मध्यमवर्ग, कॉर्पोरेट्स आणि काँन्सन्ट्रेशन कँप : लोकसत्तामधील एक लेख

डाखाउ कॉन्सन्ट्रेशन कँपला दिलेल्या भेटीच्या निमित्ताने हिटलर, राष्ट्रवादाने भारलेली तत्कालीन जर्मन जनता, तत्कालीन 'स्युडोसेक्युलरीस्ट, समतावादी' यांना लावली जाणारी विशेषणे आणि सद्य भारतीय परिस्थिती यांचे ललित अंगाने साधर्म्य दाखवु पाहणारा श्री लोकेश शेवडे यांचा हा कालच्या लोकरंगमधील लेख

मोदींना थेट हिटलर बरोबर तुलना करण्याइतके अजुन काही घडले नसले तरी काही साम्यस्थळे रेड फ्लॅग उंचावायला योग्य वाटतात. तसेही भारतीय काय अभारतीय काय मध्यमवर्गाला एखाद्या हुकुमशहाचे असलेले आकर्षण जगाला नवे नाहीच म्हणा!

व्यवस्थापनः सदर चर्चा लांबल्याने व्यवस्थापनाच्या सोयीसाठी धागा वेगळा करत आहोत

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

तसेही भारतीय काय अभारतीय काय मध्यमवर्गाला एखाद्या हुकुमशहाचे असलेले आकर्षण जगाला नवे नाहीच म्हणा!

उचलली जीभ लावली टाळाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही म्हणताय त्याच क्रियेचा दाखला या व्यतिरिक्त वरील प्रतिसादातून अर्थ निर्माण होण्यासाठी सुयोग्य प्रतिसादाची वाट पाहत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

याचा सुयोग्य प्रतिसाद एक मोठा शोधनिबंध होईल. पण ज्या ज्या देशात लोकशाही उशिरा आली किंवा आजही नाही किंवा नीट नाही तिथे तिथे मिडल क्लास लोकशाही आणण्यासाठी किती प्रयत्न केला/करत आहे/करेल याला काही महत्त्व आहे का नाही. म्यानमार, पाकिस्तान, इंडोनेशिया, अरब देश, स्पेन, नेपाळ, रशिया, .... अगदी चीन मधेही लोकांना सुप्तपणे लोकशाही हवी आहे. अमेरिकेत, युकेत, युरोपात, भारतात, आफ्रिकेत, इ तुम्हाला हुकुमशाही हवी वाटणारे लोक दिसतातच कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भारतातील सध्याच्या लोकशाहीबद्दल भाष्य करणारा कालच्या लोकसत्तातील अजून एक लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला हुकुमशाही हवी वाटणारे लोक दिसतातच कसे?

ज्या देशांत लोकशाही नाही, त्यांना लोकशाहीची आस असते हे रोचक निरीक्षण आहे. पण ज्या देशात लोकशाही आहे आणि व्यवस्था राबवण्यात आलेल्या अपयशालाच लोकशाहीचं अपयश असं संबोधण्याची सोईस्कर सवय जिथल्या लोकांना आहे, तिथे हुकूमशहाची भक्ती करणारे अनेक मध्यमवर्गीय रोज भेटतात. नजर मात्र हवी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१

बाकी, चार्ली चॅप्लिनच्या १२५व्या जन्मदिनानिमित्त 'ग्रेट डिक्टेटर'मधलं त्याचं अखेरचं भाषण मुखपृष्ठावर दिलं आहे. ही बाजुच्या पट्टीतील नोंद या पार्श्वभूमीवर वेधक वाटली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चार्ली चॅप्लीन च्या व्ययक्तीक आयुष्याबद्दल लोकसत्तात आत्ताच लेख आला होता. तो वाचला का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय वाचला. अगदीच त्रोटक होता
त्यापेक्ष अभा.द.खेर(चुभुद्याघ्या) यांनी लिहिलेले चरीत्र वाचा अतिशय साद्यंत आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हसरे दु:ख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

चार्ली चॅप्लीन बद्दल, जर कोणाला इथे एक स्वतंत्र लेख लिहीता आला तर ह्या एका अतिशय हँडसम आणि प्रचंड कल्पक आणि कष्टाळू माणसाबद्दल थोडे अधिक जाणून घेता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुहास

झाले गेले गंगेला मिळाले,
आता उदय नव्या रामाचा.
नमो नमो

अहो एक हुकुमशहा गेला आणि दुसरा आला की, काही तरी धोरणात्मक बदल होतो.

भारतात इतकी सरकारे आली आणि गेली. सर्वांचे एक च धोरण. शिवसेना आली म्हणुन पवार तुरुंगात गेले नाहीत आणि पवार आले म्हणुन राज ठाकरे तुरुंगात जाणार नाहीत ( जरी आत्त ते दुबई च्या मॉल चा पैसा कुठुन आला असे विचारत असले तरी )

ही कसली लोकशाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदी आणि हीटलर मधे काही साम्य आहे का हा फार पुढचा प्रश्न आहे.

भारत आणि जर्मनी मधे ( आणि त्यांच्या मध्यम वर्गीयात ) थोडे तरी साम्य आहे का?

१. ज्यु सोडुन जवळ जवळ सर्व जर्मन एकाच वंशाचे/जातीचे, एक च भाषा बोलणारे , एक च इतिहास असणारे होते. भारतात आपण शिवाजी चा इतिहास सांगतो, दिल्लीत औरंग्जेबाचा, गुजराथ मधे कोणाचा हे माहीती पण नाही.
२. जर्मन लोकांना ( मध्यमवर्ग धरुन ) काही मुळ मुल्य होती. प्रत्येक गोष्ट चांगली च असावी अशी आस होती. सामाजिक जाणिव होती. भारताबद्दल असे म्हणता येइल का?
३. पहिल्या महायुद्धात मार खाल्यामुळे जर्मन जनता सुडाचा मार्ग शोधत होती. १९६२ साली चीन कडुन मार खाल्यावर भारतीयांनी नेहरु इत्यादिंना देशातुन पळ्वुन लावले नाही. खरे तर कोणाला काहीच पडली नव्हती.

कुठे उकिरडयामधले कीडे आणि माणसे ह्यांच्यात साम्य शोधता आहात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसेही भारतीय काय अभारतीय काय मध्यमवर्गाला एखाद्या हुकुमशहाचे असलेले आकर्षण जगाला नवे नाहीच म्हणा!

या विधानास धरून ... सुतावरून स्वर्ग गाठायचा यत्न करतो - पहा पटतेय का -

१) समाजात ३ वर्ग असतात - मध्यमवर्ग, श्रीमंतवर्ग व कष्टकरी/गरीब - हे तीन वर्ग आहेत असे मानून पुढे जाऊया.

२) मध्यमवर्गास हुकुमशहा/शाही चे आकर्षण असते

३) कष्टकरी/गरीब - यांना कम्युनिझम चे आकर्षण असते. (साहजिक आहे)

४) श्रीमंतांना भांडवलवादाचे आकर्षण असते.

५) या ३ वर्गांपैकी कोणासही प्रजातंत्राचे आकर्षण नसते

६) तरीही प्रजातंत्र का तग धरून आहे ? जगातल्या अनेक देशांत ?

७) अनेक देशांत मध्यमवर्ग खूप मोठा आहे. खरंतर सर्वात मोठा आहे. तरीही त्या देशांत प्रजातंत्र बळकट का आहे ? व हुकुमशाही का आली नाही ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक वर्ग बहुदा सत्ताकारण्यांचा असतो, हुकुमशाहीची फळं त्यातल्या रिस्कशिवाय अनुभवायला लोकशाही उत्तम मैदान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरीही प्रजातंत्र का तग धरून आहे ? जगातल्या अनेक देशांत ?

या प्रश्नात 'आकर्षण असेल तर निश्चित त्या दिशेने प्रवास' हे गृहितक आहे. जे साफ चूक आहे. याच न्यायाने 'विमानावर गुरुत्वाकर्षण कार्य करतं म्हणता, तर ते कोसळत कसं नाही?' असा प्रश्न विचारता येतो. म्हणजे त्याचं उत्तर द्यावं लागतं, पण त्यात अशक्य काही नाही.

लोकशाही टिकून आहे याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या चार दशकांत जगभर सातत्याने अभूतपूर्व प्रगती चालू आहे. प्रचंड बहुसंख्येने जगाचे नागरिक त्यांच्या आजी-आजोबांपेक्षा अधिक समृद्ध जीवन जगत आहेत. जर दरवर्षी तीन-चार टक्क्यांनी परिस्थिती सुधरत असेल तर कोण कशाला आहे ते टाकून देईल?

माझ्या मते हुकुमशहाचं आकर्षण हे भावनिक पातळीवर असतं. 'प्रेमळ पालक मुलांना बिघडवतात, बेशिस्त बनवतात. अशा मुलांना चांगलं फटकावून काढलं पाहिजे' या विचाराचं ते राजकीय भाषांतर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ‍ॅनालॉजीशी सहमत आहे. पण त्याच लायनीवर असं म्हणणार्‍या पालकांना पोरांना फटकवायचं आकर्षण आहे असं म्हणणं सयुक्तिक ठरणार नाही. आपल्या देशात हुकुमशाही आल्याशिवाय लोक सुधारणार नाहीत किंवा आपल्या लोकांच्या ढुंगणावर सदैव हंटर हवा अशी विधानं उद्विग्नेतेतून येत असतात. त्यातून लगेच हुकुमशाहीबद्दल आकर्षण वगैरे निष्कर्ष काढणं हास्यास्पद वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

उद्विग्नतेतून नुसती विधाने येत असती तर एकानुवर्त पक्ष (जसे कॉंग्रेस, शिवसेना आता बसपा, बिजद, द्रमक, अद्रमुक) इतके वर्ष राजकारणात टिकले नसते. मुळात सगळ्यांनी मिळून राज्य करायचे (व या देशात घडणार्‍या बर्‍यावाईट गोष्टींची एक नागरीक म्हणून जबाबदारी घेण्याचे) आकर्षण सोडा इच्छाही लोकांमध्ये दिसत नाही. त्यांना ढुंगणार वळ उठवणार्‍या हंटरवाल्याचीच प्रतिक्षा असते!

बाकी कोणाला काय हास्यास्पद वाटावे हा ज्याच्या त्याचा प्रश्न. त्यावर काहीच करू शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हुकुमशाही हवी असणं आणि प्रबळ नेतृत्व हवं असणं यात फरक आहे. त्यासुद्धा तुम्ही दिलेली उदाहरण ही एका organisation ची आहेत पूर्ण देशाची नाहीत. पूर्ण देशात हुकूमशाही लागू करण्याचा प्रयत्न झाला होता ७५ ते ७७ साली आणि त्या हुकुमशाहीला लोकशाहीमार्गानेच हाकलून लावले होते. आता थोड्या दिवसांनी त्या पूर्वाश्रमीच्या हुकुमशहा परत आल्या पण ते पण विरुद्ध पार्टीच्या निकम्मेपणामुळे. त्यानंतर असा प्रयोग झालेला नाही आपल्या देशात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

त्यासुद्धा तुम्ही दिलेली उदाहरण ही एका organisation ची आहेत पूर्ण देशाची नाहीत

इथे असे एकानुवर्त नसणारे पक्षच टिकतच नाहित हे बरेच बोलके नाही काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एकदा नीट सांगा राव काय म्हणायचय तुम्हाला? असले पक्ष टिकणे = हुकुमशाहीचं आकर्षण असं तुम्हाला म्हणायचय का की अजून काही वेगळं.
हुकूमशहा ही संकल्पना देशाच्या बाबतीत लागू होते असं मला म्हणायच आहे. एखाद्या ऑर्गनायझेशनच्या बाबतीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अनुपराव, देश हे ऑर्गनायझेशन नसते असे जे ध्वनित होतेय ते गृहितक आहे की निष्कर्ष ?

(A nation-state is not an organization in the same sense as a political party is - हे काही अंशी मान्य आहे. पण संपूर्ण मान्य करणे मुश्किल आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला राजकिय पक्ष != देश असं म्हणायचं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हुकूमशहा ही संकल्पना देशाच्या बाबतीत लागू होते असं मला म्हणायच आहे. एखाद्या ऑर्गनायझेशनच्या बाबतीत नाही

हुकुमशाही ही वृत्ती आहे, निव्वळ शासनप्रवस्था नव्हे.
ती जितकी देशाच्या बाबतीत लागु होते तितकीच कुठेही! मी या वृत्तीबद्दल म्हणतोय. एकानुवर्त वृत्ती, विरोधाला न जुमानणारी वा थेट विरोध मोडीत काढणारी बेदरकार वृत्ती! नी अशी वृत्ती असणार्‍या नेत्याचे आकर्षण मध्यमवर्गाला असते असे माझे मत आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपल्या देशात हुकुमशाही आल्याशिवाय लोक सुधारणार नाहीत किंवा आपल्या लोकांच्या ढुंगणावर सदैव हंटर हवा अशी विधानं उद्विग्नेतेतून येत असतात.

'यू गेट द गवर्मेंट यू डिज़र्व' या उक्तीत जर काही तथ्य असेल, तर अशी विधाने करणारी वा अशी सुप्त इच्छा बाळगणारी मंडळी ही ढुंगणावर सदैव हंटर मारण्याच्याच लायकीची आणि देशात हुकूमशाही आल्याशिवाय (किंवा आली तरीही) न सुधारणारी म्हणता यावीत काय?

बाकी, शेजारी देशाचे हुकूमशाहीचे सनातन प्रयोग (आणि त्या देशाची एकंदर अवस्था) पाहतासुद्धा कोणाच्या मनास जर आपल्या देशात हुकूमशाही यावी असा विचारसुद्धा शिवत असेल (नि ढुंगणावरच्या हंटरचेच आकर्षण असेल), तर डोंट दे, इन ऑल प्रॉबेबिलिटी, डिज़र्व इट?

('जो दूसरे के लिए गड्ढा खोदता है, ख़ुद ही उस में गिर जाता है' या उक्तीप्रमाणे, देशात यदाकदाचित खरोखर जर हुकूमशाही आलीच, तर पहिला हंटर यांच्याच ढुंगणावर पडेल, हे या लोकांना कळत नसावे, की कळून घ्यायचे नसावे? आणि एवढे करूनही हुकूमशाही जर इतकी गोग्गोड असेल, तर मग आणीबाणीत तरी नेमके काय वाईट होते?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तर डोंट दे, इन ऑल प्रॉबेबिलिटी, डिज़र्व इट?

नाही. ते विचार तत्कालिक असतात. त्यांची किंमत फार नाही वाटतं. त्यातून अजून काही निष्कर्ष काढावेत असं मला नाही वाटत. त्याच माणसाला थोड्या वेळानी विचारल की बाबा रे तुला खरच हुकुमशाही हवी आहे का तर तो नाही म्हणण्याची शक्यता खूप आहे.
उद्या एखादा म्हणत असेल की आम्ही लहानपणी वाड्यात/चाळीत रहात होतो तेव्हा काय मजा यायची. याचा अर्थ असा नव्हे की लगेच तो माणूस चाळीत रहायची इच्छा बाळगतो.

अजून एक उदाहरण बघा. ब्रेकींग बॅड नावाच्या एका सिरिअयल मधलं.

एंबेड केलेला व्हीडो दिसत नसेल तर ही लिंक
https://www.youtube.com/watch?v=M5l8spk68CA

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

या लेखामधे लेखकमहाशयांनी जर्मनीचे, दुसर्‍या महायुद्धाचे किती अध्ययन केले आहे ते सविस्तरपणे (किंवा थोडक्यात) सांगीतले असते तर बरे झाले असते. उगाच दर दोन तीन ओळींनंतर सद्यकालीन भारताची आठवण झाली असे आळवण्यात अर्थ नाही. जर्मनीचे तेव्हाचे वास्तव वेगळे आहे, भारताचे आजचे वास्तव प्रचंडच वेगळे आहे.
१. आर्य असण्याचा जर्मनांना तेव्हा (नि आताही) जितका माज होता तितका हिंदू असण्याचा साधा अभिमानही भारतीयांना कधीच नव्हता. १००० वर्षे गुलामगिरीत राहिलेल्यांचा देश म्हणजे भारत. हिंदू ही भारतीयांची भाजपवाल्यांनी शोधलेली ओळख आहे असाच जनरल रिअल माहौल आहे.
२. वसाहतवादात ते इतर युरोपिय देशांपेक्षा मागे राहिले होते.
३. पहिल्या महायुद्धात जर्मनीची प्रचंड नाचक्की झाली होती. आज भारताबाबत असे काहीच नाही.
४. जर्मनीला अन्याय्य तह स्वीकारावा लागला होता. असंही काही भारताचं नाही.
५. आर्थिक समस्या "त्या काळात" वाढल्या होत्या. आज भारत महासत्ता वैगेरे शब्द बोलतो (बनतो कि नाही जाऊ द्या)
६. तेव्हा ज्यू सारी संपत्ती बाळगून होते. याची लोकांना चीड होती. भारतातले मुसलमान जाम भिकारी आहेत. अगदी नाव घेऊन नाही, पण त्यांचेच शोषण चालू आहे. बर्‍यापैकी लेबर तेच असतात.
७. ज्यू अनितिमान होते असा इतर जर्मनांचा समज होता. इथे मुसलमानांबद्दल असा समज नाही.
८. ज्यूंचे निराकरण हा नाझींची ओपन प्रचार होता. भारतात उंगली आणि बदला (कशाच ते भाषण ऐकायचं कष्ट कोणीही घेतलं नाही) शब्द आले तरी उमेदवार बॅन होतात.
९. १९३३ आणि २०१४ मधे काही फरक आहे कि नाही?

ज्यू देशद्रोही होते असाही समज होता. इथे काही हिंदूचा असा समज असतो हे मान्य करावे लागेल. पण किती मुसलमान असे असतात चे उत्तर १५% पैकी १४% ते ०.००००००.....१% (percentage points)असे काहीही हे मुस्लिम द्वेष्टे सांगू शकतात. यात काश्मिरी "मुसलमानांचा" प्रश्न, इथे होणारे "पाकिस्तानी अतिरेक्यांचे" बॉम्ब धमाके, त्याला लागणारा लोकल सपोर्ट, होणार्‍या दंगली, ... ते ....मुसलमानांना नको असणारा समान नागरी कायदा, त्यांना मिळणार्‍या सवलती (हज), त्यांची संवेदनशीलता, मध्ययुगीन फतवे, बुरखा परंपरा, दाउद, (अगदी) मांसाहार, इ, इ आहेत. अजूनही एक प्रकारचे द्वेष्टे आहेत जे इतिहास बेबाक करू पाहतात. म्हणजे पूर्वीच्या मुस्लिम राजांनी मंदिरे भ्रेष्ट केली ती शुद्ध करण्यात आजचे मुस्लिम आडकाठी करतात, दिल्लीत मुख्य रस्त्यांच्या (अगदी जनपथ)भर मधात मजिदी आहेत्(अंधारात बाईक धडकली तर एखादा सरळ मरेलच), पाकिस्तान मुस्लिमांना मिळाला -हिंदूना काय मिळाले, इ इ मानणारे. (यातला बराच भाग न्याय्यपणे, सत्य जाणून, शांतिपूर्वक झाला तर माझाही त्याला पाठिंबा आहे असे मी स्पष्टपणे नोंदवू इच्छितो.)

क्षणभर आपण मानू कि हे सगळे भाजपवाले, संघी मुस्लिमद्वेष्टे आहेत. पण आजपावेतो त्यांना कोण पुसले आहे? १९७७ मधे त्यांना काही सन्मानास्पद जागा मिळाल्या होत्या. १९८४ मधे पुन्हा त्यांची इज्जत गेली. १९९१ मधे, "माझ्यामते" त्यांनी 'हिंदुत्व सोडून राम पकडला'. (म्हणजे हिंदूना राम अपिल करतो, पण हिंदुत्व कळत नाही आणि मुस्लिमद्वेष नकोसा आहे.)ते "चाल म्हणून" यशस्वी ठरले. पण पुन्हा पहिले पाढे पंचावन. कारण त्यांच्या हिंदुत्वाला इथे कोणी भीकच घालत नाही. १९९८ मधे त्यांचे सरकार बनले. ते काय करू शकले? तेव्हाही कमी हंगामा झाला नव्हता. आज जी काँग्रेस आणि तथाकथित बुद्धिवादी सरळसरळ वाजपेयींचे नाव घेऊन जाहीराती करत आहेत, त्यांना 'चांगले' म्हणत आहेत त्यांनी १९९८ मधे त्यांचीच प्रचंड भिती व्यक्त केली होती. (वाजपेयींना तेव्हा पाकिस्तानी घाबरायचे, पण अनुभवाने आज मोदींना घाबरत नाहीत.) 'हे लोक' देशाचे काय करतील, इ इ. (मोदी भाड मे गये लेकिन अटलजी आज का होईना 'सत्पुरुष' बनले हे पाहून मी तरी सुखावलो आहे.) काय झालं तेव्हा? एकतरी* उदाहरण आहे का अटलजीच्या सरकारचे मुस्लिमद्वेषचे? Any hint in that direction?

आज जे काही चाललं आहे त्यात लोक दोन पक्षांचा केवळ प्रचार लोक का पाहत नाहीत? आजच सगळे मुस्लिमद्वेष्टे प्रबळ झाले आहेत कशावरून? त्यांचे लोक आजच का ऐकत आहेत? मोदी एका कामासाठी (मुसलमानांना मारण्यासाठी) दुसरा बहाणा करत आहे (विकास) हे लोकांना माध्यमांनी सांगीतलेलं नाही असं का? आजतरी मोदींना नीट वा कसे बहुमत मिळणार आहे का?

*एक अपवाद म्हणता येईल तो गुजरात दंगली नि मोदींचे मुख्यमंत्री म्हणून टिकून राहणे. आता त्यामागे त्यांचा एक इतिहास आहे. मोदी कधी सत्तेत नव्हते. म्हणजे ते थेट मुख्यमंत्री झाले. अगोदर ते कॉरपोरेटर पण नव्हते. वरून (त्यामानाने) ते अगोदरच अडाणी. त्यात त्यांचे पूर्वीचे काम लाल चौकात (धमकी मिळाली असताना) तिरंगा लाव, असली. मग जोष जास्त. पदाची जिम्मेदारी माहित नाही. त्यात ते हिंदुत्ववादी. ते मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याच राज्यात गोध्रात हिंदू मारले गेले, मग त्यांना काय करावे ते कळेना. लोक त्यांना "अहो, दंगली आवरा" असे सांगत असताना ते पॉलिश्डपणे "शांतीचे आव्हान" वैगेरे न करता "गोध्रा होगा तो अहमदाबाद होगा" म्हणू लागले. राजकर्त्यांने कर्तरी प्रयोग वापरला कि कर्मणी याने मेडियात इतका फरक पडतो, मग असली विधाने केली तर राज्यकर्ता भारतात जिवंत राहावा का? पण हे टिकले. इथे संदेहाचा फायदा मोदींना यासाठी द्यायचा कि गुजरातचे दंगे होते, कत्तली नव्हत्या. दिल्लीत काही हजार शीख - ० हिंदू, नेल्लीत ५००० मुस्लिम -० हिंदू अशा कतली झाल्या.

आणि समजा मोदींनी खरोखरच दंगली घडवून आणल्या असल्या (काही लोक म्हणतात त्यांना हे पक्के माहितच आहे) तर १२ वर्षांत काँग्रेसने (सत्ताधारी म्हणून) काय केले?
१. देश स्तरावर जाउ द्या, पण राज्य स्तरावर अशा कुप्रवृती निवडून येऊ शकतात. दंगली झाल्या तर पुढे उमेदवारीवर बंदी, पक्षावर बंदी, कार्यकर्त्यांवर बंदी असे कायदे आले का? (गुजरात मधे ते कामाचे ठरो न ठरो). उद्या अशाच दंगली हेच मुख्य राजकारण झाले तर?
२. मुख्यमंत्री, महापौर, सरपंच यांच्याकडे कार्यकत्यांचे जाळे असते. सरकारकडे लॉ मशिनरी असते. जर केवळ पदाच्या जोरावर उद्या कोणी सोम्या गोम्या एका विशिष्ट प्रकारच्या विरोधकांना चक्क संपवूच लागला तर प्रशासनाची काम करण्याची पद्धत चूक नाही. हे सारे सरकारी अधिकारी ऐन वेळी 'सामील होणारे' निघाले तर हे लोक कोणाचाही बोर्‍या वाजवणार. मग लोकशाहीला अर्थ काय? मुंबईतले प्रशासन ठाकर्‍यांचे 'ऐकते', गुजरातेतले मोदींचे 'ऐकते', तर हा डेंजर प्रकार आहे. हा दोष काय आहे हे जाणून तो दूर करण्यासाठी एक शब्द तरी कोणी बोलला आहे का?
३. आज मोदींच्या विरोधात गेलेल्या एकूण पोलिस अधिकार्‍यांची संख्या पाहता 'सामील न होणारे', 'केवळ पाहत राहणारे' लोकही बरेच होते म्हणायचे. मग हे असूनही असे झाले. शेवटी अतिशय उच्चपदस्थ अशा पोलिस अधिकार्‍यांना मोदी सहभागी होते हे माहित असून, आणि त्यांना जेलमधे घालायची इच्छा असून ते घालू शकत नाहीत (उलट स्वतःच छळ सहन करत आहेत) म्हणजे सिस्टिम मधे जबरदस्त दोष आहे.
४. ज्यांना सत्य माहित आहे, त्यांनी मोदींना शिव्या घालाव्यातच. पण तो साईड बिजनेस असावा. कारण हे पोस्ट फॅक्टो आहे. दरवेळेस 'नंतर सजा करून' फायदा नाही. व्यक्तिगत गुन्हे अगोदर थांबवता येत नाहीत पण 'राजकीय अपराधीकरण' होणार नाही अशी व्यवस्थाच हवी.

अजून एक मुद्दा आहे. काही "बुद्धीवादी" लोकांना साक्षात्कार झाला आहे कि 'बुरे दिन आने वाले है.' हे मी भाजपविरोधी मतदारांबद्दल बोलत नाहीय. (विरुद्ध बाजूने मत देणे, न आवडणे, इ काहीच गैर नाही.) फक्त साक्षात्कारी लोकांबद्दल. त्यांना भारताच्या इतिहासात त्यांचे नाव हवे आहे. आम्ही दृष्टे होतो. आम्ही इशारा दिला होता. अशा करिता त्यांच्याकडे महायुद्धकालीन संदर्भ देखिल आहेत. आम्हाला भिती वाटली होती. परिस्थिती आम्ही जाणली होती. माध्यमांत आम्ही आव्हान देखिल केले होते. मत मांडले होते. कोणी आमचे ऐकले नव्हते. इतिहास (म्हणजे आजचे भविष्य) जेव्हा भारतीय जनतेला, नेत्यांना, अंध पाठींबा देणारांना, perpertrators ना प्रताडेल तेव्हा आमचे कौतुक होईल. आपले तिंबून तिंबून मऊ झालेले पुरोगामित्व दाखवण्याचा हा मस्त मौका आहे. तोंडसुख घेण्याचा मौका आहे. किती वर्षे झाली, देशाच्या इतिहासात कोणी व्हिलनच नाही. औरंगजेबाला बोलता येत नाही, जिन्नाला नीटपणे आपल्या देशाचा म्हणता येत नाही, म्हटला तरी तो बर्‍यापैकी चांगलाच निघतो. केव्हापासून फ्र्स्टेशन साचून राहिलं आहे. हा गडी मस्त मिळाला आहे. घ्या याला ठेचून. आणि याच्या निमित्ताने एका प्रचंड मोठ्या लडीला (राजकीय, वैचारिक) बुकलण्याचा मौका मिळतो. तो बोनस. पेपरात कॉलम पाडायला मिळतात, न वापरलेले भात्यातले विशेषणांचे बाण बाहेर काढायला मिळतात. कॅटल क्लास च्या वरचे असण्याचे सुख अनुभवायचे मिळते. असे हे दांभिक लोक आहेत. कारण मोदीमुळे भारताचा जर्मनी होणार हे इतके ढळढळीत दिसत असते तर लोकांसमोर ते तसेच आणण्याचा प्रचंड प्रयत्न नको का व्हायला? देशाचे खरोखरच वाइट होणार असे बुद्धीवंतानी पटवून दाखवल्यावर तसे होऊ नये म्हणून काम करायला तयार असणारी पिढी देशात नाहीच का? इतक्या भीषण स्थितीत बुद्धिवाद्यांनी जास्त काम नको का करायला? मतदारांना अपिल करून काय होते? हा प्रयत्न इतका क्षीण आहे, उशिरा आहे, कि हा दुसर्‍या पक्षाचा प्रचार आहे कि देशभक्ती आहे हे तरी लोकांना नीट कळले पाहिजे. असो. मोदी जिंकावा वा नये याबाबत माझे मत नाही, असलेच तर गौण महत्त्वाचे आहे, पण अप्रिल २०१९ मधे, तो जिंकलाच तर, या लोकांचा प्रचंड रसभंग व्हावा ही मनोमन इच्छा आहे.

मोदीचा (टोपी नको), भाजपचा, आर एस एस चा, सामान्य कट्टर हिंदूचा, इतर मृदू हिंदूंचा, इतरांचा मुस्लिमांविरुद्ध छोटा मोठा अजेंडा आहे/असू शकतो हे सत्य आहे पण त्यात १९३९-४५ पाहण्याचे कारण नाही. जेव्हा दोन भिन्न संस्कृती एकत्र राहतात तेव्हा इतके भेद असतातच. पण उगाच भलताच बाऊ करणे योग्य नाही. म्हणून लेखकमहाशय, २०१४ मधे मंगोलिया मधे साधा थंडी/दुष्काळ पडला तर इराक, २०१५ मधे इराण मधे प्रचंड कत्तली होतील असे भाकीत वर्तवणारांपैकी वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तपशीलात बरेच मतभेद आहेत, मात्र एकुणात मोदींचा भलताच बाऊ करणे योग्य नाही हे मत योग्य वाटते.
अर्थात हे मत निव्वळ या निवडणुकीपुरते आहे कारण एकट्या भाजपाला पूर्ण बहुमत मिळाणे कठीण आहे.

बाकी, मोदी आले की मुसलमानांचा विनाश होईल ही भिती मलाही वाटत नाही. मला भिती वाटते ती 'समाजकारणाचा' विनाश होईल ही. त्यांच्या सिस्टिममध्ये राहिलात तर तुम्ही साव नाहितर सिस्टिम तुम्हाला बाहेर फेकुन देईल किंवा बदलायला भाग पाडेल ही ती भिती! या सिस्टिमला विरोध करणारा हा थेट राष्ट्रद्रोही किंवा भारताच्या विकासाच्या आड येणारा कोणीतरी! व्यक्तीस्वातंत्र्य? तेही समलैंगिक अथवा इतर कोणत्याही गटाचे? त्याचा भारताच्या आर्थिक उन्नतीला काही उपयोग आहे? नाही? मग काही थोड्या लोकांचे स्वातंत्र्य टिकवण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. निव्वळ आर्थिक फायद्याचे ते टिकेल. हिटलरचा धार्मिक अँगल आता जुनाट आहे, मात्र सध्याच्या पोकळ अस्मितांच्या जंगलात माझ्यासारखे फारशा कोणत्याही अस्मितेने न चेतवणारे अल्पसंख्यच असतात. मग अशा विचारसरणीची सिस्टिम त्यांना बदलायला भाग पाडते किंवा नष्ट करून टाकते. प्रश्न धर्माचा नाहिये, अल्पसंख्यांचा आहे! इथे बदलतात ते तपशील व कारणे, परिणामांत बदल होईल अशी अपेक्षा मात्र करायला मन तयार होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अर्थात हे मत निव्वळ या निवडणुकीपुरते

म्हणजे बाऊ करणे योग्य आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

? या निवडणुकीत तसा बाऊ करणे योग्य नाही कारण एकट्याला सत्ता मिळणे कठीणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कशावरून? एकट्या भाजपला ५०० च्या वर जागा मिळू शकतात. २७३ तर फारच अशक्य नाही. म्हणजे इतके अशक्य तर नक्कीच नाही कि होलोकॉस्ट पुढे आहे आणि आपण गप्प राहावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एकट्या भाजपला ५०० च्या वर जागा मिळू शकतात

४५० जागा लढवणार्‍या भाजपाला ५०० च्या वर जागा मिळु शकतात हा शोध रोचक आहे! Wink

२७३ तर फारच अशक्य नाही

कसे काय?

आपण एकट्या भाजपाचा बर्‍यापैकी प्रभाव असणारी राज्ये बघु
मध्य प्रदेश (२९)
राजस्थान (२५)
गुजरात (२५)
बिहार (४०)
छत्तीसगढ (११)
एकुणः १३०
समजा यातील ९०% जागा भाजपा जिंकते अर्थात ११७

म्हणजे महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, आंध्र, कर्नाटक, तमिळनाडू व पंजाब, हरियाणा, दिल्ली, गोवा, आदी लहान राज्ये मिळून १५६! जागा भाजपाला जिंकायला हव्या!
पैकी उत्तर प्रदेशात भरघोस म्हणजे अगदी ४० जागा मिळाल्या व महाराष्ट्रात १५ जागा मिळाल्या तरी टोटल ६५ जाते. कर्नाटकात किती अशा मिळणार? उरले तमिळनाडु, आंध्र जिथे भाजपा मुळातच सिंगल डिजिट जागा लढवतेय. मग २७३ एकटी भाजपा मिळवणार कुठल्या जोरावर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

५०० जागांच्या विधानात चूक आहे. म्हणजे जागेच्या संख्येत चूक आहे. हे मान्य.

पण नाझींनी तर अल्पमतात सरकार बनवले होते. सत्ता खेचून घेतली होती. इथे चिंजना, तुम्हाला, मेघनाला, लोकेशना मुस्लिमांचा होलोकास्ट करू पाहणारे हिंदू खतरे के लेवल के उपर दिसत आहेत. तो मूळ मुद्दा आहे.

मागे मी एकदा "अशी अशी डेवलपमेंट भारतीय ट्रान्सपोर्ट क्ष्रेत्रात झाली तर काय?" असे विचारले होते. तुम्ही म्हणालात -"कोणाच्या नजरेत?" जेव्हा कि असे विचारायची गरज नव्हती. मी -"समजा भारताच्या दळणवळण मंत्र्याच्या नजरेत" . तुम्ही, खोचकपणे - "असे पद असतेच का?". मूळ चर्चा तशीच राहिली. आता २००६ पासून भारत सरकारला, बर्‍याच राज्य सरकारांना नि यूएलबींना माझी टीम 'रेग्यूलेटरी' अ‍ॅडवायझरी देते. मी तो शब्द वापरू नये का?

साधा मुद्दा असा आहे कि विषय काय आहे. ५०० जाऊ द्या, ४५०. ४५० पैकी २७३. ६०% ओन्ली. मोदीची खरीच निघाली तर? अगदी ० शक्यता नाही ना? नि समोर चक्क १५ कोटींचा होलोकॉस्ट! दुसर्या महायुद्धाच्या अख्ख्या युरोपच्या २५ पट मोठा !! आणि पुरोगामी लोक पुळचळ पत्रके वैगेरे काढून झोपा काढताहेत !!! २०१४ जाऊ द्या, २०१९ मधे शुद्ध भाजपचे सरकार येऊ शकते ('आतला प्लॅन' राबवण्यासाठी हे लोक कदाचित लोकांना फसवण्यासाठी ५ वर्षे छान सरकार चालवतील.). हे ही कमी डेंजर नाही. तेव्हा ज्यांना मोदी हिटलर आहे हे पक्के माहित आहे त्यांनी कृष्णमूर्तीसारखा देशत्याग करू नये, जावेद अख्तर सारखी पत्रके काढू नयेत. त्याच्याने काय होणार?

प्रत्येक वेळी मी सारे आकडे तंतोतंत अचूक मांडावे हे गरजेचे नाही. सार्‍या वाक्यरचना एकदम समर्पक कराव्या हे ही गरजेचे नाही. (तितके माझे कौशल्यही नाही.) माझे प्रतिसाद कोणी संदर्भ म्हणून थोडीच वापरतो?

