मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १०
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
====
मायक्रोवेव्ह मध्ये अंडी उकडण्याचा प्रयोग केलाय का कोणी? जालावर शोधल्यास 'रिस्की आहे. आपल्या जबाबदारीवर करावे' अशा अर्थाचे सल्ले मिळाले.
अंडे आणि वांगे
मायक्रोवेव्ह मध्ये अंडी उकडण्याचा प्रयोग केलाय का कोणी?
होय. माझ्यागाठी तो अनुभव आहे. अंडे फुटून ओवनभर पसरते आणि मग सर्व साफ करावे लागते.
आणि हो, वांगेदेखिल मायक्रोवमध्ये फुटते. मी भरीत करण्यासाठी म्हणून वांगे ठेऊन हा प्रयोग केलेला आहे!
वांगे फुटल्यामुळे होणारा त्रास हा अंडे फुटल्यामुळे होणार्या त्रासापेक्षा जास्त* असतो.
*
१. एक फुटले तरी एकाहून अधिक अंडी घरात (बहुतेक वेळेला) असतात. भरीतासाठीचे मोठे वांगे (सहसा) एकच असते.
२. अंडे फुटले तर फक्त नाश्त्याची पर्यायी व्यवस्था करावी लागते, जी पटकन होऊ शकते. वांगे फुटले तर, जेवणाचा बेतच पूर्णपणे बदलावा लागतो.
३. अंडे तुलनेने वांग्यापेक्षा स्वस्त असते.
हे मात्र खरे नाही.
अंड्याच्या एका टोकास सुई अथवा टोच्याने सूक्ष्म छिद्र पाडणे शक्य आहे.
किंबहुना, याच तत्त्वावर चालणारा एक विद्युत-सहासात-अंडी-एकदम-उकडक माझ्या संग्रही आहे. (बर्याच दिवसांत वापरलेला नाही, हा भाग अलाहिदा.) बाजारात मिळतो.
या यंत्रात अंडी उकडावयास ठेवण्यापूर्वी त्यांच्या एका टोकास सूक्ष्म छिद्र पाडावे लागते; अन्यथा, उकडताना ती फुटतात. किंबहुना, असे छिद्र पाडण्याकरिता एक टोच्याही यंत्रात समाविष्ट आहे. (उपरसमाविष्ट दुव्यावरील 'आयटम डिस्क्रिप्शन' या विभागातील तिसरा मुद्दा पाहिल्यास त्यात 'पियर्सिंग पिन' अशी एक गोष्ट अनुसूचित केलेली दिसेल.)
(अरे, याला कोणी 'माहितीपूर्ण', गेला बाजार 'भडकाऊ' देईल की नाही?????)
त्यात काय. स्कोर किती का
त्यात काय. स्कोर किती का असेना, "मिळालेल्या श्रेणी" वर क्लिकवल्यास जे कॉलम्स दिसतात त्यात डावीकडून क्र. २ चा "श्रेणीसंख्या" नामक कॉलम पहावा. त्यात नक्की किती लोकांनी श्रेणी दिली, ते दिसते. कैकदा तो आकडा १० वैग्रेच्या घरात गेलेलाही पाहिला आहे-यद्यपि स्कोर ५ च राहिला तरीही.
मायक्रोवेव्हमध्ये बराच वेळ
मायक्रोवेव्हमध्ये बराच वेळ वापरता येईल अशा एखाद्या डब्यात अंडं फोडा. घट्ट आणि/किंवा जड झाकणाने भांडं झाका आणि मायक्रोवेव्ह करा. अशा प्रकारचे प्लास्टीकचे डबे (अमेरिकन) बाजारात पाहिले आहेत. वापरलेले नाहीत. समजा तुमचा प्रयोग फसला आणि अंड्याचा स्फोट झाला तरी फक्त डबाच घासायला लागेल.
(अंड्याच्या कवचाच्या आत वाफ कोंडते आणि अंड्याला कुकरसारखी शिटी नसल्यामुळे योग्य ठिकाणाहून वाफ बाहेर पडण्याऐवजी स्फोट होतो. मायक्रोवेव्हमध्ये आमलेट करताना काही स्फोट वगैरे होत नाहीत त्याचं कारण, वाफेला पसरायला पुरेशी जागा मिळणं हेच असावं.)
यदु कुरु पुरु
यदु, कुरु, पुरु म्हणजेच कृष्णाचे घराणे, कौरव्-पांडावांचे घराणे वगैरेमध्ये नियमित विवाहसंबंध दिसतात.
यदु, कुरु, पुरु ही सारी सम्राट ययाती ह्याची मुले.
ह्यांच्यापासून हे वंश सुरु झाले.
म्हणजेच हे सारे विवाह सगोत्री होते. तेसुद्धा फार लांब नसावे. ५-७ पिढ्या असतील.
दरवेळी महाभारतीय प्रथा परंपरांचा वारसा सांगत काही परंपरांना पंजाब्-राजस्थान व काही प्रमाणात उर्वरित उत्तर भारतही घट्ट चिटकून राहिलेले दिसतात. विशेषतः जात्यभिमान , कुतुंबाभिमान, रक्त्शुद्धीच्या संकल्पना वगैरे तिकडे फारच खोलवर दिसतात.
