मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ५७
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================
नवीन पुस्तक आलंय म्हणे: "The Clintons' War On Women"
The Clintons’ “systematically abuse women and others – sexually, physically, and psychologically – in their scramble for power and wealth,” says the book’s press release.
हे खरं असो वा नसो; मला आश्चर्य वाटले नाही. हे किंवा आआपच्या मंत्र्यावर घरगुती हिंसाचाराचे व आफ्रिकन बायकांचा विनयभंग केल्याचे आरोप, देवयानी खोब्रागडे केस किंवा ऑस्ट्रेलियातल्या राजदूताच्या घरी नोकराच्या छळाची केस.
खूप वेळा हे दिसलं आहे आणि सगळ्यांनाच माहिती असतं की मोठ-मोठ्या पदांवर जाणारी माणसं ही रुथलेस गो-गेटर असतात. वर जायचं असेल तर विधिनिषेध पाळून चालत नाही, स्वतःला काय हवंय ते माहित हवं आणि ते मिळवण्यासाठी काहीही करायची तयारी हवी. दुर्दैवाने याला यश समजतात आपल्या सिस्टीममध्ये आणि हे असंच असतं/पाहिजे असं समजणारे खूप निघतील.
या उलट ज्यांना आपण रानटी-अनसिव्हिलाईज्ड म्हणतो त्या लोकांच्या टोळीप्रमुखाला कोणतेही विशेष आर्थिक/सामाजिक लाभ नसतात; उलट जमातीसाठी त्याग करणार्याला नेता म्हणतात.
संपत्ती, पॉवर आणि सगळ्याच बाबतीत प्रचंड विषमता निर्माण करणारी व्यवस्था उत्क्रांत झाली आहे आणि ती बदलण्याचे सामर्थ्य/इच्छाशक्ती कोणाकडेही नाही.
It is too big to destroy; but it will fail because of its own weight.
ते पंच न्याय (?) करतात,
ते पंच न्याय (?) करतात, सर्वशक्तीमान असतात. शाररीक शिक्षा, आर्थिक दंड , वस्तीवरुन हाकलून देणे किंवा वाळीत टाकणे हे त्यांच्याच हातात असते. सर्व प्रकारच्या केसेस त्यांच्या समोर चालतात अगदी काडीमोडाच्या सुद्धा.
आणि प्रथांप्रमाणे त्यांना प्रत्येक कार्यात ( अगदी मयत असले तरी ) काहीतरी द्यावेच लागते.
जंगली टोळ्यांमध्ये बायको ही
जंगली टोळ्यांमध्ये बायको ही देऊन टाकायची वस्तू असते असे अनु रावांना वाटते म्हणजे त्यांना जंगली टोळ्यांची माहिती नाही
ननि - काय हो, मी असे कुठे म्हणले आहे? कैच्या कै.
काही रानटी टोळ्यांमधे टोळीच्या प्रमुखाला शिकारीतला पहिला आणी मोठ्ठा भाग मिळणे आणि टोळीतली हवी ती बाई मिळणे अशी प्रथा असते.
लग्न - बायको वगैरे असेल तर ती टोळी रानटी कशी?
डेटा सेक्युरिटी
http://www.marketwatch.com/story/safe-harbor-ruling-threatens-us-transf…
युरोपियन नागरिकांचा फेसबुक-अॅपलवरील डेटा अमेरिकेत साठवण्याची परवानगी देणारा कायदा रद्दबातल.
गेले कित्येक दिवस ऐसी वर फक्त
गेले कित्येक दिवस ऐसी वर फक्त आणि फक्त मोदी , सेक्युलर, बीफबंदी, संघ वगैरे हेच विषय चघळले जात आहेत. इव्हन पाककृती पण राजकीय रंगाच्या :-(
त्यांना कंटाळुन मी वेगवेगळे विषय काढायचे प्रयत्न केले. ऊदा, बील हिलरी कडुन मार खातो, काय ऐकताय मधे काहीतरी लिंका देणे ( खरे तर ते मी अनेक वर्षापूर्वी आणि पासुन ऐकतिय, पण फक्त दुसरा विषय काढण्यासाठी तिथे दिले ).
गम्मत म्हणजे न्यायालयाच्या व्यभीचाराच्या विअर्ड व्याख्येबद्दल एक बातमी दिली होती, त्यावर सुद्धा "अच्छे दिना" बद्दल प्रतिसाद ( एकमेव ) आला होता.
प्रश्न असा होता की,
ऐसी मालक चालकांचे आणि अॅक्टीव्ह सदस्यांना फक्त आणि फक्त ह्याच विषयावर चर्चा करायची आहे का? आणि तसे असेल तर संस्थळाच्या ध्येय धोरणात स्पष्ट पणे लिहीत का नाही?
लिहा की तुम्हीच काहीतरी
लिहा की तुम्हीच काहीतरी झक्कसं
इथे सध्या बोर्डावर नुकत्याच लोकांनी कथा लिहिल्या आहेत (स्पार्टाकस), नानावटींचे लेख आहेत, कविता आहेत, मनातल्या प्रश्नांमध्ये वॉशिंग मशीन्सवर नुकतीच चर्चा झाली..
सध्या बोर्डावरील धाग्यांचे विश्लेषण करू
एक कथा आहे
एक लवासावरील लेख आहे
कमाल नावाची कविता आहे
मनोबाच्या आठवणींचा धागा आहे
शुचिंचे ललित आहे
नानावटींचा लेख आहे
दिनवैशिष्ट्यावर चर्चा करणारा धागा आहे
अगदी शनिच्या दशे महादशेवरही एक धागा आहे
आत त्यात तुमचा सहभाग कीती हा प्रश्न बाजूला ठेऊ पण तुम्ही असाच गॉगल लाऊन बसलात तर येईल अॅक्टीव्ह सदस्यांचा नाईलाज आहे
आणि यातील एकही विषय आवडीचा नसेल तर तुम्ही करा लेखन. ती सोयही इथे आहे बरं!
