कन्यादान

आजकाल आमच्या घरी वादविवाद / चर्चा / चर्वितचर्वण (थोडक्यात भांडण) कन्यादान या विषयावरून सुरू आहे.
मी ठणकावून कन्यादानास नकार दिल्याने वरच्या लेवलच्या (अर्थात आईसाहेब, आमच्या आणि होणाऱ्या नौऱ्याच्या (अर्थात त्या काय आमच्या मातुश्रींसारख्या आमची अक्कल काढणाऱ्यातल्या नाहीत (अर्थात चारचौघात, मनातल्या मनात काढत असतील माहीत नाही) )) लोकांच डोक पार भुसकाटलय. आईसाहेबांनी मग लग्न कशाला करतेस, कोर्टात जा, तुला हवं तेच करायचं तर मला विचारू नकोस, बोलावलस तर लग्नात येईन वगैरे म्यानातल्या तलवारी काढून झाल्या आहेत. भांडणाच्या फैरीवर फैरी झडल्यावर मी आईसाहेबांना च्यालेंज देऊन टाकलं आहे की मी माहिती जमा करते तूही कर, जर माझा विरोध असण्याचे मुद्दे बरोबर असतील तर कन्यादान होणार नाही आणि तिने मला पटवून दिले की ती बरोबर आहे तर काय आपण मुंडी दिलेलीच आहे कलम करायला.

तर मुद्दा असा की आतापर्यंत जे काही अर्धवट वाचन, ऐकीवात आलं त्यात कन्यादानामुळे माझ्या आईवडीलांची पापं धुवून निघतात, माझा नौरा विष्णूचा अवतार मानून (एकंदर सतत लोळत पडलेला असल्याने कदाचीत हे मान्य करीन मी एक वेळ) त्याला माझं दान करण्यात येतं.
कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे वगैरे वगैरे. एकतर मी काही वस्तू नाही की माझं कुणी दान करेल. दुसरं म्हणजे तो कोण टिकोजीराव माझं दान घ्यायला?
बरं आणि त्यात त्याच्या वंशव्रुद्धीसाठी जितकी मी जबाबदार तितकाच तोही जबाबदार आहेचकी. त्यासाठी मला त्याला अर्पण वगैरे करायच म्हणजे जरा माझ्या डोक्याच्या बाहेर जातय. बरं आणि त्याने माझी जबाबदारी घ्यायला मी काही कुक्कुलं बाळ नाही किंवा मी ही त्याची तेवढीच जबाबदारी घेते की.

आईसाहेबांचा मुद्दा असा की हे दान नाहीच मुळी. बाकी सगळे मुद्दे (मी मूर्ख असल्याने समजावून काही उपयोग नाही : इती मातुश्री) तिने सांगितले नाहीत.

तरी फक्त तिचा मुद्दा खोडायला ओम श्री गुगालाय नमः म्हणून धुंडाळायला सुरू केलं आहे (माझा मुद्दा हिरीरीने मांडून झाला आता पुराव्याने शाबीत करायला नको?)
कन्यादानाचे विकि, कोराचे प्रतिसाद वाचून-वाचून डोक्याचं भुस्काट पडायला आल्यावर इथे ऐसीकरांना विचारावं म्हणून या धाग्याचा प्रपंच.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

लग्नाच्या बाबतीत इमोशनल ब्लँकमेल हे घरातल्या वडीलधाऱ्या मंडळीकडून होतेच होते. आतापर्यंत माझापण लग्नासाठी कोर्टात जाऊन रजिस्टर मँरेज करावे असा साधा सुटसुटीत आग्रह होता. पण आई वगैरे फिमेल डॉमिनेशन हँबीटट मध्ये स्वतःच्या आधुनिक विचाराला तिलांजली द्यावी लागते. हे चांगलेच समजले. मग सोळा संस्कारांपैकी लग्न संस्कार वगैरे, सप्तपदी विधी वगैरे का करावे वगैरे इलॉजिकल एक्सप्लेनेशन्स सहन केली. काही पर्याय नव्हता. लग्नाच्या बाबतीत आपले स्वतःचे विचार वगैरे समजून सांगणे, भूमिका पटवून देणे अतिशय अवघड आहे. त्यामुळे 'मम्' एवढेच म्हणायचे असं ठरवलंय. असो.
कन्यादान, लग्न वगैरे मुळे दोन कुटुंबातील माणसे जोडली जातात. आयुष्यात गृहस्थाश्रमाची सुरूवात मंगलमय विधी वगैरे व्हावी फलाना टिमका सगळं ऐकून झालंय ते मला इथे लिहावेसे वाटत नाही. चर्चेचा धागा माझ्या अवतीभवतीच्या घटनांंशी मिळताजुळता वाटला म्हणून हा प्रतिसाद क्रमांक १.
काही प्रश्न मला ही पडलेत.
सालंकृत विधी, व्रत वैकल्ये इत्यादी इत्यादी स्त्रियांनाच का करावे लागतात?
पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांच्या वाटेला फक्त होळीभोवती बोंबाबोंब करणेच का नशीबी आले?
लग्नसमारंभ हा दोन कुटुंबातील आणि नात्यागोत्यातील लोकांपुरता मर्यादित असेल तर त्याचा जाहिर दिखावा का केला जातो?
मध्यमवर्गीय कुटुंबे "लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून" याच्या अवतीभवती का घुटमळत असतात?
आयुष्याची जमापुंजी लग्न आणि घर यासाठी खर्च करून "मनासारखे जगताच आले नाही" अशी टिमकी सरतेशेवटी सर्रासपणे का वाजवली जाते?
लग्नकार्यात समोरच्या पार्टीचे मन दुखावले जाणार नाही म्हणून तडजोडी करून प्रसंगी कर्जे काढून आयुष्यातील काही वर्षे कुढत का व्यतीत करतात?
कन्यादान, सीमांत पुजन, सप्तपदी, लक्ष्मीपूजन, ग्रहमग, उद्यापन, लाजाहोम, हळदी, घाणा भरणे, सुडमुंज करणे, पाणिग्रहण वगैरे वगैरे विधीवत सांग्रसंगीत करून झालेली लग्ने पंजीकृत का वाटतात?
या सारखे अनेक प्रश्नांची मीही उत्तरे शोधतोय.
वैज्ञानिक पुष्टी असलेली उत्तरे आवडतील.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

प्रतेक गोष्टीत खोलात जाण्याची गरज नाही .
जीवन एकदाच मिळत आणि ते आनंदी पने जगावे.
जीवनातील काही महत्त्वाचे टप्पे आहेत जसे बालपण. सरल्या नंतर शिक्षण,आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले की लग्न हा सुद्धा महत्वाचा टप्पा आहे.

इथे तुमच्या जीवनात नवीन व्यक्ती प्रवेश करते आणि तिच्या बरोबर आयुष्य काढायचे असते.
इथे निर्णय चुकला,निवड चुकली तर खूप त्रासदायक होते.
लग्न हे रजिस्टर पद्धतीने सुद्धा करता येते .
रजिस्टर पद्धती मध्ये तुमचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण होतात आणि कायद्या नी तुम्ही नवरा बायको असता.
कारण बायको ह्या नात्याने जशी जबाबदारी येते तसे अधिकार पण येतात.
Exa घरावर,संपत्ती (नवऱ्याच्या) अधिकार.
लग्न हे सोहळा म्हणून करावा अशी खूप लोकांची इच्या असते सोहळा करायचा झाला तर हळदी पासून dj paryant sarv आलेच.
त्या मध्ये चूक की बरोबर हे शोधायचं नाही त्याचा आनंद घ्यायचा.
आयुष्यात एकदाच होते लग्न आणि लग्नाचे वय सुद्धा एकदाच येते.
कशाला जास्त डोक्याला त्रास करून घायचा.
कन्यादान हा शब्द वापरला म्हणून काय ते कन्येचे दान होत नाही .
लग्न म्हणजे मिलन
मिलन हे दोन जीवांचे होते.
मिलन होण्यासाठी दोन माणसं लागतात एका माणसाचे मिलन होवू शकत नाही.
मग ते मनाचे मिलन असू ध्या,विचारांचे असू ध्या नाही तर शरीराचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<त्या मध्ये चूक की बरोबर हे शोधायचं नाही त्याचा आनंद घ्यायचा.>

परंपराशरणतेत आनंद मानणे विचारशील व्यक्तिसाठी अवघड अशासाठी असते की परंपरा निर्माण होतानाची मूल्ये आता लागू पडत नसूनही स्विकारल्यासारखे होते. आनंद घ्या असे त्रयस्थाने सुचवणे त्यांच्या विचारकलहावर उत्तर कसे असू शकेल?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

कन्यादान याचे in letters and spirit मध्ये अर्थ guardians' permission आहे.
पूर्वी आईवडिलच मुलांची लग्ने ते सज्ञान नसतानाच लावून देत. तेव्हा हे गरजेचे होते.
-----
आताचा काळ, कायदे ,नियम पाहता याची सज्ञान वधुवरांस गरज नाही आणि ते नैमित्तिक राहिले आहे.

गौरिहर पूजन हे वधुच्या हातातील कंकणे दाखवण्यासाठी असते. पण हल्ली कंकणांपेक्षा भारी फोन, तिची शिक्षण पदवीने स्थान घेतले आहे.
असे अनेक उपविधी हवेतच असे नाहीत.

हिंदू हा एक रीतसर धर्म मानले जात नसले तरी त्यातील विवाह विधी कायदेशिररीत्या मान्य होण्याचे कारण -
१)निमंत्रण पत्रिका = कोण कोणाशी कुठे कधी विवाह करत असण्याची नोटीस.
२) विवाहास आलेले निमंत्रक, अग्नि ब्राह्मण यांना कार्य सिद्धीस नेण्याचे आवाहन आणि फोटो = साक्षिदार
३) सप्तपदी आणि लाजाहोम = वधूवरांनी स्वत: एकमेकास आणि सर्वांसमक्ष होकार देणे.
------
बौद्ध लोकांचा विवाह विधि पाहिल्यास हेच दिसेल की संघ प्रतिनिधींसमक्ष ओळख, विवाह निश्चिती, वहीत नोंद.
-------------------
थोडक्यात सज्ञान मुलांसाठी कन्यादान एक 'हेसुद्धा एक' एवढंच. बाकी सालंकृत वगैरे ज्याची त्याची आवड.
----------
पटलं तर घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आनंदाच्या सोहळ्यात तुमचे विचार
म्हणजे दुधात मिठाचा खडा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

हिंदू हा एक रीतसर धर्म मानले जात नसले तरी त्यातील विवाह विधी कायदेशिररीत्या मान्य होण्याचे कारण -
लग्न हे हिंदू रीतिरिवाज प्रमाणे होतात हिंदू धर्मा प्रमाणे नाहीत.
त्या मुळे हिंदू मध्येच वेगवेगळे रिती रीवज आहेत .
बौध्द धर्माच्या विवाह सुद्धा रिती रिवाजा प्रमाणे होतात बौध्द धर्म प्रमाणे नाहीत.
भारतीय बौद्ध आणि जपान चे बौध्द ह्यांचे लग्न लावण्याचे रिती रीवाज् एकसारखे असणार नाहीत वेगळे असणार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पारंपरिक पद्धतीने – मग ते वैदिक असो (बाकीचे विधी आधी, मंगलाष्टका सर्वात शेवट) की धार्मिक पद्धतीचे (सुरुवात मंगलाष्टकांनी) – होणाऱ्या लग्नात स्त्रीला पदोपदी दुय्यम लेखतात ह्या वास्तवाकडे दुर्लक्ष करायचे का हा मुद्दा आहे. ‘’दोन कुटुंबं, माणसं जोडताना एक दिवस वागावं की इतरांच्या मनासारखं मग रोज कुठे सगळे असतात लुडबुड करायला’’ इथपासून काय वाटेल ते तर्कट गळी उतरवायला भोवतालचे तयारच असतात. ‘’लग्न माझं आहे, ते माझ्या मनाप्रमाणे व्हायला हवं’’ इतका सरळ साधा मुद्दा जर कोणाला समजावून घ्यायचा नसेल तर तुमची लढाई सोपी नाही. होणाऱ्या नवऱ्याला या बाबतीत तुमच्या भावनांची तीव्रता समजावायला हवी. सोयीसोयीने कोणा किंवा कशाची ढाल करायची आणि बिनसलं तर खापर फोडायचं असला दुटप्पीपणा नको असेल तर आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण घ्यावी. शुभेच्छा.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लग्न सोहळ्यात दुय्यम वागणूक कोणाला दिली जाते आणि कोण कोणत्या प्रसंगातून हे समजून घेणे आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण घ्यावी. शुभेच्छा>>
हल्लीची पिढी घेतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...हा धागा उद्भवताच ना.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कन्यादान हे दानच आहे. मनुस्मृती वगैरेत विवाहाचे आठ प्रकार आहेत त्यापैकी ब्राह्म विवाह म्हणजे सालंकृत कन्यादान. (इतर काही प्रकार - यज्ञात ब्राह्मणाला कन्या दान करणे, कन्याविक्रय). येथे पहा: https://vishwakosh.marathi.gov.in/32812/

कन्यादानाचा विधी पहिला तरी ते दान आहे हे लक्षात येईल. हातावर पाणी सोडतात. एखाद्या गोष्टीवर पाणी सोडणे हा वाक्प्रचार यासंदर्भात आठवून पहा.

कन्यादानच नव्हे, बाकी बरेच विधी मुलीचे दुय्यमत्व अधोरेखित करणारे असतात, उदा. ऐरिणीपूजन/ झाल. येथे पहा: https://gurujipune.com/marathi/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a...

कोर्ट मॅरेज नको असेल तर सत्यशोधक लग्न बेष्ट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनस्मृती आताच्या ,१ टक्के लोकांना सुद्धा माहीत नाही .
त्या ग्रंधात कन्यादान विषयी काय मत व्यक्त केले असेल तर त्याचा आधार ध्या.
कोणत्या पानावर असे मत व्यक्त केले आहे
आणि त्याच बरोबर जगातील तमाम धर्मातील पुरातन ग्रंथात विवाह विषयी काय भाष्य केले आहे ते पण सांगा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोर्ट मॅरेज नको असेल तर सत्यशोधक लग्न बेष्ट

त्यांनी आल्टर्नेटिव विवाहपद्धतींविषयी पृच्छा केलेली नाही. त्यांना रीतसर विधीवत्, (दोन्हीं बाजूंच्या) कुटुंबीयांच्या इन्व्हॉल्व्हमेंटसहित लग्न करायचे आहे. त्यामुळे, अन्य कोणत्याही पद्धतीची सुचवण प्रस्तुत ठिकाणी अप्रस्तुत (तथा फ़िज़ूल) आहे.

बाकी चालू द्या.

----------

अन्यथा, गांधर्वविवाह, राक्षसविवाह यांचासुद्धा विचार करता आला असता, कदाचित.१अ

१अ किंवा, हे प्रकार आजमितीस कालबाह्य झाले असले आणि/किंवा विधीसंमत नसले, तर गेला बाजार आळंदीस जाऊन विवाह हा प्रकार विचारात घेता येईलच. परंतु, वर म्हटल्याप्रमाणे, येथे तो मुद्दा नाही.

अन्यथा, त्यांच्या मातुःश्रींंनी त्यांना (कितपत खुल्या दिलाने, याबाबत कल्पना नाही, परंतु) 'कोर्टात जा(ऊन लग्न कर), तुला हवे तेच करायचे तर मला विचारू नकोस, बोलावलेस तर लग्नात येईन' वगैरे ऑफरी केलेल्या आहेतच.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लक्षपूर्वक सगळे विधी पाहिल्याला युगं उलटली. सरळच वधूचं वस्तूकरण करणारं कन्यादान तर आहेच, पण जे काही विधी करायचे ते नवऱ्याने करायचे आणि बायकोने फक्त हाताला हात लावून मम म्हणणे हा सर्व विधींचा ल.सा.वि. म्हणता येईल. गृहप्रवेश झाल्यावर लक्ष्मीपूजन या विधीत पुढे नवरा अंगठीने तांदुळावर बायकोचं नाव लिहितो. इथे तो तिचं नाव बदलू शकतो. “नाव काय ठेवलं, की तेच राहू दिलं” असं सहज विचारायला कोणाला काही वाटत नाही. त्याच लग्नाने नवरा बनतो कुटुंबप्रमुख आणि बायकोला मिळतं दुय्यम नागरिकत्व. नवऱ्याचे आडनाव लावणे म्हणजे आपले खाजगीपण सक्तीने सार्वजनिक करणे. लग्न झालं म्हणून पुरुषाची ओळख बदलत नाही. विचार केलात तर पुरुषप्रधान संस्कृती किती खोलवर रुजली आहे आणि स्त्रीला दुजाभाव किती प्रकारे सोसावा लागतो ते समजेल. पण मग समानता हे मूल्य आपलेसे करावे लागेल. ते पुरुषांना नको असते. भारतीय संविधान बायकांना त्यांचे नाव बदलण्याची सक्ती करत नाही. पण बहुतेकींना सौ. अमुकतमुक लावण्याची हौस, कारण परंपरेने त्याला सगळी सकारात्मकता चिकटवलेली.
यथासांग विधीवत लग्न व्हावं ही अपेक्षा, पण काय चाललंय याकडे हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या निमंत्रितांचं लक्ष. अगदी मंगलाष्टका या विधीत आलेले कितीजण दुसरं काहीही न करता शांतपणे फक्त मंगलाष्टका ऐकत सहभागी होतात ? गप्पा मारत असतात नाही तर आता मोबाईलमध्ये डोकं घालून असतात. अक्षता म्हणून होणारी तांदळाची नासाडी हल्ली काहीकाही लग्नांत होत नाही, पण एकंदर तदेव लग्नम् पाठोपाठ जेवणाकडे पळणारेच अधिक. आणि ज्यांचं लग्न, त्यांनी नुसतं कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे वागायचं, जड, (ओले) हार गळ्यात घालून थांबायचं, नाकातोंडात धूर जाणारे विधीही सहन करायचे, ही तडजोड कोणाच्या आनंदासाठी करायची ? आलेल्या किती पाहुण्यांची आणि वधू-वरांतील एकाची तरी ओळख असते ?
(मी स्वतः एखाद्या लग्नाचे निमंत्रण आले तर वधू किंवा वर यांपैकी एकाची तरी आधीची ओळख असेल अशाच लग्नांना जाते.)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही म्हणता ते बरेच मी माझ्याच लग्नात करू शकलो कारण दोन्ही पक्षांचे संपूर्ण निर्णय घेणे माझ्याच हातात होते. दोघांनी स्वत: जाऊन बोलावणे निमंत्रण केल्याने निमंत्रिक दोघांना चांगलेच ओळखत होते. शिवाय कार्यक्रमा दिवशी दारात आम्हीच स्वागताला हजर होतो.
आता बोला इतकी स्वतंत्रता कुणाला असते निर्णयाची?

दोन्ही पक्षांच्या पाचपाच लोकांची तेरा मतं असतात आणि खल होत असतो. निर्णय घेणारे लोक जेवढे कमी तेवढे चांगले.

चर्चा आणि खल करत बसलो तर अंत नसतो. काय महत्त्वाचे आणि काय नाही आपणच ठरवले तरी शेवटी जेव्हा कागदोपत्री पुरावा म्हणून नोंदीसाठी जे आवश्यक असते ते करावेच लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुन्या लोकांनी काय म्हणलंय, ह्याबद्दल मला अजिबातच माहिती नाही. पण गौराक्का, मी काय म्हणते, तुम्ही होणाऱ्या नौऱ्याला आणखी एकदा गटवा. त्यालाच म्हणायला लावा की हे कन्यादान वगैरे बोगसपणा मला चालणार नाही. त्यात माझ्या बायकोला माझ्यापेक्षा हिणवलं जातं. किंवा जी काय डायलॉगबाजी तुमच्या घरात चालेल, ती करायला सांगा. राजकारण कराच थोडं!

मियाबिवी राजी ...

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. लग्न स्वत:ला हवं तस्स्स्संच करता आलं पाहिजे - ह्याला बिनशर्त पाठिंबा. प्लीज आई-वडील-इतर नातलगांच्या इमोसनल अत्याचाराला बळी न पडता स्वत:ला हवं तसं लग्न करा.

२. pick your battles, but win the war - कुठे तडजोड करायची आणि कुठे स्वत:च्या मनाप्रमाणे कामं होतील असं बघायचं - ह्यासाठी बार्गेनिंग पावर म्हणून अशा नैतिक विरोधाचं शस्त्रंही वापरू शकता.

बाकी भारतीय लग्नांत नवरानवरी सोडून इतरांचं बॅगेजच फार. च्यायला.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

pick your battles, but win the war - कुठे तडजोड करायची आणि कुठे स्वत:च्या मनाप्रमाणे कामं होतील असं बघायचं - ह्यासाठी बार्गेनिंग पावर म्हणून अशा नैतिक विरोधाचं शस्त्रंही वापरू शकता.

अगदीच सहमत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

उत्तम विचारप्रवण धागा. कोणी किती का गिल्ट कार्ड प्ले करेनात तुम्ही तुम्हाला आवडेल त्याच पध्दतीने लग्न करा. शुभेच्छा.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तूम्ही सरळ अल्टिमेटम द्या की वराचे दान करत असाल तरच लगीन करीन म्हणून. बघा मग कसे कन्यादानाचे नाव घेतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

...अशी आहे, की च्यालेंज 'विरोधी पक्षनेत्यां'नी दिलेले नसून, खुद्द त्यांच्याच मातु:श्रींनी दिलेले आहे. सो, युअर सोल्यूशन विल नॉट वर्क.

(माता न तू वैरिणी!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'विरोधी पक्षनेते' न बोलून शहाणे आहेत, नौरा बिचारा आई आणि बायको आणि बायकोची आई यात बेकार अडकलेला आहे. तू तुला काय हवं तसं कर म्हणून त्याने माझ्यापासून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटचं कार्ड तेच आहे, जावयाला समोर करून आईसाहेबांना त्यांची तलवार म्यान करायला सांगणे. आईसाहेब त्यालाही तू चुप रहा तुला काही समजत नाही म्हणण्य्याची शक्यताही आहेच.

नौऱ्याच्या आईसाहेबस्नी देवळात लगिन लावयचं होतं, सगळ्या लोकांना गाडीत भरून देवळात नेणे, तिथून उचलून आणणे हे मी आधीच रद्द केलं. अशक्य कोटीतल्या 'हुं.. त्यात काय फक्त गाडीच तर करायची ती मी बुक करतो' या आशावादाला मी वेसण घातलीये. बहुतेक त्यानी आधीच हात टेकले असावेत.

सध्या मातुश्रींशी बोलचाल बंद आहे. शांततेच्या मार्गाने युद्ध सुरू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

पारंपरिक पद्धती नुसार लग्न करायचे नसेल तर नका करू
फक्त तुमच्या जोडी दाराशी तरी तुमचे एकमत असावे.
दोघांनी ठरवावे.
लग्न कसे करायचं .
रजिस्टर करायचे की सर्व विधी नुसार करायचे.
लोकांना बोलवायचे की नाही बोलवायचे.
लग्नं नंतर नवऱ्याच्या घरी जायचे की नाही जायचे
लग्न नंतर नाव बदलायचे की नाही बदलायचे .
हे सर्व तुम्हा दोघांचे निर्णय आहेत .
बाकी तुम्ही काय करताय,काय निर्णय घेता आहात.
त्याच्या शी आई वडील सोडले तर बाकी लोकांना काही देणे घेणे नसते आणि एवढं वेळ पण कोणाकडे नसतो.
तुम्ही कोणाला तुमच्या लग्नात सहभागी करणार नसलं तर लोक पण तुम्हाला त्यांच्या कोणत्याच कार्यक्रमात सहभागी करणार नाही हे सरळ आहे.
आपल्या ऐसी अक्षरे वर काहीच परंपरा पाळू नका असा विचार व्यक्त करणारी लोक आहेत .
पण मला अस्या फक्त एकच व्यक्तीचं अनुभव ऐकायला आवडेल त्यांनी स्वतःचे विचार प्रताक्षात जीवनात उतरवले आहेत.
किती जण अशी आहेत त्यांनी फक्त दोघांनी मिळूनच लग्न केले आहे.
किती जण इथे आहेत ते लग्न नंतर आई वडिलांच्या घरात गेले नाहीत राहण्यासाठी आणि स्वतःच्या घरातच नवरा बायको राहिले आहेत.
किती जण इथे आहेत त्यांनी लग्न नंतर नाव बदल नाही आणि नवऱ्याची घरी (नवऱ्याचे स्वतःचे किंवा त्याच्या आई वडिलांच्या)लग्न नंतर राहायला गेले नाहीत.
असे कोण असेल तर अनुभव share karava .
म्हणजे बाकी लोकांना तो आदर्श घेता येईल
माझा अंदाज आहे असा एक पण व्यक्ती इथे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणताही मुद्दा तात्त्विकदृष्ट्या कितीही योग्य असला तरी असे तात्विक झगडे हिरीरीने करून, विदा, माहिती यांच्या साहाय्याने पटवून देऊन वगैरे तात्विक विजय मिळवण्यापूर्वी मला नेहमी त्याचा अंतिम आउटकम काय असेल असा अंदाज करावासा वाटतो.

हे सर्व आपण मागच्या पिढीशी करून काय साध्य होईल अशी आशा ठेवून आहोत? हा ज्येष्ठतेचा असमान लढा आहे. त्यावर ऊर्जा खर्च करण्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीला आपल्या योग्य वाटणाऱ्या विचारांचा वारसा देण्यावर फोकस ठेवावा. त्या बाजूचं भावी तात्विक युद्ध उद्भवू देऊ नये. हे तुलनेत सोपं आणि मुख्य म्हणजे खरंच काहीतरी दीर्घकालीन फायद्याचं ठरू शकतं.

मागच्या पिढीला बदलण्यासाठी संघर्ष निरुपयोगी आहे. केवळ दुखावले जाण्यापलीकडे काहीही औटकम निघण्याची आशा नसते. कारण मुळात कन्यादान हा फक्त तुमच्यासाठी तत्वाचा प्रश्न आहे, त्यांच्या दृष्टीने तुम्ही त्यांचं म्हणणं मानावं हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. कन्यादान वगैरे विधी हे निमित्त. तेव्हा तात्विक लढाई समजून कराल तर फजूल आहे.

खत मुळांना घालायचं, फांद्यांच्या लाकडाला खत चोळून उपयोग नाही.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेसुद्धा पटतंय!
गविंनी लिहिलं की गोष्टीकडे पाहण्याची नवीनच दृष्टी मिळते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

पण दोन पिढी मधील विचारांचा फरक कधीच मिटणार नाही तो अनंत काळापासून चालत आला आहे आणि पुढे पण चालू राहील .
आताच्या तरुण पिढीचे विचार त्या पुढच्या पिढ्या स्वीकारणार नाहीत .
आपण कोणत्या झोन मध्ये आहोत त्या नुसार आपल्या सोयीचा च विचार कोणताही व्यक्ती करतो.
रेल्वे platform var astana train मधील लोकांनी किती ही गर्दी असेल तरी आत मध्ये जाण्यास रस्ता द्यावा असा वाटणार विचार ट्रेन मध्ये चढल्या चढल्या बदलतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आताच्या तरुण पिढीचे विचार त्या पुढच्या पिढ्या स्वीकारणार नाहीत .

हे म्हणणं मी टाळलं. तात्विक बाबींवरून श्रम करायचेच तर पुढच्या पिढीशी संघर्ष टाळण्याच्या दिशेने करावेत असं ते म्हणणं आहे.

प्रत्यक्षात आपण मागची पिढी झालो की कन्यादान अथवा विधी नव्हे पण अन्य नवीन, समकालीन निमित्ताने / मार्गाने पुढच्या पिढीला खाली वाकायला लावणारच नाही अशी खात्री नाही. वाढत्या वयाने पावलांना खूप खाज सुटते.

ते टाळूया जमेल तितकं.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

_/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@गविसोा:

प्रतिसादाप्रतिसादागणिक माझे या धाग्यावर प्रतिसाद लिहिण्याचे कष्ट वाचवीत आहात. खात्यावर नोंद करीत आहे.

(@अस्वलसोा: तुमच्या मागील प्रतिसादाबद्दल असेच काहीसे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय जे बदल करायचे ते करून दाखवायचे ते मी केलेच. पण त्यासाठी मागच्या पिढीशी कुठेही झगडा नाहीच. केलाच पाहिजे, वेगळे राहिलेच पाहिजे असे कुठे आहे?

नात्यातल्या मोठ्या स्त्रिया - आत्या,काक्या,मावशा कधीकधी भाचे पुतण्यांच्या लग्नामध्ये राडारोडा घालतात. म्हणजे तशी चालच आहे काही प्रांतांत. आपलं म्हणणं दामटवतात अथवा लग्नावर बहिष्कार टाकतात. अशा उदाहरणांना सुधरवता येत नाही आणि सिनेमे याच प्रकरणांवर चालवतात.
ही सांपल्स नसतील तर काय वाटेल ते करता येते.
( बाकी परंपरा म्हणजे मोठ्या लोकांनी केलेला हलकटपणा असे माझे स्पष्ट मत आहे.)

मुद्दा क्रमांक २) मुलीने नाव बदलणे - इथे एक लक्षात घ्या की bank वगैरेत जुने खाते जुन्या नावाने चालवता येत होतेच. आता आधार नंबरामुळे नावातला बदल केला तर नाही चालणार.
३)समजा एखादीने नावात बदलच केला नाही आणि नावनोंदणीत जुनेच नाव लिहिले तरीही नोंदणी अधिकारी तसे करेलच.

