अंबरनाथ ते कल्याण-पहिला लोकल प्रवास-(रेस-पार्ट-टू)

'तिकिट...'
'दादा जवळ मागच्या डब्यांत आहे...'
'फर्स्टक्लासचं आहे कां...?'
'सॉरी, मी मध्यप्रदेशातून आलोय, मला माहीत नव्हतं की लोकल मधे देखील फर्स्टक्लास असतो...'
'पकडलं गेल्यावर लोक असंच काहीतरी सांगतात...'
-------------
वराती सोबत पुण्याहून परतलो...त्या लग्नाची पार्टी रात्री साडे बारा वाजता संपली. घरी येऊन झोपलो तर दीड वाजला होता. सकाळी नवरया मुलाच्या मोठ्या भावाने मला उठवलं, म्हणाला-‘चल, राम काकांना स्टेशनपर्यंत सोडून येऊं. तू साइकिलीवर त्यांची सूटकेस ठेवून घे.’
मी तसाच पैंट-शर्ट घालून निघालो. पर्स बैग मधेच राहून गेली (त्यांत रेलवेचा फ्री पास होता). साइकिल घेऊन मी स्टेशनावर पोचलो, तर दादा आणि काका आधीच उभे होते. मला बघतांच दादा म्हणाला-‘हे घे पैसे, साइकिल स्टैंडला ठेवून तीन तिकिटं घेऊन ये. त्यांत दोन रिटर्न तिकिटे आणशील, आपण काकांना कल्याण पर्यंत सोडून येऊ.’
मी पहिल्यांदाच मुंबईला गेलो होतो. तीन दिवसांपूर्वी रात्री याच काकांसोबत अंबरनाथला उतरलो होतो. महानगरी एक्सप्रेसनी रात्री साडे सात वाजता कल्याणला पोचलो. महानगरीच्या प्लेटफार्महून लोकलच्या प्लेटफार्म वर आलो. गर्दीसोबत लोकलमधे कधी शिरलो माझं मलाच कळलं नाही. दहा मिनिटांत अंबरनाथ, तिथून घरी. दुसरया दिवशी दुपारी दोन वाजता बसनी वराती सोबत पुणे.

-------------

म्हणूनच आज दादा म्हणाला की तिकिट घेऊन ये, तर कां कुणास ठावुक मला थोडी भीती वाटली. पहिल्यांदाच लोकल मधे दिवसा चढायला मिळणार होतं. मी तिकिट घेतलं, परतलो आणि दादाला दिलं. आम्ही प्लेटफार्मवर आलो. सहा वीसच्या लोकलची एनाउंसमेंट झाली. दादा-काका थोडेसे मागे उभे होते. लोकल येताच मी दादाला इशारा केला की समोर आलेल्या डब्यांत चढतोय. त्याने ओके म्हटलं. मी चढलो आणि लोकल सुटली. काकांची सूटकेस माझ्याच हातात होती. ती मी वाकून खाली ठेवली, उभा राहिलो आणि मागून आवाज आला-तिकिट. मी चमकून बघितलं, तो टीटीई होता.

मी त्याला सांगितलं-‘दादा मागच्या डब्यांत आहे, तिकिट त्याच्या जवळ आहे.’

तो म्हणाला-‘फर्स्ट क्लासचं आहे कां?’

मी नर्व्हस झालो-‘तिकिट तर आर्डनरी आहे.’

‘मग...हा फर्स्ट क्लास आहे.’

मी म्हटलं-‘हे बघा, मी मध्यप्रदेशातून आलोय, पहिल्यांदाच लोकल मधे चढलोय, मला माहीत नव्हतं की लोकल मधे देखील फर्स्ट क्लास असतो.’

तो म्हणाला-‘पकड़े जाने के बाद हर आदमी ऐसा ही कहता है.’

मी म्हटलं-‘मैं ऐसा क्यों करुंगा? मैं बता तो रहा हूं कि मध्यप्रदेश का रहने वाला हूं और पहली बार ही लोकल में चढ़ा हूं। मुझे नहीं मालूम कि लोकल में भी फर्स्टक्लास होता है। हां..., रोज आने-जाने वाले ऐसा कर सकते हैं...'

झालं...

शेजारी उभे असलेले यात्री मला म्हणाले-

‘म्हणजे आम्ही सगळे काय खोटं बोलतो की काय...!’

टीटीई म्हणाला-‘तिकिट असेल तर 28 रुपए, नसेल तर तीस रुपए फाइन द्यावा लागेल.’

मी काही म्हणणार इतक्यांत गाडी थांबली-कल्याण.

(अरे म्हणजे भुर्दंड ही भरायचाय आणि एन्जॉय पण करतां आलं नाही...)

तो माझ्या सोबतच उतरला. दादाने माझ्या सोबत त्याला बघतांच खिशांतून पर्स काढली आणि मुकाट्याने फाइनचे पैसे दिले. काकांना सोडून आम्हीं परतलो. तो स्कूटरनी व मी साइकिली ने गेलो.

प्रसिद्धी माणसाच्या आधी पोचते, याचा प्रत्यय त्या दिवशी पहिल्यांदा आला. मी घरी पोचलो, तर सगळ्यांच्या चेहरयावर निराळेच भाव होते. दुपारी आम्ही काही मंडळी नव्या जोडप्यासोबत टिटवाळ्याच्या गणपतीला गेलो.

प्लेटफॉर्मवर लोकलची वाट बघत असतांना आमच्या पैकी एक बोलला-

‘त्याच्यासाठी फर्स्ट क्लासचं तिकिट काढा बरं का‌...?’

पुढच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता मी घरून निघालो. मला डोंबिवलीला राहणारया माझ्या काकांकडे जायचं होतं.

अंबरनाथमधील आर्डिनेंस फैक्टरीच्या कॉलोनीतलं काकांचं लगीनघर ऐसपैस होतं. बाहेर येऊन मी रस्त्यावर पोचतांच बस दिसली. हात देऊन थांबवली. चढलो, कल्याणचं तिकिट घेतलं. कंडक्टरलाच विचारलं की मला डोंबिवलीला जायचंय. तो म्हणाला कल्याणहून लगेच बस मिळेल की. बस मिळाली देखील. डोंबिवली वाल्या कंडक्टरला म्हटलं-‘मला दत्तानगर ला जायचंय..’

तर ताे म्हणाला-‘बाजारात उतरुन जा, तिथून जवळ पडेल.’

मी म्हटलं-‘सांगशील.’ तो हो म्हणाला. अर्ध्या तासानंतर त्याने सांगितलं-पुढच्या स्टाॅप वर उतरुन जा. तसा मी उतरलो. इथून कुठे.

समोर एक आजीबाई भाजी घेऊन बसली होती. तिला विचारलं-दत्ता नगर कुठे आहे. तिने बोट दाखवलं म्हणाली पुढे जाऊन विचारुन घेशील. तसा मी पुढे गेलो.

एका दुकानदाराला विचारलं-‘......... कुठे राहतात...’

‘माहीत नाही, काय पत्ता सांगितलाय...अच्छा, वो नेवी में थे क्या...!’

मी म्हटलं-‘हो...’

‘अरे यार..., वो सामने वाली बिल्डिंग में तो रहते हैं, दूसरे माले पर.’

मी पार सुखावलो. त्या घरी पोचलो, बेल वाजवली.

दार किलकिलं करुन कुणीतरी विचारलं-‘कोण पाहिजे?’

मी म्हटलं-‘... काका आहेत कां...?’

‘नाहीये, तुम्हीं कोण...’

अजून दार उघडलेलं नव्हतं.

‘मी बिलासपुरहून आलोय, त्यांचा भाचा...’

आता दार उघडलं आणि काकू समोर आल्या.

म्हणाल्या-‘ते येतच असतील, सहा वाजून पांच मिनिटांपर्यंत येतात.’

नकळत माझी नजर समोर घड्याळा कडे गेली. सहा वाजून दोन मिनिटे झालेली होती. इतक्यांत लहान मुलगा धावत आला-‘बाबा आले...’

काकू म्हणाल्या-‘ते आले...’

काकांनी मला लगेच ओळखलं-‘अरे रवी, तू केव्हां आला? सामान वगैरे कुठे? आधी सांगायचं नाही कां...?’

मी सांगितलं अंबरनाथला उतरलोय. मग काकांनी माझी ओळख करुन दिली. काकू, दोघं भाऊ. दोघांशी गट्‌टी जमली. मग काकांनी मला डोंबिवली फिरवून आणलं. त्यांच्या दोघी बहिणी तिथेच होत्या. दोघींची भेट झाली. परतलो, काकांनी थालीपीट केलं. म्हणाले आता इथेच थांबून जा. मी म्हणालो नाही. काकूला सांगितलंय की परत येतोय. बरं म्हणत ते मला खाली सोडायला आले. ऑटो करुन दिला.

त्याला म्हणाले-‘मेरा भतीजा है, इसको स्टेशन पर टिकट काउंटर पे छोडना.’

त्याने मला फक्त सोडलंच नाही तर तिकिट घेतल्यानंतर लोकल कुठल्या प्लेटफार्म वरुन मिळेल हे देखील सांगितलं. अंबरनाथ साठी लोकल दहा मिनिटांनी होती. मी घरी पाेचलो तर साडे अकरा वाजले होते. मी दार वाजवलं.

काकूनी दार उघडलं, म्हणाली-‘मला वाटलं तू सुध्या कडेच राहणार...’

आज मला परतीच्या प्रवासावर निघायचं होतं म्हणून सकाळी मी पहिल्या लोकलनी निघालो. दादाने मला स्टेशनावर सोडलं. विचारलं देखील की चलूं का कल्याण पर्यंत. मी त्याला नाही म्हटलं.

आज मी मुद्दाम फर्स्टक्लासचा डबा शोधून चढलो. कारण मजजवळ रेलवेचा फ्री पास होता. तर आज कुणीच तिकिट विचारलं नाही. कल्याणला उतरलो, बैग खाली ठेवण्या करितां वाकलो अन आवाज आला-‘तिकीट...’

मी म्हटलं-‘पास आहे...’

‘दाखवा...?’ वाकून पास काढता-काढता मी त्याला विचारलं गीतांजली कुठे येईल? माहीत नाही. पास बघून तो निघून गेला. गीतांजली आली तर मी पुन्हां हैराण झालो. इंजिन पासून गार्डच्या डब्यापर्यंत चक्कर मारली. फर्स्टक्लासचा डबाच नव्हतां. शेवटी टीटी ला विचारलं-रेलवेचा पास आहे, नागपूर ला जायचंय, कुठे बसूं. त्याने मला बघितलं-म्हणाला एस-7 मधे जाऊन बैस. (त्यानेच सांगितलं-गीतांजली ला फर्स्टक्लास नसतो)

त्याप्रमाणे एस-7 मधील एका बर्थवर जाउन बसलो. गाडी सुटल्यानंतर बसलेल्या माणसाने विचारपूस केली. मी सांगितलं नागपूरला जायचंय. तो म्हणाला मला कोलकाता पर्यंत जायचंय. तू दूसरी जागा बघून घे. मी जागा बदलली. नाशिक पर्यंत तिथे बसलो होताे. मनमाड़च्या जवळपास त्याने विचारलं रिजर्व डब्यांत तूू कसा काय बसला आहेस. मी सांगितलं वडील रेलवेत आहेत, माझ्याजवळ पास आहे. अच्छा...मग त्याची भाषा, व्यवहार, माझ्या कडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला. मग त्याने गप्पा मारल्या. तो इंजीनियर होता आणि पहिल्यांदा गीतांजलि ने कोलकात्याला जात होता. मी त्याला त्याच्या प्रवासाची कल्पना दिली. नागपूरचं विमानतळ दाखवलं...आणि संध्याकाळी नागपूरला उतरलो...

तिथे एक दिवस राहून बिलासपूरला परतलो...

आता लोकलमधील प्रवासाची माझी भीति संपली होती...पण त्याला 28 रुपए भुर्दंड भरावा लागला होता...

------------------

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

लोकलच्या प्रवासाचं कुणीच कसं सांगितलं नाही? झटकन वेग घेते ,फर्स्ट क्लास असतो वगैरे?वडील रेल्वेत असून मोठ्या गाड्यांतील डब्यांची माहिती कशी झाली नाही?बाकी मजेदार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सकाळी मोबाइल वर प्रश्न बघितला नंतर मोबाइल वर उत्तर द्यायचा प्रयत्न केला....
दहा आेेळी लिहून झाल्यावर एक फोन आला, तो अटैंड करेस्ताेवर डाटा डिलीट झाला...
दुसरयांदा पुन्हां तसंच झालं...
मग मोबाइल वर लिहायचा नाद सोडला...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

साधारण माणूस प्रवास करतांना ट्रेन आल्यावर डब्यात खाली जागा शोधतो...दिसली की लगेच खिडकीतून सीटवर रुमाल ठेवतो...
त्या दिवशी माझया समोर आलेला डबा खाली होता...मी देखील साधारण माणसासारखाच विचार केला दोन स्टेशन जायचंय...
दादा-काका मागच्या डब्यांत चढून जातील...
सामाना सोबत मी या खाली डब्यांत चढतो....
तसं मी केलं...
आता लोकल मधे फर्स्ट क्लासची माहिती नव्हती कां...?
तर नव्हती....कधी गरज पडली नाही...किंवा आेळखीच्या मंडळींपैकी कुणाकडून ऐकलं नव्हतं की लोकलच्या फर्स्टक्लास मधे प्रवास केला...
सगळे लोकल मधून आलो एवढेच सांगायचे...
किंवा सांगायचे-मुंबई ला लोकलचा प्रवास परवडतो...
आज इतक्या वर्षानंतर हे सगळं लिहितांना गंमत वाटतेय...
लोकल लवकर वेग घेते...तर त्याची काळजी नव्हती...
कॉलेज मधे असलेला मुलगा वेगाची (स्पीडची) काय फिकिर करणाार....त्याची काळजी नव्हती...
तिथून परत आल्यावर चार महिन्यानंतर मी स्टीम इंजन मधे फायरमेन झालो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

पुणे मिरज/कोल्हापुर मीटर गेज होती.लाकडी डबे.कोळशाच्या एंजिनवाल्या गाड्यांतून खिडकीतून बाहेर पाहाणे आणि निखारे डोळ्यांत जायचे एंजिनपासून डबा जवळ असला की.

[[मोबाइलच्या नोटमध्ये अगोदर लिहून कॅापीपेस्ट करणे सोपे जाते.वेळ वाया नाही जात.रेल्वेत प्रवासात फार उपयोगी होते.स्टेशन आल्यावर रेंज आली की पोस्ट करायचं]]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी नोट मधे लिहिलं नसून थेट या प्रतिक्रिया च्या बाक्स मधेच लिहित होतो...
असो...चुकांमधूनच शिकायला मिळतं...
आता आफिस मधे कंप्यूटर वर आरामात लिहिता येतंय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

काही फोन्समध्ये मल्टीटास्किंग करता येतं त्यातून पुन्हा लिहिता येतं.
शिवाय माझं निरीक्षण मोबाइलात लिहित असताना फोन आल्यास फोनवर बोलून झाल्यावर आपण end callबटण दाबायचं नाही,करणाय्राने बंद करेपर्यंत थांबायचं.आपोआप मागचं काम चालू होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या दिवशी दोन्हीं वेळा फोन आला होता. बोलणं झाल्यावर कट केला तर डाटा डिलीट झाला. तुम्ही म्हणाल्या प्रमाणे बोलल्यानंतर कट नाही करणार. नोटपैड वर देखील मैटर टाइप करुन बघितला...याची माहिती नव्हती.
वाटसअप वर एक फोल्डर बनवून त्यात मैटर टाइप करायचो...
आता नोटपैड चा वापर करीन...
थैंक्स...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

आजन्म मुंबईत राहिल्याने लोकलची कोणाला भिती वाटू शकते हे जवळजवळ इंजिनियरींगला जाईपर्यंत आमच्या गावीही नव्हतं.
इंजिनियरिंगला महाराष्ट्रभरातून/देशभरातून मुलं आल्यावर अचानक आपण (त्यांच्या नजरेत) किती वेगळे नि चालती गाडी पकडू शकणारे लै भारी हिरो असल्याचे जाणवलेलं (अर्थात तेही काही आठवडे टिकलं. मग तेही सरावले)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!