पिंजरा -- नेमकं काय चुकलं ?
पिंजरा -- बहुचर्चित मराठी चित्रपट. एकाहून एक हिट्ट गाणी असलेला, "दिसला गं बाई दिसला" सारख्या लावणीपासून ते भैरव रागातल्या "तुम्हावर केली मी मर्जी बहाल" सारखी गाणी असलेला. निळू फुले, श्रीराम लागू हे व्ही शांतारामांच्या दिग्दर्शनाखाली एकत्र असलेला.
फार पूर्वी पिंजरा पाहिलेला. भारी आहे पिच्चर. पण त्यात मास्तराचं जे पात्र आहे; त्याचं काय चुकलं; घोळ कुठे झाला ह्याबद्दल उलटसुलट ऐकायला मिळालं.
कुणीतरी अगदिच सरधोपट अर्थ लावला -- "लावणी/तमाशा कित्ती वाईट असतो हे त्यात सांगितलय" किंवा "बाईच्या नादाने किती वाईट/वाट्टोळं होउ शकतं" ह्याचं ते उदाहरण. पण--
हे इतकं थेट, सरळसाधं आहे ? तमाशा वाईट वाईट्ट असला असता तमाशा अटेण्ड करणारा हरेकजण " आयुष्यातून उठला " असं होतं का ?
त्याच गावातली इतर मंडळी --कुणी पाटिल, कुणी पैलवान , कुणी नाभिक किंवा काही शेतकरी ...
ही अशी सगळी विविध मंडळी लावणी पहात असतीलच की. आपापला कामधंदा करुन झाल्यावर ते संध्या़काळी चार घटका करमणूक म्हणून फडाला येत असतील.
आवडला कार्यक्रम तर मनसोक्त शिट्ट्या वाजवून किंवा फेटे उडवून, दिलखुलास दादही देत असतील.
मनोरंजन झालं की मग घरी अन् दुसर्या दिवशी नेहमीच्या कामावर हजर!
.
.
म्हणजे, आपापला कामधंदा सांभाळून ही लोकं लावणीला येतात, त्यातली मजा लुटतात.
म्हणजे "लावणीला गेले म्हणून उध्वस्त झाले; वाटोळं झालं" असं काही त्या सगळ्यांच्याबद्दल होत नाही.
पण....
पण हे असं मर्यादेत राहून्ब मौज करणं मास्तरच्या नशिबी का नसतं ?
एक कारण म्हणजे प्रतिमा. तेव्हाच्या काळात शिक्षक ह्या व्यवसायाची प्रतिमाच एक आदरस्थानी असणारी होती.
तमाशाला सर्वसाधारण लोक जात असले तरी ह्यांनी चांगलं/सद्विचारी म्हणवले जाणार्यांनी जाउ नये असा संकेत असावा.
ह्याशिवाय अजून एक म्हणजे स्वतः मास्तर ह्या पात्रानच स्वतःविषयी निर्माण केलेली उच्चप्रतिमा.
एकदा ती केली की तुम्ही त्यातून सुटणं अवघड असतं. समाजाकडून एकदम छी थू होण्याची भीती असते.
हे म्हणजे "संन्याशाचं पोर" ह्या क्याटेगरी सारखं होतं. विवाह करणं आणि मुलं असणं ह्यात तसं फार काही गैर आहे;
अशी तेव्हाची समजूत नसेलही.पण संन्यस्त माणसानं मात्र पुन्हा कधीच संन्यासाचा मार्ग सोडू नये ही अपेक्षा होती.
आणि संन्यास-परमार्थ म्हणजे त्या नॉर्मल जीवनाहून वेगळं आणि थोर असं काहीतरी मानलेलं होतं.
तिथून पुन्हा नॉर्मलला येणं म्हणजे वरच्या पातळीवरुन खाली येणं! छी थू होणं!
मुळातच तथाकथित खालच्या(किंवा खरं तर नॉर्मल) पातळीवर असलात; तर व्यक्तीची स्वतःकडून विशेष अपेक्षा नसते;
व्यक्तीकडून समाजाचीही नसते. पण वरतून खाली येणार असलात; सामाजिक दृष्त्या, नैतिकद्रुष्त्या, तर मात्र जबरदस्त मानहानी
सहन करण्याची तयारी असायला हवी.
.
.
" संन्याशाचं पोर " हे प्रकरण आणि " पिंजरा " सिनेमा ह्यात मला तात्विक साम्य वाटतं ते ह्यामुळेच.
"लावणी/तमाशा वाईट असतो" असा संदेश त्यातून दिलाय असं मला अजिबात वाटत नाही.
मास्तर फक्त वरच्य अपातलीवरुन तथाकथित खालच्या पातळीवर पडले; इतकच नव्हे ; तर त्यांना ते एप्लवलं नाही;
ते वहावत गेले (दैनंदिन आयुश्य त्यांनी पूर्ण सोडलेलं असतं नंतर नंतर) हा लोच्या झालेला आहे.
त्यामुळे ते कथानक/तात्पर्य सरधोपट आहे; हे मला पटत नाही.
.
.
अर्थात ग्रामीण जीवन, त्यात तमाशा/लावनी वगैरेबद्दलची त्याकाळातली प्रतिमा आदि गोष्टींबद्दल मला नेमकी कल्पना नाही.
माझ्या खुर्चीत बसून थोडंफार ऐकून-बोलून-वाचून जितकं चित्र समजू शकतं गावातल्या त्या काळच्या लोकांचं; तितकच मला माहिती आहे.
त्यामुळे मला सगळं नेमकं समजलय असं म्हण्णं नाहिच. कुणी दुरुस्ती केल्यास आभारी असेन.
काचेचं भांडं
आदर्शवादी माणसाचं आयुष्य म्हणजे काचेचं भांडं किंवा बाईची अब्रू. (ही उपमा कधीपासून वापरायची होती पण चान्सच मिळत नव्हता. हल्ली तडे वगैरे एक तर जात नसावेत किंवा काहीतरी स्ट्राँग फेविकॉलसम उपलब्ध असावे.) एकदा तडा गेला की गेला. परत सांधता येत नाही.
आपल्या सर्वांना ती 'प्रॉडिगल सन'ची पॅरॅबल माहीत असेल. कामचुकार, उडाणटप्पू माणसाने कितीही चुका केल्या तरी गहजब होत नाही. पण एखाद्या सालस माणसाची छोटीशी चूकही अपेक्षाभंग करते. ह्याला दोन कारणे. एक तर सीझरची बायको संशयातीतच असली पाहिजे ही समाजाची अपेक्षा. कारण सीझर राजा आहे, तो इतरांना दंडक घालून देतो मग त्याने ते स्वतःही पाळले पाहिजेत. दुसरे म्हणजे स्वतःच्या निष्कलंक वागण्यामुळे आपणच स्वतःसाठी एक उच्च दर्जा सेट करत असतो. ती प्रतिमा भंगून चालत नाही. कारण त्यामुळे लोकांचा आपल्यावरचा विश्वास उडतो. शुभ्र कपड्यांवरचा छोटासा डागही आकाराच्या व्यस्त प्रमाणात उठून दिसतो, तसेच हे. म्हणजे 'हम आह भी करते हैं तो होते हैं बदनाम, वह कत्ल भी करें तो चर्चा नहीं होता'. असतं एकेकाचं नशीब.
वा! मस्त मांडलयस मन. तो
वा! मस्त मांडलयस मन. तो सिनेमा सन्जोपरावांच्या भाषेत सांगायचं झालं तर "आसक्ती व विरक्ती यातील संघर्ष आहे." संदर्भ - त्त्यांचा ब्लॉग.
.
सिनेमा अधःपतनावरच आहे. आदर्शवादी मास्तर ते डफात तुणतुणे वाजवणारा, झोकांड्या खाणारा बाईलवेडा असा हा प्रवास दाखविला आहे. मास्तर असण्यात काही फार थोर नाही पण बाईच्या नादात विवेकाचे भान सुटून, कर्तव्याकडे दुर्लक्ष करण्याला मात्र खालच्या पातळीवर समजले गेलेले आहे, आणि तेच शांतारामांनी अतिशय संवेदनशीलतापूर्वक सादर केलेले आहे.
.
अजुन एक ती तथाकथित खालची पातळी नाही. तुणतुणे वाजविणारा गैर नसतो पण स्वतःच्यातील पोटेन्शिअल/कुवत मारुन, कमी पातळीवरचे आयुष्य स्वीकारणे हे गैर आहे. कमी पातळी = कामांधता व मद्य यात झोकून, कर्तव्यच्युत होणे ही एक प्रकारे मास्तराच्या आयुष्याची चित्तरकथाच आहे.
Facebook वर हे कोणीतरी share
Facebook वर हे कोणीतरी share केलेलं. असं दाभोलकर म्हणाले होते का?
गणपति को डुबाने की प्रथा कैसे शुरू हुई ?
गणपति उत्सव को सर्वप्रथम शुरू करने वाले बाल गंगाधर तिलक ने पुणे में गणपति बिठाया. दस दिन तक सभा और सम्मेलनों को संबोधित किया. बिठाये गये गणपति की दसवें दिन फेरी निकाली.
गणपति का दर्शन सभी के लिए खुला रखा गया था. एक अछूत ने मूर्ति का दर्शन करने के क्रम में उसे छू दिया. इस तरह उनका गणपति अपवित्र हो गया.
ब्राह्मणों में खलबली मच गई. सभी तिलक को गरियाते हुये कहने लगे कि देखा, गणपति को सार्वजनिक किया तो धर्म डूब गया !! कौन ब्राह्मण इस मूर्ति को अपने घर में रखेगा?
तब तक फेरी पुणे के बाहर और मुला-मुठा नदी तक आ चुकी थी. तभी तिलक ने कहा, अरे चिल्लाते क्यों हो ? शांत रहो... मैं धर्म को डूबने कैसे दूंगा ? धर्म को डुबाने की अपेक्षा हम इस अपवित्र मूर्ति को ही डुबा देते हैं.
...और इस प्रकार गणपति को डुबा दिया गया. तभी से प्रत्येक वर्ष दस दिन तक तमाम अछूतों द्वारा अपवित्र हुये गणपति को डुबा दिया जाता है जिसे ब्राह्मण गणपति विसर्जन कहते हैं.
-नरेंद्र दाभोलकर
Wisdom From Single Mom (And
Wisdom From Single Mom (And President Obama Confidant) Valerie Jarrett - सुंदर, खूपच छान मुलाखत आहे. आवडली.
.
“Life is full of tradeoffs. And I think at different phases in your life, you’re able to do certain things that you can’t do at other phases, and you make choices,” Jarrett says today.
मराठी संस्थळांचे आपल्या
मराठी संस्थळांचे आपल्या मनातील स्थान. माझा संस्थळ वावर हा खालील फायद्यांचे निदर्शक आहे.