"सगोत्र " नामक संकल्पनेतून तिथे honour killingही होते.
पण महाभारतातच यदु , कुरु वगैरे मंडळी जी लग्ने करतात ती सगोत्रीच होत की.
( "नियोग पद्धत " वगैरे सारखी आडवाट/पळवाट इथे नाही.
दैवी चमत्कार ह्या लेबलाखाली झाकल्या गेल्याने नियोग , वरदान वगैरे ते काळापुरतेच राहिले हे समजू शकतो.
पण कौरव पांडाव, यादव मंडळींनी सगोत्र विवाह केले हे काही आडवाटेने वगैरे सांगितले गेलेले नाही.
सरळ्,थेट , स्पष्ट लिहून ठेवलेले आहे.
)
इतके असून खाप पंचायती ह्या साठी जीवावर का उठतात ?
आपल्या पूर्वजांचा आदर ह्यांना नाही का ?
यप्स
यप्स
आंतरजातीय चालेल; पण सगोत्र नको; असे म्हटले आहे.
वेगळ्या जातीत एकच गोत्र असू शकते.
शिवाय एकाच गावात नको असे म्हटले आहे; कारण त्यांनी शंका आहे की लोकांची वागणूक...
नको. जाहिर बोलण्यासारखं नाहिये.
माझा मुद्दा :-
आपल्या कैक आदरणीय, परमपूज्य पूर्वजांनी सगोत्र विवाह केले आहेत.
परम प्रतापी संततीही त्यातून त्यांनी सतत मिळ्वली आहे.
खापला हे समजत नै का ?
त्यांना हे कुणी सांगू शकत नाही का ?
...
...ती 'नया सवेरा' वगैरे जी काही भानगड असेल, ती कविकल्पनाच असावी, अशीही एक (गद्य)कल्पना या निमित्ताने मनाला चाटून गेली.
बाकी,
यात 'फुल विनम्र के साथ' ही दुरुस्ती इन्कॉर्पोरेट करावी अशी इणंती-अर्थातच फुल विनम्र के साथ.
'नको नको, जरा आमचेही वरिजनल काहीतरी असू द्या की राव' अशी हार्ट ऑफ... आपले, बॉटम ऑफ माय हार्टपासून नम्र विनंती.
बॉटम ऑफ नाही
त्यावरून 'बॉटम ऑफ साटम' नामक एक मराठी पिच्चरमधील पात्र आठवले.
('तुला शिकवीन चांगलाच धडा'मधला का?) ते 'बॉटम अप साटम' असे असावे. पेताड लोकांमध्ये 'बॉटम्स अप' ही फ्रेज प्रसिद्ध आहे.
https://www.google.com/search?q=bottoms+up&ie=utf-8&oe=utf-8&aq=t&rls=o…
(अतिअतिअवांतर)
या निमित्ताने 'बॉटमलेस पिट' ही संकल्पना आठवून तिचेही हसू आले. आणि का कोण जाणे, पण 'अॅलिस'मधल्या 'चेशर क्याट'ची उगाचच आठवण आली.
"Did you say pig, or fig?" said the Cat.
"I said pig," replied Alice, "and I wish you wouldn't keep appearing and vanishing so suddenly: you make one quite giddy."
"All right," said the Cat; and this time it vanished quite slowly, beginning with the end of the tail, and ending with the grin, which remained some time after the rest of it had gone.
"Well! I've often seen a cat without a grin," thought Alice; "but a grin without a cat! It's the most curious thing I ever saw in all my life!"
(उद्धृत.)
गुज्जू ज्ञानपीठ आणि शिक्षण
आजच्या दिनवैशिष्ट्यात उल्लेख आहे :-
ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक पन्नालाल पटेल अर्रे ??!! काय हे /
महाराष्ट्र सोडून इतर प्रांतांना इतिहास आणि संस्कृती तरी आहे का ?
संस्कृतीच नसेल तर काय कप्पाळ लिहिणार ?
प्रत्येक गुजराती हा बाय डिफॉल्ट दुकानदार असतो ना ?
त्यांचे फार फार तर आकडेमोडिपुरते शिक्षण झाले असावे;मुनीमजी स्टाइल.
साहित्य वगैरे महाराष्ट्र सोडून आहेच कुठे जगभरात ?
थुत त्या उर्वरित जगाच्या.
अरे गाढवा
लेखनाची प्रेरणा इथे.कृपया वाचकाने आपल्या अनुभवातून हातभार लावावा.
तु वॉशरुममधे होतास, विसर्जन केल्यावर हात धुण्याऐवजी चक्क केसांवरुन फिरवून बाहेर निघून गेलास, तुझा चेहरा लक्षात ठेवलाय परत भेटलास तर हास्तांदोलन करणार नाही, इतरांनाही सांगेन.
तु पण वॉशरुममधे होतास, हात धुवत होतास पण धुतल्यावर नळ नीट बंद झालाय न हे न चेक करताच बाहेर पडलास, तु संडासमधे असताना पाणी जायला पाहिजे अशी मनोमन इच्छा आहे.
हो, तु पण वॉशरुममधेच होतास, हात धुतला, नळ बंद केलास आणि पेपर नॅपकीनने हात पुसल्यावर त्याचा बोळा करुन बास्केटमधे बॉल सारखा टॉस केला, तुझा नेम चुकला, चुकायचाच तो, पण खाली पडलेला बोळा उचलून ठेवायचा सोडून तु शिट्टी वाजवत बाहेर पडलास, परत भेटलास तर तुला टॉस करण्याची इच्छा आहे.
तु टू व्हिलर चालवत होतास, मी पण चालवत होतो, माझं जरा वय झालय आणि तु माजल्यासारखा हाँक करत शुमाकरची औलाद असल्यासारखा बाजुने गेलास, परत गाडी चालवावी का ह्या विचारात पडलो, तु म्हातारा व्हायची स्वप्न बघतोय.
तु टू व्हिलर चालवत होतास, मी रस्ता क्रॉस करत होतो, माझं वय झालय पण ज्या वेगात तू आलास त्या वेगात धडकून किंवा धडकी भरून मी नक्की मेलो असतो, आता रस्त्यावर चालायची भिती वाटते.
मी पण रेस्तरांमधे होतो, तु ही होतास, पण तुझा आणि तुझ्या ग्रुपचा आवाज आणि खिदळणं जे काही होतं की मला मॅनेजरला विनंती करावी लागली, सगळं खात होतास पण औचित्य कशाशी खातात हे कधी कळणार तुला.
रांगेत उभा होतो मी, इतरही, तु आलास आणि तिर्थरुपांची खिडकी असल्यासारखी घुसलास, सगळे षंढासारखे बघत बसलो, त्यापेक्षा तुला षंढ केले असते तर बरे झाले असते.
तु वाचत होतास, मी लिहित होतो, तु श्रेणी देत होतास, मी लिहित होतो, कधीतरी तुही लिहिशील ह्याची वाट पहातोय.
साबण नसेल तर
>> तु वॉशरुममधे होतास, विसर्जन केल्यावर हात धुण्याऐवजी चक्क केसांवरुन फिरवून बाहेर निघून गेलास
भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात अनेक ठिकाणी मुतारीत हात धुवायला पाणी असलं तरी साबण नसतो. किंवा असला तरी लोक तो वापरत नाहीत. अशा ठिकाणी हात धुण्यामुळे सर्दी-खोकला-तापाच्या साथी किंवा conjunctivitis वगैरे झपाट्यानं पसरतात. हेसुद्धा इथे लक्षात घेण्याजोगं आहे.
दाग अच्छे नही है.
साबणाबद्दल सहमत आहे, पण डोअर नॉब हताने ऑपरेट करावाच लागतो, साबण शक्यतो लिक्विड असतो(तरिही थोडा धोकादायक), हात नुसत्या पाण्याने धुतल्यास चांगले असावे, काहीठिकाणी स्वयंचलित नळ असतात तिथे तर समस्या कमी असते.
तसेच हात न धुता 'सार्वजनिक' युरिनलचा वापर तिथले जर्म्स कॅरि करण्याची शक्यता वाढवण्यासारखे आहे.
दुचाकी कोणती बरी ?
दुचाकी कोणती बरी ?
मार्केटात अनेकानेक पर्याय असले, तरी एकूण निक्षांच्या आधारावर होंडा अॅक्टिवा आणि सुझुकी अॅक्सेस ह्यापैकीच एक घेणे
जवळजवळ निश्चित होत आहे.
अशा मोपेड स्टाइल गाड्या घरातील ज्येष्ठ मंडळी, स्त्री सदस्य हे ही सहजतेने वापरु शकतात.
गाडीचा नियमित वापर हा फार तर दहाएक किमी दूरवरच्या ठिकाणी जाण्यासाठी होणार आहे.
त्याहून अधिक अंतर कापावे लागण्याची वेळ फार क्वचित येणार आहे.
स्कूटरवरून दुसर्या गाडीवर यायला ज्येष्ठांना भाग पाडायचे असेल तर स्कूटर सदृश भासणार्या ह्या गाड्या हा
चांगला पर्याय ठराव्यात. (एरवी स्कूटरप्रेमी वडीलधारी मंडळी आणि त्यांच्या वाहनांच्या आवडी निवडी हा एक
अजब प्रकार असतो. स्विफ्ट का कोणतीतरी ही चारचाकी सोडून देउन हट्टाने स्कूटरच वापरत असलेली मंडळीही
परिचयाची आहेत.)
अॅक्टिवा साठी जमेच्या बाजू म्हणजे
१.मागील दशकभरापासून असलेले रेप्युटेशन, लोकांचा चांगला अनुभव,
२.आता मार्केटमध्ये ती गाडी एस्टॅब्लिश झाली असल्याने गरजेच्या वेळी आसपासचे मेकॅनिक
तिला चांगल्याने हाताळू शकतात.
३.महत्वाचा मुद्दा म्हणजे ट्यूबलेस टायर आहे.
४. हवी असल्यास बजाज स्कूटर सारखी समोर डिक्की बसवायची सोय.
५. धातू व फायबर दोन्ही सांगाडे उपलब्ध(metal body, fibre body दोन्ही उपलब्ध.) आम्ही अर्थातच
धातूवाले मॉडेल घेणार.
६.HET (Honda Eco technology) ह्या पेटंटिकृत तंत्रज्ञानामुळे अधिक चांगले
मायलेज मिळणार(upto ६०) असा दावा.
