मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ४६
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================
प्रिअँबल भारतीय घटनेचा भाग आहे का?
कोर्ट प्रिअँबलचा आधार देऊन न्याय देऊ शकते का?
-------------------------------------------------
१५ ऑगस्ट १९४७ ते २५ जानेवारी १९४९ (कि ५०?) पर्यंत जर भारत युकेचे डोमिनिअन होते तर भारताचा स्वातंत्र्यदिन २६ जानेवारी मानला पाहिजे. त्या दिवशी भारत खर्या अर्थाने स्वतंत्र झाला.
प्रसाद्स हैदराबाद येथे १८
प्रसाद्स हैदराबाद येथे १८ डिसेंबरला लागेल फोर्स अवेकन्स. सगळा चित्रपट आयमॅक्स फॉरमॅट मध्ये आहे, आणि जगातली दुसरी मोठी आयमॅक्स स्क्रीन सुदैवाने भारतात आहे. :) :)
होय आताच मराठी डिक्शनरीत
होय आताच मराठी डिक्शनरीत पाहीला.
.
This paper examines ways that outsiders, especially in international settings, can play a more creative catalytic role within an asset based approach. या वाक्याचे मराठी भाषांतर कसे होईल?
बहुधा असे-
अमक्या टमक्याचा अमुक अमुक मध्ये सिंहाचा वाटा आहे.
इतरत्र 'न'वी बाजू यांनी
इतरत्र 'न'वी बाजू यांनी दिलेल्या माहितीवरून आलेला प्रश्न....
'आपण मुसलमान नाही, निरीश्वरवादी आहो', असेही प्रतिपादन श्री. जावेद अख़्तर यांनी अन्यत्र जाहीररीत्या केल्याचे कळते. असो.
एखाद्या व्यक्तीने असे प्रतिपादन केले तर त्याचा काही कायदेशीर परिणाम होतो का? त्याच्या कुटुंबाच्या मालमत्तेचे संक्रमण कोणत्या कायद्याने होते? किंवा त्याच्या कुटुंबाला त्या त्या व्यक्तिगत कायद्याखाली असणारे अधिकार लॅप्स होतात का?. जावेद अख्तर मुसलमान नसतील तर त्यांना दोन पत्नी असणे* हे कोणत्या कायद्याखाली व्हॅलिड ठरते?
मी हिंदू नाही निरिश्वरवादी आहे असे म्हटल्यावर माझ्या वडिलांच्या/पूर्वजांच्या मालमत्तेतील हिस्सा मी गमावतो का? (मी वगळून) माझ्या मुलांना हा हिस्सा मिळतच राहतो का? माझ्या पत्नीला हिंदू विवाह कायद्याने मिळणारे हक्क ती गमावते का?
मी हिंदू नाही हे कायद्याला सांगण्यासाठी काय करावे लागते?
*त्यांची दोन लग्ने इन फोर्स आहेत का हे ठाऊक नाही. पण समजा असली तर असा प्रश्न आहे. त्यांनी सिव्हिल मॅरेज अॅक्ट खाली लग्न केले तर मुस्लिम पर्सनल लॉ लागू होत नाही असे वाटते. पण एका धर्माचे दोन लोक सिव्हिल मॅरेज करू शकतात की नाही याविषयी साशंक आहे.
हिंदू असणे हे म्याटर ऑफ चॉइस
हिंदू असणे हे म्याटर ऑफ चॉइस नाही.
Section २, Hindu Marriage Act
(1) This Act applies
(a) to any person who is a Hindu by religion in any of its forms or developments, including a Virashaiva, a Lingayat or a follower of the Brahmo, Prarthana or Arya Samaj,
(b) to any person who is a Buddhist, Jaina or Sikh by religion, and
(c) to any other person domiciled in the territories to which this Act extends who is not a Muslim, Christian, Parsi or Jew by religion, unless it is proved that any such person would not have been governed by the Hindu law or by any custom or usage as part of that law in respect of any of the matters dealt with herein if this Act had not been passed.
अवांतर - सावरकरी व्याख्या?? सावरकरांनी हिंदूची व्याख्या १९५५ सालच्या आधी केली की नंतर? कोणाचा प्रभाव कोणावर पडला?
धन्यवाद.स्पेशल मॅरेज अॅक्ट
धन्यवाद.
स्पेशल मॅरेज अॅक्ट ची माहिती.....
http://en.wikipedia.org/wiki/Special_Marriage_Act,_1954
दुव्यावरची ही माहिती रोचक आहे.
