Skip to main content

सध्या काय ऐकताय / अलीकडे काय ऐकलंत? - ७

सध्या गुलाबबा‍ईंच्य आवाजातलं 'नदी नारे ना जाओ शाम' ऐकते आहे. त्यांचं 'पैंया' खास आवडलं. आश भोसले आणि जयदेव ही माझी आवडती जोडगोळी आहे, पण आता त्यांच्या या गाण्याचा माझ्यावरचा असर उतरला आहे, हे खरयं.
नौटंकी या आता हरवत चाललेल्या लोकनाट्यात पूर्वी फक्त पुरुष काम करत असत त्या काळात नौटंकीने वेड लावलेल्या गुलाबबाईंनी त्यात काम करायला सुरुवात केली. त्यांच्या रुपा-गुणावर पब्लिक फिदा झालं. पद्मश्री गुलाबबाईंची कहाणी इथे बघता येईल.

.शुचि. Fri, 29/01/2016 - 08:12

मला जेसन डेरुलो चं "गेट अग्ली" ऐकायचय पण यु ट्युबवरती, नीट सापडतच नाहीये. आज सकाळी मुलीने लावले होते. आहा मस्त ठेका आहे. शब्द माहीत नाहीत ब्वॉ.
___
https://www.youtube.com/watch?v=S2lgnitdPdc

.शुचि. Sat, 30/01/2016 - 01:16

सारा एव्हॅन्स चा आवाज आवडला.

I've been tellin' my dreams to the scarecrow
'Bout the places that I'd like to see
I said, friend do you think I'll ever get there
Ah, but he just stands there smilin' back at me

So I confessed my sins to the preacher
About the love I've been prayin' to find
Is there a brown eyed boy in my future, yeah
He says. girl you've got nothin' but time

But how do you wait for heaven
And who has that much time
And how do you keep your feet on the ground
When you know, that you were born, you were born to fly

My daddy, he's grounded like the oak tree
My momma, she is steady as the sun
Oh you know I love my folks
But I keep starin' down the road
Just lookin' for my one chance to run

Yeah, 'cause I will soar away like the blackbird
I will blow in the wind like a seed
I will plant my heart in the garden of my dreams
And I will grow up where I'll wander wild and free

.शुचि. Tue, 02/02/2016 - 20:15

"नदी ना रे, न जाओ श्याम" - माझे आवडते गाणे आहे. खरं तर "मुझे जीने दो" मधली सर्वच गाणी छान आहेत.
"नदी ना रे" गुलाबबाईंच्या किनर्‍या आवाजात खूप छान वाटलं ऐकायला.

.शुचि. Sat, 06/02/2016 - 00:28

गोड रोमँटीक गाणं सापडलं. सुंदरच आहे. -

Sometimes an April day will suddenly bring showers
Rain to grow the flowers for her first bouquet
But April love can slip right through your fingers
So if she's the one don't let her run away

https://www.youtube.com/watch?v=2MW-x0py3rE

__________

टीन-एज प्रेमाचे पेपी गाणं

A music's sweet the lights are low
Playin' a song on the radio
Your Ma's in the kitchen your Pa's next door
I wanna love you just a little bit more

https://www.youtube.com/watch?v=9PK_T7uAb2E
____
सुंदर गाणं आहे.
https://www.youtube.com/watch?v=HxPnAOMpbqA

अमुक Wed, 10/02/2016 - 10:35

गाणे : कन्डो कन्डो
गायिका : आन्द्रेआ जेरेमियाह
संगीत : K (कृष्णकुमार)
गीत : अन्वर अली
चित्रपट : अ‍ॅनायम रसूलम (२०१३)
दिग्दर्शक : राजीव रवी
.

.
-------------
गाणे : येन्ग पोन रासा..
गायिका : शक्तीश्री गोपालन्
संगीत : ए. आर्. रहमान
गीत : कुट्टी रेवती, ए. आर्. रहमान
गितारवादक : केबा जेरेमियाह
चित्रपट : मार्यन् (२०१३)
दिग्दर्शक : भारतबाला
.........................................................................................................

हारुन शेख Wed, 10/02/2016 - 11:59

In reply to by अमुक

मार्यनचं गाणं मस्त आहे. समुद्र, भरार वारा, आणि विरहाचं काहूर त्यात सैरभैर झालीली ती तरुणी अप्रतिम. शिवाय छायाचित्रण प्रचंड लाजवाब. थोर !

मिसळपाव Fri, 19/02/2016 - 01:02

In reply to by मेघना भुस्कुटे

हे रत्न हाताला लागले.

++१. चेहेरा कीती बोलका, कीती हसरा असावा? :-) अशा माणसाना खोटं बोलणं, डोक्यात एक विचार आणि बोलण्यात वेगळाच विचार असं काही करता येत नसेल बहुदा.

मेघना भुस्कुटे Thu, 18/02/2016 - 23:50

डुप्रकाटाआ

बादवे, तूनळीची फीत इथे कशी विणायची म्हणे?

