भारत - सद्य स्थिती
नमस्कार मित्रांनो . आपण रोज पेपरमध्ये वाचत असालच की आज या आपल्या देशात काय चालले आहे. सध्या अंतर्गत समस्याच एवढ्या आहेत की आपल्याला बाहेर लक्ष द्यायला वेळ नाही . पण अंतर्गत किती ही असल्या तरी बाहेरच्या समस्यांना दुर्लक्षुन चालणार नाही. पाकिस्तान व चीन हे भारताच्या इतर देशांना श्रीलंका,बांग्लादेश ( नेपाळला सुद्धा )बरोबर घेऊन खिळखिळा करण्याचा प्रयत्न करत आहे . घुसखोरी ,दहशतवाद,बनावट चलन छापुन ते अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि आपण रोज पाहतो त्याप्रमाणे राजकिय पक्ष फक्त इतरांना पाण्यात पाहण्यातच आपली शक्ती खर्च करत आहेत. अशाने लवकरच देशात अराजक माजेल व कम्युनिस्टांची सत्ता येईल (पक्ष नव्हे) चीन त्याद्वारे राज्य चालवेल अशी मला भिती वाटते.
सत्ता?
कम्युनिस्टांची सत्ता?
अ
श
क्य
!!!
काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित
ऐसीवर येणारे चर्चाप्रस्ताव
ऐसीवर येणारे चर्चाप्रस्ताव यापेक्षा भरीव असावेत अशी अपेक्षा आहे. भारताची आंतरराष्ट्रीय परिस्थिती हा तुम्ही निवडलेला विषय महत्त्वाचा आहे. दोनतीन फुटकळ विधानांमध्ये तो गुंडाळून त्यावर इतरांनी चर्चा करावी ही अपेक्षा योग्य नाही. कृपया याच विषयाचा आढावा घेणारी गेल्या काही आठवड्यात आलेली ऋषिकेश यांची लेखमाला वाचा.
या विषयावर एकदा आपल्याशी
या विषयावर एकदा आपल्याशी चर्चा करायची आहे. प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे. योग्य व्यासंगाशिवाय व्यक्तिमत्वाला पैलू पडत नाहीत. आणि तसेही आजच्या जगात विशुद्ध प्रेम कुठेच मिळत नाही, त्यामुळे प्रत्येक माणसाचीच सद्य स्थिती फार वाईट आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं