हेल्मेटसक्ती
अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.
का?
पुण्यातल्याच लोकांना हेल्मेट घालण्याचे वावडे का आहे हा प्रश्न मला नेहमी पडतो.
देशातल्या बहुतेक शहरांत हेल्मेटसक्ती लागू आहे आणि तिथे असा ओरडा होत नाही असे दिसते.
मागीलवेळी सक्ती लागू करणार होते तेव्हा विलासराव देशमुखांच्या मुलाची हेल्मेटची फॅक्टरी आहे म्हणून हेल्मेटची सक्ती करण्यात येत आहे असा आरोप ऐकला होता. आता विलासराव नाहीत, काँग्रेसचे सरकार नाही. आता काय आरोप करणार ते ठाऊक नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मागीलवेळी सक्ती लागू करणार
मागीलवेळी सक्ती लागू करणार होते तेव्हा विलासराव देशमुखांच्या मुलाची हेल्मेटची फॅक्टरी आहे म्हणून हेल्मेटची सक्ती करण्यात येत आहे असा आरोप ऐकला होता. आता विलासराव नाहीत, काँग्रेसचे सरकार नाही. आता काय आरोप करणार ते ठाऊक नाही.
सॉल्लिड आर्ग्युमेंट.
हे च ते आर्ग्युमेंट
मुद्दा हेल्मेट घालण्याच्या वावडे नसून हेल्मेटसक्तीबाबत आहे. नियमानुसार हेल्मेट घातले पाहिजे का? तर 'होय'. वाह्तुक नियमांच्या अंमलबजावणीच्या प्राधान्यक्रमाचे काय?
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
पण तुम्ही अ ची अंमलबजावणी करत
पण तुम्ही अ ची अंमलबजावणी करत नाही म्हणून ब ची पण करायची नाही हे आर्ग्युमेंट योग्य नाही. त्या ऐवजी अ च्याही अंमलबजावणीचा आग्रह धरा.
मी अनेक वर्षे हेल्मेट वापरले. जो काही डिसकम्फर्ट वाटतो तो पहिले चार पाच दिवस वाटतो. त्यानंतर डोक्यावर हेल्मेट असल्याचे जाणवतदेखील नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पण तुम्ही अ ची अंमलबजावणी करत
मान्यच आहे. प्राधान्यक्रम काय असावा याबद्दल बोलतो आहे.
अगदी मान्य आहे.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
हेल्मेट घातल्याने सर्व नाही
हेल्मेट घातल्याने सर्व नाही तरी खूप मोठ्या प्रमाणात हेड इंज्युरी टाळता येते.
अशा वेळी समजा सक्ती केली तर काय बिघडलं ? लोकांच्या जिवाची किमान जबाबदारी घेणारा नियम बनवला तर लगेच त्याविरुद्ध ओरडा कशाला?
हेल्मेट बाळगण्याचा त्रास आणि ते डोक्यावर घातल्यावर जाणवणारा उकाडा किंवा डिसकंफर्ट हे मुद्देच मुळात या विरोधामागे आहेत.
एक हेल्मेट वर्षानुवर्षे चालते. तो काही दर महिन्याला विकत घेतला जाणारा आयटेम नव्हे. तरीही एका मर्यादेपर्यंत यात हेल्मेट मॅन्युफॅक्चरर लॉबीचा स्वाभाविक इंटरेस्ट असेलच.. पण तो या नियमाबाबत केंद्रस्थानी आणण्याची गरज वाटत नाही.
सक्ती केल्याशिवाय लोकांना स्वहित कळत नाही हा आपल्या देशातला दुर्दैवाचा मुद्दा आहे. आम्ही सिगरेट ओढणार.. आमच्या फुप्फुसाचे काही होऊदे.. आमच्या शरीराची वाट लावण्याचे "स्वातंत्र्य" आम्हाला द्या हा मुख्य मुद्दा करायचा हे महत्वाचं वाटतं.
मुद्दा सक्ती असावी की नसावी यापेक्षा मला जास्त वाईट का वाटतो तर सक्ती नसतानाही आपणहून शहाणपणाने हेल्मेट घालणारे लोक नगण्य असतात. पंतोजीछाप छडी किंवा ब्रिटिशछाप हंटर सिस्टीमनेच भारतातले लोक ऐकतात असं मत कोणी व्यक्त केलं तर आश्चर्य वाटणार नाही. च्यायला अमुक तारखेच्या आत बिल किंवा कर भरणे सक्तीचे आहे म्हणूनतरी शेवटच्या तारखेला मैलभर रांगा लावणारा आपला देश आहे. तीही सक्ती काढली तर लोक तारखेआधी स्वतःहून सोडाच पण पुढेही जन्मभरात एक फद्याही भरणार नाहीत खिडकीवर जाऊन.
विचार पटले, पण हे फक्त
विचार पटले, पण हे फक्त भारतातच होतं असं नाही. अमेरिकेत गाडीत सीटबेल्ट लावायची सक्ती झाली तेव्हा अनेक लोकांनी 'छ्यः आपल्याला बुवा सीटबेल्टमुळे भयंकर अनकंफर्टेबल वाटतं' अशी ओरड केली होती. १५ एप्रिलला टॅक्स भरणं सक्तीचं आहे म्हणून रात्री बारा वाजेपर्यंत मोठी पोस्ट ऑफिसेस उघडी असतात. आणि तिथपर्यंत पोचण्यासाठी गाड्यांची प्रचंड रांग लागलेली असते. बाहेर पोस्ट ऑफिसचे कामगार उभे राहून लोकांची फेडरल आणि स्टेट टॅक्सेसची पाकिटं वेगवेगळ्या मोठ्ठाल्या बिन्समध्ये भरत असतात.
होय आणि होय!
होय!
पण काही लोकांच्या ते डोचक्यात शिरत नसल्याने सक्ती करावी लागते आहे. आणि ते बरोबर आहे!
अवांतरः गेल्या पुणेभेटीत याविषयी तक्रार करणारा एक महाभाग भेटला होता...
"च्यायला, ड्रायव्हरबरोबर पॅसेंजरनाही जर हेल्मेटची सक्ती केली तर आमच्या बायकांनी आंबाडे घालायचे तरी कसे?", ही त्याची समस्या....
कानाखाली जाळ काढावासा वाटला!!!!!!
सीटबेल्टविषयी सुद्धा लोकांना
सीटबेल्टविषयी सुद्धा लोकांना काय अडचण वाटते ते कळत नाही. बरेच लोक मुंबईतून टोलनाका ओलांडून ठाण्यात शिरताक्षणी सीटबेल्ट सोडतात. तर अनेक लोक सीटबेल्ट योग्य रीतीने न लावता पोलीसाला तो लावल्यासारखा वाटेल अशा रीतीने अंगावर सोडून ठेवतात.
विमानातसुद्धा विमान लॅण्ड झाल्याझाल्या बेल्ट काढण्याची (आणि मोबाइल चालू करण्याची) घाई असते लोकांना.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नियमांविरुद्ध बंड करण्याची
नियमांविरुद्ध बंड करण्याची मानवी प्रवृत्ती याला कारणीभूत असावी असं वाटतं.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
यालाच पुरोगामी म्हणतात का?
यालाच पुरोगामी म्हणतात का?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
पुरोगामी या शब्दाबद्दल
पुरोगामी या शब्दाबद्दल अनेकांना असलेला भयगंड पाहून त्याबद्दल जाहीररीत्या काही बोलणे तूर्तास लोकहितार्थ थांबवले आहे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
भयगंड नाही पण उत्सुकता आहे.
भयगंड नाही पण उत्सुकता आहे. दर वेळेला ऐकू येतं पुरोगामी महाराष्ट्र, पुरोगामी विचारवंत वगैरे वगैरे. एकदा समजू तर दे की हा शिंचा पुरोगामी प्रकार आहे तरी काय?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
होय. नियम तोडून पुढे जाणे
होय.
नियम तोडून पुढे जाणे म्हणजे पुरोगामी अशी व्याख्या ऐकली होती ब्वॉ.
तदुपरि सक्तीशी सहमत आहे. अन्य सर्व मेट्रापलिसांत नीट पाळली जाते तर पुण्यात न पाळायचं वट्ट काही कारण नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
नियमांविरुद्ध बंड करण्याची मानवी प्रवृत्ती
शक्य आहे.
अडाण*टपणा असणे ही देखील तितकीच प्लॉझिबल शक्यता आहे, नाही का?
होय, आहे खरी. पण जोवर
होय, आहे खरी.
पण जोवर दुसर्या कुणाच्या जिवाला धोका पोचत नाही, तोवर सगळ्या सज्ञान व्यक्तींना आपापल्या हौशीनुसार आपापल्या स्वर्गाला जाण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मग ते अडाणचोट का ठरेना.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
असा विकल्प अवश्य असावा.
असा विकल्प अवश्य असावा. (नव्हे तो असतोच. फक्त तो विकल्प सरकारने सरसकट foreclose करू नये.)
सक्तीशी सहमत नाही. सरकारने का
सक्तीशी सहमत नाही. सरकारने का ठरवावं की माझ्यासाठी काय चांगलं आहे ते? उद्या दारू वाईट म्हणून त्यावरही बंदी आणतील. केरळ सरकारनी तीही आणली आहे बहुदा.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
उद्या शंभरातले पंचाण्णव लोक
उद्या शंभरातले पंचाण्णव लोक अल्होहोलिक (जस्ट इमॅजिनरी एक्झांपल) झाले तर तसा कायदा करावा लागेलही आणि पाळूही.
हेल्मेटसक्ती नसेल तर सर्वचजण तसेच उघड्या डोक्याने दुचाकी चालवतात. स्वातंत्र्य या कल्पनेचा अतिरेकही नको. तुमचे कुटुंब, एम्प्लॉयर, कर्जदाते आणि अनेक अन्य लोकांचे तुमच्यावर अवलंबित्व असते. मी माझे काय वाट्टेल ते करीन हे स्वातंत्र्य अतीच आहे.
चला अजून तपशिलात जातो. आज भारतात समजा माझ्या कारसमोर एखादी बाईक कट मारुन आली आणि त्याला माझ्या कारचा धक्का लागून तो फेकला गेला.
अशावेळी जर त्याचे डोके खांबावर / दगडावर आपटून तो मेला तर मी (कारचालक)अटक, तुरुंग, जामीन, लायसेन्स रद्दीकरण, कोर्टबाजी आणि कदाचित सदोष मनुष्यवधाबद्दल शिक्षा अशा चक्रात सापडतो. तो जर किरकोळ जखमी झाला आणि हेल्मेटमुळे त्याचा जीव वाचला तर माझे नंतरचे क्लेश बरेच सौम्य होतात.
एव्हरीथिंग यू डू हॅज टु डू समथिंग विथ अदर्स.
अमेरिकेत विनापरवाना शस्त्रे बाळगण्याचं "स्वातंत्र्य" काही स्टेट्समधे आहे हे आपल्याला माहीत आहेच. तिथले पालक शाळेत मुलांना पाठवताना काळजीत असतात. तिथे आपल्या पोरावर कोणीतरी गन खोलेल की काय म्हणून.
आज अशा केसेस कमी आहेत. केसेसची फ्रीक्वेन्सी एका "क्ष" पर्यंत वाढली तर अमेरिकेलाही झक मारत बंदी आणावी लागेल.
