.
.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
मार्मिक
निव्वळ भ्रष्टाचार संपला की माणसे एका क्षणात सज्जन होऊन बंधुभावाने काम करत नसतात. भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी उभी केलेली यंत्रणा माणसाची प्रवृत्ती बदलत नसतेच. ती बदलावी यासाठी त्याला समांतर अशी - समाजवाद्यांनी पूर्वी राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून उभारली होती तशी - प्रबोधनाची यंत्रणा उभारावी लागते. केजरीवाल आणि कंपनीची वाटचाल पाहता त्यांना याची जाणीव असावी हे म्हणणे फारच धाडसाचे ठरेल.
हा कळीचा मुद्दा आहे असं मला वाटतं, ह्यावर थोडं अधिक आलं असतं तर आवडलं असतं.
पुढील भागांबद्दल उत्सुकता आहे.
लेखमाला आवडली. पुढील भागांबद्दल उत्सुकता आहे.
'आप'ने खरंतर वैचारिक वर्गाला आपलेसे करायला हवे होते. पण काही धोरणांमुळे अन विचारसरणीमुळे (लोकपाल) त्या वर्गातील अनेक जण आपला परके झाले. आपचे समर्थक हे ज्या वर्गातील होते त्या वर्गातील लोकांचाच विरोध असताना सामान्यांना गोंधळ होणे फारसे आश्चर्यकारक नाही. लोकांना काहीच माहीती नसलेल्या उमेदवारांना देशभरातून निवडून आणणे जवळजवळ अशक्य होते. नोन डेव्हील इज बेटर दॅन अननोन डेव्हील. बहुतेकवेळी देशव्यापी निवडणूकांचे निकाल प्रादेशिक निकांलापेक्षा वेगळे असतात. ज्यांच्या वैचारिक भुमिकेबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका आहेत, ज्यांच्या उमेदवारांची ओळख जनतेला नाही, ज्यांच्या राजकारणातील अनुभवाची खात्री जनतेला नाही असे लोक निवडून येणे करामतीपेक्षा कमी झाले नसते.
बहुतेकवेळी देशव्यापी
बहुतेकवेळी देशव्यापी निवडणूकांचे निकाल प्रादेशिक निकांलापेक्षा वेगळे असतात.
निदान महाराष्ट्रात तरी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये 'आप' दिसली असती, तर बाकी कुणाला पडो न पडो, 'आप'ला तरी खूपच फरक पडला असता. विचार करकरूनही या निवडणुकांमध्ये भाग न घेण्याचं काहीच कारण कळलं नाही. त्याबद्दल कुठे काही जाहीर भूमिकाही दिसली नाही. आता ती मुळातच जाहीर केली नव्हती, की माध्यमांतून त्याची बातमी सोईस्कररीत्या दाबली, हे कळायला मार्ग नाही.
असेलही
त्यापेक्षा पक्षांतर्गत कलह हे मोठे कारण वाटते.
झटपट यशाच्या अपेक्षेने बरेच मुंगळे चिकटले होते. केजरीवाल स्वतःही बरेच जास्त फुगल्यासारखे वाटत होते.
योगेंद्र यादव, मेधाताई वा इतरही राज्यातील काही डावे/समाजवाद्यांचा चळवळिंशी जोडल्या गेलेल्या कार्यकर्त्यांचा एक गट आणि केजरीवाल-सिसोदिया-दमानिया आदी काहिशा कर्कश्श, आधुनिक शिक्षण वगैरे घेतलेल्यांचा नी तांत्रिक कुशल व्यक्तींचा नी त्याचबरोबर पक्षातील महत्त्वाची स्थाने हातात असलेल्यांचा दुसरा गट झाले आहेत असे वाटते - पुन्हा वाटते खात्रीशीर बातमी नाही (किंबहुना आआपबद्दल बातम्याच वाचनात येत नाहित फारशा)
लोकपाल आंदोलनाला आलेले बरेच कार्यकर्ते अपयशानंतर इतर पक्षांकडे वळाले आहेत. चळवळींशी संबंधित समाजवादाकडे झुकलेला गट फारसा इन्व्हॉल्व्ह नाही (त्याला होऊ दिले जात नाही - कल्पना नाही) त्यामुळे कार्यकर्त्यांची व उमेदवारांची कमतरता भारत असेलही पण तो परिणाम झाला, कारण नाही ;)
=======
महाराष्ट्रात आआपला काही भागांत विधानसभेत लोकसभेपेक्षा बरा रिस्पॉन्स मिळाला असे वाटते.
हं, पैशाची अडचण हे
हं, पैशाची अडचण हे पटण्यासारखं कारण आहे. पण एकदा पक्ष सुरू केला म्हटल्यावर अमुक अमुक निवडणुका म्हणजे काय 'का गोड धक्का दिलात हो!' नसणार. त्या पूर्वनियोजित आणि सर्वज्ञातच असतात. त्याची तरतूद करणं पक्षबांधणीत अध्याहृत नाही का?
@ऋ - +१ विधानसभेत जास्त प्रतिसाद मिळाला असता 'आप'ला, असं मलाही वाटतं.
द स्पिरिट इज विलिंग हो, बट...
>> पण एकदा पक्ष सुरू केला म्हटल्यावर अमुक अमुक निवडणुका म्हणजे काय 'का गोड धक्का दिलात हो!' नसणार. त्या पूर्वनियोजित आणि सर्वज्ञातच असतात. त्याची तरतूद करणं पक्षबांधणीत अध्याहृत नाही का?
तरतूद करायची पक्षाची खूप इच्छा असेल हो; (लोकसभा निवडणुकांमधला बट्ट्याबोळ पाहता) पैसे मिळायला तर हवेत? ;-)
म्हणजे? धंदा उघडून बसणारे
म्हणजे?
धंदा उघडून बसणारे लोक जसे 'येत्या हंगामात १०० रुपये फायदा झाला, तर तो पुढल्या हंगामात धंद्यात घालू आणि नवं दुकान काढू' असं ठरवतात, तसं असतं का पक्षांचं? एक निवडणूक बरी गेली, तर पुढच्या निवडणुकीला लागेल तेवढा पैका जमेल, असं? निदान सुरुवातीची काही वर्षं तरी लोकाधार मिळवण्यात जाणार, निवडणुकांमध्ये बट्ट्याबोळापेक्षा फार जास्त काही हाती लागणार नाही, हे गृहितक नाही का?
खवचटपणे नाही, सरळ अज्ञानापोटीच विचारतेय.
सत्ता असणार्या पक्षाला अधिक
सत्ता असणार्या पक्षाला अधिक देणग्या मिळतात, सत्ता मिळूनही ती सोडणार्या पक्षाला पैसा देणार्यांच्या तुलनेत तर नक्कीच!
मनसेने सुरूवातीला सगळ्या जागा लढवल्या नाहीत याचे कारणही तेच होते. पुढे काही सत्तास्थाने हाती आल्यावर पक्ष "फोफावला"
अर्थात, हे आपण राजकीय पक्षाबद्दल बोलतोय चॅरीटी वा सामाजिक संस्थेविषयी नाही. आआप शेवटपर्यंत (म्हणजे तो झालाय असा दावा नाही ;) ) गोंधळलेलीच राहिली
पर्याय कोणता?
>> निदान सुरुवातीची काही वर्षं तरी लोकाधार मिळवण्यात जाणार, निवडणुकांमध्ये बट्ट्याबोळापेक्षा फार जास्त काही हाती लागणार नाही, हे गृहितक नाही का?
सुरुवातीला जनाधार जरी मिळाला नाही, तरी निवडणूक लढवायला कोट्यवधींचा (काळा + पांढरा) निधी लागतो. तो कुणी तरी द्यायला हवा. उद्योगपती, एनाराय, संघटना (रा.स्व. संघ ते गल्लोगल्लीची मनसेची ऑफिसं ते सिनेकलाकार संघटना असं काय वाट्टेल ते) अशा लोकांकडून नाही तर जनताजनार्दनाकडून तो मिळवावाच लागतो. त्याचं सोंग आणता येत नाही. दिल्ली विधानसभा आणि लोकसभेसाठी काही प्रमाणात तो मिळवण्यात 'आप' यशस्वी झाला, पण महाराष्ट्रासाठी तो मिळवून देईल असं कुणी पक्षात दिसत नाही, आणि जनताजनार्दनदेखील आता त्या मूडमध्ये दिसत नाही. त्यामुळे त्यांच्यापाशी काही पर्याय आहे असं वाटत नाही.
घाई
केजारीवालला घाई नडली असे माझे मत आहे. बेडकी फुगली तसे झाले. आधीच फक्त दिल्लीत लक्ष केंद्रित करून चांगले काम केले असते आणि मोदीला संसदेत सळोकापळो केले असते तर बरेच लोक पैसे लावायला तयार झाले असते. पण केजारीवालला इतका वेळ वाट पाहायची इच्छा नव्हती असे वाटते. दरवेळी व्हिक्टम आहोत म्हणून निवडून येणे कठीण होते कारण त्याचा सगळा सपोर्टिंग वर्ग मध्यमवर्ग होता. तळागाळातील लोक जास्त वेळ वाट पाहतात बहुदा.
तळागाळातील लोक जास्त वेळ वाट
तळागाळातील लोक जास्त वेळ वाट पाहतात बहुदा.
shortage असल्याकारणाने तळागाळातले लोक ह्या अशा रांगा लावून ताटकळत वाट पाहत असतात. त्यामुळे वाट पाहण्याचे कौशल्य निर्माण होते. व तसेही इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हे वेस्टर्न भोगवादी मानसिकतेने ओतप्रोत भरलेले असल्याने त्याच्या विरुद्ध बाजूचे असलेले "वाट पाहणे" हे अध्यात्मिक रित्या उच्च मानले गेलेले आहेच.
असहमत
सारे मुद्दे 'समाजवादी कार्यकर्त्यांनी आप निवडला, परंतु त्या आपच्या मर्यादा ध्यानात घेतल्या नाहीत. त्या मी - जशा मला दिसल्या तशा - इथे मांडतो आहे. यातून आप = समाजवादी असे समीकरण कुठे दिसले हे मला तरी समजले नाही. समाजवाद्यांनी पूर्वी राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून उभारली होती तशी - प्रबोधनाची यंत्रणा उभारावी लागते. केजरीवाल आणि कंपनीची वाटचाल पाहता त्यांना याची जाणीव असावी हे म्हणणे फारच धाडसाचे ठरेल.>> यासारखी विधाने आप नि समाजवादी यांना स्वतंत्र गट म्हणून पाहतो आहे हे स्पष्ट करतात असे मला वाटते. किंबहुना आप हा मुळातच समाजवादी नाही हेच मी ठसवू पाहतोय. लेख पुन्हा वाचावा ही विनंती.
मुद्दा वाजवी आहे.
मुद्दा वाजवी आहे. परंतु लेखाचा हेतू 'नवे संदर्भ' तपासण्याचा असल्याने, दिशा राजकारणाची असल्याने आणि समाजवादी कार्यकर्त्यांनी 'आप' हा नवा राजकीय अवतार स्वीकारण्याचा प्रयत्न केला असल्याने त्या प्रयत्नाचे मूल्यमापन करताना आप'चे मूल्यमापन अपरिहार्य होऊन बसते.
>>सत्तेच्या माध्यमातून
>>सत्तेच्या माध्यमातून पक्षबांधणीची संधी साधायची सोडून केवळ जनक्षोभावर केंद्रात सत्ता मिळवण्याचा प्रयत्न फसणार हे सांगायला कोणत्याही राजकीय पंडिताची गरज नव्हतीच.
पक्षबांधणीच व्यवस्थित झाली नव्हती. लोक म्हणतच होते की आपमधे सगळेच स्वतःला शहाणे समजणारे. मग हे एकत्र कसे नांदणार? संघटनात्मक शिस्त ही बौद्धीक अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या आड येते. संघटनेत कुणीतरी नेता लागतो व काही अनुयायी/कार्यकर्ते लागतात.पण इथे सगळेच नेते. त्यामुळे आप हे अवघड प्रकरणच होतं. तत्वनिष्ठ राजकारण करुन सत्तेवर येता येईल हा आशावाद खरच भाबडा वाटत होता. अगोदर समाजकारण करा. मग पक्षबांधणीत काही वर्ष जाउ द्या. मग राजकारणात सत्तेच्या दिशेने वाटचाल करा.
अन्न, पाणी, वस्त्र, रोजगार,
अन्न, पाणी, वस्त्र, रोजगार, निवारा, वैद्यकीय सेवा, कार्यक्षम दळवणवळण व्यवस्था इ. अनेक महत्त्वाचे प्रश्न अजूनही प्रलंबित असताना एका भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच भर देणे एकांगीच होते. 'आप'चे समर्थक दावा करतील की मुळात भ्रष्टाचार दूर झाला की हे सारे आपोआप होईल. हा भाबडा आशावाद व्यवस्थेची पुरेशी माहिती नसल्याचे निदर्शक तर आहेच पण...
प्रथम, अधोरेखित वाक्य हेच मुळात तितकेसे पटत नाही.