मिसळपाव Fri, 19/02/2016 - 01:13

...ज्ञानाचा वापर करून हे सुरेख गाणं शेअर करतो. शब्द, सूर, संगीत एकमेकांची कशी सुरेख साथ करतात पहा.
अवांतरः बॅकगाउंडला, विशेषतः शेवटी शेवटी, एका पक्षाचा आवाज पण आहे! लाटांचा आवाज बॅकगाउंडला घेताना आला असावा बहुदा.

गब्बर सिंग Fri, 19/02/2016 - 01:34

In reply to by मिसळपाव

वा वा वा. क्या ब्बात है !!! काय मस्त गाण्याच्या आठवण काढलीत राव !!! तुस्सी ग्रेट हो. लताजींनी असाकाही आर्त सूर लावलाय ... साला जव्वाब नाय !!!

मिसळपाव Fri, 19/02/2016 - 03:27

In reply to by गब्बर सिंग

बाहेर यायला हे सुमन कल्याणपूरचं ऐक. काय फिरत आहे. आणि प्रत्येक कडव्यानंतर ध्रुवपदावर यायच्या आधी सेकंदभराचा पॉज काय सुरेख घेतलाय बघ...

मिसळपाव Sun, 21/02/2016 - 00:20

In reply to by गब्बर सिंग

अरे वा. गाणं फार वेळा एकलं नसलं तरी अनोळखी नव्हतं. अशी कीती गाणी मी ऐकलेली आहेत पण विस्मरणात गेल्येयत देव जाणे!

यातला २४ वर्षाच्या लताचा आवाज आणि वरच्या "हर आस .." चा ३५ वर्षाच्या लताचा आवाज त्या दोन्ही नट्याना बरोब्बर बसतो.

मेघना भुस्कुटे Sat, 20/02/2016 - 22:01

(उदय यांचे आभार. त्यांनी पुरवलेल्या माहितीचा वापर करून हा सराव आणि) अतिशय संयत भाषेत माध्यमांची भूमिका आणि अधोगती मांडणारा रवीश कुमार यांचा कार्यक्रम.

गब्बर सिंग Mon, 22/02/2016 - 16:22

In reply to by मेघना भुस्कुटे

रविश कुमार (एन्डिटिव्ही) यांचा व्हिडिओ बघितला. बर्‍यापैकी आहे. काही विशेष नाही. सेल्फ-राईचस मात्र जरूर आहे.

गब्बर सिंग Tue, 23/02/2016 - 09:17

In reply to by मेघना भुस्कुटे

वकीलांनी पत्रकारांना धुतले म्हणून रवीशकुमार वैतागलेले असावेत व त्यातून त्यांना - आम्हीच कसे सत्याच्या/सबूरीच्या बाजूला आहोत असा दावा करावासा वाटला असावा असा काँमेंट आमच्या एका मित्राने मारला.

२००२ ते २०१४ च्या दरम्यान "सेक्युलर व्हर्सेस कम्युनल" या dichotomy मधे अनेक विवाद चालायचे ते चालत होतं वाटतं ? एका बाजूला बहुतांश भारतीय जनता सेक्युलर आहे असा आरडाओरडा करायचा आणि दुसर्‍या बाजूला नेता सेक्युलर की कम्युनल ह्या dichotomy मधून सारखा जोखत रहायचं. मूळ व प्रमुख मुद्दा गव्हर्नन्स चा असूनही तो मागेच पडायचा. अगदी अडगळीत पडायचा. एखादी कृती सेक्युलर असणे वा नसणे हे गव्हर्नन्स या मुख्य मुद्द्यातला मधला एक छोटा हिस्सा आहे हे माहीती असूनही सेक्युलर व्ह कम्युनल या dichotomy ला डोक्यावर घेऊन नाचले होते हे लोक. आता देशभक्त व्ह. देशद्रोही या dichotomy चे राज्य आलेले आहे.

राजेश घासकडवी Tue, 23/02/2016 - 10:31

In reply to by मेघना भुस्कुटे

सुन्न करणारा व्हीडियो. समाजात उफाळून आलेली रक्तपिपासा आणि तीमधून उठणारे कर्कश कल्लोळ ऐकवत नाहीत.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 25/02/2016 - 01:49

In reply to by मेघना भुस्कुटे

हा कार्यक्रम पाहिला/ऐकला. यासारखं (पण बरंच बरं) कोणीतरी, बऱ्याच लोकांनी म्हणायची गरज आहे. पण काही प्रश्न पडले -

१. भारतीय बातम्या टीव्हीवर बघणारे लोक फक्त पुरुष असतात का? बातम्या देणारे पत्रकारही फक्त पुरुष असतात का? 'तुम्ही तुमच्या पत्नीशी असं बोलता का' असा प्रश्न सुरुवातीलाच विचारून 'किमान आमचा चॅनलतरी (किंवा हा कार्यक्रम) फक्त स्ट्रेट पुरुषांसाठीच* असतो' असं सुचवण्यामागचं कारण काय?
२. बऱ्याच ठिकाणी 'मी हा कार्यक्रम सादर करतोय' अशा अर्थाचं वक्तव्य होतं. चॅनल्स नक्की कसे चालतात हे मला माहीत नाही, पण असा एखादा कार्यक्रम बनवायचा म्हणजे त्यात बऱ्याच लोकांनी काम केलं असणार; चॅनल चालवणाऱ्यांचाही या कार्यक्रमाला पाठिंबा असणार. मग एवढा मी-पणा करत केलेल्या आत्मपरीक्षणाला कितीसा अर्थ आहे?
३. एकंदरच सादरीकरण भावनांना हात घालणारं वाटलं. कदाचित या पद्धतीमुळेच बराच जास्त प्रेक्षकवर्ग लाभला असेल. पण यापेक्षा बरं काही दिसू शकत नाही का? शांतपणे, भावनांना हात न घालता बोलणं आणि त्याला प्रसिद्धी मिळणं भारतात खरंच दुरापास्त आहे का?

*यातही सरसकटीकरण आहे. टंकाळ्यापायी ते खपवून घ्यावं.

मिसळपाव Tue, 23/02/2016 - 07:29

In reply to by गब्बर सिंग

...ऐकलेलं नव्हतं आधी. पण त्यावरनं तलतचं, साधारण त्या जातकुळीतलं, अजून एक अप्रतिम गाणं आठवलं - "फीर वही शाम". सुरूवातीची सुरावट काय लाजवाब आहे. (मी कॉलेजात खूप वेळा ऐकायचो हे. ती कॅसेट ईतक्या वेळा ऐकल्येय की एक साईड लावली की बॅकगाउंडला दुसर्‍या साईडचं ऐकू येतं आता!!) शेवटचं कडवं, "जाने अब तुझसे..." सुरेख आहेत.... रस्ते वेगळे झालेत, पण त्यात कडवटपणा नाहीये....

गब्बर सिंग Tue, 23/02/2016 - 07:43

In reply to by मिसळपाव

तलत वर इतकं लिहून/वाचून्/ऐकून झालंय की बस्स पूछो मत. त्याची एकेक रत्नं ऐकायची म्हंजे जोडीला दोनतिन मित्र पायजेत आणि रेड वाईन पायजे. डिम लाईट ठेवायचा आणि सुरु करायचं. फिर वोही शाम हे अजरामर गाणं आहे. जहांआरा मधलं मै तेरी नजर का सुरूर हूं हे पण मस्त आहे. जोडीला हे पण ऐकून टाका....
.
.

मिसळपाव Tue, 23/02/2016 - 09:04

In reply to by गब्बर सिंग

गाण्याच्या सुरूवातीला जेव्हा ते दोघे खाली बसतात तेव्हा तलत नूतनचे भुरभुरणारे केस हलकेच मागे सारतो... व्वा! हे असे मॅजिक टचेस आपोआप येतात? डायरेक्टर ईतके बारीक-सारीक तपशील सांगतो? समोरची बया आपल्यासारखीच निव्वळ काम करत्येय हे माहित असूनदेखील तन्मयतेमुळे हे असं हातून 'होउन जातं'? वेल, काही का असेना, जे काही आहे ते फार सुंदर आहे.

हे अजून एक - ईतना न मुझसे तू प्यार बढा. काय केलं की हे असे शब्द सुचतात?? !

गब्बर सिंग Wed, 24/02/2016 - 15:16

In reply to by मिसळपाव

राज व सुरय्या चं एकदम रोमँटिक गाणं पेश-ए-खिदमत है.
.
.

.
.
.
आणखी एक मस्त मदहोश गाणं ... मधुबाला. येस. द वन अँड ओन्ली. फक्त प्रदिपकुमार ला सहन करावं लागेल.
.
.

अनु राव Thu, 25/02/2016 - 09:51

काल हे भिमसेन जोशींचे १९६८ मधले दुष्काळ मदत फंडा साठी झालेले गाणे ऐकले.

गायन तर मस्त आहेच पण पहिली काही मिनिटे पंडीतजी दु़ष्काळ सरकार निर्मीत आहे हे सांगतायत. जवळ जवळ ५० वर्षे झाली, सर्व काही तसेच आहे.

https://www.youtube.com/watch?v=ayec2XcwEMo

मदत : यु ट्युब चे व्हिडीओ एम्बेड कसे करायचे?

गब्बर सिंग Thu, 25/02/2016 - 10:17

In reply to by अनु राव

युट्युब च्या व्हिडिओ खाली "Share" वर क्लिक करायचे. खाली सबमेनु अवतरतो. त्यामधे "Embed" वर क्लिक करायचे. युट्युब स्मार्ट आहे कारण तो "आयफ्रेम....." चा संपूर्ण कोड सिलेक्ट करून देतो. तुम्ही फक्त Control C करायचे. व इकडे येऊन Control V करायचे. "प्रकाशित करा" वर क्लिक करायचं.

मनीषा Fri, 26/02/2016 - 08:50

In reply to by .शुचि.

सुनता है गुरु .. मी अनेक वेळा ऐकते. कुमारांच्या निर्गुणी भजनातलं माझं आवडत आहे.

त्यांचेच -- "भोला मन जाने - अमर मेरी काया " हे पण सुरेख आहे .

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 06/03/2016 - 00:38

जेएनयूचा विद्यार्थी कन्हैया कुमार याचं भाषण ऐकलं. काही दिवस तुरुंगात काढल्यावर, निष्कारण अंगावर भलती राळ उडून झाल्यावरही या माणसाची विनोदबुद्धी शाबूत आहे. (दुवा)

मिसळपाव Tue, 08/03/2016 - 21:32

In reply to by गब्बर सिंग

तंतोतंत तसेच सूर असलेलं, "तुझ्या प्रीतीचे दु:ख मला" हे गाणं ऐकलयंस का? कडव्यांची चाल वेगळी आहे पण सुरूवातीचे आलाप तस्सेच आहेत दोन्ही गाण्यात !

मिसळपाव Wed, 09/03/2016 - 16:52

In reply to by गब्बर सिंग

माझ्यासारख्या "गाणं/सूर छान होतं/होते कींवा नव्हतं/नव्हते" एव्हढीच क्षमता असलेल्याला सुरांचं साम्य क्षणार्धात लक्षात आलं एव्हढंच सांगायचं होतं!! संगीतकार सारखे आहेत की वेगळे आहेत ते मुद्दामुनच बघत बसलो नव्हतो - लोकार्थाने 'धापलेल्या' ट्यून्स् अस्सल देशी साज चढवून काय सुरेख करून पेश केलेल्या आहेत कल्पना आहे. तेव्हा त्या भानगडीत पडू नये हे उत्तम - गाणं आवडलं का? ते फक्त बघावं.

मिसळपाव Tue, 08/03/2016 - 21:06

"रंगूनी रंगात सार्‍या..." ऐकायला गेलो होतो यूट्यूबवर. तेव्हा हे पण सापडलं. बर्‍याच महिन्यांनंतर ऐकतोय परत - पँट्रीमधे मागे पडलेला कँडीचा पुडा सापडतो ना अवचित, तश्शी अवस्था झाली !!

गब्बर सिंग Fri, 01/04/2016 - 21:27

In reply to by मनीषा

आहाहा काय आठवण काढलित !!! तबियत खुश करून टाकलीत. समस्त ब्रह्मांडाच्या इतिहासात याच्यासारखी कव्वाली ना कधी झाली ना कधी होईल. साहिर व रोशन दोघांनी मिळून धुमाकूळ घातलाय नुसता. जोडीला बाकीचे दिग्गज आहेतच. आशा, रफी, मन्नादा. फक्त भारतभूषण ला सहन करावे लागते. ( आणि मधुबाला त्याच्या प्रेमात पडलेली असते. काय तेजायला परेशानी आहे !!! )

आदूबाळ Fri, 01/04/2016 - 22:10

In reply to by गब्बर सिंग

+१ मला पण लय आवडते ही कव्वाली.

पूर्वी एका बाजूला "ताजमहल" आणि दुसर्‍या बाजूला "बरसात की रात" हे दोन रोशनसाहेबांचे मास्टरपीस असलेली कॅसेट मिळायची. अशा दोन कॅसेट झिजवल्या होत्या. काय अप्रतिम गाणी आहेत.

बॅटमॅन Fri, 01/04/2016 - 21:23

मोझात्सार्टला त्याची सासू रागावते तेव्हा त्याला त्यातून पुढील ऑपेराची कल्पना कशी सुचते तो प्रसंग अफ्फाट कल्पकतेने घेतलेला आहे. त्या प्रसंगावेळचा रातराणी ऑपेरा अप्रतिम आहे. अखिल पाश्चात्य क्लासिकल संगीतात आजवर वापरलेली सर्वांत हाय फ्रीक्वेन्सी व्होकल नोट याच ऑपेर्‍यात आहे, इफ आय रिमेम्बर रैट्ट.

https://www.youtube.com/watch?v=5wfp8EB179g

'न'वी बाजू Sat, 02/04/2016 - 05:51

In reply to by गब्बर सिंग

"मैं तुम्ही से पूछती हूँ, बेल्जियम हा सेक्युलर देश आहे का ? असल्यास कितपत सेक्युलर आहे ? गेली किती दशके सेक्युलर आहे ? सेक्युलर असल्याचे त्यांना कोणते फल मिळाले ?"

????

हा काय प्रकार आहे?

आणि,

"मैं तुम्ही से पूछती हूँ..."

गब्बरने लिंगबदल कधी करून घेतला?

(का करून घेतला, ते विचारत नाही. द्याट्स एण्टायरली हिज़ बिज़नेस.)

गब्बर सिंग Sat, 02/04/2016 - 06:11

In reply to by 'न'वी बाजू

हॅहॅहॅ

पण डियडर मॅक्लुस्की आठवल्या. जबरदस्त अर्थशास्त्री आहेत या. शॉल्लेट लिखाण केलेले आहे अर्थशास्त्राच्या विविध उपक्षेत्रांवर. पूर्वी पुरुष होत्या.

बॅटमॅन Tue, 05/04/2016 - 15:44

हे एक डच गाणे ऐकले.

https://www.youtube.com/watch?v=85U-77_5lWk

छान आहे, विशेषतः या ओळी.

Duizend gele, duizend rode
Wensen jou het allermooiste
Wat mijn mond niet zeggen kan,
Zeggen tulpen uit Amsterdam.

स्वैर मराठीकरण.

पुष्पें सहस्रें पिवळी नि लाल
लाभो तुवां त्यातहिं जे कमाल
जे मी मुखें स्पष्ट वदू शकेना
ते बोलतां, ऐक तया सुमांना !

घाटावरचे भट Wed, 13/04/2016 - 11:35

बेडेकर त्यांच्या खासगी मंदिरात दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी असा उत्सव करतात. त्यात व्याख्याने, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असे बरेच कार्यक्रम होतात. यंदा या रामनवमी उत्सवाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे यंदा ९ दिवस शास्त्रीय संगीतातील मान्यवर कलाकारांचे गायन वादनाचे कार्यक्रम ठेवले आहेत. पं. व्यंकटेश कुमार, सौ. मंजुषा पाटील, सौ. आरती अंकलीकर, पं. उल्हास कशाळकर, पं. रघुनंदन पणशीकर, पं. विश्वमोहन भट, पं. हरी प्रसाद चौरासिया वगैरे मातब्बर कलाकार आहेत. यापैकी व्यंकटेश कुमार आणि उल्हास कशाळकर ऐकायला मिळाले. लहान हॉलमध्ये कलाकारांसमोर बसून दाद देत गाणं ऐकण्याची मजा काही वेगळीच असते. पं. व्यंकटेश कुमार पूरिया धनाश्री, खमाजमध्ये एक होरी, कौशी कानडा आणि भैरवीत एक कन्नड भजन गायले. पं. कशाळकरांनी भूप, जैताश्री, बहार आणि भैरवीतील एक मराठी भजन सादर केले. सध्या वेळे अभावी वृतांत वगैरे लिहायला सवड नाही. वेळ मिळाला की लिहीन.

वेळ मिळाला की लिहीन.

आता आम्ही चातक! :)

लहान हॉलमध्ये कलाकारांसमोर बसून दाद देत गाणं ऐकण्याची मजा काही वेगळीच असते.

अगदी सहमत!

वाट पाहतो आहे.

असाच एक छोटा हॉल कार्यक्रम दत्तजयंतीच्या सुमारास कमला नेहरू पार्कशेजारच्या दत्तमंदिरात असतो. आणखी एक म्हणजे गणपतीउत्सवात केसरीवाड्यात. आणखी एक सदाशिव पेठेत राणी लक्ष्मी मंडळात पं रामदास पळसुले आयोजित करतात.

असे आणखी माहीत असल्यास सांगावेत.

घाटावरचे भट Fri, 15/04/2016 - 14:16

In reply to by आदूबाळ

जंगली महाराजांचा रामनवमी उत्सव. तिथे मंदिराचा मंडप काही २५ फूट बाय २० फूटापेक्षा मोठा नाही. त्यामुळे माहौल असाच क्लोज मैफिलीचा असतो. पण तिथे सगळेच कार्यक्रम शास्त्रीयचे नसतात. जंगली महाराज मंदिराच्या उत्सवाचा अ‍ॅडव्हान्टेज म्हणजे कार्यक्रम रात्री ८ ते १० असतात. त्यामुळे दिवसभर मोलमजूरी करून संध्याकाळी जाता येते. परवा कशाळकरांच्या कार्यक्रमाला जायला बरं वाटत नाहीये असं सांगून हापिसातून पळ काढावा लागला.

बादवे उद्या (शनिवार, १६ एप्रिल २०१६) जंगली महाराजला कैवल्यकुमार गुरवांचे गाणे आहे. कोणी येणार असाल तर भेटू.

घाटावरचे भट Mon, 18/04/2016 - 09:02

In reply to by ऋषिकेश

माय बॅड... शनिवारी पूर्ण दिवस ऐसीवर न आल्याने प्रतिसाद देऊ शकलो नाही. तुम्ही येणार/आला होतात का?... भेटलो असतो. असो.

रवींद्र दत्तात… Tue, 19/04/2016 - 01:26

डाॅ वसंतराव देशपांडेंनी म्हटलेला राग जोगकौंस ऐकला

खेलन आयो रे...ब्रजराज कुंवर
अबीर गुलाल उडावत जात,
खेलन आयो रे...
मुळात गोड बंदिश, सुरेख सादरीकरणात कल्पकतेचं मिश्रण....
सोबतीला उस्ताद जाकिर हुसैन ची तबला साथ...
विलंबित मधे वसंतराव म्हणतात-
धूम मची ब्रज में
रंग की पिचकारी केसर की
सब मिल मंगल गावो रे....
खेलन आयो रे...
या बंदिशी मधे जाकिर नी तबल्यावर धूम केली आहे.
तो वसंतरावांच्या शब्दांचा पाठलाग करतो ते एेकून कानांच पारणं फिटतं...
वसंतरावांची कुठली हि चीज ऐका, हा अनुभव येतोच...

घाटावरचे भट Tue, 19/04/2016 - 09:21

In reply to by रवींद्र दत्तात…

हे वसंतरावांच्या शेवटच्या जाहीर मैफिलीतलं रेकॉर्डिंग. पुण्यातल्या गरवारे कॉलेजाच्या हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमातलं. साथीला झाकिरमियाँ, सारंगीवर सुलतान खान आणि पेटीला अप्पा जळगावकर अशी साथसंगत होती असं वाचल्याचं आठवतंय.