नाही पटते. डायबेटीसच प्रमाण
नाही पटते. डायबेटीसच प्रमाण वाढलं तर सरकारनी व्यायामाची सक्ती करण्यासारखं आहे हे. अपघाती मृत्यूबद्दल बोलायच तर कर्जदाते, विमावाले यांनी ती जोखीम अभ्यासलेली असणं अपेक्षित आहे. आणि चालक आणि त्याच्या कुटुंबियांनाही स्वत:ला ते कळणं अपेक्षित आहे. सक्ती बद्दल माझा आक्षेप हा आहे की ही सक्ती स्वीकारली, उद्या अजून काही आणतील जे मला त्रासदायक असू शकतं. हे थांबणार कधी?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
डायबेटीसच प्रमाण वाढलं तर
सरकार बाजूला ठेवू जरावेळ.
शाळेत युनिफॉर्मसक्ती होती ना ? पाळली ना ? एकाचे कपडे साधे अन दुसर्याचे झकपक, श्रीमंती असे असले तर काय बिघडले. वाटेना काही पोरांना विषमता. मी काय ड्रेस घालावा हे शाळेने का ठरवावे..?
शाळेत पीटीचा पीरियड कंपल्सरी होता ना ? मला पळण्याचे भयंकर क्लेश होतात म्हणून कोणी (अपंग्/आजारी नसलेलं) वर्षभर त्या पीरियडला मैदानाऐवजी वर्गात बसून राहू शकलं ?
अभ्यासाची शाळेत आणि बहुतांशी घरीही सक्ती होती. मार्क नाही पडले तर खूप तोटे. अभ्यास ही त्या वयात बहुसंख्य मुलांसाठी "त्रासदायक" गोष्ट नव्हती?
अॅडल्ट झालं की लगेच सर्वज्ञान आलं आणि म्हणून आता कसली "नियमसिस्टीम"च नको ? ती लगेच सक्ती??
उद्या लष्करात दोन वर्षं सेवा करणं सक्तीचं झालं तर आंदोलन करणार ?
शाळेत युनिफॉर्मसक्ती होती ना
शाळेत असताना सज्ञान नसतो आपण. पालकांचे निर्णय बांधील असतात. पण शाळा निवडणं माझ्या/पालकांच्या हातात असतं. आता काही शाळा मेंदी, मराठी बोलणे वगैरेंवर बंदी आणतात. ज्यांना ते मान्य नाही त्यांना त्या शाळेत न जाण्याचा अधिकार आहे.
हो. म्हणजे मला वैयक्तिक दृष्ट्या आवडेल लष्करी सेवा करायला पण सक्ती नको.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
शाळेत असताना सज्ञान नसतो आपण.
देअर यू आर. जनता (जनरल पब्लिक) ही सज्ञान नसल्याप्रमाणेच वागते तेव्हा हे शाळाछाप फ्रेमवर्क आवश्यक ठरतं. आपण अॅज इन्डिविज्युअल पर्सन पालक - शाळा निवडून देण्यापुरते - आणि आपणच पाल्य.. रोजच्या जीवनात.
मुख्याध्यापक आणि शिक्षक चांगले लाभले, म्हणजेच शाळा चांगली निवडली तर ते आपलं चांगलं नशीब.
नाही माहिती, तुम्ही सांगा
नाही, आम्हाला नाही माहिती. तेंव्हा तुम्ही सांगाल का?
अमेरिकेतल्या कोणत्या राज्यांमध्ये विनापरवाना शस्त्रे बाळगणं हे कायदेशीर आहे?
जरा माहिती द्याल का?
पिडाकाका, तुम्ही उपरोधिकपणे
पिडाकाका, तुम्ही उपरोधिकपणे विचारताय हे सरळ आहे. तरीही:
अमेरिकेत विनापरवाना शस्त्रे सहज विकत घेता येतात असं माझं म्हणणं होतं. रादर, "विनापरवाना शस्त्र" या शब्दात असलेला बेकायदेशीर भावही त्यात नसतो, शस्त्रे घेण्यासाठी तिथे परवाना लागत नाही अशी राज्ये अमेरिकेत आहेत असं म्हणणं चुकीचं आहे असं तुम्ही म्हणत असलात तर प्रश्नच नाही. आम्ही आपले विकीपीडीत. विकिपीडिया = नेहमी चुकीचीच माहिती असं असेल तर विषय संपला.
त्यामुळे "कायदेशीर" "बेकायदेशीर" अशा शब्दांचा जंजाळात न पडता तुमची फर्स्टहँड माहिती मान्यच करतो.
शस्त्रे = तोफा किंवा मशीनगन्स असे नव्हे. ठार मारण्यास पुरेश्या हँडगन्स, छोट्या पिस्तुलांबद्दल ते विधान आहे.
बाकी परवान्याची गरज नसणे आणि "कायदेशीर" या घोळातलं मला काही कळत नाही, मुद्द्यापुरता सँपल खाली देतो. तो चुकीचा असल्यास क्षमस्व. अमेरिकेत गनस्वातंत्र्य नाही आणि त्याचे दुष्परिणाम लोकांना घाबरवत नाहीयेत असं असेल तर आनंदच आहे.
Alabama[edit]
Alaska[edit]
बाकी स्टेट्ससाठी खालील दुवा बघता येईलचः
http://en.wikipedia.org/wiki/Gun_laws_in_the_United_States_by_state
पिडाकाका, तुम्ही उपरोधिकपणे
पिडाकाका, तुम्ही उपरोधिकपणे विचारताय हे सरळ आहे. तरीही:
अमेरिकेत विनापरवाना शस्त्रे सहज विकत घेता येतात असं माझं म्हणणं होतं. रादर, "विनापरवाना शस्त्र" या शब्दात असलेला बेकायदेशीर भावही त्यात नसतो, शस्त्रे घेण्यासाठी तिथे परवाना लागत नाही अशी राज्ये अमेरिकेत आहेत असं म्हणणं चुकीचं आहे असं तुम्ही म्हणत असलात तर प्रश्नच नाही. आम्ही आपले विकीपीडीत. विकिपीडिया = नेहमी चुकीचीच माहिती असं असेल तर विषय संपला.
त्यामुळे "कायदेशीर" "बेकायदेशीर" अशा शब्दांचा जंजाळात न पडता तुमची फर्स्टहँड माहिती मान्यच करतो.
शस्त्रे = तोफा किंवा मशीनगन्स असे नव्हे. ठार मारण्यास पुरेश्या हँडगन्स, छोट्या पिस्तुलांबद्दल ते विधान आहे.
बाकी परवान्याची गरज नसणे आणि "कायदेशीर" या घोळातलं मला काही कळत नाही, मुद्द्यापुरता सँपल खाली देतो. तो चुकीचा असल्यास क्षमस्व. अमेरिकेत गनस्वातंत्र्य नाही आणि त्याचे दुष्परिणाम लोकांना घाबरवत नाहीयेत असं असेल तर आनंदच आहे.
Alabama[edit]
Alaska[edit]
बाकी स्टेट्ससाठी खालील दुवा बघता येईलचः
http://en.wikipedia.org/wiki/Gun_laws_in_the_United_States_by_state
शंका
सायकलस्वारास हेल्मेट घालणे सक्तीचे असावे का?
कारण हिंदुस्थानात सायकलीसुद्धा रस्त्याचा रहदारीचा भाग शेअर करतात / हिंदुस्थानात सायकलींना फूटपाथवरून चालविण्याची वा वेगळ्या लेनची मुभा नसते.
पुन्हा, सायकलस्वारास हेल्मेट घालणे सक्तीचे असावे का? (कट मारणार्या स्वयंचलित दुचाकीस्वाराचे जे होऊ शकते, तेच सायकलस्वाराचेही होऊ शकते.)
फार कशाला, रस्ता क्रॉस करू पाहणार्या पादचार्यास हेल्मेट घालणे सक्तीचे असावे का?
कारण रस्ता क्रॉस करू पाहणारा पादचारीसुद्धा कधीतरी तुमच्या कारच्या धक्क्याने उडवला जाऊ शकतो.
(हेल्मेटसक्तीस विरोध नाही. फक्त, (१) त्याकरिता सादर केलेले लॉजिक पटत नाही / (२) जे काही लॉजिक असेल, त्याला कोठली मर्यादा घालून द्यायची (आणि का), हा प्रश्न पडतो.)
सायकलस्वारासही हेल्मेट (वेगळे
सायकलस्वारासही हेल्मेट (वेगळे हलके मिळते) ते घालण्याची सक्ती हवी.
ती सध्या नाही ही गोष्ट डजन्ट डायल्यूट द नीड.
दुसरा मुद्दा पादचार्यालाही बसू शकणार्या वाहनाच्या धडकेचा.
पादचारी आणि दुचाकीस्वार यात महत्वाचा फरक असा की दुचाकी (सायकल वा बाईक) यांचा वेग पादचार्यांपेक्षा बराच जास्त असतो. चूक दुरुस्त करण्यास मिळणारा वेळ कम वाव हा दोन आदळणीय वस्तूंच्या वेगावर अवलंबून असतो.
म्हणून विमानांमधे हजार फूट = एक फ्लाईट लेव्हल इतके व्हर्टिकल सेपरेशन ठेवतात, आणि बर्याच मैलांचे हॉरिझाँटल सेपरेशन ठेवतात. दोन ट्रकबाबतीत हे अंतर कमी असते. दोन सायकलींमधे आणखीच कमी. इ इ.
विमानात सर्वांनी पॅराशूट लावून बसावे इत्यादि विधानांमधेही मुळात अपघातांची माहितीच नसल्याचं दिसतं. विमान हवेत फुटल्यास ते ज्या उंचीवर असेल तिथे वॅक्यूमने मनुष्य फुटेल, शरीराचा थंडीने बर्फाचा दगड बनेल, तो बाहेर फेकला जाताना विमानाच्या पार्ट्समधे त्याच्या पॅराशूटचे पार्ट अडकतील. विमान डाईव्ह मोडमधे गेलं तर उडी मारण्याची संधी मिळणारच नाही. क्रॅश लँडिंग करुन इव्हॅक्युएट करणं हाच त्यातल्यात्यात वाचण्याचा मार्ग आहे. त्या केसमधे पॅराशूटचं बोजड मूर्ख ओझं प्रवाश्यांना बाहेर काढण्याच्या कामात अडथळा ठरेल. पण पाण्यात पडल्यास तरंगण्यासाठी फ्लोट्स, हवेत असताना केबिन प्रेशर गेले तर ऑक्सिजन मास्क या योजना जास्त शहाणपणाच्या आहेत आणि त्या प्रत्येक सीटला केलेल्या असतात.
पण तात्विक मुद्द्यांना कोण काय करणार?
घरातही पडून डोकं फुटू शकतं. हेल्मेट घालण्याची पोटेन्शियल परिस्थिती ही सारासार विचाराने ठरते. सारासार विचार हाच मुळात सापेक्ष आहे किंवा तत्सम गृहीतके चालू झाली की नुसता तात्विक गाळ उरतो.
असो.
खरंतर जो मत बॉक्सिंगला आहे
खरंतर जो मत बॉक्सिंगला आहे तेच इथेही. हेल्मेट व/वा सीटबेल्ट लावणे वा न लावणे अशी कोणतीही कायदेशीर सक्ती असु नये.
हेल्मेट व/वा सीटबेल्ट न लावण्याने होऊ शकणारे तोट्यांबद्दल शक्य तितकी माहिती लोकांपर्यंत पोचवावी. त्याउप्पर जो तो आपल्या जीवाचा मालक!
मात्र सध्या तशी कायदेशीर सक्ती आहे तर ज्यांना हेल्मेट घालणे अयोग्य वाटते किंवा तशी सक्ती अयोग्य वाटते त्यांनी
१. नियम/कायदे बदलण्यासाठी प्रयत्न करावा
२. तोवर हेल्मेट वगैरे न घालता करता रितसर दंड भरावा किंवा मग सविनय कायदेभंग करून जी काही कायदेशीर सजा होईल ती भोगावी.
जर हे करायचे नसेल तर कायद्याला घाबरून गपचुक हेल्मेट घालावे व अशी चळवळ कोणीतरी सुरू करेल अशी वाट पाहवी.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
वडाची साल पिंपळाला
असहमत. बॉक्सिंगवरचा तो धागा बॉक्सिंगवर बंदी घालावी का अशा अर्थाचा होता.
इथे कोणीही दुचाकी चालवण्यावर बंदी घालायची मागणी करत नाहिये.
फक्त ते वाहन चालवतांना सुरक्षित उपाय म्हणून अॅक्सिडंट होऊन दुचाकीवरून उडाल्यानंतर) कवटी फुटू नये म्हणून हेल्मेट वापरा असं मागणं आहे.
असहमत. बॉक्सिंगवरचा तो धागा
उघड्या डोक्याने दुचाकी चालवण्यावर बंदी घाला अशी मागणी आहे ना?
बॉक्सिंगने डोके/तोंड फुटण्याची शक्यत असते म्हणून बॉक्सिंगवर कायदेशीर बंदी घाला म्हणणे मला गैर वाटते
उघड्या डोक्याने दुचाकी चालवल्याने डोके/तोंड फुटण्याची शक्यत असते म्हणून असे उघड्या डोक्याने दुचाकी चालवण्यावार बंदी घाला हे ही मला गैरच वाटते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
गैर?
यात गैर काय आहे ते समजले नाही. भारतात अधिकांश लोक हे चारचाकीपेक्षा कितितरी जास्त दुचाकी वापरतात. त्या वापरापासून होणार्या संभाव्य इजेवर हेल्मेट हा साधासोपा उपाय आहे. त्याला विरोध करण्यामागची भूमिका समजू शकत नाही.
नको असेल तर राहिलं, जाउंद्या सोडूंद्या...
शेवटी जे ते आपापल्या कर्मानं मरतंय!!!!
त्या वापरापासून होणार्या
हेल्मेटला विरोध नाहिये हो.
मी स्वतः दुचाकीच चालवत नाही पण उपलब्ध असल्यास मागे बसतानाही हेल्मेट वापरतो. तो मुद्दाच नाहिये.
विरोध हेल्मेटला नाहिये त्याच्या कायदेशीर सक्तीला आहे.
आत्ता कसं! हेच तर म्हणतोय!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सीटबेल्ट सक्तीचा करावा. कारण
सीटबेल्ट सक्तीचा करावा. कारण सीट्बेल्ट न लावलेली व्यक्ती जर अन्य (सीटबेल्ट लावलेल्या) व्यक्तीच्या अंगावर कोसळली किंवा अन्य व्यक्तीला तिने ब्लॉक केले तेवढ्या वेळात व गाडीने पेट घेतला तर?
तेव्हा हा प्रश्न फक्त त्या व्यक्तीपुरता मर्यादित नसून, अन्य लोकांचाही जीव धोक्यात येऊ शकतो.
सीटबेल्ट सक्तीचा करावा.
सीटबेल्ट सक्तीचा करावा.
सीटबेल्ट घातल्यावर व्यक्तीस सुरक्षित वाटते. इतके की व्यक्ती गैरवाजवी रिस्क घेऊन थोडे जास्त निष्काळजी वाहन चालवण्यास प्रेरीत होऊ शकते. व ह्याचे धोके आहेत. याबद्द्दल स्टीव्ह लँडबर्ग (रॉचेस्टर विद्यापीठ) यांनी मागे लिहिले होते. ते गणिती कम अर्थशास्त्री आहेत.
वा वा.. धूम्रपान आरोग्यास
वा वा.. धूम्रपान आरोग्यास अपायकारक नसून उपायकारक आहे किंवा अतिजहाल तिखट खाल्ल्याने आतड्यांची शक्ती वाढते छाप संध्यानंदी मूर्ख निष्कर्ष वाटतो.
अरे गणिती प्रोफेसरा.. तत्वतः आणि प्रत्यक्षातही तुझा मुद्दा बरोबर आहे, की संरक्षक उपाय केलेला असला की व्यक्ती काही प्रमाणात अधिक निष्काळजी होऊ शकतो.
पण त्या निष्काळजीपणासहितही जीव वाचवण्याची कपॅसिटी त्या संरक्षक उपायात असते.
अमुक वापरल्याने संरक्षण होत असल्याने मनुष्य काहीसा बेफिकीर होतो अश्या चालीवरचे विरोधी मुद्दे प्रत्येक नियमाबाबतीत काढता येतील.
भारतात रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहन चालवल्याने समोरुन कोणीही येणार नाही अश्या "मानसिक" सुरक्षिततेने (बेफिकीरी?!) मनुष्य जास्त नि:शंकपणे वाहन चालवतो हे खरंच आहे, पण म्हणून त्याचं समोर लक्षच नसतं आणि त्यामुळे अपघात होऊ शकतात, सबब वाहने उजव्या बाजूने किंवा आपल्या "स्वतंत्र" मतानुसार कोणत्याही बाजूने चालवावीत असा नियम बनवावा का?
पण त्या निष्काळजीपणासहितही
पण त्या निष्काळजीपणासहितही जीव वाचवण्याची कपॅसिटी त्या संरक्षक उपायात असते.
त्यांच्या निष्काळजीपणासहित जीव वाचवण्याची क्षमता त्या सीटबेल्ट मधे असेलही. पण तो जीव त्यांचा स्वतःचा वाचवला जातो. त्यांच्या सरप्लस निष्काळजीपणामुळे इतरांचे जीव धोक्यात घातले जात असतील तर ????
उदा. सायकलस्वार व पादचार्यांच्या जिवास धोका उत्पन्न होत असेल तर ?
त्यासोबत स्पीड लिमिट, सिग्नल
त्यासोबत स्पीड लिमिट, सिग्नल इत्यादि नियम (कम सक्ती) असतेच ना? ती गृहीत धरलेलीच आहे.
मी तर म्हणतो की असं असेल तर हानीत तरी आपपरभाव तरी कशाला?
मला दुसर्याला ठार मारायचं स्वातंत्र्य हवं. इतरांना त्रास देण्याचं स्वातंत्र्य हवं. असं म्हणायला काय हरकत आहे? "परस्परसंमती" किंवा "इतरांना त्रास न देता" वगैरे इतके "किमान" संकेत तरी कशाला पाळायचे. स्वातंत्र्य इज अबोव्ह ऑल. मी मला वाटेल त्याला मारायला स्वतंत्र आहे आणि कायदे असतील तर ते शिक्षा देणारे असावेत. मी शिक्षा भोगायला तयार आहे.. अशी मांडणी का नको ?
वयाच्या साठीपर्यंत इतरांना "ठार" न करणार्याच्या आधारकार्ड संलग्न अकाउंटला काहीतरी प्रोत्साहनपर रक्कम टाका म्हणे रिटायरमेंटच्या वेळी.
छान उत्तर दिलत गवि. गब्बरला
छान उत्तर दिलत गवि. गब्बरला कधीकधी गदागदा हलवावसं वाटतं - अरे (इतरत्र वेळी) हुषार मनुष्या तुला कळत कसं नाही? अति स्वातंत्र्याच्या उदो उदो अतिरेकाने किती अनार्की माजेल. का कळत नाही तुला?
अति स्वातंत्र्याच्या उदो उदो
आयला, चक्क अँटीपुरोगामी स्टान्स!!!! शान्तम् पापम्!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मला दुसर्याला ठार मारायचं
शिवाय, चवीपुरती ओरिएंटेशन्स बदलणार्यांप्रमाणे आठवड्यातले ४ दिवस स्वातंत्र्य पाहिजे अन उरलेले दिवस स्वातंत्र्य नको अशी मागणीही केल्यास त्यात चूक ती काय. तेही लिबरल अन हेही??
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
गविंचा मुद्दा उचलून धरणारे संशोधन
गविंचा मुद्दा उचलून धरणारे संशोधन
पेपर जरा जुना आहे. २००१ चा.
पृष्ठ क्र. २४ मधे -
We find, contrary to the prediction of the theory of compensating behavior, that higher seat belt usage does not have any significant effect
on driving behavior.
Our results indicate that, overall, mandatory seat belt laws unambiguously reduce traffic fatalities.
--
याच्या शेवटी त्यांनी वापरलेला डेटा पण अंतर्भूत केलेला आहे.
क्या बात है धन्यु रे. खरच,
क्या बात है धन्यु रे. खरच, ओपन माईंडेड है आप
नाय नाय. मी २ गोष्टी करतोय.
नाय नाय.
मी २ गोष्टी करतोय. एकतर मी किती वस्तुनिष्ठ आहे त्याचे प्रदर्शन करतोय. व दुसरीकडे या संशोधनाचा विरोधक असलेला प्रा. सॅम पेल्ट्झ्मन ("Peltzman effect" फेम) यांचा पेपर (मोफत कॉपी) शोधून तो इथे डकवायचा यत्न करतोय. पेपर सापडला आहे पण त्याची मोफत कॉपी सापडत नाहिये. हा तर त्याहीपेक्षा जुना म्हंजे १९७५ चा आहे.
----
हेम्लेट घालणे हे तुम्हास रिस्की असू शकते.
----
सीटबेल्ट मधील छुप्या रिस्क्स.
----
STEVEN D. LEVITT (फ्रीकॉनॉमिक्स चे एक लेखक) argues that the "Peltzman effect" is theoretically possible but trivial, empirically
साईड व्हिबिलिटी
माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की हेल्मेटमुळे साईड व्हिजिबिलिटी मेजर कमी होते. आणि पुण्यातलं ट्रॅफिक एवढं खराब आहे की चहुबाजूंनी वाहनं अंगावर येत असतात. त्यामुळे हेल्मेट घातल्यास उलट अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. हा अनुभव बर्याचदा पुण्यातल्या पेठांमधून गाडी चालवून घेतल्याने मी स्वत:हून हेल्मेट घालणे बंद केलेले आहे. अर्थात दुचाकीवर लांब/मोठ्या रस्त्यांवर जायचे असल्यास हेल्मेट नक्की वापरतो.
>> आणि पुण्यातलं ट्रॅफिक एवढं
>> आणि पुण्यातलं ट्रॅफिक एवढं खराब आहे की चहुबाजूंनी वाहनं अंगावर येत असतात.
मग याच्या विरोधात आंदोलनं करा की....
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
माझा वैयक्तिक अनुभव असा आहे
हे म्हणणे अत्यंत वैध आक्षेपांपैकी एक आहे. हेल्मेट घातल्याने विपरीत परिणाम होण्याची शक्यता दाखवणे / सिद्ध करणे, त्यासाठी वेगळ्या डिझाईनची हेम्लेट वापरणे किमान डोक्याचा वरचा भाग कव्हर करून पूर्ण वायजर असलेले हेल्मेट वापरणे हे मार्ग योग्य आहेत.
माझ्या जिवाचे मी बघीन.. माझ्यावर सक्ती नको हा अप्रोच बरेचजण घेतात तो मात्र चुकीचा आहे.
कायद्याच्या अंमलबाजवणीमुळे,
कायद्याच्या अंमलबाजवणीमुळे, (रादर द लॅक ऑफ़ इट), ती केलीच तर त्यातून निर्माण होणारा भ्रष्टाचार हा खरा कळीचा मुद्दा आहे. उद्या जर रस्त्यावरचे ट्रॅफ़िक पोलिस सुधारले, पैसे खाणे बंद झालं / भयानक कमीझालं तर, आज विरोध करणारे बरेच लोक स्वत:हून हौसेने कायदा पाळतील. मात्र आज कोणताही प्राधान्यक्रमाच्या अंगाने विचारही न करता तातडीने हेल्मेट सक्ती केली जाते त्यामागे सगळे छान छान उद्देशच असतील असे मला तरी म्हणवत नाही.
