Skip to main content

काही प्रश्न काही उत्तरे

दाऊदच्या व्याह्याला स्वयंपाकघरात नेऊन आग्रहाने भरवत होता, मुडदे पाडण्यासाठी आणलेली शस्रे सांभाळणारा गद्दार संजय दत्त तुम्हाला माफ करण्यालायक वाटत होता तेव्हा तुमचा हा हंगामी हिंदुत्ववाद कुठे गेला होता?

मायकेल जँक्सनला नाचवून रोजगारनिर्मिती केली ती फक्त स्वतःसाठी. स्वतःची मुलं व्यवस्थितरित्या इंग्लिश मिडीयम मध्ये शिकवायची, उठसुट परदेशात मनसोक्त सुट्या घालवायच्या आणि ईकडे मराठी आणि महाराष्ट्राच्या नावाने गळा काढून मतांचा जोगवा मागायचा हा दांभिकपणा मतदारांच्या लक्षात येत नसेल का?

कुणालाही अफजलखान म्हणून टाकले की लोक आपल्याला आपोआपच शिवाजी महाराज समजतील हा तुमचा भाबडा आत्मविश्वास आता बाजुला ठेवा,

आणि इतिहासाचे पुस्तक पुन्हा एकदा उघडून नीट वाचा, अफजलखान दिल्लीहून नव्हे, तर दक्षिणेतून महाराष्ट्रात आला होता.

आपल्याकडे दिवाळीत फटाके, गणेशोत्सवात गणपती,संक्रांतीला पतंग असे सिझनल धंदे करून पोट भरणारे असतात तसे निवडणुका आल्या की तुम्ही मराठीचे प्रेम, हिंदुत्व, आमची मुंबई असा हमखास खपणारा माल विकायला काढता. सिझन संपला की आरामच आराम.

तुमचे शिवप्रेम खरे असते तर त्या घोसाळकरला तिकीटदेण्याऐवजी त्याचा चौकडा केला असता, आणि ज्या भुजबळांचा गळा आवळायला निघाला होता, त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करणारे तुमचे जे नाशिकचे शिलेदार आहेत त्यांना तुम्ही बाहेरचा रस्ता दाखवला असता.

अर्थात चुक तुमची नाही. तुमचे ९९ टक्के आयुष्य मुंबईच्या आतच गेले आहे त्यामुळेच तुम्ही भाजपला "दिल्ली तुम सम्हालो, महाराष्ट्रका क्या करना है वो हम देखते है" अशी एरिया वाटून घेण्याची हास्यास्पद आँफर देता आहात. तुम्हाला अरुण गवळी आणि नरेंद्र मोदी यांच्यात काहीच फरक दिसत नाही का?

आणि हिंदुत्वाचे म्हणाल तर हिंदू समाज हा आसेतुहिमाचल पसरलेला आहे आणि या हिंदुबांधवांना गुजराथी, बिहारी, मद्रासी, भैय्ये असे वेगवेगळ्या गटात विभागुन हिणवत नाही कारण हिंदुत्व आणि हिंदु संघटन हा पोट भरण्याचा धंदा नसून एक अखंड सुरू असलेले व्रत आहे.

वामा१००-वाचनमा… Wed, 08/10/2014 - 19:18

बाणेदार वाटला हा लेख मला. राजकारण फॉलो करत नसल्याने १००% उमगला नाही पण लेखाचा ऑरा कळला अन तो फार बाणेदार वाटला.

अतिशहाणा Wed, 08/10/2014 - 19:37

हिंदुबांधवांना गुजराथी, बिहारी, मद्रासी, भैय्ये असे वेगवेगळ्या गटात विभागुन हिणवत नाही

हिंदुबांधवांना मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख असे विभागले तर चालते काय?

नितिन थत्ते Wed, 08/10/2014 - 23:06

>>आणि इतिहासाचे पुस्तक पुन्हा एकदा उघडून नीट वाचा

हा सल्ला म्हणजे अगदी म्हणजे अगदीच रोचक आहे. नै म्हणजे इतिहास उल्टापाल्टा करणार्‍यांना हल्ली अच्छे दिन आलेत म्हणे.

अनुप ढेरे Thu, 09/10/2014 - 07:18

In reply to by नितिन थत्ते

ब्रिगेडी लोकांना तर गेल्या ८-१० वर्षापासून अच्छे दीन आहेत थत्ते चाचा. हल्ली नाही. :)

नितिन थत्ते Thu, 09/10/2014 - 08:04

In reply to by अनुप ढेरे

हल्ली म्हणजे बराच काळ.

ब्रिगेडीच नव्हे तर पु ना ओकांचे दिनसुद्धा अच्छेच होते.

अर्थात अगदी अलिकडेपर्यंत अफझलखान दिल्लीहून आला म्हणणारे आणि तक्षशीला बिहारमध्ये होती असं म्हणणारे एकत्र होते हेही रोचक.