दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१३ मे
जन्मदिवस : मलेरियाच्या जंतूंचा शोध लावणारे नोबेलविजेते रोनॉल्ड रॉस (१८५७), चित्रकार व शिल्पकार जॉर्ज ब्राक (१८८२), राष्ट्रपती फक्रुद्दीन अहमद (१९०५), लेखिका दाफ्ने द्यु मोरिए (१९०७), राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी (१९१३), नर्तिका बालसरस्वती (१९१८), समीक्षक भालचंद्र फडके (१९२५), समीक्षक गो. मा. पवार (१९३२), लेखक आर्मिस्टेड मॉपिन (१९४४), गायक स्टीव्ही वंडर (१९५०), संगीतकार आनंद मोडक (१९५१)
मृत्युदिवस : 'बकिंगहॅम पॅलेस'चा वास्तुरचनाकार जॉन नॅश (१८३५), अभिनेता गॅरी कूपर (१९६१), जाझगायक व वादक चेट बेकर (१९८८), लेखक आर.के.नारायण (२००१), नाट्यकर्मी बादल सरकार (२०११), छायाचित्रकार जगदीश माळी (२०१३)
--
१६३८ : दिल्ली येथील लाल किल्ल्याचे बांधकाम सुरू.
१८८८ : ब्राझिलमध्ये गुलामगिरीविरोधात कायदा अमलात आला.
१९४० : दुसरे महायुद्ध : जर्मन सैन्य फ्रान्सच्या भूमीवर. ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी पार्लमेंटमध्ये 'Blood, toil, tears, and sweat' हे आपले सुप्रसिद्ध भाषण केले.
१९५० : ब्रिटनमधील सिल्व्हरस्टोन येथे पहिल्या फॉर्म्युला वन स्पर्धेची सुरुवात.
१९५२ : प्रजासत्ताक भारताच्या पहिल्या संसदेचे (राज्यसभेचे) पहिले सत्र सुरू झाले.
१९५८ : 'वेल्क्रो'ची ट्रेडमार्क म्हणून नोंदणी.
१९६८ : फ्रान्समधील विद्यार्थ्यांच्या विद्रोही चळवळीला साथ देत कामगारांनी देशव्यापी संप पुकारला. आठ लाख विद्यार्थी आणि एक कोटी कामगार यांची ही युती अभूतपूर्व होती.
२००८ : जयपूर येथे बॉम्बस्फोट; १२ मृत
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- गवि
- भाऊ
राक्षसाची
या लेखात जे काही तक्रारीच्या सुरात लिहिलेले आहे त्यातलं बरंचसं चूक आहे.
म्हंजे बऱ्याचशा तक्रारी अवैध आहेत.
---
मुस्लिम बहुल वस्ती मधे जाऊन तिथे "नो एच फॅक्टर" हा गुण वर्णिला जातोय की नाही याची शहानिशा केली नसेल तर लेखक साठे साहेब हे "मुस्लिमहृदयसम्राट्" या सर्टिफिकेशन चे अभिलाशी आहेत असं म्हणावं.
मी तर म्हणतो की त्यांना तो किताब देऊनच टाकावा.
साठे साहेबांनी त्यांच्या समाजशास्त्रातील डॉक्टरेट चा थिसिस हा वधुवरसूचकमंडळातील विवाहेच्छु मुलांमुलींचे प्रेफरन्सेस या विषयावर लिहिण्याचा मनोनिश्चय केलेला आहे असं दिसतं.
-----------
Rajendra Sathe should quickly take an appointment with his proctologist so that the doctor can pull Mr Sathe's head out of his a**.
केवढी ही कावकाव!
निरर्थक, नावं ठेवणाऱ्या बरळीला प्रतिसाद देण्याची गरज वाटत नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हा प्रतिसाद अपेक्षित होता.
हा प्रतिसाद अपेक्षित होता. म्हणूनच खालील रिझनेबल प्वाईंट (mole म्हणुन्) अंतर्भूत केला होता.
(१) हा मुद्दा रिझनेबल प्वाईंट नसल्यास तसं असं नमूद करा.
(२) हा मुद्दा रिझनेबल प्वाईंट असल्यास तसं म्हणून रिकाम्या व्हा.
(३) "रिझनेबल असो वा नसो ... त्याच्याबद्दलचा प्रतिवाद करायला मी राजेश साठे नाही, मी अदिती आहे" = असं म्हणणार आहात हे माहीती आहे.
डन
केलं. त्या वाक्याला, सदर संदर्भात शेंडाबुडखा नाही; त्यामुळे त्याला मुद्दा म्हणणं टाळलं आहे.
असंबद्ध आणि व्यक्तिगत गरळ स्वरूपाच्या प्रतिसादांवर अदितीनंच काय, राजेंद्र साठेंनीही उत्तरं देऊ नयेत. या दोघांना बरे(च) उद्योग आहेत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
केलं. त्या वाक्याला, सदर
.
.
बघा हं तुम्ही विचार करायला घाबरताहात्.
.
.
(१) मी क्वोट केलेले वाक्य लेखामधीलच् आहे. बाहेरचे उचलून आणलेले नाही. - "खादी सोसायटीचे गुणगान गाताना, ती कशी मोक्याच्या जागी आहे, मार्केट, हायवे, स्टेशन कसे जवळ आहे याच बरोबर – ‘नो एम फॅक्टर’ हा गुण आवर्जून सांगितला जातो. नो एम फॅक्टर म्हणजे इथे कोणीही मुसलमान कुटुंब राहत नाही".
(२) लेखाचा मूळ मुद्दा हा आहे की मुस्लिमेतर मंडळी (म्हंजे हिंदु) मुस्लिमांना राक्षसासारखं मानतात व म्हणून् मुस्लिमांविरुद्ध भेदभाव करतात्.
(३) लेखकाने आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ उदाहरणे दिलेली आहेत्.
(४) सोसायट्यांमधे सदनिका भाड्याने देण्याबद्दल चा मुद्दा किमान दोन परिच्छेदांत आलेला आहे. व वरील "एम फॅक्टर" चे वाक्य त्या दोन पैकी पहिल्या परिच्छेदात आहे.
(५) तेव्हा संदर्भ, शेंडाबुडखा या बाबत तुमचं म्हणणं चूक आहे. माझ्या मुद्द्याला शेंडाबुडखा नक्कीच आहे.
(६) या भेदभावाबद्दल लेखकाचा रोष हा मुस्लिमेतरांवर आहे. पण मुस्लिम हे निर्दोष आहेत का ? ते भेदभाव करू शकत असतील का ? - असे बेसिक प्रश्न त्यांनी स्वत्:ला विचारले का ? == हा माझा प्रश्न आहे.
(७) मुस्लिम लोक त्यांच्या एरियामधे मुस्लिमेतरांविरुद्ध भेदभाव करीत नसते आणि तसा डेटा उपलब्ध असता तर लेखकाने तो डेटा क्वोट केला असता की नसता (त्यांच्या म्हणण्याच्या पुष्ट्यार्थ्) ?
.
.
तेव्हा माझे तुम्हाला आव्हान आहे - माझा मुद्दा अनरिझनेबल कसा आहे ते सांगा.
.
.
.
तुमच्याच भाषेत सांगायचं तर ...
मी प्रॉक्टॉलॉजिस्ट नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कशाला?
Says the one who always has his head up in his ass.
काहीही मुद्दे काढायचे म्हणून काढायचे. दिवसातून शंभर ठिकाणी पिंका टाकण्यापेक्षा थोडा विचार करून प्रतिसाद द्यायला हरकत नाही.
ज्या देशात 84% एच फॅक्टर आहे तिथे नो एच फॅक्टर असल्याने काय फरक पडतो? सोशल मोबिलीटी म्हणजे काय, कशा कशाचा त्यावर परिणाम होतो वगैरे वाचा जरा.
-Nile
Says the one who always has
पाकिस्तान हा मुस्लिम देश आहे हे ठळक होतं हे तक्रारीच्या सुरात सांगणं हे महाचक्रमपणाचं आहे.
कारणे - (१) पाकिस्तान स्वत्:हून इस्लाम च्या मुद्द्यावरून हिंदुंपासून दूर झाला. (२) पाकिस्तान आजही अधिकृतरित्या मुस्लिम देश आहे. (३) पाकिस्तान आजही मुस्लिम देशांमधे आपले स्थान सांगतो, (४) पाकिस्तान ची काश्मिर बाबत ची १९४७-४८ च्या आसपासची भुमिका व् आजही काश्मिर ला मदत करतो त्याचे मुख्य कारण काश्मिर मधे मुसलमान जास्त आहेत म्हणून.
मग जर ते स्वत्: जर मुसलमान असण्याबद्दल व आपल्या मुस्लिम आयडेंटीटिबद्दल आग्रहि असतील तर त्याचा परिणाम इतर लोकांच्या पर्सेप्शन्वर न होणं हे का व कसं स्वाभाविक आहे ?
आधी प्रश्नाचं उत्तर द्या व नंतर इतर बाबीवर बोला.
नैतर इयत्ता पहिली "झ" मधे जाऊन बसा.
----
(१) दोन बाजूंमधे द्वंद्व असेल तर फक्त एकाच बाजूचे मूल्यमापन करता का ? व दुसरी बाजू ही ऑटोमॅटिकली बरोबर आहे असं मानता का ?
(२) मुस्लिमबहुल लोकॅलिटिज मधे जर मुस्लिम लोक हिंदूंच्याबाबतीत समावेशक असते तर ते तुम्ही तुमच्या मुद्द्याच्या पुष्ट्यर्थ जोडलं असतंत की नाही ?
---
मेंदूतून विचार करायला कधी शिकणार, तुम्ही ?
----
पळून जाऊ नका. प्रतिवाद करा.
तुलना
दोन गोष्टींमध्ये तुलना करताना त्या तुल्यबळ आहेत का हे तुलना करणार्याने आधी पहावे. वरच्या प्रतिसादात त्याकडेच निर्देश केलेला आहे. तो तुम्हाला कळलेला दिसत नाही. तुम्ही स्वत: नेहमी मुद्दे सोडून वाद घालत बसता, गोलपोस्ट बदलता (असे इथे अनेकांनी जाहीर लिहलेले आहे) त्यामुळे तुम्ही तरी आम्हाला पळून जाण्याबद्दल सांगू नका.
-Nile
दोन गोष्टींमध्ये तुलना करताना
काहीही झालं तरी हास्यास्पद लिहायचंच असं ठरवलेलंच आहे का तुम्ही ?
(१) दोन बाजू तुल्यबळ असत्या तर सदनिका किरायावर देताना एकमेकांविरुद्ध भेदभाव झाला असता तर ते तुमच्या दृष्टीने योग्य झालं असतं ?
(२) तुम्ही ज्या अवयवाद्वारे विचार करता त्या अवयवात हे घुसत नाही का की इथे मुद्दा हा आहे की श्री साठे हे दुसऱ्या बाजूचा किमान critical विचार तरी करत आहेत का ? की अध्याहृतपणे दुसऱ्या बाजूला भेदभाव न करणारी अशी मानत व/वा पोर्ट्रे करत आहेत ?
(३) तुम्हाला असं म्हंणायचंय का की केवळ ते अल्पसंख्य आहेत म्हणून त्यांनी केलेला भेदभाव (जर केला असेल तर) तो योग्य आहे ?
(४) जम्मू & काश्मिर राज्या मधे मुस्लिम हे बहुसंख्य आहेत्. तिथे काय स्थिती आहे तुमच्या दृष्टीने ? तिथे तरी मुस्लिम लोक हिंदूंशी भेदभाव विरहित वागतात का ?
------
मी इथे ऐसी वर गोलपोस्ट बदलल्याचे उदाहरण द्या च.
विषय काय, बोलताय काय! अवघड आहे.
तुमच्याशी बोलणे म्हणजे वेळेचा केवळ अपव्यय. कुठेही कसेही फाटे फोडयाचे अन मुद्द्याचं बोलायचं नाही ही तुमची खोड.
हे घ्या उदाहरण. अजून हवे असल्यास अजून देईन. पण ही उदाहरणं अशी इतक्या सहज विसरला नाहीत तर (आमच्यासाठी) बरं.
आता, हे गमतीनं होतं वगैरे वगैरे मुद्दे येतीलच. पण हे असं इतर कोणाला इतर कोणा विषयी ऐसीवर म्हणावं लागल्याचं मी तरी पाहीलेलं नाही. आणि तुमच्या विषयी असं अनेकांनी अनेकवेळा म्हणून झालेलं आहे.
असो. चालू दे तुमचं.
-Nile
तुमच्याशी बोलणे म्हणजे वेळेचा
मी लिहिलेले मुद्दे हे फाटे फोडणे कसे आहे ते सांगाल का ?
मी लिहिलेले मुद्दे हे लेख लिहिणाऱ्याने (म्हंजे साठेंनी) किमान ध्यानात घ्यायला हवे होते. ते रिलेव्हंटच आहेत. सगळे अॅड्रेस करायलाच हवेत असे नाही पण निदान काही मुद्दे तरी अॅड्रेस करायला हवे होते.
----
तुम्ही गोलपोस्ट चा धागा शोधून काढलात हे खरं आहे. पण तो वाचला असतात तर तुम्हाला समजलं असतं की अॅनॉलॉजी व गोलपोस्ट बदलणे यातला फरक मी त्त्या धाग्यावर् खाली नमूद केलेला आहे. रशिया चे उदाहरण अॅनॉलॉजी म्हणून दिले होते.
पुनश्च - तुम्ही गोलपोस्ट चा धागा शोधून काढलात हे खरं आहे. पण ते चेंजिंग द गोलपोस्ट नाहीच्. ती अॅनॉलॉजी आहे. रशियाचे उदाहरण दिले होते मी.
--
प्रतिवाद करता येत नाही म्हणून "चालु दे तुमचं" सारखे डायलॉग्स मारू नका.
प्रतिवाद करायला शिका.
.
.
प्रतिवाद
तुमच्याशी प्रतिवाद करायला कोणालाच जमत नसावं. कारण मी जे म्हणलंय ते इथे अनेकांनी म्हणून झालेलं आहे. ते तुम्हाला आठवत नाही हे दुर्दैवी आहे. थोडंफार आत्मपरिक्षण करा हा अनाहूत सल्ला.
तुमच्या इतका मोकळा वेळ माझ्याकडे नसतो. तुमच्यासारखं, प्रत्येक वाचलेली बातमी इथे टाकायची अन कुत्सित टिप्पण्ण्या करायच्या आणी कोणी काही उत्तर द्यायला गेलं की काहीतरी वायफळ वाद घालत बसायचा हे करायला मला वेळ नाही.. त्यामुळे तुमच्या तोंडी फार लागण्यात अर्थ नाही. एकंदरीत तुम्ही आणि अनु राव यांनी चर्चेच्या धाग्यांची एकंदरीतच कचराकुंडी करून ठेवलेली आहे हे माझे मत आहे. असो.
-Nile
तुमच्या इतका मोकळा वेळ
मागे एकदा इथे म्हणालो होतो तेच परत म्हणतो.:
आता उदाहरणार्थ उडन खटोला, ग्रेट थिंकर वगैरेंच्या लेख/प्रतिसादांचा कोणी तावातावाने प्रतिवाद करायला जात नाही. गब्बर कसा प्रतिसाद देतो ह्यातही काही नवं नाही. तरी लोक गब्बरचा पुन्हा पुन्हा प्रतिवाद करायला जाऊन शेवटी प्रतिवाद करण्यात अर्थ नाही असं म्हणत राहतात!
कॉस्ट अॅनालिसीस
कशा विषयी काय लिहले आहे यावरून अनेकदा कॉस्ट अॅनालिसीस करावा लागतो. फारश्या गंभीर नसलेल्या विषयांवर व्यक्त केलेल्या हास्यास्पद मतांकडे मी सहसा दुर्लक्ष करतो. (उदा. अर्थशास्त्राबद्दल तोडलेले तारे वगैरे). पण काही सेंसीटीव्ह विषयांवर दिलेल्या मुळ प्रतिसादांचं सहसा (कोणी केलं नसेल तर) खंडन करतो. त्यानंतर जोवर फुटलेले फाटे विषयाला धरून आहेत तोवर ठीक अन्यथा सोडून देतो. मग प्रतिसादक कोणीही असो.
तरी प्रतिसाद का देतो? तर काहीवेळा, ज्यांना या विषयातले काहीच माहीत नाही त्या लोकांना दोन्ही बाजू कळाव्यात हा मुख्य उद्देश. (अर्थशास्त्राबद्दल त्यांना नाही कळलं तर फरक पडत नाही. पण रेसिसम, लिंगअसमानता वगैरे बाबत त्यांना कळण्यात मदत होत असेल तर मी वेळ खर्चायला तयार आहे.) मागे एकदा, उदाहरणार्थ, तुच दिलेल्या प्रतिसादाच्या वर खाली न'वीबाजूंनी "मग कशाला वा वा करून लाडावून ठेवता" (रिफ्रेज्ड) असे विचारलेले आहे. त्याच्या अर्थ काही लोक तरी अशा फोल प्रतिसादांना बळी पडतात हे दिसतंच. त्यामुळे हा उपद्व्याप. (मला ज्या विषयातलं कळत नाही त्या विषयांत इतरांनी अशीच खंडनं करावीत म्हणजे माझी कष्टं वाचतील असं मला मनापासून वाटतं. त्यामुळे मी तसे न करणं प्रामाणिक होणार नाही.) पण कुठेतरी सीमारेषा ठरवावी लागतेच.
माझे जर प्रतिसाद पाहीलेत तर साधारण हा ट्रेंड मी फॉलो करतो असे दिसेल. कधी कधी अर्थात कमी महत्त्वाच्या विषयावर केलेल्या मुर्खपणाला उत्तर दिल्याशिवाय राहवत नाही, पण ती उदाहरणं थोडीच आहेत.
-Nile
मिहिरशी सहमत आणि....
गब्बरच्या ट्रोलिंगसंदर्भात मिहिरशी सहमत; पण काही बाबतीत गब्बरच्या विषारी प्रतिसादांचा प्रतिवाद केला गेला पाहिजे, या बाबतीत सहमती. म्हणून मी स्वतःवर घालून घेतलेलं पथ्य - गब्बरला प्रतिसाद देताना एक मिनीटाच्या वर वेळ घालवायचा नाही. फडतुसांची तेवढीच पत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
प्रतिसाद आवडला.
खरंय.
गब्बर सिंग यांचा प्रश्न
गब्बर सिंग यांचा प्रश्न व्हॅलिड आहे.
परंतु त्या बाबतीत शहानिशा करायला जाण्यासाठी हिंदू व्यक्तीने मुस्लिमबहुल भागात घर घ्यायचा प्रयत्न करून पहायला हवा. हिंदू हे मुसलमानांना राक्षस समजत असल्याने मुस्लिमबहुल भागात घर मागायला जातच नसतील तर शहानिसा कशी करणार?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
असहमत
साठ्यांचा मुद्दा (त्या) अल्पसंख्यकांना 'समाजात' स्थान नाही असा आहे. तेव्हा त्यांना समाजात कसं सामावून घेत येईल हा मुद्दा आहे. थोडक्यात, इथे, जे बहुसंख्य आहेत ते हिंदू जरी असले तरी वेगवेगळ्या घटकांनी बनलेले आहेतच. त्यांच्या ह्यांनाही सामिल करा हा मुद्दा योग्य आहे. जरा ढोबळ उदाहरण द्यायचं तर, दलितांना विहीरवर पाणी घेऊ द्या असे कोणी म्हणल्यावर दलितांसाठी वेगळीच विहीर द्या की त्यापेक्षा असं म्हणण्यासारखं आहे. किंवा, जवळ जाणारं उदाहरण, अमेरिकेत काळ्या लोकांना (जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आणि ज्यांना वंशवादामुळे जाणीवपुर्वक वेगळे ठेवले गेले, त्यांच्याही अशाच वेगळ्या वस्त्या आहेत) गोऱ्यांच्या वस्त्यात काही राखीव जागा द्या (हे काल्पनिक नाही) असे कोणी म्हणल्यावर त्यापेक्षा गोर्या लोकांनीच काळ्यांच्या वस्तीत जाऊन बंगले बांधावेत असं म्हणण्यासारखं आहे. शिवाय, जरी समजा एच फॅक्टर असलाच तरी ते मागासवर्गीय/शोषित वगैरे आहेत. सामाजिक सुधारणा करणारे लोक ज्यांना सुधारायचं त्यांच्यात सुधारणा नाहीत म्हणून रडत नाहीत. ह्या सगळ्या कॉमनसेन्सच्या गोष्टी आहेत. ह्या इथल्या लोकांना सांगाव्या लागतात हेच दुर्दैवी आहे.
-Nile
तेव्हा त्यांना समाजात कसं
का सामावुन घ्यायचे? मोगलाई आहे का?
वेगळा मुद्दा
उगाच फाटे फोडू नका. मुद्द्यावर बोला. बाकी सद्ध्या जे काही चालू आहे ती मोगलाचीच चिन्हं आहेत.
-Nile
का सामावुन घ्यायचे ह्याचे
का सामावुन घ्यायचे ह्याचे उत्तर सापडत नसेल तर राहु द्या. बाकी चर्चेत रस नाही कारण मुळ कारणाचे उत्तरच मिळत नाहीये.
मुसलमानांचं राहू द्या पण
मुसलमानांचं राहू द्या पण कोणताही समाज घटक फार काळ मुख्य प्रवाहापासून तुटला तर काही काळानंतर हिंसक होऊ शकतो. ते परवडणारं नाही. चटके प्रत्येकाच्या ढुंगणाला बसणार. ( सध्याचं शेतकऱ्यांचं आंदोलन प्रासंगिक आहे )
गर्दीतला दर्दी
साठ्यांचा मुद्दा (त्या)
अनु राव यांचा मुद्दा अत्यंत समर्पक, मार्मिक आहे.
का समावून घ्यायचे ?
जैन, बौद्ध, शीख, ख्रिश्चन हे हिंदूंइतके तुल्यबळ आहेत का ? मग ? ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख यांना समावून घेतले गेलेच की. मग "नो एम फॅक्टर्" चा च जन्म का झाला ?
सामावून घ्यायच्या आणखी किती जबाबदाऱ्या हिंदूंवर लादणार आहात ?
त्यांनी देवळं पाडली, देश तोड्ला, देश फोडून झाल्यावर सुद्धा देशातल्यादेशात वेगळा पर्सनल लॉ राबवून देशांतर्गत् सॉफ्ट विभाजन केले, दहशतवादी कारवाया केल्या ... तरीही समावून घ्यायचं ?
का का ? का ?
.
.
धन्यवाद.
साठेंना अभिप्रेत असलेले राक्षस उभे करणारे म्हणजे नक्की कोण याचे उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याकडून हीच अपेक्षा होती.
-Nile
केविलवाणं उत्तर दिलंत.
केविलवाणं उत्तर दिलंत.
(माझी मुलगी मुंबईतील बोरीवली
(माझी मुलगी मुंबईतील बोरीवली येथील एका शाळेत शिकली. त्या शाळेत तिच्यासोबत गुजराती, मल्याळी, तमीळ, तेलुगू, हिंदी व क्वचित बंगाली अशी विविध भाषिक घरांमधून आलेली मुले होती. पण पहिली ते दहावी या दहा वर्षांच्या काळात एकही मुस्लिम मुलगा किंवा मुलगी तिच्या वर्गात नव्हती. तिच्या वर्गांच्या इतर तुकड्यांमध्येही कोणीही मुस्लिम नव्हते. तिच्या शाळेचे जाडजूड व रंगीत वार्षिक अहवाल प्रसिध्द होतात. विविध स्पर्धा किंवा नाटकाबिटकांमध्ये भाग घेतलेल्या मुलांची नावे-फोटो त्यात प्रसिध्द होतात. पण मला त्यात कधीही मुस्लिम नाव आढळले नाही.)
ईथं मदरशाचा ऊहापोह व्हायला हवा होता.
(या मुलांचे वाचन मर्यादित प्रकारचे आहे. हॅरी पॉटर वगैरे. त्यात मुस्लिम व्यक्तिरेखा येण्याचा प्रश्न येत नाही. माझी मुलगी मराठी वाचते. पण उध्दव शेळके, श्री. दा. पानवलकर, भारत सासणे, हमीद दलवाई या किंवा अशांच्या लेखनातील मुस्लिम पात्रांपर्यंत ती कधीतरी पोचेल की नाही याबाबत मला तरी शंकाच आहे.)
मी अभियांत्रिकी शिक्षक आहे, जेंव्हा एखादी संकल्पना मुलांना पटवून देण्यासाठी काही लेखांचे/लेखकांचे/प्रसंगांचे दाखले देतो, मख्ख चेहरे करुन पाहतात, त्यांना मराठी, इंग्रजी लेखकच जर माहित नसतिल तर एच अन् एम पात्र बित्र तर दूरच. बाकी सैफ, सलमान, शहारुख, अमिर अन् कैक पात्र माहित नाहित म्हणून बोंबला म्हणावं की. त्यांनी गझला, शायर्या पण कध्धीच आवडीनं ऐकल्या नाहीत ह्याचा पण पुरावा द्यावा. अन् आपण मुस्लीम पात्रांपर्यंत पोचायचा हट्ट का? त्यांनापण कितपत माहिती आहे दुसर्यांबाबत ह्याची उकल हवी.
(आपली नाटके, सिनेमे, साहित्य, मालिका इत्यादींमध्ये मुस्लिम या घटकाला आज जवळपास शून्य स्थान आहे. )
हि तर हद्दच झाली, किती मोठी लिस्ट द्यावी म्हणजे खरं वाटेल?
अन् फाटक्याची व्याप्तीतर खूप मोठीय.
भांबड आलं
का?
का? नक्की किती टक्के मुस्लिम विद्यार्थी मदरशांमध्ये शिकतात?
साठेंना हेच तर म्हणायचं आहे. मुलं जे भारतीय साहित्य वाचतात, ते पॉप छापाचं असतं. त्यात 'राज, नाम तो सुनाही होगा' असतात. पण 'इब्राहिम, नाम तो सुनाही होगा' नसतात. अभारतीय इंग्लिश साहित्यात मुस्लिम पात्रं नसतातच.
सैफ, सलमान, शहारुख, अमिर ही पात्रं नाहीत, हे नट आहेत. 'शाहरूख, नाम तो सुनाही होगा', हा माल सिनेमांतही विकायला येत नाही.
हाच तर साठेंच्या लेखनाचा गाभा आहे. लहान मुली-मुलांना सामान्य मुस्लिम माणसं कशी असतात हे माहीतच नसतं. कारण अशी माणसं त्यांच्या विश्वात कुठेच येत नाहीत. त्यांच्या विश्वात बातम्यांमध्ये, कुजबूज मोहिमांमध्ये राक्षसी दाखवले जाणारे मुस्लिमच असतात. पाकिस्तान हा बोलूनचालून 'शत्रू' देश. त्यांचा धर्मच मुस्लिम. पण पाकिस्तानशी भारताचा व्यापार चालतो, अशा गोष्टी मुलांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे 'काही मुसलमान अतिरेकी असतात आणि बहुसंख्य मुसलमान आपल्यासारखेच सामान्य नागरिक असतात', असं नॉर्मल चित्र मनात तयार होण्याऐवजी 'मुसलमान म्हणजे राक्षस' अशी प्रतिमा तयार होते.
समजा कोणी आपल्या अभ्यासाचा विषय 'मराठी चित्रपटातली नोकर पात्रं' असा निवडला, तर त्यांना 'पण तमिळ सिनेमा बघा की' असं म्हणण्यात काही हशील नाही. 'मराठी चित्रपट' हा संपूर्ण संच (complete set) आहे. तसंच साठेंच्या आस्था/लेखन विषयाचं. 'हिंदू विद्यार्थ्यांच्या मनातली मुस्लिम माणसांची प्रतिमा' असा विषय त्यांनी निवडला आहे. ज्यांना दुसऱ्या विषयात रस आहे, त्यांनी त्याचा अभ्यास करावा.
(धागा हलवताना प्रतिसाद गायब झाल्यामुळे पुन्हा टंकला आहे.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लहान मुली-मुलांना सामान्य
बेडकाला वाटतं हे डबकं म्हणजेच जग आहे, संपलं. प्रातिनिधिक आहे असं म्हणून तेवढी safe side करुन घेतली म्हणजे झालं का? शितावरुन भाताची परीक्षा करताना शेजारच्या भांड्यातला भात तेवढाच शिजलेला असेल का?
भांबड आलं
किती टक्के मुस्लिम मदरशांमध्ये
सच्चर समितीचा अहवाल इथे पाहता येईल. त्यात पान क्रमांक ७६वर दिलेल्या आलेखानुसार पश्चिम भारतात केवळ १ ते ४ टक्के मुस्लिमधर्मीय मुलं मदरशांत जातात. 'मदरशाचा ऊहापोह व्हायला हवा होता' अशी मागणी करून प्रतिसादकर्ते दस्तुरखुद्द लेखकाचाच मुद्दा सिद्ध करत आहेत. त्यामुळे त्यासाठी त्यांचे आभार.
(आतापर्यंत कुणी तरी ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल अशी मला आशा होती, पण ते असो.)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पश्चिम भारत सोडून उरलेल्या
पश्चिम भारत सोडून उरलेल्या भारताचे काय? झालंच तर क्वांटिटी आणि क्वालिटीमधला फरक असतो त्याचे काय?
एकूणच हा लेख म्हणजे हॉगवॉश आहे. स्वत:चे अनुभव इतरांवर आरोपित करू पाहण्याचा प्रकार.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सच्चर अहवाल
फक्त ११ वर्ष जुना अहवाल संदर्भाकरीता दिला त्याबद्दल धन्यवाद!
पुन्हा एकाच भागाबद्दलचं चिंतन. बादवे लेखकानुसार एम फ्याक्टर शाळेत एच फ्याक्टर किती ह्याचा ऊहापोह पण हवा. असो आपण जुने statistics कुरवाळत बसुयात.
भांबड आलं
शिवाय मदरश्यांत हिंदू शिक
शिवाय मदरश्यांत हिंदू शिकत नाहीत असेही नाही.
http://www.thehindu.com/news/cities/kolkata/when-a-hindu-girl-made-a-mad...
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
लहान मुली-मुलांना सामान्य
माफ करा, पण हे कसं शक्य आहे? मुस्लिम लोक आजिबातच नजरेस पडणं हे जमवून आणणं अशक्य आहे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
मुस्लिम = आतंकवादी हे
मुस्लिम = आतंकवादी हे फेसबुकने आणि इतर मीडियानेही काही प्रमाणात लहान मुलांच्या अगदी सबकॉन्शसपर्यंत पोचवलं आहे.
गर्दीतला दर्दी
जर दोघेही एकमेकांना राक्षस
जर दोघेही एकमेकांना राक्षस मानायचं बंद केलं तर त्याचा तोटा निवडणूक काळात होईल, माझंही काही वर्षांपूर्वी राक्षस वालीच मते होती परंतु बंगळूर ला असताना एक तिरुपती चा मुसलमान होता. त्यानी माझं मतपरिवर्तन झाल
आपली नाटके, सिनेमे, साहित्य,
हे 'काहीही हं' टाईपचे आहे. जेवढी मुस्लिमांची लोकसंख्या आहे तितके प्रतिनिधीत्व निश्चितच आहे. रंगा पतंगा, इक्बाल,(सिनेमे) हम तो तेरे आशिक है(नाटक), कुबुल है(मालिका) हे चटकन आठवलेले.
आणि राहता राहिला मुस्लिमांना राक्षस वगैरे समजण्याचा विषय. मी एका खेड्यात वाढलो, अक्षरश्: एकदादेखिल मुस्लिम समाजाविषयी वाईट साईट बोललेलं ऐकलं नाहीये. जवळजवळ सगळ्या उत्सवात मग गावची यात्रा असो वा कुस्तीचा फड, सण उत्सव मुस्लिमांचा सहभाग असायचाच, तसेच मोहर्र्म, बकरी ईद, रमजान ईद सगळ्याच सणांत हिंदू लोक जमके सहभागी व्हायचेच्. आमच्या वर्गात किमान दोन तरी मुस्लिम मुले असायचीच, ती आमच्यासारखीच शिव्या द्यायची, भांडायची, स्नेहसंमेलनात नाचायची, देवळात पाया पडायला यायची, आम्हीदेखिल मशिदीत जायचो. खरोखर कधीही, कुठेही मुस्लिम म्हणून काही करण्यापासून अडवलंय असं झालेलं नाही. माझे मित्र आश्फ्या, नाझी, तिचा भाऊ शहब्या, इमऱ्या, आस्मी ही सगळी मंडळी माझ्या लहाणपणी आणि आजदेखिल तितकेच चांगले मित्र आहोत. (हो, आणि मी उखाजा काळात जन्मलेला व वाढलेला मुलगा आहे.)
साठे सांगताहेत ते खरोखर अतार्किक आणि केवळ स्वत्:च्या दृष्टीकोनातून केलेलं भडक चित्रण वाटलं.
आता साठेंचं काय करायचं?
उ.- साठेंना बोरिवलीत बाहेर पडून मसूर, माळशिरस, गोंदिया, चिखलदरा, वडगावं(महाराष्ट्रातील सगळी) फिरून मुस्लिमांच्या स्थितीचे अवलोकन, अभ्यास करायचा उपदेश करायचा(फुकटचा..)
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
डोक्यावर पडलाय राजेंद्र
डोक्यावर पडलाय राजेंद्र साठ्ये. स्वत: हिंदू सोसायटीत राहून, मुलीला फक्तं हिंदू असलेल्या शाळेत घालून दुसऱ्यांना उपदेश करत फिरतोय्. शिवाय मुंबई म्हणजे प्रातिनिधिक उदाहरण नव्हे. त्यांनी निमशहरी, गावातल्या भागात जाऊन बघावं, ते प्रातिनिधिक ठरेल्. कुपमंडूक राहून् उगाच बहुधा सगळीकडे असेच घडतेय असे म्हणू नये. गावोगावच्या मुस्लीमांची स्थिती काय आहे किंवा त्यांना काय वाटते हे बघायची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून महाशय निष्कर्श काढून मोकळे पण झालेत्.
-अनामिक
पुम्बा तुम्ही म्हणताय तशी
पुम्बा तुम्ही म्हणताय तशी परिस्थिती ग्रामीण महाराष्ट्रात आहे हे खरेच आहे (मी हि अनुभव घेतलाय ) , तरीही मोठ्या शहरांमध्ये सध्या साठे म्हणतात तशी च परिस्थिती आहे .
बोरिवली च्या बाहेर पडून साठेंना बघण्याचा सल्ला गमतीशीर वाटतो . कारण "मसूर, माळशिरस, गोंदिया, चिखलदरा, वडगावं(महाराष्ट्रातील सगळी), त्यात मी संगमनेर चे नाव वाढवतो "इथे तुम्ही म्हणताय तशी परिस्थिती असली तरी मोठ्या शहरांची लोकसंख्या किती जास्त आहे या सगळ्या गावांपेक्षा ? तिथले वास्तव ग्रामीण भागात तशी परिस्थिती नाही म्हणून नाकारायचे का ?
आण्णा, शहरात धार्मिक तेढ
आण्णा, शहरात धार्मिक तेढ जास्त आहे हे मान्यच आहे. खेडोपाडी ज्या प्रमाणे हिंदू मुस्लिमांना रोज उठून एकमेकांचे तोंड बघावेच लागते, वचावचा भांडलं तरी परत देणं-घेणं, आर्थिक व्यवहार करावेच लागतात तसं शहरात होत नाही हे याचं कारण आहे. मुद्दाम कुणी तरी हे करत आहे, घडवून आणतंय वगैरे farfetched वाटते. हा सरळसरळ आर्थिक परावलंबित्व कमी जहल्याचा परिणाम आहे. शिवाय वेगवेगळ्या शहरात गेलात वेगळे रूप आढळेल या प्रश्नाचे.
माझ्या मते, धार्मिक तेढ कमी करण्याचा एकच उपाय आहे. धर्माचा समाजावरचा पगडा कमी कमी करत नेणे. ओशो म्हणतो त्याप्रमाणे 'लोकांनी धर्म सोडणे आणि धार्मिक होणे'. आणि हे होणार आहे याचा विश्वास वाटतो.
अर्थात गावे धार्मिक बाबतीत जरा सहिष्णू असली तरी जातीच्या बाबतीत कट्टर असतात याउलट शहरात जातीवाद बऱ्यापैकी कमी असला तरी धार्मिक मुलतत्ववाद जोरोंपर असतो.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
नक्की किती जास्त आहे लोक
नक्की किती जास्त आहे लोकसंख्या? अख्ख्या महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटीच्या आसपास. पैकी मुंबईला २ कोटी द्या. उरलेल्या ९ कोटींचे काय करायचे? आणि हा निव्वळ नंबर गेम आहे का? शिवाय त्या २ कोटींपैकी देखील किती लोकांकरिता लेखकाचा अनुभव व्हॅलिड आहे? हे प्रश्न उडवून लावण्यासारखे नक्कीच नाहीत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बॅटमॅन , मुबई तू पकडलीस २
बॅटमॅन , मुबई तू पकडलीस २ कोटीची , पुणे पिंचिं धरून पकड ७० लाख . बाय डिफॉल्ट हे २ कोटी सत्तर लाख सोडून उर्वरित जंतेमध्ये धार्मिक सलोखा असून साठे म्हणतात तसं काही नाही .. असे म्हणायचंय का तुला ? ( सालं अभ्या च मत घ्यायला पाहिजे . त्याच्या इथे सगळं ठीक ठाक असेल असं वाटतं , त्याच्या लिहिण्यावरून . उगाचच . कुठं गायब आहे अभ्या सध्या ? )
सगळीकडे ठीक असण्याचा
सगळीकडे ठीक असण्याचा मुद्दाच नाहीये.
मुसलमान जणू आसपास कुठे दिसत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रगाढ अज्ञान आहे असा जो सूर आहे त्याबद्दल म्हणतोय. बहुतेक ठिकाणी मुसलमानांचे सान्निध्य आहे. आसपास थोडे मुसलमान असणे ही एक नॉर्मल कण्डिशन आहे. तेव्हा लेखकाच्या मुलीच्या शाळेतील परिस्थितीच सगळीकडे आहे असे धरून जे रडगाणे लावलेय त्याचा कण्टाळा येऊ लागलाय आताशा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मुस्लिम मराठी संस्थळावर तरी दिसत नाहीत.
सगळं जाऊद्या ऐसी अक्षरेवर किंवा एकूण मराठी संस्थळावर किती मुस्लिम आहेत ?
गर्दीतला दर्दी
हारुन शेख नामक गृहस्थ ऐसीव
हारुन शेख नामक गृहस्थ ऐसीवर अधूनमधून दिसतात/दिसायचे. बाकी कोणी आठवत नाही.
सगळं जाऊद्या पण याने काय सिद्ध होतं?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
' मुसलमान आसपास बऱ्यापैकी
' मुसलमान आसपास बऱ्यापैकी दिसतात' असा दावा करतांना आपल्या आसपासच्या वर्तुळात चटकन पाहायला गेलं तर एक्का दुक्का लोकच दिसतात असा मुद्दा होता.आणि दिसली तरी आपला आणि त्यांचा किती संवाद आहे. फक्त मुसलमानांचं दिसणं म्हणजे ते सहभागी आहेत असं वाटत नाही.
गर्दीतला दर्दी
मआंजामध्ये एक्का दुक्का दिस
मआंजामध्ये एक्का दुक्का दिसणारे लोक अन्यत्रही एक्का दुक्काच दिसतात वगैरे अझूम करणे उदाहरणार्थ रोचक वगैरे आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तेव्हा लेखकाच्या मुलीच्या
त्यांच्या अनेक आरडाओरडीचा कंटाळा येऊ लागलेला आहे.
(१) We are tired of apologizing for the terrorism carried out by the few amongst us
(२) We are tired of apologizing for the partition. We chose to stay in this country (as opposed to going to Pakistan) etc etc.
(३) We are sick and tired of the identity politics
ही त्यातली काही वाक्ये.
ही सगळी वाक्ये म्हंजे "आम्ही दुष्कृत्ये केली तरी व तुम्हाला आमचा त्रास झाला तरीही तुम्ही आमची क्षमा मागावी कारण तुम्ही मेजॉरिटी आहात व तुम्ही लार्ज्-हार्टेड, सहिष्णु असायला हवं" = असला घिलौना प्रकार आहे.
लेख वाचला. काही निरीक्ष
लेख वाचला. काही निरीक्षणांत तथ्य आहे हे नाकारता येत नाही. (उदा० शाळांमधले घेट्टोआयझेशन.)
पण लेखाच्या शेवटी जो "बुवा आला बुवाऽऽऽ"चा सूर लावला आहे तो अनावश्यक आणि वाजवीपेक्षा जास्त रडकट आहे असं वाटतं. जणू काही सदरहू पोरं कायमच बोरिवली - कांदिवली - सदाशिवपेठ - दादर भागात राहणार आहेत आणि समोरून गोल टोपी येताना दिसली की एकतर त्रिशूळ तरी काढणार आहेत किंवा पार्श्वभागी पाय लावून पळायला लागणार आहेत.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
सहमत. आधी गुजराथी/जैन वि
सहमत. आधी गुजराथी/जैन वि. इतर लोक अशा घेट्टोजच्या बातम्या यायच्या. आता हिंदू मुसलमान अशा येतात एवढाच काय तो फरक. भारतासारख्या, अस्मितांना जरा जास्तच महत्व असणाऱ्या देशात आणि त्यातही मुंबईसारख्या मोठ्या शहरांत अशा इमारती/सोसायट्या असणं आच्चर्यकारक मुळीच वाटत नाही.
सहमत आहे
'जैनम जयति शासनम' वाल्यांनी भरपूर कट्टरता माजवलीय
गर्दीतला दर्दी
बरीच स्वीपिंग वाक्ये
बरीच स्वीपिंग वाक्ये टाकल्याने लेख अतिशय सुमार झाला आहे. केवळ लेखक ज्या वातावरणात राहतो त्याची रेप्लिका असलेल्याच तो पटेल, पण अशा व्यक्तिला तो पटला तर परत लेखकाची भिती निराधार आहे हे सिद्ध होईल.
http://rightangles.in वर जावून लेख वाचल्यावर आपण मांडत असलेल्या मुद्द्यांबाबत लेखक खरंच संवेदनशील आणि जागरुक आहे का नाही असे वाटले. माध्यमे आणि मालिकांमधील मुसलमानांचे खलनायकी चित्रण त्यांना खटकते - पण या लेखात डकवलेली तीनपैकी दोन चित्रे हिंसक आहेत. हे टाळायला हवे होते. लेख वाचताना एखाद्याला आपला एखादा जुना मुसलमान मित्र आठवून वाटेल - खरं आहे हां साठे म्हणतात ते, वेगळे पडत चालले आहेत मुसलमान. पण साठे म्हणतात तशा वातावरणात वावरलेल्या लोकांसाठी त्यांनी रेफ़ेरन्स चित्र काय दिले आहे तर - उन्मादाने ओरडणार्या माणसाचे आणि बंदुका घेतलेल्या दाढीवाल्यांचे.
सिनेमाचा मुद्दा तर स्वत:च्या पायावर दगड आहे - वर्षानुवर्षे हिंदी सिनेमात चांगल्या व्यक्तिरेखा मुसलमान दाखविल्या गेल्या आहेत, त्यातही महत्वाचे म्हणजे त्या व्यक्तिरेखा असे बिंबवत की - मुसलमान असल्याने ही व्यक्ति चांगली आहे. अरे मै सच्चा मुसलमान हू, वगैरे म्हणून प्राण मदत करायचा ना हिरोला? जरी एखादी मुसलमान व्यक्तिरेखा वाईट आहे असे सिनेमात दाखविले तरी त्याच सिनेमात नक्कीच चांगला मुसलमान इन्स्पेक्टर असतोच - सरफरोशमधे सलीम, शिवाय संजूबाबाचा इन्स्पेक्टर खान लगेच आठवले. रोमॅंटीक सिनेमात मुसलमान व्यक्तीरेखा नसतात का? माय नेम इज खान, एक था टायगर, बजरंगी , फॅंटम वगैरे मधे होत्याच की.
पानीपत वगैरे तर उगाच ओढूनताणून आणले आहे, आमच्या माहितीतले संघवाले, लोकं पोरांना आपण हिंदू हिंदू असे दिवसरात्र सांगायचे त्यातली निम्मी मुलं सध्या बिर्याणी चापतात, आणि रमजान आल्यावर ऑफिसमधल्यांना, बोलाव यार एकदा घरी असे म्हणातात. आणि शाळेत कधी मशिदीकडं न फिरकणारे मित्र दिवसातून तीनदा नमाजाला जातात. वैयक्तिक उदाहरणे दिली तर कुठलाच मुद्दा सिद्ध होत नाही. लेखाची सुरुवातच अशा प्रकाराने झाली आहे. मुलांना अकबर बिरबल, मुल्ला नसरुद्दीन, सिंदबाद अशा गोष्टीतून मुसलमान म्हणजे राक्षस नाहीत अशी जाणीव होत असतेच की.
मुंबईबाहेरच्या शाळेत असेच होते हा निष्कर्षाला काही आधार नाही, माझ्या माहितीत - पुण्यात बर्यापैकी कॉस्मॉपॉलिटन असलेल्या भागातील शाळेत, वीस जणांच्या तुकडीत ४ मुसलमान मुले आहेत. अशा आकडेवारीनुसारच सगळीकडे प्रमाण असेल असे नाही पण आकडेवारीशिवाय असली विधाने करू नयेत.
घेट्टो वाला मुद्दा मांडून त्याची कारणमीमांसा स्पष्ट करणे, हे टाळण्यासाठी काय करता येईल असे मांडले असते तर बरे झाले असते
त्यांनी मांडले नाही म्हणून तक्रार नाही, पण तसे न केल्याने लेखाला एकांगी सूर आला आहे, च्यायला, हिंदू लोकांनी फारच बाबा यांना वाळीत टाकले आहे अशी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. असल्या लेखांमुळेच कुंपणावरचे लोक भाजपला मत देतात.
+१
अतिनेमके! तेव्हा भाजपाला मदत करायची असेल तर असे लेख अवश्य लिहावेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पटला पण
लेखात वास्तव सांगितलंय, ते बहुतांशवेळा लहानपणापासून स्वत: अनुभवल्यामुळे पटतं. काकांचं घर भाड्यानं देताना मुस्लीम जजला कसं डावललं याचं बरंच खुमासदार वर्णन आजही घरी चघळंलं जातं. नो एम फॅक्टर हा माझ्या खाजगी कंपनीत, सोसायटीत तंतोतंत पाळला जातो. गमंत अशी की कंपनीचालक हे टोकाचे ब्राह्मणद्वेषी आणि तुलनेने डाव्या बाजूचे आहेत.(त्यांना अलिकडले लोकसत्तेचे कुबेरी अग्रलेख पटतात).
मुस्लीमद्वेष्टा हा उजवाच असतो हे अजिबात पटत नाही.
रिचर्ड डॉकिन्स मुस्लिमफोबिया झाल्यासारखा ओरडत असतो. तो उजवा नाही. अब्राह्निक धर्मांना नावे ठेवणाऱ्या डाव्यांना कुठे मुस्लिमद्वेषात बसवतात हे तपासाण्यासारखं आहे.
प्री-बीजेपी सरकारं होती तेव्हा त्यातून मुस्लिमद्वेष नव्हता असं नव्हे हे कोणीही मान्य करेल. याला भारतीय मुस्लिम लोक स्वत: जबाबदार नाहीत हे कसं नाकारता येईल? आजच्या भारतीय मुस्लिमांना मध्य-पूर्वेतले प्युअर मुस्लिम होण्याचे वेध का लागतात? वैविध्य नाकारणाऱ्या अब्राहमिक धर्मांनी भारतीय समाजात मिसळून जाताना ज्या तडजोडी गेले काही शतके केल्या त्यांना माहितीसंपृक्त जगात धक्के लागणार आणि त्यांचे काल्पनिक आदर्श स्वरूप कुणी ना कुणी ठसवत राहणार. आज ते आयसिस करेल उद्या कुणीतरी दुसरे. भारतीय वैविध्यावर जशी इस्त्री फिरेल तशी ते आपल्या धर्मांबाबतही होईल. पण अजुनतरी आपल्यात भिंती आहेत हे जरा बरं आहे.
लेख अपूर्ण वाटतो. काही वाक्यं खरोखरीच स्वीपींग आहेत.
>>. या अवस्थेची पुसटशी छायादेखील आपल्या माध्यमांमधील चर्चा किंवा कलाकृती इत्यादींमध्ये दिसत नाही.<<
हे काहीकेल्या पटत नाही. अगदी परेश रावल सुद्धा धर्म संकट मे सारखा चित्रपट करतो(!).
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
प्रतिसाद आवडला.
रिचर्ड डॉकिन्सबद्दलतर शतशः सहमत. डॉकिन्ससारखे विषारी लोक फार दिसत नाहीत, किंवा नील डीग्रास टायसनसारखे असतात, याबद्दल (अस्तित्वात नसणाऱ्या) देवाचे आभार मानावेत तरी किती!
लेखाच्या शेवटी, धावतधावत का होईना, मुस्लिम 'तरुणाई'वर थोडी जबाबदारी टाकली आहेच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
असहमत
असहमत आहे. 1. डॉकिंस सर्वच धर्मांबाबत तसाच ओरडतो. 2. डॉकीन्स नुसता ओरडत नाही तर हे प्रश्न किमान नीट समजून घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न तो करतो. हे एक उदाहरण: https://www.youtube.com/watch?v=-8b3vhTO248
डावे-उजवे गोंधळ: मायनॉरीटीज ना सपोर्ट करताना त्यांच्यातील वाईट चालीरीतींनाही सपोर्ट करण्याची चूक डावे लोक कधीतरी करताना दिसतात. (उदा. मध्यंतरी अमेरीकेत शाळेतल्या काही मुली (मुसलमान नसलेल्या) त्या बुरखा घालून शाळेत गेल्या वगैरे.) मुस्लिमांतील वाईट प्रथांना विरोध केल्यास लगेच इस्लामोफिबीया म्हणून ओरडण्याची घाई डाव्यांनी करायला नको असे मला वाटते. तो खरंच इस्लामोफिबीया आहे का अंधश्रद्धा, दैववाद वगैरे भोंदूगिरीला विरोध आहे हे पाहून तदनुषंगाने टिका केली पाहीजे.
डॉकीन्स, हॅरीस, लॉरेन्स क्राऊस वगैरे लोक जगभरात जाऊन मुस्लिम धार्मिक नेत्यांशी (रिलीजस लिडर्स) डिबेट वगैरे करतात. त्याच प्रकारे ते चर्च वगैरे मध्ये जाऊन ख्रिश्चन धार्मिक नेत्यांशी सुद्धा करतात.
-Nile
+१
डॉकिन्स त्या बाबतीत ईक्वली ओरडतो. ल्यूस इरिगारायची साले निघाल्यावरचा विषारी आरडाओरडा अजूनही स्मरणात आहे. बहुधा त्याच रागातून डॉकिन्सला विरोध होत असावा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आभार.
माझा मुद्दा सिद्ध करण्याबद्दल आभार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मेरे मू की बात छीनल्याबद्द
मेरे मू की बात छीनल्याबद्दल आभार!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सुधारणेच्या आवश्यकतेच्या जाणीवेचा अभाव.
ख्रिश्चन आणि हिंदु ह्या दोन्ही धर्मांमध्ये जे आत्ताच्या दृष्टीने जे कालबाह्य विचार होते ते कालबाह्य आहेत आणि त्यांना आता टाकून दिले पाहिजे असे उघडपणे म्हणण्याचे धैर्य ह्या दोन्ही समाजांच्या मोठ्या गटांमध्ये आता आलेले आहे. ह्या दोन्ही समाजांतील आणि विचारांतील प्रतिगामी आणि कालबाह्य वृत्ति पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत असे नाही परंतु अशा प्रतिगामी आणि कालबाह्य वृत्ति पूर्णपणे नष्ट झाल्या पाहिजेत असे उघडपणे म्हणू शकणारा मोठा वर्ग अस्तित्वात आलेला आहे आणि त्याची संख्या दिवसेदिवस वाढत आहे.
ह्याच्या उलट स्थिति मुस्लिम समाजात आहे आणि ती केवळ भारतातील मुस्लिमांच्यात आहे असे नाही तर जगभरच्या मुस्लिमांच्यात आहे. पैगंबराच्या शिकवणीचा पुष्कळसा भाग ७व्या-८व्या शतकाला लागू होता पण आज तो तसा नाही असे उघडपणे म्हणण्याचे धैर्य दाखवू शकणारे किती मुस्लिम आहेत?
असे उघड बंडखोर जेव्हा मुस्लिमांमध्ये मोठ्या संख्येने दिसू लागतील तेव्हा अन्य समाजांची त्यांच्याकडे पाहण्याची
दृष्टि निवळू लागेल. शाहबानोसारखे प्रश्न जेव्हा उभे राहतात तेव्हा सुशिक्षित मुस्लिम उठून उभे राहण्याऐवजी गुळमुळीत बचावाचे धोरण अवलंबितात.
अयोध्या प्रकरणामध्ये मुस्लिम समाजाने एकोपा निर्माण करण्याची मोठी संधि गमावली असे मला वाटते. रामाचा जन्म तेथेच झाला का नाही हा प्रश्न नाही पण तेथे झाला अशी हिंदूंची श्रद्धा होती आणि म्हणूनच तेथील मंदिर तोडून बाबराने तेथे सत्तेच्या जोरावर मशीद उभारली. हे त्याने चुकीचे केले असे कोणी मुस्लिम उघड म्हणण्यास तयार आहे का? असल्या पूर्वीच्या अन्यायांची उघड कबुली जर मुस्लिम नेतृत्वाने दिली तर वातावरण निवळू शकेल पण अशी कबुली कोणा मुस्लिमाने कधी दिली आहे काय?
+१
जोपर्यंत मुस्लिमांतूनच उघड बंडखोर दिसत नाहीत तोपर्यंत हे चालायचंच.
मुस्लिमांनी स्वत:हूनच आपल्या धर्माच्या नावावर चालणारे फालतू उद्योग बंद करायला पुढाकार घ्यावा.
======
बाकी लेख थोडा लोल पातळीवर गेला आहे. चित्रपट वगैरेबद्दल बोलताना तर फारच म्हणजे अगदीच काहीही.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
अशी मते व्यक्त केली तर
अशी मते व्यक्त केली तर घाऊक हिंदुत्ववादी म्हणून शिक्के मारतात आजकाल. मारोत बापडे, तेवढंच दिसतंय त्यांना त्याला इलाज नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अशी मते व्यक्त केली तर
ऑ ?
का ओ ??
असे शिक्के मारले जाणे हे ज्याच्यावर शिक्का मारला गेलाय त्याची अप्रतिष्ठा, बदनामी असल्यासारखं का बोलताय तुम्ही ?
हिंदूवादी हे मिरवण्यासारखे बिरुद आहे.
विशिष्ठ आयडेंटिटी असलेल्यांच्या हितसंबंधांचा समर्थक. फक्त ती आयडेंटीटी हिंदू आहे म्हणून तो समर्थक बदनाम ?? कसाकाय ?
.
.
.
अगदिच लागू नै पण revision
अगदिच लागू नै पण ह्याची revision केली तर थोडा उजेड पडू शकतो
भांबड आलं
अगदिच लागू नै पण revision
अगदिच लागू नै पण ह्याची revision केली तर थोडा उजेड पडू शकतो
भांबड आलं
हा व्हिडिओ पाहिला नुकताच.
हा व्हिडिओ पाहिला नुकताच. ह्यात सत्य किती आणि अपप्रचार किती कोण जाणे?
पण हे वा तत्सम पाहणारे / ऐकणारे लाखो लोक असतात.
मुसलमान फक्त १४% आहेत . प
मुसलमान फक्त १४% आहेत . पण चांगले २५-४०% असल्यासारखे वाटतात. मला मात्र हे लेखकच राक्षस असल्यासारखे वाटले. कुठे राहतो देव जाणो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अजोशी सहमत. ते टक्केवारी
अजोशी सहमत. ते टक्केवारी वगैरे सोडून सोडा पण लेखक क्रॅक आहे यात शंका नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+/-
बोले तो, लेखक क्रॅक असण्यास प्रत्यवाय नाही, परंतु अजोंचा टक्केवारीचा मुद्दा अगदीच विनोदी आहे.
आता आमची१ भटे नाहीत काय, जेमतेम ३|| टक्के असून चांगली वैश्विक मेजॉरिटी असल्यासारखी वागत? मग मुसलमानांनी जर त्यांचा कित्ता गिरविला२, तर नेमके काय बिघडले? मुसलमानांनीच तेवढा कोणता अश्वमेध केला आहे? अहो, थिंकिंग बिग म्हणतात त्याला!
..........
१ प्लीज नोट.
२ यात मुसलमानांवर प्लेजियरिझमचा आरोप करण्याचा उद्देश नाही. कदाचित तो मुसलमानांचा इंडिपेंडंट आणि ओरिजनल थॉटही असू शकेल, जो योगायोगाने इतरत्र एकसमयावच्छेदेकरून (परंतु स्वतंत्रपणे) भटांसही आला, या शक्यतेशी आमचे काही वाकडे नाही. पण यातून केवळ ग्रेट माइंडस थिंक अलाइक / फूल्स सेल्डम डिसग्री२अ एवढेच फक्त पुराव्याने शाबीत होत नाही काय?
२अ टेक युअर पिक. ग्रेट माइंड्स सेल्डम डिसग्री विथ फूल्स आणि/किंवा फूल्स अँड ग्रेट माइंड्स ऑफ्'न/ऑफ्टन२ब थिंक अलाइक याही शक्यता जमेस धरण्यास आम्हांस प्रत्यवाय नाही.
२ब ऑफ्'न/ऑफ्टन वादात पडू इच्छित नाही. काय वाटेल ते म्हणा. सत्यदेव म्हटले काय किंवा सत्यनारायण म्हटले काय, शेवटी मुसलमानी परंपरेकडून ढापलेला देव. किंवा वाघ म्हटले काय नि वाघोबा म्हटले काय, खायचा सोडत नाही तो नाहीच. असो.
मलाही तेच म्हणायचं आहे. भ
मलाही तेच म्हणायचं आहे. भटे फक्त ३.५% आणि पण दिसतात ठळक. पण तेच मुस्लिमांचं आहे. पण बाकिचे हिंदू गरीब बिचारे जास्त असूनही दिसत नाहित.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
निकष
14% वाटण्याचे आणि 25-40% वाटण्याचे तुमचे निकष काय आहेत हे जरा सांगता का? वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे घटक वेगवेगळ्या प्रमाणात राहत असल्याचा अनुभव मी काही वेळा घेतला आहे. आजवर तरी कोणीतरी मला इतके इतके % असल्यासारखे वाटतात हे खात्रीने सांगता आलेले नाही. (बाकी, वैश्विक ज्ञान असणार्या अजोंना पर्सनल बबल बद्दल सांगण्याची आवश्यकता नसावी.)
-Nile
क्रायटेरिया
सर्वसाधारणपणे सर्वत्र भेटणारे लोक. ७-८ मधे १ मुसलमान भेटला पाहिजे (तसं तर हिंदू सवर्ण लोकांनी जी सोशल स्पेस ऑक्युपाय केली आहे नि मुस्लिम जितके मागास आहेत ते पाहता १५ मधे १ मुस्लिम भेटला पाहिजे.)
=============================
बाकी मला वैश्विक मुद्द्यांवर बोलायला आवडतं म्हणजे मला सगळं द्न्यान आहे असं नाही. आपला ले मॅनचा चोमडेपणा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सर्वसाधारणपणे सर्वत्र
हे लॉजिक फार काही बरोबर नाही.
१. शिख भारतात २ टक्के आहेत पण मला रोज जे १०००, २००० लोक दिसतात त्यात २०/४० शिख नसतात्.
२. तसेच जैन लोक भारतात खुपच कमी आहेत, तरी पण मला रोज दिसणाऱ्या लोकांमधे जैन लोकांची संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा खुप जास्त असते.
बाकी मला वैश्विक मुद्द्यांव
काय सांगता, मला वाटले ते काठी घेऊन उपग्रह सोडणारे अजो म्हणजे ऋषींनंतर एकटेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बाकी ठिकाय , पण तो मुसलमानी
बाकी ठिकाय , पण तो मुसलमानी प्रम्प्रेतून ढापलेला कोण तो नारायण का देव , याबद्दल जरा जास्त सांगाल का ? ( आम्हालाही तेवढेच उसन्या ज्ञानावर साडे शहांणो * चे प्रबोधन घेता येईल ) * बाकी साडे शहांणो हा शब्द स्फोटक ठरणार बहुधा .
नारायण वेगळा अन सत्यनाराय
नारायण वेगळा अन सत्यनारायण वेगळा. कुठलातरी बंगालातला पीर होता त्याचा सत्यनारायण झाला असे म्हणतात. कधी पाठपुरावा नै केला त्याचा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
...
तोही गेल्या दोनएकशे वर्षांत म्हणे. अर्थात, आमचीही माहिती याहून अधिक खोलातली नाही, नि पाठपुरावा आम्हीही केलेला नाही. कदाचित अर्बन लीजंडही असू शकेल. परंतु लीजंड अर्बन असो वा रूरल, इंटरेष्टिंग आहे, एवढे निश्चित. (सत्यनारायणाची 'लीजंड' उर्फ कथा, ऑन द अदर हँड, निव्वळ हॉरिबल आहे.)
गरजूंनी 'सत्यपीर' असे गुगलून पाहावे.
तरीच म्हणतो साला सत्य
तरीच म्हणतो साला सत्यनारायण या देवास नेहमी बदाबदा बदडावे असे का वाटते! इतकी घाणेरडि कथा धार्मिक कशी असं नेहमी वाटायचं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बरी आहे की हो कथा.
बरी आहे की हो कथा. साधुवाण्याच्या सगळ्या लीळांची समरी म्हणजे "भाऊंशी वाकडं तर नदीवर लाकडं".
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
'साधू की वाणी' हा प्रश्न म
'साधू की वाणी' हा प्रश्न मला नेहमी पडायचा ही कथा ऐकताना. माणूस दोन्हीपैकी एकच काही तरी असू शकतो असं मला वाटायचं. ही शंका एका भडजींना विचारली तर ते म्हणाले साधू हे त्या वाण्याचं नाव होतं. म्हादू, सदू तसं साधू. पण साक्षात सत्यनारायणाला गंडा घालणारा सा. वा. डेंजर आहे.
अवांतर: सत्यनारायणाच्या पुजेचे स्तोम ग्रामिण महाराष्ट्रात घरोघरी(विशेषत्: बहुजन समाजात) पसरण्यात 'ऐक सत्यनारायणाची कथा' ह्या गाण्याचा काही हात असावा का? की उलटे आहे?
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
अगदी शुद्ध हिंदू धर्मातील
अगदी शुद्ध हिंदू धर्मातील कैक कथाही अशाच आहेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बोले तो?
शुद्ध हिंदू धर्म म्हणजे नक्की काय?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बोले तो अलीकडे आयात न
बोले तो अलीकडे आयात न झालेल्या, पुराणांतरीच्या जुन्या कथांबद्दल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कंची गोष्ट? उदा?
कंची गोष्ट? उदा?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
इंद्र-अहल्या स्टोरी. गौतम
इंद्र-अहल्या स्टोरी. गौतम ऋषींचा डोळा चुकवून इंद्र परस्त्रीबरोबर कसा चान्स मारतो वगैरे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
काहीही
शेंबड्या पोराला सुद्धा पटणार नाहीत असे मुद्दे. जगभर काय चाललंय ते न बघता शहामृग झालेल्या लेखकाने ओकलेली बरळ
चर्चा मजेशीर आहे.
चर्चा मजेशीर आहे.
हे पटलं.
पण मंदीर मशीदीच्या संदर्भातली मते नाही पटली, भूतकाळातल्या अन्यायाची उघड कबुली जरी दिली तरी आजच्या काळात उभी असलेली वास्तू करेक्शन म्हणून का होइना पाडणे समर्थनीय वाटत नाही. ( असो, ते अवांतर म्हणून बाजूला ठेवू.. )
नेहमीप्रमाणे काही सेन्सिबल पण विरोधी मुद्दे आले की, 'बरळ', 'शेंडा बुडखा', 'ट्रोल' आणि 'प्रतिसाद द्यायला वेळ नाही' असे प्रतिसाद अंमळ रोचक वाटले. म्हणजे शहाणे म्हणवणाऱ्यांनी अगदीच अवांतराला 'इग्नोरणे' समजू शकतो पण प्रतिसाद वेडा वाकडा नसताना, प्रतिसाद तर द्यायचा पण स्वत्: मुद्दे न मांडता समोरच्याला कंपुने मिळून 'ट्रोल-ट्रोल' म्हणणं वगैरे थोडं दांभिकच वाटलं. (याबाबतीत आपल्याला राजेश घासकडवींचा अप्रोच आवडतो. ) नेहमी ट्रोल करतो असे वाटणारा जरी एखादा लॉजिकल प्रश्न उपस्थित करत असेल तर त्याला विचार देणं हेच जास्त संयुक्तिक आहे असं वाटतं.
बाकी अरविंद कोल्हटकरांच्या वरील उधृत वाक्याशी सहमती असल्याने जास्त काही अॅडवत नाही.
साठेंचा लेख समस्येसंदर्भात एकंदर उथळपणे आणि एक डोक्यात हेतू ठेवून मांडलेला आहे. तसेही एकंदर rightangles.in या संस्थळावरचे लेख पाहता मिरर 'पांचजन्य' वाटतो. म्हणजे अगदी दुसरे टोक असा स्वरुपात सगळे लेख. सूर असा की या विचारांना भारतात आजकाल व्यक्त होता येत नाही (क्लेमिंग व्हिक्टीमहूड!). गंमत अशी की जवळपास सगळेच हे असं व्हिक्टीमहूड क्लेम करत आहेत असं दिसतं (नक्की ऑप्रेसर कोण मग?).
"मुद्द्यांना भडक स्वरुप देउन मांडणे, थोडी फियर-मॉंगरींगची फोडणी देणे, अधून मधून विक्टीमहूड क्लेम करणे आणि रडक्या सुरात (इतर) सगळे कसे समस्येला कारणीभूत आहेत हे सांगणे" ही बऱ्याचशा लेखांची, आजकालची (बोर होइल इतकी कॉमन झालेली) थीम झालेली आहे (कोणीही असो, फॉर्मॅट सगळीकडे चालतो) आणि यात मूळ समस्येच्या गाभ्याला स्पर्श देखील होत नाही, नुसतात धुरळा नि धुळवड.
कदाचित लेखकांचा हाच आणि असाच हेतू असावा ( ट्यारपी, ट्यारपी!).
दुर्दैव असं वाटतं की जे लोक्स सारासार विचार करून लिहितात असा तुमचा समज असतो, ते देखील अशा उथळ लेखांना जास्त विचार न देता डोक्यावर घेतात आणि मोठ मोठे शब्द वापरत भलामण देखील करत बसतात. नुसत्या ट्रोलांना तरी दोष देण्यात काय हशील आहे मग ..
असो.. बाकी चालू द्या..
सदैव शोधात..
काय पण विचार आहे ?
कमाल आहे बॉ ! हे असे विचार सुचणार्याची असूया वाटते !!
आजच
आजच देवदूतांनी देवदूतांवर हल्ला केलाय. त्यामुळे 'राक्षसवादी' सुखावले असावेत!
हे पहा.
ह्या चर्चेच्या संदर्भामध्ये डॉ.कोन्राड एल्स्ट (Dr. Koenraad Elst) ह्यांचे Negationism in India : Concealing the Records of Islam हे सुमारे ५० मिनिटांचे भाषण ऐकावे. डॉ.कोन्राड एल्स्ट ह्यांची ओळख येथे पहा.
मला आवडले ते भाषण.
मला आवडले ते भाषण.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.