Succession to the property
Succession to the property of person married under this Act or customary marriage registered under this Act and that of their children, are governed by Indian Succession Act. However, if the parties to the marriage are Hindu, Buddhist, Sikh or Jaina religion, the succession to their property will be governed by Hindu succession Act.
म्हणजे मी हिंदू नाही असं जाहीर केलं तरी हिंदू सक्सेशन अॅक्ट लागू राहतोच. बाप पाखंडी असला तरी आजोबाची प्रॉपर्टी मिळतेच.
जावेद अख्तर मुसलमान नसतील तर
जावेद अख्तर मुसलमान नसतील तर त्यांना दोन पत्नी असणे* हे कोणत्या कायद्याखाली व्हॅलिड ठरते? >> इतर धर्मियांनादेखील दोन पत्नी असणे 'कायद्याने इनव्हॅलिड' नाहीय ना? मंजे फक्त पहिली पत्नी किंवा तिच्या वतीने तिचे वडील, मामा, भाऊ इ ठरावीक लोकच दुसर्या लग्नाला विरोध करु शकतात. त्यांच्याशिवाय इतरांना काही करता येत नाही.
आणि नुकतेच कुठेतरी वाचल्यानुसार: धर्म बदलल्यास लग्न ल्याप्स होते. मंजे हिंदू असताना लग्न केले आणि काही वर्षांनी ख्रिश्चन झालो तर आधीचे लग्न ल्याप्स झाले. पण हेच अग्नोस्टीक/अथेइस्ट होण्याला लागू होइल का माहीत नाही. कारण आदूबाळने दिल्याप्रमाणे त्यांनादेखील हिंदू पर्सनल लॉ बंचमधेच टाकले आहे.
...
इतर धर्मियांनादेखील दोन पत्नी असणे 'कायद्याने इनव्हॅलिड' नाहीय ना? मंजे फक्त पहिली पत्नी किंवा तिच्या वतीने तिचे वडील, मामा, भाऊ इ ठरावीक लोकच दुसर्या लग्नाला विरोध करु शकतात. त्यांच्याशिवाय इतरांना काही करता येत नाही.
नक्की खात्री नाही, परंतु द्विभार्याप्रयिबंधक कायद्याचे कार्यक्षेत्र हे बहुधा हिंदू विवाह कायद्याच्या कार्यक्षेत्राशी निगडित असावे, अशी शंका येते. तपासून पाहावे लागेल. (चूभूद्याघ्या.)
द्विभार्याप्रयिबंधक कायद्याचे
द्विभार्याप्रयिबंधक कायद्याचे कार्यक्षेत्र हे बहुधा हिंदू विवाह कायद्याच्या कार्यक्षेत्राशी निगडित असावे, अशी शंका येते. >> मला वाटते मुस्लिम वगळता इतर सर्वचजणांना द्विभार्याप्रतिबंध कायदा लागू आहे. पण तो कायदा मी वर म्हणते तसाच आहे. फक्त ठरावीक लोकच दुसर्या लग्नाला विरोध करु शकतात. कोणाही ऐरागैर्याला त्यात बाधा आणता येत नाही.
बलात्कार पिडिताच गुन्हा आहे
बलात्कार पिडिताच गुन्हा आहे असे वाटल्यावर गुन्हा दाखल करू शकते इतर नाही असा कायदा नाही हे नशीब.
=====================================================================================
एखादी कृती इंट्रिंसिकली गुन्हा असेल किंवा नसेल. उद्या बाँडेड लेबरला गुलामी हा गुन्हा आहे, आपल्यावर अन्याय होतोय अशी माहीतीच नसेल तर त्यासाठी त्यांची सहमती किती आवश्यक?
क्ष ला वाटला तर गुन्हा नैतर तर नाही हे अजब आहे.
...
माझ्या त्रोटक आणि बेभरवशाच्या माहितीनुसार:
- श्री. जावेद अख़्तर यांचा दुसरा विवाह बहुधा त्यांच्या पहिल्या विवाहाच्या हयातीत झालेला नसावा. प्रथम पत्नीशी घटस्फोटानंतर दुसरा विवाह झाला असावा.