1. मनोरंजनाची एक जागा - विरंगुळ्याचे साधन
2. स्वतःची वैचारीक बैठक आजमावण्याची जागा - स्वतःचेच विचार सुस्पष्ट होतात.
3. सोशल क्लब, मित्रमित्रिणी - नेटवर्किंग वाढविण्याचे साधन
4. स्वतःच्या विचारप्रवर्तनाचे एक साधन - माझे विचार काही प्रमाणात तरी बदलले आहेत
5. एकटेपण घालवायची संधी
6. मातृभाषेशी स्वतःची नाळ जोडून ठेवण्याची संधी - मातृभाषेबद्दलचे प्रेम.
7. उत्तम साहित्य वाचावयास मिळण्याचे हमखास ठीकाण ..........................................इथे बर्यापैकी फुटले ;)
8. मराठी भाषेत पारंगत होण्याचे साधन
9. टाइमपास
असा बहुपर्यायी कौल काढायचा होता परंतु ही तांत्रिक अडचण आली की ६ पेक्षा जास्त पर्याय देताच येत नाहीत.
आजची डेमोक्रॅटिक डिबेट मिस
आजची डेमोक्रॅटिक डिबेट मिस केली. पण हिलरी ने चांगला पेर्फॉर्मन्स दिलाय असे वाचले. बर्नी सँडर्स ने "ई मेल स्कँडल" च्या विषयात हिलरीची बाजू घेतली म्हणतात. (बर्नीला जर प्रेसिडेंट नाही झाला तरी महत्त्वाचं पद हवय वाटतं ......... हे आपलं उगाचच ;) )
उद्या यु ट्युबवरती ऐकेन.
.
कोणी पाहीली असल्यास त्यांना महत्त्वाच्या वाटलेके मुद्दे शेअर करा प्लीज.
_____
बिल्ल ने ट्वीट केलय की - I'm proud of @HillaryClinton. Tonight, she showed why she should be President.
_____
ट्रन्स्क्रिप्ट वाचतेय, चर्चा फार टेपिड वाटतेय. रिपब्लिकन वाला गस्टो नाही.
ग्लोबल कॉंग्रेस ऑन इंटेलेक्च्युअल प्रोपर्टी अँड पब्लिक इंटरेस्ट
१५-१७ डिसेंबर २०१५, नेशनल लॉ युनिवर्सिटी, नवी दिल्ली येथे होणाऱ्या ग्लोबल कॉंग्रेस ऑन इंटेलेक्च्युअल प्रोपर्टी अँड पब्लिक इंटरेस्टसाठी मराठी विकिपीडियावर आमंत्रण संदेश आला आहे.
अधिक माहिती साठी हे पान वाचू शकता:- [ग्लोबल कॉंग्रेस ऑन इंटेलेक्च्युअल प्रोपर्टी अँड पब्लिक इंटरेस्ट कार्यक्रम]
आणि सहभागी होण्यासाठी २७ ऑक्टोबर २०१५ पर्यंत आपली माहिती येथे भरता येईल:- [सहभागी व्हा!]
केवळ माहितीस्तव, कोणत्याही उत्तरदायकत्वास नकार लागू
इतर धाग्यांवरील माझी व्यक्तीगत मते आणि विकि यांचा गल्लत करून अवांतरे न करण्यासाठी धन्यवाद
It makes test scores not a measure of education but a goal of ed
“The unintended consequence of Chetty’s work is a tremendous demoralization of teachers,” said New York University educational historian Diane Ravitch. “It makes test scores not a measure of education but a goal of education.”
अधोरेखित भागाचा अर्थ सांगा रे कुणीतरी.
पूर्ण लेख इथे आहे.
छानच लेख आहे. चेट्टी यांचा
छानच लेख आहे. चेट्टी यांच्या संशोधनाचे क्षेत्र "अपवर्ड मोबिलिटी" आहे अर्थात खालच्या (आर्थिक/ सामाजिक विषमता दोन्ही बाबतीत) पायरीवरच्या २०% लोकांनी वरच्या ८०% मध्ये कसे जावे, त्याकरता पॉलिसीमध्ये काय सुधारणा व्हाव्यात.
चेट्टी हे स्वतः इकॉनॉमिस्ट असले तरी ते गरीबांच्या प्रगतीचा ध्यास ऊराशी बाळगून आहेत असे या लेखात म्हटले आहे. चेट्टी हे एका पक्षाच्या प्रती बायस होऊ नयेत या हेतूने, स्वतः मतदान करणार नाहीयेत - That aim in itself shows his credibility.
चेटींचे मत हे आहे की "जे शिक्षक , विद्यार्थ्यांचे परीक्षेतील गुणांक वाढवतात ते शिक्षक नकळत विद्यार्थ्यांच्या अपवर्ड मोबिलिटीस कारणीभूत होतात."
यावरुन काही शिक्षक नाराज झालेले दिसतात - की परीक्षेतील गुणांकांना या रिसर्चमुळे अवास्तव महत्त्व दिले गेले आहे. गुणांकाने शैक्षणिक पात्रता मोजण्याऐवजी, परीक्षेत हाय स्कोअर मिळविणे, तसा विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून शिक्षकांनी झटणे हाच उद्देश्य बनला आहे/बनू शकतो.