तुम्हाला फॅक्टस नि फिगर्स नीट माहिती आहेत नि तुम्ही दुरुस्त्या करता हे उत्तमच, पण मूळ मुद्द्यालाही उत्तर द्यात जा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आकडेवारीची सत्यासत्यता, तर्कसंगत विधानं, युक्तिवादाचा चिरेबंदीपणा... हे सगळं आपल्या जागी ठीक. मी त्यात शिरत नाही.

माझ्यापुरता मुद्दा इतकाच आहे:

भाजप सत्तेत येईल की नाही, मोदी पंतप्रधान होईल की नाही, तो हिटलरच्या पावलावर पाऊल ठेवून वंशविच्छेद करील की नाही - हे सगळं काळ ठरवेल. पण असं काही घडणारच नाही, असं छातीठोकपणे सांगता येत नाही. असं घडूही शकतं, असं इतिहास सांगतो. परिस्थिती निराळी असेलही. पण ती जशीच्या तशी कधीच न असताही इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. दुर्दैवानं ती घडलीच, तर सर्वाधिक नुकसान कुणाचं होणार आहे? जो माणूस स्वतःला पुरोगामी म्हणतो (ज्याला तुम्ही, अनुप, मन, कधीकधी बॅट्या, 'तथाकथित' असं जास्तीचं विशेषण लावता (अवांतरः त्या संदर्भात हे पोस्ट रोचक आहे.)), त्याचं. धर्म, लैंगिकता, सामाजिक न्याय आणि अशा इतर अनेक विषयांमध्ये त्याचं धोरण बघता बघता मागे फेकलं जाऊ शकेल आणि अशीही दाट शक्यता आहे की त्याला विरोध नोंदवण्याचाही हक्क उरणार नाही.

अशा माणसानं पुन्हापुन्हा सावधगिरीचे इशारे देऊ पाहणं, विरोध नोंदवणं यात इतकं न समजण्याजोगं / गैर काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

त्याचं. धर्म, लैंगिकता, सामाजिक न्याय आणि अशा इतर अनेक विषयांमध्ये त्याचं धोरण बघता बघता मागे फेकलं जाऊ शकेल आणि अशीही दाट शक्यता आहे की त्याला विरोध नोंदवण्याचाही हक्क उरणार नाही.

१. १९७७ मधे, १९९८ ते २००४ मधे भाजप केंद्रात सत्तेत होती.
२. उत्तराखंड, गुजरात, राजस्थान, म प्र, उ प्र, झारखंड, छत्तिसगढ, कर्नाटक, इथे भाजप १५, १०, ५ वर्षे सत्तेत होती.
३. बिहार, महाराष्ट्र, आसाम, पंजाब, इ मधे युतीत सरकार मधे होती.
४. बरेच काळ केंद्रात नि बर्‍याच राज्यांत विरोधी पक्ष होती.

आता २००२ चे दंगे सोडले (समजा ते सरकारी धार्मिक दंगे होते) तर अजून कोणते धार्मिक, सामाजिक, लैंगिकतेचे अन्याय या लोकांनी केले? कोण किती मागे फेकले गेले? जरा उदाहरणे द्याल का? हे सगळ्या सरकारांची वर्षे एकत्र केली तर १०० च्या वर भरतील.

त्या उलट हे पहा. काँग्रेसने १९६२ ते १९७२ देशात आणिबाणी लागू केली होती. लोक त्याबद्दल बोलतही नाहीत. १९७७ मधे 'कडक' आणिबाणी होती. पुन्हा लोक विसरले आहेत. १९८४ मधे राजनेत्यांनी शिखांच्या कत्तली केल्या. हे ही लोक विसरले आहेत. अगदी अलिकडे झालेला अजय माकन इव्हंट पहा. तो ही लोक विसरले. आणि तेच इष्ट आहे.

जो पक्ष, विचारसरणी तुम्हाला आवडत नाही त्याला मत देऊ नका. पण हे लोक चक्क चक्क दहशत बसवताय. हिटलरचे नाव घेऊन. हे गैर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काँग्रेसने १९६२ ते १९७२ देशात आणिबाणी लागू केली होती

असे कोणी म्हणत नाही. इंदिरा गांधींनी आणिबाणी लागु केली होती असेच म्हटले जाते आणि ते घातक आहेच. पण आता इंदिरा गांधी कालवश झाल्याने तो मुद्दा उरत नाही. मोदी सुद्धा नेहरु ते राहुलमध्ये इंदिरा गांधींबद्दल वाईट बोलताना दिसत नाहीत.

१९८४ मधे राजनेत्यांनी शिखांच्या कत्तली केल्या. हे ही लोक विसरले आहेत.

लोक विसरलेले नाहीत. कमलनाथांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केला असता व त्यांची त्यांच्या पक्षावर मोदींइतकीच पकड/जरब असती तर तो मुद्दाही इतकाच गाजल असता.

बाकी दंगलींची वगैरे भिती नाही हे किती वेळा स्पष्ट करायचे?
अगदीच ढोबळ व सैल विधान करायचे तर मोदीराज्यात "विरोध करता न येण्याची भिती वाटते आहे"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असे कोणी म्हणत नाही.

http://en.wikipedia.org/wiki/State_of_Emergency_in_India वर

1.Between 26 October 1962 to 10 January 1968 during the India-China war — "the security of India" having been declared "threatened by external aggression".

2.Between 3 December 1971 to 21 March 1977 originally proclaimed during the Indo Pakistan war, and later extended along with the third proclamation — "the security of India" having been declared "threatened by external aggression".

3.Between 25 June 1975 to 21 March 1977 under controversial circumstances of political instability under the Indira Gandhi's prime ministership — "the security of India" having been declared "threatened by internal disturbances".

या तीन आणीबाण्या सांगीतल्या आहेत. पहिल्या दोनच्या नावाने कोण बोलते का? आता मोदींनी लोकपाल नेमला नाही म्हणून सॉलिड बोंबाबोंब होते. कोणत्या राज्यात कोणत्या लोकपालाने कोणाला जेलमधे घातले आहे? कशाच्या नावाने आवाज उठवायचा याचा एक संकेत आहे. मोदी आहे म्हणून लोक काहीही मुद्दा बनवतात. पहिल्यांदा विकासच झाला नाही. मग झाला पण गरीबांचा झाला नाही. मग केरळ इतका झाला नाही. मग सांगतो तितका झाला नाही. मग मुस्लिमांचा, दलितांचा झाला नाही. राजकीय लोकांनी अशी नाटके केली तर ठिक, पण बुद्धीवाद्यांनी? असो. आपला विषय तो नाही.

I just wanted to know from Meghna what are the instances of social, religious, gender related misrules in near 100 government-years under BJP, so intensive that not only you yourself won't vote them but also you nearly intimidate their prospective voter.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमच्याशी वाद घालण्यात (तुम्हांला काही समजावू पाहण्यात) अर्थ नाही. कारण मला जी गोष्ट भीतीदायक वाटते, ती तुम्हांला सरळसाधी वाटते आणि उलट. त्यामुळे आपण एकमेकांच्या तर्काला प्रश्न विचारून फारसं काही साध्य होण्यासारखं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हे या केसमध्ये इतकं सरळसाधं नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उलगडून सांग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मोदी आला की क्षयझ खतरे में इ.इ. अ‍ॅक्यूजेशन्स ही मोदी आला की रामराज्य येणार इ.इ. घोषणांइतकीच निरर्थक आहेत. मोदीला इच्छा असली तरी इतके एकछत्री होता येणार नाही. पण हे न पाहता लोकांचं बरळणं चाललेलंच असतं. मोदीविरोध ही कूल पॉइंट्स मिळवण्याची सफिशिअंट कंडिशन आहे असे मानणारे (म्ह. त्याची जाण नसलेले पण आचरणातून तसे सूत्र दिसणारे) लोक मग सूर टिपेला लावतात आणि ते सगळं प्रकर्ण एकूण कॉमिकलच आहे.

मोदी तसा अंमळ हुकूमशाही प्रवृत्तीचा आहे असे म्हंटात, पण मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यात लै फरक आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मोदीला इच्छा असली तरी इतके एकछत्री होता येणार नाही. पण हे न पाहता लोकांचं बरळणं चाललेलंच असतं.

तसे नव्हे, 'सध्या' मोदींकडून हा धोका नाही असेच मीही म्हटले आहे.
पण अजोंचे म्हणणे आहे की जर मोदींची एकछत्री सत्ता आली तरीही तो धोका नाही... तसे झाले तर काय धोका आहे यावर चर्चा चालु आहे. त्यामुळे पुढिल उपहास इथे गैरलागू आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शेवटी तेच ओ. शब्द फिरवून मत बदलत नै. तुमच्या म्हण्ण्याप्रमाणे पाहिल्यास गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून धोका नै पण पंप्र म्हणून धोका आहे की नै यावर चर्चा आहे. आणि याच चर्चेबद्दल माझी कमेंट आहे. तस्मात उपहास इ. आजिबात गैरलागू नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मोदी वाईट असे एकदा मनोमन ठरवल्यावर कोणी काहीही म्हटले आणि स्वतः मोदी पुढील अगदी १० वर्षे राहिला सत्तेवर तरी मूळ मतात काहीच बदल होणार नाहीये. त्यामुळे चर्चा कितीही झाली तरी मोदी वाईटच राहणार आहे. ह्याशिवाय तोगडिया सारखे निर्बुद्ध लोक मुद्दामहून पिंक टाकणार आणि मग मोदीनेच त्याला सांगितले असे ठोकून देवून रान उठवायचे. मोदी १२ वर्ष गुजरातेत आहे. तिकडे दंगल झाली नाही तर हेच लोक म्हणणार की मुसलमान घाबरले आहेत ह्या असल्या विधानांना तुम्ही खोडून काढूच शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी सहमत. साप साप म्हणून भुईला धोपटणार्‍या या आर्मचेअर लोकांची स्ट्रॅटेजी हीच असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हिटलरने ज्या प्रकारे राष्ट्रवादाला चेतवून लोकांना

भारतात राष्ट्रवाद असू च शकत नाही. भारत हा अनेक देशांचा बनलेला एक भूप्रदेश आहे. त्याच्यात जाती, धर्म आणि भाषेवर आधारीत शेकडो/हजारो देश आहेत. काही देश कधी कधी एकमेकांमधे हात मिळवणी करतात कधी विरुद्ध जातात.

जर्मनी सारखे कधीच एकसंध जनमत भारतात असणार नाही. हिंदु म्हणुन मोदी अपील झाला तर माझी जात मराठा म्हणुन शरद पवार अपील होणार.

ह्याच कारणा मुळे भारतात लष्कर पण कधीच सरकार उलथुन टाकू शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धर्म, लैंगिकता, सामाजिक न्याय आणि अशा इतर अनेक विषयांमध्ये त्याचं धोरण बघता बघता मागे फेकलं जाऊ शकेल आणि अशीही दाट शक्यता आहे की त्याला विरोध नोंदवण्याचाही हक्क उरणार नाही.

1. You are convinced about the very high possibility of bleak future.
2. You are competent to judge the future.
3. I may be unreasonable in my argumentation.
4. It may be worthless to tell the TRUTH to me.

आपल्या सर्व विचारांचा मला आदर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमचा उपरोध / प्रामाणिकपणा राहू द्या.

१. समलैंगिकतेला कायद्यानं विरोध असू नये.
२. स्त्रियांवर शतकानुशतकं अन्याय झालेला असल्यामुळे त्यांना ५० टक्के आरक्षण मिळावं (आणि/किंवा इतर सामाजिक/आर्थिक/शैक्षणिक क्षेत्रांत झुकतं माप देणारी शक्य ती सगळी साधनं वापरली जावीत).

आपण वादाकरता असं गृहित धरून चालू की मोदी सर्वेसर्वा झाले. वरच्या दोन मागण्यांबद्दल मोदींची भूमिका काय असेल?

त्यांची जी भूमिका असेल, असं मला वाटतं, त्या भूमिकेला तुमचा काडीमात्र विरोध नाही / तुम्हांला त्यातून काहीही नुकसान/त्रास/अन्याय संभवत नाही. म्हणून तुम्हांला मोदींबद्दलची लोकांची भीती अनाठायी/अन्यायकारक/तमासखोर वगैरे वाटते, असं माझं प्रतिपादन आहे.

अशी कल्पना करून पाहा, की मोदींनी या दोन्ही गोष्टींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. आता मोदींच्या संभाव्य सत्तेबद्दलचं तुमचं परिप्रेक्ष्य (पर्सेप्शन) काय असेल?

थोडक्यात रेषेच्या या बाजूनं आणि त्या बाजूनं दिसणारं चित्र (वाटणारं समाधान / भय) निरनिराळं असतं. मग प्रत्यक्ष आकडेवारी काहीही असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

स्त्री आरक्षण
हो.
http://www.dnaindia.com/india/report-lok-sabha-elections-bjp-manifesto-v...

समलैंगिकता
नको.
http://www.ndtv.com/article/india/bjp-calls-homosexuality-unnatural-back...
माहित नाही.
http://www.thehindu.com/news/national/homosexuality-law-bjp-says-debate-...

तीन पैकी, हिंदूची बातमी कमित कमी वाचा.

पण तुमचा राजकीय विरोध कडवा नाही. हिटलर वैगेरे नाही. तुमचे तुमचे मुद्दे आहेत. त्यातला समलैंगिकतेचा मुद्दा भाजप पूर्ण करू शकणार नाही असे वाटते. काँग्रेसने सरळ भूमिका घेतली आहे. तुमचे मत काँग्रेसला जायला हवे.

भारताच्या आर्थिक, सामाजिक, इ इ जीवनात कोनकोणत्या मुद्द्याला किती महत्त्व द्यायचे, कोणाला मत द्यायचे याचे प्राधान्य ठरवताना - काँग्रेसला, आपला, इतर दोन चार पक्षांना पुढे ठेवल्यावर किमान ८-१० नंबर वर तरी भाजप आला पाहिजे. त्याचा द्वेष नको, इतके माझी अल्पमती सांगते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माझे मत कुणाला जावे ते मी ठरवीन. मी माझ्या मुद्द्यांबद्दल बोलत नाहीय.

वेगवेगळ्या मागण्या (आणि भित्या आणि अपेक्षा) असणार्‍या लोकांना दिसणारं एकाच माणसाचं (पक्षाचं, परिस्थितीचं) चित्र निरनिराळं असू शकतं, हे मी तुम्हांला सांगू पाहते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अर्थातच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गंमतीशीर चर्चा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हं तर पुरोगामी म्हणवणा-या माणसाचं धोरण मागे फेकलं जाणार का काय म्हणत होते ते झालं बघा... जगाच्या भाग्यविधाते असणा-या आंग्ल काळातील मेकॉलेचे आधुनिक कलम हटवलं आणि पार वैदिक काळात नेऊन ठेवलं बघा सुप्रिम कोर्टाने आज. अरेरे !!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय उत्तर देऊ.

१५ कोटी आकडा कुठून आणलात?
माझ्या पहिल्याच प्रतिसादातले वाक्य नि:संदिग्ध आहे ते असे:

बाकी, मोदी आले की मुसलमानांचा विनाश होईल ही भिती मलाही वाटत नाही

इतके स्पष्ट लिहुनही मग कसला होलोकास्ट नी काय काय तुम्ही म्हणताय त्यावर काय बोलायचे?
मुळात आमचे मत हे हे आहे असे तुम्ही ठरवून टाकले आहे. त्याचे स्पष्ट खंडन करूनही त्म्ही होलोकास्ट सोडायला तयार नाही.

पण मूळ मुद्द्यालाही उत्तर द्यात जा.

तुमचा असा मुळ मुद्दा काय आहे? ज्याला अजुन उत्तर दिलेले बाकी आहे?

बाकी, तुम्ही स्वतःच कबुल करताय की तुमची वक्तव्य निराधार आहेत (जसे एकट्या भाजपाला पूर्ण बहुमत वगैरे). तसे होणे अशक्य आहे, शक्यता शुन्य आहे असे मी कधीच म्हटलेले नाही. फक्त 'कठीण' आहे असेच म्हणतो आहे. बरोबर? मग तुमचा कुठला मुद्दा राहतो ते तरी सांगा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भाजपा येण्याची ७७% शक्यता आहे.
शिवाय त्यांनी ह्यापूर्वी सत्तेत असताना ६१% निर्णय मुस्लिमविरोधी घेतले होते.
आता आले तरे ९१.५५% निर्णय अल्पसंख्य हितविरोधी असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

या उपहासात्मक प्रतिसादाचे बरेच अर्थ निघतात त्यात तुम्हाला कोणता अपेक्षित आहे?
अ. आकडे काय कोणीही देऊ शकतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करावे
ब. आकडे देणारा स्वतःला शहाणा असल्याचा आव आणत असतो, प्रत्यक्षात त्याच्याकडे प्रतिवाद करायला मुद्दे नसतात म्हणून आकड्यांवर उतरतो! ?
क. आकडे देऊन लोकांची दिशाभुल होते हो, पण त्याचे महत्त्व तितकेच. खरे म्हणत्त्वाचे काय तर पर्सेप्शन!
ड. हे 'तथाकथित पुरोगामी' किंवा 'हुच्चभ्रु' मंडळींना काय जाते आकडे द्यायला. स्वतःला जादा शहाणे समजतात, आकडे काय आम्हीही देऊ शकतो
ई. अ,ब,क,ड
फ. इतर (स्पष्ट करा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तपशीलात बरेच मतभेद आहेत, मात्र एकुणात मोदींचा भलताच बाऊ करणे योग्य नाही हे मत योग्य वाटते.
अर्थात हे मत निव्वळ या निवडणुकीपुरते आहे कारण एकट्या भाजपाला पूर्ण बहुमत मिळाणे कठीण आहे.

लोकेशच्या लेखात भारताचा जर्मनी होण्याची भिती आहे असे लिहिले आहे. मी माझ्या लांबलचक प्रतिसादात असल्या बोलण्याला ना बूड ना शेंडा असे लिहिले आहे.
१. तुम्ही म्हणताय कि - अजोंचे म्हणणे more or less ठिक, पण केवळ भाजपला बहुमत नसेल तर. असेल तर लोकेशचा लेख बरोबर आहे. चिंतातुर ही तेच म्हणताहेत. अजोंनी लेखाचे केलेले खंडन चूक आहे. कुछ वही माहौल है.
२. मी म्हणतोय - भाजपला कितीही बहुमत मिळाले तर काही फरक पडत नाही. (नि लेख होलोकॉस्ट बद्दल आहे. वाचक मतदाराला भिती दाखवण्याचा प्रकार आहे.)
३. तुम्ही - भाजपला बहुमत मिळणारच नाही.
४. मी - शक्यता आहे. बहुमत मिळणार कि नाही हे सोडा. मिळाले तर लेखात लिहिले आहे ते होणार नाही.

ऋषिकेश, मुद्दा आहे कि 'समजा' शुद्ध भाजपचे सरकार आले तर काय काय होईल असे तुम्हाला वाटते? लोकेशच्या कलाने तुमचे विचार जातात का? हिटलरचे लेखातले उदाहरण योग्य आहे का? 'समजा' मोदी शेवटच्या पायरीवर गेले नाहीत तरी ते काय काय अन्याय करतील असे वाटते? एक दोन उदाहरणे द्या. असे विचार करण्याचा आधार काय? नि तितके त्यांना मत न देण्यास पुरेसे आहे आहे काय? तितके अदर्वाइज त्यांना मत देऊ इच्छिणारास भिती घालण्यासाठी, परावृत्त करण्यासाठी पुरेसे आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मुद्दा आहे कि 'समजा' शुद्ध भाजपचे सरकार आले तर काय काय होईल असे तुम्हाला वाटते?

शुद्ध भाजपा की मोदींच्या नेतृत्त्वाखालील शुद्ध भाजपाचे? मी उत्तर दुसर्‍या शक्यतेत देतो आहे
१. सर्वात महत्त्वाचे विरोध करणे दुरापास्त होईल. तुम्हाला मोदी दाखवताहेत त्या मार्गाने प्रगती नको असेल तर तुम्हाला बाजुला काढले जाईल किंवा मग 'हटवले' जाईल. समजा मी एक शेतकरी आहे आणि मला येथे येणार्‍या "खाजगी प्लांट"ला जमिन द्यायची नाहिये. तर मला आधी भरपूर मोबदला ऑफर होईल तरीही मी नकार दिला तर मला थेट "राष्ट्राच्या प्रगतीतला" अडसर समजला जाईल व (भरपूर मोबदला दिला जाईल पण) येनकेन प्रकारेण जमिन बळाकावली जाईलच.
"नाही" हे उत्तर देणे कठीण होत जाईल.

२. पर्यावरणाचे नियम सर्रास धाब्यावर बसवले जातील. उदा. पेयजल कंपन्यांमुळे होणारी भुगर्भजलाच्या पातळीतील घटा वगैरे बोलणार्‍यांना हे आले रोजगार विरोधी "हुच्चभ्रु" वगैरे म्हणून हिणवले जाईल
अजुनही बरीच आहेत. सध्या चर्चेपुरती ही दोन घेतो

लोकेशच्या कलाने तुमचे विचार जातात का?

लोकेशने दाखवलेल्या साम्यस्थळांमध्ये नाकारण्यायोग्य स्थळे कोणती वाटतात?

हिटलरचे लेखातले उदाहरण योग्य आहे का?

याला हो किंवा नाही असे उत्तर देणे सध्या शक्य नाही.
हिटलरने ज्या प्रकारे राष्ट्रवादाला चेतवून लोकांना आपल्यामागे खेचत नेले व त्या प्रवासात व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी झाल्यास त्याकडे काणाडोळा केला, तसे मोदी नक्कीच करणार नाहीत असे ठाम विधान करायची छाती होत नाही!

'समजा' मोदी शेवटच्या पायरीवर गेले नाहीत तरी ते काय काय अन्याय करतील असे वाटते? एक दोन उदाहरणे द्या.

वर दिली आहेत

असे विचार करण्याचा आधार काय?

त्यांचे गुजरातमधील काम

नि तितके त्यांना मत न देण्यास पुरेसे आहे आहे काय? तितके अदर्वाइज त्यांना मत देऊ इच्छिणारास भिती घालण्यासाठी, परावृत्त करण्यासाठी पुरेसे आहे का?

माझ्या मते होय!

पायाभुत सुविधा, वीज, पाणी वगैरे मिळवायच्या हव्यासापायी माझ्याकडचे मी काय देतोय हे मला जाणून घ्यायचे आहे. आणि सध्या त्याचे उत्तर माझे विरोध करायचे स्वातंत्र्य असे मिळत असेल तर मला या सुविधा सध्याच्या वेगात मिळणे मंजूर आहे. अधिक वेगात प्रगती झाली नाही तरी चालेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आता कसे मुद्द्याचे बोललात. आपले बाकीचे विचार मला मान्य आहे. म्हणजे त्यावरही बरेच प्रबोधन शक्य आहे, पण ते गरजेचे नाही आणि एक व्यक्ति म्हणून तुम्हाला अशी मते असण्याचा मला आदरच आहे.
पण खाली जो पॅरा बनत आहे तो चिंतनीय व चिंताजनक आहे.

हिटलरचे लेखातले उदाहरण योग्य आहे का याला हो किंवा नाही असे उत्तर देणे सध्या शक्य नाही. हिटलरने ज्या प्रकारे राष्ट्रवादाला चेतवून लोकांना आपल्यामागे खेचत नेले व त्या प्रवासात व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी झाल्यास त्याकडे काणाडोळा केला, तसे मोदी नक्कीच करणार नाहीत असे ठाम विधान करायची छाती होत नाही! असे विचार करण्याचा आधार त्यांचे गुजरातमधील काम ! नि तितके त्यांना मत न देण्यास पुरेसे आहे आहे काय? तितके अदर्वाइज त्यांना मत देऊ इच्छिणारास भिती घालण्यासाठी, परावृत्त करण्यासाठी पुरेसे आहे का तर माझ्या मते होय!

इथे आपण याकरिता निश्चिंत आहात कि एकतर असे सरकार येणार नाही, आले तर त्यांची तशी मानसिकता नसण्याची थोडी शक्यता आहे. Let me not assign any numbers to these probabilities, but I am sure (you do mean that) they are not near zero. अन्यायाची शक्यता = सरकारची शक्यता * खरी मानसिकता नीच असण्याची शक्यता. मी तुम्हाला सांगतो, अन्याय करायला बहुमत लागत नाही. म्हणजे राष्ट्रपतींनी सर्वात मोठी पार्टी म्हणून पंतप्रधान केले, तर बहुमत सिद्ध न करताच दुष्ट लोक सत्ता हातात घेतील. हिटलर इ तेच करतात. त्यामुळे आज सरकार बनण्याची शक्यता १००% मानली तरी गैर ठरू नये. उरता उरली मानसिकतेची शक्यता. ती तर सर्वांना ठाऊकच आहे!!!!!!! अग्ग्ग्ग्ग्ग्ग्गा मेलोच कि!!!!!!!!!

मग मी ही तेच म्हणतोय. ही स्थिती हाताळण्यासाठी सरकारने काय केले? बुद्धीवादी लोकांनी काय केले? त्यांच्या कडे बर्‍यापैकी वेळ होता. हा सगळा विचार करून मी तो रसभंग नावाचा प्रतिसाद लिहिला आहे. मी म्हणत नाही कि मोदी हिटलर आहे कि नाही, पण ज्यांना वाटते ते सुस्त झोपून आहेत, विनाशाच्या खाईवर देश लोटून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अन्यायाची शक्यता = सरकारची शक्यता * खरी मानसिकता नीच असण्याची शक्यता.

ओके. असे समजु

मी तुम्हाला सांगतो, अन्याय करायला बहुमत लागत नाही. म्हणजे राष्ट्रपतींनी सर्वात मोठी पार्टी म्हणून पंतप्रधान केले, तर बहुमत सिद्ध न करताच दुष्ट लोक सत्ता हातात घेतील. हिटलर इ तेच करतात. त्यामुळे आज सरकार बनण्याची शक्यता १००% मानली तरी गैर ठरू नये

मला सद्य परिस्थितीत मोदी असे करतील (बहुमत सिद्ध न करताच सत्ता हाती घेतील) असे वाटत नाही. त्यामुळे या निवडणुकीनंतर मोदींच्या नेतृत्त्वाखालील एकट्या भाजपाचे सरकार येण्याची शक्यता फारतर १-२% हून अधिक मानायला तयार नाही.

उरता उरली मानसिकतेची शक्यता. ती तर सर्वांना ठाऊकच आहे

सहमत या मानसिकतेच्या शक्यतेचा आकडा मोठा आहे असे माझे मत आहे.

अग्ग्ग्ग्ग्ग्ग्गा मेलोच कि!!!!!!!!!

तेव्हा लगेच मरण येईल याची भिती बाळगु नका!

मी म्हणत नाही कि मोदी हिटलर आहे कि नाही, पण ज्यांना वाटते ते सुस्त झोपून आहेत, विनाशाच्या खाईवर देश लोटून.

यापैकी काही व्यक्ती त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.
काही व्यक्ती त्यांच्या विरोधात प्रचार करत आहेत
काही लेख, प्रतिसाद यातून शक्य तितक्या लोकांना त्यांना वाटलेला/दिसलेला धोका समजावू पाहत आहेत. (उदा. लोकेश यांचा लेख)
काही व्यक्ती इतर काही न करता मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजपाला मत देत नाहियेत वा त्यांच्या विरोधकांना मत देत आहेत

या व्यतिरिक्त त्यांनी नक्की काय करावे असे तुमचे मत आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आता अर्धी लाकडे मसणात गेली आहेत, पण -
१. भाजप विरोधात एकच सबल उमेदवार असावा. कसं आहे, पेपरात मोदीला काँग्रेसने (काँग्रेसच्या कोणत्या नेत्याने मोदीला हिटलर म्हटले नाही ते केव्हाचा शोधतोय), सपाचे नेते, बसपाचे नेते, जेडीयूचे नेते, डी एम के चे नेते, एन सी पी चे नेते, कम्यूनिस्ट, टी एम सी चे नेते, इ इ नी हिटलर म्हटलं आहे.
२. बर्‍याच मुस्लिम संघटनांनी तसे म्हटले आहे.
३. बर्‍याच बुद्धीवाद्यांनी म्हटले आहे. आपच्या कुणी म्हटलेले ऐकले नाही, पण ऐनवेळी भ्रष्टाचार दुसरा मुद्दा झाला, सांप्रदायिकता पहिला नि केजरीवाल मोदींविरुद्ध उभे राहिले, म्हणजे त्यांनाही असेच म्हणायचे असावे. असो
४. हिटलर म्हणजे जोक नाही. म्हणजे अगदी स्वार्थी माणसाने देखिल स्वार्थ बाजूला ठेउन विचार केला पाहिजे.
५. बाकींचे जाऊ द्या. फक्त राजकीय पक्ष घेऊ.

इथे एक तांत्रिक बाब आहे. कितीतरी जागी बहुरंगी लढत आहे. जितके जास्त पक्ष तितके हे आक्रस्ताळी सांप्रदायिक लोक जास्त फुटणार असे आहे का? कि सर्वांनी मिळून भाजपला हरवायला हवे. उ प्र मधे, बिहार मधे कसे गणित आहे? केवळ भाजप विरोधी मते फुटत आहेत म्हणून तिथे भाजपला जागा मिळत आहेत. मला सांगा "हिटलर टाळणे" इतके लाईटली घ्यायची गोष्ट आहे का? सगळीकडे असेच आहे. लोक म्हणताहेत कि अगदी तामिळनाडू त भाजपला १-२ जागा मिळणार. आता aidmk आणि dmk एकत्र असले तर भाजपवाल्यांचे डिपॉझिट तरी राहिल का कूठे? (हे आपवाले सुद्धा सगळी काँग्रेसची मते खातात. शीलाताईच्या इतक्या चांगल्या सरकारला बेईज्जत करून हरवले. फक्त ७-८ जागा. तिसरे स्थान. सर्वात पुढे भाजप)हे लोक (भाजपविरोधक) आपल्या स्वार्थापुढे हिटलरला इतके हलक्याने का घेत आहेत?

आता मग मला खालिल प्रमाणे वाटू लागले आहे -
१. असा कोणी हिटलरच नाही.
२. हिटलर आहे, पण त्याचे विरोधक त्याच्याही पेक्षा स्वार्थी आहेत, जवळजवळ क्रूरच आहेत ते ही.
३. २०१४ मधे हिटलरला हात पाय बांधून खुर्चित बसू द्यायला हरकत नाही अशी त्यांची धारणा आहे.
४. बुद्धिवाद्यांचे काम हिटलरची आलोचना करणे इतकेच आहे का? त्यांनी भाजप विरोधकांना पण थोडे ज्ञान पाजले पाहिजे. एकत्र या. भाजपची मते तुटतील असे बरेच उमेदवार उभे करा. एक सशक्त विरोधक ठेवा, बाकीच्यांना (अगदी पैसे देऊन) घरी पाठवा. मोदीला इतके वाईट हरवा कि धोका कायमचा टळला पाहिजे. पक्षांनीही असा विचार करायला नको? असे कोणते मार्गदर्शन घडताना दिसत नाही.
५. भाजपचे विरोधकही 'मनातून' हिटलर हवा म्हणतात. (म्हणजे काँग्रेसच्या लोकांनी उदगीरमधे राममंदिराचे वाटलेले लाडू मी खाल्लेले आहेत.). आता मतदान कुणाला करणार?
६. हे लोक फुकाची भिती घालत आहेत. आणि घाबरणारे ज्या लोकांनी अन्यथा भाजपला मत दिले असते त्याचा आनंद घेत आहेत.

आता मी माझे एक विधान मागे घेतो , ते हे कि बुद्धिवाद्यांनी काही केले नाही. The times are busy, let me be reasonable. अ‍ॅग्रीड. पण हिटलर विरोधी पक्ष सिंसीअर नाहीत असे सरळसरळ दिसत आहे.

जाता जाता - modi is hitler + कोणताही एक राजकीय पक्ष असे गूगलून पहा. अगदी लड लागली आहे म्हणणारांची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी भाजपाला किंवा मोदींना हिटलर समजत नाही. त्यामुळे या प्रतिसादावर मी अधिका काय लिहावे अशी अपेक्षा आहे?

मात्र दोघांमध्ये, त्याच्या वागण्यात, प्रसार-प्रचार पद्धतीक काही साम्यस्थळे आहेत हे म्हणजे आहेच. त्यावर काही आक्षेप आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ही दोन परस्परविरोधी वाक्ये आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सचिन तेंडुलकर म्हणजे ब्रॅडमन नव्हे.
पण दोघांच्या शैलीमध्ये काही साम्यस्थळे आहेत.

ही परस्परविरोधी वाक्ये आहेत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नक्कीच नाहीत.

पण मी जे तसे म्हटले आहे ते इथे झालेल्या प्रचंड चर्चेच्या पार्शव्भूमीवर म्हटले आहे. मग ती साम्ये कोणती, फरक कोनते, त्यांचे महत्त्व काय यांची साग्रसंगीत चर्चा झाली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

खास अजो विरुद्ध rest of aisi सामना पहायला मिळाला फार दिवसांनी.
आख्खी उपचर्चा वाचण्यासारखी आहे.
अरुणबाबू लढते रहो हम तेरे साथ हय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आता तुमच्या नी माझ्या वागण्यात किंवा मतात काही साम्यस्थळे असतील तर "अजो हे ऋषिकेश आहेत" असे म्हणणे योग्य? की "मी अजो ऋषिकेश आहेत असे म्हणत नाही मात्र त्यांच्या वागण्यात काही साम्यस्थळे आहेत" हे मत कायम आहे असे म्हणणे?

माझ्या मते दुसरे! त्यात परस्परविरोधी काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Come on, you have yourself said that if Modi comes to power with thumping majority, there is एvery high probability (once you have said almost certainty) that it will be Hitler's rule in many and most ways. हे वाचूनच मी इथे परस्पर विरोधी विधाने आहे. म्हणूनच मला इतके लिहावे लागले. तुम्हाला मोदीला हिटलर म्हणायचेच नव्हते (ज्या अर्थाने तुम्ही सगळ्या प्रतिसादांत म्हटले आहे) तर इतका वादविवाद झाला नसता.

तुम्ही दाखवलेली साम्ये गौण नाहीत, म्हणून परस्परविरोधी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Come on, you have yourself said that if Modi comes to power with thumping majority, there is एvery high probability (once you have said almost certainty) that it will be Hitler's rule in many and most ways.

कुठे म्हटलेय मी?

तुम्ही दाखवलेली साम्ये गौण नाहीत, म्हणून परस्परविरोधी.

