ही बातमी समजली का? - ५२
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा/जाईल.
===========
There is no war in which the enemy does not hit back ____ मणिशंकर अय्यर
The Congress veteran said, "It is a horrible thing that has happened, I am outraged. However, there is no war in which the enemy does not hit back and what we are seeing is that terror groups are hitting back in the war against terror that was unleashed after the 9/11 attacks."
पाकिस्तानचा एनिमी भारत. भारतावर जे काही दहशतवादी हल्ले झाले त्यानंतर भारताने "हिट बॅक" नेमके कधी केले ???
.
.
.
The statement shown on
अगदी जस्टिफाय नाही केलेलं त्यांनी पण त्या टेररिस्ट लोकांच्या अन त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीकोनातून बघायची काय गरज आहे? नको ते हायलाईट करायचं उगाचच. म्हणे "दहशतवादाविरुद्ध युद्ध" पुकारलय त्याचा हा बॅकलॅश (सूड) आहे. ते त्या दहशतवाद्यांना बोंबलू द्या ना. तुम्ही कशाला बोलताय?
आपण दुसरा गाल पुढे केला नाही हे नशीब.
--
हा माझा या विषयावरचा शेवटचा प्रतिसाद असेल = याउप्पर वाद घालायचा दम नाही आपल्यात
बिल माहर पेटलाय एकदम....
बिल माहर पेटलाय एकदम....
.
.
.
"Their religious whackos are
"Their religious whackos are lot more whackos than our religious whackos" हे त्याचं म्हणणं मला पटतं.
"Majority of the Muslims are law-abiding, loving people who want to be left alone to subjugate their women in peace."
अयायायाया.. ‘Love jihad':
अयायायाया..
http://www.financialexpress.com/article/miscellaneous/vhp-morphs-kareena...
http://www.firstpost.com/bollywood/kareena-kapoor-on-mag-cover-durga-vah...
तरुण मंडळी विहिंप च्या कोणत्या नेत्याला फॉलो करतात ?
Defending the use of Kareena’s morphed picture and her case to highlight the issue, she said, “Kareena is an icon and role model. Youth try to emulate and follow her.”
तरुण मंडळी दिग्गज खेळाडूंना फॉलो करतात, करीना ला फॉलो करतात. कोणीही प्रचार खरंतर करीत नसूनही फॉलो करतात.
तरुण मंडळी विहिंप च्या कोणत्या नेत्याला फॉलो करतात ? व नसल्यास का करीत नाहीत ??
(आत कृपा करून गब्बर, मुद्द्याची सरमिसळ करतोय किंवा अॅपल्स टू ऑरेंजेस तुलना करतोय - असा प्रतिवाद करू नका.)
विश्व हिंदू परिषद हे एक
विश्व हिंदू परिषद हे एक मूलतत्त्ववादी आणि किमान वैचारिक प्रतलावर तरी अतिरेकी संघटन आहे. करीना कपूरने प्रेमविवाह केला आहे, ती शिकली सवरलेली आहे तेव्हा तिच्यासोबत लव जिहाद झाला म्हणणे शुद्ध मूर्खपणा, हलकटपणा आणि काही अंशी भांडकुदळेपणा आहे.
बाकी सलमान लग्न करत नाही. शाहरुख आपल्या बायकोचे हिंदुत्व राखून असावा. पण हे आमिर आणि सैफ नैतिक टिकेच्या पात्र आहेत. म्हणजे जर एक लग्न करणे हे इष्ट असले तर केवळ कायदा नुकसान करू शकत नाही म्हणून धर्माचा मागासलेला आधार घेत दुसरे लग्न करणे याला काय अर्थ आहे? आणि भिन्नधर्मीयांचे लग्न झाले तर धर्मांतर करायची काय गरज आहे? त्याशिवाय लेकरे होत नाहीत का? एकतर हे लोक तात्विक वा धार्मिक कोणत्याही अर्थाने धर्म पाळत नाही पण तोंडदाखले धर्मांतर करतात. धर्मेंद्र तर भयंकर चालू माणूस. म्हणे मी बर्याच बायका "सांभाळू" शकतो, मग सांभाळेन. आणि इस्लामबद्दल कवडीचेही सुतक नसताना त्याने फक्त हेमामालिनीसोबत दुसरे लग्न करायला धर्मांतरच केले.
धार्मिक अवहेतूने प्रेरित होऊन हिंदू तरुणींना फूस लावायचा प्रयत्न काही मुस्लिम युवक वा संघटने करत असू शकतात. पण त्याचा स्केल इतका नाही कि तो नॅशनल इश्श्यू बनावा. पण कोणाला तोच मोठा इश्श्यू वाटत असेल तर त्याकडे मिडियाने दुर्लक्ष केले पाहिजे.
बाकी मी पुरुषप्रधान संस्कृतीवादी असल्याने मला "सैफने हिंदुत्व का नाही स्वीकारले, करीना का मुसलमान झाली?" हा प्रश्न विनोदी वाटला. स्त्री पुरुषाच्या घरी जाते तेव्हा लॉजिकली, कॉमन धर्म असायचाच झाला तर, तो पुरुषाकडचा असावा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मार्मिक श्रेणी दिली आहे. आमिर
मार्मिक श्रेणी दिली आहे.
आमिर खान, अझरुद्दिन, सैफ अली खान यांनी आपापल्या पहिल्या पत्नींना घटस्फोट दिलेला आहे असे वाटते.
सलमानचे वडील सलीम यांनीही आपल्या पत्नीचा हिंदू धर्म कायम ठेवला आहे. आणि तिच्या धर्मानुसार घरात गणपती वगैरे आणला + पूजला जातो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सत्यमेव जयतेसारख्या
सत्यमेव जयतेसारख्या मालिकेच्या (म्हणजे तिथे लोकांना सुधरा म्हणून सांगायला लागणारा माणूस स्वतः किती सुधरलेला आहे हे पाहायला गेले तर) होस्टपदी असलेल्या माणसाचे व्यक्तिगत जास्त "नॉर्मल" असायला पाहिजे होते.
http://ia.rediff.com/movies/2002/dec/10split.htm
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ग्रेट
उत्तम प्रतिसाद
विहिंप किमान वैचारिक नाही तर अगदी आचारिक पातळीवरही अतिरेकीच आहे. त्रिशूळ, जांबिया वगैरे वाटण्याचे कार्यक्रम नित्यनेमाने होत असतात.
विहिंप किमान वैचारिक नाही तर
कार्यक्रम काँग्रसचेही होतात. मी स्वतः पाहिले आहेत. पण पक्षनेतृत्वाला ते अभिप्रेत नसतं असं मी मानतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कोण? मणिशंकर अय्यर का? बरं
कोण? मणिशंकर अय्यर का? बरं बरं...
बोको हरामने दोन हजार किंवा
बोको हरामने दोन हजार किंवा जास्त लोक नायजेरियात मारले. कुठवर चालणार हे असं. वाईट स्थिती आहे. काय आहे याचं लॉजिकल आउटकम. की असंच चालणार ?
विमानकंपन्या
खरंतर हा प्रश्न आहे.
एक महिनाभरापूर्वीची बातमी आज वाचली (http://www.reddit.com/r/IAmA/comments/2o831k/i_run_skiplagged_a_site_bei...). बातमीचा सारांश असा की उदा. न्यूयॉर्क ते पॅरिस हे विमानतिकीट न्यूयॉर्क ते (पॅरिसमार्गे) दुबई या तिकीटापेक्षा दुपटीने महाग आहे. काही चाणाक्ष प्रवासी पॅरिसला जायचे असूनही दुबईचे तिकीट काढतात व पॅरिसचा थांबा आला की सटकतात.
विशेषतः एअरलाईन हब असणाऱ्या शहरांसाठी (अटलांटा, सॅनफ्रॅन्सिस्को वगैरे) तिकीटे महाग असल्याने एखाद्या लहान शहराचे तिकीट काढून हब शहरातच सटकण्याचा हा प्रकार अत्यंत कमी प्रमाणावर चालू होता. मात्र आता एका संकेतस्थळाने अशी विमाने शोधण्याचा प्रकार सर्वसामान्य प्रवाशांसाठी अत्यंत सोपा करुन दिला आहे.
यावरून एका विमानकंपनीने या संकेतस्थळावर खटला भरला आहे व प्रवाशाने विकत घेतलेला संपूर्ण प्रवास न करण्याचा प्रकार 'अनैतिक' असल्याचा दावा केला आहे.
विमानकंपन्यांच्या मते हा प्रकार स्वस्त किमतीचे स्टिकर महाग वस्तूला चिकटवण्यासारखा आहे. तर काही प्रवासी या प्रकाराला आख्खा वडापाव विकत घेऊन अर्धाच खाणे असे म्हणत आहेत.
मुळात शहर अ ते ब हे तिकीट शहर अ-ब-क या तिकीटापेक्षा महाग का असावे? आणि शेवटचा ब-क टप्पा प्रवाशाने वापरला नाही तर विमानकंपन्यांचे नक्की काय नुकसान होते?
विमान कंपन्यांचे नुकसानः
विमान कंपन्यांचे नुकसानः पॅरिसला कोण कोण सटकणार आहे ते न कळल्याने ती सीटं भरता येत नाहीत. शिवाय पॅरिसला जाणार्यांची संख्या अधिक असल्याने अशा सटकू लोकांचे प्रमाण फार वाढल्यास ज्यांना खरेच दुबईला जायचे आहे अशांना तिकीटं मिळणे अवघड होईल आणि कदाचित १-२ लोकांसाठी पॅरिस दुबई प्रवास करावा लागेल.
सटकू प्रवाशांचे वागणे अनैतिक आहे. अशाने दुबईला जाणार्यांचाही प्रवास महाग होईल. (अर्धाच वडापाव खाऊ शकतो हे माहित असूनही पूर्ण घेऊन अर्धा टाकणे हेही अनैतिकच आहे).
अ ते ब प्रवासाला अ-ब-क प्रवासापेक्षा जास्त डिमांड असल्यामुळे.
अ ते ब हे तिकीट शहर अ-ब-क या
अ ते ब हे तिकीट शहर अ-ब-क या तिकीटापेक्षा महाग का असावे?
अ ते ब प्रवासाला अ-ब-क प्रवासापेक्षा जास्त डिमांड असल्यामुळे.
मग त्या संधीसाधूपणाची शिक्षा त्यांना मिळते असे म्हणायला हवे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
होय शिक्षा मिळते असे म्हणता
होय शिक्षा मिळते असे म्हणता येईल आणि त्याचबरोबर प्रवासी अ पासून क पर्यंत जाऊ असं खोटं बोलतात असं म्हणावं लागेल.
जास्त डिमांड असलेल्या ठिकाणी सेवा महाग करुन नफा कमावणे आणि खोटे बोलून नफा कमावणे यात सध्याच्या नीतिकल्पनांप्रमाणे जास्त वाईट काय आहे?
समजा
एखाद्याने मुंबई ते गोवा ते दिल्ली असे प्रवासाचे तिकीट विकत घेतले.
१. मुंबई-गोवा-दिल्ली हा प्रवास केलाच नाही तर ती फसवणूक आहे का?
२. फक्त मुंबई ते गोवा असा प्रवास केला तर ती फसवणूक आहे का?
१. नाही. २. मुंबई-गोवा तिकीट
१. नाही.
२. मुंबई-गोवा तिकीट महाग आहे हे माहित असल्याने जाणूनबुजून केल्यास होय, अन्यथा नाही.
हम्म रोचक
एखादा (विमानकंपनी) अनैतिक वागत असेल तर त्याच्याशी दुसऱ्याने (प्रवासी) अनैतिक वागावे काय?
जास्त मागणीला जास्त किंमत हे
जास्त मागणीला जास्त किंमत हे तत्व म्हणून आपण सगळ्यांनीच मान्य केलेले असताना ते तत्व पाळून धंदा करणार्या कंपनीला अनैतिक म्हणणे दुटप्पीपणा आहे.
हम्म
मी निव्वळ वादासाठी वाद घालत नाहीये. नक्की दुसरी बाजू काय आहे ते समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय. एखादी गोष्ट विकत घेतली तर तिचा संपूर्ण वापर केलाच पाहिजे असे बंधन ग्राहकावर कसे काय घालता येईल? पूर्ण प्रवासाची जाहीर केलेली किंमत भरली आहे. मग पूर्ण प्रवास केलाच पाहिजे असे बंधन ग्राहकावर असते काय? काही कारणास्तव शेवटचा टप्पा हुकला. (टर्मिनलवर झोप लागली वगैरे) तर विमानकंपनी भरपाई देत नाही. मग ग्राहकाने 'काही कारणास्तव'* शेवटच्या टप्प्याचा प्रवास टाळला तर ते अनैतिक कसे काय?
* पैसे वाचतात म्हणून.
बंधन नाहीच आहे. कदाचित
बंधन नाहीच आहे. कदाचित एअरलाईन केस हारेल. चर्चा फक्त नैतिक अनैतिकची आहे.