मूळधाग्यातही हा भाव आहेच.
(हेल्मेट घालणे सक्तीचे असावे असे माझेही मात आहे. त्याला विरोध नाहीच.)
बिपिन कार्यकर्ते
सिग्नल तोडला की पकडायच व दंड
सिग्नल तोडला की पकडायच व दंड वसूल करायचा एवढीच मोहिम जरी हाती घेतली तरी वाहतुक सुरक्षा वाढेल व सरकारचा महसूल ही वाढेल.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
दंड वसूल करण्याबरोबर हवा
दंड वसूल करण्याबरोबर हवा सोडून द्यायची. हवा सोडल्याने जी काही चिडचिड होईल ती किमान सहा महीने लक्षात राहील.
सक्ती असावी
केवळ हेल्मेटमुळे अस्मादिकांसह डोके वाचलेले २ मित्र माहीत आहेत. हेल्मेटसक्ती असावी असे वाटते. हेल्मेटमुळे धुळीच्या प्रदूषणापासूनही माफक संरक्षण मिळते. हाही एक फायदा आहे.हेल्मेटचा मुख्य तोटा विजिबिलिटी कमी होते. विशेषतः हेल्मेट जसे जुने होत जाते तसे त्याच्या काचेवर चरे पडत जातात. रात्री समोरच्या गाड्यांच्या हेडलाईटमुळे प्रचंड कन्फ्युजन होते. शिवाय आपल्याकडे लोकांना 'डिप्पर-अप्पर' मारायची फार हौस असते. एकदा रात्री हेल्मेट घालून गाडी चालवताना समोरच्या गाडीच्या प्रकाशामुळे अचानक व्हिजिबिलिटी गायब झाली आणि त्याचवेळी एक बेवडा डिव्हायडरवरुन रस्त्यावर टपकला. त्याला धडकलो. हेल्मेटमुळे अपघात झाला असे वाटते
मात्र डोकेही हेल्मेटमुळेच वाचले.नशीब तो बेवडा असल्याने लोकांनी मला धरले नाही.असो.
वरील प्रतिसादात हेल्मेटमुळे डोके वाचले हे कोरिलेशन = काॅजेशन असा मी चुकीचा निष्कर्ष काढला होता. हेल्मेटमुळे डोके वाचले असे मला वाटत नाही. ह्या घटनेबाबत अधिक अभ्यास आवश्यक आहे. मुळात अपघात होण्याचे कारणच हेल्मेट असल्याने तो तोटा मात्र अधोरेखित होतो. एखादी तज्ञ (डाॅक्टरांची!) समिती नेमता येईल काय?
!
आपल्याला डोके आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न. बाकी चालू द्या.
दुरुस्ती
>>आपल्याला डोके आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न
"क्षीण प्रयत्न" असे म्हणायची जालीय पद्धत आहे असे नमूद करून मी माझे दोन शब्द संपवतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सोपा उपाय
हेल्मेटची काच वर खाली करता येते. आजकाल भगुनं उलटं ठेवल्याप्रमाणे दिसणारे बिनकांचेचे हेल्मेट आहेत की
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
काच?
की acrylic?
स्वातंत्र्य वगैरे असोच पण
स्वातंत्र्य वगैरे असोच पण हेल्मेटसक्ती ची कायदेशीर सक्ती असावी असं मत आहे.
जर
जर दुचाकी चालवताना हेल्मेटची सक्ती असेल तर, अपघात होण्याची शक्यता म्हणून, चारचाकी, बस, अन्य वाहने व रेल्वे, यातील प्रवाशांना सुद्धा हेल्मेटची सक्ती केली पाहिजे. प्रत्येक विमानप्रवाशाला पॅराशूट घालून बसण्याची सक्ती केली पाहिजे. जहाजावर जेवढी माणसे तेवढी लाईफ जॅकेट ठेवली पाहिजेत.
आणि हो, काही काही नवर्यांनी घरांतही हेल्मेट सक्तीने घातलेच पाहिजे.
काही काही नवर्यांनी घरांतही
विनोद म्हणून ठीक आहे. पण पोलिस स्टेशनांमधले अपघाताचे फळे, जे तिथे गेल्यावर लगेच दिसतात, ते पाहिले तर बायकांना फायर-रेझिस्टंट कपडे घालून, चॅस्टीटी बेल्ट लावून फिरावं लागेल. नव्हे, भारतातले तालिबानी (भारतात त्यांना खाप पंचायत म्हणतात) असं म्हणतातही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हेल्मेट आणि कायदा
अमेरीकेत इंश्युरंस कंपन्या हेल्मेट घालायला इन्सेटीव्ह्स देतात. आमच्या राज्यात हेल्मेट घातलेले असेल आणि अपघात झाला तर आणि घातलेले नसेल तर याच्या मोबदल्यात फरक आहे. (सगळी उदाहरणं आता आठवत नाहीत, पण मोटारसायकल अपघातात जीव गेला तर हेल्मेट घातलेले असेल तर तुमच्यापश्चात अधिकचे पन्नास हजार डॉलर्स दिले जातात हे माझ्या इंश्युरंस कंपनीच्या टर्ममध्ये वाचल्याचं नक्की आठवतं. असंच काही सीट बेल्टाबाबतीतही ऐकल्या/वाचल्याचं आठवत.) तरीही अनेक हेल्मेट न वापरणारे मोटरसायकल्स्वार दिसतात, त्यांना आम्ही (जबाबदार, हुशार वगैरे मोटरसायकलस्वार) 'स्क्वीड' असे संबोधतो.http://www.complex.com/sports/2013/07/the-10-types-of-motorcycle-riders/...
-Nile
अमेरीकेत इंश्युरंस कंपन्या
असे उपाय सक्तीपेक्षा अधिक चांगले व प्रभावी वाटतात.
दामटून बंदी घालण्यापेक्षा मला असे उपाय केलेले अधिक आवडतील.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कोण म्हणालं भारतात
कोण म्हणालं भारतात इन्शुरन्सवाले हेल्मेट घातलं होतं की नाही, रस्त्याच्या कोणत्या बाजूने गाडी चालली होती, सीटबेल्ट लावला होता की नाही वगैरेकडे दुर्लक्ष करुन सरसकट भरपाई देतात ?
अरे हे सर्व उपाय पोस्टफॅक्टो आहेत. अपघात होतो तेव्हा आधी जीव वाचण्याचा प्रश्न असतो. इन्शुरन्स रकमेचा नव्हे.
हे सर्व वाचून आता तर जन्तेवर सक्तीच बरी असं वाटायला लागलंय.
हे सर्व उपाय पोस्टफॅक्टो
पोस्टफॅक्टो न वाटता, हा प्रकार थोडा पॅसिव्ह अग्रेसिव्ह प्रकारचा वाटतो. थेट सक्ती करायची नाही, पण कडक कायदे करा असं म्हणायचं नाही पण हळूच लोकांची मनं बदलण्याचा प्रयत्न करायचा. (आत्ता याचं स्पष्टीकरण देता येणार नाही, पण पाश्चात्य देशांमध्ये असे प्रकार बरेच जास्त असतात असं वाटतं.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लोकांची मनं बदलणं वगैरे वाचलं
लोकांची मनं बदलणं वगैरे वाचलं की मला गांधी-अहिंसा चर्चा आठवतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मत
अदितीला काय म्हणायचं आहे माहित नाही, पण यात इतकं आश्चर्य वाटायचं काय कारण आहे माहित नाही. निर्णय घेताना फायद्या तोट्यांचा विचार बहुतेक लोक तरी करत असावेत. (लोक लाईफ इंश्युरन्स घेतात, अॅक्स्सिडेंटल कव्हरेज घेतातच ना?) मग जर "अपघात झालाच तर हेल्मेट घातल्याने फायदा होईल" असा लोक विचार करू शकतात असे समजून तसे इंसेटीव्ह असले तर त्यात मलातरी नवल वाटत नाही. गर्दीच्या रस्स्त्यांवर तुम्ही गाडी शेअर केलीत तर तुम्हाल "फास्ट" लेनमधून जाता येतं, किंवा ठराविक देणग्या दिल्या तर टॅक्समध्ये सुट मिळते हे याच प्रकारचे इन्सेन्टिव्ह्ज नाहीत का?
-Nile
मलाही
गांधीजी पॅसिव्ह-अग्रेसिव्ह होते असं मला कधीमधी वाटतं खरं. (आणि तसं असणं सरसकट गैर आहे असंही मला वाटत नाही.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
Libertarian Paternalism
थेट सक्ती करायची नाही, पण कडक कायदे करा असं म्हणायचं नाही पण हळूच लोकांची मनं बदलण्याचा प्रयत्न करायचा.
Libertarian Paternalism
Libertarian Paternalism Is Not An Oxymoron
पुस्ती
माझ्या प्रतिसादामुळे भारतात मोटरसायकल स्वारांना हेल्मेटसक्ती नसावी असे माझे मत आहे असे कोणाला वाटण्याची शक्यता आहे म्हणून ही पुस्ती.
अमेरीकेत मोटरसायकलवाले अत्यंत किरकोळ आहेत. यामुळे किरकोळ लोकांकरता नियम नसणे हे फारसे आश्चर्यकारक नाही. तरीही, काही राज्यांमध्ये हेल्मेटसक्ती, मोटरसायकल चालवताना बूट घातलेच पाहिजेत, टर्न इंडिकेटर्स वगैरे* हवेत असे कायदे आहेतच. पण अमेरीकेतही (वरती घासकडवी यांनी म्हणल्याप्रमाणे) सीटबेल्ट सक्ती आहे. सीटबेल्टशिवाय अपघातात गाडीचा कंट्रोल जाण्याची शक्यता जास्त आहे आणि म्हणून पर्यायाने सीटबेल्ट फक्त चालकाच्याच नाही तर इतरांच्याही फायद्याचा ठरतो. त्याच धर्तीवर भारतात मोटरसायकलस्वारांची संख्या पाहता हेल्मेटसक्ती असावे असे माझे मत आहे.
*अमेरीकेत मोटरसायकल चालवणे हा हौशी प्रकार आहे. कित्येकांच्या मोटरसायकल्स ह्या "स्ट्रीट लीगल" नसतात.
-Nile
पर्यायाने सीटबेल्ट फक्त
हा मुद्दा माहीत नव्हता.
या चर्चेतून एक मूलभूत मुद्दा
या चर्चेतून एक मूलभूत मुद्दा वरती येतो आहे. तो असा
लोकांच्याच भल्यासाठी त्यांच्यावर काही विशिष्ट बंधनं घालणं योग्य आहे का?
वादापुरतं असं गृहित धरू की हेल्मेट घातल्यामुळे अनेक जीव वाचतात. म्हणजे समजा एक लाख मोटरसायकल/स्कूटरचालक आहेत. त्यातल्या कोणीच हेल्मेट वापरलं नाही तर वर्षाला एकशेदहा मृत्यू होतात. जर सर्वांनी हेल्मेट वापरलं तर वर्षाला दहा मृत्यू होतात. हे सगळे मृत्यू चालकांचेच आहेत असं समजू. म्हणजे हेल्मेट वापरल्यामुळे मृत्यूंची संख्या सिग्निफिकंटली घटते - सुमारे ९० टक्क्यांनी. तसंच मी एक मोटरसायकल चालक म्हणून माझी अपघातात मरण्याची शक्यता हजारात एक वरून दहाहजारांत एक इतकी कमी होते. हे सगळं चांगलंच आहे. प्रश्न कुठे येतो? तर बऱ्याच चालकांना अतिरेकी आत्मविश्वास असतो. त्यामुळे स्वतःच्या मरणाची अपेक्षित शक्यता मुळात हेल्मेटशिवाय हजारात एक आहे हे त्यांना पटत नाही. मुळात ती दहा लाखांत एक असेल तर आणि हेल्मेट वापरून ती वीस लाखांत एक होणार असेल, तर त्यात फारसा फरक वाटत नाही.