साम्ये गौण नाहितच. मात्र ती मोदींना हिटलर म्हणण्यासाठी पुरेशी नाहीत.
त्याचबरोबर, मला मोदींना मत न देण्यासाठी व त्यांच्या विरोधात जाहिर मते मांडण्यासाठी हे साम्यस्थळे पुरेशी गंभीर आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

  1. 'मी भाजपाला किंवा मोदींना हिटलर समजत नाही'
  2. 'मात्र दोघांमध्ये काही साम्यस्थळे आहेत'

ह्यावर तुमचं मत जर एवढंच असेल -

>> ही दोन परस्परविरोधी वाक्ये आहेत. <<

तर मी एवढंच नोंदू इच्छितो की एखाद्या गोष्टीची गुंतागुंत समजूत न घेता किंवा नाकारत तिला बायनरी पद्धतीनं ('एक तर ही बाजू तरी किंवा त्याच्या विरोधी बाजू तरी') पाहाण्याची प्रवृत्ती ह्यात आढळते. ही तुमच्या एकूण वक्तव्यांशी सुसंगत असली तरीही वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी ठरू शकते का ह्यावर तुम्ही विचार करावात एवढीच नम्र विनंती (हे खवचट विधान नाही).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>>बाकी, मोदी आले की मुसलमानांचा विनाश होईल ही भिती मलाही वाटत नाही

असा विश्वास मला ६ डिसेंबर १९९२ पूर्वी वाटायचा.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बघा रे बघा, थत्ते म्हणाला होता तसा मुसलमानांचा विनाश केला मोदीने.
===============================

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लोकेश शेवडे ह्यांच्या लेखाचा प्रतिवाद करणारा अरुण जोशींचा प्रतिसाद काहीसा चुकीच्या दिशेनं गेला आहे असं वाटतं. उदा :

>> जर्मनीचे तेव्हाचे वास्तव वेगळे आहे, भारताचे आजचे वास्तव प्रचंडच वेगळे आहे. <<

हे ठीकच आहे, पण वास्तवात आहे त्यापेक्षा एखाद्या गोष्टीचा जास्त बाऊ करून जनतेला भीती घालून त्यांचा पाठिंबा मिळवला असा लेखात उल्लेख आहे. माझ्या मते ह्या गोष्टी हिटलर स्ट्रॅटेजी आणि मोदी/भाजप स्ट्रॅटेजी किंवा तेव्हाची जर्मनीतली परिस्थिती आणि आताची आपली परिस्थिती ह्यांतलं साधर्म्य दाखवतात -

  1. देश एकसंध करणं आणि त्याला पुन्हा एकदा मोठा करण्याचं आश्वासन - हे फार व्हेग आश्वासन आहे. म्हणजे नक्की काय ते कळत नाही, पण एक स्ट्रॅटेजी म्हणून ते दोघांनी वापरलं. देशाच्या आणि संस्कृतीच्या नावानं छाती काय, कुणीही फुगवू शकतं. आपला भूतकाळ महान होता असं म्हणणं त्याच्याशी सुसंगतच आहे. दोघांनीही ते केलं. आताच्या भाजपच्या जाहिरातीसुद्धा व्हेग आहेत. 'अच्छे दिन आनेवाले है' - पण का आणि कसे हे गुलदस्त्यात आहे.
  2. कुणीतरी वेगळा (द अदर) शत्रू आहे असं भासवून त्याला नेस्तनाबूत केलं की प्रगती आपोआप होईल असं भासवणं. - हेसुद्धा व्हेग आहे, पण थत्ते ह्यांनी पूर्वी म्हटल्याप्रमाणे जनतेला तसं वाटतं आहे असं म्हणायला जागा आहे. तद्वत, वास्तव काय आहे ह्यापेक्षा वास्तवाचं 'परसेप्शन' काय आहे हे इथे महत्त्वाचं ठरतं.
  3. परिस्थिती वाईट आहे - जर्मनीची परिस्थिती खरंच वाईट होती. आपली तशी नाही. (ते का, ते कळण्यासाठी घासकडवींची मालिका वाचा.) पण ती तशी आहे असं भासवलं जातंय आणि त्याचं खापर काँग्रेसवर फोडलं जातंय. पुन्हा एकदा, लोकांचं परसेप्शन वास्तवाच्या वरचढ होतंय, कारण स्ट्रॅटेजी तशीच आहे.
  4. विरोधक दुबळे असणं - हे तर आजचं वास्तव आहेच, पण तो काही हिटलरचा किंवा मोदींचा गुणदोष नाही. तरीही, परिस्थितीतलं हे साधर्म्य अमान्य करता येण्यासारखं नाही.
  5. उद्योजकांचा पाठिंबा - हेसुद्धा आजचं वास्तव आहे. ४,५०० कोटी केवळ जाहिरातींवरचा खर्च हेच दाखवतं, पण ह्याची इतरही अनेक लक्षणं आहेत.
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

5.उद्योजकांचा पाठिंबा - हेसुद्धा आजचं वास्तव आहे. ४,५०० कोटी केवळ जाहिरातींवरचा खर्च हेच दाखवतं, पण ह्याची इतरही अनेक लक्षणं आहेत.

या ४५०० मधे २५०० होर्डींगचे आहेत. किती होर्डींग आहेत भाजपच्या एकूण? १५०००. (बातम्यांतले/विरोधकांचे आकडे). म्हणजे दर होर्डींगला १६.५ लाख रु प्रतिमाह!!! प्रत्यक्ष हा दर किती असतो? ५०० ते ५००० रु. pmph. उगाच द मुंबईतला रेट सांगून भारताचं वास्तव मांडता येत नाही. शिवाय वेळेत, बल्क मधे खरेदी केल्यावर जबर्‍या डीस्काऊंट मिळते ती वेगळीच. बाकी आकडेमोड मी करणार नाही.

आजच तुम्ही अजून एका प्रतिष्ठित माध्यमाची अडानीची बातमी इथे दिलीत. आकार पटेल सारख्या वाहिलेल्या मोदी द्वेष्ट्याचे कोट देऊ नयेत हे दुर्लक्षिले तरी माहीतीची मरोड तरोड कशी करावी त्याचे ते आदर्श उदाहरण आहे. तिचे स्पष्टीकरण चिकार लांबलचक आहे. असो.

१. 'अच्छे दिन आनेवाले है' मधे भाजपचे मतदार पाकिस्तान, बांग्लादेश, लंका, इ इ चा भारतात समावेश ऐकत आहेत असे आपल्याला सुचित करायचे आहे वाटत आहे.
२. इथे ही काँग्रस्मुक्त भारत ला आपण फारच लिटरली घेताय.
३. जर्मनी ज्या अर्थाने 'वाईट परिस्थितीत' होती आणि भारत ज्या अर्थाने 'वाईट परिस्थितीत' आहे असे भाजप म्हणतंय त्याचा संबंध नसावा. बाकी घासकडवींची मालिका किती अर्थांनी अपूर्ण आहे तेच सांगण्यासाठी एक कमिशन नेमावे लागेल.
४. साधर्म्याचे काय हो, अभिषेक मनु सिंघवींना देश य नि देश क्ष, इसवीसन ज्ञ मधे काहीही लिहून पाठवा. ते चिकार साम्ये किंवा विरोध (पहिजे ते) लिहून पाठवतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उद्योजकांचा मोदींना पाठिंबा नाही असं तुमच्या ह्या प्रतिसादातून कुठेच दिसत नाही. तसं म्हणाल तर त्याचा प्रतिवाद करण्यात येईल. अन्यथा नाही.

>> १. 'अच्छे दिन आनेवाले है' मधे भाजपचे मतदार पाकिस्तान, बांग्लादेश, लंका, इ इ चा भारतात समावेश ऐकत आहेत असे आपल्याला सुचित करायचे आहे वाटत आहे.<<

मुळात आश्वासनच इतकं व्हेग आहे की त्याचा अर्थ लोक आपापल्या सोयीनुसार घेत आहेत असं वाटतं. आणि तसंच स्ट्रॅटेजीत अभिप्रेत आहे - म्हणजे स्ट्रॅटेजी यशस्वी होते आहे असं वाटतं.

>> २. इथे ही काँग्रस्मुक्त भारत ला आपण फारच लिटरली घेताय. <<

मला वाटतं प्रश्न मी कसं घेतोय ह्यापेक्षा जनतेत परसेप्शन काय आहे हा आहे.

>> ३. जर्मनी ज्या अर्थाने 'वाईट परिस्थितीत' होती आणि भारत ज्या अर्थाने 'वाईट परिस्थितीत' आहे असे भाजप म्हणतंय त्याचा संबंध नसावा. बाकी घासकडवींची मालिका किती अर्थांनी अपूर्ण आहे तेच सांगण्यासाठी एक कमिशन नेमावे लागेल. <<

परिस्थितीत साधर्म्य नाही. स्ट्रॅटेजीत साधर्म्य आहे. बाकी घासकडवींच्या मालिकेवर विदापूर्ण प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

उद्योजकांचा मोदींना पाठिंबा नाही असं तुमच्या ह्या प्रतिसादातून कुठेच दिसत नाही

पाठिंबा नाही असे मला कुठे म्हणायचे नव्हते.

(फक्त काही आकडे ठोकू नयेत इतके म्हणायचे होते. ४५०० कोटीत भाजपचे २७३ खासदार येणार होते समजा. म्हणजे दर खासदारी १६.५ कोटी. निर्वाचन आयोगाची मर्यादा ७० लाख. मग हा २० पट खर्च कसा लपवणार? आपचे उमेदवार इतरांचा खर्च उघडकीस आणायचेच काम करत आहेत. निर्वाचन आयोगाकडे सगळा हिशेब असतो. तो कोट करा ना. आणि काँग्रेस काय शेतकर्‍यांच्या देण्गीतून खर्च आहे का?)

आता पाठींबा का आहे, असावा का नसावा हा मुद्दा वेगळा आहे. असो, तुम्ही जितक्या सहज त्यांना कटघर्‍यात उभे केले आहे ते मान्य करून चालू.

मुळात आश्वासनच इतकं व्हेग आहे की त्याचा अर्थ लोक आपापल्या सोयीनुसार घेत आहेत असं वाटतं.

तुमचे या मुद्द्यावरचे प्रतिसाद पुन्हा वाचले. या निवडणूकीत अखंड भारत हा मुद्दा आहे (पक्षातर्फे तर आहेच, पण मतदारांतर्फे पण आहे) असे आपण म्हणताय. असो.

परिस्थितीत साधर्म्य नाही. स्ट्रॅटेजीत साधर्म्य आहे

नक्की काय? सर्वात वरचा प्रतिसाद परिस्थितीबद्दल बोलतो. ते ही असो.

आता BJP's strategy WILL lead to THE SITUATION? कि Strategy is to lead to THE SITUATION? कि अजून काही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>> पाठिंबा नाही असे मला कुठे म्हणायचे नव्हते. <<

>> आता पाठींबा का आहे, असावा का नसावा हा मुद्दा वेगळा आहे. असो, तुम्ही जितक्या सहज त्यांना कटघर्‍यात उभे केले आहे ते मान्य करून चालू. <<

मोदींना उद्योजकांचा पाठिंबा आहे आणि हिटलरलाही तो होता. परिस्थितीमधलं हे साधर्म्य आहे. एवढंच म्हणायचं आहे. (लोकेश शेवडे ह्यांच्या लेखाच्या संदर्भात). त्यामुळे तो का आहे, असावा का, मी मोदींना त्यासाठी इतरत्र दोषी ठरवलं आहे का, वगैरे मुद्दे इथे अवांतर आहेत.

जंतू -

परिस्थितीत साधर्म्य नाही. स्ट्रॅटेजीत साधर्म्य आहे

जोशी -

>>नक्की काय? सर्वात वरचा प्रतिसाद परिस्थितीबद्दल बोलतो. ते ही असो.<<

परिस्थितीत साधर्म्य - उद्योजकांचा पाठिंबा आणि दुबळे विरोधक ह्या मुद्द्यांवर परिस्थितीत साधर्म्य आहे. आर्थिक परिस्थितीच्या मुद्द्यावर परिस्थितीत साधर्म्य नाही, पण स्ट्रॅटेजीत आणि परसेप्शनमध्ये साधर्म्य आहे. तुमचा गोंधळ नक्की का होतोय ते काही समजत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

३. बाकी घासकडवींची मालिका किती अर्थांनी अपूर्ण आहे तेच सांगण्यासाठी एक कमिशन नेमावे लागेल.

प्लीझ. हे महत् कार्य तुम्हीच हाती घ्या. आख्खे एकट्याच्याने होत नसले तरी ह्या थोर मिशनच्या अग्रहक्काचे पहिले पाऊल तुम्हीच उचला.
प्लीझ. अखिल विश्व अजो पंखा क्लबच्या ह्या मागणीला मान द्या.

४. साधर्म्याचे काय हो, अभिषेक मनु सिंघवींना देश य नि देश क्ष, इसवीसन ज्ञ मधे काहीही लिहून पाठवा. ते चिकार साम्ये किंवा विरोध (पहिजे ते) लिहून पाठवतील.
हे भारिच. ==))
.
.
.
बाकी राजकिय मारामार्‍या .....
चालु द्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्लीझ. अखिल विश्व अजो पंखा क्लबच्या ह्या मागणीला मान द्या.

हेच म्हणतो.

(अजोंचा फॅन) राजेश घासकडवी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिटलरने ज्या प्रकारे राष्ट्रवादाला चेतवून लोकांना

भारतात राष्ट्रवाद असू च शकत नाही. भारत हा अनेक देशांचा बनलेला एक भूप्रदेश आहे. त्याच्यात जाती, धर्म आणि भाषेवर आधारीत शेकडो/हजारो देश आहेत. काही देश कधी कधी एकमेकांमधे हात मिळवणी करतात कधी विरुद्ध जातात.

जर्मनी सारखे कधीच एकसंध जनमत भारतात असणार नाही. हिंदु म्हणुन मोदी अपील झाला तर माझी जात मराठा म्हणुन शरद पवार अपील होणार.

ह्याच कारणा मुळे भारतात लष्कर पण कधीच सरकार उलथुन टाकू शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> भारतात राष्ट्रवाद असू च शकत नाही. भारत हा अनेक देशांचा बनलेला एक भूप्रदेश आहे. त्याच्यात जाती, धर्म आणि भाषेवर आधारीत शेकडो/हजारो देश आहेत. काही देश कधी कधी एकमेकांमधे हात मिळवणी करतात कधी विरुद्ध जातात.
जर्मनी सारखे कधीच एकसंध जनमत भारतात असणार नाही. <<

जर्मनी एकसंध होती हे गृहीतकदेखील तितकंसं योग्य नाही. १८७१ पर्यंत जर्मनी राजकीयदृष्ट्या एकसंध नव्हती. नंतरही ख्रिस्ती-ज्यू हा धर्माधारित दुभंग होताच; शिवाय, जर्मनभाषक पण जर्मन नसलेले अनेक इतर लोक होते. अगदी आजही 'मी बव्हेरिअन आहे; प्रशिअन नाही' असं किंवा 'मी सेंट्रल युरोपिअन आहे; वेस्टर्न/इस्टर्न युरोपिअन नाही' आणि तत्सम म्हणणारे लोक माझ्या व्यक्तिगत ओळखीत आहेत. जनमानसात रुजलेली चीड (पहिल्या महायुद्धातला पराभव), आर्थिक हलाखी, ज्यूद्वेष असे काही मुद्दे उचलून हिटलरनं त्या एकसंध नसलेल्या जनतेचं ध्रुवीकरण केलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Come on, you have yourself said that if Modi comes to power with thumping majority, there is एvery high probability (once you have said almost certainty) that it will be Hitler's rule in many and most ways.

कुठे म्हटलेय मी?

हे पहा.

हिटलरचे लेखातले उदाहरण योग्य आहे का याला हो किंवा नाही असे उत्तर देणे सध्या शक्य नाही. हिटलरने ज्या प्रकारे राष्ट्रवादाला चेतवून लोकांना आपल्यामागे खेचत नेले व त्या प्रवासात व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी झाल्यास त्याकडे काणाडोळा केला, तसे मोदी नक्कीच करणार नाहीत असे ठाम विधान करायची छाती होत नाही! असे विचार करण्याचा आधार त्यांचे गुजरातमधील काम ! नि तितके त्यांना मत न देण्यास पुरेसे आहे आहे काय? तितके अदर्वाइज त्यांना मत देऊ इच्छिणारास भिती घालण्यासाठी, परावृत्त करण्यासाठी पुरेसे आहे का तर माझ्या मते होय!

मोदी हिटलर आहेच असे आपण म्हणाला नाहीत, पण शक्यता आहे, बरीच आहे असे म्हणत आहात. आता हिटलरने कोणती व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली हे सर्वश्रुत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मोदी आणि हीटलर मधे काही साम्य आहे का हा फार पुढचा प्रश्न आहे.

भारत आणि जर्मनी मधे ( आणि त्यांच्या मध्यम वर्गीयात ) थोडे तरी साम्य आहे का?

१. ज्यु सोडुन जवळ जवळ सर्व जर्मन एकाच वंशाचे/जातीचे, एक च भाषा बोलणारे , एक च इतिहास असणारे होते. भारतात आपण शिवाजी चा इतिहास सांगतो, दिल्लीत औरंग्जेबाचा, गुजराथ मधे कोणाचा हे माहीती पण नाही.
२. जर्मन लोकांना ( मध्यमवर्ग धरुन ) काही मुळ मुल्य होती. प्रत्येक गोष्ट चांगली च असावी अशी आस होती. सामाजिक जाणिव होती. भारताबद्दल असे म्हणता येइल का?
३. पहिल्या महायुद्धात मार खाल्यामुळे जर्मन जनता सुडाचा मार्ग शोधत होती. १९६२ साली चीन कडुन मार खाल्यावर भारतीयांनी नेहरु इत्यादिंना देशातुन पळ्वुन लावले नाही. खरे तर कोणाला काहीच पडली नव्हती.

कुठे उकिरडयामधले कीडे आणि माणसे ह्यांच्यात साम्य शोधता आहात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारत आणि जर्मनी मधे ( आणि त्यांच्या मध्यम वर्गीयात ) थोडे तरी साम्य आहे का?

असा प्रश्न विचारून तुम्ही साम्यस्थळे दिलेलीच नाहियेत.
का दोघांच्यात काही म्हणजे काही साम्य नाही असे तुमचे मत आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काहीही साम्य नाही. भारतातल्या मध्यमवर्गाला भारता बद्दल काही पडले आहे का? समाजा बद्दल तरी काही पडले आहे का? ( काही सन्माननीय अपवाद सोडुन ).

कारगील युद्ध चालू असताना, भारतीय चवीने वर्डकप बघत होते. आणि पाकीस्तान बरोबर ची मॅचचा मजा घेत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात राष्ट्रवाद असू च शकत नाही. भारत हा अनेक देशांचा बनलेला एक भूप्रदेश आहे. त्याच्यात जाती, धर्म आणि भाषेवर आधारीत शेकडो/हजारो देश आहेत. काही देश कधी कधी एकमेकांमधे हात मिळवणी करतात कधी विरुद्ध जातात.

जर्मनी सारखे कधीच एकसंध जनमत भारतात असणार नाही. हिंदु म्हणुन मोदी अपील झाला तर माझी जात मराठा म्हणुन शरद पवार अपील होणार.