-------
उगाच जर तर च्या गोष्टी काढून वादविवाद सोशल मिडियावर करता आले तरी व्यवहारात ते अमलात आणायला तेवढी समज हवी.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कसलीच बंधन नको,असू वडिलांची जबाबदारी नको हा आधुनिक समजला जाणार विचार खूप फोफावतो आहे .
कारण ह्या मध्ये फायदा आहे.
पण आई वडिलांच्या स्थावर मालमत्तेचा वर अधिकार सोडून देणे हा व्यक्ती स्वतंत्र चा च भाग असलेला विचार स्वीकारला जात नाही इथे तोटा आहे.
असा वारसा हक्क नाकारलेली एक तरी आधुनिक विचाराची व्यक्ती अस्तित्वात आहे का.
आधुनिक पना म्हणजे अधिकार हवेत पण जबाबदारी नको.
समाजाची बंधन नकोत पण समाजातून मिळणारे सर्व फायदे पाहिजेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेश एकच नंबर बोलत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

" समजा एखादीने नावात बदलच केला नाही आणि नावनोंदणीत जुनेच नाव लिहिले तरीही नोंदणी अधिकारी तसे करेलच. "
-- गैरसमज. नोंदणी पद्धतीने केलेल्या लग्नाच्या नोंदणीकागदावर दोघांचे मूळ संपूर्ण नाव (नाव, वडिलांचे नाव, आडनाव. आईचेही पहिले नाव लिहिण्याचा नियम मी लग्न केले तेव्हा नव्हता) लिहिलेले असते. आधी त्याचे, मग तिचे. नंतर साक्षीदारांची नावे. खाली नोंदणी अधिकाऱ्याची सही.
पासपोर्टच्या फॉर्मवर देखील आपण आपले नाव कधी बदलले आहे काअसा प्रश्न असतो. नाही म्हटले की मूळ नावानेच नूतनीकरण होते. लग्न झालेले असा स्टेटस असला तर एकमेकांचे नाव पासपोर्टवर शेवटच्या पानावर येते व त्यासाठी फक्त विवाहनोंदणी कागद लागतो.
पण नाव न बदलण्याचा मुद्दा लावून धरावा लागला होता तो रेशन कार्डबाबत. तेव्हा अजून आधार कार्ड आले नव्हते. त्यामुळे पासपोर्टसाठी रेशन कार्डाचे प्रस्थ होते. आणि तेव्हा आम्ही माझ्या क्वार्टर्सवर राहात होतो, ते घर माझ्या व्यवस्थापनाने मला दिलेले होते. त्याने आधी त्याचे रेशनकार्ड त्याच्या आधीच्या पत्त्यावर घेतले होते, तेथून माझ्या कार्डावर त्याचे नाव घालताना त्याचे आडनावही लावा हे गळी उतरवण्यासाठी वरच्या रेशन ऑफिसात जावे लागले होते. (मुळात बाईचे नाव कुटुंबप्रमुख म्हणून ? शांतम् पापम ! आणि तिचे आडनाव वेगळे ! माझा शिधापत्रिकेवर कुटुंबप्रमुख हे पद असण्यालाच आक्षेप होता, आहे. कार्डधारकाचे नाव व कुटुंबातील इतर सदस्यांची नावे व कार्डधारकाशी नाते हे समानतेला धरून आहे.) हेच जर माझे नाव त्याच्या शिधापत्रिकेत घालायचे असते तर आडनाव वेगळे लिहा हे गळी उतरवताना आणखी दमछाक झाली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गैरसमज कसा?
-----
धार्मिक पद्धतीने झालेल्या लग्नाचे नंतर नोंदणी करत होतो. म्हणून नवीन नावच देत असावेत.
---
कोर्ट/रेजिस्ट्रार - म्यारेज, या म्यारेजमध्ये अगोदरचे तिचे/त्याचे नाव ही ओळख आणि लग्न अमक्याशी होणार. पण लग्नानंतर कोणते नाव ठेवणार हा रकाना असेल तर तिथे जुनेच नाव ठेवण्यात त्यांचा आक्षेप का असेल?

( धागाविषय सुटत आहे मान्य.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

( धागाविषय सुटत आहे मान्य.)

हिंट देण्याची पद्धत चांगली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बायकांना अत्यंत साध्या गोष्टींसाठी शक्ती, वेळ खर्च करावे लागतात; पुरुष अशा गोष्टी सहज, गृहीत धरतात. त्यातून थकवा येतो; चिडचिड होते; आपल्यासारखे अनुभव इतर कुणाला आहेत का, हेही शोधावंसं वाटतं.

गौराक्का, अशा बाबतींत बाहेरच्या लोकांच्या निरुपयोगी, उपद्रवी गोष्टींकडे साफ दुर्लक्ष करा आणि तुम्हाला काय हवंय ते करा.

एक शाळकरी मैत्रीण काही वर्षांपूर्वी म्हणत होती, माझ्या लग्नाच्या वेळेस तुझ्यासारख्या मैत्रिणी (भौगोलिकदृष्ट्या) जवळ असत्या तर माझं नाव तेच राहिलं असतं. तिचा नवराही तेव्हा, तुला काय हवं ते कर, म्हणून बाजूला बसला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बायकांना अत्यंत साध्या गोष्टींसाठी शक्ती, वेळ खर्च करावे लागतात; पुरुष अशा गोष्टी सहज, गृहीत धरतात.

(या धाग्यात त्याचा) संबंध काय?

इथे कन्यादान करण्याचा हट्ट गौराक्कांच्या मातुःश्री करीत आहेत; (टू द बेष्ट ऑफ माय नॉलेज अँड बिलीफ) गौराक्कांचा (होऊ घातलेला) नौरा नव्हे. 'तुला काय हवे ते कर' म्हणून बाजूला बसण्याचा ष्ट्याण्डदेखील (टूदबेऑमानॉअँबि) गौराक्कांच्या मातुःश्रींनीच घेतला आहे; गौराक्कांच्या (हो.घा.) नौऱ्याने नव्हे.

गौराक्कांच्या मातुःश्री (पुन्हा, टूदबेऑमानॉअँबि) पुरुष नसाव्यात. (चूभूद्याघ्या.)

----------

त्यांच्या घरातील मागच्या पिढीतले वातावरण भलतेच प्रागतिक/सुधारणावादी असल्याखेरीज.१अ

१अ पण मग त्या परिस्थितीत कन्यादानाचा प्रश्नच उद्भवता ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'तुला काय हवे ते कर' म्हणून बाजूला बसण्याचा ष्ट्याण्डदेखील (टूदबेऑमानॉअँबि) गौराक्कांच्या मातुःश्रींनीच घेतला आहे; गौराक्कांच्या (हो.घा.) नौऱ्याने नव्हे.

गौराक्का यांच्या प्रतिसादातून

नौरा बिचारा आई आणि बायको आणि बायकोची आई यात बेकार अडकलेला आहे. तू तुला काय हवं तसं कर म्हणून त्याने माझ्यापासून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटचं कार्ड तेच आहे, जावयाला समोर करून आईसाहेबांना त्यांची तलवार म्यान करायला सांगणे. आईसाहेब त्यालाही तू चुप रहा तुला काही समजत नाही म्हणण्य्याची शक्यताही आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बायकांना कमी लेखण्याची व्यवस्था कोणी का राबवत असेना, भोगायला लागतं ते बायकांनाच. तेही विचार करणाऱ्या बायकांनाच. अशा वेळी त्यांना ज्यांनी साथ देणं अपेक्षित असतं - आयुष्याचे जोडीदार, नवरे - ते बाजूला बसतात. पुरुषांना ना हे स्वतःला सहन करावं लागतं; ना बायकोला साथ देत.

त्यामुळे अशा बाबतीत पुरुषांनी दिलेले वरवर समजूतदारपणाचे सल्लेसुद्धा आत्यंतिक कोरडे असू शकतात. गौराक्का आणि त्यांच्यासारख्या स्वतंत्र विचार करू शकणाऱ्या सगळ्या स्त्रियांनी ह्याचा जरूर विचार करावा.

गौराक्का, तुम्ही जो निर्णय घ्याल, तो तुमच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे. माझी मैत्रीण सक्तीच्या नावबदलासमोर तेव्हा झुकली; त्यानंतर ५-७ वर्षांनी माझ्यासमोर दुःख व्यक्त करत होती. घरच्यांना दुखावायचं का आपल्या बुद्धीला पटेल ते करायचं हा निर्णय सोपा नाही. मध्यममार्ग काढता आला तर उत्तमच. त्यासाठी शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यामुळे अशा बाबतीत पुरुषांनी दिलेले वरवर समजूतदारपणाचे सल्लेसुद्धा आत्यंतिक कोरडे असू शकतात.

वाटू शकतात. असतीलच असं नव्हे.

एकंदरीत तो तत्वाचा मुद्दा आपल्याला किती डाचतो यावर किती संघर्ष करायचा हे अवलंबून असतं (गिव्हन की आपलेच जन्मदाते चर्चेने मानणारे नाहीत हे जाणवतं).

तो अत्यंत महत्वाचा मुद्दा किंवा जय पराजय असेल तर असे प्रश्न पडणार नाहीत. लेखाचा टोन हलका फुलका वाटल्याने तो अगदी अस्तित्वाचा बेसिक मुद्दा आहे असं वाटलं नाही.. आणि त्यामुळे त्यापायी स्वतःचे आई बाप यांच्याशी शेंडी तुटो वा पारंबी तुटो इतका / एक घाव दोन तुकडे असा संघर्ष करून निर्णय घ्यायचा असेल इतकी तीव्र भावना वाटली नाही म्हणून सुचवणी केली, किंबहुना मत मांडलं.

मुंज करायची नाही, अमुक महाराजांच्या मठात जायचं नाही.. ते सर्व माझ्या तत्वांना तिलांजली देण्यासारखं आहे असा कणखर पवित्रा ठेवून मी आजीला आयुष्यभर नाही तर नाही दाद दिली. ती गेली मरून. आता वाटतं काय औटकम झाला? ती सुधारली? मी सुधारलो? अगदी कैफात सांगत आलो की मी माझ्या मनासारखं केलं.. माझ्या मुलाची मुंज न करणं किंवा त्याला कोणत्या मठात जायला न लावणं किंवा त्याला प्रेमविवाह करू नको असं न सांगणं किंवा इतर कोणी मुलगी लग्न करून आण पण .अमुकपैकी. नको बाबा.. असं काही आडकाठ्या न घालणं किंवा रजिस्टरच लग्न कर किंवा पुण्यातच घर घे वगैरे असं काहीच न पुश करणं हे जास्त योग्य ठरेल माझ्या तत्वाच्या प्रगतीसाठी.

