तोरई (दोडके) + कोथिंबिर सूप
आज सकाळी सौ. दोडक्याची भाजी बनवत होती. मी विनंती केल्यावर सौ.ने मुगाची डाळ भाजीत टाकली. डाळ टाकण्यामुळे दोडके कमी लागले. तीन दोडके, जवळपास 250 ग्राम, उरले. अचानक अनेक महिन्यांपासून सुप्त असलेला माझ्यातला पाकशास्त्री जागृत झाला. दोन दिवस आधीच आठवडी बाजारातून सौ. ने भरपूर कोथिंबिर ही आणली होती. माझ्या सुपीक डोक्यात विचार आला, आज आपण दोडके आणि कोथिंबिर सूप बनवू. सौ. ने नाश्त्यासाठी पोहे बनविणार होती. कोथिंबिर कापल्या नंतरच्या काड्या उरलेल्या होत्या. मी कड्यांसोबत जवळपास 50 ग्राम कोथिंबिर ही घेतली. स्वाद वाढविण्यासाठी एक टमाटो ही घेतला. एक आल्याचा तुकडा ही घेतला. सर्व साहित्य कापून कुकर मध्ये टाकले. कुकर गॅस वर ठेऊन दोन शिट्या होऊ दिल्या. कुकर थंड झाल्यावर सर्व साहित्य मिक्सर मधून काढून भांड्यात टाकले. चार बाउल सूप झाले पाहिजे म्हणून अंदाजे पाणी ही भांड्यात मिसळले. आता भांडे गॅस वर ठेऊन एक उकळी येऊ दिली. त्यात अर्धा चहाचा चमचा काळी मिरी, जिरा पाउडर आणि स्वादानुसार सेंधव मीठ टाकले. गरमागर्म सूप बाउल मध्ये टाकून त्यावर लोणी टाकले. नंतर एक फोटू काढला. पोह्या सोबत हे सूप पिताना अत्यंत स्वादिष्ट लागले. दोडक्याची भाजी न खाणारे छोटे बच्चे ही, हे सूप आनंदाने पिणार याची ग्यारंटी मी देऊ शकतो.
टीप: घरात लोणी नसेल तर दुधावरची साय ही सुपात टाकली तरी स्वाद उत्तम लागेल. (घरी काळी मिरी नसेल तर एक हिरवी मिरची ही कापून कुकर मध्ये घालू शकता).
न बा सकारात्मक विचार करा
Chicken soup for soul या ग्रंथाचे वाचन करा.
जमल्यास पिता पिता वाचून बघा
We learn from observing nature. A seed produces after its kind. Apple seeds produce apples, not bananas. Grape seeds produce more grapes, not a harvest of onions. Seeds of love produce crops of love.
सदरहू ग्रंथातील एक सुंदर सुविचार
तुम्ही संस्कृतीसंमत सोमरस सुद्धा प्राशन करू शकतात
आवरा!!!
नाही म्हणजे, माझे सुपाशी एकंदरीत काहीही वाकडे नाही, परंतु… चिकन सूप!!! अऽऽऽघ!!!!!!
(आमच्या बाजूस ‘चिकन सूप’ या द्रव्याचा आजारी पडण्याशी पारंपरिक, सांस्कृतिक असा घनिष्ठ संबंध आहे. किंबहुना, ‘चिकन सूप फॉर द सोल’ या (पुस्तकाच्या) शीर्षकाची प्रेरणादेखील याच सांस्कृतिक परंपरेतून उद्गम पावली असावी. बोले तो, आजारी पडलेले सोल लवकर बरे होऊन त्याला ताकद यावी, या कथित (आणि, एकमेव!) कारणास्तव त्या बिचाऱ्या सोलावर भडिमार करण्याचे ‘चिकन सूप’, अशा अर्थाने. (‘आपल्या’कडे कसा आजारी माणसावर परंपरेने साबूदाण्याच्या लापशीचा भडिमार करतात, अगदी तस्से. किंबहुना, हेदेखील तितकेच बेक्कार लागते. आणि, तितकेच कॅरेक्टरलेस! इकडे चिकन सूप कोणी आवर्जून, हौशीने मागवून वगैरे पीत असेल, याबद्दल प्रचंड साशंक आहे. किंबहुना, कधी रेष्टॉरंटांतून वगैरे पाहिल्याचे आठवणीत नाही. (अर्थात, माझ्या निरीक्षणांची मर्यादा ही केवळ अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपुरती किंवा फार फार तर उत्तर अमेरिका खंडापुरती सीमित आहे, हे ओघानेच आले.)))
असो चालायचेच.
???
शाकाहारी??? आणि, मी?????? कधीपासून, म्हणे?
(तुम्ही काय मध्यंतरी कम्युनिस्ट वगैरे झालात काय?)
(चिकन सूपला ‘अऽऽऽघ!’ म्हटले, ते शाकाहारी वगैरे असल्यामुळे नव्हे. (फॉर द रेकॉर्ड, मी गोगलगायीपासून ते गायीपर्यंत बऱ्याच वेड्यावाकड्या गोष्टी खाऊ शकतो, नि कधीकधी खातोसुद्धा.) चिकन सूपला ‘अऽऽऽघ!’ म्हटले, ते (आमच्या इकडले) चिकन सूप हा ‘अऽऽऽघ!’ म्हणण्याच्याच लायकीचा, अंगावर शहारे आणणारा प्रकार असतो, म्हणून. (पियो, तो जानो!))
असो चालायचेच.
न बा सकारात्मक विचार करा
Chicken soup for soul या ग्रंथाचे वाचन करा.
जमल्यास पिता पिता वाचून बघा
We learn from observing nature. A seed produces after its kind. Apple seeds produce apples, not bananas. Grape seeds produce more grapes, not a harvest of onions. Seeds of love produce crops of love.
सदरहू ग्रंथातील एक सुंदर सुविचार
तुम्ही संस्कृतीसंमत सोमरस सुद्धा प्राशन करू शकतात
होते ना!
त्यात आर्य स्त्रिया ज्वारी, बाजरी वगैरे श्रीधान्यांचा कोंडा काढायच्या. आणि मग मूठ मूठ भरून जात्यात टाकून दळायच्या आणि आर्य पुरुषांना भाकरी खाऊ घालायच्या.
जे सुपात असतात ते कधी ना कधी जात्यात जातात या म्हणीचा प्रत्यय आज येतो आहे. आज स्त्रिया स्वैराचारी झाल्या आहेत आणि पुरुषांवर संसार टिकवायची जबाबदारी आली आहे. पण विश्वाच्या हिशोबात हे परिवर्तन घडायला लागणारा काळ म्हणजे केवळ एक क्षण. आता मोदीजी आले आहेत. तर ते पुन्हा स्त्रियांना जात्यावर बसवणार आहेत. त्यासाठी त्यांनी श्रीज्ज्वला योजना काढली आहे. स्त्रियांनी जातं वापरल्याने त्यांचे ट्रायसेप आणि कोर मसल टोन होणार हा एक अधिकचा फायदा. त्यामुळे त्या शयनेशु रंभा या कॅटेगरीतही बसतील
#ट्रॅडवाइफ
टाकले
इथेच नव्हे तर अनेक ठिकाणी, पाककृतींचे वर्णन करताना बहुसंख्य लोक, शिजवायच्या भांड्यात हे टाकले, ते टाकले असं लिहितात. लहानपणापासुन, भाजीत मीठ ,तिखट किंवा अन्य काहीही पदार्थ घातले, असं ऐकण्याची संवय असल्यामुळे, ही शब्दरचना कायम खटकते. ताटात अमुक वाढ असं म्हणण्याऐवजी, पोळी टाक, भाजी टाक हे कानाला कायम खटकते.
वर्तमानपत्रात बातम्या वाचतानाही साधारण असाच अनुभव येतो. लहान मुलगा किंवा मुलगी यांच्यासंबंधी काही दु:खद बातमी असली तरी , चिमुरडा, चिमुरडी असे शब्द वापरतात. अशा वेळी, चिमुकला,चिमुकली हे शब्दही मराठी भाषेत आहेत याची नवपत्रकारांना माहितीच नसते.
हम्म!
स्थानिक शब्दप्राधान्य?
हा ‘घालणे’ विरुद्ध ‘टाकणे’ प्रकार माझ्या कल्पनेप्रमाणे स्थानिक बोलींतील शब्दप्राधान्याचा प्रश्न असावा. दोन्हीं पर्यायांत खरे तर गैर असे काहीही नाही.
माझ्या समजुतीप्रमाणे, मुंबईचे लोक शक्यतो ‘घालणे’ म्हणतात, तर पुण्याचे लोक त्याऐवजी ‘टाकणे’ म्हणतात. (झालेच तर मुंबईचे लोक ‘लादी’ म्हणतात, तर पुण्याचे लोक ‘फरशी’ म्हणतात. पुण्यात ज्याला ‘दुसरा मजला’ म्हणतात, त्याला मुंबईत ‘पहिला माळा’ (किंवा, क्वचित्प्रसंगी, ‘पहिला मजला’) म्हणतात. चालायचेच.)
उलटपक्षी, ‘घालणे’ या शब्दप्रयोगातून पुणेकराच्या मनःचक्षूंसमोर अनेकदा काही अश्लील संकेत आपोआप उभे राहतात, जे मुंबईकराच्या बाबतीत (तितकेसे) होत नाही. आणि, बोलीभाषेत मुंबईकर ‘मी तिथे गेलेलो’सारखे वाक्प्रयोग सर्रास वापरतात, जे ऐकून टिपिकल पुणेकरास अंगावरून झुरळ गेल्यासारखे वाटते.
प्रत्येक स्थानिक बोलीचा बाज वेगळा असतो, आणि, आपल्याला ज्याची सवय असते, त्याहून वेगळे काही ऐकू आले, की आपल्याला ते चमत्कारिक वाटते, इतकेच. पण तो कोणाचातरी स्थानिक ‘नॉर्म’ असू शकतो. (Earthworm या प्राण्याकरिता मराठीत गांडूळ, गांडवळ, दानवे, आणि काडू, इतके विभिन्न स्थानिक पर्यायी प्रतिशब्द आहेत, याची तुम्हाला कल्पना होती काय?)
