अनुभव
हा धागा अभ्यासपूर्ण नाही, त्यामुळे या धाग्यावरती बौद्धिक चर्चाही अपेक्षित नाही. हा अनुभव आहे.
२ अनुभव-
गुरुचरित्र स्त्रियांनी वाचु नये असे म्हणतात. आतापर्यंत मी २ दा वाचायचा प्रयत्न करुन नाद सोडुन दिला याचे कारण रात्री अनामिक भीती वाटु लागली. का ते काही कळेना. पण भीती वाटे. ग्रंथवाचन सोडले, मात्र भीती नाहीशी झाली. यामागे वैद्न्यानिक कारण असेलच तर या २ प्रसंगातच भीती का वाटली, नंतर कधी का वाटली नाही याचे कारण सापडत नाही.
अनुभव २ रा - शीख समाजाचा "ग्रंथ साहीब" हा ग्रंथ त्यांचा गुरु मानला जातो. अर्थात फक्त ग्रंथ नसुन त्यात गुरु तत्व असल्याची त्यांची श्रद्धा आहे. शीख समाजाचे १० गुरु - गुरुनानक देव जी, गुरु अंगद देव जी, गुरु अमरदास साहीब जी वगैरे. प्रत्येक गुरु अंतकाळी पुढील गुरु निवडत असे. १० वे गुरु-गुरु गोविंदसिंग जी यांनि मात्र पुढील गुरु "श्रीग्रंथसाहिब" निवडला.
या ग्रंथाची गोडी माझ्या एका शीख मैत्रिणी मुळे लागली. जप जी साहिब सकाळी, रेहरास रात्री म्हटले जाते. सुखमणी व आनंदसाहिबदेखिल अत्यंत मधुर आणि प्रासादिक प्रार्थना आहेत असे मानले जाते. मी त्या काळात रात्रंदिवस हया प्रार्थना ऐकत असे. एकदा रात्री अशाच प्रार्थना ऐकत असतेवेळी झोप लागली. प्रार्थना चालूच होत्या, आणि मध्यरात्री अनामिक भीती म्हणजे खूप वाटून जाग आली. मी लॅपटॉप बंद केला पण यत्यानंतर कधीही ग्रंथसाहिब चालू असतेवेळी झोपले नाही.
http://www.srigranth.org/servlet/gurbani.gurbani?S=y
येथे या ग्रंथाचे भाषांतर सापडेल. नानक यांनी कधीच म्हटले नाही की तुम्ही शिख व्हा त्यांनी हेच सांगीतले की मुसलमानाने चांगला मुसलमान होण्याचा प्रयत्न करावा व हिंदुने उत्तम हिंदु होण्याचा. मात्र गुरु नानक यांनी monotheism म्हणजे एक ईश्वर या संकल्पनेचा प्रसार केला. त्यांनी हीच शिकवण दिली की उच्च-नीच असे काही नाही, जातपात नको, सर्वजण समान आहेत. गुरुनानक यांचा जन्म तलवंडी गावामध्ये कालू मेहता व माता तृप्ता यांच्या पोटि झाला. त्यांचा वर्ण क्षत्रिय होता. जानवे घालायची वेळ आली तेव्हा नानक यांनी नकार दिला. त्यांच्या मुखातुन सहजुस्फुर्त शब्द निघाले- अरे पंडित, करुणेचा कापुस, समाधान हा धागा, वैराग्य गहीच गाठ असलेले, आणि सत्याचा पीळ घातलेले जानवे तुझ्याकडे असेल तर ते मला दे. कारण ते जानवे कधीही मळणार नाही की ते आगीत जळणार नाही, त्याचा ऱ्हास होणार नाही की जे हरवणार नाही आणि असे जानवे घातलेले जीव हे अत्यंत सुदैवी असतील.
असो.
नानक यांनी लंगर अर्थात एकत्र भोजनाची प्रथा सुरु केली. सर्व जातीचे, सर्व पंथांचे, गरीब-श्रीमंत सर्व लोक एकाच पंगतीला बसावेत हा हेतू. शीख लोकांचे सुवर्णमंदीर आहे तेथे सर्वांचे स्वागत आहे किंबहुना या मंदीराचे दरवाजे चारी बाजुंना खुले आहेत व हेच दर्शवितात की कोणतीही दिशा उच्च नीच नाही, सर्व दिशा समान आहेत.
नानक यांनी लिहीलेल्या जपजी साहीबमध्ये एक ओळ वारंवार येत - "सबणा जिया का इक दाता सो मै विसर ना जाई" सर्व जीवांचा निर्माणकर्ता, त्यांचा दाता हा एकच आहे हे विसरु नका.
_______________________________
अरुंधतीचा हा धागा जरुर वाचा - http://www.misalpav.com/node/15577
प्रतिक्रिया
अनुभव रोचक.नंतर लिहितो.
अनुभव रोचक.नंतर लिहितो.
जरुर. धन्यवाद.
जरुर. धन्यवाद.
मागच्या रविवारी एबीपीमाझा
मागच्या रविवारी एबीपीमाझा चानेलवर खाद्यभ्रमंतीमध्ये मुंबई माझगावातील ज्यू सिनेगॅाग आतून दाखवलं अर्धा तास. हे सहसा पाहायला मिळत नाही. धर्मगुरू पेजारकरानी प्रार्थना साभिनय म्हटली. नंतर त्यांच्या पवित्र पुस्तकाचं ' तोरा 'चं वाचन करण्याअगोदर महिलांना बाहेर घालवलं! हे एक नवीनच कळलं.
गुरुचरित्राचं वाचन स्त्रियांनी वाचू नये म्हणतात त्याचे कारण स्त्रीचा द्वेष केलेला असेल. तिचे भितीदायक वर्णन करून योगमार्गी लोकांना परावृत्त करायचं असावे. पुर्वी एकदा एका स्त्री नातेवाइकाने सांगितले की वाचवत नाही.
( मी उगाचच अभ्यास/चिकित्सेकडे जातोय पण आता विचारायला हवे पोथी वाचणाय्रांस.)
आमच्या एका मित्राकडे भिंतीवर मोठे - श्रीकृष्ण रथात, मागे अर्जुन त्याच्याकडे पाहतोय, सैन्य उभे - असं चित्र होते. नंतर कधितरी ते काढून टाकले. याचे कारण विचारले तर म्हणाला घरात भांडणे होऊ लागली भावाभावांत मग ते चित्र काढले. त्या चित्राचा परिणाम होतो.
वाचवत नाही हे खरे आहे. बरीच
वाचवत नाही हे खरे आहे. बरीच भीतीदायक वर्णने आहेत. मे बी कमकुवत मनाच्या लोकांनी वाचु नये. कदाचित तेच कारण असेल स्वप्नांचे. पण वाचवत नाही हे खरे आहे.
आमच्या एका मित्राकडे भिंतीवर
हा असला आचरटपणा लै चालतो आपल्यात. काय तर म्हणे महाभारत घरी वाचू नये, आरण्यके घरी ठेवू नयेत ह्यांव नै अन त्यांव नै. चू साले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मला नेहमी पडणारा प्रश्न
मला नेहमी पडणारा प्रश्न विचारते - जोपर्यंत कोणी अन्य व्यक्तीस जीवित/मानसिक/शारीरीक हानी पोचवत नाही तोवर त्यांना मनमर्जीप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य का असू नये? यावर तुम्ही म्हणाल त्यांनि स्वातंत्र्य जरुर वापरावे पण आम्हीही, आमचे त्यांना शिव्या घालण्याचे स्वातंत्र्य अबाधित समजतो. हा मुद्दा मान्य आहे. म्हातारी मेली तरी काही नाही पण काळ सोकावतो असे म्हाणाल तर तेही ठीकच आहे पण मग तो निव्वळ बागुलबुवा नाही का? की आज ही अंधश्रद्धा आहे उद्या सती जाण्याच्या प्रथेचे पुनरुज्जीवन करण्यापर्यंत मजल जाईल वगैतरे.
.
पण मला जे म्हणायचय ते हे की निरुपद्रवी अंधश्रद्धा या विद्न्याननिष्ठांच्या इतक्या डोक्यात का जातात? शेवटी बिग बॅग काय, उत्क्रांती काय थिअऱ्याच आहेत. जोवर अपवाद सापडत नाही तोवर त्या ग्राह्य धरलेल्या आहेत पण याचा अर्थ अपवाद कधीही सापडणार नाही असे थोडिच आहे?