(इथे घेतलेले आकडे काल्पनिक आहेत, पण सत्यपरिस्थितीतले आकडे वापरूनही युक्तिवाद बदलत नाही.)
आता प्रश्न असा आहे, की या अज्ञानाच्या परिस्थितीत कुणातरी शहाण्या यंत्रणेकडे हे तपासून पाहून आपल्यावर ते शहाणपण लादण्याचा अधिकार असावा का? अनेक बाबतीत आपण अज्ञान मान्य करून शहाण्या, ज्ञानी, अधिकारी व्यक्तीकडे जाऊन सल्ला घेतो. काही इजा झाली, रोग झाला की डॉक्टरकडे जातो. आता यात जबरदस्ती नाही असं कुणी म्हणेल. पण डॉक्टर कोणाला म्हणावं याचे नियम शहाणीसुरती व्यवस्थाच करते. इतरांना डॉक्टरी सल्ला द्यायला मनाई करते. विशिष्ट मर्यादेपलिकडे आजारी पडलं की डॉक्टरकडे जावं हे आपलं अज्ञान स्वीकारण्याइतपत आपली प्रगती झालेली आहेच. मग हेल्मेट वापरण्याबाबतीत तसं का होत नाही? याचं कारण म्हणजे आजार, इजा, रोगराई या गोष्टी मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे आपल्याकडे नाही तर आपल्या शेजाऱ्याकडे, मित्राकडे हे ज्ञान असतं. त्यांच्याकडून आपल्याला अज्ञान स्वीकारून ज्ञानी व्यावसायिकाकडे जाण्याने फायदा होतो हे दिसून येतं. इथल्याही चर्चेत ज्यांना स्वतःला अनुभव आहे, किंवा हेल्मेट न वापरल्यामुळे कोणाचा मृत्यू झाल्याचं ज्ञान आहे त्यांनी 'हेल्मेट वापरावं' असं म्हटलेलं आहे.
कदाचित सरकारने मोठ्या प्रमाणावर लोकांना मोटरसायकल चालवण्याच्या धोक्याबद्दल जाणीव करून दिली तर बहुतांश लोक हेल्मेट वापरतील. पण ते प्रचंड खर्चिक प्रकरण आहे. आणि समजा पुरेसा खर्च आणि पुरेसा प्रयत्न करूनही लोक शहाणे होत नाहीत असं दिसलं तर काय करावं? कारण ८० च्या दशकात टीव्हीवर मी जाहिराती बघितल्या आहेत. (एक धिप्पाड, मजबूत माणूस एका नारळावर प्रचंड मोठा हातोडा हाणतो. नारळ फुटतो. त्या नारळावर हेल्मेट ठेवल्यावर नारळ सुरक्षित राहतो.) अजूनही हा जनजागृतीचा प्रयत्न चालू असावा. पण एक वेळ अशी येते की अपघातांतून जे मृत्यू होतात त्याचा समाजाला जो तोटा होतो तो इतका प्रचंड असतो की ही शहाणपणाची सक्ती करणं हे कमी खर्चाचं ठरतं. आणि कमी खर्चात जास्तीत जास्त समाजाचं भलं करण्यासाठीच तर आपण सरकार निवडून देतो. तेव्हा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत अशी सक्ती करणारे कायदे करण्याची अध्याहृत परवानगी आपण सरकारला दिलेली आहे.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मोटरसायकल किंवा स्कूटर चालवणं हा अधिकार नसून सुविधा/सवलत आहे. (नॉट अ राइट, बट अ प्रिव्हिलेज.) समाज जेव्हा आपल्याला हा प्रिव्हिलेज देतो, तेव्हा त्यासाठी आवश्यक नियम पाळणं गरजेचं ठरतं. तेव्हा समाज असा नियम घालतो की तुम्ही मेल्याने तुमचं व तुमच्या कुटुंबाचं नुकसान झालेलं कदाचित तुम्हाला परवडत असेल, पण तुमच्यासारख्या शेकडो लोकांचे मृत्यू होणं हे समाजाला तोट्याचं आहे म्हणून हा नियम तुम्हाला आणि तुमच्यासारख्या प्रत्येकाला पाळायला हवा. या युक्तिवादात मला काहीच गैर वाटत नाही.
समाज जेव्हा आपल्याला हा
समाज जेव्हा आपल्याला हा प्रिव्हिलेज देतो, तेव्हा त्यासाठी आवश्यक नियम पाळणं गरजेचं ठरतं. तेव्हा समाज असा नियम घालतो की तुम्ही मेल्याने तुमचं व तुमच्या कुटुंबाचं नुकसान झालेलं कदाचित तुम्हाला परवडत असेल, पण तुमच्यासारख्या शेकडो लोकांचे मृत्यू होणं हे समाजाला तोट्याचं आहे म्हणून हा नियम तुम्हाला आणि तुमच्यासारख्या प्रत्येकाला पाळायला हवा. या युक्तिवादात मला काहीच गैर वाटत नाही.
तोट्याचं आहे की फायद्याचं ह्यात प्रश्न आहेत. (I am just thinking out loud)
१) हे गृहितक आहे की निष्कर्ष ?
२) समाजात १० व्यक्ती आहेत असे गृहित धरा. त्यातली १ व्यक्ती वारली (कारण कोणतेही असो). आता समाजास उपलब्ध असलेले फिजिकल / नॉन-ह्युमन रिसोर्सेस हे १० ऐवजी ९ लोकांना उपलब्ध होणारेत. म्हंजे जे नॉन हुमन रिसोर्सेस पूर्वी १० जणात वाटून घेतले गेले असते ते आता ९ जणांत वाटून घेतले जातील. आता हे तोट्याचे कसे ? हा तर दहाव्या व्यक्तीच्या मरण्यामुळे झालेला फायदा आहे.
३) मुद्दा क्र. २ मधे कोरोलोरी अशी असू शकते की - दहाव्या व्यक्ती च्या अंगभूत गुणांचा व कौशल्यांचा चा उपयोग व त्यातून मिळार्या लाभांचा फायदा समाजास जास्त असू शकतो. जास्त म्हंजे ती व्यक्ती वारण्यामुळे होणार्या Increased availability of resources च्या फायद्यापेक्षाही जास्त. व असे जर असेल तर - The tenth person deserves an equity - because the tenth person may be alive but because he/she dislikes the rules ... he/she might deny the society the access to his/her human capital (skills/attributes). And as a result society will be deprived of the benefits and gains. That equity is directly in contradiction with the privilege view of the driving.
तोटा आहे हे गृहितक आहे. पण
तोटा आहे हे गृहितक आहे. पण एकदा तो तोटा होतो ही सत्य परिस्थिती आहे असं सिद्ध झालं तर तुम्हाला युक्तिवाद मान्य आहे का?
आता तोटा कसा होतो ते पाहू.
१. सज्ञान मोटरसायकल चालकावर समाजाने (त्याचं कुटुंब आणि सरकार) त्याला मोठं करण्यात आणि शिकवण्यात प्रचंड इन्व्हेस्टमेंट केलेली असते. या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स पुढच्या तीसेक वर्षांत तो देणार असतो. ते बुडतात. म्हणजे रिसोर्स रिडिस्ट्रिब्यूट होण्याऐवजी रिसोर्स कमी होतात. कारण मरणारी व्यक्ती ही रीसोर्स असते. वर्षाला तीन लाख रुपये मिळवणारी व्यक्ती ही किमान तीस लाखाची अॅसेट असते.
२. त्याच्या कुटुंबाला तो जी नोकरी करत असतो त्यातून उत्पन्न मिळत असतं. त्याची भरपाई करण्यासाठी इतर व्यवस्था पहाव्या लागतात. ही कॉस्ट आहे. किंवा हेल्मेट न वापरता जगण्यासाठी काही ना काही इन्शुरन्स कॉस्ट पडेल.
३. आपला मुलगा, आपले वडील, आपली आई, किंवा आपलं भावंड जिवंत असणं आणि अकाली अपघातात मरणंं या दोनमध्ये आनंदाची युटिलिटी व्हॅल्यू असते ती जिवंत असताना अधिक असते, अकाली मरण्याने ती घटते. (सरासरी केसेसमध्ये) ही दुःखवाढ किंवा आनंदघट हा प्रचंड तोटा आहे. त्या व्यक्तीच्या मुलांवर होणारे संस्कार, त्यातून होणारी त्या मुलाची अॅसेट डेव्हलपमेंट - हे सगळे फ्यूचर गेन्स आहेत. ते जातात.
तुमच्या लाउड थिंकिंगसाठी एक प्रश्न स्वतःला विचारून पहा. कुठचाच समाज तुमच्यासारखी गणितं करून हेल्मेट न घालणं इन्सेंटिवाइज करत नाही. असं का बरं असावं?
आणि गब्बर 'इक्वॅलिटी वाढेल' हा फायदा असल्याप्रमाणे बघतो आणि 'ग्रोथ थांबेल' याकडे दुर्लक्ष करतो हे पाहून प्रचंड आश्चर्य वाटलं. रमतारामांशी दोनचार भेटी काय झाल्या आणि इतका मार्क्सवादी विचार भिनला?
१. सज्ञान मोटरसायकल चालकावर
१. सज्ञान मोटरसायकल चालकावर समाजाने (त्याचं कुटुंब आणि सरकार) त्याला मोठं करण्यात आणि शिकवण्यात प्रचंड इन्व्हेस्टमेंट केलेली असते. या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स पुढच्या तीसेक वर्षांत तो देणार असतो. ते बुडतात. म्हणजे रिसोर्स रिडिस्ट्रिब्यूट होण्याऐवजी रिसोर्स कमी होतात. कारण मरणारी व्यक्ती ही रीसोर्स असते. वर्षाला तीन लाख रुपये मिळवणारी व्यक्ती ही किमान तीस लाखाची अॅसेट असते.
प्रश्न फक्त अर्धा बरोबर आहे. उरलेला अर्धा प्रश्न हा आहे की - वर्षाला ३ लाख रुपये कमावणारी व्यक्ती समाजासाठी ३० लाखाची अॅसेट असते - असं म्हंणायचंय का तुम्हास ?????
१) समाजास ३० लाख जर मिळणार असतील व त्याबदल्यात ती व्यक्ती ३ लाखच मागणार असेल तर - त्या व्यक्तीवर हेल्मेट घालण्याची सक्ती तिच्या मनाविरुद्ध का केली जावी ? ती व्यक्ती खूपच फायदेशीर आहे समाजासाठी. मग तिच्यावर तिच्यामनाविरुद्ध बळजबरी का ?
(बाय द वे - अॅसेट असणे म्हंजे - Ability to control the asset (which means deploy and/or redeploy the asset as the OWNER deems fit).). समाजाचा असा कोणताही कंट्रोल व्यक्तीवर नसतो. )
२) एकतर हेल्मेट नाहीतर इन्श्युरन्स घ्यावा - हा विचार अर्धा बरोबर. व अर्धा समस्याजनक. (जसे हेल्मेट घालणे सक्तीचे करणे हे प्रायव्हेट सेक्टर च्या आग्रहावरून केले गेलेले असू शक्ते तसेच इन्श्युरन्स घ्यायला लावणे हे सुद्धा).