___
यात न समजण्यासारखं काय आहे विशेषतः गब्बर यांच्यासारख्या बुद्धीवान व्यक्तीला. तेव्हा वरील प्रश्न हा ऐसीकरांना फक्त लेख वाचण्यास उद्युक्त करण्यासाठी त्यांनी लिहीला आहे असा (गोड) आरोप मी करते ;)
फारच प्राचीन
चकली हा शब्द उघड उघड 'चक्र'वरून आलेला आहे. पवित्र दिवशी श्रीविष्णूच्या अतिपवित्र सुदर्शनचक्राचे स्मरण राहावे म्हणून चकली करतात. शेव हा शब्दसुद्धा तसाच उघड उघड शिव किंवा शैव शब्दावरून आला आहे. शिवशंकराच्या सामर्थ्यशाली आणि दाट गुंताळ्याच्या जटांचे-ज्या जटांनी गंगौघही झेलून धरला-स्मरण व्हावे यासाठी शेव केली जाते. हा अखिल विश्वपसारा हे एक मोठे शून्य आहे (शून्यमिदम् वगैरे) याची जाणीव करून देतो म्हणून लाडू हवा. शिवाय शून्यातून शून्य काढले तरीही शून्यच उरते तद्वतच लाडू (खाऊन) नाहीसा झाला तरी शून्य लाडू उरतोच. कडबोळे हा शब्द कुतोबल ह्यावरून आलेला आहे. म्हणजे कुठवर तुझे बळ असे सांगून तो माणसाचे यःकश्चित्, क्षुद्र, क्षणभंगुर पामरत्व दाखवून देतो.
आणि इतकेच पदार्थ नव्हेत तर करंजी, अनरसे, शंकरपाळे इत्यादि विविध पदार्थ केले जातात त्यांमागेही गहनदाट आशय असलेली पवित्र आणि प्राचीन परंपरा आहेच. (ती पुढील अंकी.)
१२ नोव्हेंबर १९७० : सर्वात
१२ नोव्हेंबर १९७० : सर्वात हानिकारक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ 'भोला' बांगलादेशात (तेव्हाचा पूर्व पाकिस्तान) दाखल. तीन लाख मृत.
वादळांना हे "भोला" वगैरे नाव कोण ठेवतं? भारताप्रमाणे, पाकिस्तानात, अमेरीकेत, कॅनडा, ऑस्ट्रेलिआतही (You must have got the point ;) ) हे वादळ "भोला" नावानेच ओळखले जाते का?
कोलंबसास 'नवे जग' सापडण्यापूर्वी (अर्थात, थोडेसे आमचेही पाखंड)
(वरील 'दिवाळी फराळा'वरून आठवले.)
कोलंबसास 'नवे जग' सापडण्यापूर्वी...
(१) 'मराठी माणूस' एकादशीस 'परंपरेने' नेमके काय खात असावा?
(उपवासाच्या बहुतांश पदार्थांचे बहुतेक कच्चे घटक - साबूदाणा, शेंगदाणे, मिरच्या, बटाटे, रताळी - हे मुळातले 'नव्या जगा'तले. कोलंबसास 'नव्या जगा'चा शोध लागण्यापूर्वी 'जुन्या जगा'त अस्तित्वात नव्हते; ठाऊक असण्याचा प्रश्न नसावा. कोलंबसाबरोबर आणि त्यानंतर 'नव्या जगा'त धुमाकूळ घालणार्या इतर दर्यावर्दी मंडळींबरोबर ते प्रथम 'जुन्या जगा'त - त्यातही युरोपात - पोहोचले. युरोपियनांबरोबर - बहुधा पोर्तुगीज़ांबरोबर - हिंदुस्थानात आले असावेत. बोले तो, शिवाजीमहाराज एकादशीस साबूदाण्याची खिचडी आणि उकडलेली रताळी खात असण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही, परंतु ज्ञानेश्वरमाऊली तसे करत असण्याची शक्यता अजिबात नाही.
याचाच उपप्रश्न असा, की एकदा पोर्तुगीजांबरोबर - किंवा अन्य कोणा युरोपियनांबरोबर - हे सर्व कच्चे पदार्थ हिंदुस्थानात पोहोचल्यानंतर 'त्यांची अशाअशा रेशिपीने साबूदाण्याची खिचडी बनवावी' ही कल्पना प्रथम नेमकी कोणास आणि कधी सुचली असावी? अर्थात, साबूदाण्याच्या खिचडीचा/ची आद्य जनक/नी कोण आणि कधीचा/ची?)
(२) चिनी भोजनाचे 'सर्वात मका' असे जे वर्णन कोणीतरी (बहुधा पु.लं.नी - खात्री नाही; चूभूद्याघ्या.) करून ठेवलेले आहे, त्यात, कोलंबसास 'नवे जग' सापडण्यापूर्वी, स्वीट कॉर्न सूप आणि ज्यातत्यात कॉर्नफ्लोअर यांऐवजी 'परंपरेने' काय खात / वापरत असावेत? (मकादेखील मूळचा 'नव्या जगा'तलाच.)
(३) फॉर द्याट म्याटर, 'पंजाब' म्हटल्यावर लगेच जे 'मक्के दी रोटी और सरसों दा साग'द्वय डोळ्यांसमोर उभे राहते, त्याऐवजी कोलंबसपूर्व पंजाबी (चुकून 'सरदारजी' म्हणणार होतो, परंतु कोलंबसपूर्व काळात सरदारजी बहुधा नसावेत; चूभूद्याघ्या.) सरसों दा साग नेमका कशाबरोबर तोंडीलावणे म्हणून खात असावा? (की उपाशी राहत असावा?)
(आणखीही प्रश्न आहेत. परंतु तूर्तास इतकेच.)
मूलगामी
हा प्रतिसाद बटाटे, रताळी आणि शेंगदाण्यांच्याबाबतीत 'मूलगामी' ठरावा. (प्रतिगामी, पुरोगामी हे आधीच अस्तित्वात असलेले दोन पंथ लक्षात घेता हा पर्यायी सशक्त तृतीय पंथ ठरू शकण्याची क्षमता यात दिसून येते.)
अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद. (श्रेणी दिली गेल्या आली गेली आहे.)