१) अन्न, पाणी, वस्त्र, रोजगार, निवारा, वैद्यकीय सेवा, कार्यक्षम दळवणवळण व्यवस्था इ. - या साठी - अनेक नोडल एजन्सीज केंद्र व राज्य पातळीवर काम करीत आहेत. व ते सुद्धा गेली अनेक वर्षे/दशके. त्या परिणामकारक नाहीत हे माहीती आहेच. व सगळ्यांनाच माहीती आहे.
२) पण भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी जी यंत्रणा उभी केलेली आहे ती (सी बी आय, व्हिजिलन्स कमिशन, अँटी करप्शन ब्युरो) अगदीच तुटपुंजी व राजकारणाने दूषित आहे. किंवा कदाचित स्वतःच भ्रष्ट आहे.
(व म्हणून लोकपाल ची गरज आहेच असे नाही. असलेल्या यंत्रणा बळकट केल्या तर काम जास्त ठीक होऊ शकते - असा ही मुद्दा मांडला जाऊ शक्तो.)
३) टायमिंग. भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे. जोरात वाढत आहे की नाही याबद्दल वाद असू शकतात. पण वाढत आहे याबद्दल वाद नाही. अनेक राज्यशास्त्र्यांनी व अर्थशास्त्र्यांनी हे दाखवून दिलेले आहे की - Institutions of Governance and demand for good governance grows as incomes grow and economy grows. अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे यश यामुळे सुद्धा आहे. (संदर्भ - अविनाश दिक्षितांच्या "Lawlessness and Economics" या पुस्तकाचा गोषवारा. पृष्ठ क्र. ९ वर अनेक संदर्भ आहेत.. हे पुस्तक अर्थशास्त्रावरील जरूर आहे पण त्यात भ्रष्टाचाराविरोधी यंत्रणा - गव्हरनन्स व तिचा वृद्धी शी असलेला संबंध याबद्दल केलेल्या संशोधनाचे दाखले आहेत. व पृ. ९ वर अनेक असे दाखले आहेत.)
४) भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच भर देणे हे जरी एकांगी असले तरी तेच जास्त सुयोग्य आहे - असा बळकट मुद्दा मांडला जाऊ शकतो. फोकस्ड अप्रोच. जी चळवळ म्हणून उभी राहीलेली आहे व जिला राजकिय पक्ष म्हणून लोकमान्यता अजून मिळायची आहे तिने एकाच वेळी अनेकविध मुद्द्यांवर भर देणे हे अव्यवहार्य आहे. (भाजपा ने तर राममंदिरासारख्या विकास, व गव्हरनन्स शी कसलाही संबंध नसलेल्या पण एकाच मुद्द्यावर भर दिला होता. आज बघा काय स्थिती आहे !!!)
५) प्रबोधनाचा मुद्दा सुयोग्य आहे की नाही ते खाली मांडतो आहेच. व आप ने प्रबोधनाचा मुद्दा नजरअंदाज केलेला असेलही. पण प्रबोधन सुरु करण्यापूर्वी First Iteration म्हणून नोडल एजन्सी ची मागणी करणे व ती पदरात पाडून घेणे - की जेणेकरून कार्यकर्त्यांचा हुरुप वाढेल व पुढील कार्यक्रमांना बल मिळेल - हे जास्त व्यवहार्य वाटते.
-----
भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी उभी केलेली यंत्रणा माणसाची प्रवृत्ती बदलत नसतेच. ती बदलावी यासाठी त्याला समांतर अशी - समाजवाद्यांनी पूर्वी राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून उभारली होती तशी - प्रबोधनाची यंत्रणा उभारावी लागते.
१) भ्रष्टाचार निर्मूलन यंत्रणा + प्रबोधन यंत्रणा अशा दोन्ही समांतर असल्यास भ्रष्टाचार कमी होईल असे म्हणणे भाबडेपणाचे का व कसे नाही ?
२) भारतातल्या ज्या राज्यात Governmental and economic activity खूप आहे पण भ्रष्टाचार खूप कमी आहे तिथे तो कमी का आहे ? त्यामागे (भ्रष्टाचार विरोधी) प्रबोधन हे कारण आहे का ?
-
खालील प्रश्न केवळ पि़ंका आहेत -
ज्या देशांत भ्रष्टाचार कमी आहे त्या देशांत (भ्रष्टाचार विरोधी) प्रबोधनाच्या चळवळी व यंत्रणा आहेत का ? कितपत प्रभावी आहेत ?
ज्या देशात (say २० वर्षांपूर्वी) खूप भ्रष्टाचार होता व आता कमी झाला आहे तिथे (भ्रष्टाचार विरोधी) प्रबोधनाची काय अवस्था आहे ?