----
आपला मुलगा, आपले वडील, आपली आई, किंवा आपलं भावंड जिवंत असणं आणि अकाली अपघातात मरणंं या दोनमध्ये आनंदाची युटिलिटी व्हॅल्यू असते ती जिवंत असताना अधिक असते, अकाली मरण्याने ती घटते. (सरासरी केसेसमध्ये) ही दुःखवाढ किंवा आनंदघट हा प्रचंड तोटा आहे. त्या व्यक्तीच्या मुलांवर होणारे संस्कार, त्यातून होणारी त्या मुलाची अॅसेट डेव्हलपमेंट - हे सगळे फ्यूचर गेन्स आहेत. ते जातात.
ज्यांच्यासाठी ते फ्युचर गेन्स महत्वाचे आहेत त्यांनी इन्श्युरन्स चे पैसे द्यावेत. Who values the motorcycle rider (his body) ????? Those who value the life of the rider should be paying for the insurance (if they want to mitigate and/or transfer the risk of a fatal or otherwise accident).
----
तुमच्या लाउड थिंकिंगसाठी एक प्रश्न स्वतःला विचारून पहा. कुठचाच समाज तुमच्यासारखी गणितं करून हेल्मेट न घालणं इन्सेंटिवाइज करत नाही. असं का बरं असावं?
अंशतः उत्तर - Hyperbolic discounting
वर्षाला ३ लाख रुपये कमावणारी
दरवर्षी ३ अब्ज निर्माण करणाऱ्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू किमान ३० अब्ज असते त्या अर्थाने. ३० अब्ज किमतीची कंपनी बुडू नये काही प्रयत्न करणं आवश्यक असतं तसंच अशा हजारो व्यक्तींचं आयुष्य नष्ट होऊ नये यासाठी काही मामूली बंधनं घालायला माझा होकार आहे. अॅसेट हा शब्द मी ओनरशिप या अर्थाने वापरला नव्हता. एखादी चांगली कामगार कंपनीच्या दृष्टीने 'शी इज अॅन असेट टु द कंपनी' हे ज्या अर्थाने म्हटलं जातं त्या अर्थाने.
जेव्हा व्हॅल्यू पुरेशी कळलेली नसते तेव्हाचाच प्रश्न आहे. तो अज्ञान व्यक्ती आहे. अज्ञान व्यक्तींवरती काही मामूली प्रमाणात त्यांच्या भल्यासाठी जबरदस्ती करणं हे त्या व्यक्तीच्या आणि सर्वांच्याच फायद्याचंच असतं.
असो. एकंदरीत ही चर्चा करताना गब्बरची विधानं समोरच्याचा युक्तिवाद समजून न घेता तांत्रिक खुसपटांवर उतरलेली आहेत असं दिसतं आहे. तसंच काही चर्चा खरडवहीत आणि काही इथे, खरडवहीतल्या चर्चेतल्या मुद्द्यांना इथे बगल, हे काही ठीक चाललेलं नाही. मला व्यक्तिशः डिफेन्स अॅटर्नीशी चर्चा करायला फार मजा येत नाही. कोर्टात जज्जासमोर नसण्याचा गैरफायदाही इथे मिळताना दिसतो आहे. त्यामुळे आता 'पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या' म्हणण्याची वेळ आलेली आहे. तसाही माझा जवळपास सगळा युक्तिवाद करून झालेला आहे.
सर्वात प्रथम पोलिसांना हेल्मेट सक्तीचे करा !
सध्या मध्य प्रदेशात हे चालु झाले आहे. पोलिसांना हेल्मेट सक्तीचे केले आहे. आणि त्यानंतर ते इतर नागरिकांना करणार आहेत !
मला वाटते हाच योग्य मार्ग आहे. सर्वप्रथम पोलिसांना सक्तीचे करावे. त्यानंतर ईतर गणवेशातल्या लोकांना ( रेसूब वगैरे). एकदा त्यांना हेल्मेट मधे पाहिल्यावर इतर नागरिक आपोआप सुधरतील. नंतर एकदा सग्ळ्यांना सक्तीचे झाले की सोपे होईल.
पण हा नियम इतर वाहतुकीच्या नियमांसारखाच व्य्वस्थीत लागु करावा. आणी इतर नियमही पाळण्यास लावावे. त्यातुन येणारया दंडातुन क्यामेरे वगैरेंची व्यवस्था करता येईल.
मुंबईत हेल्मेट सक्ती आहे. हे
मुंबईत हेल्मेट सक्ती आहे. हे शहर भारतात (दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्यूमध्ये) चौथ्या क्रमांकावर आहे.
आता मुंबईत व पुण्यात किती दुचाक्या रस्त्यावर असतात व त्यात अपघातांचे प्रमाण किती असा विदा शोधतो आहे. त्यावरून हेल्मेट सक्ती केल्याने खरोखरच काही फरक पडतो का यावर काही भाष्य करता यावे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सक्ती नसती तर
समजा हेल्मेट-सक्ती नसती, तर हे शहर रस्ते-अपघात-मृत्युसंख्येमध्ये कितव्या क्रमांकावर आले असते, हा अभ्यासही रोचक ठरू शकेल.
मुंबईत चारचाकी वाहनांची संख्या खूपच दिसते. त्या मानाने दुचाक्यांची संख्या कमी वाटते. पण दुचाक्यांची एकूण संख्या कमी असेल असे नाही.
मुंबईची लोकसंख्या दीड कोटी आणि पुण्याची साठ लाख हेही आकडेवारीत आणि क्रमवारीत लक्ष्यात घ्यायला हवे.
सहमत आहेनुसती किती वाहने
सहमत आहे
नुसती किती वाहने आहेत बघुन उपयोगाचे नाही तर सरासरी रस्त्यावर किती असतात तेही बघायला हवे.
एकदा रस्त्यावर सरासरी किती वाहनचालक दुचाकीवर असतात व त्यापैकी किती जणांना अपघात होतात? व त्यात हेड इंज्युरीजचे प्रमाण काय? हे लक्षात घेतले तर निष्कर्ष काढताना शहराची एकुण लोकसंख्या इथे फारशी उपयोगाची ठरू नये.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
टक्केवारी
किती अपघात आणि त्यात किती मस्तकइजा/मृत्यू ही टक्केवारी ठीक वाटते. तशीच रस्त्यावर किती वाहनचालक आणि त्यांचे किती मस्तकइजाअपघात हीही योग्यच. शिवाय उदा. प्रति कि.मी. रस्त्यावर किती वाहने, म्हणजे रस्त्यावर किती दाटी, हेही पहावे. यातून लोकसंख्यादाटीचा आणि वाहतूकव्यवस्था असण्या/नसण्याचाही मुद्दा समोर येईल. म्हणजे अमुक एवढ्या वाह्नांना अमुक लांबीचा, अमुक रुंदीचा रस्ता पुरेसा सुरक्षित आहे का वगैरे. मग शहरांची तुलना प्रमाणशीर होऊ शकेल. किंवा अमुक लाख लोकांसाठी किती चौ.मी. रस्ते हवेत वगैरे.
कदाचित अवांतर
हे थोडंसं लसीकरणासारखं नाहिये का?
गंपू, पंपू आणि समस्त परिवार ह्यांनी लसीकरणाला विरोध केला- त्याची काय गरज, आम्ही आमचं बघून घेऊ वगैरे. मग नंतर कळलं की लसवाल्या पोरांना पोलिओ होत नाही- हे बघून गंपू,पंपू ज्यु. वगैरेंनी खुशाल लस टोचून घेतली आणि व्यवस्थित जगताहेत.
तसंच- हेल्मेट घालून नक्की अपघात "वाढतात" किंवा "कमी होत नाहीत" असा निर्विवाद विदा उपलब्ध होईपर्यंत हेल्मेट वापरायला काय हरकत आहे?
त्यामुळे
- हेल्मेटचा दर्जाही सुधरेल जर ते जीवनावश्यक असूनही त्यात Design issues असतील तर (भारतात कल्पना नाही कितपत शक्य आहे)
- हेल्मेटमुळे जीव गेला असं काही होणार असेल तर तेही समजेल (हे होईल असं वाटत तरी नाही)
==================
भूतकाळातील आस्वल्य.
पोलिओचे उदाहरण इथे चुकीचे
पोलिओचे उदाहरण इथे चुकीचे वाटतंय.
पोलिओची लस फक्त लहान मुलांना दिली जाते. त्यामुळे ती मुलांना देणे हे आई-वडीलांवर सक्तीचे असलेच पाहिजे. तसेच, जर एखाद्या संसर्गजन्य रोगाची साथ असेल तर स्वतः 'लस घेणे' सक्तीचे असलेच पाहिजे.
पण जर रोग संसर्गजन्य नसेल तर सज्ञान व्यक्तीस लस घेण्याची सक्ती असावी काय? आणी अगदीच अतीशयोक्ती म्हटले तर ओबेसिटी वाढत आहे म्हणून सर्वांना रोज २ तास व्यायामाची सक्ती करणे कितपत योग्य होईल?
पुण्यासारख्या शहरात वाहतुकीचा
पुण्यासारख्या शहरात वाहतुकीचा विचार करता हेल्मेटमुळे निर्माण होणारी सुरक्षितता विरुद्ध त्यामुळे होणारी गैरसोय यातून कुठले सिलेक्शन करायचे अशा प्रश्नाचे उत्तर जो तो तारतम्याने ठरवतो. ज्यावेळी सुरक्षितता ही गैरसोयीपेक्षा वरचढ ठरेल तेव्हा लोकांचा हेल्मेट वापराकडे कल वाढेल.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
>>ज्यावेळी सुरक्षितता ही
>>ज्यावेळी सुरक्षितता ही गैरसोयीपेक्षा वरचढ ठरेल तेव्हा लोकांचा हेल्मेट वापराकडे कल वाढेल.
अशा स्वरूपाचा लोकांचा कल असता तर ओव्हरऑलच अपघात कमी झाले असते. सुरक्षितता विरुद्ध गैरसोय अशा विचारापेक्षा सुरक्षितता विरुद्ध पोकळ आत्मविश्वास असे द्वंद्व असते आणि त्यात पोकळ आत्मविश्वास सहसा जिंकताना आढळतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
कारणे
दुचाकीमध्ये इतर वाहनांशी टक्कर न होता होणार्या अपघातांचे प्रमाण लक्षणीय असते.
उदा. ओल्या रस्त्यावरून घसरणे; रस्त्यातल्या खड्ड्यामुळे तोल जाणे; पंक्चर झाल्यावर गाडीवरचा ताबा सुटणे; मागे बसलेल्या व्यक्तीने विचित्र हालचाल करणे. (यातली बहुतांश सायकलीला लागू नाहीत)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सायकलवरून प्रतितास दीड किमी
सायकलवरून प्रतितास दीड किमी वेगाने जाताना पडलं तरीही सायकलच्या हेल्मेटचा फार फायदा होतो. कोणत्याही दुचाकीवरून पाय जमिनीला टेकत नसतील तर हेल्मेट वापरावंच.
बाकी हेल्मेटचे फायदे आहेतच, शिवाय रस्त्यावरची माती आणि वारा डोळ्यात जात नाहीत, त्यामुळे अनपेक्षित वेळी डोळ्यांतून पाणी येण्याचा धोका नाही, गुप्तता मिळते (लोकांना टाळायचं असेल तर "ती माझी मैत्रीण होती, माझी स्कूटर-हेल्मेट वापरत होती'' म्हणता येतं), ''डोकं आहे म्हणून हेल्मेट घालते'' असे कूल पाँइंट्स मिळवता येतात, तोंडावर फडकं बांधायचे श्रम कमी होतात. शिवाय इतरांकडे तुच्छपणे बघण्याची संधी मिळते, ते निराळंच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
फडकं बांधण्याचे श्रम.. हम्म
फडकं बांधण्याचे श्रम..
हम्म .. बादवे.. पुण्यात ही बुरखा पद्धत कधी रुढ झाली याविषयी काही विदा आहे का ?
ते सुंदर चेहरे मुळी दिसतच नाहीत. का लपविता ?
विदारक आहे हे..
विदारकच आहे. काईच्या काई
विदारकच आहे. काईच्या काई ध्यान दिसतं ते वेगळच परत घाम येउन केसांची वाट अधिकच लागत असावी.
एसी?
हेल्मेटमध्ये एसी बसवला तर कसं होईल?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कल्पनाविलास चांगला आहे, पण
कल्पनाविलास चांगला आहे, पण एसी बसवणं म्हणजे चहू बाजूंनी हवा खेळती राहीलसं पाहणं. मग डोक्यापेक्षा बरंच मोठं हेल्मेट घातलं काय अन नाही काय.
गैरसोय सहन केली एकवेळ तरी घामेजलेलं हेल्मेट पुन्हा घालणं नको वाटतं. दरवेळी आधी लिंट रिमूव्हरने आतले अस्तर स्वच्छ करणे हा उद्योग मी करायचे. पण माझ्याकडचे परदेशांतून आणलेले लिंट रिमूव्हर संपल्यावर मी हेल्मेट घालणं सोडून दिलं. अलीकडे एका मॉलमधे दिसला एक लिंट रिमूव्हर. पण तो तितका चांगला नव्हता. चारचाकीचं हे एक सुख आहे, हेल्मेटची कटकट नाही.
महत्त्वाचं काय?
सायकलवरून दीड किमी प्रतितास अशा बेफाट वेगानं जाताना मी तोंड फोडून घेतलं होतं. पाच वर्षं होत आली या प्रकाराला. अजूनही त्या दाताच्या मुळाशी बोटानं दाबलं तरी थोडी दुखरी संवेदना आहे. सवयीप्रमाणे तेव्हा सायकलचं हेल्मेट घातलेलं असल्यामुळे चश्म्याच्या काचा डोळ्यांत गेल्या नाहीत; हेल्मेटवर आपटल्यामुळे शब्दशः कपाळमोक्ष झाला नाही आणि हेल्मेटनं बराच आघात सोसल्यामुळे दातही घशात गेला नाही.
दात, डोळे, जीव वगैरे गोष्टी गमावण्यापेक्षा केस खराब झालेले चालतील; तसेही रोज व्यायाम करून घामट्ट होतातच.
मात्र हेल्मेटच्या आतलं अस्तर काढून धुण्याची सोय झाली तर बरं होईल. ती नसल्यामुळे, पुण्यात स्कूटरीवरून प्रवास करताना मी कधीमधी रुमाल केसांना गुंडाळायचे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
???
शाळेत असताना नारायण पेठेतील घर ते टिळक रोडवरील शाळा हे साधारणतः एक किलोमीटरपेक्षा किंचित कमी अंतर चालत सुमारे दहा मिनिटांत काटत असे. नंतर ज्युनियर कॉलेजला गेल्यावर (नारायण पेठेतील) घरावरून ते टिळक रोडवरच परंतु थोडे पुढे असलेले स.प. महाविद्यालय हे एक किलोमीटरपेक्षा थोडे अधिक असलेले अंतर हे चालत साधारणतः पंधरा मिनिटांत काटत असे, तर सायकलने हेच अंतर काटण्यास सुमारे दहा मिनिटे लागत. आता, मी जात्याच द्रुतगती चालक नाही (पायी किंवा सायकलवरसुद्धा), आणि नारायण तथा सदाशिव पेठांतील आतल्या रस्त्यांवर ते मनात आणले, तरी शक्यही नव्हते. (तेव्हाही, नि आताही.)
तर सांगण्याचा मतलब, माझ्यासारख्या संथगती मनुष्याचासुद्धा चालण्याचा वेग हा सुमारे चार ते साडेचार किमी प्रतितास असतो. सायकलीने तो थोडा अधिक असतो. (सहा ते साडेसहा किमी प्रतितास मानू या का?)
तर आपला दीड किमी प्रतितास हा (सायकलीवरचा) वेग म्हणजे संथगती मनुष्याच्या चालण्याच्या गतीच्या सुमारे तीनअष्टमांश म्हणजे निम्म्याहून कमी झाला. या गतीस तुम्हाला सायकलवर तोल सांभाळता येणे कठीण झाले असू शकेल, हे एक वेळ समजू शकतो - आम्हीही एकेकाळी तारुण्यात सायकलवर संथगतीत, जवळजवळ स्तब्धावस्थेत तोल सांभाळण्याच्या कसरती करत असू, ते प्रकर्षाने स्मरते - परंतु झालेल्या दुखापतीचे वर्णन पाहता, आपण वाटाण्याच्या बीवर वीस गाद्या आणि पिसांच्या वीस रजयांची चळत रचून त्यावर निजण्याचा हॅन्स ख्रिश्चन अँडरसनप्रणीत प्रयोग करून पाहावाच, असे आग्रहपूर्वक सुचवू इच्छितो. कोण जाणे, आपणांत राजरक्त आढळावयाचे!
तर कृपा करून आपला अपघातासमयीच्या वेगाच्या अंदाजाचा आकडा सुधारून पाहणार काय?
(अर्थात, त्या स्वल्पवेगातसुद्धा रस्त्याकाठच्या घळईत वगैरे घरंगळत जाऊन कशाला तरी आदळल्यास गंभीर दुखापत होणे शक्य आहेच, परंतु मग ते सायकलीच्या वेगाचे फल नव्हे. अन्यथा, चालण्याच्या गतीहूनही कमी वेगाने जाणाऱ्या सायकलीवरून निव्वळ हापटी खाल्ल्याने गंभीर दुखापत होऊ शकेल, हे (माझ्या) कल्पनाशक्तीच्या आवाक्याच्या अंमळ बाहेरचे वाटते.)
हेल्मेटच्या उपयुक्ततेबद्दल अर्थात वाद नाहीच.
नव्हे.
मित्रासाठी हळूहळू सायकल चालवत पायरीवर सायकल चढवताना ती आडवी झाली, मी पडले. याचं कारण सायकल फार हळू चालवत होते. दीड नसेल तर दोन किमी प्रतितास असा वेग असेल.
मी चालताना साधारणतः पाच किमी प्रतितास वेगानं चालत असेन.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हम्म्म्म्म्...
थोडक्यात, आपल्या दुखापतीचा सायकलीच्या वेगाशी अर्थाअर्थी काहीही संबंध नसून, आपल्या पडण्याशी (पक्षी: आपण आणि पृथ्वी यांतील गुरुत्वाकर्षणाशी - सायकल केवळ निमित्तमात्र!) आहे. (फार फार तर, आपण पडल्यानंतर सायकल आपल्या अंगावर पडली असल्यास त्यामुळे दुखापतीत कदाचित किंचित भर पडली असू शकेल, इतकेच काय ते सायकलचे योगदान.)
कदाचित आपण जर रस्त्यातून - फूटपाथवरूनसुद्धा! - चालताना ठेच लागून अथवा केळीच्या सालावरून पाय घसरून पडला असता, किंवा घरात स्टुलावर चढल्यावर पडला असता, तर हेच गुरुत्वाकर्षण साधारणतः तितक्याच प्रमाणात कामी आले असते, आणि साधारणतः इतक्याच स्वरूपाची दुखापत झाली असती.
मात्र, फॉर सम रीझन अनबिनोन्स्ट टू ह्यूमनकाइंड, आपण फूटपाथवरून चालताना अथवा स्टुलावर चढताना हेल्मेट घालत नाही. (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, सायकल चालविण्याऐवजी काही कारणास्तव - जसे, पंक्चर झाली म्हणून - ती रस्त्यातून हाताने ढकलून न्यायची झाल्यास, कदाचित रस्त्यात पायाला ठेच लागून अथवा केळीच्या सालावरून घसरून आपण पडू शकू आणि सायकलसुद्धा आपल्या अंगावर पडू शकेल आणि त्यामुळे दुखापत होऊ शकेल, अशा विचाराने हाताने सायकल रस्त्यातून ढकलताना डोक्यावर हेल्मेट घालण्याची गरज आपल्याला भासणार नाही.)
नाही, सायकल चालविताना हेल्मेट घालू नये असे माझे म्हणणे मुळीच नाही. किंबहुना, सायकल चालविताना हेल्मेट घालण्याची उपयुक्तता तथा आवश्यकता मला पटते. मात्र, तिच्या समर्थनार्थ आपण प्रस्तुत केलेले उदाहरण तितकेसे सयुक्तिक नाही, एवढेच सुचवावेसे वाटते.
तथास्तु.
सायकल हेल्मेटशिवाय घालवण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला फुल्ल परमिशन हे. दाताच्या दुखऱ्या मुळाची शप्पथ घेऊन सांगते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
...
पण चारचाकीत सीटबेल्टची, झालेच तर एअरबॅगची कटकट असते, त्याचे काय?
या सरकारचेसुद्धा एक समजत नाही. एकीकडे भारताची लोकसंख्या जास्त आहे म्हणून बोंब मारायची१, आणि दुसरीकडे अशा हेल्मेटच्या, नाहीतर सीटबेल्टच्या, नाहीतर एअरबॅगच्या सक्त्या करायच्या. इन्फर्मिटी ऑफ पर्पज़ यालाच म्हणत असावेत काय?
त्यापेक्षा असे का करत नाहीत? हिंदुस्थानची प्रजा जेनेटिकली मॉडिफाय करून इतःपर जन्मास येणाऱ्या हिंदुस्थानी प्रजेस डोकीच असणार नाहीत अशी तरतूद करायची२. डोकेच नसले, तर डोके फुटण्याचाही प्रश्न उद्भवणार नाही की हेल्मेट ठेवायलाही जागा राहणार नाही. जेणेकरून हेल्मेटसक्ती ही एकसमयावच्छेदेकरून अनावश्यक तथा अशक्य ठरेल. हं, आता, चारचाकीवाल्यांना याचा फायदा नाही३, हे खरे. परंतु चारचाकीवाले हे तसेही अलीकडे आणि त्यातून शहरांतून वाढू लागलेले प्रस्थ आहे; त्यांची संख्या अद्यापही अत्यल्प आहे. हिंदुस्थानची ७०% जनता जेथे दुचाकीवाली आहे४, तिथे दुचाकीवाल्यांचाच विचार प्रकर्षाने करणे इष्ट नव्हे काय? बहुजनहिताय बहुजनसुखाय! सबब, चारचाकीवाल्यांचा विचार करण्याची अजिबात आवश्यकता नाही. इत्यलम्|
(बाकी, हेल्मेटच्या आतून लिंट रिमूव्हर फिरवणे हा प्रकार प्रथमच ऐकला. लिंट रिमूव्हरचा असाही उपयोग होऊ शकतो, याची याअगोदर कल्पना नव्हती. अर्थात, देशाटन, पंडितमैत्री, सभेत संचार वगैरे केल्याने येणाऱ्या चातुर्याच्या खाती हे नव्याने प्राप्त झालेले ज्ञान टाकून देतो. आभारी आहे.)
..........
१ निदान, आमच्या जमान्यातली समाजवादी सरकारे तरी अशी बोंब मारायची. आजकालची मारतात की नाही, कल्पना नाही. (चूभूद्याघ्या.)
२ याकरिता जेनेटिक मॉडिफिकेशनची आवश्यकता ती काय, असा प्रतिवाद कोणी करू शकेल. या दाव्यात तथ्य असल्यास - असा माझा दावा नाही, परंतु तरीही - सो मच द बेटर. तेवढाच खर्च वाचला२अ!