ह्याच कारणा मुळे भारतात लष्कर पण कधीच सरकार उलथुन टाकू शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आरसा दाखवला की लगेच भडकावु ठरतो प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतं या चर्चेत अंशात्मक फरक विसरला जातो आहे. साम्य आहेत म्हणजे ती एक्झॅक्ट असली पाहिजेत असा काहीसा आग्रह दिसतो.

मोदी = हिटलर हे बरोबर का? नाही. पण त्यांच्या राजकारण करण्याच्या पद्धतीत साम्यं आहेत.
हिटलरने ज्यू वंशाचा नाश मोठ्या प्रमाणावर केला = मोदीही निवडून आले तर मुसलमानांना गॅस चेंबरमध्ये पाठवतील - हे बरोबर आहे का? नाही. पण तेवढ्या टोकाला न जाताही मुस्लिमांना (किंवा कुठल्याही अल्पसंख्यांक समाजाला) जिणं हराम करून टाकता येतं. प्रवीण तोगाडियांनी केलेली वक्तव्यं पाहिली तर ते कळून येतं. अशा प्रयत्नांना जोर येईल म्हणणं म्हणजे वंशविच्छेद होईल असं म्हणणं नव्हे.

सुदैवाने भारताच्या सद्य परिस्थितीत हुकुमशहा प्रवृत्तीची व्यक्तीदेखील पूर्ण हुकुमशाही करू शकणार नाही. त्यामुळे हिटलर ज्या टोकाला जाऊ शकला त्या टोकापर्यंत कोणाला जाता येणार नाही. पण त्या दिशेने प्रवास करण्याची इच्छा असणं मात्र नाकारता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदी = हिटलर ह्याच्या आधी भारतीय = जर्मन हे समीकरण १% तरी बरोबर आहे का ते बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा एकदम क्लिअरकट प्रतिसाद आहे. It clearly means Modi is not a Hitler in its extreme meaning.

जिणे हराम करणे यात जनरली काय काय अपेक्षित आहे हे कळले तर इतर मतदारांना भिती घालणे किती सयुक्तिक आहे ते सांगता येईल. तर क्षणभर मी मानायला तयार आहे कि काहीही म्हणजे काहीही 'भिती घालणे' ठिक / नैतिक आहे. पण वास्तविक भिती काय आहे?
१. स्त्री आरक्षण
२. समलैंगिकता
३. जमिनीचे अधिग्रहण
४. पक्षपुरस्कृत दंगली (पुन्हा सत्ता मिळवायला)
असे मुद्दे पुढे आले आहेत. इथे भाजप खोटारडी आहे इ मत असायला काही ना नाही. After all it is one's judgement. लोकांनी आपल्या आपल्या विचारांनी या मुद्द्यांवर भाजपला पाडायला हरकत नाही. या नि अशा सर्व बाबींत पक्षाची भूमिका काय आहे, वास्तव काय आहे हे जाणून मोदींचा विरोध होत असेल तर मला मान्य आहे.

पण अति बाऊ करण्याच्या नादात बाऊ करण्याची किंमत बाऊ पेक्षा जास्त निघू नये. मला तरी 'डेंजर' म्हणावा असा केवळ मुद्दा ४ वाटतो. बाकी राजकीय मतांतरे आहेत. दंगली भाजप घडवून आणील म्हणून, वा केवळ तो सत्तेत आहे म्हणून (इतरांच्या पापाने) दंगे होणारच असे कोणी पटवून दिले तर मी लगेच बाऊ मोठा करायचा प्रयत्न चालू करेन.

व्यक्तिशः मला हा बाऊ अस्थानी, चूक नि पोलिटिकली मोटिवेटेड वाटतो. त्याचा एकच (निवडणूकपूर्व) चांगला परिणाम असा आहे कि मोदी सॉफ्ट झाले आहेत (बुद्धिवाद्यांच्या मते तसे दाखवत आहेत.).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अति बाऊ करण्याच्या नादात बाऊ करण्याची किंमत बाऊ पेक्षा जास्त निघू नये.

स्त्रियांवर अत्याचार झालेले नाहीत असं मानलं की मग पारंपरिक कुटुंबव्यवस्था मोडावी म्हणून जो 'बाऊ' केला जातो तो जास्तच वाटणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ज्यात त्यात आरेसेस आणणार्‍या दिग्विजयसिंगांप्रमाणेच ज्यात त्यात स्त्रीवाद आणण्याच्या कौशल्याचं कौतुक वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगोदर भीषण सत्य म्हणायचं, मग सद्हेतुप्रेरित इष्ट बाऊ म्हणायचं. अजून थोडे खेचले तर हा नुसताच बाऊ निघेल (म्हणजे निघू शकतो), नि नंतर तर चक्क एक दुष्ट चाल ही असू शकते. शिवाय, नंतरसाठी, कोण बाऊ लिहितो नि कोण सत्य हे कळणे ही गरजेचे आहे.

कोण बोलत आहे नि काय बोलत आहे याला वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळं महत्त्व देणं साहजिक आहे. त्याला बरीच पार्श्वभूमी असते. म्हणून शक्य तितका संदर्भ स्पष्ट, अचूक बनवायचा प्रयत्न करावा. त्याने बरीच सहमती बनते. वर घासकडवी म्हणाले कि 'हिटलरी इच्छा असणं' नाकारता येत नाही. त्यांचं असं मत असायला काहीच हरकत नाही. पण देशाच्या, लोकांच्या एकूण निर्णयप्रक्रियेत या मताला, शक्यतेला, वाटण्याला किती महत्त्व द्यायचं हे वेगळं अभ्यासलं गेलं पाहिजे.

तुझ्या प्रतिसादावरून आठवले -
प्रत्येक वाक्याच्या शेवटी "लस्सी मार के", "पुंगी बजा के" असले बाकी वाक्याशी काहीच संबंध नसलेले शब्द योजण्याच्या शैलीला हिंदीत, उर्दूत एक नाव आहे. काय आहे ते माहित आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सहमत.

प्रत्येक वाक्याच्या शेवटी "लस्सी मार के", "पुंगी बजा के" असले बाकी वाक्याशी काहीच संबंध नसलेले शब्द योजण्याच्या शैलीला हिंदीत, उर्दूत एक नाव आहे. काय आहे ते माहित आहे का?

नै बॉ. काय म्हणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"भीषण सत्य" असा शब्दप्रयोग या धाग्यात तुम्ही वगळता इतर कोणीही केलेला नाही. तेव्हा संदर्भ समजला नाही.

नंतरसाठी, कोण बाऊ लिहितो नि कोण सत्य हे कळणे ही गरजेचे आहे.

नीट न वाचल्यामुळे, या वाक्यापुरती सहमती असं लिहीणार होते. पण काय लिहीलं आहे यापेक्षा कोण लिहीतंय (आणि ते ही लिहीणारे सगळे पुल्लिंगीच) एवढंच पाहण्याच्या व्यक्तीपूजेबद्दल असहमती. बाकी जाऊ द्या. माझ्याकडे तेवढा वेळ आणि संयम नाही. पण अभ्यास करायला पाहिजे खराच. त्याशिवाय स्त्रिया, दलित, अल्पसंख्याकांवर अन्याय कधी आणि कसा होतो हे समजत नाही.

१. हा आला स्त्रीवाद. मागच्या प्रतिसादात स्त्रीवाद होता हे समजणं स्वस्त आणि सोयीचं सरसकटीकरण आहे.
२. इथे संबंध नसताना स्त्रीवाद आला असं समजणाऱ्यांना आपल्या सगळ्याच व्यवहारात स्त्रीद्वेष कितपत भिनलेला आहे आणि तो अन्यायकारक आहे, याची कल्पना नाही. एवढंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नंतरसाठी, कोण बाऊ लिहितो नि कोण सत्य हे कळणे ही गरजेचे आहे.

यावरून फक्त लिहिणारे पुरुषच अभिप्रेत होते असेही विधान करता येते. ओढूनताणून विधाने एकदा करणे चालू झाले की त्याला सुमार राहत नै हे स्वोदाहरणाने स्पष्ट केल्याबद्दल ट्रिप्पल धन्यवाद. शिवाय स्वतःला विरोध म्ह. स्त्रीवादाला विरोध असली पोरकट/पोरीकट (होय, परत नस्ता आरोप नको) विचारसरणी बाळगून ठीकठिकाणी रडीचा डाव खेळणार्‍यांबद्दल तरी नक्की काय बोलावे म्हणा. तुमचीच ब्याट, खेळा दोनवेळा. खूष?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वर अदितीनं व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत आहे.

मोदींच्या राजवटीत स्त्रिया, दलित, आदिवासी, समलिंगी व्यक्ती, हिंदुत्ववादी न मानणारे हिंदू आणि इतर धर्मीय - या लोकांवर अन्याय होऊ शकतो हेच मुळात अरुण जोशींना समजत नाही (कारण त्यांच्या न्यायान्यायाच्या कल्पना आणि माझ्या (किंवा आदितीच्या) न्यायान्यायाच्या कल्पनेतच महदंतर आहे), म्हणून त्यांना हे लोक वृथा बाऊ करतायत असं वाटतं. त्यामुळे 'मुळात अत्याचार होतच नाहीय, असं मानता, म्हणून कुटुंबव्यवस्थेबद्दल आम्ही जे बोलतो ते तुम्हांला बाऊ केल्यासारखं वाटतं' हे अदितीचं मत हे अतिशय योग्य उपमेचं उदाहरण आहे.

त्याची 'जिथेतिथे स्त्रीवाद आणणे', 'स्वतःला विरोध म्हणजे स्त्रीवादाला विरोध अशी पोरकट विचारसरणी', 'रडीचा डाव' अशी संदर्भहीन संभावना करण्यानं मुद्दा खोडला जात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>मोदींच्या राजवटीत स्त्रिया, दलित, आदिवासी, समलिंगी व्यक्ती, हिंदुत्ववादी न मानणारे हिंदू आणि इतर धर्मीय - या लोकांवर अन्याय होऊ शकतो हेच मुळात अरुण जोशींना समजत नाही

मला वाटते आदिवासी (जमीन अधिग्रहणासंदर्भात) आणि इतर धर्मीय (तो सुद्धा बाय अ‍ॅक्ट ऑफ ओमिशन) सोडले तर इतरांवर खास विशेष (काँग्रेस राजवटीत होत नाही असे) अन्याय व्हायची शक्यता फारशी वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला तुमच्या मताबद्दल शंका आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मला वाटते आदिवासी (जमीन अधिग्रहणासंदर्भात) आणि इतर धर्मीय (तो सुद्धा बाय अ‍ॅक्ट ऑफ ओमिशन) सोडले तर इतरांवर खास विशेष (काँग्रेस राजवटीत होत नाही असे) अन्याय व्हायची शक्यता फारशी वाटत नाही.

असेलही किंवा नसेलही, पुरेसे विदाबिंदु नाहीत माझ्याकडे.
माझ्यासाठी त्याहून भयंकर हे की, काँग्रेस राजवटीत वा अन्य बीजेपी राजवटीतही त्याविरुद्ध पुरे-सा आवाज उठवता येतो, मोदींच्या गुजरातेत ते शक्यच होणार नाही याची तजवीज होते. हेच देशपातळीवर होणे अधिक घातक आहे आणि हा मुख्य फरक आहे असे माझे मत झाले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>>>पुरे-सा आवाज उठवता येतो, मोदींच्या गुजरातेत ते शक्यच होणार नाही याची तजवीज होते.

याला काही आधार आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तेच तर म्हणतोय. नक्की आधार कशाला आहे म्हणून ही ओरड चाललीय? आधार द्या अन मग ओरडा पाहिजे तितके. नपेक्षा हा मोदीद्वेषच आहे असे नाइलाजाने म्हणावे लागेल. कसला आधार नसतानाही निव्वळ मला वाटते म्हणून चाललेय तर तसे स्पष्टपणे सांगावे तरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आता जर कित्येक गोष्टी बाहेरच येऊ दिल्या जात नाहीत किंवा बाहेर समजल्याने लोकांना फरकच पडु नयेत अशी परिस्थिती निर्माण केली जाते, तर काय नी कसे उदाहरण द्यावे?

आता अतीफेमस नॅनोची गाजलेली स्टोरी घेऊ, नी त्याबद्दलची एक रँडम बातमी घेऊ:

त्यात काही शेतकरी काय म्हणताहेत ते बघु:

“I didn’t want to sell my land but the government left us with no alternative. I am a crorepati today but I have lost ancestral land where we grew multiple crops — rice, jowar, wheat. It was hard work but the only work we know,” said Rathod.

बंगालातही मल्टि क्रॉप लँड घेतल्यावरूनच मोठे आंदोलन झाले होते व नॅनोला पळणे भाग पडले होते. तेच इथेही झालेले दिसते पण इथे आवाज येनकेनप्रकारेण (फिल्मीच बोलायचे तर Wink तोंडात पैसे कोंबुन) दाबला गेला असे म्हणता यावे का?

स्थानिक काय म्हणतातः
“There is development but more for industry and not for us farmers. Because of Narendrabhai, we got good money for our land but lost our livelihood.”

आता यालाच विकास म्हणायचा आणि असे करणार्‍याला विकासपुरूष तर मग तसेही बोलणारे त्याच गावातील स्थानिक आहेत (तेही त्या बातमीत सापडेल). ते असे काही आहेत ज्यांचा तसाही या विक्रीला विरोध नव्हता. त्यांनी मिळालेल्या पैशाचा उपयोग केला व स्वतःची प्रगती करून घेतली. पण ज्यांच्याकडे ते मीन्स व/वा कपॅसिटी नाही त्यांचे काय (गब्बर सारख्या मंडळींच्या मते त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरजच नाही - हे एक भांडवलशाही विधान म्हणून ठिक.)

वरवर पाहता यात काहीच ऑब्जेक्शनेबल नाही. स्थानिकांना "पैसे" दिलेले आहेत. अगदी बाजार भावाच्या चौपट! पण त्यांची जमिन + रोजगार नाही, त्याविरुद्ध आवाज उठवायची सोयच नाही. त्या पैशाचा उपयोग करायचे कसब, शिक्षण नाही. त्यामुळे तो पैसा आहे या व्यतिरिक्त त्या व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यात एखादे चकचकीत घर, गाड्या, कपडे यावर 'खर्च' होणार. पुढे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शेतकरी, आदिवासी, अल्पसंख्यांकांवर अन्याय झाल्याची उदा. आहेतच की. ती नाकारतो कोण?

मुद्दा आहे काँग्रेस राजवटीपेक्षा बीजेपी राज्यात स्त्रियांवर जास्त अत्याचार झालेत की नै याचा.

बाकी we got good money for our land हेही नसे थोडके. बर्‍याच ठिकाणी ते तरी होतं की नै कुणास ठाऊक. अर्थात या मुद्यांचे इतके चर्वितचर्वण झालेय की कै अर्थ नै. असोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुद्दा आहे काँग्रेस राजवटीपेक्षा बीजेपी राज्यात स्त्रियांवर जास्त अत्याचार झालेत की नै याचा

हा मुद्दा कधी झाला? वरीच चर्चा तपशीलात वाचा.
मी आधी काय म्हटले होते?

माझ्यासाठी त्याहून भयंकर हे की, काँग्रेस राजवटीत वा अन्य बीजेपी राजवटीतही त्याविरुद्ध पुरे-सा आवाज उठवता येतो, मोदींच्या गुजरातेत ते शक्यच होणार नाही याची तजवीज होते. हेच देशपातळीवर होणे अधिक घातक आहे आणि हा मुख्य फरक आहे असे माझे मत झाले आहे.

त्यावर थत्तेचाचांनी संदर्भ मागितले.
मी एक उदाहरण देऊन ते म्हणणे अधिक स्पष्टपणे मांडले आहे. यात स्त्रियांवरील अत्याचार कुठुन आले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वरील बर्‍याच प्रतिसादांत हा मुद्दा आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोणत्या? एखादं तरी उदाहरण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुद्दा आहे काँग्रेस राजवटीपेक्षा बीजेपी राज्यात स्त्रियांवर जास्त अत्याचार झालेत की नै याचा. >> मला यातल फार काही कळत नाही पण तरी उगाच आमचे दोन पैसे. स्त्री सबलीकरणासाठी मोदीँनी काही योजना आणल्या आहेत का? बिहार, मध्यप्रदेश, महाराष्ट्रात शाळकरी मुलीँना सायकली देणे, मुलगी झाल्यास बाळंतपणाचा खर्च सरकार करणार, मुलीच्या नावे ५ १० हजार बँकेत ठेवणार अशा काही ना काही योजना असतात. तशा काही मोदीँच्या बाबतीत ऐकल्या नाहीत. खरंतर भारतीय सरासरीपेक्षा जास्त एनिमीक मुली गुजरातमधे आहेत आणि बाळंतपणात दगवणेदेखील भारतीय सरासरीपेक्षा जास्त आहे अशा अर्थाच्या बातम्या वाचल्याचे आठवते आहे.
विदा मागु नका (ही धमकी समजा ;-))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

योजना न करणे याचा अत्याचार जास्त होण्याशी संबंध लावला जाणे रोचक आहे.

