबात आकर्षण नव्हते. श्रीरामाची लीला अगाध आहे!)

चिमणराव Sun, 14/01/2024 - 19:05

In reply to by 'न'वी बाजू

प्रतिसाद हा तुम्हाला वैयक्तिक नाही पण मुद्यांना आहे.

ज्योतिषी लोक रामाची कुंडली सांगतात त्यात मंगळ आणि शनी ग्रह बेकार जागी बसले आहेत. गुरू, चंद्र असे आहेत की मेल्यावर कीर्ती होते. पराक्रमाचा रवि चांगला पण..पण..पण तो ग्रह राजा बनवत नाही. फक्त सांगितलेली कामे तडीस लावणे एवढेच काम करतो.

क्षणभंगुर Sun, 14/01/2024 - 21:45

In reply to by विवेक पटाईत

पटाईत काका, तुमच्या जगात मणिपूर आणि गाझा आहे का हो?
अंधभक्तांना जग म्हणणे म्हणजे मुंगीने स्वतःच्या टाळूला गंडस्थळ म्हणण्यासारखे आहे... (ही उपमा कोणाची ते माहित नाही)

Rajesh188 Sun, 14/01/2024 - 20:14

हे दोन आयडी bjp चे समर्थक आहेत.
श्री रामावर टीका करणे ह्याचा अर्थ bjp ला मदत करणे.

ह्या दोन आयडी सारखी लोक सरळ श्री रामावर टीका करणारी लोक bjp नीच पाळलेली असावीत असा मला संशय आहे .
ह्या लोकांन मुळे सीमेवर असणारे पण परत bjp कडे जातात.

राम मंदिर ला विरोध करायचे बाकी अनेक पॉइंट आहेत.
1) राम मंदिर हा धार्मिक मुद्धा असताना त्याचा वापर लोक भावना भडकावून निवडणुकी साठी केला जात आहे.
२) मंदिर पूर्ण न होताच फक्त निवडणुका आहेत आणि त्याचा फायदा उचलत आहेत.
३) श्री रामाला कोणाचा विरोध नाही पण श्री रामाचा वापर निवडणुकीत मत मिळवण्यासाठी करणे हे चूक आहे.

हेच पॉइंट फक्त highlite झाले तर च लोक कट्टर पना सोडून सदसद्विवेकबुद्धी वापरतील.

सरळ श्री राम ह्यांच्या वर च फालतू टीका टिप्पणी केली तर उलट परिणाम होवून सर्व हिंदू एक होतील .
आणि bjp पूर्ण बहुमत घेवून सत्तेत येईल.
म्हणून मी वर लिहिले आहे न '

'न'वी बाजू Sun, 14/01/2024 - 21:15

In reply to by Rajesh188

बरे, घटकाभर समजून चालू या की मी भाजपसमर्थक आहे.

सरळ श्री राम ह्यांच्या वर च फालतू टीका टिप्पणी केली तर उलट परिणाम होवून सर्व हिंदू एक होतील .
आणि bjp पूर्ण बहुमत घेवून सत्तेत येईल.

तुम्ही हिंदू आहात ना? ठीक आहे; आता, मी सरळ श्री राम ह्यांच्यावर (तुमच्या म्हणण्याप्रमाणे फालतू) टीकाटिप्पणी केलेलीच आहे. देणार आहात काय भाजपला आपले मत? म्हणजे निदान माझ्या श्रमांचे सार्थक तरी होईल!

(हं, आता, तुम्ही अगोदरच जर भाजपसमर्थक असाल, नि आपले मत तसेही भाजपलाच जर देणार असाल, तर मग मी उगाच श्रम घेतले म्हणायचे.)

(तुम्ही हिंदू नसल्यास क्षमस्व.)

राम मंदिर ला विरोध करायचे बाकी अनेक पॉइंट आहेत.
1) राम मंदिर हा धार्मिक मुद्धा असताना त्याचा वापर लोक भावना भडकावून निवडणुकी साठी केला जात आहे.
२) मंदिर पूर्ण न होताच फक्त निवडणुका आहेत आणि त्याचा फायदा उचलत आहेत.
३) श्री रामाला कोणाचा विरोध नाही पण श्री रामाचा वापर निवडणुकीत मत मिळवण्यासाठी करणे हे चूक आहे.

हेच पॉइंट फक्त highlite झाले तर च लोक कट्टर पना सोडून सदसद्विवेकबुद्धी वापरतील.

(भाजपला मते देणाऱ्या) लोकांना सदसद्विवेकबुद्धी असते, या गृहीतकाच्या आधारावर हा सगळा डोलारा उभा आहे. बाकी तुमचे चालू द्या.