उद्या एखादा माणूस अन्न विकत घेऊन टाकून द्यायला लागला (जगात हे होतंच आहे) तरी त्याला कोण अडवू शकणार आहे?
कदाचित एअरलाईन केस
एअरलाईन केस हारण्यातच ग्राहकांना इंटरेस्ट आहे. एअरलाईनने आणि ग्राहकांनी स्वतःचा फायदा बघावा, यात गैर काही नाही.
पैसे वाचतात म्हणून हे व्हॅलिड
पैसे वाचतात म्हणून हे व्हॅलिड कारण नाहीय.
समजा न्युयॉर्कहून दुबईला जाणारा एकच प्रवासी आहे, त्याला पॅरिसमध्ये विमानकंपनीने पैसे वाचतात म्हणून तिकीटाचे अर्धे (किंवा प्रोराटा) पैसे परत केले आणि तुमचं तुम्ही बघा असं सांगितलं तर चालेल का?
नाही चालणार
ग्राहक आणि कंपन्या सुरुवातीपासूनच अनइक्वल ग्राऊंडवर असतात. त्यामुळेच ग्राहकांच्या हिताच्या संरक्षणासाठी विशेष कायदे करावे लागतात. एखादी सेवा विकत घेतल्यानंतर ती संपूर्णपणे वापरण्याचे बंधन ग्राहकावर असते का? असे बंधन असेल तर ते एनफोर्स करणे खरेच अवघड आहे.
तुमच्या उदाहरणाबाबतः न्यूयॉर्कवरुन दुबईला जाणारा एकच प्रवासी असेल तर त्याला नेण्याची संपूर्ण किंमत कंपनीला तिकिटाच्या स्वरुपात मिळाली आहे. ते परवडत नसेल तर कंपनी असे तिकीट विकणारच नाही. त्यामुळे त्या कंपनीला त्या प्रवाशाची वाहतूक करावीच लागते (किंबहुना अशी परिस्थिती खरेच येते तेव्हा एअरलाईन कंपन्या ग्राहकाच्या सोयीचा विचार न करता फायद्याच्या दृष्टीने त्याला इतर कंपन्यांचा विमानात 'सामावून' घेतात. मग भले संपूर्ण प्रवासाचा वेळ अगदी दुप्पट झाला तरी चालेल.) शिवाय जर अमुकतमुक प्रवाशांसाठी तिकिटे विकली जातात तेव्हा एखादे विमान 'ओवरबुक' कसे होते बॉ?
ग्राहक आणि कंपन्या
हे मान्य आहे आणि त्यासाठी कायदेशीर लढाई करावी. सगळ्यांनीच फसवाफसवी केली तर ज्यांना फसवाफसवीची संधी नाही अशा ग्राहकांची पंचाईत होईल.
एखादा (विमानकंपनी) अनैतिक
एखादा (विमानकंपनी) अनैतिक वागत असेल तर त्याच्याशी दुसऱ्याने (प्रवासी) अनैतिक वागावे काय?
हो. अवश्य.
प्रतिसाद म्हणून अनैतिक वर्तणूकीचा विकल्प जरूर राखून ठेवावा.
१. नाही. ? जाणूनबुजून प्रवास
? जाणूनबुजून प्रवास केलाच नाही तरीही? असा विचार मला कंपन्यांच्या बाजूने बायस्ड वाटतो.
विमानांचे सोडा...
...भारतीय रेल्वेमध्येसुद्धा लांब पल्ल्याच्या गाड्यांत अनेकदा किमान प्रवासाचे बंधन असू शकते. (भारतीय रेल्वेची भाडेपद्धती बहुधा अद्यापही अंतराबरहुकुम चालत असावी, हा भाग अलाहिदा.)
उदा., मुंबई ते चेन्नै जाणार्या काही गाड्यांनी तुम्ही मुंबईहून किमान दौंडापर्यंतचे तिकीट असल्याखेरीज (अगदी विनाआरक्षणसुद्धा) प्रवास करू शकत नाही, असे बंधन निदान काही काळापूर्वीपर्यंत तरी होते. (बहुधा अद्यापही असावे. दौंडाअगोदरच्या गंतव्यस्थानाचे तिकीट सादर केल्यास त्याकरिता दंड होऊ शकत असे.) त्याउपर, दौंडाचे तिकीट काढूनसुद्धा तुम्ही कल्याणास किंवा पुण्यास उतरल्याससुद्धा तुम्हांस दंड लागू करण्याचा अधिकार संबंधित अधिकार्यांस बहुधा असावा, परंतु त्याची तपासणी आणि/किंवा अंमलबजावणी कितपत काटेकोरपणे होत असावी, याबद्दल साशंक आहे.
परंतु ते सोडा. समजा एखाद्याने न्यूयॉर्कवरून (प्यारिसपर्यंतच जायचे असूनसुद्धा) प्यारिसमार्गे दुबईचे तिकीट (न्यूयॉर्क ते प्यारिस तिकिटापेक्षा स्वस्त पडते म्हणून) विकत घेतले, आणि तो विमानात चढला.
यातील नैतिकतेचा (नैतिक असण्याचा किंवा नसण्याचा) भाग तूर्तास सोडा. तरीही मला यात अनेक व्यावहारिक अडचणी दिसतात. (व्यक्तिशः, यात 'अनैतिक' असे नेमके काय आहे, हे मला कळत नाही, तरीही.)
- प्रथम, (तो संयुक्त अरब अमिरातींचा नागरिक असल्याखेरीज) त्याला दुबईचा व्हिसा लागणार नाही काय? (तो अमेरिकन किंवा युरोपीय नागरिक असल्यास त्याला प्यारिसकरिता शेनजेन व्हिसा लागणार नाही बहुधा, पण त्यातही पुन्हा अमेरिकन नागरिक असल्यास अल्पकाळानंतरचे परतीचे तिकीट जवळ असल्यासच लागणार नाही, पण ते सोडा. अमिरातींचा व्हिसा तर नक्की लागेल.) तो असल्याशिवाय एअरलाइन त्यास बहुधा विमानात चढू देणार नाही. म्हणजे, काहीही कारण नसताना अमिरातींचा व्हिसा काढणे आले.
- समजा, अमिरातींमध्ये व्हिसा-ऑन-अरायव्हलची सोय आहे, असे गृहीत धरू. आणि या कारणास्तव न्यूयॉर्कमध्ये त्यास अमिराती व्हिसा नसूनसुद्धा चढू दिले, असे मानू. तरीही, परतीच्या प्रवासाचे काय? त्याचे परतीचे तिकीट दुबई ते प्यारिसमार्गे न्यूयॉर्क असे असताना त्यास दुबईहून प्यारिसला त्या तिकिटावर प्रवास न करता मध्येच प्यारिसला चेकइन करू दिले जाणार नाही.
- बरे, समजा एकमार्गी तिकीट आहे, परतीच्या प्रवासाचा प्रश्न नाही. अशा परिस्थितीत तर दुबईत व्हिसा-ऑन-अरायव्हलची सोय जरी असली, तरीसुद्धा त्यास ती लागू होणार नाही; त्यास अमिरातीचा आगाऊ व्हिसा घ्यावा लागेल. त्याशिवाय दुबईत (तो तेथपर्यंत प्रत्यक्षात जाणार नाहीये, ही गोष्ट अलाहिदा, पण) त्याला प्रवेश नाकारला जाईल, आणि तसे झाल्यास विमानकंपनीसही दंड होऊ शकत असल्याकारणाने विमानकंपनीही त्यास मुळात न्यूयॉर्कला विमानात चढू देणार नाही. (अपवाद: तो अमिरातींचा पासपोर्टधारक किंवा रहिवासी परवानाधारक असला तर.)
म्हणजे थोडक्यात, एखाद्या अमिराती नागरिकास जर न्यूयॉर्कहून प्यारिसला पळून जायचे असेल (आणि त्याजवळ प्यारिसकरिता शेनजेन व्हिसा असेल), तर त्याला असे करण्यात फायदा आहे, इतरांस याचा फारसा उपयोग होणार नाही.
परंतु व्हिशाचेही सोडा. समजा, प्रवास आंतरराष्ट्रीय नाही, देशाअंतर्गतच आहे, असे मानू. तरीही यात अडचणी येऊ शकतात. (आंतरराष्ट्रीय प्रवासाकरिताही या अडचणी अर्थात याव्यातच.)
समजा, न्यूयॉर्क ते अटलांटामार्गे बर्मिंगहम (अलाबामा) हे तिकीट न्यूयॉर्क ते अटलांटा तिकिटापेक्षा स्वस्त आहे, असे धरून चालू. समजा मला न्यूयॉर्कहून अटलांटाला जायचे आहे, परंतु मी (स्वस्त पडते म्हणून) बर्मिंगहमचे तिकीट काढले आणि न्यूयॉर्कला विमानात बसलो, आणि मध्येच अटलांटाला उतरून विमानास रामराम ठोकावयाचे ठरवले. (परतीच्या प्रवासात मध्येच चेकइन करता न येण्याची अडचण येथेही लागू आहेच, सबब माझा प्रवास एकमार्गी आहे, असे तूर्तास मानून चालू.)
तीन शक्यता:
- निघताना समजा माझ्याकडे सामान होते, ते मी न्यूयॉर्कला चेकइन केले. अटलांटाला मी तर विमानातून उतरलो. माझ्या सामानाचे काय? ते तर बर्मिंगहमकरिता चेकइन झालेले आहे, ते मला बर्मिंगहमलाच मिळू शकेल. म्हणजे बोंबला!
- निघताना समजा माझ्याकडे फक्त क्यारीऑनच्या नियमांत बसेल, अशा एका छोट्याश्या ब्यागेव्यतिरिक्त अन्य काहीही सामान नव्हते. ती ब्याग मला चेकइन करावी लागली नाही; सबब, ती घेऊनच मी विमानात चढलो. या परिस्थितीत मला अटलांटाला उतरून चालू लागण्यात काहीही अडचण येणार नाही.
- निघताना समजा माझ्याकडे फक्त क्यारीऑनच्या नियमांत बसेल, अशा एका छोट्याश्या ब्यागेव्यतिरिक्त अन्य काहीही सामान नव्हते. अत्यंत आत्मविश्वासाने आणि 'कसे विमानकंपनीला गंडवले' या आनंदात मी बोर्डिंग पास घेऊन विमानात चढण्याकरिता गेटपाशी गेलो, आणि 'आज विमानात खूप गर्दी आहे; सगळ्या बिन्स भरल्या आहेत' हे शुभवर्तमान समजले. झक मारत आयत्या वेळी ब्याग गेट-चेकइन करावी लागली. झाला की नाही पोपट? (तरी, गेट-चेकइनच्या बाबतीत, अटलांटाहून पुढे बर्मिंगहमला जाताना विमान जर बदलावे लागत असेल, तर मला माझी क्यारीऑन ब्याग अटलांटात परत मिळेल. पण तीच फ्लैट जर पुढे बर्मिंगहमला जाणार असेल तर?)
(अतिअवांतर: साधारणतः वरील तिसर्या परिस्थिती वर्णिल्यासारखा पोपट आमच्या एका भूतपूर्व सहकार्याचा अमेरिकेअंतर्गत विमानप्रवासात एकदा झाला होता. फक्त, त्याच्या बाबतीत भानगड गेट-चेकइनची नव्हती, तर मुळात बोर्डिंग पासाकरिता चेकइन करतानाच विमानकंपनीने काही कारण काढून त्याची ब्याग चेकइन करण्यास त्यास भाग पाडले होते, असे ऐकून आहे. अखेरीस त्याचा पोपट झाला, याव्यतिरिक्त अधिक तपशील ठाऊक नाहीत.)
थोडक्यात, अशा युक्तीचा फायदा अत्यंत मर्यादित परिस्थितीत होऊ शकेल, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
अनाकलनीय
विमानकंपनीच्या तिकीटानुसार एखाद्याने दुबईपर्यंतचे तिकीट काढले, तर तशीही ती सीट दुसऱ्या माणसाकरवी भरणे शक्य नाही. मग पॅरिस ते दुबई (ज्या प्रवासाचे पैसे आधी भरलेच आहेत) तो प्रवास एखाद्याने केला नाही तर फारफार तर पेट्रोलची बचत व्हावी. नुकसान कसे काय होईल?
हे मान्य पण निव्वळ जास्त मागणी आहे या कारणाने अर्धा वडापाव हा पूर्ण वडापावापेक्षा महाग करणे हेच मुळात अनैतिक नाही का?
अर्धा वडापाव हा पूर्ण
अगदी अगदी!!!
विमानकंपनी स्वतः "अनैतिक" (का काय) वागते आहे अन वर कांगावा करते आहे.
चोराच्या उलट्या बोंबा.
म्हणजे विमान कंपनी ने स्वतःचा स्वार्थ बघायचा अन प्रवाशांनी तसाच त्यांचा स्वार्थ पाहीला की उलटी बोंब ठोकायची.
माझे मत प्रवाशांच्या बाजूने आहे. त्यांनी जरुर अ-ब-क तिकीट काढून मध्येच सटकावं.
वरील तीन प्रतिसादांत नक्की काय म्हटले आहे?
वरील तीन प्रतिसादांत नक्की काय म्हटले आहे? मला रिकामेच दिसत आहेत.
आजच मिसळपाववरच्या एका
आजच मिसळपाववरच्या एका धाग्यावर मी एक प्रतिसाद लिहीला होता तो असा: (हे सटकूंना लागू आहे)
जास्त मागणीला जास्त किंमत हे तत्व आपण सगळ्यांनी एकदा मान्य केल्यावर ते तत्व पाळणार्या कंपनीला अनैतिक ठरवून प्रवासी असेच सटकू लागले तर शेवटी सगळ्यांसाठीच प्रवास महाग होणे व इंधनाची नासाडी होणे यापलिकडे काहीही होणार नाही. पण व्यापक हित कोणाला हवंय?
हुश्श दिसला एकदाचा! काहीतरी
हुश्श दिसला एकदाचा! काहीतरी स्पेशल कॅरेक्टरमुळे प्रकाशित केल्यावर टेक्स्ट गायबत होते.
सगळ्यांनी म्हणजे नक्की कुणी?
सगळ्यांनी म्हणजे नक्की कुणी? मला वाटतं 'जास्त मागणीला जास्त किंमत' या तत्त्वापेक्षा 'जमतील तितके पैसे कमवा' हे तत्त्व कंपनी व पोटेंशियल ग्राहक यांनी नक्कीच मान्य केलेले असावे. गंडवणाऱ्या कंपनीचा गंडवणारा ग्राहक म्हणजे एकाच तत्त्वाचे पाईक वाटतात. फक्त ग्राहकांना दोष कसा काय देता येईल?
कंपनी गंडवत नाही. त्यांनी ते
कंपनी गंडवत नाही. त्यांनी ते दर आधीच सांगितलेले असतात. आधी एक दर सांगून नंतर दुसरा घेतला तर गंडवणे झाले.
हम्म
हे मान्य आहे
साधा प्रश्न. कंपनीचा उद्देश
साधा प्रश्न.
कंपनीचा उद्देश फायद्यात अधिक व्यवसाय करणे असा आहे की पेच बनवून कस्टमरच्या नैतिकतेच्या चाचण्या घेणे असा आहे?
तंतोतंत नसलं उदाहरण तरी स्वहस्ते पेच करण्याचं उदा म्हणून असं पहा: घरात दोन पोरं असताना लहानाला लहान आणि मोठ्याला मोठं चोकलेट आणायचं.(वयानुसार क्वांटिटी..!!!)...
मग दोघांची जुंपली की त्याना समजूतदारपणाचे धडे द्यायचे किंवा तशी अपेक्षा करुन भंग झाली म्हणून त्रास करुन घ्यायचा.
ही चाचणी नव्हे, गृहीतक आहे की
ही चाचणी नव्हे, गृहीतक आहे की प्रवासी त्याच्या गंतव्य स्थानाबद्दल खोटं बोलणार नाही आणि कंपनी त्या-त्या स्थानांच्या दरांबाबत खोटं बोलणार नाही.
खरंच?
हे गृहितक योग्य नाही. सगळ्या विमानकंपन्या ओव्हरबुकिंग सर्रास करतात.
मागणीनुसार किंमत वाढते हे
मागणीनुसार किंमत वाढते हे तत्व आपण सगळ्यांनीच मान्य केले आहे आणि ते प्रत्येक धंद्याचे प्रेरक तत्व आहे. गरज नसलेल्या वस्तुंची मागणी निर्माण करुन जिथे पैसे कमवले जातात तिथे असलेल्या गरजेवर पैसे कमवले तर अनैतिक म्हणणे सोयीस्कर नाही. मुळात ते अनैतिक आहे; पण अशाने सगळी सिव्हिलायझेशन अनैतिक आहे हे सिद्ध करता यावे.
हा युक्तीवाद एकदम बिनतोड
हा युक्तीवाद एकदम बिनतोड वाटतो आहे. खोटे बोलणे अनैतिक आहेच.
नुकसान?
>>विमान कंपन्यांचे नुकसानः पॅरिसला कोण कोण सटकणार आहे ते न कळल्याने ती सीटं भरता येत नाहीत.
विमान कंपनीला तिकिटाचे पैसे मिळाले की सीट्स भरल्या आहेत की नाहीत, याचा विचार त्यांनी करायची गरज नाही. गरज पडली तर रिकामे विमान घेऊन जावे (कारण त्या ठिकाणाहून ते नंतर पुढे अजून कुठेतरी जाणार असते).
>> शिवाय पॅरिसला जाणार्यांची संख्या अधिक असल्याने अशा सटकू लोकांचे प्रमाण फार वाढल्यास ज्यांना खरेच दुबईला जायचे आहे अशांना तिकीटं मिळणे अवघड होईल आणि कदाचित १-२ लोकांसाठी पॅरिस दुबई प्रवास करावा लागेल.
बाजारात माल विकला गेला की त्याचे काय होते, ते बघायची गरज नाही.
मी तर म्हणतो की कॉन्सर्ट तिकिटे जशी सेकंडरी मार्केटमध्ये विकली/खरेदी केली जातात, तशी सोय विमान तिकिटांच्या बाबतीत पण झाली पाहिजे. पण सगळा मलिदा विमान कंपन्यांना स्वतःलाच हवा आहे, म्हणून ते सेकंडरी मार्केट होऊ देतील अशी शक्यता कमी वाटते.
अनैतिक आणि बेकायदा या भिन्न गोष्टी आहेत.
अनैतिक आणि बेकायदा या भिन्न गोष्टी आहेत.
अनैतिक हे मान्य आहे, पण ते बेकायदा नाही.
जसे विमानाचे भाडे डिमांड/सप्लायप्रमाणे बदलणे, ओव्हरबुकिंग करणे हे अनैतिक आहे, पण बेकायदा नाही.
..न्यूयॉर्क ते पॅरिस
..न्यूयॉर्क ते पॅरिस प्रवासाची किंमत न्यूयॉर्क पॅरिस दुबई प्रवासापेक्षा जास्त ठेवणं हे अनैतिक नव्हे, मूर्खपणाचं आहे.
डिमांड कमी असेल तर फार फार तर पॅरिस दुबई लेग कॉम्प्लिमेंटरी / फ्री करावा.. ..हे देखील मॅक्झिमम डिस्काउंट सिनारियो म्हणून.
..तसं न करता पुढे प्रवास करण्यासाठी आणखी कमी तिकीट ठेवणं म्हणजे मुळात गुंता करुन ठेवायचा आणि मग त्यात पाय घालायचा.
हे योग्य वाटते
अनैतिकपणाचा मुद्दा एअरलाईन कंपनीनेच काढला आहे.
..न्यूयॉर्क ते पॅरिस
..न्यूयॉर्क ते पॅरिस प्रवासाची किंमत न्यूयॉर्क पॅरिस दुबई प्रवासापेक्षा जास्त ठेवणं हे अनैतिक नव्हे, मूर्खपणाचं आहे.
मूर्खपणाचे ही नाही. व अनैतिक ही नाही.
तसंही चालेल.. पण मग तेजायला
तसंही चालेल.. पण मग तेजायला प्रवाश्यानी पॅरिसला कल्टी मारली तर त्रागा कशाला?
अगदी. विक्रेता/उत्पादक व
अगदी.
विक्रेता/उत्पादक व ग्राहक यांची राजीखुशी हे महत्वाचे (एकमेव) नैतिक मूल्य आहे. अनेक (सर्व नव्हे) परिस्थितीत ते लागू पडते.
तुझं मत ऐकायचं होतं या
तुझं मत ऐकायचं होतं या बाबतीत. च्यायला ननिंंचही पटतय , तुझं ही पटतय.
हमारे जैसन बिनपेंदे के लोटोंका यही हाल हुआ है
यात कन्फ्युजन काहीच नाही.
यात कन्फ्युजन काहीच नाही. गब्बरसिंग यांचे मत एक ग्राहक व कंपनी या रिलेशनवर आधारित आहे. कारण मला वाटतं त्यांच्या मते देअर इज नो सोसायटी ओन्ली इंडिव्हिज्युअल्स.
अपुलीगपुली च्या मते ननि यांचे
अपुलीगपुली च्या मते ननि यांचे मत काय आहे ?
अरे ननि म्हणाले ना की "नफा"
अरे ननि म्हणाले ना की "नफा" या प्रायमरी तत्त्वावरती कंपनी रन होते. OMG! Let me find that प्रतिसाद. तेव्हा ते पटलं की होय.
पण तू म्हणालास की ग्राहकाचे हित हेच तत्त्व हवं तर नंतर तेही पटलं
http://aisiakshare.com/node/3643#comment-84976 - Phew!!! हां हा तो प्रतिसाद.
गरज नसलेल्या वस्तुंची मागणी
गरज नसलेल्या वस्तुंची मागणी निर्माण करुन जिथे पैसे कमवले जातात तिथे असलेल्या गरजेवर पैसे कमवले तर अनैतिक म्हणणे सोयीस्कर नाही.
१) गरज नसलेल्या वस्तूंची मागणी निर्माण करणे ही एक बाब आहे.
२) त्यातून पैसे कमावले जाणे ही दुसरी बाब आहे.
प्रश्न - जर कस्टमर वर बळजबरी/धमकीबाजी होत नसेल तर कस्टमरला गरज नसलेल्या वस्तूंची मागणी निर्माण करून तिच्यातून पैसे मिळवणे कसे शक्य आहे ? ज्या वस्तूंची कस्टमर ला गरज नाही त्यासाठी कस्टमर पैसे का मोजेल ?
मला रोख कळत नाहीये रे प्लीज
मला रोख कळत नाहीये रे प्लीज रिफ्रेज करशील का?
फुड-पोर्न चे उदाहरण मला चटकन आठवते. अनेक भडक बटबटीत अशा चमचमीत खाण्याच्या जाहीराती करुन भूक चाळवली जाते ना. यात कुठे होते बळजबरी अन बरेचदा गरज ही नसते पण टेम्प्टेशन हे हत्यार वापरुन सुजवट गरज निर्माण केली जातेच की.
अनेक भडक बटबटीत अशा चमचमीत
अनेक भडक बटबटीत अशा चमचमीत खाण्याच्या जाहीराती करुन भूक चाळवली जाते ना. यात कुठे होते बळजबरी अन बरेचदा गरज ही नसते पण टेम्प्टेशन हे हत्यार वापरुन सुजवट गरज निर्माण केली जातेच की.
ती तुझ्या दृष्टीने सुजवट गरज असेल कदाचित. पण विकत घेणार्याच्या दृष्टीने नसेलही. तो विकत घेण्यासाठी पैसे मोजतोय ना ? मग ती सुजवट कशावरून ?
तू टोटली उद्योजक-प्रो आहेस.
तू टोटली उद्योजक-प्रो आहेस. म्हणून तू असं म्हणतोस. पण हेच उद्योजक (a.k.a. विक्रेते) mind wield करुन फक्त धंदा करतात. Obesity सारखा रोग त्यातून पसरु शकतो.
मला मान्य आहे मोहाला बळी पडणे हा ग्राहकाचा दोष आहे. पण तसे म्हणणे हे एककल्ली नाही का? मूळात विक्रेत्याने असा अनिष्ट मोहच का निर्माण करावा?
अर्थात तू लिबर्टेरीअन असल्याने तू "मोह निर्माण करण्याच्या" स्वातंत्र्यावर बंदी आणणार नाहीस.
Obesity सारखा रोग त्यातून
मग ओबेसिटी कमी करण्यासाठी पण त्यातून अजून उद्योग निर्माण होतील ना.
ग्राहकांना काय हवे नी काय नको ते मार्केटमध्ये ठरू दे ना.
ह्म्म्म!! इन्टरेस्टिंग!
ह्म्म्म!! इन्टरेस्टिंग!
मग ओबेसिटी कमी करण्यासाठी पण
मग ओबेसिटी कमी करण्यासाठी पण त्यातून अजून उद्योग निर्माण होतील ना.
एक्सलंट.
उदय, टेरी अँडरसन ने हाच मुद्दा मांडला होता. व तुला टेरी अँडरसन न वाचता ही तो मुद्दा माहीती आहे - हे ग्रेट्ट आहे.
उदयभाऊ, मुझे गर्व है की मै आप के दोस्तों मे से एक हूं.
छान आहे रे ती टेरी यांची
छान आहे रे ती टेरी यांची लिंक. पण मला या जन्मात ती कळली नसती जर तू उदय यांच्या वरच्या मुद्द्याशी ती रिलेट केली नसतीस
Consider the example of irrigation water withdrawals reducing stream flows for fish habitat. Viewed through the externality lens, trout fishers might argue that farmers are imposing costs on them and that the government should regulate water use. An environmental entrepreneur, however, sees an opportunity to convince trout lovers to contribute to the cause and to contract with farmers to increase instream flows. -
मूळात विक्रेत्याने असा अनिष्ट
मूळात विक्रेत्याने असा अनिष्ट मोहच का निर्माण करावा?