  • ‌मार्मिक4
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'तुमचा जन्म अमुक म्हणून झाल्यानं तुम्ही खालच्या पातळीवर राहणार; तुम्ही वस्तूसारख्या दान दिल्या जाणार किंवा तुमचं नाव/ओळख बदलून टाकणार', असं उदाहरण ह्यात दिसलं नाही. हाच तो कोरडेपणा ...

स्वतंत्र बुद्धीच्या बायांना तो अनुभव माहीत असतो, तसा स्वतंत्र बुद्धीच्या बिनशहरी अवर्णांनाही तो चांगलाच माहीत असतो. समाजाच्या उतरंडीत असे अनुभव उच्चवर्णीय, स्ट्रेट, पुरुषांना येतच नाहीत! सह-अनुभूती येणारच कुठून?

माझ्याशी असं कोणी वागलात तर "तुम्हाला माझी किंमत नाही, मी तुमची किंमत का करू?" असा रोकडा सवाल विचारण्याची आणि त्यातून होणारी गुंतागुंत सहन करण्याची क्षमता माझ्याकडे आहे. त्यातही तुम्ही निराळे; गौराक्का निराळ्या आणि मी निराळी. आपल्याला किती पंगे घेणं झेपतं ते पाहावं आणि पंगे घ्यावेत. माझ्या मैत्रिणीला अजूनही आपलं नाव बदलू दिल्याची - आपल्या नावावरचा, ओळखीवरचा आपला हक्क, ताबा घालवल्याची - पुरेसा खमकेपणा न दाखवण्याची बोच आहे. अशी बोच ज्यांना राहणार नाही, असं वाटतं, किंवा आपण होऊन कन्यादान, नाव बदलणं हवंसं वाटतं त्यांनी जरूर परंपरा पाळाव्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

का करायला गेलात जस्टिफाय???

जाल पुन्हा?

'कारण शेवटी आम्ही भटेच! त्याला काय करणार?' म्हणून सोडून द्यायचे, तर...

(किंवा, आमच्यासारखा 'I don't owe the world an explanation' स्टान्स घेऊन बघाच एकदा. पण हे मी तुम्हाला सांगायला नको.)

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मार्मिक दिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाव बदलणे आणि साधारण एका मठात जायला एक दिवस खर्च करणे ही एकच गोष्ट नाही. नाव बदलणे ही कायम राहणारी गोष्ट आहे. कोणाची मर्जी राखण्यासाठी तत्त्वांना बारकीशी मुरड घालणं किंवा न घालणं, हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. नाव बदलणे ह्या प्रकाराबरोबर जन्मभर राहणं जमणार आहे का ह्याची शहानिशा स्वत:शीच करणं महत्त्वाचं.
बादवे चर्चा भरकटते आहे.
धागाजननीला कन्यादान हे खरंच दान आहे का, ह्यात स्त्रियांना एक वस्तू असं मानलं जातं का इ. ह्यावर विवाद अपेक्षित होता.

आणि ह्यातून जे निष्पन्न होईल ते तिच्या निर्णयावर परिणाम करेल हे नक्की आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

नाव बदलणे, त्याची सक्ती असा कोणताही मुद्दा मूळ धाग्यात दिसला नाही. फक्त एका विधीपुरता वाद आहे आणि तर्कदृष्ट्या तो विधी सरळ सरळ स्त्रीला दुय्यम स्थान देणारा आहे. पण पालक त्या उद्देशाने तो करू इच्छित नसून केवळ प्रथा चालवण्याचा आपला हट्ट / prestige issue म्हणून तो धरुन बसलेत.

आता तो करण्यासाठी त्यांचं मन वळवणं हा उपाय जनरली शक्य नसतो असं निरीक्षण आहे आणि धाग्यातही त्याला पुष्टी मिळते आहे.

अशा वेळी हा अस्तित्वाचा लढा, माघार घेणं, कायमचा पश्चात्ताप वाटेल इतका चरचरीत अपमान वाटत असेल तर बेलाशक रजिस्टर्ड लग्न करावं. इथे कुठेतरी ज्येष्ठांना पटवून देणं, नातं टिकवणं असा टोन लेखात दिसला म्हणून असं वाटलं की खरेच काय करावं असा संभ्रम पडला असावा. पण पुढे प्रतिसाद चर्चा वाचून मात्र मतं बरीच स्पष्ट असल्याचं दिसतं. तेव्हा हा विधी केवळ आई वडिलांच्या मनाखातर स्वीकारू नये असं सांगावंसं वाटतं. कारण पुढे सतत ते मनात राहणार असं दिसतं आहे.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त. जबरा फॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि ह्यातून जे निष्पन्न होईल ते तिच्या निर्णयावर परिणाम करेल हे नक्की आहे.

कसला निर्णय? कन्यादान करायचे की नाही याचा, की लग्न करायचे की नाही याचा? (असल्या अकलेचे तारे तोडणाऱ्या, 'बाजूला बसणाऱ्या' इसमाशी खरोखरच लग्न करायचे आहे का, असाही प्रश्न उद्भवू शकतोच., , त्यात पुन्हा, सगळे पुरुष असलेच, म्हटल्यावर...)

मुळात, इतक्या वैयक्तिक प्रश्नाची चर्चा (नि निर्णय) सार्वजनिक फोरमवर करायला हे काय राखी सावंतचे स्वयंवर आहे? त्याकरिता ओपीनियन पोल/जनमताचा कौल कशासाठी?

असो. इत्यलम्|

----------

समस्त स्त्रीवादी, आता खूष? (नॉट दॅट आय केअर.)

वास्तविक, धिस इज़ नन ऑफ माय बिझनेस. (नॉर शुड इट बी.) परंतु, एक स्ट्रिक्टली बायलॅटरल मॅटर (कश्मीरप्रश्नासारखे) इंटरनॅशनलाइझ केले, की हेच व्हायचे. यू आस्क्ड फॉर इट!

स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका. (किंवा, जमत नसले, तर आपल्या जवळच्या, विश्वासातल्या लोकांना खाजगीत विचारा. वैयक्तिक प्रश्न असे चव्हाट्यावर मांडू नका.)

बाकी चालू द्या.

डिस्क्लेमर: हा (बोले तो, 'असल्या' इसमाशी लग्न करायचे की नाही ते ठरवा, हा) माझा सल्ला नव्हे. केवळ, असा प्रश्न उद्भवू शकतोच, अशा प्रकारचे ते (स्पेक्युलेटिव) विधान आहे. इतःपर धागाकर्त्रीच्या या संदर्भातील कोणत्याही कृतीस मी जबाबदार नाही.

वैट्ट्ट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट्ट्ट, दुष्ष्ष्ष्ष्ष्ट!!!

उपमेकरिता सॉरी, बट नॉट सॉरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समस्त स्त्रीवादी, आता खूष? (नॉट दॅट आय केअर.)

इफ नॉट व्हाय बॉदर आस्कींग ?

स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका.

ते आहेच, इथे निर्णय नाही दुसरा कोणता मुद्दा यात असू शकतो का याच्या पडताळणीसाठी हा धागा सुरू केलाय. (सी द कोरा लिन्क)

टॅनुल्याच्या म्हणण्याप्रमाणे कन्यादान हे नक्की दान आहे की नाही याबद्दल वेगवेगळी माहीती मिळतेय मला आंतर्जालावर.
डोळे झाकून मी म्हणेन तेच्च्च खरं असं करायचं नसल्याने हा मुद्दा चव्हाट्याव्र्र मांडण्याचा सायास.

अवांतर
-----------------
बाकी आपण जेंडर इक्वालिटीवाले आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

अनुमोदन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> निर्णय नाही दुसरा कोणता मुद्दा यात असू शकतो का याच्या पडताळणीसाठी हा धागा सुरू केलाय. >>>>

कितीही पडताळा पण ते अमलात आणण्याचे धाडस, स्वातंत्र्य नसेल तर नंतर "मला हे पटलेलं पण अमक्या तमक्याच्या आग्रहा/हेक्यासाठी केलं" अशी सारवासारव करण्याची वेळ येऊ नये.

-----
लग्न झाल्यानंतर नोंदणीसाठीच्या फॉर्मवर भटजींची सही आणि साक्षीदारांची सही असते. सरकारी मनुष्य किंवा सरकार काही तपासणी करायला येत नाही - आपण खरेच हे विधी केले आहेत का.
आता पद्धत बदलली आहे का?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चौदाव्याचे जर असे मत व्हायला लागले असेल तर त्याला त्या घातक वळणावरून वाचवणे इष्ट. आंतरजालावर काय गोमूत्राने कोरोना जातो आणि सतीप्रथेचा गोडवाही वाचायला मिळेल. वाचनात तारतम्य नको ?
हल्ली त्याची काळजी वाटू लागली आहे. तरी त्याला पुण्याला धाडून देणे.
तेही जमत नसेल(त्याला) तर किमान डोंबोलीला आचरट बाबांकडे पाठवून देणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणी धैर्यधर नसले की हेच होते. शिवाय अमुक केलं तर हा आणि तमुक केलं तर तो/ती दुखावला जाईल ही भीती.
-----
कुणी मला विचारलं तर मी सांगतो की निर्णय घेण्याची ठाम ताकत असेल तरच सांगतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अदिती व गवि - प्रतिसाद आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असला आगाऊपणा करून मनस्ताप, रुसवे फुगवे या शिटाशिवाय फार काही हाती पडत नाही. तुम्हाला मुलं होतील तेव्हा कदाचित तुम्ही त्यांना हे स्वातंत्र्य द्याल असं मानून चाला. गम्मत म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांवर हेच लादण्याची शक्यता जास्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

असला आगाऊपणा करून मनस्ताप, रुसवे फुगवे या शिटाशिवाय फार काही हाती पडत नाही. तुम्हाला मुलं होतील तेव्हा कदाचित तुम्ही त्यांना हे स्वातंत्र्य द्याल असं मानून चाला.

कोणाकोणाशी सहमत व्हावे लागेल आजकाल, सांगवत नाही.

गम्मत म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांवर हेच लादण्याची शक्यता जास्त आहे.

मात्र, गृहीतक म्हणून हे पटले नाही. या गृहीतकास आधार जाणून घ्यायला आवडेल.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मात्र, गृहीतक म्हणून हे पटले नाही.या गृहीतकास आधार जाणून घ्यायला आवडेल.

नौऱ्याने तू तुझ्या पोराला / पोरीला तिच्या मनाप्रमाणे करायला दे, अशी वागू नकोस वगैरे अकलेचे तारे तोडले आहेत. आताचा मुद्दा सोडून उगा फ्युचरमध्ये घुसल्याने चिडून मी त्याला इथेही मीच मागे हटू आणि तिथेही मीच का असं ऐकवल्यावर त्याने कपाळावर हात मारला आहे.

मजेचा भाग सोडला, तर कदाचित हीच मानसिकता असावी, सगळीकडे मीच मागे का व्हायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

नौऱ्याने तू तुझ्या पोराला / पोरीला तिच्या मनाप्रमाणे करायला दे, अशी वागू नकोस वगैरे अकलेचे तारे तोडले आहेत.

हेच. गृहीतकामागे हीच कारणे आहेत. एका हायपोथेटिकल सिच्युएशन मध्ये - उद्या नौऱ्याने एखांदे जग्गीटैप व्हॉट्सप/तत्सम फॉरवर्ड वाचून/पाहून 'कन्यादान हा भारतीय विवाहसंस्कृतीचा आत्मा आहे' ऐसे ठाम मत करून घेतल्यास हा प्रश्न परत ऐरणीवर आलाय. आता गौराक्काला हे अजिबात पटत नसूनही डोक्यावरून मिऱ्या वाटणाऱ्या मुलीवर हक्क गाजवावासा वाटू लागला आहे. (सगळीकडे मीच मागे का व्हायचं?) डो.मि.वा. मुलगीही काही ऐकणाऱ्यातली नाही त्यामुळे खुमखुमी अजून पेटली आहे. and so on..

आयला, गेली पन्नास साठ वर्षे हजारो बॉलीवूड ष्टोऱ्या 'ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन' हे कोकलून गेल्या तरी जातीबाहेर लग्न न करण्याचं प्रमाण झ्याटभरसुद्धा कमी झालं नाही. असल्या गोष्टी लगेच बदलत नसतात.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

वरील शब्दाचा काय अर्थ आहे? नक्की कोणते प्रमाण आहे ते मोजण्याचे,?

त्या शब्दाला दुसरा शब्द उपलब्ध आहे की नाही.?
ऐसी अक्षरे ला हा शब्द मान्य आहे का ?म्हणजे आम्ही पण
मध्ये मध्ये वापरात जावू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या ऐसीवर शष्पोत्सव चालू आहे. त्यातीलच ही एक एंट्री.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संविधानात्मक शब्द 'गुंजभर' , चिमुटभर,. हिंदीत 'तनिक भर'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वैदिक पध्दतीने लग्न करायचं तर हा विधी टाळता येत नाही, म्हणे! त्यामुळे तो करायचा किंवा नोंदणी पद्धतीने लग्न करायचं. नाहीतर नील यांच्या प्रतिसादाचा पहिला भाग खरा ठरण्याची शक्यता अधिक. बाकी स्त्री ही दान करण्याची वस्तू हे खटकतं वगैरे आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>वैदिक पध्दतीने लग्न करायचं तर हा विधी टाळता येत नाही, म्हणे! >>
लेखाच्या मूळ विषयाकडे वळून - "कन्यादान करणे दुय्यमपणाचं लक्षण आहे" यास मी पहिल्या प्रतिसादात उत्तर दिलं आहे.( सज्ञान नसलेल्या मुलांचे भले करण्यासाठी जरी bank खाते उघडायचे असले तरी पालकांची परवानगी लागते. )
तर आता सज्ञान मुलगी लग्नास उभी असताना कन्यादान विधीची (= पालकांची अनुमती)गरज नाही.

तरीही इतके वर्षं चालू आहे तर करुया म्हटल्यास त्यात कमीपणा धरू नये. / किंवा करुच नका.

नोंदणी पद्धतीने लग्न करायचं. तर त्यांना फक्त चार साक्षीदार लागतात.

-------------
बाकी लेखिकेने हे प्रतिसाद आईला दाखवले का?
------------------

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साग्रसंगीत सगळे विधी करून एका पद्धतीने लग्न करा, म्हणजे तुमचे घरचे लोक खूष. आणि नोंदणी पद्धतीने परत एकदा करा म्हणजे तुम्ही खूष. आईवडिलांच्या आणि तुमच्या आयुष्यात (hopefully) एकदा येणारा हा प्रसंग आहे. हा विधी जास्त त्रासदायक वाटत असेल त्याकडे तुम्ही मनोरंजन म्हणून पाहू शकता. Pick your battles. दुसऱ्या महत्त्वाच्या विषयांवर (उदा. नावबदल) तुमचं चालवून घ्या. ' माझं लग्न आहे ' अशी टोकाची भूमिका घेता येत नाही. एकतर आपल्या संस्कृतीत लग्न हे दोघांचं नसतं. शिवाय हे विधी ही अतिशय किरकोळ बाब आहे त्यावर इतकी डोकेफोड करायची गरज नाही. हा एका गावातून शहरात आलेल्या अवर्णाचा सल्ला!
Just take a chill pill.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या निमित्ताने, पुणे परिसरात (निदान एके काळी तरी; कदाचित आजही असू शकेल.) प्रचलित असलेल्या 'आळंदीस जाऊन विवाह' या विकल्पाबद्दल कोणी (नॉट नेसेसरिली अनुभवी) जाणकार विस्तृत माहिती विशद करून सांगू शकतील काय?

(कॉलिंग अबापट, अनुप ढेरे, कदाचित अतिशहाणासुद्धा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीसंचालकमंडळ, तुम्ही 'गविस्तर' (श्रेयाव्हेर: कुणी तरी 'इथलाच/इथलीच/इथलेच' किंवा 'तिथला/तिथली/तिथले') अशी नविन श्रेणी का चालू करत नाही!

- एक संस्थळहितेच्छु

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

हिंदू धर्माच्या रिती रीवजा नुसार,कन्यादान,सप्तपदी हे एक विधी आहेत.
कन्यादान चा विधी केल्यामुळे त्या स्त्री चे स्वतंत्र धोक्यात येत नाही,माहेर तुटत नाही,खऱ्या आयुष्यात फक्त तो विधी केल्या मुळे काही फरक पडत नाही.
परंपरेने चालत आले आहे त्या मागे काही उध्येष सुद्धा असेल.
ज्या विधी नी कन्येच्या खऱ्या आयुष्यात काही ही फरक पडत नाही तो विधी स्व धर्म जागृत ठेवण्यासाठी केला म्हणून काही ही आभाळ कोसळत नाही.
आणि इथे सक्ती पण नाही .
नाही केले कन्यादान म्हणून तुम्हाला कोण्ही हिन सुद्धा लेखत नाही.
हिंदू धर्माच्या प्रत्येक गोष्टी वर विनाकारण चर्चा घडवून आणायची ही पुरोगामी लोकांची जुनी खोड आहे.
आम्हाला आमचा धर्म प्रिय आहे आम्ही तो विधी करणारच .असे ठाम राहवे .
नसेल तर सरकारी ऑफिस मध्ये जा आणि हार घालून विवाह बांधणार अडका .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

१) कर्मकांड म्हणजे धर्म नव्हे.
२) हिंदु धर्मात जातीयतेचे विषही होते, त्याचे निर्मूलन अजूनही पूर्णपणे झालेले नाही.
३) गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या मग तो ते जोखड झुगारून देऊ पाहील. हे आंबेडकरांचे विधान स्त्रियांच्या बाबतीतही लागू होते.
४) तारतम्य आणि आपलेपणाची भावना या दोन गुणांच्या जोरावर स्त्रिया घरं आणि पर्यायाने समाजाला स्थैर्य देत आल्या आहेत.
म्ह्णून त्यांनी सतत अन्यायाकडे मोठ्या चित्राच्या चौकटीचा विचार करून दुर्लक्षच करावे आणि पुरुषांनी मात्र यात धर्माचे पालन पाहावे ही एकतर्फी सोय आहे.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कन्यादान विधी आणि स्त्री ची अस्मिता ह्याचा संबंध जोडायची काही गरज नाही.
तो एक विधी आहे तो स्त्री चे हक्क मारत नाही किंवा स्वतंत्र सुद्धा हिरावून घेत नाही आणि आपल्या इच्छ्येवर आहे जबरदस्ती कोण्ही करत नाही.
समानता हवीच ते कोण्ही नाकारत नाही .
अक्षता ना विरोध करायचं कारण काय तर धान्य वया जाते किती? १० kg chya aastach jat asel .
Te pan vaya jat nahi baher फेकल्यावर पक्षी खात असतील .
म्हणजे व्यर्थ विरोध .
कन्यादान विधी ला विरोध
सप्तपदी ला विरोध
मुलीला मुलाच्या घरी लग्न झाल्या नंतर विरोध.
कुटुंब पद्धती ला विरोध.
म्हणजे हिंदू च्या प्रतेक गोष्टीला विरोध.
म्हणजे ह्याचा अर्थ सरळ आहे सर्व खुणा पुसायचा प्रयत्न चालू आहे बुध्दी भेद करून .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो तुम्ही गौराक्कांना मदत करताय की त्यांच्या मातोश्रींना?
कमाल करते हो प्रजापती पांडे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वलराव ,अहो, ते सनातन हिंदू धर्म व परंपरापालन यांना मदत करत असतील कदाचित.
हे जपलं पाहिजे की नै ?
तुम्ही सनातन नावाच्या संस्थेची वेबसाईट वाचा व अभ्यास वाढवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदू धर्माचा अभ्यास वाढवायला सनातन प्रभात..
बसक्या अण्णा.. हे म्हणजे गायनाची तालीम घेण्यासाठी हिमेशकडे जाण्यासारखं झालं.
त्यापेक्षा राजेश१८८ंशीच ह्या विषयावर (वेगळ्या धाग्यात) चर्चा करू.
तूर्तास गौराक्कांना मदत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जन्माला आल्यवर डॉक्टर बाळाच्या पायाला धरून बाहेर काढतात असं पाहीलं होतं (अर्थात पिच्चरात)
तुमच्या वेळेस चुकून डॉक्टरानी डोक्यावर पाडलं काय तुम्हाला?

(अर्थात तुम्चा जन्म हास्पिटलात झाला असावा असं ग्रुहित धरून. यू कॅन रिप्लेस डॉक्टर विथ हूएवर वॉज देअर)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

व्हूएव्हर वॉज कि व्हूएव्हर वर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

३) गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या मग तो ते जोखड झुगारून देऊ पाहील. हे आंबेडकरांचे विधान स्त्रियांच्या बाबतीतही लागू होते.

लौ यू, उज्ज्वला!

आणि आंबेडकरांनीही, गुलामांना थेट बंड करायला सांगितलं नाही. बंड करण्याची तयारी आपली आपणच करावी लागते. तेव्हा आपल्याला आपलं अस्तित्व, ओळख, विचारस्वातंत्र्य महत्त्वाचे वाटत असतील तर खुशाल बंड करा. देव-देश-धर्म आणि नातेवाईकांच्या आणाभाका घेऊन चालवलेला मराठी मालिकाछाप मेलोड्रामा किती काळ चालवून घ्यायचा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपल्या कुटुंबापुयते सम्यक विचार आचरण ठेवायला काहीच हरकत नसावी. कारण तुम्ही अमुक एक गोष्टी केल्या/केल्या नाहीत तरी कुठेही धर्मगुरू ( जे कोणी ) अडवायला येत नाहीत.
इतर धर्मांत मात्र तसे होते आणि त्यांना ठराविक आचरण करावेच लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घ्या मिटवून...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिटवून घेणारच पण सात्विक संताप व्यक्त करायलाच हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर मी प्रतिसादात माझे मत दिले होते पण फंडामेंटलिस्ट लिबरलांचे प्रतिसाद डोक्यात जात आहेत, त्यांच्यामुळे आमच्यासारख्या सेन्सिबल लिबरलांची बदनामी होते हे पुन्हा नमूद करतो आहे. चक्क राजेश188शी सहमत व्हायला लागतंय यावरुन इंटेलेक्चुअल येट इडियट लिबरल किती वहावत चाललेत हे अधोरेखित होते.
कन्यादान हा अत्यंत हार्मलेस - निरर्थक विधी आहे. त्यामुळे कुठल्याही स्त्रीचे स्वातंत्र्य - अस्मिता धोक्यात आल्याचे मला दिसलेले नाही. कन्यादान केले आहे, पोरगी उजवली आहे तर नंतर जावयाने तिला कितीही त्रास दिला तरी केवळ कन्यादान केले म्हणून तिची मदत करणार नाही असा पवित्रा घेणारे आईबाप माझ्या पाहण्यात नाहीत. आपले दान केले आहे हे समजून आता स्वातंत्र्य गमावले म्हणून रडत बसलेल्या पोरीही पाहिलेल्या नाहीत. जे लोक पोरगी उजवल्यानंतर - सासर हेच तिचे घर - असे समजून तिची जबाबदारी नवऱ्यावरच टाकून देतात किंवा कन्यादान हा विधी झाल्याने आता नवरा हाच आपला नवा मालक असे समजून ज्या पोरी रडत बसतात, असे लोक केवळ कन्यादान हा विधी बंद केल्याने आज, आत्ता, ताबडतोब जागे होऊन शहाणे होतील अशी सुतराम शक्यता नाही.

मात्र वर प्रतिसादात काय दिसतंय
1. कन्यादान हा अतिशय चुकीचा, हानीकारक, अन्यायकारक अगदी मोदी, ट्रम्प वगैरेंनी एक्झिक्युटीव ऑर्डर काढून बंद करण्यासारखा विधी आहे.
2. लग्नात 2 किलो अक्षता टाकल्याने प्रचंड नासाडी होते
3. परंपरा म्हणजे धर्म नाही
4. बायकांना साध्यासाध्या गोष्टींसाठी फार सहन करावं लागतं, पुरुषांना साधंसोप्पं घरबसल्या मिळतं.

प्रत्यक्ष आयुष्यात काय दिसतं
1. मुली असलेले लोक त्यांना चांगलं शिकवतात. आपण इतकी इन्वेस्ट केलेली, पालनपोषण केलेली व्यक्ती दुसऱ्या घरी जाणार याचं वैषम्य वाटू नये म्हणून किमान कन्यादानाचं पुण्य मिळेल अशी आशा बाळगतात. (दान केलं तरी मुलीची जबाबदारी टाकून दिली आहे असं मानत नाहीत). माझ्या लग्नात कन्यादान विधी करणाऱ्या ब्राम्हणाने, दान केलंय म्हणजे तुम्ही मुलीला टाकून दिलं असं नाही हे माझ्या सासूसासऱ्यांना, आणि - तिच्या आईवडिलांनी मुलीची जशी काळजी घेतली तशी तू घेणं अपेक्षित आहे हे मला सांगितलं होतं.
2. आयुष्य हे अत्यंत क्षणभंगुर आहे हे जाणून घेऊन छोटेमोठे समारंभ आनंदाने साजरे करतात. त्यात 2 किलो तांदूळ उडवण्याची प्रथाही आहे. येशूख्रिस्त आला तेव्हाही अत्तर शिंपडणाऱ्यांना गरीबांची काळजी दाखवून शरमिंदे करण्याचा प्रयत्न केला होता. गरीब आज आहेत, उद्याही आहेत, आपण मेल्यावरही असणार आहेत त्यासाठी आयुष्यभर आंबट चेहरा करुन काळजी करत बसायची - आणि माफक आनंदाच्या अपेक्षा मारण्याची - गरज नाही. याच संकेतस्थळावर अशा उधळपट्टीने गरीबांचाच कसा फायदा होतो याची चर्चा झालेली आहे (चूभूद्याघ्या)
3. हिंदूधर्म म्हणजे परंपराच आहेत. धर्माची दुसरी काहीही व्याख्या उपलब्ध नाही.
4. साध्यासाध्या गोष्टींसाठी चक्क पुरुषही लढत आहेत, काबाडकष्ट करत आहेत. आश्चर्य वाटेल पण खरं आहे.

प्रत्येक प्रतीकात्मक प्रथेमागचे अर्थ काढून त्याचा बरेवाईटपणा शोधणारे लोक हे मला मराठी भाषाशुद्धीकारक लोकांप्रमाणे वाटतात.

असो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लग्नात 2 किलो अक्षता टाकल्याने प्रचंड नासाडी होते

वस्तुत:, काँट्रॅक्टिंग पार्टीज़ हे ट्रॅन्झॅक्शन जागेपणी आणि पूर्ण शुद्धीत राहून एक्झिक्यूट करीत आहेत, याच्या निश्चितीप्रीत्यर्थ, त्यांना खडबडून जागे करण्यासाठी अक्षता फेकण्याची पद्धत आहे. त्यामुळे अन्नधान्याची नासाडी होते अशी कन्सर्न असल्यास, त्याऐवजी दोन किलोंची दगडफेक करावी काय?

(पूर्वी रेशनच्या खड्यांत तांदूळ असायचे. कदाचित मूळ पद्धत दगडफेकीचीच असेल, परंतु खड्यांतील तांदळांचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत गेले असेल. कोणी सांगावे?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी3
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विरोध करायचं म्हणून काही ही लॉजिक लावून करायचा, हे काही पटत नाही.
हा आडके पना येण्यासाठी माणसाला निर्लज्ज असणे गरजेचे आहे.
आणि नेमका हाच गुण लिबरल लोकांत आहे असे खेदाने म्हणावे असे वाटत आहे.
एकद्याचे आई वडील वयस्कर असतील त्यांना आयुष्याच्या संध्याकाळी देव दर्शन करायची इच्या असेल तर त्यांना देव नाही हे सांगत बसणार की त्यांच्या इच्या पूर्ण करणार.
कोणती गोष्ट शहाणपणाची आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समोरच्याची बाजू पटली नाही की समोरचा निर्लज्ज होतो की आपण इम्पेशन्ट? - हे स्वत:च्या आत डोकावुन तपासून बघा राजेश.
'निर्लज्ज' हा अपशब्द वापरायची काहीही गरज नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समोरच्याच विचार पटत नाहीत म्हणून तो शब्द वापरला नाही ,आपल्या व्यतिरिक्त बाकी सर्वांचे विचार थोतांड असतात असे समजणाऱ्या प्रवृत्ती विरूद्ध वापरला आहे.
अक्षता टाकल्या मुळे तांदळाची नासाडी कशी होत नाही आणि खूप कमी प्रमाणात त्याचा वापर होतो ह्याचा प्रतिवाद म्हणून दगड मारा असे सांगणे ह्याला काय शब्द वापरला पाहिजे.
लग्न सोहळ्यात माणसं झोपा काढतात का ,
त्यांना जागे करायला त्यांना दगड मारावे लागतात असली मुक्ता फळ उधल्यावर दुसरे काय बोलणार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आंजावरच्या कोणी त्रयस्थ व्यक्तिंनी आपल्या विचारसरणीला नावं ठेवली तर केवढा सात्त्विक संताप झाला! आपल्या जन्मदात्यांनी आपल्याला वस्तूसारखं दान दिलं तर मात्र सहन करून टाका हो; किती कट्टरपणा कराल!

हाच तो, हाच तो कोरडेपणा! माझा मुद्दा साधार सिद्ध करण्याबद्दल मंडळ अत्यंत आभारी आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रत्येक बाबतीत कुढत बसणारे ह्या विषया भोवतीच फिरत बसतील जोपर्यंत त्यांच्या मनाला समाधान मिळत नाही .
ते पण समविचारी लोकांना समजावत, नवं नवीन विचित्र विचार,कल्पना ह्यांचा मारा करून.

मध्ये मध्ये स्वतःच्या सोयीसाठी महापुरुषांच्या नावाचा सुद्धा वापर केला जाईल.
पण खिडकी बाहेर डोकावून जगा कडे पाहणार नाहीत.
लग्न सीजन मध्ये लग्नाचे हॉल मिळत नाहीत सर्व तारखा फुल्ल असतात,भटजी ना जेवायला वेळ मिळत नाही एवढे लग्न लावायची असतात,सर्व जण जीवनाकडे खेलखर पने बघत असतात,उगाच कल्पित कल्पना करून त्यांच्या भीती खाली वावरत नाहीत.
विवाह सोहळे दणक्यात होत आहेत २ kg tandul किरकोळ गोष्ट आहे लाखा पासून करोडो रुपये खर्च करून सर्व विधी केले जात आहेत आणि जीवनाकडे positive vicharne बघत आहेत.
लग्नं अगोदरच एवढे मतभेद असतील तर लग्न नंतर किती स्फोटक वातावरण होईल त्याची कल्पना करा.
बिलकुल निरुपद्रवी असलेल्या एका विधी वरून चार माणसात एकमत होत नसेल(मुली कडची दोन,आणि मुलाकडची दोन) तर सर्व नातेवाईक ,मित्र मंडळी,शेजारी पाजारी ह्यांना बोलून लग्न सोहळा साजरा करूच नका .
सहा जनच ( दोघांचे आई वडील,आणि भावी नवरा बायको )कोर्टात जा आणि उरकून या लग्न.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>>अजून हे दळण चालूच आहे का
Permalink Submitted by अतिशहाणा on बुधवार, 18/03/2020 - 17:44.

>>>
नै तर काय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पं. महामहोपाध्याय काणेंच्या 'हिंदू धर्मशास्त्राचा इतिहास'मध्ये खालील माहिती आढळली:

कन्यादान (वधूचे दान)
- ह्या विधीत वराने वधूबरोबर धर्म, अर्थ आणि काम ह्यांच्या बाबतीत प्रतारणा करू नये असे वधूचा पिता म्हणतो आणि तशी प्रतारणा मी करणार नाही (नातिचरामि) असे वर उत्तर देतो. हा प्रकार हल्लीही करण्यात येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

सुंदर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महामहोपाध्याय काणे यांच्या पुस्तकाचा दुवा इथे देत आहे.
https://epustakalay.com/marathi/book/5208-dharm-shaastr-vichaar-by-pandu...

विषय खोल आहे, त्यामुळे खूप शोधाशोध केली. वेद-शास्त्र-धर्म यांवर कुठेही सुलभ स्वरूपाची मीमांसा सहज उपलब्ध नसते... सुरुवात कुठून करावी कळत नाही.
मी लहान असतांना धर्मशास्त्र ह्या विषयावर व्याख्याने होत असतील, तर माझ्या दुर्दैवाने मला ती ऐकायला मिळाली नाहीत. आता स्त्रीवादी आहे, पण प्रत्येक भूमिकेमागे काय विचार आहे, ते जाणून घेणे आवश्यक आहे, हे पटते. ह्या पार्श्ववभूमीवर चर्चा-विषय अगदी जवळचा, सर्वांना भिडणारा असा वाटला!

शेवटी, निर्णय जोडप्यानेच घ्यावा, पण काणेंच्या पुस्तकात ८०व्या पानापासून विशेष विवेचन आहे, ते जरूर वाचण्यासारखे आहे. तिथून मिळणारे पुन्हा दुसरे संदर्भ सुद्धा जरूर पडताळून पाहावे. त्यात त्यांनी सांगितलेले मला कळले, ते थोडक्यात असे:
१. आई-वडिलांचा आपल्या अपत्यावर अधिकार असतो, त्या अधिकाराने ते मुलाला, किंवा मुलीला विकण्याची, किंवा दत्तक देण्याची काही समाजांमध्ये प्रथा होती. त्या अर्थी, मुलगा असो वा मुलगी, अपत्याचे दान करणे शक्य आहे.
२. परंतु दुसरीकडे याज्ञवल्क्याने मुले, व स्त्रिया 'न देण्यासारख्या' आहेत, कारण त्या वस्तू नव्हेत, असंही सांगतिलं आहे. चाणक्याने सुद्धा 'आर्यांनी' पुत्रादिकांचा क्रय करू नये असे सांगितले, कारण आर्यांमध्ये तशी प्रथा नाही.
३. काणे यांच्या मते, मुलीच्या रक्षणाची जबाबदारी, पित्याकडून संक्रमित होते, असा अर्थ घ्यावा.
- ह्यावर पूर्वी माझाही आक्षेप झाला च असता, पण, आता, एका मुलाची आई झाल्यावर मला असं वाटतं की, लग्नापूर्वी, कितीही जबाबदार व स्वतंत्र आणि स्वरक्षणास समर्थ असले, तरी मुलं ही अजूनही साधारणतः आई वडिलांची जबाबदारी असतात (ह्याला नक्कीच अपवाद आहेत, पण मी ह्याचा सरळ सारासार विचार करून अर्थ लावते आहे)
त्यामुळे कन्यादान चा विधी फक्त स्त्री-विरुद्ध आहे, असे मानण्याचे कारण नाही.

अर्थात, कन्यादान फक्त कन्येचेच का होते, वाराचे का नाही, हे पुस्तक वर वर वाचून कळले नाही. ह्यावर अजून माहिती मिळाली तर छान होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चाणक्याने सुद्धा 'आर्यांनी' पुत्रादिकांचा क्रय करू नये असे सांगितले, कारण आर्यांमध्ये तशी प्रथा नाही.

म्हणजे, कन्यादान न करण्यामागचे राश्योनाल, 'ही आर्यांची पद्धत नव्हे' (पक्षी: 'ही अनार्यांची/अवर्णांची पद्धत आहे, अत एव त्याज्य') असे (एलीटिस्ट) आहे तर!

मग तर ते (आणि त्यामागची मनोवृत्ती) हाणून पाडलीच पाहिजे, नाही काय?

"आम्ही आर्य आहोत. आमच्यात कन्यादान करत नाहीत."

"आम्ही ब्राह्मण आहोत. आमच्यात 'तसले' खात नाहीत."

अँड सो ऑन, अँड सो फोर्थ.

कन्यादानाकरिता इतके सबळ कारण दुसरे कोणते सापडावे? आर्य/सवर्ण वर्चस्ववाद्यांचे कंबरडे मोडण्याकरिता त्यांच्या नाकावर टिच्चून कन्यादान हे झालेच पाहिजे! कोणी नाही केले/करू दिले, तर तिला/त्याला 'एलीटिस्ट' अशी शिवी सर्वप्रथम माझ्याकडून जाईल.

मग नका रडत येऊ माझ्याकडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कन्यादान फक्त कन्येचेच का होते, वाराचे का नाही...

स्त्रीद्वेषाचं आणखी बरं उदाहरण कुठून शोधून आणणार?

याज्ञवल्क्याने मुले, व स्त्रिया 'न देण्यासारख्या' आहेत, कारण त्या वस्तू नव्हेत

हे पूर्ण वाढलेल्या पुरुषांबद्दल का सांगितलं नसेल? त्याच्या काळातही स्त्रियांना जबाबदारी आणि/किंवा वस्तू समजलं जात असे, असं म्हणायला आणखी काय पुरावा हवा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जरी कन्यादान दान नसून मातृपितृसाक्षी विवाह असला, तरी या प्रथेमध्ये कुठेना कुठे स्त्रियांना दुय्यम लेखले गेले असण्याची शक्यता जास्त आहेच.ती वेळच तशी होती, मानसिकताच तशी होती वगैरे. चार्वी यांनी मनुस्मृतीचा आधार दिलाच आहे. टेक्निकल अनलिसिस करून मिळणारा rseult सुस्पष्टच आहे.
पण जरी ही प्रथा misogynist असली तरी:
1) तुम्हाला ह्या प्रथेतून जाताना होणाऱ्या प्रतारणेमुळे झालेल्या मानसिक त्रासाची पातळी 1
2) इतरांना तुम्ही या प्रथेतून गेला तर मिळणाऱ्या आनंदाची पातळी
या दोनीची इंटेनसिटी पाहून निर्णय होऊ शकतो.
तसही आपण होळी, रंगपंचमी साजरा करताना कुठं टेक्निकल अनलिसिस करतो? मज्जा वाटते म्हणूनच करतो ना? इथं फक्त मज्जा तुम्हाला नाही येणार, इतरांना येणार इतकाच काय तो फरक.

---------------------------------------------------------------------------
1- इफ एनी.अतिशहाणा यांनी म्हटल्याप्रमाणे तुमचे आई वडील काही याकडे तुमचे लिटरल दान म्हणून पाहत नाहीत. त्यांच्यासाठी या प्रथेची asthetic आणि sentimental किंमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांच्यासाठी या प्रथेची asthetic आणि sentimental किंमत आहे.

आणि आता ज्या भांडण्यायोग्य गोष्टी वाटतात त्याच गोष्टींबाबत वय झाल्यावर वरील किंमत बदलते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

आम्ही आमचे लग्न पारंपरिक पद्धतीने पण कन्यादान टाळून केले. कन्यादान ऐवजी आम्ही लक्ष्मी नारायण पूजन असा विधी केला. त्यातआमच्या दोघांच्या  आई वडिलांनी आम्हाला दोघांना लक्ष्मी नारायणाचे रूप मानून आमची पूजा केली. त्यात काय मिळायचे पुण्य त्यांना मिळाले असे त्यांनी ठरविले. 
ब्राह्मी समाज पद्धती मध्ये परिणय हाही एक विधी आहे. त्याची पण आम्ही माहिती काढली होती पण आता विसरले. लग्नाला १५ वर्षे झाली. आता माझ्या नणंदेच्या लग्नात पण आम्ही लक्ष्मी नारायण पूजन केले. आमचे गुरुजी अतिशय सज्जन आहेत पण त्यांनी नवऱ्या मुलाचे पाय धुणे आणि कन्यादान लग्नात घुसवायचा अनेकदा प्रयत्न केला. माझ्या लग्नात तर मीच तो हाणून पाडला . त्यात गुरुजी विरुद्ध नवरी मुलगी अशी थोडी वादावादी झाली . मला संस्कृत थोडे फार येत असल्याने त्यांनी मधेच सुरु केलेले प्रकार कळले. दगा होईल अशी शंका होतीच. मागचा अनुभव असल्याने नणंदेच्या लग्नात असे काही झाले नाही. 

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0