- तसेही, त्यांचा प्रथम विवाह मुस्लिम विवाह कायद्याखाली झाला असण्याबद्दल साशंक आहे. त्यांची प्रथमपत्नी ही 'इराणी' (बोले तो, बिगरपारशी झरतुष्ट्री - इराणातून येऊन भारतात स्थायिक होणार्या झरतुष्ट्रींची दुसरी ब्याच) समाजातील असावी, असे वाटते. दोन भिन्नधर्मीय व्यक्तींचा विवाह हा बहुधा कोणत्याही 'पर्सनल लॉ'खाली होऊ शकत नसावा - केवळ स्पेशल म्यारेज अॅक्टाखालीच असा विवाह होऊ शकत असावा, असे वाटते. (चूभूद्याघ्या.) त्यामुळे, वादाच्या सोयीकरिता जरी श्री. अख़्तर यांना 'कायद्याने मुसलमान' मानले, तरीसुद्धा मुस्लिम विवाह कायद्याच्या तरतुदी त्यांच्या प्रथम विवाहास बहुधा लागू होऊ नयेत, असे वाटते. (पुन्हा चूभूद्याघ्या.)
- श्री. अख़्तर यांचा सद्य (द्वितीय) विवाह कोणत्या कायद्याखाली झाला आहे, याबद्दल मला कल्पना नाही.
दोन भिन्नधर्मीय व्यक्तींचा
दोन भिन्नधर्मीय व्यक्तींचा विवाह हा बहुधा कोणत्याही 'पर्सनल लॉ'खाली होऊ शकत नसावा - केवळ स्पेशल म्यारेज अॅक्टाखालीच असा विवाह होऊ शकत असावा, असे वाटते. >> बहुतेक तसे नाहीय. भिन्नधर्मिय व्यक्ती धर्मांतर न करता नवर्याच्या धर्माच्या पर्सनल लॉ खाली लग्न करु शकतात.
...
या सर्व 'धार्मिक' विवाह कायद्यांची भाषा पाहिल्यास 'अमूकअमूक धर्माच्या दोन व्यक्ती' अशा स्वरूपाची आढळते ब्वॉ. (चूभूद्याघ्या.)
(अर्थात, 'अमूकअमूक धर्माच्या दोन भिन्नलिंगीय व्यक्ती' असेही (बहुधा) स्पष्टपणे म्हटलेले नसते (पुन्हा चूभूद्याघ्या), हेही आहेच, परंतु तो पूर्णपणे वेगळा मुद्दा.)
आवरा....-- self goal --hit wicket
In the Battle of Karancebes, on the evening of 17 September 1788, different portions of an Austrian army, which were scouting for forces of the Ottoman Empire, fired on each other by mistake, causing self-inflicted decimation.
The army of Austria, approximately 100,000 strong, was setting up camp around the town of Karánsebes (now Caransebes in modern Romania). The army's vanguard, the hussars, crossed the Timis River nearby to scout for the presence of the Ottoman Turks. There was no sign of the Ottoman army, but the hussars did run into a group of Romani, who offered to sell schnapps to the war-weary soldiers. The cavalrymen bought the schnapps and started to drink.
Soon afterwards, some infantry crossed the river. When they saw the party going on, the infantry demanded alcohol for themselves. The hussars refused to give them any of the schnapps; a heated argument ensued, and one soldier fired a shot.
Immediately, the hussars and infantry engaged in combat with one another. During the conflict, some infantry began shouting "Turci! Turci!" ("Turks! Turks!"). The hussars fled the scene, thinking that the Ottoman army’s attack was imminent. Most of the infantry also ran away; the army comprised Italians from Lombardy, Slavs from the Balkans, and Austrians, plus other minorities, many of whom could not understand each other. The situation was made worse when officers, in an attempt to restore order, shouted "Halt! Halt!" which was misheard by soldiers with no knowledge of German as "Allah!, Allah!".
As the cavalry ran through the camps, a corps commander reasoned that it was a cavalry charge by the Ottoman army, and ordered artillery fire. Meanwhile, the entire camp awoke to the sound of battle and, rather than waiting to see what the situation was, everyone fled. The troops fired at every shadow, thinking the Ottomans were everywhere; in reality they were shooting fellow Austrian soldiers. The incident escalated to the point where the whole army retreated from the imaginary enemy, and Holy Roman Emperor Joseph II was pushed off his horse into a small creek.
Two days later, the Ottoman army arrived. They discovered 10,000 dead and wounded soldiers and easily took Caransebes.
मुळात ग्रीकांचा भारताशी
मुळात ग्रीकांचा भारताशी इनिशिअल संपर्कच पर्शिया ऊर्फ इराणच्या थ्रू आलेला आहे. अलेक्झांडरच्याही अगोदर दोनेकशे वर्षांपूर्वी स्किलॅक्स नामक एक जनरल हा डरायस (मुळाबरहुकूम उच्चार दार्यवुश) नामक तत्कालीन इराणी बादशहाने सिंधू नदीजवळच्या प्रदेशाची पाहणी करण्याकरिता पाठविलेला होता. त्यामुळे इंडस (ग्रीक उच्चारी इंदोस) हा ग्रीक उच्चार पर्शियन उच्चारावरूनच आलेला आहे असे म्हणायला नक्कीच वाव आहे. ओल्ड पर्शियन भाषेच्या कॉर्पसमधील हिंदू या शब्दाची तारीख अन ग्रीक उल्लेखाची तारीख मॅच करून याचा निकाल लागेलसे वाटत नाही, कारण ग्रीकच्या तुलनेत ओल्ड पर्शियन कॉर्पस तसा कमीच उपलब्ध आहे.
अजूनेक म्हणजे इसपू १००० च्या काळात ग्रीस अन भारताचा संपर्क असल्याचा कै पुरावा अजून माहिती नाही, जो कै संबंध अलेक्झांडरपूर्व काळात आला तो इराण्यांच्या थ्रूच आलेला आहे.
ग्रीकांना यवन म्हणतात, पण हा यवनप्रदेश कुठला आहे? तर आयोनिया, अर्थात नॉर्थ ईस्ट ग्रीस. तो भाग इराणी साम्राज्याच्या अंडर होता. त्यामुळे ग्रीक माणूस हा आयोनिया प्रदेशातील असतो असे जे इनिशिअल इम्प्रेशन झाले ते तसेच राहिले.
हा रेफ्रन्स कुणा नेत्याला
हा रेफ्रन्स कुणा नेत्याला उद्देशून नसावा. मुक्तपीठात प्रतिक्रिया देणारा हा एक आयडी आहे. मोदीपासून राहुल गांधीपर्यंत, अमेरिकेपासून अंटार्क्टिकेपर्यंत आणि तेलापासून जेनेटिक्सपर्यंत कुठल्याही विषयावरच्या लेखावर याची "हागणदारीमुक्त वेगळा विदर्भ झालाच पाहिजे" अशी प्रतिक्रिया असायची. त्याचा तिथे मिनी फ्यानक्लबही तयार झालाय.
आपण लिहिता ती भाषा मराठीच
आपण लिहिता ती भाषा मराठीच असते ना?
पटाइतांना महाराष्ट्र सोडून कैक पिढ्या झाल्यात. तरी ते हिंदाळलेल्या का होईना मराठीत लिहितात.
तुम्हाला महाराष्ट्र सोडून १/२ पिढी झाली नसावी (एक गेस). तरीही अनुक्रमे भारत, महाराष्ट्र, पुणे, भारतीय संस्कृती, विचारधारा, इतिहास इ इ म्हटले आपला उपहास रॉकीवर पोचलेला असतो. तुमच्या मागच्या ५०० प्रतिसादांत एकदातरी 'इकडच्या' कोणत्या गोष्टीबद्दल अभिमान व्यक्त झाला आहे असं आहे का?
सुदैवाने मराठी लिहिणे म्हणजे ती स्क्रिप्ट लिहिणे असा समज पटाईतकाकांचा नाही.
...
पटाइतांना महाराष्ट्र सोडून कैक पिढ्या झाल्यात. तरी ते हिंदाळलेल्या का होईना मराठीत लिहितात.
तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. नव्हे, त्यांना वाटेल ते, वाटेल तसे, वाटेल तशा (आणि वाटेल त्या) भाषेत लिहिण्याचा त्यांचा अधिकार (निदान आमच्या लेखी तरी) वादातीत आहे.
प्रश्न केवळ कळशाने किटलीस कृष्णवर्णीय संबोधण्याचा आहे. अर्थात, कळशाचा तो अधिकारही मान्य आहेच, पण मग त्यावर वाटेल तशी टिप्पणी करण्याचा आमचा अधिकारही प्रश्नांकित असण्याचे काही कारण आम्हांस तरी दिसत नाही. (त्यावर वाटेल तशी प्रतिटिप्पणी करण्याच्या आपल्या अधिकारास आम्हांस काहीच प्रत्यवाय नाही; तसेही, आमच्या प्रत्यवायास विचारतो कोण? आणि का विचारावे?)
तुम्हाला महाराष्ट्र सोडून १/२ पिढी झाली नसावी (एक गेस). तरीही अनुक्रमे भारत, महाराष्ट्र, पुणे, भारतीय संस्कृती, विचारधारा, इतिहास इ इ म्हटले आपला उपहास रॉकीवर पोचलेला असतो. तुमच्या मागच्या ५०० प्रतिसादांत एकदातरी 'इकडच्या' कोणत्या गोष्टीबद्दल अभिमान व्यक्त झाला आहे असं आहे का?
- अर्धी पिढी कशी मोजतात?
- रॉकी? छे हो! आमचा अटलाण्टाचा ष्टोनमौण्टन पुरतो आम्हांस.
- अभिमान ही आमच्या कल्पनेप्रमाणे स्वेच्छेची बाब असावी. (आणि उपहाससुद्धा.) चूभूद्याघ्या.
- ठीक. कदाचित आम्हीही कळशाची भूमिका वठवत असू. हरकत नाही. त्या परिस्थितीत, या न्हाणीघरात सर्वच नागडे, असे म्हणता यावे, नाही काय?
वैदर्भी मराठी, मालवणी मराठी
वैदर्भी मराठी, मालवणी मराठी तसेच ऐसिअक्षरे मराठी हे खास प्रकरण आहे. ते सहजासहजी आत्मसात होत नाही. त्यासाठी वर्ग लावावे लागतात, खूप अभ्यास आणि चिंतन करावे लागते.आर्काईव्ज़ मध्ये डोके खुपसून बसून या मराठीचे मूळ रूप, उगमस्थान वगैरेचे ज्ञान करून घ्यावे लागते. झालेच तर थोर्यामोठ्यांचे आशीर्वादही (पदरी)पाडून घ्यावे लागतात.(हे पायांवर धोंडा पाडून घेणे स्टाइलवर वाचावे.)
जरा गंभीरपणे म्हणायचे तर ऐसीवरचा सूक्ष्म विनोद, डोके लावून उलगडाव्या लागणार्या आणि स्वतःचे संदर्भज्ञान तपासायला लावणार्या शब्दकोट्या,तिरकस पण कधीच जखमा न करणारे शेरे-ताशेरे, सदस्यांचे कधीही चिरडीला न येणे,शाब्दिक आणि वैयक्तिक अपमान न करणे हे मला आवडते. अर्थात येथे 'ऐसी तुम्हांला का आवडते'असा कौल नाहीय, ही वेगळी गोष्ट.
साम्य
http://www.aisiakshare.com/user/1577/authored
.
.
http://aisiakshare.com/user/1664/authored
.
.
काव्या आणि पी. डी. वीणा हे कोणी नवीन लोक नसून इथलेच नेहमीचेच यशस्वी दशावतारी कलाकार असावेत.
शिवाय बॉटबॉयसुद्धा ह्या दशावतारी लोकांपैकीच कुणीतरी आहे, कोण ते ठौक नै. पण एकदोन लेख मस्त होते त्याचे.
गब्बर, ऋ, मेघना, इ इ शांत का आहेत?
http://www.firstpost.com/politics/kejriwal-to-sue-media-for-defamatory-…
मोदी सरकार यायच्या आधीच मिडियाच्या स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे आणि अजूनच होईल अशी "भिती" वाटणारे ऋषिकेश, मेघना, अदिती, चिंज, इ इ (न वाटली तरी स्वातंत्र्य महत्त्वाचे वाटणारे गब्बरजी, इ इ ) केजरीवालने ही प्रत्यक्ष हरकत केली आहे तेव्हा शांत का म्हणे आहेत?
"In such case, a reference letter will be sent to the principal secretary (Home) containing details of the defamatory imputation published, the mode of publication, factual inaccuracy, details of allegations made and ground for believing that it will harm the reputation of the person against whom the imputation has been made," a senior officer said.
हे किती सब्जेक्टीव आहे नै का? मग केजरीवर टिका नको म्हणे? तो भाजपच्या विरोधात आहे म्हणून?
हॅहॅहॅ, त्यांचं सरकार आता
हॅहॅहॅ, त्यांचं सरकार आता च्यानल सुरु करायला देखील मदत करणारे!
http://www.hindustantimes.com/newdelhi/delhi-govt-to-help-good-journali…
निर्लज्जपणाचा कळस मंजे साला
निर्लज्जपणाचा कळस मंजे साला ओपनली म्हणतो कि माध्यमे काहीही म्हणू द्यात आपची दिल्लीच्या जनतेशी नाळ घट्ट आहे. माध्यमे काही का म्हणेनात दिल्ली सरकारचे काम चांगलेच आहे. त्याची भाषा, नूर, शाब्द, स्वर सगळं घॄणास्पद आहे. आणि पुरोगामी त्याला बोलतच नैयत.
अरे, सरकारी पैशाने, मशिनरीने तुमच्या विरुद्ध बोलणार्या माध्यमांविरुद्ध कारवाई करणार? ब्रिटिशांनी देखिल असं केलं नाही.
हा बाबा सायको आहे कि काय?
माध्यमे मला बदनाम करताहेत अशी
माध्यमे मला बदनाम करताहेत अशी रड मोदी करू लागले तेव्हा ...काहीही संबंध नसताना ... त्या रडीची अर्थ ... मोदी माध्यमांची मुस्कटदाबी करतात... करतील... इ इ काढले गेले. तो चिंजंचा महान लेख -डी एन ए वरचा लेख भाजपने दाबला असे सुचित करणारा आठवतो का? ....
आता प्रत्यक्ष मुस्कटदाबी चालू झाली आहे - मिडियाचे पब्लिक ट्रायल - सुपारी - सरकारी चॅनेल - मिडियाकडे दुर्लक्ष करा - डिफेमेशन केस करा - हद्द म्हणजे सरकारी खर्चाने. सरकारवरची प्रत्येक टिका सरकारचे डिफेमेशन वाटू शकते - आणि ही सगळी मंडळी आपण त्या गावचेच नाही असे गप्प बसली आहेत.
मग केजरीवर टिका नको म्हणे? तो
मग केजरीवर टिका नको म्हणे? तो भाजपच्या विरोधात आहे म्हणून?
केजरीवाल जे करत आहेत ते चूक आहेच व माझा त्याला अजिबात पाठिंबा नाही.
"मिडियावर कुठेतरी काहीतरी मर्यादा असल्याच पायजेत" हे वाक्य "स्वातंत्र्य म्हंजे स्वैराचार नव्हे" या वाक्याइतकेच निरर्थक आहे.
राष्ट्रीय सुरक्षा हा एक विषय व contractually protected secrets सोडून बाकी इतर बाबतीत मिडियावर कोणतेही बंधन घालण्याचा सरकारचा अधिकार (जो काही असेल तो) काढून घेतला पायजे.
व्यक्तीला सरकारचा थेट उपमर्द व अपमान करायचा पूर्ण अधिकार असायला हवा. सरकारला (व त्यामधील व्यक्तींना) अर्वाच्य शिवीगाळ करायचा अधिकार सुद्धा व्यक्तीस असायला हवा. Abusive language exists in this world for a reason. It is not completely without utility. विधीमंडलात केलेल्या कोणत्याही विधानाबद्दल सभासदांवर भारतातल्या कोणत्याही न्यायालयात खटला दाखल करता येत नाही. Why should MLAs get a privilege which people do NOT have it ? तसाच अधिकार व्यक्तीला असायला हवा. व असा अधिकार पारित करून तो घटनेच्या नवव्या परिशिष्टात समाविष्ट केला जावा.
ऋ ने खाली असे लिहिलेले आहे -
ऋ ने खाली असे लिहिलेले आहे - माझी मते स्पष्ट व जाहिर आहेत. (केजरीवालांना वेगळी नी मोदींना वेगळी) अशी व्यक्तीगणिक बदलत नाही.
माझे नेमके उलट आहे. मी अजिबात वस्तुनिष्ठ नाही. मी बायस्ड आहे. मी मोदींचा चाहता असलो तरी मला भाजपा वर सडकून टीका करताना मला आसुरी आनंद होतो.
केजरीवाल हे भाजपा ला विरोध् करतात म्हणून तर आवडतातच. पण (राजकीय पक्षांची) स्पर्धा ही निकोप असावी वगैरे निरर्थक propriety च्या नेमके विपरित asymmetric competition करतात म्हणूनही आवडतात.
मी अजिबात वस्तुनिष्ठ नाही. मी
मी अजिबात वस्तुनिष्ठ नाही. मी बायस्ड आहे.
हे प्रचंडच आवडून गेले आहे. आपले विचार समीकरणांत मांडणे, तशी समीकरणे अन्य लोकही वापरून मजसमान निष्कर्ष काढू शकतात असे वाटणे, जर लोकांचे विचार विपरित दिसू लागले तर त्यांनी समीकरण नीट वापरलेले नाही असे वाटून घेणे वा त्यांची सवती समीकरणेच गंडलेली आहेत असे वाटून घेणे इ इ पेक्षा बायस्ड असणे, तसे माहित असणे खूपच छान आहे.
केजरीवालांच्या चाळ्यांकडे
केजरीवालांच्या चाळ्यांकडे सतत लक्ष द्यायला मी दिल्लीकर नाही!
भारतीय नागरीक आहे, महाराष्ट्रातील मतदार आहे.
इतर राज्यांतील बातम्यांपैकी प्रत्येक बातमीवर प्रतिक्रिया व्यक्त करेनच असे नाही.
माझी मते स्पष्ट व जाहिर आहेत. (केजरीवालांना वेगळी नी मोदींना वेगळी) अशी व्यक्तीगणिक बदलत नाही.
http://www.aisiakshare.com/no
http://www.aisiakshare.com/node/2481
माझे पंतप्रधान[पदाच्या मुख्य इछुकां(भाग: ३/३)]वरील आक्षेप
या धाग्यावर
पंतप्रधानपदासाठी म्हणून माझा श्री.केजरीवाल यांच्यावरील सर्वात प्रमुख आक्षेप होता एकाधिकारशाहीचा. मात्र गेल्या महिन्याभरात विशेषतः निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पक्षाचा कारभार पूर्वीइतका व्यक्तीकेंद्रीत वाटत नाहीये. तरी इतक्या नवख्या व अननुभवी (आआप-१) व्यक्तीने थेट देशाचा पंतप्रधान व्हावे असे वाटत नाही हे ही खरे.
अजून एक आक्षेप म्हणजे पक्षाची आर्थिक नीती व राजकीय स्थान (आआप-२). यांनी आतापर्यंत घेतलेले निर्णय म्हणा किंवा व्यक्त केलेली भूमिका म्हणा, मला यांच्यात व सौम्य डाव्या पक्षांत विलक्षण साम्य दिसते. लोहियावादी पक्षांचा आयडियलिझम यांच्यात पुरेपूर उतरला आहे आणि म्हणूनच यांच्या आर्थिक धोरणावर सतत शंका वाटत असते. झोपडपट्ट्या अधिकृत करणे काय किंवा मोफत पाणी वा विजेवरील सबसिडी काय डावीकडे किंवा सरकार केंद्रित दिवसांकडे अर्थात परमिट राजकडे यांची वाटचाल चालली नाहीये ना अशी शंका येते.
तिसरे व सर्वात महत्त्वाचा आक्षेप म्हणजे हे (आआप-३) व्यक्तीकेंद्रीत निवडणुका लढतात. समोरच्या व्यक्तीविरुद्ध राळ उडवून द्यायची इतकी की लोकांच्या डोळ्यात जाऊन त्यांना खरे-खोटे समजेनासे व्हावे. भारतीय राजकारणात हे सर्वत्र चालते हे खरेय पण जेव्हा एखादा पक्षा 'आदर्शवाद' हीच आपली कार्यप्रणाली आहे असे म्हणतो तेव्हा निवडणुका लढवायची ही पद्धत नक्कीच आदर्श वाटत नाहीत. काँग्रेस व भाजपापेक्षा वेगळा म्हणवणार्या पक्षालाही टीकेचा स्वीकार सकारात्मक रितीने करता येत नसेल तर हे इतर पक्षांची मोठे साम्य दाखवणारे ठरते.
शेवटचा मोठा आक्षेप असा की (आआप-४) लवचीकतेचा अभाव. आम्हालाच सगळे कळते, बाकी सगळे मूर्ख आहेत असा यांचा आविर्भाव असतो. योग्य वेळी लवचीकता दाखवणे केजरीवाल यांच्या क्षणिक राजकीय फायद्याचे असेलही मात्र एक पंतप्रधान म्हणून हे एककल्ली वागणे मला घातक वाटते.
असे लिहिणारे आपणच का?
================================================================================
इतर राज्यांतील बातम्यांपैकी प्रत्येक बातमीवर प्रतिक्रिया व्यक्त करेनच असे नाही.
अर्थातच. पण ही प्रत्येक बातमी नाही. माध्यमाचे स्वातंत्र्य या नावाखाली सुतावरून स्वर्ग गाठायची सवय असताना प्रत्यक्षात स्वर्ग आल्यावर डोळे मिटणे ...
१. मॅक मंजे काय? इंग्रजांच्या
१. मॅक मंजे काय? इंग्रजांच्या बर्याच नावापूर्वी मॅक असतं. ते स्पेलपण Mc असं करतात, Mac असं नै करत.
२. काही नावांत o' असतं. आता नावात ओ असणं ठिके. पण अॅपॉस्ट्रॉफी? या ओ चा अर्थ अर्थ असतो काय.
३. Johnson मंजे जॉनचं पोरगं असं म्हणता येईल का? मंजे प्रत्यक्ष बापाचं नाव जॉन असावंच असं नै, पण आपण देवकीनंदन बहुगुणा असं मंतो तसं.
१ आणि २ हे स्कॉटिश-आयरिश
१ आणि २ हे स्कॉटिश-आयरिश विशेष आहेत इतकंच माहिती आहे.
३ बद्दलः येस, इंडीड. इट्स मोर लाईक अ क्लॅन अॅन्सेस्टर नेम आय थिंक. इंग्लिशसोबत जर्मन, स्वीडिश, नॉर्वेजियन आणि डॅनिश भाषा बोलणार्यांमध्येही अशी नावे आढळतात. अशा स्टाईलचे नाव धारण करणार्या एका केसरबाईंवरती आमचा खूपच जीव आहे.
म्याक, ओ आणि सन
म्याक आणि ओ, ह्या दोन्हींचा अर्थ 'चे', अपत्य, असाच आहे.
म्याकडॉनल्ड (डॉनल्डचे अपत्य) किंवा ओ'नील (नीलचे अपत्य).
म्याकचे स्पेलिंग Mc तसेच Mac अशा दोन्ही पद्धतीने केलेले पाहिले आहे. तसेच O नंतर अपॉस्ट्रॉफी देण्याचीदेखिल प्रथा आहे.
जॉन्सन म्हणजे जॉनचे अपत्य हे खरे.
पैकी, म्याक आणि ओ हे आयरीश मंडळीत तर सन हे इंग्लिश मंडळीत सहसा वापरताना पाहिले आहे.
बहुतेक कुटुंबात, 'चे' अपत्य बर्याच पिढ्यांपूर्वी घडून गेले असून आता ते फक्त आडनाव म्हणून उरले आहे!
(नारायणसूत) सुनील
नाह नाह
अरुण म्हणजे सूर्याच्या रथाचा सारथी. नारायण कशावर जातो, ते कोण चालवतं कि तो पायीच जातो त्याची कल्पना नाही. पिताश्रींचं नाव भास्कर. म्हणजे सूर्य. ते नेहमी सील्टबेल्ट लावावा लागू नये म्हणून रथात मागे बसतात. त्यांना ड्रायविंग येत नाही. शिवाय गाडीत त्यांचाच प्रकाश पडलेला असतो.
अशी सेटिंग सेट करता येण्याची
अशी सेटिंग सेट करता येण्याची सोय करण्याएवढी सध्या माझी पत नाही. पण हे सेटिंग ब्राऊजर+प्रोफाईल स्पेसिफिक आहे.
मला हे ब्राऊजर-स्पेसिफिक सेटिंग असणं सोयीचं वाटतं. मेमरीच्या बाबतीत कंप्यूटरच्या तुलनेत फोन गरीब असल्यामुळे फोनवर वेगळं आणि कंप्यूटरवर वेगळं सेटींग ठेवण्यातली सोय जाणवते.
प्रिअँबल घटनेची छत्री आहे.
प्रिअँबल घटनेची छत्री आहे. म्हणजे प्रीअँबल अढळ रहाणार**, पण त्याखालची घटना बदलू शकते.
** अढळ रहाणार म्हणजे त्याचा आत्मा अढळ रहाणार, शब्द बदलू शकतात. (बेसिक स्ट्रक्चर डॉक्टराईन)
कोर्टाने प्रीअँबलचा उपयोग करून न्याय दिल्याची फ्यामस केस म्हणजे केशवानंद भारती. पण हे अगदी अपवादात्मक परिस्थितीत आणि फक्त सर्वोच्च न्यायालयच करू शकत असावं.