७.dry batteries वापरात आणलेल्या आहेत; त्या अधिक चालतात म्हणे. (हे सुझुकीत आहे की नाही,
ठाउक नाही. असेलही)
सुझुकी अॅक्सेस :-
१. इंजिन अॅक्टिवापेक्षा अधिक ताकतीचे म्हणजे १२५ccचे आहे ,( अॅक्टिवा :- ११०cc)
बाकी किंमत, रचना , उपयुक्तता दोन्ही गाड्यांची बरीचशी सारखी आहे.
इथली मंडळी ह्या दोन गाड्यांबद्दल काय विचार करतात ?
एकूणच दुचाकी घेताना काय प्राथमिकता डोक्यात असतात्/असाव्यात ?
अॅक्टीवाचे डायनामिक्स जरा
अॅक्टीवाचे डायनामिक्स जरा हुकलेले आहेत. जड असल्याचा फील येतो. याच टाईपची टीव्हीएस वेगो एकदा पहा. स्टँड पायाने दाबला तरी लागतो इतका मस्त सीजी अॅडजस्ट केलेला आहे. गाडी साधारण सेम वजनाची आहे पण अॅक्टीवा सारखा जड फील नाही. माझी अॅक्टीवा जूनी आहे त्या नंतर दोनदा नवीन अपग्रेड झालेले मॉडेल्स लॉन्च झालेत. त्या बद्दल नीट कल्पना नाही.
महेंद्राचे पण टू व्हीलर्स मध्ये मॉडेल मिळतील तिकडे पण नजर टाकायला हरकत नाही. वेगो घेताना महेंद्रा रोडीओ पाहीली होती, जमिनीपासूनची तिची किमान उंची कमी असल्याने ती रिजेक्ट केलेली.
अॅक्सेस वापरली नाही.
+१ अॅक्टिव्हा जड आहे, शिवाय
+१
अॅक्टिव्हा जड आहे, शिवाय फारच ब्रॉड बुडाची/पिछवाड्याची आहे. मागे बसणारा दिर्घकाळ (पाऊण-एक तास) बसल्यास पायात गोळे येतात (माझ्या पोटर्यांत तरी येतात).
अॅक्सेस अगदीच कंपेरेबल आहे. साधारण तसेच फिचर्स, तशीच किंमत म्हणून फक्त छुप्या पैशाचा आस्पेक्ट सांगितला.
वेगो मला 'दिसायला'च आवडत नै. :(
रोडीयो माहित नाही
आपण गाडीवर बसल्यावर आपल्याला
आपण गाडीवर बसल्यावर आपल्याला गाडी कुठं दिसते???
गाडीच्या रंगाबद्दल डीस्कशन सुरु असतांना मी हेच बोल्लो तर सगळे काय येड्यासारखं बडबडतो म्हणून पहातात. घराच्या रंगाचं ठीके , तो आपल्याला कायम दिसत रहातो. गाडीच्या जवळ्पास आपण दहा पंधरा सेकंद रंग पहाणार. (आपल्या पुसायच्या उत्साहानुसार त्याची शेड बदलणार तर का विचार करा?) अन आत बसल्यावर रंग घंटा दिसणारे?
?
अन आत बसल्यावर रंग घंटा दिसणारे?
एम-५० किंवा एम-८०च्या 'आत' कसे बसता येईल, ते कळले नाही. (पिष्टन किंवा स्पार्कप्लग आहात काय?)
(बादवे, अजूनही एम-५०/एम-८० मिळते??? 'आमच्या जमान्या'तल्या गाड्या होत्या ना या? एम-५० तर 'आमच्याच जमान्या'त ऑब्सोलीट होऊ घातली होती, असे अंधुकसे आठवते.)
आपण गाडीवर बसल्यावर१ आपल्याला
आपण गाडीवर बसल्यावर१ आपल्याला गाडी कुठं दिसते???
गाडीच्या रंगाबद्दल डीस्कशन सुरु असतांना मी हेच बोल्लो तर सगळे काय येड्यासारखं बडबडतो म्हणून पहातात. घराच्या रंगाचं ठीके , तो आपल्याला कायम दिसत रहातो. गाडीच्या जवळ्पास आपण दहा पंधरा सेकंद रंग पहाणार. (आपल्या पुसायच्या उत्साहानुसार त्याची शेड बदलणार तर का विचार करा?) अन आत बसल्यावर२ रंग घंटा दिसणारे?
१- ज्या गाड्यांवर बसता येतील अशा.
२- ज्या गाड्यांमध्ये बसता येइल अशा.
घ्या, स्वसंपादीत.
एखाद्याची विकत घेऊन चालवता
एखाद्याची विकत घेऊन चालवता येण्याइतपत / कायदेशीरपणे१ विकता येण्याइतपत बर्या अवस्थेतील तितक्या जुन्या दुचाक्या अजूनही अस्तित्वात आहेत?
योग्य किंमत मिळाल्यास नक्कीच मि़ळतात१ असा अनुभव आहे, यामाहा आरएक्स १०० हे वाहन तर हॉट केक प्रमाणे विकले जाते. माझ्याच मित्राने २५ वर्षापूर्वीची एक आरएक्स यामाहा बार्गेन करुन ३७ हजाराला विकत घेतली२.
१ वापरण्यास, भंगार म्हणून नव्हे.
२ मार्केट फोर्सेस, दुसरं काय.
पांढरा कांदा लाल कांदा
पांढरा कांदा व लाल कांदा ह्या नेमका फरक काय आहे ?
पांढरा कांदा थोडा २० ते ५०टक्के महाग असतो.
दिसायला बाहेरुन शुभ्र पांढरा, आतून शुभ्र पांढरा.
त्यांचे चव, गुणधर्म व टिकणे वेगवेगळे आहेत का ?
काय काय फरक आहेत ?
गूगल बाबाला विचारले; पण फारसे काही हाती लागले नाही.
तसेही गूगलवर नसलेली बरीच माहिती परंपरेने भारतीय घरात प्रचलित असते.
आजीबाईच्या बटव्याच्या रुपाने किंवा बळीराजाच्या स्थानिक शेतीच्या अनुभवाने समृद्ध असते.
म्हणून म्हटले इथे विचारुन पहावे.
.
.
.
लोणावळा इथे मिळणारी चिक्की जरा जास्तच हवा केली गेलेली आहे असे वाटते.
त्याऐवजी लोणावळ्यालाच मिळणारा fudge हा मला आवडतो.
क्वचितच खाल्ला आहे, पण माझ्या आवडिचा प्रकार आहे.
पुणे,मुंबै, औरंगाबाद येथे लोणावळावाल्यांचे बरेच आउटलेट्स्/फ्रँचाइअझी पाहण्यात आले.
पण तिथे फक्त चिक्की मिळते.fudge मिळत नाही.
असे का असावे ?
हा पदार्थ फारसा लोकप्रिय नाही हे कारण असावे की तो टिकवण्यात वगैरे अडचणी असाव्यात ?
अॅक्च्युअली लोणावळा चिक्कीत
अॅक्च्युअली लोणावळा चिक्कीत हल्ली क्रश शेंगदाणा चिक्की बरीच पॉप्युलर आहे. पण ती साधारण घरी बनवता येते अशा गुळाच्या चिक्कीसारखीच लागते.
लोणावळा चिक्की फेमस झाली ती बहुधा ट्रान्सल्युसंट दिसणारी ग्लुकोज चिक्की म्हणून.
बादवे.... पांढरा कांदा कमी तिखट असतो बहुधा.
पांढरा कांदा
वडखळ-अलिबाग परिसरात पांढरा कांदा मुबलक मिळतो. हा कमी तिखट असतो म्हणून रायत्या-कोशिंबिरीत अधिक वापरला जातो. खेरीज, हा कांदा बराच काळ टिकतो. जण्रली हा सुटा फार क्वचित मिळतो. बरेचदा लडी/माळा ह्या स्वरूपात विकला जातो.
अलिबाग भागात जाणे झाले तर एक-दोन माळा तरी विकत घेतल्या जातातच.
आमच्या
आमच्या इकडच्या मंडईतही सुटे पांढरे कांदे मिळतात. बहुतांश कांदे मध्यम आकाराचे असतात. काही लहानही असतात.
अजून एक :-
कांद्याच्या पातीतले कांदे बाय डिफॉल्ट लाल कांदेच असतात असे वाटते.
पांढरे कांदे असलेली कांद्याची पात्/जुडी मंडईत कधी दिसली नाही.
चवीत इतका फरक जाणवला नाही.
(मध्यम आकाराचा पांढरा कांदा व मध्यम आकाराचा लाल कांदा कच्चा खाउन पाहिला भाकरीसोबत एकेक दिवस.)
कांद्याच्य पातीत येणारे लहान्,बारकुले लाल कांदे चांगले झणझणीत असतात असे जाणवले.
उन्हाळ्यात कांदा खावा, लिंबू पाणी प्यावे म्हणतात.
तेव्हा कोणता कांदा खाणं अपेक्षित असतं, ऊन बाधू नये म्हणून?
पांढरा कांदा
पांढरा कांदा हा शीत आणि औषधी समजला जातो. कफ झाला असेल तर पांढर्या कांद्याचा रस पाजतात, लाल कांद्याचा नाही. कडक उन्हाळा लहान मुलांना बाधू नये, डोळे चिकटू नयेत म्हणून पूर्वी पांढरा कांदा किसून तो डोक्यावर थापीत असत. हा चवीला कमी मिरमिरीत असतो म्हणून रायती-कोशिंबिरींत वापरतात. मुख्य म्हणजे लाल कांद्यापेक्षा पांढरा कांदा अधिक काळ टिकतो म्हणून पावसाळ्याची साठवण करताना पांढरा कांदा वापरत असत. सुट्या कांद्यापेक्षा माळा बांधलेल्या असल्या तर साठवणुकीला सोपे जाते. दांडीवर किंवा दोरीवर टांगून ठेवता येतात. सगळीकडून हवा मिळाल्यामुळे कांदा लवकर कुजत नाही.
मुंबईत पूर्वी कांद्याच्या माळी (ठाणे जिल्ह्यात 'माळी' म्हणतात.), खडे मीठ, चिंच हातगाड्यांवर विकायला येई. जुन्या वस्त्यांत या गाड्या दिसत. अजूनही ईस्ट इंडिअन गावठाणांत मोसमात दिसतात. वसईवाले भाजी विक्रेतेसुद्धा सुटा आणि बांधलेला कांदा आणीत, अजूनही क्वचित आणतात.