तदुपरि

http://gujaratwomenswelfare.wordpress.com/category/women-empowerment/

हे पाहिल्यास कळून येईलच की. एखादी बातमी ऐकली नाही म्ह. ती नसतेच असेही नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

योजना आणल्या नंतर खरोखर किती फायदा झाला ह्या बद्दल काही माहिती आहे का? त्या त्या योजनेचे तोटे कोणी सांगितले आहेत का? त्याचा खर्च परवडतो का? बाकी सर्व धाग्यात आणि एकंदर मोदी विरोध करण्यासाठी जे जे म्हणून मध्ये आणता येईल ते ते सगळे आणले जाते. एखादा मुद्दा फारसा चालला नाही की गाडी दुसऱ्या रुळावर. मुळातच मोदी .००००१% चांगला असू शकतो ह्यालाच विरोध आहे किंवा ते मान्यच नाहीये. हेच सर्व निकष बाकी राज्यांना आणि बाकी नेत्यांना येत नाहीत. मुलायम आणि लालू तर फारच चांगले बुवा. राहुलबाबा १० वर्ष सत्तेत असून विरोधी बाकांवर बसल्या सारखा करतो ह्याला काय म्हणावे. त्याच्या कारकीर्दीवर फारसे आक्षेप नाहीत कारण मुळातच तो सेक्युलर आहे. इतके दुट्टपी धोरण असू नये. स्त्रियांची इतकी विटम्बना दिल्ली आणि हिंदी बेल्ट मध्ये झाली. खैरलांजी तर महाराष्ट्रातच घडले आणि ते पण बराच काळ दाबलेलेच होते आणि अजूनही त्यावर फार बोंबाबोंब होत नाही. हे सगळे कशाचे द्योतक आहे? तसेही आत्ता मोदी वेव्ह ही खरे म्हणजे कोंग्रेस विरोधी व्हेव आहे. मोदीने चुका केल्या आणि त्याचा उन्माद वाढला तर ५ वर्षाने त्याला कोण परत मत देणार आहे? तसेही हे २००४ मध्ये घडलेच आहे. मग आत्ता मुंडके उडालेल्या बाजीप्रभूच्या थाटात चौफेर लेखी आणि तोंडी तलवारबाजी कशासाठी? इतके हतबल होण्याचे काय कारण? गेली १२ वर्षे मोदीला वेचून वेचून दगड मारले तरी काहीच होत नाही हा राग आहे की आता आपल्यावर असेच दगड आले तर आपले काय होणार ह्याची भीती आहे? त्याच्यावरचे आरोप खरे असतील तर मग इतके घाबरण्याचे कारण काय? हे असेच बाकीच्या लोकांबद्दल का नाही बरे मागे लागून गोष्टींचा छडा लावत बरे? महाराष्ट्रात काय कमी नेते आहेत का? त्यांच्याबद्दल का नाही बरे असे होत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांच्याबद्दल का नाही बरे असे होत?

याचे साधे उत्तर आहे, कारण त्यांना पंतप्रधानपदाचे, - जे भारतातील फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पज - सर्वात मोठे राजकीय पद आहे त्याचे, उमेदवार म्हणून घोषित केले जात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुमचे उत्तर सद्य स्थितीमध्ये बरोबर वाटते खरे पण मुळात मोदी आहे म्हणूनच हे मान्य करायला आपली तयारी असावी. नाहीतर राहुल आणि बाकीच्यान्बाबत इतके खोलात कोणी बरे शिरत नाही? बाकी मुख्यमंत्री पद पण तसे बरेच मोठे आहे. गुजरातमध्ये मोदी आल्याने स्त्रियांवर अत्याचारात वाढ झाल्याचे काही पुरावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राहुलबद्दल माझे आक्षेप मी एका वेगळ्या लेखात मांडले आहेत. त्याहुन अधिक त्याचा अनुभव नाही.
किंबहुना मोदींवरील मोठा आक्षेप भाजपाचे काँग्रेसीकरण - पूर्णपणे एका व्यक्तीच्या हाती सत्ता केंद्रीत करणे - हा ठेवला आहे.

मोदींना पाथिंबा देणार्‍यांनाही धोरणे काँङ्रेसचीच हवी आहेत असे अनेकदा दिसते. फक्त त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांच्यामते कणखर नेता म्हणून ते मोदींना पाठिंबा देताहेत.

मात्र पंतप्रधानपद हे निव्वण अंमलबजावणी करणार्‍याचे नसून, मोठे धोरणत्मक बदल घडवण्याचे सामर्थ्य असलेले पद आहे. त्यावर दावा केला की इतकी स्क्रुटिनी सहन करायची ताकद हवीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्क्रुटिनी सहन करायची ताकद हवीच.>> मान्य आहे.

पण मुद्दा हां आहे की एकाला एक न्याय आणि दुसर्याला दुसरा असा आहे. आव आपण निरपेक्ष असण्याचा आहे पण घोळून घोळून मोदी हां हिटलर आहे आणि तो आला तर सगळीकडे हाहाकार माजणार असे रान उठवण्याचा आहे. अशीच स्क्रुटिनी सोनिया गांधींच्या आतल्या आवाजाची आणि नंतरच्या राज्य कारभाराची झाली नाहीये. जिथे तिथे किड्स गोल्व खेळणे झाले आहे.

बाकी एकाच माणसाच्या हाती सत्ता जाण्याचे तर मग कॉंग्रेसची यादी तर मोठी आहे. मधू किश्वर ह्यांनी मोदींबद्दलच मत गुजरात मध्ये काम पाहून बदलले. पण अर्धवट माहितीच्या आधारावर आणि वृत्तपत्रात आलेल्या लेखानरच फक्त मत बनवून कोल्हा आला रे आला अशी आवई उठवणे बरोबर नाही.

आता इतके मोदीच्या बाजूने लिहिल्यावर एक काव्हीयेट टाकतो. अरविंद केजरीवाल ह्याबद्दल अशीच हवा होती पण नंतर आणि सध्या त्याचे जे माकडचाळे चालू आहे ते बघून कुठून ह्याला पैसे दिले असे झाले. मोडीचे तसे होऊ नये अशी अपेक्षा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(गब्बर सारख्या मंडळींच्या मते त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरजच नाही - हे एक भांडवलशाही विधान म्हणून ठिक.)
वरवर पाहता यात काहीच ऑब्जेक्शनेबल नाही. स्थानिकांना "पैसे" दिलेले आहेत. अगदी बाजार भावाच्या चौपट! पण त्यांची जमिन + रोजगार नाही, त्याविरुद्ध आवाज उठवायची सोयच नाही. त्या पैशाचा उपयोग करायचे कसब, शिक्षण नाही. त्यामुळे तो पैसा आहे या व्यतिरिक्त त्या व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यात एखादे चकचकीत घर, गाड्या, कपडे यावर 'खर्च' होणार. पुढे काय?

बाजारभावाच्या चौपट = बाजारभावाच्या एक पट + बाजारभावाच्या तिप्पट

१) बाजारभावाच्या एक पट - हे का दिले जातात ?
२) बाजारभावाच्या तिप्पट - हे का दिले जातात ?
३) बाजारभावाच्या चौपट च्या ऐवजी बाजारभावाच्या किती पट दिले की - पुढे काय ? - हा प्रश्न निर्माण होणार नाही ? (हा प्रश्न थोडा उर्मट आहे पण माझा उद्देश तो नाही.)
४) बाजारभावाच्या चौपट रक्कम मिळाल्यावर त्या शेतकर्‍याच्या समोर कोणते रियलिस्टिक विकल्प असतात ?

--

मागच्या इलेक्शन मधे ओबामा ने हा मुद्दा वेगळ्या काँटेक्स्ट मधे उपस्थित केला होता. रॉमनी च्या प्रायव्हेट एक्विटी कंपनीने जे ले-ऑफ्स केले त्या कामगारांच्या रीट्रेनिंग चे काय ? Free market capitalism is the greatest engine of economic growth .... there is no doubt about that .... however...Those who are in favor of free-market-capitalism are missing the point. The point they miss is - what about the retraining of those workers ? - अशा अर्थाचे ते वाक्य (भाषण) होते.

---

मोठ्ठे गृहितक - बाजारभावाच्या चौपट भाव देताना लबाडी केली जात नाही. - हे एक मोठे गृहितक आहे.

---

ते असे काही आहेत ज्यांचा तसाही या विक्रीला विरोध नव्हता. त्यांनी मिळालेल्या पैशाचा उपयोग केला व स्वतःची प्रगती करून घेतली. पण ज्यांच्याकडे ते मीन्स व/वा कपॅसिटी नाही त्यांचे काय

मीन्स व्/वा कपॅसिटी नाही हे गृहितक की निष्कर्ष ?

---

“I didn’t want to sell my land but the government left us with no alternative. I am a crorepati today but I have lost ancestral land where we grew multiple crops — rice, jowar, wheat. It was hard work but the only work we know,” said Rathod.

वडिलार्जित / वडिलोपार्जित जमिन गेली.

१) ही जमीन विकत घेण्यासाठी किती पैसे दिलेत ?
२) तिचा वापर किती वर्षे केलात ? त्याचे डेप्रिशियेशन झाले का ? (जमीनीचे डेप्रिशियेशन होते असे अकाऊंटिंग चे तत्व नाही ... बहुतांश वेळा नसते ... हे मला माहीती आहे. पण आर्ग्युमेंट साठी गृहित धरू की डेप्रिशियेशन होते.)
३) आज तिची जी किंमत आहे ती बाजारभावानुसार आहे - तिच्या डेप्रीसियेशन वजा जाता बुक व्हॅल्यु पेक्षा किती जास्त आहे ?
४) रिलेटिव्हली फ्री मार्केट असल्यानेच तिची किंमत जास्त आहे की नाही ?

---

Why / how does बाजारभाव come to exist in the first place ?

---

Defenders of free market capitalism are always at a disadvantage because of their perceived motives. Those who attack free market capitalism are automatically assumed to be with altruistic, benevolent motives.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या प्रांजळपणाचा मी भक्त झालो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मेघना :

मोदींच्या राजवटीत स्त्रिया, दलित, आदिवासी, समलिंगी व्यक्ती, हिंदुत्ववादी न मानणारे हिंदू आणि इतर धर्मीय - या लोकांवर अन्याय होऊ शकतो हेच मुळात अरुण जोशींना समजत नाही (कारण त्यांच्या न्यायान्यायाच्या कल्पना आणि माझ्या (किंवा आदितीच्या) न्यायान्यायाच्या कल्पनेतच महदंतर आहे), म्हणून त्यांना हे लोक वृथा बाऊ करतायत असं वाटतं.

थत्ते :

मला वाटते आदिवासी (जमीन अधिग्रहणासंदर्भात) आणि इतर धर्मीय (तो सुद्धा बाय अ‍ॅक्ट ऑफ ओमिशन) सोडले तर इतरांवर खास विशेष (काँग्रेस राजवटीत होत नाही असे) अन्याय व्हायची शक्यता फारशी वाटत नाही.

गुजरातेत ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स तितकीशी सुधारली नाही असं म्हणणारे लेख कुणी वाचलेले नाहीत का?
http://www.telegraphindia.com/1130927/jsp/nation/story_17396973.jsp
उद्धृत :

If you look at HDI data from Gujarat, you will see a large difference between the levels of development of tribals and non-tribals, and between those of urban and rural people.

The Committee for Evolving Composite Development Index of States awarded each state a score on the basis of its performance relating to 10 criteria. These were: per capita consumption expenditure, education, health, household amenities, poverty rate, female literacy, percentage of Dalit and tribal populations, urbanisation, financial inclusion, and connectivity.

The committee put 10 states in the category of “least developed” and labelled the six best-performing states as “relatively developed”. The 12 states in between, including Gujarat and Bengal, have been branded “less developed”.

Himachal Pradesh, Sikkim and Tripura did better than Gujarat

अर्थतज्ज्ञ जाँ ड्रेझ ह्यांचा लेख
उद्धृत :

Whether we look at poverty, nutrition, education, health or related indicators, the dominant pattern is one of indifferent outcomes. Gujarat is doing a little better than the all-India average in many respects, but there is nothing there that justifies it being called a “model.” Anyone who doubts this can download the latest National Family Health Survey report, or the Raghuram Rajan Committee report, and verify the facts.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वाचायचा आळस. म्हणून तर वाद घालताना 'नकोच ते झेंगट' असं म्हणून अंग काढून घेतलं जातं. Tongue असो, आयती माहिती पुरवल्याबद्दल आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ जाँ ड्रेझ...

कदाचित टायपो असावा. जाँ ड्रेझ यांना असे काही मिळाल्याचे ऐकिवात नाही. बाकी चर्चा सुरू असू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

दुरुस्तीबद्दल धन्यवाद. टायपो झाली, कारण तो लेख अमर्त्य सेन ह्यांचा होता असं मला वाटलं होतं पण तो त्यांचे सहकारी ड्रेझ ह्यांचा निघाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>>गुजरातेत ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स तितकीशी सुधारली नाही असं म्हणणारे लेख कुणी वाचलेले नाहीत का?

असले लेख लिहिणारे लोक गुजरातमध्ये भांडवलशाही विकास झाला आहे पण.... अशा टोन मध्ये लिहितात. मला गुजरातमध्ये इतर राज्यांपेक्षा (महाराष्ट्र कर्नाटक दिल्ली तामिळनाडू वगैरेपेक्षा) खास काही वेगळा विशेष विकास झाला आहे हेच मान्य नाही.

वीजनिर्मिती हा एकच मुद्दा असेल ज्यात गुजरात महाराष्ट्राच्या पुढे आहे. पण त्यासाठी मी मोदींच्याच पक्षाला युतीला जबाबदार समजतो. महाराष्ट्रातले गुंतवणुक वातावरण बिघडवण्यात यांचाच मोठ्ठा हात आहे. (एनरॉन, जैतापूर, तळेगाव वगैरे).

गुजरातमध्ये ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स सुधारलानाही याचा अर्थ गुजरातमध्ये वल्नरेबल गटांवर इतर राज्यांपेक्षा अधिक अन्याय होतो असा लावायला मी तयार नाही. म्हणून मी "मला वाटते आदिवासी (जमीन अधिग्रहणासंदर्भात) आणि इतर धर्मीय (तो सुद्धा बाय अ‍ॅक्ट ऑफ ओमिशन) सोडले तर इतरांवर खास विशेष (काँग्रेस राजवटीत होत नाही असे) अन्याय व्हायची शक्यता फारशी वाटत नाही." असा प्रतिसाद दिला होता. इतर धर्मीयांवर अ‍ॅक्ट ऑफ ओमिशनने अन्याय इतर राज्यात पण होत असावेत. ९३च्या दंगलीतील गुन्हेगारांवर कारवाई न करणे हा अ‍ॅक्ट ऑफ ओमिशनच आहे.

गुजरातचा विकास इतर प्रगत राज्यांच्या तुलनेत जसा विशेष नाही तसाच अन्यायही विशेष नाही. गुजरात/मोदी इज जस्ट अनदर स्टेट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अगदी सहमत.

गुजरातमध्ये ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स सुधारलानाही याचा अर्थ गुजरातमध्ये वल्नरेबल गटांवर इतर राज्यांपेक्षा अधिक अन्याय होतो असा लावायला मी तयार नाही. म्हणून मी "मला वाटते आदिवासी (जमीन अधिग्रहणासंदर्भात) आणि इतर धर्मीय (तो सुद्धा बाय अ‍ॅक्ट ऑफ ओमिशन) सोडले तर इतरांवर खास विशेष (काँग्रेस राजवटीत होत नाही असे) अन्याय व्हायची शक्यता फारशी वाटत नाही." असा प्रतिसाद दिला होता. इतर धर्मीयांवर अ‍ॅक्ट ऑफ ओमिशनने अन्याय इतर राज्यात पण होत असावेत. ९३च्या दंगलीतील गुन्हेगारांवर कारवाई न करणे हा अ‍ॅक्ट ऑफ ओमिशनच आहे.

गुजरातचा विकास इतर प्रगत राज्यांच्या तुलनेत जसा विशेष नाही तसाच अन्यायही विशेष नाही. गुजरात/मोदी इज जस्ट अनदर स्टेट

हेच नेमके लोक लक्षात घेत नाहीत. एक तर चांगल्या नैतर वाईट टोकावरच नेऊन बसवतात. छुप्या न्यूनगंडाचे लक्षण मानावे काय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तसं नाही. गुजरात मोदी इज जस्ट अनदर स्टेट हे खरं असलं तरी गुजरातचा कैच्याकै विकास झाला आहे (इतर राज्यांचा सगळा बट्ट्याबोळ आहे) असं क्लेम केलं गेलं की दुसरं टोक गाठलं जाणारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

डिरेक्शन ऑफ कॉजेशन नक्की तशीच आहे की कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> गुजरातमध्ये ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स सुधारलानाही याचा अर्थ गुजरातमध्ये वल्नरेबल गटांवर इतर राज्यांपेक्षा अधिक अन्याय होतो असा लावायला मी तयार नाही. <<

The National Crime Records Bureau had made an observation few years back which went unnoticed then. Coming to atrocities against Dalits, Gujarat ranks third in the country after U.P. and Bihar. (Asian Age, 11 April 2003)

संदर्भस्रोत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गुजरातेत दलितांवर अत्याचार जास्त होतात ही मोदीराज्याची देणगी आहे असे स्पष्ट तरी बोला की. होऊ दे खर्च!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गुजराथ इज जस्ट अनदर स्टेट ह्या वाक्याला सपोर्ट करुन, गुजराथमधे दलितांवर झालेल्या अत्याचाराबद्दल अधिक संदर्भ -

१. २०११ रिपोर्ट - शेवटून दुसरे पान पहावे. राष्ट्रीय टक्केवारीत गुजराथचे योगदान ५% आहे.
२. २०१२ रिपोर्ट - ४३३ पानावरचा तौलनिक तक्ता पहावा. राष्ट्रीय टक्केवारीत गुजराथचे योगदान 3.73% आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. आंध्र, ३६गड, ओडिसा, मध्यप्रदेश, इ. ठिकाणी अजून सणसणीत आकडेवारी आहे. मध्यप्रदेशचे योगदान २०.५७% आहे तर राजस्थानचे २२.८१%. पण ते मुसळ न दिसता गुजरातचं ३.७३% तेवढं दिसणार!!!

शिवाय ही अधिकृत आकडेवारी नेटवर उपलब्ध असताना कौंटरकरंट्स सारख्या तद्दन प्रचारकी वेबसायटींचा दाखला देताना पाहून चिक्कार करमणूक झाली. उगीच नै लोक मोदीद्वेषाचा ठपका ठेवत!!! आता ही आकडेवारी चूक आहे हे तरी सिद्ध करा म्हणावं अन मग पुढच्या गोष्टी. बायस इतक्या उघडपणे दिसून येईल असं वाटलं नव्हतं. रोचक आहे खरेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्हीच सांगताय तोच विदा घेऊ तक्ता घेऊ तो काय म्हणतो:
पान ४२३

गुजरात मध्ये SC पॉप्युलेशन आहे ४०.७४ लाख, त्यांच्यावर अन्याय झाला असे गुन्हे किती? १०२८
महाराष्ट्राकडे बघु (तिथेही साधारण तितकाच काळ काँङ्रेस सरकार आहे), इथे SC लोकसंख्या किती? १३२.७६ लाख व त्यांच्यावर अन्याय झाला असे गुन्हे? १०९१
उत्तर प्रदेशात एकुण ४१३.५८ लाख लोकसंख्या, गुन्हे ६२०२

अर्थात गुजरात मध्ये दर ३.९६ लाखांमागे एक गुन्हा होतोय तर महाराष्ट्रात १२ लाखांमागे एक गुन्हा, उत्तरप्रदेशात ६ लाख जनतेमागे १ गुन्हा! तरी गुजरातचे प्रमाण इतर राज्यांइतकेच आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नमो नमो!