हे मूलगामी???
अहो, खरे मूलगामी प्रश्न तर अजूनपर्यंत विचारलेलेच नाहीत.
बोले तो,
१. फिरंग्याने (?) पाव टाकलेल्या विहिरीतले पाणी प्यायल्याने आमचा धर्म (बहुधा त्याच विहिरीत) बुडून आम्ही बाटत असू ना?
२. त्या पंचहौद मिशन प्रकरणात१ म्लेंच्छाच्या हातचा चहा पिऊन धर्म बुडविल्याबद्दल टिळकांना२ ग्रामण्य की कायश्याश्या भानगडीस३ तोंड द्यावे लागून प्रायश्चित्त घ्यावे लागले होते ना?
मग त्याच फिरंग्याने आणलेला साबूदाणा, बटाटे, रताळी, मिरच्या नि शेंगदाणे यांना आमच्या (सदान्-कदा बुडत्या) धर्माने उपवासाचे पवित्र खाणे म्हणून डोक्यावर कसे काय चढवून घेतले बुवा? हरएक एकादशीस हे बाटगे जिन्नस खाऊनच्या खाऊन आमचा धर्म अजूनपर्यंत कसा काय तरंगून राहिला आहे बुवा?
---------------------------------
तळटीपा:
१ हे काय होते, ते तुम्हीच सांगा.
२ रे. नव्हे. लो.
३ ही नक्की काय भानगड असते, तेसुद्धा तुम्हीच तपशीलवार समजावून सांगितलेत, तर बरे होईल. धन्यवाद.
..मान वरखाली (हनुवटी छातीकडे
..मान वरखाली (हनुवटी छातीकडे आणि पुन्हा ऊर्ध्वदिशेत) अशा हालचालीने "हो" म्हणणं आणि मान खांदा टु खांदा हलवून "हो" म्हणणं यात फरक नक्की आहे असं वाटतं. तो काय असावा.
पहिली हालचाल ही थेट आपल्याला जबाबदारी आणि निर्णय खुद्द घेऊन होकार द्यायचा असतो तेव्हा अन दुसरी हालचाल इतर कोणाचातरी निर्णय केवळ मान्य करायचा असेल (चालेल) तर असते का?
"नाही" यासाठी मात्र मानेची एकच हालचाल आहे.
दुसऱ्या धाग्यामुळे प्रश्न
दुसऱ्या धाग्यामुळे प्रश्न पडला.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांनाच शेतजमीन खरेदी करता येते असा कायदा करण्यामागचा विचार काय होता?
समजा एका माणसाच्या नावावर शेतजमीन आहे, तर त्याच्या वारसांना शेतजमीन खरेदी करता येते. ही शेतजमीन विकली तरीही नंतर शेतजमीन खरेदी करता येते. पण वारसांच्या वारसांना जमीन खरेदी करता येईल का?
शेतजमीन धनदांडग्यांच्या हाती
शेतजमीन धनदांडग्यांच्या हाती जाऊ नये म्हणून हा कायदा केला असावा. Passive landlord system ला मोडीत काढण्यासाठी कूळकायदा आणून मालकीचं हस्तांतरण कसणाऱ्याच्या (labour rich व्यक्तीच्या) हाती झालं. आता हीच जमीन capital rich व्यक्तीला capitalच्या जोरावर हडपता येऊ नये म्हणून हा नियम.
जर विकत घेणाऱ्या व्यक्तीच्या सख्ख्या आजोबांपर्यंत कोणाच्याही नावे त्यांच्या हयातीत कधीही शेतजमीन असेल तर त्याला शेतजमीन घेता येते असा काहीतरी नियम आहे.
शेतजमीन धनदांडग्यांच्या हाती
शेतजमीन धनदांडग्यांच्या हाती जाऊ नये म्हणून हा कायदा केला असावा. Passive landlord system ला मोडीत काढण्यासाठी कूळकायदा आणून मालकीचं हस्तांतरण कसणाऱ्याच्या (labour rich व्यक्तीच्या) हाती झालं. आता हीच जमीन capital rich व्यक्तीला capitalच्या जोरावर हडपता येऊ नये म्हणून हा नियम.
शेतजमीन ही कॅपिटल असते. आणि इतर अनेक कॅपिटल प्रमाणे (उदा. लेथ मशीन, वेल्डिंग मशीन, पॉवर लूम) ती डेप्रिशिएट होत नाही. बरेचदा अॅप्रिशिएटच होते.
तसेच लेबर सुद्धा ... अॅप्रिशिएट होत जाते अनेकदा.....(ह्युमन कॅपिटल...)
हम्म. प्रत्यक्षात न कसलेली
हम्म.
प्रत्यक्षात न कसलेली जमीन हा डेपरिशिएबलच नव्हे तर इम्पेयर्ड ऍसेट असतो. कारण जमिनीवर तण माजतं, विहिरी बुजायला लागतात, वाट्याच्या पाण्यावर शेजारचा शेतकरी कबजा करतो.
कोणत्याही प्रकारची सरकारी मदत मिळवण्यासाठी पीक का घेतलं नाही वगैरेची लांबरुंद कारणं द्यावी लागतात. अर्जावर ठेवलेली वजनं वेगळी.
सहजासहजी विकताही येत नाही.
नापीक/पडीक जमिनीला कॅपिटल म्हणवत नाही.
(गेले काही महिने हा प्रकार जवळून अनुभवतो आहे)
सहजासहजी विकताही येत
सहजासहजी विकताही येत नाही.
भावनिक कारणं हे एक मुख्य. (बापजादे ज्यावर पोसले ती काळी आई वगैरे.)
दुसरं, जास्त व्यवहारिक कारण असं आहे, की शेतजमिनीला मार्केट असेलच असं नाही. (बागायती जमिनी, हायवेशेजारच्या जमिनी, कोणत्यातरी जाणत्या राजाला प्रोजेक्ट उभारण्यासाठी पाहिजे असलेल्या जमिनी वगैरे अपवाद आहेत अर्थात.)
वि. पु. भागवतांचा छापखान्यावरील लेख
'मौज' प्रकाशनाचे मुद्रणतज्ज्ञ वि. पु. भागवत (श्रीपुंचे भाऊ) यांनी छापखान्यातल्या यंत्रांवर कधी काळी दोनेक पानी (ललित) लेख लिहिला होता. त्यात यंत्रांची वर्णनं, आवाज, छापखान्यातलं वातावरण, इ. गोष्टी होत्या.
तो लेख कुणाकडून मिळू शकेल काय ? किमान कुठल्या अंकात वा पुस्तकात आला होता, कुठल्या वर्षी, इ. तपशील इथे कुणाला माहीत आहेत का ?
थेटरमध्ये सिनेमाआधी
थेटरमध्ये सिनेमाआधी राष्ट्रगीत का वाजवतात? माझी तर चिडचीड होते. अरे उगाच काय सगळीकडे देशभक्तीचं प्रदर्शन करायचं? उगाच काहितरी. पण नंतर वाटतं की सिनेमा बघणं ही तशी चैनीची गोष्ट आहे. ती चैन करण्यासाठी किंवा मौजमजा करण्यासाठी स्वातंत्र्य लागतं. ते स्वातंत्र्य कोणामुळे तरी मिळालेलं असतं/ कोणीतरी तुमच्यासाठी राखत असतं. सिनेमाआधीचं राष्ट्रगीत हे सांगण्यासाठी आहे का की ही जी तुम्ही मजा करतायत ती कोणीतरी तुम्हाला प्रोटेक्ट करतय त्यामुळे करता येतिये. पण मग नाटकाआधी का नाही रा.गी.? हाटेलात चरताना का नाही? समजत नाय.
(वॉट्सॅपावर, रा.गी. चालू असताना उभं राहिलं नाही म्हणून कोणालातरी थेट्रातून इतर प्रेक्षकांनी हाकललं अशी बातमी ऐकली. त्यानंतर आलेले हे विचार.)
सहमत आहे. राष्ट्रप्रेम आणि
सहमत आहे. राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रगीताला उभे रहाणे याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही
(एक सामाजिक संकेत म्हणून मी उभा रहातो. पण म्हणून प्रत्येकाने तसे उभे रहावे असा माझा हट्ट नाही)
मुळात सुर्यास्तानंतर ध्वज फडकावत नैत ना? शिवाय राष्ट्रगीत ५३ का कायतरी सेकंदात संपवायला हवे असाही दंडक आहे ना? थिएटरात ते पाळले जातात का?
व्हर्ज्युअल ध्वज रात्री ११ ला पण फडकत असतो
रा.गी. चालू असताना उभं राहिलं नाही म्हणून कोणालातरी थेट्रातून इतर प्रेक्षकांनी हाकललं अशी बातमी ऐकली.
बापरे.. हे कै च्या कै आहे!
नशीब रोज सकाळी ऑफिसात आल्यावर राश्ट्रगीत वाजत नाही. ते ही आमचं करमणूकीचंच ठिकाण आहे ;)
असेल किंवा नसेल पण कायदा बरंच
असेल किंवा नसेल पण कायदा बरंच काही सांगतो त्यातल्या इतर गोष्टी कुठे पाळातात?
बाकी ही संबंधित बातमी वाचली बातमी सुदैवाने ठिक आहे. पण त्याखालच्या प्रतिक्रिया वाचून चिंता वाटते आगामी काळाबद्दल! :(
अर्थात यात नवं काहीच नाही पण हे असं भस्सकन समोर आलं की समोर काय वाढून ठेवलंय आपल्याकडे याबद्दलची ती चिंता आहे!
हा अग्रलेख तर म्हणतो असा
हा अग्रलेख तर म्हणतो असा कोणताही कायदा नाही
मुळात राष्ट्रगीत, तेदेखील चित्रपटाच्या पडद्यावर, सुरू असताना उभे राहायला हवे असा कोणताही कायदा वा नियम नाही. राष्ट्रसन्मानाची प्रतीके सांभाळावीत कशी, त्यांचा आदर कसा करावा हे स्पष्ट करणाऱ्या प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर अॅक्ट १९७१ या कायद्यात अशा कोणत्याही नियमाचा उल्लेख नाही. राष्ट्रगीत म्हणू पाहणाऱ्यास रोखण्याचा प्रयत्न झाला तर मात्र तो राष्ट्रचिन्हाचा, राष्ट्रगीताचा अपमान ठरतो आणि तो करणाऱ्यास तुरुंगवास घडू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्या समारंभात राष्ट्रगीत प्रत्यक्ष गायले जात असेल आणि उपस्थितांनी उभे राहून मानवंदना दिली नाही तर देखील तो राष्ट्रगीताचा अपमान ठरतो. परंतु हा नियम चित्रपटाच्या पडद्यावर अप्रत्यक्षपणे वाजविल्या जाणाऱ्या राष्ट्रगीतप्रसंगी लागू होत नाही.
इसिलियेच बोला 'बहुधा'.परंतु
इसिलियेच बोला 'बहुधा'.
परंतु हा नियम चित्रपटाच्या पडद्यावर अप्रत्यक्षपणे वाजविल्या जाणाऱ्या राष्ट्रगीतप्रसंगी लागू होत नाही.