हा कांदा बराच महाग असतो.
रोख रक्कम / cash आणि cheque
लोक रोख रक्कम का वापरतात?
"चेक/धानदेश " ही व्यवस्था काही आताच निर्माण झाली आहे असे नाही.
चांगली रुजलेली व्यवस्था आहे. (atm ,credit,debit वगैरे कार्डे तरी एकवेळ नवीन म्हणता यावीत.
सर्वच ठिकाणी काही त्यांची सपोर्ट सिस्टिम उपलब्ध नाही. पण चेक भारतात रुजलयला आता एक शतक तरी
उलटून गेलं की राव. अगदि काहिच नाही तर निदान एक दोन पिढ्या तरी उलटल्या अहेत.
)
तरी लोक मोठ्मोठ्या रोख रकमा बाळगण्याचं का सोडत नाहित?
बरं बाळगतात, तर इतक्या सहजी इतक्या मोठ्या रकमांच्या बॅगा कशा काय विसरत असावेत ?
एक प्रातिनिधिक म्हणता यावी अशी बातमी खाली दिसते आहे :-
http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5362140544113445758&Secti…ताज्या बातम्या&NewsDate=20140513&Provider=संजय भोसले : सकाळ वृत्तसेवा&NewsTitle=नोकराने वाचविले धनिकाच्या मुलीचे लग्न!
*********************बातमी सुरु******************************
नोकराने वाचविले धनिकाच्या मुलीचे लग्न!
ढाणकी - माणुसकी हरविली आहे, हेच वाक्य खरे ठरविणाऱ्या घटना आज अवतीभवती मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मात्र, अशा नीतीमूल्ये ढासळलेल्या वातावरणातही काही प्रामाणिकपणाचे कवडसे तेजाने तळपत आहेत. म्हणूनच तर हॉटेलमध्ये साधा नोकर असलेल्या एका तरुणाने चक्क पाच लाख रुपयांचा ऐवज सापडूनही मोह आवरला अन् ज्याचे पैसे त्याला सहिसलामत परत केले. हे पैसे होते एका मुलीच्या लग्नाचे. माणुसकीवरचा विश्वास दृढ करणारी ही घटना ढाणकी गावात घडली. आणि लाखा एक ठरावा असा तो माणूस आहे शेख तौफिक!
ग्रामीण भागात एक म्हण आहे, "विश्वासावरच जग चालते'... याचाच अर्थ आजही नीतीमत्ता कायम आहे. याचाच प्रत्यय ढाणकी येथील रेणुका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या शे. तौफिक शे. रफीक यांनी दिला. अठराविश्वे दारिद्य्रात जीवन जगणारा तौफिक हॉटेलमध्ये काम करून कुटुंबाचा गाडा ओढतो. परंतु, सारी कामे विश्वासाने करतो. गरिबी असली तरी मनात कोणतीच लालसा नाही. श्रीमंतीची हाव नाही. इमानदारीचे फळ निश्चितच चांगले मिळते, या उद्देशाने नेकीने काम करणाऱ्या शे. तौफीकच्या इमानदारीमुळे एका मुलीचे शुभमंगल पार पडले.
ढाणकी येथील रेणुका हॉटेलमध्ये 9 मे रोजी सकाळी नेहमीप्रमाणे गर्दी होती. बाहेरगावहून फराळ करण्यासाठी चार ग्राहक आले. हॉटेलात चहापाणी घेतले अन् निघून गेले. काही वेळाने चहा करणाऱ्या तौफिकला एक बॅग दिसली. ती बॅग त्याने हातात घेताच बॅगेत जडवस्तू असल्याचे जाणवले. त्याने हॉटेलमालक बालाजी भोयर यांना ती बॅग दिली. त्यांनी बॅग उघडून पाहिली तर बॅगेत नोटांचे बंडल दिसून आले. त्यांनी ती बॅग तशीच ठेवली. थोड्या वेळाने बॅगेचा शोध घेत ग्राहक परत आले. हॉटेलमध्ये सारेच कावरे-बावरे होऊन पाहत होते. नंतर येथे कुणाची बॅग विसरली आहे का, याची चौकशी हॉटेलमालक बालाजी भोयर यांनी केली. ती बॅग हिमायतनगरहून आलेल्या गुंडावार यांची होती. आपल्या मुलीच्या लग्नाच्या खरेदीसाठी त्यांनी हे पैसे आणले होते. भोयर यांनी अधिक चौकशी करून संबंधिताला बॅग परत केली. बॅग परत मिळाल्याने वधूपित्याचा आनंद ओसंडून वाहत होता. नवरी मुलीच्या अंगावरील सोन्याचे दीड लाखाचे दागिने, खरेदीसाठी आणलेले चार लाख रूपये परत मिळाल्याने मुलीच्या लग्नासाठी घेतलेले दागिने तसेच वर मुलासाठी कपडे व खरेदीसाठी आणलेली रक्कम परत मिळाल्याने वधूपिता यांनी शे. तौफिकचे आभार मानले.
""एवढी रक्कम व दागिने हरविले असते तर कदाचित माझ्या मुलीचे लग्नच खोळंबले असते. शेख तौफिक याने माणुसकी दाखवून पैसे परत केल्याने माझ्या मुलीचे शुभमंगल होत आहे. शेख तौफिकच्या प्रामाणिकपणामुळेच माझी मुलगी नवरी म्हणून बोहल्यावर चढली.''
- श्री. गुंडावर, हिमायतनगर.
*********************बातमी समाप्त***************************
मुळात लग्न आणि बेफाम खर्च हे गणित लोकांच्या डोक्यातून का जात नाही ?
(ह्यावर मेघनाचा एक शतकी धागाही झालाय. मुसु वगैरे मंडळींनी नोंदवून ठेवावेत इतके भारी प्रतिसादही दिलेत.
पण तरी प्रश्न रुंजी घालत राहतोच.
)
साधेपणा ही फक्त बोलायची गोष्ट नसून व्यवहारात उलट तीच अधिक फायदेशीर आहे, हे चूक आहे का ?
www.google.co.in
www.google.co.in, www.google.co.uk, www.google.co.hk हे सर्व माझ्याइथे व्यवस्थित चालत आहेत.
कोण
"कोण मनमोहन " ते "पंतप्रधान मनमोहन " म्हणायला जितका काळ लागला तितकाच.
किंवा "प्रधानमंत्री की अगली बारी अटलबिहारी अटलबिहारी" अशा घोषणा देणार्यांना "प्रधानमंत्री वाजपेयी" म्हणायची सवय व्हायला जितका वेळ लागला, तितकाच.
किंवा मैत्रिणीची पत्नीरुपात पदोन्नती झाल्यावर एकमेकांना मित्र-मैत्रिण अशा रुपात पाहण्यापासून "पती-पत्नी" असे पहायची सवय व्हायला जितका टैम लागतो ; तितकाच.
प्रत्येक रोग्याचा रोग बरा होण्याचा काळ अगदिच सारखा असत नाही. प्रकृती,हवामान ह्यानुसार थोडं मागंपुढं व्हायचच.
बादवे, मराठीत प्रेमिक - प्रेमिका हाच शब्द गर्लफ्रेंड - बॉयफ्रेंड साठी वापरावा का ?
अगासी आणि स्टेफी ग्राफ ह्यांचे पेप्रात फोटो येत तेव्हा "अगासीची गर्लफ्रेंड " ह्या अर्थाने "अगासीची मैत्रिण" असे वापरलेले पाहून विचित्र वाटे. मित्र्-मैत्रिण ही अम्ब्रेला टर्म सगळीकडे का वापरा ? विशेष असा शब्द नाही का ?
काय चाल्लय हल्ली?
हेल्लो!
काय चाल्लय हल्ली ?
कसली गरमी होतिये नै / यंदा फारशी गरमी जाणवतच नाही/किम्वा ऋतुनुसार कोणतेही हवामानाबबत योग्य वाक्य
कसा आलास्/आलीस?
ह्या दोन चार डायलॉगनं सुरुवात करावी.(सहसा ह्यानेच ऑपॉप होते.)
नंतर फ्लो मध्ये आपोआप बोलणे सुरु राहते.
संवादाचा महत्वाचा भाग आपण स्वतः बोलणे आहे; तसेच समोरच्याचे ऐकणे; समोरच्याच्या बोलण्यावर प्रतिसाद देणे
हाही आहे. (सतत बोलत राहणारा अतिबडबद्या व कदाचित अप्रैय्/इरिटेटिंग ठरु शकतो.
अजिबातच न बोलणारा घुम्या/माथ्या/मंद्/शिष्ट ह्यातील काही ठरु शकतो.
)
समोरचा जे सांगू पाहत आहे, त्याबद्दल तुम्हाला बोलता येते का हे महत्वाचे.
बोलता येत नसेल(त्यातली काहिच माहिती नसेल) तर निदान योग्य ते प्रश्न तरी विचारता यावेत.
(ह्यासाथी सुधीर गाडागीळांनी अत्मकथनपर लेख लिहिलेत, ते कामी यावेत. किंवा साध्या तर्कानेही हे जमेल.)
मी फायनान्स/अर्थ निरक्षर आहे; पण गब्बरसदृश अर्थशास्त्री भेटला तर त्याच्याशी गप्पा मारु शकेन असे वाटते.
त्यांना मी अगदिच डोकेदुखी वाटणार नाही, असा अंदाज आहे.
.
.
.
तुम्हा लोकांचा कट्टा झाला होता तेव्हा तुम्ही प्रथमच भेटाणार्या माणसांशीही बोलू शकला असाल तर
पूर्वपरिचयाच्या व्यक्तीशी बोलण्यात अडचण यावयास नको.
कुणी छान तयार होउन आले असेल किंवा इतक्या वर्षानंतरही स्वतःस मेंटेन केले असेल तर तुमच्या मैत्रीतील
खुलेपणाच्या इंडेक्सनुसार त्याची/तिची मोकळेपणाने त्याचेही कॉम्प्लिमेंट्स द्यावेत.
पूर्वीचा स्पर्धक असेल तर त्याच्याशी स्पर्धेच्या आथवणी काढता येतात.
पुन्हा शर्यत लावायचे च्यालेंज करता येते.