याचा अर्थ गुजरातेतील दलित पोलिसांकडे तक्रार करण्यास घाबरत नाहीत असा होतो. मात्र इतर राज्यातील दलित घाबरतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजस्थान एट ऑल बद्दल मूग गिळण्याचे कारण समजेल का? २०% प्रपोर्शन जे काँट्रिब्यूट करतात तिकडे दुर्लक्ष करून हे ३ टक्केच तेवढे अतिशय जास्त इ.इ. प्रचार अतिशय केविलवाणा आणि तितकाच निरर्थक आहे.

शिवाय इथे रिपोर्टेड गुन्हे किती, जिथे गुन्हे पर क्यापिटा कमी वाटताहेत तिथे रिपोर्टिंगचे प्रमाण कमी असेल इ.इ. क्षुद्र मुद्दे तुमच्या मनास स्पर्शिणारच नाहीत. नक्की ठरवा तरी काय निकष आहे ते. एकदा का गुजरात हा सर्व भारतापेक्षा वैट्ट वैट्ट ठरवणे हा उद्देश असेल तर असेच दिसणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गुजरात मॉडेलचा गवगवा होत असल्याने त्याची जास्त चिकित्सा होणारच. उद्या राजस्थान मॉडेलच्या नावावर मते मागितली असती तर भंवरदेवी पासून सगळे मुद्दे चर्चेत आले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदीसमर्थकांनी गाय मारली(शांतं पापं) म्हणून तुम्ही वासरू मारणारच, हो की नै?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गुजरातचा गवगवा हा फक्त मोदीसमर्थकांच्या चर्चेपुरता नाही. भाजपाने त्यांचा जाहीरनामा अगदी शेवटच्या दिवसापर्यंत प्रकाशित केला नाही. मोदींना जाहीरनाम्याची गरजच नाही. गुजरात मॉडेल हाच जाहीरनामा आहे असे वर्तमानपत्रातील स्तंभलेखक लिहीत होते. जाहीरनामा प्रकाशित करण्यापूर्वी व केल्यानंतरही मोदींसह भाजपा नेते गुजरात मॉडेल सर्व देशभर राबवणार हे मतदारांना सांगत आहेत. त्यामुळे गुजरातेत नक्की काय होत आहे याकडे लक्ष वेधले जाणे चुकीचे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यामुळे गुजरातेत नक्की काय होत आहे याकडे लक्ष वेधले जाणे चुकीचे वाटत नाही.

हे म्हणणं वेगळं आणि त्याचा विरुद्ध बाजूने अतिरेक करणं वेगळं. आता लक्ष वेधले जाते म्हणून त्या अतिरेकाचे समर्थन होणार असेल तर असूदे बापडे. तितकी आंधळी विरोधभक्ती मला जमत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तो 'अतिरेक' आहे हे तुम्हाला वाटू शकते. मात्र असा विरोध करणाऱ्यांना ४५०० कोटीच्या जाहिरातीच्या बजेटविरुद्ध आपला आवाज लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कितीही बोंबलले तरी कमीच असेही वाटू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अच्छा, म्हणजे समोरची बाजू वरचढ आहे तस्मात आपले म्हण्णे कसेही अतिशयोक्त इ. असले तरी गळी उतरवलेच पाहिजे तर. मजा आहे, चालूद्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मोदींबद्दल कुठलाही प्रश्न विचारला गेला की 'मोदींविरुद्ध अपप्रचाराची राळ हो राळ....', 'त्यांना घेरलं हो घेरलं...', 'मारलं हो मारलं...' असा जो काही ठणाणा होतो, तो पाहून (या धाग्यावरही दिसलंच हे) 'आंधळी विरोधभक्ती' आणि 'आंधळी भक्ती' यांतल्या सीमारेषा नक्की करून घेण्याची निकड माझी मला जाणवली मात्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

दोन्हीही तितकेच तीव्र असते. मॅग्निट्यूड तेवढेच, फक्त डायरेक्शन १८० अंशांतून वळलेली असते. फक्त एखाद्या संस्थळाची डीफॉल्ट प्रकृती कशी आहे यावर प्रो प्रतिक्रियांचा उदोउदो करायचा की काँट्रॅरियन प्रतिक्रियांचा हे ठरतं. ऐसीची डीफॉल्ट प्रकृती जशी आहे तसे प्रतिसाद येताहेत, ते साहजिकच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

समान रिपोर्टिंग हे गृहितक राजस्थानचे २०% काँट्रीब्युशन काढतानाही आहे, गुजरातचे ३.७३% काढतानाही आणि मी दिलेले आकडे काढतानाही. तेव्हा ते वेरीयेशन नलिफाय होऊन हा बोभाटा टिकत नाही.

जर रिपोर्टिंग कमी-जास्त प्रमाणात शक्य आहे तर सगळेच आकडे नाहि का बदलणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जर रिपोर्टिंग सेम आहे तर ३ टक्क्यांवर इतक्या फोकसचे कारण समजेल काय?

शिवाय पर क्यापिटा गुन्हेच पाहिले तर अजून ६ राज्यांची टक्केवारी गुजरातपेक्षा जास्त आहे- बिहार, गोवा, कर्नाटक, केरळ, ओरिसा आणि राजस्थान. मग गुजरात टॉपला असल्यासारखी ओरड कशाला? सिलेक्टिव्ह रीडिंग केल्यावर शेवटी असेच दिसणार. गुजरात त्यात ढोग नंबर असला तरी त्यात गुन्हे असल्याची ओरड होणारच, तेव्हा त्यात कै नवल नै.

गुजरात या यादीत ७ वा आहे असे म्हणा, उगीच टॉपला असल्याचे चुकीचे चित्र उभे करू नका. टोटल गुन्ह्यांत प्रमाण ४% पेक्षा कमी, पर क्यापिटातही टॉपहून ७ वा, शिवाय % ऑफ दखलपात्र गुन्हे यातही त्याचा क्रमांक ७ वा आहे. त्यामुळे इट इज जस्ट अनदर स्टेट हेच सिद्ध होते. स्वतःच्या बायसला असे आरोपित करणे कितीही सुखकर वाटले तरी ते चूक आहे.

आता मी तुम्हांला विरोध करतो याचा अर्थ मोदीसमर्थक झालो असा काढण्यास तुम्ही स्वतंत्र आहातच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अतिशहाणा, मेघना इत्यादी जे सांगत आहेत, तेच वेगळ्या शब्दांत -

एखादी कल्पना, वस्तू, मॉडेल फार उपयुक्त आहे असा दावा केला की त्याबद्दल चिकीत्सा होते. उदा- अमेरिका हा प्रगत देश आहे, समजला जातो. तिथे राज्यकारभाराच्या बाबतीत केलेल्या चुकांची चिकीत्सा फार जास्त प्रमाणावर होणार. भारत ही सगळ्यात मोठी लोकशाही आहे (असा दावा आपणही - भारत - करतो) त्यामुळे लोकशाही हक्कांची पायमल्ली झाली तर जगभर त्याची बोंबाबोंब होणार.

गुजरातचंही तसंच आहे. गेली बारा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री असणारे नरेंद्र मोदी आता पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. गुजराथमध्ये फार विकास झाल्याचे दावे आल्यामुळे त्यांची चिकीत्सा होत आहे. त्यात १२ वर्षं मुख्यमंत्रीपद हा कमी काळ नव्हे. अशीच चिकीत्सा भारत या देशाचीही होते, 'इंडिया शायनिंग'ची (माझ्या मते) तेवढी झाली नव्हती (जी पुढे मतदारांनी केलीच). कॉंग्रेसचीही चिकीत्सा सदैव होतच राहते, कारण अर्थातच संसदेत कॉंग्रेसचं (कॉंग्रेसप्रणित आघाडीचं) बहुमत सगळ्यात जास्त आणि बरीच वर्ष होतं, सध्या आहे. पण देशाबद्दल आकडेवारी देताना तुलना करायला तसाच इतर विदा मिळत नाही. सुदैवाने आपल्याकडे भारत आणि पाकीस्तानची तुलना न करण्याइतपत हुशार लोक आहेत. पण अनेकदा चीन-भारत अशी तुलना करून आपण कुठे कमी पडतो आहोत याची चर्चा होतेच. (पण या चर्चांना नाही म्हटलं तरी एक देशप्रेमाची बाजू असल्यामुळे त्यात मोदीभक्त, मोदीप्रेमी वि. मोदीद्वेष्टे, मत नसणारे अशा प्रकारचं ध्रुवीकरण होत नसावं.)

उदा - या वरच्या प्रतिसादात जो उल्लेख आहे त्यातल्या बिहार, गोवा, कर्नाटक, केरळ, ओरिसा आणि राजस्थान या राज्यांचं मॉडेल देशभर लागू करण्याची हवा त्या-त्या राज्यसरकार आणि त्यांच्या आघाड्यांनी केलेली नव्हती. गुजरातची केलेली होती, आहे. त्यामुळे चिकीत्सा गुजरातही होणं अपरिहार्य आहे. त्यातही गुजरातशी तुलना करता येण्यासारख्या महाराष्ट्र, आंध्र या राज्यांशी अधिक तुलना होणं अपरिहार्य आहे. (याबद्दल अनेकदा नितिन थत्ते लिहीतात.) तुलना न करताही, २८ पैकी २२ वा नंबर हा काही थोर नाहीच. (जगातही, सामाजिक समानतेच्या बाबतीत २२ व्या क्रमांकावरचा देश कोणता हे आपल्यापैकी कोणालाही माहित नसेल. आणि १९०+ देश आहेत.)

---

विरोधी मतप्रदर्शन करतानाही, कोणीही न केलेली विधानं जणू केलीच आहेत अशी वाक्य लिहून, उदा - "गुजरात त्यात ढोग नंबर असला तरी त्यात गुन्हे असल्याची ओरड होणारच, तेव्हा त्यात कै नवल नै", "आता मी तुम्हांला विरोध करतो याचा अर्थ मोदीसमर्थक झालो असा काढण्यास तुम्ही स्वतंत्र आहातच", मुद्दा सिद्ध होत नाही. खरंतर, या व्यासपीठावर मोदींची कसून चिकीत्सा करणाऱ्यांनीच मोदीप्रेम आणि मोदीद्वेष ही (आणि हो-किंवा-नाही अशी कोणतीही) बायनरी विचारसरणी कुचकामी असल्याची विधानं केलेली आहेत. असं असूनही त्यांच्यावर बायनरी विचारसरणीने विचार केल्याचे आरोप आडून करणं अस्थानी आणि दुर्दैवी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरंतर, या व्यासपीठावर मोदींची कसून चिकीत्सा करणाऱ्यांनीच मोदीप्रेम आणि मोदीद्वेष ही (आणि हो-किंवा-नाही अशी कोणतीही) बायनरी विचारसरणी कुचकामी असल्याची विधानं केलेली आहेत. असं असूनही त्यांच्यावर बायनरी विचारसरणीने विचार केल्याचे आरोप आडून करणं अस्थानी आणि दुर्दैवी आहे.

जर बायनरी विचारसरणी अंगीकारत नसतील तर मग उपलब्ध विदा वापरून एकांगी, फसवे निष्कर्ष काढणं समर्थनीय कितपत आहे? माझा प्रश्न साधा आहे. मोदीसमर्थकांनी गाय मारली तर मोदीविरोधकांनी किंवा चिकित्सकांनी वासरू मारूनच्या मारून त्याचे समर्थन करावे आणि ते दाखवल्यावर क्राय फाउल करावे याचा अर्थ काय? हे खरंच दुर्दैवी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

राजेशने लिहीलेलं आहेच, उपरोल्लेखित परिच्छेद लिहीण्यामागचा पुन्हा मुद्दा एकच -

कोणीही कितीही भारून जाऊन किंवा भारून न जाता विचार करत, लिहीत असतील. लेखनाला विरोध करताना व्यक्तिगत आरोपवजा विधानं करू नयेत. प्रश्न साधा असेल तर त्यासाठी आक्रस्ताळी भाषा वापरल्याने उलट मुद्द्याचं आणि चर्चेचं नुकसान होतं.

---

"उपलब्ध विदा वापरून एकांगी, फसवे निष्कर्ष काढणं" हे काम जे कोणी करत असतील त्यांच्याबद्दलही आक्रस्ताळी विधानं करण्याचं कारण नाही. पण खरंतर वरची चर्चा वाचून माझ्या मते, "फसवे निष्कर्ष काढणं" हे काम मोदीसमर्थक किंवा मोदींच्या चिकीत्सेचे विरोधक करत आहेत. "२८ पैकी २२ वा नंबर हा काही थोर नाहीच." माझ्या मताबद्दल मतभेद होऊ शकतात. पण ते असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रोचक प्रतिसाद. विशेषतः ६ वा क्रमांक कशात आहे हे न पाहता लिहिल्यामुळे अजूनच रोचक.
विदा काय दाखवतो ते पाहण्याचे कष्ट घेतले असते तर...पण असो, उगीच सर्वांकडून भलत्या अपेक्षा कशाला ठेवा. असो. तर

टोटल गुन्हेगारीत गुजरातचे काँट्रिब्यूशन ४% पेक्षा कमी.

पर क्यापिटा गुन्ह्यांतही सातवा क्रमांक.

त्यामुळे कुसळमुसळ न्याय लावला तर एकट्या गुजरातवर इतका फोकस करणे म्हणजे मूर्खपणाच आहे. मोदीसमर्थक कसेही असले तरी या चिकित्सकांचा मेंदू जागेवर आहे ना? बाकी २८ पैकी २२ हा नंबर थोर नाहीच, पण अख्खा देश एक तरफ आणि गुजरात दुसरे तरफ म्हणावा इतकाही खास नाही. तस्मात + किंवा - कुठल्याच अँगलने गुजरात लै भारी असा नै.

हा मुद्दा या तथाकथित चिकित्सकांना झेपत नाहीसे दिसते. गुजरात जगातभारी या तद्दन मूर्ख प्रचाराचा विरोध करण्यात आपणही तीच पातळी गाठतो आहोत हे त्यांना लक्षात येत नाही आणि ते स्वतःच स्वतःची पर्पज डिफीटवत आहेत- अ‍ॅज मच अ‍ॅज दे वुड लाइक टु बिलीव्ह अदरवाईज.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या सगळ्या चर्चेत विनाकारण समोरच्यावर 'मूर्ख' वगैरे शब्दांची खैरात केल्याने काय साध्य होतेय हे समजत नाही.
माझा मुद्दा तुम्हाला पटत नाहीये हे समजले पण त्याने मी(किंवा तो मुद्दा मांडणारे कोणीही) मुर्ख कसा ठरतो हे समजत नाही. असो.

माझे म्हणणे पुरेसे स्पष्ट आहे. "मी" यांनी दिलेला वरील विदा "बघा गुजरात मध्ये मोदींनी केलेले काम इतरांसारखेच आहे", "उलट दलितांवर अन्याय इतरांपेक्षा कमीच होतोय" असे दर्शवण्याच्या उद्देशाने दिलेला होता तो मी तोच विदा वापरून खोडून दाखवला आहे. (गुजरात दलितांवरील अन्यायाच्या बाबतीत २८ राज्यांत पर क्यापिटा गुन्हांनुसार ६-७व्या क्रमंकावर असेल तर हे सामान्य असल्याचे लक्षण मी मानत नाही. पण आता तो मुद्दाच नाही).

शांतपणे माझा प्रतिसाद वाचा. - मी गुजरातमध्ये दलितांवर सर्वाधिक अन्याय होतोय असे कुठेही म्हटलेले नाही - नी माझा तसा दावा नाही. माझा प्रतिसाद मी यांनी दिलेला विदा किती अपूर्ण आहे व त्यतून दोन्ही प्रकारचे निष्कर्ष कसे काढता येतील हेच दाखवून देणारा आहे. ज्याला ज्या आकड्यांना महत्त्व द्यायचेय त्या आकड्यांना द्यावे.

मी गुजरातमध्येच दलितांवर सर्वाधिक अन्याय होतोय असे इथे म्हटले असेल तर दाखवा नाहीतर वैयक्तिक टिपणी करणारी विनाकारण केलेली विधाने मागे घ्या!

असो. एन आयदर केस, चर्चा अश्या भाषेत वळली नी मुद्देसूद लिहिणे मला शक्य होत नाही. तेव्हा मी माझे प्रतिसाद या धाग्यावर थांबवतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझा प्रतिसाद मी यांनी दिलेला विदा किती अपूर्ण आहे व त्यतून दोन्ही प्रकारचे निष्कर्ष कसे काढता येतील हेच दाखवून देणारा आहे. ज्याला ज्या आकड्यांना महत्त्व द्यायचेय त्या आकड्यांना द्यावे.

दोन्ही प्रकारचे निष्कर्ष अवश्य काढता येतात, पण सॅनिटी चेक्स लावणे गरजेचे आहे. ज्या राज्याचे टोटल गुन्ह्यांतील काँट्रि ४% पेक्षा कमी आहे त्या राज्यावर अन्य २०% वाल्यांच्या तुलनेत जास्त फोकस करून वर पर क्यापिटात वरून ७ वा क्रमांक आहे असे म्हटल्याने उरलेल्या ९७% कडे दुर्लक्ष होते. हे शहाणपणाचे आहे असे मला वाटत नाही. बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रतिसाद किती उजवीकडे सरकू शकतात, हे बघण्यासाठी दिलेला प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>> प्रतिसाद किती उजवीकडे सरकू शकतात, हे बघण्यासाठी दिलेला प्रतिसाद.
--- छे, धर्माचा उल्लेख असलेली कुठलीही आंतरजालीय चर्चा पहा फक्त त्यासाठी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने