Skip to main content

ब्रेक्झिट - ब्रिटीश स्वातंत्र्य

ब्रिटीश स्वातंत्र्य चिरायु होवो. :-)

गब्बर सिंग Fri, 24/06/2016 - 09:31

In reply to by ऋषिकेश

जग अजूनही उजवीकडेच झुकते आहे याचा आणखी एक पुरावा.

डेव्हिड कॅमेरॉन हा "रिमेन" साठी जोरदार प्रचार करत होता. कॅमेरॉन हा उजवा आहे.

अनु राव Fri, 24/06/2016 - 09:34

In reply to by ऋषिकेश

ऋ खरे तर हा कष्ट करुन जगणार्‍यांचा विजय आहे. लंडन आणि साऊथ मधले पैश्याशी खेळणार्‍यांना युरोप मधे रहायचे होते, पण कष्ट करुन खरेखुरे उत्पादक काम करणार्‍यांना ( शेतकरी, सुतार, बिल्डर वगैरे ) युरोप चे लोढणे नकोय. स्कॉटीश लोकांचा वेगळाच हेतू असल्यामुळे ते युरोपच्या बाजुनी होते.

अनु राव Fri, 24/06/2016 - 09:47

In reply to by अनुप ढेरे

एम्पी ना चोपून काढु आम्ही, आता पुढच्या निवडणुकीत युकेआयपी सरकार. फ्रांस मधे पेन, हाम्रीकेत ट्रंप.

अस्वस्थामा Fri, 24/06/2016 - 18:28

In reply to by अनु राव

अग्गागा. अनुराव. ब्रेक्झिटचे रिझल्ट पाहून तुमच्या या भाकिताची पण शक्यता जास्त वाटतेय . ;)
बादवे, तो बोरिस बाबा, पीयम व्हायचं म्हणतोय. कदी मिनिस्टर होईल असं पण वाटलं नव्हतं तो पीयम झाला तर काय होईल काय माहीत.

बॅटमॅन Fri, 24/06/2016 - 19:43

In reply to by आदूबाळ

हा हा हा. एकच लंबर! वाळवंटी लोक अनुरावांच्या लाडक्या इंग्लंडची वाट लावतील तेव्हा कसं व्हायचं हो मग.

अतिशहाणा Fri, 24/06/2016 - 19:53

In reply to by बॅटमॅन

वाळवंटी लोकांचं जितकं व्हायचं तितकं वाटोळं झालेलंच आहे. पण आजच रेडोवर ऐकले की ब्रिटनमध्ये जेवढे बाहेरुन लोक आलेत त्यापेक्षा जास्त ब्रिटीश हे यूकेबाहेर युरोपात राहतात. त्यांची या निर्णयाने चांगलीच वाट लागली आहे. विशेषतः पौंडाच्या घसरणीमुळे आणि युरोपियन युनियनच्या हेल्थकेअर-टॅक्सेशन वगैरे नियमांमुळे त्यांची पुरती गोची होणार.

.शुचि. Fri, 24/06/2016 - 20:00

In reply to by अतिशहाणा

ही ब्रिटसची अवलाद रेसिस्टच साली. आमच्या व्हरमॉन्टच्या हापिसात, लेडीज रेस्ट्रुममध्ये काही कारणाने बेसिन फार ओले होत असे. म्हणजे नळाचे पाणी बाहेर येऊन बेसिनच्या कट्ट्यावरती थारोळे (वा किती दिवसांनी वापरला हा शब्द) साचत असे. मी पाहील, एका बाईने चिठ्ठी लावलेली अतिशय तिरकस्+दीडशहाणी+ पण witty ;) की जर बेसिन वाचवायचे असेल तर पाणी साचू देऊ नका, वस्तू नीट वापरा टाइप्स. अन खाली सही - एक ब्रिटीश नॅनी.
च्यायला मी फाडूनच टाकली. मला ब्रिटसचा अत्यंत राग आहे. लोभी जमात ..... व्यापारी साले....

सैराट Fri, 24/06/2016 - 21:47

In reply to by .शुचि.

ऑस्ट्रेलियन लोकांशी गाठ पडली तर तुमचं हे मत बदलेल असं वाटतं. जगातले सर्वात जास्त आढ्यतेखोर लोक म्ह्णजे ऑस्ट्रेलियन.

.शुचि. Fri, 24/06/2016 - 21:52

In reply to by सैराट

ऑस्ट्रेलिअन लोकांनी आपल्यावर राज्य केलं नाही. जोवर आपली खोडी काढत नाही तोवर आपण कशाला कोणाला नावं ठेवा?

अरविंद कोल्हटकर Fri, 24/06/2016 - 23:00

In reply to by बॅटमॅन

अमेरिकेत जसे 'Pilgrim Father'चे वंशज असणे हे अमेरिकन निळ्या रक्ताचे एक गमक आहे तसेच ऑस्ट्रेलियामध्ये पूर्वज 'transported for life'वाला होता हे अभिमानाने सांगितले जाते.

.शुचि. Fri, 24/06/2016 - 23:43

In reply to by बॅटमॅन

मी असेही लोक पाहीलेत ज्यांना सकाळी सकाळी व एका पर्टिक्युलर वेळी कोठा साफ होण्याचा अभिमान असतो. =))
फक्त आपली रेघ मोठी कशी होइल ते लोक पहात असतात तेजायला.

अनुप ढेरे Sat, 25/06/2016 - 23:23

In reply to by अरविंद कोल्हटकर

या 'transported for life'वाल्यांना प्रजा पैदा करायला बायका कशा मिळाल्या? का त्याही 'transported for life'वाल्या होत्या? का अबॉरिगिनल?

अनु राव Sun, 26/06/2016 - 11:59

In reply to by बॅटमॅन

बॅटोबा - कैद्यांच्या वंशजांनी आत्ताचा ऑस्ट्रेलिया तयार केला ( जो तुला पटत नसला तरी थर्ड वर्ड देशांपेक्षा खूप चांगला आहे ) म्हणजे तूच बघ. जिथले गुन्हेगार इतके चांगले निर्माण करु शकत असतील तर ...

बॅटमॅन Sun, 26/06/2016 - 23:46

In reply to by अनु राव

कैद्यांच्या वंशजांनी जर हवेतून ऑस्ट्रेलिया निर्माण केला असेल तर सहमत. बाकी भक्तियोग चालूदे. बायदवे ऑस्ट्रेलियाचा जीडीपी भारतापेक्षा कमी आहे बरं का. पण भक्तियोग आणि तथ्यांचा परस्परसंबंध असेलच असे नाही.

सैराट Sat, 25/06/2016 - 22:59

In reply to by बॅटमॅन

;) बराच भूगोल बदलेल असं दिसतंय -

स्कॉटलंडमध्ये ब्रिटिश साम्राज्यातून बाहेर पडण्याची मागणी पुन्हा उठतेय.
उत्तर आयर्लंडमध्येही ब्रिटिश साम्राज्यातून बाहेर पडण्याची मागणी उठतेय.
वेल्स सुद्धा ब्रिटिश साम्राज्यात राहील कीं नाही माहीत नाही. अनिश्चितता उद्भवलीय.
स्पेन जिब्राल्टरवर आपला हक्क सांगतंय.

यूकेचे तुकडे झाल्यावर ब्रिटिशनिष्ठांचे उमाळे कसे भरभरून वाहतील ते पाहणे रोचक ठरेल.

सैराट Fri, 24/06/2016 - 21:50

In reply to by चिंतातुर जंतू

NSG मध्ये दाखल होण्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी घेऊन आपले प्रधानसेवक असं करतील का असा खोचक सवाल काँग्रेसने विचारलाय.

अतिशहाणा Fri, 24/06/2016 - 21:52

In reply to by सैराट

कांग्रेसची मागणी कैच्याकै आहे. देशातील जनतेने सार्वमतामध्ये पंतप्रधानांच्या आवाहनाला झिडकारुन वेगळा कौल देणे आणि ब्राझील-चीन-पाकिस्तानने भारताची मारणे यात फरक आहे.

अनुप ढेरे Sat, 25/06/2016 - 10:46

In reply to by अतिशहाणा

राजिनाम्याची मागणी कैच्याकै आहेच. पण स्वित्झर्लंड आणि ब्राझीलने पण विरोधी मत देणं हे खूप मोठं अपयश आहे. तोंडावर पडणंच. एक मुद्दा आहेच की NSGचे बहुतेक सगळे फायदे ऑल्रेडी भारताला मिळतायत तर केवळ या सिंबालिझमसाठी एवढी राजकीय शक्ति खर्च करणं सयुक्तिक आहे का?

अनु राव Fri, 24/06/2016 - 14:15

In reply to by बॅटमॅन

म्हणजे थेरड्यांपायी तरुणांचा बळी जातोय तर.

ह्या म्हणण्याला बेसिस काय? उलट तरुण जर बहकले असतील सध्याच्या अती०मुक्तते मुळे तर थेरड्यांनी वाचवलेच आहे असे म्हणता येइल. पोलिश आणि रुमानियन लोक येतात ते थेरड्यांचे जॉब घ्यायला नाही तर तरुणांचे जॉब घ्यायलाच.

बॅटमॅन Fri, 24/06/2016 - 14:18

In reply to by अनु राव

पोलिश आणि रुमानियन लोक सगळे स्किल्ड आहेत की अन्स्किल्ड? अन्स्किल्ड असतील तर ब्रिटिशांना उर्वरित ईयूमध्ये जायला मुक्तद्वार होते. स्किल्ड असतील तर स्वतःच्या स्किल्स वाढवून घ्या म्हणावे, बापजाद्यांच्या पुण्याईवर किती दिवस जगणार?

अनु राव Fri, 24/06/2016 - 14:28

In reply to by बॅटमॅन

स्कील्ड आहेत की नाही हा प्रश्न नाहीये. आमच्या सारखे भारतीय युकेत जातात ते काही तिथल्या लोकांपेक्षा स्कील्ड असतात म्हणुन नाही तर स्वस्त असतात.

थोड्या प्रमाणात, स्क्रुटीनी होऊन लोकांना काम करायला प्रवेश देणे आणि दार उघडे ठेऊन सर्वांना या म्हणणे यात फरक आहे.

पोलिश लोक मुळातच हुशार आहेत आणि रुमानियन पण वाईट नाहीयेत. प्रश्न स्कील्ड आहेत की नाही हा नाहीये.

बांग्लादेशी आणि बिहारी पण मराठी लोकांपेक्षा स्कील्ड आहेत म्हणुन अगदी कोकणात पण घरे बांधणारे काँट्रॅक्टर कोकणी आणि लेबर बांग्लादेशी असे झाले आहे.

बापजाद्यांच्या पुण्याईवर किती दिवस जगणार?

ह्या वाक्याला काही अर्थ च नाहीये. त्या लोकांना वाटले की बाहेरच्या लोकांना आपल्या देशात मुक्तप्रवेश नसावा. असे वाटण्याचे जे काही परीणाम असतील तर ते भोगतील. जो तो आपापल्या मेरीट वर तगेल. इंग्लंड ला बुडायचे असेल तर बुडेल आणि नसेल बुडायचे तर नाही बुडणार. तसेही बापजादे पुण्यवान असतील तर मुले निघताचच पुण्यवान.

बॅटमॅन Fri, 24/06/2016 - 14:31

In reply to by अनु राव

थोड्या प्रमाणात, स्क्रुटीनी होऊन लोकांना काम करायला प्रवेश देणे आणि दार उघडे ठेऊन सर्वांना या म्हणणे यात फरक आहे.

तरण्यांना तरी मुक्तद्वारात फायदा दिसत होता बॉ. दारे बंद करून बसायचं असेल तर तसं का होईना. थेरड्यांनी मजा आणली बाकी.

तसेही बापजादे पुण्यवान असतील तर मुले निघताचच पुण्यवान.

हॅ हॅ हॅ. उत्तम राजनिष्ठ प्रतिसाद.

मिलिन्द् पद्की Wed, 29/06/2016 - 22:05

In reply to by बॅटमॅन

भांडवल आणि तयार मालाला मुक्तद्वार , फक्त लेबर स्थलांतरावर बंदी, हे कसे काय ?

अनु राव Thu, 30/06/2016 - 10:22

In reply to by मिलिन्द् पद्की

भांडवल आणि तयार मालाला मुक्तद्वार , फक्त लेबर स्थलांतरावर बंदी, हे कसे काय ?

तुम्हाला तयार माल आणि लेबर ह्याच्यात काही फरक दिसत नाही?

भांडवल आले तर रोजगार निर्मीती होते.
तयार माल आला तर काहीच नाही तर कमीत कमी माल, रॉ मटरीयल तर येऊन पडते आपल्या देशात.

लेबर आला की आपल्या देशातल्या लोकांचे जॉब जातात, वर हे आलेले लेबर आपल्या देशाचा पैसा त्यांच्या मुळ देशात पाठवतात.

आदूबाळ Fri, 24/06/2016 - 14:33

In reply to by बॅटमॅन

आणि याच थेरड्यांनी त्यांच्या जवानीत यूकेने ईयूमध्ये जाण्याला पाठिंबा दिला होता. हे म्हणजे आयुष्यभर प्रेम चोप्रेगिरी करून शेवटी आलोकनाथ होण्यासारखं आहे.

अनु राव Fri, 24/06/2016 - 14:39

In reply to by आदूबाळ

म्हणजे आयुष्यभर प्रेम चोप्रेगिरी करून शेवटी आलोकनाथ होण्यासारखं आहे.

.

स्वता प्रेम चोप्रा गिरी करायची आणि आपल्या मुलांना जबरदस्तीने आलोकनाथ होयला भाग पाडायचे अस म्हणा.

तिरशिंगराव Fri, 24/06/2016 - 19:02

In reply to by बॅटमॅन

ब्रिटनचे जर काही भले व्हायचे असेल, तर सर्वप्रथम पारंपरिक ब्रिटिश थेरडेशाहीचा नि:पात झाला पाहिजे.

असे वाक्य कुठेतरी वाचल्याचं आठवताय.

ऋषिकेश Fri, 24/06/2016 - 14:12

After UK referendum, delhi will soon have a referendum on full statehood
& mdash; Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) June 24, 2016

वॉव! हे खरं प्रेशर टॅक्टिक!

तिरशिंगराव Fri, 24/06/2016 - 15:24

या निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे, त्यावर कोणी तज्ञ व्यक्तीने भाष्य करावे.

चिंतातुर जंतू Fri, 24/06/2016 - 15:29

In reply to by तिरशिंगराव

‘ब्रेक्झिट’ला तोंड देण्यास भारत समर्थ- अरुण जेटली

आता असं म्हणू नका की बाजारपेठेला आणि लोकांना धीर देण्याची त्यांना गरज आहे :-)

तिरशिंगराव Fri, 24/06/2016 - 16:44

तुम्हाला स्वघोषित तज्ञ चालणार आहे का?

हो, कारण आमच्यापेक्षा ते तज्ञच असतील.

अनु राव Fri, 24/06/2016 - 17:04

ट्रंपोबा पण खुष झालेत.

US presidential hopeful Donald Trump has said it is a "great thing" that the people of the UK have "taken back their country" in voting to leave the EU.

"People are angry all over the world. They're angry over borders, they're angry over people coming into the country and taking over and nobody even knows who they are.

.शुचि. Fri, 24/06/2016 - 17:27

या हलकट ब्रिटिशांनी राज्य केलं जगावर, यांच्यावरती कोणा जुलमी जमातीचं राज्य व्हावं. ;) अन ते शक्य नसल्याने वाट तरी सुअपर वाट लागावी.

अनु राव Fri, 24/06/2016 - 17:31

In reply to by .शुचि.

हिलरी पण अँग्लोसॅक्सन च आहे, हिलरीचा नवरा सुद्धा आणि बुशोबा सुद्धा.

फक्त ओबामाची अर्धी गडबड आहे.

.शुचि. Fri, 24/06/2016 - 19:46

In reply to by अनु राव

काल कोणाशी तरी (आता रात्री कोण तावडीत तर नवरा) चर्चा केली. प्रत्येक काळी कोणी तरी काळी बाजू असलेली ज्मात्/लोक असतातच. प्रत्येक वेळी असे स्वतःला आयसोलेट करुन घेऊन, भिंती तर बांधल्या गेल्या नाहीत.
हे माझं - सर्वसमावेशकता मी अ‍ॅट द कॉस्ट ऑफ ओन लॉस म्हणतच नाही.
पण इमिग्रंटसना आत येऊ देण्यात काही तर फायदा होता यु के ला. आता इतके पॅरॅनॉइड झालेत की त्या फायद्यावरती लाथ मारताहेत?
__
अन्य ट्रंपचं सांगू नकोस. "यु आर फायर्ड" या नार्सिसिस्ट माणसाने इतकं सिरीअसली घेतलय की तो जग फायर करायला निघालाय. लहनखुरी बोटं असलेल्या या माणसाचं पूर्ण कॅम्पेन फक्त त्याच्याभोवती फिरतं.
___
जग एक लहान गाव झालय म्हणता म्हणता, काही लोक स्वत/:ला बेट करुन घ्यायला निघालेत. मी जे ऐकलं होतं त्यावरुन, यु के ची तरुण पीढी धादांत वाया गेलेली आहे.
___
अन तसंही फरक फार पडत नाही अन्य लोकांना. यु के ला काय सोनं लागलय. शेवटी मनुष्य्/लोक हे स्वतःला आहे त्या परिस्थितीशी अ‍ॅडजस्ट करुन जगायल शिकतातच. नाही जाता आलं भारतीयांना त्या रेसिस्ट देशात तर काहीही बिघडत नाही. लाथ मारा त्या यु के च्या ढुं****.
____
हां आर्थिक दूर्गामी परिणाम इमॅजिन करण्याचीही आपली कुवत नाही मात्र. ते स्वघोषित्/चमचेघोषित्/सिन्सिअर-लोक घोषित वगैरे वगैरे एक्स्पर्टसनी सांगावे. (तसे असल्यास. आहेत असे नीरीक्षणही नाही/ निष्कर्षही नाही.)
_______________
बैजवार्/विगतवार लेख- http://www.bbc.com/news/uk-politics-32810887

'न'वी बाजू Sat, 25/06/2016 - 18:13

In reply to by .शुचि.

अन्य ट्रंपचं सांगू नकोस. "यु आर फायर्ड" या नार्सिसिस्ट माणसाने इतकं सिरीअसली घेतलय की तो जग फायर करायला निघालाय.

फडतूसांना फायर करावे(/फडतूसांवर फायरिंग करावे) यात नेमके काय गैर आहे?

मग गब्बर(/गब्बु/गब्स्/गब्सु) तरी याहून नेमके वेगळे काय म्हणून राहिलाय?

लहनखुरी बोटं असलेल्या या माणसाचं

आइंदा बोटांचा विषय मी काढला नाही. नाही, फॉर द रेकॉर्ड नमूद करून ठेवतोय. असो.

लाथ मारा त्या यु के च्या ढुं****.

यूकेचे ढुंगण नेमके कोठे असते? नाही म्हणजे, माणसाला ढुंगण असते, याबद्दल (शेवटी कितीही झाले तरी माणूस असल्याकारणाने) कल्पना आहे. परंतु तमाम देशाचे असे सामूहिक ढुंगण कल्पिण्यास थोडे अवघड जाते. (म्हणूनच त्यास 'अवघड जागा' असे म्हणत असावेत काय?)

(नाही म्हणायला, Kurt Vonnegut Jr. नामक कोणा एका लेखका(!)चे Breakfast for Champions नामक एक पुस्तक कॉलेजात असताना नजरेखालून गेले होते. त्यात कोठलीशी जागा/खेडे हे 'तमाम जगाचे ढुंगण' असल्याचा ज़िक्र आहे. तीही बाब कल्पिणे आम्हांस तेव्हा जड गेले होते, असे (अंधुकसे) आठवते. असो.)

ऋषिकेश Sun, 26/06/2016 - 15:35

In reply to by .शुचि.

लहानखुरी बोटं =))
शुचि बोटांकडे का बघत होतीस! खरं सांग! (ह. घेणे!)
मला एकदम फ्रेन्ड्सचा एक एपिसोड आठवला :प

.शुचि. Sun, 26/06/2016 - 19:28

In reply to by ऋषिकेश

अहो नाही तुम्हाला माहेत नाही का, ट्रंप किती सेन्सिटिव्ह आहे बोटांच्या आकाराबदाल ते? कोण्या स्त्रीला तो इतकी वर्षे अधुन मधुन त्याच्या हाताचा फोटो पाठवतो ते ही बोटावरती वर्तुळ काढून. हेसिद्ध करायला की त्यची बोटे लहानखुरी नाहीते.

ब्रह्मास्त्र Sat, 25/06/2016 - 11:56

In reply to by .शुचि.

या हलकट ब्रिटिशांनी राज्य केलं जगावर

गुलाम बनून बौद्धिक न्यूनगंड बाळगणारे हलकट असतात,राज्य करणारे हलकट नसतात.
वसाहतवादामध्ये मला काहीही वावगे वाटत नाही.

'न'वी बाजू Sat, 25/06/2016 - 18:01

In reply to by .शुचि.

या हलकट ब्रिटिशांनी राज्य केलं जगावर

जगावर फडतूसांवर.

यात नेमके काय गैर आहे?

यांच्यावरती कोणा जुलमी जमातीचं राज्य व्हावं. ;) अन ते शक्य नसल्याने वाट तरी सुअपर वाट लागावी.

स्वप्ने पाहा!

.शुचि. Sat, 25/06/2016 - 18:31

In reply to by 'न'वी बाजू

न्युट्रल - स्वप्ने खरीच होतात असे नाही. पण स्वप्ने पहाणे ही मानवी प्रवृत्ती आहे.
पहीले मन - फक्त इतक्या आयुष्यात कधीही वाईट चिंतले नव्हते जे आता मी ऐसीवर येऊन चिंतू लागले आहे. ही बरी डेव्हलपमेन्ट की वाईट माहीत नाही पण संगतीचा व एकंदर परीणाम हे नक्की.
दुसरे मन - हां फोड इतरांवर तू स्वतःच्या चूकांचे खापर.

अतिशहाणा Fri, 24/06/2016 - 19:51

ब्रिटनचा निर्णय आवडला. तेवढीच आम्हा थर्ल्ड वर्ल्डमधील लोकांना एंटरटेनमेंट! अमेरिकेत ट्रंप, ब्रिटन यूकेच्या बाहेर, भारतात स्वामींचा धुमाकूळ! मजा येतेय निश्चित! मी आजकाल रोजचे पेपर वाचायला जाम उत्सुक असतो!
आने दो!

बॅटमॅन Fri, 24/06/2016 - 22:43

In reply to by अतिशहाणा

अगदी अगदी!!!! सीर्यसली, लयच मज्जा येणार.

थर्ल्ड वर्ल्ड

एक रेसिस्ट ब्रिटिश-पाकिस्तानी मुलगी एकदा एका फेबु ग्रूपवर थर्ड वर्ल्ड आणि भारताबद्दल काही तारे तोडत होती. शेवटी जनतेने त्याच्या मूळ अर्थावर तिचे असे काही बौद्धिक घेतले की तिने पुन्हा त्या थ्रेडवर कमेंट म्हणून केली नाही त्याची या निमित्ताने आठवण झाली.

.शुचि. Sat, 25/06/2016 - 00:08

In reply to by बॅटमॅन

२०१४ मध्ये वाचलं होतं त्याप्रमाणे स्कॉटलंडकडे स्वतंत्र अस्तित्व टिकवुन ठेवण्याइतके रिसोर्सेस डेव्हलप झालेले नाहीत. माहीत नाही कोणकोणत्या बाबतीत ते स्वावलंबी आहे ते. २०१४ च्या त्यांच्या निवडणूकीच्या सुमारास वाचनात आले होते. आता विसरले.

Scotland’s oil fields remain a massive financial asset

हां ऑइलबद्दल वाचले होते.
___
http://www.businessforscotland.co.uk/10-key-economic-facts-that-prove-s…
या स्कॉटलंडच्या पेपरात तर वारेमाप आत्मविश्वास दिसतोय की. तो तिथला संध्यानंद आहे अथवा नाही माहीत नाही.

सैराट Sat, 25/06/2016 - 00:33

In reply to by .शुचि.

यूरोप खोलात चाललाय हळूहळू . मध्यपूर्व तर तुफान अशांत आहेच. अमेरीका आर्थिक मंदीने त्रस्त आहे. मला वाटतं भारत आणि चीन यांचं येणाऱ्या काळावर वर्चस्व असेल.

अस्वस्थामा Mon, 27/06/2016 - 18:36

In reply to by सैराट

तेवढे संडास बांधून घ्यावेत या दोन्ही देशांनी आपल्या नागरिकांच्या घरात आणि हो, तिथे पाणी, गटार हे पण बघावे.

(युरोप खोलात (रिसेशन वगैरे) म्हंजे त्यांच्या सकाळच्या कामाला ५ टिश्यू ऐवजी ४ टिश्यू असं हय ते. अगदी हंगेरी आणि पोलंडदेखील आपल्यापेक्षा लय नीटनीटके व्हायलेत राव.)

वर्चस्व वगैरे बघू मग.

(युरोपीय देशांच्या स्थितीबद्दल फार कणव नाही पण तिथल्या परिस्थितीबद्दल एखाद्याने भारताततून "गंभीर/खोलात" असं म्हणणं हास्यास्पद वाटतं. खासकरुन आपण अतिशय बेसिक्सवरच झगडत असताना महासत्ता वगैरे वल्गना चीड आणतात. )

सैराट Tue, 28/06/2016 - 01:19

In reply to by अस्वस्थामा

संडासांबद्दल ठीक आहे. कूर्मगती असेल पण प्रगती आहे की. बाकी टिश्युच्या संख्येवरून नीटनेटकेपणाची व्याख्या करणे चूक वाटते हो. आपली पद्धत (धुण्याची ) कमी नीटनेटकी आहे असं मला वाटत नाही. वर्चस्व वैगेरे म्हंटलं ते तुम्हाला इतकं वाईट का वाटलं बरं. आणि त्या वर्चस्व शब्दावरून डायरेक 'महासत्ता वगैरे वल्गना' इथपर्यंत पोचलात ते.
भारताततून असं म्हणणं चूक वाटत असल्यास अमेरिकेतून असे म्हंटले तर ते बरोबर असं काही लॉजिक असल्यास मी अमेरिकेत राहतो असं मी जाहीर करतो. त्याने घंटा फरक पडणार नाही पण तरीही ;)

बॅटमॅन Tue, 28/06/2016 - 01:24

In reply to by सैराट

भारताततून असं म्हणणं चूक वाटत असल्यास अमेरिकेतून असे म्हंटले तर ते बरोबर असं काही लॉजिक असल्यास मी अमेरिकेत राहतो असं मी जाहीर करतो.

हाण्ण तेजायला. एकच नंबर.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 28/06/2016 - 01:29

In reply to by सैराट

टिश्युच्या संख्येवरून नीटनेटकेपणाची व्याख्या केली जात नसून मंदी आली तर फार मोठा फरक पडणार नाही असं म्हटलं जात असल्याचा माझा समज झाला.

अस्वस्थामा Tue, 28/06/2016 - 17:36

In reply to by सैराट

बाकी टिश्युच्या संख्येवरून नीटनेटकेपणाची व्याख्या करणे चूक वाटते हो. आपली पद्धत (धुण्याची ) कमी नीटनेटकी आहे असं मला वाटत नाही.

तुम्हाला मुद्दा कळालेला नाहीय. आदितींचा प्रतिसाद पहावा (तो अर्थ अभिप्रेत आहे, धुण्याच्या पद्धतीची चर्चा नव्हे). बेसिक्समध्ये गंडलाय प्रतिसाद तरीपण तो वॅलिड म्हणणे म्हंजे हाईटच.

भारताततून असं म्हणणं चूक वाटत असल्यास अमेरिकेतून असे म्हंटले तर ते बरोबर असं काही लॉजिक असल्यास मी अमेरिकेत राहतो असं मी जाहीर करतो. त्याने घंटा फरक पडणार नाही पण तरीही

असं 'लॉजिक असल्यास' म्हणताय आणि पुढे 'घंटा फरक पडणार नाही' हे पण म्हणताय. त्यामुळे तुमचं हे लॉजिकपण गंडेल आहे हे तुम्हालाच लक्षात येतंय तरीही 'अम्रिकेत असल्याची' जाहिरात करायची असल्यास असो. ;)

मुद्दा एवढाच की "एखाद्याने भारताततून" याचा अर्थ तुम्ही आणि फक्त तुम्हीच असा नाहीय हो. जनरल स्टेटमेंट आहे हे तुम्हालाही समजलंय पण विरोधासाठी विरोध चाल्लाय तुमचा. त्यामुळे अम्रिकेत राहिल्याने स्टेटमेंट बरोबर/चूक होत नाही हो साहेब.
याउप्पर अगदीच वाटल्यास ते "युरोपीय देशांच्या स्थितीबद्दल फार कणव नाही पण तिथल्या परिस्थितीबद्दल एखाद्याने "गंभीर/खोलात" असं म्हणणं हास्यास्पद वाटतं. खासकरुन आपण अतिशय बेसिक्सवरच झगडत असताना महासत्ता वगैरे वल्गना चीड आणतात." असे वाचावे.
(समजूतदारास हे इतके समजवावयास पण लागू नये पण हेही असोच)

वर्चस्व वैगेरे म्हंटलं ते तुम्हाला इतकं वाईट का वाटलं बरं.