स्पर्धक म्हणजे खरोखरिच एखाद्या स्पर्धेत असलेली व्यक्ती नव्हे तर वर्गातील प्रथम क्रमांक येण्यापासून ते
प्रेम त्रिकोणातील तुमचा स्पर्धक असे सगळे त्यात आले.
लोकं पुरेसे समजदार मॅच्युअर असले, तर स्पर्धाकाळातील विखार हा सुप्त कौतुक/आकर्षणात बदललेला असतो.
अर्थात हे सर्व पब्लिकला ठाउक असेलच, उगीच टंकतो आहे असे वाटते.
कसली गरमी होतिये नै / यंदा
कसली गरमी होतिये नै / यंदा फारशी गरमी जाणवतच नाही/
...
मी असले प्रकार शक्यतो अॅम्वेवाल्यांना१ टाळत नसेन इतक्या कटाक्षाने टाळतो.
बाकी, अचानक भेटल्यास फुटपाथ बदलावा की टाळक्यात धोंडा घालावा, याबद्दलच मनात जेथे द्वंद्व, तेथे ठरवून कोण कशाला झक मारायला भेटेल?
------------------------------------------------------------------------------------------------
१ ही मंडळी भेटलेली नाहीत बर्याच वर्षांत. टच वुड.
...
किंवा, चुकून असल्या ठिकाणी सापडल्यास, समोर जे काही प्यायला ठेवलेले असेल, ते शांतपणे पीत राहावे, जे हादडावयास ठेवलेले असेल, ते तोंडात टाकत राहावे, जर कोणी बडबडावयास आलेच, तर मेंदू स्विचऑफ करून ते निमूटपणे ऐकावे नि अन्यथा आपण आपल्याच धुंदीत एकटे राहावे, असे धोरण ठेवावे म्हणतो. सुदैवाने अशी वेळ फारशी येत नाही म्हणा. रादर, येऊ देत नाही शक्य तोवर.
+१
मी हल्ली असे भेटणे सोडून दिले आहे. काय बोलायचे ते कळतच नाही. त्यातही एखाद्या व्यक्तीशी तार जुळते पण त्या व्यक्तीचा शाळकरी वयातील/कॉलेजातील/रुममेट असतानाचा त्याचा/तिचा फारसा काही संबंध नसतो असे निरीक्षण आहे.
मैत्री वगैरे टिकली तर टिकु देतो, सुटली तर सोडून देतो.
मात्र बालपणापासूनच्या टिकलेल्या मित्र-मैत्रीणींच्या बाबत मात्र असूयायुक्त आदर आहे.
डिपोर्टेशन
समजा श्री क्ष, एक भारतीय, टूरीस्ट, इ व्हिसा घेऊन अमेरिका (कॅनडा, इ इ) देशात गेले. तिथे त्यांनी आपली सारी कागदपत्रे नष्ट केली. कोणी विचारले तर आपण अमेरिकनच आहोत असे सांगू लागले. इथे अमेरिका त्यांना भारतीय सिद्ध करून परत पाठवायचा प्रयत्न करेल. पण त्यांनी स्वतः नकार दिला, चाळे केले, अगदी काही आठवतच नाही, इ इ थापेबाजी केली तर काय होईल?
गृहितक - भारतातले सगळे त्यांना ओळख द्यायची नाही, इ ठरवून आहेत.
डिटेन्शन सेंटर फॉर इलिगल इमिग्रंट्स
व्हिसा घेऊन अमेरिका (कॅनडा, इ इ) देशात गेले.
हे असल्यास सिद्ध करणे फार अवघड नाही, मूळ प्रॉब्लेम हा लपून-छपून प्रवेश करणार्यांचा आहे. हा मुद्दा फार क्लिष्ट आहे, तरी ह्यावर एक 'डिटेन्शन सेंटर' ह्या नावाचे विकीपान उपलब्ध आहे
हो.
काहीसं असंच. मला तर उलट सौंशय आहे या लोकांनी बीजेपीला भरभरून मते दिली असावीत. एकदा का मोदी निवडून आला की त्यांना त्यावर नव्या जोमाने टीका करायला अजून सोपे होईल अन एकूणच रॉयस्टाईल खळबळ१ उडवून दिल्याने त्यांचा धंदा बरा चालेल इ.इ. अटकळी असाव्यात.
१उदा. "मोदीला पंप्र केलेच कुणी? भारतीय लोकशाही धोक्यात" इ.इ.इ.
अप्पर सर्किट
शेयर मार्केट मध्ये तूफान पडझड किम्वा एकाएकी उसळी सुरु झाली तर काहीवेळासाठी सर्किट लावतात.
व्यवहार थांबवतात.
आज अजो विरुद्ध इतर अशी तूफान म्याच "गांधी" ह्या विषयावर रंगली अस्ताना अचानक अर्धातास वगैरे ऐसी डाउन होतं.
ऐसी व्यवस्थापनानं "इतक्या प्रतिसादांचा भडिमार सर्व्हरला किंवा वाचकांना सहन होणार नाही" असा
विचार करुन अप्पर सर्किट लावलं काय ? ;)
त्याचा स्फोट होऊन त्या
त्याचा स्फोट होऊन त्या अंड्याचे ऑम्लेट मायक्रोवेव्हच्या आतल्या भिंतींवर जाऊन बसते असे वाटते.