पुढच्या पाच वर्षात काय होईल?

आधीच्या धाग्यात अरुण जोशींनी प्रश्न विचारला की मोदी सरकार आल्यावर काय होईल याबाबत स्केप्टिक लोकांना काय वाटतं हे खरोखर जाणून घेण्याची इच्छा आहे. त्याचा स्वतंत्र धागा करण्याऐवजी नवीन धागा काढतो आहे. याचं कारण नुसत्याच नकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित न करता सरकारच्या सर्वच धोरणांत कितपत बदल होईल (किंवा होणार नाही) आणि त्याचा परिणाम काय होईल यावर चर्चा व्हावी अशी इच्छा आहे. तेव्हा निव्वळ मोदींबाबत किंवा भाजपाबाबत स्केप्टिक असलेल्यांनीच नव्हे तर सर्वांनी या चर्चेत भाग घ्यावा ही विनंती. पाच वर्षांनी जेव्हा पुन्हा मत देण्याची वेळ येईल तेव्हा आपल्याला आपल्या अपेक्षा काय होत्या आणि त्या कितपत पूर्ण झाल्या हे तपासून बघता येईल.

१. भारताचा विकासदर (जीडीपी ग्रोथ रेट) काय असेल? विकासाची कुठची कामं सरकारतर्फे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली जातील?
२. भारताचं परराष्ट्रधोरण काय असेल? आहे त्यापेक्षा कसं वेगळं असेल?
३. साक्षरता, शिक्षण, यावर सरकार कितपत भर देईल? आरोग्यावर किती खर्च केला जाईल?
४. भारतात फॉरिन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढेल का?
५. हिंदू-मुस्लिम, किंवा एकंदरीत सामाजिक भेद वाढतील, कमी होतील की जैसे थे राहतील?
६. विरोधी पक्ष नक्की काय भूमिका घेतील?

माझे विचार
१. यूपीएच्या पहिल्या कारकीर्दीत तो ८ टक्क्यांच्या वर होता. दुसऱ्या कारकीर्दीत तो ६ टक्क्यांच्या थोडा पलिकडे होता. या पार्श्वभूमीवर असं दिसतं किमान ८ टक्के दर राखणं आवश्यक आहे. माझ्या मते ते शक्य होईल. कदाचित १० टक्क्यांपर्यंत तो पोचवण्याचे प्रयत्न होतील. जर विकासदर ९ टक्के किंवा वर राहिला तर पुढच्या वेळी सरकार बदलणं फार कठीण होईल. मला वाटतं सर्वसामान्य जनतेच्या डोळ्याला दिसणारी विकासाची कामं वेगात करण्यावर भर राहील. रस्ते गुळगुळीत व सुंदर, शक्य तितक्या ठिकाणी वीज अधिक काळ उपलब्ध - हे दिसून येईल. त्यासाठी अल्ट्रामेगा पॉवर प्लॅंट्स विकसित केले जातील. सौर ऊर्जेवर काम सुरू आहेच त्याचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्याचा प्रयत्न होईल. (या अर्थातच चांगल्याच गोष्टी आहेत)
२. परराष्ट्रधोरणाबाबत मला फार माहिती नाही. मला वाटतं की सर्वसामान्यांना दृश्य ठिकाणी बोटचेपेपणाऐवजी खंबीर भूमिका घेण्याचा प्रयत्न होईल. पाकिस्तानबरोबर काही ना काही वाद होईल.
३. शिक्षणावर फार वेगळा खर्च होईल असं वाटत नाही. वेगवेगळी पाठ्यपुस्तकं - विशेषतः इतिहासाची - बदलली जाऊन अधिक राष्ट्रवादी इतिहास शिकवला जाईल. जुने काही हिरो जातील, काहींचं उद्धरण होईल. आरोग्याबाबतही जास्त काही वेगळं होईल असं नाही.
४. भारतात एफडीआय वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. आकडे किती बदलतील हे माहीत नाही, पण गुजरातमध्ये ज्याप्रमाणे वायदे झाले तसे होताना दिसतील.
५. माझ्या मते सामाजिक भेद वाढतील. पण गोध्रा स्टाइल दृश्य रक्तरंजितपणा पुन्हा होईलसं वाटत नाही. (कदाचित विरोधी पक्षांना तसे दंगे निर्माण करण्यात रस असेल.) भेदभाव वाढतील ते 'अंडर द टेबल' स्वरूपात. म्हणजे मुस्लिमांना जागा मिळू न देणं, ते जिथे राहतात तिथे विकास पोचू न देणं वगैरे स्वरूपात.
६. शेवटच्या प्रश्नाबद्दल मला फार जाण नाही. इतरांचे विचार वाचायला आवडतील.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

सध्या काही अंदाज बांधणं शक्य नाही.

मी स्वतः तीन वर्षेपर्यंत तरी टीका वगैरे करणार नाही. (काही बेसिक गोष्टी चुकीच्या करू लागले नाहीत तर).

काँग्रेसवर ज्या कारणांनी टीका करत होते त्याच गोष्टी करू नयेत एवढे मात्र खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

काँग्रेसवर ज्या कारणांनी टीका करत होते त्याच गोष्टी करू नयेत एवढे मात्र खरे.

हेच आणि असेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या धाग्यावर खरंतर फक्त टीका वगैरे होऊ नये अशी इच्छा आहे. आपल्याला जनतेचा कौल समजलेला आहे. तेव्हा नवीन निवडून दिलेलं सरकार काय करू शकेल, काय करण्याचा प्रयत्न करेल, आणि त्यांच्या हातून काय घडावं याबाबतच्या अपेक्षा मांडायच्या आहेत. त्यात 'अमुक होईल अशी भीती वाटते' अशा प्रकारची विधानं यायला हरकत नाही, पण देशाच्या कारभाराच्या दृष्टीने सर्वांगीण परिणाम कसे कसे होतील याबद्दलचेही विचार मांडावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>काँग्रेसवर ज्या कारणांनी टीका करत होते त्याच गोष्टी करू नयेत एवढे मात्र खरे.

नवाझ शरीफ यांना शपथविधीचे आमंत्रण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे होतच रहाणार. रीटेल मध्ये FDI सुद्धा येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

रीटेल मधे एफडीआय ला अडथळा त्या कायद्यातल्या तरतूदींचाच आहे असा एक सूर ऐकायला मिळाला. त्या कायद्यातल्या तरतूदी जरा जास्त जाचक आहेत.

(बाकी मार्क्स & स्पेन्सर येणारे असे कळले)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणूनच म्हणतो
निव्वळ काँग्रेसला विरोध करताना जर काही गोष्टींवर टीका केली होती, तरी सरकारमधे आल्यावर (अधिकची माहिती समजते, गुप्त माहितीला अ‍ॅक्सेस असतो) जर ते निर्णय योग्य होते असे वाटले तर अशा निंदेचे भय न बाळगता मोदींनी तेच निर्णय पुढे चालवावेत.

मी तरी स्वागतच करेन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे वरकरणी ठीक आहे.

पण मग असे व्हायला नको.... पुढच्या निवडणुकीत नवा (ष्ट्राँग) चेहरा उभा करून मते मागणार......
(बाजपेयी/अडवाणींना बोटचेपे म्हणून डिसक्रेडिट करून मोदींना पुढे केले)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

व्यवस्थापकः width="" height="" टाळावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मोदी म्हणजे दैवानं मिळालं आणि ट्विटरनी घालवलं असं करायला लागलेत.

शेवटचा ट्विट खरच मोदींच असतं तर रिट्विट करता आलं असतं न?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटचा नमोचा ट्वीट नाहीये.... इंडिया टुडेला त्यांनी बाइट दिला असावा तो इंडिया टुडेने ट्वीट केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे २०१३चे ट्वीट्स आहेत. देशाप्रमाणे आता मोदींनीही कात टाकलेली आहे. थत्तेचिच्या, तुमच्यासारखे 'सिक्युलर' अ‍ॅनार्किस्ट जुने ट्वीट्स दाखवून जनतेची दिशाभूल करता आहात. जनता तुम्हाला माफ करणार नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चला या संस्थळावर एक सेक्युलर दुसर्‍या सेक्युलराचे पाय ओढतो म्हणून लोकशाही टिकून आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सार्क देशांच्या प्रमुखांना बोलावून त्यांना खोपच्यात घेऊन गुमान अखंड भारतात सामील व्हा अशी तंबी देण्याची नमो-योजना तर नसेल ना?

बाकी काँग्रेसची धोरणे मोदींनी सुरु ठेवली तर त्याचा आनंदच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदींना आज एल ओ सी वर फायर चालू आहे (बातमीनुसार) ते ऐकू येत नाहीय वाटतं. अर्णवला पण म्हणाले होते - गदारोळ असेल तर चर्चा होऊ शकते का? नि आता पलटी मारली. दिल्लीत तर सरळसरळ शरीफ साहेबांच्या औकातीवरच घसरले होते. राजकारण्यांच्या त्वचा नक्की कशा बनलेल्या असतात देव जाणो.

पण एक आहे -
१. तेव्हा पाकिस्तान विरोधी बोलून मते घ्यायची नि जिंकून देशसेवा करायची
२. नि आता योग्य ती निती राबवायची

असेही असू शकते.

खरे खोटे देव जाणो पण मला मोदी सच्चा राष्ट्रभक्त वाटतो. शिवाय तो प्रचंड कूट राजनितीक माणूस आहे. करतोय ते आपल्या भल्यासाठी हे मानून गप्प बसायला अजून अवकाश आहे, पण आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

फक्त मोदी राष्ट्रभक्त आहे नी आधीचे पंतप्रधान नव्हते असा सूर असल्यास तो अर्थातच मंजूर नाही.

मात्र पुर्वसुरींची चांगली - देशहितकारक - धोरणे आपल्या प्रचारात मांडलेल्या भुमिकेच्या विरोधात जाऊनही त्याने राबवली तर (आणि बहुदा तरच Wink ) ते स्वागतार्ह आहे. प्रचारात मांडलेल्या कित्येक गोष्टि देशासाठी धोकादायक तरी आहेत नाहितर निव्वळ अस्मितांना हात घालणे सोडून त्यात काही मटेरियल नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फक्त मोदी राष्ट्रभक्त आहे नी आधीचे पंतप्रधान नव्हते असा सूर असल्यास तो अर्थातच मंजूर नाही.

असा सुर दिसण्याचं कारण काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दिसला नाही शंका आली.

लेट मी रिफ्रेज

खरे खोटे देव जाणो पण मला मोदी सच्चा राष्ट्रभक्त वाटतो. शिवाय तो प्रचंड कूट राजनितीक माणूस आहे. करतोय ते आपल्या भल्यासाठी हे मानून गप्प बसायला अजून अवकाश आहे, पण आवडेल.

अशी (जे करतोय ते भल्यासाठिच मानण्याची) सवलत मोदींव्यतिरिक्त (कोण)कोणत्या पंतप्रधानांना द्यावीशी वाटते - द्यायला आवडेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुजीबूर रेहमान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

फक्त मोदी राष्ट्रभक्त आहे नी आधीचे पंतप्रधान नव्हते असा सूर असल्यास तो अर्थातच मंजूर नाही.

'भारताच्या राष्ट्रीय संपत्तीवर सर्वप्रथम मुसलमानांचा हक्क आहे.' असे मनमोहनसिंग म्हणाल्याची बातमी वाचली होती. तसे असेल तर कोण राष्ट्रभक्त हे वाचकांनी ठरवावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक बरे आहे की बर्‍याच मोठ्या कालखंडानंतर सरकार पक्ष कोणत्याही मोठ्या तमिळ पक्षावर अवलंबून नाही, युतीत नाही व छोट्या तमिळ अस्मितावादी पक्षांशी जोडलेला असला तरी त्यांच्या पाठिंब्यावर जराही विसंबून नाही.

इतर सार्क राष्ट्रांबरोबर श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांना बोलावणेही धाडसाचेच आहे.

गेल्या १०-१५ वर्षात हा तमिळ अस्मितावादी पक्षांवरील डिपेन्डन्समुळे देशाच्या परराष्ट्रधोरणाचे झालेले नुकसान काहि अंशी भरून काढत, चीनच्या लंकेतील वाढत्या प्रभावाला चाप नाहि तरी निदान आपलाही प्रभाव काही प्रमाणात वाढवणे मोदींना जमले तरी चांगले होईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असेच म्हणतो. बहुमतासाठी गरज लागते म्हणून त्या बळावर तमिऴ पक्षांनी सरकारला वेळोवेळी धारेवरच धरलेले आहे. बरी खोड मोडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रादेशिक पक्षांचे अवलंबित्व कमी झाले/निघून गेले हे बरेच झाले.
पण तामिळी पक्ष जी आरडाओरड/आक्रोश करत होते; ती अगदिच तथ्यहीन होती का ?
मानवाधिकारांचे उल्लंघन एल टी टी ई चा खात्मा केल्या नंतरच्या काळात लंकन सरकारनं केलं नाही का ?
लिट्टेच्या सैनिकांसोबतच कित्येक तामिळ नागरिकांचीही बेफाम हत्या झाली म्हणतात.
तो आंतरराष्ट्रिय मुद्दा बनला होता त्यावेळी.
भारत सोडा, इतर देशांनीही त्यावेळी आक्षेप घेतला होता.
(आता "हा त्यांचा अंतर्गत मामला आहे" हे उत्तर समोरून येउ शकतं.
पण ती वस्तुस्थिती नसते. प्रत्यक्षात इकडलं आणि तिकडलं तामिळ समाजजीवन जोडलं गेल्यासारखं असतं.
इथल्या कित्येकांची सोयरिक तिकडे असते. तिकडच्या कित्येकांची कुतुंबे इथल्यांशी जोडली गेलेली असतात.
मागील दोनशे वर्षात युरोपमध्ये रशियासुद्धा रशियाबाहेरील स्लाव्ह हितांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करीत असे.

अवांतर :-
ह्या समाजजीवन जोडलं गेलं असल्याच्या कारणानच मला काश्मीर हा एकत्र असावा असे वाटते.
एक तर पाकच्या ताब्यात जो काही काश्मीर आहे तो आपल्याला जोडून घ्या, किंवा आपले काश्मीर खोरे (आख्खे
जम्मू- काश्मीर राज्य नव्हे ) त्यांना देउन टाका. किंवा दोन्ही देशांच्या de facto ताब्यातील काश्मीर भाग एकत्र करुन
वेगळा नेपाळ स्टाइल बफेर स्टेट बनवा.
साला, इथल्या काश्मीरीनं तिकडं जायचं नाही म्हणजे काय ?
उद्या मिरज आणि सांगली किंवा पिंपरी-चिंचवड- पुणे, किंवा सिकंदराबाद - हैद्राबाद ह्यादरम्यान कुणा सत्ताधार्‍यांनी नकाशाच्या रेषा आखल्या आणि इकडच्यांनी तिकडं जायचं नाही म्हटलं, तर?
पब्लिक किती काळ ऐकेल ?
)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

साला, इथल्या काश्मीरीनं तिकडं जायचं नाही म्हणजे काय ?
उद्या मिरज आणि सांगली किंवा पिंपरी-चिंचवड- पुणे, किंवा सिकंदराबाद - हैद्राबाद ह्यादरम्यान कुणा सत्ताधार्‍यांनी नकाशाच्या रेषा आखल्या आणि इकडच्यांनी तिकडं जायचं नाही म्हटलं, तर?