असो चालायचेच.
(अतिअवांतर: हा मजल्यांच्या मोजणीच्या बाबतीत जो मुंबई-पुणे भेद आहे, अगदी तस्साच भेद इंग्रजीत इंग्लंड-अमेरिका तत्त्वावर आहे.)
चिमुरडा, चिमुरडी असे शब्द वापरतात. अशा वेळी, चिमुकला,चिमुकली हे शब्दही मराठी भाषेत आहेत याची नवपत्रकारांना माहितीच नसते.
बादली-बारडी… Same difference.
+1
माझा नवरा मध्यप्रदेशमधला आहे. एकदा आमचं खूप भांडण चाललं होतं तेव्हा तो अगदी कळकळीच्या समजुतीने म्हणाला.
हे बघ, आपल्याला पुढे वाढायचं आहे.
आय वाझ लाईक, what? टाइम्प्लिस.
तर ते, हमे आगे बढना है याचं भाषांतर होतं.
तसंच: अचार डाला (याचं का कोण जाणे पण लोणचं टाकलं असं भाषांतर करतात. डालना = घालणे असं मला वाटतं)
खिलौने + खेळणी = खेळवणी
सेब + फळ = शेवफळ (सुरुवातीला तिथली शेवही प्रसिद्ध आहे म्हणून मला वाटलं होतं कुणी मला शेवेचा लाडू आणून देणार आहे. तर सफरचंद कापून दिलं)
आणि एखाद्याशी गप्पा मारल्या = मी तिच्याशी गोष्टी करून घेतल्या (?)
ले लो चं भाषांतर म्हणून घेऊन घेतलं.
दे दो चं भाषांतर म्हणून देऊन दिलं
हे सगळं लक्षात आल्यावर आमची फॅमिली भाषा मी हिंदी केली.
न बा पुण्याची गोष्टच वेगळी आहे हो.
मी तसाही मराठी माणूस जन्माने नसल्याने मला न्यूनगंड बाधत नाही म्हणजे मी थोडा गेंड्याच्या कातडीचा सुद्धा आहे. पण तरीही माणूस आहे शेवटी.
एकदा पुण्यात नवसदाशिवात एका ठिकाणी वास्तव्यास होतो. तेथील आजी म्हणाल्या " अरे दिवे मालवले का ? "
तेव्हा मात्र मी फारच बुजून गेलो होतो माझा भाषिक आत्मविश्वास ढासळला होता म्हणजे अर्था च्या बाबतीत नाही पण आपण असं मराठी कधीच बोलू शकणार नाही या अर्थाने.
तुम्ही तो महागुरूंचा अजरामर video बघितलाय का? ज्यात ते अरे दत्ता आला का ? असे पुन्हा पुन्हा बोलून दाखवतात तसे मी मग कुठेही संधी मिळाली की अरे दिवे मालवले का ? असे विचारत सुटलो होतो.
मालवून टाक दीप
शाळेत असताना (मुंबईत) एकदा मित्राकडे वार्षिक परीक्षेच्या अभ्यासासाठी गेलो होतो. संध्याकाळ झाल्यानंतर त्याच्या अभ्यासाच्या खोलीतून बाहेर येताना त्याची आई म्हणाली, " खोलीतला दिवा काढून आलात ना रे ?".
दिव्याचा स्विच बंद करताना आजही कधी कधी आपण दिवा "काढतोय" असं वाटतं.
+
संध्याकाळ झाल्यानंतर त्याच्या अभ्यासाच्या खोलीतून बाहेर येताना त्याची आई म्हणाली, " खोलीतला दिवा काढून आलात ना रे ?".
हो, ‘दिवा काढणे’ असा वाक्प्रचार मुंबईकरांच्या (विशेषेकरून, अगोदरच्या पिढ्यांतील मुंबईकरांच्या) तोंडून अनेकदा ऐकण्यात आलेला आहे खरा. (औरंगजेबाने संभाजीमहाराजांचे डोळे काढले होते, त्याची आठवण होते.)
(आणि, का, कोण जाणे, परंतु दिव्याच्या बल्बला ‘ग्लोब’ म्हणून संबोधतात. असो.)
हाच तर तो फरक आहे पुणेरी आणि उर्वरित इतर मराठी मध्ये
पुण्याला एक वेगळी मराठी काढून द्यावी असे नेहमी वाटते
ती ग्रेस यांची ओळ आहे मग वेगळे आभाळ द्यावे अशा पाखरांना (नीट आठवत नाही चूकभूल देणे घेणे)
कारण इतरांना आपल्या मराठीत काही भेसळ झाली तर चालते पण पुणेकरांना आपल्या पुणेरी मराठीत खडा आलेला खपत नाही.
( तिथे असत्या तर पुणेकर आजींनी अक्कल काढली असती मुबईकर आईची दिवा काढल्यावर)
?
वेदकाळात सूप होते काय?
सूप ही मेकालेची देणगी नव्हे काय?