(नाही, तुमच्या मुद्द्यांत अगदीच दम नाही, असे नाही म्हणणार मी. फक्त, दम असूनसुद्धा त्यांचा उपयोग नाही, इतकेच म्हणायचे आहे.)

चिमणराव Sun, 14/01/2024 - 21:54

In reply to by Rajesh188

लॉजिक काही समजले नाही.

माझे इथले प्रतिसाद वाचून मतदारांच्या झुंडी मतदानास जाऊन अमुक एका पक्षाला मत देतात?
माझे फेसबुक आणि वाटसपही झीरो आहे. कोणतेही ग्रूप्स नाहीत. तर मग नक्की कसा प्रचार करतो? शाळेचाही ग्रूप नाही . विविध संस्थळांच्य लोकांशीही खाजगी ग्रूप नाहीत.

आमच्याकडे घरी खोबऱ्याच्या वड्या केल्या तरी हट्टाने केशरीच होतात असंही नाही. पालकाच्या,दुधीच्या हिरव्यासुद्धा करतो.

सरकारविरोधी पक्ष जी काही मोळी बांधायच्या खटपटीत आहेत त्यातही मी काही अडचण आणत नाही.

Rajesh188 Sun, 14/01/2024 - 21:44

तुम्ही भारतात राहत नाही आणि भारतीय लोक सध्या कोणत्या युगात वावरत आहेत हे तुम्हाला माहीत नसावे.
भारतात भौतिक सुधारणा ठराविक भागात दिसत असली तरी भारतीय जनता अजून पण पुरातन काळातच जगत आहे.

भारतात कोणतीच निवडणूक .
गुणवत्तेवर होत नाही, आर्थिक प्रश्नांवर होत नाही,सामाजिक सुधारणा होत नाही कायदा सू व्यवस्था वर होत नाही.,बेरोजगारी वर होत नाही.शिक्षणाच्या दर्जा वर होत नाही.,
Infrastructure वर होत नाही.
फास्ट आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन ह्या वर होत नाही.

भारतात सरकार निवडली जातात ती फक्त जातीवर,धर्मावर, प्रांतावर .
आज पण.
त्या मुळे प्रतेक निवडणुकीत जात ,धर्म,प्रांत हेच निवडणुकीचे मुद्दे असतात
चवीला ,पाकिस्तान,बांगलादेश असतो.
अजून भारतीय जनता प्रगल्भ झाली नाही.

मी हिंदू च आहे .
पण सर्व जाती,सर्व धर्म ,सर्व प्रांतीय जे भारतात आहेत ते सरकार निवडताना गुणवत्तेचा बिलकुल विचार करत नाहीत .

म्हणूनच भारतीय मीडिया ,समाज माध्यम फक्त आणि फक्त जात धर्म,आणि pakisthan ह्या वरच चर्चा करत असतात.
भारतीय जनता जेव्हा प्रगल्भ होईल तो दिवस भारतासाठी दसरा,दिवाळी पेक्षा कमी नसेल

'न'वी बाजू Sun, 14/01/2024 - 22:50

In reply to by Rajesh188

तुमच्या मुद्द्यांबद्दल फारसे दुमत नाही.

मी भारतात राहात जरी नसलो, तरी थोडीबहुत कल्पना आहे मला. आणि, प्रामाणिकपणे बोलायचे झाले, तर इथे अमेरिकेतसुद्धा याहून फार वेगळी परिस्थिती आहे, असे निदान मला तरी म्हणवत नाही. (हं, मुद्दे थोडेबहुत वेगळे असू शकतील, कदाचित. किंबहुना, इथल्या राजकारणात पैशाचे प्रमाण तुलनेने कित्येक पटींनी असल्याकारणाने, इथले राजकारण नि त्याचे परिणाम कित्येक पटींनी अधिक गंभीर म्हणावे लागतील.)

बाकी, ‘प्रगल्भ जनता’ हे एक दिवास्वप्न असावेसे वाटते. आणि, ज्या पद्धतीने उजव्यांची सद्दी जगभर वाढत आहे, ती लक्षात घेता, ‘प्रगल्भ जनता’ ही एंटिटी जगभरात दिवसेंदिवस अधिकाधिक दुर्मिळ होत असावी, अशी धारणा होते.

मात्र, माझ्या इथल्या मतप्रदर्शनामुळे काही फरक पडत असेल, यावर माझा विश्वास नाही. बोले तो, जे भाजपला मत देणारे आहेत, ते भाजपला तसेही मत देतीलच. त्यांच्यावर माझ्या मतप्रदर्शनाने यत्किंचितही फरक तसाही पडणार नाहीच. आणि, माझ्या मतप्रदर्शनामुळे चिथावून जाऊन (उदाहरणादाखल) एखादा कट्टर काँग्रेसी हिंदू अचानक भाजपला मत देऊ लागेल, हे मला शक्य वाटत नाही.

(फार कशाला, विवेक पटाईत आणि तत्सम लोक हे इथे येऊन प्रचाराचे प्रयत्न जे करीत असतात, त्याचाही काही उपयोग होत असेल, असे मला वाटत नाही. हं, धुरळा उडतो निश्चित; मात्र, तो धुरळा मतांमध्ये भाषांतरित होत असेल, याबद्दल मी साशंक आहे. नाहक खर्च करते (म्हणजे, करीत असल्यास) भाजपचे आयटी सेल!)

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 14/01/2024 - 22:56

In reply to by 'न'वी बाजू

रामावर झालेला खर्च भाजपाला निश्चित फळणार, असा माझा तर्क आहे. हा तर्कच राहणार, कारण याचं counterfactual उपलब्ध होणं शक्य नाही. म्हणजे हे रामाचं प्रकरण आत्ता काढण्याजागी वर्षापूर्वी किंवा ऑक्टोबरमध्ये काढलं असतं तर, असा प्रयोग करता येणं अशक्य आहे.

चिमणराव Mon, 15/01/2024 - 08:35

भाजप त्यांच्या प्रयत्नाने, कामाने निवडून येते या म्हणण्यापेक्षा विरोधी पक्षांचा धुरळा, स्टार लिडरांची नेतेगिरी, संचालन लोकांना विश्वासार्ह न वाटणे हे कारण आहे असं मत बऱ्याच लेखकांनी,समीक्षकांनी नोंदवलं आहे.
पंजाब सरकारचे पाहा. कॉन्ग्रेसकडून आआप पक्षाने सत्ता अगदी हिसकावून घेतली. त्याचे कारण आआपची प्रलोभने आणि दिल्लीचं उदाहरण. या वेळी भाजप समर्थक, प्रचारक (ऐसीवरचेही असले तर) निष्फळ, निष्प्रभ का ठरले? मतदार आपला फायदा बघतात. कुणी चुचकारलं किंवा हिणवलं म्हणून मतं देत नसतात.
कुणाला मी पुणेकर वृत्तीचा( १९६०-७० च्या काळांत विनोदी लेखकांनी वर्णलेली) किंवा भाजपीय वाटत असेल तर नाइलाज आहे.

विवेक पटाईत Mon, 15/01/2024 - 08:16

५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर श्रीराम पुन्हा स्वगृही स्थापित होणार. या विषयावर वाचकांचे मत अपेक्षित.

स्वतःचे कुठलेही मत व्यक्त न करता वाचकांचे मत विचारण्याचे प्रयोजन कळले नाही.
सर्व्हे वगैरे घेताय का ?

विवेक पटाईत Mon, 15/01/2024 - 20:31

ऐसी अक्षर वर विद्वान लोकांचा वावर आहे। त्यांचे मत महत्त्वपूर्n। हा धागा स्वतंत्र टाकला हिरा.पण मालकांना बहुधा " राम" शब्दाची अलर्जी आहे.

चिमणराव Tue, 16/01/2024 - 07:09

In reply to by विवेक पटाईत

ऐसी सोडणे हाच उपाय आपल्या हातात आहे.
विरोधी मते असतातच पण वाचक आणि प्रतिसादकर्तेच एवढे तुटपुंजे झाले आहेत २०१५ नंतर की एक छापील माध्यम झाले आहे. फेसबुकवर तर सगळा आनंदच आहे. कंटाळवाणे माध्यम झाले आहे. Reddit सुद्धा कामाचे नाही.
चार पाच वर्षे मजा केली, झालं संपलं.

डिजिटल माध्यम हातात परवडण्यासारखे होईपर्यंत अर्धी हाडे मसणात गेली. तो उपायही खुंटला. पार्कात जाऊन एखाद्या बाकड्यावर बसून काही चर्चा वार्तालाप करण्याचेही शक्य नाही. लोकांचे विशिष्ट विचारसरणीचे, गावांचे, पेन्शनवाले (त्यात पुन्हा केंद्र /राज्य सरकारांचे वेगळे) गट असतात. ते आपल्याला घेत नाहीत, टाळतात. एखादा बाजूचा मनुष्य चांगला योग्य भेटलाच तर तो लगेच उठून जातो कारण त्याला घरी परतायची वेळ दिलेली असते.
असो.

अहिरावण Thu, 22/02/2024 - 07:59

In reply to by विवेक पटाईत

मालकांना बहुधा " राम" शब्दाची अलर्जी आहे.

लहानपणापासून ऐकले होते राम नाम ऐकले की राक्षस बिथरतात... सर्वत्र प्रचिती येत आहे...

जे जे भारतीय, हिंदू प्रतीकं असतात त्यावर काही जण आकांडतांडव करतात्

गंमत म्हणजे देव तुझं कल्याण करो म्हटलं की देव कुठे देव कुठे करुन अंगावर येणारे... एखाद्या पाद्र्याने वा ख्रिश्चननाने गॉड ब्लेस यु म्ह्टले की कृतार्थ होतात...

आपल्या आईबापावरचा राग हे समाजावर काढत असतात... मानसिक रोगी असतात... चालायचेच्

Rajesh188 Tue, 06/02/2024 - 15:39

भारतीय समाजातील सर्व गटातील घटक हे प्रगल्भ नाहीत ..स्वतःला ठराविक विचारत प्रत्येकाने कोंडून घेतले आहे .
ऐक कोश स्वतः भोवती निर्माण करून घेतला आहे.

मी भारतीय समाज माध्यम पेक्षा विदेशी समाज माध्यमावर जास्त वेळ घालवतो .
कारण तिथे कोषातील लोक नसतात ,वाद प्रतिवाद पूर्व ग्रह ठेवून करत नाहीत.
त्या मुळे वाद विवाद मध्ये मजा येते
नवीन ज्ञान प्राप्त होते.

भारतीय लोक कधी प्रगल्भ होणार .
कधी कोषातून बाहेर पडणार .
कधी पूर्व ग्रह सोडणार .
हा प्रश्न मला क्षणा क्षणा ल पडतो.

पण ऐसी अक्षरे ह्या एकमेव वेब पेज वर तुलनेने विचाराने खुप प्रगल्भ लोक आहेत त्या मुळे मी इथे पण बिन्धास्त रमतो

Rajesh188 Tue, 20/02/2024 - 15:45

Ai निर्मिती उद्योग हा एक व्यवसाय आहे फक्त जगातील अती बलाढ्य कंपन्या त्या व्यवसायात असल्या मुळे जाहिराती जोरात आहेत.
ह्या पेक्षा जास्त Ai ल जास्त किंमत नाही.
मानवी हितासाठी Ai निर्मिती होत नाही.
जो पर्यंत हा व्यवसाय फायद्यात असेल तो पर्यंत तो चालेल.
नुकसान झाले की बंद होईल.
पॉर्न हा पण व्यवसाय च आहे जो पर्यंत पुरुष स्वतःच्या काम इच्छेवर पूर्ण नियंत्रण मिळवता नाहीत.
तो पर्यंत च हा व्यवसाय चालेल.

इथे कधी ही काही ही घडू शकते.
पिझ्झा वरून डायरेक्ट कोंड्या च्या भाकरी वर लोक आली आहेत .
आणि अनेक प्रक्रिया केलेल्या अन्न वरून सरळ झाड पानावर आलेली आहेत( सलाड)

जयदीप चिपलकट्टी Wed, 21/02/2024 - 07:19

मार्च महिन्यात आमच्याकडे बदकं दिसू लागतात. कँपसमधल्या एखाद्या रस्त्याचा ताबा घेऊन कर्कश कलकलाट करत सगळीकडे घाण करून ठेवतात, जेणेकरून बिचारे बदकेतर तो रस्ता आपोआपच टाळू लागतात. ‘ऐसी अक्षरे’ची दशा अलिकडे अशीच झालेली आहे. हे का आणि कसं झालं असा प्रश्न मनात अनेकदा उभा राहतो.

------

Rajesh188 Wed, 21/02/2024 - 21:41

प्रमाण भाषा नाही म्हणून हिनवल्या मुळे ८०% ( हा माझाच अंदाज आहे).
लोकांना ना उमेद केले जाते आणि अतिशय मौल्यवान अशा विचारणा समाज मुकतो. कोनत्या ही प्रकारचा
सेन्सॉर कॅन्सर सारखा आहे.
कोणाच्या हि कॉमेंट च दर्जा ठरवण्याचा आगावू पना करू नका.( दर्जा काय असतो कोणी सांगेल का?,आणि त्याचे मोजमाप कसे केले जाते ,कोणत्या मोजमाप मध्ये केले जाते? हे मोजमाप कोण ठरवते?,)
जो पर्यंत त्या कॉमेंट मध्ये .
धमकी,हिंसा,गुंडागर्दी,धार्मिक,जातीय द्वेष असा, आशय नाही.तो पर्यंत कोणाला कोणाच्याच कमेंट वर आक्षेप किंवा शेरेबाजी करायची गरज नाही.
असे मला तरी वाटतें

अहिरावण Thu, 22/02/2024 - 07:49

काही लोकांना

नमस्कार्
नमस्कार्
आज हवा जरा कुंद आहे
हो पाऊस पडेल असे वाटते
नाही पडणार दुपारी उन पडेल्
शक्य आहे
चला भेटू
हो भेटू

अशा तत्सम गुळपाणी संवादाची सवय असते
त्यांना प्रखर वास्तव झेपत नाही

मग ते तक्रार करतात्
वर्गात आजकाल सोज्वळ चर्चा होत नाहीत वगैरे

घर हापिस बायको आणि सासू यापलीकडे जग नसलेली बुर्झ्वा मंडळी !!!

चिमणराव Thu, 29/02/2024 - 05:36

Bitcoin व्यवहार

कोणते व्यवहार करण्यासाठी आणि कोणाला उपयुक्त आहेत ? गुप्त आहेत का? सामान्य माणसासाठी आहे का?

गवि Thu, 29/02/2024 - 08:20

In reply to by चिमणराव

तुम्ही एकूण विविध क्रिप्टोकरन्सीची खरेदी आणि विक्री (गुंतवणूक या दृष्टीने) म्हणता आहात की फक्त बिटकॉइन हे विशिष्ट प्रसिद्ध कूटचलन वापरून ऑनलाईन वस्तू सेवा खरेदी करणे याबद्दल विचारत आहात?

गलिव्हर Thu, 29/02/2024 - 21:27

In reply to by चिमणराव

सध्या तरी सामान्य लोकांना उपयुक्त आहे असे वाटत नाही.
१. किंमतीत होणारे जोरदार चढउतार
२. तांत्रिक बिघाड किंवा इतर कारणांनी वॉलेटचा ॲक्सेस गमावणे
३. स्थिर खर्च - मेंटेनन्स चार्जेस इत्यादी
४. फार कुठे स्वीकारले जात नाहीत.

गलिव्हर Sat, 02/03/2024 - 17:06

In reply to by चिमणराव

हे सरकारच्या हातात काय पानं आहेत ह्यावरून ठरते. जसे जसे रेग्युलेशन वाढत जातील तसे अवघड होईल. सध्या सरकार काय माहिती मिळवू शकते ह्याबद्दल नीट कल्पना नाही. जर पॉप्युलर समज आहे तसे सरकारला माहिती मिळवणे अशक्य असेल तर स्विस बँकेला पर्याय होऊ शकतो. स्विस बँक हा त्यामानाने सेफ पर्याय आहे हा फरक राहीलच. बँकेत ठेवलेले पैसे शून्य होण्याची शक्यता कमी आहे. पण जर बिटकॉइन किंवा ब्लॉकचेन तंत्रज्ञानात काही त्रुटी आढळल्या तर रातोरात गुंतवणुकीची किंमत शून्य होऊ शकते.

गवि Mon, 11/03/2024 - 18:22

In reply to by 'न'वी बाजू

हो. हरिद्वारमध्ये सगळेच लोक रोज (आपल्याच न्हाणीघरात देखील) गंगाजलानेच नहातात.

(आंघोळच न करणारे वगळता).

मिसळपाव Tue, 12/03/2024 - 03:47

In reply to by गवि

यावरनं शाळकरी काळातला जोक आठवला;

- "नेपाळमधे कुठल्याच घराना कडीकुलूपं नसतात. "
-- का बुवा?
- "अरे कारण तिकडे सगळेच गुरखे" !!

चिमणराव Mon, 11/03/2024 - 21:39

In reply to by 'न'वी बाजू

का ठेवतील?
पैसे ही एक वस्तू सांभाळायची म्हणून त्यावर स्विस बँकेत भाडं ( charge) घेतात असं ऐकून आहे. तर तसे तिथले सोमेगोमे कशाला ठेवतील? अगदी दीड दोन टक्के व्याज मिळालं तरी त्यात गुंतवतील.

'न'वी बाजू Tue, 09/04/2024 - 06:46

In reply to by चिमणराव

कदाचित, नाइलाज म्हणून? दुसरा काही पर्याय नाही, म्हणून? रोजच्या व्यवहारांकरिता जे पैसे लागतात, ते ठेवायला (आणि तेथून लागतील तेव्हा सहज काढता यायला) काही जागा लागते, ते स्वतःच्या घरच्या गादीखाली थप्प्या लावण्याऐवजी कदाचित त्यातल्या त्यात सुरक्षित जागा म्हणून?

स्वित्झर्लंडबद्दल मला कल्पना नाही. इथे यूएसएत काय चालते, ते सांगू शकतो.

इथे सेव्हिंग्ज़ खाते हा जो काही प्रकार असतो, त्यात चेक लिहिण्याची सोय नसते. पैसे काढायचे तर विथड्रॉवल स्लिप/एटीएम/(उपलब्ध असल्यास) ऑनलाइन ट्रान्सफर असे पर्याय असतात, नि महिन्यातून कितीदा पैसे काढता येतात, यावर मर्यादा असतात. व्याजदर सामान्यतः अत्यल्प असतो — सहसा जेमतेम पाव ते अर्धा टक्का वगैरे. (आजकाल काही ऑनलाइन बँका त्यांची काही स्कीम चालू असेल, तर क्वचित चारपाच टक्क्यांपर्यंतसुद्धा देऊ शकतात, नाही असे नाही. परंतु, अशा बँका आणि अशा स्कीमा शोधून काढाव्या लागतात. शिवाय, चेक लिहिण्याची सोय नसणे तथा पैसे काढण्यावरील उपरोक्त मर्यादा या सर्व लागू होतातच.) एकंदरीत, दैनंदिन व्यवहारांकरिता हा प्रकार उपयुक्त नाही, आणि गुंतवणूक म्हणून म्हणाल, तर तितकासा परतावा नाही.

दैनंदिन व्यवहारांकरिता, ज्यावर (अमर्याद) चेक लिहिता येतात, असा खात्याचा प्रकार म्हणजे चेकिंग खाते. (अमर्याद म्हणजे, अर्थात, केवळ खात्यातील रकमेने मर्यादित.) तत्त्वतः, हा प्रकार, मला वाटते, भारतात ज्याला करंट खाते म्हणतात, त्याच्या समतुल्य मानता यावा. यात व्याज सहसा मिळत नाही. (‘इंटरेस्ट-बेअरिंग चेकिंग अकाउंट’ असाही प्रकार क्वचित असू शकतो, परंतु तो विरळा. शिवाय, अशा खात्यांवर व्याज जरी मिळाले, तरी ते नगण्य असते, नि शिवाय मिनिमम बॅलन्सची रक्कम अधिक असू शकते. एकंदरीत, चेकिंग खात्यात व्याज एक तर मिळत नाही, किंवा मिळाले, तरी अत्यल्प असते. किंबहुना, व्याज मिळविणे हे अशा खात्यांमागील उद्दिष्ट नसून दैनंदिन व्यवहारांची सोय हे असते, असे म्हणता येईल.) उलटपक्षी, चेकिंग खात्यांना मासिक भाडे असते. (विविध बँकांच्या चेकिंग खातेसंबंधीच्या विविध नियमांस अनुसरून असे भाडे अनेकदा टाळता येते. जसे, काही किमान बॅलन्स सदैव राखून, किंवा, दरमहाचा पगार डायरेक्ट डिपॉझिटने खात्यात जमा करून. तसेच, विद्यार्थ्यांच्या चेकिंग खात्यांना अनेकदा असे भाडे आकारले जातेच, असे नाही.)

व्याजच जर मिळवायचे असेल, तर मग सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट (सीडी — भारतातील एफडीच्या समान) हा पर्याय आहे. यात व्याज तुलनेने बरे मिळते, परंतु पैसे अडकून राहतात, नि मुदतपूर्व ठेव मोडण्याचे भुर्दंड लागू होतात. थोडक्यात, रोजच्या व्यवहारांकरिता याही खात्याचा उपयोग शून्य.

(याव्यतिरिक्त, ‘मनी मार्केट अकाउंट’ नावाचा एक बहुतांशी सेव्हिंग्ज़ खात्यासमान परंतु थोडे अधिक बरे व्याज देणारा प्रकार असतो. यात चेक लिहिता येतात, परंतु महिन्यातून किती चेक लिहिता येतात यावर मर्यादा असते. शिवाय अनेकदा उच्च किमान बॅलन्स आणि/किंवा मासिक भाडे या गोष्टी या प्रकारच्या खात्यास लागू होऊ शकतात. थोडक्यात, अमेरिकन सोम्यागोम्यांच्या दैनंदिन व्यवहारांकरिता असे खाते उपयुक्त असेलच, असे नाही.)

तर मग, स्वित्झर्लंडचे जाऊ द्या, परंतु, यूएसएतल्या सोम्यागोम्याने रोजच्या व्यवहारांकरिता आपले पैसे नक्की कोठे ठेवावे, म्हणता?

जावा फुल स्टॅक Sun, 03/03/2024 - 11:28

बीटकोईन हा असुशिक्षित जनतेचा फसवणुकी चा प्रकार आहे असे वाटते

मला खूप जास्त माहिती नाही पण थोडी माहिती आहे

कारण फोन पे वरुण बीटकोईन वापरता येत नाही भारतिय ₹ वापरून पेमेँट करतो

ते जास्त सोयिस्कर आहे तसेच बँकेत पैसे पाठवता येतात

चिमणराव Mon, 11/03/2024 - 07:46

हल्लीच National Creators award मिळालेल्या काही जणांचे चानेल पाहात होतो. त्यापैकी एक Abhi and Niyu हा पाकिस्तानचा पाहिला. https://youtu.be/ZL41RdhPSy8?feature=shared

तर प्रश्न आहे की अशा छोट्या आणि कर्जात बुडालेल्या देशाचं काय होणार.

........
!बक्षिस मिळवणारी आणखी एक आहे Keerthika Govindasmi. तिचा https://youtu.be/v2NzkyJDhfw?feature=shared. हा विडिओ पाहिला. इतके वर्षं पाठ्यपुस्तकांत अशोकाचा खरा इतिहास का लपविला?

.......
बक्षिसं मिळवणाऱ्या प्रातिनिधिक लोकांशिवाय आणखी असे बरेच असतीलच. कामिया जणांनी(पर्यटन), गौरव चौधरी(डिजिटल मिडिया माहिती) यांच्यापेक्षा चांगली माहिती देणारेही बरेच आहेत.

Rajesh188 Mon, 11/03/2024 - 12:48

धार्मिक अंध श्रद्धा ना आव्हान देण्याची खुमखुमी खूप लोकात असते .
पण विज्ञान आणि त्याचे कथित दावे ह्याला मात्र कोणी आव्हान देत नाही.
कृत्रिम पावूस.

ढग निर्मिती पासून पावूस पाडण्याची कृती ह्याचा खूप प्रचार केला जातो.

बंगलोर मध्ये पाणी टंचाई आहे.जगात अनेक भागात पाणी टंचाई आहे.
आता उन्हाळ्यात ज्या ज्या संशोधकाने ढग निर्मिती करू शकतो कृत्रिम रित्या.
पावूस पाडू शकतो असे जाहीर दावे केले आहेत.
आणि ज्या ज्या प्रसार माध्यमांनी ते प्रसिद्ध केले आहेत.
त्यांना पण अंध श्रद्धा निर्मूलन संकल्पा प्रमाणे जाहीर आव्हान दिले तर ते पास होतील.

बंगलोर किंवा जिथे पाण्याची कमतरता आहे तिथे ढग निर्मिती कृत्रिम पने कृत्रिम पने पावूस पाडणे .
हे आव्हान त्यांना जमले नाही तर.
धार्मिक अंध श्रद्धा आणि विज्ञान चे नाव घेवून पसरवल्या जाणाऱ्या अंध श्रद्धा ह्या मध्ये फरक काही फरक नाही
असे मला तरी वाटतें

Rajesh188 Wed, 20/03/2024 - 14:31

ह्या नावाखाली प्रतिष्ठित पासून आलतू फालतू विज्ञान च मक्ता घेतलेली प्रसार माध्यम नवं नवीन शोध प्रसिद्ध करत असतात.
पण ते संशोधक कोण त्यांची नावं सांगत नाहीत.
त्यांचा बाप कोण म्हणजे कोनत्या संस्थेत ते काम करतात त्यांना संशोधन करण्यास कोण पैसे पुरवते हे पण ते सांगत नाहीत.

ह्याचा अर्थ सरळ आहे हे अंध श्रद्धा पसरवत आहेत पण विज्ञान चे नाव वापरून.
आणि हे चोर बुवा , बाजी करणाऱ्या पेक्षा जास्त धोकादायक आहेत

मला खूप इच्छा आहे विज्ञान वादी होण्याची .
पण स्थिती तशी नाही.
कोणताही नवीन शोध कोणत्या ही संशोधन करणाऱ्या व्यक्ती नी लावला तर.
त्याची प्रसिद्धी.
त्या संशोधकांचे नाव.
तो ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेचे नाव.

त्या संस्थेचा हेतू हे काम करण्यासाठी.
त्या संस्थेला मदत करणारे .
त्या मदत करणाऱ्या लोकांची ओळख ,त्यांचे व्यवसाय.

कोणी किती आर्थिक मदत केली त्याची detail मध्ये माहिती हे सुरवातीलाच दिले पाहिजे.

तर विश्वास ठेवता येईल .

नाहीतर हजारो वर्षांचा अनुभव असणारे ज्ञान च उत्तम असे माझे तरी मत आहे.
म्हणून मी कथित विज्ञान वादी होण्याच्या भानगडीत पडत नाही

जावा फुल स्टॅक Wed, 20/03/2024 - 16:21

मला वाटते कि , विज्ञानापेक्षा शहाणपण महत्वाचे आहे

कारण अनुबोंबने लाखो माणसे ठार मारली त्याची जिम्मेदारी कोनाची
विज्ञानाची कि मानवाची हा प्रश्न आहे

अंध श्रद्धे चे तेच आहे

आपण सर्व जण देवाला नमस्कार करतो तेंव्हा कोना चे काय नुकसान होते???

मग लोकांच्या श्रद्दे ला काय म्हणून नावे ठेवावीत...?

म्हणून आपण त्यांच्या कडे दुर्लक्ष्य करावे हेच बरोबर आहे असे म्हनतो

थोडा विचार करा

जावा फुल स्टॅक Wed, 20/03/2024 - 16:25

हजार वर्षाचा अनूभव आसणारे ज्ञान च उत्तम असे माझे सूद्धा मत आहे

आजकाल ची पोरे काहीपन बोलतात तेच बरोबर आहे असे कसे म्हणल्या जावु शकते???

लोकप्रिय पुस्तकात लिहिलेले कसे खोटे असेल असे म्हणता???

'न'वी बाजू Mon, 15/04/2024 - 20:34

माझ्या खरडवहीची स्थिती तूर्तास "असमर्थ" अशी आहे. तरीसुद्धा, मला स्वत:ला माझ्या खरडवहीत (दुव्याद्वारे) प्रवेश करता येतो. (हे ठीकच.)

मात्र, नुकतीच एका सद्गृहस्थांनी माझ्या खरडवहीत खरड लिहिली. (माझा याला आक्षेप नाही, परंतु) या संदर्भात मला प्रश्न असा पडतो, की सदर सद्गृहस्थांना हे कसे काय शक्य झाले असावे?

त्याहीपेक्षा पुढचा प्रश्न म्हणजे, माझ्या खरडवहीतल्या माझ्या किंवा इतरांच्या खरडी मी उडवू शकतो. हे ठीक. माझ्या खरडवहीतल्या माझ्या स्वत:च्या खरडी मी Edit करून त्यांतील मजकूर मी बदलू शकतो. हेही (एक वेळ) ठीक. मात्र, माझ्या खरडवहीतले इतरांच्या खरडीसुद्धा Edit करून त्यांतील मजकूर मी बदलू शकतो, असे दिसते. हे कसे काय?

या हिशेबाने, समजा मी कोणाला काही खरड लिहिली. (म्हणजे, मी इतरांना सहसा खरडी लिहीत नाही, ते सोडून द्या.) परंतु, त्या व्यक्तीने समजा (कदाचित जुने हिशेब चुकते करण्यासाठी) माझ्या त्या खरडीतील शब्द बदलून त्या जागी जर भलतेच काही लिहिले, तर त्याला जबाबदार कोण?

(गंमत म्हणजे, इतरांच्या खरडवह्यांतील माझ्या खरडींचे मजकूर मी बदलू शकत नाही. (हे एक वेळ ठीकच आहे.) मात्र, माझ्या खरडवहीतील इतरांच्या खरडींचे मजकूर मी बदलू शकतो. Go figure!)

ते आहेच, आणि लँडिंग पेज काळे करून ठेवले आहे. खटपटी चालू असतात त्यांच्या काही ना काही.

'न'वी बाजू Thu, 18/04/2024 - 11:25

In reply to by मिसळपाव

…स्वतःच्याच खरडवहीपुरत्या (आणि स्वतःच्याच लँडिंग पेजपुरत्या) जावास्क्रिप्टच्या काही काड्या करून पाहिल्या होत्या.

(आता नव्याने जावास्क्रिप्ट टाकता येत नाही; ब्लॉक होते. पण पूर्वीच टाकून ठेवलेली ‘लेगसी’ जावास्क्रिप्ट अद्यापही निर्विघ्नपणे चालते.)

हारुन शेख Sat, 14/09/2024 - 12:13

महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचा मुख्यपानावरील दुवा भलत्याच ठिकाणी घेऊन जातोय. कृपया दुरुस्त करणे.

शिवाय त्या यादीतील इतर काही दुवे चालत नाहीत.