हे एकच वाक्य अक्ख्या प्रतिसादात दखलपात्र आणि सेंन्सिबल पाँईंटाचा मुद्दा आहे. इतर प्रतिसाद तिरकसपणाच जास्त आहे. (बादवे, ते वगैरे असतंय 'वैगेरे' नव्हे पण आम्ही घेतलं बरं का समजून)

याचा अर्थ एवढाच की आपण वर्चस्व वगैरे म्हणण्याच्या कोसो दूर आहोत ही वस्तुस्थिती आहे. एकतर यासाठी जे क्रायटेरिया (आर्थिक, सामाजिक, सामरिक, राजकिय, भौगोलिक इ.इ.) विचारात घेऊ त्यातल्या एकाही अंगाने आपण वर्चस्व म्हणण्याच्या अवस्थेतदेखील नाही.
हे मान्य की आपण आधीपेक्षा (८० च्याआधीपेक्षा) खूप सबल आणि सक्षम आहोत पण खूप काही आहे की जे अजून आपल्याला "वर्चस्व" वगैरे म्हणण्यापासून दूर ठेवतं.
ते समजून न घेता उगीच युरोपात जरा खुट्ट वाजलं की भारताच्याबाबतीत हे जे असे ढोल वाजू लागतात ते पटत नाहीत. वाईट वाटतं कारण देशाबद्दल भरपूर प्रेम वाटतं (कुणी काहीही म्हणो) पण वस्तुस्थितीशी फारकत घेऊन ना चोल्बे.

@बॅट्या,

ते इस्रोनं २० सॅटेलाईट का काय ते सोडले तेव्हाही असेच मत असेल नै?

इस्रो करतेय ते अतिशय स्तुत्य आहे. पण तो भारतातल्या इतर घटकांच्या/संस्थांच्या अकार्यक्षमतेवर उठून दिसणारा अपवाद आहे हे ही तितकंच खरंय.
भारताचा होणार्‍या चांगल्या गोष्टींचा, वेगाने घडणार्‍या चांगल्या-वाईट बदलांचा अभिमान आहे पण आपण इतक्या पाय ओढणार्‍या गोष्टींशी लढतो आहोत की "वर्चस्व" वगैरे शब्द भारतासाठी तरी सध्या गैरलागू आहेत.

बॅटमॅन Tue, 28/06/2016 - 17:41

In reply to by अस्वस्थामा

इस्रो करतेय ते अतिशय स्तुत्य आहे. पण तो भारतातल्या इतर घटकांच्या/संस्थांच्या अकार्यक्षमतेवर उठून दिसणारा अपवाद आहे हे ही तितकंच खरंय.
भारताचा होणार्‍या चांगल्या गोष्टींचा, वेगाने घडणार्‍या चांगल्या-वाईट बदलांचा अभिमान आहे पण आपण इतक्या पाय ओढणार्‍या गोष्टींशी लढतो आहोत की "वर्चस्व" वगैरे शब्द भारतासाठी तरी सध्या गैरलागू आहेत.

सहमत.

सैराट Wed, 29/06/2016 - 17:49

In reply to by अस्वस्थामा

अस्वस्थामा, तुमचं म्हणणं कळलं. वरील प्रतिसादातल्या बहुतांशी म्हणण्याशी मी सहमत आहे. आधी तुम्ही दिलेला प्रतिसाद मला थोडा 'फेबिअन सोशालिस्ट' दृष्टिकोनातून आलेला, भारतास हीन लेखणारा वाटला होता त्यामुळे थोडा तिरकसपणा केला. वर्चस्व हा शब्द मी भविष्यकाळासाठी वापरला होता आत्ता लगेच वर्चस्व निर्माण झालेय असा नव्हे. ( त्यात चीनलाही धरलं होतं त्यावरून मी दिवास्वप्न बघत नव्हतो हे सांगावंसं वाटतं).

ता. क. - 'वगैरे' बद्दल धन्यवाद.

नितिन थत्ते Sat, 25/06/2016 - 07:35

ईयू मध्ये जर्मनी ष्ट्रॊंग झाला होता का ब्रिटनपेक्षा?

नै म्हणजे "आम्ही जगावर राज्य करणारे जर्मनीच्या खाली कसे राहणार?" हा पॉइंट असू शकेल थेरड्यांच्या विचारप्रक्रियेत.

ब्रह्मास्त्र Sat, 25/06/2016 - 11:51

In reply to by नितिन थत्ते

पॉइंट असू शकेल थेरड्यांच्या विचारप्रक्रियेत.

मार्मिक श्रेणी?????
कोणत्या अँगलने

अनु राव Sat, 25/06/2016 - 08:39

नेक्स्ट इन लाइन - मेक्झीट - मेन, मेरीलँड, मॅसॅचुसेट ( आणि बाकी छोटी न्यु इंग्लंड स्टेट्स ) एग्झीट फ्रॉम रेस्ट ऑफ हाम्रीका.

ब्रह्मास्त्र Sat, 25/06/2016 - 11:49

चांगला निर्णय झाला आहे.
आर्थिक सुबत्ता प्राप्त देशांनी मायग्रंट्सची घाण का वाढवावी?
टीवीवरच्या चर्चेत काहीजण याला स्वार्थी व संकुचित भूमिका म्हणत आहेत,काहीजण याला नस्लभेदी का काय ते? म्हणत आहेत,पण मला असे वाटत नाही.
स्थानिकांची कुंचबणा होत असेल त्यांच्या हक्कांवर गदा येत असेल तर हा निर्णय चांगलाच आहे.

गब्बर सिंग Sat, 25/06/2016 - 12:27

In reply to by ब्रह्मास्त्र

स्थानिकांची कुंचबणा होत असेल त्यांच्या हक्कांवर गदा येत असेल तर हा निर्णय चांगलाच आहे.

अहो, सरकार हे संभाव्य नागरिकांप्रति वचनबद्ध असावे अशी अपेक्षा आहे लोकांची ... विद्यमान नागरिक गेले गा च्या गा त.

त्याला काय करणार ??

