श्रद्धा - धार्मिकांचा प्लॅसिबो
श्रद्धेचा रिमोट वापरून प्रत्यक्षात एक बारिकसा खडासुद्धा आपोआप एक सेंटीमीटर मागे-पुढे सरकवता येत नाही हे माहित असूनसुद्धा श्रद्धा असल्यास डोंगर चालत चालत चढू शकतो अशी बढाई मारणारे भरपूर जण आहेत. श्रद्धेमुळे नाट्यपूर्ण घटना घडत असतात असे छातीठोकपणे सांगणारे अनेक लोक आपल्याला नेहमी भेटत असतात. गंगेचे पाणी पिल्यानंतर अनेक दुर्धर रोग बरे झाले आहेत असे सांगणारे लोक आपल्याला नक्कीच भेटले असतील. पार्वतीमाँने पोटावर हात फिरवल्यानंतर बाईची पाळी चुकली व पोट दिसण्याइतपत पुढे आले होते असे (शपथेवर!) सांगितलेल्या शेकडो बायका महाराष्ट्र - गुजरात येथे सापडतील. शेवटी पोटात मूल नव्हतेच, हा भाग वेगळा. अर्धांगवायूच्या झटक्यामुळे एखादा अवयव निकामा झालेला असला तरी ईश्वरावरील (किंवा बुवा-महाराज यांच्यावरील!) श्रद्धेमुळे ते अवयव नीटपणे काम करत आहे असे सांगणार्याकडे बघितल्यावर आपण थक्क होतो. कारण अवयव निकामा झाला आहे हे उघड्या डोळ्यांना स्वच्छ दिसत असते.
सश्रद्धांचा मेंदू कसा काम करतो, हा एक संशोधनाचा विषय आहे. मेंदूतील एक बारीकशी हालचाल शारीरिक प्रक्रियेत एवढा मोठा बदल कसा काय घडवू शकतो? ज्ञानेंद्रियांच्या अनुभवाच्या विरुद्धच्या टोकाच्या गोष्टीवर आपले मन कसे काय विश्वास ठेऊ शकते? श्रद्धेला जैविक आधार असू शकेल का? असे अनेक प्रश्न आपण श्रद्धेच्या संदर्भात विचारू शकतो. 'श्रद्धेतील विसंगती' या विषयावर संशोधन करणारे कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. व्ही. रामचंद्रन यांच्या मते श्रद्धेचा संपूर्ण व्यवहार आव्हानात्मक असूनसुद्धा त्याचा नीटपणे अभ्यास झालेला नाही. काही वैज्ञानिक मात्र अलिकडे श्रद्धेबद्दल गंभीरपणे अभ्यास करत आहेत. याविषयी दोन प्रमुख विचारप्रवाह आहेत. ढोबळमानाने श्रद्धा विवेक व बुद्धीमत्ता यांच्या रसायनातून तयार झालेला व्यवहार असावा असे काही अभ्यासकांना वाटत आहे. परंतु इतर काहींना श्रद्धा पूर्णपणे भावनात्मक व्यवहार असून त्यात उत्स्फूर्ततेचाच भाग जास्त आहे असे वाटते. श्रद्धा वैचारिक विश्लेषणाचा विषय नसून पूर्णपणे भावनेचाच आहे व त्याच दृष्टीकोनातून त्याचा अभ्यास करायला हवा, असे बहुतेकांना वाटत आहे.
श्रद्धेच्या जैविक मूळ कारणावर बोट ठेवणे वाटते तितके सोपे नाही. ईश्वरावरील श्रद्धेमुळे शारीरिक रोग बरा होऊ शकतो याचा वैज्ञानिकरित्या अभ्यास करणे फार अवघड गोष्ट आहे. परंतु श्रद्धाविषयक अभ्यासकांना आजकाल एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. अभ्यासकांच्या मते रोगोपचारावरील श्रद्धेचे स्वरूप हे ईश्वरावरील श्रद्धेशी मिळते जुळते आहे. आणि रोगोपचारावरील श्रद्धेच्या तथाकथित परिणामांची नियंत्रित चाचणी करणे तुलनेने सोपे आहे. ताणतणावासाठी घेतलेल्या गोळ्यांमुळे होणार्या अनुकूल परिणामात ऐंशी टक्के वाटा वैद्यकशास्त्रावरील श्रद्धेचा तर उरलेला वीस टक्के वाटा गोळ्यांच्या रासायनिक प्रक्रियेत असे जाणकारांचे मत आहे. पर्यायी उपचार पद्धतीच्या बाबतीत तर परिणामातील श्रद्धेचा वाटा याच्यापेक्षाही खूप खूप जास्त असणार. बरे वाटणे व बरे होणे हा फरकच सश्रद्धांच्या लक्षात येत नाही. अक्युपंक्चरच्या उपचार पद्धतीत पोटदुखीसाठी शरीरातील कुठल्याही भागात सुई टोचली तरी चालेल, पोटदुखी गायब! अशा प्रकारच्या केवळ श्रद्धेशी निगडित उपचाराच्या परिणामाला 'प्लॅसिबो इफेक्ट' असे वैद्यकीय परिभाषाकोशातील नाव आहे. आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीत प्लॅसिबोलासुद्धा उपचारात प्रक्रियेत भर दिला जात आहे. त्यामुळे श्रद्धेचे वैज्ञानिक स्वरूप समजून घेण्यासाठी, त्याची तपासणी करण्यासाठी प्लॅसिबोच्या परिणामाचा अभ्यास पुरेसा ठरू शकेल, असे अभ्यासकांना वाटत आहे.
ढोबळपणे प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे वैद्यकीय उपचारातील श्रद्धेमुळे होणारे जैविक परिणाम. प्लॅसिबोचा खराखुरा परिणाम होऊ शकतो व रोगोपचार पद्धतीतील ती एक प्रभावी शक्ती आहे, हे मान्य करायलाच हवे. परंतु प्लॅसिबो कशा प्रकारे काम करत असावा हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे. यासाठी एका संशोधकाने प्रत्यक्ष प्रयोग करण्याचे ठरविले. त्याने सुदृढ, निरोगी अशा चौदा युवकांची निवड करून त्यांना दाढदुखी होण्यासाठी काही गोळ्या दिल्या. गोळ्यांचा चांगलाच 'परिणाम' दिसू लागल्यानंतर, दाढदुखी कमी होण्यासाठीचे इंजेक्शन देत असताना "या इंजेक्शनमुळे दाढदुखी थांबेल किंवा कदाचित थांबणारही नाही" असे रुग्णांना सांगत असे. इंजेक्शन सिरिंजमध्ये फक्त सलाइनचे पाणी भरलेले होते. तरीसुद्धा त्यातील बहुतेकांनी 'इंजेक्शनमुळे गुण आला' म्हणून सांगू लागले. संशोधकानी त्यांच्या मेंदूची PET चाचणी घेतली. चाचणीत त्यांच्या मेंदूत एंडॉर्फिनचा जास्त प्रमाणात स्राव झाला होता, हे लक्षात आले. जास्त प्रमाणातील एंडॉर्फिनमुळे त्यांना कमी प्रमाणात वेदना जाणवत असावेत. हाच धागा पकडून संशोधक, प्लॅसिबो उपचार घेणारे व न घेणारे अशा दोघांच्याही मेंदूतील सूक्ष्म बदलांचा अभ्यास करू लागले. PETची चाचणी घेतली. चाचणीत, केवळ मेंदूतच नव्हे तर मेंदूतील वेदनेचा अनुभव दर्शविणाऱ्या, वेदनेच्या तीव्रतेची माहिती देणाऱ्या व शरीराच्या कुठल्या भागात वेदना होत आहेत याची जाणीव देणाऱ्या भागातसुद्धा एंडॉर्फिन पसरलेला होता. इंजेक्शनच्या सकारात्मक परिणामाविषयी ज्यांचा विश्वास होता त्यांच्या मेंदूतील स्रावात लक्षणीय फरक जाणवत होता.
यावरून, आपल्याला जे अपेक्षित आहे ते घडून येण्यासाठी जाणीवेच्या पातळीवर या प्रक्रिया घडत असावेत असा अंदाज बांधता येईल. श्रद्धासुद्धा जाणीवपूर्वक व बुद्ध्यापुरस्कर घडत असलेली प्रक्रिया असून आपल्या मनातील इच्छा-आकांक्षांना पूरक म्हणून ते कार्य करत असावे. आपल्याला नेमके काय हवे याची संपूर्ण जाणीव असेल तरच श्रद्धा (व प्लॅसिबो) परिणामकारकरित्या कार्य करू शकतात. रुग्णाला अज्ञानात ठेऊन प्लॅसिबोचा प्रयोग केल्यास कधीच गुण येणार नाही. तुमचे परिचित तुम्हाला बरे वाटावे यासाठी प्रार्थना करत आहेत हे तुम्हाला माहित असेल तरच तुम्हाला बरे वाटण्याची शक्यता आहे. तुम्हाला न कळत हजारो लोकांनी प्रार्थना केली तरी ती व्यर्थ ठरण्याची शक्यता आहे.