.शुचि. Tue, 14/06/2016 - 09:28

हां युट्युबवरती सापडला - https://www.youtube.com/watch?v=0ZiNlNP3Ua4
_________
सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी;
हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी.

आम्हीहि त्यात होतो-- खोटे कशास बोला ---
त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी !

उगवावयाची उषा ती अमुची तिच्याच नेत्री
अन् मावळावयाची संध्या तिच्याच ओठी

दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून,
नेसायचे मुमुक्षू इस्त्री करून छाटी !

जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारुतीला
तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी !

प्रत्यक्ष भेटली कां ? नव्हती तशी जरूरी;
स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी.

हसतोस काय बाबा, तू बाविशीत बुढ्ढा,
त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी !

विंदा करंदीकर
__________________________________________

" फुंकर "
बसा म्हणालीस, मी बसलो
हसलीस म्हणून हसलो
बस-इतकंच...
बाकी मन नव्हते थार्‍यावर
दारावरचा पडदा दपटीत
तू लगबग निघून गेलीस
माजघरात
माझ्या सोबत ठेवून
तुझ्या सुस्त संसाराच्या निशाण्या...
या जाळीच्या पडद्यात
कशाला कोरले आहेस
हे हृदय, उलटे, उत्तान ?...
काचेच्या कपाटात
कशाला ठेवल्या आहेस
भुश्श्याच्या राघूमैना ?...
उडताहेत लाकडी फळावर
कचकड्यांची फुलपाखरे
भिंतीवर रविवम्य्राची पौष्टिक चित्रे हारीने.
काळ्या मखमलीवर
पतीच्या नावाचा रेखीव कशिदा...
त्यातला एक टाका जरी चुकली असतीस
तरी मी धन्य झालो असतो.
तू विचारलेस, काय घेणार ?
काय पण साधा प्रश्न...
काय घेणार ?
देणार आहेस का ते सारे...पूर्वीचे ?
मला हवे आहेत
चिंचेचे आकडे...ते
ते अधाशी ओठ, ती कुजबुज, त्या शपथा !
दे झालं कसलंही साखरपाणी.

तुझं आणि तुझ्या पतीचं हे छायाचित्र
छान आहे.
तुझ्यावरची सारी साय
या फुगीर गालांवर ओसंडते आहे.
बळकट बाहू, रुंद खांदे
डोळ्यांत कर्तेपणाची चमक
छान आहे.
राग येतो तो तुझा
या चित्रात तू अशी दिसतेस
अशी दिसतेस की
जसे काही कधी झालेच नाही !

मी तुला बोलणार होतों
छद्मीपणाने
निदान एक वाक्य, एक जहरी बाण, निदान एक...
ते मला जमले नाही, आणि
तू तर नुसती हसत होतीस...
आता एकच सांग,
उंबर्‍यावर तुझ्या डोळ्यांत पाणी आले...
इतकी का तुला सुपारी लागली ?
पण नकोच सांगूस,
तेवढीच माझ्या मनावर
एक फुंकर...

---- वसंत बापट
______________

तीर्थाटन

तीर्थाटन मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी;
अन तुझिया देहात गवसली
सखये मजला तीर्थे सारी

अधरावरती तव वृंदावन
प्रयाग सापडले नेत्री;
भालावरती ते मानसरोवर,
मानेवरती गंगोत्री

गया तुझ्या गालात मिळाली
रामेश्वर खांद्यावरती
मिळे द्वारका कमरेपाशी
अन काशी अवतीभवती

मोक्षाचीही नुरली इच्छा
नको कृपा याहून दुसरी
तीर्थाटन मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी
-विंदा करंदीकर

या कवितेत मुकुंद फणसळकरांनी तीर्थाटन ऐवजी तीर्थाटण उल्लेख केला आहे जो गुरगुट्या भातात दाताखाली कच यावी तसा मला खुपला.
________________
फुलवित चित्रे ...
फुलवित चित्रे चैत्र तुझ्या अंगी झाला धुंद
वक्षी फ़ळून वैशाख उरी लोटी दाह गंध
सौम्य जाईची मादवी भरी ज्येष्ठ तुझ्या गात्री
नेत्री आषाढ़ साठवी ओल्या काजळाच्या रात्री
मुखी घालितो श्रावण ऊन-पावसाची जाळी
रोमरोमी भाद्रपद ढाळी साळीची नवाळी
तुझ्या शब्दी अश्विनाच्या आकाशाचे चमत्कार
हाव-भाव लकारत करी कार्तिक शृंगार
तुझ्या चलीच्या डौलात मार्गाशीर्शाची श्रीमंती
गोड कन्तित पौषाच्या स्निग्ध चांदण्याची शान्ति
तुझ्या स्पर्शात माघाचे मोहरते अंतरंग
आणि हर्षात फाल्गुन उधळतो संध्यारंग
तुझ्यामुळे बारा मास अलिंगितो एक क्षणी
सार्या सृष्टीचे लावण्य पितो ओष्ठांच्या यौवने !

____________
किती किती राहशील सावध

किती किती राहशील सावध
मोडशील गं भाराने
उडते छ्प्पर धरिले का कधी
हटेल मिटल्या दाराने

पागल वारा पागल धारा
खेळ मांडिला वार्‍याने
सावरशील कशी
करीची पणती
वारे भरल्या पदराने
धडकन अंधारात विजेची
अगत्य का गं वातीचे
घालशील आवर प्राणा
शरीर हे तर मातीचे

ईथल्या रेघा, पाडीती भेगा
ये उघड्यावर, उघड्याने
घडी अशी ही पागल येते
क्वचित, कधीतरी भाग्याने
तोडून बंधन, पागल हो क्षण
वाग जरा अविचाराने
तुझ्या जगाला खुशाल म्हणू दे
झपाटली हिज जाराने

-बा. भ. बोरकर

.शुचि. Tue, 28/06/2016 - 02:09

____
इंग्रजी "एक लडकी को देखा तो ऐसा लगा ...." सॉर्ट ऑफ!
.

.

She's the voice I love to hear
Someday when I'm ninety
She's that wooden rocking chair
I want rocking right beside me
Everyday that passes
I only love her more
Yeah, she's the one
That I'd lay down my own life for

And she's everything I ever wanted
And everything I need
She's everything to me
Yeah she's everything to me

.शुचि. Tue, 28/06/2016 - 08:52

"फ्रँन्कली स्पीकींग" मध्ये मोदींची मुलाखत पाहीली. अवर्णनिय आवडली. किती पॉइझ आहे, चिंतन आहे, किती केपेबल वाटतात. फार चांगले नेतृत्व वाटते.

.शुचि. Tue, 28/06/2016 - 18:20

In reply to by अनुप ढेरे

अनुपजी किती कन्विन्सिंग बोलतात मोदी. इकॉनॉमिकली त्यांचे सर्व कार्यक्रम हे गरीब /फडतूस माणसाला केंद्रस्थानी ठेऊन केलेल आहेत. असेही ते म्हणाले. जे की पटवुनही दिले. थांबा ऑफीसात जाते मग लिहीते. कसे पटविले ते. त्यांनी सांगीतले की डाळी महाग झाल्या ती जबाबदारी केंद्रसरकार इतकीच राज्याचीही असते. राज्याला अनेक अधिकार दिएलेले आहेत - जसे मिनिमम साठा किती हवा, किती इम्पोर्ट/एक्स्पोर्ट करायचे याचे तारतम्य वगैरे.
गरीबांना (न्हावी, रिक्षावाला, दूधवाले वगैरे हातावरती पोट असणारे लोक) यांना त्यांच्या व्यवसायवृद्धीकरता पैसे दिले गेले. त्यामुळे रोजगारास मदत झाली. मॉल्स आठवड्यातील ७ दिवस उघड्या राहूस हकतात मग दुकाने का नाही. ती बंदी हटवली. त्यामुले दुकानदारांना दुसरा मनुष्य ठेवावा लागला - रोजगारात वृद्धी.
अस्वच्छतेचा सर्वात जास्त फटका गरीबाला बसतो. आजारी पडले - त्या ४ दिवसांची कमाई बुडली वगैरे. म्हणून स्वच्छता अभियान....
राबविल्या जाणार्‍या बर्‍याच योजना या दूर-पल्ल्यामध्ये परिणाम दाखविणर्‍या आहेत पण त्या आवश्यक आहेत - त्यांनी बरीच नावे सांगीतली.
काल परवा पर्यंत दहशतवादाच्या तक्रारीबद्दल भारताला कोणी सिरीअसली घेत नव्हते ते आता जग घेऊ लागले आहे .... इ. इ.

अनुप ढेरे Tue, 28/06/2016 - 21:35

In reply to by .शुचि.

दोन यु-टर्नबद्दल विचारलं असतं तर आवडलं असतं. आधार आणि GST. निवडणूकपूर्व स्टांस बदलण्याच कारण नक्की काये? मोदी सरकारने काँग्रेसच्या या आयडियांमध्ये असे काय बदल केले आहेत की आता त्या दोन गोष्टी स्वाकारार्ह झाल्या?

बाकी मिनिमम गव्हर्मेंट वगैरे तर बाराच्या भावात गेलं आहेच. त्याबद्दल काय विचारणार. :(

.शुचि. Tue, 28/06/2016 - 18:14

In reply to by चिंतातुर जंतू

पोलाइट. मी पहील्यांदा त्यांनी घेतलेली मुलाखत पाहीली. मला फारच नम्र व विनयशील वाटला तो मनुष्य त्या मुलाखतीत. पत्रकाराकरीता हा गुण उत्तम असे माझे म्हणणे नाहीच फक्त नीरीक्षण मांडले.

सैराट Tue, 28/06/2016 - 18:31

In reply to by .शुचि.

तुम्ही फार लवकर मत बनवता असं वाटतं शुचि. आर्णब काहीही असला तरी नम्र व विनयशील मनुष्य अजिबात नाही. अर्थात मोदींना 'अल्फा' ट्रीटमेंट देण्याकरता त्याने शेपूट घातलेय हे स्पष्टच आहे. मोदींमध्ये झालेले पॉझिटिव्ह बदल ह्या मुलाखतीत दिसून येतायेत. प्रवासाने शहाणपण येतं म्हणतात ;) त्याचं प्रत्यंतर.

अतिशहाणा Tue, 28/06/2016 - 19:46

In reply to by सैराट

प्रवासाने शहाणपण येतं म्हणतात

+१

इकॉनॉमिकली त्यांचे सर्व कार्यक्रम हे गरीब /फडतूस माणसाला केंद्रस्थानी ठेऊन केलेल आहेत. असेही ते म्हणाले. जे की पटवुनही दिले. थांबा ऑफीसात जाते मग लिहीते. कसे पटविले ते. त्यांनी सांगीतले की डाळी महाग झाल्या ती जबाबदारी केंद्रसरकार इतकीच राज्याचीही असते. राज्याला अनेक अधिकार दिएलेले आहेत - जसे मिनिमम साठा किती हवा, किती इम्पोर्ट/एक्स्पोर्ट करायचे याचे तारतम्य वगैरे.
गरीबांना (न्हावी, रिक्षावाला, दूधवाले वगैरे हातावरती पोट असणारे लोक) यांना त्यांच्या व्यवसायवृद्धीकरता पैसे दिले गेले. त्यामुळे रोजगारास मदत झाली. मॉल्स आठवड्यातील ७ दिवस उघड्या राहूस हकतात मग दुकाने का नाही. ती बंदी हटवली. त्यामुले दुकानदारांना दुसरा मनुष्य ठेवावा लागला - रोजगारात वृद्धी.
अस्वच्छतेचा सर्वात जास्त फटका गरीबाला बसतो. आजारी पडले - त्या ४ दिवसांची कमाई बुडली वगैरे. म्हणून स्वच्छता अभियान....
राबविल्या जाणार्‍या बर्‍याच योजना या दूर-पल्ल्यामध्ये परिणाम दाखविणर्‍या आहेत पण त्या आवश्यक आहेत - त्यांनी बरीच नावे सांगीतली.
काल परवा पर्यंत दहशतवादाच्या तक्रारीबद्दल भारताला कोणी सिरीअसली घेत नव्हते ते आता जग घेऊ लागले आहे .... इ. इ.

ठळक केलेला भाग वाचताना क्षणभर ममोसिंगांचीच मुलाखत वाटत आहोत असे वाटले.

चिंतातुर जंतू Tue, 28/06/2016 - 18:40

In reply to by .शुचि.

>> पोलाइट. मी पहील्यांदा त्यांनी घेतलेली मुलाखत पाहीली. मला फारच नम्र व विनयशील वाटला तो मनुष्य त्या मुलाखतीत.

ह्या संदर्भात ही व्यंगचित्रं रोचक वाटू शकतील -

Irregular by Manjul

Arnab Modi Interview

.शुचि. Tue, 28/06/2016 - 19:02

In reply to by अनुप ढेरे

हाण्ण!!! मला अर्नब यांचे कृतांतकाळ रुप पहायला मिळालेले नाही . काल मोदींसमोर, एकदम दास-मारुती रुपात पाहीले =))

.शुचि. Wed, 20/07/2016 - 22:42

छे ग आता कशी रहावी स्मृती मला तेव्हाची सगळी
होता का ग चंद्र तेधवा की होती ती रात्र वादळी?
छे ग आता ...
.
भिजल्या रानावरुन तेव्हा आला होता मातट गंध
की घमघमला होता तेव्हा तुझा मोकळा कुंतलबंध
चंद्रकळा होतीस नेसली ...चुकलो ना छे!
जास्वंदीची चुनडी, तूच सांग मी पुरता हरलो
मात्र एवढे स्मरते आहे होता त्याचा पोत रेशमी
का डोळे करतेस एवढे, चुकलो का ग सांग पुन्हा मी
छे ग आता ....
.
कानामधली तुझी कुंडले सल त्यांचे माझ्या गालावर
मलाच उलटे म्हणालीस तू असा कसा होतोस अनावर!
म्हणालीस का की हे सारे माझ्या मनीचे उनाड चाळे?
सांग काय कुजबुजलो आपण, विसरलीस का तूही सगळे
होतीस ना तू फुले माळली,.. नाही आठवणीत जराशी
मला वाटते बकुळ फुलांचा गजरा होता तुझिया पाशी
छे ग आता कशी रहावी ...
.
साधी होतीस तरी त्या दिशी लाविलेस वाळ्याचे अत्तर
नाही मग हा संभ्रम माझा, तुझाच किंवा मीच निरुत्तर
एक मात्र आठवते निश्चित पहाट झाली होती लवकर
भिजले होते भाळ दवाने काटा फुलला अंगांगांवर
माझा कोट तुझ्या खांद्यावर,शाल तुझी अन माझ्या देही
चुकलो का मी पुन्हा सांग मग कशी वाजली थंडी नाही!
.
छे ग आता कशी रहावी स्मृती मला तेव्हाची सगळी
होता का ग चंद्र तेधवा की होती ती रात्र वादळी?