ये पब्लिक को क्या मालूम. रा.गा. सुरू झालं की उठायचं आणि भा.मा.की ओरडलं की जय म्हणायचं!
अवांतरः मी कंदीमंदी सकाळी एका कॉलेजच्या मैदानावर पळायला जातो. तिथे साडेसातला लाउडस्पीकरवर राष्ट्रगीत वाजवलं जातं. पळणारे लोक जागीच उभे रहातात एक मिनीट आणि झालं की पळणं/चालणं सुरू. कधी कधी एखादा नवखा गडी असतो/असते. तो जर कानात बुंडुक घालून पळणारा असेल तर त्याला स्पीकरवर राष्ट्रगीत सुरू झालंय हे समजत नाही. तो पळत रहातो. मग इतर उत्साही पब्लिक त्याला हातवारे करून ओय! ओय! अशा हाका मारतं. (एखादी पोरगी असेल तर अधिक चेव येतो पब्लिकला असही निरिक्षण आहे! ) तो/ती गोंधळतो. तो कानातलं बुंडुक काढून हातवार्यांच्या कर्त्याशी संवाद साधायला जातो. मग तोपर्यंत त्याला उमजतं की लाउडस्पीकरवर रा.गी चालू आहे आणि तो थांबतो. हे होइपर्यंत राष्ट्रगीत संपतं. मोहक दृष्य असतं ते.
त्याचप्रमाणे एखाद्या समारंभात
त्याचप्रमाणे एखाद्या समारंभात राष्ट्रगीत प्रत्यक्ष गायले जात असेल आणि उपस्थितांनी उभे राहून मानवंदना दिली नाही तर देखील तो राष्ट्रगीताचा अपमान ठरतो. परंतु हा नियम चित्रपटाच्या पडद्यावर अप्रत्यक्षपणे वाजविल्या जाणाऱ्या राष्ट्रगीतप्रसंगी लागू होत नाही.
हा "लिटरल इंटर्प्रिटेशन"चा प्रकार नव्हे का?
कायद्यामागचा हेतू पहायला हवा.
प्रत्यक्ष गायलेल्या राष्ट्रगीताला उभं राहिलं नाही तर अपमान नक्की कोणाचा / कशाचा होतो आहे? राष्ट्रगीताचा अपमान - पर से - होऊ शकत नाही, कारण ती काही सजीव वस्तू नाही. हे म्हणजे "हेल्मेटला रडू आलं" किंवा "कंबरपट्ट्याला गुदगुल्या झाल्या" म्हणण्यासारखं आहे.
याचा अर्थ ते राष्ट्रगीत ज्या लोकांचा मानबिंदू आहे, किंवा अस्मितेचा विषय आहे त्या लोकांचा अपमान होतो आहे. मग ते राष्ट्रगीत प्रत्यक्ष म्हटलं काय, किंवा पडद्यावर वाजवलं काय, किंवा मोबाईलवर वाजवलं काय, फरक करण्याचं कारण नाही.
हा "लिटरल इंटर्प्रिटेशन"चा
हा "लिटरल इंटर्प्रिटेशन"चा प्रकार नव्हे का?
अर्थातच!
कायद्यामागचा हेतू पहायला हवा.
सहमत आहे. मात्र या कायद्यामागे आपले झेंडे जाळणे वगैर प्रकार केल्यावर क्रांतिकारकांना चाप बसवता यावा असा ब्रिटिंशांचा हेतू असावा.
स्वतंत्र भारतात तो चोप्य पस्ते झाला आहे 'बहुधा' :प
स्मोकिंग ही निव्वळ व्यक्तिगत
स्मोकिंग ही निव्वळ व्यक्तिगत आरोग्याची बाब नाही. पॅसिव्ह स्मोकिंग वा अन्य मार्गाने कुटुंबय इतर समाजावरही परिणाम होतो. तेव्हा तुमच्या आरोग्याची काय झक मारायची ती मारा, पण माझ्या आरोग्याशी खेळायचा अधिकार तुम्हाला नाही! ते असो.
अर्थात व्यक्तिगत बाणा/आवड आणि सार्वजनिक आरोग्य यांत आम्हाला सुयोग्य वाटणारी बाजु आम्ही घेतो, तुम्ही तुम्हाला वाटणारी घेता आहातच! :)
तक्रार
जालावर कोणी अश्लील ब्लॉग चालवत असेल व त्यावर 'इनसेस्ट' भर्या कहाण्या लिहित असेल, तर तो कायद्याने गुन्हा ठरतो का ? आणि त्याची तक्रार कुठे करावी ? कारण अशा लिखाणामुळे समाजस्वास्थ्य बिघडून, 'निर्भया' केससारखे अल्पवयीन गुन्हेगार तयार होण्याची शक्यता आहे. वानगीदाखल एक लिंक देत आहे.
https://other.literotica.com/stories/memberpage.php?uid=1397040&page=su…
ह्या महाभागाने आपल्या आई व बहिण यांच्याबाबत गलिच्छ लिखाण केले आहे.
मला या तक्रारीमागची भूमिका
मला या तक्रारीमागची भूमिका नीट कळलेली नाही. को ण त्या ही प्रकारच्या लेखनामुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळण्याची 'शक्यता' कुणालातरी वाटते, म्हणून त्यावर बंदी घालावी? का? त्याचे समर्थन काय? वाचायला वा बघायला काहीही उपलब्ध असू शते. पण ते उपभोगणे आणि प्रत्यक्ष गुन्हा करणे यांत निर्णयाची मोठीच्या मोठी ग्याप असते. बाकी, हे लेखन किती चूक, किती बरोबर यांत तर शिरायलाच नको, तूर्तास.
या उलट ज्यांना आपण
ये तुमको किस्ने बोला ननि.