इंद्रियांच्या अनुभवांचासुद्धा श्रद्धेत प्रमुख सहभाग असतो. कारण आपण करत असलेली अपेक्षा कुठूनही उद्भवू शकते. श्रद्धा केवळ मानसिक समाधान देत नसून त्या इच्छाशक्तीद्वारे काही मर्यादित प्रमाणात शारीरिक बळही ती देऊ शकते. पार्किन्सनच्या रुग्णांना प्लॅसिबोच्या उपचारानंतर बरे वाटू लागते. प्लॅसिबोसंबंधातील चाचणीत त्यांच्या मेंदूत, शरीराच्या हालचाली करण्यास उत्तेजन देणाऱ्या डोपामाइनचा श्राव जास्त प्रमाणात आढळला. अशा प्रकारची वाढ औषध सेवनानंतर होत असते. परंतु यावेळी औषधाचे काम प्लॅसिबो करत होता. प्लॅसिबो म्हणून दिलेल्या गोळ्या/इंजेक्शनमुळे पार्किन्सनच्या रुग्णांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यातून डोपामाइनचा स्राव होऊ लागल्यामुळे शारीरिक हालचाली करण्याची इच्छा होऊ लागली. काही मर्यादेपर्यंत अवयव कामही करू लागले. गंमत म्हणजे दुर्धर रोगानी जर्जरित झालेल्या व औषधोपचारांच्या सकारात्मक परिणामाबद्दल साशंक असलेल्या रुग्णावर प्लॅसिबोचा कितीही मारा केला तरीही त्यांच्या अवस्थेत काहीही फरक पडत नाही. अल्झामाइरच्या रुग्णांच्यात मुळातच जाणीवेचा अभाव असतो. त्यांच्या आशा उंचावल्या नसतात. त्यामुळे त्यांच्यावरील प्लॅसिबो उपचार निरर्थक ठरतो. कारण त्यांच्यात कुठलीही अपेक्षाच नसते. त्याचप्रमाणे अक्युपंक्चरचा परिणाम लहान मुलावर होत नाही. कारण पर्यायी रोगोपचाराच्या प्लॅसिबो प्रक्रियेची त्यांना जाण नसते, अपेक्षा नसतात.
प्लॅसिबोच्या संदर्भात अनुभव व अपेक्षा हातात हात घालून काम करत असतात. वैद्यकीय उपचारावरील रुग्णाची अढळ श्रद्धा एकूण उपचार प्रक्रियेत महत्वाचे ठरते. 'अपेक्षेनुसार अनुभव' हा श्रद्धेचा गाभा आहे. त्यामुळे धार्मिक श्रद्धेच्या संदर्भात धर्माबद्दलच्या इच्छा व आकांक्षा व धर्मश्रद्धेतून आलेले अनुभव फार महत्वाचे ठरतात. केवळ धर्मावरील श्रद्धाच नव्हे तर इतर अनेक प्रकारच्या श्रद्धा आपल्या मनात कायम कोरून ठेवल्यासारखे असतात. कितीही विरोधी पुरावे दिले तरी त्या मानसिकतेत तसूभरही बदल होत नाही. बदल करण्यास नकार दिल्यामुळे नुकसान होत आहे हे माहित असूनसुद्धा आपण आपापल्या श्रद्धेशी घट्ट चिकटून बसतो, हट्टाला पेटतो.
डॉ. व्ही रामचंद्रन यांचा संशोधनाचा विषय वैद्यकीय उपचारावरील श्रद्धेमुळे उद्भवणारी वैचित्र्यपूर्ण परिस्थिती असा आहे. यातून श्रद्धेचे नेमके स्वरूप काय असेल हे कळू शकेल. अर्धांगवायूचाच एक प्रकार असलेल्या ऍनोग्नोसियाच्या रुग्णांच्या एका गटाचा अभ्यास करत असताना गटातील काही रुग्ण त्यांच्या शरीरातील हातासारखा अवयव निकामा झाला आहे यावर विश्वास ठेवायलाच तयार नव्हते. हात नेहमीसारखाच असून फक्त आता तो नीट नाही अशा समजूतीत ते वावरत होते. त्यापैकी एका रुग्णाला डॉक्टरांनी " मी तुला भूल येण्याचे इंजेक्शन देतो. काही काळ तुझा हात बधीर राहील" असे म्हणत लुळ्या पडलेल्या हाताला सलाइनच्या पाण्याचे इंजेक्शन दिले. तो रुग्ण खरोखरच हात बधिर झाला आहे असे म्हणू लागला. इंजेक्शनचा खरे-खोटेपणा तपासण्यासाठी रुग्णाच्या दुसर्या निरोगी हाताला पण इंजेक्शन दिल्यावर रुग्णाने 'भूल काम करत नाही' म्हणून तक्रार केली. अजून काही अशाच प्रकारच्या रुग्णावरील प्रयोग कमी-जास्त प्रमाणात सामान्यपणे याच प्रकारात मोडत होते. हे रुग्ण आपापल्या हाताकडे एकाग्र नजरेने बघत हाताची भूल उतरण्याच्या प्रतीक्षेत होते. त्या सर्वांना आपला हात खरोखरच व्यवस्थित आहे यावर पूर्ण विश्वास होता..या रुग्णांना हात हलवण्यास सांगितल्यानंतर सांधेदुखी, स्नायूत बिघाड असे काही तरी कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. या गटातील रुग्णांच्या मेंदूच्या तपासणीत ज्यांच्या उजव्या मेंदूत बिघाड आहे तेच फक्त आपण रुग्ण आहोत हे मानण्यास तयार नव्हते. परंतु ज्यांच्या डाव्या मेंदूत बिघाड होता त्यांना मात्र आपण अर्घांगवायूचे रूग्ण आहोत याची जाणीव होती. उजव्या मेंदूतील कमतरतेमुळे माणूस प्रश्न विचारण्याची क्षमताच हरवून बसतो. प्रत्यक्ष पुराव्यावर विश्वास ठेवायलाही तयार होत नाही.
श्रद्धेतील विसंगती ऍनोरेक्सिया व बायपोलार डिसऑर्डर (कधी उन्माद तर कधी औदासीन्य) मुळे उद्भवण्याची शक्यता असते.ऍनोरेक्सियाग्रस्त रोगी स्वत: हडकुळा असूनसुद्धा आरश्यात बघत 'आपण फार मोठे पहिलवान आहोत' अशी समजूत करून घेत असतो. बायपोलार डिसऑर्डरचे रुग्ण नेहमीच आपल्या नादात असतात. कधी स्वत:ला ग्रेट व कधी कचरा अशी समजूत करून घेत असतात. त्यांचा स्वत:च्या स्वत:वर अजिबात विश्वास नसतो. अशा प्रकारचे आजार सामान्यपणे भावनेतील बाधेमुळे होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे श्रद्धेतील विसंगतीसुद्धा अशा प्रकारच्या भावनाविकारांचे कारण असू शकते.
काही वैज्ञानिकांच्या मते श्रद्धा - ईश्वरावर की वैद्यकीय औषधोपचारावर, हा मुद्दा गौण आहे - ही एक भावनिक स्थिती असते. ज्याप्रकारे सुख, समाधान, आनंद, इ.इ. मेंदूतील एका विशिष्ट स्रावांना कारणीभूत ठरतात तसाच काहिसा प्रकार श्रद्धेच्या बाबतीतही घडत असावे. श्रद्धा सामान्य स्थितीत असलेल्या मेंदूत बदल घडवून आणते. भावनोद्रेकाच्या स्थितीत असलेल्या मेंदूप्रमाणेच डोपोमाइन व सेरोटोनिन श्रद्धेच्या स्थितीतही कार्य करत असतात. आध्यात्मिकतेच्या आहारी पडलेल्यांच्यातसुद्धा याच न्युरोट्रान्समिटरचाच सहभाग असतो.
अजून एका अभ्यासामध्ये जितक्या जास्त प्रमाणात दुखणे तितक्या तीव्रतेने प्लॅसिबो गुण देतो हे लक्षात आले. जेव्हा जास्त दुखत असते तेव्हाच वेदनेपासून मुक्त होण्याची इच्छा तीव्र होते. अशा प्रसंगात प्लॅसिबोचा आधार मिळत असल्यास रुग्णाची इच्छा पूर्ण होते. कारण प्लॅसिबोमुळे मेंदूत होत असलेला एंडॉर्फिनचा स्राव वेदना कमी करणार्या मेंदूच्या संवेदनशील भागात पसरू लागतो व रूग्णाला वेदनेतून मुक्ती मिळाल्यासारखे वाटू लागते. धार्मिक श्रद्धांच्या बाबतीतही नेमके हेच घडते.
श्रद्धा ही एक जैविक घटना असून त्यामुळे मेंदूत होत जाणार्या बदलांचे मोजमोप करणे आता शक्य आहे. जीवन जगण्यासाठी अत्यंत गरजेचा असलेल्या आत्मविश्वासात श्रद्धेमुळे बळकटी मिळत असेल. श्रद्धेतून आत्मविश्वास की आत्मविश्वासातून श्रद्धा हा प्रश्न बाजूले ठेवला तरी माणूस श्रद्धेच्या मागे एवढा का धावत आहे याचे चित्र स्पष्ट होत जात आहे, हे मात्र खरे.
प्रतिक्रिया
टाळ्या! मस्तं लेख. खूप खूप
टाळ्या! मस्तं लेख. खूप खूप आवडला! बर्याचदा श्रद्धेला झोडपणारेच लोक दिसतात पण त्याची कारणमीमांसा खूप कमी वेळा वाचायला मिळते.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
उत्तम लेख. जेव्हा डॉ
उत्तम लेख. जेव्हा डॉ रामचंद्रन यांचे नाव जावडेकरांच्या मेंदुच्या मनात या पुस्तकात वाचले तेव्हा बरे वाटले. चला एक तरी भारतीय मेंदुविज्ञानाच्या संशोधन क्षेत्रात आहे. पण लवकरच तो गोड गैरसमज दूर झाला. ते भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ आहेत.