पण मला जे म्हणायचय ते हे की
निरुपद्रवी अंधश्रद्धा जर चालतात तर त्यांवरची टीकाही चालायला हवी,
इन रिटर्न, अशी टीका करणारे चू, महामूर्ख आणि अजून कायकाय असतात असे म्हणण्याचे तुमचे स्वातंत्र्य मी सहर्ष मान्य करतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मला नेहमी पडणारा प्रश्न
कारण 'मऊ लागलं म्हणून कोपराने खणणे' ही मानवी प्रवृत्ती आहे. निरुपद्रवी अंधश्रद्धा एकदा मान्य केली की कधीतरी हळूच त्यातला 'निरुपद्रवी' गळून पडतो, आणि त्या अंधश्रद्धा तापदायक व्हायला लागतात.
उदा १ : नात्यातल्या एका तान्ह्या मुलाचं नाव 'रुद्र' ठेवलं होतं. ते बाळ तान्हं असताना खूप रडायचं, किरकिर करायचं. कोणा 'घरगुती बाबा'ने** सांगितलं की याचं नाव रुद्र असल्याने त्याने रौद्र रूप धारण केलं आहे. तर आता त्याचं नाव बदला. "नाव तर बदलायचंय. आमचे घबा इत्के चांग्ले आहेत - कधीच खर्चिक उपाय सांगत नईत. पैसे तर बिल्कुल घेत नईत" वगैरे चर्चा होऊन एक अत्यंत पपलू नाव ठेवण्यात आलं.
पण तोवर बर्थ सर्टिफिकेट वगैरे सगळं निघालं होतं. मग कोणत्यातरी एजंटाच्या xxत काही हजार रुपये सारून त्या पोराच्या बापाने कायदेशीररीत्या पोराला पपलू केला.
उदा २ : आमच्या शाळेत एक अहिर गवळी समाजातला मुलगा होता. म्हणजे अगदी प्रॅक्टिसिंग गवळी. त्याच्या घरी अशी प्रथा होती की गाय/म्हैस बाळंत व्हायच्या दिवशी सगळ्यांनी उपास करायचा. नाहीतर ते बाळंतपण बिघडतं. एकेकाळी घरातले सगळे बाळंतपणाच्या उस्तवारीत असणार, आणि त्यामुळे रांधायला जमत नसेल. म्हणून ही उपासाची गोळी लावून दिली असावी. पण सध्याची त्यांची डेरी मोठी होती. पगारी नोकर होते. गायीम्हशींचं बाळंतपण करायला व्हेटदेखील येत असेल. पण तरी उपास प्रथा चालूच. आई त्याला बिनडब्याचं शाळेत पाठवायची. बिचारा अगदी रडकुंडीला यायचा. तेरा-चौदा वर्षांच्या पोरांना भुकेला मिळालं नाही तर फार बेकार अवस्था होते.
**हे वेगळं आणि फारच रोचक प्रकर्ण आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
शेवटी बिग बॅग काय, उत्क्रांती
बिगबँगचं म्हैत नाय. उत्क्रांती नुस्ती थेरी नव्हं मामी. अपवाद सापडले तर मज्जाच मज्जा!
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
उत्क्रांतीबद्दल दुसरा काही
उत्क्रांतीबद्दल दुसरा काही प्रवाद नसल्याने मानतो पण त्याबद्दल साशंकच आहे. हे कोणी केले हे एक गुढ आहे हे कबूल करतो.
"आपोआप आरएनए आणि नंतर एकपेशीय
"आपोआप आरएनए आणि नंतर एकपेशीय लोक तयार होणे आणि त्यातुन जीवसृष्टी निर्माण होणे" हा सिद्धांत म्हणजे गेल्या हजार वर्षातली सर्वात मोठ्ठी अंधश्रद्धा आणि क्वॅक आहे.
अजोचा परकायाप्रवेश?
अजोचा परकायाप्रवेश?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
म्हणजे अणुतै तुम्ही म्हणताय
म्हणजे अणुतै तुम्ही म्हणताय तसं असेलही
पण इकॉनॉमी /इझम वगैरे बाबत चर्चा करणाऱ्यांकडून आर एन ए & एकपेशीय वगैरे बद्दल तज्ञ मत ऐकून गहिवरून आलं .
सायन्स वाल्या आम्हा फडतुसांचा एक प्रॉब्लेम असतोय . निदान काय माहित नाही आणि काय संदिग्ध आहे याबद्दल एक ढोबळ अंदाज असतो . सर्वसामान्यपणे .
पण इकॉनॉमी /इझम वगैरे बाबत
सहमत!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
निदान काय माहित नाही आणि काय
आम्ही बिना सायन्सवाले लोक १००% खात्रीने सांगतो ना की हे सर्व ईश्वराने निर्माण केले आहे तर आबा तुम्ही सायन्स वाले लोक ऐकत नाही
थांबा पुष्पदंतविरचित शिवमहिम्नस्तोत्राचाच दाखला देते
_______
हे देव, आप ही इस संसार के सृजक, पालनकर्ता एवं विलयकर्ता हैं| तीनों वेद आपके ही सहिंता गाते हैं, तीनों गुण (सतो-रजो-तमो) आपसे हे प्रकाशित हैं| आपकी ही शक्ति त्रिदेवों में निहित है| इसके बाद भी कुछ मूढ़ प्राणी आपका उपहास करते हैं तथा आपके बारे भ्रम फ़ैलाने का प्रयास करते हैं जो की सर्वथा अनुचित है
हे महादेव !!! वो मूढ़ प्राणी जो स्वयं ही भ्रमित हैं इस प्रकार से तर्क-वितर्क द्वारा आपके अस्तित्व को चुनौती देने की कोशिस करते हैं| वो कहते हैं की अगर कोई परं पुरुष है तो उसके क्या गुण हैं? वो कैसा दिखता है? उसके क्या साधन हैं? वो इसा श्रिष्टी को किस प्रकार धारण करता है? ये प्रश्न वास्तव में भ्रामक मात्र हैं| वेद ने भी स्पष्ट किया है की तर्क द्वारा आपको नहीं जाना जा सकता |
शुचिमामी व अन्य सर्वांची क्षमा याचून
असं काही नसतं.
(पळा!)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शुद्धलेखनाची चूक!!!!!!
अस काही नसतं.
डांकं!
डांकं!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
निदान काय माहित नाही आणि काय
बापटण्णा, इन जनरल हे खरे आहे पण, उत्क्रांतीच्या बद्दल सायन्स्वाले चुकले आहेत. ( मी सुद्धा सायन्सवालीच आहे, मला असे बाजुला काढु नका )
गेल्या १००० वर्षातली तिन क्वॅक अनुक्रमे
१. उत्क्रांतीची थिअरी
२. होमिओपाथी
३. इकॉनॉमिक्स्
नंबर ३ बद्दल नंब्रपणे सहमत
नंबर ३ बद्दल नंब्रपणे सहमत आहे.
- गरिबांचा बोकील
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
महाभारतातले चित्र
या चित्राच्या संदर्भात असलेच सल्ले ऐकून, मी, मुद्दाम, माझ्या हॉलमधे श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे ते प्रसिद्ध चित्र लावले. सहा महिन्याच्या आंत ते चित्र अस्पष्ट झाले, फेड आऊट झाले. त्याचे कारण म्हणजे, आमच्या हॉलमधे संध्याकाळी त्या भिंतीवर ऊन येते. चित्र हे ओरिजिनल पेंटिंगची फोटोकॉपी असल्याने, कडक उन्हात, त्यातले रंग उडून गेले. घरांत कोणाचीही भांडणे तोपर्यंत झाली नव्हती. तरीही पुन्हा एकदा, ऊन न येणाऱ्या भिंतीवर हा प्रयोग, एखाद्या पक्क्या रंगाच्या पेंटिंगने करायचा आहे.
पाहू या, श्रीकृष्ण काय फळ देतो ते !
भीती वाटणे, अशांतता वाटणे
भीती वाटणे, अशांतता वाटणे याचे दोन अनुभव लिहिले. चर्चेसाठी नाही म्हणून पुढे लिहित नाही.
म्हणूनच म्हणतात
की अज्ञानात सुख असते. एकादशी दिवशी अज्ञानते पणे अभक्ष भक्षण केलं अन् नंतर कळलं की एकादस होती की उगीच अपराध भावना वाटते. जेवन झाल्यावर शेवटी भाजीत एखादा किटक वैगेरे दिसला की मळमळल्या सारखं होतं. अज्ञानचं सुख...
भांबड आलं
"गुरुचरित्र वाचनोत्तर
वाटलेल्या भीतीमागे वैद्न्यानिक कारण असेल"... असे वाटू शकते हे वाचून अनामिक भीती वाटू लागली. का ते काही कळेना. पण भीती वाटली
गुरुचरित्रात भूत-प्रेत योनी,
गुरुचरित्रात भूत-प्रेत योनी, समंध वगैरे उदाहरणे असून. ४ युगांची वर्णने आहेत त्यात कलीयुगाचे बीभत्स रसातील वर्णन आहे. या अशा गोष्टींमुळे भीती वाटुन स्वप्न पडु शकत असावे. मला हॉरर सिनेमे बघता येत नाहीत, अजिबातच बघता येत नाहीत. प्रचंड अस्वस्थ वाटते. माझ्या पूर्वॅच्या एका लेखामधून्-
???
मला हे समजत नाही. बोले तो भूत, प्रेत, समंध वगैरेंची भीती वाटू शकते इथवरही एक वेळ ठीक आहे. पण योनीची भीती??? आणि तीही इतकी, की दुःस्वप्ने पडावीत??? यह बात कुछ हज़म नहीं हुई|
(ओली स्वप्ने पडली, तर एक वेळ समजू शकतो. पण दुःस्वप्ने म्हणजे कैच्याकैच आहे. बोले तो, नक्की काय होते? त्या 'कथा' पिच्चरमध्ये - चांगला होता, बैदवे - त्या नसरुद्दीन शाहला दिवादुःस्वप्न पडते, तसले काही होते काय?)
भूतयोनी, प्रेतयोनी असे
भूतयोनी, प्रेतयोनी असे म्हणायचेय, भावनाओंको समझो
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
भुताची असो, की प्रेताची असो...
...योनी इज़ योनी. त्यात काय घाबरायचे? (खाते की गिळते कोणाला?)
- (अॅब्सोल्यूटिस्ट) 'न'वी बाजू.
एनीवे तर हा ग्रंथ वाचावासा
एनीवे तर हा ग्रंथ वाचावासा वाटतो पण वाचवत नाही अशी "धरले तर चावते-सोडले तर पळते" अशी अवस्था आहे.
सर्व धर्माचे मूळ - जिवाजिवांत
सर्व धर्माचे मूळ - जिवाजिवांत असमानता का आणि मृत्यू का येतो हे शोधण्याचा, स्पष्टिकरण देण्याचा प्रयत्न आहे. परंतू शेवटी याचे उत्तर न देता इतर वर्णनं ,मार्ग दाखवत ग्रंथ आटोपता घेतात.
हा प्रतिसाद आवडला. शिवाय
हा प्रतिसाद आवडला. शिवाय धर्माचे अजुन एक काम म्हणजे केयॉसमधुन ऑर्डर आणणे. असमानता, प्रोमॉर्डिअल इन्स्टिन्क्ट्स (आदिम प्रेरणा व गरजा) यांची सांगड घालुन, समाजात त्यातल्यात्यात ऑप्टिमम (आदर्श नव्हे) ऑर्डर आणणे.
मी गुरुचरित्र वाचलं आहे.
मी गुरुचरित्र वाचलं आहे. इंटरेस्टिंग आहे पण भयावह वगैरे नक्कीच नाही. किंवा मग माझी इमॅजिनेशन इतकी व्हिव्हिड नसेल.
गेले २ दिवस टेंबेस्वामी लिखित
गेले २ दिवस टेंबेस्वामी लिखित, 'गुरु चरित्र सार सप्तशती' वाचली अतिशय प्रसन्न स्वप्ने (कधी नव्हे ती) पडली. परत स्वप्नात स्वच्छ जल पाहीले. मला खूण पटली. तसेच गुरुचरित्र सार सप्तशतीच्या ३५ व्या अध्यायात 'गुरुचरित्र स्त्रियांनी का वाचू नये' याचे कारण सापडले.
कारण कोणाला पटो वा न पटो पण त्यांनी असे अनुरोधित (हिंट) केलेले आहे की स्त्रियांना सांगीतलेले मंत्र किंवा कोणतीही गोष्ट पट्ट्कन षट्कर्णी होते आणि एकदा षटकर्णी झाला की मंत्राचे सामर्थ्य नाहीसे होते.
यावर विश्वास ठेवायचा की नाही हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. अर्थात आडवाटेने, स्त्रियांवर 'पोटात काही ठेउ शकत नाही' असा आरोप आहे/असे म्हटले आहे.