२अ काय? कोकणस्थ नसूनही कोकणस्थी बेअरिंग जमलेय की नाही? द्या टाळी! अहो, पुणे-३०मध्ये आयुष्याची गेला बाजार सोळासतरा वर्षे - माय फॉर्मेटिव इयर्स - उगाच नाही काढली मी!
३ कारण त्यांना हेल्मेटसक्ती नाही म्हणून. त्यांना (अतिरिक्त) डोके असल्याचा आरोप कोणत्याही प्रकारे केलेला नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. आगाऊ आभार.
४ आता, हा सत्तर टक्क्यांचा आकडा कोठून काढला, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होईल. तर, हिंदुस्थानची सत्तर टक्के जनता खेड्यांत राहते, यातील सत्तर टक्क्यांचा आकडा गांधीजींनी जेथून कोठून काढला, तेथूनच, असे त्या प्रश्नास आमचे प्रामाणिक उत्तर आहे. असो चालायचेच.
चारचाकी
चारचाकीचं हे एक सुख आहे, हेल्मेटची कटकट नाही.
लोकांनी काय खायचं, काय प्यायचं आणि कसं वागायचं याबाबत दक्ष असलेलं सरकार, पुढेमागे, चारचाकीतही हेल्मेट अनिवार्य करायला मागे पुढे बघणार नाही. तसंही, मागच्या सीटवरच्यांना बेल्ट लावणं, कंपल्सरी केलंच आहे.
परानुभव
कारमध्ये बसलेली असताना अपघात होण्याचा मला अनुभव अजूनतरी, सुदैवानं नाही. मात्र ओळखीची एक मुलगी सीटबेल्टमुळे वाचली, हे प्रकरण माहीत आहे. ही गोष्ट अमेरिकेतली. मागच्या सीटवरच्या बाकी दोन व्यक्ती कितीतरी दिवस हॉस्पिटलात होत्या आणि हिचं खरचटण्यावर निभावलं होतं. तिला पुढे काही दिवस survivor's guiltचा सौम्य त्रास झाला.
दहा-एक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी भारतात परत आल्यावर लगेच भावाबरोबर गाडीत मागच्या सीटवर बसले. सीटबेल्ट लावला. तर भाऊ आणि गाडी चालवणारा त्याचा मित्र दोघे मला हसले. आपल्याला स्वतःच्या जीवाची काळजी नसेल तर चेंगराचेंगरीत माणसं मरतात, कुपोषणामुळे बालकं दगावतात, आणि सरकार त्याबद्दल काही करत नाही, म्हणून तक्रार करण्याचा काय अधिकार राहतो? भारतात आता सीटबेल्ट सक्ती केली असेल तर उत्तम गोष्ट केली आहे.
अपघात सांगून होत नाहीत. वेग जेवढा जास्त तेवढी अपघातामध्ये इजा अधिक. चांगले रस्ते, चांगल्या गाड्या, वेगवान वाहतूक हवे असतील तर नियम पाळणं आणि सुरक्षिततेसाठी जागरूक राहण्याला पर्याय नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अच्छा हेल्मेटचा विषय आहे. मी
अच्छा हेल्मेटचा विषय आहे. मी फक्त गविंच्या बुरखा प्रतिसादाला प्रत्युत्तर देत होते.
व्हॉट्स-अप वर आलेल्या एका
व्हॉट्स-अप वर आलेल्या एका फॉरवर्डचा एक तुकडा....
भारतात लोक आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर ओरखडे उमटू नयेत म्हणून फार जागरूक असतात पण.....
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
‘शाम, पायाला माती लागू नये
‘शाम, पायाला माती लागू नये म्हणून इतकं जपतोस. तेवढीच काळजी मनाला माती लागू नये म्हणून घेतोस का?’
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
आता परत १ जानेवारी २०१९ पासून
आता परत १ जानेवारी २०१९ पासून पुण्यात हेल्मेट सक्ती येवू घातलीये. वाहतुकीच्या बाकी गंभीर प्रश्नांकडे कधी लक्ष देणार?
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
पुणे हे आता एकमेव शहर आहे
पुणे हे आता एकमेव शहर आहे जिथे हेल्मेटसक्तीला विरोध होतो.
तिकडे सीमेवर जवान उणे ५० से तापमानात (बंदुकीच्या) गोळ्या खातायत आणि तुम्हाला हेल्मेट नाही घालता येत?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अनन्यत्व
तुम्ही पुणेकरांची स्तुती करताय. अशानं त्यांना अधिक चेव चढेल
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
त्या सैनिकांतले पुणेकर
त्या सैनिकांतले पुणेकर लष्कराच्या हेल्मेटसक्तीला विरोध करतात का?
४११००१
पुणे-१ (पुणे लष्कर अथवा पुणे कँटॉनमेंट उपाख्य 'कँप') हे राजकीय तथा सांस्कृतिकदृष्ट्या उर्वरित पुण्याहून अलग आहे, याची आपणांस कल्पना नाही काय?
(नसायचीच!)
तज्ज्ञ
रस्ते सुरक्षा विषयक तज्ज्ञ (किंवा डॉक्टर!) जर हेल्मेट सक्ती रेकमेंड करत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करावे.
उद्या हीच मंडळी अपघातांचे प्रमाण वाढण्याचे कारण हेल्मेटसक्ती आहे असे निर्लज्जपणे सिद्ध करतील.
हे कसं काय ब्वॉ?
हे कसं काय ब्वॉ?
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
स्टॅटिस्टिक्स वापरून काहीही
स्टॅटिस्टिक्स वापरून काहीही सिद्ध करता येतं म्हणतात...
आजच्या पेपर मधे पुणेकरांच्या
आजच्या पेपर मधे पुणेकरांच्या प्रतिक्रिया- दंड भरु पण हेल्मेट वापरणार नाही.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
पुण्यात गांधीवाद?
पुण्यात गांधीवाद?
दुसऱ्या वेळेस लायसन्स रद्द करण्याचा (किंवा अटक करण्याचा) नियम आला की गांधीगिरी टिकते का ते पाहू !
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
.
सत्याग्रह, सविनय कायदेभंग वगैरे साधने म्हणून कितीही प्रभावी असली, तरी त्यामुळे त्यांची साध्ये ऑपॉप, बायडीफॉल्ट न्याय्य ठरतात, असे नव्हे. (अगदी गांधींनी पुरस्कारली तरीही.)
"देवी हा संसर्गजन्य रोग नसून पोटाच्या काही विकारांमुळे रक्त अशुद्ध झाल्याकारणाने होतो. देवी हा संसर्गजन्य आहे ही अंधश्रद्धा आहे, आणि लसीकरणामुळे तिचा प्रतिबंध होतो हा गैरसमज आहे. लसीकरण ही एक रानटी प्रथा असून ती कायद्याच्या, शिक्षेच्या धाकाने लोकांवर लादली जात आहे. लसीकरण गलिच्छ प्रथा आहे. लसीकरण धर्माविरुद्ध आहे. असे धर्मबाह्य कृत्य करण्यापेक्षा देवी होऊन मृत्यू आलेला परवडला. सत्याग्रहींनी पडेल ती शिक्षा पत्करून लसीकरणाचा विरोध केला पाहिजे."
अशा प्रकारचे विचार गांधीजींनी व्यक्त केलेले आहेत.
१९२१ साली प्रकाशित झालेले महात्मा गांधींचे 'A Guide to Health' नामक एक अनुवादित पुस्तक किंडलवर मोफत उपलब्ध आहे. त्यात देवीवर एक स्वतंत्र प्रकरण आहे. गरजूंनी तथा जिज्ञासूंनी अवश्य लाभ घ्यावा. तसेच, तितकेच कुतूहल तथा धाडस असल्यास संपूर्ण पुस्तक वाचून काढावे.
किंडलावृत्ती (मोफत) उतरवून घेण्यासाठी हा दुवा.
प्रॉजेक्ट गुटेनबर्गवर हटमलस्वरूपात (मोफत) वाचण्याकरिता हा दुवा.
>>यांची साध्ये ऑपॉप,
>>यांची साध्ये ऑपॉप, बायडीफॉल्ट न्याय्य ठरतात, असे नव्हे. (अगदी गांधींनी पुरस्कारली तरीही.)
ते तर आहेच.
पण न्याय्य असते तरीही ॲक्च्युअली त्रासदायक अशी शिक्षा असेल तर "केवळ न्याय आणि तत्त्वासाठी" स्वत:चा "बळी देण्यास" यातले किती लोक तयार होतील हे पाहणे रोचक ठरेल.
"दंड भरू पण हेल्मेट घालणार नाही" असे बाणेदारपणे म्हणणाऱ्यांना पोलीसाने नेमाने रोज/प्रत्येक वेळी पकडून दंड करायला सुरुवात केली तर तीन चार दिवसांनी सत्याग्रह टिकतो का हे पहायला हवे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ढिम्म
ते सर्व ठीकच, पण सध्या तरी पोलिसांनी काही मनावर घेतल्याचं दिसत नाही. मी आज सकाळी भर रहदारीच्या वेळी विद्यापीठ चौक आणि नळ स्टॉप अशा दोन ठिकाणी कित्येक वाहनचालक बिनधोक बिनाहेल्मेटचे उजळ माथ्यानं वावरताना पाहिले. दोन्ही चौकांतले ढीगभर पोलीस ढिम्म उभे होते.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
द्याट इज देअर लिथार्जी ऑर
द्याट इज देअर लिथार्जी ऑर व्हॉटेव्हर. मागे आर आर पाटील गृहमंत्री असताना, नियम लागू आहे पण अंमलबजावणी नाही असा तोडगा सर्व शहरांसाठी (केवळ पुण्यासाठी नाही) काढला गेला होता.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मूलभूत अडचणी
पोलिसांनी खरंच मनावर घेतलं तर ह्या दोन्ही चौकांतला सकाळचा रहदारीचा रेटा, विनाहेल्मेट दुचाकीस्वारांची संख्या, पटकन दंड भरून मोकळं होण्यापेक्षा वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालत रस्त्यात थांबण्याची पुणेकरांची खोड वगैरे घटक लक्षात घेता पुण्यात अंदाधुंद माजेल ह्याचं त्यांना भान असावं असा माझा अंदाज आहे. अगदी हेल्मेटसक्तीपूर्व काळातही एखाद्या दिवशी पोलीस कारवाई करू लागले तर चार-पाच दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला हुज्जत घालत आणि तोवर तिकडे सिग्नल तोडून दुसरे दुचाकीस्वार पोलिसांना सळो की पळो करताहेत, हे दृश्य इथे सवयीचं आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ठाण्याला पोलीस जेव्हा अशी
ठाण्याला पोलीस जेव्हा अशी मोहीम चालवतात तेव्हा चौकात पाच सहा पोलीस असतात. स्वारांना अडवणारे दोन तीन, ट्रॅफिक कंट्रोल करणारे दोन तीन वगैरे. शिवाय चौकातच अडवलं पाहिजे असं काही नसतं.
तसेच हेल्मेट न घातलेल्या प्रत्येकालाच पकडायला हवे असे नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
विनामोहीम
ह्या चौकांत कसलीही मोहीम नसतानाच पाच-सहा पोलीस असतात. कारण पुण्यात तेवढे नॉर्मलीच लागतात.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मग विना हेल्मेट स्वारांना
मग विना हेल्मेट स्वारांना पकडण्याने ट्रॅफिकचा बट्ट्याबोळ होणारच नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हेल्मेट घातल्यामुळे जीव वाचला
हेल्मेट घातल्यामुळे जीव वाचला आहे अशी उदाहरणे सापडतील पण हेल्मेट न घातल्यामुळे कुणाचा अपघात झाला आहे का? या केस मधे सुरक्षितता व सोय यातील पर्याय निवडायचा झाल्यास लोक कशाला प्राधान्य देतील?
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/