माणसाची सश्रद्द वा अश्रद्ध असणे ही अवस्था एका जैविक प्रक्रियेचा भाग आहे असे मला वाटतेच. अंधश्रद्धा हा भाग केवळ अज्ञान व अगतिकता यातून आला नसुन तो एक मानवी मेंदुच्या उत्क्रांतीतील अवशेषात्मक भाग आहे. अश्रद्धतेचा वा सश्रद्धतेचा अतिरेक हा मला मनोविकाराचाच भाग वाटतो. अतिरेक शब्दाची व्याप्ती सापेक्ष आहे हे मान्यच.
अश्रद्ध लोक प्लासिबोच्या सुपरिणामापासुन वंचित रहतात
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
अतिरेक
"अतिरेक " बद्दल तुम्हीच एकदा "ताकतवान बौद्धिक एडके ढुशी द्यायला सावज शोधत असतात " असे काहीतरी उदाहरण बुद्धीवाद्यांबद्दल दिले होते.त्याची मांडणी आवडली होती.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अच्छा मनोबा तुला या
अच्छा मनोबा तुला या प्रतिसादाबद्दल म्हणायचे आहे तर!
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
exactly
तोच प्रतिसाद!
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
वंचनेबाबत काहीसा साशंक
वंचनेबाबत काहीसा साशंक आहे.
"मानसिक निर्धाराने दुखण्याला दिलासा मिळतो, आणि निर्धाराकरिता वापरलेली सबब महत्त्वाची नसते" याचा प्रत्यय बघितल्यामुळे हे वाक्य निव्वळ श्रद्धा राहत नाही. ही जाणीव असल्यानंतर मानसिक निर्धाराचे कवायती प्रशिक्षण मिळवता येईल, असे वाटते.
+१
सहमत.
-Nile
अवांतर - वंचना / वंचित
प्रकाश घाटपांडे : अश्रद्ध लोक प्लासिबोच्या सुपरिणामापासुन वंचित रहतात
..............येथे 'वंचित' = अ-लाभार्थी अश्या अर्थी आहे.
धनंजय : वंचनेबाबत काहीसा साशंक आहे.
..............येथे वंचनेचा अभिप्रेत अर्थ काय आहे ?
कारण वंचना शब्दाचा सर्वमान्य अर्थ 'फसवणूक' असा आहे.
--------
मोल्सवर्थ :
वंचणें [ vañcaṇēṃ ] v (वंचन) To cheat or trick; to delude or deceive; to chouse, cozen, or defraud. The word has a free or familiar use; as हा बंदीस पडला आणि आपल्या सर्वस्वास वंचला. 2 To skip, miss, or overpass (knavishly); as त्यानें दोन पात्रें वंचली.
वंचन [ vañcana ] n वंचना f Cheating, defrauding, deceiving, tricking.
वंचित [ vañcita ] p Cheated, tricked, deceived, imposed upon.
----------
दाते-कर्वे :
वंचित - (धावि.) १ वियुक्त; निराळा; अलग. 'अशा लेखकांना विद्वान या विशेषणापासून प्रायः वंचित ठेवण्यांत येतें.
वंचक : (अक्रि.) फसणें. -ज्ञा १७.३५६. 'तो वंचलासे जन जो न वाची ।'-(सारुह १.३२.) वंचतुक-स्त्री. वंचना; फसवणूक. 'नावाजिलें तुम्ही म्हणा आपणांसी वो । तरी कां वंचतुक सुमनासि वो ।'
--------
शब्दरत्नाकर (वा. गो. आपटे)
वंचित - फसलेला, अंतरलेला
वंचना - फसवणूक
--------
जुनेच चित्रः
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
विज्ञान
यानंतर तिसरी आकृति काढावी. तिथे खांद्यावर काहीही नसावे. नि त्याखाली विज्ञान असे नाव द्यावे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हा प्रतिसाद
हा प्रतिसाद पटला नाही. विज्ञानाचा विकास झाला तो निव्वळ डोके वापरल्यामुळेच. नाहीतर आज जगांत लोकं अश्मयुगातच राहिले असते. त्यामुळे विज्ञानाला डोकेच नसते हे गृहीतक पटत नाही. विज्ञान जे सांगते त्या प्रत्येकाला, कोणालाही समजेल असा पुरावा असतो.
हा प्रतिसाद पटला नाही.
पृथ्वी स्वतःभोवती आणि सुर्याभोवती देखील फिरते हे केवळ आमच्या शाळेच्या पुस्तकात लिहिलेय म्हणून मानतोय इतकेच. बाकी त्याचे पुरावे माझ्यासारख्या अल्पमतीवाल्या अनेक जीवांना देण्यात आलेले नाहीत व दिले तरी कळतील की नाही ही शंका आहेच. शिवाय विज्ञानाशी पंगा घेण्याची उर्जा ही आमच्यासारख्या सामान्यांच्या अंगी नसते.
बाकी 'एनर्जी कॅनॉट बी क्रियेटेड ऑर डिस्ट्रॉयेड बट कॅन बी ट्रान्फर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अनादर ' हे तत्व पटणार्या वि़ज्ञानाला 'आत्मा अजर, अमर आहे आणि तो एक शरीर जीर्ण झाल्यावर दुसरे शरीर धारण करतो' हे तत्त्व अगदीच टाकावू का वाटते हे समजत नाही. किंवा त्याचा अभ्यास करणे सद्ध्याच्या वि़ज्ञानाच्या आवाक्याबाहेर असावे असे वाटते.
बाकी 'एनर्जी कॅनॉट बी
कारण कुठल्यापद्धतीने कुठली एनर्जी कुठल्या एनर्जीत ट्रान्सफॉर्म होते हे प्रयोगाने दाखवता येतं. जे आत्म्याच्या विधानाला (अजूनतरी!!) शक्य झालेलं नाही.
बा द वे its one form to another ... not one object to another
कारण कुठल्यापद्धतीने कुठली
उत्कृष्ट.. "अजूनतरी" या शब्दाने "विज्ञान" म्हणजे काय हे बरोबर अधोरेखित केलंत.
कुठल्यापद्धतीने कुठली एनर्जी
Let's better not confuse between assumptions and deductions in science.
एक वैज्ञानिक तत्त्व स्विकारले नि ते तत्त्व प्रयोगाअंती सिद्ध होते आहे कि नाही हे पुन्हा तेच तत्त्व वापरून (त्या आधारित उपकरणे वापरून, इ) चेक केले तर त्याला काही अर्थ आहे का?
==================================================================
ते असो.
रासायनिक उर्जा ज्वलनानंतर (अंशतः) प्रकाशात रुपांतरित होते. हा प्रकाश जेव्हा पोकळीत प्रवास करतो त्याची उर्जा तितकी असली पाहिजे. पण उर्जेचे एकक काय? kgm^2/s^2. प्रकाशाला (त्याला तुम्ही फोटॉन म्हणा नैतर वेव म्हणा) मासच नसेल पोकळीतून जाताना त्याची उर्जा कशी मोजता येईल (मंजे मोजताच कशी येईल)? आता वेव एनर्जीचे जे समीकरण आहे ते कोणी मला विस्कटून सांगेल काय? मंजे नॉट इन टर्म्स ऑफ या फोटॉनपासून कसे दुसरे पार्टीकल्स बनतात आणि त्यांच्यात उर्जा असते किंवा हा किरण जिथे पडला तिथे काय होते, पण इन टर्म्स ऑफ प्रकाश हा प्रकाश म्हणून प्रवास करत असतो तेव्हा काय?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
एक वैज्ञानिक तत्त्व स्विकारले
नक्की आक्षेप समजला नाही.
ट्रान्सफॉर्मेशनपूर्वी आणि नंतरची वेगवेगळ्या प्रकारची एनर्जी मोजून ती तेवढीच आहे हे दाखवताना तेच तत्व कुठे वापरले गेले.. मी शिकलेले उदाहरण आठवतय ते सांगतो.. पोटेन्शिअल एनर्जी टु कायनेटीक एनर्जी .. त्यात उंचावर असणार्या वस्तुची पोटेन्शिअल एनर्जी त्याची उंची, मास वापरुन काढली जाते.. कायनेटीक एनर्जी वेग, त्वरण वरुन काढली जाते..
यात तेच तत्व वापरुन हा मुद्दा नक्की कसा वापरताय ते जरा स्पष्ट करा..
स्पष्टीकरण
असं लिहिताना खूप पायर्या गाळल्या आहेत हे मान्य. मी सुलभतेसाठी इंग्रजीत लिहिण्याचं स्वातंत्र्य घेतो-
One measures energy in terms of force times energy. Please note that it is an assumption that an object has kinetic energy equal to 1/2mv^2. There is no way to directly measure kinetic energy as kinetic energy. Similarly one cannot measure potential energy as potential energy. If one wants to measure them, hypothetically, they can be converted into work energy and now, the force and the displacement can be directly measured.
But this presumes that - displacement caused in absence of any force (I mean without any force as its cause) does not require any energy. (Same as what Newton's law says.). And this is basically law of conservation of energy being used to crosscheck the verity of the same.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
काय तुम्ही लोक त्याच त्याच
काय तुम्ही लोक त्याच त्याच जिलब्या टाकताय?
कितीही वर्ष गेली तरी ना अजो मत बदलणार आहेत ना दुसरे.
आहे तसे अॅक्सेप्ट करा ना सर्वांना.
आपण डायबेटिक आहात का?
आपण डायबेटिक आहात का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अजुन तरी नाही. कधी बटाटेवडे,
अजुन तरी नाही.
कधी बटाटेवडे, भजी, मिसळ वगैरे पण येउ द्या की.
त्याच त्याच जिलब्या म्हणजे बोर होते फार.
अगदी बरोबर. तरी अलीकडे काही
अगदी बरोबर. तरी अलीकडे काही दिवस भा रा भागवत विशेषांकामुळे नेहमीच्या जिलब्यांवरती उत्तम उतारा मिळालाय हेही नसे थोडके.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हा हा हा, हे एकदम नेमके
हा हा हा, हे एकदम नेमके वाक्य.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मी मते बदलतो पण समोरचा
मी मते बदलतो पण समोरचा माझ्यापेक्षा खमक्या नि चिवट निघाला पाहिजे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
थोडक्यात-मत काय आहे यापेक्षा
थोडक्यात-मत काय आहे यापेक्षा मत मांडणारा कसा आहे यावर मतपरिवर्तन अवलंबून आहे तर....रोचक!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
I am surprised how come you
I am surprised how come you always interpret something I never imply.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मलाही तेच म्हणायचंय. नेमकं जे
मलाही तेच म्हणायचंय. नेमकं जे लिहिलेल्या वाक्यावरून स्वयंस्पष्ट असतं ते तुम्हांला कसं काय म्हणायचं नसतं?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
लोल. मेलोय हसून.
लोल. मेलोय हसून.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
it was force times
it was force times displacement.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
work done by displacement of
work done by displacement of object by force is simplest form and hence used for measuring equivalent energy. Since it's same energy and one unit is required to measure it, this is used for measuring energy. Now why it's same energy is evident from cause and effect in all cases. This is not assumption. When object falls from height it goes down so potential energy conversion to kinetic is clear by cause and effect..
so energy is transformed not created or wasted is not assumption.. it's proved by every example.. measuring needs equivalent so that it can have same unit..
and hence used While
While measuring work, isn't it that no work is considered to be done if no displacement is observed? Is this not as good as assuming law of conservation of energy?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
श्रेणीस श्रेणी
इडीयट.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
one form to another ... not one object to another
व्याख्येप्रमाणे बरोबर.
पण तरीही काही इमानदार शंका.
'कॅनॉट बी क्रियेटेड ऑर डिस्ट्रॉयेड' हे कसे काय ? म्हणजे उर्जा एका रुपातून दुसर्या रुपात जाते मग ती पुर्णपणे जाते काय ? की तिथेही माध्यमाच्या मर्यादेमुळे लॉस / गेन होतो ?
उदा. जर लॉस होत असेल तर 'अ' रुपातून 'ब' रुपात जाताना १०% लॉस, तिथून पुढे 'क' रुपात जाताना अजून ५% लॉस असे करत करत एका ठराविक ठिकाणी कंप्लीट लॉस (म्हणजे डिस्ट्रॉय) होत नाही काय ?
आणि जर मुळात जन्म होत नाही तर मृत्यु कसा होतो ? (उर्जेच्या बाबतीत म्हणा किंवा आत्म्याच्या बाबतीत म्हणा.)
कन्व्हर्जन मध्ये लॉस होतोच
कन्व्हर्जन मध्ये लॉस होतोच की...फक्त लॉस म्हणजे दुसर्या रूपात ती ऊर्जा बाहेर पडते जिचा प्रत्यक्ष उपयोग होत नाही. त्यामुळे एकूण ऊर्जेचे मान आहे तेवढेच राहते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
असा लॉस वैगेरे काही होत
असा लॉस वैगेरे काही होत नाही.
============================
गवरी पूर्ण जळते का? तर नाही. मग पूर्णपणे जाते काय चे उत्तर नाही. पण गवरीचा जो रेणू जळतो त्याची १००%* केमिकल एनर्जी हिट एनर्जी बनते.
* ऑक्सिडेशनच्या पूर्वीच्या आणि नंतरच्या उर्जास्थितींतील फरक.
===========================================================================================================
कोणत्याही प्रश्नात "मूळात" हा शब्द घातला कि विज्ञानाची भयंकर ततपप होते. कारण विज्यानाचा बॉटम अप अप्रोच आहे. चार गोष्टी पाहून अर्थ लावत जाणे. त्याला थेट वरचा प्रश्न विचारला कि अनंत थेर्या, प्रतिथेर्या, पॅराडॉक्सेस, आणि "अजून संशोधन चालू आहे, वाट पहा" इ इ चालू होते.
ते काही का असेना, उर्जेचा जन्म होत नाही नि ती नष्ट होते असे कायसे गृहितक या प्रश्नात दिसते. सायंटिफिकली हा प्रश्न इन्व्हॅलिड वाटतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सायंटिफिकली हा प्रश्न इन्व्हॅलिड वाटतो.
सायंटिफिकली हा प्रश्न इन्व्हॅलिड वाटतो ? काय साहेब, हा तर उर्जा अक्षय्यतेचा नियम म्हणून आम्हाला शाळेतच शिकवला गेला आहे.
तुमची मूळ वाक्यरचना "मूळात
तुमची मूळ वाक्यरचना "मूळात जन्म होत नाही" अशी आहे. तो मूळात शब्द महत्त्वाचा आहे. बिग बँगेचे वेळी मास व उर्जा जन्मले म्हणायचे कि नाही मला संभ्रम आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
शाळेतली वाक्यरचना काय होती ते
शाळेतली वाक्यरचना काय होती ते असू द्यात, पण नियमाचा अभिप्रेत अर्थ खालिलप्रमाण आहे -
नविन उर्जा शून्यातून अथवा "उर्जा नसलेल्या अन्य गोष्टीपासून"* निर्माण करता येत नसते. असलेल्या उर्जेचे अस्तित्व पूर्णतः नष्ट* करता येत नाही. (मात्र एका रुपातून दुसर्या रुपात रुपांतरित करता येते.)
*अर्थात याला वस्तुमानाचा अपवाद आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
"अजून संशोधन चालू आहे, वाट
म्हणजे मला अजून समजलेलं नाहिये.. पण प्रयत्न करत रहाणार.. कधीतरी नक्की समजेल..
हेच धर्माच्या बाबतीत विचारणार्याची लायकी/अधिकार/ श्रद्धा नसणे यावर जातं
बाकी
वगैरे म्हणजे विनोदी श्रेणीला साजेसं म्हणता येइल!!
वगैरे म्हणजे विनोदी श्रेणीला
तसं हे विधान पॉसिटिवली विनोदी आहे. उपहासाने नव्हे. विज्ञानाने "मूळात" कशाचे स्पष्टीकरण दिले आहे त्याचे एक (फक्त एक ) उदाहरण द्या नि पाहिजे ती श्रेणी द्या.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
लॉस हा सापेक्ष असतो.. आता
लॉस हा सापेक्ष असतो.. आता पंखा हा हवा ढकलण्यासाठी तयार केलाय तेव्हा जी उर्जा हवेपेक्षा पंख्याचे पाते ढकलण्यासाठी खर्च होते तो लॉस.. किंवा ज्या वीजेमुळे मोटारचा शॅफ्ट फिरण्याऐवजी मोटर तापते तो लॉस..
त्यामुळे उर्जेचा लॉस नसतो.. ती कुठे न कुठे वापरली जातेच.. आपल्याला हवी तिथे वापरली जाणे हा लॉस..
तरीच!
नुस्तं पुस्तकात लिहलंय म्हणून मानणारे मुटक्यांसारखे लोक जगात नसते तर वेगवेगळ्या धर्मांची बांडगूळं इतकी फोफावलीच नसती. बाकी पुस्तकात लिहलेलं वाचून त्यावर डोकं खाजवून समजून घेणार्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच!
-Nile
विज्ञानवाद्यांनी वाचून वाचून
विज्ञानवाद्यांनी वाचून वाचून आणि डोके खाजवून खाजवून स्कॅल्प लाल करून घेतल्याने काय फायदा झाला?
१. सगळं जग आण्विक विनाशाच्या खाईवर आहे.
२. जगात गोर्यांचे चार देश सोडले तर भयंकर गरीबी आहे.
३. जगात विषमता भयंकर आहे.
४. पर्यावरणाचा र्हास झाला आहे.
५. नैसर्गिक स्रोत संपत आले आहेत.
६. लोकांचे जीवन अधिक स्ट्रेसफूल बनत आहे.
हे सगळं विज्ञानाच्या बांडगुळांनी केलं आहे. स्वतःला शहाणी समजणारी, धर्माला हाकलूनच देणार्या या खाजवणार्या लोकांना आपण धर्मापेक्षा विघातक अशा विज्ञानाला फ्री रन दिला आहे याची कल्पना देखिल नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
किती ते अज्ञान!
खरंय ब्वॉ, विज्ञानाने इतकी प्रगती करूनही तुमच्या सारखे अज्ञानी लोक पुष्कळ शिल्लक आहेतच. हेच खरं विज्ञानाचं अपयश!
-Nile
मला काय ज्ञान आहे नि काय नाही
मला काय ज्ञान आहे नि काय नाही याचा अदमास घ्यायची लायकी( ते एंट्री टू द हॅज टू बी अर्न्ड, आठवतं?) विकसित व्हायला आपल्याला बरेच कष्ट घ्यावे लागतील दिसतंय. आणि माणसानं नेहमे आपल्या लायकीत राहावं. लोकांचं ज्ञान, अज्ञान कशाला काढता? व्यक्तिगत दोषारोपात जायची गरज नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
विज्ञानाची प्रगती झाली नाही असं मी म्हणालो का? नाही म्हणालो. या प्रगतीचा, शोधांचा एक मोठा अ-तांत्रिक अँगल आहे. ते अँगल न पाहणारे तुमच्यासारखे अज्ञानी लोक पुष्कळ आहेत. वाढत आहेत. त्या अपयशाबद्दल चर्चा आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हे हे हे, फार कष्ट नाही पडणार
फक्त चोप्यपस्तेचे कष्ट पडले.
-Nile
कॉपी पेस्ट करून करा नैतर अजून
कॉपी पेस्ट करून करा नैतर अजून कशी, अॅक्नॉलेजमेंटसाठी धन्यवाद.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पुस्तकात लिहलंय म्हणून मानणारे मुटक्यांसारखे लोक जगात नसते
मार्मिक प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
एक गोष्ट सांगतो.
लहानपणी राख आणि मिठाने दात घासणारे आम्ही मोठेपणी कोलगेट वापरायला शिकलो. मग कोलगेटला साक्षात्कार झाला की नुसती सफेद पावडर पुरेसी नाही तर तुमच्या टुथपेस्टमधे लिंबू आहे काय ? तर आम्ही लगेच लिंबाचा अंश असलेली टुथपेस्ट वापरतो. नंतर ते पुरेसे नाही मग कोणीतरी आम्हाला विचारते की तुमच्या टुथपेस्टमधे लिंबू आणि मिठ आहे काय ? आता उद्या परत तुमच्या टुथपेस्टमधे राख आहे का असे विचारले तर पुन्हा आम्ही राखेने दात घासायला कमी करणार नाही.
आता ह्या सर्व गोष्टी कोठून आल्या तर नवनव्या संशोधनातून. विज्ञानातून.
आता तुम्ही म्हणाल की विज्ञान सतत आपले पहिले सिद्धांत तपासून बघत असते आणि जर अगोदर काही चुकले असले तर त्यात न लाजता बदल करते. थोडक्यात तुमचे संशोधन होता होता आमच्या दातांच्या कण्या झाल्या त्याचे काय ?
आमच्यासारखे पुस्तके वाचून त्यावर विश्वास ठेवणारे आहेत त्यामुळेच धर्म, वि़ज्ञान आणि इतर जे काही आहेत त्यांची दुकाने व्यवस्थित चालू आहेत यावर विश्वास ठेवा. प्रत्येक पुस्तकात लिहिलेलं वाचून त्यावर डोकं खाजवून समजून घ्यायचे ठरले तर एक जन्म पुरेसा पडेल असं वाटत नाही. शिवाय डोक्याचा चांदोमामा होईल ते वेगळेच. शिवाय कितीही डोकं खाजवून समजून घेतलं तरी आपलंच डोकं लै भारी असं म्हणणे म्हणजे जगातील ज्ञानवंतांचा अनादर केल्यासारखे होईल ते वेगळे. शेवटी आम्ही सामान्य माणसं, आम्ही देवळातल्या देवापुढंही मस्तक झुकवितो, लग्नात बायकोसमोर, तिरडीवर झोपलेल्या अनोळखी माणसासमोर आणि महिन्यातुन एकदा न्हाव्यासमोर देखील. शिवाय शास्त्रज्ञ / वैज्ञानिक म्हटले तरीही आम्ही लोटांगण घालू.
काये की आम्ही त्याशिवाय जगणे सुखकर होईल असे वाटतं नाही. त्यामुळे आमच्यापुढे विज्ञान श्रेष्ठ की धर्म हा प्रश्नच आमच्यापुढे नाही.
आमच्यासारखे पुस्तके वाचून
+१
बिंगो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
विज्ञान आणि जाहिरात यात फरक
विज्ञान आणि जाहिरात यात फरक आहे हो......
मी माझ्या डेंटिस्टला कोणती टूथपेस्ट चांगली आहे असा प्रश्न विचारला तेव्हा त्याने "दात घासण्यात पेस्टचा रोल मार्जिनल आहे; ब्रश खरा महत्त्वाचा" असे ऑथेंटिक (तो डेंटिस्ट्री शिकला असल्याने त्याला मी त्यातल्या त्यात ऑथेण्टिक समजतो) उत्तर दिले.
याच डेण्टिस्टने "हल्ली डेण्टिस्टना रूट कॅनॉल, क्राऊन, इम्प्लॅण्टमध्ये जास्त इंटरेस्ट असतो त्यामुळे माझा दात काढण्याचा* धंदा उत्तम चालतो" अशी माहिती दिली होती.
*म्हणजे दुसरे डेण्टिस्ट पेशंटची कवळी करायची असेल तरी त्या पेशंटला आधीचे दात काढायला याच्याकडे पाठवतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
विज्ञान आणि जाहिरात यात फरक आहे हो....
माहित आहे हो.
पण 'रुद्राक्ष', 'हनुमान यंत्राची' जाहिरात आली तरी बहुसंख्य धार्मिक असलेले लोक पण ते घेत नाहित.
मात्र हीच जाहिरात टुथपेस्टची असेल तर त्यावर बर्यापैकी विश्वास ठेवतात. कारण या कंपन्या संशोधनावर प्रचंड पैसा खर्च करतात आणि संशोधन हे विज्ञानावर आधारीत असते असे माझ्यासारख्या बरेच जणांना वाटते.
अहो पण चंद्रावरुन पृथ्वीचे
अहो पण चंद्रावरुन पृथ्वीचे फोटो पाहीलेत की आपण. दुसरं चांगलं उदा. सांगा पाहू.
___
बाय द वे, मानसशास्त्र हे शास्त्र्=सायन्स आहे की सुडोसायन्स? कारण एक औषध मला लागू पडलं म्हणजे ते दुसर्याला लागू होइलच असे नसते. त्यात कदाचित पित्त-वात वगैरे प्रकृतींची गुंतागुंत असते की आणखी काही?
विज्ञान जे सांगते त्या
आपण हे सोदाहरण पाहू -
१. प्रकाश हा तरंग किंवा कणांचा बनला आहे.
२. तरंग व कण या दोन भिन्न भिन्न बाबी आहेत.
३. प्रकाश अल्टरनेटली कण वा तरंग असतो असे नव्हे तर तो एकदाच दोन्ही असतो.
४. सगळेच उपाणू पदार्थ हे असेच असतात.
५. आपण त्यांचेच बनले आहोत.
६. सत्य काय आहे (आणि आहे काय) हे ते मोजेपर्यंत ठरत नाही.
७. कोणतीही गोष्ट १००% अचूक मोजता येत नाही.
इति विज्ञान.
हे सगळे नियम एकत्र घेतले तर ???
"मी आहेच कि नाही" इथून प्रश्न चालू होतो. "मी काय आहे" हा फार पुढचा प्रश्न झाला.
एका पातळीनंतर विज्ञान भयंकर अगम्य बनू लागते. अगम्य चालेल पण एकदम इल्लोजिकल? नको त्या गोष्टींचे प्रिमॅच्यूअर स्पष्टीकरण द्यायचा आग्रह विज्ञानाने सोडला तर आपले विधान थोडेफार ठिक आहे.
======================================================================================
विज्ञानाचे जसे हे "अधिभौतिक" क्षेत्र आहे तसेच धर्माचे आहे. ते प्रत्येक गोष्टीचा संदर्भ देवात देतात. त्यामुळे काहीही विचारा ते गोलगोल फिरवत ठेवल्यासारखं वाटतं. हा इनफायनाईट सर्क्यूलर रेफरन्स त्यामानाने लॉजिकल आहे.
===========================================================================================================
हे देखिल भलतंच भन्नाट विधान आहे. म्हणजे वापरलं डोकं कि ते झालं विज्ञान. म्हणजे पाषाणयुगात हत्यार बनवणाराचे (अन्य) विचार काय होते हे न जाणताच त्याला तुम्ही वैज्ञानिक म्हणत आहात. अश्मयुगाचं असू द्या, एकूण नास्तिक किती आहेत ते पाहून, विज्ञान, अॅज अॅन अल्टर्नेटीव फिलॉसॉफी ऑफ लाइफ, आजदेखिल व्हॅलिड नाही असे म्हणता येईल.
कोणत्याही धर्माने शोध लावण्यावर बंदी घातलेली नसावी. उलट साला सगळ्या धार्मिक क्रिया पूर्ण करायला कितीतरी शोध वापरावे लागतात. एका विशिष्ट डोमेनमधे धर्माचं एक तत्त्वज्ञान आणि विचारप्रणाली आहे. अर्थातच विज्ञान तिथे आपलं नाक खुपसतं तेव्हा धर्म आपली "सिनिऑरिटी" दाखवायचा प्रयत्न करतो.
=================================================================================
हे वाक्य अजून एका प्रकारे निरर्थक आहे. समजा असं असतंच, म्हणजे "कोणालाही" समजलं असतं, तर आज निअर १००% जग नास्तिक नसतं का? एक तर कोट केलंय तसं नाही, नैतर जगातल्या ९५% लोकांना डोकं नाही. विज्ञान अधिकृतरित्या सांगतं कि विज्ञान देव मानत नाही (कमाल म्हणजे दुसरीकडे वैज्ञानिक संशोधन पद्धती म्हणते कि एखादी गोष्ट नसतेच असे विज्ञान सिद्ध करू शकत नाही. ते असोच.) आणि लोकांना (कोणालाही) पुराव्यानिशी पटेल असं काही त्याकडे असतं आज कोणी अस्तिक नसतं.
हे सत्य आहे. पण माझा प्रतिसाद "रिप्लाय इन काइंड" होता. धर्माला डोके नाही म्हणताना जे निकष लावले गेले, जी अप्रोच वापरली गेली, तत्सम निकष लावले मी. सर्वसाधारणपणे विज्ञानाचा अंगिकार करणारे, विज्ञानाच्या त्रूटी मान्य करणारे, धर्माच्या चांगल्या गोष्टीला चांगले व वाईटला वाईट असे विवेकाने म्हणणारे लोक बुद्धीमान आहेत हे नि:संशय आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
इथे विनोदी श्रेणी देणारा /
इथे विनोदी श्रेणी देणारा / देणारी ते खांद्याच्या वर काही नसतं याची साक्ष आहे. बिनडोक विज्ञानवाद्यांचं परफेक्ट उदाहरण.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सर्वसाधारणपणे विज्ञानाचा
हे एकदम परफेक्ट .. पण विज्ञान नेहेमीच त्रुटी मान्य करतं, नवीन गवसल्यावर जुनी चूक मान्य करतं.. पण धर्म अथवा देवाच्या बाबतीत मात्र आहे ते कसं परीपूर्ण आहे हाच घोष कायम असतो..
आणि एवढं विवेकेवादी विधान करणार्यानेच "reply in kind" असा पवित्रा घेउन विज्ञान इल्लॉजिकल इतकं टोकाचं विधान करावं हे मात्र दुर्भाग्य !!
धर्माला ह्यूमिलिएट करण्याची फॅशन नको
आपल्या मतांचा मला आदर आहे. पण आपली जी मते आहेत ती सर्वसाधारणपणे "वेल्-ओरियंटेड" लोकांचा गैरसमज आहे असे मला वाटते. माझ्या अगदी तांत्रिक असहमती आहेत. काय आहेत ते पहा.
नक्की? आपल्याला अख्खे जगत्कारण गावले आहे असा विज्ञानाचा आव नसतो का?
पूर्ण झालेल्या प्रयोगांचा काय निष्कर्ष आहे या पेक्षा भविष्यवेधी विधाने करण्यातच विज्ञानाचा जास्त जोर नसतो का? पेपरात हे झालं पेक्षा हे होणार या बातम्या दहापट असतात. आणि यात अनंत अस्पेक्ट्स बाजूला ठेवले जातात. याला त्रूटी मान्य करणं म्हणता येणार नाही.
तुम्ही प्रत्येकच विधानापुढे, अॅज अ पॉलिसी, this statement is subject to future revisions, असे इंप्लाय करू लागलात तर ते त्रुटी मान्य करणं? मग एक सेपरेट लिस्ट द्या कि या या विधानांत काहीही त्रुटी नाहीत नि ती actionable आहेत. त्रुटी आहे असं विज्ञानाचं तत्त्वज्ञान अस्लं तरी त्याचा व्यवहारात फायदा नाही. ते सत्रुटी विधान लोक फायनल मानून आपली विचारधारा बनवून टाकतात.
आणि धर्म, अगदी अशाच प्रकारे, त्रुटी मान्य करत नाही हे कशावरून? हिंदू, बुद्ध, जैन धर्मातील कितीतरी विचारसरणी, त्यांच्यावरच्या डिबेट्स, अंगिकार, स्वीकार, प्रचार, झिडकार कशाचे लक्षण आहेत? शरीया लॉ मधे सुधारणा होत नाहीत का?
परिपूर्ण असा घोष असता तर "वैदिक जीवन पद्धती नि मध्ययुगातली पद्धती, नि आजची पद्धती या सेम राहिल्या असत्या." ईश्वराचे स्वरुप, रोल, त्यात माणसाचा संबंध इ बद्दल ज्या हजारो विचारसरणी निर्माण झाल्या आहेत ते कशात तरी त्रुटी आहे असं वाटल्यामुळे झालं असण्याची बर्यापैकी शक्यता आहे. उदा. अद्वैतवाद, द्वैतवाद, द्वैताद्वैअवाद, विशिष्टाद्वैतवाद या धर्माच्या बसिक संकल्पनांचे भिन्न इंटर्प्रिटेशन करणार्या पद्धती आहेत.
विज्ञान नि धर्म दोन्ही आपापल्या त्रुटी मान्य करतात.
आणि धर्माने एखादी गोष्ट ती केवळ वैज्ञानिक आहे म्हणून झिडकारली आहे याचे मला उदाहरण मिळेल काय? कि धर्माच्या सार्या अंतर्गत सुधारणांचे सारे श्रेय संबंध नसताना विज्ञानाला द्यायचे आहे?
=======================================================================================
१००% विज्ञान इल्लॉजिकल आहे असं मला म्हणायचं नाही. विज्ञान असो वा धर्म, त्यांचे बिट्स अँड पिसेस, सिद्ध आणि उपयुक्त आहेत. मानवतेच्या कल्याणासाठी विज्ञानाने फार मोठी भूमिका निभावली, बुद्धिमत्ता वापरली असे म्हणायचे असेल तर ते धर्माबद्दल देखिल खरे आहे. आदर्श मानवी वर्तन कसे असावे, मानवी मूल्ये काय असावीत (त्रुटींसहित) याबद्दल खूप जुन्या काळापासून धर्माने मार्गदर्शक तत्त्वे घालून दिलेली आहेत. ती तेव्हा कामाची होती नि आजही आहेत.
जेव्हा आडकित्ता यांच्या चित्रात "मानवतेचा विचार करणारे शास्त्रज्ञ विरुद्ध बिनडोक धर्मांध" अशी तुलना आहे. त्यांच्यापेक्षा खतरनाक तुलना "मूल्यांचा विचारच न करणारे स्वार्थी शास्त्रज्ञ विरुद्ध महान धर्मशील" अशी होऊ शकते. म्हणून इन काइंड.
दोन्हीकडे सर्व प्रकारचे लोक आहेत - मूल्ये असो, चरित्र असो, बुद्धी असो, मानवतेवरचा परिणाम असो. म्हणून in kind उत्तर.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
नक्की? आपल्याला अख्खे
कधी कुठे कोणी?
पेपरात बातम्या ? वैज्ञानिक देतात?
(न्यूज)पेपरात जे पब्लिश होतं तेच
(न्यूज)पेपरात जे पब्लिश होतं तेच विज्ञान असतं, एवढं शिंपल कळू ने तुमच्यासारख्या झंटलमन लोकाण्णा?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
विज्ञान म्हणजे केवल रिसर्च
विज्ञान म्हणजे केवल रिसर्च पेपरातून कोट केलेले विज्ञान असेल तर तोच न्याय धर्माला लावा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
प्रचंड मोठा फुलटॉस देताय याची
प्रचंड मोठा फुलटॉस देताय याची जाणीव आहे का?
या हिशेबाने धर्म म्हणजे वेद, मनुस्मृती, कुरान, बायबल, इ. ठरेल. बरोबर?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अर्थात.
अर्थात.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अंमळ क्लॅरिटी
हम्म, म्हणजे वरील आणि इतर धर्मग्रंथांमध्ये जे लिहिलंय तेच धर्माचं अधिकृत स्टेटमेंट ऑन अ गिव्हन इश्श्यू घ्यायचं असंच ना?
नै म्हणजे पुढे २०-२० म्याचमध्ये सिक्सर मारल्यावर 'कंपौंडच्या बाहेर असल्याने नो सिक्स' असा प्राब्ळम नको म्हणून अगोदरच क्लॅरिफाय करतोय.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
नाही. बहुतेक वार्ताहरांचे घरी
नाही. बहुतेक वार्ताहरांचे घरी प्रयोगशाळा असते नि तिथे शोध लागतात.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
याला तरी विनोदी देऊ का? नंतर
याला तरी विनोदी देऊ का? नंतर तक्रार चालणार नाय.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अवश्य.
अवश्य.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अधिकृततेचा आग्रह
गविसाहेब, कधीकधी मला तुमच्या प्रो-विज्ञान नि अँटी-धर्म (म्हणजे तत्सम) लोकांचे असे विचार पाहून गंमत वाटते.
म्हणजे मेरठमधे हिंदू नि मुसलमानांचे दंगे झाले तर त्याचा पूर्ण दोष धर्माला. त्यातल्या इंट्रिंसिक तत्त्वज्ञानाला. त्यावेळेस मी मक्केवरून किंवा काशीवरून दंग्याचे लिखित फर्मान मागितले तर?
पण विज्यानाबद्दल काही का कु केली कि मात्र रिसर्च पेपरच पाहा हा आग्रह. वाह री दुनिया.
==========================================================================
दोन सिस्टिम्स (विज्ञान नि धर्म), त्यांचे अधिकृत तत्त्वज्ञान, त्यांचे अग्रणी, त्यांच्या संस्था, त्यांचे अनुयायी, त्यांचे विचार, प्रत्येकाचा लोकजीवनावर परिणाम हे त्या त्या पातळीवर का नाही तोलायचे? Isn't that fairer?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हिंदू धर्माचं अधिकृत काय आहे
हिंदू धर्माचं अधिकृत काय आहे ते सांगा बुवा....
बर्याच श्रद्धा हिंदू धर्मात नाहीतच असं एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडे अंधश्रद्धा विरोधी कायदा आला की हिंदू धर्मावर घाला म्हणून ओरडायचं....
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
विज्ञानाचं अधिकृत काय ते
विज्ञानाचं अधिकृत काय ते सांगता येईल?
उदा. विश्वनिर्मीतीच्या कितीतरी अल्टरनेटीव थेर्या आहेत. ऐसीचे सदस्य जयंत नारळीकर यांची देखिल एक जगन्मान्य थेरी आहे.
===================================================================================================
चर्चा करायची असेल "both are respectable" किंवा किमान "both can be respectable" असा मूड हवा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सामान्य माणसाच्या प्रतलावर
सामान्य माणसाच्या प्रतलावर पाहिलं तर हिंदू धर्माला अंधश्रद्धा निर्मूलनाची जितकी गरज आहे त्यापेक्षा जास्त वि़ज्ञानाला आहे. अर्थात याची जाणिव अजून उत्पन्न झालेली नाही हा भाग वेगळा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हिंदू धर्माला अंधश्रद्धा
प्रचंड काहीही.. विज्ञानाला अंधश्रद्धानिर्मूलन होण्याची काडीइतकीही गरज नाही. विज्ञान म्हणजेच (=) "विज्ञानचळवळ" वगैरे चालवणारे काही लोक डोळ्यासमोर आहेत का?
विज्ञान वेगळं आणि इच्छुक "प्रचारक" त्याचा वापर आणि पिचिंग कश्या प्रकारे करतात या पूर्ण वेगळ्या दोन गोष्टी आहेत.
याच लैनीवर
धर्म वेगळा आणि इच्छुक "प्रचारक" त्याचा वापर आणि पिचिंग कश्या प्रकारे करतात या पूर्ण वेगळ्या दोन गोष्टी आहेत.
असेही अर्ग्यू करता येईलच, नै?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हो ना.. पण धर्म आणि विज्ञान
हो ना.. पण धर्म आणि विज्ञान यांची तुलना अजो करताहेत, मी नव्हे. विज्ञानाला धर्माचा आल्टरनेट म्हणून पाहणारे काही लोक असतील तर त्यातला मी नव्हे. म्हणजे हिंदू, मुस्लिम, विज्ञानी असे धर्म मी मानत नाही.
कोणताच धर्म न मानणे म्हणजे बळंच त्याजागी विज्ञान कोंबून ती जागा भरणे असा अर्थ होत नाही.
खालच्या प्रतिक्रियेत मेरठच्या
खालच्या प्रतिक्रियेत मेरठच्या दंग्याविषयी (उदा.) उल्लेख आला आहे. दंगलींसाठी धर्म आणि तत्वं जबाबदार असं विज्ञान अथवा वैज्ञानिक कधी म्हणतात? कधी म्हणाले?
विज्ञानाचा प्रचार झाला की दंगली थांबतील असं कोणी म्हटलं का? दंगली हा माणसाच्या गटबाजीचा विषय आहे. धर्म कशाला? शाळेत असताना तू "देसाईच्यात" की "डोंगरेच्यात" असे प्रश्न एकमेकांना विचारुन परस्पर गटांतील पोरांशी भांडणे करणे हेही जोरात चालायचं.
विज्ञानात त्याला उत्तर नाही. धर्म नाहीसे झाले तरी दंगली होणारच. गम ए इश्क गर न होता, गम ए रोजगार होता..
वादातील
हवाकाढू गवि
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+१००००
दाखवावी तितकी सहमती कमी आहे.
एक संपूर्ण संस्था म्हणून दोन्हीकडे गुण दोष, अप्प्लिकॅबिलिटी, उप्युक्तत्ता, इ इ मुद्दे आहेतच. माझे प्रतिसाद "धार्मिकांना डोकेच नसते" ही जी मूळ थीम आहे (सर्वात वर) तिच्यासाठी होते.
================================================
कूल. याबद्दल काही म्हणणं नाही. तुम्ही धर्म माना नैतर नका मानू, पण धर्माबद्दल एक मत मांडाल तर ते पटणेबद्दल असलं पाहिजे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
म्हणजे मेरठमधे हिंदू नि
कोण वैज्ञानिक / विज्ञानवादी / विज्ञानसमर्थक अशा दंगलींचा दोष धर्माला देतो ? दंगलींविषयीची आरोपनिश्चिती हा विज्ञानाच्या परीघाबाहेरचा विषय आहे. त्यातून एखाद्या एरवी विज्ञानवादी असलेल्या माणसाने अशी आरोपनिश्चिती केलीच तर तो पूर्ण वेगळा विषय झाला. वैज्ञानिक दृष्टिकोनातून दंगली या धर्मांच्या दोषांमुळे आहेत असं काही वैज्ञानिक स्टेटमेंट आहे का कोणी केलेलं? मॉडर्न मेडिसिनचा डॉक्टर समजा "स्वदेस" हा पिक्चर फारच मस्त आहे असं म्हणाला तर ते वैद्यकीय दृष्टिकोनातून असतं का?
पूर्ण जगाचे सर्व व्यवहार एक्सप्लेन करु इच्छिणे हे कोणत्याही विचारपद्धतीचं अंतिम ध्येय असणारच. पण तरीही कोणत्या गोष्टी थेट कक्षेतल्या आहेत आणि कोणत्या नाहीत याचं भान हवं आणि ते विज्ञानसमर्थकांच्यात सर्वात जास्त दिसतं.
वैज्ञानिक विचारपद्धती ही फक्त एक पद्धती आहे. ते न्यायालय किंवा न्यायाधीश नव्हे. उलट सर्वाधिक जपून, अटींसह, कॉन्झर्वेटिव्ह घोषणा / विधानं ही विज्ञानाकडूनच केली जातात. विज्ञानाधारित असलेल्या मॉडर्न मेडिसिनच्या बॉक्सवर "हे अमुक गटातले औषध आहे. त्याचे अमुक दुष्परिणाम आहेत.. अमुक केसेसमधे हे अॅडव्हाईसेबल नाही... तमुक प्रमाणापेक्षा जास्त घेतल्यास अमुक घातक परिणाम होईल.. " असं सर्व प्रामाणिकपणे स्पष्ट लिहिलं जातं. अन्य बर्याच विज्ञानाधारित नसलेल्या पॅथीजमधे असे काहीही लिहिण्याची तसदी कोणी घेत नाहीच उलट बिंधास "कोणीही घेऊ शकतं.. दुष्परिणाममुक्त...अनेक रोगांवर हमखास एक इलाज" वगैरे भोंगळ पद्धतीने प्रचार केला जातो.
रिसर्च पेपर नि मक्केचे फर्मान
तुम्ही मांडलेल्या मुद्द्यावर वेगळ्याने बोलता येईल. पण यू आर मिसिंग द पॉइंट.
===================================================================
विज्ञान काय म्हणते ते पहा म्हटले कि रिसर्च पेपरच पहा म्हणायचे आणि धर्म काय म्हणतो त्यासाठी मात्र कोणाही सोम्यागोम्या कसा वागला त्याचे उदाहरण द्यायचे हे योग्य इतका लिमिटेड मुद्दा आहे.
==========================================================================================
लक्षात घ्या - मी फक्त एक साधी गोष्ट म्हणत होतो. विज्यान धर्मापेक्षा भयंकर प्रमाणात फ्यूचिरिस्टीक विधाने करते ज्यांत जबरदस्त त्रुटी असतात. म्हणून त्रुटी असणे मान्य करणे हा फार मोठा व्हर्च्यू नाही. तर सगळे मला म्हणायला लागले - पेपरात येते ते विज्ञान का? त्या परिप्रेक्ष्यात माझे विधान होते.
"तुमच्या माझ्या सारख्या लोकांनी ततुलना करताना" रिसर्च पेपर नि मक्केचे फर्मान दोन्ही मागीतले पाहिजे नैतर दोन्ही नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मक्केचे फर्मान म्हणजे नेमके
मक्केचे फर्मान म्हणजे नेमके काय? कुरानातील वाक्य की हदीस की अजून काही? फतवा प्रत्येक गोष्टीवर नसतो कारण त्या त्या मौलवीपर्यंत तो तो इश्श्यू जाईलच याची ग्यारंटी नसते.
बाकी तुम्ही स्वहस्ते इतका मोठा फुलटॉस देत आहात याची तुम्हांला कल्पनाही नाहीये.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एव्हढे फूलटोस दिलेत, एकतरी
एव्हढे फूलटोस दिलेत, एकतरी बाउंडरी दिसू द्या.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
विज्ञान काय म्हणते ते पहा
तुम्ही मुळातच गडबड करत आहात. विज्ञान असे म्हणत नाही की रिसर्च पेपर बघा.
विज्ञान म्हणते की तुम्ही च करुन बघा.
कोणीतरी आधीच ते काम केले असेल तर पुन्हा पुन्हा ते सिद्ध करण्यात वेळ जावू नये म्हणुन "रिसर्च पेपर बघा" ही सोय आहे.
ह्या सर्व थियरी किंवा रिसर्च पेपर ला मान्यता मिळवायला पण कोणीतरी सिद्धता द्यायला लागते आणि कोणी तरी ती ग्राह्य धरायला लागते
तरीही कोणाला त्या रिसर्च पेपर बद्दल शंका असेल तर विज्ञान म्हणते तुम्ही करुन बघा.
विज्ञानात अश्या अनेक शंका घेतल्या गेल्या म्हणुन तर एकुणच समज पुढे चालत आहे.
तुम्ही कोणीही अजूनही माझा
तुम्ही कोणीही अजूनही माझा पॉइंट लक्षात घेत नाही आहात.
वर "पेपरातल्या वैज्यानिक बातम्या" कशा असतात या माझ्या विधानावर ३-४ पेपरात बातम्या देणारे वैज्ञानिक का एतत्सम प्रतिक्रिया आल्या. मी फक्त तेवढ्यापुरतं बोलतोय. माध्यमांत, समाजात, इ इ विज्ञानाबद्दल जे समज, गैरसमज, वर्तन आहे त्याच्या दाखला विज्ञानाबद्दल बोलताना द्यायचाच नाही नि फक्त टिका करायची ती रिसर्च पेपरच्या स्टँडर्डच्या विज्यानाची, ते ही पीअर रीव्ह्यूड असेल तर, असा पावित्रा आहे. हे मागे जिलब्या पाडताना देखिल झालं आहे.
मग प्रश्न असा आहे कि धर्माबद्दल जे समज, गैरसमज, वर्तन सामान्य लोकांत, माध्यमांत आहे त्याचा दाखला देऊन धर्मावर टिका का करावी? बास्स्स. तिथे देखिल रिसर्च पेपरच्या इक्विव्हॅलेट जे काय आहे तेच पाहावे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मग प्रश्न असा आहे कि
तसे केले तर बरेच कायकाय दिसते. जातिभेदाचे समर्थन, 'कन्व्हर्ट ऑर डाय', स्त्रीस्वातंत्र्यावरची बंधने, एक ना अनेक. हे सगळे सगळे त्या ग्रंथांत लिहिल्याचे पुरावे चिक्कार आहेत. आता बोला. आता मग 'हा खरा धर्म नव्हे' वगैरे पळवाटा चालायच्या नाहीत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बॅटमॅन, धर्माधारित समाज
बॅटमॅन, धर्माधारित समाज जीवनात तू सांगितलेल्या नि तशा इतर अनेक त्रुटी होत्या नि आहेत हे मान्य आहे. त्यांचा ओरिजिन काय आहे, कारण काय आहे, इ इ गोष्टी सध्याला बाजूला असू देत. त्यांना आपण सध्यापुरते आपण धर्माचा अनिष्ट इंटेग्रल पार्ट मानू.
पण धर्मापासून डिटॅच झालेल्या नव्या तत्त्वज्ञानापासून जी नविन जीवनपद्धती आता अस्तित्वात आली आहे तिच्यात काय काय त्रुटी आहेत त्या तिच्या इंटेग्रल पार्ट मानल्या तर धर्म फारच बरा म्हणावा लागेल.
आता लगेच मी हवेत गोळी मारली म्हणू नकोस. दोन्ही जीवनपद्धतींची बर्याच व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, भावनिक, पर्यावरणीय, न्याय्य, इ इ इ इ निकषांवर तुलना करून माझे असे प्राथमिक निरीक्षण राहिले आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पण धर्मापासून डिटॅच झालेल्या
सब्जेक्टिव्ह वाईड बॉल असल्याने आम्हीही इथे कै बोलणार नाही. तूर्त आर्मिस्टिस जाहीर करतो. चलो पार्टी हो जाये.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मुद्दा समजला. म्हणजे मुद्दा
मुद्दा समजला. म्हणजे मुद्दा विज्ञान किंवा धर्म या मूळ गोष्टींबद्दल नसून त्यांच्याविषयी सामान्य लोकांच्या असलेल्या धारणांतील साम्यांबद्दल आहे. म्हणजेच गैरसमज, अतिरेकी विश्वास, बाउंडरीज लक्षात न घेणे, भलत्या बाबतीत मिक्स करणे, इझम तयार करणे, फायदेतोटे इ इ विज्ञान आणि धर्म या दोहोंबाबत समाजात सिमिलर पद्धतीने आहेत. तस्मात सामान्य फॉलोअर्स या घटकाची स्खलनशीलता किंवा कुवत यानुसार दोन्ही गोष्टी हँडल केल्या जातात. तस्मात दोन्हींच्या फॉलोअर्समधे फॉलोईंग प्रोसिजरमधे समप्रमाणात दोष आहेत असं तुमचं म्हणणं आहे.
समप्रमाणात आहेत किंवा कसं हे सब्जेक्टिव्ह आहे, पण मूळ मुद्दा अॅग्रीड.
या मुद्द्याची कैकवेळेस गल्लत
या मुद्द्याची कैकवेळेस गल्लत होते बरं का गवि...हा मुद्दा पुढे करून धर्मात वट्ट दोष नाहित अशीही अर्ग्युमेंटे पुढे येतील. त्याकरिता रिसर्च पेपरचे धार्मिक इक्विव्हॅलंट काय म्हणतात ते पाहणं गरजेचं आहे हेच अजोंना पटत नव्हतं. आज पटलंय तर पहा म्हणावं त्यात काय काय लिहिलंय ते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धर्म हा अत्यंत चुकीचे विचार
धर्म हा अत्यंत चुकीचे विचार चुकीच्या पद्धतीने मांडत असेल.. काही धर्म जरा बरे विचार बर्या पद्धतीने मांडत असतील.. कसंही असू शकेल.. पण धर्म आणि विज्ञान यांचं क्षेत्रच वेगळं आहे. विज्ञान म्हणजे दुसरं काही नसून केवळ सिद्ध होण्याच्या कक्षेत जास्तीतजास्त गोष्टी आणण्याची आणि या सिद्धतांच्या मांडणीची पद्धत आहे. विज्ञान आणि वैज्ञानिक मांडणी याचा धर्माच्या क्षेत्राशी संबंधच नसल्याने धर्माला बाद ठरवण्यासाठी विज्ञानाला हाक मारण्याची गरज अथवा उपयोग नाही. ते काम वेगळंच करावं लागेल.
धर्माचा मुख्य प्रॉब्लेम असा की बहुतांश बाबतीत तो अमुक करा, तमुक करु नका असं सांगतो. विज्ञान असं केल्यास तसं होईल असं सांगतं.
कर / करु नकोस अशा "इन्स्ट्रक्शन्स"साठी धर्म किंवा तत्सम काहीतरी अस्तित्वात येतं.
विज्ञान म्हणेल की तू बाण मारलास तर समोरचे तुझे काका रक्तस्त्रावाने मरतील.
पण कृष्ण सांगतो की तू धनुष्य उचल.. तू बाण मार.. तुला बाण मारलाच पाहिजे.. इन गिव्हन कंडिशन्स तो तुझा धर्मच आहे..
प्रत्येक व्यक्तीला पूर्ण परिस्थिती पाहून "काय करु" हा स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याची क्षमता आली तर धर्म नाहीसा होईल, पण ते विज्ञानाचं ध्येय किंवा कार्य नव्हे.
नेस्ले इंडियाचे शेअर घेऊ की नको? हा विचार गेले चार दिवस पडला आहे. मला कंपनीच्या परिस्थितीचा तांत्रिक अथवा आर्थिअ अॅनालिसिस करण्याचे कष्ट नकोयत. मला "घे" किंवा "घेऊ नको" असं सांगणारा कोणीतरी हवा. धर्माचं इथेच फावतं.
+१००
गवि, एकदम बिंगो.
अगदी सायंटिफिक मेथड म्हणते कि science is not judgemental. It does not tell what is right and what is wrong.
Forget telling what is right and what is wrong, science is altogether incompetent to even understand the terms right and wrong.
धर्म मात्र थेट लोकांच्या "आवडणार्या" नि " न आवडणार्या" प्रतिक्रिया येतील असे निर्णय घेतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
विज्ञान आणि धर्म ही वेगळी
विज्ञान आणि धर्म ही वेगळी डायमेन्शन्स आहेत हे दाखवायला उदाहरण ठीक आहे पण त्यातदेखिल नेस्लेचे शेअर्स वगैरे टाईप मार्गदर्शन हे देखिल धर्माचे खाते नव्हे.. अर्थकारण हे धर्म/राजकारणापासून खूपच बाहेर आहे. धर्म त्यातदेखिल ढवळाढवळ करु इच्छितो.. उदा. इस्लामिक बँकिंग..
खरं सांगायचं तर आजच्या जगात "धारयती इति धर्मः" किंवा जगण्याची पद्धती असे व्यापक स्वरूप देण्याची काहिही गरज नाही.. असे केल्याने धर्म उगीचच कायदा/ घटना याच्या कक्षेत प्रवेश करतो.. पर्सनल लॉ वगैरेसारखं..
धर्म केवळ उपासना पद्धती एवढच मर्यादीत असावा तरच तो वैयक्तिक कक्षेत ठेवता येइल.. आणि समाजाच्या बाकी जीवनासाठी काळाप्रमाणे बदलू शकणारा कायदा/ घटना जास्त परीणामकारक ठरतील.. घटनेतदेखिल कर्तव्ये वगैरे असतात या गोष्टी धर्माच्या कक्षेत असु नयेत.. कारण मग त्यात बदल/ चिकित्सा असंभव होउन बसतो..
खरं सांगायचं तर आजच्या जगात
भारतीय कायद्यातील बराच मोठा भाग हा धर्मग्रंथांवर आधारित आहे इतकेच निदर्शनास आणून देऊ इच्छितो. बाकी चालू द्या.
शिवाय, भारतात नेहमीच धर्म ही एक वैयक्तिक बाब राहिली आहे. (धर्म = उपासनापद्धती असे म्हटले तर) हे ख्रिश्चन आणि मुसलमानच एकमेकांची आणि आपापल्याच लोकांची गचांडी धरण्यात कायम आघाडीवर राहिलेले आहेत. त्यांचे प्रताप बघून काढलेले उद्गार भारताला लावण्याआधी जरा विचार पायजे की नको?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
भारतीय कायद्यातील बराच मोठा
उदा ??
कुठले धर्मग्रंथ ??
पाने