वेश्याव्यवसाय - पुस्तक परिचय
वेश्याव्यवसाय
मध्यंतरी अमृता फडणवीस यांनी एक सनसनाटी विधान केले. माध्यमांनी त्याला चटपटीत प्रसिद्धी ही दिली होती.
"वेश्या व्यवसायाचा प्रोफेशन म्हणून स्विकार करायला हवा" . जर्मनीसारखेच भारतातही वेश्या व्यवसायाकडे आदराने पहावं असं त्यांनी म्हटलंय. देहविक्रय हा पुरातन व्यवसाय आहे. देहविक्रय करणाऱ्या महिलांमुळेच समाजात बॅलन्स टिकून आहे. देहविक्रय करणाऱ्या महिला या समाजाच्या अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे या महिलांना समाजात मानाचे स्थान मिळायला हवे हा अमृता फडणवीस यांचा मुद्दा मध्यंतरी एका चर्चा पीठावर मी मांडला होता त्यावर एका स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्तीनी हा व्यवसाय अमृता किंवा त्यांच्या बिरादरीतील महिला प्रोफेशन म्हणून स्वीकारतील का? असा प्रश्न उपस्थित केला. खर तर अशा विषयांवर अनेक जण मौन राखणॆ पसंत करतात अमृता फडणवीस यांनी तो विनासंकोच मांडला या बद्दल मला त्याचे कौतुक वाटले. अशा प्रकारचे विचार दुर्गा भागवत यांनीही पुर्वी मांडले होते. दुर्गाबाई भागवत यांना “साहित्य अकादमी” पुरस्कार मिळाल्याबद्दल एक सत्कार समारंभ कुलाबा येथे एका महिला संघटनेने आयोजित केला होता.या कार्यक्रमात त्यांनी एक अजब वक्तव्य केले होते.”मी तमाशा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले ते केवळ मानसन्मानासाठी नव्हे तर तमासगिरांचे ,आणि विशेषत: त्यातील स्त्रियांचे जीवन कळावे म्हणून,त्यांचे दु:ख समजावे म्हणून,वेश्यांना आपण बदनाम समजतो,मात्र वेश्या हा समाजाचा एक अत्यावश्यक भाग आहे.सांसारिक जीवन जराही खिळखिळे झाले तर पुरुष अतृप्तीच्या मोकळ्या वाटांवर मोकाट सुटतो. त्याच्या वासनांची पूर्तता करून वेश्या एक प्रकारे समाजाचा तोल सांभाळत असतात.वेश्या व्यवसाय अशा रीतीने समाजाचे रक्षण करतो.डॉक्टर इंजिनिअर प्रमाणे त्याला प्रतिष्ठा आणि सामाजिक मान्यता मिळाली पाहिजे.
गोलपीठा” या प्रकाशन सोहळ्यात दुर्गाबाई भागवत प्रमुख पाहुण्या होत्या.भाषण करताना त्यावेळी त्या म्हणाल्या की,
“घराला जशी संडासबाथरूमची गरज असते,त्याचप्रमाणे समाजस्वास्थ्यासाठी समाजाला वेश्या व्यवसायाची गरज आहे.परंतु वेश्यांना समाजाने सामाजिक प्रतिष्ठा द्यायला पाहिजे,कारण ती समाजाची गरज भागवते.”
दुर्गाबाई भागवत यांच्या उपरोक्त भाषणांचा राजा ढाले यांनी त्यांच्या भाषणात खरपूस समाचार घेतला होता. ‘वेश्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून द्या,कारण ती समाजाची गरज भागवते,
असं म्हणणाऱ्या भागवत बाईंना वेश्यांना वेश्याच ठेवायचं आहे. हा त्यांचा पतितोद्धार असं ज्यांना वाटतं त्यांनी स्वत: हा धंदा का करू नये?
समाजाच्या लैंगिक जाणीवांचे व्यवस्थापन करणार्या साहित्यात र.धों. कर्वे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल आख्ख आयुष्य त्यांनी हा कार्यासाठी खर्च केले आहे.
र.धों.कर्वे वेश्याव्यवसाय या आपल्या पुस्तकातील प्रस्तावनेत लिहितात
"प्रस्तुत लेखकावर वेश्यावृत्तीचा पुरस्कार करण्याचा आरोप अनेकांनी केल आहे आणि त्यांत थोडेबहुत तथ्यहि आहे. परंतु तो पुरस्कार केवळ समाजसुखा- च्या दृष्टीने आहे, वेश्या ही एक उत्तम संस्था आहे अशा विश्वासाने नव्हे. पूर्वी सुखी असलेल्या समाजांनी आज नीतिवाजीच्या आहारी जाऊन अनेकांना काम- तृप्ति दुर्लभ केली आहे. ती सुलभ झाल्याशिवाय समाज सुखी होणें शक्य नाही. कृत्रिम कर्तव्यांपुढे अन्नाची परवा न ठेवणें हाच सद्गुग मानल्यावर कामतृप्तीला अजीबात फाटा देण्याचा प्रयत्न झाल्यास नवल नाही, परंतु ज्यांना निसर्गनियमांचे थोडेबहुत ज्ञान आहे, त्यांना यांत भूषण वाटणार नाही, आणि ज्याप्रमाणे सर्वांना अन्न मिळाले पाहिजे आणि तें खायला वेळ मिळाला पाहिजे, हें आतां लोकांना हळूहळू कळूं लागले आहे, आणि यामुळेच समाजवाद उत्पन्न झाला आहे, त्याचप्रमाणे कामतृप्तीचाहि हक्क सर्वांना असला पाहिजे हैं जेव्हा लोकांना कळूं लागेल, त्या वेळी समागमावरचे फालतू निर्बंध नाहीसे होतील आणि समागम सुलभ होऊन समाज सुखी होईल. परंतु ते निर्बंध जोपर्यंत नाहीसे झाले नाहीत तोपर्यंत समाजाला वेश्यांची गरज आहे. वेश्यांना मागणी नाहीशी झाली म्हणजे त्या आपोआपच नाहीशा होतील, परंतु तेथपर्यंत आणि नंतरहि त्यांना आपला धंदा करण्याचा पूर्ण हक्क आहे आणि तो त्यांना सरळपणें करूं न देऊन त्यांना छळण्याचा जो प्रयत्न नीतिवाज लोक करीत आहेत तो अत्यंत निंद्य आहे आणि त्यांत समाजाचें हित नाही. मात्र वेश्यांनाहि है घडसें कळत नाही आणि त्यांना देखील आपण पाप करतों असेंच वाटतें. ही भावना ज्यांना आहे, आणि एकाच पुरुषाला चिकटून राहण्यांतच ज्यांना मोठेपणा वाटतो, त्या खऱ्या वेश्याच नव्हत. त्यांत कमीपणा न वाटतां मोकळ्या मनाने ज्या धंदा करतात त्याच खऱ्या वेश्या, आणि त्यांचेवर नीति- बाजांच्या प्रचाराचा विलकुल परिणाम होत नाही. अशाच वेश्यांचा समा- जाला उपयोग आहे आणि याच दृष्टीने येथे या प्रश्नाचा विचार केलेला आहे."
१ जून १९४०.
र. धों. कर्वे
पुस्तकात वेश्याव्यसायाबद्दल जागतिक स्तरावरील माहिती दिली आहे.
1) प्राचीन हिंदुस्थान
2) युरोप
3) नंतरची परिस्थिती
4) वेश्याबंदीची मोहिम
5) कायदेबंदीचा सविस्तर विचार
6) कायदेबंदीचे प्रत्यक्ष परिणाम
7) नियंत्रण कसे असावे
8) वेश्यावृत्तीचा नैतिक विचार
अशा विविध प्रकरणातून सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक,वैज्ञानिक पातळींवर विविधांगी विस्तॄत विचार मांडले आहेत. पुस्तकात खर्या व खोट्या वेश्या हे एक प्रकरण पुरवणी म्हणून जोडले आहे. त्यात ते म्हणतात,"
कायद्याचा त्रास होतो काय तो खर्या वेश्यांना मुख्यतः यांचाच विचार केलेला आहे. त्यांच्याबद्दल कोणासही सहानुभूती वाटत नाही आणि ती वाटल्याचे ढोंग जे सोंवळे लोक करीत असतात, त्यांचा मुख्य उदेश वेश्या नाहीसा करण्याचाच असतो. हा उद्देश सफल झाल्या विवाहसंस्थेला अनंत धोका आहे हे अशा लोकांस कळत नाही. प्रस्तुत लेखकाला विवाहसंस्थेबद्दल मोठाला आदर नाही, परंतु वेश्या आणि विवाहसंस्था यांचा अत्यंत निकट संबंध आहे ही गोष्ट बाजूला ठेवली तरी वेश्यांना धंदा करण्याचा हक्क आहे आणि तो कायद्याने सरळपणाने कबूल केला पाहिजे आणि वेगवेगळ्या मिषाने त्यांना त्रास देणे हा अन्याय आहे, हे समजण्याइतकी न्यायबुद्धी लोकांत उत्पन्न झाली तरी पुष्कळ आहे. लोकांत न्यायबुद्धी नसते असे नाही, परंतु पारंपरिक बुरसटपणामुळे ती लुप्त झालेली असते, आणि तिचा कांही उपयोग होत नाही ही गोष्ट लोकांच्या नजरेस आल्यास ती कदाचित् जागृत होईल"
र.धों. देहविक्रय शब्द वापरत नाहीत. कारण वेश्या शरीराचा विक्रय करत नाहीत. शरीर भाड्याने देतात. आजही वेश्यांसाठी काम करणार्या अनेक संघटनांचे तेच म्हणणे आहे. वेश्यांचे ही तेच म्हणणे आहे. आता सेक्स वर्कर हा शब्द प्रचारात आला आहे. कारण त्यांना वेश्या म्हणायला कसंतरीच वाटते. वेश्या पेक्षा सेक्सवर्कर शब्द जरा प्रतिष्ठा असलेला वाटतो. त्यांचे प्रश्न पुन्हा वेगळे आहेत. तो पुन्हा एक स्वतंत्र विषय आहे. मागे वेश्याव्यवसायची नैतिकता या एका पोस्ट मधे मी काही भाग पुर्वी मांडला होता. असो.
सगळे वाचले की पुन्हा र.धों हे काळाच्या किती पुढे होते हे जाणवत राहते.
मुकुंद टांकसाळे यांनी https://radhonkarve.com/ या संकेतस्थळावर पुस्तक उपलब्ध करुन दिले आहे. अक्षरस्पर्श ग्रंथालयाचे दुर्मिळ पुस्तक ठेवल्याबद्दल आभार.
प्रकाशक- र.धों. कर्वे
राईट एजन्सीज, नवी भटवाडी, गिरगांव मुंबई
प्रकाशन काल-1940
पृष्ठे- 166
किंमत- ?