आदूबाळ Sat, 25/06/2016 - 13:40

एक वत्सीय फॉर्वर्ड

Investors who think they will obtain clarity after the 'Brexit', don't realise that it will be followed by Grexit. Departugal. Italeave. Fruckoff. Czechout. Oustria. Finish. Slovakout. Latervia. Byegium. Neverlands. Spainoff

सैराट Sat, 25/06/2016 - 23:40

In reply to by अनुप ढेरे

व्हायलंटली तुकडे होतायत का ही शंका आहे. त्यांचं थोडंसं ' अति लोकशाही संकटात नेई ' टाईप झालंय. मला वाटतं आनंदही नाही - दुःखही नाही अशी प्रतिक्रिया जास्त योग्य होईल ( पण,पण,पण 'त्यांनी आपले एकेकाळी असेच तुकडे केले होते, बरोबरच होतंय जे होतंय ते' अशी खुन्नस असणारेच जास्त सापडतील )

नितिन थत्ते Mon, 27/06/2016 - 10:08

In reply to by बॅटमॅन

सहमत आहे. स्थानिकांना काही जमण्यासारखं नसतं साम्राज्य चालवणार्‍यांमुळेच काय विकास व्हायचा तो होतो. अशी विचारसरणी दिसते कुठे कुठे.

बॅटमॅन Mon, 27/06/2016 - 12:02

In reply to by नितिन थत्ते

लोल. ब्रिटनची कॉलनी होती ऑस्ट्रेलिया. त्यामुळे इन्फ्रा व फिनान्शिअल सपोर्ट तिथून येतच होता. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासारखे महत्त्वाचे भाग लंडनच्याच ताब्यात होते कैक वर्षे. त्यामुळे "कैदीही इतके करू शकतात तर" वगैरे साफ भक्तियोग आहे. शिवाय खुद्द ऑस्ट्रेलियातही सर्वच कैद्यांच्या कॉलन्या नव्हत्या. काही कैद्यांच्या तर काही नॉर्मल लोकांच्या होत्या.

नितिन थत्ते Mon, 27/06/2016 - 13:23

In reply to by बॅटमॅन

काहीही!!!

ब्रिटिश राज्य होतं म्हणून रेल्वे आली वगैरे गोष्टी मेकॉलेपुत्र बोलत अस्तात ब्वॉ !!

बॅटमॅन Mon, 27/06/2016 - 14:03

In reply to by नितिन थत्ते

ब्रिटिश राज्य होतं म्हणून रेल्वे आली

हे खरे असले तरी व्यत्यास खरा नाही. पण हे तुम्हांला वेगळे सांगणे न लगे हेही वेसांनल.

बॅटमॅन Tue, 28/06/2016 - 11:59

In reply to by नितिन थत्ते

ओके पण तसे म्हणायचे नव्हते. एका बाजूला प्रमाणाबाहेर क्रेडिट दिलेले दिसले म्हणून तसे अर्गुमेंट केले इतकेच.

मिलिन्द् पद्की Wed, 29/06/2016 - 22:13

In reply to by बॅटमॅन

कोकण रेल्वेच्या आधी स्वतंत्र भारताने जवळ जवळ शून्य नवीन ट्रॅक्स बांधले होते! असलेली व्यवस्था टिकवून ठेवणंही धड जमत नव्हते!

घाटावरचे भट Thu, 30/06/2016 - 09:03

In reply to by मिलिन्द् पद्की

इतकी अज्ञानमूलक विधानं कुठल्या माहितीच्या आधारावर येतात देव जाणे! स्वतंत्र भारतात १९४७च्या सुमारास साधारण ५५,००० किलोमीटर ट्रॅक्स होते (बीबीसीआय, जीआयपीआर, एमेसेम, ईस्टर्न रेल्वे आणि विविध संस्थानांच्या स्वतःच्या रेल्वे मिळून. मग त्यात गेजचं, सिग्नलिंगचं वगैरे सगळं वैविध्य आलं). आजमितीला साधारण १,१५,००० किलोमीटर ट्रॅक्स आहेत (बहुतांशी ब्रॉड गेज). मान्य आहे की वाढीचा हा वेग फार नाही. पण हे सगळं फक्त गेल्या २५ वर्षांत झालं असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर मग अवघड आहे.

अधिक माहितीसाठी भारतीय रेल्वेचा सालवार इतिहास इथे पहा.

बॅटमॅन Thu, 30/06/2016 - 12:12

In reply to by घाटावरचे भट

धन्यवाद भटोबा. शेवटी इंग्रजांनीच भारत निर्माण केला म्हटले की सगळे प्रश्न संपतात हे तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला माहिती न्हाय वाट्टं?

मिलिन्द् पद्की Wed, 29/06/2016 - 22:10

In reply to by अनुप ढेरे

"भारत" ही संकल्पनाच मुळात ब्रिटीश आहे . त्यांनी भारत एकत्र आणला . शत्रुभावना बेतात ठेवणे !

.शुचि. Wed, 29/06/2016 - 22:15

In reply to by मिहिर

हो ना मलाही वाटलेले की सर्व संस्थानिक, वल्लभभाई पटेलांनी आणले ना एका छत्राखाली? का माझं काही चुकतय?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 29/06/2016 - 22:30

In reply to by मिहिर

रँडमपणे किंवा न-रँडमपणे लोकांना नावं ठेवणं, तितपत वारंवारितेने काळं-पांढरं करणं ह्या पलीकडे कोणी काही लिहिणार असेल तर ठीक. एरवी कोणीतरी जालावरचा आयडी 'सोडत नाही तुम्हांला' ह्या धमकीला काय किंमत?

बॅटमॅन Wed, 29/06/2016 - 22:44

In reply to by मिलिन्द् पद्की

"भारत" ही संकल्पनाच मुळात ब्रिटीश आहे . त्यांनी भारत एकत्र आणला . शत्रुभावना बेतात ठेवणे !

हो ना, ते ईस्ट इंडिया कंपनीवाले बहुधा परग्रहवासी असावेत. इंडिया, अलहिंद वगैरे नावे देणारे लोक नक्की मंगळावरून आलेले की प्रॉक्झिमा सेंटावरीवरून बायदवे?

बाकी भारत या संकल्पनेचा कोणता अ‍ॅस्पेक्ट अपेक्षित आहे? या संकल्पनेमागे खूप पैलू आहेत. ते न पाहता एकच एक घोकत बसले की झाले. पण असे म्हणणे हे सध्याच्या इंटुक विश्वात चलनी नाणे आहे त्याला इलाज़ नाही म्हणा. आफ्टरॉल वन हॅज़ टु बिलाँग.

जाता जाता हेही पहा.

https://books.google.co.in/books/about/India.html?id=uD_0P6gS-vMC

हे एका गोर्‍याने म्हटलेय म्हणून ते सत्यच आहे त्यामुळे त्याचा हवाला दिला. हेच म्हणणारे देशी असते (बाहेर सेटल न झालेले देशी) तर ते बाय डिफॉल्ट संघी, हिंदुत्ववादी वगैरे असतात म्हणून गोर्‍यांचा रेफ्रन्स दिला.

आणि पोलिटिकल ऑर्गनायझेशनच्या पोस्ट-नॅशनॅलिझम कल्पना प्री-नॅशनॅलिझम काळाला लावून पाहिल्यास अ‍ॅनार्की वाटणारच. पण तसे करण्यात काही चूक मात्र असूच शकत नाही, बरोबर ना?

मिलिन्द् पद्की Thu, 30/06/2016 - 00:04

In reply to by बॅटमॅन

परंतु मग भारतातले दोनशे संस्थानिक, त्यांच्या आठशे बायका व सोळाशे कुत्री, 1857 चा स्वातंत्र्य संग्राम, तसेच भारत एकत्र करण्यातली सरदार पटेलांची थोरवी याचे काय ? का हे सर्व खोटे?

बॅटमॅन Thu, 30/06/2016 - 00:06

In reply to by मिलिन्द् पद्की

सरदार पटेलांची थोरवी मान्य केली याचा अर्थ अगोदर सगळे काही अंदाधुंद होते असा घेणार काय?

मिलिन्द् पद्की Thu, 30/06/2016 - 01:02

In reply to by बॅटमॅन

नाही, फक्त भारत हा एक देश आहे हे अनेकांना , विशेषतः अनेक संस्थानिकांना, मान्य नव्हते व त्यांना शक्य तो सवता सुभा हवा होता असा घेणार !

बॅटमॅन Thu, 30/06/2016 - 01:09

In reply to by मिलिन्द् पद्की

पण भारताची संकल्पना निव्वळ राजकीय नाही हे लक्षात घ्यायचं नसेल तर चालूद्यात.

अनुप ढेरे Thu, 30/06/2016 - 09:57

In reply to by बॅटमॅन

http://scroll.in/article/810548/the-brexit-of-1947-scotland-is-more-lik…

हा लेख वाचनीय आहे. भारत ही संकल्पना ब्रिटीश काय नजरेतून पहात होते. त्यांच्या 'देश' या संकल्पनेआधारे भारत एकसंध राहू शकतच नव्ह्ता. तो अजून तरी एक आहे.

गब्बर सिंग Thu, 30/06/2016 - 10:18

In reply to by बॅटमॅन

पण भारताची संकल्पना निव्वळ राजकीय नाही हे लक्षात घ्यायचं नसेल तर चालूद्यात.

भारताची धार्मिक पण आहे.

भरताची भूमि.

संस्कृतात पित्याच्या नावाच्या पहिल्या अक्षराला अ जोडला की मुलाचे नाव तयार होते.

वसुदेव = वासुदेव (कृष्ण)
पराशर = पाराशर (व्यास मुनी)
दशरथ = दाशरथ
मरुत = मारुति
जमदग्नि = जामदग्नि (परशुराम)

भारत ही भरताची भूमि. म्हंजे भरताचा पुत्र असं नाही पण भरताचे क्रिएशन म्हणू. पण मूळ मुद्दा हा आहे की भरताने भूमन्यू ला आपला उत्तराधिकारी बनवले. स्वतःच्या ७ की ९ मुलांना डावलून. कारण भूमन्यू मधे राजा बनण्यासाठी योग्य असलेले गुण होते असे भरताचे मत पडले. व ते कर्मयोगाचे (अ‍ॅज काँट्रास्टेड विथ जन्मयोग) बीजारोपण. व अशी ही कर्मास जन्मापेक्षा जास्त महत्व देणारी भूमि म्हणून भारत.

( नंतर जन्मावर आधारित निर्णय झाले ... व पुलावरून व खालून खूप पाणी निघून गेले ते निराळे ...)

लोळगे सायकल कंपनी Thu, 30/06/2016 - 10:19

In reply to by बॅटमॅन

ब्रिटिशांच्या आधीही भारत संकल्पना होती, ओटोमन एंपायर यायच्या आधी अथेन्स आणि स्पार्टावाले एकमेकाला ग्रीक समजायचे नाहीत का?

अरविंद कोल्हटकर Thu, 30/06/2016 - 02:29

In reply to by मिलिन्द् पद्की

भारतात यायची इच्छा नसलेले 'अनेक' संस्थानिक होते असे का म्हटले आहे? त्यांची काही मोजणी वा नावे देता येतील का?

हैदराबाद, भोपाळ आणि त्रावणकोर-कोचिन ह्या तीनच संस्थानांनी आपण संघराज्यात सामील होणार नाही अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली होती. हैदराबाद अणि भोपाळ ह्यांचे शासक मुस्लिम होते आणि त्यांचा मोठा आकार पाहता आपण स्वतन्त्रपणे तग धरू शकू अशी त्यांची समजूत होती. त्रावणकोर-कोचिनमध्ये समुद्राकाठच्या वाळूत अणुशक्तीला उपयोगी पडेल असे थोरियम मुबलक प्रमाणात होते आणि त्याच्या जोरावर आपल्याला काही bargaining power मिळेल अशी समजूत त्या राज्याचे दिवाण सर सी पी रामस्वामी अय्यर ह्यांना होती. काश्मीरहि स्वतन्त्र राहू इच्छित होते पण अखेरच्या क्षणी त्याला भारतात यावेच लागले.

बाकीची जवळजवळ सर्व राज्ये तोंडात मिठाची गुळणी धरून बसलेली होती आणि आवश्यकतेआधी आपले पत्ते उघडे करायला तयार नव्हती. त्यापैकी काहींना स्वतन्त्र राहता आले तर चालेल असे मनातून वाटतहि असेल पण पुष्कळशा राज्यांमधून स्थानिक प्रजापरिषदांनी चळवळ करून आपली पसंती विलीनीकरणाकडे आहे हे दाखवून दिले होते. अशा कारणाने स्वतन्त्र राहणे बहुसंख्यांना परवडले नसते हेहि त्यांना जाणवले होते. भारताच्या मानाने नगण्य आकाराच्या आणि भारताकडून सगळ्या बाजूंनी वेढल्या गेलेल्या शेकडो छोट्या राज्यांना विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही हे मनोमन जाणवले होते. ह्या त्यांच्या द्विधा मनस्थितीचा योग्य उपयोग करून पटेल आणि त्यांच्या Ministry of States ह्या खात्याचे सचिव मेनन ह्यांनी साम-दाम-भेद ह्यांच्या योग्य वापरातून हा प्रश्न अतिशय उत्तम प्रकाराने सोडविला. हैदराबाद आणि जुनागड सोडल्यास 'दंड' ह्याचा वापर कोठेच करावा लागला नाही.

भारताच्या स्वातन्त्र्याचा जन्म कसा झाला हे सारांशरूपाने http://www.aisiakshare.com/node/3981 येथे पाहता येईल. वी.पी.मेननलिखित The Story of the Integration of the Indian States हे पुस्तकहि डोळ्याखालून घालावे असे आहे.

उपरिनिर्दिष्ट लेखामध्ये उल्लेखिलेल्या माउंटबॅटन ह्यांच्या योजनेला Dicky Bird Plan असे कुचेष्टाखोर नाव का मिळाले हे मला अलीकडे ह्या जुन्या वर्तमानपत्रातून समजले. प्रेसिडेन्ट रूझवेल्ट हे माउंटबॅटन ह्यांना Dicky Bird अशा नावाने ओळखत असत आणि माउंटबॅटन ह्यांनी आपल्याच कल्पनेतून जी योजना तयार केली होती - आणि जी निश्चितपणे तोंडावर आपटली असती - तिला रूझवेल्ट ह्यांनी दिलेले नाव म्हणजे Dicky Bird Plan!

बॅटमॅन Thu, 30/06/2016 - 12:14

In reply to by अरविंद कोल्हटकर

अतिनेमके. पटेलांनी संस्थानांच्या विलीनीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली हे खरे असले तरी प्रजेचा कल पाहता त्याला फार प्रयास पडणार नव्हते हेही ऑब्व्हियस आहे. तेव्हा असे अराजक माजले असते इ.इ. निव्वळ कविकल्पना आहेत.

मिलिन्द् पद्की Thu, 30/06/2016 - 22:26

In reply to by अरविंद कोल्हटकर

Many of the Princes were at first unwilling to sign; but eventually succumbed to a combination of Menon's threats, bluff, skillful diplomacy and sheer exhaustion. The Nawab of Bhopal threatened to abdicate in favour of his daughter and tried to sign the Standstill Agreement without actually acceding. The Maharajah of Indore blustered and threatened but in the end sent the Instrument of Accession through the post. The Maharajah of Jodhpur threatened to join Pakistan. Mountbatten and Menon eventually persuaded him to join India but not before he pulled a pistol concealed inside a fountain pen and threatened to shoot Menon. By the day of transfer of power, or shortly thereafter, apart from a few States clearly destined to join Pakistan, of the 565 Princely States all but three had signed the Instrument of Accession. These three were Junagadh, Hyderabad and Kashmir.
http://www.britishempire.co.uk/maproom/india/vpmenon.htm

मिलिन्द् पद्की Thu, 30/06/2016 - 22:32

In reply to by मिलिन्द् पद्की

VP Menon, Architect of Modern India and right hand of Sardar Patel in negotiations with the Princes: Menon's own judgement on British rule in India: 'From 1765, when the East India Company took over the collection of the revenues of Bengal, Bihar and Orissa, the British had gradually built up in India an administrative and political system hitherto unknown. They brought about the consolidation and unity of the country; they created an efficient administrative organization on an all-India basis; it was they who for the first time introduced the rule of law; and they left to India that most precious heritage of all, a democratic form of government. As long as there is an India, Britain's outstanding contributions to this country will continue to abide'.

बॅटमॅन Thu, 30/06/2016 - 23:50

In reply to by मिलिन्द् पद्की

British had gradually built up in India an administrative and political system hitherto unknown.

आर यू सीर्यस? ताब्यात घेतलेल्या प्रदेशांतील शासनव्यवस्था कशी असावी याबद्दलचे डिस्कशन कधी पाहिलेत? की मेननच्या एकोळी कमेंटीवरून सर्व जोखणार? शनिवारवाड्यावर युनियन ज्याक फडकावणारा अल्पिष्टनसाहेब त्याच्या आत्मचरित्रात काय लिहितो ते बघा जरा. स्थानिक व्यवस्थेचा पदोपदी आधार घेतला गेला होता. ब्रिटिशांनी नवीन व्यवस्था हवेतून निर्माण केली नव्हती. 'ब्रिटिशांचा' हिंदू सिव्हिल लॉ आजही मनुस्मृती, मिताक्षरा, दायभागादि ग्रंथांवर आधारित आहे. महसूल व्यवस्थेतल्या अनेक गोष्टी मुघल, मराठा आणि दाक्षिणात्य राजवटींमधून घेतलेल्या आहेत.

it was they who for the first time introduced the rule of law;

हे वाक्य भारताच्या इतिहासाबद्दल पराकोटीचे अज्ञान दाखवते. पण चालायचेच. ब्रिटिश काळातल्या इंग्रज शासकांची तत्कालीन आणि इम्मिजिएटलि प्री-ब्रिटिश काळातील भारताबद्दलची पूर्वग्रहदूषित मतेच नंतरच्या जनतेला सार्वकालिक फीचर्स म्हणून पढवली गेली. त्याच विषवल्लीचे पीक म्हणजे वरीलप्रमाणे निराधार आणि भुक्कड जनरलाईझ्ड
विधाने होत.

and they left to India that most precious heritage of all, a democratic form of government.

जवळपास हजारेक वर्षे भारतातही लोकशाही पद्धतीने चालणारी गणराज्ये होती. जस्ट इन केस 'ओरिएंटल डेस्पॉटिझम' वगैरे औटडेटेड थेर्‍या आठवत असतील तर हा विदाबिंदू.

मिलिन्द् पद्की Fri, 01/07/2016 - 00:34

In reply to by बॅटमॅन

अच्छा , म्हणजे चातुर्वर्ण्य, जन्माधिष्ठित जाती-व्यवस्था, सतीची चाल , स्त्रीचे दुय्यम स्थान हे सर्व पूर्वीच्या भारतीय लोकशाहीतूनच आले आणि चालत राहिले तर! मानायला पाहिजे अशी "लोकशाही"!

बॅटमॅन Fri, 01/07/2016 - 00:51

In reply to by मिलिन्द् पद्की

तुमच्या लाडक्या ब्रिटिश लोकशाहीत चक्क १९१८ पर्यंत स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. एवढेच नव्हे तर १८६९ पर्यंत केंब्रिज-ऑक्सफर्डमध्ये स्त्रियांना प्रवेशच दिला जात नव्हता. रसायंटिफिक रेसिझमसारख्या आयडिया आणि तज्जन्य भेदभावाचे अनेक प्रकार या ग्लोरियस वगैरे वेस्टमिन्स्टरीय लोकशाहीतही होते बरंका.

नै म्हणजे लोकशाही म्हणजे आदर्श वगैरे बोलून मुद्दा भरकटवायचा असेल तर इंग्लंडच्या लोकशाहीची होम पिचवरची अफाट कामगिरी सांगितलेली बरी असते.

अनुप ढेरे Fri, 01/07/2016 - 09:41

In reply to by मिलिन्द् पद्की

ह्म्म्म, साधारण ८० वर्ष उमेरिकेत लोकशाही आणि गुलामगिरी एकत्र होतं बरका.

वैशाली हे नाव ऐकलं आहे काय तुम्ही कधी? तिथे दोन हजार वर्षापूर्वी लोकशाही होती असं म्हणतात बुवा.

Nile Fri, 01/07/2016 - 22:54

In reply to by अनुप ढेरे

वैशाली हे नाव ऐकलं आहे काय तुम्ही कधी? तिथे दोन हजार वर्षापूर्वी लोकशाही होती असं म्हणतात बुवा.

म्हणजे? वैशाली सोडून तत्कालीन भारतात नव्हती असं म्हणायचं आहे का? मग १. भारत अखंड नव्हता आणि २. इतर भारतात परिस्थिती वाईट होती या मिलिंद याच्या दाव्याला ही तुमची पुस्तीच आहे असे समजायचे का?

साधारण ८० वर्ष उमेरिकेत लोकशाही आणि गुलामगिरी एकत्र होतं बरका.

तुमच्या वैशालीच्या वाक्याप्रमाणे कित्येक नॉर्दन स्टेट्समध्ये 'फ्री ब्लॅक्स' होते.

ह्या अशा वाक्यांनी नक्की काय चर्चा करता येते हे कळत नाही. असो.

ऋषिकेश Sun, 26/06/2016 - 15:39

तरुणांनी मतदानाला अधिक बाहेर पडावे,नंतर रडु नये हा धडा बाकी देशातील तरुण शिकतील का? आनि शिकले नाही शिकले - जगाचा सनसनाटीकडे कल वळताना बघाता तर ट्रम्पोबा येणार निश्चित!

अनु राव Tue, 28/06/2016 - 08:35

In reply to by सैराट

ट्रंप निवडुन नक्कीच येणार नाही.

ज्या अमेरीकेत ८ आणि ४ वर्षापूर्वी ओबामा निवडुन येऊ शकतो, तिथे ४ वर्षात इतकी सुधारणा होणार नाही की ट्रंप निवडुन येइल.