नेहरूंची कृपा थोडी जास्त असती तर खरोखरच अरुणजोशी दक्षिण पाकिस्तानी असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भारीच मनोरञ्जन करता बॉ तुम्ही. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कंटाळलोय. तरी लिहितोच.
नेहरु काय, काँग्रेस काय सगळ्यांनीच भारताच्या घशात जितका अधिक भूभाग घालता येइल तितका घातलाय.
आपल्या वाटते तितकी ही माणसे मद्दड नव्हती.
(नाहीतर ह्यांच्या पाठीमागे उभे राहणारे तुमचे माझे आज्जे तरी अतिमूर्ख होते हे मान्य करा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हो ना. एक तर नेहरू एट ऑल हे मंद नव्हते किंवा त्यांना मते देऊन निवडून देणारे आपले आज्जे शतमूर्ख होते. त्यात परत एकत्र कुटुंब पद्धतीमुळे अतिमूर्खांची मते दुसर्‍यावर लादली जायची. हाड थू त्या एकत्र कुटुंब व्यवस्थेच्या, हाड थू त्या जुन्या समाजव्यवस्थेच्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असं नाही हो, पटेल वेगळे नि नेहरू वेगळे.

गोपीनाथ बोर्दोलोई नेहरूंना आसाम भारतात घ्या म्हणत होते नि नेहरू नको म्हणत होते. आता तुमच्याकडे कोण कोणाच्या मागे का उभे राहिले मला माहित नाही पण आसामातल्या बर्‍याच ज्येष्ठ नागरीकांनी झालेली थेट चर्चा बरेच सांगून जाते. शिवाय हा विकिपेडीया पाहा-

Jawaharlal Nehru and Muslim League were ignorant enough to this grim situation and joined hands to implement the grouping plan. Gopinath Bordoloi requested Mohandas Gandhi for suggestion and the later advised him to continue opposing the grouping vehemently.

In 1947, Lord Mountbeten took over as new Viceroy. He held separate meeting with Muslim League, Congress and Mahatma Gandhi. They decided to go for Partition as a permanent solution instead of grouping. India and Pakistan became separate independent countries.

Thus Gopinath Bordoloi played a major role in securing the future of Assam which would have been included in East Pakistan otherwise. Whether any other leader could have shown the light other than him during that crisis period is in doubt.[4]

आणि कृपया पुण्यात बसून मराठवाड्याबद्दल बोलू नकात. तुम्ही ब्रिटिश भारतात होतात. आमचे पूर्वज निजामाखाली होते. कोण कोणाला का निवडून दिले यात घुसून ऐतिहासिल सत्ये अमान्य करू नकात. पटेल नसते तर अरुणजोशी दक्षिण पाकिस्तानी असते हा जोक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पुण्यात बसून मराठवाड्याबद्दल बोलणे आणि आसाम व मराठवाड्याची तुलना करणे यांत अधिक इडियॉटिक काय आहे ते समजत नाही. कॄपया उजेड पाडावा ही इणंती.

अ‍ॅपल-ऑरेंज ऐवजी आता मराठवाडा-आसाम असा नवा शब्दप्रयोग रूढ करावेसे वाटू राहिलेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आणि कृपया पुण्यात बसून मराठवाड्याबद्दल बोलू नकात

मग मराठवाड्याबद्दल बोलण्यासाठी कुठे "बसायचं" म्हन्ता? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा ह्हा ह्हा ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुण्यात मी ४ वर्षे राहिलो आहे. पुणेकरांचा एक मोठा गैरसमज आहे कि ते तिथे बसून जगातल्या कोणत्याही कानाकोपर्‍याबद्दल जे काही बोलतात तेच (त्या कोपर्‍यातल्या स्थानिकांपेक्षा) जास्त ग्राह्य असते. शिवाय या समजाला समाज मान्यता आहे. हा समज कसा मोडीत काढायचा याचे तंत्रज्ञान अजून विकसित व्हायचे आहे. तोपर्यंत मी वाट पाहायला तयार आहे.

१५ -०८-४७ ला पुणेकर झंडा लावून मोकळे झाले, पुढे विलिनीकरणापर्यंत इतरत्र काय काय झाले हे नेहरूंनी त्यांना ६०-७० वर्षे शिकवले ते त्यांचे सत्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अच्रत, बव्लत नि दूष्ट दूष्ष्ष्ट वैट्ट वैट्ट वैट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट, इ.इ. असलेल्या पुणेकरांना एकवेळ फाट्यावर मारा आणि अगोदर दक्षिण पाकिस्तानास नेहरूचा पाठिंबा होता या विधानाचा पुरावा द्या. पुणेकरांना काय, कधीही झोडता येईल, त्याला वेळकाळ लागत नै. विषय दक्षिण पाकिस्तानचा अन उदा. मात्र आसामचे हे कै झेपलं नै. हे कसलं लॉजिक आहे म्हणे? दक्षिण पाकिस्तानी लॉजिक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्याचं कसं आहे बॅटमन, पुणेरी लोकांना स्वातंत्र्य नि फाळणी म्हटले कि पंजाब नि बंगाल आठवतात. पण त्यांच्याच विभागातल्या सोलापूरपलिकडचा उस्मानाबाद जिल्हा आठवत नाही.

जरा हे वाचा - http://en.wikipedia.org/wiki/Operation_Polo

हे होणार होते. आमचे नशीब निजाम खट्याळ निघाला -
In June 1948, Mountbatten prepared the 'Heads of Agreement' deal which offered Hyderabad the status of an autonomous dominion nation under India. The deal called for the restriction of the regular Hyderabadi armed forces along with a disbanding of its voluntary forces. While it allowed the Nizam to continue as the executive head of the state, it called for a plebiscite along with general democratic elections to set up a constituent assembly. The Hyderabad government would continue to administer its territory as before, leaving only foreign affairs to be handled by the Indian government.

Although the plan was approved and signed by the Indians, it was rejected by the Nizam who demanded only complete independence or the status of a dominion under the British Commonwealth.

ही जून १९४८ ची पोझिशन होती.

हे वाचा -
When Indian Home Minister Sardar Vallabhbhai Patel requested the Hyderabad Government to sign the instrument of accession, the Nizam refused and instead declared Hyderabad as an independent nation on 15 August 1947, the same day that India became independent
आम्ही सप्टेंबर १९४८ पर्यंत या हायदराबाद राज्याचे नागरिक होतो.

हे नेहरूंचे फक्त सेक्यूलर काँट्रिब्यूशन -
After having received information that widespread communal violence against Muslims in reprisal for previous atrocities against Hindus,[18] Prime Minister Nehru sent congressman Pandit Sunderlal and a mixed-faith team to investigate. Reporting back the team estimated that between 27,000 and 40,000 civilians have died and that some members of the Indian army and police force participated in violent acts.[19]
अर्थात हे अयोग्य नाही, पण हिंदूंच्या बाजूने काही करायचे म्हटले तर त्यांना नको का वाटायचे देव जाणो.

आणि हे वाचा. हेच तुम्ही विचारत होतात.
TAILPIECE

In one of my earlier blogs based on a book written by a 1947 I.A.S. officer, one MKK Nair titled “With No Ill Feeling to Anybody”, I had quoted a Pioneer report from the same source saying that Sardar Patel had walked out of a Cabinet meeting because of some remarks of the PM which he felt were offensive. This book also says that Nehru favoured the U.N. route instead of the Army Action decided by Patel.

नेहरु हैद्राबादचा काश्मिर करून उरले असते, पण आमचे नशीब बलवत्तर.

तुमच्याच काय आमच्याही पूर्वजांनी नेहरूंना नि त्यांचा वारसा सांगणारांना भरभरून निवडून दिलं. पण ते सांगून सत्य बदलू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अंतर्गत प्लेबिसाईट म्हटलेय तर पुढेमागे निजाम गेलाच असता यात काही सौंशय नाही. निजामाचा खट्याळपणा भारताच्या पथ्यावर पडला हेही खरेच आहे.

तदुपरि त्या टेलपिसात नक्की कुठल्या संदर्भातली ऑफेन्सिव्ह वाक्ये आहेत याचा काही अर्थबोध होत नाही. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अंतर्गत प्लेबिसाईट म्हटलेय तर पुढेमागे निजाम गेलाच असता यात काही सौंशय नाही.

हैद्राबाद संस्थानाच्या विलिनीकरणावर आपणांस पुढे वाचनाची गरज आहे. अन्यथा हे इतक्या नेहरूवियन आरामात म्हटले नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गोविंदभाई श्रॉफ वगैरे आघाडीच्या निजाम विरोधक हैद्राबद मुक्तीसंग्रामात सहभाग घेतलेल्यांच्या प्रत्यक्ष मुलाखतींवरुन बनवलेलं अनंतराव भालेराव ह्यांचं पुस्तक वाचा.
जनमत भारताकडं झुकत होतं; म्हणून निजामाचे उजवे हात म्हणवून घेणार्या रझाकारांनी त्यांना धाकात ठेवायला म्हणून
दडपशाही सुरु केली.(कुनी निजामविरोधक असल्याचे समजले तर त्याच्या आख्ख्या कुटुंबाचा छळ करायचा वगैरे.)
झाले उलटच. आम पब्लिकमधील जे थोडेफार लोक निजामाच्या राज्यास अनुकूल होते वा तटस्थ होते; ते ह्या
दडपशाहीमुळे चिडून उलट अधिकच कट्टर निजामविरोधक वा भारतवादी बनले.
"लवकर हा भूभाग ताब्यात घेउन आम्हास सोडवा " अशी मागणी स्वामी रामानंद तीर्थ ह्यांच्या लोकांनी व
स्टेट काँग्रेसने अनधिकृतरित्या कैकदा केली होती. लश्करी हाणामारी टाळायचे प्रयत्न दिल्लीवरून सुरु होते; निजामास
हवे तर इतर राजवाड्यांपेक्षा अधिक सवलती देण्याचेही बोलून पाहिले गेले.(उदा :- अधिक तनखा, भारत सरकारकडून
स्पेशल स्टेटस्,मानद पद वगैरे)
आपण लोहपुरुष म्हणतो त्या वल्लभभाई पटेलांनीही शक्यतो "कशाला उगाच रक्त सांडायचं" असा विचार करत
बहुतांश राजघराण्यांशी यशस्वी बोलणी केली ह्यात त्यांचं कौतुक आहे. निजाम अधिक सवलती वगैरे नाकरुन पूर्ण
स्वातंत्र्यावर ठाम राहतो असे दिसल्यावरच लश्करी कारवाई झाली. तोवर जनमत आधीच भारताकडे झुकले होते.
रझाकार सोडल्यास आम पब्लिकनं भारतात विलीनीकरण होण्यास विरोध केला नाही.
(वादग्रस्त सुंदरलाल रिपोर्ट ह्या संदर्भात येउ शकतो हे; पण त्याची चर्चा इथे नको.)

भूभाग ताब्यात आल्यावर तिथल्या नोकरशाही,ब्यूरोक्रसी कायम ठेवली गेली. त्यांना काही त्रास भारताने दिला नाही.
तिथल्या उच्चपदस्थ , I A S ला समकक्ष अधिकार्‍यांनी झपाट्याने भारतात एकीकरण होण्यासाठी मार्गदर्शक तत्वे
प्रस्रुत केली. कोणता जिल्हा-तालुका कुठे येइल, त्याचे रिपोर्टिंग कुणाकडे काय असेल हे सारे त्यात होते.
हे त्यांनी इतक्या झपाट्याने केले की मनापासून त्यांनाही भारतात विलीन व्हावे असे वाटत होते असा अंदाज करता येतो.
शिवाय हे विलीनीकरण आज ना उद्या होइल ह्याचा आधीच अंदाज घेउन त्यांनी रुपरेशाही आधीच बनवली होती.

ह्या नोकरशाहीतील तपशीलाबद्दल श्री भुजंगराव कुलकर्णी ह्या तत्कालीन निजामी राजवटीतील उच्चपदस्थ अधिकार्‍यांचे आत्मचरित्र वाचावे.

अवांतर :- हे भुजंगराव कुलकर्णी नंतर भारत सरकारच्या सेवेत रुजू झाले. महाराष्ट्र राज्यातही सचिव पदापर्यंत पोचले.
त्यांची कारकीर्द नावाजली गेली.पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराचे बांधाकम वगैरे त्यांच्याच अखत्यारित झाल्याचे
ऐकले आहे.त्यावेळी त्या कामाची बरीच तारिफही झाली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

छ्या! तुम्हा पुण्या मुंबईच्या लोकांना मिळणारी माहिती अर्धवट असते.
तु त्या भागात बालपण घालवलेले नाहिस नी निजाम असताना तु वा तुझे पुर्वज तिथे रहातही नव्हते. तद्वत तुझ्या मताला नी माहितीला अजिबात वेटेज देणार नाही!
हो की नाही हो अजो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मनोबाने किमान बालपण तरी मराठवाड्यात घालवलेसे वाटते, सबब थोडे तरी वेटेज दिलेच पाहिजे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो, प्लेबिसाईट झाली असती तर हैद्राबाद संस्थान भारतात आले असते हे नि:संशय आहे. तिथे ८०% लोक हिंदू होते आणि प्रो-भारत होते. पण मी बोलतोय ते "प्लेबिसाईट झाली असती तर" या भागावर. निजामाचे कितीतरी प्लॅन होते वेगळे राहण्याचे. केंद्रिय नेतृत्व (रीड- पटेल) दुबळे असते तर समस्या किचकट झाली असती. "कलम ३७० ब (एक काल्पनिक कलम)" वैगेरे प्रकार आजही डोकेदुखी राहिला असता. शिवाय निजाम जो एरवी चांगला प्रशासक होता नि हिंदुंना काही फरक पडत नव्हता तो १५ ऑगस्ट १९४७ नंतर प्रचंड हिंदुद्वेष्टा झाला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

निजामबद्दल काही गोंधळून टाकणार्‍या गोष्टी ऐकल्यात.
निझाम स्टेट जिंकल्यावर भारतानं त्याला छळणं राहिलं दूर उलट तिथला प्रशासक्/राज्यपाल म्हणून नेमलं.
स्वतः निजाम फार हिंदु द्वेश्टा नव्हता. त्याचे जवळचे काही मंत्री व विश्वासातली माणसे हिंदु (त्यातही प्रामुख्याने उच्चवर्णीय; त्यातही ब्राम्हण अधिक (त्यातही मराठी आणि तेलंगी ब्राम्हण अधिक; कन्नड कमी)) होती.