हा अनिष्ट मोह आहे हे च मुळात मला मंजूर नाही. तू त्याच्यावर अनिष्ट ते चे लेबल लावत आहेस.
---
Obesity सारखा रोग त्यातून पसरु शकतो.
गेल्या ३०० वर्षांत जी प्रगती झाली त्याने एका बाजूला ओबेसिटी व दुसर्या बाजूला कुपोषण निर्माण केले आहेत. तू एका एक्स्ट्रीम ला गेलीस (ओबेसिटी) म्हणून मी दुसर्या एक्स्ट्रीम ला (कुपोषण) जातोय पण मूळ मुद्दा रेंज ऑफ पॉसिबिलिट्ज चा आहे. व या चा निचोड हा आहे की - most of the times reality is somewhere between these 2 extremes and often is nowhere close to आदर्श. व कोणताही असा यत्न जो आदर्श सोल्युशन राबवायचा यत्न करतो --- तो यत्न व्हिजिबल व इन्व्हिजिबल कॉस्ट्स निर्माण करतो (लादतो) व त्या ही अशा लोकांवर की जे त्या कॉस्ट्स अबसॉर्ब करण्यास सक्षम नसतात.
खूपच वेगळा अन रोचक विचार आहे
खूपच वेगळा अन रोचक विचार आहे अन तू छान स्पष्टीकरण दिलयस गब्बर.
__/\__ ते कुपोषण वगैरे मस्त!!!
आता बघ ... कुणीतरी येईल ... व
आता बघ ... कुणीतरी येईल ... व कुपोषण हे ओबेसिटी च्या नेमके विरुद्ध का व कसे नाही याचे आर्ग्युमेंट करेल.
हाहाहा
हाहाहा
"मूर्खपणाचे नाही" बिझिनेस मॉडेलबद्दल कुतूहल
>> न्यूयॉर्क ते पॅरिस प्रवासाची किंमत न्यूयॉर्क पॅरिस दुबई प्रवासापेक्षा जास्त ठेवणं हे अनैतिक नव्हे, मूर्खपणाचं आहे.
> मूर्खपणाचे ही नाही. व अनैतिक ही नाही.
"मूर्खपणाचे नाही" म्हणजे "फायदेशीर आहे" असा अर्थ लावलेला आहे. बरोबर अर्थ लावला आहे, ना?
माझा अनुभव मी वर सांगितलाच आहे. मी कमी किमतीत न्युअर्क-मुंबई हे अगदी तेच-ते विमान वापरले. शिवाय माझ्याकडून कमी पैसे घेतले, पण माझ्या बुडाने वॉशिंगटन-न्यर्क विमानातले आसनही व्यापले. ते विमानकंपनीला आणखी कोणाला विकता आले नाही, विमानकंपनीचा तो संभाव्य नफा हुकला. अगदी विक्री न-होता आसन रिकामे गेले असते, तरी इंधनात बचत झाली असती! (खरोखर एक व्यक्ती आणि सामान वजनाने इंधनवापरात वाढ होते, असे ऐकून आहे.)
या व्यवहारात विमान कंपनीचे फायदा मिळवायचे बिझिनेस मॉडेल काय आहे, याबाबत मला खरेच कुतूहल आहे.
----
हे सापडले :
http://crankyflier.com/2012/01/03/why-does-a-connecting-flight-cost-more...
तीच वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकता यावी - जेणेकरून इन्व्हेन्टरी संपावी.
अधिक किंमत टाकून माल विकत घेणारे ग्राहक (च-दर्जाचे) आहेत, पण पूर्ण विमान भरेल इतक्या संख्येत नाहीत.
उर्वरित आसने कमी (पण तरीही नफेशीर) किमतीत विकत घेणारे ग्राहक (छ-दर्जाचे) बाजारात आहेत, आणि हे स्वस्तखाऊ ग्राहक ट-इतक्या प्रमाणात त्रासही सहन करून स्वस्तात जायला तयार आहेत.
बिनात्रास आसनाची (छ-दर्जाच्या ग्राहकाला परवडेल अशी) कमी किंमत जाहीर केली, तर अ-दर्जाचे ग्राहकही त्या कमी किमतीतच आसने विकत घेतील. अशाने नफा कमी होईल.
म्हणून कमी किमतीत विकायच्या आसनांना मुद्दामून ट-प्रमाणात त्रासदायक करायचे, जेणेकरून च-दर्जाचे ग्राहक अधिक किंमत देऊन आसने विकत घेतील, आणि छ-दर्जाचे ग्राहक त्रास सोसून कमी (पण तरीही नफेशीर) किमतीत आसने विकत घेतील.
अर्थात "ट-इतका-त्रास" म्हणजे किती हे काळजीपूर्वक बाजार संशोधन करून आजमवावे लागते. स्वस्त आसने त्यापेक्षा अधिक त्रासदायक केलीत तर छ-दर्जाचे ग्राहकही खरेदी करणार नाहीत. मग रिकामी आसने आणि तोटा सहन करावा लागेल.
"मूर्खपणाचे नाही" म्हणजे
"मूर्खपणाचे नाही" म्हणजे "फायदेशीर आहे" असा अर्थ लावलेला आहे. बरोबर अर्थ लावला आहे, ना?
जनरली बोलायचे तर तुम्ही लावलेला अर्थ योग्य आहे.
तिकिटाची किंमत ही Which leg is valued the most by largest number of potential customers ? त्या potential customers चा willingness (and ability) to pay यावर अवलंबून असतो. मुख्य म्हंजे विविध विमान कंपन्यांच्या तिकिटांच्या या किंमतींमधून हे संदेशवहन होते. किंमत ही एक गव्हर्नन्स मेकॅनिझम आहे. It nudges the customer to ration his scarce resources.
Neither illegal, nor immoral
गब्बरशी सहमत. किंमत किती ठेवावी, ते कंपनी ठरवणार. Neither illegal, nor immoral.
तसंच एकदा पैसे दिले की प्रवास कसा करायचा ते प्रवाशाला ठरवू द्यावे. Neither illegal, nor immoral.
प्रवासी खोटं बोलतोय हे
प्रवासी खोटं बोलतोय हे immoral नाही का? जेव्हा प्रवाशाने अ-ब-क तिकीट घेतलं तेव्हाच त्याने क ला जाण्याचा करार केलेला असतो (असतो का?) अन जर तो क ठीकाणी गेला नाही तर तो खोटारडेपणा होतो का?
माझ्या मते, नाही
> जेव्हा प्रवाशाने अ-ब-क तिकीट घेतलं तेव्हाच त्याने क ला जाण्याचा करार केलेला असतो (असतो का?) अन जर तो क ठीकाणी गेला नाही तर तो खोटारडेपणा होतो का?
असे विमान कंपन्या म्हणतात खरे. पण असे नसावे.
"आपण विमानाच्या दारापर्यंत वेळेत येऊ शकल्यास आसन आरक्षित असावे" असा करार ग्राहक करतो. (असे ग्राहक म्हणतो.) त्यामुळे त्या आसनावर बसून प्रवास केला-वा-न-केला ही बाब कंत्राटात नाही.
ग्राहकाचे म्हणणे बरोबर असावे. कारण "आपण प्रवास करूच" असा वायदा करणे ग्राहकाच्या शक्तीमध्ये नसते. ग्राहक वाहातुकीत अडकू शकतो, वगैरे. आसन आरक्षित ठेवल्यास "हे घ्या पैसे" इतके करणे मात्र ग्राहकाच्या शक्तीत असते, आणि तितपतच करार ग्राहक करू शकतो.
आसन पूर्ण प्रवासभर आरक्षित
आसन पूर्ण प्रवासभर आरक्षित असावे असा करार असतो असे वाटते. म्हणजे दुबईपर्यंत आसन आरक्षित करुन पॅरिसला उतरुन जाणे हे अन्न वाया घालवण्याइतके तरी अनैतिक आहेच. कारण कंपनीचा नफा मरु द्या, पण एखाद्याला काही अतिशय महत्त्वाच्या कामाला पॅरिस ते दुबई जायचे असेल तर त्याला ते आसन मिळणार नाही.
धनंजयने पैसे भरून आसन घेतले
धनंजयने पैसे भरून आसन घेतले की ते ननिला मिळणारच नाहीये, मग धनंजय वाटेत उतरून जावो अथवा नाही.
So the point is moot.
उदय जर धनंजय यांनी सचोटीने
उदय जर धनंजय यांनी सचोटीने महाग न्युयॉर्क ते पॅरीस फक्त तिकीट घेतलं असतं
तर गरजू ननिंना ते पॅरिसला आसन रिकामे झाल्या ने पॅरीसला आसन मिळाले असते.
सचोटीचा मुद्दा कळला नाही
सचोटी/गरजूचा मुद्दा कळला नाही.
धनंजयकडे पॅरिसचे महाग तिकीट घेण्याकरिता पैसेच नाहीत. त्यामुळे समजा धनंजयने तिकीटच विकत घेतले नाही, तर गरजू धनंजयला आसन मिळणार नाही.
आणि न्यूयॉर्क पॅरिस आसन रिकामे राहील. मग समजा ननि यांनी ते आसन पॅरिसपुढे वापरले, तर गरजू धनंजयची परवड झाली, त्याचे काय घ्या?
पण पैसे नाहीत म्हणून धनंजय
पण पैसे नाहीत म्हणून धनंजय खोटे बोलून तिकीट विकत घेतात हे अनैतिक वाटते नाही का? पैसेच नाहीत तर त्यांनी बोट्/कॅब्/बस काहीही करावे. खोटे कशाला बोलायचे? ते अनैतिकच.
बरोबर. आणि त्यामुळे ननिकडे
बरोबर. आणि त्यामुळे ननिकडे पैसे असो नसो त्याला तिकीट मिळणारच नाही (सीट रिकामे असूनही).
बरोबर. आणि त्यामुळे ननिकडे
बरोबर. आणि त्यामुळे ननिकडे पैसे असो नसो त्याला तिकीट मिळणारच नाही (सीट रिकामे असूनही).
व तरीही हा तिकीट व्यवहार किंवा प्रवाशाने मधेच उतरून जाणे हे अनैतिक नाही. ननिंकडे पैसे असो वा नसो त्यांना तिकिट न मिळणे अनैतिक नाही.
पॅरिसमार्गे न्यायचे की झुरिकमार्गे
धनंजयला पॅरिसला जायचे आहे की दुबईला हे त्याने विमान कंपनीला सांगणे बंधनकारक नाही. त्याने पैसे मोजले आणि दुबईचे तिकिट काढले. विमान कंपनीच्या दृष्टीने तो दुबईला जात आहे, त्यामुळे त्याला पॅरिसमार्गे न्यायचे की झुरिकमार्गे, ते विमान कंपनी ठरवू शकते. ती रिस्क घ्यायला धनंजय तयार असेल तर प्रश्न मिटला. यात अनैतिक काय आहे?
मला असे वाटत होते (आहे) की
मला असे वाटत होते (आहे) की दुबईचे तिकीट इक्वल्स धनंजय यांनी विमान कंपनीला सांगणे की त्यांना दुबईलाच जायचे आहे. "मी दुबईला जाणार" असा करार करणे.
का बरे असे वाटते
हा तर जुलूम झाला!
मला पैसे जाळायचा शौक असेल, तर मला पैसे जाळता यावेत. किंवा आळस वाटला म्हणून आणि तिकीट घेतल्याच्या दिवशी वाटल्यास बिछान्यात झोपून राहाता यावे.
अथवा मी मेल्यास विमानकंपनीने माझ्या वारसदारांकडून नुकसानभरपाई मागण्याचे काम नाही. (मात्र माझ्या घरकर्ज देणार्या बँकेने घर वारसदारांना पोचण्यापूर्वी जप्त करणे ठीक आहे. उगाच "मरणान्तानि ऋणानि" वगैरे मी म्हणत नाही, गैरसमज नसावा.)
हां - या सर्व प्रकारात विमान कंपनीने तिकिटाचे पैसे ठेवून घ्यावेत.
तिकीट काढताना विमान कुठे
तिकीट काढताना विमान कुठे थांबणार आहे हे प्रवाशाला माहिती नसते हे माझ्यासाठी नवीन आहे.
मी दोनदाच असा वन स्टॉप प्रवास केला आहे आणि दोन्हीवेळा मला विमान कुठे थांबणार/बदलणार हे माहित होते.
नव्ह वाटत बुवाेनाहीहेनाह्हेनाव्हेन
> पण पैसे नाहीत म्हणून धनंजय खोटे बोलून तिकीट विकत घेतात हे अनैतिक वाटते नाही का?
नाही वाटत बुवा. जे विकत आहेत, ते सोडून फालतू वेगळ्याच कुठल्या गोष्टीबाबत ते मला प्रतिज्ञापत्र मागत असतील, तर मला सत्य-असत्य बाबत काहीही बांधीलकी वाटत नाही.
ह्म्म. रोचक आहे
ह्म्म. रोचक आहे
कॅनडात राणीच्या नावाने शपथ
माझा एक मित्र कॅनडाचा नागरिक झाला आहे. राजेशाहीबाबत त्याचे काही विशेष प्रेम नाही - पूर्ण लोकशाही योग्य असल्याचे त्याचे मत आहे. अर्थात राणीविरुद्ध बंड वगैरेसुद्धा करायचे त्याच्या योजनेत नाही... परंतु राणीच्या नावाने निरर्थक आणि कालबाह्य शपथ घेताना त्याला काहीही अनैतिकता वाटली नाही. आणि मलाही त्याचे पटते.
(लोकाशाहीविरुद्ध राणीच्या हक्काकरिता राजकर्तव्याखातर लढणारा कोणी सैनिक असेल, तर त्याने अशा बाबतीत खोटे प्रतिज्ञापत्र देऊन चालणार नाही. कारण त्याच्याकरिता ती प्रतिज्ञा सुसंबद्ध आहे.)
असंबद्ध बाबतीत प्रतिज्ञापत्रे मागणार्यांना, तशा प्रतिज्ञापत्रांच्या आधारे सेवा देणार्या-नाकारणार्यांना यथेच्छ खोटे प्रतिज्ञापत्र द्यावे.
थोडे टोकाचे गडद करून उदाहरण देतो :
एखाद्या दंगलीत "तू अमुक धर्माचा असल्यास/नसल्यास आम्ही तुला मारू" अशी जीवन-मृत्यूची विक्री करणार्यांसही बेधडक खोटे बोलावे. मग आपण खोटे बोलून त्या विक्रेत्यांकडून जीव विकत घेतला, असे वाईट वाटण्याचे काहीएक कारण नाही. कारण "मी तुला जगू देईन" या व्यवहाराबाबतच्या करारात "तुझा धर्म काय" हे कलम असंबद्ध आहे. त्या धर्मात धर्मगुरू होण्याच्या दीक्षाप्रसंगात बाबतीत मात्र ते कलम सुसंबद्ध आहे. तिथे मात्र खोटे प्रतिज्ञापत्र देणे अनैतिक असेल.
प्रतिसाद अतिशय आवडलेला आहे.
प्रतिसाद अतिशय आवडलेला आहे.
तसा न्याय कंपनीला का लावू
तसा न्याय कंपनीला का लावू नये? त्यांना असे व्हायला नको असेल तर त्यांनी तिकिटांच्या अशा विचित्र किंमती ठेवू नयेत.
किंवा दुबईला कमी तिकिटात न्यायचे आहे तर थेट दुबईला न्यावे. इंधनाचा खर्च अजून वाचेल.
तिकिटाच्या करारात अंतर्भूत असते ते म्हणजे धनंजयने दुबईचे तिकीट काढले तर (तो वेळेत विमानतळावर हजर ज़ाला तर) त्याला दुबईला पोचवण्याची जबाबदारी कंपनीने घेतली. धनंजयवर दुबईला जाण्याची जबाबदारी नाही.
मी तिकीट काढले आणि मरणाचा आजारी पडलो तर कसाही स्ट्रेचरवरून जाऊन तो प्रवास करण्याची सक्ती माझ्यावर नसते. मला घरातून उचलून नेऊन विमानात ठेवणे/कोंबणे ही जबाबदारी (आणि अधिकार) कंपनीला नसते. मी प्रवासाला गेलोच नाही तर कंपनी माझ्यावर खटला भरू शकत नाही.
मी कंपनीशी करार करतो की मी तिकीट काढले आहे आणि माझी जागा आरक्षित केली आहे. मी समजा प्रवास केलाच नाही तरी मी तिकिटाचे पैसे परत मागणार नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
किंवा दुबईला कमी तिकिटात
न्युयॉर्कवरुन थेट दुबईला नेले तर इंधनाचा खर्च वाचेल की पॅरिस दुबई अशी दुसरी फ्लाईट सोडावी लागल्याने वाढेल? शिवाय प्रवासी कमी असल्याने दरडोई इंधनाचा खर्च वाढेलच.
एकांड्या ग्राहकावर तशी काहीच जबाबदारी नाही पण आपल्या कृतीने इतर ग्राहकांना किंवा पॉसिबली विमान कंपनीच्या कर्मचार्यांना फरक पडणार असेल तर त्याची काहीच नैतिक जबाबदारी नाही का?
म्हणजे तोटा होत असेल तर इतर ग्राहकांना काय दर मिळतोय तिकडे लक्ष द्यायचे आणि फायदा होत असेल तर इतर ग्राहक गेले उडत (किंवा उडायची इच्छा असूनही राहिले बसून) असं म्हणायचं हा दुटप्पीपणा नाही का?
बाजारातल्या मिसप्रायसिंगचा फायदा घेऊन नफा कमवणे वैध असले तरी ही डिझाईन्ड मिसप्रायसिंग आहे आणि तिचा फायदा घेऊ नये हे अध्यारुत आहे.
तसे नसल्यास आर्बिट्राज वैध आणि इनसायडर ट्रेडिंग अवैध या म्हणण्याला काही बेसिस राहात नाही.
>>इतर ग्राहकांना किंवा
>>इतर ग्राहकांना किंवा पॉसिबली विमान कंपनीच्या कर्मचार्यांना फरक पडणार असेल तर त्याची काहीच नैतिक जबाबदारी नाही का?
वेल !! ही जबाबदारी कंपनीने (पार्टली तरी) का घेऊ नये?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
न्युयॉर्क ते दुबई अशा कमी
न्युयॉर्क ते दुबई अशा कमी मागणीच्या रुटवर मागणीच्या प्रमाणात कमी भाडे आकारुन कंपनीने ती जबाबदारी उचलली आहे असे मला वाटते.
१. पॅरिस ते दुबई या रूटच्या
१. पॅरिस ते दुबई या रूटच्या कमी भाड्यात सुद्धा कंपनीला नफाच होतो.
तसे असेल तर जबाबदारी वगैरे काही उचललेली नाहीये.
२. पॅरिस ते दुबई या रूटवरील कमी भाड्यात कंपनीला तोटा होतो. तरी कंपनी ग्राहकांच्या सोयीसाठी हा रूट चालवते.
तो तोटा न्यूयॉर्क ते पॅरिस रूटवरील प्रवाशांनी का भरून द्यावा? (कंपनी काही त्यांच्या खिशातून देत नाही).
बेसिकली जास्त मागणीच्या रूटवर जास्त भाडे आकारण्याच्या कंपनीच्या एका नागड्या स्वार्थाला, प्रवाशांनी शोधलेली पळवाट हा दुसर्या नागड्या स्वार्थाचा शह आहे. त्यात नैतिक अनैतिक असे काही नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ओके.
ओके.
त्यापेक्षासुद्धा...
...समजा मला खरेच दुबईला जायचे होते म्हणून मी दुबईचे तिकीट काढले, परंतु प्यारिसला उतरण्यापूर्वीच हृदयविकाराचा झटका येऊन माझा मृत्यू झाला, तर विमानकंपनीने (फसवणुकीसाठी नाही तरी 'करार मोडल्या'बद्दल) माझ्याविरुद्ध मृत्युपश्चात खटला उभारावा काय? की ('करार मोडू नये' म्हणून) माझे मढे तसेच दुबईच्या विमानात चढवून दुबईपर्यंत न्यावे (नि मढे या विमानातून या विमानात हलविण्याचा खर्च माझ्या वारसांकडून वसूल करावा)?
(असे होऊ लागले, तर 'मुडदा बशिवला तुझा' या वाक्प्रचारास काही नवा, वेगळाच अर्थ प्राप्त होईल.)
(सांगण्याचा मतलब, केवळ मी दुबईचे तिकीट काढले म्हणून दुबईपर्यंतचा प्रवास पूर्णपणे किंवा अंशतःसुद्धा करण्याची कोणतीही जबाबदारी माझ्यावर नाही. उलटाक्षी, आयत्या वेळेस प्यारिसचे विमान ओव्हरबुक झाल्यामुळे विमानकंपनीने त्या फ्लैटीतून मला बंप करून त्याऐवजी माझी सोय, उदाहरणादाखल, फ्रांकफुर्टमार्गे दुबईला जाण्यार्या विमानात करून दिली - आणि त्यामुळे माझा प्यारिसला उतरण्याचा प्लान गंडला - तर तक्रार करण्यास कोणतीही जागा माझ्याजवळ नाही.)
भारतात
भारतात अश्या प्रकारचा विमानप्रवास करता येत नाही.
मी रायपूर-मुंबई-पुणे या फ्लाइटचे पुण्यापर्यंतचे तिकीट काढले असेल तर मुंबईला मला विमानातून उतरू देत नाहीत. मुंबईला उतरणारे जे प्रवासी असतात त्यांचे बोर्डिंग पास तपासून ते मुंबईपर्यंतचेच असल्याची खात्री करून घेतली जाते. [अर्थात याचे कारण प्रवासी उतरल्यावर लवकर परतला नाही तर पुढे पुण्यास जाण्यास खोळंबा होऊ नये म्हणून].
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
?
समजा मुंबईहून पुण्याकरिता विमान बदलणे असेल तर? (पुणे अथवा रायपूर यांपैकी कोणतातरी विमानतळ हा संबंधित विमानकंपनीचे हब असल्याखेरीज रायपूर-मुंबई-पुणे अशी एकविमानी फ्लाइट असणे सयुक्तिक वाटत नाही. चूभूद्याघ्या.)
दुसरे म्हणजे, मुंबईस उतरणार्या प्रत्येक प्रवाशास उतरण्यापूर्वी थांबवून त्याचा बोर्डिंगपास तपासून मगच उतरू देताना, उतरू पाहणार्या मागील इतक्या सार्या प्रवाशांच्या अगोदरच एवढ्याशा चिंचोळ्या जागेत ताटकळणार्या रांगेचा खोळंबा करणे, यामागील व्यवहार्यता लक्षात येत नाही.
(भारताअंतर्गत विमानप्रवास फारसा केलेला नसला, तरी आंतरराष्ट्रीय विमानातूनसुद्धा मुंबईला उतरताना आपले इण्डियन प्रवासी बंधुभगिनी किती उतावीळ होतात, की विमान रनवेला टेकले रे टेकले, की ते टर्मिनलला पोहोचण्याची वाट पाहणे तर सोडाच, ते साधे थांबण्याचीसुद्धा वाट न पाहता, पट्टा बांधून राहण्याची सूचना अद्याप जारी असतानासुद्धा जागेवरून उठून आपले ओव्हरहेड बिनमधले सामान काढायला धावतात, नि शेवटी विमानाच्या स्टाफला पीए शिष्टमवरून ओरडून, दटावून त्यांना खाली बसवावे लागते, याचा अनुभव चांगलाच नि पुष्कळदा घेऊन झालेला आहे. अशा परिस्थितीत, उतरण्याअगोदर प्रत्येकाचा बोर्डिंगपासही जर तपासून पाहू लागले, तर काय अशक्य परिस्थिती निर्माण होईल/होत असेल, याची कल्पना करवत नाही.)
एकविमानी फ्लाइट असेल तरच असे
एकविमानी फ्लाइट असेल तरच असे होते.
मी अशा फ्लाइटमधून मुंबईला उतरलो आहे. बोर्डिंग पास चेकिंग विमानाच्या दारात न करता एरोब्रिजच्या (टर्मिनलकडील) टोकाला करतात. तीन कर्मचारी चेकिंग करतात. त्यामुळे झटपट होते. तपासण्याची काही टेक्निक असावी. बोर्डिंगपासवरील विशिष्ट जागी फक्त तारीख आणि डेस्टिनेशन तपासणे वगैरे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
तपासणी करणार्याला माझा विचार
तपासणी करणार्याला माझा विचार बदलला आहे आणि मी मुंबईलाच उतरतोय असे सांगितले तर?
डोन्नो
डोन्नो.
बहुधा विमान पुण्याला पोचेपर्यंत मुंबई विमानतळावर बसून रहायला लावतील.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पण प्रवाशाला माहित आहे की तो
पण प्रवाशाला माहित आहे की तो उतरुन जाणार आहे आणि त्यामुळे एका अधिकच्या माणसाची सोय होऊ शकते आणि रिसोर्सेसचीही बचत होण्याची शक्यता आहे आणि इन-जनरल दुबईला जायचे नसताना दुबईचे तिकीट काढणे मिसलिडींग आहे.
तरीही प्रवासी होमो इकॉनॉमिकस असल्याने त्याने फक्त स्वतःच्या वाचलेल्या पैशाचा विचार केला पाहिजे असेच ना?
शिवाय प्रवास पूर्ण करेल याची
शिवाय प्रवास पूर्ण करेल याची खात्री देणे वेगळे आणि प्रवास पूर्ण करणार नाही हे माहित असूनही भासवणे वेगळे.
प्रवाशावर असे कुठलेही बंधन नाही.
माझ्यामते प्रवाशावर असे कुठलेही बंधन नाही.
उदा. युनायटेडचे काँट्रॅक्ट वाचले. त्यात UA’s obligation to the Passenger आहे, पण Passenger obligation बद्दल काहीच नाही. (मी "oblig" या शब्दावर सर्च केला.)
पान ११ वर आहे
पान ११ वर लिहिले आहे.
Prohibited Practices
:
1)
Fares apply for travel only between the points for which they are published. Tickets may not be purchased and
used at fare( s ) from an initial departure point on the Ticket which is before the Passenger’s actual point of origin of travel, or to a more distant point( s ) than the Passenger’s actual destination being traveled even when
the purchase and use of such Tickets would produce a lower fare. This practice is known as “Hidden Cities Ticketing” or “Point Beyond Ticketing” and is prohibited by UA
ओय होय!!! बुल्स आय!
ओय होय!!! बुल्स आय!
कंपनी काय वाटेल ते करारात लिहील
कंपनी काय, वाटेल ते कलम करारात लिहील, आणि अगतिक गरजवंत आहे म्हणून मी कशावरही सही करेन. प्रश्न असा आहे, की माझ्या अंगाचे हालचाल करायचे स्वातंत्र्य (आसनावरून उठून जाण्याचे स्वातंत्य) हिरावून घेणारे कलम करारात असणे शक्य तरी आहे काय?
अशा बाबतीत विमानकंपनीने माझ्याविरुद्ध कोर्टात दावा करावा, आणि असे कलम कायद्यात बसत असेल, तर कोर्ट त्यांना माझ्याकडून नुकसानभरपाई देऊ करेल.
कंत्राटातील जाचक - undue influence/duress - कलमे बेकायदेशीर म्हणून कोर्टाने रद्द ठरवण्याची उदाहरणे आहेत. अथवा "bundling" प्रकारची विक्री-कंत्राटे कोर्टांनी फेटाळलेल्याची उदाहरणे आहेत. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टिम घेतली तर आमचा ब्राउझरही घेतलाच पाहिजे, वगैरे.
http://en.wikipedia.org/wiki/United_States_v._Microsoft_Corp.
आता गब्बर सिंग सांगतील की हा खटला चुकीचा होता वगैरे. परंतु असा विचार होऊ शकतच नाही, आणि त्याचे कायदेशीर परिणामही होत नाही, असे काही कोणाला म्हणता येणार नाही.
आणखी एक उदाहरण म्हणजे वैद्यकीय सांशोधन करताना "तुमच्याकडून मिळवलेली साधनसामग्री वाटेल तशी वापरू, तुम्हाला इजा झाल्यास त्याबाबत कोर्टात खटला भरण्याचा हक्क तुम्ही सोडून देता" अशा प्रकारची भाषा संमतिपत्रात पूर्वी काही ठिकाणी असे. लोक तशा संमतीपत्रांवर सह्यासुद्धा करत. पण ती कलमेच बेकायदेशीर असल्याचे कोर्टांनी ठरवले.
-------
(अॅलिस... थ्रू द लुकिंग ग्लास मधून)
said the Sheep: "... Now, what do you want to buy?"
"To buy!" Alice echoed ...
"I should, like to buy an egg, please," she said timidly. "How do you sell them?"
"Fivepence farthing for one——twopence for two," the Sheep replied.
"Then two are cheaper than one?" Alice said in a surprised tone, taking out her purse.
"Only you must eat them both, if you buy two," said the Sheep.
"Then I'll have one, please," said Alice, as she put the money down on the counter. For she thought to herself, "They mightn't be at all nice, you know."
-------
परंतु अशा प्रकारे अंडा-विक्री करण्याचा करार कायद्यात बसतो का? की विकत घेतली तर खाल्लीच पाहिजेत?
आता गब्बर सिंग सांगतील की हा
आता गब्बर सिंग सांगतील की हा खटला चुकीचा होता वगैरे. परंतु असा विचार होऊ शकतच नाही, आणि त्याचे कायदेशीर परिणामही होत नाही, असे काही कोणाला म्हणता येणार नाही.
ब्राऊझर (आय ई) बद्दलची केस विलक्षण होती. चुकीची होती की नाही ते तुम्ही ठरवा.
भारताचे सरकार (जो करन्सी पुरवठा करणारा आहे) असे चालवून घेईल का की - जर एखादा नागरिक म्हंटला की आम्ही भारतात राहत असलो तरी आम्ही चिनी करन्सी आमच्या दैनंदिन व्यवहारात वापरणार - असे म्हंटले तर भारत सरकारला चालेल ? (आता लगेच अॅपल्स टू ऑरेंजेस चे ऑब्जेक्शन येईलच.)
दुसरे म्हंजे - या अशा सरकारी आचरट पणाची किंमत इतरांना चुकवावी लागते. सरकार जिंकले खरे पण मायक्रोसॉफ्ट ने काय केले की ब्राऊझर मोफत उपलब्ध (डाऊनलोडेबल) करून दिला व डिस्ट्रिब्युशन कॉस्ट्स कमी केल्या. मायक्रोसॉफ्ट वर सिक्युरिटी (व्हायरस विरोधी सॉफ्टवेअर) कंपन्यांनी सुद्धा असाच दावा गुदरला होता. प्रत्युत्तरादाखल मायक्रोसॉफ्ट ने "सिक्युरिटी इसेन्शियल्स" मोफत (डाऊनलोडेबल) उपलब्ध करून दिले. मार्केट मधल्या किंमती पाडल्या व अनेक सिक्युरिटि कंपन्यांची दाणादाण उडाली.
नॉर्थवेस्ट एअरलाइन्स विरुद्धचा अपूर्ण खटला
अशा प्रकारची तिकिटे विकत घेण्यास ग्राहकाला भाग पाडणे म्हणजे विमानकंपन्यांकडून अँटिट्रस्ट कायद्याचे उल्लंघन आहे, असा एक खटला नॉर्थवेस्ट एअरलाइन्सविरुद्ध १९९६-२००४ पर्यंत रखडत चालला होता.
परंतु नॉर्थवेस्ट एअरलाइन्स बुडीतखात्यात गेली, आणि हा खटलाही नाहिसा झाला.
आता या नवीन खटल्याचे (युनायटेड एअरलाइन्स+ऑर्बिट्स विरुद्ध अक्तरेर झमन) काय होते बघूया.
ठीक आहे.
जर प्रवाशाला पान ११ क्लॉज K मान्य असेल, तर मग काय प्रश्न आहे?
आताची केस या मुद्द्यांना लिगल बेसिस आहे की नाही, यावरून आहे.
हो.
स्वखर्चाने केलेल्या प्रवासात चेक-इन सामान अनेकदा असल्याने मला स्वतःला टप्पा चुकवण्याचा फारसा उपयोग नाही. पण या केसचा निकाल कसा लागतो याची उत्सुकता आहे.
तत्त्वतः सहमत
तुमचा मुद्दा तत्त्वतः मान्य आहे. पण एअरलाईन कंपन्यांनी प्रवासी विमान चुकवतील, उशीरा येतील अशी शक्यता गृहित धरुन ओवरबुकिंग केलेलेच असते. त्यामुळे एखाद्याला अतिशय महत्त्वाच्या कामासाठी कुठे जायचे असेल तर तिकीट न मिळण्याची शक्यता नगण्य आहे.
एअरलाईन कंपन्या व त्यांच्या एजंटांच्या अप्रामाणिकपणाची ही एक जुनी बातमी पाहाः म्याक वापरकर्त्यांना विंडोज वापरकर्त्यांपेक्षा जास्त भाडे दाखवणेः http://www.npr.org/blogs/thetwo-way/2012/06/26/155756095/orbitz-shows-ma...
त्यासाठी लिगल अॅक्शन घेऊ
त्यासाठी लिगल अॅक्शन घेऊ शकतात ना प्रवासी आणि दाखवलेले भाडे मान्य असेल तर दुसर्याला काय दाखवले त्याने काय फरक पडतो बरे? बाजारात केळी विकणारे गिर्हाईकाच्या कुवतीप्रमाणे कमीजास्तला विकतातच की.
आणि थोड्या फार प्रवाशांची फ्लाईट चुकेल म्हणून काही प्रमाणात ओव्हरबुकिंग करतात, पण एकदा पैसे वाचवण्याची ही युक्ती कळली आणि पॅरिसला जाणारे बहुसंख्य लोक जर दुबईचे तिकीट काढायला लागले तर त्यांना पॅरिस ते दुबई जवळ जवळ डबल बुकिंग करावे लागेल.
मालप्रॅक्टिस
पण ही मालप्रॅक्टिस आहे ना. हे म्हणजे इन्शुरन्स कवरेज असलेल्या पेशंटला जितके पिळता येईल तितके पिळणाऱ्या हॉस्पिटलसारखीच मनोवृत्ती झाली.
ग्राहक कम्युनिटीच्या दृष्टीने
ग्राहक कम्युनिटीच्या दृष्टीने पाहिल्यास मालप्रॅक्टिस आहे. एक ग्राहक व एक कंपनी या दृष्टीने पाहिल्यास नाही. अर्थात कंपनी मालप्रॅक्टिस करते म्हणून ग्राहकांनी कंपनीला फसवण्यात गैर नाही याच्याशी मी असहमत आहे.
या चर्चेत काही जण इंडिव्हिजुअल ग्राहक व कंपनी अशी मांडणी करत आहेत तर काही ग्राहक कम्युनिटी व कंपनी अशी मांडणी करत आहेत. यात कन्सिस्टन्सी नसल्याने सगळं कन्फ्युजिंग होतंय.
न्यायालये कन्झ्युमर कम्युनिटीचा विचार करतात अशी आशा आहे.
शिवाय अ-ब-क तिकीट घेऊन ब
शिवाय अ-ब-क तिकीट घेऊन ब पोर्टवर उतरुन जाताहेत हे लक्षात आल्यावर कंपनी अ ते क भाडं वाढवणार (ते कशाला नफा कमी करुन घेतील?) तर अ ते क प्रवास करणार्यांचा तोटा होणार.
त्याची नैतिक जबाबदारी सटकू प्रवाशांवर नाही का?
असो. प्रत्येकाने फक्त स्वतःच्या इमिजिएट फायद्याचा विचार करणे एवढंच नैतिक आहे हेच गृहीतक असल्यास नो प्रॉब्लेम.
माझा अनुभव
मागच्या महिन्यात अमेरिका-मुंबई येण्याचा अनुभव.
माझ्या घरापासून न्युअर्क आणि वॉशिंगटन ही दोनही विमानतळे (वेळ-खर्चाच्या दृष्टीने) समान अंतरावर आहेत. न्युअर्क-मुंबई-न्युअर्क अशी एक थेट विमानसेवा मला सोयीची होती. पण त्याच दिवशीचे वॉशिंगटन-न्युअर्क-मुंबई (परतीचे तिकीट, त्यातील न्युअर्क-मुंबई-न्युअर्क विमाने अगदी तीच-ती) असे भाडे स्वस्त होते.
म्हणून मी वॉशिंगटन-न्युअर्क-मुंबई (परतीचे) असे तिकीट काढले. जाताना वॉशिंगटन येथेच चढावे लागले. तिथे चढलो नसतो, तर पूर्ण तिकिटच बाद झाले असते. परत मुंबईहून येताना मात्र मी न्युअर्कला मी टंगळमंगळ केली, आणि न्युअर्क-वॉशिंगटन विमान चुकले.*
(*माझ्या या बेशिस्त स्वभावाची मला कल्पना होती म्हणून मी न्यूअर्कहून घरी कसे पोचायचे त्याबद्दल आधीपासून सोय केली होती हे बरे.)
वॉशिंगटनला जाऊन मग तिथून घरी येण्यापेक्षा (ते विमान चुकवल्यामुळे) न्युअर्कहून थेट मी घरी लवकर पोचलो. पण जाताना उगाच कित्येक तास आधी निघावे लागले.
----
या धाग्यासारखेच मलाही कुतूहल वाटले. मी अशाच ऐर्यागैर्याला, तज्ज्ञाला नव्हे विचारले, की असे विचित्र भाडे का बरे आकारले असेल? कारण न्युअर्क-मुंबई विमानले नेमके तेच-ते आसन मी कमी किमतीत आडवले, आणि शिवाय वॉशिंगटन-न्युअर्क विमानातले आसनही आडवले. हे विमानकंपनीच्या फायद्याचे कसे? त्या ऐर्यागर्याने सुचवले, की न्युअर्क-मुंबईची जबाबदारी असलेल्या विभागाने/उपकंपनीने वॉशिंगटन-न्युअर्कची जबाबदारी असलेल्या विभागाकडे/उपकंपनीकडे कंत्राट दिले असणार. "आम्ही तुमची विमाने आमच्या विमानांकरिता feeder म्हणून वापरू, पैकी क्षक्षक्ष इतकी आसने वापरूच वापरू. तुम्ही आसने आमच्याकरिता राखीव ठेवा. ती आसने न भरल्यास आम्ही दंड भरू." त्यामुळे ती आसने भरण्याकरिता (दंड टाळण्याकरिता) ते मला स्वस्तात का होईना वॉशिंगटन-न्युअर्क विमानात कोंबून घेत आहेत.
शक्यता गमतीदार वाटली. अर्थात त्या व्यक्तीला असे काहीही निश्चित ज्ञान नव्हते. कल्पनाविलासच.
ही शक्यता असावी
ही शक्यता गमतीदार असली तरी बऱ्यापैकी तर्कसुसंगत वाटते. यासंदर्भातले समांतर उदाहरण मला सुचते ते मोबाईल वर्चुअल नेटवर्क ऑपरेटर (http://en.wikipedia.org/wiki/Mobile_virtual_network_operator)चे. एटी अँड टी, टी मोबाईल वगैरे कंपन्यांचे नेटवर्क वापरुन मोबाईल सर्विस पुरवणाऱ्या कंपन्यांचे दर या मूळ कंपन्यांपेक्षा बरेच स्वस्त आहेत. यामागेही असेच कारण आहे.
या हिडन सिटीज तिकीट प्रकरणात
या हिडन सिटीज तिकीट प्रकरणात व्हिसा आणि चेक इन बैगेजचं कसं करावं?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
याबाबत राष्ट्रीय आप्रवास कायदा वरचढ
याबाबत राष्ट्रीय आप्रवास (इमिग्रेशन) कायदा वरचढ ठरतो.
जर मधले छुपे शहर नव्या देशात असले (फक्त ट्रान्झिट नव्हे) तर त्या छुप्या शहरात प्रवाशाला इमिग्रेशन सोपोस्कारांसाठी मोकळे करावे लागते, आणि प्रवाशाचे सर्व चेक-इनसामान कस्टम चाचणीकरिता हवाली करावे लागते. नाहीतर देशांतर्गत छुप्या शहरात सामान बाहेर येत नाही. असे सामान असेल, तर मधल्या शहरात बाहेर पळण्यात अडचण ठरते.
गेल्या ७० वर्षांत झाली नाही
गेल्या ७० वर्षांत झाली नाही इतकी मोठी रॅली पॅरिसमधे चालू आहे. सी एन एन जमलेले हे सगळे लोक कसे "संभले हुए राष्ट्रवादी आहेत, आणि मुस्लिमांच्या विरोधात वैगेरे कसे नाहीत" हे सांगत आहे. बीबीसीचे वार्ताहर लोक जेव्हा इस्लामबद्दल परखड बोलत आहेत तेव्हा पुढचा प्रश्न टाळत आहेत. अल जजिरा वर मात्र हल्ल्यानंतर फ्रान्समधे मुस्लिमांविरुद्ध काय काय झाले आहे आणि आता वातावरण चिघळ्यायच्या कसे बेतात येऊही शकते हे सांगितले जात आहे.
--------------------
एका सटायरिकल मॅगझिनवर झालेल्या हल्ल्यासाठी फ्रान्समधे त्यांचा सर्वात मोठा जमाव एकत्र यावा हे मला थोडे जास्तच संवेदनशील वाटत आहे. पॅलेस्टाईनचे लिडर त्या सिंबॉलिक मार्च मधे येत आहेत पण त्याबद्दल लोकांचे स्वागतार्ह मत नाही. भारतीय लोकांना अतिरेकी राष्ट्रवादी म्हणणार्या लोकसत्ताच्या संपादकांना अतिरेक नक्की कसा असतो हे इथे पाहायला सांगायला पाहिजे. मी चार्ली आहे, मी चार्ली आहे अशी पोस्टरे घेऊन थांबलेले लोक हे "मिडियाने जीभ सांभाळली पाहिजे" असे अजिबात म्हणताना दिसत नाहीयेत तेव्हा हे लोक "स्वातंत्र्य" या मूल्यासाठी उभे राहिले आहेत कि त्यांना इस्लामचा विरोध करायला तो एक बहाणा मिळाला हे नक्की सांगता येत नाही. तूर्तास तरी फ्रेंच ऐक्य आणि शांतीची आस प्रबल आहे.
-----------------------
असं म्हणणं खूप दुष्टपणाचं आहे पण भारतानं काय भोगलं आहे आणि शस्त्रे विकून मिळालेले ऐश्वर्य भोगताना आम्ही काय सहन केलं आहे हे अधिक स्पष्ट होण्यासाठी युरोपमधे, प्रगत जगामधे असे अजून हल्ले आणि प्रदर्शने आवश्यक आहेत. जगातल्या सगळ्या देशांचे लक्ष शस्त्रे विकण्यापासून शांती पसरावण्याकडे वळेल इतके हल्ले आवश्यक आहेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
रशियाचं आणि अमेरिकेचं
रशियाचं आणि अमेरिकेचं दशकानुदशके भांडण चालू असताना एकाच्या गोळीने दुसर्याचा एक शिपाई मेला असेही वाचल्याचे आठवत नाही. स्वतःला शांतीप्रिय म्हणवणारी, मानवी विकास सुचकांकात सर्वात वर असणारी, आदर्श म्हणून पाहिली जाणारी राष्ट्रे देखिल प्रचंड शस्त्र विक्री करत. भारताच्या आणि पाकिस्तानच्या भांडणाने जर यांची शस्त्रे विकली जात असतील तर ते भांडण मिटावे असे त्यांना का वाटेल? उलट त्यांना वाटेल कि ते असे चिघळावे कि कधीच मिटणार नाही.
अगदी हेच धोरण समोर ठेऊन प्रगत राष्ट्रांनी जगात सगळीकडे आग लावून दिली. भारत आणि पाकिस्तान मधे काश्मिरचा प्रश्न असेल, पण अतिरेकवाद १९८० पर्यंत नव्हता. पण या पांढरपेशा राष्ट्रांना मोठी शस्त्रे विकून पुरेसे पैसे पुरेनात म्हणून त्यांनी छोटी शस्त्रे विकण्यासाठी दहशतवाद वाढवला. नाहीतर लोकल शस्त्रे,सामग्री घेऊन काय मिजास आहे अतिरेक्यांची भारतीय लष्कराशी दोन हात करायची?
पाश्चात्य देशांच्या लष्करांना काही करणे कोणासही असंभव आहे. म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारे विश्वशांतीसाठी काही इंसेंटीवच नव्हता. कूठेही जाऊन धूमधडाका करणे नि सगळे वाणिज्यिक स्वार्थ साधणारे करार करणारे सरकार तिथे स्थापणे हा धंदा चालला होता. ट्विन टावर्स पडल्यानंतर अमेरिका बरीच सरळ आली आहे. स्थानिक इगो राखण्यासाठी ओसामा हन्ट वैगेरे ठिक आहे पण अन्यथा नमते घेण्याचे शिकली आहे. पण अजूनही आमच्या भागात शांती असावी अशी आतून इच्छा नसते. म्हणून मला देखिल तिकडे अजून रॅलिज व्हाव्यात असे वाटते.
-----------------------
डिस्क्लेमर - स्वैर विचार आहेत. फार तथ्य नसू शकते. Readers should go by the people who know better.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
म्हणून त्यांना कोणत्याही
म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारे विश्वशांतीसाठी काही इंसेंटीवच नव्हता.
हे पटणेबल आहे.
---
तुम्ही शस्त्रास्त्र स्पर्धा ह्या विषयास अप्रत्यक्ष हात घातलेला आहे. पाश्चात्य राष्ट्रांनी अनेकांना शस्त्रे विकली व त्याची फूस मिळाली व हल्ले वाढले.
थॉमस शिलिंग च्या संशोधनाचा हवाला देतो. पण माझा मसाला अॅड करून पिंक टाकतो की शस्त्रस्पर्धा ह्या युद्ध रोखण्यास कारणीभूत होतात. मजेशीर बाब म्हंजे शस्त्रस्पर्धा ही शस्त्रखरेदी शिवाय होत नाही व खरेदी साठी विक्रेता व ग्राहक असे दोघेही लागतात. भारत तर गेली ५ दशके शस्त्रे आयात करीत आलेला आहे. रशियाकडून (रशिया पाश्चात्य राष्ट्र आहे की कसे ते तुम्हीच ठरवा). व इन जनरल शस्त्रे ही युद्ध प्रिव्हेंट करण्यास सुद्धा कारणीभूत झालेली आहेत. पण - That which is prevented is not clearly visible.
शस्त्रे विकणार्या आणि
शस्त्रे विकणार्या आणि खरीदणार्या राष्ट्रांत युद्धे होत नाहीत. म्हणजे भारत आणि रशिया असे युद्ध होणार नाही. पण विकत घेणार्या सार्या देशांत होऊ शकते. युद्ध परवडत नाही म्हणून देश युद्ध टाळतात, मग युद्धांची फ्रिक्वेंसी कमी होते. चक्क शांती येऊ शकते. म्हणून दहशतवाद, नक्षलवाद आवश्यक आहे असे त्यांना वाटते. दहशतवादी हरकतींनी वातावरण प्रचंड तापते आणि युद्ध चालू होते.
दुसर्या बाजूला शांतीच्या प्रत्येक दिवसाला टाळलेले युद्ध म्हणता येते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
शस्त्रस्पर्धा ह्या युद्ध
मला पटतय हे. मागे तू काहीतरी स्कॉलर आर्टिकल दिलेलं त्यात त्यांनी तेच म्हटलं होतं.
एकतर शस्त्रे विकायची आणि वर
एकतर शस्त्रे विकायची आणि वर त्याच्याने शांती प्रस्थापित होते असे म्हणायचे हा वाणिज्यप्रेरित नीच अजेंडा आहे. उत्तर प्रदेशात वा बिहार मधे बहुतांश भागात सरकारचे राज्य नाही असे म्हणता येते. कारण तिथे प्रत्येकाकडे "घोडा" असतो. वीजेचे बिल भर म्हणायची कोणाची हिंमत होत नाही. ट्रान्सफॉर्मर्मधले तेल लोक खालच्या बाजूला भोक पाडून नेतात. लग्नात तंबूला प्रचंड छिद्रे पडतात आणि बायकापोरांची काने क्षक्षली जातात. घोडाधारकांना दिमडी दिल्याशिवाय भिंतीवर वीट चढू शकत नाही.
त्या स्कॉलरला म्हणावं, अगोदर अतिरेक पिडित देशात राहा नि मग आर्टिकले लिही. हे लोक इतरांना मूर्ख समजतात कि काय. भांडायचे साधने मुबलक झाली तर भांडणे कशी थांबतील? ते काय आंटीबायोटिक आहे का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
त्या स्कॉलरला म्हणावं, अगोदर
त्या स्कॉलरला म्हणावं, अगोदर अतिरेक पिडित देशात राहा नि मग आर्टिकले लिही. हे लोक इतरांना मूर्ख समजतात कि काय ?
अगदी बरोब्बर.
त्या स्कॉलर ची इलिजिबिलिटीच नैय्ये या विषयावर बोलायची. अॅकेडमिक आयव्होरी टॉवर मधून बडबड करतो नुस्ता. अमेरिकन युनिव्हर्सिटीत बसून असला म्हणून काय झाले ? नोबेल पारितोषिक मिळाले म्हणून काय झाले ? ते तर ओबामा ला पण मिळाले होते. नोबेल मिळाले की लई श्याना होत नै माणूस. ग्रासरूट लेव्हल वर राहणारा माणूस व त्याला काय वाटते ते महत्वाचे व त्यातून शिकणे महत्वाचे.
हो ना. लायकी नैचंय. डिग्री ओफ
हो ना. लायकी नैचंय. डिग्री ओफ वेपनायझेशन चं कोणतं सूत्र नाही, एकक नाही. देशांचा डाटा नाही. आणि त्याचं आणि शांतीचं कोरिलेशन इन्वर्स आहे. अगदी देश अणुबाँब टाकणार नाहीत, धजणार नाहीत, अण्वस्त्रसज्ज आहेत, म्हणून युद्ध करणार नाहीत याला देखिल काहीच अर्थ नाही. आणि साला वेपनायझेशन वाढल्यावर शांती वाढते तर अमेरिका आणि रशिया यांनी न्यूक्लिअर वॉरहॅड्स कमी केल्यावर शांती कमी व्हायला पाहिजे. पण ती वाढलेली दिसते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आणि साला वेपनायझेशन वाढल्यावर
आणि साला वेपनायझेशन वाढल्यावर शांती वाढते तर अमेरिका आणि रशिया यांनी न्यूक्लिअर वॉरहॅड्स कमी केल्यावर शांती कमी व्हायला पाहिजे. पण ती वाढलेली दिसते.
न्युक्लिअरायझेशन अमेरिकेने व रशियाने कमी केले (स्टार्ट १, २...) पण इतरांचे वाढले नाही का ? चीन, पाकिस्तान, नॉर्थ कोरिया, इस्रायल (strategic ambiguity) ही सगळी गेल्या २५ वर्षांत जास्त न्युक्लियराईझ झालेली राष्ट्रे नाहीत का ? इस्रायल च्या ऑपरेशन ऑपेरा नंतर इराक च्या झालेल्या दयनीय स्थितीतून इराण ने काहीच धडा शिकला नसेल ???
न्युक्लिअरायझेशन अमेरिकेने व
ज्या देशांनी अण्वस्त्रे कमी केली त्यांच्यात शांती आहे आणि ज्यांनी शस्त्रास्त्रे वाढवली त्यांच्यात अशांती वाढलीय. चीन भारताच्या, व्हिएटनामच्या, जपानच्या खोड्या काढतो. पाकिस्तान गेल्या २५ वर्षात थंडावला आहे असं लहान पोरंही म्हणनार नाही. जी जी राष्ट्रे शस्त्र सज्ज आहेत ती ती अशांत आहेत.
आणि मूळाच मी तेच तर म्हणतोय. स्वतःची शस्त्रे कमी करायची. इतरांची वाढवायची. त्यांच्यात लावून द्यायचे. मग अमेरिकेतल्या आयवोरी टावरातून कॉफी फुंकत उलट सुलट स्कॉलरली पेपर लिहायचे. गडगंज पैसाही आणि शांतीही. वर प्रतिमाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ज्या देशांनी अण्वस्त्रे कमी
ज्या देशांनी अण्वस्त्रे कमी केली त्यांच्यात शांती आहे आणि ज्यांनी शस्त्रास्त्रे वाढवली त्यांच्यात अशांती वाढलीय. चीन भारताच्या, व्हिएटनामच्या, जपानच्या खोड्या काढतो. पाकिस्तान गेल्या २५ वर्षात थंडावला आहे असं लहान पोरंही म्हणनार नाही. जी जी राष्ट्रे शस्त्र सज्ज आहेत ती ती अशांत आहेत.
अशांत आहेत हे मान्य.
चीन भारताच्या, व्हिएटनामच्या, जपानच्या (व फिलिपाईन्स च्या सुद्धा) खोड्या काढतो - हे मान्य.
अमेरिका पण राडेबाजी करतेय - इराक, सिरिया, अफगाणिस्तान .... अॅड इन्फिनिटम. इराण व नॉर्थ कोरिया बरोबर राडेबाजीची भाषा केली जात्ये.
मोठ्या स्केलवर च्या युद्धाची शक्यता कमी झालिये की वाढलिये ?
मोठ्या स्केलवर युद्धाची
मोठ्या स्केलवर युद्धाची शक्यता वाढली आहे कि कमी आहे हा गहन प्रश्न आहे. त्या ही पेक्षा महत्त्वाचं कि तो एक "स्वतंत्र" प्रश्न आहे. त्यात इतके फॅक्टर आहेत कि युद्धसज्जतेचा, शस्त्रसज्जतेचा परिणाम नक्की किती आहे आणि कोणत्या बाजूने आहे या सत्कृतदर्शनी उत्तर जास्त शस्त्रे जास्त माज जास्त लढाया असा आहे. राज्यकर्ते खेळणी म्हणून दाखवायली इतकी महागडी शस्त्रे घेत नाहीत. त्यांना ती वापरायची असतात.
जेव्हा पाकिस्तानकडे अणुबाँब नव्हता तेव्हा तो भारतावर पडायची शक्यता शून्य होती. जेव्हापासून आला तेव्हापासून आजपर्यंत पडला नसला म्हणून काय झालं? आज ती शक्यता शून्याच्या वर आली आहे. ऋण नै झाली. तो कधीही पडू शकतो.
शस्त्रे वाढली कि खुमखुमी वाढते.
शस्त्रे बनवणारी राष्ट्रे शांत आहेत. त्यांनी गुप्त संगनमत केले असावे*. त्यांच्यात युद्धे होत नाहीत. ती विकत घेणार्या राष्ट्रांत मात्र लढाया होत आहेत. याचा अर्थ शस्त्रे जास्त असणार्या देशांत युद्धे होत नाही असा कसा होईल? आणि हे विधान आउटराइअटली रिजेक्ट करता येते. राष्ट्रांच्या आर्मरिच होण्याच्या या काळात (तुमच्यामते शांतीकडे सरकण्याच्या) दुसर्या महायुद्धानंतर जितके मृत्यू युद्धात झाले आहेत तितके दुसर्या महायुद्धात झाले नाहीत असे मी वाचले होते. दहशतवादाचे मृत्यू मोजले तर शांती शब्द उच्चारायचा नैतिक अधिकार देखिल शस्त्रे विकणार्या राष्ट्रांना नाही असे वाटेल.
* मी असेच ठोकत आहे. जस्ट अ थॉट.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कुकूचकू...
शस्त्रे बनवणारी राष्ट्रे शांत आहेत. त्यांनी गुप्त संगनमत केले असावे*. त्यांच्यात युद्धे होत नाहीत. ती विकत घेणार्या राष्ट्रांत मात्र लढाया होत आहेत. याचा अर्थ शस्त्रे जास्त असणार्या देशांत युद्धे होत नाही असा कसा होईल?
इतरांना आपसात लढवणे हा अनेकांचा छंद असतो. पण सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करायचे ठरवलेले आहे.
http://timesofindia.indiatimes.com/india/SC-puts-interim-ban-on-cock-fig...
बातमी वाचली आहे. कॉक फायटिंग
बातमी वाचली आहे.
कॉक फायटिंग शब्द पाहून फार मस्त अडल्ट मटेरियल वाचायला मिळेल असे वाटले होते. असो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
नोबेल पारितोषिक मिळाले म्हणून
नोबेल पारित्षिक मिळाले कि कारणाच्या जन्विननेसवर जास्त शंका घ्यावी या तुमच्या म्हणण्याला प्रचंड अनुमोदन आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
त्या स्कॉलरला म्हणावं, अगोदर
अजोंच्या ह्या मताशी सहमत. जनरलाइज्ड करुन मला म्हणायचे आहे की युरोप मधे तयार झालेली कुठलीही फिलोसॉफी भारताला लागू होत नाही. पण सगळे शिक्षण त्याच फिलोसॉफीचे होत असल्यामुळे इथले पुस्तकपंडीत युरोपियन उपाय्/तत्व भारताला लावायला बघतात.
अनेक उदाहरणे आहेत,
१. TQM, Continuous Improvement वगैरे जपान मधे चालणार्या प्रॅक्टीस भारतातील कॉर्पोरेट जगतात कुचकामी आहेत. इथे कोणीही Team Player वगैरे नसतो. कुठलीही गोष्ट व्यवस्थित प्लॅनिंग वगैरे करुन करायची भारतीयांची पद्धत नाही. सुरु करायचे आणि नंतर जुगाड करत रहायचे. जपानी माणुस निर्णय होयच्या आधी जे काही मत असेल ते देइल, पण एकदा निर्णय झाला की तो त्याला पसंत नसला तरी मनापासुन पाळेल. भारतात दुसर्याचा निर्णय चुक आहे असे वाटत असेल तर भारतीय मुद्दाम गप्प राहील आणि नंतर "मी सांगतच होतो" असे म्हणेल.
२. गब्बर सतत M1, M2, M3 वगैरे बोलत असतात. GDP, IIP , Monetory Policy वगैरे शक्य आहे जिथे जवळजवळ प्रत्येक Transaction रेकॉर्ड होतात. भारतात, ह्याच्या २०% पण नाही. तिथल्या डाटा पॉईंट्स ना काही अर्थ आहे का? वर भारतीयांची पैसे मिळवायची आणि ते खर्च करण्याची मानसिकता पुर्ण वेगळी आहे पाश्चात्यांपेक्षा. तिथल्या थियरी इथे कुचकामी आहेत.
३. सायकोथेरपीचे पाश्चात्य शास्त्र आणि समजुती भारतीयांना लावणे म्हणजे तर तद्दन मुर्खपणा आहे.
गब्बर सतत M1, M2, M3 वगैरे
गब्बर सतत M1, M2, M3 वगैरे बोलत असतात. GDP, IIP , Monetory Policy वगैरे शक्य आहे जिथे जवळजवळ प्रत्येक Transaction रेकॉर्ड होतात. भारतात, ह्याच्या २०% पण नाही. तिथल्या डाटा पॉईंट्स ना काही अर्थ आहे का? वर भारतीयांची पैसे मिळवायची आणि ते खर्च करण्याची मानसिकता पुर्ण वेगळी आहे पाश्चात्यांपेक्षा. तिथल्या थियरी इथे कुचकामी आहेत.
माझे उत्तर -
The Mystery of Capital: Why Capitalism Triumphs in the West and Fails Everywhere Else
पाश्चात्य थियरीज (उदा. भांडवलवाद) इतरत्र (उदा. भारतात) चालत नाहीत अशा मथळ्याचे पुस्तक सुद्धा पाश्चात्य अर्थशास्त्र्याने लिहिलेले आहे. (हर्नांदो दी सोतो हे पेरु मधले आहेत. आता पेरू हे पाश्चात्य राष्ट्र आहे की नाही ह्याबद्दल विवाद केला जाऊ शकतोच.)
पाश्चात्य थियरीज (उदा.
गब्बर - ह्याच साठी तू भारतीयांसाठी अर्थशास्त्र शोधुन काढले पाहीजे.
बादवे - साटो ला हे कळायला जिनिव्हा ला शिक्षण घ्यायला लागले
आता पेरू हे पाश्चात्य राष्ट्र
प्रत्येक शब्दाला स्थिर अर्थ नसतो, पण असतो असे सगळे मानतात हे एक भाषेचे दौर्बल्य आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मी प्रचंड गोंधळलोय. युरोप मधे
मी प्रचंड गोंधळलोय.
काही जण म्हणतात की भारतीय संस्कृत थोर आहे. ती सहिष्णू आहे. तिच्या मते अख्खे विश्व एकच आहे. भारतातील काही संत "हे विश्वची माझे घर" म्हणतात. आणि मग तेच भारतील याच विश्वातील फक्त युरोपला अशी सापत्न वागणूक का बरे देत असावेत?
म्हणजे ते देणे योग्य की अयोग्य हे मला माहित नाही पण थोर्थोर भारतीय परंपरेस हे साजेसे आहे काय?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ऋषिकेश, मुरली मनोहर जोशी पण
ऋषिकेश, मुरली मनोहर जोशी पण असेच (उदा. भारत हा इतका "हटके" आहे की बस्स.) बोलत असतात व अमेरिकन निओकॉन्स पण हीच "अमेरिकन एक्सेप्शनलिझम" ची जपमाळ जपत असतात. इंटरनेट आले (१९९५ - २००० च्या दरम्यान) तेव्हा इंटरनेट स्टार्टप्स च्या मंडळींना सुद्धा असेच वाटले होते की - This is New Economy. की आम्ही न्यु इकॉनॉमी चा भाग आहोत व आम्हास लागू पडणारे नियम वेगळे असतील. पण अशा विचारांचा फोलपणा लवकरच त्यांच्या लक्षात आला.
मी ज्या अर्थशास्त्र्यांच्या नावाची माळ जपतो त्यातले अनेक जण सुद्धा आपल्या थियरीज बाबत गैरवाजवी आग्रही होते. म्हंजे They were excessively confident of their theory's applicability. मी ज्यांच्या विरोधी भूमिका घेतो (उदा. समाजवादी) ते सुद्धा आपल्या थियरीबद्दल फाजील आत्मविश्वास बाळगून होते. वास्तविक I would like to think that अनु राव यांचा प्रमुख मुद्दा spontaneous order च्या संकल्पनेत अगदी शिंपल्यात मोती बसावा तसा बसेल. पण मी तसे म्हणणे म्हंजे हायेक च्या Fatal Conceit मधल्या मूळ (पण अध्याहृत) मुद्द्याकडे दुर्लक्ष केले असा होईल.
गब्बर - तुम्ही ज्या
गब्बर - तुम्ही ज्या थियरींबद्दल लिहीता, त्याबद्दल काहीही माहीती नसते. तेंव्हा जर कुठले नाव टाकत असाल तर माझ्या सारख्यांना कळेल अश्या ४ ओळी तरी लिहीत जा.
समाजवाद्/साम्यवादा बद्दल म्हणाल तर हे विचार माणसाच्या मुळ प्रवृत्तीच्या विरुद्ध आहेत त्यामुळे ते कधीही सत्यात येणार नाहीत. जी साम्यवादी/समाजवादी रुपे दिसतील ती माणसातील विकृती असतील. हे विचार मांडणार्यांनी माणुस कसा विचार करतो हे ध्यानातच घेतले नाही असे लहानतोंडी मोठा घास घेउन म्हणावे लागेल.
सहकार ही संकल्पना सुद्धा भारतासारख्या देशात ( किंवा कुठेच ) अजिबात चालणार नाही हे त्या विचार मांडणार्यांना कळले नाही. माझ्या मते त्यांचा हेतू वाईट नव्हता, पण ते 'भाबडे' नक्कीच होते.
अजब आहे. वसुधैव कुटुंबकम्
अजब आहे. वसुधैव कुटुंबकम् म्हणजे "सारे जग भारतीय तत्त्वज्ञानाने चालावे" असे होते हा गजबचा अर्थ आहे.
------------
तरीही -
मानवी मूल्ये जगभरात सर्वत्र समानच असावीत तेव्हा मूळ तत्त्वज्ञान समान असले तरी फारसा फरक पडणार नसावा. अपितु मानवी व्यवस्था, व्यवहार जगात सर्वत्र भिन्न आहेत तेव्हा सर्वत्र तीच समान सूत्रे काम करणार नसावीत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.