स्टॅट ब्यांक ऑफ हैद्राबाद मध्ये काम केलेली म्हातारी माणसे "निजाम हा लक्ष्मीपूजनाच्या वेळी मस्तपैकी धोतर/सोवळे नेसून
ब्यांकेतील स्टाफसमवेत लक्ष्मीपूजन करीत असे" असे सांगतात.

शिवाय --
रझाकारांनी निजमाच्या नावानं अत्याचार केले; निजामालाही त्यांच्यापासून सुटकाच हवी होती.
(त्यांनी निजमाला स्थानबद्ध केल्यासारखे, बाहुले बनवून शेवटी शेवटी ठेवले होते) असे काही प्रो-निजाम मंडळी
पराभवानंतर सांगत. आता हे सर्व ते रझाकारांना वाईट ठरवून निजामची प्रतिमा सांभाळण्यासाठी म्हणत होते की
ती वस्तुस्थिती होती ते मात्र माहित नाही.

लक्ष्मीपूजन करण्याची बाब मात्र खरी असण्याची मला दाट शक्यता वाटते.

खखोदेजा.१००% ऐकिव माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

निजाम स्वतः कसा होता हे गुपितच आहे. लोक त्याच्याबद्दल वाईटच बोलतात, किमान अक्सेशनच्या काळातल्या वर्तनाबद्दल. पण नि:संशय दुष्ट त्याचा प्रधान होता. "जास्त नाक खुपसाल तर हिंदूंची गत वाईट असेल" असे त्याने पटेलांना दिल्लीत धमकावले होते.

बाय द वे, हे पुण्यात बसून इ इतके सिरियस घेऊ नका. पंजाब व बंगाल नंतर हा खूप मोठा प्रसंग होता. पण लोकांना ते अयशस्वी झाले म्हणून त्यांचे महत्त्व वाटते. हा यशस्वी झाला म्हणून लोकस्मृतीतून गेला आहे.

माझ्या आईचे आजोबा रझाकारांच्या गोळीने मेले. आईच्या मामांनी सेना उभी केलेली रजाकारांशी लढायला. भारत सरकार काही येईना तेव्हा या लोकांनी १ १/२ खूप सोसलं. निजामाच्या प्रधानाचा ब्राह्मणांवर विशेष कोप होता. हिंदू समाजात हे नसले तर ते संख्येने किती का असेनात आपण त्यांच्यावर राज्य करू शकतो अशी त्याची धारणा होती. म्हणून हत्या, बलात्कार, पिटाळणे हा प्रकार खूप होता. पण इतर समाज ठामपणे ब्राह्मणांच्या मागे होता (त्यांना रजाकारांपासून लपवण्यात नि भारतात येण्यात). खूपश्या स्थानिक (हैदराबाद शहराच्या बाहेरच्या, गावाकडच्या) मुस्लिमांनी देखिल मदत केली. त्यांच्या निष्ठा भारताशीच होत्या. पण त्यातही ज्यांनी रजाकारांना साथ दिली त्यांना अक्सेशन नंतर संपवले गेले हे ही खरे आहे.

There are hundreds of stories.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निजाम स्वतः कसा का असेना, लोकांपर्यंत जे येतं त्या आधारेच ते मत बनवणार. अत्याचारादि तुम्ही स्वतः कबूल केले आहे तर हिंदूंना काही फरक पडत नव्हता असे म्हणणे हा वदतोव्याघात आहे. पगडींच्या आत्मचरित्रातील प्रत्यक्षदर्शी निरीक्षणे तुमच्या अगोदरच्या दाव्याला छेद देतात. निजामराज्यात ते स्वतः कलेक्टर होते. कळमनुरी, परभणी, औरंगाबाद तसेच तेलंगण(रूरल) आणि खुद्द हैदराबाद या ठिकाणी ते किमान १० वर्षे तरी होते. निजाम राज्यातली बेपर्वाई, अनास्था, मग्रुरी, धर्मवेड, इ. बद्दलची त्यांची निरीक्षणे नक्कीच पाहण्यासारखी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निजाम चांगला प्रशासक होता-असे असेल तर मग तुमचा मराठवाडा इतका मागास का बरे राहिला मग?

हिंदूंना काही फरक पडत नव्हता- असे असेल तर सेतुमाधवराव पगडींसारखे लोक खोटेच बोलत होते असे दिसते. फोर्स्ड कन्व्हर्जन, धर्माधारित भेदभाव, इ. निजामशाहीत नव्हतेच तर. रोचक आहे. टॉप क्याबिनेटमध्ये हिंदू असल्याने कै कुणी प्रो-हिंदू होत नाही- उदा. औरंगजेब.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निजाम चांगला प्रशासक होता-असे असेल तर मग तुमचा मराठवाडा इतका मागास का बरे राहिला मग?

मराठवाडा इतका मागास खचितच नाही कि दुषणं निजामाला जावीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

म्हंजे नक्की काय?

-मराठवाडा मागास नाही(पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत)

-निजामाने मराठवाड्यात सुशासन केले

यांपैकी नक्की काय म्हणायचे आहे? की तिसरेच?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुणेकरांचा एक मोठा गैरसमज आहे कि ते तिथे बसून जगातल्या कोणत्याही कानाकोपर्‍याबद्दल जे काही बोलतात तेच (त्या कोपर्‍यातल्या स्थानिकांपेक्षा) जास्त ग्राह्य असते. शिवाय या समजाला समाज मान्यता आहे. हा समज कसा मोडीत काढायचा याचे तंत्रज्ञान अजून विकसित व्हायचे आहे. तोपर्यंत मी वाट पाहायला तयार आहे.

ह्याच्यामुळेच तर तंत्रज्ञान विकसित होत नाही, अनुल्लेख हा गुण मातीत असावा लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा समज कसा मोडीत काढायचा याचे तंत्रज्ञान अजून विकसित व्हायचे आहे.

उलट हा समज 'मोडी'त काढल्यामुळेच बहुधा अलीकडच्या 'बाळबोध' जनतेपर्यंत पोहोचला नसावासे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुण्यात मी ४ वर्षे राहिलो आहे. पुणेकरांचा एक मोठा गैरसमज आहे कि ते तिथे बसून जगातल्या कोणत्याही कानाकोपर्‍याबद्दल जे काही बोलतात तेच (त्या कोपर्‍यातल्या स्थानिकांपेक्षा) जास्त ग्राह्य असते. शिवाय या समजाला समाज मान्यता आहे.

मोदी धागा.
पुणेकरा वरनं बाहेरच्याची जळ्जळ.
मराठी संस्थळावर आल्याचं सार्थक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

किंवा आपले काश्मीर खोरे (आख्खे जम्मू- काश्मीर राज्य नव्हे ) त्यांना देउन टाका.

हे तू बोललास म्हणून ठीक आहे. एखादा शुद्ध पुरोगामी जर असं म्हणाला, तर झाऽऽऽलं! परवा कुणीशा त्या आधुनिक शिव्यांची जंत्री दिली होती ना, त्यातल्या शेलक्या पाचसात शिव्यांचा अहेर होईल लगेच. देशद्रोही, शेळपट, कणाहीन... वगैरे वगैरे वगैरे. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आयला, पुरोगाम्यांतही शुद्ध-अशुद्ध असं सोवळंओवळं आहे की काय? एकदा कधी काँग्रेसविरोधी बोललं की अशुद्ध असं काहीसं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे तू बोललास म्हणून ठीक आहे. एखादा शुद्ध पुरोगामी जर असं म्हणाला, तर

मनोबा पुरोगामी नाहिये का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ठ्ठो ROFL

मनोबा कशावरून पुरोगामी नाही? किंवा फॉर द्याट म्याटर 'शुद्ध पुरोगामी' नाही????? मनोबावरच्या फुका आरोपाचा आम्ही निषेध करतो. 'पुरोगामी' नामक लेखच ज्याने पुरोगामी भूमिकेवरूनच पाडलाय त्याला पुरोगामी नै असे दर्शवायचा प्रयत्न करणे म्हंजे...वेल. असोच्च्च ROFL

(अक्षगटसदस्य) बट्टमण्ण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण तामिळी पक्ष जी आरडाओरड/आक्रोश करत होते; ती अगदिच तथ्यहीन होती का ?
मानवाधिकारांचे उल्लंघन एल टी टी ई चा खात्मा केल्या नंतरच्या काळात लंकन सरकारनं केलं नाही का ?

तथ्यहिन नसेलही - स्केल लो डाऊन केली तर तथ्यहिन नाहिये सुद्धा. पण परराष्ट्रनिती ही यावर ठरत नाही.

इस्रायलला राव सरकारपर्यंत आपण रेकग्नाईजच करत नव्हतो, आज तो आपला संरक्षणसामग्रीचा मोठा व्यावसायिक विक्रेता + भागीदार आहे. मात्र अजुनही पॅलेस्टाईन प्रश्नावर आपण पॅलेस्टाईनच्या बाजुने आहे. युनोतील प्रत्येक मतदानात आपण पॅलेस्टाईनच्या बाजुने व इस्त्रायलच्या मतदान केले आहे. इस्रायलची राजकीय भुमिका मान्य नाही म्हणून त्यांच्याशी बोलायचेच नाही, त्यांच्या प्रमुखांना बोलवायचेच नाही वगैरे मुर्खपणा आपण करत नाही.

लंकेतील तमिळांच्या प्रश्नात आपण विरोधी बाजु घेऊ शकतो, त्या मसुद्यांवर श्रीलंकेच्या विरुद्ध मतदान करू शकतो पण तो मुद्दा सोडल्यास इतरत्र श्रीलंकेशी चांगल्या शेजार्‍याचे संबंध ठेवणं, व्यापारी संबंध वाढवणं आपल्याच फायद्याचं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इस्रायलला राव सरकारपर्यंत आपण रेकग्नाईजच करत नव्हतो, आज तो आपला संरक्षणसामग्रीचा मोठा व्यावसायिक विक्रेता + भागीदार आहे. मात्र अजुनही पॅलेस्टाईन प्रश्नावर आपण पॅलेस्टाईनच्या बाजुने आहे. युनोतील प्रत्येक मतदानात आपण पॅलेस्टाईनच्या बाजुने व इस्त्रायलच्या मतदान केले आहे. इस्रायलची राजकीय भुमिका मान्य नाही म्हणून त्यांच्याशी बोलायचेच नाही, त्यांच्या प्रमुखांना बोलवायचेच नाही वगैरे मुर्खपणा आपण करत नाही.

प्रश्न - इस्रायल च्या कोणत्या नेत्यास बोलवले होते आपण ? व कोणाच्या कारकीर्दीत ? व विथ फॅनफेअर ?

--

माझे मत - इस्रायल ला खूप जास्त महत्व देणे गरजेचे आहे. पॅलेस्टाईन ला डंप करावे.

--

स्टार्टप नेशन इस्रायलचा व नेतानयाहू यांचा व एरियल शरॉन यांचाही चाहता (गब्बर)

--

विथ फॅनफेअर - गब्बर, फॅनफेअर चा फॉरिन पॉलिसीत संबंध आहे किंवा नाही याबद्दल चर्चा करणे हे कितपत मह्त्वाचे आहे ? गब्बर, अगदीच कसा रे तू हा ???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इस्रायल च्या कोणत्या नेत्यास बोलवले होते आपण ? व कोणाच्या कारकीर्दीत ? व विथ फॅनफेअर ?

२००३मध्ये शेरॉन हे भारताला भेट देणारे पहिले इस्रायली प्रमुख अगदी विथ फॅन फेअर , ऑफिशियल स्टेट विझिट, करारही साईन केले. २००३ म्हणजे अर्थात वाजपेयींचा काळ.
१९९१/९२ ला राव सरकारने ज्या दोन महत्त्वाच्या देशांना मान्यता दिली. म्यानमार व दुसरे इस्रायल.
युपीए-१मध्ये शरद पवार, कपिल सिब्बल व कमलनाथ यांचे शिष्टमंडळ इस्रायलला गेले होते (२००६ बहुदा), त्याव्यतिरिक्त आपले तत्कालिन परराष्ट्रमंत्री एसएम कृष्णा हे सुद्धा तिथे जाऊन आले आहेत, त्यांनी बरेच लँडमार्क करार केले होतेच पण भाषणात मात्र आमचा पॅलेस्टाईनलाही पाथिंबा आहे हे सुद्धा सांगत होते Smile
मनमोहनसिंगाच्या युपीए-१ काळात आपले संबंध इतके फ्लरिश झाले की २००८मध्ये रशियाला मागे टाकत इस्रायल भारताचा सर्वात मोठा शस्त्र विक्रेता (सप्लायर) झाला होता. (युपीए-२ मध्ये सध्या तो दुसरा मोठा आहे बहुदा)

माझे मत - इस्रायल ला खूप जास्त महत्व देणे गरजेचे आहे.

+१ सहमत आहे. आणि वर म्हटल्याप्रमाणे ते आता मिळतेच आहे. मोदींनी गुजरात मुख्यमंत्री असताना इस्रायला भेट दिली होतीच. आता सुद्या नेतान्याहुंशी बोलणे झाल्याचे वृत्त आहेच.

पॅलेस्टाईन ला डंप करावे.

का बरे? पॅलेस्टाईनला आपण देत असलेली मान्यता व इस्रायलविरुद्ध करत असलेले मतदान आपल्या व इस्रायलच्या संबंधांमधे येत नाही.
उलट आपला तेलासाठी अरब राष्ट्रांवर डिपेन्डन्स आहे. आणि पॅलेस्टाईनला दुखावणे म्हणजे अरबांना दुखावणे असेल नसेल, पाकिस्तानला इराणशी संबंध भारतापेक्षा अधिक सुधारालया चान्स देणारे नक्की आहे - जे आपल्याला आफ-पाक गेममध्ये पिछाडीला टाकेल.

पॅल्स्टाईनला युनोत मतदान करून चुचकारण्याचा आणि त्याच वेळी इस्रायलशी उत्तम व्यापारी, कुटनितीकच नव्हे तर लष्करी व संरक्षणक्षेत्रात संबंध ठेवणार्‍याची कसरत भारताने आजपर्यंत उत्तम प्रकारे करून दाखवली आहे. आता पॅलेस्टाईनला विनाकारण बाजुला सारत नवा प्रश्न का उभा करायचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शिक्षणावर फार वेगळा खर्च होईल असं वाटत नाही. वेगवेगळी पाठ्यपुस्तकं - विशेषतः इतिहासाची - बदलली जाऊन अधिक राष्ट्रवादी इतिहास शिकवला जाईल. जुने काही हिरो जातील, काहींचं उद्धरण होईल. आरोग्याबाबतही जास्त काही वेगळं होईल असं नाही.

सहमत. एन्सीईआरटीत मार्क्सिस्टांच्या प्रभावाखाली बृहद् भारत अर्थात आग्नेय आशियाचा धडाच काढून टाकण्यात आला होता त्याचे नंतर परिमार्जन केले तसे काहीसे झाले तर बरेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शिवसेना, मगोप, राजद, लोजप,राष्ट्रवादी वगैरेंची सद्दी संपावी असे वाटते. पुढील निवडणुकांमध्ये यूपीए व एनडीए असे दोन पक्ष त्यांच्या चिन्हांसह लढावेत. निदान महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांपासून याची सुरुवात व्हावी असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थत्त्यांशी सहमत, अंदाज बांधणे अवघड आहे. खातेवाटपावरुन काही स्पेक्युलेशन करता येणे शक्य आहे पण आत्ताच काही सांगणे अवघड आहे.

शिवसेना, मगोप, राजद, लोजप,राष्ट्रवादी वगैरेंची सद्दी संपावी असे वाटते. पुढील निवडणुकांमध्ये यूपीए व एनडीए असे दोन पक्ष त्यांच्या चिन्हांसह लढावेत.

असे वाटत असले तरी ते विशफुल थिंकिंगच आहे.

निदान महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांपासून याची सुरुवात व्हावी असे वाटते.

उलट आता समीकरणे बदलतील व ती फार रोचक असतील असा माझा अंदाज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उलट आता समीकरणे बदलतील व ती फार रोचक असतील असा माझा अंदाज आहे.

+१
भाजपा अधिक जागांची मागणी करेल व वेळ येताच शिवसेनेशी युती तोडायला मागेपुढे बघणार नाही
तीच स्थिती काँग्रेस राष्ट्रवादीत होईल. दोघेही आपला पराभव एकमेकांनी साथ न दिल्याने झाला असा आरोप करतील व शेवटी वेगळे लढतील. मात्र जर आघाडी फुटायची लक्षणे दिसली नाहित तर युतीही तुटायची शक्यता कमी होईल हे आहेच म्हणा.

पुढिल निवडणुका कदाचित पंचरंगी वा मनसे भाजपाबरोबर गेला नाही तर कदाचित षट्रंगी होतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

व्हॉट्सअॅप-ट्विटरच्या युगात काँग्रेसची प्रचाराची पद्धत फारच जुनाट होती. भाजपाच्या प्रचाराचे विश्लेषण येथे पाहता येईल. ही नवी पद्धत पुढील पाच वर्षात सर्वच पक्ष पाळतील असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण आधिची पाच वर्षं बरी होती, असं म्हणायला लागू नये एवढीच किमान अपेक्षा सद्ध्या तरी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विशफुल थिंकींग -
(१) महागाई संपेल
(२) चीनशी संबंध सुधारतील/करार होईल
(३) भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उजळेल.
(४) लोकसंख्या नियंत्रणाबद्दल काही महत्त्वाचे निर्णय व्हावेत. जसे फक्त एक मूल असेल तर अमुक सवलती वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(१) महागाई संपेल

गब्बरसिंग कुठे गेले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महागाई आटोक्यात येण्याची शक्यता जास्त आहे. रघुराम राजन हे "इन्फ्लेशन हॉक" खरोखर आहेत. फक्त त्यांना काम करू दिले पाहिजे.

ते ऑक्टोबर मधे पदावर आले तेव्हा इन्फ्लेशन १०%, ११% च्या आसपास होते. आज इन्फ्लेशन ८.५% च्या आसपास आहे. आणि एनिवे भाजपाच्या मागच्या सरकारातही इन्फ्लेशन कमीच होते. त्यामुळे - महागाई कमी होईल यावर मी जास्त विश्वास ठेवायला तयार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सबसिडी कमी करत नेली तर इन्फ्लेशनही कमी होत जाते(चलन मजबूत होत जाते; व आयातीच्या वस्तू, प्रामुख्याने तेल स्वस्तात मिळते.
त्याच्या स्पायरल इफेक्टने इतरही किंमती आटोक्यात राहतात.) असे ऐकले आहे.
त्यात तथ्य असेल तर इन्फ्लेशन कमी होण्याचे चान्सेस आहेत. कारण सबसिडी कमी करायला लागणारी हिंमत पुरवू शकणारे संख्याबळ
भावी सरकारला मिळालेले दिसते.

लोकसंख्या नियंत्रणाबद्दल अजिबात काही करु नये असे माझे मत आहे.
फार तर लोकसंख्या नियोजनाचा विचार करा.
लोकसंख्या तशीही स्थिरावण्याकडे आधीच वाटचाल करु लागली आहे.
आणखी उपाय करुन स्थिरावलेल्या लोकसंख्येकदून आकुंचित होत जाणार्‍या लोकसंख्येकडे प्रवास नको.
मुळात लोकांच्या खाजगी बाबीत नाक खुपसणे टाळावे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मुळात लोकांच्या खाजगी बाबीत नाक खुपसणे टाळावे असे वाटते.

Welcome to the bandwagon !!!

---

लोकसंख्या नियंत्रणाबद्दल अजिबात काही करु नये असे माझे मत आहे.

यही तो मै कह रहा हूं मालिक.

Paul R. Ehrlich ने टाकलेला "बाँब" अजूनही ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात लोकांच्या खाजगी बाबीत नाक खुपसणे टाळावे असे वाटते. > किती मुलं जन्माला घालावीत ही जर खाजगी बाब असेल तर त्यांना कसं वाढवताय हीदेखील खाजगी बाब असेल नाही का? मग ज्याकाही मुलांशी रिलेटेड सबसिडी, ट्याक्स बेनिफीट, शालेय आहार योजना, बाळंतपणाच्या रजा वगैरे आहेत त्या बंद कराव्यात. काय म्हंता? किंवा रिक्षावाल्या काकांच्या अरेरावीचा प्रश्न सरकारने सोडवावा अशी अपेक्षादेखील करु नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदम सहमत.

ती मुलं पालकांची आहेत व त्यांच्या कॉस्ट्स व बेनिफिट्स पालकांचे आहेत. सरकार जवढे कमी मधे पडेल तेवढे स्वागतार्ह आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सबसिडी कमी करत नेली तर इन्फ्लेशनही कमी होत जाते
<<
मागच्या सरकारने पेट्रोलियम पदार्थांवरील सबसिडी कमी करायला सुरुवात केली तर मोठा आरडा ओरडा करण्यात आला होता असे आठवते...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

१. भारताचा विकासदर (जीडीपी ग्रोथ रेट) काय असेल? विकासाची कुठची कामं सरकारतर्फे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली जातील?

आता आंतरराष्ट्रीय परिस्थिती तितकी वाईट नसल्याने (व यात प्रगतीच होईल असाच अंदाज असल्याने) विकासदर ८%च्या वर पोचेल असे वाटटे (किमान तशी अपेक्षा आहे)
ज्या विकासकामांमुळे विकास प्रत्यक्ष 'दिसेल' अशी कामे प्राधान्याने हाती घेतली जातील. सरदार पटेलांच्या पुतळ्यासारखे लोकांच्या भावनांना कुरवाळणारे निर्णयही होतील.
विमानतळे, रस्ते वगैरेमध्ये चालु असलेलेच काम अधिक वेगाने होईल असे वाटते.
नद्या जोड प्रकल्प हाती घेतला जाईल. (इच्छा आहे की तो भारताच्या काही विवक्षित भागातच हाती घेतला जावा - विशेषतः पुर्वोत्तर राज्ये, बिहार, बंगाल भागात)
खाणकाम वाढेल, वीज निर्मिती वाढवायचे मोठे प्रयत्न होतील.

२. भारताचं परराष्ट्रधोरण काय असेल? आहे त्यापेक्षा कसं वेगळं असेल?

यात मोठे बदल नसतील, मात्र संबंधांचं मुळ आर्थिक असेल, राजकीय/भावनिक राजकारण फक्त पाकिस्तान व काही प्रमाणात चीन बरोबर खेळले जाईल.
शेजारील छोट्या देशांवर मोदी लक्ष केंद्रित करतील व लुक इस्ट अधिक जोरकसपणे राबवतील असा अंदाज आहे. अमेरिकेसोबतचे संबंध ओमाबा असेपर्यंत फारसे बदलणार नाहित असे वाटते. (सुधारणारही नाहित)

३. साक्षरता, शिक्षण, यावर सरकार कितपत भर देईल? आरोग्यावर किती खर्च केला जाईल?

बहुदा मुरली मनोहर जोशी पुन्हा शिक्षण मंत्री होतील! मग काय आनंदच आहे Wink
आरोग्य धोरणे तशीच राहतील. फक्त शहरी व्यावसायिक हॉस्पिट्ल्सच्या संख्येत भरगच्च वाढ होईल. गावांत मात्र फार मोठे बदल होणार नाहीत.
शहरीकरण एकुणात अधिक वेगाने होईल.

४. भारतात फॉरिन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढेल का?

होय. त्यासाठी एव्हिएशन, इन्श्युरन्स व कदाचित डिफेन्स ही क्षेत्रे ओपन होतील

५. हिंदू-मुस्लिम, किंवा एकंदरीत सामाजिक भेद वाढतील, कमी होतील की जैसे थे राहतील?

दैनंदिन बाबतीस सरकारतर्फे जैसे थे राहतील.

६. विरोधी पक्ष नक्की काय भूमिका घेतील?

बोटचेपी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आता आंतरराष्ट्रीय परिस्थिती तितकी वाईट नसल्याने (व यात प्रगतीच होईल असाच अंदाज असल्याने)

यात प्रगतीच होईल असा अंदाज वाईल्ड गेस आहे की एज्युकेटेड? एज्युकेटेड असल्यास कोणत्या माहितीच्या आधारे काढला ते सिरियसली व सिन्सियरली वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निव्वळ आर्थिक क्षेत्रातील आमची बहुतांश मते फारशी एज्युकेटेड नसतात Smile
सध्या विविध च्यानेलांवर चाललेल्या चर्चा, मोठाल्या वृत्तपत्रातील छोटे-मोठे लेख वगैरेवर बनलेले मत आहे. खंडन अपेक्षितच नव्हे तर स्वागतार्ह आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रश्न खंडनाचा नाहीय. नवीन तंत्रज्ञान आपले प्रश्न सोडवील किंवा अर्थव्यवस्थेची सायकल्स असतात या पेक्षा जास्त ठोस माहितीवर आधारित आशादायी काहीतरी खरोखर वाचायला हवंय. पुढच्या पाच-दहा वर्षात २००८ ची पुनरावृत्ती होणार नाही याची कोणतीही खात्री नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोल्डमन सॅक्सचा 'Modi'fying our view - Raise India to market weights हा अहवाल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खासगी आयुष्यात ढवळाढवळ करायला सुरूवात.
BJP MP From Bikaner To Table Anti-Homosexuality Bill In Lok Sabha

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

येत्या पाच वर्षात उदारमतवादी लोकांच्या क्रियाशीलतेचीही कसोटी लागणार बहुतेक. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बातमीची तारीख काय आहे? डिसेंबर १४ पानाच्या डावीकडे दिसते पण साल दिसत नाहिये.नेमकं काय आहे?
या गोष्टी काही व्यक्तिंनी प्रयत्न केला तरी अगदी मेजॉरिटीतले सरकार देखील पहिल्या काही बदलांमधला म्हणून करायला घेइल असे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

३७७ की कायसेसे कलम पास करताना काँग्रेसचे राज्य होते असे ऐकून आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षसापेक्ष उमाळा रोचक वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ते कलम उर्वरित दंडसंसितेसह ब्रिटिश राज्यात १८८२ साली, म्हणजे १८८५च्या काँग्रेसच्या स्थापनेच्या आधी ३ वर्षे पास झाले.

काँग्रेस सरकाराने दिल्ली हायकोर्टाचा निकाल मान्य करून सुप्रीम कोर्टात ३७७ कलमाचा विरोध केला होता, हा त्यातल्या त्यात ताजा ३-५ वर्षांचा इत्तिहास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आय स्टँड करेक्टेड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुपया अजून ष्ट्रांग व्हावा का नाही याबाबत समजत नाही. वधारला तर दरवाढ कमी होईल असं वाटतय. पण फार वधारला तर आमची कंपनी ( किंवा इतर आयटी कंपन्या) बुडेल!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

निकालाच्या आदल्यादिवशी हापिसात एका सिनिअर फंड मॅनेजरशी चर्चा करण्याचा योग आला.
परदेशातील गुंतवणूकदारांच्या या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. गेल्या दहा वर्षात "इंडिया हॅज डन नथिंग" असे तो म्हणाला.
त्यामुळे मुख्यत्त्वे मूलभूत सोयीसुविधांचे रखडलेले अनेक प्रकल्प वेगाने मार्गी लावले जाण्याची शक्यता आहे.
महागाई कमी करण्यात "सप्लाय साईड कन्स्ट्रेन्ट्स" आहेत असे त्याचे मत पडले आणि इन्फ्रास्ट्रक्चर सुधारल्याशिवाय सप्लाय साईड सुधारणे शक्य नाही.
चीनच्या पाच-सहा SEZच्या तुलनेत भारतात २०० SEZची योजना झालेली असूनही फारसा फरक पडला नव्हता तो आता पडेल असे समजण्याचे सबळ कारण दिसत नाही.
विरोधीपक्षात असताना किरकोळ विक्री क्षेत्र खुले करण्याच्या निर्णयाला विरोध करणारे लोक आता विकासासाठी तशा निर्णयांना पाठिंबा देतील की कसे ते कळेलच.
त्याचवेळी अमेरिकेत क्युई टेपरिंग चालू आहे आणि या वर्षाच्या अखेरीजवळ क्युई संपुष्टात येईल आणि जगभर व्याजदर वाढतील. त्याला तोंड देऊन आर्थिक वाढ टिकवणे आणि त्याचवेळी महागाई कमी करण्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक व वेळेवर प्रकल्पपूर्ती करणे हे या सरकारपुढे मोठे आव्हान असेल.
एकेकाळी IMFचे लाडके असलेले ममोसिंग चांगल्या सुरूवातीनंतर ढेपाळल्याने अंतरराष्ट्रीय समुदायाच्या नजरेतून उतरलेच होते.
आता मोदी त्यांचा नवा लाडका नयनतारा होतात का ते पाहायचे.
या सम्पूर्ण निवडणुकीत मला खटकलेली गोष्ट म्हणजे हवामान बदलामुळे निर्माण होऊ घातलेल्या आव्हानांबद्दल कोणीही चकार शब्द काढलेला नाही त्यामुळे या सरकारच्या कारकीर्दितही त्याबद्दल अभ्यास वा आपत्कालीन उपाययोजना होतील असे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या सम्पूर्ण निवडणुकीत मला खटकलेली गोष्ट म्हणजे हवामान बदलामुळे निर्माण होऊ घातलेल्या आव्हानांबद्दल कोणीही चकार शब्द काढलेला नाही त्यामुळे या सरकारच्या कारकीर्दितही त्याबद्दल अभ्यास वा आपत्कालीन उपाययोजना होतील असे वाटत नाही
पर्यावरणप्रेमी भावी सरकार नदीजोड करणारेत म्हणे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

I would prefer taking a different approach from the one as proposed by Rajesh. I think the discussion should be categorized as political changes, economic changes, developmental changes, social changes, cultural changes, foreign affairs changes and miscellaneous issues.
त्यातला पहिला भाग हा-
१. १९९१ पर्यंत भारतात विरोधी पक्ष कोणता होता या प्रश्नाचे उत्तरच समाधानकारक देता येत नव्हते. १९९१ एक स्थिर विरोधी पक्ष आला तेव्हा सरकारे नीट कामे करू लागली. प्रशासनातला मूर्खपणा, लॅकलैडिजिकल अप्रोच कमी झाला. सरकार विरोधकांनी सक्षम केले. वास्तव असे आहे कि हवा वेगळी नि वास्तव वेगळे. म्हणून मोदी कदाचित जस्ट अनादर पीएम ठरू शकतात. आणि काँग्रेसची पाळेमूळे देशात खूप खोल आहेत. वर अतिशहाणा म्हणतात त्याप्रमाणे २०१९ मधे काँग्रेस will be more than prepared for a ferocious propaganda that matches BJP irrespective how well BJP performs. याची भाजपला नि काँग्रेसला जाणिव आहे. सक्षम विरोधी पक्ष नाही हे १६ व्या लोकसभेचे दुर्भाग्य असले तरी २०१९ पासून पुढे नसेल अशी अपेक्षा करू या. देशाच्या भवितव्यासाठी भाजप हा कायमचा सत्ताधारी वा विरोधी पक्ष बनणे, त्यांच्या ८०% विचारसरणीचा अनुयायी म्हणून, मला देशाचे अहोभाग्य वाटते.
२. बी जे डी, अण्णाद्रमुक, एनसीपी नि टी एम सी सरकारमधे सामील होतील असे वाटते. याला एक वर्ष लागेल. 'पाच वर्षे शक्य तितकी कामे करून काढणे' हा मोदींचा अप्रोच नाही. २/३ बहुमत घेऊन 'जास्तीत जास्त' कामे करणे हा असेल. मोदींची 'खानदानी' दुश्मनी सोडली तर त्यांचे कोणाशीही इतके वाकडे नाही, त्यामुळे कधीकाळी हा अलायन्स ४१५ च्या पुढे गेला तर नवल नको.
३. काँग्रेसमधे 'खानदानाबद्दल' असंतोष होईल. खानदानाच्या बाहेरचे लोक नेते, बुद्धिमान असू शकतात असा विचार बळावेल. विचारमंथन होईल. पक्ष फुटण्याची स्थिती येईल. पक्ष खानदानाच्या साडेसातीतून सुटावा नि निस्पृह, बुद्धिमान लोकांच्या हाती जावा, त्याचा पुनरुद्धार व्हावा, सोनिया रिटायर व्हावी, हायकमांड शब्द नष्ट व्हावा, असे काँग्रेसच्या खर्‍या इतिहासाच्या व विचारसरणीच्या ८०.०१% प्रेमापोटी वाटते.
४. परवा परवा पर्यंत टीवी वर सारे विचारवंत शेवटी चुनाव जातीवरच घसरला असे म्हणायला लागले. अर्लि ट्रेंड्स पाहून मग हिंदू मतांचे कंसॉलिडेशन झाले आहे म्हणायला लागले. पण जेव्हा मतदानाची आकडेवारी आली तेव्हा, यू पी नि बिहारचे निकाल पाहता, त्यांना एक प्रचंड धक्कादायक सत्य मान्य करावे लागले. बीएसपी यू पी त एकही जागा नाही, पण वोट शेअर २५% आहे. झाडून सारे यादव एस पी ला मतदान देतात म्हणे. आता बीजेपीची जिंकायची मार्जिन पाहिली, एकूण ३०-३५-४०% च्या वर मुस्लिम असलेले मतदारसंघ पाहिले (चांगले ४० च्या वर मतदारसंघ असतील), तर एक अर्थ निघतो - प्रचंड मुस्लिमांनी भाजपला मत दिले आहे. नाहीतर तर ती दलित-यादव वोट बँक काढली तर भाजप उच्चवर्णीयांच्या मतावर पाशवी संख्येने जागा जिंकूच शकत नाही. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे - अगदी जातीयवादाचा गढ असलेल्या ठिकाणी लोक जात धर्म विसरून मतदान करत आहेत. सिनिकल पोल अनालायजर्सना पण मान्य करावे लागले ही निवडणूक विकासाच्या अपेक्षेने झाली. कारण दुसरी बेरीज नि निका मॅच होत नाहीत. काल ३० ते ४०% विचारवंतांचा, इ सुर ही निवडणूक खरोखरच विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली असा सुर दिसला ही आनंदाची गोष्ट आहे (शेवटी हेच लोक मास ओपिनियन मोबिलाइज करतात.)
---इथून पुढे निवडणूकीत जातीचे महत्त्व (आपल्या नि उमेदवाराच्या) कमी (नि नंतर नष्ट) होणे हा देशाचा भाग्योदय आहे. आपली प्रांतिक (रीड- जातीय) अस्मिता घेऊन २०-२५ जागांच्या बळावर केंद्राला तुकडे टाकण्याचा खेळ बंद होइल. जयललिता वगळता, थोडके लोक आपली व्यक्तिगत प्रतिमा (ममता, नविन) आहे म्हणून टिकले आहेत.
४. भारत एक जोडलेली गोधडी आहे. या जागच्या लोकांचा त्या राज्याच्या नेत्याशी संबंध नाही, नाते नाही, नि त्या राज्याला तिथलेच लोक प्रतिनिशित्व करणार नि त्यांनी नाही केले तर त्यांचे नुकसान होणार अशी हिणकस भावना हळूहळू लोकांच्या मनातून उतरू लागेल. नेता कोणत्याही राज्याचा असो, तो सगळ्यांचे नीट प्रतिनिधित्व करू शकतो ही भावना असेल. ही भावना आजपर्यंत गांधी खानदानाचाच ट्रेडमार्क होती. आता सर्वच पक्षांत असे नेते येतील.
५. सगळेच नेते भ्रष्ट नसतात. अगदी ७०% नेते किंचितही भ्रष्ट नसतात. कोण्या का पक्षाचे असेनात. उरलेल्या ३०% ना पक्ष चालवायचा असतो. त्यात त्यांना पैसे लागतात. यात बर्‍याच गोष्टी येतात. १. निवडणूक खर्च - अधिकृत , अनाधिकृत २. पक्ष धरून ठेवणे - बेसिक लेवला कार्यकर्त्यांची घरे चालवणे वा त्यांना धंद्यात इ इ फेवर करणे ३. भ्रष्टाचार प्रॉपर - अगदी तात्विकदृष्ट्याही देशाला वा पक्षाला काहीच फायदा नसताना गडगंज पैसा घरी घेऊन जाणे. जनरली स्वच्छ असूनही मोठाले नेते सगळे दुर्लक्षित करतात, कारण आजूबाजूचे लोक गेले तर ते नेते कसे? आणि भारतात त्यांच्यासाठी कोण फुकट काम करावे. मग म्यूच्यूअल फेवर होतात नि संस्था बारगळतात. (काँग्रेसमधे बव्हंशी लोक चांगले होते. मी ज्योतिषी नाही पण साडेसातीतही एक पिक टाईम असतो का ते मला माहित नाही. काँग्रेससाठी ती वेळ सुबोध राय कॅग बनणे. सरकारचे बजेट १६० नि हा बाबा म्हणतो त्यातले १०० रु भ्रष्टाचार!!! असो.) पण हे लांडगे का पाळावे लागतात? स्पष्ट आहे - 'तुम्ही मास लिडर नाहीत.' आता जर मते मिळवण्यासाठी लांडगाव्यवस्थेची गरज फार कमी झाली नि सामान्य लोक फक्त नेत्याचे नाव ऐकून, काम पाहून मतदान करू लागले तर? तुम्ही किती 'हवा बनवा', १५ वर्षे सत्ता केल्यावर, प्रचार न करता, लोक १००% जागी, तुम्हालाच नाही अजून चार जणांना लोक ४-४ लाखांच्या मार्जिनने निवडून देऊ लागले तर लांडग्यांची गरज पडते का? तसे भाजपचे रेप्यूटेशन आहे कि हा खायला न मिळालेला लांडगा आहे, म्हणून तो जास्त खातो.
मोदींचे सूत्र स्पष्ट आहे - दिसला लांडगा कि घरी पाठवायचा. शिवाय त्याचे 'गुप्तहेर खातेही' भन्नाट आहे. मग यांच्याकडे दर सहा महिन्याला एक मोठी विकेट पडणार. सातत्य नसणार. "नैतिक जबाबदारी घेऊन तुम्हीही जा" अशी ओरड कान पकवेल.
पण यालाही एक सिल्वर लायनिंग आहे - सगळ्याच पक्ष हे लांडगेकपातीचं सूत्र आरंभतील. तुम्ही म्हणाल हा फार मोठा आशावाद झाला. पण असं नाही, लोकांनी उभ्या देशातली झाडून सगळी साडेसाती घरी पाठवली आहे. (एक जयललिताचा अपवाद. तिथे ही दगडापेक्षा वीट मऊ हा न्याय झालाय. ते डी एम के वाले अतिच फ्रॉड होते. काय करणार बिचारे लोक तिथले?)
५. भाजप १५-२० वर्षांनी तरी केरळ, तामिळ नाडू, बंगाल इथे विरोधी पक्ष बनेल. मग त्यात एकूण परीक्षेत पास व्हायला पाच पैकी च्या पैकी मार्क घेतलेच पाहिजेच अशी अट असणार नाही.
६. विचारवंतांचे डोके कसे चालते ते जाऊ द्या - म्हणजे भारताचा जर्मनी (१९३९चा) होणार म्हटले कि ऐकून घ्यावे लागते. पण "विरोधी पक्ष, म्हनजे भाजप (आर एस एस नव्हे)" देशात अतिरेक्यांची प्रशिक्षण केंद्रे चालवत आहे असे "गृहमंत्री" म्हणणार नाहीत. चुनाव आयोग, माध्यमे, इ इ इतका डाटा एकत्र करून बसतील कि बोलायचा धाक असेल. केवळ इतक्यानेच निवडणूक हारली जाऊ शकते हे सिद्ध झाले आहे. म्हणजे नेत्यांचे जब्बाबदार वर्तन, सांभाळून बोलणे. पुन्हा देशाचे अहोभाग्य.
७. देशाने दिलेला मँडेट हा एन डी ए ला आहे. एकट्या भाजपला नाही. हीच निवडणूक एकटी भाजप लढली असती तर २०० च्या आत गाशा गुंडाळावा लागला असता हे सांगायला कोणी पंडित लागत नाही. भाजपमधे १०% खासदार निव्वळ अक्कलशून्य कडवट प्रतिगामी नि बुरसटलेल्या विचारांचे असावेत. मोदी फक्त समोरच्या सैन्याच्या हतीवर बसलेल्या राजावर टिका करतात. अन्यथा ते सौम्य असतात. मग लोकांची गरळ ५ वर्षे ऐकावी लागणार. पण यांचे काही चालणार नाही. मोदी कोणतीही इतर भिंत पाडल्यासारखे मंदीरे नि मजिदी पाडत असतात, कारण - विकास. 'दिसण्यासारखा' विकास झाला तर लोक त्यांना काही म्हणणार नाहीत हे मोदींना माहित आहे. पण विकास झाला नाही तर जून २०१९ मधे "कोण मोदी?" अशी हालत होईल.
आता इथे ही एक सिल्वर लायनिंग आहे - या निमित्ताने "समान नागरी कायदा", "हिंदूराष्ट्र", "हिंदू निर्वासित", "३७०", "राममंदिर" असे शब्द जरी उच्चारले तरी शिव शिव, शिव शिव म्हणणारे कालचे विचारवंत नि या संकल्पना उचितपणे मांडू शकणारे कालचे वाळीत असलेले उजवे यांच्यात एक संवाद सुरु होईल. प्रश्न भांडण करूनच सोडवायचे नसतात, जी बाजू जड ती जड, जी खरी ती खरी, असा प्रांजळपणा येईल. सेक्यूलर नावाचा धर्म असलेल्या भारतात हिंदू धर्म असलेल्या अतिरेक्यांनी उच्छाद मांडला आहे असा एप्रिल २०१४ पर्यंतचा सीन नष्ट होईल.
८. ही केवळ आशा नि इच्छा आहे. असे होईल असे म्हणायला पुरेसे कारण नाही- सारे सेक्यूलर लोक कंसोलिडेट होतील. या निवडणूकित सगळे नकली सेक्यूलर घरी गेले आहेत. पण तरी, त्यांचा वोट शेअर पाहता, ही विचारसरणी राइट ऑफ करता येत नाही. "हिंदूराष्ट्रातले/आताचे हिंदू/सरकार सर्वाथाने सेक्यूलर असतील/असेल" असे मानणे नि "आताच्या/खर्‍या अर्थाने सेक्यूलर सरकार असावे" या टक्करणीय विचारसरणी आहेत. या अल्टीमेट लढाईसाठी भाजप व काँग्रेस हे वेगळे पक्ष आहेत. अन्यथा त्यांच्या विभक्त अस्तित्वाला तात्विक आधार नाही. ही निवडणूक मुख्यतः विकासासाठी आहे तरीही हिच्यात या लढ्याकडे अल्पशी पुश आहे. हा लढा तात्विक नि सदैव "जालावर चघळायला खुराक" स्वरुपातच राहो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रतिसादात तथ्य असावं. आकडे बरेच वापरले आहेत.
ही प्रतिसादातील आकड्यांची यादी :-

१९९१
१९९१
२०१९
१६
२०१९
८०%
२/३
४१५
८०.०१%
२५%
३०-३५-४०%
३० ते ४०%
२०-२५
७०% नेते
३०% ना पक्ष चालवायचा असतो.
१६०
१०० रु
१५ वर्षे
१००% जागी
१५-२० वर्षांनी
जर्मनी (१९३९चा)
तर २०० च्या आत
१०% खासदार
५ वर्षे
२०१९
३७०,
२०१४

100 percent पेस्तनकाका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चल ठिक आहे. मी एक विधान करतो -

"मंत्रालयाच्या कार्याची 'बर्‍याच' नेत्यांना व्यवस्थित जाणिव असते."

आता इथले प्रशासन म्हणजे २००९ चे केंद्र सरकार. सांगा पाहू बर्‍याच म्हणजे मला नक्की किती म्हणायचे असावे? ०?-५?-१०%?-......-९५%-१००%?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अहो ते सांगता आलं असतं तर मला लोकांनी १००% अरुण जोशीच नसतं का म्हटलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हे साला तुमचा पुनेरीटाट्या आपटे लोक पुन्यात बसून मराठवाड्यावर बोलते. पयलेच्या जमानाच नाय राहिला. अगोदरच्या टायमाला लेखक कशे सगळीकडे असनार. आता झाले सगळे पुनेरी आपटे, गोखले, रानडे! चार पेठ बगले तरी बास झाला म्हंते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जस्ट अ फ्यू करेक्शन्स/सजेशन्स ..... (प्रतिवाद वगैरे नाही).

>>१९९१ पर्यंत भारतात विरोधी पक्ष कोणता होता या प्रश्नाचे उत्तरच समाधानकारक देता येत नव्हते. १९९१ एक स्थिर विरोधी पक्ष आला तेव्हा सरकारे नीट कामे करू लागली.

ही गोष्ट तितकी खरी नाही. [७७-७८ व ८९-९० काळ सोडला तरी] १९६७ मध्ये सुद्धा काँग्रेसला निसटते बहुमत मिळाले होते. त्यावेळी प्रबळ विरोधी पक्ष होतेच. कंसातील काळात काँग्रेसच विरोधी पक्षात होती. तुम्ही जेन्युइनली विरोधी धोरणे असलेला विरोधी पक्ष असं म्हणत असाल तर १९९१ हे थोडे फार खरे मानता येईल. त्यापूर्वीच्या विरोधी पक्षांची धोरणे काँग्रेससारखीच समाजवादी नियंत्रित अर्थव्यवस्थेची होती. भांडण नियंत्रणाच्या स्केलबाबत होते. त्यामुळे काँग्रेसला भांडवलवादी म्हटले जाऊ शके. [तरीही ६७ च्या निवडणुकीत जनसंघ आणि स्वतंत्र पार्टीला किती सीट मिळाल्या हे ठाऊक नाही].

>>सक्षम विरोधी पक्ष नाही हे १६ व्या लोकसभेचे दुर्भाग्य असले
कम ऑन .... ५४३ पैकी ३४० मिळाले आहेत म्हणजे २००+ खासदार विरोधात आहेत. (राजीव गांधी काळात ~१२० होते).

>>'पाच वर्षे शक्य तितकी कामे करून काढणे' हा मोदींचा अप्रोच नाही. २/३ बहुमत घेऊन 'जास्तीत जास्त' कामे करणे हा असेल.
मोदींना तसे कुठलेही काम करायला आडकाठी येणार नाही. त्यासाठी २/३ बहुमताची गरज नाही. केवळ ३७० कलम रद्द करण्यासाठी आणि समान नागरी कायदा लागू करण्यासाठी ते लागेल. ही कामे समजा झाली नाहीत तरी जनता बहुधा नाराज होणार नाही. या विशिष्ट कामांसाठी मोदींना खरोखर किती मते मिळाली आहेत हे जाणणे अवघड आहे.

>>नेता कोणत्याही राज्याचा असो, तो सगळ्यांचे नीट प्रतिनिधित्व करू शकतो ही भावना असेल. ही भावना आजपर्यंत गांधी खानदानाचाच ट्रेडमार्क होती. आता सर्वच पक्षांत असे नेते येतील.

मधल्या काळातल्या राजकीय कारणांमुळे ही भावना त्या त्या काळातल्या विरोधी पक्षांनी खच्ची केली. काँग्रेसला जेरीस आणण्याचा तो एक मार्ग तत्कालीन राष्ट्रीय विरोधी पक्षांनी अवलंबला. असे जे जे पक्ष दिसतील त्यांच्याशी युत्या आघाड्या करण्याचा सपाटा तेव्हाचे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी आणि नंतर भाजप यांनी लावला. शिवसेना, तेलगू देसम, बिजू जनता दल, अकाली दल, असम गण परिषद, काही काळ नॅशनल कॉन्फरन्स (आता) जगन रेड्डीची काँग्रेस वगैरे ही उदाहरणे आहेत. अर्थात काँग्रेसला हरवताच येत नाही या परिस्थितीत त्या पक्षांना दोष देणेही योग्य नाही. आज भाजपला बहुमत मिळाले आहे म्हणून युत्या वैट असतात असा साक्षात्कार झाला असला तरी निकालाच्या आदल्या दिवशीपर्यंतही भाजप (निवडणुकोत्तर) युत्या करायला तयार होतीच (कॉंग्रेसही त्या खेळाला तयार होती).

>>काँग्रेससाठी ती वेळ सुबोध राय कॅग बनणे. सरकारचे बजेट १६० नि हा बाबा म्हणतो त्यातले १०० रु भ्रष्टाचार!!! असो.

सुबोध विनोद राय यांनी भ्रष्टाचार म्हटले नव्हते..... त्यांनी नोशनल लॉस म्हतले होते. तितका भ्रष्टाचार झाला असा ट्विस्ट अण्णा/केजरी कंपनीने दिला.

सामान्य लोक नेहरूंचे नाव पाहून मतदान करीत असत पण त्याहीवेळी लांडगे पाळावे लागतच असतील.

आता सेक्युलर वगैरेविषयी.....
मोदी यांचे सरकार सेक्युलर सरकार असेल हा धाडसी आशावाद आहे. पण ती आशा ठेवायला मोठ्या बहुमतामुळे जागा आहे. People may have voted Modi for development, The question is why has RSS/BJP nominated Modi as PM. Does Modi subscribe to core ideology of RSS (and all its components)? Or is he really development man and will keep RSS at bay? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळण्यास अजून वेळ आहे. तोवर बेनिफिट ऑफ डौट (विथ स्केप्टिसिझम) द्यायला हरकत नाही.

मुक्त मंथनाच्या दुसर्‍या भागाच्या प्रतीक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

I don't think we say different things. You are slightly left off the contre and I am slightly right off the centre.
१. विरोधी पक्ष - १९४७ ते १९७७ मधे विरोधी पक्ष कोणता होता, त्याचे नाव काय, त्याचा नेता कोणता, त्यांनी कोण्त्या विषयांवर विरुद्ध भूमिका घेतली, "तेच" लोक सातत्याने विपक्षात होते का, इ इ.
२. २०० जागा सत्ताधारी पक्षाला नसणे नि एका विपक्षी पक्षाला, मतवादाला प्रचंड पाठबळ असणे वेगळे.
३. अर्थातच
४. मोदीच्या नावाने उभ्या देशात मते मिळणे, राजीवच्या नावाने उभ्या देशात मते मिळणे - शुभसंकेत.
५. ऑडिटर does not classify losses are real or notional. All the losses are real to them. The opposition termed them corruption, the government coined the word notional.

मोदी यांचे सरकार सेक्युलर सरकार असेल हा धाडसी आशावाद आहे. पण ती आशा ठेवायला मोठ्या बहुमतामुळे जागा आहे. People may have voted Modi for development, The question is why has RSS/BJP nominated Modi as PM. Does Modi subscribe to core ideology of RSS (and all its components)? Or is he really development man and will keep RSS at bay? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळण्यास अजून वेळ आहे. तोवर बेनिफिट ऑफ डौट (विथ स्केप्टिसिझम) द्यायला हरकत नाही.

Allowing complete cynicism and skeptcism, the very idealogy that inclusive Hinduism (not on paper, but at heart) and development cannot coexist is bereft of logic.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१९४७ ते ५२ विरोधी पक्ष नव्हता..... म्हणजे सरकारात काँग्रेसेतर लोकही होते असे वाटते. ५२ च्या पहिल्या निवडणुकीनंतरचं ठाऊक नाही. पण १९६७ च्या निवडणुकीत बडी आघाडी होती आणि त्यात जनसंघ + समाजवादी हे होते. कॉग्रेसला जस्ट बहुमत मिळाले होते. पैकी समाजवादी लोक हे सातत्याने विरोधक म्हणून संसदेत होते. जनसंघीसुद्धा सातत्याने होतेच. 'तेच' लोक म्हणजे काय हे कळत नाही.

>>the very idealogy that inclusive Hinduism (not on paper, but at heart) and development cannot coexist is bereft of logic.

म्हणजे काय? ते तर एकत्र असू शकतात. "इन्क्लूजिव्ह हिंदुइझम (अ‍ॅट हार्ट)" आहे का याविषयी शंका आहे. म्हणून मूळचे keep RSS at bay वाक्य आले.

My full support to Modi if he has merely 'used' RSS to reach the top and will keep those elements at bay. (I mean if we are now dealing with a BJP government independent of RSS).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

काय व्हावे:
सर्व महानगरांतील मेट्रो रेल्वे प्रकल्प वेगवान व्हावेत ही अपेक्षा. त्यासाठी ती प्रक्रिया स्वतंत्र प्राधिकरण(?) किंवा तत्सम संस्था काढून नियंत्रित करावी. शहरी वाहतूक नियंत्रण नसले तरी मेट्रो प्रकल्प केंद्रसरकाराच्या अखत्यारित असावेत.
मोठ्या शहरांना/दरम्यान थेट जोडणार्‍या/धावणार्‍या रेल्वे व्हाव्यात.
सौर उर्जेच्या वापरात प्रचंड वाढ.

काय होईल?
रेल्वे मार्ग वाढतील. किमान मालवाहतुकीत तरी वाढ होईल.
काही ठिकाणी चार पदरांचे सहा पदरी होतील. कदाचित सर्व राष्ट्रीय महामार्गांवर वाजपेयी आणि मोदींचे फोटो पाहायची सवय लावावी लागेल.
पूर्ण-पान-केन्द्र-सरकारी जाहिराती वाढतील. सरदार पटेल जयंती पुण्यतिथी दिवशी जोरदार प्रचिती येईल.
नद्या जोड प्रकल्प काही वेळेस चर्चिला जाईल. प्रायोगिक म्हणून एक दोन कालवे खोदले जातील. पुन्हा ये रे माझ्या मागल्या असं होईल.
मतदान प्रक्रिया(नोंदणी इत्यादी) सुलभ करण्याचा प्रयत्न केला जाईल. मतदानात सरासरी वाढ करण्याचा प्रयत्न केला जाईल.
इंधनाच्या किमती वाढतील.(सरकार-निरपेक्ष वाढ)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"सीमेपलिकडचे दहशतवादी कॅम्प नष्ट करणे" या मुद्द्यावर मागच्या सरकारांना (भाजपसह) नेहमी टीकेला सामोरे जायला लागले होते.

या मुद्यावर बरेच हॉक्स काही ठोस कृतीची अपेक्षा करतील. अपेक्षित कृती न झाल्यास रोषाला सामोरे जावे लागेल.

त्यावर कृती करायची का किंवा किती करायची हे नव्या सरकारला लष्कर वगैरेंशी चर्चा करून ठरवावे लागेल. सरकारने लष्कराच्या सल्ल्यानुसार 'योग्य तो' निर्णय घ्यायला हवा. कुणाला बरे वाटावे म्हणून नसती साहसे करू नयेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

काल एन्डीटीवी वर एक चर्चा ऐकली. त्यात भाजपाच्या सदस्यानी ( जे ४० वर्ष परराष्ट्र सेवेत होते) सांगितलं की कुरापती / अतिरेकी हल्ल्यांना रिस्पॉन्स आधीसारखाच (कॉग्रेस सरकार सारखा) नसेल. म्हणजे नक्की कसा वेगळा असेल यावर प्रकाश नाही टाकला. म्हणाले हे टीव्ही वर सांगण्या योग्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तुम्ही पाहिलेली चर्चा ती हीच का:
हे मनमोहनसिंह यांचे सरकार नाही! - गडकरी

सत्तास्थापनेआधी असे बोलणे आततायी वाटते. योग्य/अयोग्य दूरच राहिले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नाही नाही. गडकरी नव्हते त्या चर्चेत. शशी थरूर, भाजपचे एक सरदारजी, एक अमेरिकन पत्रकार आणि एक ब्रिटिश पत्रकार अस प्यनेल होतं. भाजपा आणि थरूर देशाची सुरक्षा आणि सन्मान महत्वाचा असं म्हणत होते आणि नवी पॉलिसि यावर भर देणारी असेल/ गेली १० वर्ष होती असं म्हणत होते. फिरंगी पत्रकार, 'भारतानी व्यापाराभिमुख धोरण ठेवलं पाहिजे' असं म्हणत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

शशी थरूर, भाजपचे एक सरदारजी, एक अमेरिकन पत्रकार आणि एक ब्रिटिश पत्रकार अस प्यनेल होतं.

Now, why does this sound like the opening line of a joke?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Now, why does this sound like opening line of a joke?
Now, why does this sound like an opening line of a joke?
Now, why does this sound like the opening line of a joke?

या तिन्ही वाक्यांचे मराठीत कनोटेशन काय होईल. वाक्य चूक नाही, कनोटेशन वेगळे आहे असे समजायचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पहिली वाक्यरचना व्याकरणदृष्ट्या चूक आहे. (अर्थात, भारतीय बोली इंग्रजीत खपून जावी. आर्टिकले गाळण्याची भारतीय सवय सनातन आणि कॉमनप्लेस आहे.)

दुसरी आणि तिसरी वाक्यरचना: दोन्ही व्याकरणदृष्ट्या तत्त्वतः बरोबर ठरावीत, पण आपण म्हणता तसा कनोटेशनमध्ये किंचित फरक व्हावा.

तिसरी वाक्यरचना: 'एखाद्या विनोदातील अनेक वाक्यांपैकी सलामीचे वाक्य' असा अर्थ. (जो मला अभिप्रेत आहे.)

दुसरी वाक्यरचना (मला समजल्याप्रमाणे): 'एखाद्या विनोदाच्या सलामीच्या वाक्याकरिता ज्या अनेक शक्यता असू शकतात, त्यांपैकी एक वाक्य' असा अर्थ. (जो या ठिकाणी कदाचित अगदीच अस्थानी ठरणार नाही, परंतु मला अपेक्षित नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिली वाक्यरचना "मधली वा शेवटची ओळ नाही" असे ठासून सांगायचे असेल तर वापरता यावी.
दुसरी वाक्यरचना अभिप्रेत असावी. - ही (एका) विनोदाची (एक) प्रारंभीची ओळ वाटते.
तिसर्‍या वाक्यरचनेत एक विशिष्ट प्रारंभीची ओळ, अन्य नाही असे म्हणायचे निघते. हे अभिप्रेत नसावे.

चूकभूल देणेघेणे.

* वाक्य चूक नाही समजून तिहींचा जो काही अर्थ निघतो तो लिहायचा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मोदींना उद्देशून लिहिलेल्या फेसबुक आणि व्हॉट्सॅपवरच्या उन्मादी पत्रांच्या गर्दीत हेही एक पत्र वाचायला मिळालं. आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तिथले खालचे २-३ काँमेंट्स पण छान वाटले -
१. माया -Seems there is a mad rush between all commentators & journalists who have been anti-BJP / Modi all along to put out these open letters and words of advice to the new PM. Appears almost as if, having had little or no impact with all their doomsday warning before and during elections, they now want to put out their suggestions quickly, so that they can then 'credit' for having guided Mr. Modi's policies in the right direction later.
२. के वि जयन - Nothing prevented the other parties to gang up together and fight under one (secular) banner to obtain the "69%" as one block. That would have solved all the country's problems. You don't have to be an ex-IAS to divine this.
३.मकरंद- If Mr.Gandhi has put a piece of advise to minorities as well to be open and positive then it would have been neutral and businesslike letter!! h His AAP and CONGRESS philosophy is unable to hide behind his moderate advice and innocent looking intentions. Gandhiji always asked BOTH SIDES to work together for solving problems. Its not only Mr.Modi who should try hard(APPEASE?) to be in good books to "PASS" LABEL OF MODERATE!! Mr. Gandhi please do service to nation by advising minorities their leaders and so call secularist to support efforts of Mr. Modi instead of creating doubts in minds of minorities by such letters. Do I, as Gujarati from land of GANDHI,PATEL AND MODI expect from you this at least?

बाकी रोजचाच घोळ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पत्र ठीक आहे. मला तुम्ही पंतप्रधान व्हायला नको होतात असं स्पष्ट म्हणणं चांगलं आहे.

पण ३१% च मतं मिळाली (प्रत्यक्षात शिवसेना, तेलगू देसम, अकाली दल धरून ३६-३७% आहेत) या म्हणण्याला ग्रेट अर्थ नाही. आजवरच्या सगळ्याच सरकारांना ५०% हून कमीच मते मिळाली होती. केवळ ८४ च्या निवडणुकीत काँग्रेसला ५०% पेक्षा जास्त मते मिळाली होती.

जिथे नेहरू शास्त्री मोरारजी बसले त्या टेबलवर तुम्ही बसणार? हे रॅण्टिंग तर कै च्या कैच. त्या टेबलावर देवेगौडा सुद्धा बसले होते आणि मुलायमसिंग, ममता हेसुद्धा तिथे बसण्याची स्वप्ने पहात होते.

बाकी लोकांच्या मनात भीती आहे वगैरे म्हणणे मांडण्याचा हक्क त्यांना आहेच. पण काही कन्क्लूजन काढण्यापूर्वी पुरेसा वेळ जाऊ देणे भाग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पण ३१% च मतं मिळाली या म्हणण्याला ग्रेट अर्थ नाही....

हे अगदी मान्य आहे.

पण नेहरू-शास्त्री-मोरारजी बसले तिथे मोदी बसण्याबद्दल खेद असला, तर मला समजू शकतो. जरी सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चिट दिलेली असली, तरी मोदींची दंगलीतली भूमिका पुरेशी वादग्रस्त आहे. हां, आता याच्या समर्थनार्थ असेच इतर नालायक पंतप्रधान दाखवता येतीलही. पण त्यामुळे मोदी धुतल्या तांदळासारखे ठरत नाहीत. (होय, सर्वोच्च न्यायालयापेक्षा मी स्वतःला शहाणी समजते. ;-))

बाकी कन्क्लूजन काढण्यापूर्वी पुरेसा वेळ जाऊ देणे वगैरे मान्यच.

पण 'आला मसीहा आला..'चा लोट इतका उद्वेगजनक होता, की त्या पार्श्वभूमीवर हे 'पुरेसं पाय जमिनीवर ठेवलेलं, निषेध स्पष्ट नोंदणारं आणि तरी रोखठोक स्वीकार करणारं' पत्र वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पण 'आला मसीहा आला..'चा लोट इतका उद्वेगजनक होता, की त्या पार्श्वभूमीवर हे 'पुरेसं पाय जमिनीवर ठेवलेलं, निषेध स्पष्ट नोंदणारं आणि तरी रोखठोक स्वीकार करणारं' पत्र वाटलं.

कुणाला काय उद्वेगजनक वाटावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. तूर्तास पी-सेक लोकांच्या पिरपिरीतला दम निघून गेल्याचे पाहून जास्त बरे वाटते आहे.

(होय, मी पीसेकविरोधक आहे. त्याचा अर्थ मोदीसमर्थक होत असेल तर होवो बापडा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कंसातलं वाक्य लईच आवडलं! तुझं वर्गीकरण करताना माझा बरेचदा गोंधळ उडत असे, आता कमी उडेल. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हा हा हा Biggrin

बादवे ते 'पी' सायलेंट नैये हां Wink तदुपरि गोंधळ उडवण्याचे काम अजूनही यथास्थित पार पाडू हेवेसांनल.

(गोंधळप्रेमी) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तरी मोदींची दंगलीतली भूमिका पुरेशी वादग्रस्त आहे.
'आला मसीहा आला..'

पहिलं वाक्य हे (बर्‍याच लोकांसाठी) दुसरं वाक्य उच्चारण्याचं कारण आहे असा माझा दावा आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दुर्दैवाने ( "पहिलं वाक्य हे (बर्‍याच लोकांसाठी) दुसरं वाक्य उच्चारण्याचं कारण " असण्याच्या ) मुद्द्यात तथ्य आहे.
इतका विखार दोन्हीबाजूकडून खिन्न झालो आहे.
कॉंग्रेस व भाजप हे कित्येक बाबतीत एकास झाकावे आणि दुसर्‍यास काढावे; इतके सारखे आहेत असे मला वाटते.
याउप्परही स्थिर सरकार आल्याचा आणि काँग्रेस सत्तेबाहेर गेल्याचा थोडा आनंद जरुर झाला होता.

पण दोन्ही बाजूकडून द्सणारा त्वेष्,विखार उदास करुन जातो.
(जे जिंकलेत त्यातले काही उन्मादी "आता संधी सोडणार नाही" किंवा "किंवा पहा आता काय काय करतो ते" अशा आवेशात
आहेत.जे हारलेत त्यातले सज्जन बरेचसे चिंतित्,भयग्रस्त्,दडपणाखाली आहेत. त्यांच्यातले आक्रमक "आम्हाला काय कमी
समजता का, पुरुन उरो ****नो." अशा आवेशात आहेत.
)

हे आवरायचे कसे हे समजत नाही. प्याचपचा प्रयत्न करण्याची कुणास जरुरही वाटत नाही.
(नेहमीचे डिस्क्लेमर :-
तुमचा व माझा सॅम्पल स्पेस वेगळा असू शकतो. माझा सॅम्पल स्पेस खूपच छोटा आहे.
५ वर्षांनी मी जितका जास्त चूक ठरलो असेन तितका मला अधिक आनंद होइल.
)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

(होय, सर्वोच्च न्यायालयापेक्षा मी स्वतःला शहाणी समजते. )

कंट्रिस्कॅन करा. कदाचित कामाला येईल. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कंट्रिस्कॅन म्हणजे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पण नेहरू-शास्त्री-मोरारजी बसले तिथे मोदी बसण्याबद्दल खेद असला, तर मला समजू शकतो. जरी सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चिट दिलेली असली, तरी मोदींची दंगलीतली भूमिका पुरेशी वादग्रस्त आहे.

नेहरू-शास्त्री एक वेळ समजू शकतो, पण मोरारजी?

मोरारजींना क्लीन चिट कोणी दिली होती? फॉर द्याट म्याटर, मोरारजींनी क्लीन चिट मागितली कधी होती?

आणि मोरारजी जर चालू शकतात, तर मग मोदींनीच काय घोडे मारले आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे रॅण्टिंग तर कै च्या कैच.

कसं आहे कोणाची जागा कुठे आहे याचं इतकं मोठं अभिज्ञान या नौटंकी लोकांना आहे असे सांगतात हे पाहून हसूच येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

फारच भावनाशील पत्र वाटलं.
मुद्दे ठिक असले तरी कारण व मिमांसा त्रोटक व अपुरी आहे.

बाकी श्री.मोदींना ओपन लेटर लिहिण्याची इतकी अहमिका का लागली आहे कोण जाणे! एकतर ती लेटर्स मोदी स्वतः वाचणे दुरापास्त. विरोधकांनी लगेच अशी पत्रे लिहिणे केविलवाणे वाटते! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाकी श्री.मोदींना ओपन लेटर लिहिण्याची इतकी अहमिका का लागली आहे कोण जाणे!

प्रसिद्धीसाठी कायपण!! काँग्रेस पडली तरीपण!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

A reminder of Modi's promises

1. Bullet trains
During his campaign, the PM candidate spoke often of revamping Indian Railways in the same way that Japan had overhauled its rail infrastructure. Since exit polls and election results have been out, rail stocks have been buoyant and sources have suggested that the BJP might move to announce a push on high-speed rail on the Mumbai-Ahmedabad and the New Delhi-Patna routes as soon as possible.
(बुलेट नसले तरी वेळेवर, न घसरता धावणार्‍या, व स्वच्छ सुविधा देणार्‍या गाड्या आल्या, आणि मुख्य म्हणजे थंडीच्या महिन्यांमधे आधुनिक सिग्नलिंग सिस्टेम्स वर आधारित चालू शकल्या तर पुष्कळ. दिनेश त्रिवेदी च्या काळातच रेल्वेंचे खाजगीकरण होण्याचे चिन्ह दिसू लागले होते (म्हणजे फक्त केटरिंग वगैरे सुविधांचे नव्हे तर ऑपरेशनली सुद्धा). आधुनिकीकरणासकट खाजगीकरण ही वाढेल का?

3. River Linking
the grandiose BJP plan of inter-linking all of India’s rivers, a complex idea endorsed by the Supreme Court but widely believed to be potentially dangerous for Indian ecology.

4. Tax reform
The manifesto promises to provide a “non-adversarial and conducive tax environment and rationalised and simplified the tax regime,” which some have even gone so far as to expect will mean an end to the income tax and the implementation of a bank transaction tax. More conventionally, forward movement will be expected on the Goods and Services Tax as well as the Direct Tax Code.
(माझ्या मते सर्वात रोचक मुद्दा, जाणकारांकडून याच्या शक्यताबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल):

5. Spreading Institutes
Everywhere Modi went during the campaign – and he went almost everywhere – he promised to bring an Indian Institute of Technology or an Indian Institute of Management along with him. So, the party eventually put the promise on paper: a Modi sarkar would bring either of the flagship IITs, IIMs or a branch of the All India Institute for Medical Sciences to every state in the country. That would mean setting up 13 new IITs, 15 IIMs and 21 AIIMS across the country.
इथे देखील मिनिमम गवर्न्मेंट अंतर्गत राज्याचे पैसे वापरले जाईल का खाजगी शैक्षणिक संस्थांना वाव मिळेल हा मुद्दा महत्त्वाचा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

शिवाय पेट्रोल २० की २५ रुपयांत मिळणे कसे शक्य आहे (आणि सोनियाच्या अमेरिकेतील उपचारांमुळे ते ८० रु लीटर मिळते असे सांगणारी) ढकलपत्रे येत असत त्याप्रमाणे पेट्रोल स्वस्त मिळू लागेल बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सोनियाच्या अमेरिकेतील उपचारांमुळे ते ८० रु लीटर
आवरा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

खरोखर एका ठराविक किमतीबद्दल आश्वासन दिले होते का? गॅस च्या किमतीबद्दल ही काहीतरी वाचले होते.

लेखात उल्लेख नाही, पण कॉमन सिविल कोड पेक्षा लेबर कायद्यामधे सर्वात आधी बदल होईल असे वाटते.
साध्या संसदीय बहुमताने कुठले बदल शक्य आहेत, आणि कुठल्या बदलांसाठी २/३ बहुमत वा घटनेत बदल लागतील हे देखील पहायला हवे. टॅक्स आणि लेबर पॉलिसी दोन्हींसाठी घटनेत केंद्र-राज्य सरकारांच्या अधिकार-नात्यात बदल करावे लागतील का? साधे बहुमत सध्या आहे. २/३ बहुमतासाठी आम्मांखेरीज कोणावर अवलंबून राहता येईल? दीदी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राज्यसभेत बहूमत नसल्याने बर्‍याचशा वचनांना आमलात येण्यास विलंब होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओव्हरऑल आशावादामुळे हे आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पुढच्या पाच वर्षात काय होईल?

कदाचित ... राहूल गांधींचे लग्न होईल ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याचं पोरगं/गी कस्लं निघेल हा सर्वात मोठा, दूरदृष्टीचा प्रश्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

खोडसाळ? हारल्या हारल्या संध्याकाळी "प्रियंका लावो देश (म्हणजे कॉग्रेस) बचावो" चे नारे अकबर रोडवर चालले होते.

काँग्रेसचे गणित : (मोतीलाल, जवाहर, इंदिरा, फिरोज, अरुण, कमला, राजीव, संजय, इ इ चे आत्मे) + (सोनिया, राहुल, प्रियंका, प्रियंकाचा नवरा, राहुलची जी एफ, प्रियंकाची मुले) + (राहुलची संभाव्य मुले, प्रियंकाची संभाव्य मुले, त्यांच्या बायका, नवरे, इ इ) + (त्यांच्या पुढच्या संभवित पिढ्या) - (बाकीचे सगळे काँग्रेसनेते, त्यांची सारी खानदाने) - कार्यकर्ते - अन्य देशजनता = (मोतीलाल, जवाहर, इंदिरा, फिरोज, अरुण, कमला, राजीव, संजय, इ इ चे आत्मे) + (सोनिया, राहुल, प्रियंका, प्रियंकाचा नवरा, राहुलची जी एफ, प्रियंकाची मुले) + (राहुलची संभाव्य मुले, प्रियंकाची संभाव्य मुले, त्यांच्या बायका, नवरे, इ इ) + (त्यांच्या पुढच्या संभवित पिढ्या)

हामच्या फोर्म्यूल्या १९४७ पसून एक सेकंदाचा* बी अपवाद असल तर सांगा.

*सीताराम केसरी रस्त्यावर फेकले जायचे दोन क्षण ग्रे एरिया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्याला मंजूलची नजर हवी Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खाष्ट सासू आणि बुळा नवरा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पण आता त्याला पोरगी कोण देणार?

बुडणार्‍या जहाजावर स्वतःची पोरगी पाठवणार होण? (म्हणजे तो लग्नाला पोरगी शोधतो आहे असे गॄहित धरून!)

अर्थात फक्त टि.व्ही वर यायला मिळेल म्हणून राहुल महाजन शी स्वयंवर करायला पोरी तयार होतात तर ह्या राहुलने काय घोडे मारलेय असा योग्य प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राखी सावंत हे नाव येतय डोळ्यासमोर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

देशाच्या प्रत्येक पदाचा सन्मान करावा. ते संभाव्य विरोधी पक्ष नेते आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजून नक्की नाही. काँग्रेसला एकुण जागांच्या १०% मतेही न मिळाल्याने स्वतःच्या जोरावर विरोधीपक्षनेतेपद मिळणे कठीण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अजून नक्की नाही. काँग्रेसला एकुण जागांच्या १०% मतेही न मिळाल्याने स्वतःच्या जोरावर विरोधीपक्षनेतेपद मिळणे कठीण आहे.

स्वतःच्या जोरावर म्हणजे? म्हणजे पंतप्रधान बनायला लागतो तसा पाठिंबा विरोधी पक्षनेतेपदासाठी पण लागतो का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नव्हे
"विरोधीपक्ष नेता" हे घटनात्मक पद आहे. याचा दर्जा पंतप्रधानाइतकाच समजला जातो व त्यास वेगळे अधिकार, भत्ते, सुचिधा, सवलती असतात. मात्र त्या पदावर जाण्यासाठी किमान एका पक्षाला/गटाला एकुण लोकसभेच्या सदस्यांच्या १०% सदस्य निवडून आणणे गरजेचे असते. तसे करणारा कोणताही पक्ष/गट नसल्यास, विरोधीपक्ष नेता हे पद रिकामे असते. व त्या सोयी/सुविधा/सवलती कोणालाही मिळत नाहीत.

अशावेळी प्रश्न येतो की विविध समित्या/पदे यांच्या नेमणुका करताना विरोधीपक्षनेत्याचे मत महत्त्वाचे व गरजेचे असते. जसे लोकपाल निवड समितीत विरोधी पक्ष नेता आहे. अशावेळी सर्वाधिक खासदार असणार्‍या गटाचा नेता विरोधी पक्ष नेत्याची भुमिका बजावतो. (मात्र त्यास इतर सोयी सुविधा मिळत नाहितच).

माझ्या आठवणीप्रमाणे, आपल्या इतिहासात पहिल्या तीन लोकसभांमध्ये एक असा विरोधी पक्षनेता नव्हता.

===

१६व्या लोकसभेत ३ पर्याय शक्य दिसताहेत:

१. विविध विरोधी गटनेते असणे. व समित्यांपुरते विरोधी पक्षनेत्याची भुमिका काँग्रेसचा लोकसभेतील नेता निभावेल.
२. काँग्रेसने इतर पक्ष/अपक्ष वगैरेंचा पाठिंबा घेत आपला नवा "गट" प्रस्थापित करणे जेणेकरून त्या गटातील खासदारांची संख्या ५४च्या वर जाईल. मग त्या गटाच्या नेत्याला विरोधी पक्षनेतेपद मिळेल
३. ममता व जयललिता किंवा ममता व बिजु पटनायक यांचे पक्ष किंवा इतर कोणतेही २/३ पक्ष मिळूने एकच गट स्थापन करणे, जेणेकरून त्या गटातील खासदारांची संख्या ५४च्या वर जाईल. मग त्या गटाच्या नेत्याला विरोधी पक्षनेतेपद मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

राखीचे स्थळ सुचवून राहुलजींचा अपमान केला जातो आहे असे म्हणत असाल तर :-
विरोधीपक्षनेतेपद वगैरे ठेवा दूर; कुठल्याही स्थळाबद्दल असं बोलणं हेच मुळी अपमानास्पद आहे.
आधी राखीसकट प्रत्येक नागरिकाचा आदर करायला शिका.

तिच्याबद्दल इतका हीन भाव ठेवावा असं तिनं नक्की काय केलय?
एक व्यवसाय म्हणून अनेक अभिनेत्री,मॉडेल्स काम करतात तय धर्तीवरचं कायदेशीर काम ती करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मनोबा फॅन क्लब रजिष्ट्रेषण ओपन्स नाउ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझं नाव नोंदवा ओ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

डन. रजिष्ट्रेशन फी = मनोबाला एक लेख लिहायला लावणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रश्न कायदेशीर अथवा बेकायदेशीर चा नाहीयेच!

"घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्वा गर्दभध्वनिम् । येन केन प्रकारेण प्रसिद्धपुरुषो भवेत् ॥" हे ऐकले असेलच. राखी सावंत त्या प्रकारातली आहे. आणि फक्त पडद्यावर असेच नाही तर एरवी सुद्धा ती तशीच वागत बोलत असते. त्यामुळे तिने स्वत:बद्दल एक "हीन व उथळ" असे मत बनवून घेतले आहे.

अशी व्यक्ती, जिला कोणी शहाणा माणूस जोडीदार म्हणून निवडणार नाही शक्यतो!

धिस इज अपार्ट फ्रॊम हर प्रोफ़ेशन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

राखी चे स्वयंवर झालेले आहे.

पूनम पांडे का नको ? उत्तर भारतीय सुद्धा आहे. युपी तली आहे ना ?

आम्हाला उत्तर भारतीयांवर अन्याय झालेला मुळीच खपायचा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या निवडणुकीच्या वेळी काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात बीजेपी ला मते मिळाली ती फक्त धर्माच्या आधारावर मिळालेली नाही आहेत. गुजरात मोडेल वैगेरे ठीक आहे पण गुजरात ची लोकसंख्या काय ६ करोड. मोडीना फक्त गुजरात मधून नाही तर संपूर्ण देशामधून बहुमत मिळालेलं आहे. या आख्या प्रचारामध्ये एकदाही भाजपने राम मंदिर चा मुद्दा काढला नाही आहे. अडवाणी ला बाजूला ठेवलं. एकूणच फक्त विकास आणि भ्रष्टाचार या मुद्द्यावर हि निवडणूक लढवली गेली. जे काही जुने कर्मठ लोक हिंदुत्वाच्या आधारावर भाजप ला वोट करत होते त्यांच्या तुलनेत जे तरुण पब्लिक आहे त्यानेसुद्धा आपली मते भाजपला दिली.
या उलट कोन्ग्रेसच्या गेल्या दहा वर्षच्या व त्या आधी पन्नास वर्षाच्या काळात देशात जी न भूतो न भविष्याती शिक्षण , संशोधन , बेसिक विकास म्हणजे रस्ते , वीज , पाणी , निवारा या गोष्टीमध्ये वाट लागली होती ती भरून काढणे हे भाजप समोरचे मोठे आव्हान असेल. नाहीतरी दोन हजार एकोणीस मध्ये वोट करणारे तरुण पब्लिक अनिवेज धर्म आणि मंदिर असल्या फालतू गोष्टीवर वोटिंग नाही करणार. सगळ्यांना चांगली बुर्ज्वा लाईफ पाहिजे आहे.

१. भारताचा विकासदर (जीडीपी ग्रोथ रेट) काय असेल? विकासाची कुठची कामं सरकारतर्फे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली जातील?
आठच्या दरम्यान विकासदर ठेवला तरी खूप काही मिळवलं अस आहे. महागाई नियंत्रणात आणणे हे सरकारच मोठ आव्हान असेल. पेट्रोल ची भरमसाठ दरवाढ आटोक्यात आणायचं प्रयत्न करेल. सर्व गोष्ठी एकमेकांशी रिलेटेड आहेत. संशोधनाला वाव देऊन नवीन एको फ्रेंडली transport ला एन्करेज करेल. सौरर्जेचा वापर करन्यावर भर देईल. माझा मित्र गुजरात मध्ये सौर उर्जेवर काम करतो आता ते ओरिसा आणि बाकी भारतात सगळीकडे पसरत आहेत. आता जास्ती मोठे प्रोजेक्ट नाही आहेत पण काही दिवसांनी हळू हळू मोठे प्रकल्प हाती घेण्यात येतील. ( कारण आता इटालियन सरकार नाही आहे).
अह्मेदाबाद मध्ये ज्या प्रकारे बीआरटी काम करते आणि तुमच्या पुण्यात ज्या प्रकारे काम करते त्यात काहीतरी फरक पडेल. वाज्पेयीच्या काळात सुर्वण चतुष्कोन केला त्यामुळे व्यापाराला बरीच चालना मिळाली.
२. भारताचं परराष्ट्रधोरण काय असेल? आहे त्यापेक्षा कसं वेगळं असेल?
वेळ आल्यास म्हणजे एक जरी आक्रमण किंवा एक जरी भारतीय जगात कुठेही उडला तरी पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्यावर भर देण्यात येईल. बांगलादेशींना ममता बनर्जीच्या घरी पाठवण्यात येईल. इथे लोकल मध्ये उभा राहायला जागा नाही आणि बांगलादेशींना आश्रय द्या? सर्व ठिकाण सिक्युरिटी एकदम कडक केली जाईल कारण एक जरी ब्लास्ट झाला तरी हे त्या सरकारच्या कामगिरी वर काळा धब्बा असेल. अमेरिकाला सुधा आता नरमाई चे धोरण स्वीकारावे लागेल कारण सगळे मार्केट इंडिया मध्येच आहे. लोकांच्यामध्ये राष्ट्रवाद जागवण्याचे काम करण्यात येईल जेणेकरून स्वदेशी गोष्टीना एन्करेज करण्यात येईल. ( पुढील मुद्दे फोरेन डायरेक्ट मध्ये लिहितो).
चायना कडून खरा धोका आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे चायनीज गोबी मंचुरियन ने भारतीय संस्कृती बिघडवली आहे. गटाराच्या नाल्याच्या कडेला dragon चे फोटो लावून चायनीज विकणार्यांवर आणि खाणार्यांना दिसताक्षणी पकडून फटके दिले पाहिजेत. परत कोणी चायनीजचे नाव काढाल नाही पाहिजे. men-land china सारखी हॉटेल्स तेवढी सुरु ठेवली पाहिजेत.( एस हिप्पोक्रेट हिप्पोपोटमस)
३. साक्षरता, शिक्षण, यावर सरकार कितपत भर देईल? आरोग्यावर किती खर्च केला जाईल?
साक्षरतेमध्ये काय फरक पडेल अस वाटत नाही. पण उच्च शिक्षणाचा दर्जा वाढेल. कोन्ग्रेस च्या कालावधीत इतक मोठ्या प्रमाणात करप्शन उच्च शिक्षणावर झाल आहे कि त्याला तोडच नाही. मेडिक्लेम योजना वैगेरे सुरु करतील. भाजप कडे चिदंबरम आणि निलकेणी सारखे dude मेम्बर हुशार केम्ब्रिज रिटर्न लोक नाही आहेत पण जेवढे आहेत तेवढे प्रामाणिकपणे काम करतात. त्यांना प्रामाणिकपणे काम करायलाच लागणार कारण त्यांचे पूर्वज गांधी नाहीत.
४. भारतात फॉरिन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढेल का?
नक्कीच हा मुद्दा थोडा वादाचा आहे. फोरेन डायरेक्ट वाढवला तर स्वदेशी ची बोंब होईल. रोजगार निर्माण करणे यासाठी FDI वाढवायला काही हरकत नाही पण उगीच भारतात दुसरी अमेरिका तयार करणे हिताचे नाही. शाखांमध्ये FDI आणतील.
५. हिंदू-मुस्लिम, किंवा एकंदरीत सामाजिक भेद वाढतील, कमी होतील की जैसे थे राहतील?
भेद कमी होईल अशी आशा आहे. विशफुल थिंकिंग. मुस्लीम लोकांना मेन प्रवाहात आणणे शक्य आहे हे कोन्ग्रेसी साले स्वताच्या वोट साठी त्यांना बाजूला ठेवतात. जर दंगली झाल्याच तर कोन्ग्रेस वालेच दंगली करणार मुद्दाम. त्यामुळे पहिल्यापासूनच शांतात ठेवण्यचा प्रयत्न सरकार करेल. जो काही लढा असेल तो बाहेरच्या शक्तींबरोबर असेल.
६. विरोधी पक्ष नक्की काय भूमिका घेतील?
कोण विरोधी पक्ष ? एकही चेहरा आठवत नाही. या ममता बनर्जीला आणि कामुनिस्त लोकांना भारताच्या बाहेर हाकलण्याच काम होईल. अलरेडी कमाल खान मुंबई मधून गेल्यामुळे तेवढीच घाण कमी झाली आहे. कामुनिस्त लोकांच पूर्णपणे पानिपत करण्यात येईल. "झोला-दाढी-बिडी-काडी अभिव्यक्तीस्वातंत्र एसी केबिनवाले सुडो सोशालीस्त" लोकांना पण हाकलून देण्यात येईल. शोभा डे चे लेखांवर बंदी आणण्यात येईल. टाईम्स ऑफ इंडिया पेपरवरतीच बंदी घालावी अस वाटत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

चायना कडून खरा धोका आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे चायनीज गोबी मंचुरियन ने भारतीय संस्कृती बिघडवली आहे. गटाराच्या नाल्याच्या कडेला dragon चे फोटो लावून चायनीज विकणार्यांवर आणि खाणार्यांना दिसताक्षणी पकडून फटके दिले पाहिजेत. परत कोणी चायनीजचे नाव काढाल नाही पाहिजे. men-land china सारखी हॉटेल्स तेवढी सुरु ठेवली पाहिजेत

त्रिवार निषेध.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या रिअल इस्टेटच्या भावांना आवरा म्हणावं आधी! च्यायला, पुढे मागे भारतात यायचं म्हणलं तर परवडेल तरी आम्हा गरीबांना (सालसांना.. वगैरे)!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

य्क्स तुम्ही अस्वलासारखे अस्वल असून चायनीज खाता....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

पांडा नावाचे अस्वल केवळ चायनीझ बांबू खाते, म्हणे.

पांडा नावाचे आमच्या ओळखीचे कुटुंब मात्र केवळ ओडिशा-पद्धतीचे भारतीय जेवण जेवत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते 'पांडे' असतील कदाचित!
(पांडाचं आदरार्थी बहुवचन पांडे होत असावं असा आपला अंदाज. प्लीज बेअर विथ इट.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने